Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खरीप अनुदानात १५ लाखांचा गैरव्यवहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर तालुक्यात २०१४-१५ या वर्षात खरीप अनुदान वाटपात १५ लाख ६५ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात अनुदानाची रक्कम वसूल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी तहसीलदार सुमन मोरे यांना नोटीस बजावली आहे. घोटाळ्यात सामील असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
वैजापूर तालुक्यात २०१४-१५ या वर्षात शेतकऱ्यांना खरीप अनुदानाचे तहसील कार्यालयामार्फत वाटप करण्यात आले. परंतु, हे अनुदान मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून पेरा नसताना सातबारावर पेरा दाखवणे, जिरायती क्षेत्र असतांना बागायती क्षेत्र दाखवून जास्त अनुदान उचलणे, असे प्रकार केले. यामुळे खरे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले, तर बोगस लाभार्थ्यांनी अनुदान लाटून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्यानंतर पथकाने अनुदान वाटपाची तपासणी केली असता वाटपात १५ लाख ६५ हजार रुपयांची अनियमतता झाल्याचे दिसून आली. त्यामुळे वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी तहसीलदार सुमन मोरे यांना नोटीस पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले.
२०१४-१५ या कालावधीत चार तहसीलदार वैजापूर येथे कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तालुक्यातील ६२७ शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले असल्याने या घोटाळ्यात त्यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने बडे मासे गळाला लागणार का याबाबत साशंकता आहे.

६२७ शेतकऱ्यांना नोटीस
खरीप अनुदान घोटाळ्यात चार तहसीलदार, १८ तलाठी व मंडळ अधिकारी यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. प्रत्यक्षात कोणते अधिकारी सहभागी आहेत याचा अद्याप तपास झालेला नाही. प्रशासनाने या कालावधीत अनुदान वाटप केलेल्या तालुक्यातील ६२७ शेतकऱ्यांना नोटीस पाठवून रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

अनुदानाच्या १५ लाख रुपयांपैकी आतापर्यंत तीन लाख रुपये वसूल झाले आहेत. घोटाळ्यास जबाबदार अधिकाऱ्यांची नावे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
सुमन मोरे, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व राष्ट्रीय दिनी मतदार नोंदणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असते. मात्र, आता प्रत्येक राष्ट्रीय दिनी मतदार नोंदणी करावी, असे निर्देश ‌निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्याला दिले आहेत.
देशभरात राबवण्यात येणारे अपंगदिन, महिलादिन, मातृदिन, पितृदिन यासह इतर दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी तसेच वगळणी, दुरुस्ती करण्यात येणार आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनी (१७ सप्टेंबर) औरंगाबाद जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली.
मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून बहुतांश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर मतदार नोंदणी, यादीतील नाव, ओळखपत्र या सर्व गोष्टींची आठवण होते. मात्र, मतदार नावनोंदणीची ही प्रक्रिया प्रशासनामार्फत निरंतर सुरू असते.

नोंदणी नेहमी शक्य
जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयामध्ये निरंतर सुरू असलेल्या मतदार नावनोंदणीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून नागरिकांना केव्हाही मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे शक्य असते. मात्र, आता प्रत्येक राष्ट्रीय दिनी मतदारांना नावनोंदणी किंवा दुरुस्ती, वगळणी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागातील पाणी दूषित

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मार्च महिन्यात ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणचे पाणी साठे आटले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी भागात घेतलेल्या पाणी नमुन्यात ग्रामीण भागातील पाणी नमुने मोठ्या प्रमाणावर दूषित असल्याचे आढळून आले आहे. मे महिन्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये शहरी व ग्रामीण भागात पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात औरंगाबाद तालुक्यात दोन्ही विभाग मिळून २४ टक्के, पैठण २२, गंगापूर १७, वैजापूर १, खुलताबाद १२, कन्नड २४, सिल्लोड ९, सोयगाव सर्वाधिक ३६ तर फुलंब्री तालुक्यात २० टक्के पाणीनमुने दूषित आढळून आले.
मार्च महिन्यात औरंगाबाद तालुक्यात ३५ टक्के पाणी नमुने दूषित होते. त्यात ग्रामीण ३२, तर शहरी भागात ५५ टक्के, पैठण ३० टक्के, गंगापूर ४४, वैजापूर १०, खुलताबाद ३०, कन्नड २६, सिल्लोड ३०, सोयगाव ५२, फुलंब्री २६ टक्के पाणीनमुने दूषित आढळून आले. मे महिन्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सध्या गंगापूर व वैजापूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. पुढील दोन महिने ग्रामीण भागातील पाणी दूषित होऊ नये, याची प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड तालुक्यात अनुदानाची वसुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
खरीप अनुदान वाटपात गैरव्यवहार करून हडप केलेली रक्कम जमा करा अन्यथा गुन्हे दाखल होतील, असा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला इशारा कामी आला आहे. तालुक्यात सुमारे ४३ लाख २१ हजार रुपयांची वसुली असून त्यापैकी सुमारे २२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
सिल्लोड तालुक्यात सन २०१४ च्या खरीप हंगाम अनुदान वाटपात अजिंठा, गोळेगाव (बुद्रुक), बोरगावबाजार येथील तलाठ्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या चार टप्प्यात महसूल प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातील काही शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत असतानाही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या यादीत पुन्हा आली होती. ही शहानिशा न करता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील ९४३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३ लाख २१ हजार ५०५ रुपये दुसऱ्यांदा जमा केले.
दरम्यान हा प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला. हा ४३ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने त्याची वसुली करण्यात येत आहे.
या प्रकरणात दोषी असलेले अजिंठा येथील तलाठी बी. बी. पाटील, गोळेगाव येथील तलाठी के. टी. शिप्रे, बोरगावबाजार येथील तलाठी व्ही. सी. पवार या तीन तत्कालीन तलाठ्यांना २०१५ मध्ये निलंबित करण्यात आले. परंतु, रक्कम वसुल झाली नव्हती. त्यामुळे गेल्या आठवड्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी अधिकारी कर्मचारी व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तहसीलदार संतोष गोरड यांनी कर्मचाऱ्यांना रक्कम वसूल करा अन्यथा गुन्हे दाखल करू, असा इशारा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वसुली सुरू केली आहे.
सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत ४४१ शेतकऱ्यांकडून २१ लाख ४४ हजार ४१९ रुपये वसूल करण्यात आले. या वसुलीतील १८ लाख ४७ हजार ३६० रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. उर्वरित २ लाख ५९ हजार ४४ रुपये शासनाच्या खात्यावर जमा करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू करा

0
0

कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू करा

संघटनेची एकमुखी मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात मानाच्या असलेल्या जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) औरंगाबादमध्ये होत असलेल्या जलसंधारण आयुक्तालयात विलीनीकरण करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहे. या निर्णयाचे वाल्मीतील कर्मचारी-अधिकारी संघटनेने स्वागत करत शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असलेला महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावा, अशी मागणी संघटनेचे चे अध्यक्ष डॉ. व्ही. पी. पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
वाल्मी ही शासनाची स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे. संस्थेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन, वैद्यकीय प्रतिपूर्ती, आश्वासित प्रगती योजना असा कोणताच फायदा मिळत नाही. उलट कारवाई करताना शासकीय नियम लागू केले जातात. मात्र, सुविधा देताना हे नियम पाळले जात नाहीत. या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा याबाबत मागणी करूनही त्यांच्या हाती निराशाच पडली. आता महाराष्ट्र शासनानेच जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्याचे ठरविले असून यात शासनाच्या जलसंधारणाशी निगडित असलेले सर्व विभाग आणि वाल्मीचेही विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अधिकारी - कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. मात्र, विलीनीकरण करताना पूर्वीप्रमाणेच वाल्मीची स्वायत्तता कायम ठेवू नये, सर्व कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावे. यासाठी शांततामय मार्गाने संघर्ष सुरू राहील,’ असे डॉ. व्ही. पी. पवार यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रूपाली गोरे, सचिव ए. बी. निर्मळे, डॉ. हर्षदा देशमुख, डॉ. मोहन नारखेडे, डॉ. राजेश पुराणिक, बी. बी. खेडकर, उत्तम काकडे, आर. जी. पाटील, अजित कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
वाल्मीत एकूण २९० कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन वेतन देते तसेच हे सर्व कर्मचारी जलसंधारण आयुक्तालयात काम करण्यास इच्छुक आहेत. मात्र, इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना फायदे द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. आजही त्यांना वैद्यकीयसाठी फक्त ८० रुपये दर महिना दिले जाते. पेन्शन नाही. इतर सुविधा नाहीत. वेतन आयोगही तीन ते चार वर्षांनी लागू होतो. अशी या कर्मचाऱ्यांची परिस्थिती आहे. ‘असोपा’ समितीने सुचविलेल्या शिफारशीही शासनाने स्वीकारलेल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेऊर-आष्टी मार्गासाठी दहा कोटी

0
0

पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मानले प्रभूंचे आभार

म. टा. प्रतिनिधी, बीड

जेऊर ते आष्टी या बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी ते जेऊर ७० किलोमीटर या मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यवासियांच्या दृष्टीने दुधात साखर अशी भावना आहे. परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जात होती. वीस वर्षांत ३०० कोटी रुपयांचा निधी या मार्गाला मिळाला. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिली. त्यासाठी निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४१३ कोटी या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडचे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा रेल्वे प्रकल्प होता. दिवंगत मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदींनाच्या पूर्व संध्येला हा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय व रामेश्वर मुंडे यांच्यात लढत होत आहे. या पूर्वी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष साऱ्या राज्याने बघितला. गोपीनाथ मुंडेंच निधन झाल्यानंतर पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष मिनी मंत्रालयासाठी परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे यांच्यात पहावयास मिळणार आहे.

अजय मुंडे हे गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा आणि धनंजयचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तर रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेचे सख्खे चुलत भाऊ आहेत. हे दोघे आताच चर्चत येण्याचे कारण या जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोघे भाऊ एकमेकासमोर उभे आहेत. ज्या वेळी धनंजय मुंडे यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला त्याच वेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे सोबत राष्ट्रवादीत आले. युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध सरपंच राहिले. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडे सोबत असणार आहे.

रामेश्वर मुंडे हे धनंजय मुंडेच्या बंडानंतर ही पंकजा मुंडे सोबतच राहिले. एक भाऊ दूर गेला तरी एक भाऊ पंकजासोबत स्थानिक राजकारण करीत होता. मात्र, अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी अपल्यालाच मतदान देतील असे रामेश्वर मुंडेंना वाटते.
मागच्या पाच वर्षापासून परळीच्या सगळ्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजयचा सामना झालेला म्हणूनच आता परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात पुन्हा या भावंडातील लढत लक्षवेधी असणार आहे. या दोन मुंडेच्या लढतीत कस पंकजा व धनंजय यांचा लागणार आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाऊबंदकीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्यांचे सत्र सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असून, गेल्या तीन महिन्यांमध्ये ३७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी आणि दुष्काळासारख्या कारणांबरोबरच, कृषी उत्पादनाला हमी भाव न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल पडल्याचे दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये २०१०पासून दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेमध्ये १२५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये एकूण ९ लाख २७ हजार ४३० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ८ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगावरून खरीप पिकांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध झाले. जिल्ह्यात १४०३ महसुली गावे आहेत. सर्वच गावांमध्ये तीन वर्षे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या वर्षी पहिल्यांदा अंतिम पैसेवारी सरासरी ५८.२४ पैसे नोंदविण्यात आली. उत्पादन वाढल्याचे दिसून येत असताना, पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुखांना दर न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील जानेवारीमध्ये वीस, फेब्रुवारीत सात तर मार्चमध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील २७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. तर, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली असून, एक प्रकरण चौकशी स्तरावर आहे.

बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग ,उडीद, मका, खरीप ज्वारी याच्या उत्पादनात मोठी तूट आली आहे. तसेच, ज्वारी, गहू, हरबरा यासारख खरीप आणि रब्बी उत्पादन शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे, चांगला पाऊस झाल्यानंतरही मिळणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

0
0

म. टा. विशेष प्र‌तिनिधी, शिरूर कासार (बीड)

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...

0
0

शिरूर कासार(बीड) : शिरूर तालुक्यात बडेवाडीची रूपाली. वडिलांचं छत्र हरवलेलं. गेल्या एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा झाली आणि तिचं लग्न झालं. नवरा हमाल. दारू पिऊन मारहाण करायचा. एक दिवस चाकू घेऊन मागे लागला. दीपाली जीव वाचवायला माहेरी परत आली ती परतलेली नाही

वडवली तालुक्यातल्या चिंचवणच्या वस्तीवरची शीतल. सातवी पास झाली आणि गेल्या जुलैमध्ये लग्न झालं. तीनच महिन्यांत सासरच्या लोकांसोबत कर्नाटकात ऊस तोडायला जावं लागलं. ‘पहाटे चार वाजता शेतात कोयता घेऊन धावायचं. ऊस तोडून मोळ्या बांधून गाडीत टाकायच्या. दुपारी कोपीवर येऊन सैपाक, धुणी-भांडी. लय अवघड होतं सारं’, कसनुसं हसत ती सांगते.

रूपाली आणि शीतलसारख्या लग्न ठरलेल्या, झालेल्या, मोडलेल्या आणि विधवा झालेल्या शाळकरी वयाच्या मुली बालाघाटात गावागावांत दिसतात. उघड्या बोडक्या बालाघाट डोंगरांच्या आडोशाला पहुडलेल्या या तालुक्यांत दुष्का मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...ळ कायमचा मुक्कामी. जमीन रेताड. खरीपाचं जमेल तेवढं पीक घेऊन दसरा झाला की बैलगाड्या जुंपून इथली ७५ टक्के जनता ऊस तोडणी कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातेत जाते. बीडमधून ४ लाख लोक ऊस तोडायला बाहेर जातात, त्यात बालाघाटातले सर्वाधिक. चार ते सहा महिने तिकडेच. तान्ही लेकरं सोबत, जाणती घरी. वयात आलेली मुलगी गावात ठेऊन जाणं लोकांना असुरक्षित वाटतं. कारखान्यांवर उघड्यावर संसार. तिथे मुलगी सोबत असणं धोक्याचं. लग्न करून जबाबदारी संपवणं हा एकच पर्याय उरतो. ‘इपरीत झालं तर गरीबाच्या अब्रूचं खोबरं व्हतंय, पोरीच्या जातीचा जीवाला लय घोर’, मातोरी गावातल्या सुमन जरांगे सांगतात. बीडमध्ये बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यांची मुलगी शिकतेय, पण नातेवाईकांनी लग्नाचा तगादा लावलाय. पती आजारपणात गेल्यामुळे जबाबदारी अंगावर पडलेल्या सुमनबाई तणावात होत्या.

या पट्ट्यात वंजारी समाजाची लोकसंख्या मोठी. त्यांच्यात हुंड्याची मोठी प्रथा. तेच अनुकरण इतर समाजातही दिसतं. ‘पोरगं नावाला शिकल्यालं, ऊस तोडणारं असलं तरी लाखभर रुपय मोजावं लागतेत. नोकरदार आसंल तर तीन चार लाख’, वारणीचे पोलिस पाटील श्रीनिवास बोटे सांगत होते. ऊसतोडणीला एक कोयता म्हणजे एक जोडपं. पूर्ण कोयत्याला जास्त पैसे मिळतात. मुलगा जाणता झाला की त्याचं लग्न उरकायची घाई. पुष्कळदा मुलगाही २१ हून कमी वयाचा असतो!

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

(अल्पवयीन मुलींची नावे बदलली आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृह खातं आवडतं, ते मिळाल्यास आनंदः पंकजा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गृह खातं हे माझं आवडतं खातं असून या खात्यावर माझं विशेष लक्ष असतं, ते खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, असं विधान करून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खात्यावर थेट दावा केला आहे. याआधी, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून बरंच रामायण घडलं होतं.

माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवासस्थानांचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी झालं. त्यावेळी त्यांनी राजकीय वर्तुळात नवी पुडी सोडली.

गृह खातं माझं आवडतं खातं आहे. माझ्या वडिलांनी - गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिलं होतं. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांचं मनोबल उंचावलं होतं. त्यांनी केलेलं काम मी अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे या खात्याबद्दल विशेष जिव्हाळा आहे. हे खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या गृह खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडील खात्यावरच दावा सांगून पंकजा यांना नेमकं काय सूचित करायचं आहे, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जातोय. पंकजा यांच्या इच्छेला पक्षश्रेष्ठींकडून काय प्रतिसाद मिळतो, याबद्दलही उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षांची आई अन् पस्तिशीची आजी!

0
0

धानोरा (जि. बीड) : बाजारचा दिवस असल्याने खालापुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्हरांड्यात गर्दी होती. त्यात चार-पाच फिकुटलेल्या, अशक्त तरुण बायका नंबर यायची वाट बघत बसलेल्या. डॉ. अंजली भांगे तिथल्या तरुण डॉक्टर. म्हणाल्या, ‘लग्नं लवकर त्यामुळे गर्भारपणही लवकर. मुली आधीच अॅनेमिक असतात. वजनही कमी. कोवळ्या वयात लादलेल्या शरीरसंबंधांमुळे रक्तस्राव, पोटदुखी, पाळीच्या तक्रारी असतातच. वेळेआधी प्रसूती, कमी वजनाची मुलं हे या भागात सर्रास दिसतं.’

या आरोग्य केंद्राची दोन वर्षांची आकडेवारी धक्कादायक होती. एप्रिल ते फेब्रुवारी, २०१६ दरम्यान ९१९ प्रसूती झाल्या. त्यापैकी ३० अर्भकमृत्यू होते. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी, २०१७ यादरम्यान ८८७ प्रसूती झाल्या त्यापैकी २२ अर्भकमृत्यू होते. यातल्या बालमाता किती होत्या हे कळायला मार्ग नाही. कारण नाव नोंदवताना वय १८ वर्षांच्या आत नोंदवण्याचा आरोग्य विभागाचा प्रघात नाही!

आर्वी गावात आशाताई भेटल्या. जेमतेम पस्तीशीच्या असून, पन्नाशीच्या दिसत होत्या. चार मुलं. सततच्या रक्तस्रावामुळे गर्भाशय काढून टाकावं लागलं. आता त्रास थांबलाय, पण घरात काम होत नाही म्हणाल्या. तिशी पस्तिशीत गर्भाशय काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार बायका या भागात मोठ्या संख्येनं.

केंद्र सरकार किशोरींसाठी विशेष योजना राबवते. यात आयर्न, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या शाळकरी मुलींना दिल्या जातात. दर सहा महिन्यांनी रक्त तपासणीही होते. शाळकरी वयाच्या संसारी मुलींपर्यंत मात्र या गोळ्या पोहचायला मार्ग नाही. मातोरीमध्ये आशा वर्कर सांगत होत्या, केंद्र सरकारने मुलींसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले. त्यांचा दर्जा इतका वाईट होता की मुलींनी ते घेतलेच नाहीत. मुदत संपून गेलेली अशी शेकडो खोकी अक्षरशः जाळून टाकावी लागली. बालाघाटातल्या मुली कुपोषण आणि अॅनेमिया सोबत घेऊन जगणाऱ्या. त्यामुळे पाठीची दुखणी, सांधेदुखी, अशक्तपणा यांची कायमची सोबत. जन्मलेली मुलंही अशक्त कुपोषित. डायरिया, न्यूमोनियाला बळी पडणारी. पस्तीशीत सासू हपन्नाशीच्या आत बाई म्हातारी होते. तोवर १५ वर्षांची सून हाताशी आलेली असते.

२१ वर्षांच्या मनीषाचं नुकतंच कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं. मनीषाला दोन मुली आणि एक मुलगा! ‘इथे गर्भनिरोधकं पहिल्या खेपेला कुणीही घेत नाही,’ धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. अभिजित सांगळे सांगत होते. इथे रायमोहापेक्षा बरी स्थिती. पण शस्त्रक्रिया बंदच होत्या. हल्लीच सर्जनची नेमणूक झाली आहे. इथे जून २०१६ मध्ये कुटुंबनियोजनाच्या १३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पैकी ११ जणींना तीन मुलं होती आणि वय सरासरी २३!

मातोरीच्या शाळेत एक मुलगा म्हणाला, शेजारच्या आठवीतल्या मुलीचं लग्न ठरलंय. तिच्या आई-वडिलांशी बोलू म्हटलं तर ते शेतात. मग तिची मोठी बहीण आली. १६ वर्षांची. नऊ महिन्यांची गरोदर! जालना जिल्ह्यात अंबडचं सासर. चेहऱ्यावर बाळासारखे निरागस भाव. थोडी थकलेली. पायावर सूज होती. तपासण्या केल्या का, नाव कुठे घातलंस… असं काहीबाही विचारलं तर तिला काही कळेना. लाजत राहिली नुसती. हे वाचकांपर्यंत पोहोचेल तोवर तिनं बाळाला जन्म दिलेला असेल. सुखरूप सुटका झाली असेल ना तिची?

आजारी पडलेलं ग्रामीण रुग्णालय

रायमोहच्या ग्रामीण रुग्णालयात आत शिरताना पायरीवर झोपलेले कुत्रे हाकलावे लागले. कुबट वास नाकात शिरला. कुणीही वैद्यकीय अधिकारी जागेवर नव्हता. अॅडमिट केलेले रुग्ण व्हरांड्यात गप्पा मारत होते. कुणीतरी धावपळ करून ‘एनआरएचएम’च्या डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञाची बदली झाल्याचं सांगितलं. बाकी वैद्यकीय सोयींचा उजेडच होता. गरीबांना साहजिकच खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, हजारो रुपयांच्या बिलांत घेतलेली उचल संपून जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारने चिरडल्याने तरुणीचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिग्लनवर समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने अचानक थांबलेल्या दुचाकीवरून खाली पडलेल्या तरुणीला पाठीमागून येणाऱ्या कारने चिरडले. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी पाऊणच्या सुमारास जालना रोडवर डेअरीसमोरील महर्षी दयानंद चौकात हा प्रकार घडला. ही तरुणी चिकलठाणा येथे बँकेच्या परीक्षेसाठी भावासोबत जात होती. अवघ्या महिन्यावर याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघातातील मृत तरुणीचा विवाह होणार होता.
प्रथमा सुभाष वाटोरे (वय २४, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे या तरुणीचे नाव आहे. चिकलठाणा येथे बँकेच्या परीक्षेसाठी प्रथमा व तिचा भाऊ सचिन दुचाकीवरून जात होते. अमरप्रीत चौकात सिग्लन सुटल्यानंतर सचिनची दुचाकी सिग्लनपासून अवघ्या पन्नास फूट अंतरावर गेली होती. यावेळी समोरील वाहनाचे अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे सचिनला ब्रेक दाबावे लागले. दुचाकीचे ब्रेक दाबताच मागे बसलेली प्रथमा खाली कोसळली. त्याचवेळी पाठीमागून जात असलेल्या कारच्या चाकाखाली ती चिरडली गेली. सचिन किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत प्रथमाला घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास क्रांतीचौक पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, कारचा क्रमांक एमएच २० बीसी ८२८३ असा असल्याचा प्राथमिक अंदाज सचिनने व्यक्त केला आहे. प्रथमाचे वडील माजी सैनिक आहेत.

महिन्याभरात विवाह
प्रथमाचा नुकताच १७ एप्र‌िल रोजी साखरपुडा झाला होता. येत्या २८ मे रोजी तिचा विवाह होणार होता. घरी तिच्या विवाह समारंभाची तयारी सुरू होती. विवाह सोहळ्यासाठी आज खरेदी करण्यात येत होती. त्यावेळी प्रथमा बँकेची परीक्षा देण्यासाठी निघाली होती. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रीन कव्हर’ चार टक्क्यांवर!

0
0

Nikhil.Nirkhi@timesgroup.com
Tweet : @nikhilnMT
औरंगाबाद ः शहरातील झाडे-वृक्षांच्या प्रमाणात झपाट्याने घट होत असून, वृक्षांचे अच्छादन चक्क चार टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. ‘ऑक्सिजन हब’मध्येही झपाट्याने घटत होत आहे. शहर-जिल्ह्यात दररोज दहा वृक्षांची तोड होत असून, ही वृक्षतोड थांबली नाही, तर शहरातील ‘ग्रीन कव्हरेज’ हे लातूरप्रमाणे शून्य टक्क्यांवर येण्यासाठी फार काळ लागणार नाही, अशीही भीती तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे. झाडांचे आच्छान घटत असल्यानेच वायू-ध्वनी प्रदूषण शोषण्याची प्रक्रिया संथ झाली असून, ‘पीएम१०’सारखे विविध घातक घटक अनारोग्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
महापालिकेने मागच्या अनेक वर्षांत शहरातील वृक्षगणना केलेली नाही, तरीही ‘गुगल मॅप’, विविध ‘ऑक्सिजन हब’ व प्रशासकीय नोंदीनुसार शहरातील वृक्षांचे आच्छादन सरासरी चार टक्क्यांवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. काही भागात हे आच्छादन त्याहीपेक्षा कमी आहे. पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक यांच्यानुसार, पुण्यात ४८ लाख झाडे आहेत, तर औरंगाबाद शहरात अवघी साडेचार-पाच लाख झाडे शिल्लक आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी १० झाडांची कत्तल होत आहे. ही कत्तल अशीच सुरू राहिली, तर येत्या काही वर्षांत हिरवाईचे आच्छादन लातूरप्रमाणे ०.८ टक्क्यांवर आल्याशिवाय राहणार नाही. हे आच्छादन २० टक्के उत्तम समजले जाते; पण किमान १२ टक्के तर आच्छादन हवे. दुर्दैवाने, हिमायतबाग, सलीमअली सरोवर, विद्यापीठ, चिकलठाणा एमआयडीसी, पैठण रस्ता, वाल्मी असे मोजकेच ‘ऑक्सिन हब’ शहरामध्ये शिल्लक आहेत. त्यातच जिथे-तिथे कचरा जाळण्याची पद्धत, वीटभट्ट्या, धूळ, झाडांशिवाय रस्ते, १५ लाखांपेक्षा जास्त वाहने आदी कारणांमुळे श्वसनमार्गे जाणारे १० मायक्रॉनपेक्षा कमी ‘पार्टिक्युलेट मॅटर’ (पीएम१०) हे श्वसनविकारांसह विविध आजार वाढवत आहे. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी-शोषण्यासाठी झाडेच नसल्याने आणखी आजार वाढत आहेत. तापमान शोषणारे डांबर रस्ते वगळून १ ते २ अंश तापमान वाढवणारे सिमेंट रस्त्यांमुळे ‘सिलिकोसिस’ हा फुफ्फुसाचा विकारही वाढू शकतो. सद्यस्थितीत कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, हायड्रो कार्बन्स, सल्फर डायऑक्साइड अशा कितीतरी घातक वायुंनी शहरवासीयांचा श्वास गुदमरतोय व ‘सीओपीडी’चे रुग्णही वाढत आहेत. सिटीचौक, रेल्वेस्टेशन, मिलकॉर्नर, औरंगपुरा आदी भागांमध्ये ‘पीएम१०’ २००पेक्षा जास्त म्हणजेच कमाल मर्यादेच्या तिप्पट-चौपटीने आहेत, असेही डॉ. पाठक म्हणाले.

शहरातील काही भागात ४ टक्क्यांपेक्षाही कमी ‘ग्रीन कव्हरेज’ आहे. झाडे वाढवण्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे; अन्यथा प्रदूषण जीवघेणे ठरल्याशिवाय राहणार नाही.
- प्रा. डॉ. सतीश पाटील, विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभाग

महापालिका, सामाजिक वनिकरण विभाग, वन विभागाने किमान १० वर्षे नियोजित पद्धतीने वृक्षवाढीवर फोकस करावा. चारही दिशांच्या सर्व टेकड्या वृच्छादित कराव्यात व निदान १५-२० वर्षांपूर्वी इतके तरी हिरवाईचे आच्छादन वाढवावे व नवीन वृक्षांचे कत्तल होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. ‘टाउनशिप’मुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होणार आहे, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.
- प्रा. विजय दिवाण, पर्यावरण अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images