Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

३१ जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यभर मूक मोर्चे निघाल्यानंतरही राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवणे या मागण्यांसाठी मुंबई येथे ३१ जानेवारीला राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात क्रांती मोर्चाचे राज्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आकाशवाणी चौकातील बिग बाजार इमारतीत गुरुवारी सकाळी पाच विद्यार्थिनींच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यभरातील तीन हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यस्तरीय मोर्चाचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. येत्या ३१ जानेवारीला मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा व तालुकास्तरावर बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली जाणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यात समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र सेल उघडण्यात आला आहे. या माध्यमातून फेसबुक, व्हॉटसअॅप या सोशल साइटसह दैनंदिन बैठकांचे नियोजन केले जाणार आहे.

मेटे यांना विरोध
या बैठकीत आमदार विनायक मेटे बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. आमदार असूनही विधान परिषधेत आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे मांडत नसल्याचा आरोप करण्यात आला, तर शिवस्मारक आणि आरक्षणाच्या मुद्यावर नेहमी आग्रही आहे, असे मेटे यांनी सांगितले, मात्र काही वेळ कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाछपाईचे काम ब्रिटिश कंपनीला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात 'मेक इन इंडिया'चा डंका वाजवत असताना नोटाछपाईचं काम मात्र इंग्लंडस्थित 'डे ला रू' कंपनीला देण्याचा घाट सरकारने घातला आहे. गंभीर बाब म्हणजे 'डे ला रू' कंपनीला केंद्रीय गृहमंत्रालयाने काळ्या यादीत टाकलं असताना याच कंपनीवर पुन्हा विश्वास टाकण्यात आला आहे.

'डे ला रू' कंपनीचं मुख्यालय इग्लंडमधील हॅम्पशायर येथे आहे. ही कंपनी चलन, पासपोर्ट आणि टॅक्स स्टॅम्प छपाईसाठी प्रसिद्ध आहे. जवळपास २० देशांचं चलन आणि पासपोर्ट ही कंपनी छापून देते. भारतानेही १० वर्षांपूर्वी या कंपनीकडून चलनछपाई करून घेतली होती. मात्र, काही आक्षेपार्ह बाबी पुढे आल्याने या कंपनीचं कंत्राट थांबवून गृहमंत्रालयाने या कंपनीला काळ्या यादीत टाकलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा याच कंपनीला चलनछपाईचं कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारतात सध्या 'मेक इन इंडिया'चे वारे वाहत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या 'मिशन'मध्ये महाराष्ट्र सरकार मोठा हातभार लावत आहे. असे असताना राज्य सरकारने या परदेशी 'डे ला रू' कंपनीवर विशेष मेहेरबानी दाखवली आहे. या कंपनीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक करार केला असून कंपनीला औरंगाबादमधील शेंद्रा 'एमआयडीसी'त १० एकर जागाही देऊ केली आहे. गंभीर बाब म्हणजे नाशिक सिक्युरिटी प्रेसमधील कर्मचारी संघटनेने या कंत्राटाला तीव्र विरोध केला आहे. शिवसेनेचे नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे यांनीही या कंत्राटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तरीही कंपनीचे घोडे पुढे दामटवण्यात आले आहेत.

दरम्यान, चलनातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी केली असताना दुसरीकडे नोटाछपाईसारखं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील काम एका परदेशी कंपनीकडे देण्याचे प्रयोजन काय, असा सवालही विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ कारणांसाठी शहरात वृक्षतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरासमोर कचरा पडतो या कारणामुळे झाड तोडण्याची परवानगी मागणारे शेकडो अर्ज महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे दाखल होतात. झाड तोडण्यासाठी किरकोळ कारण असलेल्या अशा अर्जांचे प्रमाण ९५ टक्के असते. मात्र, परवानगी नसताना वृक्षतोडीचे प्रमाण कायम आहे. कायदेशीर कारवाईची माहिती नसल्यामुळे वृक्षतोड वाढून शहर उजाड झाले आहे.
शहराचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असते. प्रत्यक्षात रस्ता रूंदीकरण, नवीन बांधकाम आणि नागरिकांची उदासीनता वनक्षेत्र घटवण्यास कारणीभूत ठरली आहे. औरंगाबाद शहरात झाडांचे प्रमाण फक्त साडेचार टक्के आहे. दरवर्षी जून महिन्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊनही मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांना वनक्षेत्र वाढवता आले नाही. झाडांचे संरक्षण करण्याबाबत शहरातील नागरिकांमध्ये कमालीची उदासीनता आहे. योग्य कारणांसाठी झाड तोडण्याची परवानगी देणे आणि शहरातील झाडांची निगराणी राखण्यासाठी महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष मनपा आयुक्त असून स्वयंसेवी संस्थांचे सदस्य समितीत आहेत. समितीकडे झाड तोडण्याची परवानगी मागण्यासाठी शेकडो अर्ज आले आहेत. मात्र, बहुतेक कारणे आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. झाड घरावर कोसळेल, अंगणात कचरा पडतो, घराचा दर्शनी भाग फांद्यांनी झाकला आहे अशा कारणांसाठी झाड तोडण्याची परवानगी मागण्यात आली आहे. एकूण अर्जांपैकी ९५ टक्के अर्ज या कारणांमुळे फेटाळले जातात. अर्जासोबत झाडांचे दोन-तीन बाजुने काढलेले फोटो जोडलेले असतात. विद्युत तारांना अडथळा ठरत असेल आणि झाड धोकादायक स्थितीत असल्यास तोडण्याची परवानगी मिळते. अंगणात कचरा पडतो म्हणून झाड तोडण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जांचा ओघ अजूनही कायम आहे.

जागरूकतेचा अभाव
प्रदूषण नियंत्रण, धुळीचे कण शोषणे, शुद्ध हवा देणे अशी महत्त्वाची कामे झाडे करतात. मात्र, नागरिकांना झाडांबद्दल आस्था नाही. बहुतेकांचा झाड तोडण्यावर भर आहे. कायदेशीर कारवाईची भीती नसल्यामुळे परवानगी नसताना सर्रास झाडे तोडली जात आहेत. मागील दोन महिन्यात आकाशवाणी परिसर, टिळकनगर, उत्तमनगर येथे वृक्षतोड झाली. मनपा प्रशासन कारवाई करीत नसल्यामुळे शहर उजाड झाले आहे.

झाड खरेच धोकादायक असेल तरच मनपा आयुक्त आणि इतर सदस्य वृक्षतोडीस परवानगी देतात. सध्या वृक्ष प्राधिकरण समितीला मर्यादित अधिकार आहेत. वृक्षतोड झाल्यानंतरही कारवाई करण्यात अडचणी येतात.
- रवी चौधरी, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती

मटा भूमिका

ही वेळ एकजुटीची

एखादे झाड ताडण्यात नागरिकांना काही गैर वाटत नाहीच, पण वृक्ष वाचविण्याची जबाबदारी असलेले वन खाते आ​णि महापालिकेलाही त्याचे सोयरसूतक नाही. त्यामुळे कितीही पाऊस पडला तरी शहराचे हिरवे आवरण संपुष्टात येत चालले आहे. रस्ते, घरे आ​णि वाहने धुळीने माखले आहेत. आजारांचे प्रमाणही वाढत आहे. वाहनांचे प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी झाडे उपयुक्त ठरतात, हे जबाबदार अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. पर्यावरणवादी संघटना आणि संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन दबाव वाढविला नाही, तर झाडांची कत्तल अशीच सुरू राहील. वृक्षतोड हे क्रौर्य आहे आ​णि त्यासाठी कायद्यात शिक्षेच्या ज्या तरतुदी आहेत, त्यांचा अवलंब करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएमटी बंद होणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद औद्योगिक वसाहतीतील सर्वात जुन्या उद्योगांपैकी असलेल्या केंद्र सरकारच्या अखत्यारितील एचएमटी ही कंपनी बंद होणार नाही. कंपनीचे विस्तारीकरण करण्यासाठी १९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मासिआ व एमटीडीसीच्या वतीने आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ औद्योगिक प्रदर्शनात आयोजित इंजिनीअरिंग या विषयावरील परिसंवादाचा समारोप गीते यांच्या उपस्थितीत झाला. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘यापूर्वीच्या दौऱ्यात मी एचएमटी च्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील युनिटला भेट दिली. या युनिटचे विस्तारीकरण करण्याचे केंद्र सरकारने ठरविले. त्या दृष्टीने आढावा घेतला. एचएमटी बंद होणार की काय, अशा चर्चेमुळे कामगारवर्गात अस्वस्थता होती, पण कंपनी बंद होणार नाही. उलट त्याचे विस्तारीकरण केले जाईल.’
औरंगाबाद एचएमटीसाठी १९ कोटींची तरतूद केली आहे. औरंगाबाद युनिटमध्ये डेअरी उद्योगासाठी लागणारी उत्पादने बनविली जातात. वास्तविक येथे जागा उपलब्ध आहे. विविध सुविधा आहेत, त्यामुळे विस्तारीकरणात एचएमटीमध्ये फूड प्रोसेसिंगसाठी लागणारी मशीनरी उत्पादित करण्याचे प्रयत्न आहेत. त्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमद्ये (डीएमआयसी) सरकारी मोठा उद्योग आणण्यासंदर्भात मागे हालचाली झाल्या होत्या, पण अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्याबाबत अवजड उद्योग खात्याकडून काही उपाययोजना होणार आहेत काय, या प्रश्नावर गीते म्हणाले,‘डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग येण्यासंदर्भात सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. किंबहुना सरकारी उपक्रमाचा एखादा मोठा प्रकल्प येथे आणण्याविषयी मी आग्रही आहे. रेल्वे, संरक्षण खात्याने एक युनिट येथे सुरू करावे, यासाठी मी स्वतः बोलणी करणार आहे.

नवीन अॅटो उद्योग औरंगाबादेत यावेत
औरंगाबाद : राज्यात पुण्यानंतर मोठे अॅटोमोबाइल हब औरंगाबादमध्ये आहे. त्यानंतर तमिळनाडू आणि हरियाणाचा क्रमांक आहे. गेल्या काही वर्षांपासून नवीन अॅटो उद्योग तमिळनाडूमध्ये जात आहेत. ते उद्योग इकडे यावेत यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. कारण अॅटो इंडस्ट्रीला लागणारे सुटे भाग औरंगाबादेत तयार होऊन जगातील ८० देशांमध्ये जातात. या भागातील पोटॅन्शिअलचा पुरेपूर उपयोग व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. इंजिनीअरिंग विषयावरील परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, मासिआ अध्यक्ष विजय लेकुरवाळे, प्रदर्शन समन्वयक भारत मोतिंगे, संतोष कुलकर्णी, अर्जुन गायके यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. गीते म्हणाले, की औरंगाबादेत स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाचा (सेल) डेपो मराठवाड्या यावा, यासाठी खूप वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. उद्योजकांनी त्याचा पाठपुरावा करावा, मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करेन. खैरे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची लॉबी, आयुक्तांना भारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या नगररचना विभागात प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्याला पाठवण्याची तयारी शासनाने केली होती, पण याची कुणकुण लागल्यामुळे पालिकेतील लॉबीने त्या अधिकाऱ्याचा परस्पर काटा काढला. त्यामुळे महापालिकेच्या नावाने निघणारी त्या अधिकाऱ्याची ऑर्डर नगररचना विभागाच्या औरंगाबाद शाखेच्या नावाने निघाली. या सर्व प्रकाराचा आयुक्तांना शेवटपर्यंत पत्ता लागला नाही.
टीडीआर घोटाळा प्रकरणात पालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक डॉ. डी. पी. कुलकर्णी यांना निलंबित केले आहे. त्यांच्या जागी शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवावा यासाठी त्यांनी पत्रव्यवहार देखील केला. १ जानेवारी रोजी सहायक संचालकपदावर प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिला जाईल, असे आश्वासनही शासनाकडून मिळाले. त्यामुळे नवीन वर्षात नवीन सहायक संचालक नगररचना विभागाला मिळेल, असे बोलले जाऊ लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी देण्यासाठी नगररचना विभागाच्या पुणे येथील संचालक कार्यालयातून हालचाल सुरू झाली. एका अधिकाऱ्याच्या नावाने ऑर्डर तयार करून ती मुंबईला नगरविकास खात्याच्या सचिवांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आली. याची माहिती महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या लॉबीने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस मुंबईत ठाण मांडले आणि त्या अधिकाऱ्याची महापालिकच्या नावाने तयार होणारी ऑर्डर बदलून घेतली. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला महापालिकेच्या ऐवजी नगररचना विभागाच्या औरंगाबाद शाखेत पोस्टिंग मिळाली आणि तो अधिकारी ३१ डिसेंबर रोजी औरंगाबाद शाखेत रुजू झाला.
महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्याचा परस्पर काटा काढल्याचा आनंद पालिकेच्याच नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांना झाला आहे. आपण मुंबईत लावलेली फिल्डिंग उघड होऊ नये यासाठी आता लॉबी प्रयत्न करत आहे.

‘त्या’ लॉबीत कोणकोण ?
नगरविकास खात्याने ज्या अधिकाऱ्याच्या नावाने महापालिकेत प्रतिनियुक्तीसाठी ऑर्डर तयार केली होती, त्या अधिकाऱ्याची ऑर्डर मंत्रालयात जाऊन बदलणाऱ्या महापालिकेतील ‘त्या’ लॉबीत कोणकोण आहेत या बद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. नगररचना विभागात प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणण्याच्या आयुक्तांच्या प्रयत्नात खोडा घालणाऱ्यांचा शोध खुद्द आयुक्तांनीच घ्यावा, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता शिबिराला साताऱ्यात प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
सातारा, देवळाई या दोन गावांचा समावेश होऊन वर्ष झाले तरी अद्याप येथील बांधकाम परवानगी, मालमत्तांबाबत नियमित करणे आदी प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागतर्फे शुक्रवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले असले, तरी अनेक मालमत्ताधारकांच्या अडचणी कायम आहेत.
महापालिकेतर्फे बांधकाम परवानगीसाठी पहिल्यांदाच असे शिबिर घेण्यात आले. वॉर्ड कार्यालयाच्या आवारात झालेल्या या शिबिराला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनातर्फे मंडप, खुर्ची व माईकची व्यवस्था करण्यात आली होती. बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळे अनेकांचे बांधकाम रखडले आहेत. विनापरवानगी सुरू असलेले बांधकाम थांबवण्यात येते. मालमत्तांचे नियमितीकरण, १५ ते २० वर्षांपूर्वी ग्रामपंचायतची परवानगी घेऊन बांधलेले घरे, ४७ ब साठी भरलेले शुल्क आदींबाबत नागरिकांनी प्रश्न विचारले. मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे नगररचना कार्यालयात जमा करून नियमित कराव्‍यात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे, सायली जमादार, सविता कुलकर्णी, सुधीर फुलवाडकर, ज्ञानेश्वर बोरसे, महेश चौधरी, सोमीनाथ शिराणे, नगररचनाचे सहायक संचालक अविनाश देशमुख, संजय चामले, वॉर्ड अधिकारी शैला डाके, अभियंता पी. जी. पवार, राजू जाधव, ताहेर पटेल, किरण नरवडे, राहुल शिंगारे आदींसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

नागारिकांच्या अडचणी, समस्या समजून घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कागदपत्रे पाहिल्यानंतरच निर्णय घेता येईल.
-अविनाश देशमुख, सहायक संचालक, नगररचना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगविश्वाची प्रदर्शनात गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी साप्ताहिक सुटी असते. मासिआने भरविलेल्या अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो औद्योगिक प्रदर्शनास भेट देण्यासाठी उद्योगविश्वाची कलाग्रामच्या मैदानावर गर्दी झाली होती. दिवसभर उद्योग, व्यावसायिक क्षेत्रासह अभियांत्रिकी, पॉलिटेक्निकचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते. शनिवारी अनेक शाळांचे विद्यार्थी प्रदर्शनस्थळी भेट देण्यासाठी येणार आहे.
इंजिनीअरिंग, अॅटोमोबाइल, कृषी, अन्नप्रक्रिया, फार्मास्युटिकल्स उद्योगांसह अनेक घरगुती तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ३५०हून अधिक उद्योगांचे स्टॉल कलाग्राम मैदानावर भरविलेल्या प्रदर्शनात लावण्यात आलेले आहेत. सकाळी दहा ते दोन हा वेळ उद्योग क्षेत्राशी संबंधितांसाठी राखीव असल्याने या वेळेत मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी औद्योगिक सुटी असल्याने दुपारच्या सत्रातही कामगार, व्यावसायिकांची गर्दी होती. उत्पादनाच्या विभागणीनुसार डोममध्ये मांडण्यात आलेल्या आकर्षक सजावटी, भेट देणाऱ्यांना माहिती देताना काही ठिकाणी देण्यात येणारे डेमो पाहण्यासाठी गर्दी झाली होती. मेड इन औरंगाबादच्या दालनासमोर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती. प्रदर्शनामध्ये इंजिनीरिंग, कृषी, ऑटोमोबाईल अशा विविध स्टॉल बरोबरच मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनाचे आगळे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रदर्शनासाठी मसिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, उपाध्यक्ष किशोर राठी, प्रदर्शन समन्वयक संतोष कुलकर्णी आणि भारत मोतींगे, प्रसिद्धीप्रमुख अर्जुन गायके, राहुल मोगले, माजी अध्यक्ष संतोष चौधरी, भगवान राऊत, बालाजी शिंदे, सुनील भोसले, सुनील किर्दक, अभय हंचनाळ, नारायण पवार, अब्दुल शेख, मनीष बाफना, कुंदन रेड्डी, फुलचंद जैन, गजानन देशमुख, मनीष अग्रवाल, उदय गिरधारी, प्रसाद मुळे, अनुप काबरा, ज्ञानदेव राजळे, अनिल पाटील, संदीप जोशी, सचिन गायके आदी पुढाकार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मणचावडी-एमजीएम रस्त्यासाठी नवा वायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लक्ष्मणचावडी ते एमजीएम रस्त्याच्या कामाची निविदा १५ दिवसात काढण्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मान्य केले. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा, जालना रोडवर वाहनांची वर्दळ खूप वाढली आहे. जालना रोडवर अपघात झाला तर आम्ही महापालिकेला जबाबदार धरू, असा इशारा आमदार अतुल सावे यांनी यावेळी दिला.
लक्ष्मणचावडी ते एमजीएम रस्त्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात महापौर भगवान घडमोडे यांच्या उपस्थितीत बैठक घेणअयात आली. या बैठकीला आमदार अतुल सावे, सभागृहनेते गजानन मनगटे, विरोधीपक्षनेता अय्युब जहागीरदार, गटनेता गजानन बारवाल, भाऊसाहेब जगताप, नगरसेवक कमलाकर जगताप, आशा भालेराव, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, नगररचना विभागाचे सहायक संचालक ए. बी. देशमुख, विधी सल्लागार अपर्णा थेटे उपस्थित होते.
या रस्त्याचे प्रकरण कोर्टात प्रकरण सुरू असल्याने आतापर्यंत काम सुरू करता आले नाही, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. रस्त्याच्या कामाचे निविदा काढू नका असे कोर्टाने आदेश दिले आहेत का, अशी विचारणा महापौरांनी केली असता निविदा काढण्यासंदर्भात कोर्टाचा आक्षेप नाही, असे सिकंदर अली यांनी स्पष्ट केले. कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून निविदा काढा, असे आदेश महापौरांनी दिले. अतुल सावे म्हणाले, मला आमदार होऊन सव्वादोन वर्ष झाले आहेत. या काळात या रस्त्याबद्दल तीन आयुक्तांसबत चर्चा झाली, दोन वेळा साइट इन्सपेक्शन झाले. रस्त्याच्या संदर्भात कोर्टात शपथपत्र सादर करण्याचे ठरले होते, अद्याप शपथपत्र का दाखल करण्यात आले नाही, अशी विचारणा त्यांनी केली. जालना रोडवर वाहतूक व अपघात वाढले आहेत. अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यापुढे जालना रोडवर अपघात झाल्यास या अपघाताला महापालिका जबाबदार आहे, असा फलक लावू, असा इशारा सावे यांनी दिला.
महापौरांनी विधीसल्लागारांसह उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून तीन टप्प्यात रस्त्याच्या कामाचे टेंडर काढण्याचे ठरले. १५ दिवसात निविदा काढू, असे सिकंदर अली यांनी स्पष्ट केले. २१ जानेवारीला रस्त्याच्या कामाचा नारळ फोडू, असे देसरडा यांनी जाहीर केले.

अंत्ययात्रेत जाणे टाळतो
लक्ष्मणचावडी ते एमजीएम या रस्त्याची साइट व्हिजिट खूपवेळा झाली. आता त्या रस्त्याने गेले तरी नागरिक थांबवतात आणि रस्ता केव्हा होणार हे विचारतात. त्यामुळे कैलासनगरातील स्मशानभूमित अंत्यसंस्कारासाठी जाण्याचे मी टाळतो. घरी जाऊन संबंधितांची भेट घेतो, असा उल्लेख करून आमदार अतुल सावे यांनी काम होत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पित्याचा निर्घृण खून, दोन् मुलांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तीव्र घरगुती वादातून पित्याचा काठ्या-लोखंडी पहारीने निर्घृण करणाऱ्या दोन्ही मुलांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी शुक्रवारी (६ जानेवारी) ठोठावली. विशेष म्हणजे या घटनेची एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्यानंतरही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणी ज्या गावात ही घटना घडली त्या गावातील रहिवासी विठ्ठल सखाराम कुबेर (३८, रा. पिंपळकुटा, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत भगवानदादा सोनवणे (५०, रा. पिंपळकुटा) हे त्यांचा मोठा मुलगा व आरोपी रामेश्वर (वय २५) आणि त्याची पत्नी मनीषा यांच्यासोबत शेतवस्तीवर राहात होते, तर घरातील वाद-भांडणांमुळे त्यांचा धाकटा मुलगा व आरोपी गणेश उर्फ ज्ञानेश्वर, त्याची पत्नी आणि भगवानदादा यांची पत्नी हे गावामध्ये दुसरीकडे राहात होते. भगवानदादा यांना असलेली मद्यपानाची सवय व घरातील तसेच शेत जमिनीवरून असलेल्या वादांमुळे भगवानदादा व त्यांच्या मुलांमध्ये वारंवार भांडणे होत होती. १६ मार्च २०१५ रोजी रामेश्वर रात्री आठच्या सुमारास घरी आला; पण घराचे दार लवकर उघडले नाही म्हणून त्याने त्याच्या पत्नीला शिविगाळ केली. त्यावेळी पत्नीला शिविगाळ का करतो, असे म्हणत भगवानदादांनी रामेश्वरला सुनावले. त्यानंतर रामेश्वर गावात गेला व सोबत भाऊ गणेशला घेऊन आला. त्यानंतर दोघांनी भगवानदादांना काठ्या व लोखंडी पहारीने बेदम मारहाण केली. या प्रकारात रामेश्वरची पत्नी मनीषा पडली असता, तिलाही दोघांनी मारहाण केली. त्यामुळे तिथून पळ काढत तिने आसपासच्या गामस्थांकडून मदतीची याचना केली. ‘तुमची भांडणे नेहमीचीच आहेत, त्यात आम्ही पडणार नाही’ असे सांगून ग्रामस्थांनी मदत करण्याचे टाळले. मात्र गोंधळ-आवाजामुळे फिर्यादीसह विश्वंभर दाभाडे, कारभारी कोरडे, जिजा दाभाडे व इतर ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले असता, दोघे आरोपी पळून गेले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी भगवानदादांना घाटीत आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर त्याचदिवशी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध कलम ३०२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. घटनेपासून फरार असलेल्या दोन्ही आरोपींना १७ मार्च २०१५ रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून आरोपी कोठडीत आहेत. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. डी. कोकणे यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

शवविच्छेदनात शेकडो जखमांची नोंद
या प्रकरणी शवविच्छेदन अहवालामध्ये मृत भगवानदादा यांच्या डोक्यावर सुमारे ५० आंतरबाह्य गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय संपूर्ण शरीरावरही गंभीर इजा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. तसेच रामेश्वरच्या कपड्यावरील रक्ताचे डाग हे मृताच्या रक्ताचे असल्याचेही सिद्ध झाले.

जिजाबाईंची साक्ष ठरली महत्वाची
सुनावणीवेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी १२ साक्षीदार तपासून गुन्हा सिद्ध केला. यामध्ये दोघा आरोपींना जाताना पाहिलेल्या जिजाबाई दाभाडे तसेच डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. मात्र या घटनेची एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व आरोपी रामेश्वरची पत्नी मनिषा ही फितूर झाली. त्यानंतरही परिस्थितीजन्य पुरावा व इतर साक्षीदारांची साक्ष विचारात घेऊन कोर्टाने दोन्ही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महानगर समितीत नियुक्तीचा शिवसेनेत वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महानगर नियोजन समितीवरील नियुक्तीवरून स्थायी समिती सभापती व सभागृहनेते यांच्यात वादावादी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. समितीवरील नियुक्तीसाठी कोणत्या अधिकारात नावे दिली, असा सवाल करणाऱ्या सभापतिंना सभागृहनेत्यांनी ‘मातोश्री’ च्या दिशेने बोट दाखवले.
महानगर नियोजन समितीवर महापालिकेतून १९ नगरसेवकांनी नियुक्ती करायची आहे. त्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सहा नगरसेवकांमागे एक नगरसेवक या समितीवर नियुक्त केला जातो. त्यानुसार शिवसेनेने त्र्यंबक तुपे, कमलाकर जगताप, रेणुकादास वैद्य, आशा निकाळजे, रावसाहेब आमले, सचिन खैरे या सहा नगरसेवकांची नावे निश्चित केली. ही नावे उमेदवारी अर्जाच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात पोचवण्याची जबाबदारी सभागृहनेते गजानन मनगटे यांच्यावर देण्यात आली. मनगटे यांनी त्यासाठी नगरसेवकांना महापालिकेतील आपल्या दालनात बोलावले. स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले देखील तेथे आले. नियोजन समितीच्या यादीत आपले नाव नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मनगटे यांना जाब विचारला. कोणत्या अधिकारात तुम्ही ही नावे ठरविली, माझे नाव त्यात का घेतले नाही, असे ते मनगटे यांना तावातावाने विचारत होते. त्यामुळे अन्य नगरसेवक आवाक झाले. मनगटे यांनी मेघावाले यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नावे मी ठरवली नाहीत. मुंबईहून आलेल्या आदेशाचे मी पालन करीत आहे, असे त्यांनी मेघावाले यांना सांगितले. त्यानंतर मेघावाले यांनी वाद घालणे थांबवले व सभागृहनेत्याच्या दालनातून ते निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल’मुळे मार्केट‌िंगमध्ये क्रांती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उद्योग, व्यापारासह अनेक क्षेत्रांमध्ये डिजिटल मार्केटिंगने क्रांती केली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविणाऱ्या या माध्यमाचा अवलंब करून जगात क्रांती झाली आहे. संवादाचे एकेकाळी सिंगल सिस्ट‌िम असलेले माध्यम आता दुहेरी झाले आहे. उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी व्यवस्थापनासोबत कामगारांचाही महत्वाचा वाटा असतो. यासह अनेक विषयांवरील चर्चांनी शुक्रवारचा पहिला परिसंवाद गाजला.
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (मासिआ) कलाग्राममध्ये आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो २०१७ मध्ये इंजिनीअरिंग विषयावर दिवसभर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात उद्योजक राहुल धूत, इइपीसीचे संचालक रजत श्रीवास्तव, व्हीएलएफएमचे मुख्य फॅकल्टी फुरुहाशी ताकेयुकी यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात फिल्पकार्ट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेडच्या पब्लिशर नेटवर्कचे सहसंचालक कृष्णकुमार जवांधिया, उद्योजक मिलिंद केळकर आदींनी सहभाग नोंदविला. तिसऱ्या सत्रात समूह चर्चा झाली. त्यात प्रसाद कोकिळ, प्रा. मुनीष शर्मा, श्रीधर नवघरे, टी. एन. कंदाकुरे, राहुल धूत सहभागी झाले होते. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत परिसंवादाचा समारोप झाला.
राहुल धूत म्हणाले, की ध्येय निश्चित करून उद्योगात कार्यरत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षमता ओळखली गेली पाहिजे. मराठवाड्यात जागतिक दर्जाचे उत्पादन बनविणारे उद्योग आहे आणि या मातीत तो गुण आहे. फक्त त्याचा योग्य शोध घेतला जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण काम सुरू केले तर औरंगाबाद राज्यात नव्हे तर जगात अव्वल होईल. इंजिनीअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (ईईपीसी) रजन श्रीवास्तव यांनी लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाचा आलेख उपस्थितांसमोर मांडला. देशाचा विकास होताना या क्षेत्राचे महत्व डावलून चालणार नाही. लघु व मध्यम उद्योगांनी देशातील ४० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत २२० देशांना निर्यात केले जाते. भविष्यात यात आणखी वाढ होणार आहे.
‘व्हीएसएमई’चे मुख्य फॅकल्टी फुरुहाशी ताकेयुकी यांनी संवाद साधताना ग्राहक आणि उत्पादक यांच्या कार्यपद्धतीतून उत्कृष्ट उत्पादन समोर येते. व्हीएसएमई संकल्पनेत एक ग्राहक आणि चार पुरवठादार समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनाप्रमुखांच्या फोटोखाली बसणे टाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो खाली बसून काम करण्याचे टाळत महापौर भगवान घडमोडे यांनी शुक्रवारी दालनात बसण्याची दिशा बदलली. पूर्वीचे महापौर दक्षिणोत्तर बसत होते. घडमोडे यांनी पूर्व-पश्चिम, अशी दिशा धरली आहे.
शिवसेना-भाजप युतीमधील करारानुसार भाजपचे भगवान घडमोडे नुकतेच महापौर झाले आहेत. यापूर्वीचे तीन महापौर शिवसेनेचे होते. त्यामुळे दालनामध्ये महापौरांच्या खुर्चीमागे भिंतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. या फोटो खाली बसून शिवसेनेचे महापौर काम करीत असत. घडमोडे महापौर झाले, पण युतीत असल्यामुळे त्यांना शिवसेनाप्रमुखांचा फोटो काढून टाकणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी हा फोटो तसाच ठेवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी अचानक खुर्चीची दिशा बदलली आहे. त्यांची पाठ पाठ पश्चिमेकडे, तर तोंड पूर्वेकडे झाले आहे. त्यामुळे दालनात येणाऱ्या प्रत्येकावर त्यांची नजर पडणार आहे. २०१० पर्यंत महापौरांची आसनव्यवस्था अशीच होती, असे सांगितले जाते.

फक्त बदल करावा वाटला
दिशा बदलाबद्दल पत्रकारांनी घडमोडे यांना छेडले असता ते म्हणाले, कोणतीही दिशा शुभ किंवा अशुभ नसते. आपण चांगले काम केले, तर कोणत्या दिशेला तोंड करून बसतो व काम करतो याला काही महत्त्व रहात नाही. चांगला विचार करून सुरू केलेला दिवस शुभच असतो. त्याला खुर्ची किंवा दालनाच्या मर्यादेत अडकवणे योग्य होणार नाही. बदल करावा वाटला म्हणून आसन व्यवस्था बदलली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींना काढले वसतिगृहाबाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या नाशिक येथील विद्यार्थिनींच्या विद्यापीठ वसतिगृहातील खोल्यांचे कुलूप तोडून त्यांचे साहित्य बाहेर काढण्यात आले. ही खोली पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या पोलिसांना देण्यात आली आहे. या विद्यार्थिनी अजिंठा येथून शुक्रवारी रात्री नऊ वाजता परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नाशिकच्या एसएमआरके कॉलेजच्या १५ विद्यार्थिनी प्रा. स्नेहल एकबोटे यांच्यासह औरंगाबादमध्ये शैक्षणिक सहलीसाठी आल्या आहेत. त्यांनी परिचिताच्या माध्यमातून मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गेस्ट हाउसमधील खोल्या आरक्षित केल्या होत्या. प्रा. एकबोटे व विद्यार्थिनी गुरुवारी रात्री सात वाजता शहरात दाखल झाल्या. पण, गेस्ट हाउसमध्ये क्रीडा स्पर्धेसाठी आलेले पोलिस राहत असल्याने नवीन वसतिगृहातील चार खोल्या तेथील कर्मचाऱ्यांनी दिल्या, अशी माहिती प्रा. एकबोटे यांनी दिली. खोल्यांना कुलूप लावून या विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी अजिंठा येथे गेल्या. प्रा. एकबोटे व विद्यार्थिनी रात्री नऊ वाजता परत तेव्हा तीन खोल्याचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. ‘खोल्यांचे कुलूप तोडण्यात आले होते व त्या खोल्यांचा ताबा पोलिसांनी घेतला होता,’ अशी माहिती प्रा. एकबोटे यांनी दिली.
रितसर बुकिंग केलेले असतानाच याप्रकारे खोली बाहेर काढणे चूक आहे. वारंवार प्रयत्न करुनही विद्यापीठांचे कोणी जबाबदार अधिकारी उपलब्ध झाले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रा. एकबोट यांनी दिली. तीन खोल्याचे कुलूप तोडून सामान बाहेर काढलेले असल्याने नाईलाजाने सर्व १५ मुलींना एकाच खोलीत राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

एक दिवसासाठी खोल्या दिल्याचा दावा
वारंवार फोन करूनही विद्यापीठाच्या कोणी जबाबदार अधिकाऱ्यांने प्रतिसाद दिला नसल्याबद्दल विद्यार्थिनींसोबत असलेल्या प्रा. स्नेहल एकबोटे यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यापीठ कर्मचाऱ्याने खोलीचे कुलूप तोडून सामान बाहेर काढेल असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. हे सामान वसतिगृह रेक्टरच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. दरम्यान, क्रीडा स्पर्धेसाठी येणाऱ्या पोलिसांसाठी विद्यापीठातील खोल्या एक महिन्यापूर्वीच रितसर आरक्षित केल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. तर, पाहुण्या विद्यार्थिनींना फक्त एक दिवसासाठीच खोल्या दिल्या होता, असा दावा विद्यापीठाने केला आहे.


क्रीडा स्पर्धेनिमित्त शहरात पोलिस मोठ्या संख्येने आले आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, हे लक्षात घेऊन विद्यापीठाकडे जागा मागितली होती. त्यानुसार एक महिनाआधी बुकिंग केलेले आहे.
- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त

नाशिकच्या मुलींना केवळ एक दिवस राहण्याची परवानगी देण्यात आली होती. पण, त्यांना एका दिवसापेक्षा जास्त रहायचे आहे याची कल्पना नव्हती. विद्यापीठाने पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी वसतिगृह उपलब्ध करून दिले आहे. स्पर्धेसाठी पोलिस आल्याने त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी लागली.
-सुहास मोराळे, विद्यार्थी कल्याण संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका अभियंत्याच्या अतिक्रमणाची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी आपल्या राहत्या घरी अतिक्रमण केले असून, प्रशासन या अतिक्रमणाला पाठीशी घालत आहे. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून अतिक्रमण पाडण्याचे आदेश द्यावेत व चहल यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
श्रीराम बियाणी यांनी ही तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, चहल यांनी गारखेडा भागात म्हाडाच्या वसाहतीत घर घेतले आहे. तेथील आठव्या क्रमांकाचे घर चहल यांचे आहे. त्यांनी सामासिक अंतराबद्दलचे नियम पायदळी तुडवले आहेत. या घराचे वाढीव बांधकाम करताना महापालिकेची परवानगी किंवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. हे अतिक्रमण असून ते तत्काळ तोडून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी विनंती बियाणी यांनी केली आहे.

मी म्हाडाकडून घर घेतले असून ते म्हाडानेच बांधलेले असल्याने ते अधिकृत आहे. जास्तीच्या बांधकामाबद्दल एक वर्षापूर्वीच म्हाडाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे जास्तीचे बांधकाम अतिक्रमित आहे, असे म्हणता येणार नाही. त्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. मुद्याम त्रास देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची तक्रार केली जात आहे.
-सरताजसिंग चहल, कार्यकारी अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धागेदोरे : खुनाची उकल चोवीस तासांत

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com
Tweet : @rtaksalMT

२५ जानेवारी २०१६. सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. कर्मचाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत असतानाच टेबलवरील फोन खणखणला. कर्मचाऱ्याने फोन उचलला, ‘जय हिंद’ म्हणत नाही तोच फोन करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याने देवळाई परिसरात वन विभागाच्या जमिनीवर मृतदेह सापडल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत कर्मचाऱ्याने तातडीने थोरात यांना माहिती दिली. थोरात यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. साई टेकडीजवळ शासकीय वाहन पोचले. पुढे वाहनाने जाणे शक्य नव्हते. वन विभागाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सर्वजण अर्धा किलोमीटर पायीच घटनास्थळापर्यंत गेले. तेथील दृश्य मन हेलवणारे होते. साधारणपणे २० ते २५ वयोगटातील तरुणाचा तो मृतदेह होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केल्याच्या खुणा होत्या. काळा टी-शर्ट, जीन्स पॅन्ट आणि पायात चप्पल असलेल्या त्या तरुणाला जाळण्याचा प्रयत्नही मारेकऱ्यांनी केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

थोरात व त्यांच्या पथकाने परिसरात सर्च करत अन्य काही पुरावे, वस्तूचा शोध घेतला, पण हाती काही लागले नाही. ओळखपत्र वा अन्य कोणतीही वस्तू न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविणे अवघड होते. पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केल्यानंतर टी-शर्टवर ‘हिवाळे ग्रुप’ अशी छापील अक्षरे दिसून आली. त्या अनुषगांने पोलिसांनी पुढील तपासचक्रे फिरवली. हिवाळे लॉन्सचे संचालक नाना हिवाळे यांच्याकडे विचारणा केली. गणेशोत्सव काळात हिवाळे यांनी तीनशे ते चारशे जणांना अशी टी-शर्ट दिल्याचे समोर आले. त्यांनी स्वतः मृतदेहाची पाहणी केली, पण ओळख पटली नाही.
मृत तरुण हा सातारा, देवळाई, गारखेडासह कचनेर, शिवगा तांडा आदी परिसरातील असावा, अशी शक्यता गृहीत धरत शहर पोलिसांसह तेथील खबरे, पोलिसमित्र आदींना माहिती देण्यात आली. शहर पोलिसही घटनास्थळी आले. जवाहरनगर, मुकुंदवाडी, एमआयडीसी सिडको, सातारा पोलिसांना मृताचा फोटो पाठविण्यात आला. त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून कुणी तरुण बेपत्ता (मिसिंग) आहे का, याचा शोध सुरू झाला. पंचनामा झाल्यानंतर दुपारी मृतदेह घाटीत पाठविण्यात आला. पोलिस नाईक बापुराव चव्हाण यांनी शासनातर्फे फिर्याद दिली, त्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, तत्कालीन अप्पर अधीक्षक श्रीधर, उपअधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. मृत तरुण कोण, खून कोणी व का केला या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम सुरू झाले. सायंकाळी प्रिया थोरात यांना बंदोबस्तासाठी शेंद्रा परिसरात जावे लागले. तेथे मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमधून त्यांना फोन आला. मुकुंदवाडी परिसरातील एक मुलगा मिसिंग आहे, त्याच्या पालकांना पाठवतो, असा निरोप अधिकाऱ्यांनी दिला.

धागेदाेरे हाती येण्याची शक्यता वाढल्याने थोरात यांनी वरिष्ठांना माहिती देत तातडीने पोलिस स्टेशन गाठले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास भेदरलेल्या अवस्थेत एक महिला त्यांना भेटण्यासाठी आली. एकुलता एक असलेला मुलगा २३ जानेवारी रोजी सायंकाळी घराबाहेर गेला, पण तो परत आला नाही, असे ती सांगत होती. त्या महिलेस शांत करत तपास अधिकाऱ्यांनी मुलाचे वर्णन, कपडे याबाबत विचारणा केली. मृतदेहाच्या वर्णनाशी ते मिळते-जुळते होते. त्या महिलेला मृतदेह कसा दाखविणार, असा प्रश्न पडल्याने पोलिसांनी तिच्या पतीबाबत विचारणा केली. ते चिकलठाणा येथील एका कंपनीत नोकरीस असल्याचे समजताच पोलिसांनी कंपनीत जाऊन त्यांना तेथून ठाण्यात आणले. दोघेही खूप भेदरलेले होते. पोलिसांनी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. थोड्या वेळाने त्यांना मृतदेहाचे कपडे व मृतदेह दाखविण्यात आला. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच ते पालक हादरून गेले. त्यांचे सांत्वन करत पोलिसांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
मृतदेह हा राहुल बाळू लाडंगे (वय १९, रा. अंबिकानगर) यांचा असल्याचे समोर आले. राहुल हा सिडको परिसरातील एका कॉलेजात बारावीत शिकत होता. पॉकेटमनीसाठी तो केटरिंगच्या कामासाठी जात असे. त्याचा मोबाइल क्रमांक; तसेच त्यांचे कुणाही वैर होते का, मित्र कोण आदी माहिती घेत पोलिसांनी तपासाची पुढील दिशा ठरवली.

गुन्हा दाखल होऊन दुसरा दिवस उजाडला. तोपर्यंत पोलिसांचा सर्व दिशांनी तपास सुरू झाला होता. कॉलेज व परिसरातील सखोल चौकशीत प्रेमप्रकरणातून हा खून झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच दरम्यान तांत्रिक साधनांच्या मदतीने व खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून काही महत्त्वाचे धागेदारे पोलिसांच्या हाती आले आणि उमेश बबन चव्हाण (वय २०) व सचिन आत्माराम चंदनशिव (वय २०, दोघे रा. मुकुंदवाडी) या संशयितांचा शोध सुरू झाला. दोघे आपापल्या घरी असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले.

...म्हणून केला खून

राहुल, उमेश व सचिन हे तिघे मित्र. त्यात राहुल व उमेश यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत. त्यातूनच उमेशच्या मनात राहुलविषयी अढी निर्माण झाली आणि त्यातूनच त्याने सचिनच्या मदतीने राहुलचा खून केल्याचे तपासात समोर आले. तशी कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. २३ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास उमेश चव्हाण व सचिन चंदनशिवे यांनी राहुलला फिरायला जाण्यासाठी बोलावून घेतले. तिघे मुकुंदवाडी परिसरातून रिक्षाने साई टेकडीकडे निघाले. रस्त्यात उमेश व सचिन यांनी मद्यप्राशन केले. साई टेकडी येथे सायंकाळी ते पोहचले. त्यांनी रिक्षा सोडून दिली. त्यानंतर राहुलने साईदर्शनाचा आग्रह धरला, पण त्या दोघांनी आपण फिरून येऊ, असे म्हणत त्याला पायी निर्जनस्थळी नेले. तेथेही त्यांच्यात वाद झाला. जवळपास कुणी नसल्याची खात्री करून राहुलवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यांनी छोट्या बाटलीत रॉकेलही आणले होते. मृतदेह पेटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्नही त्यांनी केला. राहुलचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळ काढला. राहुलचा मोबाइल टेकडीजवळील एका खदानीत फेकून दिला. चाकू दुसऱ्या खदानीत, तर रॉकेलची बाटली बाळापूर रस्त्यावरील एका विहिरीत फेकल्याचे तपासात समोर आले. राहुलचा मोबाइल व अन्य वस्तू खदानीतून काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची मदत घ्यावी लागली. तपासांती पोलिसांनी कोर्टात दोषारोपत्र सादर केले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तपास अधिकारी थोरात, कर्मचारी शकील शेख, जनार्दन भुरमे, देविदास सास्ते, संदीप जाधव, अर्जुन राठोड, आवेज शेख यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कांचन चाटे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांच्या चाकू हल्ल्यात दोन शाळकरी मुले जखमी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शाळेत निघालेल्या तिघांवर विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने चाकूहल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हडको परिसरात घडली. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
दहावी वर्गात शिकणारे तिघे मित्र शनिवारी मित्राच्या घरी जाऊन तेथून वाहनाने वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शाळेत जाणार होते. ते तिघे गप्पा मारत सिद्धार्थनगरसमोरील होमगार्ड मैदानासमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांना अडविले. जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करीत अचानकपणे तिघांवर हल्ला चढविला. त्यातील एकाने स्वत:ला वाचविले. मात्र, दोन विद्यार्थी चाकूहल्ल्यात जखमी झाले. त्यापैकी रोहित नावाच्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर हडकोतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सोळा ते सतरा वयोगट
मारहाण करणाऱ्या पैकी एकजण जखमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व विद्यार्थी हे सोळा ते सतरा वयोगटातील असून अद्याप तक्रार दाखल नसल्याचे सिटी चौक पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणला पुन्हा महापालिकेचा दणका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आणि महावितरण यांच्यातले शीतयुद्ध पुन्हा पेटले असून, पालिकेच्या जागेवरील विद्युत रोहित्र (डीपी) आणि कार्यालयांना २०१० पासून व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारण्याची तयारी पालिकेने केली आहे. २३५ डीपींवर १ कोटी ७६ लाख ९९ हजारांचा मालमत्ता कर आकारल्याचे करमूल्य निर्धारण विभागाने तयार केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
बिल थकल्यामुळे महावितरणने महापालिकेच्या इमारतींची वेळोवेळी वीज कापली. जीटीएलकडे वीज वितरणाचा कारभार असताना जीटीएलने बिलापोटी क्रांतिचौक उड्डाणपुलाची वीज तोडली होती. मध्यंतरी महापालिका मुख्यालय व सिद्धार्थ उद्यानाच्या ४२ लाख रुपयांच्या थकित बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचीही वीज कापली होती.
महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागांवर महावितरणने डीपी बसवल्या आहेत. त्यांना महापालिका आतापर्यंत कर लावत नव्हती. वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वाढत गेल्यामुळे महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पालिका मालकीच्या जागांवर उभारलेल्या रोहित्रांना व कार्यालयांना व्यावसायिक दराने मालमत्ता कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या नियमानुसार मागील पाच वर्षांची थकबाकी वसूल करता येते, हे लक्षात घेऊन २०१० वर्षांपासूनची थकबाकी आकारण्यात आली आहे.

...अशी केली आकारणी
शहरात एकूण ५७९ डीपी असून त्यापैकी २३५ डीपींवर करआकारणी करण्यात येणार आहे. कर आकारणी करण्यात येत असलेल्या डीपींचे एकूण करयोग्य मूल्य २६ लाख ४ हजार रुपये होते. एका वर्षाचा कर व्यवसायिक दराने २५ लाख ६० हजार रुपये होतो. २०१०पासूनची थकबाकी १ कोटी ५१ लाख ३९ हजार रुपये इतकी होते. थकबाकी व चालू वर्षाचा कर मिळून एकूण १ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपये आकारण्यात आले आहेत.

-
भूमिका

-
महावितरणची दंडेली
-
महापालिका लोकोपयोगी सेवा देते आणि त्यासाठीच विजेचा वापर करते, परंतु पालिकेला व्यावसायिक दराने वीज देऊन महावितरण कंपनीने भरमसाट बिले पालिकेच्या माथी मारली. ती भरता न आल्यामुळे वीज तोडण्याचा सपाटाच या सरकारी कंपनीने लावला. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयदेखील सुटले नाही. राज्यभरातील सर्व पालिका महावितरणकडून व्यावसायिक दराने कर वसूल करतात. औरंगाबाद पालिकेने मात्र अधिकार असूनही व्यवसायिक दराने करवसुली केली नव्हती. त्यामुळे आयुक्तांनी घेतलेला निर्णय जशास तसा ठरतो. व्यावसायिक दर लावणाऱ्या महावितरणने सेवाही तशीच द्यावी. रस्त्यात आलेले खांब काढून टाकावे आणि ज्या भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होतो, तेथे नवीन रोहित्रे बसविण्याची तसदी घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’ अडचणींचा गेडामांनी घेतला आ‍ढावा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आरटीओ कार्यालयात बसविलेल्या नवीन संगणकीकृत प्रणालीच्या अडचणींची पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम शनिवारी औरंगाबादेत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी कार्यालयात बैठक घेतली. सर्व्हर रूममध्ये जाऊन सिस्टीमची पाहणी केली आणि अडचणी समजून घेतल्या.
राज्यात कोल्हापूर आणि नवी मुंबई ही दोन आरटीओ कार्यालये संपूर्णपणे संगणकीकृत आहेत. त्या खालोखाल औरंगाबादचा क्रमांक लागतो. औरंगाबादेतील संगणकीकृत सिस्टीम योग्य पद्धतीने हाताळली जाते, पण याठिकाणी अनेक त्रुटी होत्या. या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. सर्जेराव शेळके यांनी वरिष्ठ कार्यालयास कळविले होते. त्याची पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम शनिवारी औरंगाबादेत आले होते. त्यांनी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्रुटींची विचारणा केली. ए‍वढे प्रॉब्लेम एकट्या औरंगाबादमध्येच कसे काय येतात ?, सर्व अडचणी संकलित करून सादर करा म्हणजे त्याचे निराकरण करता येईल, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

आरटीओ कार्यालयातील संगणक प्रणालीत येणाऱ्या त्रुटींबद्दल आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची पाहणी आज केली. येथील अडचणी सुटल्या की उर्वरित कार्यालयांमध्ये सर्व व्यवहार सुरळीत होतील. त्यादृष्टीने माहिती घेतली या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल. - डॉ. प्रवीण गेडाम, परिवहन आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदी निषेधार्थ धरणे आंदोलन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी नोटबंदी जाहीर केली. ५० दिवसांत सर्व काही सुरळीत होईल, असा दावा केला होता, पण देशात अजूनही विदारक चित्र आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या केंद्रसरकारचा धिक्कार करत ‘ केंद्र सरकार हाय हाय’ ‘ कहा गए भाई कहा गए अच्छे दिन कहा गए’ अशा घोषणा देत काँग्रेसने शनिवारी धरणे आंदोलन व निदर्शने केली.
नोटबंदीने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. देशभरात ३०० जणांचे बळी गेले. याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसने राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रसरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, शिक्षण सभापती विनोद तांबे, पालिकेतील गटनेते भाऊसाहेब जगताप, विजय कामड, जगन्नाथ काळे, सरोज मसलगे, उत्तमराव शिंदे, सागर साळउंके, अॅड. सुभाष देवकर, लियाकत पठाण, किरण पाटील, किशोर तुलसीबागवाले, राजकुमार जाधव, राजेश मुंडे, किशोर ढेपे, मुनीर पटेल, तय्यब पटेल आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

प्रमुख नेते अनुपस्थित
प्रदेश काँग्रेसने निदर्शने करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार जिल्ह्याचा कार्यक्रम औरंगाबादेत आयोजित करण्यात आले होते. निदर्शनात कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते पण आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची अनुपस्थिती जाणवली. निदर्शनानंतर कार्यकर्त्यांमध्ये यासंदर्भात चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलते खेडे साहित्यात दिसावेः डॉ. छाया महाजन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची मानसिकता मराठी साहित्यात उमटत आहे. परंपरा व ग्रामसंस्कृतीत अडकलेल्या खेड्यांचे परिवर्तन सुरू झाले आहे. या खेड्याचे पुरेपूर चित्रण ‘नवं काटवन’ कादंबरीत दिसते. बदलते खेडे टिपणे लेखकासमोर आव्हान आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन यांनी केले. ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शिवार प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. भीमराव वाघचौरे यांना ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. एमजीएम संस्थेच्या आइन्स्टाइन सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, डॉ. छाया महाजन, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, डॉ. महेश खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार प्रदान केल्यानंतर महाजन यांनी कादंबरीवर भाष्य केले. ‘ग्रामीण जीवन शेतकरी, संस्कृती आणि श्रम या तीन घटकात सामावले आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलीचा समान वाटा असण्याचा विषय कादंबरीत मांडला आहे. हा विषय मांडताना नातेसंबंधांची घट्ट वीण वाचकांना भावते.
‘हा पुरस्कार गुरूप्रसाद आहे. ज्यांनी शिकवले त्यांच्याच प्रतिष्ठानने दिलेला पुरस्कार पुढील लेखनासाठी प्रेरणादायी आहे,’ असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा शेळके यांनी केले. सूत्रसंचालन आशा देशपांडे-माने यांनी केले, तर प्रेरणा दळवी यांनी आभार मानले.

लाखमोलाची मदत
हिवरेबाजार (जि. अहमदनगर) येथे पाचवे ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन रा. रं. बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी संयोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे डॉ. पी. डी. पाटील यांनी संमेलनाध्यक्षाला एक लाख रुपयांचा निधी प्रदान केला. ही रक्कम शालेय विद्यार्थ्यांनी वाड्मय निर्मिती करावी या उपक्रमासाठी वापरण्यात येईल, असे बोराडे यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images