Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

'अभिजात महाराष्ट्र' मैफल सोमवारी रंगणार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टाइम्स ग्रुप आणि हिरण्य फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोमवार (१ मे) सायंकाळी 'अभिजात महाराष्ट्र' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शास्त्रीय संगीताची मैफलीचा लाभ जास्तीत जास्त रसिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टाइम्स ग्रुप व हिरण्य फाऊंडेशनतर्फे या वर्षीच्या महाराष्ट्र दिना निमित्यच्या 'अभिजात महाराष्ट्र' या सायंमैफिलीत सुकन्या रामगोपाल आणि त्यांच्या दोन महिला साथीदारांचा सुश्राव्य अविष्कार औरंगाबादकरांना ऐकायला मिळणार आहे. घटम हे मातीचे प्राचीन ताल लोकवाद्य आहे. या घटमला १९ व्या शतकात कर्नाटकी संगीतात अधिकृत स्थान मिळाले आहे. ठरावीक पद्धतीनेच बनवलेल्या, भाजलेल्या मातीच्या मटक्यावर ताल धरून सुरेल संगीत निर्माण केले जाते. साथीचे वाद्य म्हणून या वाद्याची ओळख नंतरच्या काळात एक महत्वाचे वाद्य म्हणून झाली आणि त्याचे श्रेय विकू विनायकराम यांना जाते. पुरुष वाद्य अशी ओळख असणाऱ्या वाद्याला सुकन्या रामगोपाल यांनी लिलया आत्मसात केले.
हाताच्या दहाही बोटांनी घटमवर कमी-अधिक प्रमाणात वार करून सूर-ताल आणि लयीत ध्वनीत काढणे हे फार सिद्धतेचे काम आहे. घटमच्या क्षमतांचा पूर्ण वापर करून सुकन्या रामगोपाल (घटम), रंजिनी व्यंकटेश (मृदंगम), भाग्यलक्ष्मी कृष्णा (मोर्चिंग) यांचा 'स्त्री ताल तरंग'चा लय-राग-समर्पण हा अनोखा कार्यक्रम हिरण्यच्या मॅरेज लॉन्सवर या अनोख्या वाद्याचा ताल-सूर ऐकायची पर्वणी औरंगाबादकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वांसाठी खुला असलेल्या या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन हिरण्य रिसोर्टचे संचालक सुनीत आठल्ये व मेधा आठल्ये यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एस. टी. कामगारांचे सोमवारी अधिवेशन

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाजप कामगार महासंघ प्रणित कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र एस. टी. ड्रायव्हर, कंडक्टर मॅकेनिक युनियनचे राज्य अधिवेशन सोमवारी (१ मे) संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड व युनियनचे अध्यक्ष अनिल सपकाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. पशुसवंर्धन मंत्री महादेव जानकर, परिवहन, कामगार राज्य मंत्री विजय देशमुख, आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आदी उपस्थित असतील,’ असे सपकाळे यांनी नमूद केले.
‘सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दहा वर्षांसाठी बेसिक पगारवाढ मिळावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, चार वर्षांची कामगार करार पद्धत बंद करावी, चालकांवर वाहकपदाची जबाबदारी नको, वाहकपदाची स्वतंत्र भरतीची व्यवस्था करावी, यासह अन्य प्रलंबित प्रश्न या अधिवेशनाच्या माध्यमातून मांडण्यात येतील, ते सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असे साकडे घालण्यात येणार आहे,’ असे सरचिटणीस कैलास कराड यांनी नमूद केले.
‘कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करू, पाठपुरावा केला जाईल,’ अशी माहिती भाजप नेते डॉ. कराड यांनी दिली. पत्रकार परिषदेला संघटनेचे कार्याध्यक्ष नारायण पगारे, सहसचिव सुरेश जाधव, सरचिटणीस कैलास कराड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवानी दीदींचे बुधवारी व्याख्यान

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रख्यात अध्यात्मिक वक्त्या शिवानी दीदी यांच्या व्याख्यानाचे गारखेड्यातल्या विभागीय क्रीडा संकुलावर बुधवारी (३ मे) सायंकाळी सव्वा सहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.
प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमात शिवानी दीदी ‘आयुष्याचा लेखाजोखा’ या विषयावर बोलतील. जवळपास ३ वर्षांपासून शिवानी दीदी औरंगाबादला याव्या यासाठी प्रयत्न होते, असे औरंगाबाद विभाग प्रमुख बी. के. मंगला व बी. के. शीला दीदी यांनी सांगितले. त्या शनिवारी भानुदास नगरच्या केंद्रामध्ये आयोजित पत्रपरिषदेत बोलत होत्या. शिवानी दीदी मूळच्या इंजिनीअर असून पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. पीस ऑफ माइंड व इतर टीव्ही चॅनलच्या माध्यमातनू संपूर्ण जगामध्ये अध्यात्मिक प्रेरणादायी कार्य व आपल्या मोटिव्हेशनल स्पीचद्वारे शिवानी दीदी घराघरात पोचल्या आहेत. कार्यक्रमासाठी आतापर्यंत १२ हजार नागरिकांनी नोंदणी ​केली आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार प्रवेशि​का विनादेखील प्रवेश दिला जाईल. शहरातील निमंत्रितांसाठी गुरुवारी (४ मे) रुक्मिणी सभागृहामध्ये सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान दीदींचा कार्यक्रम असेल. याच दिवशी शहरालगतच्या श्यामवाडी येथे चेतना एम्पॉरमेंट फाऊंडेशनच्या मेडिटेशन सेंटरचे उदघाटन होणार दीदींच्या हस्ते होईल. यावेळी बी. के. विवेक रांदड, सी. एस. सोनी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेएनईसी’ला ‘एआयसीटीई’ची पुन्हा मान्यता

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी कॉलेजला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पुन्हा मान्यता दिली आहे. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात वेतनश्रेणी व थकबाकीवरून वाद होता. एक जानेवारी २०११पासून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व वेतनाची फरकाची रक्कम देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्याची माहिती प्राचार्य डॉ. एच. एस. शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
महात्मा गांधी ट्रस्ट संचालित जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी कॉलेजची मान्यता २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात आल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मार्चमध्ये स्पष्ट केले होते. शासकीय नियम आणि एआयसीटीईच्या नियमाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एक जानेवारी २००६पासून व वेतनातील फरकाची रक्कम मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने यावर निर्णय देताना सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला एमजीएम व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, त्याठिकाणीही कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला. खंडपीठाच्या मूळ आदेशाची संस्थेच्या प्रशासनाने अंमलबजावणी केली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अवमान याचिका दाखल केली. खंडपीठात १० फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत यावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) काय कारवाई केली, असा सवाल करण्यात आला होता. ‘एआयसीटीई’ने ‘जेएनईसी’ची मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेतला. याचिकाकर्ता व संबंधित संस्थेने एकत्रित येऊन तोडगा काढण्याचेही कोर्टाने सूचित केले होते. त्यावर कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात सामंजस्याने हा वाद मिटविण्यात आला.
न्यायालयाच्या बाहेर हा वाद मिटल्याने प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यानंतर २१ एप्रिलला एआयसीटीईकडे कोर्टाच्या निर्णयाची प्रत, अहवाल सादर करण्यात आला. संस्थेतील वादावर तोडगा निघाल्याने ‘एआयसीटीई’ने संस्थेला पुन्हा मान्यता बहाल करण्यात येत असल्याचे कळविले. कर्मचारी व संस्थेतील वाद मिटल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. रेखा शेळके, डॉ. अभय कुलकर्णी उपस्थित होते.

असा निघाला तोडगा
एक जानेवारी २००६ ते २०१०पर्यंत सेवानिश्चिती व एक जानेवारी २०११ पासून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व फरकाची रक्कम देण्याचे संस्थेने मान्य केले. फरकाची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यातील पहिला ४० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘स्थायी’मध्ये सेनेकडून अपक्षांची वर्णी

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थायी समितीमध्ये अपक्ष नगरसेवकांना संधी दिल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या व स्थायी समितीसाठी दावेदार असलेल्या नगरसेवकांची संख्या शिवसेनेत जास्त असताना त्यांना डावलण्यात आले. या निर्णयामुळे काही नगरसेवक ‘मातोश्री’वर दाद मागणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती शनिवारी करण्यात आली. आठपैकी पाच सदस्य शिवसेनेतर्फे नियुक्त करण्यात आले. महापालिकेत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या २९ आहे. २९ पैकी पाच सदस्य स्थायी समितीतून निवृत्त झाल्यामुळे उर्वरीत २४ सदस्यांमधून पाच सदस्य स्थायी समितीवर नियुक्त केले जातील, अशी अपेक्षा या नगरसेवकांना होती. पाच सदस्यांमध्ये आपला क्रमांक लागावा, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत होता. परंतु शिवसेनेच्या नेतृत्वाने पाचपैकी दोन जागांवर अपक्ष नगरसेवकांची नियुक्ती केली. दोन जागा आमदार-खासदारपुत्रांनी पटकवल्या, तर शिल्लक राहिलेल्या एका जागेवर अनुभवी नगरसेवक व माजी सभापती रेणुकादास वैद्य यांना संधी देण्यात आली.
महापालिकेत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असला, तरी गेल्या वेळेसपेक्षा शिवसेनेच्या नगरसेवकांची कमी झाली आहे. काही वॉर्डात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून अपक्ष उमेदवार निवडून आले. निवडून आलेल्या अपक्षांनी महापालिकेत शिवसेनेलाच पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी स्थायी समितीमध्ये शिवसेनेने अपक्ष नगरसेवकांना स्थान दिले. पाचपैकी दोन जागांवर अपक्षांची वर्णी लागल्यामुळे पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुढील वर्षी अशाच पद्धतीने नियुक्त्या झाल्या, तर शिवसेना नगरसेवकांवर तो अन्याय ठरू शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. पक्षामध्ये अपक्ष नगरसेवकांनाच वाव दिला जाणार असेल, तर ते कितपत सहन करायचे याबद्दलही बोलले जाऊ लागले आहे. मनातील ही खदखद ‘मातोश्री’ वर व्यक्त करण्यासाठी नगरसेवकांचा एक गट मुंबईला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महापौरांनी पत्र दिलेच नाही
महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांची नियुक्ती शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केली. राठोड यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांनी महापौर भगवान घडमोडे यांना दिले व या पत्रानुसार राठोड यांच्या गटनेतेपदी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश दिले. घडमोडे पालिकेतील भाजपचे गटनेते आहेत. त्यांच्या नावाची नोंद विभागीय आयुक्तांकडे झालेली आहे. गटनेतेपदासोबतच महापौरपद घडमोडे यांना मिळाल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्येही खदखद होती. शनिवारच्या सर्वसाधारण सभेपूर्वी घडमोडे गटनेतेपदी नियुक्त केल्याचे पत्र राठोड यांना देतील, असे मानले जात होते, पण त्यांनी पत्र दिलेच नाही. त्यामुळे शिवसेने पाठोपाठ भाजपमध्येही असंतोषाचे वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदल्यांच्या नव्या नियमांना आव्हान

0
0




म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या शासन निर्णयाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ग्रामविकास खात्याने बदल्यांसंदर्भात या २७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ग्रामविकास सचिव, संचालक शिक्षण विभाग यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संगीतराव पाटील यांनी दिले आहेत .
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी ही याचिका केली आहे. राज्य शासनाने १५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार बदलीचे धोरण ठरविलेले आहे. त्यानुसार पती-पत्नी एकत्रिकरण, आंतर जिल्हा व जिल्हास्तरीय बदलीबाबत स्पष्ट निर्देश दिलेले होते. त्यानुसार शिक्षकांचे समुपदेशन करून तालुक्यांतर्गत ज्येष्ठता यादीनुसार, शिक्षकांची तालुक्यातील रिक्त जागेवर तात्काळ बदली केली जात होती.
शासनाने २७ फेब्रुवारी रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला, जो केवळ जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाला लागू आहे. त्यानुसार समुपदेशन न करताच २० जागांचा पर्याय देण्याची तरतूद आहे. शिक्षकाची बदली संपूर्ण जिल्ह्यातकोठेही करण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे १५ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार ‘शिक्षक’ या संवर्गाच्या व्याख्येतील ‘माध्यमिक शिक्षक व केंद्र प्रमुख’ यांना वगळण्यात आले असून, त्यांना पूर्वीचाच शासन निर्णय लागू आहे. यापुढे शिक्षकांच्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत.
बदल्यांच्या एकूणच धोरणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आव्हान दिले आहे. याचिकाकर्त्याची बाजू एस. जी. मुंडे हे मांडत आहेत. या याचिकेची सुनावणी ५ जूनला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तंत्रशिक्षण’ला डीडीचा विसर

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध अभ्यासक्रम प्रवेशासाठी निर्माण केलेल्या ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’च्या (सीईटी सेल) कारभाराचा फटका तंत्रशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील तब्बल ३७ हजार ४०१ विद्यार्थ्यांना बसला आहे. प्रवेशशुल्का पोटी विद्यार्थ्यांनी जमा केलेले ‘डिमांड ड्राफ्ट’ (डीडी) या सेलने वठवल्यामुळे डीडी काढण्याचा आणि रद्द करण्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांवरील या भुर्दंडाची किंमत तब्बल ८० लाख रुपयांच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांना आता, रोखीने पैसे भरावे लागणार आहेत.
अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, विधी, बीएड, एमएड अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यात सीईटी सेल स्थापन करण्यात आला. त्यांच्यातर्फे २०१६-१७ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेश प्रक्रिये दरम्यान प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांनी जमा केलेले हजारो डीडी वठवलेलेच नाहीत. हे डीडी आता विद्यार्थ्यांना परत करत, त्यांना ही रक्कम रोखीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सगळ्यात वेळ आणि आर्थिक फटका विद्यार्थ्यांनाच बसतो आहे. डीडी काढण्यासाठी बँकेच्या रांगेत आणि आता डीडी रद्द करण्यासाठी हे विद्यार्थी रांगेत आहेत. त्यासह काढण्यासाठी आणि रद्द करण्यासाठी सुमारे एका विद्यार्थ्याला २०० रुपयांचा आर्थिक बुर्दंड बसतो आहे. या वर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान सुमारे तीन लाख ५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितीसाठीचे डीडी आले. त्यातील ३७ हजार ४०१ विद्यार्थ्यांना डीडी परत करण्यात आले. यातील मराठवाड्यातील नऊ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला डीडी रद्द करण्यासाठी सुमारे शंभर, दीडशे रुपये खर्च येत आहे. त्यासह डीडी काढतानाचा खर्च झालेला वेगळा. प्रशासनाच्या कारभाराचा भुर्दंड नाहक विद्यार्थ्यांना सोसावा लागतो आहे. हा आर्थिक फटका ८० लाख रुपयांच्या घरात आहे. डीडी रद्द केल्यानंतर हे शुल्क विद्यार्थ्यांना रोखीने कॉलेजांकडे जमा करावयचे आहेत. शुल्क जमा करण्यासाठी कॉलेजांनी दिलेली वेळ ही कमी आहे.

परीक्षेच्या काळात मानसिक त्रास
सीईटी सेलतर्फे ३७ हजार ४०१ डीडी परत कॉलेजांना पाठविण्यात आले. हे डीडी रद्द करण्यासाठी विद्यार्थी बँकांच्या रांगेत उभे आहेत. या डीडीची एकूण रक्कम १२ कोटी ६२ लाख ८९ हजार एवढी आहे. प्रशासनाने मुदतीत डीडी वठवले असते, तर विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक झळ बसली नसती, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, सध्या परीक्षेचा काळ असून, या काळामध्ये अभ्यासाऐवजी बँकांच्या रांगांमध्ये उभारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरुसात हाणामारी; आठ जणांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
उरुसात धक्का लागल्याने नाव विचारण्याच्या कारणावरून दोन भावांना जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री नौगाजी बाबा दर्गा परिसरात घडली. या घटनेत शहरातील खान गल्ली येथील सैबाज सिराज पठाण हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यापैकी दोन पसार आहेत.
अजमेर सिराज पठाण, त्याचा भाऊ सैबाज व इतर सहकारी हे नौगाजी बाबाचा उरुस बघून घरी जात होते. त्यावेळी गर्दीत धक्का लागल्याने सैबाज याने सागर राजूसिंह राजपूत याला नाव विचारले. त्याचा राग धरून सागर व त्याच्या अन्य साथीदारांनी अजमेर व सैबाजला फायटरने मारहाण केली. या घटनेत सैबाजला जास्त मार लागल्याने त्याला प्राथमिक उपचार करून ताबडतोब औरंगाबादला पाठवण्यात आले. घटनेची माहिती पसरल्याने आरोपीना पकडण्याची मागणी करत मोठा जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला. माजी नगराध्यक्ष साबेरखान, रमेश पाटील बोरनारे अमीर आली, जाफर शेख आदींनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले.
दरम्यान, अजमेर पठाण याच्या तक्रारीवरून सागर राजूसिग राजपूत, शुभम किरणसिंग राजपूत, जितू प्रेमसिंग राजपूत, शुभम मनोजसिंग राजपूत, विरेंद्र विजयसिंग राजपूत, दीपक शामलाल राजपूत, पंकज बाबुसिंग परदेशी व अभिजित कांतीलाल पारे यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सागर व पंकज हे दोघे पसार आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इंधन बचाओ’ चे जागरण

0
0

म. टा. प्र‌ति‌निधी, औरंगाबाद
इंधन वाचविणे आणि पर्यावरण संरक्षण अभियानाअंतर्गत माहेश्वरी मंडळ, श्रेयनगर प्रभागाच्या वतीने रविवारी सकाळी आयोजित ‘इंधन बचाओ जनजागृती अभियान’ सायकल फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेरीत १७५ जणांनी सहभाग घेतला. वॉर्डाच्या नागरसेविका शिल्पाराणी वाडकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीला प्रारंभ करण्यात आला.
श्रेयनगर प्रभागामध्ये आयोजित या फेरीच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद तोतला, मलकापूर बँकेचे दीपक राहुजी, नगरसेवक राजू वैद्य, नगरसेविका शिल्पराणी वाडकर आदी उपस्थित होते. प्रारंभी उपप्रमुख रेखा मुंदडा आणि त्यांच्या चमूने इंधन वाचविण्याचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले. प्रकल्प प्रमुख पुरुषोत्तम करावा तसेच इतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रभाग प्रमुख सीए अशोक राठी यांनी प्रास्ताविक केले. ही फेरी रेणुकामाता मंदिर, काल्डा कॉर्नर, दूध डेअरी चौक, क्रांतीचौक, उस्मानपुरा सर्कल, एकनाथ रंगमंदिर, दशमेशनगर सर्कल, शिवमंदिर, तापडिया स्कूल, वर्मा चौक, झांबड इस्टेट यामार्गे जाऊन रेणुकामाता मंदिर येथे विसर्जित झाली. फेरीत सहभागींना टी-शर्ट आणि टोपी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्षितिजातीत’तून उलगडला नृत्याविष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘क्षितीजातीत’ या संकल्पनेखाली रविवारी महात्मा गांधी नृत्य अकादमी (महागामी) मधील संचालिका पार्वती दत्ता यांच्या वरिष्ठ शिष्यांनी ओडिशी आणि कथ्थक या नृत्यप्रकारातील नृत्याविष्कार सादर केला.
सं‍चा‌लिका पार्वती दत्ता यांच्या शिष्या दर्शना कणसे, शीतल भामरे, कन्नगी गोसावी यांनी एकल नृत्य सादर केले. दर्शना कणसे यांनी ओडिशी, तर कन्नगी गोसावी यांनी कथ्थक नृत्यप्रकार सादर करत उपस्थितांना थक्क केले. गुरूशिष्य परंपरेतील हा नृत्यप्रकार असल्याने याला ‘क्षितीजातीत’ असे संबोधण्यात आले होते. जागतिक नृत्य दिनानिमित्त गेल्या आठवड्याभरापासून विविध संकल्पनेवर आधरित नृत्यसाधनेचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. यात अक्षर व नृत्य यांचा आंतरिक संबंध शोधणारे ‘वर्णजा’ नृत्य पहिल्या कार्यक्रमात सादर झाले. यात प्रसिद्ध नृत्यांगना पार्वती दत्ता यांच्या अप्रतिम पदन्यासाने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. याशिवाय कॅलिग्राफी प्रतिमांच्या माध्यमातून कथक नृत्य सादरीकरणाचा ‘वर्णजा’ कार्यक्रम पहिल्या दिवशी सादर झाला. नृत्यांगना पार्वती दत्ता यांनी कथकचे अप्रतिम सादरीकरण करीत अक्षरसंबंध अधोरेखित केला. यावेळी बिंदू, रेखा, आकार आणि कल्पना यांचा संगम असलेल्या नृत्य रचनांनी रसिकांना खिळवून ठेवले. कुंचल्याच्या फटकाऱ्याचे दर्शन घडवणारा मुद्राभिनय व पदन्यास कार्यक्रमाची उंची वाढवणारा ठरला. या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमांनी विकासात्मक, सामाजिक भूमिका घ्यावी

0
0

माध्यमांनी विकासात्मक, सामाजिक भूमिका घ्यावी
डॉ. के. जी. सुरेश यांचे प्रतिपादन
'दक्षिण अशिया, अरब राष्ट्रातील माध्यमे' परिषदेच
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतासह दक्षिण अशिया व अरब राष्ट्रात अजूनही सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत व प्राथमिक प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे येथील प्रसार माध्यमांनी नकारात्मक भूमिका सोडून विकासात्मक व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पूरक भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन भारतीय जनसंवाद संस्थेचे महासंचालक डॉ. के. जी. सुरेश (नवी दिल्ली) यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभाग व ‘युनिसेफ' यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० एप्रिल दरम्यान आंतरविद्याशाखीय दोन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे होत आहेत. यातील 'युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट गोल्स्, सोशल जस्टीस अ‍ॅण्ड मीडिया' या पहिल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप शनिवारी झाला. तर 'मीडिया इन साऊथ अशिया अ‍ॅण्ड अरब वर्ल्ड : चॅलेंजेस् अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटिज’ या विषयावर रविवारी (३० एप्रिल) आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. यावेळी प्रा. गितीअरा नसरीन (ढाका विद्यापीठ), प्रा संजय भानावत, प्रा. अजंता हाफअराची डॉ. स्वाती मोहपात्रा, विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे, संयोजक डॉ. दिनकर माने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. डॉ. सुरेश म्हणाले, आज ‘बाहुबली’च्या विषयवरून माध्यमे व सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. भारतासारख्या विकसनशील देशात गरीबी, बेरोजगारी या विषयांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. समाजातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी शिक्षण व पत्रकारांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आशियातील लोकांमध्ये देखील मोठी क्षमता असून त्याला पूरक भूमिका माध्यमांनी घ्यावी, असे प्रा. गितीअरा नसरीन म्हणाल्या. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले की, विधी, वैद्यकीय व्यवसायाप्रमाणेच पत्रकारिता हे जबाबदारीचे व समाज परिवर्तनाचे क्षेत्र आहे. दुर्देवाने दक्षिण आशियात युरोपियन राष्ट्रप्रेमाने संशोधन व अनवेशनात्मक पत्रकारितेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे देशासमोरील मूलभूत प्रश्न दुर्लक्षिले जातात, असेही त्यांनी सांगितले. विभागाने ‘युनिसेफ’च्या सहकार्यातून संयुक्त राष्ट्रसंघाची चिरंतन विकासबद्दलची उद्दिष्ट्ये सामाजिक न्याय व माध्यम यावर मंथन घडवून आणले, ही आनंदाची बाब आहे, असे डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्याकडे उसाची रक्कम थकित

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
ऊस देऊन सहा महिने उलटल्यानंतरही उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभू महादेव शुगर अँड अलाइड या साखर कारखान्याने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. या पैशाच्या मागणीसाठी ऊस उत्पादकांनी पैठण तहसील कार्यालयावर लाक्षणिक उपोषण केले.
तालुक्यातील दादेगाव, नायगाव, मायगाव यांच्यासह जवळपास १० ते १५ गावातील शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात कळंब तालुक्यातील शंभू महादेव शुगर अँड अलाईड या साखर कारखान्यात ऊस दिला. पण, सहा महिन्यानंतरही बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. काही शेतकऱ्यांना दिलेले धनादेश कारखान्याच्या खात्यात पैसे नसल्याने वठले नाहीत. पैसे मिळ‍ण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरवठा केला, पण कारखाना प्रशासनकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप आहे. कारखान्याकडून दाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पैठण तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून त्यासाठी लागणारा खर्च, लग्नसराईचा खर्च, इतर खर्चामुळे जीव मेटाकुटीला आला आहे. बँकेच्या कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. या गंभीर परिस्थितीत तत्काळ पैसे न मिळाल्यास एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याला शंभू महादेव साखर कारखान्यावर राहील, असे या निवेदनात म्हटले आहे. येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांचा संपूर्ण मोबदला एकरकमी बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी केली आहे. या उपोषणात अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे विष्णू ढवळे, गणेश जुंजे, शेख रईस, ऊस उत्पादक शेतकरी महादेव भोसले, सुभाष गिरगे, गोविंद विसपुते, दिनकर गिरगे, शंकर गिरगे, घनश्याम ढोरकुले, सुधाकर उगले, सुधाकर गिरगे, गोरख गिरगे, रुस्तुम देशमुख, सूर्यकांत भागवत, भास्कर खराद, सोपान गिरगे आदींनी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरण्य रिसॉर्टवर आज संगीत मैफल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टाइम्स ग्रुप आणि हिरण्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोमवारी (१ मे) सायंकाळी ‘अभिजात महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शास्त्रीय संगीत मैफलीचा लाभ जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. केवळ सरकारी स्तरावर हा दिवस साजरा केला जात असल्याचे आजवर पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात राहणारे मराठी-गैर मराठी सामान्य माणूस मात्र या विशेष दिनाच्या औचित्यापासून दूरच रहातो. प्रत्येकाला आपल्या मातृभूमीची ओढ-जिव्हाळा तर असतोच पण आपल्या आयुष्याला घडवणाऱ्या, यशाचे माप पदरात टाकणाऱ्या कर्मभूमीचाही सार्थ अभिमान प्रत्येकाला असतोच. याच भावनेने हिरण्य फाऊंडेशन गेल्या तीन वर्षांपासून १ मे रोजी हिरण्यच्या निसर्गरम्य वातावरणात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची एक सायंमैफिल साजरी करत आहे. आपल्या मराठवाड्यातील उदयोन्मुख कलावंतांना हक्काचे व्यासपीठ देणे तसेच शहरवासीयांना सहसा ऐकायला न मिळणारी कानाकोपऱ्यातली भारतीय पारंपरिक वाद्य ऐकायची संधी औरंगाबादकरांना देणे, असे स्वरूप या मैफिलीचे असते. टाइम्स ग्रुप आणि हिरण्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सर्वांना मोफत आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी एकत्र यावे, मातृ आणि कर्मभूमीला या रूपाने वंदन करावे. तसेच शहराच्या हिताच्या, सर्वांगीण भरभराटीच्या दृष्टीने एकत्रित येऊन काही विचारांना चालना देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
औरंगाबाद शहराला प्राचीन इतिहास आहे.अजिंठा-वेरुळ सारखी जगविख्यात कलात्मक स्थळं इथे आहेत. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणूनही या शहराला मान्यता मिळाली आहे. मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात औरंगाबादची ओळख एक महत्त्वाचे शैक्षणिक ठिकाण म्हणून झाली आहे. औद्योगिक स्तरावर तर एक झपाट्याने वाढणारे शहर अशी औरंगाबादची प्रतिमा जगात झालेली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी राज्याच्या स्थापनेच्या दिवशी तरी एकत्र यायलाच हवे असे हिरण्य फाऊंडेशनला प्रकर्षाने वाटते.
गेल्या तीन वर्षात कुलभूषण कहाळेकर, सावनी गोगटे, स्वरेषा पोरे या आपल्या कलावंतांना ‘अभिजात महाराष्ट्र’ या कार्यक्रमात संधी मिळाली आहे. तसेच पं. अतुल कुमार उपाध्ये, मुकेश जाधव, शाकीर खान, शशांक मक्तेदार, मिलिंद तुळणकर आणि ज्योती हेगडे या कलावंतांना व्हायोलीन, तबला, सितार, गायन, जलतरंग, रुद्रवीणा असे विविध वाद्य अविष्कार याच कार्यक्रमातून सादर करायची संधी मिळाली आहे.

मैफलीचे मानकरी
सोमवारी चौथ्या 'अभिजात महाराष्ट्र'च्या मैफिलीत अंबाजोगाईचे कलावंत ओंकार देगलूरकरांचे गायन आणि त्यानंतर बंगळुरूच्या विख्यात घटम वादिका सुकन्या रामगोपाल आणि त्यांच्या महिला साथीदार ‘स्त्री ताल तरंग’ च्या अंतर्गत लय-ताल-समर्पण हा अनोखा ‘घटम’ वादनाचा आविष्कार सादर करतील. तरी सर्व संगीत प्रेमींनी याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन टाइम्स ग्रुप व हिरण्य फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालोदेवाडीत लग्नघर खाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील मालोदेवाडी येथे घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तुसह मंडप व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यात जवळपास २२ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घरात ७ मे रोजी लग्न होते.
मालोदेवाडी येथे गावालगत असलेल्या नंबर २६७ मध्ये गणेश काशिनाथ मालोदे, मनोज काशीनाथ मालोदे, योगेश काशिनाथ मालोदे, चंद्रकांत काशिनाथ मालोदे हे चार भाऊ राहतात. त्यांचा लग्नसमारंभासाठी मंडप व साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. घरातील महिला व मुलांनी घराबाहेर पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले, यात गृहउपयोगी वस्तू व व्यावसायिक साहित्य, रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने जळून खाक झाले. त्यांचे शेजारी विनायक कचरू मालोदे यांच्या गोठ्याला आग लागल्याने शेती साहित्य, चारा, अवजारे जळाली. अग्निशमन दलाने रात्री साडेआठ वाजता येऊन आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत सर्व जळून खाक झाले होते. मंडळ अधिकारी एस. एम. जैस्वाल, तलाठी बाढे यांनी रविवारी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

आनंदावर विरजण
मालोदे परिवारातील योगेश काशिनाथ मालोदे यांचा विवाह डोगरगाव (शिव) येथील रहिवासी मामाच्या मुलीसोबत ७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. सर्वजण लग्नाच्या तयारीत असताना काळाने घात केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी चालक वाह‌काला बेदम मारहाण

0
0

एसटी चालक वाह‌काला बेदम मारहाण
कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी बसच्या चालक व वाहकाला शनिवारी औरंगाबाद ते राजूर रोडवर बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी एसटी कामगारांनी एक तास काम बंदचे आंदोलन पुकारले. या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करीत राजूर मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी दुपारी औरंगाबाद राजूर या मार्गावर एसटी बसचे चालक जिवन मंडावत व वाहक अप्पासाहेब काकडे हे बसची फेरी घेऊन गेले होते. हसनाबाद फाट्यापासून पुढे सुंदरवाडी गावात बस आली तेव्हा प्रवासी अक्षरशः कोंबले होते. प्रवासी खूपच जास्त झाल्यामुळे चालक व वाहकांनी बस थांबवून दारात उभ्या असलेल्या काही प्रवाशांना उतरण्याची विनंती केली. मात्र प्रवाशांनी वाद घालत चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने हा वाद संपुष्टात आला व बस पुढे निघाली होती. परत याच मार्गावरून येत असताना या गावात खरात व दानवे नावाच्या दोन प्रवाशांनी तीस ते पस्तीस जणांच्या जमावासह बस अडवली. मंडावत व काकडे या दोघांनाही लाठ्याकाठ्या व टॉमीने मारहाण करण्यात आली. गावकऱ्यांनी सुटका केल्याने हे दोघे बचावले. या दोघांवर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी रविवारी आगार क्रमांक दोन येथील संतप्त कामगारांनी एक तास काम बंद आंदोलन केले. या घटनेचा निषेध करीत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच यावेळी राजूर मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगार प्रमुखांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी संदीप जाधव, सी. एम. ताटू, आर. टी. गायकवाड, कुलकर्णी, परीकर, कांबळे यांच्यासह इतर कामगारांची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९० हजारांचे मोबाइल नऊ घटनांत लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात मोबाइल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या काही दिवसात या घटनांत झपाट्याने वाढ झाली आहे. आठवडी बाजारासोबतच आता मोबाइल चोरांनी उघडी घरे तसेच उन्हाळ्यामध्ये छतावर झोपणाऱ्या नागरीकांना लक्ष्य केले आहे. नऊ घटनात तब्बल ९० हजारांचे मोबाइल चोरट्यांनी लांबवले आहेत.
या प्रकरणी सबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तक्रारदारांचे नाव, चोरी गेले ठिकाण व मोबाइलची किंमत पुढीलप्रमाणेः विकास अंबादास दुशिंग मिसारवाडी, घराच्या छतावरून, आठ हजार रुपये, राजेंद्र वाणी सिडको एन-८ टायपिंग सेंटरमधून, १३ हजार, विजय धांडे टीव्ही सेंटर, उघड्या घरातून, ७ हजार, विकास शिरसाठ कैलासनगर, उघड्या घरातून, १४ हजार, भास्कर खंडाळे अशोकनगर, उघड्या घरातून, ९ हजार ७५०, आशिष नावंदर कडा ऑफीस मैदान, गाडीच्या डिकीतून २९ हजार, माणिक मोहन काळे मु‌कुंदवाडी, जे सेक्टर ७ हजार ७००, सिद्धार्थ हिवाळे गारखेडा परिसर, आईसक्रिम सेंटरमधून ३ हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजीएममध्ये मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग

0
0

एमजीएममध्ये मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्‍घाटन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या परिसरातील मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंगचे उद्‍घाटन महाराष्ट्र दिनी (१ मे) रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे पर्यावरणमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार आहे.

एमजीएमने हॉस्पिटलच्या कर्मचारी व रुग्णांसाठी अद्ययावत चार मजली मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग उभारली आहे. एमजीएम हॉस्पिटल रुग्णसेवा देण्यासठी कटिबद्ध असून हजारो रुग्णांच्या पसंतीला उतरलेल्या या हॉस्पिटलमध्ये मल्टी लेव्हल पार्किंग बिल्डिंग उभारल्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे. या बिल्डिंगमध्ये पर्यावरणाला पूरक अनेक उपाय योजना केल्या आहेत. ज्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे लाऊन, सोलर पॅनलचे छत देण्याचे योजिले आहे. याबरोबर फायर सेफ्टी, सीसीटीव्ही कॅमेरे, लिफ्टची सुविधाही देण्यात आली आहे. मल्टी लेव्हल पार्किंग ही मराठवाड्यातील पहिली बिल्डिंग आहे.

या उद्‍घाटनप्रसंगी एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सूर्यवंशी यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ वर्षीय मुलावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’

0
0

आठ वर्षीय मुलावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’
युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जन्मजात बहिरेपणावर रामबाण ठरलेली ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ ही अद्ययावत शस्त्रक्रिया लातूर येथील आठ वर्षीय मुलावर शुक्रवारी (२८ एप्रिल) शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटल येथे करण्यात आली. प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद कीर्तने (मुंबई) व शहरातील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. रमेश रोहिवाल, भूलतज्ज्ञ डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. सुजाता झिने, डॉ. रवी कुलकर्णी व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींसाठी केंद्र सरकारच्या ‘एडीआयपी’ योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते व युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र मदत केंद्र उभे करण्यात आल्याचे हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर व डॉ. रोहिवाल यांनी कळविले आहे. या शस्त्रक्रियेसाठी ‘कॉक्लिअर कंपनी’च्या स्वाती सोनार, शहरातील ऑडिओलॉजिस्ट डॉ. प्रिया भाले आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकाऱ्यांना सुविधांसाठी साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
शहरातील विविध भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी फुलंब्री शहर विकास आघाडीतर्फे नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.
फुलंब्री शहरात नगरपंचायत अस्तिवात येऊन आता दोन वर्ष उलटले आहेत. नवीन कॉलनीत पथदिवे, एलईडी लाइट, दलित वस्ती निधीतून मातंग व कैकाडी समाजाची स्मशानभूमी बांधणे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी कराची अडवणूक करू नये, बाजारगल्ली ते विवेकानंद नगर रस्त्यात मुरूम टाकणे, फुलंब्री शहरातील पूर्व व दक्षिण भागात शौचालय अनुदान देणे, पंतप्रधान आवास योजनेतून गरजूना घरकुल उपलब्ध करून द्यावे, शहरातील हातपंप दुरुस्ती करणे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर पंचायत समितीचे माजी उपसभापती रऊफ कुरेशी, जनार्धन तुपे, राजेंद्र नागरे, वाल्मिक जाधव, इलियास पटेल, सय्यद वाजीद, संजय प्रधान, शेख हारूण, सय्यद असलम, सय्यद इफ्तेखार, मधुकर सोनवणे, रिजवान खान, नासेर अत्तार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआयएमसी’चा मराठी अभ्यासक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंडियन इ‌न्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आय. आय. एम. सी.) या संस्थेचा मराठी पत्रकारितेसाठी पहिला पदव्युत्तर पदविका (पीजी डिप्लोमा) अभ्यासक्रम १ ऑगस्टपासून अमरावती येथील संस्थेच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे महासंचालक के. जी. सुरेश यांनी दिली.
यावेळी के. जी. सुरेश म्हणाले की, सध्या प्रादेशिक क्षेत्रात माध्यमांना चांगले दिवस असून लोकांना आपल्या भाषेत बातम्या ऐकायला, वाचायला आवडतात. प्रादेशिक माध्यमांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे मराठी पत्रकारितेसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या येथे इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम शिकवण्यात येतो मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून येथे मराठी पत्रकारितेचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रारंभी १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या अभ्यासक्रमात बातमीदारी, संपादन, माध्यम कायदे व मूल्ये अशा पत्रकारितेच्या महत्त्वाच्या अंगाबरोबरच या नवीन अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा आणि मराठी माध्यमांचा इतिहास हे घटकही असणार आहेत. याशिवाय येत्या शैक्षणिक सत्रापासून केरळमधील कोट्टायम केंद्रावर मल्याळी भाषेतून पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

२७ मे रोजी प्रवेश परीक्षा
या अभ्यासक्रमासाठी ‌अखिल भारतीय पातळीवरची प्रवेश परीक्षा २७ मे २०१७ रोजी होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ मे २०१७ ही आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.iimc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असेह आवाहन के. जी. सुरेश यांनी केले. ही परीक्षा मुंबई आणि नागपूर या केंद्रावर घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती अमरावती येथे होतील.

गोरेगावात संस्थेसाठी १६० कोटी खर्च
गोरेगावात नॅशनल सेंटर फॉर एक्सलेन्स, अॅनिमेशन अॅण्ड ग्राफिक्स या फिक्की आणि इंडियन इ‌न्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन यांच्या विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठी राज्य शासनाने २० एकर जागा देऊ केली आहे. यासाठी केंद्र शासनाने १६० कोटी रुपयांचा निधी केंद्राने दिले आहेत. येत्या दोन वर्षात येथे अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. येथून दरवर्षी १६०० विद्यार्थी उत्तीर्ण होतील असे के. जी. सुरेश यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images