Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘भूमिगत’ च्या कामामुळे नाले तुंबले

$
0
0

‘भूमिगत’ च्या कामामुळे नाले तुंबले

अनेक वसाहतींना धोक्याची घंटा

पालिकेचे मात्र दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे शहरातून वाहणारे अनेक नाले तुंबले आहेत. नाल्यांच्या शेजारी असलेल्या वसाहतींसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. ‘भूमिगत’साठी खोदलेल्या रस्त्यांची माती नाल्यांमध्ये टाकण्यात आल्यामुळे नाल्यांचे पात्र अरुंद झाले असून उंची घरांपेक्षा वाढली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात नाल्याकाठच्या घरांमध्ये हाहाकार उडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या यंत्रणेने मात्र, अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.

केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मिडीयम टाऊन्स (युआयडीएसएसएमटी) या योजने अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे. शहराच्या विविध भागातून वाहणारे नाले भूमिगत करण्याची ही योजना आहे. त्यासाठी बहुतेक वसाहतींमधील ड्रेनेज लाइन बदलण्याचे काम तीन वर्षांपासून केले जात आहे. अनेक ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. नागरिकांनी घरांचे व दुकानांचे बांधकाम अनधिकृतपणे केले आहे. नाल्यांवरच्या अतिक्रमणांची संख्या मोठी असल्यामुळे अतिक्रमणे न पाडता मुख्य रस्ते खोदून त्यातून मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाइन टाकण्यात आल्या. ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले. खोदकाम केल्यानंतर निघालेली माती लांब नेऊन टाकण्यापेक्षा नाल्यातच टाकण्यात आली. नाल्यांमध्ये माती टाकल्यामुळे नाल्यांचे पात्र अरुंद झाले, अतिक्रमणांचे प्रमाणही वाढले. अरुंद झालेले नाल्याचे पात्र, त्यामुळे वाढलेली नाल्यांची उंची यामुळे नाल्याच्या काठी असलेल्या घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

महापालिका मुख्यालयाच्या शेजारून वाहणाऱ्या नूर कॉलनीच्या नाल्यामध्ये टाकण्यात आलेली मातीची भर स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे घरांपेक्षा नाल्याची उंची जास्त झाली आहे. पावसाळ्यात नाल्यातून वाहणारे या भागातील घरांमध्ये शिरणार आहे. या नाल्यातील मातीची भर काढून टाकून घरांना सुरक्षित करावे या मागणीसाठी नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले, पण त्याची दखल अद्याप घेण्यात आली नाही. महापालिका मुख्यालयाच्या शेजारून वाहणाऱ्या नाल्याची जशी अवस्था आहे तशीच अवस्था शहानूरवाडी नाला, जयभवानीनगरचा नाला, बारुदगर नाल्याचा काही भाग, कटकटगेट परिसरातील नाल्याची झाली आहे. या नाल्यांचे पात्र देखील ‘भूमिगत’ च्या कामामुळे अरुंद झाले आहे. भूमिगत गटार योजनेचे काम करताना मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाइन टाकण्यात आल्या, पण त्या एकमेकांना जोडल्या नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात या ड्रेनेजलाइन चोकअप होण्याची शक्यता आहे. भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून नाले भूमिगत करण्याच्या कामाचा फटका नाल्यांकाठच्या वसाहतींना बसणार असून भूमिगत गटार योजनेचे काम या वसाहतींसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

चौकट

बहुजन विकासचे आंदोलन

महापालिका मुख्यालयाच्या शेजारून वाहणाऱ्या नूर कॉलनीच्या नाल्यातील मातीची भरती काढण्यात यावी. नाल्याच्या काठावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसाठी बहुजन विकास अभियानचे अध्यक्ष सय्यद साबेर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी वारंवार आंदोलन केले, पण त्याची दखल महापालिकेच्या यंत्रणेने अद्याप घेतली नाही.

आयुक्तांनी समिती नेमावी

भूमिगत गटार योजनेसाठी खोदकाम केल्यावर ज्या नाल्यांमध्ये माती टाकण्यात आली व मातीमुळे ज्या नाल्यांचे पात्र अरुंद झाले व उंची वाढली त्या नाल्यांच्या सर्वेक्षणासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांची समिती नेमावी. नाल्यांची उंची वाढल्यामुळे पावसाळ्यात नाल्याकाठची अनेक घरे पाण्याखाली जाणार आहेत ही बाब लक्षात घेवून अपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून नाल्यांचे सर्वेक्षणाचे, नाल्याची रुंदी वाढवून पात्र मोठे करण्याचे काम आयुक्तांनी युद्धपातळीवर करून घेतले पाहीजे. नाला विभागासाठी स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती करावी.

राजेंद्र दाते पाटील, समाजिक कार्यकर्ते

निकषानुसार काम झाले नाही

भूमिगत गटार योजनेचे काम निकषानुसार झाले नाही. खोदकाम केल्यावर निघालेला मलबा उचलून दूसरीकडे नेऊन टाकण्यासाठी एकूणच कामामध्ये तरतूद करण्यात आली आहे. ३३६.७६ रुपये प्रति क्युबिक मीटर असा हा दर आहे. मलबा वाहून नेण्यासाठी तरतूद केलेली असताना तो वाहून न नेता नजिकच्या नाल्यांमध्ये टाकण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात नाल्या काठच्या घरांमध्येच पाणी जाईल असे नाही तर आजूबाजूच्या वसाहती देखील बाधीत होतील. पावसाळ्याच्या तोंडावर आयुक्तांनी याची दखल घ्यावी व योग्यप्रकारे काम करून घ्यावे.

समीर राजूरकर, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४५ लाखांची जमीन खरेदीत फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन एकर शेती खरेदी विक्री प्रकरणात व्यवसायिकाची ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इसार पावती व्यवसायिकाच्या नावे, तर रजिस्ट्री एजंटाच्या नावाने करण्यात आली. ही घटना २५ फेब्रुवारी २०१५ ते २६ फेब्रुवारी २०१७ दरम्यान घटना घडली. याप्रकरणी जमिनीच्या मूळ मालकासह पाच जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंजबिहारी जुगलकिशोर अग्रवाल (वय ५७, रा. रामगिरी हॉटेलसमोर, एन ३, सिडको) यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. अग्रवाल यांनी सुरेश बसैये यांची बाळापूर येथील दोन एकर जमीन खरेदीचा करार केला होता. बसैये यांनी जमिनीची इसारपावती अग्रवाल यांना करून देत त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले. अग्रवाल यांनी बसैये यांना वारंवार रजिस्ट्री करून देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान, अग्रवाल यांनी माहिती घेतली असता या जमिनीची रजिस्ट्री या प्रकरणातील एजंट अफजल पटेल याच्या नावावर करून देण्यात आल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून जमिनीचा मूळ मालक सुरेश बसैये, एजंट अफजल पटेल, आजम पहेलवान, काशीनाथ नगराळे व सुखदेव घुगे यांच्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत शुक्रवारी १५ कर्मचारी लेटलतिफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या धडक तपासणी मोहिमेच्या पाचव्या दिवशीही तब्बल १५ कर्मचारी लेटलतिफ आढळून आले. सलग चार दिवस कारवाई करूनही कर्मचारी उशिरा येत असल्याने पुढच्या आठवड्यापासून कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हा परिषद कार्यालयात वेळेत हजर राहणे बंधनकारक आहे. कर्मचारी उशिराने दाखल होत असल्याची वारंवार तक्रार होत होती. सीईओ मधुकरराजे अर्दड यांनी सोमवारी अचानक तपासणी केली असता अर्धे कर्मचारी जिल्हा परिषद गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यानंतर मंगळवार, बुधवार व गुरुवारी सातत्याने सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी प्रत्येक विभागात जाऊन अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यात सातत्याने अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे दिसून आले. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन समज देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी काही कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या. एखादा कर्मचारी सलग तीन दिवस गैरहजर राहिले, तर त्याचा शेरा सेवापुस्तिकेवर घेण्यात येणार आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी विभागांना भेटी दिल्या. त्यात १५ कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे दिसून आले. विभागनिहाय कर्मचारी संख्या पुढीलप्रमाणे ः पाणीपुरवठा व स्वच्छता १, समाजकल्याण ३, आरोग्य १, सिंचन १, महिला व बालकल्याण २, कृषी २, पाणीपुरवठा १, पशुसंवर्धन १, शिक्षण ३.

उशिरा आलेले कर्मचारी
सोमवार ः १६२
मंगळवार ः ७३
बुधवार ः ५१
गुरुवार ः ४२
शुक्रवार ः १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅट विक्रीत सव्वा कोटीची फसवणूक

$
0
0

औरंगाबाद ः प्रथमेश कन्सट्रक्शनचे मालक प्रफुल्ल मांडे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी सातारा व क्रांती चौकात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या दोन प्रकरणात मांडे यांनी सव्वा कोटीची फसवणूक केली आहे. यामध्ये सुंदरवाडी येथील जमीनमालकाचे सात फ्लॅट परस्पर विकत ७० लाखांची तर समर्थनगर येथील नागरिकाची फ्लॅट देतो असे सांगत ५० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी प्रफुल्ल मांडेला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अक्षय माधवराव दोमकोंडवार (वय ४२ रा. उषाकिरण अपार्टमेंट, ज्ञानेश्वर नगर, गारखेडा) व त्यांचे मित्र गणेश धुलजी मेहता (रा. न्यू शांतिनिकेतन कॉलनी) यांनी जून २०११मध्ये सुंदरवाडी येथे जमीन खरेदी केली होती. ही जमीन विकसित करण्यासाठी त्यांनी प्रथमेश कन्सट्रक्शनचे मालक प्रफुल्ल मधुकरराव मांडे (रा. गुरूसहानीनगर, एन-चार, सिडको) यांना दिली होती. यासंदर्भात रजिस्ट्री कार्यालयात करारनामा करण्यात आला होता. यामध्ये ५३ टक्के बांधकाम दोमकोंडवार व मेहता यांना, तर उर्वरित ४७ टक्के बांधकाम मांडे यांनी ठेवायचे असे ठरले होते. या करारानुसार दोमकोंडवार यांच्या वाट्याला दोन दुकाने, सात फ्लॅट आले होते. दरम्यान, दोमकोंडवार हे ‌इंटरनेटवर त्यांच्या मिळकतीची पाहणी करीत असताना त्यांच्या वाट्याचे सात फ्लॅट मांडे यांनी परस्पर विक्री केल्याचे दिसून आले. बनावट कागदपत्र तयार करून सातारा परिसरातील रजिस्ट्री कार्यालयात नोंदणीकृत खरेदीखत व इसार पावती करून ही फसवणूक करण्यात आली. ३१ ऑगस्ट २०१५ ते १८ ऑक्टोंबर २०१६ या कालावधीत हा प्रकार घडला असून, यामध्ये दोमकोंडवार यांची ७० लाखांची फसवणूक झाली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी प्रफुल्ल मांडेविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फ्लॅट विक्रीत ५० लाखांची फसवणूक
आरोपी मांडे याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. दीपक इंद्रराव पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली. पवार यांच्या वडिलांनी एप्रिल २०१२मध्ये मांडे यांच्या उदय कॉलनी येथील बांधकाम साइटवर फ्लॅट बुक केला होता. हा व्यवहार ६१ लाखांमध्ये ठरला होता. या फ्लॅटची इसारपावती देखील करण्यात आली होती. इंद्रराव पवार यांनी ५० लाख रुपयांची रक्कम मांडे यांना दिली होती. दरम्यान, वृद्धापकाळाने मार्च २०१४मध्ये इंद्रराव पवार यांचे निधन झाले. दीपक पवार यांनी फ्लॅट ताब्यात देण्यासाठी वारंवार मांडे यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र मांडे यांनी टाळाटाळ केली. अखेर याप्रकरणी दीपक पवार यांच्या तक्रारीवरून मांडे याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उज्वला योजनेतून ४० हजार घरे धूरमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यावरणाचे रक्षण आणि महिलांचे आरोग्य यांच्यासाठी पंतप्रधान उज्वलायोजनेमधून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्ये तीनही गॅस कंपन्यांमार्फत दिलेल्या गॅस कनेक्‍शनमुळे तब्बल ४० हजार स्वयंपाकघर धूरमुक्त झाले आहेत. यंदाही औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी प्रत्येकी २० हजार गॅस वाटपाचे उद्दीष्ट आहे.
ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य धुरामुळे धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत चालला आहे. महिलांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये पहिल्यावर्षी देण्यात आलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले आहेत.
दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांतील महिलांना गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करता यावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ मे २०१६ रोजी उत्तरप्रदेशातील बलिया येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर ६० टक्यांपेक्षा कमी कनेक्शन असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देत या जिल्ह्यांमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांना देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ७२ टक्के कुटुंबांकडे गॅस असल्यामुळे २०१६ - १७ मध्ये औरंगाबादला २० हजार कनेक्शनचे उद्दिष्ट मिळाले. तसेच जालन्यात गॅस कनेक्शनधारक कुटुंबांची संख्या औरंगाबादच्या तुलनेत खूप कमी आहे. जालना जिल्ह्यात कनेक्‍शन धारकांची संख्या ३५ टक्के असल्याने या ठिकाणी जास्त उद्दिष्ट देण्यात आले होते. वर्षभरात औरंगाबाद जिल्ह्यात १९२८१ तर जालन्यात २०२३४ असे एकूण ३९५१५ कुटुंबांना उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांच्या नावे गॅस कनेक्‍शन देण्यासाठी २०११ मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक जनगणना यादीचा आधार घेण्यात आला आहे. शासनाचे २०१९ पर्यंत ९५ टक्के कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभूराजांच्या कार्याची प्रेरणा घ्या : सुळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आपल्या संघर्ष काळात संकटांसमोर शरणागती न पत्करता शंभूराजांनी संकटांचा मुकाबला केला. रयतेकडेही संरक्षण करीत असताना अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात व्यासंग वाढवून ग्रंथ लेखन केले. १४ भाषा आत्मसात असलेल्या शंभूराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तरुणांनी भविष्य घडवावे,’ असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सवात त्या बोलत होत्या.
छत्रपती संभाजीराजे युवा मंच यांच्या वतीने सुशीलादेवी देशमुख विद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी संभाजीराजे जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार सुळे, वक्ते प्रदीप सोळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ, स्वागताध्यक्ष सुधाकरराव गायकवाड, प्रदेश प्रवक्ते नीलेश राऊत, पंजाबराव तौर, सदाशिवराव जाधव यांची उपस्थिती होती.
सद्यस्थितीत आव्हानात्मक परिस्थितीत सर्व तरुणांनी थोरांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी. महिलांचा आदर करणारे आणि रयतेची काळजी घेणारे छत्रपती संभाजीराजे तरुणांसाठी आदर्श आहेत. हा आदर्श बाळगून वाटचाल करावी असे सुळे म्हणाल्या. तर सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी जयंती साजरी करा, असे आवाहन सोळुंके यांनी केले.
‘जयंती साजरी करण्याचे तीन हेतू असतात. पैसे गोळा करून मिरवणूक काढणे, खोटा इतिहास सांगून समाजात द्वेष पसरवणे आणि खरा इतिहास सांगून समाजात एकात्मता निर्माण करणे. महामानवांचा इतिहास सांगून समाजात एकात्मता निर्माण करण्याची गरज आहे,’ असे सोळुंके म्हणाले.
यावेळी चित्रकार कोमल रंधे व राष्ट्रीय खेळाडू पूजा सोळंके यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन अमोल रंधे, अक्षय सोळुंके व भागवत गाठाळ यांनी केले होते. प्रा. समाधान इंगळे आणि अमरजीत इंगळे यांच्या शाहिरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला पद्माकर देशमुख, अभिनेत्री अश्विनी भालेकर, सत्यभामा पाटील, लता गावंडे, संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड, आत्माराम शिंदे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

जयघोष शंभूराजांचा
सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी दरवर्षी छत्रपती संभाजीराजे युवा मंच यांच्या वतीने जयंती उत्सव आयोजित केला जातो. सर्वांना सामावून घेणारा जयंती उत्सव लक्षणीय ठरला. छत्रपती शंभूराजांचा जयघोष करताच अवघा परिसर दुमदुमून गेला. या उत्सवात आबालवृद्ध उत्साहाने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ रेणापुरात भाजपला सर्वाधिक जागा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
रेणापूर नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रीक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून बाजी मारली असली तरी एका जागेमुळे स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही.
१७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपचे आठ, काँग्रेसचे पाच आणि पुरस्कृत एक, राष्ट्रवादी काँग्रेस एक, अपक्ष दोन असे उमेदवार विजयी झाले आहेत. दोन अपक्षापैकी गजेंद्र चव्हाण हे भाजपाचे बंडखोर उमेदवार आहेत.
विजयी उमेदवारामध्ये भाजपाचे अभिषेक अकनगिरे, जमुनाबाई राठोड, गोजरबाई आवळे, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, उज्वल कांबळे, सुरेखा चव्हाण, आरती राठोड यांचा समावेश आहे. काँग्रेसचे विजयी उमेदवार अनिल पवार, शीला मोटेगावकर, शिवाजी पाटील, रझीयाबी शेख, कोमल राजे, आणि काँग्रेस पुरस्कृत रामलिंग जोगदंड यांचा समावेश आहे. अपक्ष सुमन मोटेगावकर, गजेंद्र चव्हाण यांनी बाजी मारली.
अनिल पवार या काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रभागातील लोकांनी वर्गणी गोळा करून निवडणुकीचा खर्च केला आणि त्यांना विजयी केले.
या निवडणुकीसाठी भाजपकडून रमेश कराड आणि काँग्रेसच्यावतीने आमदार त्र्यंबक भिसे यांनी परिश्रम घेतले होते. भाजपला सत्ता घेण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची मदत कराड यांना घ्यावी लागणार असून त्यांनी ठरवले तरच सत्ता येईल. या चर्चेसोबतच निष्ठावंत बाजुला राहिले तर काय होते, अशी चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात रेणापूरच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवघ्या एक मताने विजय
भाजपच्या आरती राठोड या अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार स्वाती कोल्हे यांना २८२ मते मिळाली असून आरती राठोड यांना २८३ मते मिळाली. त्यामुळे राठोड या एक मताने विजयी ठरल्या. विशेष म्हणजे या प्रभागात नोटाला तीन मते नोंदवली गेली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्ली-मुंबईच्या पथकाकडून पाहणी; नैसर्गिक अपघाताचा गुन्हा

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, निलंगा/लातूर

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नागरी उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) मुंबई व नवी दिल्ली येथील पथकांनी शुक्रवारी निलंगा येथे अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची तपासणी केली. दरम्यान, निलंगा पोलिस ठाण्यात नैसर्गिक अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गुरुवारी दुपारी बाराला मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर निलंगा येथे गुरुवारी कोसळले. त्यातून ते थोडक्यात वाचले. उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे पायलटने हेलिकॉप्टर खाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेच्या तारेला अडकल्याने ते कोसळले. या अपघाताची गंभीर दखल घेऊन ‘डीजीसीए’ने चौकशी सुरु केली आहे.

‘डीजीसीए’चे सहायक संचालक यशपाल यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम रेड्डी यांच्यासह पाच जणांचे चौकशी पथक शुक्रवारी सकाळी निलंग्यात दाखल झाले. त्यांनी हेलिकॉप्टरची कसून तपासणी करून आवश्यक त्या नोंदी केल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे पाटील यांनी सांगितले. तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. जी. वैष्णव आदी या पाहणीप्रसंगी उपस्थित होते.

पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. तसेच अपघातस्थळ व परिसराची पाहणी करुन जागेची मोजमापे घेतली. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरचे इंजिन, पंखे व अन्य भाग तपासले. हेलिपॅडपासून अपघातस्थळाचे अंतर मोजले. विद्युत ट्रान्सफॉर्मरही पाहिला. अपघात कशामुळे झाला, हेलिपॅडची जागा योग्य होती का, पुरेसे पाणी मारले होते का, हेलिपॅड तयार झाल्यानंतर त्याची पाहणी कोणी केली होती का, अभिप्राय कोणी दिला, सुरक्षेची जबाबदारी कोणावर होती आदी प्रश्न पथकाने

संबंधित यंत्रणांना विचारले.

..

हेलिकॉप्टर तिथेच

...

दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हलवण्यासाठी वेळ लागणार असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. निलंगा नगरपालिकेने त्यासाठी आठ कर्मचारी नियुक्त केले आहेत. शिवाय तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनाही नियुक्त करण्यात आल्याचे तहसिलदारांनी सांगितले.

...

ब्लॅक बॉक्स ताब्यात

मुंबईच्या पथकाने सकाळी दहाला हेलिकॉप्टरच्या बाहेरील बाजूची पाहणी केली. त्याशिवाय परिसराची पाहणी करीत घटनास्थळाची छायाचित्रे घेतली. दिल्ली येथील पथकाने दुपारी चारनंतर हेलिकॉप्टरच्या आतील बाजूची पाहणी केली. यावेळी त्यांनी ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला असून त्यामुळे अपघाताचे नेमके कारण समजू शकणार आहे. ‘डीजीसीए’चे उपसंचालक जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पाहणी केल्याचे भवानजी आगे यांनी ‘मटा’ला सांगितले.

इरफान चर्चेत

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर इरफान शेख यांनी जवळ जात मदत कार्य केले. अपघातस्थळापासून जवळच त्याचे भंगाराचे दुकान आहे. अपघात झाला तेव्हा तो दुकानात उभा होता. त्याने हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. प्रसारमाध्यमात याबाबतचे वृत्त आल्यानंतर निलंग्यात इरफान चर्चेत आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ विलासराव यांच्या जयंती निमित्त अभिवादन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ७२ व्या जयंती निमित्ताने बाभळगाव येथील त्यांच्या समाधीस्थळावर प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह शासकीय अधिकारी, काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
लातूर जिल्ह्यातील साखर कारखाने, सहकारी बँक, काँग्रेस भवनात अभिवादन करण्यासाठी त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
१६० पेशंटची तपासणी
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील पोद्दार हॉस्पिटल अ‍ॅक्सिडेंट अ‍ॅण्ड ट्रामा केअर सेंटरमध्ये शुक्रवारी मोफत अस्थिरोग व हाडांचा ठिसूळपणाची तपासणी व मोफत औषध शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १६० रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधींचे मोफत वाटप करण्यात आले.
प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार अरूण समुद्रे, डॉ. चेतन सारडा, डॉ. अशोक पोद्दार, लक्ष्मीकांत कर्वा, प्रसाद उदगीरकर, श्याम धूत, देशपांडे आदिंची उपस्थिती होती. या शिबिरात डॉ. अशोक पोद्दार, डॉ. नितीन सास्तूरकर, डॉ. राजकुमार दाताळ, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. परमेश्वर फड, डॉ. तेजश्री हमने, डॉ. प्रशांत अंभोरे यांनी रुग्णांची तपासणी केली. तपासणी करण्यात आलेल्या सर्व रुग्णांना औषधे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय पेन्शनधारकांना वेतन आयोगाचा फरक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. निवृत्ती वेतनधारक केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार आहे, असे भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्त एम. एच. वारसी यांनी सांगितले.
भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (ईपीएफओ) देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनासंदर्भात पेन्शनधारकामंध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. ते दूर करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी विभागीय आयुक्तांनी पेन्शन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी पेन्शनधारंकाच्या सर्व समस्यांचे निरासरन केले. सिडके येथील बँक ऑफ महाराष्ट्रेच्या सभागृहात शुक्रवारी बैठक झाली. सहाय्यक आयुक्त विवेक रेड्डी, वामन नंदनवाड, अधिकरी अनिल टाकळकर यांच्यासह ईपीएस ९५ संलग्न असलेल्या राष्ट्रीय समन्वय समिती, इंटक, आयटक यासह विविध संघटनांचे प्रतिनिधीसह मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते.
पेन्शनधारकांमध्ये विविध माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात आहे. यामुळे पेन्शनधारकांमध्ये सभ्रंम निर्माण झाला आहे. पेन्शनचा अतिरिक्त लाभ मिळणार (वेटेज), निवृत्ती वेतनात वाढ होणार यासह अन्य काही गैरसमज पसरविले जात असल्याचे वारसी यांनी नमूद केले.
किमान २० वर्षे सेवा केली व ५८व्या वर्षीनंतर पेन्शन घेतलेले पेन्शनधारक सर्व्हिस वेटेजसाठी पात्र असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला असून, निवृत्तधारक केंद्रीय कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम (एरिअर्स) मिळेल, असेही त्यांनी स्पस्ट करत पेन्शर्सधारकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकाचे त्यांनी निरासरन केले.

‘दलालांवर कारवाई करू’
वाढीव वेटेजवरून अनेक दलाल पेन्शनधारकांकडून १०० रुपयाचा फार्म भरून पेन्शन मिळवून देण्याचा धंदा करतात, अशी चर्चा आहे. कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असेल, तर नागरिकांनी पीएफ कार्यालयाशी संपर्क साधवा. दलालावर कठोर कारवाई केली जाईल. पेन्शनसंदर्भात काही प्रश्न असतील, तर कार्यालयात संपर्क साधवा, असे आवाहन वारसी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गायकवाडने तपासले गर्भपात केंद्र, हॉस्पिटल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिन्सीत बेकायदा गर्भपात केंद्र चालविण्याच्या प्रकरणातील आरोपी डॉ. चंद्रकला गायकवाड गेल्या वर्षभरापासून चक्क महापालिकेच्या गर्भपात केंद्र तपासणी पथकात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यांचे बेकायदा गर्भपात केंद्र उघड झाल्यानंतर त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.
डॉ. चंद्रकला गायकवाड यांनी महापालिकेत वैद्यकीय अधिकारी ३० वर्षांहून अधिक सेवा केली. त्यांची सेवा जिन्सी परिसराच्या आरोग्य केंद्रातच झाली होती. २०१३मध्ये त्या निवृत्त झाल्या. गेल्या वर्षी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी त्यांना एनआरएचएम योजनेत मानधनावर सेवेत घेतले होते. महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांवरील डॉक्टर रजेवर गेल्यास त्यांना प्रभारी म्हणून तेथे पाठविण्यात येत होते. सध्या त्या हर्सूल येथील आरोग्य केंद्रावरही कार्यरत होत्या.
१५ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत शहरात धडक मोहीम राबवून सर्व प्रसुती रुग्णालयांची, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करावी, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने वेगवेगळी पथके स्थापन केली होती. डॉ. अंजली पाथ्रीकर यांच्या पथकात डॉ. चंद्रकला गायकवाड यांचाही समावेश होता. त्यांनी शहरातील अनेक रुग्णालये, गर्भपात केंद्रांची तपासणी केली. विशेष बाब म्हणजे ही सर्व तपासणी सुरू असताना डॉ. गायकवाड यांचे स्वत:चे बेकायदा गर्भपात केंद्र सुरू असेल, असा कोणालाही सशंय आला नाही.

दहा बाय दहाच्या खोलीत गर्भपात केंद्र
अनेक वर्षांपासून जिन्सी रोडवर दहा बाय दहा आकाराच्या एका खोलीत डॉ. गायकवाड अनधिकृत गर्भपात केंद्र चालवित होत्या. आतापर्यंत हजारो गर्भपात त्यांनी केले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. पोलिस त्या तपास पोलिस करीत आहेत. डॉ. गायकवाड यांच्या मदतनीस शांताबाई गोकुळ सातदिवे उर्फ चंदा खरे महापालिकेच्या आरोग्य विभागातच सेविका म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर डॉ. गायकवाड यांची एनआरएचएममधील सेवा कायमची संपविण्यात आली आहे. त्याबरोबरच शांताबाई सातदिवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

केंद्रांमध्ये रुग्णांची बनावट माहिती
अनधिकृत गर्भपात प्रकारातील मुख्य सूत्रधार डॉ. गायकवाड यांच्या केंद्रातील रुग्णांची बहुतांशी नोंदी या बनावट आहेत. त्यामुळे किती रुग्णांचे अनधिकृत गर्भपात झाले हे स्पष्ट होत नाही. गायकवाड या स्वतः डॉक्टर असल्याने शहरातील अनेक डॉक्टरांशी तिची ओळख होती. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. आणखी काही धागेदोरे सापडतील शक्यता आहे असे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ गेले; वसुली कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करार रद्द केल्यानंतर समांतर जलवाहिनीचा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (पीपीपी) तत्त्वावर होणार नाही, हे स्पष्ट झाले, पण या प्रकल्पासाठी केलेली दरवाढ व नागरिकांवर लादलेल्या अटी मात्र कायम आहेत. नवीन नळ कनेक्शन घेताना तीन महिन्यांची पाणीपट्टी ‘अॅडव्हान्स’ भरण्याची सक्ती ‘समांतर’ कंपनीतर्फे केली जात होती, हेच धोरण पालिकेच्या प्रशासनाने पुढे सुरू ठेवले आहे. त्यामुळे ‘अॅडव्हान्स’ पाणीपट्टी भरल्याशिवाय नवीन कनेक्शन मिळत नाही. ही पाणीपट्टी ‘ इन्स्पेक्शन चार्जेस’ म्हणून आकारली जात आहे.
समांतर जलवाहिनीचा करार रद्द झाल्यामुळे पाणीपुरवठा महापालिकेच्या ताब्यात आला आहे. महापालिकेने कंपनीकडून पाणीपुरवठा ताब्यात घेतलेला असला, तरी कर आकारणी कंपनीच्या काळात ठरविण्यात आलेल्या नियमांप्रमाणे आणि दरानुसारच केली जात आहे. पाणीपट्टीत दरवर्षी केली जाणारी दहा टक्के वाढ कायम ठेवण्यात आली आहे. ही वाढ रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला व प्रशासनाला तसे आदेश दिले, पण प्रशासनाने अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही.
नवीन नळकनेक्शन देण्यासाठी तीन महिन्यांची पाणीपट्टी इन्स्पेक्शन चार्जेस म्हणून आगाऊ भरून घेण्याचे कंपनीबरोबर केलेल्या करार ठरविण्यात आले होते. पाणीपुरवठ्या संबंधिच्या उपविधीमध्ये त्याचा उल्लेख आहे. या उपविधीला शासनाने मान्यता दिली. समांतर जलवाहिनीचा करार रद्द केल्यावरही महापालिका उपविधीप्रमाणेच काम करीत आहे. नवीन नळकनेक्शनसाठी आगाऊ पाणीपट्टी भरून घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक बोजा पडत आहे. समांतर जलवाहिनीचा करार होण्यापूर्वी नवीन कनेक्शनसाठी आगावू पाणीपट्टी भरून घेतली जात नव्हती, असे सूत्रांनी सांगितले.

इन्स्पेक्शन चार्जेस
नळ कनेक्शन.....निवासी दर.....इन्स्पेक्शन चार्जेस
अर्धा इंची............४०५०............१०१३
पाऊण इंची.........६४००............१६००
एक इंची.............१४,९००..........३७२५
दीड इंची............६५,२५०.........१६३१३
दोन इंची............१,०८,७००........२१,१७५
तीन इंची............१,७३,९५०........४३,०८८
चार इंची.............२,६०,०००........६५,२२५
सहा इंची............४,३४,८५०.......१,०८,७१३
आठ इंची...........६,५२,३००........१,६३,०७५
(पाणीपट्टी रुपयांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेदरम्यान दलाई लामा यांचा फोटो बाळगू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कैलास मानसरोवर यात्रेकरूंनी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांचे छायाचित्र, लिखित साहित्य बाळगू नये अथवा बाळगू नये, असे चीनने स्पष्ट केले आहे. संवेदनशील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ल्हासा येथील चायना इंडियन पिलिग्रीम सर्व्हिस सेंटर या संस्थने यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे कैलास मानसरोवरसाठी यात्रा घडवून आणणाऱ्या टूर्स कंपन्या आता यात्रेकरूंना खबरदारी घेण्यास सांगत आहेत.
कैलास मानसरोवर यात्रेकरूंमध्ये दरवर्षी वाढ होते आहे. वेगवेगळ्या बॅचेसमध्ये हे यात्रेकरू यात्रेसाठी जातात. नेपाळमार्गे तिबेटमध्ये जाणाऱ्या भाविकांना चीनच्या नव्या निर्बंधाचा सामना करावा लागणार आहे. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेश प्रवेशाला चीनने विरोध केला होता. उभय देशांच्या संबंधावर परिणाम होईल, असे चीनने म्हटले होते. आता कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान यात्रेकरूंकडे दलाई लामा यांचे चित्र सोबत बाळगू नये, त्यासह लिखित साहित्य, व्हिडिओ बाळगता कामा नये, असे चीनने स्पष्ट केले आहे. नेपाळमधील टूर एजंटांमार्फत भारतीय टूर कंपन्यांना हे पत्र देण्यात आले आहे. या कंपन्यांनी यात्रेकरूंना याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

... तर बंदी, काळ्या यादीत टाकू
चिनी लष्काराला काही संशयास्पद वस्तू आढळल्या होत्या. त्यानंतर काही प्रवाशांना परत पाठविण्यात आले होते, असे पत्रात म्हटले. त्यामुळे संवेदनशील राजकीय पार्श्वभूमीवर दलाई लामा यांचे चित्र, साहित्य यात्रेकरूंनी बाळगू नये, अशी काळजी घ्यावी, असे पत्रात म्हटले आहे. तसे आढळले, तर टूर कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे. २२ मे रोजी हे पत्र काढण्यात आलेले आहे. त्यामुळे भारतातील टूर्स कंपन्या खबरदारी घेत आहेत.

कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंकडे दलाई लामा यांचा फोटो, त्यांच्याशी निगडित साहित्य बाळगू नये असे, सूचना देणारे पत्र आम्हाला नेपाळमधील टूर्स एजंटांकडून मिळाले आहे. त्या पत्रात यात्रेकरूंना दिलेल्या सूचनांमध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. आम्ही प्रत्येक यात्रेकरूला ते पत्रही दिले आहे.
- मंगेश कपोते, टूर ऑपरेटर, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेलिपॅड’मध्ये राजकीय हस्तक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एखाद्या कार्यक्रमासाठी नेतेमंडळीसाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणाऱ्या हेलिपॅडसाठी असलेले निकष धाब्यावर बसविले जातात. अनेक ठिकाणी स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना अधिक त्रास होतो. अशाच आग्रहामुळेच निलंग्यासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता असते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी निलंगा (जि. लातूर) दौऱ्यावर होते. कार्यक्रम आटोपून ते हेलिकॉप्टरने जात असताना काही उंचीवर जाताच हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातातून मुख्यमंत्री बचावले. त्यानंतर हेलिकॉप्टर, हेलिपॅडची तपासणी आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे. निलंग्यात ज्या ठिकाणी हेलिपॅड केले होते. त्या जागेच्या आजुबाजुला विजेच्या तारा होत्या. बाजूला एक ट्रक उभा होता. हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जे निकष असतात. ते येथे पाळले गेले नाहीत, हे स्पष्टपणे दिसून आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; निलंगा येथे हेलिकॉप्टरने येणाऱ्या नेतेमंडळींसाठी आजवर हीच जागा हॅलिपॅडसाठी निश्चित केली जात होती. आजुबाजुचा परिसर रिकामा असावा, असे अपेक्षित असतानाही ही जागा कशी काय निवडली जात होती, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
सर्वसाधारणपणे हेलिपॅड उभारताना नेत्याच्या कार्यक्रमस्थळाजवळच्या परिसराला प्राधान्य दिले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना साइट निवडीचे अधिकार असतात. नेमक्या याच ठिकाणी स्थानिक राजकीय हस्तक्षेपाचा फटका अधिकाऱ्यांना बसतो आणि धोकादायक साइट निवडल्या जातात. काळी माती, मुरूम, पांढरी माती यांचे परीक्षण करून हेलिपॅडसाठी जागा निवडतात. हेलिपॅडच्या ३० मीटरचा परीघात कोणतेही अडथळे नसावेत.
अधिकाऱ्यांना जागा निवडीचे फारसे स्वातंत्र्य नसणे, राजकीय हस्तक्षेपाला विरोध करण्यास येणाऱ्या अडचणींमुळे हॅलिकॉप्टरच्या अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यातूनच निलंगा येथील प्रकार घडला असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. सरकारी पातळीवर या दुर्घटनेची चौकशी होईलच, पण भविष्यात हेलिपॅड उभारणीसाठी अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य असावे, अशी मागणी आता अधिकाऱ्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

निकष डावलून हेलिपॅडची उभारणी करू नये. निलंग्यात हेलिपॅड उभारणीत निकष डावलले गेले असतील तर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. हेलिपॅड उभारणीत सहसा राजकीय हस्तक्षेप केला जात नाही.
- आमदार सतीश चव्हाण, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0



परभणी : कर्जबाजारीपणामुळे दोन दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण, लोणी आणि सिमुरगव्हाण तर पूर्णा तालुक्यातील देगाव या ठिकाणी या घटना घडल्या.
पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथे परमेश्वर बन्सीधर घाडगे (वय ४५) या शेतकऱ्याने शनिवारी सकाळी घरातील माळवदाच्या कडीला गळफास घेतला. घांडगे यांच्यावर बँकेचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे या चिंतेत त्यांनी आत्महत्या केली. अमोल घांडगे यांच्या माहितीवरून पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद झाली. दुसरी घटना तालुक्यातीलच लोणी बु. येथे घडली. मारोती निवृत्ती रासवे (५२) यांनी शुक्रवारी रात्री ८.३० वाजता विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांनी घराच्या छतावर जाऊन विष घेतल्यामुळे, उशिरापर्यंत कोणाच्याच लक्षात आले नाही. त्यांना तात्काळ परभणी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे चार एकर जमीन असून, बँक सोसायटीचे कर्ज होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसरी घटना शुक्रवारी सकाळी पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथे घडली. या ठिकाणच्या कैलास बाळासाहेब उगले (२५) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच सभोवतालच्या शेतकऱ्यांनी त्यांना पाथरीच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सततची नापिकी आणि कर्जाचे हप्ते या चिंतेत त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.
याशिवाय, पूर्णा तालुक्यातील देवगाव येथे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शेतातील झाडाला वैजनाथ बाबुराव वळसे (४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बँकेचे आणि खासगी कर्ज होते. तसेच नापिकीमुळेही ते त्रस्त होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली.
मराठवाड्याच्या अन्य भागांमध्ये असणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण परभणी जिल्ह्यामध्येही पसरले आहे. मराठवाड्यामध्ये चार वर्षांच्या दुष्काळानंतर, गेल्या वर्षी पावसाने हजेरी लावली. मात्र, शेतमालाच्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमध्येही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढविण्‍ाार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या वक्फ संस्था, मशिदी, दर्गा, अशुरखान्यांचे नूतनीकरण, दफनभूमीच्या संरक्षक भिंती व वक्फ मिळकतीचे उत्पन्न वाढविण्याकरिता दुकाने बांधण्यासाठी; तसेच नोंदणी व योजनांच्या कामांना वक्फ बोर्डाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख यांनी दिली.
मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीत खासदार हुसेन दलवाई, आमदार अब्दुल्ला खान उर्फ बाबाजानी दुर्राणी, मौलाना गुलाम वस्तानवी, हबीब फकीह, नवनिर्वाचित सदस्य इमतियाज काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी अजमतुल्ला कुरेशी यांची बैठकीसाठी उपस्थिती होती. १७ व १८ मे २०१७ रोजी झालेल्या बैठकीत ५८ ठराव व २५ मे रोजी झालेल्या बैठकीत काही ठराव वगळता २२ ठरावांना व प्रलंबित असलेली काही कामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्य वक्फ मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध वक्फ संस्थाच्या संबंधित असलेली मिळकतींवर शासकीय व निमशासकीय विभागाच्या अतिक्रमणासंबंधी विभागीय आयुक्तांबरोबर चर्चेनंतर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत मशिदी, दर्गा, आशुरखान्याचे नूतनीकरण, दफनभूमींना संरक्षण भिंती या कामांना मंजुरी देण्यात आली. वक्फ संस्थेचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यांना बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी सभा २३ ऑगस्ट २०१६ व ४ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली. १९९५च्या पूर्वी वक्फ बोर्डाशी संबंधित प्रकरणात धर्मदाय आयुक्तांकडे जमा असलेला बोर्डाचा पैसा परत मिळविण्यासाठीही कार्यवाही करण्याचा ही निर्णय बैठकीत घेतला आहे.
या बैठकीत लेखाअधीक्षक मुजफफर सिद्दिकी, बोर्डाचे विभागीय अधिकारी अतिक खान (पुणे), खुसरो खान (कोकण, मुंबई), सय्यद शाकेर (नागपूर), पठाण मुनीर (नाशिक), शफीक अहेमद (अमरावती), काझी शारेक, एम. ए. माजीद पटेल, काजी मिझबाओद्दीन, आसिफ शेख, अब्दुल अजिम यांची बैठकीत उपस्थिती होती.

दहा महिन्यांत पाचवी बैठक
वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख यांच्या १० महिन्यांच्या कार्यकाळातील ही पाचवी बैठक होती. मागील काही महिन्यांपासून काही न्यायलयीन प्रक्रियेमुळे बैठकीला मुहूर्त लागत नव्हता. मे महिन्यात सलग दोन बैठका आयोजित करून प्रलंबित सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवार सभेत सावेंकडे कर्जमाफीची मागणी

$
0
0

औरंगाबाद : सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी आमदार अतुल सावे यांच्याकडे शिवार संवाद सभेदरम्यान शनिवारी करण्यात आली.
केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना पोचविण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यात गुरुवारपासून शिवार संवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आमदार अतुल सावे यांनी कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा, पिशोर, शफियाबाद, तेलवाडी, देवपूळ, निपाणी आदी ठिकाणी शिवार सभा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कांद्याला हमी भाव द्यावा, कर्ज माफ करण्यात यावे, ठिंबक सिंचनाचे अनुदान ५०टक्क्यांवरून ७५ टक्के करावे, थकित अुनदान तातडिने द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा आदी यावेळी शेतकऱ्यांनी आमदार सावे यांच्याकडे केल्या.
शेतकऱ्यांसाठी; तसेच अन्य कल्याणकारी योजनांची आमदार सावे यांनी दिली. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याला प्राधान्य देण्याचे काम भाजप सरकार करत आहे. आमची बांधलकी नागरिकांशी आहे, असे प्रतिपादन आमदार सावे यांनी केले. संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, संजय खंबायते, डॉ. संजय गव्हाणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेलिकॉप्टरची तपासणी पूर्ण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन जाताना, अपघात झालेल्या हेलिकॉप्टरची शनिवारी तपासणी करण्यात आली. या हेलिकॉप्टरची तपासणी पूर्ण झाली असून, या तपासणीच्या अहवालानंतरच हेलिकॉप्टरविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.
फडणवीस गुरुवारी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. निलंगा येथील नियोजित कार्यक्रम संपवून मुंबईला परतत असताना, हे हेलिकॉप्टर कोसळले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच काही क्षणांतच ते विजेच्या तारेला अडकून जमिनीवर कोसळले. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टर फार उंचीवर नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, हेल‌िकॉप्टर एका घरावर कोसळल्याने आठ जण किरकोळ जखमी झाले होते. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिल्लीच्या पथकाने शनिवारी सकाळी पुन्हा अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी सुरू केली. या तपासणीत अपघात झाला त्यावेळचे नोंदवलेले तापमान, इंधनाचा साठा याचे मोजमाप करण्यात आले आहे. दुपारी बाराच्या सुमारास या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांना आमचे तपासणीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले आणि ते पथक हैदराबादमार्गे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे यांनी दिली.
डॉ. आगे म्हणाले, ‘या पथकाने सकाळपासूनच हेलिकॉप्टरची तपासणी सुरु केली होती. ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला होता. आता पुढील सर्व कार्यवाही नागरी उड्डाण संचालनालयाचा देखभाल दुरुस्ती विभाग करणार आहे. सायंकाळी उशिरा मुंबईतून देखभाल दुरुस्तीचे पथक निलंग्यात येईल आणि त्यानंतर प्रथम अपघातग्रस्त हेलीकॉप्टरमध्ये असलेले शिल्लक इंधन बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यात येईल. त्यानंतर हेलीकॉप्टर जागेवरुन कसे हलवायचे याचा निर्णय तांत्रिक पथक घेणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनधारकाला मारहाण; चौकशी करण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आकाशवाणी चौकात वाह‌तूक पोलिसांनी एका तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणाची चौकशी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सहायक आयुक्त सी. डी. शेवगण यांच्याकडे सोपविली आहे. या प्रकरणात वाहतूक पोलिसांची चूक अाढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सूचित केले.
आकाशवाणी चौकात बुधवारी आकाशवाणी चौकात सकाळी दहाच्या सुमारास एका वाहनधारकाला वाहतूक पोलिसांनी मारहाण केली. या घटनेची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे प्रकरण समोर आल्यानंतर वाहतूक पोलिस निरीक्षक अविनाश अघाव यांनी संबंधित तरुणाची मोटारसायकल ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केल्याची माहिती दिली होती.
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना यासंदर्भात विचारले असता, त्यांनी सांगितले की, वाहनधारकाला मारहाण केल्याच्या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांच्याकडे देण्यात आली आहे. याप्रकरणात संबंधित वाहनधारक दोषी असल्यास त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल, मात्र या प्रकरणात वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

आयुक्तांच्या निर्देशांचा विसर
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी औरंगाबाद पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मोहीम राबविण्यापूर्वी सर्व पोलिसांना त्यांनी निर्देश दिले होते. वाहनधारकांने वाद घातल्यास पोलिसांनी वाद घालू नये. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले होते, मात्र वाहतूक पोलिसांकडून या निर्देशाचे पालन होत नाही, असे चित्र या घटनेवरून दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थायरॉइडवर मात शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
थायरॉइड हा गंभीर नव्हे, तर साधा सोपा आजार आहे. तो आयोडिनशी संबंधित आजार आहे. त्यामुळे आयोडिनचे शरीरात योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. थोडीशी काळजी आणि नियमित तपासणी या दोन उपायांनी आपण थायरॉइडच्या विकारांमुळे होणारा त्रास टाळू शकतो. त्यावर सहजरित्या मात करणे शक्य आहे, अशी माहिती आंतरग्रंथी व मधुमेहतज्ज्ञ डॉ. हेमंत फटाले यांनी दिली.
सम्राट एंडोक्राइन इन्स्टिट्यूट व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शहर शाखेतर्फे जागतिक ‘थायरॉइड डे’निमित्त शनिवारी आयएमए हॉलमध्ये ‘चला जाणून घेऊ या थायरॉइड ग्रंथीविषयी’ या जनसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. डॉ. पुरुषोत्तम दरक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. डॉ. हेमंत फटाले, बालस्थूलता तज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले, आयएमएचे सचिव डॉ. संतोष रंजलकर डॉ. यशवंत गाडे आदी उपस्थित होते.
आजकाल थायरॉइड ग्रंथीचे आजार इतके सर्वसामान्य झाले आहेत. दहा जणांमध्ये दोघांना हा आजार होतो. आजारात आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमधून पुरेशा मात्रेमध्ये थायरॉइडचा हार्मोन तयार होत नाही. हे हार्मोन शरीराच्या सर्वांगीण चयापचयासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या एकंदरित चयापचयाचा वेग हा थायरॉइडवर अवलंबून असतो, असे सांगत डॉ. फटाले यांनी थायरॉइड आजार आयोडिनशी संबंधित आहे. थायरॉइडशी संबंधित विकार आहे. याविषयी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक असल्याचे नमूद केले.
गरोदर मातांच्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास जन्माला येणाऱ्या बाळात थायरॉइड ग्रंथीशी समस्या आढळू शकतात.
वजन वाढणे, नैराश्य, एनर्जी, उत्साहाचा अभाव, चिडचिडपणा, मासिक पाळीसंदर्भात त्रास, रक्तस्त्राव, अनियमितपणा पाळी येणे आदी लक्षणे या आजारीचे आहेत. अर्थात, ही लक्षणे दिसली म्हणजे प्रत्येकास थायरॉइड आजार आहे, असे नाही. त्यासाठी तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. डॉ. प्रीती फटाले यांनी, लठ्ठपणा व थायरॉइडचा जवळचा संबंध आहे, पण प्रत्येक लठ्ठपणाला थायरॉइड आजाराच कारणीभूत नाही, असे सांगितले. वजन कमी होणारच नाही, ही मानसिकता सोडा. आत्मविश्वास बागळगा, व्यायाम करा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर उपस्थितांच्या विविध प्रश्न व शंकाना त्यांनी उत्तर देत या आजाराविषयी असलेले समज गैरसमज दूर केले.

मीठातील आयोडीनचे प्रमाण कसे जपावे
- अन्न शिजवतांना मीठाचा वापर न करता ताटात घ्या
- पुडा फोडल्यानंतर मीठ एक महिन्यातच वापरावे
- मीठ स्वयंपाक घरात शेगडीजवळ व उन्हात ठेऊ नये
- गर्भधारण, स्तनदा मातांनी डबल फोर्टिफाइड मीठ वापरावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images