Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कृत्र‌िम पेट्रोल टंचाईचा धोका

$
0
0

कृत्र‌िम पेट्रोल टंचाईचा धोका

डिलर्सकडून विक्रीनुसार इंधनाची ऑर्डर; उतरत्या दरांमुळे ग्राहक खुश

Abdul.Wajed

@timesgroup.com

Tweet : @sourabhsMT

औरंगाबाद ः मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याने ग्राहकांना याचा थेट फायदा होऊ लागला आहे. दुसरीकडे महागात इंधन खरेदी करून स्वस्त दरात विक्री करावी लागत असल्याने पेट्रोल डिलर्स त्रस्त झाले आहेत. तोटा थांबविण्यासाठी शहरातील पेट्रोल पंपचालकांनी इंधनाची अतिरिक्त आवक थांबविली आहे. दररोज विक्री होणाऱ्या इंधनाचा आढावा घेऊन तेवढेच इंधन कंपनीकडून खरेदी केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात पेट्रोलचा कृत्र‌िम तुटवडा होण्याचा धोका आहे.

शहरातील ४१ पेट्रोल पंपावरून औरंगाबादेत दररोज ३ लाख लिटर पेट्रोलची विक्री होत आहे. गेल्या १६ जूनपासून इंधनाचे दर दररोज ठरविले जात आहेत. १६ जूनपासून ते १ जुलैपर्यंत पेट्रोलच्या दर सर्वसाधारणपणे ३ रुपये ६० पैशांनी लिटरमागे कमी झालेले आहेत. तर याच काळात डिझेलचे दर २ रुपये ७१ पैशांनी कमी झाले आहेत.

दररोज दर बदलल्यामुळे व ते कमी होत असल्यामुळे ग्राहक खुश आहेत. तथापि, दररोजच्या दर कमी होण्याने पेट्रोलपंपचालक त्रस्त झाले आहेत. आपला तोटा टाळण्यासाठी त्यांनी पूर्वीप्रमाणे एक-दोन दिवसांचा स्टॉक करून ठेवणे बंद केले आहे. त्याऐवजी दररोज जेवढी विक्री होत आहे तेवढेच इंधन कंपनीकडून मागविले जात आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात पेट्रोलची कृत्र‌िम टंचाई होण्याची

शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेचे लैंगिक शोषण; वडिलांची १९ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोकरीच्या काळात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाने विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. तसेच तिच्या वडिलांना देखील पतसंस्था उघडण्याचे आमिष दाखवत १९ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध रविवारी सिडको पोलिस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विलास नारायण लंभे (रा. घाटनांद्रा ता. कन्नड) हा एका अर्बन बँकेत नोकरीला होता. या काळात त्याची बँकेतच नोकरी करीत असलेल्या एका विवाहितेशी ओळख झाली. या विवाहितेचा पतीसोबत कोर्टात खटला सुरू आहे.‌ विलासने या महिलेशी ओळख वाढवली. माझी पत्नी भोळसर असून मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष त्याने दाखवले. या विवाहितेला मुंबई, पुणे आदी ठिकाणी नेत लैंगिक शोषण केले. या काळात या विवाहितेच्या वडिलांकडून विलासने थापा मारीत १९ लाख रुपये लाटले. यानंतर त्याने विवाहास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हतबल झालेल्या या विवाहितेने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेत दाद मागितली. आयुक्त यादव यांच्या आदेशानुसार सिडको पोलिस ठाण्यात आरोपी विलास विरुद्ध बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर कोते हे तपास करीत आहेत.

पतसंस्था स्थापन करण्याचे आमिष
विलास लंभे याने बँकेत काम केलेले असल्याने त्याला बँकिंगच्या व्यवहाराची माहिती आहे. विवाहितेच्या वडिलांना त्याने आपण विक्रीकर अधिकारी होणार असल्याची थाप मारली होती. तसेच पतसंस्था स्थापन करण्याचे आमिष दाखवून फे‌ब्रुवारी ते जूनच्या दरम्यान १९ लाख रुपये उकळले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवड केली, तरच सुदृढ जीवन जगू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘जलयुक्त, गाळमुक्त व अाता वृक्षयुक्त शिवार कार्यक्रम सुरू हाेणार अाहे. यात सर्वांनी गांभीर्य दाखविले, तरच या उपक्रमाचा उपयाेग हाेणार अाहे. माझ्यासमाेर पुढील पिढी अाहे. याची जाण ठेवून वरील तिन्ही उपक्रम सर्वांनी राबविले तरच सुदृढ जीवन जगता येईल,’ असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केले.
तालुक्यातील वृक्ष लागवड सप्ताहाचा विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रांगणात बागडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मराठवाडा विभाग मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, जिल्हाधिकारी नवल किशाेर राम, वनसंरक्षक ए. डी. भाेसले, उपवन सरंक्षक वडजकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी ३० प्रकारच्या झाडांची लागवड झाली.
पुढे बाेलताना बागडे म्हणाले की, अापल्या देशात सर्वांचाच स्वभाव बचतीचा अाहे. पण झाडांची बचत करण्याचा सर्वांना विसर पडला. काही दिवसांनी अापल्या हस्ते वृक्ष लागवड नसेल तर ताे अपात्र ठरेल असेही हाेऊ शकते. यावेळी अभियंता अशाेक ससाने, उपविभागिय अधिकारी भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती एकनाथ धटिंग, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

मराठवाड्याची स्थिती दयनीय
यावेळी बोलताना मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन म्हणाले, एकूण जमिनीपैकी ३३ क्षेत्रावर झाडांनी व्यापलेले असेल, तर पर्यावरण संतुलित राहते हा निसर्ग नियम अाहे. राज्यात सध्या २० टक्के वृक्ष अाच्छादन अाहे. मराठवाड्यात फक्त ४.८२ टक्के भूभाग झाडांनी व्यापलेला अाहे. इतकी दयनीय स्थिती काेठेच नाही. त्याचा परिणाम अापल्यासमाेर अाहे. पाणी व अाॅक्सिजनची कमतरता ही मानवास घातक अाहे. यासाठी भूभागावर झाडांची अवश्यकता अाहे. शासनाने या उपक्रमात गेल्या वर्षी दाेन काेटी झाडांची लागवड केली. यावर्षी चार काेटींचे लक्ष अाहे. २०१८ मध्ये १३ काेटी, २०१९ मध्ये ३३ काेटी झाडे लावण्याचा उपक्रम अाहे. ही झाडे जगविण्यासाठी लक्ष दिले जाणार अाहे. प्रत्येक झाड हे अाॅनलाइन राहणार असल्याने त्याची माहिती शासन दरबारी जाणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत प्रवेशाची पाचवी फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मोफत शालेय प्रवेश प्रक्रियेतील रिक्त राहिलेल्या जागांसाठी शिक्षण विभागातर्फे पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्यासाठी येत्या ५ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या प्रक्रियेतून भरण्यात येणाऱ्या ५ हजार ५१६ जागांपैकी अद्यापही २ हजार ८६० जागांवर प्रवेश झालेले नाहीत.
‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यामध्ये घेण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले होते. चार फेऱ्यांमधूनही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यात पाचवी फेरी घेण्यास विलंब झाला. शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटल्यानंतर ही फेरी होत आहे. या पाचव्या फेरीच्या प्रक्रियेत www.rte25admission.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी ५ जुलैपर्यंत करता येईल. या प्रक्रियेसाठी शहरात दहा केंद्र देण्यात आली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या. या फेऱ्यांमध्ये शाळा व शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे प्रत्येक फेरीत प्रक्रियेला विलंब होत गेला.
त्यात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा राहिल्या आहेत. औरंगाबाद विभागात पहिल्या चार फेरीत केवळ २ हजार ६५६ जागांवर प्रवेश होऊ शकले. तर, आजपर्यंत ७८० विद्यार्थ्यांचे अर्ज कागदपत्रातील त्रुटींमुळे रद्द झाले.

ही आहेत केंद्र
आरटीई मोफत प्रवेशाच्या पाचव्या फेरीसाठी पालकांना सोयीचे ठरावे यासाठी शिक्षण विभागाने केंद्र सुरू केली आहेत. त्यामध्ये आ. कृ. वाघमारे प्रशाला, शिशु विकास मंदिर प्राथमिक शाळा, महात्मा फुले प्राथमिक शाळा पदमपुरा, सिडकोतील बळीराम पाटील प्राथमिक शाळा, खोकडपुऱ्यातील शिवाजी प्राथमिक शाळा, जालना रोडवर सेंट फ्रांन्सिस डिसेल्स प्राथमिक शाळा, शहागंजमध्ये महाराष्ट्र हिंदी विद्यालय, रामनगर परिसरातील सुशिलादेवी देशमुख प्राथमिक शाळा, चिकलठाण्यातील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, हडकोतील एसबीओएसह पंचायत समितीत ही एक केंद्र असणार आहे.

एकूण शाळा : ४६९
झालेले प्रवेश : २६५६
उर्वरित रिक्त जागा : २८६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपड्याच्या दालनाला आग लागून लाखोंचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोडवरील साजन सरिता एनएक्स या रेडिमेड कापड दुकानाला रविवारी सकाळी आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला.
जालना रोडवर अमरप्रित चौकातील साजन सरिता या दुकानातून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती अग्नीशमन दल व दुकानमालक अंकुश आनंद परसवाणी यांना दिली. अग्निशमन दलाने ही आग अर्ध्या तासात आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून गेला. या दुकानाला लागूनच परसवाणी यांचे गोदाम आहे. त्यामधील माल बाहेर काढण्यात आला. या आगीत अंदाजे २० ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज परसवणी यांनी व्यक्त केला. दुकानाला आग लागल्याचे समजताच इतर व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती, त्यांनी गोदामातील माल काढण्यासाठी मदत केली. दुकानातून येत असलेल्या धुरामुळे आग विझवण्यात अडचण येत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी काचा फोडून दुकानात प्रवेश करून आग विझवली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर येथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
या दुकानात असलेल्या इन्वर्टरच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे दिसत आहे. आगीत जीवीतहानी झाली नसून माल जळाल्याने नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अब्दुल अजीज अब्दुल लतीफ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही आषाढी वारीला जुन्याच बसचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी तिन्ही कार्यशाळेतून नवीन बस दिल्या जातात. एकादशीनंतर त्या विविध आगारांना दिल्या जातात. यावर्षी नवीन बस बांधणीसाठी चेसीस खरेदी न केल्याने वारकऱ्यांना जुन्याच बसमधून प्रवास करावा लागणार आहे.
यंदा आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला मराठवाड्यातून १०४९ बस सोडण्यात येणार आहेत. औरंगाबाद मध्यवर्ती बस स्‍थानकातून विशेष यात्रा बस सोडण्यात आली आहे. विविध आगारातून प्रवाशांच्या मागणीनुसार बस देण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध भागातून ९ जूलैपर्यंत बस सेवा चालविण्यात येणार आहे. विविध आगारांना यंदा स्‍थानिक पातळीवर जादा बसचे नियोजन करावे लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या तीन्ही कार्याशाळांत नवीन बस बांधणी बंद आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून औरंगाबाद, दापोडी आणि नागपूर येथील कार्यशाळेत जुन्या बसची पुनर्बांधणी केली जात आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन व्यवस्‍थापकीय संचालक विकास खारगे यांच्या कार्यकाळात चेसीस खरेदीला उशीर झाला होता. त्यावर्षी जुन्या बस पंढरपूर यात्रेसाठी पाठविण्यात आल्या. गेल्या वर्षीही नवीन बस गेली नाही. यंदाही तोच कित्ता गिरवला जात आहे.

महामंडळाचे नियोजन
औरंगाबाद विभागातून १२० बस पंढरपूर यात्रेसाठी जाणार आहेत. याशिवाय बीड येथून १००, जालना १२४, लातूर १३०, नांदेड १८०, उस्मानाबाद १९० आणि परभणीहून १७५ बस सोडण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वातानुकूलित रेल्वे प्रवास जीएसटीमुळे महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर रेल्वेचा वातानुकूलित प्रवास ०.५ टक्क्यांनी महाग, तर एसटी महामंडळाच्या शिवनेरी वातानुकूलित बसचा प्रवास (औरंगाबाद ते पुणे) पाच रुपयांनी स्वस्त झाला आहे.
‘जीएसटी’मुळे रेल्वेच्या काही सेवा स्वस्त, तर काही महागण्याची शक्यता आहे. रेल्वे स्‍थानकातील रिटायरिंग रुमचे दर २० ते २५ रुपयांची स्वस्त होणार आहेत. पूर्वी दोन दिवसांच्या एससी रुम बुकिंगसाठी १९४५ रुपये मोजावे लागत होते, आता १९२० रुपये लागणार आहेत. रेल्वे कॅन्टिनसह इतर सुविधा महाग होण्याची शक्यता आहे. ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर रेल्वे प्रवास पाच ते आठ रुपयांनी प्रवास महागला आहे, अशी रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाच्या शिवनेरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. पूर्वी औरंगाबाद ते पुणे वातानुकूलित बस प्रवासासाठी ६६१ रुपये मोजावे लागत होते, ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर ६५६ रुपये आकारण्यात येत आहेत. याशिवाय एसटीच्या बसच्या दरांवर ‘जीएसटी’चा कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

पार्किंग महागणार
औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बस स्‍थानकातील पार्किंग महागण्याची शक्यता आहे. पार्किंगवर १८ टक्के ‘जीएसटी’ लावण्यात आल्याने दुचाकीधारकांना दोन ते तीन रुपयांचा फटका सहन करावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत औषधांचा प्रश्न कायम

$
0
0


घाटीत औषधांचा प्रश्न कायम
अँटिबायोटिक्ससह वैद्यकीय साहित्याचा तुटवडा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) अनेक प्रकारच्या औषधी तुटवड्याचा प्रश्न कायम असून, दैनंदिन औषधे, प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) तसेच वैद्यकीय साहित्य नसल्याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. मनोरुग्णांनाही तब्बल तीन महिन्यांपासून घाटीमध्ये बहुतांश औषधी मिळत नसल्याने नाहक दंड सोसावा लागत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी ‘मटा’कडे केल्या आहेत.

घाटीमध्ये येणारे बहुतांश रुग्ण हे गोरगरीब तसेच सामान्य कुटुंबातील असतात व औषधी-साहित्य नसल्याने रुग्णांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहेत. रुग्णांनी ‘मटा’ला दिलेल्या माहितीनुसार, घाटीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त औषधी-साहित्य मिळत नसून, रुग्णालयात उपलब्ध नसलेली सर्व प्रकारची औषधी-साहित्य रुग्ण-नातेवाईकांना लिहून दिली जात आहेत. सुत्रांनुसार रुग्णालयामध्ये दैनंदिन सामान्य औषधे, तोंडावाटे घ्यावी आणावी लागणारी प्रतिजैविके, तसेच ग्लोव्हज, सुया, बँडेज, कॅप, मास्क आदी साहित्याचाही मोठा तुटवडा आहे. अलीकडे काही प्रमाणात इंजेक्टेबल्स, सलाईन उपलब्ध होत आहे. मात्र ते कधी उपलब्ध होईल आणि कधी उपलब्ध होणार नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. अगदी शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्यही रुग्णांना लिहून दिले जात आहे.

मनोविकृती विभागातही मागच्या तीन महिन्यांपासून औषधांचा गंभीर तुटवडा असून, बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) तसेच आंतर रुग्ण विभागात (आयपीडी) औषधी नसल्याने बहुतांश औषधी विकत घेण्याची वेळ येत आहे. दुर्दैवाने मागच्या काही महिन्यांपासून बहुतेक विभागांमध्ये हीच स्थिती कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शासकीय कॅन्सर हॉस्पिटल पाण्याच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्टेट कॅन्सर सेंटर’चा दर्जा मिळालेले राज्यातील एकमेव शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटल हे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत असून, हॉस्पिटल सुरू होऊन तब्बल साडेचार वर्षे लोटले असले तरी हॉस्पिटलला महापालिकेकडून पाणीच मिळत नसल्याचे विदारक चित्र कायम आहे. केवळ पाइपलाइन करून औपचारिकता पूर्ण करण्यात आल्यामुळे दररोज दोन-चार खासगी टँकर घ्यावे लागत आहेत.
शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला अलीकडेच ‘स्टेट कॅन्सर सेंटर’चा दर्जा मिळाला असून, या अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून हॉस्पिटलला १२० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातील ३५ कोटी रुपयांचा पहिला हप्ताही केंद्राकडून हॉस्पिटलला देण्यात आला आहे. नजिकच्या भविष्यात कॅन्सर हॉस्पिटलची वाटचाल देशातील एक अव्वल कॅन्सर हॉस्पिटलच्या दिशेने होऊ घातली असताना, दुर्दैवाने हॉस्पिटलच्या स्थापनेपासून म्हणजेच २१ सप्टेंबर २०१२ पूर्वीपासूनच हॉस्पिटलला पुरेसे पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. याची दखल घेत हायकोर्टाने ज्युबली पार्कपासूनच हॉस्पिटलपर्यंत नवीन जलवाहिनी तयार करण्याचे आदेश पालिकेला दिला. त्यासाठी ४५ लाख रुपये देण्याचे आदेश कोर्टाने घाटी हॉस्पिटलला दिले होते व घाटीकडून हा निधी तत्काळ देण्यात आला. मात्र खंडपीठाच्या आदेशानंतर तब्बल दोन-अडीच वर्षे उशिरा पालिकेने ही जलवाहिनी केली खरी; परंतु त्या जलवाहिनीद्वारे पाणीच येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने, आता तर पूर्वी येणारे अत्यल्प पाणीदेखील बंद झाले आहे आणि दररोज दोन-चार खासगी टँकरवर ‘स्टेट कॅन्सर सेंटर’चा कारभार सुरू आहे.

पालिकेला डझनभर पत्र
या संदर्भात हॉस्पिटलने महापालिकेला आतापर्यंत डझनभर पत्र दिली आहेत व पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. मात्र, पालिकेकडून कुठलीच दखल घेतली गेलेली नाही किंवा कुठलीही सकारात्मक पावले उचललेली नाही. एकीकडे खंडपीठाच्या आदेशाची पायमल्ली, तर दुसरीकडे गोरगरीब व गंभीर कर्करुग्णांचाही पालिका विचार करण्यास तयार नसल्याचे विदारक चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या पावसासाठी आठवड्याची प्रतिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात दमदार सुरुवातीनंतर गेल्या काही दिवसांपासून केवळ रिमझिम पाऊस सुरू असून, मोठ्या पावसासाठी किमान आठवडाभर प्रतीक्षा करावी लागेल, असे ‌हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
उत्तर भारतात पश्चिमी विक्षोपीयच्या वाऱ्याची तीव्रता वाढल्यामुळे यंदा तेथे मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे, मात्र मध्य भारतात वाऱ्याची; तसेच ढगांची हालचाल मंदावल्यामुळे मध्य महाराष्ट्रात मोठ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. कश्मीरपासून देशाचा इशान्य भाग, बिहारचा काही भाग, कोलकाता, गुवाहाटी आदी भागांमध्ये पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांची तीव्रता असल्यामुळे या भागात मोठा पाऊस सुरू आहे. अशीच स्थिती केरळ, गोवा, कोकण किनारपट्टी; तसेच गुजरातच्या काही भागांमध्ये असल्यामुळे येथही दमदार पाऊस होत आहे. येत्या सात ते आठ दिवसांमध्ये मध्य भारतामध्ये पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांची स्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता असून, त्यानंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता औंधकर यांनी व्यक्त केली.
जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली होती, मात्र १४ जूनपासून लातूर, उस्मानाबाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला होता. सध्या विभागातील जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी काही तालुक्यांमध्ये पावसाची मोठी पिछाडी आहे.

निम्म्या तालुक्यांची ‌पिछाडी
मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी ओलांडली असली, तरी पावसाच्या मोठ्या खंडामुळे विभागातील ७६पैकी ३२ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ५, जालना ४, परभणी ६, हिंगोली २, नांदेड ११, बीड २ तर लातूर जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी टोळक्याचा कारचालकावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डाव्या साइडने ओव्हरटेक का केले या कारणावरून वाद घालत मद्यपींच्या टोळक्याने कारचालकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये डोक्याला आठ टाके पडल्याने कारचालक गंभीर जखमी झाला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी सिडोक एन ११, सौभाग्य चौकात घडला. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ एकनाथ औताडे (वय ३६ रा. सैलानीबाबा दर्गाजवळ, पिसादेवी रोड, हर्सूल) यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. ते शनिवारी सायंकाळी टीव्ही सेंटरकडून कारमधून घराकडे जात होते. यावेळी एन ११ भागात सौभाग्य चौकाच्या पुढे त्यांच्या कारपुढे एका दुचाकीवर दोन जण दुचाकी वाकडी तिकडी चालवत जात होते. औताडे यांनी त्यांना हॉर्न वाजवून साइड मागितली. मात्र त्यांनी साइड दिली नसल्याने औताडे यांनी डाव्या बाजूने कार ओव्हरटेक करीत पुढे नेली. यानंतर या दुचाकीस्वारांनी तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर दुचाकीस्वारांनी औताडे यांच्या कारपुढे दुचाकी आडव्या लावल्या. औताडे यांना कारबाहेर ओढण्यात आले. हे सर्व दुचाकीस्वार मद्यप्राशन केलेले होते. डाव्या बाजूने ओव्हरटेक का केले या कारणावरून औताडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. यापैकी एका आरोपीने त्याच्या पिशवीत असलेली कुलरची लोखंडी इलेक्ट्रिक मोटर औताडे यांच्या डोक्यात मारून जखमी झाले. हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत औताडे यांची सुटका केली. नागरिकांनी मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना पकडून सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी औताडे यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर शंकर जाधव (वय १९), राजू विठ्ठल जाधव (वय ३०) आणि रवींद्र अंबादास रोकडे (वय २३ सर्व रा. घोडेगाव, ता. खुलताबाद) व त्यांच्या पसार साथीदाराविरुद्घ सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचाऱ्याचा हस्तक्षेप
या मारहाणीत औताडे यांच्या डोक्याला तीन ठिकाणी मार लागून सात टाके पडले आहेत. मात्र या आरोपींच्या परिचयाचा एक पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांने औताडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी हस्तक्षेप करीत केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेविकेचे घर फोडून लाखाचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भवानीनगर भागातील माजी नगरसेविका रेणुका वाडेकर यांचे घर फोडून चोरट्यानी ५८ हजाराच्या रोख रक्कमेसह दीड तोळ्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी पहाटे घडला. भावाच्या अस्थी विसर्जनासाठी त्या सिल्लोड येथे गेल्या असता हा प्रकार घडला.
भवानीनगर, जुना मोंढा भागातील गल्ली क्रमांक दोन येथे माजी नगरसेविका रेणुका कृष्णा वाडेकर यांचे घर आहे. त्यांच्या भावाचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्या सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे पती, सासू व दोन मुलींसह गेल्या होत्या. वाडेकर कुटुंब रविवारी दुपारी अस्थी विसर्जन करून घरी परतणार होते. त्यांचे कुलूपबंद घर लक्ष्य करीत चोरट्यांनी रविवारी पहाटे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ड्रॉवर तोडून त्यातील सामान त्यानी पलंगावर फेकले. आतमधील रोख ५८ हजार रुपये व दीड तोळ्याचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले, स्वयंपाक घरात असलेले सोन्याचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. हा प्रकार रविवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. नागरिकांनी या घटनेची माहिती वाडेकर तसेच जिन्सी पोलिसांना दिली. जिन्सी पोलिस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक मनोज पगारे तसेच श्वानपथक व फिंगर प्रिंटस एक्स्पर्ट घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी वाडेकर यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावसामुळे श्वान घुटमळले
आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र रात्री व पहाटे पाऊस पडलेला असल्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यामध्ये श्वानाला यश आले नसल्याने ते तेथेच घुटमळले.

टीव्हीचा आवाज मोठा
चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर कपाट व त्यामधील ड्रॉवर तोडले. यावेळी त्याचा आवाज बाहेर जाऊ नये तसेच घरातील मंडळी परतली आहे, असे वाटावे म्हणून त्यांनी टीव्ही सुरू करून त्याचा आवाज मोठा केला होता. हा टीव्ही सकाळपर्यंत सुरूच होता.

नुकतेच काढले होते पोलिस सरंक्षण
काही दिवसापूर्वीच वाडेकर यांच्या घरावर टोळक्याने हल्ला केल्याने त्यांच्या घराला १५ दिवस पोलिस सरंक्षण देण्यात आले होते. ते नुकतेच काढण्यात आले होते. या ठिकाणी गस्तीची मागणी त्यांनी केली होती. मात्र ते सिल्लोडला गेल्यानंतर चोरट्यानी संधी साधली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाणिज्यिक ग्राहकांकडे २० काटींची थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात २९ हजार वाणिज्यिक ‌वीज ग्राहक असून त्यापैकी सात हजारपेक्षा जास्त ग्राहकांकडे २० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.
अनेक वाणिज्यिक ग्राहक तीन ते चार महिन्यांपासून वीज बिल भरत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी गुरुवारी छावणी उपविभागांत कारवाई करत दहा थकबाकीदार ग्राहकांचा पुरवठा खंडित केला. शहरातील काहींच्या वीज बिलांची प्रकरणे कोर्टात आहेत. त्यांच्याकडून चालू महिन्याचे वीज बिलही जमा केले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठांनाकडे ही थकबाकी आहे. ३६०० व्हॅट पेक्षा जास्त वीज वापर असलेले ‌वीज ग्राहकांकडे ही विजेची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. या वीज ग्राहकांवर कारवाई करून वीज सेवा खंडित करण्याचे आदेश मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने गणेशकर यांनीच गुरुवारी थकबाकीदारांविरुद्ध कारवाई केली.
वाणिज्यक वीज ग्राहकांकडील थकबाकी वसुलीत चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे संकेत मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील सर्व टँकर बंद

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
टंचाई कालावधी संपुष्टात आल्यामुळे ‌मराठवाड्यात सुरू असलेले सर्व टँकर प्रशासनाने १ जुलैपासून बंद केले आहेत. आता टँकरची आवश्यकता असलेल्या गावांचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवून टँकर सुरू करावे लागणार आहेत. मागील आठवड्यात मराठवाड्यात १९८ गावे आणि ४५ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.
मराठवाड्यात जून महिन्यात वरुणराजा आरंभशूर ठरला असला, तरी काही जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे विभागात पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. शिवाय टंचाई कालावधीही संपुष्टात आल्यामुळे २१८ टँकर प्रशासनाने बंद केले आहेत.
दरम्यान, पाणीटंचाई असलेल्या गावांत पुन्हा टँकर अथवा इतर उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पंचायत समितीमार्फत प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये जून महिन्याच्या प्रारंभी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी झाली. इतर जिल्ह्यांतही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे टँकरसंख्या सातत्याने कमी झाली होती. विभागात १ जून रोजी सुरू असलेल्या ६९२ टँकरपैकी ११९ टँकर पावसाच्या पहिल्या १५ दिवसांतच बंद करण्यात आले होते. त्यानंतरही टँकरसंख्येत सातत्याने घट होत गेली. ३० जून रोजी विभागात २१८ टँकर सुरू होते. यातील सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात होते.

जलस्त्रोतांच्या तपासणीनंतर टँकर
मराठवाड्यात चांगला पाऊस असतानाही अनेक तालुक्यांमध्ये टँकर सुरू होते. पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणचे भूजलपातळी वाढल्यानंतरही टँकर बंद करण्यात आले नव्हते. आता प्रशासनाने हे टँकर बंद केले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जलस्त्रोतांची तपासणी केल्यानंतरच टँकर सुरू करण्याची परवानगी जिल्हाप्रशासन देणार आहे.

३० जूनची स्थिती
- टँकरसंख्या ः २१८
- गावांची संख्या ः १९६
- वाड्या ः ४५
- विहीर अधिग्रहण ः ५३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
‘आदिवासी बांधवांची अवस्था फारशी चांगली नाही. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविणे हे एक आव्हान आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांनी दिली.
ठाकरवाडी येथे आदिवासी ठाकर समाज दुर्बल घटक विकास संस्थेतर्फे आयोजित कृतज्ञता सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास सेवानिवृत्त अप्पर आयुक्त मधुकर गायकवाड, पोलिस निरीक्षक हरीश खेडकर, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड व हिंदवी खंडागळे, पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश अधाने, पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे, प्रभाकर शिंदे, हीना मनियार, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अविनाश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींनी ठरवले तर एक-एक पैसा आदिवासी बांधवांच्या विकासासाठी खर्ची पडेल व त्यांना योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. आदिवासींमधील परंपरागत कौशल्य विकसित करून रोजगार निर्मिर्ती झाली पाहिजे. आदिवासींसाठी योजना राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करून विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार बंब यांनी केल्या. त्यासाठी सेवानिवृत्त अपर आयुक्त गायकवाड यांची मदत घेतली जाईल, असे ते म्हणाले. या कार्यक्रात आदिवासी ठाकर समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त अपर आयुक्त गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव खंडागळे यांनी केले तर संचालन विजय चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालम गांगड, रामचंद्र मधे, सुक्रम मेंगाळ, सोमा गांगड, शिवराम मधे, पांडू मधे, सनीराम मधे, शिवनाथ गांगड, खंडू बाधारे, जयराम उघडे, सुधाकर मेंगाळ यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
देवकृपा उद्योग समुहाच्यावतीने पवारवाडीमध्ये ३० स्वच्छतागृहे बांधून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यातील पदाधिकारी, सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी समजून या स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. प्रत्येक नागरिकांनी कुटूंबाचे आरोग्य चांगले व निरोगी राहण्यासाठी शौचालय बांधून त्याचा वापर करावा. जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्वस्तरावरुन प्रयत्न करावेत, असे आवाहन बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बीड जिल्ह्यातील देवकृपा उद्योग समुहाच्यावतीने माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे स्वखर्चातून ३० स्वच्छतागृह उभारण्यात आले आहेत. या उद्योग समुहाचे आप्पासाहेब जाधव यांनी ही स्वछतागृह बांधून दिली आहेत. या स्वच्छतागृहाचा लोकापर्ण कार्यक्रम पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास आमदार आर. टी. देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके, माजलगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस, देवकृपा उद्योग समूहाचे आप्पासाहेब जाधव, बाबुराव पोटभरे, तहसीलदार एन. जी. झंपलवाड, गटविकास अधिकारी गुंजकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘केंद्र सरकारने देशात स्वच्छ भारत अभियान राबवित असून जिल्ह्यानेही प्रत्येक गावात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जनजागृतीपर मोठी चळवळ निर्माण केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये या अभियानाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात कामे करण्यात येत आहेत. आपले गाव, आपला परिसर स्वच्छ राहिला तर आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.’
राज्य सरकार विविध विकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा फायदा जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांना झाला पाहिजे. यासाठी या योजना प्रशासनाबरोबर पदाधिकाऱ्यांनी या कामामध्ये पुढाकार घेऊन राज्य सरकारच्या या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविला पाहिजे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निधी उपलब्ध करून देणार-मुंडे
जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वत:चा उद्योग किंवा त्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी बचत गट तयार करण्यात येत असून याचा फायदा महिलांना होणार आहे. पवारवाडीच्या पाण्याच्या टाकीसाठी येणाऱ्या काळात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मंत्र्यांची तंबी म्हणजे ‘फुसका बार’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
सातत्याने आदेश देवून व आढावा घेऊन ही जलयुक्त शिवार अभियान व ग्रामसडक योजनेची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने होत नसल्याचे पाहून
सहपालक मंत्री महादेव जानकर चांगलेच भडकले. वेळेत कामे पूर्ण न केल्यास निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची तंबी त्यांनी दिली. विशेष म्हणजे यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना भूम येथील आढावा बैठकीत कामे पूर्ण न केल्यास कडक कारवाई करू, असा इशारा दिला, मात्र त्याचा अधिकाऱ्यांवर काडीमात्र फरक पडत नसल्याने ही तंबी फुसका बार ठरत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात अशीच कारवाईची वाच्यता केली. मात्र, या कारवाई संदर्भातील तंबीची फारशी दखल अधिकारी घेताना दिसत नाही. त्यामुळेच मंत्री महोदयांना वारंवार अशा
आदेशाची व त्यांच्या अस्तित्वाची गर्जना करावी लागत आहे. मंत्री महोदयांची ही ओरड आता अधिकाऱ्यांच्या अंगवळणी पडली असून, यातून कुठलीही कारवाई होणार नाही याची त्यांना खात्री असल्याने, ही तंबी म्हणजे फुसका बार ठरू लागली आहे.
जलयुक्तच्या कामासाठी निधीची कमतरता नसतानाही जिल्ह्यात या कामाला गती आलेली नाही, ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. मागेल त्याला शेततळे योजनेचे काम जिल्ह्यात अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे, याबद्दलही मंत्री महोदयांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रखडलेले आहे. त्यामुळे ही कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होतील किंवा नाही याबद्धलही साशंकता व्यक्त करण्यात आली.
कारवाईची ओरड केवळ आढावा बैठकीपूर्तीच असते. त्यानंतर या बाबीकडे कोणीही फारसे लक्ष देत नाहीत किंवा त्याचा पाठपुरावा केला जात नाही, अशी भावना सध्या अधिकाऱ्यांत बळावत चालली आहे. त्यातूनच अधिकारी शासननिर्देशाकडे दुर्लक्ष करीत असावेत, अशी यानिमित्ताने चर्चा आहे. तसेच प्रशासन व अधिकाऱ्यांवरील पकड नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांत उमटत आहेत.
अधिकाऱ्यांना तंबी देण्याचा प्रकार हा बैठकीत चार भिंतीच्या आत होत असल्याने अधिकारी याबाबत फारसे गांभिर्याने घेत नाहीत. राज्य सरकारचा माहिती विभाग हा बैठकीतील सत्य व अधिकाऱ्यांची खरडपट्टी दडवून ठेवण्यात धन्यात मानतो. वस्तुस्थितीची जाणीव होऊ न देण्यासाठी म्हणून सर्व अलबेल असल्याचे चित्र रंगविले जात.

विद्यमान सरकारमध्ये केवळ घोषणांचा सुकाळ आहे. स्वच्छ प्रशासनाचा व पारदर्शक कारभाराचा केवळ गवगवा केला जातो. सरकारची अधिकाऱ्यांवर कसलीच वचक नाही. विविध योजनांचा लाभ सर्वसामन्यांना मिळत नाही.
विक्रम काळे, आमदार

आघाडी सरकारच्या काळात सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक होता. सध्याचे मंत्री मात्र, अधिकाऱ्यांसमोर हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळते. बैठकीच्या नावाखाली केवळ दौऱ्यांचे सोपस्कर पाडले जात आहे.
मधूकराव चव्हाण, आमदार, तुळजापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसआयुक्तालयाचा प्रश्न सोडवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेडच्या पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न आम्ही प्राधान्य क्रमानुसार सोडविणार असून, निधीच्या उपलब्धतेनुसार नांदेडला पोलिस आयुक्तालय करण्याबाबत आम्ही आग्रही असल्याचे मत राज्याचे अर्थ व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
नांदेड पोलिस परिक्षेत्रातील चारही जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात व त्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात सरकार आग्रही असून, प्रामुख्याने निवासाचा प्रश्न व त्यांचे कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. परिक्षेत्रात रिक्त असलेल्या अधिकायांच्या व पोलिस कर्मचाऱ्यांच्या जागा तातडीने भरण्यासंदर्भात मुंबईला गेल्यानंतर निर्णय करु. या परिक्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर ते प्रश्न सुटले किंवा नाही यासाठी पुन्हा एक महिन्यानंतर आपण नांदेडला येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
नांदेड परिक्षेत्राची कामगिरी समाधानकारक असून, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी व ती सुरळीत करण्यासाठी नांदेडने ४ कोटी ८० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्या-त्या क्षेत्रासाठी असलेले परवाने व त्याची शहानिशा करून पोलिसांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड ते मुंबई ही विमानसेवा मुंबईला जागा उपलब्ध न झाल्याने सुरू झाली नाही. येत्या काही दिवसात यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही सेवा लवकर सुरू करण्याचे आम्ही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस अधिकाऱ्यांकडून अन्न औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क व महसूल विभागातंर्गत सुरू असलेल्या धाडसत्राला संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू व त्यावर समन्वय साधून निर्णय घेऊ, असेही केसरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोज भंडारी, उमेश मुंढे, सिडकोचे शहरप्रमुख वैजनाथ देशमुख, अवतारसिंह पहरेदार आदींची यावेळी उपस्थिती होती.

‘कर्जमाफीसाठी युद्ध्पातळीवर प्रयत्न’
सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत चालू ठेवणे हे एक मोठे आव्हान असून, जिल्हा नियोजन मंडळात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध केला
जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अध्यादेश काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मिळालेला वेळ कमी असला तरी ३० जूनची मुदत आणखी वाढवून घेण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत, कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारीचा मागोवा आम्ही घेतला आहे. ती कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी युद्ध्पातळीवर प्रय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीची ऑक्टोबर वारी जाहीर

$
0
0

औरंगाबाद ः माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होत आहे. बारावीची ११ तर, दहावी परीक्षा १८ जुलैला सुरुवात होणार आहे.
मंडळ फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची महिनाभरात परीक्षा घेते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिकवर्ष वाया जाऊ नये या हेतूने दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना लगेचच जुलैमध्ये परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्याची संधी लगेच मिळते. यंदा बारावीची परीक्षा ११ जुलैपासून सुरू होत आहे. औरंगाबाद विभागातून ६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. विभागात २२ परीक्षा केंदाहून परीक्षा घेतली जाणार आहे. तर, दहावीची परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. दहावीला विभागातून १२ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीची परीक्षा विभागात ४९ केंद्राहून होणार आहे.

दहावीत ही गळती मोठी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून दोन वर्षांपासून जुलैमध्येच परीक्षा घेण्याचा शिक्षण मंडळाने निर्णय घेतला. यानंतरही दहावी, बारावी स्तरावर गळतीचे प्रमाण कायम असल्याचे चित्र आहे. दहावी, बारावी पुरवणी परीक्षेस नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी लक्षात घेतली तर, ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी पुरवणी परीक्षेला नोंदणी करत असल्याचे आकड्यावरून समोर येते. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालानुसार १६ हजार १४ पैकी विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. त्यापैकी ६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदाचा दहावीचा निकाल लक्षात घेतला, तर पुरवणी परीक्षेला विभागातून यंदा सुमारे २५ हजार ९०६ विद्यार्थी फेरपरीक्षेला बसू शकतात. असे असले तरी, पुरवणी परीक्षेला १२ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

पेपर तपासणी एकत्र
जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर व्हावा यासाठी शिक्षण मंडळ जिल्हास्तरावर तपासणी केंद्र करणार आहे. जिल्हावार कॅम्प करत केंद्रीय पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. एकाच ठिकाणी जिल्ह्यात ही उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा घेण्यासाठी विभागीय मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा केंद्र, उत्तरपत्रिका तपासणी केंद्राचे नियोजन ही करण्यात आले आहे.
- वंदना वाहुळ, विभागीय सचिव, शिक्षण मंडळ, औरंगाबाद

वेध परीक्षेचे
- बारावीचे परीक्षार्थी : ६४७७
- बारावी परीक्षा केंद्र : २२
- दहावीचे विद्यार्थी : १२३७६
- परीक्षा केंद्र : ४९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीला पळ‍विणाऱ्यास शिऊरमध्ये पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
अल्पवयीन मुलीला दुचाकीवर पळवून घेऊन जाणाऱ्या एका तरुणाला दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रविवारी रात्री तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडले. किरण कैलास वैष्णव (वय २० रा. बेगमपुरा, औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलिस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे व अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवणे या स्वरुपाचे गुन्हे आहेत. दरम्यान, या मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस रविवारी रात्री शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना किरण वैष्णव हा अल्पवयीन मुलीला दुचाकीवर संशयास्पद अवस्थेत घेऊन जाताना दिसला. पोलिसांना पाहताच तो शिऊर परिसरातील एका पेट्रोल पंपामागे लपल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघांना पकडून विचारपूस केली असता ते औरंगाबाद शहरातील बेगमपुरा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी बेगमपुरा येथे संपर्क साधण्यात आला. किरण वैष्णव याच्यावर विविध स्वरुपांचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्यातून दरोडा प्रतिबंधक विभागाला देण्यात आली. या दोघांना बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या मुलीला वैष्णव याच्या कारनाम्यांची माहिती दिल्यानंतर तिने यापुढे आई वडिलांना विचारल्याशिवाय कुठलेही पाऊल न उचलण्याची शपथ घेतली व दरोडा प्रतिबंधक विभागाचे आभार मानले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, अविनाश भास्कर, रवीकुमार किर्तीकर व विलास सुगधान यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images