म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. ग्रामीण भागातील अवैध दारू बंद करण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येणार आहेत. या ग्रामरक्षक दलालाच अवैध दारू पकडण्याचे अधिकार देण्यात येतील. त्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख व उत्पादन शुल्क अधीक्षक यांनी प्रत्येक आठवड्याला कारवाई करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.
एखादा व्यक्ती तीनवेळा अवैध दारूप्रकरणी दोषी ठरत असेल तर, त्याला ‘मोक्का’ लावण्याचे आदेशही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी उस्मानाबादेत बोलताना
दिले. सौर ऊर्जेवर तुळजाभवानी मंदिर उजळण्यासाठी प्रयत्नशील महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या संपूर्ण परिसरासाठी आवश्यक सौर ऊर्जा
प्रकल्प दोनसाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन नामदार बावनकुळे यांनी तुळजाभवानी मंदिरात बोलताना दिले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी गुरुवारी तुळजापूरला धावती भेट देवून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्यावतीने त्यांचा यथायोग्य
सत्कार करण्यात आला.
यावेळी तुळजापूरचे तहसीलदार तथा देवस्थान समितीचे सदस्य झापले यांनी मंदिराच्या वीज रोषणाईसाठी सौर ऊर्जेचा टप्पा क्रमांक दोन साठीचा
निधी शासनाकडून मिळाल्यास मंदिर परिसराला आवश्यक असणारी ऊर्जा निर्मिती होवू शकते, ही बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आदींची उपस्थिती होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट