Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ऑलआऊट ऑपरेशनमध्ये पोलिसांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑलआउट ऑपरेशन दरम्यान नाकाबंदी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला ट्रिपलसीट असलेल्या तीन दुचाकीस्वारांनी धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. हा प्रकार गुरुवारी रात्री साडेआठ वाजता सिल्लेखाना चौकात घडला. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लेखाना चौकात ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान क्रांती चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव हे पथकासह गुरुवारी रात्री नाकाबंदी करत होते. यावेळी दुचाकीवर (एम एच २० डी आर ९६६३) तीन तरूण विनाहेल्मेट येत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबून हेल्मेटबाबत विचारणा केली. तेव्हा, हम क्या चोर है क्या, मेरे दो हेल्मेट चोरी हो गये, लोग हजारो करोडो रुपये लेके भाग गये, अशी आरडाओरड सुरू केली. पोलिसांनी त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असता त्यांनी, मै रास्ता रोको करता, असे म्हणत चौकात उभे राहून वाहतुकीला अडथळा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या तरुणाला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिस कर्मचारी वाघमारे यांच्या छातीवर बुक्का मारून ढकलून दिले. या प्रकरणी उपनिरीक्षक गंभीरराव यांच्या तक्रारीवरून दुचाकीचालक रफीक व दोन अनोळखी आरोपी (सर्व रा. संजयनगर) यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अकमल शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नाम’च्या कामांमुळे धोंदलगाव सुजलाम्

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या वैजापूर तालुक्यातील धोंदलगावमधील तलावात यावर्षी मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने निम्म्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. पावसाळ्यात सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची ग्रामस्थांना अपेक्षा आहे. त्यामुळे साडेपाच हजार लोकवस्तीचे हे दुष्काळी गाव सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर आहे.
या गावात गेल्या दोन वर्षांत लोकसहभागातून नाम फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणची अनेक कामे झाली आहेत. आतापर्यंत चार बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून एका बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे. एका बंधाऱ्यात एक कोटी ९५ लाख ९१ हजार लिटर एवढे पाणी साठवले जाऊ शकते. नाम फाउंडेशनने तालुक्यातील धोंदलगाव हे गाव दत्तक घेतल्यानंतर मे २०१५ मध्ये गावातील एका बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला. नाना व मकरंद यांच्या उपस्थितीत आक्टोबरमध्ये गावात झालेल्या ग्रामसभेत जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी ३५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे गावाच्या विकासासाठी सर्व थरातून मदतीचा ओघ सुरू राहिला. नाम फाउंडेशनने चार किलोमीटर नदीतील गाळ काढला. बुलडाणा अर्बन सोसायटीने पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून दिले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेने गावात आतापर्यंत ३४ शौचालयांचे बांधकाम केले असून अजून ४० शौचालयांचे बांधकाम संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. याशिवाय नाम फाउंडेशनने गावातील दोन बेघरांना घर बांधून दिले आहे. सरपंच अण्णासाहेब डमाळे यांनी एक लाख रुपये खर्च करून नदीच्या झालेल्या कामासाठी दगडी अस्तरीकरण केले. याशिवाय शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून गावात १७०० हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्तीची कामे करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी मातीची धूप थांबली आहे. शिवसेना व भाजप या राजकिय पक्षांनीसचद्धा लोकसहभागातून अनेक कामे केली. या कामांमुळे गावाचे रुपडे पालटले आहे. आता मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमिवर पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणी अडवले गेले आहे.

लोकसहभागातून कामे
धोंदलगावात लोकसहभागातून आतापर्यंत साडे पाच किलोमीटर लांब नदीच्या खोलीकरणाचे काम झाले आहे. त्याचप्रमाणे रस्ते, पार्क व लेवलिंगच्या कामासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती नामचे समवयक आनंद यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात आतापर्यंत पावणे दोन लाख घनमीटर इतकी जलसंधरणाची कामे झाली असून त्यात नाम फाउंडेशनचा वाटा एक लाख ३२ हजार ७८९ घनमीटर एवढा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयो गैरव्यवहार; ६ महिन्यांत चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील रोजगार हमी योजनेत ‌१९९७पासून २१४ गंभीर प्रकरणांमध्ये सुमारे ५०० कोटींचा गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी सहा महिन्यांमध्ये करणार असल्याची माहिती विध‌िमंडळ रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी शुक्रवारी (९ जून) दिली.
रोहयो समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रोजगार हमी योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील अत्यं‌त गंभीर स्वरुपातील गैरव्यवहाराच्या चार ते पाच तक्रारी असून, अशा तक्रारींची चौकशीच झाली नाही. तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. अशा तक्रारींची संख्या २१४ असून, यामध्ये ५०० कोटी रुपयांची गैरव्यवहार झाला आहे. इतर लहान तक्रारींची संख्याही मोठी असल्याचे बंब यांनी यावेळी सांगितले. अपूर्ण कामांमुळे वादग्रस्त असलेल्या ‘मनरेगा’च्या कामांबाबत सर्व स्तरांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. योजनेसाठी निधीची कमतरता नाही, मात्र मजूर मिळत नसल्याची तक्रार कायम आहे. या बैठकीमध्ये रोहयोच्या अडचणी व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार संगीता ठोंबरे, संतोष दानवे, संजय रायमूलकर, भाऊसाहेब कांबळे, बबनराव शिंदे, शरद सोनावणे, अनिल तटकरे, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, अपर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड आदींची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील १७५ प्रकरणे ‘जैसे थे’
मराठवाड्यात रोहयोत विविध स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये मराठवाड्यात एकूण १७५ प्रकरणे अाहेत. एकही प्रकरण निकाली काढण्यात आले नाही. जिल्हा, विभागीय चौकशी अधिकारी व शासन स्तरावरील प्रकरणांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात २५, जालना २०, लातूर १३, बीड २५, उस्मानाबाद ४४, हिंगोली १२, नांदेड १३ तर परभणी जिल्ह्यात गैरव्यवहाराची २३ प्रकरणे आहेत. त्यात जिल्हास्तरावरील ५४, विभागीय चौकशी अधिकारी स्तरावर २०, तर शासनस्तरावर १०१ प्रकरणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खातेदारास केले दोन हजार रुपये परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
जगात ईमानदारी सारखा मोठेपणा नाही आणि बेईमानी सारखा दुष्कर्म नाही. ईमानदारीमुळे मनुष्य सर्वांचेच विश्वास संपादन करतो व समाजात आदर्श स्थान मिळवितो. असाच आदर्श बँक ऑफ महाराष्ट्र वेरूळ शाखेतील रोखपालाने घालून दिला आहे. खातेदाराकडून बँक खात्यात जमा करताना जास्त आलेले दोन हजार रुपये त्यांनी परत केले.
वेरूळ येथील महाराष्ट्र बँकेमार्फत साधारण १८ गावांचा व्यवहार चालतो. त्यामुळे बँकेत नेहमीच खातेदारांची वर्दळ असते. या गर्दीत येथील कर्मचारी अनेक वेळा खाते नंबर, तारीख चुकल्यास नेहमी खातेदारांना सहकार्य करतात. याचा प्रत्यय शुक्रवारी आला. शेतकरी कृषी सेवा केंद्राचे संचालक रमेश माळी हे पैसे जमा करण्यासाठी बँकेत गेले असता त्यांचाकडून नजरचुकीने जास्तीचे दोन हजार रुपये देण्यात आले. यावेळी रोखपाल उज्ज्वला धवन यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी माळी यांना बँकेत बोलावून दोन हजार रुपये परत केले. यावेळी बँकेत उपस्थित असणारे खातेदारासह व्यवस्थापक रत्नपारखी यांनी त्यांचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअर म्हणजे मेडिकल, इंजिनीअरिंगच नव्हे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्यातील क्षमता काय आहेत, हे ओळखायला शिका. आपली आवड, स्ट्राँग पॉइंट ओळखून करिअर निवडा. करिअर म्हणजे केवळ मेडिकल, इंजिनीअरिंगच नाही. अर्थशास्त्र, सांख्यिकी, कृषी, बीएस्सी, एमएस्सी, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध क्षेत्रांतही तुम्ही यशोशिखर गाठू शकता, असे प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉ. अजित थेटे यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘बारावीनंतर काय’ या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. नागरी सेवा, माध्यम क्षेत्र, हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट, स्पेस इंजिनीअरिंग, बेसिक सायन्स अशा विविध क्षेत्रांतील करिअरची आणि त्यातील संधीची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत. याबाबत योग्य ती माहिती व्हावी, याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी मिशन संस्था उपक्रमाची व्हेन्यू पार्टनर होती. संस्थेच्या आइन्स्टाइन सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन उपक्रमात डॉ. थेटे म्हणाले,‘जागतिकीकरणाच्या युगात नवनवी क्षेत्रे करिअरसाठी खुणावत आहेत. स्पेशलाइझेशनच्या या युगात आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी वाढल्या आहेत. फक्त त्या संधी ओळखता यायला हव्यात.’
केवळ एक-दोन क्षेत्रांचा विचार करण्याची चूक विद्यार्थी, पालकांनी करू नये, असे आवाहन करत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती दिली व त्यातील संधी सांगितल्या. अधिक चौकस राहून भविष्यातील संधी समजून घ्या. क्षेत्र निवडताना अॅप्टिट्यूट टेस्टही उपयुक्त ठरू शकते. आपली आवड, विषयाचे ज्ञान आणि आपण जे क्षेत्र निवडतो आहोत त्यातील वातावरण कसे असेल, त्याच्याशी आपण समरस होतो की नाही हे आपल्याला समजले तर उपयुक्त ठरते. कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना, नवीन काही करण्याची जिद्द, सृजनशीलता, मेहनत करण्यासाठी तयारी असल्यास ते क्षेत्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरते. कोणी सांगते म्हणून इंजिनीअरिंग, मेडिकल अशा ठराविक क्षेत्राकडे पाहू नका. लॉ, फॅशन डिझाइनिंग, बँकिंग, विमा, कॉर्मस, डिजिटल बँकिंग, परफॉर्मिंग आर्ट, डिझाइन, फॉरेंन्सिक सायन्स, कंपनी सेक्रेटरी, टुरिझम, फूड टेक्नॉलॉजी असे अनेक क्षेत्र आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्यात करिअर करण्याची संधी आहे. त्यासह अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित अशा विषयांचाही विचार करा. बेसिक सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा विषयांमध्ये संशोधनाची संधी आहेत. जे तुम्हाला शास्त्रज्ञ म्हणूनही ओळख निर्माण करून देऊ शकते. त्यासाठी तुमची विषयाची आवड महत्त्वाची ठरते. विषयाची आवड आपल्याला किती आहे हे पहा. त्यासाठी स्वतःमधील क्षमता, कमतरता या लक्षात यायला हव्यात. गुण कमी मिळाले म्हणून निराश होण्याचे कारण नाही. गुण कमी होण्याची अनेक कारणे असतात. त्यातून बाहेर पडत करिअरमध्ये चांगले ते करण्यावर अधिक भर द्यायला हवा. स्वलःला प्रामाणिक राहून नवनवीन कौशल्ये शिकत राहणे महत्त्वाचे असते. क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत, त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडविता येणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. ‘आयटी’, ‘कम्प्युटर सायन्स’, ‘अॅनिमेशन’, ‘हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट’, ‘माध्यम क्षेत्र’, त्यासह मेडिकल, पॅरामेडिकल त्यातील संधी याबाबतही त्यांनी माहिती दिली. मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांनी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थी, पालकांनी उभे राहून लक्ष देऊन करिअरची माहिती जाणून घेतली.

माध्यम क्षेत्रातही करिअरच्या नानाविध संधी
माध्यमांचे बदलते स्वरूप त्यामुळे निर्माण झालेल्या संधी एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयाच्या डॉ. आशा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. माध्यम क्षेत्रात आज करिअरच्या अमर्याद संधी आहेत, असे त्या म्हणाल्या. डिजिटल मीडियामध्ये वेब पत्रकारिता, फोटाेग्राफी, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसह शासकीय नोकरीतील संधीची माहिती दिली.

‘महाराष्ट्र टाइम्स’हा मार्गदर्शनपर उपक्रम अतिशय चांगला होता. करिअर निवडताना प्रत्येकाला भविष्याची चिंता असते. अशावेळी करिअरची क्षेत्र, त्यातील बदल, संधी याची माहिती मिळणे गरजेचे असते आणि ही माहिती मार्गदर्शनातून मिळाली.
- दीपा सुखिया, विद्यार्थी

सीईटी निकालाचे गुण आल्यानंतर अनेकांना चांगल्या कॉलेजांना प्रवेश मिळेल का? अशी भीती होती, परंतु सरांनी उत्तम रित्या प्रवेशाची माहिती दिली. त्यातील संधी आणि इतर करिअरसाठी उपयुक्त विविध क्षेत्र कोणती आहेत, याची माहिती दिली.
- साक्षी पांडे, विद्यार्थी

अभियांत्रिकी, मेडिकल म्हणजेच करिअर नाही. हे सरांनी अतिशय सुरेखपणे सांगितले. वेगवेगळी क्षेत्र जी करिअरसाठी उत्तम आहेत. त्याची माहिती मिळाल्याने प्रवेश घेताना आपण अधिक ठाम असू. ‘मटा’चा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरला.
- साक्षी ठोंबरे, विद्यार्थी

मला नागरी सेवेत काम करण्यासाठी कोणकोणत्या विद्याशाखेला महत्त्व द्यावे, त्यातील संधी याची मला माहिती हवी होती. मी कला शाखेला प्रवेश घेण्याचा विचार करते आहे. ‘मटा’च्या या उपक्रमामुळे मला प्रोत्साहन मिळाले. त्याचा निश्चित फायदा होईल.
- कीर्ती वैष्णव, विद्यार्थी

मेडिकलशी निगडित असलेल्या अनेक शाखांची माहिती सरांनी दिली. जी क्षेत्रे करिअरसाठी उत्तम ठरू शकतात. पॅरामेडिकल, फिजीओथेरपी त्यातील संधी याची माहिती मिळाली. आवड तर महत्त्वाची असतेच, परंतु आपल्याला करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती ‘मटा’च्या या उपक्रमातून मिळाली.
- मानसी वैष्णव, विद्यार्थी

आपल्यातील बलस्थाने ओळखत करिअर कसे निवडावे याची सविस्तर माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या या उपक्रमातून मिळाली. मोजक्याच क्षेत्रांचा अनेकदा विचार होतो. त्यातूनच करिअर निवडण्यावर भर दिला जातो, आज अनेकविध क्षेत्रांची माहिती मिळाली.
- विजयश्री लोखंडे, विद्यार्थी

करिअरबाबत अनेक साशंकता असते. कमी माहिती असल्याने चूक होऊ शकते. आजच्या मार्गदर्शनातून खूप वेगवेगळी करिअरची क्षेत्रे, त्यांची बेस्ट कॉलेज यांची माहिती मिळाली. करिअरसाठी ठराविक क्षेत्र आहेत, असे नाही, हे त्यांनी उदाहरणांसह सांगितले.
- अनीस सदरे, विद्यार्थी

कमी गुण मिळाल्याने मी थोडासा नाराज होतो. सरांच्या मार्गदर्शनामुळे माझा ताण खूप हलका झाला. आपण नेहमी प्रयत्न करत रहावे. आमच्या भावना समजून घेऊन त्यांनी केले मार्गदर्शन हे प्रोत्साहन देणारे ठरले. त्यामुळे ‘मटा’च्या या उपक्रमाचे कौतुक करायलाच हवे.
- श्रीजित फाळके, विद्यार्थी

मला माध्यम क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून चांगले मार्गदर्शन मिळाले. करिअर निवडताना आपल्यातील क्षमता काय आहेत, त्याची जाणिव आपल्याला हवी. तसे असेल तर, आपण निवडलेल्या क्षेत्रात चांगले करू शकतो.
- ऋतुजा करपे, विद्यार्थी

मला अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा आहे. त्यात सरांनी असलेल्या मुळशाखा, उपशाखा त्यासह नवनवीन स्पेशलाइझेशन आमच्यासमोर मांडले. हे ज्ञान प्रवेशासाठी अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला निवड करताना सोपे होते.
- ययाती तुपे

माझ्यासमोर अनेक करिअरचे पर्याय आहेत. त्यातून कोणते निवडावे हा प्रश्न होता. माझी आवड असलेल्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मला करिअर करायचे तर, काय संधी आहेत? याची योग्य ती माहिती मला मिळू शकली.
- अमर तुपे

करिअरच्या वेगवेगळ्या संधी आणि त्याची माहिती उपक्रमातून मिळाली. आपण ज्या क्षेत्रात जाऊ तेथे बेस्ट केले की, करिअरच्या संधी अधिक वाढतात. हे त्यांचे वाक्य अनेकांना प्रोत्साहन देणारे आहे. हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल असे मला वाटते.
- वरद कवाडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच फ्लॅटची तिघांना विक्री; बिल्डरला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बिल्डर प्रफुल्ल मांडेची अनेक प्रकरणे समोर येत असतानाच, एकाच फ्लॅटची तिघांना विक्री केल्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामध्ये तब्बल साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर मांडे याला सोमवारपर्यंत (१२ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी शुक्रवारी (९ जून) दिले. तर, दुसऱ्या एका प्रकरणामध्ये त्याचा नियमित जामीनही शुक्रवारी फेटाळण्यात आला.
याप्रकरणी मोहम्मद सोहेल परवेज खान महेबूब खान (वय ३६, रा. रऊफ कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २७ ऑक्टोबर २०१६ रोजी फिर्यादीने आरोपी व प्रथमेश कन्स्ट्रक्शनचा मालक प्रफुल्ल मधुकरराव मांडे (वय ३६, रा. गुरुसहानीनगर, औरंगाबाद) याच्याकडून गारखेडा परिसरातील मधुमालती प्राइड येथील फ्लॅट क्रमांक ३०१ हा ३० लाखांत खरेदी करण्याचा करार केला व इसारपावतीसाठी साडेतीन लाख रुपये आरोपीला दिले. मात्र फिर्यादीने वारंवार पाठपुरावा करुनही आरोपीने फ्लॅटचे अर्धवट काम पूर्ण करून दिले नाही व खरेदीखतही करून दिले नाही म्हणून फिर्यादीला आरोपीच्या व्यवहाराबाबत शंका आली. त्यामुळे आरोपीने फिर्यादीला इसारपावती करून दिलेल्या फ्लॅटबाबत फिर्यादीने भूमी अभिलेख कार्यालयात माहिती घेतली असता, तोच ३०१ क्रमांकाचा फ्लॅट आरोपीने करारापूर्वी किशोर द्वारकादासद गिल्डा (रा. भोकरदन रोड, जालना) यांना १३ लाख ८२ हजार रुपयांना, तर करारानंतर विनयकुमार रमेशराव भागवत (रा. इन्कमटॅक्स कॉलनी, औरंगाबाद) यांना १५ लाख रुपयांना विकल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला गुरुवारी (८ जून) अटक करण्यात आली. आरोपीला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून साडेतीन लाख रुपये जप्त करणे बाकी आहे, तसेच आरोपीविरुद्ध अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून, आणखी काही गुन्हे दाखल आहेत का व त्याचे कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला ७ दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील आशिष दळे यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दुसऱ्या प्रकरणात जामीन फेटाळला

शहरातील आणखी एका प्रकरणामध्ये आरोपी मांडेचा नियमित जामीन फेटाळण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी मं. ना. पाटील यांनी शुक्रवारी (९ जून) दिले. या प्रकरणी अक्षय माधवराव दोमकोंडवार (वय ४२, रा. गारखेडा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र गणेश धुलाजी मेहता यांनी २६ जून २०११ रोजी सुंदरवाडी (ता. जि. औरंगाबाद) परिसरातील गट क्रमांक ३१ मधील जमीन विकत घेतली होती आणि डेव्हलप करण्यासाठी आरोपी बिल्डर मांडे याच्याशी ६ एप्रिल २०१३ रोजी करार केला होता. यामध्ये ५३ टक्के जमिनीवरील दुकान-फ्लॅटची मालकी फिर्यादीकडे, तर ४७ टक्के जमिनीवरील फ्लॅट-दुकानाची मालकी आरोपीकडे ठेवण्याचा करार करण्यात आला होता. मात्र आरोपीने फिर्यादीच्या जमिनीवरील फ्लॅट, दुकानांची सातजणांना परस्पर विक्री केल्याचे समोर आले. यामध्ये ७० लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपीने ४ जून रोजी नियमित जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, आरोपीला जामीन दिल्यास तो पुन्हा नव्या लोकांची फसवणूक करू शकतो, पुरावेही नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी कोर्टात केली होती. ही विनंती ग्राह्य धरून आरोपीचा नियमित जामीन फेटाळण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी दारू, दोन जीप कन्नडमध्ये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड शहर पोलिसांनी दोन वाहनांतून ८२ हजार २०० रुपयांची विदेशी दारू, एक सूमो व बोलेरो, असा सुमारे सहा लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, उपनिरीक्षक उस्मान शिंदे, पोलिस नाईक दीपेश नागझरे, शिपाई कऱ्हाळे, पाटील, ताठे, शिंदे यांनी गस्त घालताना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास अंधानेर-मुंडवाडी मार्गावर ही वाहने पकडली. टाटा सुमो (एम. एच.२० डी. जे.१८०५) व महिंद्रा बोलेरो (एम. एच. २० डी. व्ही. ०७३५) या वाहनांतून विदेशी दारूच्या ५४० बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत दीपक पगारे, संतोष जैस्वाल (रा. औराळा), राहुल घुसळे (रा. शिरोडा) यासह एक अल्पवयीन संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर हॉस्पिटल’ पाण्याविनाच

$
0
0

‘कॅन्सर हॉस्पिटल’ पाण्याविनाच

४५ लाख घेऊनही पालिकेचा कर्करुग्णांच्या जिवाशी खेळ सुरुच; हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला स्वतंत्र जलवाहिनीद्वारे थेंबभर पाणी मिळत नसतानाच पूर्वीप्रमाणे तिसऱ्या दिवशी मिळणारे पाणीही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पाण्याचा अक्षरशः ठणठणाट असूनदेखील पालिकेला कुठलेही सोयरसुतक नसल्याची स्थिती कायम आहे. एकीकडे हायकोर्टाच्या आदेशाची सरळसरळ पायमल्ली होत असतानाच, दुसरीकडे पालिकेकडून चक्क गोरगरीब कर्करुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे.

कॅन्सर हॉस्पिटलची दररोजच्या पाण्याची गरज एक ते दीड लाख लिटरची असताना हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासून असलेल्या ८ इंची नळाद्वारे कधीच १०-२० हजार लिटरपेक्षा जास्त पाणी मिळाले नाही आणि तेदेखील तिसऱ्या दिवशीच मिळत होते. त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाप्रमाणे (घाटी) कॅन्सर हॉस्पिटलला दररोज पुरेसे पाणी मिळावे, अशी हॉस्पिटलची पहिल्यापासून मागणी आहे. या गंभीर स्थितीची दखल घेऊन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ डिसेंबर २०१४ रोजी, ‘सहा महिन्यांत हॉस्पिटलसाठी ज्युबली पार्कपासून स्वतंत्र जलवाहिनी तयार करा’, असे आदेश पालिकेला दिले. त्यासाठी हॉस्पिटलने पालिकेला ४५ लाख रुपयांचा धनादेश द्यावा, असे खंडपीठाने आदेश दिल्यानंतर हॉस्पिटलने इमानेइतबारे ४५ लाखांचा धनादेश देऊन जवळजवळ तीन वर्षे लोटली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने मागच्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी जलवाहिनीचे काम पूर्ण केले. त्यानंतर पहिले काही दिवस जलवाहिनीला पाणी आले; परंतु त्यानंतर थेंबभर पाणीही मिळत नसल्याची दुर्दैवी स्थिती कायम आहे. या प्रश्नी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सरताजसिंग चहल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

खासगी टँकरवर १५ लाखांचा खर्च

२१ सप्टेंबर २०१२ रोजी कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. तेव्हापासून; किंबहुना त्यापूर्वीपासूनच खासगी टँकरशिवाय पर्याय नसल्याची स्थिती कायम आहे. हॉस्पिटलला पूर्वीच्या ८ इंची नळाद्वारे मिळणारे पाणी गरजेच्या तुलनेत अत्यल्प होते व उपचार-शस्त्रक्रियांसाठी किमान प्रक्रियायुक्त पाणी असावे, या दृष्टिकोनातूनच पालिकेने त्यांच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी हॉस्पिटलने पालिकेकडे केली होती. ही मागणी धुडकावून लावल्यामुळे हॉस्पिटलला खासगी टँकरशिवाय पर्याय राहिला नव्हता. मात्र या खासगी टँकरवर मागच्या साडेचार वर्षांत १५ लाखांपेक्षा जास्त खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हॉस्पिटलला नवीन जलवाहिनीद्वारे थेंबरभर पाणी मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. पूर्वी तिसऱ्या दिवशी येणारे पाणीही बंद करण्यात आले आहे. हॉस्पिटलसाठी रोज तीन ते चार खासगी टँकर सुरू आहेत.

डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल

या प्रश्नी तातडीने लक्ष घालणार असून, कॅन्सर हॉस्पिटलला लवकरात लवकर पाणी मिळेल, यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे.

अतुल सावे, आमदार व अभ्यागत समिती अध्यक्ष

या प्रकाराला अधिष्ठाता स्वतः जबाबदार आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी व तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर आम्हाला जलवाहिनीचे काम रखडल्याचे सांगण्यात आले होते. वस्तुतः हे आधीच सांगणे अपेक्षित होते. तरीदेखील आम्ही मागे लागून जलवाहिनीचे काम पूर्ण करून दिले. मात्र नवीन जलवाहिनीला पाणीच येत नसल्याचे मला एकदाही सांगण्यात आले नाही. लोकप्रतिनिधींनी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतरच त्यांना प्रश्न सांगावेत असे काही नाही. हा प्रकार कळविण्याची जबाबदारी हॉस्पिटलचीही आहेच. तरीदेखील प्रकरणात लक्ष घालू.

इम्तियाज जलील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तरुण’ कर्ज योजनेने व्यवसायास ‘उभारी’

$
0
0

‘तरुण’ कर्ज योजनेने व्यवसायास ‘उभारी’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुद्रा लोनमुळे व्यावसायिकांना शिशू, किशोर आणि तरुण या तिन्ही अवस्थांमधून जाण्यास मदत झाली आहे. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात मुद्रा लोनचे सर्वाधिक वाटप करण्यात आले आहे. तब्बल ६५९ कोटी रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील १ लाख ४० हजार लोकांना वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात तिपटीने कर्जवाटप करण्यात आले आहे. मुद्रा लोनच्या माध्यमातून विनातारण कर्ज मिळत असल्यामुळे छोट्या उद्योजकांना त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे. १५ ऑगस्ट २०१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. मुद्रातील तिसरा प्रकार तरुण लोनचा असून याद्वारे अनेकांनी व्यवसायाला उभारी दिली आहे. मागील वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात १११ कोटींचे कर्ज वाटप झाले होते.

याबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, डिसेंबर २०१६ अखेर ८६,९५१ लोकांना ३३२ कोटींचे कर्ज वाटप झाले होते. गेल्या वर्षीच्या तिप्पट मुद्रा लोनचे वाटप करण्यात आले आहे. कर्जाची मागणी जास्त असल्यामुळे मार्चअखेर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता होती आणि तो वाढला. ६५९ कोटी रुपयांचे ‌कर्ज जिल्ह्यातील १ लाख ४० हजार लोकांना वाटप झाले आहे.


मुद्रा लोन अंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण कर्ज दिले जाते. गेल्या दोन-अडीच वर्षांत या योजनेत कर्ज घेणारे वाढले आहे. याअंतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी उद्योग व्यवसाय वाढवला आहे. दुप्पट-तिपटीने कर्ज घेणारे वाढले असले तरी अजूनही या योजनेसंबंधी विचारणा होत आहे व बँका कर्ज देत आहेत.

दिनकर संकपाळ, झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र

औरंगाबाद जिल्हा सन २०१५-२०१६मध्ये मुद्रा योजनेचे साध्य

योजना प्रकार - तरुण

खातेदार - १५३७

मंजूर कर्ज - ५०४७लाख

वाटप कर्ज - ४९५७लाख

औरंगाबाद जिल्हा सन २०१६-२०१७मध्ये मुद्रा योजनेचे साध्य

योजना प्रकार - तरुण

खातेदार - २२२६

मंजुर कर्ज - १७१.१४ कोटी

वाटप कर्ज - १६७.६३ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रोड, बीड बायपासला तारीख

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून जालना रोड आणि बीड बायपासचे काम प्रत्यक्षात तीन महिन्यांनंतर सुरू होईल. निविदा प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी पुन्हा एक नवीन आश्वासन दिले गेले आहे.
गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी येथे येऊन या दोन्ही रस्त्यांचे विस्तारीकरण आणि मजबुतीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत केले जाईल अशी घोषणा केली होती. त्यासाठी ८०० कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. परिणामी, हा निधी केंद्रातून देऊन कामे करण्याबाबत चर्चा झाली. प्राधिकरणाच्या यंत्रणेने जालना रस्त्याचे सर्वेक्षण करून रस्त्यात येणाऱ्या मालमत्ता हटविण्यास सांगितले त्याप्रमाणे काही ठिकाणी कार्यवाहीही झाली. केंब्रिज ते छावणी लोखंडी पूल असा रस्ता सहा पदरी करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान बीड बायपासचे संपूर्ण काँक्रिटीकरण आणि तीन उड्डाणपूल सविस्तर प्रकल्प अहवालात प्रस्तावित आहेत. मार्च अखेर हा प्रस्ताव दिल्लीत सादर झाला होता. त्यात त्रुटी आढळल्याने स्थानिक कार्यालयाने नव्याने सुधारित अहवाल नुकताच सादर केला आहे.
गडकरी शनिवारी एका विवाहानिमित्त औरंगाबादेत आले होते. त्यांनी महापौर भगवान घडमोडे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी यांनी सांगितले, की दोन्ही रस्त्यांची कामे लवकरच सुरू होतील. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अखेर ती भावंडे सापडली

$
0
0

...अखेर ती भावंडे सापडली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंधरा वर्षांपासून बेपत्ता झालेली अमोल मगर या युवकाची भावंडे अखेर लोणावळ्याच्या आंतरभारती बालगृहात सापडली. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध करताच राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत स्युमोटो दाखल केला होता. यानंतर महिला व बालविकासाच्या तपासाला वेग आला.
पदमपु-यातील शिशूसदनामध्ये २००२पर्यंत माझी बहीण निकिता (वय दीड वर्ष) व भाऊ अनिकेत (वय आठ महिने) होते. इथल्या सर्व मुलांना सुरुवातीला पुणे व नंतर यवतमाळला पाठवले. २००४ पर्यंत बहीण-भाऊ संपर्कात होते. त्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्कच झाला नाही. माझी भावंडे मला शोधून द्या म्हणत २७ वर्षांच्या अमोल बापूराव मगरने १७ मे रोजी शिशूसदनाविरूद्ध वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. १५ मे रोजी जिल्हा महिला व बालविकास विभागाला अर्ज केला. पुणे, यवतमाळ, नाशिक, उस्मानाबाद, नांदेडमध्ये शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. अमोलचे मूळ गाव कन्नड तालुक्यातील लिंबा चिंचोली. वडिलांनी दुसरे लग्न केले आणि आई व तिन्ही मुलांशी संबंध तोडला. २००१मध्ये अमोलची आई वारली. तेव्हा अमोल ११ वर्षांचा होता. तेव्हा ही भावंडे शिशूसदनात ठेवली. स्वतः अमोल काही काळ काकासोबत राहला. नंतर रेल्वेस्टेशनच्या पब्लिक हायस्कूलमध्ये शिकला. एक वर्ष हडकोच्या रिमांड होममध्येही होता. तेव्हापासूनच तो नातेवाईकाच्या मदतीने भावंडाचा शोध घेत होता.
शिशूसदनच्या जागेवर मुलांचे अनुरक्षणग्रह आहे. त्यांच्याकडे रेकॉर्ड नसल्याने अमोलला हडकोच्या रिमांड होममध्ये पाठवले. रिमांड होमने जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे पाठवले. तिथूनही उत्तर न आल्याने त्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातही अर्ज केला. मात्र, प्रत्येक ठिकाणी संबंधितांनी जुने रेकॉर्ड असल्याने असमर्थता दर्शवली. मात्र, केवळ अमोलची भावंडेच नव्हे, तर त्यावेळी शिशूसदनातील अन्य १०० मुलांचेही रेकॉर्ड नसल्याने राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत १९ मे रोजी स्युमोटो दाखल केला. २४ मे रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यावेळीही या विभागाकडे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. मात्र,शिशूसदन बंद झाले तेव्हा या संस्थेतील मुलांना जवळपासच्या संस्थांमध्ये सामावून घेण्याचे समजले. त्यावेळी शिशूसदनच्या जागी पुण्याची प्रीतमंदिर संस्थाही शहरात होती. ही संस्थाही काही कारणाने बंद झाली. तेव्हा अमोलची भावंडे प्रीतमंदिरमध्ये होती का याचा शोध घेतला. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. रेणुका घुले यांनी याविषयी प्रीतमंदिरला ​विचारणा केली व नंतर ही मुले २००६ पासून लोण्यावळयाच्या आंतरभारती बालगृहात असल्याचे समजले. सध्या दोन्ही भावंड शालेय शिक्षण घेत असल्याचे अॅड. घुले यांनी सांगितले.

अमोलची तक्रार दाखल झाली तेव्हा आम्ही सर्व रेकॉर्ड तपासले. मी स्वतः महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधला. जुनी घटना असल्याने रेकॉर्ड मिळवायला उशीर लागला. त्यांचे शालेय शिक्षण सुरू आहे. त्यांची इच्छा असेल तर या मुलांना औरंगाबादला आणता येईल. - अॅड. रेणुका घुले, अध्यक्ष, बालकल्याण समिती

अमोलची भावंडे सापडल्याचा खूप आनंद वाटतोय. आयोगाने स्युमोटो दाखल केल्याने तपासाला वेग आला व ती मुल सुखरूप असल्याचे समजले. यापुढे महिला व बालविकास विभागही आपल्या नोंदी व्यवस्थित ठेवतील. - विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आर्ट ऑफ लिव्हिंगची नाला सफाईसाठी मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील नाला सफाईसाठी महापालिका श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेची मदत घेणार आहे. नारेगाव येथील कचराडेपो मधील कचरा नष्ट करण्यासाठी देखील महापालिका या संस्थेची मदत घेणार आहे.
शहरातून सुमारे सत्तर नाले वाहतात. त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होते. नाल्याचे पाणी दुर्गंधीमुक्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने विशिष्ट पद्धत विकसित केली आहे. नाल्याच्या पाण्यात एक ड्रम (टाकी) उभा केला जातो. त्यात पाणी टाकून ठराविक पद्धतीचे रसायन मिसळले जाते. रसायन मिसळलेले पाणी पाइपद्वारे नाल्याच्या पाण्यात सोडले जाते. त्यामुळे नाल्यातील पाण्याची दुर्गंधी नष्ट होते. पिंपरी चिंचवड, दिल्ली येथे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने असा प्रयोग केला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबादेत असा प्रयोग करण्याची इच्छा संस्थेच्या प्रतिनिधींनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याकडे व्यक्त केली व प्रस्ताव सादर केला. संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी मुगळीकर यांनी दाखवली.

कचरामुक्तीतही मदत
कचरा डेपोमधील कचरा नष्ट करण्यासाठी देखील आर्ट ऑफ लिव्हिंगने इकोझाइन रसायनचे तयार केले आहे. हे रसायन कचऱ्यावर फवारले, तर कचऱ्याचे आपोआप विघटन होते. कचऱ्यात मिसळलेले प्लास्टिक तेवढे शिल्लक राहते. संस्थेने असा प्रयोग जबलपूर येथे केला आहे. औरंगाबादमध्ये हा प्रयोग करण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी पालिकेकडे एक हजार लिटरचे इकोझाईन रसायन दिले आहे. पालिकेच्या यंत्रणेने हे रसायन नारेगाव कचरा डेपोमध्ये फवारले. त्याचा परिणाम चांगला आला, तर जास्त प्रमाणात रसायन घेऊन त्याची फवारणी करू व पुढील दोन महिन्यांत नारेगावचा कचरा डेपो कचरा मुक्त करू, असे मुगळीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कटकटगेट रस्त्याचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कटकटगेट व गारखेड्यातील विजय चौक रस्त्याचे काम अखेर सुरू झाले असून दोन महिन्यांत ते पूर्णत्वास जाईल, अशी माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.
कटकटगेटपासून पोलिस मेसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम व्हावे यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. कटकटगेट परिसरातील अतिक्रमणे काढून रस्त्याचे काम सुरू करा, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले होते. या रस्त्याच्या कामांसाठी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी ७६ लाख रुपये देखील मंजूर केले. अधिकाऱ्यांना आदेश देऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, तरी काम सुरू होत नव्हते. अतिक्रमणे हटविण्यात अडचणी येत होत्या. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने अतिक्रमणे हटविली. त्यानंतर आता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांचे काम सुरू करण्यात आले आहे, असे मुगळीकर यांनी सांगितले.

ओझांनी दिली होती मंजुरी
कटकटगेटच्या रस्त्याबरोबर गारखेडा भागातील हिंदूराष्ट्र चौक ते विजय चौक या रस्त्याचे रखडलेले काम देखील सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. शिवसेनेच्या कला ओझा महापौर असताना त्यांनी पतियाला बँक ते विजय चौक रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली होती. हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, पतियाला बँक ते हिंदूराष्ट्र चौकापर्यंतच रस्त्याचे काम झाले. पुढचे काम रखडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ इथेनॉलवर सिटी बस चालवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिले जाते. महापालिकेनेही इथेनॉलवर सिटी बससेवा सुरू करावी, अशी सूचना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.
गडकरी एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी महापौर निवासस्थानी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी गडकरी म्हणाले, इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या शेतीमालाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. हा व्यवसाय मराठवाड्यासाठी फायदेशीर ठरेल. साखर कारखानदारांनी यावर भर दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. इथेनॉलसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी धोरण आखले जात आहे. पेट्रोल, डिझेलला पर्याय असून अधिकाधिक इथेनॉल निर्मिती व्हावी, यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. काही उद्योग इथेनॉल निर्मितीसाठी येऊ घातले असून, त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. इथेनॉलच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या शेतीमाल उत्पादनावर भर दिल्यास ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरले. ऊसाचे चिपाड, बांबू आदीपासून सेकंड जनरेशन इथेनॉलची निर्मिती होते. बांबूला दोन हजार रुपये प्रती टनचा भावही मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे, ज्ञानोबा मुंढे, अॅड. माधुरी अदवंत आदी उपस्थित होते.

शेतकरी संपावर मौन
पत्रकारांनी सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाबाबत विचारले असता गडकरींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर मौन बाळगणे पसंद केले. इथेनॉलवर सिटी बस चालवा. त्या संदर्भातील सर्व परवानग्या तातडीने देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती महापौर भगवान घडमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बेशिस्त वाहनांमुळे वाळूज रोड जॅम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नगरनाका, छावणी येथील चौकात बेशिस्त वाहनांचा फटका शनिवारी सायंकाळी लाखो औरंगाबादकरांना बसला. पुढे जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक अडकल्यामुळे वाळूज रस्त्यावर एक किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
सायंकाळी सहा वाजता अडकलेल्या गाडीची तब्बल दोन तासानंतर सुटका झाली. चौकात उभे असलेल्या चार ट्रॅफिक पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यास अपयश आले. नगरनाका चौकात दररोज ट्रॅफिक जॅम होत असते. बाबा पेट्रोलपंपाकडून येणारी वाहने सिग्नलवर उभी राहताना वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे दौलताबादकडून येणाऱ्या जड वाहनाला वळून वाळूजकडे जाण्यास अडचण होते. त्यात दुसरे सिग्नल लागले तर वाहने सुसाट वेगाने निघतात आणि ट्रॅफिक जॅम होते. गेल्या आठवड्यात दररोज हा अनुभव असल्याचे उद्योजकांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नगरनाका चौकात वाहतूक कोंडी झाली. पाहता पाहता लांबच लांब रांगा लागल्या. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चारचाकी, ट्रक आणि बस पुढे निघण्याच्या प्रयत्नात अडकल्या आणि ट्रॅफिक जॅम झाले. तब्बल दोन तास वाहतुकीची कोंडी झाली. गोलवाडी पुलापर्यंत गाड्या अडकून पडल्या. हा त्रास रोजचा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तक्रार तरी कुणाकडे द्यायची वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार वाहतूक पोलिस कार्यरत होते. त्यांनी काहीच केले नाही. शेवटी वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आले आणि कशीबशी वाहतूक सुरळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ शिक्षकांच्या सेवा संपुष्टी आदेशाला स्थगिती

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधील दोन तत्कालीन शिक्षकांच्या सेवा संपुष्टी आदेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली.
मोहम्मद बासित अन्सारी व सय्यद अश्फाक सय्यद वजीर अली हे शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विभागात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपाची असून व्यवस्थापन मंडळातर्फे जाहिरात, लेखी परीक्षा तसेच मुलाखती घेऊन करण्यात आली.
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सहा मे रोजी एक शासन निर्णय काढला. त्यानुसार व्यवस्थापन मंडळाची कंत्राटी स्वरुपात नियुक्ती देण्याचे आदेश मागे घेण्यात आले. या निर्णयाचा संदर्भ घेऊन बहुतांश महाविद्यालयातील प्राध्यापक जे कंत्राटी आधारावर नियुक्त झाले आहेत, अशा सर्वांची सेवा ३१ मे रोजीच्या पत्रान्वये संपुष्टात आणण्यात आली.
या सेवा संपुष्टाला आव्हान देत मोहम्मद बासित अन्सारी व सय्यद अश्फाक सय्यद वजीर अली यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. सहा मे रोजीच्या शासन निर्णयानुसार एक तात्कालीक कर्मचारी हे दुसऱ्या तात्कालीक कर्मचाऱ्यांशी पुनर्स्थापित होतो असे करणे हे असंविधानिकच नव्हे, तर समता तत्वाशी विसंगत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नियमित प्राध्यापकांची नियुक्ती व्हावी अशा प्रकारचे निर्देश कोर्टाने द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यातर्फे करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही तात्कालीक स्वरुपात केली, अशी नियुक्ती संविधानातील कलम १४ व १६ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांनी केला. कोर्टाने या प्रकरणात नोटीस बजावून नियुक्ती संपुष्टात आणण्याचा आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. याचिकाकर्त्यातर्फे सतीश तळेकर, प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्यांच्या हक्कासाठी ऑल इंडिया लॉयर्स युनियन

$
0
0


औरंगाबाद : ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या (एआयएलयू) दुस-या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्घाटन केरळ उच्च न्यायालयातील वकील तथा संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. ई. के. नारायणन यांच्या हस्ते येथील भानुदासराव चव्हाण सभागृहात झाले. अध्यक्षस्थानी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. आदिनाथ तिवारी होते.
उद‍्घाटनपर मार्गदर्शन करताना अॅड. नारायणन यांनी ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या स्थापनेचा इतिहास विशद केला. त्यांनी सांगितले की, १९७५ साली देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क गोठविण्यात आले. सर्वसामान्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ऑल इंडिया लॉयर्स युनियनची स्थापना झाली. देशात २२ राज्यांमध्ये संघटनेच्या शाखा आहेत. महाराष्ट्रात संघटनेच्या सदस्य वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. अशोक पाटील यांनी स्वागतपर विचार मांडले. त्यानंतर अॅड. एस. आर. बोदडे, वरिष्ठ वकील एम. ए. मिर्झा, अॅड. एन. एल. जाधव, राज्य वकील परिषदेचे माजी सदस्य अॅड. वसंतराव साळुंके आणि सिटूचे उद्धव भवलकर यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सरचिटणीस अॅड. बाबासाहेब वावळकर आणि जिल्हाध्यक्ष अॅड. रामनाथ चोभे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरस्वती भुवन संस्थेला २८ लाखांची देणगी

$
0
0


औरंगाबाद : आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यास अनेकांना अडचणी येतात. अशांना मदत करावी अशी भावना शारदा मंदिरमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या शालिनी पारगावकर-राव यांना होती. हयात असताना आपल्या पतीकडे त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. डॉ. शालिनींच्या निधनानंतर तीन महिन्यांतच त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पती व हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती एम. एन. राव यांनी शनिवारी २८ लाखांची देणगी स.भु.संस्थेकडे वर्ग केली. तेव्हा राव भावनिक झाले.
सरस्वती भवन शिक्षण संस्थेच्या शारदा मंदिरमध्ये शालिनी पारगावकर-राव यांचे शिक्षण झाले. हयात असताना आर्थिक मागास विद्यार्थिनींना पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याची त्यांची इच्छा होती. वेळोवेळी पती एम. एन. राव यांच्याकडे ती त्या बोलून दाखवत. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉ. राव यांनी आज संस्थेकडे २८ लाख रुपयांचा निधी वर्ग केला. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर होते. व्यासपीठावर सचिव दिनेश वकील, सनदी अधिकारी भुंजगराव कुलकर्णी, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. रश्मी बोरीकर उपस्थित होते. डॉ. शालिनी पारगावकर यांनी इंटर पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यासपूर्ण केला. डॉक्टर झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. त्या सेवेत असल्यापासून आर्थिक मागास विद्यार्थिनींसाठी मदतीला जाण्याची त्यांची कायमची सवय होती, अशी आठवण त्यांचे पती एम. एन. राव यांनी सांगितली. शारदा मंदिर आणि उस्मान‌िया विद्यापीठात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना मदतीची भावना त्यांनी अनेकदा बोलून दाखविल. मार्च २०१७ मध्ये निधन झाले. त्यातून सावरत डॉ. शालिनी यांचे पती एम. एन. राव यांनी पत्नीची इच्छा पूर्ण केली. देणगी बँकेत जमा करून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थिनींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे शक्य नाही त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासह तीन शिक्षकांना रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी रामकृष्ण जोशी, जुगलकिशोर धूत, ब. गो. फडणीस, दि. वि. भिलेगावकर, डॉ. नंदकुमार उकडगावकर, मिलिंद रानडे, सु. गो. पोहनेरकर, डॉ. उल्हास शिऊरकर, क. वि. व्याहाळकर, मोहिनी रसाळ, अनुराधा पाठक, श्याम देशपांडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतीवन बळीराजाच्या पाठिशी

$
0
0


Manoj.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद ः एकीकडे हमीभाव, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा लढा सुरू असताना दुसरीकडे कसलाही गवगवा न करता दीपक व कावेरी नागरगोजे या दाम्पत्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत यंदाही सुरू ठेवले आहे. यावर्षी ‘शांतीवन’मध्ये ५०० अनाथ मुलांच्या संगोपनाची सोय करण्यात असून, त्यासाठी कार्यकर्ते गावोगावी जाऊन सर्वेक्षण करत वंचित मुलांची माहिती गोळा करत आहेत.
बीड जिल्ह्यात आर्वी येथे नागरगोजे दाम्पत्याने बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून शांतीवनची मुहूर्तमेढ रोवली. परिसरातील उत्कृष्ट शाळा म्हणून शांतीवनची ओळख आहे. सध्या येथे ३०० अनाथ मुलांच्या संगोपनासह परिसरातील वेगवेगळ्या गावातून ७०० मुले शिकण्यासाठी येतात. अनाथ मुलांचे संगोपन, शिक्षण, जेवण, असा सर्व खर्च शांतीवन उचलते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहिपर्यंत मदत केली जाते. गेल्यावर्षीपासून शांतीवने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्या शाळेत प्रवेश देऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जवळपास २०० मुलांना येथे हक्काचे घर मिळाले. यंदाही येथे अशा मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी व्हॉटस् अॅप, फेसबूकच्या माध्यमातून अशी मुले असल्यास कळवा, असे आवाहन शांतीवनचे दीपक नागरगोजे यांनी केले. मराठवाड्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, शांतीवनचे कार्यकर्ते अशा मुलांच्या शोधात आहेत. एकीकडे कर्जाचा डोंगर, नापिकी, बेभरवशाचा मान्सून अशी संकटावर संकटे कोसळताना शांतीवन शेतकरी कुटुंबासाठी आधारवड ठरला आहे.

दुःखाचा डोंगर पेलला
बीडचा अवघ्या अकरा वर्षांचा राम. त्याच्या छोट्या बहिणीच्या बाळांतपणात आई सोनाली जग सोडून गेली. पत्नीच्या निधनानंतर उघड्यावर पडलेला प्रपंच आणि मुलांची जबाबदारी कशी पेलवायची, या विचारताच वडील विलास बेपत्ता झाले. राम आणि त्याची छोटी बहीण उघड्यावर आले. वयोवृद्द आजी कसेतरी या मुलांचे पालन पोषण करीत होती. शांतीवनची शोधमोहीम सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्या अनुपमा पाटील यांच्या नजरेत हे मूल आले. शांतीवनमुळे त्यांना त्यांना आता हक्काचे घर मिळाले आहे.

बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू केलेले हे काम असेच सुरू राहील. यंदाही शांतीवनमध्ये आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेश देणार आहोत. त्यांच्या राहण्यापासून शिक्षणापर्यंत सर्व भार उचलणार आहोत. आपल्या परिसरात अशी मुले असल्यास आम्हाला कळवा. - दीपक नागरगोजे, शांतीवन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सरकारने कृती न केल्यास आंदोलन सुरूच ठेवणार

$
0
0

औरंगाबाद : ‘राज्यातील शेतकऱ्यांनी इतिहासात प्रथमच सात दिवस संप पुकारला. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. सुकाणू समितीसोबत सरकारची चर्चा होणार आहे. सरकारने या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढावा, नुसती आश्वासने दिली तर आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
भानुसे म्हणाले, ‘राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. हमीभाव व कर्जमुक्ती या मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला होता. सरकारने या प्रश्नी अधिक गांभीर्य दाखवायला हवे होते. निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतमालाला हमीभाव देऊ असे आश्वासन दिले, पण एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयात हमीभाव देता येणार नाही, असे आश्वासन दिले. त्यामुळे सरकारवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा सरकार चर्चा करून दिशाभूल करत आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही, राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही नरमाईची असल्याने विरोधी पक्षच उरला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बाजूने संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली आहे,’ असा इशारा त्यांनी दिला. यावेळी राम भगुरे, बाबासाहेब दाभाडे, अक्षय मेलगर, पुंजाराम जाधव, दिनेश जगदाळे आदी उपस्थित होते.

शेतकरी आंदोलनात विरोधकांची नरमाईची भूमिका आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली आहे. कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवला जाईल. - शिवानंद भानुसे, प्रदेश प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images