Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विमानतळाच्या प्रवेशद्वारावर साकारणार ऐतिहासिक नगरी

$
0
0

विमानतळाच्या प्रवेशद्वारावर साकारणार ऐतिहासिक नगरी

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव, ४९ लाखांची तरतूद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

विमानतळाच्या प्रवेशद्वारावर ऐतिहासिक औरंगाबाद नगरी साकारली जाणार आहे. देश - विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक वास्तू व वारसास्थळांची ‘ अॅट अ ग्लान्स ’ माहिती मिळावी या उद्देशाने महत्वाच्या स्थळांच्या प्रतिकृती या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने ४९ लाख ९८ हजार ६२३ रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे.

ऐतिहासिक औरंगाबाद शहराला शासनाने पर्यटनाच्या राजधानीचा दर्जा दिला आहे. विविध ऐतिहासिक दरवाजांसह अजिंठा - वेरूळच्या लेण्या, पानचक्की, बीबी का मकबरा, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय अशा विविध वास्तू पर्यटकांना साद घालतात. या वास्तू पाहण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांना या वास्तूंची एकत्रित माहिती मिळावी या उद्देशाने विमानतळाच्या समोर भिंतीलगत विविध वारसा स्थळे व वास्तूंची प्रतिकृती तयार करून लावण्याचा हा प्रस्ताव आहे. डी.पी. डिझाईन या संस्थेचे प्रदीप देशपांडे यांनी प्रतिकृतींचे डिझाईन तयार केले आहे.

‘मटा’ला माहिती देताना प्रदीप देशपांडे म्हणाले, ‘विमानतळासाठी दोन गेट आहेत. एका गेट मधून आतमध्ये प्रवेश करता येतो, तर दुसऱ्या गेट मधून बाहेर पडण्याची व्यवस्था आहे. दोन्हीही गेटच्या बाजूला ९ मीटर बाय ९ मीटर आकाराचे खड्डे आहेत. हे खड्डे काँक्रिटीकरणाने भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खड्डे भरल्यानंतर विमानतळासाठी प्रवेश करावयाच्या गेटच्या शेजारी कैलास लेणीचा स्तंभ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आठ फूट उंचीचा हा स्तंभ असणार आहे, स्तंभाच्या बाजूने लँडस्केपिंग केले जाणार आहे. बाहेर यावयाच्या गेटच्या शेजारी पद्मपाणीची मूर्ती लावण्यात येणार आहे. सहा फूट उंचीची ही मूर्ती ‘ थ्री डी’ मध्ये तयार केलेली असेल. दोन्हीही गेटच्या मध्ये १२५ मीटरची जागा आहे. या जागेचा उपयोग विविध प्रतिकृती लावण्यासाठी केला जाणार आहे. त्यात भडकलगेट, मकईगेट, दिल्लीगेट, पानचक्की, बीबी का मकबरा, सोनेरी महल, औरंगाबाद लेणी या वारसा स्थळांचा समावेश करण्याचे नियोजन आहे. पानचक्कीचे पाणी पडत आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी एक हौद व त्यात कारंजे तयार केले जाणार आहेत. भिंतीवरून पाणी पडत आहे, असा देखावा तयार केला जाणार आहे. प्रत्येक वास्तू केव्हा उभारण्यात आली त्याची माहिती देऊन त्या वास्तूबद्दल थोडक्यात माहिती देखील त्या ठिकाणी लावली जाणार आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची तोंडओळख शहरात पाय ठेवताच होऊ शकणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रस्ताव मंजूर केल्यावर व संबंधित कंत्राटदाराला वर्कऑर्डर दिल्यावर सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा संकल्प आहे.’


नियोजन समितीचा निधी

-

महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागांची चालू वर्षाची दरसूची आणि बाजारभावाचे सर्वेक्षण करून ४९ लाख ९८ हजार ६२३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हा निधी मिळवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हा नियोजन समितीने प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षारोपणासह जतन, संवर्धनावर भर

$
0
0

वृक्षारोपणासह जतन, संवर्धनावर भर

ravindra.taksal@timesgroup.com

Tweet : @rtaksalMT

औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात वन क्षेत्र हे सुमारे ८७ हजार हेक्टरवर आहे. वन क्षेत्र व तेथील वन्यप्राण्याचे संरक्षण, जतन व संवर्धनासाठी विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. अवैध वृक्षतोड, प्राण्यांची तस्करी यावर अंकूश लावण्यासाठी गस्ती पथकाद्वारे करडी नजर ठेवली जात असून वन संरक्षणासाठी लोकसहभागातून अनेक कामे केली जात आहेत. सध्या १२ लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती वन विभागाचे उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांनी मटाशी बोलताना दिली.
उप वनसंरक्षक म्हणून प्राधान्याने कोणत्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची आवश्यकता वाटते ?

- मराठवाड्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन क्षेत्राचे प्रमाण तुलनेत कमी आहे. औरंगाबाद, जालना विभागात ८७ हजार हेक्टरावर वन क्षेत्र आहे. राज्य सरकारने वन क्षेत्रात वाढ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यात एक जुलै ते सात जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत एकूण १२ लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी झाली असून, त्यापैकी साडेपाच हजार रोपांची लागवड करण्याची जबाबदारी एकट्या वनविभागाकडे दिली आहे. उर्वरित रोपे विविध शासकीय विभाग तसेच ग्रामपंचायतींच्या मदतीने लावली जाणार आहेत.

वृक्षारोपणासाठी आवश्यक रोपे तयार झाली आहे कि अन्य ठिकाणांहून ती खरेदी करावी लागणार आहेत ?

- औरंगाबाद जिल्ह्यात १२ लाख तर जालना जिल्ह्यात सहा लाख ५० रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या मिळून जिल्ह्यात २२ रोपवाटिका असून त्या ठिकाणी वड, पिंपळ, फळझाडे यासह विविध प्रकारच्या झाडांची १५ लाख रोप तयार झाली आहेत. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांना लागणारी रोप वन विभागामार्फत पोहचती करून दिली जाणार असून, वाहतूक खर्च वन विभाग करणार आहे. तर अन्य विभागांना सवलतीच्या दरात रोपे दिली जाणार आहेत. त्यामुळे अन्य ठिकाणाहून रोपे विकत घ्यावी लागणार नाहीत. जिल्ह्यातील एकूण लक्ष्य गाठण्यासाठी व सर्व विभागात समन्वय साधण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरीय समिती तयार केली आहे.

लावलेली सर्व झाडे जगतातच असे होत नाही ?

- लावलेली सर्व झाडे वाढायला हवी असेच नियोजन पाहिजे. लावलेल्या झाडांचे जतन व संवर्धनाची जबाबदारी ही त्या-त्या यंत्रणेवर देण्यात आलेली आहे. वन क्षेत्रात आम्ही चराई बंदी केली असून लावण्यात येणारी रोपे ही सुदृढ असावी यासाठी किमान दीड फुटापेक्षा जास्त उंच वाढ झालेली रोपे लावण्यात येतील. अनेकदा पाणी टंचाईमुळे झाडांची योग्य वाढ होत नाही. गतवर्षी करण्यात आलेल्या वृक्षारोपणात किती झाडे वाढली, याचे सर्व्हेक्षण या महिन्याअखेर होईल. तसेच वृक्षतोड, वन्यप्राण्याची शिकार, तस्करी रोखण्यासाठी विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यासाठी खास गस्ती पथक तैनात करण्यात आले आहे.

वृक्ष लागवडीसाठी अन्य प्रयत्न कोणते होत आहेत ?

- वन क्षेत्रात चराई बंदी करण्यात आलेली आहे. संरक्षणासाठी लोक सहभागही वाढविण्यात आला असून जनजागृतीवर भर दिला जात आहे. संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत ३०० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यासह केंद्रीय संरक्षण विभागांतर्गत इको-बटालियन स्थापन करून त्यांच्यामार्फत वृक्ष लागवड, संरक्षण, संगोपनासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार आहेत. हा पायलट प्रोजेक्ट अब्दीमंडी येथील वन विभाग परिसरात राबविण्यात येणार आहे. वृक्ष लावणे हे मानवी, नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेतून सर्वांनी या मिशनमध्ये काम करावे. तसेच निसर्ग पर्यटनासंदर्भात काही योजना लवकरच हाती घेऊ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत मुलीचे घर जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
विवाहितेने आत्महत्या केल्याचा राग मनात धरून तिच्या दहाव्याच्या कार्यक्रमात माहेरच्या लोकांनी घर जाळण्याचा प्रयत्न करून सासरच्यांना मारहाण केल्याची घटना शुकवारी तालुक्यातील खंबाळा येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार तालुक्यातील खंबाळा येथील रहिवासी वर्षा संतोष मोरे या विवाहितेने १० मे रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, खंबाळा येथे शुक्रवारी दहाव्याचा कार्यक्रम होता. यावेळी वर्षाचा भाऊ राहुल हंसराज केरे, विमलबाई हंसराज केरे, सोमनाथ मुठ्ठे, संजय वरुडे (सर्व रा. तिडी), फकीरचंद जगन्नाथ हिवाळे (रा. गंगापूर) व त्यांच्या अन्य पाच ते सहा साथीदारांनी घराचा दरवाजा तोडून घरातील फ्रिज, टीव्ही व इतर साहित्य अस्ताव्यस्त केले व त्यावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. कांताबाई भीमराज मते, संतोष भीमराज मते यांना मारहाण केली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. त्यावरून आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश जामदार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिध्दार्थ उद्यानाचे भगदाड बुजवले

$
0
0

सिध्दार्थ उद्यानाचे भगदाड बुजवले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानात प्रवेश करण्यासाठी फुकट्यांनी चक्क भिंतीला भगदाड पाडले होते. या संदर्भात मटाच्या मंगळवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत उद्यान प्रशासनाने ते भगदाड स्वरुपात बुजवले आहे.

शहरातील विरुंगळ्याचे एकमेव ठिकाण म्हणून सिद्धार्थ उद्यान परिचित आहे. सुटीचा आनंद लुटण्यासाठी या उद्यानात सध्या बालगोपाळांसह पालकांची गर्दी होत आहे. या उद्यानाचे तिकीट दर वाढवण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी दोन रुपयावरून दहा रुपये तर मोठ्या व्यक्तीसाठी पाच रुपयावरून वीस रुपये दर आकारण्यात येत आहे. काही महाभागांनी उद्यानात शिरण्यासाठी शक्कल लढवली होती. उद्यानाच्या मागच्या बाजूस वाहतूक उद्यान आहे. या उद्यानाच्या सरंक्षक भिंतीला मोठे भगदाड पाडण्यात आले होते. या भगदाडातून आतमध्ये फुकट्यांचा शिरकाव होत असे. या प्रकरणी मंगळवारी महाराष्ट्र टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. हे भगदाड सध्या बुजवण्यात आले आहे. यामुळे फुकट्यांना आता उद्यानात शिरकाव करणे कठीण झाले आहे.

उद्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गोष्टी घडत आहेत. उद्यानात नागरिकांना लुबाडण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. गुन्हेगार अशा पळवाटांचा उपयोग यासाठी करतात. उद्यानात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

अनिल मकरिये - माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून काढला ८४ कोटींचा गाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यात लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यावर्षी लोकसहभागातून एक कोटी १७ लाख ६५ हजार घनमीटर गाळाचा उपसा केला आहे. या कामांचे मूल्य तब्बल ८४ कोटी ७१ लाख रुपये आहे.
यंदा मराठवाड्यातील धरणे व लहान मोठ्या तलावांमध्ये पाण्याची फारशी अडचण नाही, तरीही पाणी कमी झालेले प्रकल्प, नदी, लहान तलावांमधून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. आठही जिल्ह्यांमधील ७७३ गावांमध्ये लोकसहभागातून गाळ काढणे सुरू आहे. जलयुक्त शिवार अभियानात २०१६-१७ वर्षांसाठी निवडण्यात आलेल्या १५१८ गावांमध्ये गाळ काढण्याचे १८०७ कामे सुरू आहेत. यापैकी ११३१ शासकीय, तर ६७६ कामे लोकसहभागातून सुरू आहेत. शासकीय कामांमधून ९० लाख ९३ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. लोकसहभागातून एक कोटी १७ लाख ६५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या कामांचे मूल्य ८४ कोटी ७१ लाख रुपये असल्याच्या नोंदी सरकारी दप्तरी आहेत.
यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सरसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात गाळ काढणे, रुंदीकरण तसेच खोलीकरणाची सर्वाधिक २३२ कामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात ९१ तर उस्‍मानाबाद जिल्ह्यात लोकसहभागातून १२१ कामे सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी पकडले दारू तस्करांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
घाटनांद्रा येथील शासनमान्य देशी दारूच्या दुकानावर गुरुवारी मध्यरात्री महिलांनी पाळत ठेऊन दारूचे बॉक्स घेऊन जाण्यासाठी आलेल्या मोटारसाकलवरील अनोळखी इसमांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे दुकानमालक अशोक गणेशलाल जैस्वाल याने महिलांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटनांद्रा येथील देशी दारूच्या दुकानावर गुरुवारी मध्यरात्री अवैध मार्गाने दारू नेण्यासाठी शिवनारायण शामलाल जैस्वाल व आकाश शिवनारायण जैस्वाल (रा. दोघेही चिंचोली) आले होते. त्यांच्यावर महिलांची पाळत ठेवली होती. या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दुकानमालक अशोक गणेशलाल जैस्वाल याने महिलांना शिवीगाळ केली, सुंदराबाई मोरे यांना धक्काबुक्की केली, अशी फिर्याद रेखा मोरे यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दुकानमालक पळून गेला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली. दारू वाहतूकप्रकरणी पोलिस नाईक विठ्ठल डोके यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दुकानावर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बढतीचे आमिष दाखवून बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
नोकरीत बढती मिळ‍वून देण्याचे आमिष दाख‍वून एका दलित अंगणवाडी मदतनीसावर अनेक वेळा बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी कल्पेश मनसुखलाल खिलोसिया (रा. भराडी) याला गुरुवारी अटक केली. त्याच्यावर बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीला कोर्टाने शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संशयित आरोपी कल्पेश मनसुखलाल खिलोसीया (रा. भराडी) याचा सिल्लोड येथे प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. माझी खूप ओळख असून तुला नोकरीत बढती मिळ‍वून देतो, असे आमिष त्याने एका दलित अंगणवाडी मदतनीसाला दाखवले होते. तू मला खूप आवडते, तुला पत्नी सारखे वागवेल, अशा थापा मारून एक वर्षांपासून शहरातील दोन हॉटेलमध्ये व राहत्या घरी महिलेवर बलात्कार केला. हे कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला ठारा मारीन अशी धमकी त्याने दिली होती. त्याचा त्रास जास्तच वाढल्याने पीडीत महिलेने तिच्याबद्दल घडणारा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पती-पत्नीने गुरुवारी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. यावरून कल्पेशविरुद्ध बलात्कार व अॅट्रासिटी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला शुक्रवारी कोर्टासमोर उभे केले असता अधिक चौकशीसाठी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पीडित महिलेवर बलात्कार झालेल्या हॉटेलची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. एका हॉटेलच्या रजिस्टरवर आरोपीने तीन वेळा खोली भाड्याने घेतल्याची नोंद आहे. पण, महिलेचे नाव बदलण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याची माहीती पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा दिवसांपासून फुलंब्रीत निर्जळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
किमान वेतनाच्या मागणीसाठी नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून फुलंब्री शहरात पिण्याचे पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.
किमान वेतनाच्या मागणीसाठी नगर पंचायतीचे सर्व २९ कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे सर्वत्र घाण पसरली आहे. शहरातील पथदिवे बंद असून नाल्या तुंबून दुर्गंधी पसरली आहे. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी सरपंच सुहास शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायत अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरवले. पण, शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत कार्यालय उघडलेच नव्हते. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला. नगर पंचायत प्रशासक तहसीलदार संगीता चव्हाण व मुख्याधिकारी याेगेश पाटील हे ११ वाजता आले. त्यांना हिणवण्यासाठी फटाक्यांची अातिषबाजी करण्यात अाली. पाण्याचा रिकामा हंडा देऊन या अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांकडे आजच पाणी देण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांचे प्रश्न तुमच्या पद्धतीने हाताळा पण, नागरिकांना अाजच पाणी द्या, असे शिरसाठ यांनी चव्हाण व पाटील यांना सुनावले. सांजूळ व फुलंब्री या दाेन्ही धरणात भरपूर पाणी असून २० वर्षांत अशी परिस्थिती उद्भवली नव्हती, असे सांगण्यात आले.
यावेळी याेगेश मिसाळ, राम बनसोड, भास्कर वानखेडे, सुमित प्रधान, अावेज चिस्ती, रंगनाथ हापत, जमीर पठाण, अारेफ पटेल, नागेश भरद्वाज, तय्यब शाह, सचिन शेरकर, अरविंद काथार, वाल्मिक जाधव, रवींद्र माेहाेरकर आदी उपस्थित होते.

कर का वाढवले ?
नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत असताना मिळणारेच वेतन दिले जाते. दाेन वर्षांपासून नगर पंचायत अस्तित्वात आली असून प्रशासक, मुख्यधिकारी नियुक्त झाले. त्यांनीही या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची काळजी घेतली नाही. मात्र, नगर पंचायतीच्या नियमानुसार सर्व कर वाढवले आहेत. त्याची वसुलीही केली जाते, पण कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन दिले जात नाही. कर अाकारणी कशाकरिता वाढविली, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

वेतन वाढवणार
प्रत्येक कर्मचाऱ्यास १५०० रुपये वेतनवाढ देण्यात येईल, असे प्रशासक संगीता चव्हाण व मुख्याधिकारी याेगेश पाटील यांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. किमान वेतनासाठी शासनाचे काही धाेरण अाहे. ताे प्रश्न अामच्या हाती नाही. मात्र ही सर्व पूर्तता करून शासन दरबारी पुढील कार्यवाही करण्यात येईल, पाणीपुरवठा सायंकाळपर्यंत सुरळित करण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार दानवेंच्या नावाने अनेकांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याची थाप मारून अनेकांना गंडवणाऱ्याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. गणेश साहेबराव बोरसे पाटील (रा. खडकेश्वर) असे त्याचे नाव आहे. त्याने राज्यात अनेकांना शासकीय कामे करून देतो, नोकरी लावून देतो, बदली करून देतो अशा थापा मारून गंडवल्याचे उघड झाले आहे. त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर (रा. रामकृष्णनगर, परभणी) हे व्यापारी असून त्यांचे परभणी येथे व्यंकटेश मंगल कार्यालय आहे. वाकोडकर मल्टी सर्व्हिसेस नावाने असलेल्या त्यांच्या फर्मची औरंगाबाद येथील पीएफ कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. त्यानिमित् वाकोडकर यांना नेहमी औरंगाबादला यावे लागते. ते ९ मार्च २०१७ रोजी पीएफ कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना गणेश बोरसे पाटील हा भेटला. गणेशने वाकोडकर यांच्याशी ओळख वाढवत त्यांच्या कामाचे स्वरूप विचारले. वाकोडकर यांनी माहिती दिल्यानंतर आपण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जवळचे कार्यकर्ते असून शासकीय कार्यालयातील कामे मी करतो, अशी थाप मारली. वाकोडकर यांच्या कामासाठी दीड ते दोन लाख रुपये लागतील, मात्र काम होईल असे अामिष गणेशने वाकोडकर यांना दाखवले. वाकोडकर यांचा विश्वास बसल्याने त्यांनी १६ एप्रिल २०१७ रोजी नुतन कॉलनी येथील ममता बिकानेरजवळ गणेश बोरसे पाटील याला एक लाख रुपये दिले. यावेळी वाकोडकर यांच्यासोबत त्यांचा चालक अशोक हनवते व नातेवाईक भालचंद्र गोळे होते. ही रक्कम दिल्यानंतर वाकोडकर यांनी कामाबाबत विचारणा केली असता गणेश बोरसे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पैसे परत करण्यास नकार दिला. याप्रकरणी वाकोडकर यांनी क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गणेश बोरसे पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल आडे व एपीआय विजय घेरडे तपास करीत आहेत. गणेश बोरसे पाटील हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील गावचा रहिवासी आहे. त्याने यापूर्वी देखील अनेकांना दानवे यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगत गंडा घातला आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे देखील त्याने आपले जाळे निर्माण केले होते. त्याच्यावर यापूर्वी बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारपर्यंत कोठडी

या प्रकरणी आरोपी गणेश रावसाहेब बोरसे याला शुक्रवारी (१९ मे) कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून तक्रारदाराचे एक लाख रुपये हस्तगत करावयाचे आहेत, आरोपीच्या घराची झडती घ्यायची आहे, आरोपीने कोण-कोणत्या राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर करुन गुन्हे केले, आरोपीचे कोणी साथीदार आहेत काय आदींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत (२५ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. भोसले यांनी दिले

खासदार दानवेंनी पकडले

सिल्लोड जवळील धानोरा येथे स्वतः रावसाहेब दानवे यांना गणेश बोरसे दिसला. त्यांनी लगेच त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. गेल्या आठ महिन्यांपासून बोरसे पोलिसांना गुंगारा देत होता, असे खासदार दानवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाला ड्राफ्टची प्रतीक्षा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या कॉपी प्रकरणानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. परीक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आता कुणा कर्मचाऱ्याचा कॉपी प्रकरणात सहभाग आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत. संलग्नीकरण रद्द का करू नये, या आशयाची नोटीस विद्यापीठ प्रशासनाने साई कॉलेजला शनिवारीसुद्धा पाठवली नाही. कायदेतज्ज्ञ ड्राफ्ट बनवत असून नोटीशीला एफआयआरची कॉपी जोडली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौका येथील साई इंजिनीअरिंग कॉलेजचे सामूहिक कॉपी प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करीत विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेताच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा राजीनामा घेण्यात आला. तसेच परीक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. साई कॉलेजचे प्रा. अभिजित गायकवाड, प्रा. अमित कांबळे व प्राचार्य संतोष देशमुख यांची शिक्षकपदाची मान्यता रद्द करून त्यांना परीक्षा प्रक्रियेतून कायमचे बडतर्फ केले. तसेच संबंधित कॉलेज ‘काळ्या यादी’मध्ये टाकण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. कॉलेजचे संलग्नीकरण रद्द का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस पाठवण्यात येणार आहे. मात्र, कॉपीप्रकरण घडून चार दिवस उलटल्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कॉलेजला नोटीस पाठवली नाही. कायदेशीर कारवाईत त्रुटी राहू नये म्हणून कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे. संपूर्ण ड्राफ्ट तयार करण्यास विलंब झाल्यामुळे नोटीस पाठवली गेली नाही. किमान शनिवारी साई कॉलेजला नोटीस पाठवण्याची शक्यता होती, पण दिवसभरात कोणतीही माहिती प्रशासनाने दिली नाही. संबंधित कॉलेजची मान्यता रद्द करण्यासाठी कठोर कारवाई करा अशी मागणी जोर धरीत आहे.

रगडे यांची बैठक
परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश रगडे यांनी शनिवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. दीक्षांत समारंभाची तयारी आणि अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांबाबत बैठकीत चर्चा झाली. दीक्षांत समारंभासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे समन्वयक माजी संचालक दिगंबर नेटके होते. आता पदभार स्वीकारल्यामुळे रगडे यांनी बैठक घेऊन दीक्षांत समारंभ नेटका करण्यावर भर दिला आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या.

प्रकरणाचा तपास सुरू
साई कॉलेजमध्ये मास कॉपी मागील वर्षीसुद्धा झाल्याची माहिती हाती लागल्यानंतर पोलिस यंत्रणा अधिक तपास करीत आहे. विद्यापीठातील कर्मचारी कॉपी प्रकरणात थेट सहभागी आहेत का याचा शोध पोलिस घेत आहेत. विद्यार्थी व प्राध्यापकांचे जबाब घेतल्यानंतर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना जबाबासाठी बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची मोठी उकल होण्याची शक्यता आहे.

एका विद्यार्थ्याची हर्सूलमध्ये रवानगी
नगरसेवकाच्या घरात अभियांत्रिकी शाखेची उत्तरपत्रिका लिहिल्या प्रकरणातील एका विद्यार्थ्याला कावीळ झाल्याचे समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी शनिवारी त्याला न्यायालयात हजर करून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी त्या विद्यार्थ्याला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. मात्र, त्याचा जामीन घेण्यासाठी कोणीही उपलब्ध नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याची न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
यापूर्वी न्यायालयाने या प्रकरणात तीन विद्यार्थिनींना जामीन मंजूर केला आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक, नगरसेवक अशा एकूण ३० जणांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फुलंब्री तालुक्यातील चौका गावाजवळील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २७ विद्यार्थी नगरसेवकाच्या घरात रात्री उत्तरपत्रिका सोडवीत असताना पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी विद्यार्थ्यांसह घरमालक तथा शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे तसेच कस्टोडियन अमित कांबळे, प्राचार्य संतोष शिवाजीराव देशमुख, प्रा. विजय आंधळे संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गंगाधर मुंढे, सचिव मंगेश मुंढे अशा एकुण ३३ जणांना अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वक्फ’ची आता विभागीय कार्यालये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यभरातील वक्फ बोर्डाच्या प्रकरणांचे निकाल वेळवर लागणे आणि लोकांच्या औरंगाबादला होणाऱ्या फेऱ्या टाळण्यासाठी मुंबई, पुण्यासह नागपूर आणि अमरावती येथे ‘वक्फ’ची विभागीय कार्यालये सुरू केली जाणार आहेत. असा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे,’ अशी माहिती बोर्डाचे सदस्य हबीब फकीह यांनी शनिवारी दिली.
गुरुवारी वक्फ बोर्डाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयाची माहिती हबीब फकीह यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयात दिली. ते म्हणाले, ‘वक्फ बोर्डाकडे कर्मचारी संख्या कमी आहे. कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लवकरच भरती करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या औरंगाबाद मुख्यालयात सर्वसामान्यांची गर्दी दिवसभर होते. यामुळे कर्मचाऱ्यांना आपले काम नीट करता येत नाही. चार तासांसाठी वक्त कार्यालयात नागरिकांची भेट बंद करण्यात येईल. याशिवाय या कार्यालयात सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. राज्यभरातून वक्फ बोर्डाच्या छोट्या मोठ्या कामांसाठी अनेक जणांना औरंगाबादला यावे लागते. ही कामे त्यांच्याच भागातील जवळच्या विभागीय केंद्रावर व्हावीत यासाठी पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती येथे विभागीय कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी एक वक्फ अधिकारी, एक क्लर्क आणि एक शिपाई असे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. ही कार्यालये एक जूनपासून सुरू केली जाणार आहेत,’ असे हबीब फकीह यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजमतुल्लाह कुरैशी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

पानचक्की पर्यटन महागले
वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही महत्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. त्यात आमखास मैदानावर स्पर्धा, विवाह सोहळा साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमासाठी दहा हजार रुपये घेण्यात येतील. पानचक्की येथे देश विदेशातून अनेक पर्यटक येतात. या पर्यटकांकडून पाच ते दहा रुपये फी आकारण्यात येते. हे शुल्क देशातील पर्यटकांसाठी १० रुपये, तर परदेशी पर्यटकांसाठी ५० रुपये आकारण्यात येईल.

इमारत भाडे दहा पट
जालना रोडवरील चितलांगे यांनी वक्फ बोर्डाच्या जागेवर तयार केलेल्या इमारतीचे भाडे दर वर्षी २ लाख रुपये घेण्यात येत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले आहे. या प्रकरणात ‘त्या’ इमारत मालकाकडून दर वर्षी २२ लाख रुपये भाडे आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय जालना रोडवरील अन्य वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी तसेच मौलाना आझाद आणि व्हिडिओकॉन कंपनीच्या जमिनीबाबतही कोर्टात धाव घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटा छापणाऱ्यास ३० मेपर्यंत कोठडी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरामध्ये बनावट नोटा संगणक व प्रिंटरवर तयार करून त्या चलनात आणणारा आरोपी माजीदखान बिस्मिलाखान याला ३० मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एच. मोहमंद यांनी दिले.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने सापळा रचून व छापा मारून माजीदखान यास ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून दोन हजार, पाचशे व शंभर रुपयांच्या पाच लाख पाच हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. स्कॅनर, प्रिंटर, कात्री, चलनात असलेले २३ हजार रुपये असे पाच लाख पाच हजार ३०० रुपये जप्त करण्यात आले. माजीदखानला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहमंद यांच्यासमोर हजर करण्यात आले.

किती नोटा चलनात?
आरोपीने चलनात किती नोटा आणल्यात याची चौकशी करावयाची आहे, त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, स्कॉनर, प्रिटंर कुठून घेतला याची चौकशी करावयाची असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती असता सरकारी वकील एन. एम. पवार यांनी केली. कोर्टाने ही विनंती मान्य केली.

एटीएसकडून चौकशी
बनावट नोटा प्रकरणात आरोपी माजेद खान याची शनिवारी दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी केली. या नोटा देशाबाहेरून पाठविण्यात आल्या आहेत का, त्यांचा उपयोग कशासाठी केला, याची माहिती एटीएसने घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मज्जू उर्फ माजीद खानला नगरसेवक व्हायचे होते. त्यासाठी तो वीस वर्षांपासून प्रयत्न करित होता. राजकारणात कोणतेही यश ‌न मिळाल्याने त्याने उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवली. पुन्हा छापखान्याचा व्यवसाय सुरू केला. गेल्या काही महिन्यांपासून माजीदचे दुसऱ्या जिल्ह्यात दौरे वाढले होते. त्याने लॉटरी, तसेच अन्य धंद्याच्या आधारे या नोटा चलनात आणल्या असण्याची आहे.

लाखोंचे फेडले कर्ज
२५ वर्षांपूर्वी रिक्षा चालवून संसाराचा गाढा ओढणाऱ्या माजेदने रिक्षा विकून राजकारणात प्रवेश केला. तिथे त्याच्यावर साडेदहा लाख रुपयांचे कर्ज झाले होते. मात्र, अल्पावधीत त्याने ही देणी फेडल्याची माहितीही समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आयुक्त म्हणाले, चला गावाकडे !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठवाड्यातील गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी जनजागृतीचे प्रभावी माध्यम वापरले जाणार आहे. येत्या २० ते २९ मे या कालावधीत महसुली कर्मचारी ‘चला गावाकडे जाऊ - ध्यास विकासाचा घेऊ’ अभियान राबवणार आहेत. शासकीय योजनांची माहिती देणे व श्रमदानातून कामे करण्यात येतील,’ अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. विभागीय आयुक्तलायत शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘विभागात स्वच्छता अभियान, तलाव - बंधाऱ्यातील गाळ काढणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे, शेततळे तयार करणे, जलयुक्त शिवार, महिला सबलीकरण, वैयक्तिक शौचालये, सिंचन विहिरी अशी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. या कामात आणखी भर घालण्यासाठी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जन्मगावाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. ‘चला गावाकडे जाऊ - ध्यास विकासाचा घेऊ’ या अभियानातून संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या मूळ गावी काम करण्याचे नियोजन आहे. येत्या २० ते २९ मे या कालावधीत अभियान राबवले जाणार आहे. या कालावधीत कोणतेही दोन दिवस काम करणे अपेक्षित आहे. नोकरदाराने आपल्या गावासाठी काम करणे अभियानाचा उद्देश आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक गावातील कर्मचाऱ्याला अभियान कधी राबवणार याची माहिती देणार आहेत. मात्र, कार्यालयीन कामकाज सुरळीत चालेल अशा पद्धतीने गावी जाण्याचे नियोजन करण्यात येईल,’ असे डॉ. भापकर यांनी सांगितले.
गावाला भेट देऊन सर्व अधिकारी व कर्मचारी विवरणपत्रातील माहितीचे एकत्रीकरण तहसील कार्यालयात ३० मे पर्यंत करणार आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित अहवाल त्यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना दोन जूनपर्यंत सादर करणे अपेक्षित आहे. शहरी भागातील कर्मचाऱ्यांनी जन्म झालेल्या वॉर्डात मोहीम राबवण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत विकासकामांचे अभ्यासपूर्वक मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यमापनानुसार सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या अभियानात विभागातील जवळपास दोन लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत.

फक्त कागदांची पूर्तता ?
गावाचा परिपूर्ण विकास करण्याची अभिनव संकल्पना विभागीय आयुक्तांनी राबवली आहे. मात्र, या अभियानात अनेक उणिवा आहेत. दोन दिवसात कोणते काम करणार आणि कामाचे नियोजन काय याबाबत ठोस माहिती नाही. केवळ चार रकाने असलेला कागद भरल्यानंतर अभियान संपणार आहे. इतर सरकारी अभियानाप्रमाणे या अभियानाची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे साशंकता निर्माण झाली आहे. हे अभियान फक्त सहल होण्याची शक्यता आहे, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याबद्दल गुपचिळी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाणीपट्टीमध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबद्दल महापालिकेच्या प्रशासनाने आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली आहे. कायदेशीर बाबी तपासून या बद्दल निर्णय घ्यावा लागेल, असे मत आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी व्यक्त केले.
समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पीपीपीतत्वावरील समांतर जलवाहिनीचा प्रकल्प रद्द करण्यात आल्यामुळे पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय देखील महापालिकेच्या प्रशासनाने रद्द करावा व चालू आर्थिक वर्षात जुन्याच दराने पाणीपट्टीच्या नोटीस नागरिकांना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती. ही मागणी मान्य करून महापौर भगवान घडमोडे यांनी प्रशासनाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. महापौरांच्या आदेशानंतरही दहा टक्के वाढीव दराने पाणीपट्टीच्या नोटीस बजावणे पालिकेच्या प्रशासनाने सुरूच ठेवले. त्यामुळे आज शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घोडेले यांनी पुन्हा हाच विषय मांडला. या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना आयुक्त मुगळीकर म्हणाले, ‘दहा टक्के दरवाढ रद्द करण्याबद्दल कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल.’

कायदेशीरबाबी तपासून निर्णय
सर्वसाधारण सभा संपल्यावर आयुक्त डी. एम. मुगळीकर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘समांतर जलवाहिनीच्या एकूणच प्रकरणात कोर्टाचा स्थगन आदेश आहे. पाणीपट्टीची वाढ हा त्याचाच एक भाग आहे, त्यामुळे या बद्दल निर्णय घेतना कायदेशीरबाबी तपासाव्या लागतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् सावली झाली गायब!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्या प्राणात श्वास असेपर्यंत सोबत करणारी आपली सावली शनिवारी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी जेव्हा गायब झाली. तेव्हा अनेकांना चुटपूट लागली. विज्ञानाची ही अनोखी किमयागारी पाहायला विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र अभ्यासकांच्या घरी गर्दी केली.
‘औरंगाबादच्या अक्षांशानुसार वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव आपल्याला घेता येतो,’ अशी माहिती नांदेड येथील एमजीएमच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. येथील एमजीएम परिसरात औंधकर यांनी प्रयोगाच्या माध्यमातून शून्य सावलीचे रहस्य उपस्थितांना उलगडून दाखवले. ‘पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. गिरीश गाडेकर, आशिष गाडेकर, गायकवाड तसेच शहरातील विज्ञानप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही औंधकर यांनी केले.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. - श्रीनिवास औंधकर, खगोलशास्त्रज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वेस्टेशन जवळील उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल स्टेबलिटी ऑडिट केले जाणार आहे. यासाठी एमआयटी कॉलेजने पुढाकार घेतला असून सीएसआर फंडातून कॉलेज हे काम करणार आहे. पुढील आठवड्यात ऑडिट करण्याचे काम सुरू होईल, असे संकेत महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले.
‘रेल्वेस्टेशनच्या जवळ बांधण्यात आलेला शहरातील सर्वात जुना उड्डाणपूल आहे. आता हा पूल खचला आहे. पुलाच्या पृष्ठभागावर खड्डे पडले असून जास्तीच्या वजनामुळे पूल हालतो की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल स्टेबलिटी ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या कामासाठी एमआयटी कॉलेजला सहकार्य करण्याची विनंती केली. कॉलेजने ही विनंती मान्य केली,’ असे मुगळीकर म्हणाले.

ऑडिटसाठी आवश्यक असलेले मशीन मुंबईत कस्टम ड्युटी आकारण्यात आल्यामुळे थांबवून ठेवण्यात आले आहे. कस्टम ड्युटी भरून ते मशीन दोन - तीन दिवसात शहरात दाखल होईल, त्यानंतर त्या पुलाचे ऑडिट केले जाईल. - डी. एम. मुगळीकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून खडाजंगी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बीड बायपास रस्त्यावर साकारल्या जात असलेल्या ५० ग्रीन वसाहतीला पाणीपुरवठा करण्याच्या मुद्यावरून शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना व भाजपचे नगरसेवक आमने-सामने आले. बिल्डरच्या गृहनिर्माण योजनेसाठी तत्काळ पाणीपुरवठा केला जातो आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते, असा मुद्दा उपस्थित करून भाजपच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. पाण्याची उपलब्धता तपासून त्या वसाहतीला पाणी देण्याचा निर्णय घ्या, असे आदेश महापौरांनी दिले. या वसाहतींत शिवसेनेच्या एका बड्या लोकप्रतिनिधीच्या घराचे बांधकाम सुरू आहे. हे विशेष.
महापालिकेच्या १७ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी ५० ग्रीन/१०८ या वसाहतीला पाणीपुरवठा करण्याचा ऐनवेळचा विषय मांडला व त्याला मंजुरी मिळाली. या वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी पैठण रोडवरील उड्डाणपुलापासून स्वतंत्र पाइपलाइन टाकावी लागणार आहे. शिरसाट यांनी मांडलेला ऐनवेळचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या कामाचे तत्काळ टेंडर काढून काम सुरू केले. पाणीपुरवठा विभागाने एवढी तत्परता दाखवल्याबद्दल शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच घेरले. शहरातील अनेक वसाहतींनी अनेक वर्षांपूर्वी बेटमेंट चार्जेस भरले आहेत, पण त्या वसाहतींना अद्याप पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. मात्र, ५० - ग्रीन वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन इतकी तत्परता का दाखवत आहे, असा सवाल राजू शिंदे यांनी विचारला. प्रमोद राठोड म्हणाले, ‘पाणीपुरवठ्यात वाढ झाली असेल, तर नवीन वसाहतींना पाणीपुरवठा करा. पाणीपुरवठ्यात वाढ झालीच नाही, तर नवीन वसाहतींना पाणीपुरवठा कसा करणार.’ राजू शिंदे यांनी ‘५० ग्रीन वसाहतीमध्ये एका लोकप्रतिनिधीचे घर बांधले जात आहे. त्याच्यासाठी तर नवीन पाइपलाइन टाकण्यात येत नाही,’ ना असा सवाल केला. शिंदे यांच्या या सवालामुळे शिवसेनेचे राजू वैद्य व नंदकुमार घोडेले संतापले. ‘लोकप्रतिनिधींचा उल्लेख करू नका. त्याचा या चर्चेशी काही संबंध नाही,’ असे ते म्हणत होते. यातच सेना - भाजपचे नगरसेवक आमने सामने आले. महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. त्यामुळे महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. सभा पुन्हा सुरू झाल्यावर ‘पाण्याची उपलब्धता तपासून त्या वसाहतीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्या,’ असे आदेश महापौर घडमोडे यांनी प्रशासनाला दिले.

सहा महिन्यांपासून अंमलबजावणी नाही
एमआयएमच्या नगरसेविका संगीता वाघुले यांनी त्यांच्या वॉर्डातील पाण्याची समस्या मांडली. ‘या वॉर्डात पाइपलाइन टाकण्याचा ठराव सहा महिन्यांपूर्वी मंजूर झाला, पण अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. बिल्डरच्या वसाहतीसाठी पाणीपुरवठा करण्यास पालिकेची यंत्रणा तत्परतेने काम करते. हे कसे काय?’ असा सवाल विचारला. सीमा खरात, शिल्पाराणी वाडकर, मनिषा मुंडे, कीर्ती शिंदे यांच्यासह अन्य नगरसेविका व नगरसेवकांनी त्यांच्या त्यांच्या वॉर्डातील पाण्याची समस्या सर्वसाधारण सभेत मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बिल्डरला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्राहकाला मालमत्तेची नोदंणी करून नमुना क्रमांक ८ व साताबारा उताऱ्यावर त्याच्या मालकी हक्काची नोंद करावी. वसाहतधारकांची सोसायटीची नोंदणी करावी. ड्रेनेज लाइनच्या दुरुस्ती करता दहा हजार द्यावेत. तक्रारकर्त्याला नुकसान भरपाईपोटी दहा हजार तर खर्चापोटी दोन हजार द्यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष नीलिमा संत, सदस्य किरण ठोले व संध्या बारलिंगे यांनी बिल्डरला दिले.
राकेशराज अमरनाथ शर्मा यांनी अलका कन्स्ट्रक्शन यांच्याकडून गंगापूर जहाँगीर ग्रामपंचायतीच्या हद्दीत शेंद्राबन येथील अष्टविनायक वसाहतीत सदनिका सात लाख रुपयांत खरेदी केली. मात्र, हमी व आश्वासन दिल्याप्रमाणे बिल्डरने शब्द पाळला नाही. त्यामुळे मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश बिल्डरला द्यावेत, अशी विनंती शर्मा यांनी अर्जाद्वारे मंचाकडे केली.
उत्कृष्ट रस्ते, सांडपाण्यासाटी स्वतंत्र ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येक सदनिकेत स्वतंत्र विद्युत मीटर, १० सदनिकेसाठी स्वतंत्र डीपी. तसेच सातबारा व नमुना आठवर मालकी हक्काची नोंद, मुलांना खेळण्याचे मैदान, बगिचा, मंदिर, पार्किंगची व्यवस्था, मुख्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत अशा सुविधा देण्याची हमी बिल्डरने घेतली, पण त्याची पुर्तता केली नसल्याचा आक्षेप तक्रारीत घेण्यात आला होता.
डीपीचे कुठलेही आश्वासन देण्यात आले नाही. खेळमैदान, मंदिर बांधायचे होते. मात्र, याप्रकरणी दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे व न्यायालयाने नवीन बांधकाम करण्यास मनाई हुकुम दिला आहे. तसेच मालकी हक्क व सोसायटी नोंदणीचे काम शासकीय विभागाशी संबंधित असल्याने ग्राहकांनी पाठपुरावा करण्याची भूमिका बिल्डरने घेतली. सुनावणीअंती बिल्डरला मूळ त्रुटीबद्दल व सेवा पुरविण्यात जबाबदारी झटकता येणार नाही, हे मंचाने स्पष्ट केले. शर्मा यांची बाजू प्रकाश उंटवाल यांनी मांडली .

सोसायटीची नोंदणी करा
ग्राहकाला मालमत्तेची नोदंणी करून नमुना क्रमांक ८ व साताबारा उताऱ्यावर त्याच्या मालकी हक्काची नोंद करावी. वसाहतधारकांची सोसायटीची नोंदणी करावी. ड्रेनेज लाइनच्या दुरुस्ती करता दहा हजार द्यावेत. तसेच तक्रारकर्त्याला नुकसान भरपाईपोटी दहा हजार, तर खर्चापोटी दोन हजार द्यावेत असे आदेश बिल्डरला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अतिक्रमण हटाव’वरून निकमांची उचलबांगडी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘अतिक्रमण हटाव विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाला आहे. त्यामुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे,’ असे आरोप शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केले. त्यावर उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडील अतिक्रमण हटाव विभागातून उचलबांगडी करण्याचे आदेश आदेश महापौर भगवान घडमोडे यांनी आयुक्तांना दिले.
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नानंतर सर्वसाधारण सभेत अतिक्रमण हटाव विभागावर जोरदार चर्चा झाली. चर्चेची सुरुवात नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी केली. त्यांनी काही उदाहरणे देत अतिक्रमण हटाव विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे, असा आरोप केला. ‘पडेगाव भागातील पाच अपार्टमेंटच्या अतिक्रमणाबद्दल आपण तक्रार केली, पण त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. अधिकारी गल्लीबोळात जावून कारवाई करतात व आपण फार मोठे काम केल्याचा आव आणतात. अतिक्रमण हटावच्या नावाखाली भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. राजू वैद्य यांनी थेट उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘उपमहापौरांनी केलेले फोन निकम घेत नव्हते. उपमहापौर निकम यांना आपल्या घरचे काम सांगत नव्हत्या. निकम यांच्याबद्दल कमी अधिक प्रमाणात सर्वच नगरसेवकांना सारखाच अनुभव आहे. निकम यांच्याकडे अनेक विभागांचे अतिरिक्त कार्यभार देण्यात आले आहेत. ते सर्व कार्यभार काढून घेवून त्यांना झेपतील तेवढेच कार्यभार त्यांच्याकडे ठेवा, अतिक्रमण हटाव विभागाचा कार्यभार त्यांच्याकडून काढून घ्या,’ अशी मागणी वैद्य यांनी केली.

तक्रारींचा पाढा
नासेर सिद्दिकी, विकास एडके, राज वानखेडे, संगीता वाघुले, अब्दुल नाईकवाडी, प्रमोद राठोड, अॅड. माधुरी अदवंत आदींनीही निकम यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे महापौर भगवान घडमोडे यांनी निकम यांच्याकडील अतिक्रमण हटावचा चार्ज काढून घेण्याचे आदेश आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना दिले. सर्वसाधारण सभा संपताच आयुक्तांनी या आदेशाचे पालन केले.

अतिक्रमण हटावचे काझी प्रमुख
उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे असलेले अतिरिक्त कार्यभार काढून घेण्याचे आदेश सर्वसाधारण सभेत महापौर भगवान घडमोडे यांनी दिल्यानंतर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सायंकाळी तत्काळ या आदेशाचे पालन केले. निकम यांच्याकडे असलेला अतिक्रमण हटाव विभागाचा पदभार काढून तो दक्षता कक्षाचे प्रमुख एम. बी. काझी यांच्याकडे देण्यात आला. महसूल उपायुक्तपदाची सुत्रे पूर्वीप्रमाणे अय्युब खान यांच्याकडे सोपवण्यात आली. अय्युब खान यांच्याकडे आता अस्थापना विभाग १ व २, प्राणिसंग्रहालय विभागप्रमुख, स्थानिक संस्थाकर विभाग, कामगार विभाग, प्रकल्प विभाग, सांस्कृतिक विभाग, भांडार विभाग, निवडणूक विभाग, लेखा विभागाचे धनादेश स्वाक्षरी करणे हे अधिकार देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामे होणार वैध

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना शनिवारी महापालिकेने दिलासा दिला. या भागातील नियमांत बसणारी सर्व बांधकामे आवश्यक शुल्क भरून अधिकृत करण्याचे आदेश महापौर भगवान घडमोडे यांनी प्रशासनाला दिले. या आदेशामुळे २५ ते ३० हजार बांधकामे नियमित होऊ शकतील, असा अंदाज आहे.
सातारा-देवळाईतील बांधकामे नियमित करण्यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवला. सायली जमादार, कैलास गायकवाड यांनी त्यास अनुमोदन दिले. सातारा-देवळाई भागात ग्रामपंचायतीची परवानगी घेवून मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. नागरिकांचे हित लक्षात घेवून ती नियमित करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीकडून मंजूर झालेल्या रेखांकनामध्ये महापालिकेतर्फे बांधकाम परवानगी दिली जात नाही. या रेखांकनातील भूखंडांवर अनधिकृत बांधकामे होणार आहेत, त्यामुळे या भूखंडांवरील बांधकामासाठी महापालिकेच्या परवानगीची गरज असल्याचे घोडेले यांनी प्रस्तावात म्हटले होते. बांधकामे नियमित झाली तर या भागाचा अधिकृतपणे विकास होणे शक्य आहे. ग्रामपंचायतीची परवानगी घेवून झालेली बांधकामे आवश्यक तो दंड आकारून नियमित करावीत. ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या रेखांकनातील भूखंडावर बांधकाम करण्याची परवानगी द्यावी असे घोडेले यांनी प्रस्तावाच्या अनुषंगाने बोलताना सांगितले. नियमानुसार हे करता येणे शक्य आहे का हे तपासले पाहिजे. सातारा - देवळाईमधील बांधकामांबद्दल एक आराखडा तयार करून त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी व तो आराखडा शासनाच्या मंजुरीला पाठवावा, अशी सूचना शिवसेनेचे रेणुकादास वैद्य यांनी केली. प्रमोद राठोड म्हणाले, इतर शहरांमध्ये नगररचना विभागाच्या धोरणानुसार काय निर्णय घेण्यात आला आहे याचा अभ्यास करून योग्य ती कार्यवाही करावी. दरम्यान, महापौरांच्या आदेशानंतर नियमभंग करून झालेल्या बांधकामांवर हातोडा पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images