Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोटारसायकलींची धडक; दोन ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळजवळ काळी पिवळीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची गुरुवारी समोरासमोर झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आयान जाकेर शेख (वय ६) व बाबासाहेब हरीचंद्र सरग (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत.
तालुक्यातील थेरगाव येथील जाकेर मुनीर शेख (वय ३५), आलिशान जाकेर शेख (वय ३०), रिहान जाकेर शेख (वय १०), आलिया जाकेर शेख (वय ४) आयान जाकेर शेख (वय ६) हे एमएच २० डी एक्स १८४६ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून आडूळकडून पाचोडकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या बाबासाहेब हरीचंद्र सरग (वय ४८, रा. आडूळ) यांच्या एमएच २० एआर ८२४५ या क्रमांकाच्या मोटरसायकलसोबत धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की जाकेर शेख यांच्यासमोर दुचाकीच्या टाकीवर बसलेला सहा वर्षांचा आयान हा डोक्याला मार लागून जागीच ठार झाला. बाबासाहेब हरीचंद्र सरग यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच आडूळ बीट जमादार शिवाजी जाधव, पोलिस शिपाई जीवन गोपालघरे, वाहनचालक गुढेकर हे वाहन घेऊन घटनास्थळी गेले. त्यांनी जखमींना आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपाचारार्थ दाखल केले. सरग यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठणमध्ये आजपासून शिल्लक तूर खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेतकऱ्यांची शिल्लक तूर खरेदी करण्याचे आदेश सहायक निबंधक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पैठण येथील तूर खरेदी केंद्रावर शुक्रवारपासून तूर खरेदी सुरू होणार आहे.
यावर्षी राज्यात तुरीचे बंपर उत्पादन झाले आहे. जाहीर केल्याप्रमाणे राज्यशासनाने हमीभावात तूर खरेदी सुरू केली होती. सुरुवातीला १९ जानेवारी ते २२ एप्रिलपर्यंत पैठण येथील तूर खरेदी केंद्रात नाफेडच्या वतीने २६ हजार ६८८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर २९ एप्रिलपासून नोंदणी करण्यात आलेली ७ हजार ५१९ क्विंटल तूर राज्य शासनाकडून खरेदी करण्यात आली. फार्मर्स फूड या संस्थेकडून ३ हजार ८८४ क्विंटल, अशी एकूण ३८ हजार ३१ क्विंटल तूर पैठण येथील शासकीय तूर खरेदी केंद्रात खरेदी करण्यात आली.
मात्र, नोंदणी न करण्यात आलेली तूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याने ती खरेदी करण्यासाठी राजकीय पक्ष व संघटनानी आंदोलन केले. आंदोलनानंतर शेतकऱ्यांची शिल्लक एक लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवारी पैठण येथील उपनिबंधक कार्यालयाला तूर खरेदी करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. या आदेशानुसार ३१ मेपर्यंन्त तूर खरेदी केली जाणार असल्याची माहिती सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी दिली आहे.

फोन आल्यानंतर आणा तूर

ज्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे, त्यानी सहायक निबंधक कार्यालय येथे सातबारा उतारा, पीकपेरा, आधार कार्ड, मोबाइल नंबर, बँक खात्याच्या तपशील आदी कागदपत्राची पूर्तता करून नाव नोंदणी करावी व टोकन घेऊन जावे, असे आवाहन नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी केले आहे. नाव नोंदणी केल्यानंतर तूर खरेदी केंद्रातून फोन आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रात तूर आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.

पैठण तालुक्यामध्ये अजूनही शेतकऱ्यांकडे जवळपास १० हजार क्विंटल तूर शिल्लक आहे. ही तूर १० ते १२ दिवसांत खरेदी केली जाईल
- श्रीराम सोन्ने, सहायक निबंधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीमध्ये बनवेगिरी, पाच अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठाणे येथे नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये उतीर्ण झालेल्या दोन उमेदवारांनी बनवेगिरी केल्याचे समोर आले आहे. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेसाठी या दोघांनी चार डमी उमेदवारांचा वापर केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर ग्रामीण गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल बबनराव डोईफोडे (वय २४, रा. भालगाव ता. औरंगाबाद) याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी ठाणे येथे झालेल्या पोलिस भरतीत तेजराव बाजीराव साबळे (रा. काद्राबाद) व भारत राजेंद्र रुपेकर (रा. नानेगाव ता. पैठण) यांची निवड झाली होती. या दोघांनी परीक्षेत बनवेगिरी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या जागी झनक चैनसिंग चरांडे व वाहब नवाब शेख (दोघे रा. काद्राबाद, ता. औरंगाबाद) यांनी मैदानी चाचणी दिली. राजू भीमराव नागरे (रा. काद्राबाद) व दत्ता कडुबा नलावडे (रा. भालगाव) यांनी साबळे व रुपेकरच्या जागेवर पेपर सोडवले. डोईफोडे याला धमक्या देण्यात येत असल्याने तो आतापर्यंत शांत होता, मात्र बुधवारी त्याने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी तातडीने पथक नेमून आरोपी तेजराव साबळे, झनक चरांडे, वाहब नवाब शेख, राजू भीमराव नागरे, दत्ता नलावडे यांना अटक केली आहे. भारत रुपेकर हा पसार झाला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे, एपीआय ब्रह्मा गिरी, पीएसआय विवेक जाधव, भगतसिंग दुलत, राजेंद्र जोशी, सुनील शिराळे, धीरज जाधव, विक्रम देशमुख, बाबासाहेब नवले, राहुल पगारे, शेख झिया व तांदळे यांनी केली.

लाखोंचा व्यव्हार
मैदानी चाचणीसाठी झनक चरांडे व वहाब शेख या दोन डमी उमेदवारांना उभे केले होते. त्यासाठी त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात देण्यात येणार होते. त्यांनी मैदानी चाचणीत ९० व ९१ गुण मिळवले. त्यांनतर लेखी परिक्षेसाठी राजू नागरे व दत्ता नलावडे यांना बसवण्यात आले. यात नागरे याने तीन लाख, तर नलावडे याने एक लाख रुपये घेतले. लेखी परीक्षेत देखील ८० व ८१ गुण साबळे व रुपेकर यांना मिळाले होते.

यांत्रिक करामती
लेखी परीक्षेसाठी आरोपींनी मिनी मायक्रोफोन व सूक्ष्म ब्लुटुथचा वापर केला. परीक्षा केंद्राबाहेर थांबलेल्या आरोपींना प्रश्नपत्रीकेचा फोटो स्कॅन करून पाठवल्यानंतर त्यांनी एअरफोनद्वारे उत्तरे सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’साठी दरनिश्चितीचा प्रस्ताव ८ दिवसांत सादर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले असून, येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांसोबत वाटाघाटीने दर ठरवण्यासाठी येत्या आठ दिवसांत दरनिश्चितीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले.
समृद्धी महामार्गासंदर्भात गुरुवारी (१८ मे) जिल्हाधिकारी नव‌लकिशोर राम यांनी भूसंपादन, नगररचना, रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी आवश्यक असलेल्या जमिनीचे तत्काळ नकाशे तयार करा, शेतकऱ्यांच्या जमिनीवर असलेल्या विहिरी, तलाव, झाडे, इतर बांधकामांचे मूल्यांकन वेगाने पूर्ण करा, भूमीअभिलेख कार्यालयाकडून क्षेत्र निश्चिती करून शेतकऱ्यांची यादी आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू तातडीने पूर्ण करावे, शेतकऱ्यांकडून १५ दिवसांत हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणी घेण्यात यावी; तसेच शेतकऱ्यांची जमीन वाटाघाटीने खरेदी करावी लागणार असल्याने त्यासाठी संबंधित गटांचा रेडिरेकनर दर आणि मागील तीन वर्षांत झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदींची माहिती घेऊन दर निश्चितीचा प्रस्ताव ८ दिवसांत तयार करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले दिले. यावेळी समृद्धी महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीसाठी औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, रस्ते विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी आर. व्ही. आरगुडे, भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी; तसेच वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांचे भूसंपादन अधिकारी, तहसीलदार सतीश सोनी यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

मूल्यांकन ‌समिती स्थापन
जिल्हा मूल्यांकन समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता जलसंपदा, जिल्हा सरकारी अभियोक्ता, कार्यकारी अभियंता रस्ते विकास, निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. दर निश्चितीचा प्रस्ताव समितीसमारे सादर करून त्याला मान्यता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांशी वाटाघटीने जमीनखरेदीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सप्टेंबरपर्यंत जमिनीचा ताबा
सप्टेंबर महिन्यापर्यंत जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (११२.३१ किलोमीटर) आणि जालना (४२ किलोमीटर) या जिल्ह्यांतील पाच तालुक्यांतून महामार्ग जाणार अाहे. औरंगाबादसह औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील ६२ गावांमध्ये सुमारे ११२.२१ किलोमीटरपैकी ११० किलोमीटरवरील जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी ५९ गावांमधल १३८० हेक्टर जमीन संपादन करण्यात येणार आहे, वैजापूर व गंगापूर तालुक्यांच्या तुलनेत औरंगाबाद तालुक्यामध्ये जमीन देण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी विरोध आहे. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व महामार्गाविषयी जनजागृती केली. त्यामुळेच संपूर्ण मोजणी पूर्ण करणे शक्य झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू विक्रेत्यांना हद्दपार करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अवैध दारू विक्रीचा किमान एक गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणार आहे. या हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोन वर्षांसाठी कारागृहात पाठवण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिला आहे.
सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी पोलिस आयुक्त यादव यांचे जनता संमेलन पार पडले. यावेळी नारेगाव येथील महिलांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांच्या तक्रारी मांडल्या. यावेळी आयुक्त यादव यांनी या अवैध दारू विक्रेत्यांवर तत्काळ कारवाईचे आदेश पोलिस निरीक्षकांना दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत नारेगाव परिसरात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. शहरातील इतर भागातील अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम राबवण्यात येणार आहे का, अशी विचारणा पोलिस आयुक्त यादव यांना करण्यात आली. यावेळी शहरात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध जोरदार मोहीम राबवण्यात येणार असून अवैध दारू विक्रीचा एकजरी गुन्हा दाखल असल्यास त्या गुन्हेगाराला हद्दपार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वास्तव्य केल्यास महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचे चार्जशीट कोर्टात पाठवण्यात येणार आहे, या गुन्ह्यात दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याची माहिती आयुक्त यादव यांनी दिली.

नोटीस बजावणार
शहरात ज्या हॉटेलच्या बाहेर, गार्डनमध्ये परवाना नसताना मद्यप्राशन करण्यात येत आहे, अशा हॉटेलचालकांना महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम १४९ नुसार नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त यादव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तरीच्या किडनीचे यशस्वी पुनर्प्रत्यारोपण

$
0
0

सत्तरीच्या किडनीचे यशस्वी पुनर्प्रत्यारोपण
पाऊणशे वयोमान असूनही दात्याच्या ठणठणीत किडनीमुळेच तरुणाला दुसऱ्यांदा जीवनदान
Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet-nnirkheeMT
औरंगाबादः ब्रेनडेड दात्याचे पाऊणशे वयोमान असूनही त्याची किडनी चाळीशी-पन्नाशीतल्या व्यक्तीसारखी तरुण असू शकते, हेच पुन्हा सिद्ध झाले आहे. दात्याच्या ठणठणीत मूत्रपिंडामुळेच ३५ वर्षांच्या तरुणावर चक्क दुसऱ्यांदा मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले आणि लातूरचा तरुण पुन्हा एकदा आयुष्यात उभा राहिला. ७४ वर्षीय ब्रेनडेड दात्याचे किडनीदान व त्याचे तरुणावर पुनर्प्रत्यारोपण या दोन्ही बाबी शहरात पहिल्यांदाच घडल्या, हे विशेष.
कामानिमित्त शहरात आलेला जिंतूर येथील ७४ वर्षीय विधिज्ञ मेंदुत रक्तस्त्राव होऊन औरंगाबादेत ब्रेनडेड झाला. दात्याच्या नातेवाईकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांची तपासणी केली असता, दोन्ही मूत्रपिंड ९५ टक्के सुदृढ असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दात्याचा रक्तगट जुळणाऱ्या व मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा (रेसिपिएंट) शोध सुरू झाला आणि हाडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील ३५ वर्षीय ग्रामपंचायत सदस्य असलेल्या रुग्णाचा रक्तगट जुळल्यानंतर प्रत्यारोपणाची तयारी सुरू झाली. अर्थात, या रुग्णाची केस वेगळी व वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मकही होती. या ३५ वर्षीय तरुण रुग्णाचे दोन्ही मूत्रपिंड यापूर्वी २००९ मध्ये पूर्णपणे निकामी झाले होते व त्याच्या आईनेच त्याला किडनीदान दिले होते. त्यानंतर पुन्हा ९ वर्षांनी म्हणजेच २०१७ मध्ये त्याच्या आईने दिलेली किडनी औषधे बंद केल्यामुळे निकामी झाली व मागच्या तीन-चार महिन्यांपासून हा तरुण डायलिसिसवर होता. या वेळी मात्र त्याला किडनी देण्यासाठी कोणीही नव्हते. वडील ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, पत्नीची किडनी जुळत नव्हते व भाऊ विचारत नव्हते. परिणामी, त्याचे डायलिसिसवर दिवस काढणे सुरू होते. पत्नीसह दोन मुलींची जबाबदारी होतीच व अशा चिंताक्रांत अवस्थेत ७४ वर्षीय ब्रेनडेड दात्याचे किडनीदान जीवनदानाची संधी घेऊन आले. एवढ्या जास्त वयाच्या दात्याची किडनी घ्यावी का, ही शंका आली; पण वैद्यकीयदृष्ट्या दात्याची किडनी ठणठणीत असल्याचे लक्षात येताच तरुणाने होकार दिला. अर्थात, छोटे दुकान व काही एकर शेतीमुळे पैशांची तजवीज करणे शक्य नव्हते. मात्र मित्र धावून आले व मित्रांनीच चार लाख रुपये उभे केले आणि प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया माणिक हॉस्पिटलमध्ये पार पडली. दुसऱ्यांना प्रत्यारोपण असल्यामुळे शस्त्रक्रिया क्लिष्ट व खर्चिक होती; पण मूत्रपिंडविकारज्ज्ञ व ‘माणिक’चे मुख्य संचालक डॉ. उल्हास कोंडपल्ले, ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर, मूत्ररोग शल्यचिकित्सक डॉ. शरद सोमाणी, शल्यचिकित्सक डॉ. भास्कर मुसांडे, भूलतज्ज्ञ डॉ. बालाजी आसेगावकर आदींच्या टीमने प्रत्यारोपण यशस्वी केले. उत्तम प्रकृतीमुळे प्रत्यारोपणानंतर त्याला नुकतीच सुटी देण्यात आली.
नकारामुळे दुसरी किडनी म्युझियममध्ये
संबंधित ज्येष्ठ दात्याची दुसरी किडनीही सुदृढ होती व त्याचेही प्रत्यारोपण आणखी एका रुग्णावर होणार होते. मात्र रुग्णाने ऐनवेळी नकार दिल्यामुळे ते प्रत्यारोपण होऊ शकले नाही. त्याचवेळी इतरही रुग्णांना ती जुळली नाही व काहींनी वयामुळे शंका घेत नाकारली. शेवटी दात्याची दुसरी किडनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) म्युझियमकडे सुपूर्द करण्यात आली व आणखी एक जीवनदान मिळता-मिळता राहून गेले.
वयानुसार अवयवांचेही ‘एजिंग’ नक्कीच होते. मात्र एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचेही अवयव चांगल्या स्थितीत असू शकतात व डायलिसिसपेक्षा चांगल्या अवयवांचे प्रत्यारोपण कधीही उत्तम रिझल्ट देणारे असते. त्यामुळे ज्येष्ठाची किडनीही तरुण असू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे.
– डॉ. सुहास बावीकर, ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणने पकडल्या २,०६४ वीज चोऱ्या

$
0
0

महावितरणने पकडल्या २,०६४ वीज चोऱ्या

एक कोटी ५६ लाख वसूल, ३०९ जणांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद ः

महावितरणने औरंगाबाद शहरात गेल्या वर्षभरात २०६४ वीज चोऱ्या पकडून एक कोटी ५६ लाख ८४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याच काळात ३०९ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

महावितरणने औरंगाबाद शहरात एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली. यात औरंगाबाद शहर विभाग एकमधील पॉवर हाऊस, शहागंज, वाळूज, छावणी उपविभाग अंतर्गत तपासणी मोहिमेत ३,६६६ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७४५ वीज ग्राहकांच्या एक कोटी रुपयांच्या वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. त्यांच्याकडून ६४ लाख ७३ हजार रुपये दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला. तर १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

यात औरंगाबाद शहर विभाग दोनमधील चिकलठाणा, गारखेडा, क्रांतिचौक व सिडको उपविभाग अंतर्गत वीज मीटर तपासणी मोहिमेत ४,८४४ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३१९ वीज ग्राहकांच्या दोन कोटी ५५ लाख दोन हजार रुपयांच्या वीज चोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ९२ लाख ११ हजार रुपये दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला. तर २९४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिक्रत विजेचा वापर करणे, तसेच कलम १३५ अंतर्गत वीज मीटरमध्ये छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे इत्यादी बाबीचा समावेश होतो.

अधिकृत वीज जोडणी घ्या
महावितरणकडून वीज चोऱ्या पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार असून ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी वीज मीटरमध्ये छेडछाड करू नये, आकडे टाकून विजेचा वापर करू नये, अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवगिरी’च्या जमीन लिलावास मनाई

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
औरंगाबाद शहरालगत सांवगी येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची १५६ एकर जमीन आहे. या कारखान्यावर बँक ऑफ बडोदा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मोठ्या प्रमाणांवर कर्ज आहे. त्यामुळे कारखान्याच्या मालकीची जमीन विक्री करण्याचे आदेश कर्ज वसुली प्राधिकरणाने दिले होते. या जमीन विक्रीचा लिलाव अंतिम करण्यास औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे.
प्राधिकरणाच्या आदेशानुसार जमीन विक्रीसाठी २१ एप्रिल रोजी लिलावाची नोटीस देण्यात आली होती. लिलाव २७ मे रोजी ठेवण्यात आला आहे. या लिलाव प्रक्रियेस पिसादेवीचे नारायण अपिचंद काळे यांनी आव्हान दिले. प्राधिकरणाने याच जमीनीची खाजगी वाटाघाटीने विक्री केली होती. मात्र ही विक्री खंडपीठाने २९ नोव्हेंबर २०११ रोजी रद्द केली होती. खंडपीठाने यापुढे कारखान्याची जमीन विक्री करावयाची झाल्यास साखर आयुक्तांच्या देखरेखीखाली ऋण वसुली अधिकाऱ्यांनी विक्री करावी असे निर्देश दिले होते. खंडपीठाच्या निर्देशाप्रमाणे २०१२ मध्ये जमीन विक्रीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी जमीन विक्रीची किमान किंमत ६५ कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र जमीन विक्री होऊ शकली नाही. त्यानंतर पाच वर्ष या जमिनीची विक्री करण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
शासनाचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग कारखान्याच्या जमिनीतून प्रस्तावित आहे. या कारखान्याची जमीन झालर विकास क्षेत्रास समाविष्ट करण्यात आलेली आहे. ही जमीन औरंगाबाद शहरालगत आहे. या जमिनीच्या आसपास मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालय व रहिवासी विकास झालेला आहे. याचिकेत महाराष्ट्र शासन, साखर आयुक्त, कर्ज वसुली प्राधिकरण, बँक ऑफ बडोदा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. खंडपीठाने लिलावाची प्रक्रिया अंतिम करण्यास मनाई केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे देवदत्त पालोदकर यांनी बाजू मांडली. शासनातर्फे व्ही. एम. कागणे, देवगिरी काराखान्यातर्फे कमलाकर सूर्यवंशी हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी १५ जूनला होणार आहे.

नव्याने लिलाव प्रक्रिया घ्या

या परिस्थितीत ऋण वसुली अधिकाऱ्यांनी २०१२ पेक्षा अधिक किमान किंमत निश्चित करून साखर आयुक्तांच्या देखरेखीखाली लिलाव प्रक्रिया राबविणे आवश्यक असतानाही त्यांनी परस्पर जमिनीचा लिलाव घोषित केला. या जमिनीची किंमत ३४ कोटी निश्चित केली आहे. लिलाव झाल्यास कारखान्याचे कर्ज, कर्मचारी व शेतकऱ्यांचे देणे फिटणार नाही. खंडपीठाच्या निर्देशाप्रमाणे साखर आयुक्तांच्या देखरेखीखाली नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला आयोगाकडून ‘स्युमोटो’दखल

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
१५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या भावंडाचा शोध घेत असलेल्या तरुणाच्या व्यथेची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. शिशूसदनचे रेकॉर्ड सापडत नसल्याचे उघड झाल्याने राज्य महिला आयोगाने हे प्रकरण स्युमोटे करून दाखल करून घेणार आहे.
पद्मपुऱ्यातील शिशूसदन येथील बहीण व भावाच्या शोधासाठी अमोल मगर हा तरूण जंगजंग पछाडत आहे. त्यासाठी त्याने अखेर बुधवारी वेदांतनगर पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. तत्पूर्वी मगर यांने सोमवारी जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केला. त्याची बहीण निकिता व भाऊ अनिकेत असलेले शिशूसदन २००२ मध्ये बंद झाले. त्यानंतर २००४ पर्यंत अमोल भावंडांच्या संपर्कात होता. पण, त्यानंतर त्यांची माहिती मिळत नाही. अमोलने त्यांचा पुणे, यवतमाळ, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड येथेही शोध घेतला आहे.
अमोलच्या भावंडाचे रेकॉर्ड सापड नाही, असे महिला व बाल विकास विभागाचे म्हणणे आहे. शिवाय शंभर मुलांचे रेकॉर्ड सापडत नाही, असे विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रश्नाची व्यापी शंभर मुलांची झाली आहे. परिणामी, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
शिशूसदन बंद झाल्यानंतर येथील सर्व मुलांना भारतीय समाज सेवा केंद्र, विद्यादीप संस्था, पैठण अशा शहरापासून जवळच्याच संस्थांमध्येच पाठवण्यात आले होते, अशी माहिती मिळत आहे. पण, या सर्व मुलांचे रेकॉर्ड जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे असायला हवे. ही मुले शहरातच होती, तर अमोलला चुकीची माहिती देत दिशाभूल करण्यात आली होती का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विभागाचीच जबाबदारी
जाणकारांच्या मते शिशूसदन जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत चालवले जात होते. त्यामुळे तेथील रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी या विभागाची आहे. वेदांतनगर पोलिसांकडून मगरेच्या भावंडांचा तपास केला जात आहे, आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत, अमोलला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

अमोलची बातमी वाचून संस्थेचे सर्व रेकॉर्ड स्वतःहून तपासले. आमच्या संस्थेत त्या भावंडांचे रेकॉर्ड नाही. मुलांचे सर्व रेकॉर्ड प्रत्येक संस्था जिल्हा महिला व बाल विकास विभागाला सोपवते. भविष्यात या घटना घडू शकतात. तेव्हा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याबाबत धोरण असणे गरजेचे आहे.
वसुधा जातेगावकर, संचालिका, भारतीय समाज सेवा केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड महिन्यात आठ लाखांचे उत्पन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत दरेगाव येथील तुकाराम गायकवाड व योगिता गायकवाड आणि नामदेव गायकवाड व अश्विनी गायकवाड या पदवीधर दापत्यांनी निराश झालेल्या शेतकऱ्यांना मार्ग दाखवला आहे. त्यांनी नियंत्रित पद्धतीने शेती करून २० गुंठ्यात काकडीचे उत्पादन घेऊन दीड महिन्यात आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
गायकवाड दाम्पत्याला पदवी घेतल्यानंतर नोकरीची संधी होती, पण ते घरातील पारंपरिक शेतीत रमले. या दोन दाम्पत्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करणअयाचा निर्धार केला. राहुरी कृषी विद्यापीठात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रशिक्षण घेतले. शेतात दोन शेततळे तयार करून पावसाळ्यातील पाणी साठविले. दोन राउंड शेप शेडनेट उभारून २० गुंठ्यात काकडीचे, तर १० गुंठ्यात कारले पिकाचे उत्पादन घेण्याचे ठरविले. चांगली नांगरणी, सेंद्रीय खत घातले. त्यानंतर एप्रिलमध्ये रमजान काकडीचे बियाणे लावले. सात बाय सात अंतराचे वाफे तयार करून तीन बाय चार अंतरावर काकडीचे बियाणे लावण्यात आले. पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी फॉगर व ठिबक सिंचनाचा उपयोग केला. नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात काकडीची शेती फुलली. वेलीला जागोजागी काकड्याही लागल्यात.
राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, मंडळ कृषी अधिकारी विशाल आगलावे, कृषी पर्यवेक्षक विजय निकम, कृषी सहायक प्रिया देशमुख यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे गायकवाड दाम्पत्याने सांगितले.

३० टन उत्पन्न अपेक्षित

सद्यस्थितीत काकडीचे पीक दीड महिन्यांचे झाले असून ऑगस्टपर्यंत ३० टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या दोन महिन्यातच आठ लाखांच्या काकडीचे उत्पादन झाले. दर तिसऱ्या दिवशी सरासरी १० ते १५ क्विंटल काकडीची तोड केली जात आहे. ही काकडी औरंगाबादच्या बाजारपेठेत जात असून प्रति क्विंटल १४५० रुपये प्रमाणे भाव मिळत आहे.

ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा

वीजपुरवठा खंडीत झाल्यावर काकडीला पाणी देण्यासाठी ट्रॅक्टरवर डायनामा बसून त्याद्वारे पाणी देण्यात येत आहे. दरेगाव येथीलच सोमीनाथ गायकवाड यांनीही १० गुंठ्यात शेडनेटमध्ये काकडी लागवड करून नऊ टन काकडी उत्पादन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’च्या कामांना गती देण्याचे निर्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाच्या महत्वाकांक्षी अशा मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या कामांना पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी गती द्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवड्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा, जलसंधारण आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. गेल्या दीड महिन्यात मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्यावे, २०१५-१६ व २०१६-१७ मधील जलयुक्त शिवार अभियानातील उर्वरित कामे त्वरीत पूर्ण करावी, २०१७-१८ साठी निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे पावसाळ्यापूर्वी तयार करून कामे पूर्ण होतील याकरीता प्राधान्य द्यावे, असे डॉ. भापकर यांनी सांगितले.
जलयुक्‍त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांबरोबरच मराठवाडा विभागात चला गावाकडे जाऊ, विकासाचा ध्यास घेऊ या अभिनव उपक्रमातही सर्वांनी सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा वर्षांच्या मुलीवर पोलिसाचा बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून खुलताबाद पोलिस ठाण्यातील ४५ वर्षांच्या हेडकॉन्स्टेबलला गुरुवारी अटक करण्यात आली. सुधाकर कोळी (रा. खुलताबाद), असे त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई सुधाकर कोळी हा पीडित मुलीच्या घरी बुधवारी रात्री गेला होता. त्याने तिच्या वडिलांना राष्ट्रीय महामार्गावर जाऊऩ मुख्य रस्त्यावर जाऊन विशिष्ट नंबरची वाहनावर लक्ष ठेव व मला सांग, असे फर्मावले. या बहाण्याने तिच्या वडिलांना घराबाहेर पाठवल्यानंतर कोळी याने पीडितेला घराबाहेर नेले व धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी आठवीची विद्यार्थीनी आहे. दरम्यान, दोन तास विशिष्ट नंबरच्या वाहनाची वाट पाहून घरी परतलेल्या वडिलांना पीडित मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. यामुळे मुलीच्या वडिलांना धक्का बसला. त्यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात धाव घेऊन कोळी विरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल कोळी याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या मुलीची औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली.

पोलिस निलंबित
हेडकॉन्स्टेबल सुधाकर कोळी याला निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. हा खटाल फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समिती सभापतींची निवड ३ जूनला

$
0
0

विषय समिती सभापतींची निवड ३ जूनला
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थायी समिती सभापतींसह पाचही विषय समित्यांच्या सभापतीपदांची निवड ३ जून रोजी होणार आहे. गुरुवारी नगरसचिव विभागातर्फे सहा सभापती आणि एक उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक वेळापत्रकानुसार १ जून रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत नामनिर्देशितपत्रे वितरित केली जातील. त्यानंतर २ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशितपत्रे वितरित केली जातील. ३ जून रोजी निवडणूक सुरू होताच त्या समितीच्या सभापतींच्या निवडीच्या वेळेआधी पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे नामनिर्देशन पत्रांची छाननी करतील. सकाळी १० वाजता स्थायी समिती सभापतींची निवडणूक होईल. त्यानंतर ११ वाजता महिला व बाल कल्याण समितीचे सभापती व उपसभापती, ११.४५ वाजता आरोग्य समिती सभापती, १२.१५ वाजता शहर सुधार समिती सभापती, १२.४५ वाजता शिक्षण समिती सभापती, दुपारी १.४५ वाजता समाजकल्याण समिती सभापतींची निवडणूक होणार आहे. स्थायी समितीचे १६ तर बाकी सर्व समित्यांचे प्रत्येकी ९ सदस्य आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकोरिया यांची महावितरण प्रादेशिक संचालक पदावर नियुक्ती

$
0
0

बकोरिया यांची महावितरण प्रादेशिक संचालक पदावर नियुक्ती

सोमवारी पदभार स्विकारणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

महानगरपालिकेचे माजी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची महावितरणच्या प्रादेशिक संचालक पदावर नियुक्ती झाली आहे. प्रसाद रेशमे यांची बदली झाल्याने त्या जागी बकोरिया येणार आहेत. ते गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील जिल्हे आणि खान्देशचा काही भाग जोडण्यात आला आहे. प्रादेशिक कार्यालयाची स्‍थापना केल्यानंतर प्रभारी पदावर औरंगाबाद महावितरण कार्यालयाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. सुरेश गणेशकर यांच्यानंतर हा कारभार पुण्याचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्याकडे देण्यात आला होता.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत औरंगाबाद प्रादेशिक संचालक पदाचा कारभार सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्याकडे देण्यात आला होता. औरंगाबाद शहरात राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या कार्यक्रमात सुनील केंद्रेकर दोन दिवसांत औरंगाबादला रूजू होतील, अशी घोषणा उर्जामंत्र्यानी केली होती. मात्र, काही दिवसानंतर सुनील केंद्रेकर यांची बदली राज्याच्या कृषी आयुक्त पदावर झाल्याचे वृत्त आले. यामुळे हे पद रिक्त राहिले. या पदावर नागपूर येथील प्रसाद रेशमे यांची बदली झाल्याची माहिती तीन दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयात देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी अचानक ओमप्रकाश बकोरिया यांची या पदावर नियुक्ती झाल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले. यामुळे महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदाचा घोळ बकोरिया यांच्या आगमनानंतर संपेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

महावितरण कार्यालयाच्या प्रादेशिक संचालक पदावर बदली झाल्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. सोमवारपर्यंत औरंगाबादला रूजू होणार आहे.
ओमप्रकाश बकोरिया
नियोजित, औरंगाबाद प्रादेशिक संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४१९ शेतकऱ्यांना भूखंडांचे वाटप

$
0
0

४१९ शेतकऱ्यांना भूखंडांचे वाटप
dhananjay.kulkarni@timesgroup.com

@dhananjaykMT

औरंगाबाद - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध कामांमध्ये महामंडळाने संपादित केलेल्या जमीन मालकांना १०० चौरसमीटर जमीन देणे हे काम मोठे होते. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये महामंडळाने संपादित केलल्या जमीन मलकांना नियमाप्रमाणे भूखंड दिला आहे. आजमितीस सुमारे ४१९ भूपीडितांना भूखंडांचे वाटप करण्यात येऊन भूखंडांचे प्रा‌थ‌मिक करारनामे सुद्धा करून देण्यात आलेले आहेत.

याअंतर्गत ४१९०० स्क्वेअर फूट जागांचे वाटप करण्यात आले आहे. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील भूपीडितांना ‘पीएपी’ सदाराखाली भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. याच अंतर्गत जालना फेज २ मधील ९ पीएपी भूखंडांचे वाटप करण्यात आले आहेत. भूखंडांचे वाटप करताना औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकूण २२ औद्योगिक क्षेत्र येतात. या औद्योगिक क्षेत्रात गेल्या दोन वर्षांमध्ये एकूण १२२ भूखंडांचे वाटप करण्यात आलेले असून त्यापोटी ३५.०५ कोटी इतका निधी महामंडळास प्राप्त झालेला आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात पुनर्बांधणी

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील निवासी भूखंडांच्या (सोसायटी- सभासद) एकत्रित असलेल्या नस्ती वेगळ्या करून त्या नस्तीची पुनबार्धंणी केली आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण ७९५ निवासी भूखंडांच्या नस्ती जतन करण्यात आलेल्या आहेत. सदर एका भूखंडामध्ये सरासरी २० सभासदांची घरे आहेत. त्यानुसार प्रत्येक सभासदांच्या घर क्रमांकानुसार आजमितीस २५०नस्ती वेगवेगळ्या करून पुनर्बांधणीचे काम करण्यात आलेले आहेत.
एलएमएस प्रणाली लागू
महामंडळाने प्रादेशिक कार्यालयातील भूखंड वाटपाचे रेकॉड चांगल्याप्रकारे ठेवता यावे याकरिता एलएमएस (लँड मॅनेजमेंट सिस्टिम) ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रणालीमध्ये नस्तींची नोंद घेतल्याबाबत आढावा घेतला असता यात भूखंडांच्या नस्तीचे ४० ते ४५ टक्के इतक्याच भूखंडांची नोंद झाली होती, पण एलएमएस लागू करण्यात आलेल्या नोंदी वाढल्या. या नव्या प्रणालीमध्ये ८० ते ८५ टक्के डाटा पूर्ण भरण्यात आला आहे. सद्यस्थितीतही प्राप्त होत असलेल्या प्रत्येक प्रस्तावाची एलएमएस प्रणालीमध्ये नोंद घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येत नाही.

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे संपादन झाल्यानंतर १०० चौरस मीटर भूखंडांचे वाटप करून ४१९ भूपीडितांना दिलासा मिळाला आहे. प्राथमिक करारनामे सुद्धा कार्यान्वित करून देण्यात आलेले आहेत.
- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमएसबीटीई’कडून विद्यापीठ धडे घेणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभागाच्या चुकीमुळेच अभियांत्रिकीतील गैरप्रकारांना पाठबळ मिळाल्याचे समोर येत आहे. दहावी, बारावी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील परीक्षांच्या उत्तरपत्रिका त्याच दिवशी ताब्यात घेतल्या जातात, परंतु विद्यापीठ दोन-दोन दिवस उत्तरपित्रकांचे गठ्ठेच कॉलेजमध्येच ठेवते. साई अभियांत्रिकीतील रॅकेट उघटकीस आल्यानंतर गुरुवारी विद्यापीठाला जाग आली.
साई अभियांत्रिकी कॉलेजच्या (चौका) उत्तरपत्रिका फेरलेखन रॅकेट उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षांचा गोंधळ पुन्हा समोर आला. अशा गैरप्रकार होण्यास विद्यापीठ परीक्षा विभाग प्रशासनाचेही दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते आहे. विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यासंबंधी विद्यापीठाच्या परीक्षा केंद्र मार्गदर्शिकेत ११ सूचनांकडे साफ दुर्लक्ष केले जाते. विशेषतः परीक्षा झाल्यानंतर त्याचदिवशी उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्रावर जमा करण्याचे स्पष्ट असताना, विद्यापीठ दोन-दोन दिवस उत्तरपित्रका कॉलेजांकडे ठेवते. त्याचाच फायदा घेतल्याचे समोर येते आहे. त्यामुळे कॉलेजांना अशी सूट देण्यामागचे काय कारण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फेरलेखन रॅकेट उघड झाल्यानंतर गुरुवारच्या पेपरच्या उत्तरपत्रिका आज त्याच दिवशी विद्यापीठात आणल्या गेल्या. उशिरा जाग आलेल्या प्रशासन अशी काळजी किती दिवस घेते हा प्रश्न आहे.

कोऱ्या उत्तरपत्रिकांचा हिशेब नाही
सोडविलेल्या उत्तरपित्रका दोन-दोन दिवस कॉलेजांकडे रहातात. त्यासह कॉलेजांना दिलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचाही हिशेब परीक्षा विभागाकडे नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कॉलेजांना परीक्षार्थी संख्येनिहाय प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. उत्तरपत्रिकाही पाठविल्या जातात. त्यात अधिकच्या उत्तरपित्रकाही कॉलेजला दिल्याजातात, परंतु त्याचा हिशेब घेतला जात नसल्याची चर्चा आहे.

विद्यापीठाला का शक्य नाही?
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेत उत्तरपित्रका त्याच दिवशी कस्टडीमध्ये पोचतात. पोलिस बंदोबस्तात या उत्तरपत्रिका असतात, तर राज्य तंत्रशिक्षण मंडळतर्फे (एमएसबीटीई) घेण्यात येणाऱ्या पॉलिटेक्निकच्या परीक्षेतही यंत्रणा अतिशय सक्षम आहे. परीक्षेच्या त्याच दिवशी उत्तरपित्रका वितरण केंद्रावर पोचविण्याची काळजी घेतली जाते. त्याचवेळी विद्यापीठ मात्र दोन-दोन दिवस उत्तरपत्रिका कॉलेजांमध्येच ठेवते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ परीक्षा विभाग पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंजिनीअरिंग पेपर घोटाळा प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभाग; तसेच इतर काही कॉलेज पोलिसांच्या रडारवर आहेत. त्या दृष्टीने देखील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.
चौका येथील साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाच्या २६ विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्री सुरेवाडी येथील नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात बिल्डिंग कंन्सट्रक्शन अँड ड्रॉइंगचा पेपर सोडवताना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या प‌थकाने ही कारवाई यशस्वी केली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस आयुक्त यादव यांनी घेतली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकारी देखील चौकशी भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. पर्यवेक्षक कॉलेजला भेट देत असतील, मात्र परीक्षेचे पेपर सोबत नेत नसतील, तर त्याची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काही कॉलेजांवरही लक्ष
साई इंजिनीअरिंग कॉलेजप्रमाणे शहरातील इतर काही इंजिनीअरिंग कॉलेजांमध्येही असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली असून, हे कॉलेज देखील रडारवर असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्त बीड बायपास वाहतुकीसाठी चोवीस तास खुला

$
0
0

अपघातग्रस्त बीड बायपास वाहतुकीसाठी चोवीस तास खुला

सतरा वर्षात घेतले ७७ बळी

अपघात टाळण्यासाठी केल्या विविध ‌उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जात असलेल्या बीड बायपासवरील अवजड वाहनांची बंदी रद्द करण्यात आली आहे. २४ तास या रोडवरून आता अवजड वाहनांना जाता येणार आहे. वेगवेगळ्या कारणांचे समर्थन करीत हा मार्ग पोलिसांनी सुरू केला आहे. वाहतूक शाखेने अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून वाहनधारकांना देखील दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

शहरातून अवजड वाहनांची वाहतूक टाळण्यासाठी बीड बायपासची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बीड बायपासच्या दोन्ही बाजूला नागरी वसाहती वाढल्या आहेत. १७ वर्षांत या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीने तब्बल ७७ बळी गेले आहेत. याआधीचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सकाळी सात ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत यांनी बंदी घातली होती. नूतन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी देखील या संदर्भात सात दिवसाची बंदीची अधिसूचना काढली होती. या मार्गाला पर्यायी मार्ग देण्यात आला होता. तसेच आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या होत्या. हे आक्षेप प्राप्त झाल्यानंतर त्याचा विचार करून बीड बायपासवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीची बंदी तुर्तास रद्द करण्यात आली आहे.

या कारणासाठी रद्द करण्यात आली वाहतूक बंदी

- या मार्गावर वखार महामंडळाचे दररोज १७० ट्रक धावतात. रेल्वे मालधक्का येथून अन्नधान्य घेऊन ट्रक याच मार्गाने जातात. बंदीमुळे या अत्यावश्यक सेवेला अडचण झाली होती.

- बीड बायपासला पर्यायी रस्ता पैठण-पाचोड, फुलंब्री दिला होता. हा मार्ग लांब असल्याने वेळ व इंधनाचा खर्च जास्त होत होता. त्यामुळे वाहनचालक हा मार्ग टाळत होते. बंदीच्या काळात वाहने रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती.

- नागरी वसाहतीमध्ये देखील वाहतूक बंदीच्या काळात अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.

- जड वाहनांची गर्दी एकाच वेळी होत असल्याने अँबुलन्स सेवेला देखील याचा फटका बसत होता.

- मालवाहू जड वाहनांमध्ये नाशवंत माल, अन्नधान्य, औषधी अत्यावश्यक माल हा मुंबई, पुणे व विदर्भात मराठवाड्यात या मार्गावरून पाठवण्यात येतो. बंदीमुळे उशीर होत असल्याने या मालाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होत्या.

- वाहतूक बंदीचा कालावधी संपल्यानंतर अवजड वाहने, तीन चाकी वाहने व दुचाकी वाहने एकाच वेळी रस्त्यावर येत होती. यामुळे चौकात रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला होता.

- शहराच्या आसपास इंडस्ट्रीयल कॉरीडोरचे काम वेगाने सुरू आहे. शेंद्रा व वाळूज एमआयडीसीमधील औद्योगिक प्रकल्पातील युनिटची आपसातील वाहतूक, कच्च्या मालाच्या वाहतुकीवर या बंदीमुळे परिणाम होऊन समस्या निर्माण होत होत्या.

...

वाहतूक शाखेने अपघात टाळण्यासाठी क‌ेलेल्या उपाययोजना

- रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण मनपाच्या वतीने काढण्यात आले.

- वेग मर्यादा ठेवण्यासाठी स्पीड गन बसवण्यात आले. या गनच्या माध्यमातून वेग मर्यादेचे उल्लंघन करण्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत सत्तर हजार रुपये दंड वसूल

- बीड बायपासवर नियमानासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले. यामध्ये स्वतंत्र वाहनासह एक अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

- बीड बायपासला येऊन मिळणाऱ्या अॅप्रोच रोडवर गतिरोधक टाकण्यात आले आहेत.

- बीड बायपासवर आता वाहनांची वेग मर्यादा प्रतितास चाळीस किलोमीटर ठेवण्यात आली आहे. तसे फलक देखील लावण्यात आले आहेत.

...

नागरिक, वाहनचालकांनी घ्यावी दक्षता

- सिग्नलचे काटेकोरपणे पालन करावे

- सर्व प्रकारच्या वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा

- वाहन चालकांनी मद्यपान करून वाहने चालवू नये

- ट्रक चालकांनी एकाच लेनमध्ये वाहने चालवावी

- वाहनचालकांनी ओव्हरटेक करू नये

- दुचाकीस्वारांनी आपले वाहन काळजीपूर्वक चालवावे, जड वाहनांच्या लेनमध्ये येऊ नये

- बीड बायपासवर दुभाजकालगतची लेन जड वाहतुकीसाठी, मधली लेन मध्यम, जड, हलके वाहन, कार, जीपसाठी तर ‌शेवटची लेन रिक्षा, दुचाकीस्वारांसाठी आहे. याचे पालन करावे

- सर्व कारचालकांनी व समोरील प्रवाशाने सीट बेल्टचा वापर करावा

- दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा

...

पंधरा वर्षात या रोडने घेतले ७७ बळी

गेल्या १५ वर्षांत या रोडवर विविध अपघात ७७ बळी गेले आहेत. त्याचे वर्ष व आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

वर्ष मृत्यू

२००३ - १

२००४ - ५,

२००५ - ३,

२००६ - ५

२००७ - ५

२००८ - ७

२००९ - ४

२०१० - २

२०११ - ५

२०१२ - ६

२०१३ - १०

२०१४ - ६

२०१५ - ६

२०१६ - ७

२०१७ - ५ मे महिन्यापर्यंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगभूमीवरील सशक्त अभिनेत्रीची ‘एक्झिट’

$
0
0

रंगभूमीवरील सशक्त अभिनेत्रीची ‘एक्झिट’
रिमा यांच्या आठवणींना उजाळा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सहजाभिनयाने हिंदी-मराठी रूपेरी पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी निधन झाले. रिमा यांचे अकस्मात जाणे कला क्षेत्रासाठी धक्कादायक ठरले. औरंगाबाद शहरातील रंगकर्मींशी रिमा यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. ‘बिनधास्त’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रिमा अनेक दिवस शहरात होत्या. अशा अनेक आठवणींना कलाकारांनी उजाळा दिला.
चित्रपटातील आईच्या सोशिक भूमिकेची चौकट बदलून त्याला करारीपणाची जोड देण्याचे काम रिमा लागू यांनी केले. ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपटातून त्यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. ‘नणंद भावजय’, ‘अंतरपाट’ या चित्रपटातील भूमिकांनी त्यांनी लक्ष वेधले. मात्र, नायिका म्हणून जम बसवताना त्यांनी नाटकांतून काम करणे सुरू केले. रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिकांतून त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटातील आई साकारल्यानंतर रिमा यांना अधिक ग्लॅमर लाभले. ‘मैंने प्यार किया’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’ चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. ‘घराबाहेर’, ‘बिनधास्त’, ‘सैल’, ‘आपली माणसं’, ‘जन्म’, ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ अशा अनेक मराठी चित्रपटातील रिमा यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या. वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. या चतुरस्त्र अभिनेत्रीचे अचानक जाणे सर्वांसाठी धक्कादायक ठरले.
‘बिनधास्त’ साकारला
मच्छिंद्र चाटे निर्मित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘बिनधास्त’ चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण औरंगाबाद शहरात पार पडले होते. या चित्रपटानिमित्त रिमा लागू शहरात होत्या. तसेच वेगवेगळ्या नाटकांच्या प्रयोगासाठी त्या शहरात येत असत. इथल्या रंगकर्मींशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. उत्तम अभिनेत्रीच्या अचानक निधनाने रंगकर्मी शोकमग्न झाले आहेत.

रिमा लागू मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेत्री होती. विजया मेहता यांच्या ‘रंगायन’ संस्थेचा प्रभाव असलेल्या अभिनेत्रीत रिमा आघाडीवर होत्या. ‘पुरूष’ नाटकानंतर त्या अधिक प्रकाशझोतात आल्या. अलीकडचे ‘के दिल अभी भरा नही’ नाटकसुद्धा उल्लेखनीय होते. हिंदी पडद्यावरील ग्लॅमरस आई असलेल्या रिमा महत्त्वाच्या अभिनेत्री होत्या.
- डॉ. दिलीप घारे, रंगकर्मी

‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ या चित्रपटात रिमाताईंसोबत काम करण्याची संधी मिळाली. निगर्वी आणि मनमिळावू स्वभावाची ही अभिनेत्री होती. लहान-मोठ्या कलाकारांशी, सहकाऱ्यांशी प्रेमाने वागण्याची त्यांची हातोटी लक्षणीय होती. या दमदार अभिनेत्रीचे अचानक जाणे धक्कादायक आहे.
- राजकुमार तांगडे, रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील अनियमितता, गैरसोयींविरुद्ध आंदोलन

$
0
0

घाटीतील अनियमितता, गैरसोयींविरुद्ध आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपुऱ्या सोयी-सुविधा तसेच अनियमिततेच्या विरोधात पीपल्स व्हॉईस संघटनेच्या वतीने गुरुवारी (१८ मे) घाटी परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात अधिष्ठातांना दिलेल्या निवेदनात, कॅन्सर हॉस्पिटलमधील सुपरस्पेशालिस्ट तज्ज्ञांचा तसेच निवासी डॉक्टरांचा अभाव, तसेच विविध विभागांमध्ये अद्ययावत सेवा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे म्हटले आहे. हृदयरोगचिकित्साशास्त्र, उरोशल्यचिकित्साशास्त्र, मज्जातंतू शल्यचिकित्साशास्त्र, नवजात शिशूशास्त्र विभाग हे विभाग केवळ नावालाच असल्याचा आरोपही संघटनेतर्फे करण्यात आला असून, रुग्णांना सेवा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेमार्फत देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात संघटनेचे रवी गायकवाड, संग्राम मौर्य, पंकज कांबळे, सुनिल वाकेकर, आनंद भुताळे, काकासाहेब शेजूळ, रवी वाव्हाळे, कुणाल गायकवाड आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images