Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ ऑरिकहॉल डिझाइनला देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाउनशिप लिमिटेडच्या (एआयटीएल) ऑरिकसिटी इमारतीला ‘बेस्ट बिल्डिंग इन इंडिया’ तर वास्तुविशादर आय. एम. कादरी यांना ‘बेस्ट आर्किटेक्ट’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
टाइम्स नेटवर्कच्या वतीने या दोन्ही पुरस्कारांना डीएमआयसीला गौरविण्यात आले. औरंगाबाद परिसरातील शेंद्रा आणि बिडकीन येथे डीएमआयसीचा एक टप्पा विकसित होत आहे. दोन वर्षांपू्र्वी शेंद्रा परिसरातील पायाभूत सुविधांचे काम शापूर्जी पालंजी या कंपनीकडून केले जात आहे. याच कंपनीला ऑरिकहॉल उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. १२५ कोटी रुपये खर्चून ही पाच मजली इमारत उद्योग क्षेत्रातील एक अभिनव इमारत म्हणून ओळखली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑरिकहॉलच्या उभारणीचे भूमिपूजन झाले होते. याठिकाणी दोन मजल्यांचे स्लॅब झाले आहेत. अडीच लाख चौरसफुटांत पाच मजले उभारणार असून सर्वात खालच्या मजल्यात डीएमआयसीचे कमांड कंट्रोल सेंटर असणार आहे. राज्यातील सर्वात मोठे मध्यवर्ती सुविधा केंद्र म्हणून ऑरिकहॉल नावारूपास येणार आहे. पाचव्या मजल्यावर डीएमआयसीचे ऑफिस असणार आहे. टाइम्स नेटवर्कच्या वतीने सर्वोत्कृष्ट बिल्डिंग म्हणून डीएमआयसी आणि बेस्ट आर्किटेक्ट म्हणून आय. एम. कादरी यांना गौरविण्यात आले.

ऑरिकहॉलच्या डिझाइनला आणि आर्किटेक्टला गौरविण्यात आले. डीएमआयसीची इमारत निश्चितपणे एक मॉडेल म्हणून साकारली जाईल. याठिकाणी उद्योजकांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातील. - गजानन पाटील, सरव्यवस्थापक, डीएमआयसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ अपहृत मुलाचा मृतदेह सापडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
घरासमोर खेळण्यासाठी गेलेला १७ वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी (७ जुलै) दिघी शिवरातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशाल गायकवाड असे मृत मुलाचे नाव आहे.
वाळूज परिसरातील दिघी ( काळेगाव ) येथील विशाल शांतीलाल गायकवाड (१७) हा रविवारी खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. तो रात्री उशीरापर्यंत घरी न असल्याने त्याचे वडील शांतीलाल गायकवाड यांनी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी तक्रार दिल्यानंतर वडिलांनी गावातील काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर सोडून दिले. मात्र, आज विशालाचा मृतदेह दिघी काळेगाव व कनकोरी शिव रस्त्यावर आसलेल्या गट नंबर ९८ येथील नवनाथ पेहरकर यांच्या विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी विहिरीवर मोठी गर्दी केली होती.

चौघांना घेतले ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतेदह बाहेर काढला. हा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घाटी येथे दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड करून चार जणांना ताब्यात घेतले असून विचारपूस सुरू करण्यात आली आहे. या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आनंदाची बहार चिरंतन टिकवा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गतिमान झालेल्या आजच्या जीवनशैलीत सुख, समाधानासाठी प्रत्येकजण धडपडतो, तरीही मानसिक स्वास्थ मिळणे दुरापास्त झाले आहे. आपल्याला वेळीच चांगल्या-वाईट गोष्टीची जाण झाल्यास जीवनात आनंदाची बहार कायमस्वरूपी टिकवता येते,’ असे प्रतिपादन पुण्याच्या ऑल स्माइल फाऊंडेशनचे संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी केले.
शुक्रवारी सायंकाळी तापडिया नाट्यमंदिरात ‘संस्कार आणि मानसिक स्वास्थ्य – एक शास्त्रीय दृष्टिकोन’ हा टाइम्स ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. देशमुख यांचे व्याख्यान झाले. डॉ. देशमुख म्हणाले, ‘पाली भाषेत जो शब्द ‘संखारा’ असा वापरल्या जातो तो संस्कृत भाषेत ‘संस्कार’ असा वापरला जातो. आपल्या पंचेंद्रियामार्फत कुठलीही परिस्थिती आपल्या मनात संवेदनांच्या रूपात नोंद होते. संस्कार म्हणजे कुठल्या परिस्थितीत आपण कुठली कृती करायला पाहिजे ती स्मृती. आईच्या पोटात गर्भावस्थेत असल्यापासूनच आपल्यावर संस्कार होतात. त्यातील काही सुसंस्कार असतात आणि काही कुसंस्कार. चेतन मन हे संस्कार समजून-उमजून विचारपूर्वक बनवते. मग ते संस्कार अचेतन मनात साठवले जातात. अचेतन मन हे संस्कारांचा साठा वापरून आपोआप विजेच्या वेगाने शरीराला चालवणारे यंत्र आहे. त्यामुळे सुसंस्कार असलेले अचेतन मन आपोआपच आपल्याच शरीराला आणि नातेसंबंधांना फायदा होईल असे आदेश देते. तसेच कुसंस्कार असलेले अचेतन मन आपोआपच आपल्याच शरीराला आणि नातेसंबंधांना हानी होईल असे आदेश देते.
चुकीचे संस्कार आपोआपच ताण, नैराश्य आणि मनोकायिक आजार निर्माण करतात. नाते-संबंधांमध्ये दुरावा यायला लागतो. निर्णयक्षमता कमी होते. आनंद आणि यश दृष्टीपथातून दूर जातात. या अचेतन मनाच्या कामावर चेतन मनाचे नियंत्रण नसते. अचेतन मनातील चुकीचे संस्कार बदलून तेथे बरोबर संस्कार जमा करणे हा एकमेव उपाय अचेतन मनाला नियंत्रणात आणू शकतो,’ असे डॉ. देशमुख म्हणाले.

‘पीस अँड हॅपिनेस’ उद्या
मार्गदर्शनासाठी पुण्याच्या धर्तीवर डॉ. सचिन देशमुख आता औरंगाबादमध्ये उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा मन:शांती सहजपणे कशी मिळवावी, हे शिकवणारा एक दिवसाचा ‘पीस अँड हॅपिनेस प्रोग्राम’ रविवारी (९ जुलै) औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ज्यांना इतका वेळ काढता येत नसेल, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम तीन दिवसांत विभागून ११, १२ आणि १३ जुलै रोजी रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत आयोजित केला. वैयक्तिक समुपदेशनासाठीसुद्धा ते औरंगाबाद येथे उपलब्ध राहणार आहेत. अधिक माहिती मिळवण्यासाठी ९०४९३३४००६ किंवा ९८२३४६७८३६ या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकेल.

ज्यांच्या मनात याआधीच कुसंस्कार बनून गेले त्यांना त्यांच्या संस्कार आणि मनावर काम करणे गरजेचे आहे. म्हणजेच अचेतन मनातील कुसंस्कार बदलून त्या ठिकाणी सुसंस्कार बनवायला हवेत. त्यासाठी फक्त विचारांवर काम करून किंवा धान्य करून हा उद्देश साध्य होणार नाही. त्यासाठी वैज्ञानिक पद्धत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. - डॉ. सचिन देशमुख, मानसोपचार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ परभणी अवैध वाळूसह वीस ट्रक जप्त

$
0
0


परभणी - प्रशासनाने सील केलेल्या अवैध वाळूच्या साठ्यातून वाळू चोरून नेत असलेल्या वाळू माफियांवर छापा टाकून पोलिसांनी २० ट्रक जप्त केले. ही कारवाई शनिवारी दुपारी पालम तालुक्यातील पारवा शिवारात अप्पर पोलिस अधिक्षक पानसरे यांच्या पथकाने केली असून यामुळे अवैध वाळू व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत.
येथील पोलिस दलाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पालम हद्दीतील मौजे पारवा शिवारातील गायरान जमिनीवर वाळू माफियांनी अवैधरित्या साठवलेला साठा प्रशासनाने सील केला होता. मात्र, या सील केलेल्या साठ्यातून काही जण अवैधरित्या वाळू चोरून नेत असल्याचे समजले होते. त्यानुसार अप्पर पोलिस अधिक्षक पानसरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ननवरे यांचे पथक तयार करून या ठिकाणी शनिवारी दुपारी १ वाजता अचानक छापा टाकला. यावेळी सदर ठिकाणावरून तीन ट्रकने रेती भरण्याचे सुरू होते. शिवाय, जवळच वाळू भरण्याच्या तयारीत असलेले १७ ट्रक देखील उभे होते. या सर्व गाडी चालकांसह गाड्या जप्त करण्यात आल्या.
यानंतर अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी भोसले, पालमचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना बोलावून पंचनामा करण्यात आला. तेव्हा या ठिकाणी तीन ट्रकमध्ये भरलेली १५ ब्रास वाळूसह इतर रांगेत रिकामे उभे असलेले १७ ट्रक असे एकूण २० ट्रक जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १ कोटी २० लाख रूपये असून या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी विजय बोधले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, भविष्यात देखील जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि चोरटी वाहतुक करणायांविरूद्ध अशीच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक पानसरे यांनी दिला आहे.
#

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे टिप्पर पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला असून अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेला एक टिप्पर बनावट चावी बनवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेला. या घटनेतून वाळू माफियाने जिल्हाधिकारी कार्यालयाला टार्गेट करीत आव्हान निर्माण केले आहे. तीन दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून महसूल विभागाचे अधिकारी हतबलपणे टिप्परचा शोध घेत आहेत.
तहसीलदारसह तलाठी पळवून नेलेले टिप्पर परत मिळविण्यासाठी वाळू माफियाना विनावनी करीत असून त्यांची मनधरणी करताना दिसत आहेत. उस्मानाबाद शहरातील अकबर शेख या वाळू माफियाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावलेले टिपर (क्रमांक एम. एच. २५ यु १७१३) रातोरात पळवून नेले असून कडक सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने अवैध वाळू विक्री विरोधात मोहीम उघडली असून सहा टिप्पर पकडले आहेत. यपूर्वीही वाळू माफियाने प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पथकावर कारवाई करण्यासाठी गेले असता अंगावर टिप्पर घालत प्राणघातक हल्ला केला होता त्यात अधिकारी बचावले होते. या घटनेत पुरेशी कारवाई न झाल्याने आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून टिप्पर पळवून नेण्यापर्यंत वाळू माफियाची मजल पोहचली आहे.



अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईची गरज
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून ही वाळू सोलापूर, परभणी, बीड जिल्ह्यातून कळंब व इटकळ मार्गे येते. महसूल आरटीओ व पोलिस विभागातील काही अधिकारी यांचे त्यांना पाठबळ असल्याने राजरोसपणे हा धंदा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून वाळूचा टिप्पर चोरीला गेल्याची घटना खरी आहे. त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत. वाळू माफियाला मोकाट सोडले जाणार नाही.
डॉ. चेतन गिरासे, उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालकमंत्र्यांना खासदार सव्वाशेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेनेच्या जिल्ह्यातील संघटनात्मक फेरबदलात पालकमंत्री रामदास कदम यांच्यावर खासदार चंद्रकांत खैरे सव्वाशेर ठरले असून, त्यांनी पुन्हा एकदा पक्षावर वर्चस्व मिळवल्याचे शनिवारी (८ जुलै) जाहीर झालेल्या पदाधिकारी नियुक्तींच्या पहिल्या यादीतून स्पष्ट झाले.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत संघटनेवर वर्चस्व कुणाचे हे अधोरखीत केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेतील संघटनात्मक बदलाची चर्चा सुरू होती. जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर फेरबदल होतील असे मानले जात होते, पण बदलाला बराच वेळ लागला. आता नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत खैरे यांचे वर्चस्व दिसते. आमदार संजय शिरसाट यांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी फ्री हँड देण्यात आला असून, पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांचे कार्यक्षेत्र वाढवून ग्रामीण भागाचे विद्यमान जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांचे पंख कापले आहेत.
प्रभारी महिला संपर्क संघटक म्हणून माजी महापौर कला ओझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओझा यांना खासदार खैरे यांच्यामुळेच महापौरपद मिळाले होते, आता खैरे यांच्यामुळेच त्यांची संपर्क संघटक म्हणून नियुक्ती झाल्याचे मानले जात आहे. नगरसेविका सुनीला आऊलवार यांना प्रभारी महिला सहसंघटक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आऊलवार गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत महत्वाच्या पदावर आहेत. खैरे यांच्या शिफारशीमुळे महापालिकेत त्या स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाल्या आहेत. आमदार संदीपान भुमरे यांना सिल्लोड, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख त्रिवेदी यांचे कार्यक्षेत्र कमी झाल्याचे मानले जात आहे. महापालिकेचे माजी सभापती विजय वाघचौरे यांना औरंगाबाद पश्चिमचे शहरप्रमुख करून आमदार शिरसाट यांना फ्री हँड देण्यात आला आहे. शिरसाट यांच्यामुळेच वाघचौरे महापालिकेत सभापती झाले होते. आताही शिरसाट यांना मजबूत करण्यासाठी वाघचौरे यांना नेमल्याचे बोलले जात आहे. विश्वनाथ स्वामी यांना औरंगाबाद पूर्व चे शहरप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. औरंगाबाद मध्यच्या शहरप्रमुखाबद्दल मात्र निर्णय होऊ शकला नाही. गोपाळ कुलकर्णी आणि बाळासाहेब थोरात यांच्यात या ठिकाणी स्पर्धा आहे. कुलकर्णी खैरेंच्या जवळचे कार्यकर्ते आहेत, तर थोरात यांनी पालकमंत्र्यांना धरून ठेवले आहे.

तीन पैकी एकाच संघटकाची नियुक्ती
विधानसभा संघटक म्हणून नवीन जबाबदारी शिवसेनेने निश्चित केली आहे. नगरसेवक राजू वैद्य यांच्याकडील शहरप्रमुख पदाची जबाबादारी काढून घेण्यात आली असून, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून त्यांच्याकडे नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. औरंगाबाद मध्य व पश्चिमच्या संघटकाची मात्र नियुक्ती करण्यात आलेली नाही. संघटकपदी नियुक्ती झाल्यामुळे वैद्य यांना औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्व शक्तीने काम करण्याची संधी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चीन दौऱ्यातून शिवसेनेची माघार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुचर्चित चीन दौऱ्यातून शिवसेनेने माघार घेतल्यामुळे आता महापालिका आयुक्त, महापौर यांच्यासह भाजपचे दोन नगरसेवक या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण रविवारी सायंकाळी मुंबईला रवाना होणार असून सोमवारी पहाटे अडीचच्या विमानाने बिजिंगला जाणार आहेत.
चीन सरकारने ड्युहाँग शहरात १४ ते १७ जुलै दरम्यान विकास परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण महापालिका आयुक्त व महापौरांना चीन सरकारने पाठवले. या दोघांसह अन्य तिघांना दौऱ्यात सहभागी होण्याची संधी दिली. त्यात अन्य तीन कोण यावरून आठ दिवसांपासून पालिकेचे वातावरण ढवळून निघाले आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता महापौर, आयुक्तांनी या दौऱ्यात सहभागी होऊ नये अशी भूमिका सभागृहनेते गजानन मनगटे यांनी घेत या दौऱ्याला सुरुवातीला विरोध केला, पण त्यानंतर लगेचच दौऱ्यातील शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचे नाव देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून चीन व भारत यांचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्हीही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्यामुळे महापौर, आयुक्तांनी या दौऱ्यात सहभागी होऊ नये असे मत व्यक्त करीत एमआयएमने प्रथम चीन सरकारचा पुतळा जाळला. त्यानंतर सर्वसाधारण सभेत चीन दौरा रद्द करो, अशा घोषणा देत राजदंड पळवला. या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शनिवारी चीन दौऱ्यातून नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचे नाव मागे घेतले. जंजाळ या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आयुक्त डी. एम. मुगळीकर, महापौर भगवान घडमोडे, पालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक कचरू घोडके या दौऱ्यात सहभागी होतील हे स्पष्ट झाले आहे. सोमवारी पहाटे अडीच वाजता चीनला जाणाऱ्या विमानात बसणारे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी बिजिंगला पोचतील. १४ जुलै रोजी बिजिंगहून ड्युहाँग शहरासाठी रवाना होतील. ड्युहाँगहून १६ जुलै रोजी ते पुन्हा बिजिंगला येणार असून तेथून १७ जुलै रोजी मुंबईला येणार आहेत.

चीनचा दौरा हा राजकीय नसून शासनाने आयोजित केला आहे. विकासाच्या दृष्टीने आपल्या शहरासाठी या दौऱ्याचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक या दौऱ्यात सहभागी होत आहेत. महापालिकेवर त्याचा बोजा पडणार नाही. शिवसेनेने आतापर्यंत फक्त राजकारणच केले. चांगल्या कामात ते सहभागी होत नाहीत. - किशनचंद तनवाणी, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दारू दुकानाविरोधात गारखेडावासी आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उल्कानगरीमध्ये प्रस्तावित दारू दुकानास तीव्र विरोध करत शनिवारपासून (८ जुलै) गारखेड्यातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली. या मोहिमेला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्हा प्रशासनाने हिताचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
उल्कानगरी येथील मालखरे क्लासिक परिसरात देशी दारूचे एक दुकान प्रस्तावित आहे. ही माहिती समजातच येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. ज्या इमारतीत हे दुकान प्रस्तावित आहे, ती इमारत निवासी व व्यापारी वापरासाठी आहे. या नागरी वसाहतीत अनेक महिलांचे गृहउद्योग आहेत. तरीही या ठिकाणी दारू दुकानास परवानगी कशी दिले जाते, प्रस्ताव कसा तयार केला जातो, असा सवाल नागरिकांनी केला आहे. या दुकानास नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून त्याचा एक भाग म्हणून येथील महापालिका वॉर्ड कार्यालयाजवळ स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. भाजप नगरसेवक दिलीप थोरात, सुरेंद्र कुलकर्णी, जालिंदर शेंडगे, सागर नीळकंठ, राजू पाटील यांच्यासह परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता. आमदार अतुल सावे यांनीही या नागरिकांची भेट घेत आंदोलनासंदर्भात माहिती जाणून घेतली व आंदोलनास पाठिंबा दर्शविला. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांची नागरिकांनी भेट घेत प्रस्तावित दुकानास एनओसी देऊ नका, अशी निवेदनाद्वारे विंनती केली. राज्य उत्पादन शुल्क विभागासही निवेदन देत दारू दुकानास विरोध असल्याचे नागरिकांनी कळविले आहे.

आजही जनजागृती
दिवसभरात साडेचारशेहून अधिक नागरिकांनी निषेध पत्रकावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरी करणारे नागरिक याच परिसरातील आहेत हे हे समजण्यासाठी त्यांच्या आधारकार्डाची फोटो कॉपी अर्जासोबत जोडली आहे. रविवारीही स्वाक्षरी मोहीम सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सह्यांचे पत्र सोमवारी जिल्हा प्रशासनास देण्यात येणार आहे. या दुकानास विरोध करण्यासाठी जागरुक नागरिकांनी उल्कानगरी व परिसरात पत्रके वाटली.

शी दारूचे दुकान रहिवासी भागात प्रस्तावित करणे चुकीचे आहे. या परिसरात अनेक महिला बुटीक, भाजी पोळी केंद्र आदीसह अन्य गृह उद्योग चालवितात. देशी दारू दुकानामुळे त्यावर मोठा परिणाम होईल. मद्यपी लोकांमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. - अर्चना बोडखे, रहिवासी

दारू दुकानास आमचा कडाडून विरोध राहणारच. रहिवासी भागात दारूचे दुकान कसे प्रस्तावित केले जाते. त्या विरोधात नागरिकांनी लढा सुरु केला असून स्वाक्षरी मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. - सुरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक

प्रस्तावित देशी दारूच्या दुकानामुळे परिसरातील शांतता भंग होईल. अनेक प्रश्न निर्माण होतील. रहिवासी भागात असे दुकान नको. त्यास शेवटपर्यंत कडाडून विरोध करणार. - दिलीप थोरात, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ उद्योगांच्या मदतीसाठी इन्क्युबेशन सेंटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठवाड्यातील उद्योगांच्या मदतीसाठी, परिसराच्या विकासात महत्वपूर्ण सहभाग नोंदविण्यात आमचा कायम सक्रिय सहभाग राहिलेला आहे. सरकारच्या स्टार्टअप आणि स्टँड अप इंडिया मोहिमेत नवीन उद्योग औरंगाबाद परिसरात सुरू होत आहेत, सुरू होतील. त्यांच्या मदतीसाठी वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये इन्क्युबेशन कम अॅक्सलरेशन सेंटर लवकरच सुरू करण्यात येईल,’ अशी घोषणा चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड असोसिएशनचे (सीएमआयए) अध्यक्ष प्रसाद कोकिळ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सीएमआयएची नूतन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या आगामी वर्षातील योजनांची माहिती कोकिळ यांनी दिली. उपाध्यक्ष रितेश मिश्रा, सचिव विनोद नांदापूरकर, माजी अध्यक्ष आशिष गर्दे, सदस्य कमलेश धूत, नीलेश कापडिया, हेमंत कापडिया, अद्वैत कंक, उत्सव माछर आदींची यावेळी उपस्थिती होती.
कोकिळ पुढे बोलताना म्हणाले, ‘सीएमआयएतर्फे उद्योगासह परिसर विकासाचे महत्वपूर्ण उपक्रम राबविले जातात. औरंगाबादसह मराठवाड्यात नवनवीन उपक्रम राबविले जातात. पुढील वर्षासाठी आम्ही काही उद्दिष्ट्ये ठरविली आहेत. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) मध्ये अँकर प्रकल्प यावा, उद्योजकता वाढावी, स्थानिकांना रोजगार वाढावा, यासाठी सीएमआयएकडून प्रयत्न केले जातील.’

उद्योगपूरक विकास
‘सरकारसोबत जगाच्या कुठल्याही देशात जायची आमची तयारी आहे. औरंगाबादची कनेक्टिव्हिटी कशी वाढेल ? रेल्वे, विमानसेवा कशी वाढेल त्यासाठी पुढाकार घेतला जाईल. पाणीप्रश्न, रेन वॉटर हार्वेस्टिंग, इज ऑफ डुइंग बिझनेस, ग्रीन कव्हर वाढविणे, औद्योगिक वसाहतीतील प्रदुषण कमी करणे यावर आमचा भर असणार आहे. राजकीय मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सरकारी संस्थांसोबत ‘को ऑर्डिनेशन’ करून उद्योगपूरक विकासाला चालना दिली जाईल,’ असे कोकिळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गृहनिर्माण संस्था रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तालुक्यातील गृहनिर्माण तसेच अन्य सहकारी संस्थांनी ३१ जुलैपूर्वी लेखापरीक्षण पूर्ण न केल्यास त्या सहकारी संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तालुका उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिला आहे.
औरंगाबाद तालुक्यात २२४३ हून अधिक सहकारी संस्था आहेत. त्यापैकी ११०० सहकारी गृहनिर्माण संस्था असून यापैकी फार कमी संस्थांचे ऑडिट झाले आहे. अनेक गृहनिर्माण संस्था ऑडिटकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेक समस्यांना भविष्यात तोंड द्यावे लागते. काही संस्था लेखापरीक्षण करून घेतात, पण तो तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करत नाहीत. सर्व संस्थांनी दिलेल्या मुदतीत लेखापरीक्षण करून घेणे सक्तीचे आहे. लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी दूर करून ३ महिन्यात दोष दुरुस्ती अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. तालुक्यातील सहकारी संस्थांच्या नोंदणीत गृहनिर्माण, पतसंस्था, नागरी, ग्रामीण संस्था, मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार संस्था, ग्राहक संस्था, औद्योगिक संस्थांचा समावेश आहे.
सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांनी दरवर्षी लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक असते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण अत्यंत नगण्य होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी केवळ १० ते २० टक्केच संस्था लेखापरीक्षण अहवाल सादर करत होत्या. आता मात्र हे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत गेले आहे. अहवाल सादर न करणाऱ्या संस्थांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार तालुका उपनिबंधकांना असतात. एखाद्या संस्थेत जर वादाची परिस्थिती असेल आणि वारंवार सांगूनही संस्थेकडून नियमाची अंमलबजावणी होत नसेल, तर गुन्हा दाखल करता येतो. या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा म्हणून सर्व सहकारी संस्थांना तालुका उपनिबंधक कार्यालयाने ३१ जुलैपर्यंत ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्यावर्षीपासून आम्ही केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सहकारी संस्था लेखापरीक्षण अहवाल सादर करतात. यंदा हा आकडा १५०० पेक्षा पुढे जाऊ शकतो. उर्वरित संस्थांनीही कारवाई टाळण्यासाठी अहवाल वेळेच्या आत सादर करावा. - मंगेश सुरवसे, तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘पीईएस’ बाबासाहेबांच्या स्वप्नातील संस्था व्हावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आदर्श शिक्षण संस्था व्हावी,’ अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी व्यक्त केली. ते पीईएसच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड होते. यावेळी बडोले म्हणाले, ‘डॉ. आंबेडकरांनी कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगातील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. तेथील शैक्षणिक दर्जा पीईएसला मिळावा यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. या संस्थेने आंबेडकरी विचारांचे वाहक झाले पाहिजे. राज्यासह देशातील बौद्ध लेण्यांच्या विकासाचे काम पीईएसने हाती घ्यावे. त्यास शासन मदत करेल,’ असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. वि. ल. धारूरकर यांनी ‘पीईएस संस्थेला डिम्ड विद्यापीठाचा दर्जा मिळावा,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी चळवळीत काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा बडोले, डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर साळवे यांनी केले. प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, प्राचार्य डॉ. मोहम्मद शफीक, ए. पी. गोलकोंडा, जयश्री घोबले, भन्ते डॉ. सत्यपाल उपस्थित होते. डॉ. प्रज्ञा रुईकर, डॉ. नवनाथ गोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य करडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देसरडांविरोधात धमकीची तक्रार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माजी महापौर प्रशांत देसरडा यांनी धमकावल्याचा तक्रार अर्ज लोकविकास बॅँकेचे शाखा व्यवस्थापक तानाजी सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय औटी यांनी शनिवारी (८ जुलै) पोलिस आयुक्तालयात दिला. देसरडा यांच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
तक्रार अर्जात म्हटले आहे की, देसरडा २०१६पासून बँकेच्या संचालक पदावर आहेत. त्यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे संकेत असताना ते शहरात कुठल्याही बँकेच्या शाखेत जाऊन वेगवेगळी माहिती मागवतात. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतात. बेकायदेशीर कामासाठी आग्रह धरत मानहानी करतात. कर्मचाऱ्यांवर दडपण आणतात. २२ जून रोजी देखील मला बळजबरीने एका कागदावर सही करण्यासाठी दडपण आणल्याचे औटी यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे.

आमच्याकडून असा कुठलाही प्रकार घडला नाही. गैरसमजातून हे सर्व झाले आहे. बँकेच्या विद्यमान अध्यक्षांवर अविश्वास दाखल केला आहे. त्यामुळे हा अविश्वास ठराव मांडू नये, यासाठी अध्यक्षांकडून टाकलेला हा दबाव आहे. ११ जुलैच्या बैठकीत हे गैरसमज दूर होतील. - प्रशांत देसरडा, माजी उपमहापौर

प्रशांत देसरडा यांच्यावर दाखल झालेल्या तक्रारीशी माझा काहीएक संबंध नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांशी अरेरावी केली म्हणून कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. अविश्वास ठरावाशी या प्रकरणाचा अर्थाअर्थी संबंध नाही. - जे. के. जाधव, अध्यक्ष, लोकविकास बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ देशातील आर्थिक विषमता भयावह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘देशात स्वातंत्र्यानंतरही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समता प्रस्थापित झाली नाही. देशातील २० भांडवलदार घराण्यांच्या हाती देशाची ५० टक्के संपत्ती आहे. आर्थिक विषमता भयानक असल्यामुळे इतर जनता प्रचंड दारिद्रयात आहे. भटक्या-विमुक्तांची स्थिती भयावह असून त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘वसंतोत्सव’ कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा फुले सभागृहात शनिवारी झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन बडोले यांनी केले. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे, प्रभारी अधिकारी सतीश पाटील, लेखाधिकारी नंदकुमार राठी, प्रभारी अधिष्ठाता दिलीप खैरनार व वसंतराव नाईक अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. अशोक पवार यांची उपस्थिती होती. भटक्या-विमुक्तांच्या बिकट प्रश्नांवर बडोले यांनी सविस्तर भाष्य केले. ‘देश स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्याचा अर्थ कळला नाही. आर्थिक समतेचा विचार केल्यास निराश वाटते. हा देश मूठभर भांडवलदारांच्या हाती जाईल अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीती होती. सध्याची आर्थिक विषमता पाहिल्यास त्याची प्रचिती येते. तांड्यावरील बांधवांच्या समस्या कायम आहेत. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करूनही फायदा झाला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद झाली नाही. कौशल्य विकास कार्यक्रमातून तांड्यावर रोजगार देणे गरजेचे आहे. तरच आंबेडकरांचा समतेचा संदेश प्रत्यक्षात येईल,’ असे बडोले म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अशोक पवार यांनी भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांच्या गळतीच्या स्थितीकडे सर्वांचे लक्ष वेधले. ‘वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सर्वेक्षणात विद्यापीठाशी संलग्न चार जिल्ह्यात भटक्या-विमुक्त प्रवर्गातील ७४ हजार विद्यार्थी शिकत असल्याचे आढळले, पण यातील फक्त साडेतीन हजार विद्यार्थीच पदवीपर्यंत शिक्षण घेतात. सवलतीपासून समाज वंचित असल्यामुळे शिक्षणातील गळतीचे प्रमाण भयावह आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज आहे,’ असे डॉ. पवार म्हणाले. दरम्यान, के. ओ. गिऱ्हे संपादित ‘भटक्यांचे भावविश्व’ मासिकाचे मान्यवरांनी प्रकाशन केले. तसेच केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण नेहा राठोड या गुणवंत विद्यार्थिनीचा बडोले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर वादविवाद स्पर्धा झाली. ध. सु. जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

निधी देणार
वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्राला १०० कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. मंत्रिमंडळात चर्चा होऊनही निधी मिळाला नाही अशी खंत डॉ. अशोक पवार यांनी व्यक्त केली. यावर लवकरच आढावा घेऊन सकारात्मक कार्यवाही करीन. संशोधन केंद्रासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल असे बडोले यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बाल गिर्यारोहकांची ‘कळसूबाई’वर चढाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंडियन कॅडेट फोर्सतर्फे आयोजित गिरीभ्रमण मोहिमेत आठ वर्षीय वैदेही खैरनार, माधवी बेलकर व १३ वर्षीय वेदांत खैरनार, कार्तिक भवर या चौघांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर केले. कळसूबाई समुद्रसपाटीपासून पाच हजार चारशे फूट उंच आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कळसूबाई शिखर हे गिर्यारोहकांसाठी नेहमीच आव्हानात्मक ट्रेक राहिलेला आहे. या ट्रेकमध्ये औरंगाबादच्या १८ गिरीप्रेमींनी सहभाग घेतला. त्यात वैदेही खैरनार, माधवी बेलकर, वेदांत खैरनार व कार्तिक भवर या लहान गिर्यारोहकांनी कळसूबाई शिखर सर करून सर्वांचीच वाहवा मिळविली.
नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने बारी या गावी जावे लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.
या मोहिमेत औरंगाबादच्या गिर्यारोहकांनी हरिश्चंद्र गड व कोकणकडा हेही यशस्वीपणे सर केले. कोकण कड्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकण कडा हा अर्धा गोलाकार आहे. येथून सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा बघता येतो. हरिश्चंद्र गडाची उंची चार हजार फूट आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. या मोहिमेत वैदेही, माधवी, कार्तिक, वेदांत या लहान गिर्यारोहकांना विनोद नरवडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या मोहिमेत माऊंट कन्या मनीषा वाघमारे, जगदीश खैरनार, अमित बेलकर, रोहण श्रीरामवार, आदित्य जगताप, दीपक वटाने, सौरभ तोतला, शुभम भावसार, वैभव देवरे, शुभम निकम, प्राची, पल्लवी धबाले यांनी सहभाग घेतला.

...अशी आहे आख्यायिका
कळसूबाई ही गावातील सून होती. तिला औषधी वनपस्तीबद्दल ज्ञान होते. त्या ज्ञानाचा उपयोग करून ती गावातील लोकांची सेवा करीत असे. तिच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी शिखराला कळसूबाई हे नाव दिले, अशी आख्यायिका सांगितली जाते. आदिवासी समाज आजही कळसूबाईला आपली देवी मानतात. त्याची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेखाली पडूनही मुलगा सुखरूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेचा प्रवास म्हणजे प्रत्येक क्षणी सावधगिरी घेण्याचा काळ. किरकोळ चुकीने थेट जीव गमावण्याचीच वेळ येते. मात्र, दैव ज्याच्यावर मेहरबान असते. तो चालत्या रेल्वेखाली येऊनही वाचू शकतो. औरंगाबाद येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी त्याचीच प्रचिती आली.

मनमाड काचीगुडा पॅसेंजर स्टेशनवर आली. ती निघताना एक महिला तिच्या चार वर्षीय मुलासह गाडीत चढताना, मुलाचा तोल गेला. आणि तो फलाट आणि रेल्वेमधील जागेतून रूळांवर पडला. रेल्वे निघाली. प्रवाशांनी गोंधळ केल्याने रेल्वे थांबविण्यात आली. मुलगा सुखरूप होता.

येथील स्थानकावर शनिवारी सकाळी, नांदेडकडे जाणाऱ्या मनमाड काचीगुडा पॅसेंजरची प्रवासी वाट पाहत होते. फलाट क्रमांक एकवर सकाळी नऊला गाडी पोहोचली. ती पाच मिनिटे थांबली. त्यात चढण्या आणि उतरण्यासाठी प्रवाशांची गर्दी होती. त्यात परतूरला जाण्यासाठी आलेले कुटुंबही होते. रेल्वेत चढताना त्यांचा मुलगा खाली पडला. ते पाहून महिलेने टाहो फोडला. प्रवाशांच्या लक्षात येताच, काही जणांनी साखळी ओढली. कमी वेगात असलेली रेल्वे जागेवर थांबली. संबंधित परिवारातील सर्व जण रडत होते. माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोडे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबतच्या पोलिसांनी गर्दी हटवून मुलाला बाहेर काढले. तो सुखरूप असल्याचे पाहून परिवारातील सदस्यांच्या जीवात जीव आला. त्याच्या आईने लोहमार्ग पोलिस आणि घटनास्‍थळी धावून आलेल्या प्रवाशांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुलंब्रीत हमरस्त्यावर जोडपुलाला भगदाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
फुलंब्री शहरातील एसबीआय बँकेसमोरील जोडपुलाजवळ मोठे भगदाड पडले आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलाची दुरुस्ती तत्काळ करावी अशी मागणी होत आहे.
औरंगाबाद-जळगाव महामार्ग पूर्वी एकेरी असल्यामुळे बँकेसमोर एकच पूल होता. कालांतराने फुलंब्री गाव हे तालुक्याचे गाव झाले, वाहतूक वाढली. त्यामुळे एकेरी रस्ता कमी पडू लागला. त्यामुळे गावातून जाणारा हा रस्ता दुहेरी करण्यात आला. त्यामुळे फुलंब्रीत दोन ठिकाणी पूल टाकण्यात आले. या दोनही ठिकाणी पूर्वी एकेरी पुल होते. औरंगाबादकडून जळगावकडे व जळगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. या जोडपुलाच्या मधोमध १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडात वाहून अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे या पुलाची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाविषयी कल्पना दिली आहे. त्यांनी लक्ष घालून या पुलाची तत्काळ दुरुस्ती करुन द्यावी. त्यामुळे वाहनधारकांना हा पुल वापरासाठी सुरक्षित वाटेल.
- सुहास शिरसाठ, माजी सरपंच

या पुलाची पाहणी करून तात्पुरते अडथळे लावले आहेत. मात्र हा रस्ता १५ मे १०१७ पासून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.
-अशोक ससाणे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेडपी’च्या शाळा १५ ऑगस्टपर्यंत ‘डिजिटल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आनंददायी व कृतियुक्त शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गावागावातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मोहिमेत आजवर १९५४ शाळा डिजिटल झाल्या असून, उर्वरित शाळा १५ ऑगस्टपर्यंत डिजिटल करण्याचे उद्दिष्ट आहे.
शहरी भागातील शाळांमध्ये कृतियुक्त शिक्षणाच्या माध्यमातून विविध प्रयोग राबविण्यात आले. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. शालेय शिक्षण विभागाने अशा प्रकारचे प्रयोग ग्रामीण भागात राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या. त्यानुसार झेडपी शाळा डिजिटल करणे सुरू झाले. औरंगाबाद जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची सुरवात केली. लोकसहभाग, शाळा अनुदानाचा निधी यातून एलईडी, एलसीडी खरेदी करणे, शाळांमधून शिक्षणाचे धडे देणे ही कामे सुरू केली. शिक्षकांच्या शिकविण्याच्या पुढे जाऊन डिजिटल शिक्षणही विद्यार्थ्यांना आवडते झाले. एका शाळेत सुरू झालेला हा प्रकल्प हळुहळु परिसरातील शाळांमध्ये राबविणे सुरू झाले. पाहता पाहता जिल्ह्यातील २०७० शाळांपैकी १९५३ शाळा डिजिटल झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २ लाख ५३ हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या वर्गांमधून शिक्षण घेतात. डिजिटल झालेल्या शाळांमधून एक डिजिटल सेट दिल्याने तेथील शैक्षणिक वातावरण पुरते बदलले आहे. आनंददायी शिक्षणामुळे यंदा दहावीच्या निकालावरही सकारात्मक परिणाम झाल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी नोंदविले. उर्वरित शाळा १५ ऑगस्टपर्यंत सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा १५ ऑगस्टपर्यंत डिजिटल होतील. त्यामुळे शिक्षणपद्धतीतही अधिक सुलभता निर्माण होईल. झेडपी शिक्षक, गावकरी, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यानेच हे शक्य होत आहे.
- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा खून; पतीसह दोघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
घरखर्च व दिराच्या लग्नासाठी माहेरातून एक लाख रुपये आणण्यासाठी सतत तगादा लावल्याने जैतखेडा येथील इंदिरा धरमसिंग ढेडवाल (वय २५) या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पती, दीर व सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला शौचास जात असल्याचे सांगून २५ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पिशोर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पण, तिचा सासरी छळ होत असल्याची माहिती असल्याने माहेरच्या मंडळींना घातपाताचा संशय व्यक्त करून २८ मे रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडे त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी केली होती. यानंतर ६ जुलै रोजी तालुक्यातील वडाळी शिवारातील खापरकुंड जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचे प्रेत सापडले. याबाबत कन्नड ग्रामीण पोलिसांनी ७ जुलै रोजी चौकशी केली असता ते जैताखेडा येथील बेपत्ता इंदिरा धरमसिंग ढेडवाल यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मोहनसिंग रामसिंग भोपळावद (रा. निरगुडी ता. खुलताबाद) यांच्या फिर्यादीवरून पती, दीर व सासूविरुद्ध कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पती, दीर ताब्यात
पोलिसांनी पती धरमसिंग महासिंग ढेडवाल व दीर रामसिंग महासिंग ढेडवाल या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक मारुती पंडित, हेडकॉन्स्टेबल कुंवरसिंग ठाकूर हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विखेंच्या वक्तव्यामु्ळे काँग्रेसमध्ये खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शनिवारी शिर्डी येथील कार्यक्रमात सरकार अधिक जवळचे वाटते, असे वक्तव्य केले होते. भाजपच्या जवळ जाण्याचे हे संकेत मानले जात असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आले. पंधरा वर्षांची सत्ता गेल्यानंतर काँग्रेसमध्ये काहीशी अस्वस्‍थतता दिसत होती. दरम्यान, नगर पालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही जिल्ह्यात भाजपाने चांगलेच यश मिळविले. दुसरीकडे राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजाविताना काँग्रेसने अनेक आंदोलने ‌सुद्धा केली. मात्र, शिर्डी येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण पाटील यांनी हे सरकारचे अधिक जवळचे वाटते, असे वक्तव्य केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून विखेंची ओळख आहे. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे विखे जर भाजपावासी झाले, तर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्ष आहेत. दरम्यान कुठलीही निवडणूक नाही. अशा परिस्थितीत विखे पक्षातून बाहेर पडले, तर काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे काँग्रेसच्या एका माजी आमदाराने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल भक्कमपणे सुरू आहे. आमचे विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील काँग्रेस सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाहीत.
-नामदेव पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोजेक्ट हॅपीनेसमध्ये चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर हसू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सजलेल्या रंगमंचावर लख्ख प्रकाश पडताच ठेका धरायला लावणारे संगीत सुरू झाले अन् क्षणार्धात चिमुरडे नाचू लागले. मूकबधीर, अनाथ, गरीब मुलांसाठी ‘प्रोजेक्ट हॅपीनेस’ कार्यक्रम संस्मरणीय अनुभव ठरला. शिक्षण, ज्ञान व आणि मनोरंजनातून जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशन झिरो ग्रॅव्हीटिजच्या वतीने ‘प्रोजेक्ट हॅपीनेस’ कार्यक्रम घेतला. एमजीएमच्या रूक्मिणी सभागृहात रविवारी सायंकाळी कार्यक्रम रंगला. या माध्यमातून औरंगाबाद शहरातील मूकबधीर, दिव्यांग आणि अनाथ मुलांच्या जीवनात हास्य फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहा ते अठरा वयोगटातील २२० मुलांनी मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘गणेश आराधना’ सादर करून फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. भगवानबाबा बालिकाश्रमाच्या मुलींनी ‘गुनगुन गुना रे’ गाण्यातून रसिकांना खिळवून ठेवले. ‘एक दो तीन’, ‘उडी उडी जाय दिल की पतंग उडी जाय’ गाण्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर आरंभ ऑटीझम सेंटरच्या विद्यार्थ्यांनी ‘इतनीसी हसी इतनीसी खुशी’ गीतावर भन्नाट नृत्य केले. आनंद मूकबधीर संस्थेच्या विद्यार्थ्यांचे ‘कृष्ण जन्माला गं सखे कृष्ण जन्मला’ नृत्य उत्तम सादर केले. उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला.
दरम्यान, या कार्यक्रमाचे उदघाटन एमजीएम संस्थेचे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, सुशीला बोराडे, मधुकरराव मुळे व प्राचार्य प्रताप बोराडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मैत्री जिचकार, याज्ञवल्क्य जिचकार, ईशा मुळे, अश्विन महाजन, सानिया मुळे, कुश महाजन, रोहीत देशमुख व अविनाश मुथियान यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी
२००८ पासून कार्यरत डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशन समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी विशेष काम करीत आहे. मूकबधीर, अनाथ मुला-मुलींसाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, ज्ञान व मनोरंजना या माध्यमातून जनजागृती करीत आहे. फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी एक महिनन्यापासून दिव्यांग-मूकबधीर मुलांना नृत्याचे धडे देत कार्यक्रमाचे संयोजन केले. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी शेकडो कार्यकर्ते झटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images