Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सिल्लोड शहरात पाहणी; शहर हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
केंद्रीय तपासणी पथकाने पाहणी करून शहर हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. नगर पालिका शासनाच्या दीड कोटी रुपये बक्षिसाकरिता पात्र ठरली असून लवकरच मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र व बक्षीस मिळणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर पालिकेला २०११च्या जगगणनेनुसार ३३०० स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण करण्यासाठी गुड मार्निंग पथक, उघड्यावर जाणाऱ्यास गुलाबपुष्प भेट, पोलिसात गुन्हे दाखल करणे, कार्टातून दंडात्मक कारवाई, शहरातील चौकांमध्ये ऊठबशा मरायला लावणे आदी उपाययोजना केल्या. यामुळे धाक निर्माण करण्यात आला. याशिवाय पथनाट्य, जनजागरण विद्यार्थी फेरी, रिक्षाद्वारे अावाहन हे प्रयत्न केले. शासनाच्या १२ हजारांच्या अनुदानात पालिकेने एक हजाराची भर टाकून स्वच्छतागृह बांधकामासाठी १३ हजार रुपये दोन टप्प्यात दिले.
शहरातील कामांची जिल्हा व राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणी यापूर्वीच झाली आहे. राज्य समितीच्या अहवालानुसार केंद्रीय समितीने पाहणी करून सिल्लोड शहर हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित केले आहे, असे मुख्याधिकारी कायंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेतूमध्ये आता टोकन सिस्टीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचे काम आठ दिवसांपासून जेएमके इन्फोसॉफ्ट या नव्या खासगी संस्थेकडून सुरू करण्यात आले असून संस्थेने नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी टोकण सिस्टीमच सुरू केले आहे.
सध्या सेतू सुविधा केंद्रामध्ये १५ संगणकांच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक काउंटरसमोर विद्यार्थी, पालकांची मोठी रांग लागलेली असते. यामुळे वेळ वाया जातो. यासाठी आता सेतूमधील प्रत्येक कामासाठी बँकेप्रमाणे टोकण सिस्टीम सुरू करण्यात आले आहे. यामुळे कोणत्या वेळेस, कोणत्या खिडकीसमोर प्रमाणपत्रासाठी जावे लागणार हे विद्यार्थ्यांना कळाल्यामुळे वेळेची बचत होणार आहे. सध्या सेतू सुविधा केंद्रामधून दररोज पाचशे ते सहाशे विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. जेएमके ‌इन्फोसॉफ्टकडे सेतूचा कारभार आल्यापासून सेतू कार्यालयातील माहिती फलक बदलणे तसेच नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. गेल्या आठड्यामध्ये सेतूमध्ये तांत्रिक बाबींचे इन्स्टॉलेशन करण्यात आले होते. सेतूमधून सातबारा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, वय व अधिवास, भूमीहिन, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक, ३० टक्के महिला आरक्षण, वास्तव्य दाखला आदी विविध १८ प्रमाणपत्रे वितरीत केली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनपूर्व मिरचीला ६० रुपये प्रतिकिलोचा भाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यातील मान्सूनपूर्व मिरची तोडणीला सुरुवात झाली आहे. सध्या मिरचीला प्रति किलो ६० रुपये दर मिळत आहे. यावर्षी तालुक्यात अडीच हजार हेक्टरवर मान्सूनपूर्व मिरची लागवड करण्यात आली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे.
गेल्या वर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करण्यात आली होती. पण, भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मिरची रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. काही शेतकऱ्यांनी पिकात जनावरे सोडून मिरची उपटून टाकली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. यावर्षी मात्र हंगामाच्या सुरुवातीला ६० रुपये किलो भाव मिळत आहे. हा भाव १५ दिवसांपासून स्थिर आहे. त्यामुळे अगामी काळातही हा भाव स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कमी जास्त क्षेत्रावर कायम मिरचीची लागवड ठेवलेल्या शेतकऱ्यांना यंदा या पिकातून चांगला पैसा मिळण्याची अपेक्षा आहे.
तालुक्यातील गोळेगाव, पानवडोद, शिवना, आमठाणा, सारोळा, लिहाखेडी, मांडणा, उंडणगाव, अन्वी या परिसरातील गावांमध्ये अडीच हजार हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुभाष अघाव यांनी दिली. अनेक शेतकऱ्यांनी लागवडीकरिता मल्चिंग पेपरचा वापर केला आहे.

मुंबईच्या बाजारात
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या मिरचीची लागवड करण्यात आली आहे. या पिकाची आता तोडणी करण्यात येत आहे. ही निर्यातक्षम मिरची सध्या मुंबई येथे पाठवली जात आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव रोखला जाऊन उत्पादनात वाढ होते. निंदणी-खुरपणीचा खर्च कमी होतो. या शिवाय पुणे, नाशिक, नागपूर, अकोला येथेही माल पाठवला जात आहे.

सध्या मिरची काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्यानंतर भाव प्रति किलो ३० ते ४० रुपयांच्या अासपास स्थिर असतील, असा अंदाज आहे.
- सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅथॉलॉजिस्ट नेमणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या रुग्णांना अत्याधुनिक लॅब चाचण्यांच्या सेवा देण्याचा करार झालेल्या ‘एचएलएल’ कंपनीचा पॅथॉलॉजिस्ट मुंबईत असताना, त्याच्या सह्या जालना, जळगाव व इतर ठिकाणी सर्रास वापरून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे ‘मटा’ने उघडकीस आणले. याबाबत ‘मटा’ने २१ व २२ जून रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ‘एचएलएल’ने त्याची दखल घेत प्रत्येक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नेमण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आता राज्यातील सर्व शंभर-सव्वाशे लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती होणार आहे.
‘एचएलएल लाइफकेअर कंपनी’मार्फत राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये सुमारे शंभर-सव्वाशे प्रयोगशाळा उभारून दैनंदिन; तसेच अत्याधुनिक चाचण्यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत सुमारे २० जिल्ह्यांमध्ये चाचण्यांच्या सुविधा देण्यात येत असतानाच, गोरेगावस्थित (मुंबई) एकाच पॅथॉलॉजिस्टच्या सह्या जालना; तसेच जळगावच्या रिपोर्टवर आढळल्या होत्या व हे रिपोर्ट ‘मटा’च्या हाती लागले होते.याच एकमेव पॅथॉलॉजिलस्टच्या सह्या गोंदिया तसेच चिंचवड (पुणे) येथील रिपोर्टवर आढळून आल्या होत्या व हे रिपोर्टदेखील ‘मटा’च्या हाती लागले होते. यासंदर्भातील वृत्ताची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘एचएलएल’चे पेमेंट रोखण्याचे जाहीर केले होते व कंपनीला खुलासा मागवण्यात आला होता. त्यानंतर एचएलएल कंपनीने प्रत्येक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नियुक्त करण्याची ग्वाही आरोग्य विभागाला दिली आहे.

...त्याशिवाय पेमेंट नाहीच
प्रत्येक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट असणे अनिवार्य आहे. पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखालीच सर्व लॅबमधील चाचण्यांवर प्रक्रिया व्हाव्यात व त्या चाचण्या पॅथॉलॉजिस्टनेच प्रमाणित कराव्यात, असे अपेक्षित आहेत. या संदर्भातील मार्गदर्शक तत्व ‘एमसीआय’ने पुन्हा एकदा काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. पॅथॉलॉजिस्टशिवाय चाचण्या केल्यास त्याचे पेमेंट अजिबात केले जाणार नाही, असे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी ‘मटा’ला सांगितले.

‘एचएलएल’च्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नेमण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व १००-१२५ लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट असणार आहे. कंपनीच्या सर्व कामावर लक्ष असून, कुठल्याही प्रकारची दिरंगाई, चुकीच्या पद्धती खपवून घेतल्या जाणार नाहीत.
- डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण पालिका कर्मचारी, प्रशासन चर्चा फिस्कटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नगर पालिका प्रशासन, तहसीलदार महेश सावंत व नगर पालिका कर्मचारी यांच्यातील चर्चा सोमवारी फिस्कटली. नगर पालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पाच दिवसांपासून संप पुकारला असल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
तीन महिन्याच्या थकित पगार मिळावा, पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम व पतसंस्थेच्या कर्जदारांच्या पगारातून कपात केलेले ६० लाख रुपये द्यावेत, या मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू झाला आहे. संपाच्या पाचव्या दिवशी सोमवारी तहसीलदार महेश सावंत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तहसीलदार, नगराध्यक्ष सूरज लोळगे, नगरसेवक आबा बरकसे, तुषार पाटील, बजरंग लिबोरे, प्रकाश वानोळे व कामगार संघटनेचे अध्यक्ष दगडू पगारे यांच्यात संप मागे घेण्याबद्दल चर्चा झाली. तीन थकित पगारांपैकी त्वरित एक पगार व १२ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उर्वरित दोन पगार दिल्यास संप मागे घेण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दाखवली. पण, नगर पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्वरित एक थकित पगार करणे अशक्य असल्याचे नगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात कर वसुली मोहीम राबवून १५ दिवसानंतर एक थकित पगार करण्यात येईल. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी संप त्वरित मागे घ्यावा, अशी विनंती नगर पालिका प्रशासनाने केली. पण, कर्मचाऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कचऱ्याचे ढीग
मागील पाच दिवसांपासून नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने शहरातील स्वच्छता मोहीम बंद आहे. परिणामी प्रत्येक चौक, मुख्य रस्त्यावर व पाचही प्रभागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे शहरवासियांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात रस्ते दुरुस्तीचे उपमहापौरांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यातील रेणुकामाता कमान ते अहल्यादेवी होळकर चौक या रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहने चालवणे तर दूर पायी चालणेही अवघड झाले आहे. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधी, प्रशासनाला निवेदने दिली. दरम्यान, उपमहापौर स्मिता घोगरे यांनी सोमवारी पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने दुुरुस्तीचे आदेश दिले.
साताऱ्यातील रेणुकामाता कमान ते अहल्यादेवी होळकर चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे गृहप्रकल्प, शाळा, कॉलेज आहे. या रस्त्याचा वापर म्हाडा वसाहतीतील नागरिकही करतात. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना पाठ, मानदुखी व मणक्याचे आजार जडलेले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून डास वाढतात. गेल्या वर्षी खड्ड्यात टाकेला मुरूम आता निघून गेला आहे. उपमहापौर स्मिता घोगरे यांनी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली व मनपा अधिकाऱ्यांना तातडीने मुरूम टाकून दबाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी रमेश बाहुले, आबासाहेब देशमुख, संजय कुलकर्णी, छोटू पटेल, श्रीकांत हुल्याळकर, श्याम भलके, आनंद आघाव, संदीप पवार, जयराम पजई, विश्वनाथ संख, शीला आघाव, साधना गिरकर, प्रिया गिरी, वसुधा हुल्याळकर, योगिता होलिये, बुधवंती जहांगीड, संगीता ठाकरे, स्नेहल पांडव, संगीता वऱ्हाड, सुप्रिया पाटील, पौर्णिमा होलिये, मीना देशमुख आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

आमदार शिरसाट यांचे मनपाला पत्र
आमदार संजय शिरसाट यांनी येथील समस्यांसंदर्भात मनपा प्रशासनाला १४ जून २०१७ रोजी पत्र दिलेले आहे. सातारा देवळाई परिसरातील बांधकाम परवानगी सिडकोकडे होती त्यावेळी ५ वर्षांत १५ कोटी रुपये सिडकोकडे जमा झाले आहेत. त्यातील साडेनऊ कोटी रुपये सिडकोने महापालिकेकडे जमा केले आहेत. त्या पैशातून रेणुकामाता कमान ते अहल्यादेवी होळकर चौक हा ९ मीटर रूंद व १६०० मीटर लांब रस्त्याचे अडीच कोटी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण करावे, इतर रस्ते, पूल, लाइटची कामे करावीत, असे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीस पात्र शेतकरी याद्या आठवड्यात द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्जमाफी मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी आठ दिवसात तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नलव किशोर राम यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (३ जुलै) जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे अधिकारी, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी, लिड बँकेचे प्रतिनिधी, तालुक्यातील सहायक निबंधक, उपनिबंधक यांच्यासह राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केल्यानंतर सहकार विभागाने अध्यादेश काढला. आता कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
एकूण थकबाकीदार शेतकरी, २०१२-१५ या काळात पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांची यादी तसेच २०१५-१६, आणि २०१६-१७ मध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा तीन याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले. या शिवाय दीड लाख रुपये कर्ज असलेले शेतकरी आणि दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी यांचीही यादी तयार करण्याचे निर्देश दिले असून या विषयावर ११ जुलै रोजी पुन्हा बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तीन प्रकारच्या याद्या
एकूण थकबाकीदार शेतकरी, २०१२-१५ या काळात पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांची यादी तसेच २०१५-१६, आणि २०१६-१७ मध्ये नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी अशा तीन याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी काढण्याचा वाद; खुनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी काढण्याच्या कारणावरून एका तरुणावर तिघांनी चाकूने हल्ला केला. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहा वाजता रोशनगेट भागात घडला. या प्रकरणी तिघांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान उस्मान पठाण (वय २३, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) हा मजूर शनिवारी सकाळी रोशनगेट भागात आला होता. तेथील मुबारक हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी काढताना इम्रान एम. लतीफ व त्याचे दोन मित्र तेथे आले, त्यांनी दुचाकी लवकर काढ, असे म्हणत त्यांनी सलमानला शिवीगाळ केली. त्यांना समजावून सांगताना त्यांनी सलमानला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी सलमानचे हात धरले व इम्रानने पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला. हा वार सलमानने चुकवला, पण डावा पाय व गुडघ्यावर चाकुचा वार लागून तो जखमी झाला. या प्रकरणी रविवारी जिन्सी पोलिस ठाण्यात सलमानच्या तक्रारीवरून इम्रान व दोन साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जोगदंड हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नणंदेसोबत नीट का बोलत नाही या कारणावरून विवाहितेला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी सात वाजता भडकलगेट भागात घडला. या प्रकरणी पती व सासू, सासऱ्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कुलसूम रजाखान (रा. भडकल गेट) या विवाहितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली. तू आमचे का ऐकत नाही, नणंदेसोबत नीट बोलत नाही, असे म्हणत मारहाण करण्यात आली. तिच्या सासू, सासऱ्याने धरून ठेवले व पतीने अंगावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विवाहि‌तेचा भाऊ रमीजखान याने तिला सोडवले. यावेळी रमीजखानला देखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पती रजाखान, सासरा उस्मानखान व सासू सलमा बेगम उस्मानखान (सर्व रा. भडकल गेट, टाउन हॉल) यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक योगेश धोंडे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासनाची कर्जमाफी खामगावमध्ये अमान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी नियमित कर्ज भरणा करणारे कर्जदार व सभासदांना मान्य नसल्याची भूमिका खामगाव येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांनी घेतली आहे. त्या संबंधीचे निवेदन संस्थेचे चेअरमन नथ्थुकांत सोनवणे यांनी सोमवारी नायब तहसीलदार उद्धव नाईक यांना दिले.
खामगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे १०१५ कर्जदार असून त्यापैकी ९७० कर्जदार नियमित कर्ज भरतात. त्यांची चालू बाकी दोन कोटी ५७ हजार रुपये आहे. थकबाकी असणारे फक्त ४५ सदस्य असून त्यांच्याकडे पाच लाख १५ हजार रुपयांची थकबाकी आहे. शासनाच्या निकषानुसार थकबाकीत अंदाजे २० सभासद कर्जमाफीला पात्र ठरतात, त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची थकबाकी आहे. पण, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी संस्थेचे चेअरमन सोनवणे यांना घेराओ घालून यापुढे आम्ही कर्जाची परतफेड करणार नाही, असे बजावून कार्यालयास कुलूप ठोकले. नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांचा शासन विचार करेपर्यंत कुलूप काढू देणार नाही, असा पवित्रा सभासद शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आमची मागणी शासनापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी खामगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन नथ्थुकांत सोनवणे, गणेश अन्नदाते, खंडुतात्या सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सेवा संस्थेला कुलूप
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी संस्थेचे चेअरमन सोनवणे यांना घेराओ घालून यापुढे आम्ही कर्जाची परतफेड करणार नाही, असे बजावून कार्यालयास कुलूप ठोकले. नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांचा शासन विचार करेपर्यंत कुलूप काढू देणार नाही, असा पवित्रा सभासद शेतकऱ्यांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची दडी धडकी भरणारी

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यामध्ये पावसाने चांगल्या सुरुवातीनंतर मोठी दडी मारली आहे. पावसाने दिलेली ही हुलकावणी पिकांवर परिणाम करणारी असून, दुबार पेरणीचे संकटही कायम आहे.
यंदा मराठवाड्यामध्ये पावसाने चांगली सुरुवात केली आहे. या पावसामुळे जलसाठ्यामध्ये चांगली वाढ होण्याबरोबरच पेरण्यांनाही वेग आला होता. बीडमध्ये ९० टक्के, लातूर जिल्ह्यामध्ये ८० टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये पावसाने खंड दिला आहे. त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला आहे. हलक्या जमिनीत पेरणी करून उगवून आलेली पिके पिवळी पडू लागली आहेत. आता १० जुलै रोजीच पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हा विलंब दुबार पेरणीला आमंत्रण ठरू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दोन दिवसांमध्ये पाऊस व्हायला हवा
लातूर : जिल्ह्यात यंदा खरीपाच्या ८० टक्के पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत. पहिल्या पावसानंतर पेरणी झालेल्या ठिकाणी आता पिके वाळू लागली आहेत. सलग दहा ते १२ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
लातूर जिल्ह्यात तीन जुलैपर्यंत पावसाची सरासरी २०७ मिलिमिटर आहे. ती वार्षिक सरासरीच्या २५ टक्के आहे. या बाबत बोलताना लातूर तालुक्यातील तांदुळजाचे शेतकरी अरुण कुलकर्णी म्हणाले, ‘पावसाने ताण दिल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. त्याच प्रमाणे वाऱ्यामुळे पिके सुकू लागली आहेत. दोन दिवसांच्या आत जर पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहणार आहे.’
जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बी. एस. रणदिवे म्हणाले की, जिल्ह्यात पेरण्या पुर्णत्वाकडे जात आहेत. ऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे पिके वाळत आहेत, ही खरी बाब असली तरी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात चांगल्या पावसाची शक्यता आहे. शेतात उंदरांची संख्या वाढल्याची शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी मान्य केले.

उंदीर, डुकरांमुळे त्रस्त
लातूर : पावसाने ओढ देण्यामुळे शेतकरी चिंतित आहे, तसाच तो शेतात वाढलेल्या पांढऱ्या उंदरामुळेही त्रासून गेला आहे. हे उंदीर पिके खुरडुन खात आहेत. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे. यंदा शेतकऱ्यांनी पुन्हा उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. उसाच्या पिकाला आता डुकराच्या टोळ्यांचा त्रास होत आहे. रात्री अपरात्री दहा ते पंधरा डुकरांची टोळी उसाच्या फडात शिरुन उसाचा फडशा पाडत आहेत. वन विभागाने डुकराचा, उंदराचा बंदोबस्त करण्याची मागणी अरुण कुलकर्णी यांनी केली.

पावसासाठी पांडुरंगाला साकडे
बीड : जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्या असल्या, तरीही त्यानंतर पावसाने मारलेली दडी जिल्ह्यामध्ये धडकी भरणारी आहे. जिल्ह्यात हाच विषय चर्चेचा असून, आखाडी परतल्यावर पाऊस परत यावा, अशी प्रार्थना शेतकरी पांडुरंगचरणी करत आहेत.
जिल्ह्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस पडला व शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. यावर्षी सरासरीच्या २५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण होते आणि समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग आला होता. गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात नव्वद टक्के पेरण्या झाल्या असल्याची आकडेवारी कृषी विभागाकडे नोंदवली गेली होती. गेल्या पंधरा दिवसांपैकी बहुतेक दिवस कोरडे दिवस गेल्याने पेरलेली पिके उगवले असले, तरी जगण्यासाठी पावसाची गरज आहे. अनेक ठिकाणी पिके पावसाअभावी माना टाकू लागली आहेत. आषाढी एकादशी मंगळवारी आहे. आखाडी वारीच्या पालख्या पंढरपुरातून परत निघाल्यानंतर पाऊस पडेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

उस्मानाबादमध्ये दुबार पेरणीची धास्ती
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार सुरुवातीनंतर काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन-चार दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के पाऊस झाला आहे. रोहिणी व मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात ११-१२ जुलैला पुन्हा पावसाचे जोरदार आगमन होईल, असा अंदाज कृषी विभागासह हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत उगवून आलेली खरिपाची पिके तग धरतील किंवा नाही, याबद्दल शेतकऱ्यांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्याना विलंब होत असल्याने शेतकरी चिंतातूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल जेलमधून रजेवर गेलेले ५७ कैदी फरार

$
0
0

Vijay.Deulgaonkar@timesgroup.com
Tweet : @sourabhsMT

औरंगाबाद ः हर्सूल कारागृहातून संचित व अभिवचन रजेवर गेलेले ५७ कैदी अनेक वर्षे उलटले तरी कारागृहात परतलेले नाहीत. यापैकी २७ बंदिवानाचे फोटोही प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत. या फरार बंदिवानांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बंदिवानामध्ये २० वर्षांपूर्वी पसार असलेल्या ११ बंदिवानाचा देखील समावेश आहे.
हर्सूल कारागृहात जन्मठेपेसारखी दीर्घ मुदतीची शिक्षा झालेले अनेक बंदिवान आहेत. त्यांना संचित व अभिवचन रजेवर जाण्याचा अधिकार आहे, मात्र मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात परतणे बंधनकारक आहे. कारागृह अधीक्षकांकडून शहर पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये रजेवर सुटलेले ५७ बंदिवान कारागृहात परतलेले नसल्याचे दिसून येते. यामध्ये १९७१मध्ये फरार झालेल्या बंदिवानापासून ते २०१६मध्ये रजेवर गेलेल्या बंदिवानांचा समावेश आहे. ५७पैकी २५ बंदिवान हे २०११नंतर कारागृहातून बाहेर पडले असून, अद्याप परतलेले नाहीत.

२७ बंदिवानाचे फोटोच नाही
शहर पोलिसांना हर्सूल कारागृह अधीक्षक कार्यालयाकडून आलेल्या यादीमध्ये २७ बंदिवानाचे फोटोही नसल्याचे दिसून आले, मात्र या बंदिवानाच्या जामीनदारांची नावे व पत्ता त्यांचा शोध घेण्यासाठी देण्यात आला आहे.

महिला बंदिवान देखील फरार
या ५७ फरार बंदिवानामध्ये रियाज बेगम मोहम्मद इस्माइल या महिला बंदिवानाचा देखील समावेश आहे. १४ जून २००९ रोजी कारागृहाबाहेर पडलेल्या रियाज बेगम कारागृहात परतल्या नसल्याने त्यांच्यावर १३ ऑक्टोबर २०१३ रोजी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

२०१३मध्ये नव्याने गुन्हे दाखल
राज्याच्या तत्कालीन तुरुंग महासंचालक मीरा बोरवणकर यांनी कारागृहातून पॅरोलवर सुटून न परतलेल्या बंदिवानांवर नव्याने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार कलम २२४अन्वये सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हर्सूल कारागृहातून संचित व अभिवचन रजेवर गेलेल्या ५७ बंदिवानापैकी कोणीही कारागृहात परतलेले नाही. या बंदिवानाची माहिती पोलिस प्रशासनाला शोध घेण्यासाठी देण्यात आली आहे. या फरार बंदिवानाविरुद्ध सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
- बापुराव मोरे, अधीक्षक, हर्सूल मध्यवर्ती कारागृह

फरार असलेले बंदिवान
नाव...............................फरार झालेले वर्ष
अप्पा कचरू चुंबडे.................१९७१
सय्यद वजीर सय्यद अजीम......१९८२
रहीमखान पिरखान................१९८४
सुनील सुखदेव चेडे.................१९८७
कमलाकर नामदेव दरकसे......१९९०
पांडुरंग नागोराव कोंडमीरे.......१९९२
देविदास मारोती जाधव...........१९९२
रामनाथ लक्ष्मण गाडे..............१९९२
शिवाजी विश्वनाथ ढवळे..........१९९४
गोरख मुसा मुरकुटे................१९९५
धर्माजी नागोराव गुंडेवार.........१९९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिसभा निवडणुकीची धामधूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. जिल्हानिहाय दौरे काढून इच्छुक उमेदवार मतदार निश्चितीसाठी प्रयत्नशील झाले आहेत. पदवीधर मतदार नोंदणीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. याबाबत कुलगुरूंची भेट घेऊन जलील यांनी सविस्तर चर्चा केली.
अधिसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार नोंदणी, मतदारांच्या भेटी आणि तुल्यबळ उमेदवारांना एकत्र आणण्याचे काम वेगात सुरू आहे. पदवीधर (१०), प्राध्यापक (१०), प्राचार्य (१०), संस्थाचालक (०६) आणि पदव्युत्तर प्राध्यापक (०३) अशा पाच प्रवर्गातून ३९ उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. विद्यापीठ विकास मंच, उत्कर्ष पॅनल आणि बामुक्टो या संभाव्य आघाड्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या पॅनलचा प्रचार सुरू झाला असून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालये उघडण्यात आली आहेत. संस्थाचालक, प्राध्यापक व प्राचार्य यांच्या भेटी घेऊन मतदार निश्चितीवर भर देण्यात आला आहे. पॅनेलची ध्येयधोरणे समजावून सांगण्यासाठी उमेदवारांनी प्रचार दौरे केले आहेत. अर्थात, उमेदवारांची नावे जाहीर नसली तरी सक्षम उमेदवाराला आपल्या गटात वळवण्यासाठी प्रमुख उमेदवारांचे प्रयत्न आहेत. पदवीधर प्रवर्गासाठी पदवीधारकांची मतदार नोंदणी सुरू असून १२ जुलैपर्यंत नोंदणीची मुदत आहे. मात्र, मुदत एक महिना वाढवावी अशी मागणी आमदार इम्तियात जलील यांनी केली आहे. आमदार जलील यांनी सोमवारी दुपारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठातून लाखो पदवीधर बाहेर पडले आहेत. मग आतापर्यंत केवळ दोन-पाच हजार मतदारांचीच नोंदणी कशी झाली असा सवाल जलील यांनी केला. निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्याऐवजी खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त मतदारांना सहभागी करून योग्य उमेदवार निवडून द्या असे जलील म्हणाले. महाविद्यालयात जनजागृती शिबिर घेऊन मतदार नोंदणी करावी असा पर्याय त्यांनी सूचवला. या मागण्यांचा योग्य विचार करण्यात येईल असे आश्वासन कुलगुरू चोपडे यांनी दिले. या शिष्टमंडळात डॉ. मोहम्मद फैजुद्दीन सिद्दीकी, अश्फाक सिद्दीकी, परवेज खान, शफीक पटेल, नवाज कुरेशी आदींचा सहभाग होता.

कृती समितीची मागणी
विद्यापीठ कायद्याअंतर्गत अधिसभा सदस्य निवडणुकीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पाहता नोंदणीचा कालावधी पुरेसा नाही. पदवीधर मतदानापासून वंचित राहू नये म्हणून नोंदणीचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना कृती समितीने केली आहे. याबाबत कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर ‘एसएफआय’चे सुनील राठोड, रखमाजी कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राहुल तायडे, अमोल दांडगे, एनएसयुआयचे नीलेश आंबेवाडीकर व युवा सेनेचे विजय सुबुकडे यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकअप व्हॅनची ट्रॅक्टरला ठोस; चालक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
औरंगाबाद-फुलंब्री रस्त्यावरील हाॅटेल माेरयासमाेर फुलंब्रीकडे येणाऱ्या एका भरधाव पिकअप व्हॅनने त्याच्या पुढे असलेल्या ट्रँक्टरला धडक दिल्याने दाेन्ही वाहने उलटली. या अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सहा वाजता झाला. विनायक कडुबा शेजवळ (वय २८, रा. वानेगाव), असे मृत चालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर (एम एच २०, ए वाय ५८५६) व पिकअप व्हॅन (के ए २८, सी ५४९८) ही वाहने फुलंब्रीकडे येत हाेती. अाेव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप व्हॅन ट्रॅक्टर ट्राॅलीवर अादळले. या अपघातात दोन्ही वाहने उलटली.
घटनास्थळाजवळील शेतवस्त्यांवरील नागरिकांनी धाव घेऊन दोन्ही वाहने सरळ केली. ट्रॅक्टर सरळ करताना त्यांना चालक विनायक शेजवळ यांचा मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत अाढळला. महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. शेजवळ यांच्यावर वाणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात अाले. या प्रकरणी पिकअप व्हॅनचालकावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पुढील तपास बी. जे. चव्हाण हे करीत आहेत.

धड-शिर वेगळे
ट्रॅक्टरचालक विनायक शेजवळ हा या ट्रॅक्टरखाली अाल्याने त्यांचे धड मानेपासून वेगळे झाले. पिकअप व्हॅनमधील कोणालाही इजा न झाल्याने चालकासह सर्वजण घटनास्थळाहून पसार झाले. हे वाहन कर्नाटकातील शेळी व्यापाऱ्यांचे आहे. ते वडाेदबाजार येथील अाठवडी बाजारात शेळ्या खरेदीसाठी जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत मुलीवर अत्याचार; पोलिस ठाण्यावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
सराई येथील सात वर्षीय बालिकेवर अल्पवयीन मुलाने केलेल्या अत्याचाराची फिर्याद देण्यास आलेल्या नातेवाईकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, बलात्काराचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालावावे, या मागण्यांसाठी सोमवारी पोलिस ठाण्यावर सराई येथील ग्रामस्थांनी मोर्चा काढला. या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विद्यार्थिनींचा सहभाग होता.
सराई येथील सात वर्षीय मुलगी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर खेळताना गावातीलच अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीची आई, दीर, आजोबा हे फिर्याद देण्यासाठी गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस ठाण्यात पोचल्यावर गुन्हा दाखल करण्यास उशीर केला व पोलिसांनी पीडित मुलीच्या चुलत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये तीन दिवस ठेवण्यात आले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची भेट घेऊन दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती.
या घटनेत सोमवारी सकाळी सराई ग्रामस्थांनी पोलिस ठाणे व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार मोहनलाल हरणे व पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सराईचे सरपंच रामहरी नागे, शंकरराव अधाने, पंचायत समितीचे माजी सभापती दिनेश अंभोरे, विलास चव्हाण, युवराज नागे, बाबुराव नागे, दत्तू नागे, गणेश अधाने, गोविंद काळे, बाळू नागे, अजय चिमणे, गुलाबराव नागे, अजय जाधव, ज्ञानेश्वर मातकर, मुरलीधर दांडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इनामी जमिनीबद्दल तहसीदारांची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील पिल्लू की मशीदच्या इनामी जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री करणाऱ्यांवर तहसीलदार महेश सावंत यांनी नोटीस बजावली आहे. या बेकायदा खरेदी-विक्री प्रकरणाची तक्रार करूनही वक्फ बोर्डाने कानाडोळा केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
शहरातील पिल्लू की मशीदची पैठण-औरंगाबाद रोडवरील सर्वे नं.२७७ मध्ये जवळपास १० एकर जमीन आहे. शहरातील काही भूमाफियांनी या मशिदीच्या इनामदारांना हाताशी धरुन जमिनीची खरेदी विक्री सुरू केल्याचा आरोप आहे. सध्या या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. याबाबत शहरातील खलिपा व लिंबोरे यांनी वक्फ बोर्डाकडे सप्टेंबर २०१५ मध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र, वक्फ बोर्डाने त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
पिल्लूकी मशीदच्या इमानी जागेची बेकायदा खरेदी-विक्री सुरू असल्याची तक्रार तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच त्यांनी इमानी जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्याना नोटीस पाठवली आहे.

तीन दिवसाची मुदत
तीन दिवसांत बांधकाम व जागा मालकीचे अभिलेख सादर करण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. योग्य अभिलेख सादर न केल्यास अतिक्रमणधारकांचे काहीही म्हणणे नाही, असे समजून पुढील कार्यवाही करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ १४४ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या उपकरातून कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या प्रस्तावाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. गेट खरेदीची निविदा प्रक्रिया पार पडली असून जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांच्या पुढाकाराने १४४ बंधाऱ्यांची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर अखेर या बंधाऱ्यांना दरवाजे बसणार आहेत. ज्यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत कोल्हापुरी बंधाऱ्यांना दरवाजे बसविण्यासाठीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी मंजूर झाला. उपकरातून अडीच कोटींची तरतूद या गेटसाठी ठेवण्यात आली. पहिल्या वर्षी कोणत्या बंधाऱ्यांना गेट बसवायचे याबाबत पदाधिकारी व सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. परिणामी प्रक्रिया रखडली. गेल्यावर्षी अर्ध्या वर्षापर्यंत नुसतीच चर्चा झाली. ई टेंडरिंग पद्धतीने निविदा मागविल्या गेल्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. सभागृहात त्यावर चर्चा झाली. गेट खरेदी करण्याबाबत काही सूचना केल्या होत्या. एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवावेत, त्यावर नंबर टाकावेत आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे जेणेकरून गैरप्रकार होणार नाही, अशी सूचना तत्कालीन सदस्य संतोष माने यांनी केली होती. कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटवर चर्चा झाली, पण त्याची अंमलबजावणी न झाल्याने गेल्यावर्षी चांगला पाऊस होऊनही पाणी अडविण्यात प्रशासनाला अपयश आले होते.

रुद्रा कन्स्ट्रक्शनला कंत्राट
दरम्यान सभागृहाची मुदत संपली आणि ही प्रक्रिया पुन्हा एकदा रखडली होती. प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविली. फायनान्शिअल बीडसाठी जुलै महिनाही थांबावे लागेल की काय अशी परिस्थिती होती, पण अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी आढावा घेऊन ही प्रक्रिया तत्काळ मार्गी लावावी, असे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने प्रक्रिया राबविली. यावेळी चार निविदा आल्या होत्या. त्यापैकी रुद्रा कन्स्ट्रक्शन्सची निविदा सर्वात कमी दराची असल्याने त्यांना कंत्राट मिळाल्याचे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. पांढरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढीसाठी कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसविणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात १४४ बंधाऱ्यांना गेट बसविले जातील. ज्याद्वारे हजारो हेक्टर शेतीची सिंचन क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे. - अॅड. देवयानी डोणगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड चाचणी

$
0
0

औरंगाबादेत क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड चाचणी
१२, १३ जुलैला आयोजन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवछत्रपती क्रीडापीठांतंर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश देण्यासाठी निवड चाचणींचे आयोजन करण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागाची निवड चाचणी १२ व १३ जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे.
गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुलात औरंगाबाद विभागातील निवड चाचणी १२ व १३ जुलै रोजी होईल. यात अॅथलेटिक्स, जलतरण, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, तिरंदाजी, ज्युदो, बॉक्सिंग, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग अशा १३ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. लातूर येथील विभागीय क्रीडा संकुलात निवड चाचणी १०, ११ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी गजानन पाटील, शिवकांता देशमुख, दिनकर सावंत, प्रविण ढगे, संजय गाढवे, उमेश बडवे, धीरज मिश्रा, प्रफुल्ल खर्चे, विजय फसाटे, सतीश पहाडे, सतीश भट, विजय डोबाले, शरद कचरे, जगदीश चौधरी, विशाल गर्जे, सचिन पुरी, उज्ज्वला साळुंखे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर विभागाची निवड चाचणी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलावर ५, ६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. अमरावती विभागातील निवड चाचणी ७, ८ जुलै रोजी अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या चाचणीत अॅथलेटिक्स, जलतरण, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, तिरंदाजी, ज्युदो, बॉक्सिंग, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग अशा १३ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
नाशिक येथे १४ व १५ जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुलात चाचणी घेण्यात येईल. मुंबई विभागातील निवड चाचणी धारावी येथील जिल्हा क्रीडा संकुलात १७, १८ जुलै रोजी होणार आहे. पुणे विभागाची निवड चाचणी १९, २० जुलै रोजी बालेवाडी क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे. कोल्हापूर येथे २१ व २२ जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुलात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘एमसीआय’कडून ‘कॅन्सर’ची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्टेट कॅन्सर सेंटर’चा दर्जा मिळालेल्या शहरातील शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ‘एमडी-रेडिओथेरपी’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एमसीआय) निरीक्षकाने सोमवारी (३ जुलै) दिवसभर तपासणी केली. या संदर्भात संबंधित ‘एमसीआय’ निरीक्षकाच्या सकारात्मक अहवालानंतर पुढील वर्षापासून पीजी अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा आणि रुग्णसेवेबद्दल ‘एमसीआय’च्या निरीक्षकाने समाधान व्यक्त केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) दशकापेक्षा जास्त कालावधीपासून रेडिओथेरपी विषयातील पीजी अभ्यासक्रम खंडित झाला असून, अत्याधुनिक सेवा देण्यात येणाऱ्या आमखास मैदानासमोरील शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हा अभ्यासक्रम पुन्हा एकदा सुरू व्हावा, यासाठी मागच्या काही वर्षांपासून तयारी सुरू आहे. सुदैवाने हॉस्पिटलमध्ये रेडिओथेरपी विषयामध्ये एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक व चार सहाय्यक प्राध्यापकांची पदे कार्यरत असून, लिनॅक, सिटी सिम्युलेटर, ब्रेकेथेरपी यासारख्या अतिशय अद्ययावत उपकरणांद्वारे हॉस्पिटलमधील कर्करुग्णांवर रेडिओथेरपीचे उपचार देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे तब्बल १५ ते १६ जिल्ह्यातील कर्करुग्ण उपचार घेण्यासाठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येत आहेत. हॉस्पिटलची भव्य-प्रशस्त इमारतदेखील एक जमेची बाजू आहे. त्यामुळेच हॉस्पिटलमध्ये खंडित झालेला ‘एमडी-रेडिओथेरपी’ अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात यावा, अशी अपेक्षा केली जात होती. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलने हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी मागितली होती. विद्यापीठाच्या टीमने पाहणी करून तशी मान्यता दिल्यानंतर ‘एमसीआय’च्या तपासणीचे शुल्क भरले होते. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून ‘एमसीआय’कडून पाहणी होण्याचे संकेत होते.

बारकाव्यांसह केली शुटिंग
‘एमसीआय’चे निरीक्षक डॉ. के. पी. प्रमोद हे सोमवारी सकाळी साडेनऊलाच हॉस्पिटलमध्ये अचानक दाखल झाले आणि ते दाखल झाल्यानंतरच ते दाखल झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यावेळी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड व त्यांच्या टीमच्या वतीने सकाळचा राऊंड घेतला जात असताना, डॉ. प्रमोद हे दाखल झाले आणि त्यानंतर संबंधित निरीक्षकाने संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलिंपिकसाठी कृती आराखडा

$
0
0

ऑलिंपिकसाठी कृती आराखडा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याचे ऑलिंपिक व्हिजन कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्यातील सर्व वयोगटातील खेळाडूंची इत्यंभूत माहिती गोळा करण्याचे काम क्रीडा विभागाने हाती घेतले आहे.
राज्याच्या क्रीडा विभागातर्फे २०२०, २०२४, २०२८ व २०३२ या वर्षांमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेऊन प्राविण्य मिळवावे या हेतूने राज्याचा ऑलिंपिक व्हिजन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. क्रीडा संचनालयामार्फत ऑलिंपिक व्हिजन कृती आराखडा तयार करण्याकरिता राज्यातील खेळाडूंची सर्वंकष माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हानिहाय प्राविण्यप्राप्त खेळाडूंची एकत्रित माहिती गोळा करण्यात येणार आहे. माहिती गोळा करण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आलेला आहे. हा गुगल फॉर्म शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
राज्यातील सर्व गटातील प्राविण्यप्राप्त खेळाडू, पालक, शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळे, त्यांचे प्रशिक्षकांच्या मदतीने ही माहिती गोळा करण्यात येणार आहे. अॅथलेटिक्स, जलतरण, सायकलिंग, ट्रायथलॉन, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, तिरंदाजी, जिम्नॅस्टिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, नेमबाजी, ज्युदो, कबड्डी, खोखो, तायक्वोंदो, टेनिस, क्रिकेट, सॉफ्टबॉल, बुद्धिबळ, योगा, तलवारबाजी अशा खेळांमधील खेळाडूंची माहिती गोळा करण्यात येणार आहे.
२०१६-१७ या वर्षातील सर्व वयोगटाच्या खेळनिहाय, शालेय राष्ट्रीय स्पर्धा, संघटनांच्या राष्ट्रीय स्पर्धा, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या खेळाडूंची माहिती नोंदवण्यात येणार आहे. तसेच शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धा, संघटनांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व सहभाग घेतलेल्या खेळाडूंची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग खेळाडूंनी पॅरा गेम्स, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केलेल्या कामगिरीचीही नोंद फॉर्म भरताना करून घेण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images