Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेऊर-आष्टी मार्गासाठी दहा कोटी

0
0

पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मानले प्रभूंचे आभार

म. टा. प्रतिनिधी, बीड

जेऊर ते आष्टी या बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी ते जेऊर ७० किलोमीटर या मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यवासियांच्या दृष्टीने दुधात साखर अशी भावना आहे. परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जात होती. वीस वर्षांत ३०० कोटी रुपयांचा निधी या मार्गाला मिळाला. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिली. त्यासाठी निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४१३ कोटी या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडचे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा रेल्वे प्रकल्प होता. दिवंगत मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदींनाच्या पूर्व संध्येला हा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय व रामेश्वर मुंडे यांच्यात लढत होत आहे. या पूर्वी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष साऱ्या राज्याने बघितला. गोपीनाथ मुंडेंच निधन झाल्यानंतर पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष मिनी मंत्रालयासाठी परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे यांच्यात पहावयास मिळणार आहे.

अजय मुंडे हे गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा आणि धनंजयचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तर रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेचे सख्खे चुलत भाऊ आहेत. हे दोघे आताच चर्चत येण्याचे कारण या जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोघे भाऊ एकमेकासमोर उभे आहेत. ज्या वेळी धनंजय मुंडे यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला त्याच वेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे सोबत राष्ट्रवादीत आले. युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध सरपंच राहिले. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडे सोबत असणार आहे.

रामेश्वर मुंडे हे धनंजय मुंडेच्या बंडानंतर ही पंकजा मुंडे सोबतच राहिले. एक भाऊ दूर गेला तरी एक भाऊ पंकजासोबत स्थानिक राजकारण करीत होता. मात्र, अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी अपल्यालाच मतदान देतील असे रामेश्वर मुंडेंना वाटते.
मागच्या पाच वर्षापासून परळीच्या सगळ्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजयचा सामना झालेला म्हणूनच आता परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात पुन्हा या भावंडातील लढत लक्षवेधी असणार आहे. या दोन मुंडेच्या लढतीत कस पंकजा व धनंजय यांचा लागणार आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाऊबंदकीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्यांचे सत्र सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असून, गेल्या तीन महिन्यांमध्ये ३७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी आणि दुष्काळासारख्या कारणांबरोबरच, कृषी उत्पादनाला हमी भाव न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल पडल्याचे दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये २०१०पासून दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेमध्ये १२५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये एकूण ९ लाख २७ हजार ४३० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ८ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगावरून खरीप पिकांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध झाले. जिल्ह्यात १४०३ महसुली गावे आहेत. सर्वच गावांमध्ये तीन वर्षे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या वर्षी पहिल्यांदा अंतिम पैसेवारी सरासरी ५८.२४ पैसे नोंदविण्यात आली. उत्पादन वाढल्याचे दिसून येत असताना, पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुखांना दर न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील जानेवारीमध्ये वीस, फेब्रुवारीत सात तर मार्चमध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील २७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. तर, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली असून, एक प्रकरण चौकशी स्तरावर आहे.

बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग ,उडीद, मका, खरीप ज्वारी याच्या उत्पादनात मोठी तूट आली आहे. तसेच, ज्वारी, गहू, हरबरा यासारख खरीप आणि रब्बी उत्पादन शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे, चांगला पाऊस झाल्यानंतरही मिळणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

0
0

म. टा. विशेष प्र‌तिनिधी, शिरूर कासार (बीड)

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...

0
0

शिरूर कासार(बीड) : शिरूर तालुक्यात बडेवाडीची रूपाली. वडिलांचं छत्र हरवलेलं. गेल्या एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा झाली आणि तिचं लग्न झालं. नवरा हमाल. दारू पिऊन मारहाण करायचा. एक दिवस चाकू घेऊन मागे लागला. दीपाली जीव वाचवायला माहेरी परत आली ती परतलेली नाही

वडवली तालुक्यातल्या चिंचवणच्या वस्तीवरची शीतल. सातवी पास झाली आणि गेल्या जुलैमध्ये लग्न झालं. तीनच महिन्यांत सासरच्या लोकांसोबत कर्नाटकात ऊस तोडायला जावं लागलं. ‘पहाटे चार वाजता शेतात कोयता घेऊन धावायचं. ऊस तोडून मोळ्या बांधून गाडीत टाकायच्या. दुपारी कोपीवर येऊन सैपाक, धुणी-भांडी. लय अवघड होतं सारं’, कसनुसं हसत ती सांगते.

रूपाली आणि शीतलसारख्या लग्न ठरलेल्या, झालेल्या, मोडलेल्या आणि विधवा झालेल्या शाळकरी वयाच्या मुली बालाघाटात गावागावांत दिसतात. उघड्या बोडक्या बालाघाट डोंगरांच्या आडोशाला पहुडलेल्या या तालुक्यांत दुष्का मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...ळ कायमचा मुक्कामी. जमीन रेताड. खरीपाचं जमेल तेवढं पीक घेऊन दसरा झाला की बैलगाड्या जुंपून इथली ७५ टक्के जनता ऊस तोडणी कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातेत जाते. बीडमधून ४ लाख लोक ऊस तोडायला बाहेर जातात, त्यात बालाघाटातले सर्वाधिक. चार ते सहा महिने तिकडेच. तान्ही लेकरं सोबत, जाणती घरी. वयात आलेली मुलगी गावात ठेऊन जाणं लोकांना असुरक्षित वाटतं. कारखान्यांवर उघड्यावर संसार. तिथे मुलगी सोबत असणं धोक्याचं. लग्न करून जबाबदारी संपवणं हा एकच पर्याय उरतो. ‘इपरीत झालं तर गरीबाच्या अब्रूचं खोबरं व्हतंय, पोरीच्या जातीचा जीवाला लय घोर’, मातोरी गावातल्या सुमन जरांगे सांगतात. बीडमध्ये बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यांची मुलगी शिकतेय, पण नातेवाईकांनी लग्नाचा तगादा लावलाय. पती आजारपणात गेल्यामुळे जबाबदारी अंगावर पडलेल्या सुमनबाई तणावात होत्या.

या पट्ट्यात वंजारी समाजाची लोकसंख्या मोठी. त्यांच्यात हुंड्याची मोठी प्रथा. तेच अनुकरण इतर समाजातही दिसतं. ‘पोरगं नावाला शिकल्यालं, ऊस तोडणारं असलं तरी लाखभर रुपय मोजावं लागतेत. नोकरदार आसंल तर तीन चार लाख’, वारणीचे पोलिस पाटील श्रीनिवास बोटे सांगत होते. ऊसतोडणीला एक कोयता म्हणजे एक जोडपं. पूर्ण कोयत्याला जास्त पैसे मिळतात. मुलगा जाणता झाला की त्याचं लग्न उरकायची घाई. पुष्कळदा मुलगाही २१ हून कमी वयाचा असतो!

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

(अल्पवयीन मुलींची नावे बदलली आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृह खातं आवडतं, ते मिळाल्यास आनंदः पंकजा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गृह खातं हे माझं आवडतं खातं असून या खात्यावर माझं विशेष लक्ष असतं, ते खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, असं विधान करून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खात्यावर थेट दावा केला आहे. याआधी, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून बरंच रामायण घडलं होतं.

माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवासस्थानांचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी झालं. त्यावेळी त्यांनी राजकीय वर्तुळात नवी पुडी सोडली.

गृह खातं माझं आवडतं खातं आहे. माझ्या वडिलांनी - गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिलं होतं. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांचं मनोबल उंचावलं होतं. त्यांनी केलेलं काम मी अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे या खात्याबद्दल विशेष जिव्हाळा आहे. हे खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या गृह खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडील खात्यावरच दावा सांगून पंकजा यांना नेमकं काय सूचित करायचं आहे, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जातोय. पंकजा यांच्या इच्छेला पक्षश्रेष्ठींकडून काय प्रतिसाद मिळतो, याबद्दलही उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षांची आई अन् पस्तिशीची आजी!

0
0

धानोरा (जि. बीड) : बाजारचा दिवस असल्याने खालापुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्हरांड्यात गर्दी होती. त्यात चार-पाच फिकुटलेल्या, अशक्त तरुण बायका नंबर यायची वाट बघत बसलेल्या. डॉ. अंजली भांगे तिथल्या तरुण डॉक्टर. म्हणाल्या, ‘लग्नं लवकर त्यामुळे गर्भारपणही लवकर. मुली आधीच अॅनेमिक असतात. वजनही कमी. कोवळ्या वयात लादलेल्या शरीरसंबंधांमुळे रक्तस्राव, पोटदुखी, पाळीच्या तक्रारी असतातच. वेळेआधी प्रसूती, कमी वजनाची मुलं हे या भागात सर्रास दिसतं.’

या आरोग्य केंद्राची दोन वर्षांची आकडेवारी धक्कादायक होती. एप्रिल ते फेब्रुवारी, २०१६ दरम्यान ९१९ प्रसूती झाल्या. त्यापैकी ३० अर्भकमृत्यू होते. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी, २०१७ यादरम्यान ८८७ प्रसूती झाल्या त्यापैकी २२ अर्भकमृत्यू होते. यातल्या बालमाता किती होत्या हे कळायला मार्ग नाही. कारण नाव नोंदवताना वय १८ वर्षांच्या आत नोंदवण्याचा आरोग्य विभागाचा प्रघात नाही!

आर्वी गावात आशाताई भेटल्या. जेमतेम पस्तीशीच्या असून, पन्नाशीच्या दिसत होत्या. चार मुलं. सततच्या रक्तस्रावामुळे गर्भाशय काढून टाकावं लागलं. आता त्रास थांबलाय, पण घरात काम होत नाही म्हणाल्या. तिशी पस्तिशीत गर्भाशय काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार बायका या भागात मोठ्या संख्येनं.

केंद्र सरकार किशोरींसाठी विशेष योजना राबवते. यात आयर्न, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या शाळकरी मुलींना दिल्या जातात. दर सहा महिन्यांनी रक्त तपासणीही होते. शाळकरी वयाच्या संसारी मुलींपर्यंत मात्र या गोळ्या पोहचायला मार्ग नाही. मातोरीमध्ये आशा वर्कर सांगत होत्या, केंद्र सरकारने मुलींसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले. त्यांचा दर्जा इतका वाईट होता की मुलींनी ते घेतलेच नाहीत. मुदत संपून गेलेली अशी शेकडो खोकी अक्षरशः जाळून टाकावी लागली. बालाघाटातल्या मुली कुपोषण आणि अॅनेमिया सोबत घेऊन जगणाऱ्या. त्यामुळे पाठीची दुखणी, सांधेदुखी, अशक्तपणा यांची कायमची सोबत. जन्मलेली मुलंही अशक्त कुपोषित. डायरिया, न्यूमोनियाला बळी पडणारी. पस्तीशीत सासू हपन्नाशीच्या आत बाई म्हातारी होते. तोवर १५ वर्षांची सून हाताशी आलेली असते.

२१ वर्षांच्या मनीषाचं नुकतंच कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं. मनीषाला दोन मुली आणि एक मुलगा! ‘इथे गर्भनिरोधकं पहिल्या खेपेला कुणीही घेत नाही,’ धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. अभिजित सांगळे सांगत होते. इथे रायमोहापेक्षा बरी स्थिती. पण शस्त्रक्रिया बंदच होत्या. हल्लीच सर्जनची नेमणूक झाली आहे. इथे जून २०१६ मध्ये कुटुंबनियोजनाच्या १३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पैकी ११ जणींना तीन मुलं होती आणि वय सरासरी २३!

मातोरीच्या शाळेत एक मुलगा म्हणाला, शेजारच्या आठवीतल्या मुलीचं लग्न ठरलंय. तिच्या आई-वडिलांशी बोलू म्हटलं तर ते शेतात. मग तिची मोठी बहीण आली. १६ वर्षांची. नऊ महिन्यांची गरोदर! जालना जिल्ह्यात अंबडचं सासर. चेहऱ्यावर बाळासारखे निरागस भाव. थोडी थकलेली. पायावर सूज होती. तपासण्या केल्या का, नाव कुठे घातलंस… असं काहीबाही विचारलं तर तिला काही कळेना. लाजत राहिली नुसती. हे वाचकांपर्यंत पोहोचेल तोवर तिनं बाळाला जन्म दिलेला असेल. सुखरूप सुटका झाली असेल ना तिची?

आजारी पडलेलं ग्रामीण रुग्णालय

रायमोहच्या ग्रामीण रुग्णालयात आत शिरताना पायरीवर झोपलेले कुत्रे हाकलावे लागले. कुबट वास नाकात शिरला. कुणीही वैद्यकीय अधिकारी जागेवर नव्हता. अॅडमिट केलेले रुग्ण व्हरांड्यात गप्पा मारत होते. कुणीतरी धावपळ करून ‘एनआरएचएम’च्या डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञाची बदली झाल्याचं सांगितलं. बाकी वैद्यकीय सोयींचा उजेडच होता. गरीबांना साहजिकच खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, हजारो रुपयांच्या बिलांत घेतलेली उचल संपून जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती-सभागृह नेत्यात वाजले

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थायी समितीच्या बैठकीत वारंवार प्रश्न विचारल्यामुळे सभापती मोहन मेघावाले हे सभागृहनेता गजानन मनगटे यांच्यावर संतापले. या दोघांमध्ये स्थायी समितीच्या बैठकीतच वाद झाला. विशेष म्हणजे दोघेही शिवसेनेचे नगरसेवक आहेत.
पालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यासाठी मेघावाले यांनी शुक्रवारी स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजगौरव वानखेडे, कैलास गायकवाड, सीताराम सुरे, विकास एडके, समीना शेख या नगरसेवकांनी विविध मुद्दे उपस्थित करून प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात कशा आणि किती त्रुटी आहेत हे मांडण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीचे सदस्य असलेले सभागृहनेते गजानन मनगटे देखील काही सूचना करण्यासाठी उभे राहिले. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात अडीच कोटी रुपयांची तरतूद करावी. गतवर्षीच्या सभापतींकडे देखील आपण ही मागणी केली होती, पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. तुम्ही आपल्या घरचे सभापती आहात म्हणून तुमच्याकडे हक्काने मागणी करतो,’ असा उल्लेख मनगटे यांनी केला. त्यानंतर त्यांनी महिला बालकल्याण समितीच्या खर्चाबद्दल प्रश्न उपस्थित केला. ‘यंदा या विभागाचे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले नाहीत. त्यामुळे हे चार कोटी व नवीन वर्षाचे पाच कोटी असे नऊ कोटींची तरतूद करून विविध योजनांवर ते खर्च करा. बीड बायपासच्या सर्व्हिस रोडसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा,’ अशी मागणी त्यांनी केली. मनगटे यांनी एका नंतर एक प्रश्न विचारल्यामुळे सभापती मोहन मेघावाले संतापले. एकदम सर्व प्रश्न विचारा. एकानंतर एक प्रश्न का विचारता असे म्हणत मनगटे यांना उद्देशून ते म्हणाले, ‘मी प्रशासनाचा मुलाहिजा ठेवत नाही. बैठकीला उशिरा आल्यामुळे उपायुक्तांना सभागृहाच्या बाहेर उभे केले. मी सर्वपक्षीय नगरसेवकांचा सभापती आहे, तुमच्या घरचा सभापती नाही.’ सभापतींच्या अशा उत्तरामुळे मनगटे स्तंभित झाले. ‘प्रश्न विचारू नको का,’ असे ते सभापतींना म्हणाले. ‘प्रश्न कागदावर लिहून देतो, त्याची उत्तरे द्या,’ असा उल्लेख त्यांनी केला. स्थायी समितीच्या बैठकीत एकाच पक्षातील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्यामुळे अन्य नगरसेवकांनी या चकमकीचा आनंद घेतला.

आयुक्त आलेच नाहीत
अर्थसंकल्पासंबंधीच्या स्थायी समितीच्या बैठकीला आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आलेच नाहीत. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयु्क्त आले होते. मग त्यांनी त्यातील सुधारणा जाणून घेण्यासाठी व नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे होते. आयुक्तच नाहीत, मग उत्तर कोण देणार, असा प्रश्न उपस्थित करून नगरसेवकांनी बैठक तहकूब करण्याची मागणी केली, पण सभापतींनी बैठक रेटून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसबीआयचे एटीएम कोरडेच

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या कित्येक दिवसांपासून पैका नसल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये खडखडाट आहे. विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबादची जेवढे एटीएम आहेत त्या सर्व एटीएमवर रोकडच उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
बँकांमध्ये पैसे नाहीत. एकाचवेळी मोठी रक्कम काढायची असल्यास दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते, तर एटीएममध्ये गेल्या सात ते आठ दिवसांपासून पैसा नाही. ही परिस्थिती पूर्वीच्या एसबीएचच्या एटीएमची झालेली आहे. शहरातील अनेक एटीएम बंद आहेत, तर बँकांमध्ये पन्नास हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम मागितली तर त्यासाठी दोन ते तीन तासांची प्रतीक्षा करावी लागते. कारण तेवढी रक्कम बँकेच्या शाखेत आता उपलब्ध नाहीत. सध्या विलिनीकरणानंतर शहरातील ३०० एटीएम एकट्या एसबीआयचेच झाले आहेत. यामुळे या एटीएमवर गर्दी होणे साहजिकच आहे. मात्र, या एटीएमवर खडखडाट असून ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या एटीएम प्रकारामुळे ‌अधिकच गोंधळ उडाला आहे.
एसबीएचने विलिनीकरणाआधी एटीएम सेंटर व रोकड टाकण्याची प्रक्र‌िया योग्यपणे हाताळली होती. आता स्टेट बँकेत विलीनकरण झाल्यावर गोंधळ झाला आहे. सध्या या एटीएमवर व एकूण सर्वच एसबीआय शाखांमध्ये रोकडची चणचण भासू नये यासाठी वारंवार रिझर्व्ह बँकेकडे रोकडची मागणी केली जात आहे, परंतु पुरवठा होत नसून ही खडखडाटाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी सांगत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा दिवसांपासून तापमान ४०च्या वर

0
0


औरंगाबाद : शहराला बसणाऱ्या उन्हाच्या चटक्यात गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली असून औरंगाबादचे कमाल तापमान गेल्या १० दिवसांपासून ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक आहे. शुक्रवारी (२१ एप्रिल) शहराचे कमाल तापमान ४०.४, तर किमान तापमान २३.८ अंश नोंदले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबद शहरात उन्हाचा कहर असून सकाळी ९ वाजेपासूनच चटके बसण्यास सुरुवात होते. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, संध्याकाळीही वातावरणात उकाडा जाणवत आहे. गेल्या ९ दिवसांपासून शहरात अशी स्थिती आहे. १२ एप्रिलला शहराचे कमाल तापमान ४०.५ अंश सेल्यिसस असे होते, यानंतर १३ ते १९ एप्रिलपर्यंत तापमान ४१ अंशापेक्षा अधिक होते, तर २० एप्रिलला तापमानात एक अंशाची घट झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात उन्हाचा पारा ३८ ते ४१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा रुपयांची नाणी बंद नाहीत

0
0


म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
दहा रुपयांची नाणी बंद झाल्याच्या केवळ अफवा आहेत. ही नाणी चलनात असून ती बंद झाली नाहीत, असा खुलासा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याने रिझर्व्ह बँकेच्या हवाल्यानुसार केला आहे.
नाणी बंद होणार असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी १० रुपयांची नाणी बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी धाव घेतली आहे. मेडिकल, किराणा दुकानांवर ही नाणी स्वीकारली जात नाहीत. याबद्दल स्टेट बँकेचे अधिकारी रवी धामणगावर म्हणाले, ‘२१ नोव्हेंबर २०१६ रोजी रिझर्व्ह बॅंकेने दहा रुपयांचे नाणे चलनात कायम असल्याबद्दल अध्यादेश जारी केला होता. यामुळे नाणी बंद झालेलीच नाहीत. यापुढेही दहा रुपयांची नाणी चलनात कायम राहतील, असे स्पष्ट केले नोटबंदीच्या काळातही अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे नाणी घेणे टाळू नये. ही नाणी बँकांमध्येही स्वीकारली जात आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

माझे किराणा दुकान आहे. अनेकांनी दहाची नाणी बंद झाल्याचे सांगितले. माझ्याकडून ही नाणी कोणी स्वीकारली नाहीत. मी देखील ही नाणी घ्यायची की नाही, हा विचार करत होतो, मात्र ही अफवा असल्याचे बॅँकेतून सांगितले. - राजेश्वर कुलकर्णी, देवळाई, औरंगाबाद

मुकुंदवाडीतील वीज बिल केंद्रावर गेलो असता मला १० रुपयांची नाणी बंद झाल्याचे कळाले. काउंटरवर ही नाणी स्वीकारताना कोणीही दिसले नाही. तिथे हुज्जत घातली. बँकांनी विविध ठिकाणी जाहीर खुलासे करावे. - ऋषिकेश थोटे, शिवशंकर कॉलनी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एच१एन१’चे ७० टक्के मृत्यू उशिरा उपचाराने

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्वाइन फ्लू’ (एच१एन१) आजारामध्ये संशयित रुग्णांना कोणत्याही रिपोर्टची वाट न पाहता पहिल्या २४ ते ४८ तासांमध्ये ‘ओसेलटॅमिविर’ हे औषध सुरू करणे अत्यावश्यक असताना, ते तब्बल ७ ते ८ दिवसांपर्यंत उशिरा सुरू केल्याचे समोर आले. हेच ‘स्वाइन फ्लू’मधील ७० टक्के मृत्यूचे कारण असल्याचे आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर यांनी खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळेत सांगितले.
तर, ‘स्वाइन फ्लू’मुळे या वर्षी देशात सुमारे २५० मृत्यू झाले व यातील १५० म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात झाल्याचे प्रभारी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिका व ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या शहर शाखेतर्फे खासगी डॉक्टरांसाठी शुक्रवारी (२१ एप्रिल) आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी, ‘आयएमए’चे शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर, नियोजित शहराध्यक्ष डॉ. कलदिपसिंग राऊळ आदींची उपस्थिती होती. डॉ. बिलोलीकर म्हणाले, आजाराची ठळक लक्षणे दिसत असल्यास रिपोर्टची वाट न पाहता २४ ते ४८ तासांत ‘ओसेलटॅमिविर’ सुरू करणे व रुग्णाचा डोस पूर्ण होईल याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. गरोदर महिला, मधुमेही व इतर ‘हाय रिस्क’ व्यक्तींसाठी सरकारने मोफत लस उपलब्ध केली आहे. ही लस केवळ ३५० रुपयांमध्ये खासगीत उपलब्ध असल्यामुळे रुग्णांच्या जवळच्या व्यक्तींनी तसेच आरोग्य सेवा देणाऱ्यांनी त्याचा वापर करणे खूप हिताचे आहे. डॉ. आवटे म्हणाले, राज्यात २००९ व २०१० मध्ये ‘स्वाइन फ्लू’मुळे सुमारे १००० व्यक्तींचे मृत्यू झाले. २०१५ मध्ये ९०५, तर २०१६ मध्ये २६ व्यक्तींचे मृत्यू झाले. २०१७ मध्ये आतापर्यंत १५० व्यक्तींचे मृत्यू झाले आणि सर्वाधिक मृत्यू पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांत झाले. त्यातच ६० टक्के मृत्यू हे २१ ते ५० या कर्त्यावयातील व्यक्तींचा झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

औरंगाबादेत तपासणी नाहीच
‘स्वाइन फ्लू’ची तपासणी करणारी एकही पॅथॉलॉजी लॅब औरंगाबादेत नाही. त्यामुळे इच्छुक लॅबचालकांनी पुढे यावे, असेही आवाहन आवटेंनी केले. शहरातील १६ औषधी दुकानांमध्ये ‘ओसेलटॅमिविर’ गोळ्या उपलब्ध असून, बालकांसाठी ‘सिरप’ही लवकरच उपलब्ध होणार असल्याचे बिलोलीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने राज्यात १३४ जणांचा मृत्यू

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात एक जानेवारीपासून २० एप्रिलपर्यंत स्वाइन फ्लूने १३४ जणांचा मृत्यू झाला. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपचारासाठी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज असून आवश्यक त्या रुग्णांना मोफत लसही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर, प्रभारी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शहर व जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाइन फ्लूबाबत जागृती कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिलोलीकर म्हणाले, ‘दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत स्वाइन फ्लूचा जोर राज्यात अधिक दिसून येतो. यंदा मात्र फेब्रुवारी, मार्चमध्येही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. विषाणू संसर्गामुळे लागण होत आहे. अधिक तापमानात हा विषाणू टिकत नाही असे म्हणतात, पण कमाल व किमान तापमानाचा फरक जर तिप्पट असेल तर एच१ एन१ ला तग धरून ठेवण्यात यश मिळते. परिणामी अद्यापही रुग्ण आढळून येत आहेत. अशी परिस्थिती असली तर राज्यातील आरोग्य यंत्रणा कुठल्याही संकटाचा सामना करण्यास तयार आहे. आपल्याकडे संशयित रुग्णांची तपासणी यंत्रणा सक्षम आहे. एखाद्याला लागण झाली असेल किंवा कुणाला संशय असेल तर त्यांना मोफत लस देण्याचीही सरकारी रुग्णालयात सुविधा आहे.’

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी म्हणाल्या, ‘महापालिकेच्या हद्दीत २७४४ खाटा उपलब्ध असून त्यातील ४५० खाटा आयसीयूमध्ये आहेत. १५५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. पालिकेच्या वतीने पाच रुग्णालयांमध्ये स्क्रिनिंग सेंटर सुरू केले आहेत. रुग्णांना आवश्यक त्या औषधींची उपलब्धतताही करून दिली आहे. शहरातील १६ औषधी दुकानांवर स्वाइन फ्लूशी संबंधित औषधी मिळण्याची सोय करून दिली आहे.’ यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित होते. सभागृहात शहर व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाइन फ्लूबाबत कार्यशाळा घेण्यात आली.

दाट लोकवस्ती लक्ष

सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूबाबत दक्षता बाळगताना दाट लोकवस्तीच्या शहरांकडे लक्ष केंद्रित केले आहे. पुणे, औरंगाबाद, नाशिक, नगर, नागपूरसारख्या शहरात दाट लोकसंख्या आहे. संसर्गजन्य असलेल्या स्वाइन फ्लूची लागण होऊ नये, यासाठी या कार्यशाळा पहिल्या टप्प्यात या शहरांमध्ये घेण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलाची २५ लाखांची फसवणूक

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वकिलासोबत जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करीत शेतीची परस्पर विक्री करून वकिलाची २५ लाखांची फसवणूक केल्याची घटना ऑक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१६ या काळात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर दिलसुखचंद पांडे (रा. नाथनगर, सिंधी कॉलनी) हे व्यवसायाने वकील आहेत. पांडे पूर्वी नवाबपुरा भागात राहत असल्याने त्यांची तेथील विजय केशरचंद कासलीवाल यांच्यासोबत ओळख होती. पांडे यांना शेती खरेदी करण्याची इच्छा असल्याने त्यांनी कासलीवाल यांना तसे सांगितले. यावर कासलीवाल यांनी ते काम करीत असलेल्या दुकानाचे मालक राजेश राधेश्याम अग्रवाल यांची पैठणखेडा (ता. पैठण) येथील शेती विक्री करायची असल्याचे सांगितले. एकरी पंधरा लाख रुपये दराने हा व्यवहार ठरला. इसारापोटी पांडे व त्यांच्या पत्नीने १ ऑक्टोबर २०१४ रोजी रोख २८ लाख ५० हजार रुपये अग्रवाल यांना दिले. उर्वरित रक्कम १ जानेवारी २०१५ रोजी देण्याचे ठरले व ही रक्कम दिल्यानंतर अग्रवाल पांडे यांना ‌जमिनीची रजिस्ट्री करून देणार असा करार झाला. दरम्यान २० डिसेंबर २०१४ रोजी पांडे हे उर्वरित रक्कम घेऊन अग्रवाल यांच्याकडे गेले. शेतीची रजिस्ट्री करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी अग्रवाल यांनी हा व्यवहार वैयक्तिक कारणामुळे करण्यास असमर्थता दर्शवली. तसेच पांडे यांचे २८ लाख ५० हजार व नुकसान भरपाई म्हणून दीड लाख असे एकूण तीस लाख रुपये देण्याचे ठरले. त्यांनी या रकमेचे दोन चेक देखील पांडे यांना दिले. मात्र, हे चेक वटले नसल्याने पांडे यांनी कोर्टात खटला दाखल केला. दरम्यान मे २०१६मध्ये पांडे व अग्रवाल यांच्यामध्ये पुन्हा बोलणी झाली. यावेळी नोव्हेंबर २०१६ पासून दर महिन्याला अग्रवाल पांडे यांना पाच लाख रुपये देतील असे ठरले. नोव्हेंबर २०१६मध्ये अग्रवाल यांनी पांडे यांना पाच लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर रक्कम दिली नाही. या प्रकरणी आपली फसवणूक केल्याप्रकरणी पांडे यांच्या तक्रारीवरून राजेश राधेश्याम अग्रवाल व विजय केशरचंद कासलीवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images