Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परिस्थितीशी झुंजणाऱ्या कोमलला व्हायचे आहे डॉक्टर

$
0
0

Giridhar.Pande@timesgroup.com
Tweet : @giridharpMT
औरंगाबाद ः मुलांच्या भविष्यासाठी दिवसभर शेतात काबाडकष्ट करणारे वडील... संसाराचा रथ ओढण्यासाठी वडिलांना हातभार लागावा म्हणून शेतावर काम करणारी आई... दहा बाय दहापेक्षा कमी जागेत असलेले दोन खोल्यांचे घर, अशी बिकट परिस्थिती बदलून कोमल पळसकरला आपल्या घरात सुखाचा, आनंदाचा दरवळ आणायचा आहे. त्यासोबतच समाजसेवाही तिला करायची आहे. म्हणूनच तिने निश्चय केला आहे खूप शिकण्याचा अन् डॉक्टर होण्याचा. त्यासाठी हवे आहेत समाजाचे आशीर्वाद अन् आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींची साथ.
औरंगाबाद शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पळशी गावात अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करून कोमल भगवान पळसकर या विद्यार्थिनीने दहावीमध्ये ९३.२० टक्के मिळवित घवघवित यश मिळविले आहे. या टक्केवारीवरच हे यश थांबत नाही तर कोमलने पळशीच्या आपल्या धारेश्वर हायस्कूलमध्ये पहिला क्रमांकही पटकावला. सगळ्या गावानं तिच्या या यशासाठी तिची पाठ थोपटली.
शिक्षकांनी, वडीलधाऱ्यांनी दिलेल्या शाबासकीने कोमलला मोठं बळ मिळालं अन् तिने वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण घरची आर्थिक परिस्थिती तिचा अडसर ठरू लागली. वडिलांची अवघी दीड एकर शेती, ती सुद्धा कोरडवाहू. त्यात मराठवाड्यावर पाऊस नेहमीचाच रुसलेला, त्यामुळे वर्षाकाठी शेतातून घरच्यांची पोटं भरावीत एवढंही कसंबस धान्य निघत नाही, तिथे उच्च शिक्षणाचा विचार कुठून करणार? आईच्या शेतावरून काम करण्यानं कितीसा पैसा मिळणार. वडील शेतीतून भाजी-भाकरी मिळवितात, तर आईचा मिठाचा आधार. कोमलचा छोटा भाऊ आठवीत शिकतोय, त्याचाही खर्च आहेच. त्यामुळे दहावीनंतर कोमलला पुढे शिकविण्याची कितीही इच्छा असली तरी मायबापांचे हात थिटे पडतात.
डॉक्टर व्हायचंच, असं तिनं मनाशी पक्क केलं आहे. दिवसभर घरातली कामे, आईला स्वयंपाकात मदत आणि रात्रीचा दिवस करून दहावीमध्ये घवघवीत यश मिळविल्यानंतर परिस्थितीपुढे शरण जायचं नाही, ही तिच्या मनाची जिद्द आहे. त्यामुळेच तिच्या जिद्दीला सलाम तर करायलाच हवा आणि सोबतच तिला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी समाजातून मदतीचे काही हात पुढे येण्याची नितांत आवश्यकता आहे. तुमच्या मदतीने ती निश्चितच तिचे ध्येय गाठण्यात यशस्वी होईल, यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुर्दशा हीच व्हिआयपी रोडची ओळख

$
0
0

दुर्दशा हीच व्हिआयपी रोडची ओळख

खड्डे, तुटलेले दुभाजक, पार्कींगने गेली शोभा

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशन ते दिल्ली गेट हा रस्ता व्हिआयपी रोड म्हणून ओळखला जातो. पोलिस आयुक्तालय, विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर आहेत. तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थाने देखील याच मार्गावर आहेत. मात्र, खड्डे, तुटलेले दुभाजक, रस्त्यावर होणारी बेशिस्त पार्किंग व दुभाजकावर वाळत घातलेल्या कपड्यांनी या मार्गाची दुर्दशा झाल्याचे चित्र आहे. दुर्दशा हीच व्हिआयपी रोडची आता ओळख होऊ लागली आहे.

व्हिआयपी रोड कशामुळे

रेल्वे स्टेशन ते दिल्लीगेट मार्गाची ओळख व्हिआयपी रोड म्हणून झाली आहे. या मार्गावर महापौर, पोलिस आयुक्त, उपायुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांची निवासस्थाने आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेस्टेशन विक्रीकर कार्यालय, आरटीओ, विशेष पोलिस महा‌निरीक्षक ऑफिस, मध्यवर्ती बसस्थानक, पोलिस मुख्यालय, सिटी क्लब, आमखास मैदान, कॅन्सर हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, सुभेदारी गेस्ट हाऊस आदी महत्त्वाची कार्यालये या मार्गावर आहेत. शहरात येणाऱ्या व्हिआयपी या मार्गावरून नेहमीच येणे जाणे करतात. त्यामुळे या मार्गाला व्हिआयपी रोड म्हणून ओळख मिळाली आहे.

दुभा‌जकांची झाली दुर्दशा

प्रमुख असलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी दुभाजकाची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी दुभाजक तोडून रस्त्यात गॅप निर्माण करण्यात आला आहे. या गॅपमधून धोकादायक वाहतुकीमुळे अपघात घडण्याचे प्रकारही वाढले आहेत. महापौर बंगल्यासमोरील दुभाजक देखील याच पद्धतीने तोडून रस्ता तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुभाजकामध्ये असलेली झाडे देखील बेशिस्तपणे वाढली असून त्याकडे देखील मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. किलेअर्क परिसरात दुभाजकावर कपडे वाळत टाकण्यात येतात. यामुळे या दुभाजकांना ओंगळवाणे स्वरुप प्राप्त झाले आहे.

रस्त्यांची झाली चाळणी

सुमारे पाच किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत तसेच काही ठिकाणी रोडवर पॅचवर्क करण्यात आले आहेत. यामुळे या मार्गावरून जात असताना कारमधील व्हिआयपी लोकांना चांगलेच झटके सहन करावे लागत आहेत. लहान मोठे खड्डे चुकवतच या मार्गावरून वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे.

वाहनांची बेशिस्त पार्किंग

या मार्गाला लागलेले आणखी एक ग्रहण म्हणजे चार चाकी वाहनांच्या पार्किंगचे आहे. या प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय तसेच मनपा आयुक्तांच्या बंगल्यासमोर तर अशी वाहने हमखास दिसून येतात. शहरात चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येते. मात्र, या व्हिआयपी मार्गावरील बेशिस्त पार्किंगकडे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब ठाकरे स्मृतिवनाच्या विरोधावरून एमआयएममध्ये फूट

$
0
0

बाळासाहेब ठाकरे स्मृतिवनाच्या विरोधावरून एमआयएममध्ये फूट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवनाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास विरोध करण्यावरून महापालिकेत एमआयएम मध्ये फूट पडली. या विरोधामुळे शिवसेना - भाजपचे नगरसेवक एकत्र आले. स्मृतिवनाच्या विकासाचे काम झालेच पाहिजे, असा मुद्दा त्यांनी लावून धरला, सभापतींनी त्याला मान्यता दिली.

सिडकोतील एमजीएमच्या परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतिवन व स्मारक उभारण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी शासनाने २० कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून त्यापैकी पाच कोटी रुपयांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पासाठी शशी प्रभू अँड असोसिएटस् या संस्थेची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने मांडला होता. या विषयावर चर्चा सुरू असताना एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन रशीद उठून उभे राहिले. ते म्हणाले, एमआयएम या प्रस्तावाचा विरोध करीत आहे. ‘बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे’ असा उल्लेख ठाकरे यांनी केला होता, त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो असे म्हणत सय्यद मतीन यांनी विषयपत्रिका फाडली. आम्ही सभात्याग करीत आहोत असे सांगत त्यांनी सभागृहातील एमआयएमच्या नगरसेवकांना सभागृहाच्या बाहेर येण्याची खूण केली. मात्र, मतीन यांना त्यांच्या उर्वरित तीन सहकाऱ्यांनी साथ दिली नाही. त्यामुळे मतीन एकटेच बाहेर गेले. मतीन यांच्या भूमिकेला छेद देताना शिवसेनेचे रेणुकादास वैद्य म्हणाले, असे वर्तन विकासाला, हिंदुत्वाच्या विचाराला खीळ घालू शकरणार नाही. मतीन यांनी कामकाजात अडथळा निर्माण केला आहे,त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांचा विरोध नोंदवून हा विषय मंजूर करा. सभापती गजानन बारवाल यांनी विरोध नोंदवून घेत शशी प्रभू अँड असोसिएटस् या संस्थेला पीएमसी म्हणून नियुक्त करण्याचा विषय मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’साठी जबाबदार कोण

$
0
0

‘भूमिगत’साठी जबाबदार कोण
नगरसेवकांचा सवाल, टेक्निकल ऑडिटचा अहवाल सादर करण्याचे सभापतींचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
भूमिगत गटार योजना येत्या काळात १०० टक्के फेल होणारी योजना आहे. या योजनेवर देखरेख करणारे अधिकारी २०१८ मध्ये महापालिकेच्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. अधिकारी निवृत्त झाल्यावर या कामासाठी आम्ही कुणाला जबाबदार धरायचे, असा खडा सवाल नगरसेवकांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. दरम्यान, या योजनेच्या कामाचे टेक्निकल ऑडिट करून त्याचा अहवाल स्थायी समितीच्या बैठकीत ठेवा, असे आदेश सभापतींनी दिले.
भूमिगत गटार योजनेच्या कामाचे पडसाद स्थायी समितीच्या यापूर्वीच्या दोन बैठकांपासून उमटत आहेत. आज गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देखील या योजनेचे पडसाद उमटले. भाजपचे राजगौरव वानखेडे व शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य यांनी या योजनेतील विविध त्रुटींवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वानखेडे म्हणाले, ‘भूमिगत गटार योजना येत्या काळात निश्चितपणे फेल ठरणार आहे. ही योजना फेल झाल्यावर कुणावर जबाबदारी निश्चित करायची. या योजनेवर सध्या काम करणारे अधिकारी २०१८ यावर्षी निवृत्त होणार आहेत.’ राजू वैद्य म्हणाले, ‘भूमिगत गटार योजनेच्या कामावरून स्थायी समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत दोन तास काथ्याकूट झाला. योजनेचे टेक्निकल व फायनांशियल ऑडिट करण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. ऑडिट करून त्याचा अहवाल सभागृहाच्या समोर ठेवा.’ गटार योजनेसाठी वापरण्यात आलेल्या पाइपचे टेस्ट रिपोर्ट देखील सभागृहात ठेवण्याची मागणी वानखेडे यांनी केली. भूमिगत गटार योजनेसाठी नागरिकांकडून वसूल करण्यात आलेल्या सिवरेज टॅक्स मधून किती पैसे जमा झाले याची माहिती द्या, अशी मागणी देखील त्यांनी केली. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी म्हणाले, ‘तीन वर्षात ४२ कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम देखभाल दुरुस्तीसाठी वापरण्यात येते असा उल्लेख त्यांनी केला.’ या उल्लेखाला वानखेडे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, भूमिगत गटार योजनेच्या कामात महापालिकेचा हिस्सा भरण्यासाठी ही रक्कम नागरिकांकडून वसूल करण्यात आली, अधिकारी दिशाभूल करीत आहेत. या संदर्भात २०१० मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त तपासून पहा, असे आव्हान त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वानखेडे यांच्या अशा पवित्र्यामुळे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी वरमले. ते म्हणाले, मी या गोष्टीला नकार देत नाही, पण युजर्स चार्जेस देखभाल दुरुस्तीसाठीच वापरले जातात.
सभापती गजानन बारवाल यांनी भूमिगत गटार योजनेबद्दलची चर्चा गांभीर्याने घेतली. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत टेक्निकल ऑडिट सादर करा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
इंजिनिअरिंग कॉलेजला ३६ लाखांचे पेमेंट
भूमिगत गटार योजनेच्या कामाचे थर्डपार्टी ऑडिट करण्यासाठी १८ फेब्रुवारी २०१६ या दिवशी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला वर्कऑर्डर दिली आहे. ७२ लाख रुपयांत हे काम करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. या महाविद्यालयाला आतापर्यंत ३६ लाख ५६ हजार रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. या महाविद्यालयाने केलेल्या ऑडिटचा अहवाल स्थायी समितीच्या समोर ठेवा, असे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारस्थान रचून जाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. विठ्ठल लघाने यांना आरोपी हरिभाऊ लाटे आणि सहकाऱ्यांनी शेतीच्या वादावरून कट कारस्थान रचून जाळल्याचे कोर्टामध्ये गुरुवारी (६ जुलै) सिद्ध झाले. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली.
याप्रकरणी मृत डॉ. विठ्ठल लघाने यांचे भाऊ नानासाहेब भाऊराव लघाने (रा. रांजणगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १९९३ मध्ये मौजे खामजळगाव येथील गट क्रमांक ५४ मधील ३ हेक्टर १८ आर जमीन फिर्यादीने आरोपी हरिभाऊ अण्णासाहेब लाटे (रा. खामजळगाव, ता. पैठण) याच्याकडून विकत घेतली. तरीही जमिनीचे भाव वाढल्याचे पाहून आरोपी हरिभाऊ याने चार एकर जमीन फिर्यादीला विकत मागितली. त्यामुळे एकूण जमिनीपैकी १ हेक्टर ५९ आर जमीन हरिभाऊला विकली होती. मात्र, विकलेली जमीन दोघांना विकून हरिभाऊ मोकळा झाला. दरम्यान, पैशांची गरज होती म्हणून फिर्यादीने उर्वरित जमीन आनंदा मुरलीधर निकम यांना विकली. मात्र, जमीन देण्यासाठी हरिभाऊ हा निकम यांना धमकावत होता. कंटाळून निकम यांनी ती जमीन अशोक चव्हाण यांना विकली. अशोक चव्हाण यांना शेती करणे शक्य नसल्याने त्यांनी डॉ. विठ्ठल लघाने यांना शेती करण्यासाठी मुख्त्यारनामा करून दिला व डॉ. लघाने यांनी शेतीच्या कामासाठी सुभाष निकम याला नेमले, पण आरोपी हरिभाऊ हा सुभाष याला शेती करू देत नव्हता व त्याने मारहाण केल्याची तक्रार दिल्यानंतर बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन हरिभाऊला अटकदेखील झाली. याचा राग आरोपी हरिभाऊच्या मनात होता. दरम्यान, १७ ऑक्टोबर २०१२ रोजी डॉ. विठ्ठल लघाने हे दामू भवर, फकीरचंद गाडेकर यांच्यासह कारने शेताकडे निघाले होते. त्याचवेळी आरोपी हरिभाऊ, आरोपी भावड्या उर्फ भाऊसाहेब गोरख पवार (रा. लामगव्हाण, ता. पैठण), आरोपी बद्री काशीनाथ शिंदे (रा. अमरापूर वाघुंडी, ता. पैठण), आरोपी नारायण सर्जेराव डोळस (रा. अमरापूर वाघुंडी, ता. पैठण) हे मागून जीममधून आले आणि त्यांनी लघाने यांच्या कारला जोराची धडक दिली. कार थांबताच चौघांनी लघाने यांच्यासह तिघांवर हल्ला चढवला. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप जाधव यांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

डिझेल टाकून जाळले!
सशस्त्र आरोपी बघून तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी डॉ. लघाने यांच्या डोक्यात टॉमीने जोराचा वार केला. यात डॉ. लघाने हे जागीच कोसळले व बेशुद्ध झाले. तेवढ्यात जीपमध्ये ठेवलेल्या कॅनमधील डिझेल लघाने यांच्या अंगावर टाकून आरोपी हरिभाऊ याने त्यांना पेटवून दिले. यात डॉ. लघाने यांचा जळून मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध कलम ३०२, ३२३, ३४ अन्वये बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दोन कलमांन्वये शिक्षा
खटल्याच्या सुनावणीवेळी, जिल्हा सरकारी वकील शिवाजी नवले यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फकीरचंद गाडेकर, दामू भवर, मेराज पठाण तसेच डॉक्टरांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली आणि आरोपींनी कट कारस्थान रचून खून केल्याचे कोर्टात सिद्ध झाले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने चौघा आरोपींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, तर आरोपी भावड्या, आरोपी बद्री व आरोपी नारायण यांना कलम ३२३ अन्वये दोन महिने साधा कारावास ठोठावला. दंडाची निम्मी रक्कम म्हणजेच २० हजार रुपये मृताच्या कुटुंबियांना देण्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘गंगाखेड शुगर’मध्ये ३२८ कोटींचा घोटाळा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
परभणी जिह्यातील गंगाखेड शुगर अॅंड एनर्जी फॅक्टरीच्या बहुचर्चित ३२८ कोटींच्या पीककर्ज घोटाळ्याची मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. जवळपास २९ हजार शेतकऱ्यांना गंडा घातल्याप्रकरणी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमा, असे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले.
गंगाखेडमधील गिरीधर केशव साळुंके, नंदकुमार गणपतराव भालके, वामन मारुती नागरगोजे, अविनाश चौधरी, पांडुरंग राठोड व अन्य दोन शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली आहे. त्यानुसार परभणी येथील सिंडिकेट बँक, युको बँकेची गंगाखेड शाखेसह लातूर व नांदेडची शाखा, बँक आँफ इंडियाची अंबाजोगाई शाखा, आंध्र बँकेची नागपूर शाखा, युनाटेड बँकेची नागपूर शाखा आणि रत्नाकर बँक मुंबई या बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून या खासगी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या परस्पर पीक कर्ज उचलले. याचिकाकर्त्याची प्रल्हाद बचाटे यांनी बाजू मांडली. शासनातर्फे अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलमध्ये महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जमिनीचा सातबारा तात्काळ देण्याची मागणी करीत महिलेने तहसील कार्यालयात रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी एक वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानाबाई यशवंता मोकळे (रा. आडगाव सरक, ता. औरंगाबाद) असे या महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही महिला तहसील कार्यायात आली. आडगाव माऊली येथील अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनीचा सातबारा लगेच देण्याची मागणी तीने केली. कर्मचारी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना या महिलेने पिशवीत आणलेली रॉकेलची बाटली काढून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकरणी रामेश्वर लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डमी उमेदवार बसवला; परीक्षार्थीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई, ठाण्यातील पोलिस भरतीत डमी उमेदवार बसवून पास झालेल्या आरोपीला अटक करून गुरुवारी (६ जुलै) कोर्टात हजर केले असता शनिवारपर्यंत (८ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यु. पी. देवर्षी यांनी दिले.
या प्रकरणी अनिल बबनराव डोईफोडे (ह. मु़. समतानगर, औरंगाबाद) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात भाड्याच्या घरात राहात होता. मार्च-एप्रिल २०१७ दरम्यान ठाणे पोलिस आयुक्तालयात पोलिस भरती असताना झनक चरांडे व वाहब शेख यांना तेजराव साबळे व भरत रुपेकर यांनी परीक्षा पास करून देण्याबाबत सांगितले. त्यानुसार साबळे व रुपेकर यांनी पोलिस परीक्षेचे फॉर्म भरले होते. त्या दोघांची मैदानी चाचणी डमी उमेदवार झनक चरांडे, वाहब नवाब शेख या दोघांनी दिली होती. लेखी परीक्षेसाठी त्यांनी राजू नागरे याला या बाबत सांगितले आणि राजू नागरे व त्याचा मित्र दत्ता नलवाडे या डमी उमेदवारांनी त्यांची लेखी परीक्षा दिली. या चारही डमी उमेदवारांनी परीक्षा दिल्यानंतर मुख्य उमेदवार चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी भारत राजेंद्र रुपेकर (रा. नानेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यास अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी सुनावली. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील झेड. वाय. दुर्राणी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदेड पालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या नांदेड-वाघाळा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडत गुरुवारी (दि.६) काढण्यात आली. यंदाचे महापौर पद अनुसूचित जाती (एससी) महिला प्रवर्गासाठी सुटले आहे. २० प्रभागातून ८१ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. त्यापैकी १५ जागा अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव आहेत. या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. महापौर शैलजा स्वामी यांचा वॉर्ड ओबीसी पुरुषासाठी सुटला असल्याने त्यांचे पती किशोर स्वामी हे तेथून नशीब आजमावतील.
पालिकेच्या शंकरराव चव्हाण सभागृहात सकाळी ११.१५ वाजता आरक्षण सोडतीच्या कार्यक्रम सुरुवात करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रारंभी प्रास्ताविक करून प्रभाग रचना व आरक्षणाबाबत माहिती दिली. साधारणतः १२ वाजून ५ मिनिटांनी संपूर्ण तपशील निश्चित करण्यात आला.
आरक्षणाच्या घोषणेमुळे पालिकेच्या सभागृहाला आणि परिसराला यात्रेचे रुप आले होते. सभागृहात प्रवेश करताच वॉर्डाची रचना, त्याची व्याप्ती आदीचे नकाशे लावण्यात आले होते. नव मतदार आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या मोबाईलमध्ये पटापट त्याचे फोटो घेतले आणि बंदीस्त केले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सुरुवातीला पालिकेच्या आयुक्तांचे निवेदन होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते जाफरअलीखान पठाण यांनी काही म्हणने मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आयुक्तांनी त्यांना खाली बसवले. पालिकेच्या प्रशालेतील संजना नागोराव थोरात, सुरज केशव सजने, विशाल दामोदर थोरात, मंजू मानसी बोडके यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
पालिकेच्या विद्यमान महापौर शैलजा स्वामी यांचा वॉर्ड ओबीसी पुरुषासाठी सुटला आहे. त्यामुळे त्यांचे पती किशोर स्वामी हे तेथून नशीब आजमावतील. माजी महापौर सत्तारभाई हे जुन्या नांदेडातून तर उपमहापौर शफी अहेमद कुरेशी हे सुद्धा त्यांच्याच वॉर्डातून निवडणूक लढवतील. जुन्या नांदेडातील होळी भागातून १४ ड मधून शिवसेनेचे बाळे खोमणे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर नव्या मोंढातून नवल पोकर्णा हे पुन्हा उभे राहतील. काँग्रेसचे गट नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडको नवीन नांदेड भागातून अॅड. संदीप पाटील-चिखलीकर हे पुन्हा उभे राहतील तर पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती अनुजा तेहरा व शिवसेनेचे पप्पु जाधव वजिराबाद भागातून रिंगणात उतरतील.
यावेळी सुमती व्याहाळकर, निवृत्ती सदावर्ते, उदय गुंजकर, संतोष पांडागळे, शितल खांडील, महेंद्र खेडकर, विरेंद्रसिंघ गाडीवाले, बाळू खोमणे, अॅड. महेश कनकदंडे, उमेश मुंढे, शिवसेनेचे शहर प्रमुख दत्ता कोकाटे, रत्नाकर वाघमारे, उपायुक्त कंदेवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘फायर एनओसी’ नसल्यास हॉस्पिटल, बिअर बार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘फायर एनओसी’ नसलेले बिअरबार, हॉस्पिटल बंद करण्यात येतील, असा इशारा स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी गुरुवारी दिला. त्याचबरोबर फटाक्यांच्या दुकानांचे परवाने देखील रद्द करण्यात येणार अाहेत. ‘फायर एनओसी’शिवाय यापुढे कोणत्याही व्यावसायिक इमारतीला पूर्णत्वाचा दाखला दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बारवाल यांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांसह पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई येथील अग्निशामक दलांच्या कामकाजाची पाहणी केली. ते तीन दिवस या शहरांच्या दौऱ्यावर होते. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘या सर्व शहरांत अद्ययावत यंत्रणा आहे. त्या शहरांच्या तुलनेत आपण खूपच मागे आहोत. औरंगाबादमधील यंत्रणेत सुधारणा करावी लागेल.’
फायर एनओसी न घेतलेल्या इमारतांनी पूर्णत्वाचा दाखला दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय फायर एनओसी नसलेले बिअर बार, हॉस्पिटल बंद केले जातील, असाही इशारा त्यांनी दिला.

अग्निशमन केंद्रांची उभारणी लवकरच
अग्निशामक दलासाठी १८ कर्मचारी आउटसोर्सिंगवर घेतले जातील, असे सभापती बारवाल यांनी सांगितले. या दलासाठी ४२ मीटरची शिडी खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरात पाच अग्निशमन केंद्रांचे बांधकाम येत्या काळात केले जाणार आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल योग्य प्रकारे व्हावा, यासाठी लक्ष देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड, लातूरात पुनर्वसु बरसले

$
0
0


टीम मटा, औरंगाबाद
गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने गुरुवारी बीड, लातूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. दोन्ही जिल्ह्यात पुनर्वसू नक्षत्र जोरात बरसल्याने शेतकयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले.
लातूरात दमदार हजेरी
लातूर - तब्बल १५ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लातूर व परिसरात गुरुवारी सांयकाळी सुमारे चाळीस मिनीटे जोरदार पाऊस झाला. या पावासामुळे बळीराजाची चिंता काहीशी दूर झाली असून दुबार पेरणीचे संकट सध्यातरी टळले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावासाने हुलकावणी दिली होती. आद्र्रा नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. त्यामुळे शेतकयासमोर दुबार पेरणीचे संकट उभे टाकले होते. यामुळे सर्वत्र अस्वस्था वाढत चालली होती. आद्र्रा नक्षत्रात पाऊस न पडल्यामुळे पिके सुकु लागली होती. दरम्यान, पुनर्वसु नक्षत्राला बुधवारीच सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळनंतर पाऊस सुरु झाला. लातूर शहर व परिसरात सांयकाळी चाळीस मिनिटे पाऊस झाल्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.

बीडमध्ये पिकांना जीवदान
बीड - गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने बीड शहरासह परिसरात हजेरी लावली. यामुळे शेतकयांतून समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान लाभले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शेतकयांनी पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळनंतर पाऊस सुरू झाला. बीड शहरासह व परिसरात सांयकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वृक्षारोपणाचा नुसता गाजावाजा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मोठमोठी भपकेबाज होर्डिंग, जाहिराती आणि दिखाऊ सोहळ्यांच्या भूलभुलैय्यात वनमहोत्सवाची शुक्रवारी (७ जुलै) सांगता होताना पाच दिवसांत उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात फक्त ५५ टक्के रोपट्यांची लागवड झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महोत्सवाचा पुरता बोजवारा उडाला असून टार्गेट गाठण्यासाठी सुमारे पावणे सात लाख रोपांची लागवड करण्याचे आव्हान आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चार कोटी रोपे लागवडीचे उद्दिष्टे शासनाने हाती घेतले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी १२ लाख २०० रोप लागवडीचे उद्दिष्टे देण्यात आलेले आहे. त्यापैकी साडेपाच हजार रोपांची लागवड करण्याची जबाबदारी एकट्या वनविभागाकडे दिली आहे. उर्वरित रोपे विविध शासकीय विभाग तसेच ग्रामपंचायतींच्या मदतीने लावली जात आहेत. या संबंधित विभागानाही टार्गेट देण्यात आले आहे. हा वन महोत्सव सुरू होऊन सहा दिवस झाले असले तरी अद्यापही ६ लाख ८४ हजार रोपांची लागवड होणे बाकी असल्याचे समोर आले आहे. वन विभागाने लागवडीचे टार्गेट जवळपास गाठले आहे. मात्र, कृषी, उद्योग आदींसह अन्य महत्त्वाच्या काही विभागांना ५० टक्केही उद्दिष्टे अद्याप गाठता आलेले नाही.


अन् गळपटले!
‘दीड लाखांचे टार्गेट असताना कृषी विभागाने ३६ हजार रोपांची लागवड केली. उद्योग विभागाने सुमारे २५ हजार रोपांची लागवड केली. आता दोन दिवसात ५५ हजार रोपांची लागवड या विभागाला करावी लागणार आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाव मोठे; लक्षण खोटे
‘यंदा मराठवाड्यासाठी ७४ लाख वृक्षलागवडीचे टार्गेट असून यासाठी एक कोटी ३५ लाख रोपे तयार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला ३६५ झाडे मोफत देण्यात येणार असून ही झाडे जगवण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत मजुराला झाडांना पाणी देणे, निगा राखणे, तसेच संरक्षणाचे काम देण्यात येणार आहेत,’ अशी माहिती वनमहोत्सवापूर्वी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली होती. मात्र, खरेच मराठवाड्यात एवढे वृक्षारोपण झाले आहे का, याबद्दल शंका निर्माण होत आहे.


तीन जिल्ह्यांचे उद्दिष्ट पूर्ण
वन विभागाच्या यंदा राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पामध्ये मराठवाड्यातील बीड, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्याने प्रतिसाद देत अवघ्या पाच दिवसांत उद्दिष्ट पूर्ण केले. मात्र, औरंगाबाद (५६.५९ टक्के), जालना (६८.५६ टक्के) जिल्ह्याची पिछाडी आहे. तर हिंगोली जिल्ह्यात ८७.७५, लातूर ९३.६४, परभणी जिल्ह्याने पाच दिवसांमध्ये ७०.३२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.

जिल्ह्याचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण होईल. काही विभागाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. पाऊस नसणे आणि पाण्याचा अभाव यामुळे त्यांनी वृक्षारोपण लांबविले आहे. अजून जिल्ह्यातील आकडेवारी येत आहे. - सतीश वडस्कर, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नळदुर्ग लूटप्रकरणी आणखी एक जण ताब्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लुटणाऱ्या व यातील लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्याकडून उस्मानाबाद पोलिसांनी आतापर्यंत १ कोटी ४८ लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली. त्याशिवाय या प्रकरणात बुधवारी रात्री कर्नाटकातून पोलिसांनी आणखी एकास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून पोलिसांनी ३२ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.
हैदराबाद येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार जैन यांचे तीन नोकर १९ जून रोजी चार लाखांची रोकड घेऊन मुंबईला निघाले होते. जैन यांच्या आजारी नातेवाईकाच्या उपचारासाठी ही रक्कम नेण्यात येत होती. मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी कारचा पाठलाग करुन चार लाख रुपये लुटले होते. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान, या टोळीचा छडा लावण्यात उस्मानाबाद पोलिसांना आठ दिवसांनी यश आले होते. कारमधील सुरेंदरसिंग हा होस्पेट येथून पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला होता. त्यांनी श्रवणसिंग याची चौकशी करून त्याला अटक केली होती. होस्पेट येथून रुपसिंग भोरसिंग राजपूत (वय ४०, रा. होस्पेठ, कर्नाटक) यालाही अटक केली. त्याच्या घरातून पोलिसांनी ७२ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली. या सर्व नोटा पाचशे व दोन हजार रुपयांच्या आहेत.

या प्रकरणाचा तपास करणारे फौजदार अनिल किरवाडेनी आरोपींकडून हस्तगत केलेल्या रकमेपैकी ४४ लाख रुपये इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हडपल्याचे समोर आल्यांनतर ही माहिती समजल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किरवाडेसह तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करून या चौघांनाही मंगळवारी अटक केली होती.
दरम्यान, या प्रकरणात बुधवारी रात्री कर्नाटकातून पोलिसांनी आणखी एकास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून पोलिसांनी ३२ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘समृद्धी’साठी तलाठ्यांकडून मनधरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील ६२ पैकी ४० गावांचे दर प्रशासनाने निश्चित केले असले, तरी अनेक बाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या शेतकऱ्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी प्रशासनाने तलाठ्यांवर सोपवली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यात दरनिश्चित केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून औरंगाबादसह गंगापूर तसेच वैजापूर तालुक्यांमध्ये दरांबाबत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या दरांबाबत भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी तलाठी संवाद साधणार आहेत. ३० जून रोजी समितीने गावनिहाय तसेच जमिनीच्या दर्जानुसार दर जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत दर जाहीर करण्यात आले आहेत. तर गंगापूर तालुक्यात १२ ते २५ लाख तर वैजापूर तालुक्यामध्ये एकरी १३ ते २१ लाख रुपये दर देण्यात आला आहे.
रेडिरेकनर तसेच खरेदी विक्रीचे व्यवहार तपासून दर निश्चिती केली असली, तरी औरंगाबादजवळ असलेल्या गावांच्या तुलनेत वैजापूर आणि गंगापूरच्या गावांमध्ये तुलनेत दर कमी दिल्यामुळे या तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांमध्ये दराबाबत नाराजी आहे. ही नाराजी तलाठी दूर करण्याचा प्रयत्न करणार असून त्याचा अहवाल प्रशासनाला देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार शेतकऱ्याना गंगाखेड शुगरने घातला गंडा

$
0
0

परभणी - गंगाखेड येथील उद्योजक तथा रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्सने जिल्ह्यातील तब्बल दहा हजार शेतकऱ्याच्या नावे परस्पर ३२८ कोटींचे कर्ज उचलून गंडा घातला आहे. पाच राष्ट्रीयकृत आणि एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शुगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रताप केला असून या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या पुर्वीच औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आर्थिक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून २४ जुलैपर्यंत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात ५ जुलै रोजी रात्री ११.५५ वाजता गिरीधर शिवाजी सोळंके (३६, रा. नागापूर ता. परळी) या शेतकऱ्याने गंगाखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम ४०६, ४०९, ४१७, ४२०, ४६७, ४७१, १२० (ब) भादवी प्रमाणे गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. चे सर्व संचालक मंडळ, अधिकारी आणि विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. या फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे कारखान्याच्या लोकांनी पदाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून परभणी, बीड, उस्मानाबाद आदी परिसरातील तब्बल ८ ते १० हजार शेतकऱ्यांचे बनावट कर्ज प्रकरणे करून तब्बल ३२८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांच्या पैकी गिरीधर सोळंके या शेतकऱ्यांच्या नावे ९३ हजार ६०० रुपये परस्पर पिक कर्ज उचलले आहे. सदर प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हा शाखा व स्थानिक गुन्हा शाखेच्यावतीने सुरू झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात यावा, असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आहेत. या प्रकरणात काही शेतकऱ्यांची नावे पुढे आली आहेत. त्या शेतकऱ्यांनी कधीही बँकेकडे कर्जाची मागणी केली नाही. परंतु, आता त्यापैकी एका शेतकऱ्यांवर परभणीच्या सिंडीकेट बँकेचे ३ लाखाचे कर्ज आहे. गंगाखेड येथील एका माजी नगरसेविकेवर नागपूरच्या आंध्रा बँकेचे २ लाख ८५ हजार शेती कर्ज आहे. याशिवाय, हैदराबाद बँकेचे एका शेतकऱ्यांवर ९९ हजार पिक कर्ज दाखवण्यात आले आहे. हा सगळा प्रताप गंगाखेड शुगर लि. च्या चेअरमनसह पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप होत असून या प्रकरणात एकूण ३२८ कोटींचे कर्ज उचलल्या गेले आहे.
वर्षभरापूर्वी काही शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केले असता त्यांच्या नावे पूर्वीचेच कर्ज असल्याची माहिती सिबील रिपोर्टवरून त्यांना समजली होती. त्यानुसार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड पोलिसात त्यावेळी तक्रार देखील दिली होती. परंतु चौकशी झाली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार मधुसुदन केंद्रे यांनी सर्व बँकांशी पत्र व्यवहार करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बँकांनी त्यांना माहिती दिली नाही. त्यानंतर हा सर्व प्रकार गंगाखेड शुगरनेच केल्याची खात्री झाल्यावरून औरंगाबादच्या खंडपीठात याचिका दाखल झाली. त्यानुसार न्यायालयाने आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले आहेत. या संबंधीचा अहवाल २४ जुलै पर्यंत सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.
दरम्यान, या संदर्भात याचिकाकर्ते आमदार केंद्रे यांनी हा घोटाळा एवढाच नसून ७०० कोटीपर्यंत असण्याची शक्यता आहे. सर्व प्रकरण उघडे पाडण्याच्या आम्ही प्रयत्नात असल्याचेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. तर या प्रकरणात गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांची बाजू ऐकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाइल बंद होता. वारंवार संपर्क करूनही ते नॉट रिचेबलच राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पाण्यासाठी २२ कोटींवर ‘पाणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच जिल्ह्याला पावसाने चिंब केले असले, तरी फेब्रुवारी ते जून या महिन्यांमध्ये पाण्यासाठी तब्बल २२ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात आले. फेब्रुवारी ते मे या कालावधीमध्ये १७ कोटी ८६ लाख, तर जूनमध्ये साडेचार कोटी रुपये पाण्यावर खर्च झाले.
गेल्यावर्षी दमदार पाऊस झाला असला तरी गंगापूर, वैजापूर तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे या तालुक्यांमध्ये टँकर लवकर सुरू करावे लागले. मराठवाड्याच्या तुलनेत यंदा सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू होते. सिल्लोड, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागली. त्यामुळे प्रशासनाने टंचाई असलेल्या गावांमध्ये नळ दुरुस्ती, इंधन विहीर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहीर संपादन तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात ४ जूनपर्यंत ३६९ गावांमध्ये ४३६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी मे अखेरपर्यंत तब्बल १७ कोटी ८६ लाख रुपये खर्च करण्यात आले. जून महिन्यात पाण्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. जिल्हाप्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे या निधीची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वाहन चोरी टोळीचा म्होरक्या पोलिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील विविध भागातून दुचाकी, चारचाकी वाहनांची चोरी करून देशभरात विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना चिकलठाणा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून दोन हायवा ट्रक जप्त करण्यात आले. टोळीचा म्होरक्या शहर पोलिस दलातील पोलिस नाईक संदीप नामदेव मानकापे असल्याचे समोर आले आहे.
विजय भगवान जाधव (३१), विनोद दामोधर अरबट (रा. अय्यप्पा मंदिरासमोर, बीड बायपास), सादिक शेख नूद अहमद शेख (मौलवीगंज, धुळे), कवडे (येवला, नाशिक) आणि पोलिस नाईक संदीप नामदेव मानकापे (जवाहरनगर पोलिस ठाणे) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी विजय जाधव, विनोद अरबट (पाटील) आणि सादिक शेख हे तिघे अटकेत आहेत. उर्वरित दोघे पसार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, झाल्टा फाट्याजवळील अंबिका पेट्रोल पंप परिसरातून १४ जून रोजी मध्यरात्री हायवा ट्रक (एमएच २० सीटी ३९०९) चोरीला गेली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपास केला. फिर्यादींनी संशय व्यक्त केलेल्या सर्व संशयितांवर सहाय्यक फौजदार एन. बी. कटकुरी हे लक्ष ठेऊन होते. त्यातून त्यांनी बीड बायपास परिसरातील विजय जाधव आणि विनोद अरबट पाटील यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ काळ सोकावला !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अक्षरशः हंड्याने पाणी देऊन पिके जगवण्याची वेळ आली आहे. पुढील दोन तीन दिवस पाऊस न पडल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.
हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस पडणार असे भकित वर्तवले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस मिमी पाऊस पडला. परिणामी, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तालुक्यातील जवळपास पंचवीस टक्के खरीप क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर मागच्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने, लागवड केलेली पिके कशी जगवावी या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी हंड्याच्या सहाय्याने पिकाना घोट घोट पाणि देऊन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी माहिती देताना तालुक्यातील गेवराई तांडा येथील शेतकरी एम पठाण म्हणाले, ‘यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडल्याने मी माझ्या पाच एकर शेतात कापसाची लागवड केली. मात्र, मागच्या वीस दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने, शेतातील पीक कसे जगवावे ही चिंता मला सतावत आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून माझ्या कुटुंबातील सदस्य व काही मजूर बादलीच्या सहाय्याने पिकांची चूळ भरणी करून पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहोत.’

कृषिमंत्री फुंडकरांकडे मदतीची मागणी
मराठवाड्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी पूर्ण केली. मात्र, त्यानंतर २५ दिवसांपासून पाऊस गायब झाला व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या, शेतकऱ्यामध्ये दुबार पेरणीची शक्ती राहिली नसून सरकारने तातडीने पंचनामे करून बियाणे व पेरणीचा खर्च द्यावा, अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली आहे.

पाच एकरात कापूस लावला. मात्र, वीस दिवसांपासून पाऊस गायब आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कुटुंबातील सदस्य व काही मजुरांच्या मदतीने पिकांची चूळ भरणी करून पिके जगवत आहे. दुबार पेरणीचा खर्च करायलाही खिशात पैसा नाही. - एम. पठाण, शेतकरी, गेवराई तांडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ व्हॉटसअॅप ग्रुपमुळे महिलेला मिळाली वैद्यकीय मदत

$
0
0

व्हॉटसअॅप ग्रुपमुळे महिलेला मिळाली वैद्यकीय मदत

औरंगाबाद हैदराबाद पँसेजरमध्ये घडला प्रकार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हाय ब्लडप्रेशर व पॅरेलिसीसचा त्रास असलेली ६५ वर्षाची महिला औरंगाबाद हैदराबाद पॅसेंजरमध्ये चक्कर येऊन बेशुद्ध पडली. शुक्रवारी दुपारी हा प्रकार मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ घडला. रेल्वेत असलेल्या रेल्वे प्रवासी सेनेच्या सदस्यांनी व्हॉटसअप ग्रुपवर टाकलेल्या माहितीनंतर या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांना तात्काळ जालना येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

जेरस सुधाकर डकले (वय ६५, रा. जुना जालना) ही महिला दुपारी जालन्याला जाण्यासाठी दीड वाजता हैदराबाद पँसेजरमध्ये बसली होती. मुकुंदवाडी स्टेशनच्या पुढे डिकले यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या. घामाने त्यांचे अंग भिजले होते. यावेळी डब्ब्यामध्ये रेल्वे प्रवासी सेनेचे सदस्य नाज मोमीन, दीपज्योती घोरपडे व संदीप कुरील उपस्थित होते. त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांना माहिती दिली. डिकले यांनी बेशुद्ध होण्यापूर्वी फक्त नाव व जुना जालना असे सांगितले होते. सोमानी यांनी नांदेड नियंत्रण कक्षाला ही माहिती देत पँसेजर क्रॉसिंगसाठी न थांबवता थेट नेल्यास महिलेला मदत मिळण्यास उशीर होणार नाही, अशी विनंती केली. नियंत्रण कक्षाने ही मागणी मान्य करीत ही पँसेजर क्रॉसिंगसाठी थांबणार नाही याची व्यवस्था केली. यानंतर महाराष्ट्र पोलिस मित्र या व्हॉटसअॅप ग्रुपवर सोमानी यांनी ह‌ी माहिती टाकली. जालना मुख्यालयात एटीएस विभागात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक निमेष मेहेत्रे यांना देण्यात आली. त्यांनी त्यांचे कर्मचारी संजय गवई यांना महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी पाठवले. अवघ्या दहा मिनिटांत नातेवाईकांचा शोध घेत ही माहिती देण्यात आली. जालना रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर पोहचल्यानंतर १०८ रुगणसेवेच्या अँब्यूलंसमधून त्यांना उपचारासाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या मदतकामी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे एपीआय भगवान कांबळे, रेल्वे नियंत्रण कक्षाचे उपअधिक्षक मिथिलेश यांचा देखील सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणाऱ्यांची रवानगी हर्सूल कारागृहात

$
0
0

औरंगाबाद ः महावितरणकडून वाढून आलेले वीज बील कमी करुन नवीन इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या माजी कर्मचाऱ्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. सय्यद यांनी दिले.
ही कारवाई बुधवारी (५ जुलै) दुपारी पाचच्या सुमारास आंबेडकर चौकात करण्यात आली होती. तक्रारदाराला वाढीव वीज बील आले होते व वीज बील न भरल्याने मीटर बंद करण्यात आले होते. बंद मीटर सुरू करण्यासाठी तक्रारदार चार जुलै रोजी ‘महावितरण’च्या जाधववाडी कार्यालयात गेला असता, आरोपी प्रभाकर सांडू फुले (३८, रा. कान्होबा मंदिराजवळ, हर्सूल) याने बिलाची रक्कम कमी करून नवीन मीटर बसवून देण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती व आरोपी फुलेला दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी फुलेला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील शिवाजी नवले यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images