Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
राज्यातील प्रत्येक गाव आणि खेडे हे हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याबरोबरच मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत जालना जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळविला आहे. अशा विविध माध्यमातून जालना जिल्ह्यासह मराठवाड्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे धोरणे जाहीर करण्याबरोबरच मराठवाडा आणि जालना जिल्ह्याच्या विकासासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये भाजपाने मिळविलेले यश आणि त्यासाठी केलेले प्रयत्नावरही मंत्री लोणीकर यांनी यावेळी प्रकाशझोत टाकला.
लोणीकर म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य मागील काही वर्षांपासून दुष्काळाचा मोठा सामना करीत होते. पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. मराठवाड्यात ४ हजार टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. लातूर शहरात रेल्वेने पाणीपुरवठा करुन तेथील नागरिकांना राज्य सरकारमार्फत दिलासा दिला. दुष्काळी परिस्थितीत तातडीच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी राज्यभरात साधारण ७०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. गेल्या दोन वर्षात स्वच्छता अभियानातही राज्याने मोठी आघाडी घेतली असून ११ जिल्ह्यांसह राज्यातील १६ हजार ५५३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त केल्या आहेत. १२ मे २०१७ अखेर राज्यातील १४९ तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. येत्या ३ ते ४ वर्षात राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस असून त्यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या विविध योजना प्रभावीवणे राबविण्यात येत आहेत.’
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती लक्षात घेता मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ या नावाखाली राज्य सरकारचा स्वत:चा असा ग्रामीण पाणी पुरवठ्याचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा कार्यक्रम राज्यभरात सन २०१६-१७ ते सन २०१९-२० या चार वर्षांसाठी राबविण्यात येणार असून याकरिता चार वर्षांसाठी रुपये २५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमामधून १००३ नवीन ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रस्तावित असून ८३ प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय ५३१ ग्रामीण योजनांच्या देखभाल दुरुस्तीकरिता दरवर्षी रुपये १०० कोटी याप्रमाणे चार वर्षांकरिता रुपये ४०० कोटीची तरतूद करण्यात आली असल्याचे, लोणीकर यांनी सांगितले.

केंद्र शासनाद्वारे क्यूसीआय या संस्थेमार्फत देशभरातील जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वेक्षण करण्यात आले. याचे निष्कर्ष केंद्रीय ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नुकतेच जाहीर केले. महाराष्ट्राच्या कामगिरीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड योजना
दुष्काळाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला. जलस्त्रोत आटल्याने तसेच जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा मोठा सामना मराठवाड्यातील नागरीकांना करावा लागला. यापुढील काळात मराठवाड्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी मराठवाड्यात वॉटर ग्रीड योजना राबविण्यात येईल. मंत्रिमंडळानेही यास तत्वत: मान्यता दिली असून पाणीपुरवठा विभागामार्फत याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. ही योजना राबवून मराठवाड्याला टँकरवाड्याच्या चक्रातून कायमस्वरुपी मुक्त केले जाईल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिली ड्रोनचे उड्डाण अखेर यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस आयुक्तालयात शुक्रवारी दुपारी चिली (मिरची) ड्रोन कॅमेऱ्याचे प्रात्याक्षिक घेण्यात आले. या प्रात्याक्षिकात कॅमेऱ्यातून मिरची पावडर खाली टाकण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. तांत्रिक बाबीमुळे हा कॅमेरा गुरुवारी न उडाल्याने प्रात्याक्षिक अपयशी ठरले होते.
कायदा व सुव्यवस्था राखणे, अनूचित घटनांना आळा घालणे व मोर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक आयुक्तालयाच्या मैदानावर गुरुवारी आयोजित केले होते. यामध्ये जमावाचे छायाचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचे प्रात्याक्षिक यशस्वी झाले होते. परंतु, हिंसक जमाव आटोक्यात आणण्यासाठी वापरण्यात येणारा चिली ड्रोन कॅमेरा तांत्रिक बाबीमुळे उडू शकला नव्हता. या कॅमेऱ्याचे शुक्रवारी पुन्हा प्रात्याक्षिक घेण्यात आले. या कॅमेऱ्याखालील बॉक्समधून जमावावर मिरची पावडर टाकणे शक्य असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात हजाराची लाच; पोलिस नाईक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ‌
टिप्पर चालकाकडून सात हजारांची लाच घेताना सातारा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजाराम वाघ याला अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा पोलिस ठाण्यात दुपारी ही कारवाई केली.
बीड बायपास येथील एका टिप्पर चालकावर पोलिस नाईक वाघ यांनी कारवाई केली होती. या चालकाचे लायसन्स वाघ यांच्याकडे जमा होते. ते परत करण्यासाठी वाघ यांनी साडेसात हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सात हजार रक्कम ठरली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने चालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शुक्रवारी सापळा रचून वाघ यांना लाचेची रक्कम घेताना अटक करण्यात आली. आरोपी राजाराम गणपत वाघ (वय ४७ रा. शिवाजीनगर) याच्या विरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शिवाजीनगर येथील घराची लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडून रात्री उशीरापर्यंत झडती सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या बदल्यांना आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी सर्वसधारण व अवघड क्षेत्रानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. या याद्याच रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दिवाणी अर्ज केला आहे. त्यावर १५ मे रोजी सुनावणी होईल.
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्याचे नवे धोरण जाहीर केले. त्यानुसार यापुढे शिक्षकांच्या अवघड व सर्वसाधारण अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिक्षकांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या करताना २७ फेब्रुवारी २०१७च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयात अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राची निवड करण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. बदल्यांच्या एकूणच धोरणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप रमाकांत ढाकणे यांनी याचिका केली आहे. सुनावणीअंती न्यायालयाने शासनासह प्रतिवाद्यांना नोटीस बजावलेली आहे. तालुका मुख्यालयापासून दूर असणारे गाव, शाळा यांचा समावेश होईल. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोचण्यास सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम व डोंगराळ भागातील गावे; तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्चित केली जातील. अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे, शाळा सर्वसाधारण क्षेत्रात ओळखली जातील.

गैरव्यवहाराचा आक्षेप
याप्रक्रियेत जिल्हा परिषद शाळांत काम करणारे प्राथमिक, माध्यमिक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने अवघड व सर्वसाधारण क्षेत्रातील याद्याही प्रसिद्ध केल्या आहेत, पण वर्गीकरण करताना अनेक ठिकाणी मर्जी व अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप करत याद्या रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरजिल्हा बदलीसाठी आता ऑनलाइन अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया यंदा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात सुरवातीला दोन विभागांकडून पोर्टलद्वारे अर्ज मागविले. दुसऱ्या टप्प्यांत औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक आणि लातूर विभागाची प्रक्रिया राबविली जाईल. १५ ते १७ मेदरम्यान ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आंतरजिल्हा बदलीचा विषय दरवर्षी चर्चेचा असतो. शिक्षण विभागापासून ना हरकत घेणे, समोरच्या जिल्ह्यात जागेचा शोध मग पुढची प्रक्रिया पार पाडणे यासाठी शिक्षकांना चकरा माराव्या लागत होत्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांत आंतरजिल्हा बदली प्रक्रियेविषयी खूप चर्चा होती. प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून आंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया स्थगित केली होती. यंदा मात्र सरकारी पातळीवरच ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचे निश्चित झाले आहे. इच्छुक शिक्षकांनी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावयाचे आहेत. राज्यातील सर्व विभागांमधून इच्छुकांचे अर्ज जमा करून नियमानुसार बदल्यांसाठी गृहित धरले जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; औरंगाबाद जिल्ह्यात बाहेरून १४५ शिक्षकांना येण्यासाठी जागा रिक्त आहेत. प्रवर्गनिहाय या जागा भरल्या जातील. जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांचा आकडा मात्र संबंधित जिल्हा परिषदांच्या ना हरकतीनंतरच समोर यणार आहे. एकूण यंदाची बदली प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. हस्तक्षेप होणार नसल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर प्रवेश परीक्षा वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. सीईटी, विषय निवड आणि प्रवेश प्रक्रिया या तीन टप्प्यात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे शुल्क वसूल केले जाणार आहे. या मनमानीला विरोध करीत विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालयांनी ‘सीईटी’ रद्द करण्याची मागणी केली आहे. सीईटीचे नियोजन विद्यापीठ प्रशासन करीत असले, तरी हा निर्णय ऐनवेळी बारगळण्याची शक्यता आहे.
पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ‘सीईटी’ घेण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी ‘सीईटी’वर शिक्कामोर्तब केले होते. ‘सीईटी’साठी खुल्या प्रवर्गाला ५०० रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क आहे; तसेच ‘सीईटी’नंतर विषय नोंदणीसाठी अनुक्रमे एक हजार व पाचशे रुपये शुल्क आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार आहे. तीन टप्प्यांत आकारले जाणारे शुल्क ही विद्यार्थ्यांची लूट असल्याचा आरोप विद्यार्थ्यी संघटनांनी केला आहे. महाविद्यालय प्रशासनानेही ‘सीईटी’ला विरोध केला आहे. काही विषयांना विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. काही विषयांना जेमतेम विद्यार्थी प्रवेश घेतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने घेतलेला ‘सीईटी’चा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. विद्यापीठाची स्वतंत्र यंत्रणा असताना ‘वुई शाइन’ या खासगी कंपनीला ‘सीईटी’चे कंत्राट दिले आहे. खासगी कंपनीला भरमसाठ पैसे देऊन ‘सीईटी’ घेण्याचा विद्यापीठाचा निर्णय विद्यार्थ्यांना आर्थिक झळ बसवणारा आहे. या कारणामुळे ‘सीईटी’चा मुद्दा वादात सापडला आहे.
कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे आणि प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांची भेट घेऊन प्राचार्य व विद्यार्थी संघटना चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा हा निर्णय असल्याची टीका करीत ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनने विरोध केला आहे. ‘एआयएसएफ’च्या शिष्टमंडळाने गुरुवारी कुलसचिव डॉ. जब्दे व विद्यापीठ अधिकारी डॉ. पाटील यांना निवेदन देऊन ‘सीईटी’ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी राज्य अध्यक्ष पंकज चव्हाण, अय्याज शेख, संतोष जाधव, योगेश साळवे, मयूर साळवे, सागर घाटे आदी उपस्थित होते. विद्यार्थी हिताचा विचार न करता विद्यापीठाने तुघलकी निर्णय घेतला आहे. भरमसाठ शुल्क आकारून शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप ‘एआयएसएफ’ने केला आहे.

प्रश्नांचा भडिमार
‘सीईटी’बाबत विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम सीईटी आताच का, ‘सीईटी’चे कंत्राट खासगी कंपनीला का, विद्यापीठाचे प्रोग्रामर काय करतात, विद्यापीठात पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पैसे नसताना खासगी कंपनीला देण्यासाठी पैसे कोठून आले, ‘सीईटी’चा निर्णय घेताना विद्यार्थी संघटना, प्राचार्य व प्राध्यापकांना विश्वासात का घेण्यात आले नाही, सीईटी घेतल्यानंतर विद्यार्थी व विद्यापीठाचा दर्जा वाढेल याची हमी प्रशासन घेणार काय, असे प्रश्न ‘एआयएसएफ’ने निवेदनात केले आहेत.

प्रशासनाचा पेच
पदव्युत्तर ‘सीईटी’ निर्णयाला महाविद्यालये व विद्यार्थी संघटनांचा वाढता विरोध पाहून विद्यापीठ प्रशासन पेचात पडले आहे. विद्यापीठाचे काही विभाग विद्यार्थी नसल्याने रिकामे असतात. केंद्रीय पद्धतीने ‘सीईटी’ घेऊन या विभागात विद्यार्थी भरल्यानंतर इतर महाविद्यालयांना विद्यार्थी दिले जातील, असे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘सीईटी’ला विरोध वाढला आहे. ‘पेट’ परीक्षेबाबत गलथानपणा करणारे विद्यापीठ प्रशासन ‘सीईटी’ घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित भूईगळसह आठजणांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या अमित भूईगळसह आठ जणांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायधीश व्ही. एस. पाडळकर यांनी शुक्रवारी दिले.
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे १७ एप्रिल रोजी शहरात शासकीय दौऱ्यावर आले असता, त्यांच्यावर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळसह २५ जणांनी हल्ला केला होता. गायकवाड यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात अमित भूईगळसह उपाध्यक्ष श्रीरंग ससाणे, दिनेश साळवे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे, गौतम गवळी, शांताबाई धुळे व रेखा उजागरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हे संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, सशर्त जामीन मंजूर करीत, खटला सुरू असेपर्यंत सुभेदारी विश्रामगृहात जाऊ नये, राज्य सोडण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी, दोषरोपपत्र दाखल होईपर्यंत महिन्याच्या १० व २५ तारखेस सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. सोमनाथ लड्डा व अॅड. सागर लड्डा यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
गोळेगाव येथे पत्नीचा खून केल्यानंतर पतीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. किशोर किसन काळे (वय ४०) व कविता किशोर काळे (वय ३३), अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर काळे हा आई-वडिलांपासून विभक्त होऊन पत्नीसह गोळेगाव येथील पानवडोद रस्त्यावरील घरात विभक्त राहत होता. पती व पत्नीमध्ये कायम भांडणे होत असत. या भांडणात किशोरने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तू मारल्यामुळे ती मरण पावली. त्याने तिला त्याच अवस्थेत पलंगावर ठेवले व घराला कडी लावून निघून गेला. दरम्यान, गोळेगाव शिवारातील खोरा परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मुलांना शुक्रवारी सकाळी किशोरचा मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती लगेच पोलिस पाटलांना दिली.
किशोर काळे याची दोन मुले आजी-आजोबाकडेच रहातात. त्याचा मोठा मुलगा शुक्रवारी सकाळी कपडे आणण्यासाठी आईच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याला आई पलंगाजवळ पडलेली दिसली, त्याने ही माहिती आजोबाला सांगितली. परंतु, ती मृतावस्थेत असल्याचे मुलाच्या लक्षात आले नाही. किशोरच्या वडिलांनी पोलिस पाटीलाला घरी बोलावून किशोर काळे हा रागात घरून निघून गेला असून त्याच्या घराकडे जाऊन पाहण्यास सांगिले. पोलिस पाटील घरी गेले असता त्यांना दार ढकलताच त्यांना उग्र दर्प आला. यावेळी कविता काळे या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या. अजिंठा पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पानवडोद येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात मृत कविताचा भाऊ विनोद कडुबा सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मृत किशोर काळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकतर्फी प्रेमातून एका २४ वर्षांच्या तरुणीला एक तरूण व त्याच्या आईने अडवून अॅसिड टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पाच वाजता दिशानगरी भागात घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही २४ वर्षांची ‌तरुणी बहिणीसोबत बुधवारी सायंकाळी दिशानगरी भागातून जात होती. त्यावेळी आशिष अनिल आहेर व स‌ुनीता आहेर (रा. एन चार, सिडको) यांनी तिला अडवले. तू माझ्यासोबत लग्न कर, दुसऱ्या मुलासोबत केल्यास तुझे फोटो व्हॉटसअॅपवर टाकून बदनामी करतो, अशी धमकी देत आशिषने विनयभंग केला. त्याची आई सुनिता आहेरने, तू माझ्या मुलाशी लग्न केले नाही, तर तुझ्या अंगावर अॅसिड टाकून ठार मारीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आई व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार पदार हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णोदेवीच्या भक्ताची २० हजारांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंटरनेटवर खोटी वेबसाइट अपलोड करून कटरा ते वैष्णोदेवी हेलिकॉप्टर प्रवाशाचे आमिष दाखवून एका नागरिकाची २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ एप्रिल रोजी सिडको एन ८ भागात घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र विजयसिंग राजपूत (वय ३९ रा. एन ८, गजराजनगर) यांना एप्रिलमध्ये जम्मू काश्मीरला जायचे होते. कटरा येथून वैष्णोदेवीला जायचे असल्याने त्यांनी गुगलवर वेबसाइट तपासल्या. यामध्ये माहेलीकॉप्टर नावाने त्यांना वेबसाइट आढळली. त्यांनी वेबसाइटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यासोबत संवाद साधला. त्याने नऊ जणांचे २० हजार रुपये आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात भरण्यास सांगितले. राजपूत यांनी विश्वास ठेवून ही रक्कम त्या खात्यावर भरली. यानंतर आरोपीने मोबाइल क्रमांक बंद करून टाकला. राजपूत यांनी कटरा येथे जाऊन चौकशी केल्यानंतर ही वेबसाइट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी राजपूत यांनी गुरुवारी तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी मनीष शर्मा विरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक परोपकारी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन जण जखमी; बसचालकाला शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरधाव बस रिक्षाला धडकून रिक्षा चालकाला गंभीर जखमी करणाऱ्या बसचालकाला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी ठोठावली.
याप्रकरणी रिक्षा चालक साजेद खान याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २७ जानेवारी २०११ रोजी ते जालना रोडवरून रिक्षा घेऊन जात होते. त्याचवेळी पाठमागून भरधाव वेगात आलेल्या बसने रिक्षाला जोराची धडक दिली. या धडकेने रिक्षा, सायकलस्वाराला धडकली व त्यानंतर बस दुभाजकावर आदळली. या तिहेरी अपघातात रिक्षाचालक व सायकलस्वार दोघेही गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी सहायक सरकारी वकील एम. ए. गंडले यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी बसचालक संजय सुंदरलाल लोंढे (वय ३०, रा. नारेगाव, औरंगाबाद) याला कलम २७९ अन्वये तीन महिने साधा करावास व कलम ३३८ अन्वये सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी फाशीचा प्रयत्न; १६० ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नांदूर-मधमेश्वर जलतगती काललव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी फाशी घेण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी १६० आंदोलकांना ताब्यात घेऊन मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई केली. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केले होते.
उपोषण सुरू करतानाच आंदोलकांनी सामूहिक फाशी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, कन्नडचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरंजन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, गंगापूरचे पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, शिल्लेगाव ठाण्याचे सूर्यकांत कोकणे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. याशिवाय दंगल नियंत्रण पथकालाही सज्ज ठेवण्यात आले होते. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
उपोषणार्थिंनी सकाळपासूनच घोषणा नांदूर-मधमेश्वर व नाशिक पाटबंधारे विभागाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध केला. बाजार समितीचे माजी संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २०० लाभधारक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी जगताप यांच्यासह कालवा लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली. दुपारी दोनच्या सुमारास उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप व तहसीलदार सुमन मोरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. कालव्यातून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या सचिवांना कळवण्यात आले असून १६ मे रोजी पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. पण, कालव्यातून आजच पाणी सुटले पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. कालव्यातून पाणी सुटणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी लपवून ठेवलेले दोर बाहेर काढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब धाव घेऊन शेतकऱ्यांची धरपकड सुरू केली. आम्हाला फाशी घेऊ द्या नाही, तर जेलमध्ये टाका, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे पोलिसांनी १६० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यानुसार कार्यवाही करुन सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कालव्यातून पाणी सोडण्याबाबत मुंबई येथे १६ मे रोजी जलसंपदा राज्यमंत्री यांच्यासोबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय होणार आहे.
-डॉ. संदिपान सानप, उपविभागीय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्यांचा मराठवाड्याला फास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात यंदा पाण्याची स्थिती चांगली असली तरीही शेतकरी आत्महत्यांचा फास अधिकच आवळला गेला आहे. अवघ्या पाच महिन्यांत मराठवाड्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३०३वर पोचली आहे.
नापिकीचे सत्र, शेतीमालाचा घसरलेला भाव, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दरम्यान, सरकार दप्तरी या वर्षी पाच महिन्यांत ३०३ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये यंदा फारशी पाणीटंचाई नाही, शेतीमध्येही यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उत्पन्न असले, तरी नापिकी, कर्जबाजारीपणाच्या दृष्टचक्रातून शेतकरी बाहेर आला नाही. येत्या काही दिवसांमध्ये पेरण्यांची तयारी करावी लागणार असल्यामुळे पुन्हा नवीन आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागणार असून, यंदा शेतीतून उत्पादन मिळाले असतानाही समाधानकारक भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.
गेल्या पाच महिन्यांत आतापर्यंत सर्वाधिक ५७ आत्महत्यांची प्रकरणे बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४३, जालना २६, परभणी ३२, हिंगोली २०, नांदेड ५३, लातूर २२ व उस्मानाबाद जिल्ह्यात ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

८५ प्रकरणांची चौकशी प्रलंबित
आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वीच पीक कर्ज घेतले आहे. काहींचा शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या नावावर पीक कर्ज नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांच्या वारसांना मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. अशी मराठवाड्यात ३६ प्रकरणे असून, यातील काही प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ८५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कचऱ्या’चे खासगीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छतेच्या स्पर्धेत औरंगाबाद शहराचा क्रमांक ५७वरून २९९पर्यंत घसरला. त्याचे निमित्त साधून महापौर भगवान घडमोडे यांनी कचरा संकलन व विल्हेवाटीच्या कामाचे खासगीकरण करण्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासनाला दिले. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शहर पुन्हा एकदा ‘रॅम्की’च्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कचरा संकलन व विल्हेवाटीवर दरवर्षी ६० ते ६२ कोटी रुपये खर्च करूनही शहर २९९ क्रमांकावर आले, त्यामुळे या खर्चाचे तीन वर्षांपासूनचे ऑडिट करा, असेही महापौरांनी आयुक्तांना सांगितले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे औरंगाबाद शहरातील स्वच्छतेच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. देशातील ४४३ शहरांमध्ये औरंगाबाद शहर २९९ क्रमांकावर राहिले. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत ५७व्या क्रमांकावर असलेल्या या शहराचे रँकिंग कसे घसरले, यावर चर्चा करून कामात सुधारणा करण्यासाठी महापौर घडमोडे यांनी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजातील अनेक त्रुटी यावेळी उघड केल्या, प्रश्नही विचारले. त्याला प्रशासनातर्फे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी उत्तर दिले. त्यानंतर महापौरांनी विविध मुद्यांच्या आधारे प्रशासनाला आदेश दिले.
महापौर म्हणाले, ‘घनकचरा व्यवस्थापनावर खूप खर्च करून देखील आपण मागे आहोत. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील शहर स्वच्छ झालेले नाही. त्यामुळे आता एक पाऊल पुढे टाकून स्वच्छतेसाठी मायक्रो प्लॅनिंग करावे लागेल. ‘माझी सिटी टकाटक’ या मोहिमेंतर्गत सीआरटी या संस्थेला एका खासगी कंपनीने महापालिकेबरोबर स्वच्छतेचे काम करण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये दिले. एवढी रक्कम देऊनही शहराचे रँकिंग घसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने सीआरटीकडून कामाचा हिशेब घ्यावा. स्वच्छतेत आपले शहर टॉप टेनमध्ये आणण्यासाठी प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी या सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. या कामात नागरिक सहभागी होणार नाहीत, तोपर्यंत शहर टॉप टेनमध्ये येणार नाही.’

खर्चाचे ऑडिट होणार
कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट या कामासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी ६० ते ६२ कोटी रुपये खर्च केला जातो. इतर शहरांच्या तुलनेत हा खर्च तिप्पट आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या खर्चाचे ऑडिट करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी केली, तर रेणुकादास वैद्य यांनी इतर शहरातील खर्चाची आकडेवारीच सादर केली. त्यामुळे महापौर भगवान घडमोडे यांनी कचरा संकलन व विल्हेवाट लावण्याच्या कामावर करण्यात आलेल्या खर्चाच्या ऑडिटचे आदेश आयुक्तांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरुंनी वाचला जाहीर पाढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘दोन वर्षांत डॉ. सुहास मोराळे यांना कधीही रागावून बोलताना पाहिले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण प्रयत्न कमी पडले. कामात सहभागी असणे आणि मनापासून काम करणे यात फरक असतो,’ अशा शब्दात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांचे कान उपटले. विशेष म्हणजे मोराळे यांच्या सेवा गौरव समारंभातच कुलगुरूंनी विद्यार्थी कल्याण विभागाच्या उणिवांचा जाहीर पाढा वाचला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मोराळे यांचा कार्यकाळ संपला. यानिमित्त महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी दुपारी सेवा गौरव समारंभ झाला. त्यांना निरोप देऊन विद्यार्थी कल्याण संचालकपदी डॉ. राजेश रगडे यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. चोपडे, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांची प्रमुख उपस्थिती होती.
दोन वर्षे संचालकपदाचा कार्यभार सांभाळणारे डॉ. मोराळे यांचा सत्कार केल्यानंतर कुलगुरू चोपडे यांनी विस्तृत भाषण केले, विद्यार्थी कल्याण विभागाच्या मर्यादा त्यांनी परखडपणे मांडल्या. विशेष म्हणजे ‘मोठा भाऊ म्हणून बोलतोय. मोराळे, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका,’ असे सांगत चोपडे यांनी जोरदार भाषण केले. ‘ग्रामीण भागातून आलेल्या मोराळे यांनी संधीचे सोने केले. दोन वर्षांत कधीच त्यांना रागावून बोलताना पाहिले नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोड‍वण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण प्रयत्न कमी पडले. तरूण प्राध्यापकांनी मनापासून काम करणे अपेक्षित असते. कामात माझे योगदान काय, असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. प्रशासनात घडी बसवली पाहिजे. कामात समर्पण खूप गरजेचे असते. कामात सहभागी होणे आणि समर्पण असणे यात फरक असतो.’
कामाचे डॉक्युमेंटेशन करण्यात आले नाही. पुढील वर्षी ‘नॅक’ कमिटीला ते दाखवता आले असते. विद्यार्थ्यांसाठीचे काम निरंतर टिकले नाही. विद्यार्थी कल्याण विभागाच्या कामाचे पुस्तक डॉ. मोराळे यांनी प्रकाशित केले नाही. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी यूजीसीच्या अध्यक्षांचे भाषण राष्ट्रीय स्तरावरील ‘युनिव्हर्सिटी न्यूज’मध्ये प्रकाशित होणे अपेक्षित होते, मात्र या कामात तत्परता दाखवली गेली नाही. पुढील काळात मोराळे यांनी शिक्षण-संशोधनातून चांगले काम करावे, असे डॉ. चोपडे म्हणाले.
जालना येथील काही प्राध्यापकांनी इंद्रधनुष्य विशेषांक प्रकाशित केला. या अंकाबाबत चोपडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे पुस्तक मनापासून काढले गेले नाही, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. नारायण पंडुरे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही वेगळी भट्टी
‘विद्यार्थी कल्याण संचालकपद वेगळी भट्टी आहे. या कामातून तावून-सुलाखून निघाल्यास कोणत्याही कामात तुम्ही कमी पडणार नाही,’ असे डॉ. मोराळे नवीन संचालक डॉ. राजेश रगडे यांना म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा अनुभव मोराळे यांनी सांगितला. ‘एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवण्याचे काम केले. शिस्त लावण्यासाठी रोष पत्करावा लागला, पण इंद्रधनुष्य महोत्सव आणि राष्ट्रीय महोत्सवात विद्यापीठाने बाजी मारल्याचा आनंद आहे,’ असे डॉ. सुहास मोराळे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पाहणीचा फार्स नको, मदत हवी

$
0
0

मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद
सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, पाणी व चारा टंचाई तर कधी अवकाळी पावसामुळे व गारपीट या नैसर्गिक संकटामुळे सर्व सामान्यांसह बळीराजा व पशुपालकांना जगणे मुश्कील झाले आहे. यंदाचा खरीप पेरणीचा हंगाम दोन आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे व खताची तर पशुधन वाचविण्यासाठी चाऱ्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यात केवळ पाहणीचा फार्स व श्रमदान न करता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करत त्यांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी उस्मानाबाद जिल्हा भेटीसाठी येत आहेत. यावेळी ते आढावा बैठकी बरोबरच जलयुक्त शिवारच्या कामाची पाहणी करून हिवरा या गावी लोकसहभागातून सुरू असलेल्या कामात सहभागी होऊन कार्यकर्त्यांना पाठबळ देणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यापूर्वीही केंद्र व राज्य सरकारच्या अनेक मंत्री व अधिकारी यांचे दौरे झाले. विरोधकांनीही पाहणी दौऱ्याचा आनंद लुटला. परंतु, शेतकऱ्यांला हवी असणारी मदत किंवा कर्ज माफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यात विशेष प्रयत्न करण्याचे राज्य सरकारने ठरविले. यासाठी प्रत्येकी ५५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला. मात्र, हा निधी कुठे रखडला, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी उस्मानाबादकरांची अपेक्षा आहे. ५५० कोटी रुपयांच्या पॅकेजच्या घोषणेला दीड वर्षे उलटूनही मदत न मिळाल्याने ही घोषणा वांझोटी ठरली आहे.
नापिकी, कर्जबाजारीपणा बरोबरच शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने दिवसें-दिवस शेतकऱ्याची अवस्था दयनीय होत चालली असून, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु, सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांना दिलासा देण्यास असमर्थ ठरत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वीही त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आवडत्या हाडोंग्री परिसरात येऊन गेले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी आर्थिक मदत करण्याबरोबरच सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, या अधिकाऱ्यांनीही केवळ बैठकाचे सोपस्कार करण्यापलीकडे फारसे काही केल्याचे दिसत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी काही विशेष प्रयत्न केल्याचेही दिसून आले नाही. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढावी यासाठी शेततळे, ठिबक सिंचन, सारख्या विविध योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, जिल्ह्यातील शेततळ्याचे काम कासवगतीने चालू आहे. तर, ठिबक सिंचन योजनाही अनुदान रक्कमेअभावी रखडलेली आहे.

तूर विनाविलंब खरेदीचे आदेश द्यावेत
उस्मानाबाद जिल्ह्यात तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असून, ही तूर विनाविलंब खरेदी करण्याबाबतचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला द्यावेत, अशी अपेक्षा उस्मानाबादकर बाळगून आहेत.

शेततळ्यांचा आढावा घेणार
मुख्यमंत्री फडणवीस भूम येथे होत असलेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढावी यासाठी शेततळे, पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामांचा आढावा घेणार असल्याची माहिती सुत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत १५ रुग्णांवर होणार मणक्यांच्या शस्त्रक्रिया

$
0
0

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित मणक्यांच्या विकारांवरील तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या १५ रुग्णांवर मणक्यांच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया होणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ डॉ. भोजराज, डॉ. गौतम जव्हेरी व टीमकडून या रुग्णांवर घाटीमध्ये शस्त्रक्रिया होणार आहेत.
अस्थिव्यंगोपचारशास्त्र विषयातील तज्ज्ञसेवा रुग्णांना उपलब्ध करण्याच्या हेतुने शुक्रवारी (१२ मे) घाटीमध्ये डॉ. भोजराज व टीमच्या उपस्थितीत शिबिर झाले. अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. अनिल धुळे आदींच्या उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिरात सुमारे शंभर रुग्ण तपासणीसाठी आले होते. यापैकी मणक्यांच्या शस्त्रक्रियांसाठी १५ रुग्णांची निवड करण्यात आली.

‘स्पाइन फाउंडेशन’ कडून मदत
घाटीतील शिबिरात शस्त्रक्रियांसाठी निवड करण्यात आलेल्या रुग्णांवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया होणार आहेत. त्याचवेळी योजना लागू न होणाऱ्या रुग्णांना ‘स्पाइन फाऊंडेशन’मार्फत मदत केली जाणार आहे. फाऊंडेशनच्या मदतीतूनच विविध इम्प्लांट तसेच वैद्यकीय साहित्याची खरेदी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीत ऑईल मिलला आग

$
0
0


परभणी - शहरातील एमआयडीसीमधील ऑईल मिलला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने तब्बल अडीच ते पावणे तीन कोटी रूपयांचे नुकसान झाले. यात मिलमधील बारदाणा, सरकी, मशनरी आणि स्टीलची पत्रे जळून खाक झाली असून या प्रकरणी नवा मोंढा पोलिसात नोंद झाली आहे. दरम्यान, परभणीसह गंगाखेड, मानवत, पूर्णा, पाथरीच्या अग्नीशमन दलाने रात्रभर शर्तीचे प्रयत्न करून शुक्रवारी सकाळी १० वाजता ही आग आटोक्यात आणली.

शहरातील उद्योजक ओमप्रकाश डागा यांची वसमत रोडवरील औद्योगीक वसाहतीत माहेश्वरी ऑईल मिल आहे. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास मिलमध्ये रात्रपाळीचे काम सुरू होते. १२.१० वाजेच्या सुमारास स्पर्किंग होऊन वीजखंडीत झाली होती. त्यानंतर १० मिनीटाने पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाल्याने मिल मधील मशीन चालू करण्यात आल्या. मात्र स्पार्कींग झाली त्यावेळी काही ठिणग्या मिलमधील रिकाम्या बारदाण्यांवर पडल्या होत्या. त्यामुळे त्या बारदाण्यांनी पेट घेतला. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर रात्र पाळीवर काम करणारे ४ मजूर, वॉचमन आणि मुनीम मुंजाभाऊ रामभाऊ कदम यांना धूर निघत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी तात्काळ मशीन बंद केल्या. मात्र तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. त्यामुळे कदम यांनी तात्काळ मालकाला दूरध्वनीवर माहिती दिली. मालकाने अग्नीशमन दलाला कळवले. मात्र अग्नीशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. परभणी मनपाच्या दोन अग्नीशमन दलाचे बंब येऊन देखील आग आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने बाजार समितीसह पाथरी, मानवत, पूर्णा आणि गंगाखेड या ठिकाणच्या अग्नीशमन दलाला पाचारण केले. रात्रभर सुमारे दहा बंबांनी पाण्याचा मारा केला. त्यासोबतच खासगी टँकरनेही पाणी आणून आग विझवण्याचा करण्यात आला. सकाळी दहाच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. या संदर्भात ऑइल मिलचे मुनीम मुंजाभाऊ कदम यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर लाठीचार्ज

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। उस्मानाबाद

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पारडी फाट्याजवळ काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आगामी काळात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तीव्र संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यात रान उठवले आहे. त्यातच तूर डाळ खरेदी आणि इतर मुद्यांवरही शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. उस्मानाबादमधील शेततळी कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह भूम तालुक्यात आले होते. वाशी तालुक्यातील पारडी फाट्य़ाजवळ आल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आज, शनिवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. काही आंदोलकांनादेखील ताब्यात घेण्यात आले.

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री सुभाष देशमुख, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जालना जिल्ह्यातही नियोजित कार्यक्रम आहेत. उस्मानाबाद येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या दौऱ्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात एक जुलै ते सात जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत एकूण १२ लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी झाली असून, त्यापैकी साडेपाच हजार रोपांची लागवड करण्याची जबाबदारी एकट्या वनविभागाकडे दिली आहे. उर्वरित रोपे विविध शासकीय विभाग तसेच ग्रामपंचायतींच्या मदतीने लावली जाणार आहेत.
वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत अडीच कोटी रोपे वन विभागाकडून लावली जातील. इतर शासकीय विभागांना ७५ लाख रोपांचे लक्ष्य देण्यात आले आहे. उर्वरित एक कोटी रोपे ग्रामपंचायतींमार्फत लावली जातील. चार कोटी रोपे पुरविण्याची जबाबदारी वनविभागाकडे राहणार आहे.
यात औरंगाबाद जिल्ह्यात १२ लाख, तर जालना जिल्ह्यात सहा लाख ५० रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी वन विभागाकडे साडेपाच हजार रोपांची लागवड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वन विभागाला दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे नियोजित स्थळी खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण लक्ष्य गाठण्यासाठी व सर्व विभागात समन्वय साधण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरीय समिती तयार केली आहे. नियुक्त केलेल्या समन्वयकांची माहिती देणारी पुस्तिकाही तयार करण्यात येत आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांना लागणारी रोप वन विभागामार्फत पोहचती करून दिली जाणार असून, वाहतूक खर्च वन विभाग करणार आहे. तर अन्य विभागांना सवलतीच्या दरात रोपे दिली जाणार आहेत.

मंगळवारी बैठक
केवळ वृक्षारोपण करणे नव्हे तर लावलेल्या झाडांचे जतन व संवर्धनाची जबाबदारी ही त्या-त्या यंत्रणेवर आहे. या महालागवडीच्या पूर्वतयारीचा आढावासंबंधी येत्या १६ मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या मिळून जिल्ह्यात २२ रोपवाटिका असून त्या ठिकाणी वड, पिंपळ, फळझाडे यासह विविध असे १५ लाख रोप तयार झाले आहेत. - सतीश वडस्कर, उपवनसंरक्षक, वन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images