Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ नळाला ‘अभया’ची तोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन फुकटात पाणी वापरणाऱ्या शहरवासीयांसाठी खूषखबर. महापौरांच्या कल्पनेतून प्रशासनाने अभय योजना आणली असून केवळ पाचशे रुपयांत तुम्हाला तुमचे अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेता येणार आहे.

महापालिका प्रशासनाला शहरात अनधिकृत नळकनेक्शन्सची गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मालमत्ता कराच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करण्यासाठी व त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेतर्फे वर्षातून किमान दोन वेळा अभय योजना जाहीर केली जाते, परंतु या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेत नाहीत. अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला जातो, पण राजकीय दबावामुळे कारवाई देखील केली जात नाही. त्यामुळे अनधिकृत नळांची संख्या वाढत चालली आहे.

महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन्स अधिकृत करण्यासाठी यंदा ३१ जुलैपर्यंत अभय योजना राबवण्याची घोषणा केली होती. नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच ही घोषणा करण्यात आली, पण चार महिन्यांत काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे या योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने महापौर भगवान घडमोडे यांनी दरवर्षीची अभय योजना बाजूला ठेवून नवीन योजना अंमलात आणा, असे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले. ज्या घरासाठी किंवा दुकानासाठी अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेले आहे असे लक्षात येईल त्या घराच्या किंवा दुकानाच्या मालकाकडून ५०० रुपये शुल्काच्या स्वरुपात वसूल करा आणि नळ अधिकृत करून द्या, नळ कनेक्शन अधिकृत करताना संबंधित व्यक्तीला वर्षभराच्या पाणीपट्टीचे बिल द्या, असे महापौरांनी सांगितले आहे. यापूर्वीच्या अभय योजनेतून अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेणे नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या गैरसोयीचे होते. कारण त्यात नळ कनेक्शन अधिकृत करून देताना वर्षभराच्या पाणीपट्टीसह दंडही आकारला जात होता. या नव्या योजनेत ती तरतूद वगळल्यामुळे नागरिक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाणीपुरवठा विभागातर्फे दरवर्षी किमान दोन वेळा अभय योजना जाहीर केली जाते, पण त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे ५०० रुपये शुल्क भरून घेऊन नळ अधिकृत करून देण्याची योजना मी सूचवली. नळ अधिकृत करून घेताना संबंधित व्यक्तीला वर्षभराच्या पाणीपट्टीचे बिल दिले जाणार आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत त्याला ते बिल भरणे बंधनकारक असणार आहे. त्यातून महापालिकेचा महसूल वाढेल. - भगवान घडमोडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ बिल्डरकडून ४० लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन गृह प्रकल्पावरील चार फ्लॅट वेगवेगळ्या ग्राहकांना विकून गंडा घातल्याप्रकरणी कैलास रोहिदास बारवाल (रा. पद्मपुरा) या बिल्डरविरोधात सोमवारी (१० जुलै) क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हसन बागवाला (रा. सिटी चौक) या व्यापाऱ्याने आपली ४० लाख रुपायंची फसवूक झाल्याचा दावा तक्रारीत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बागवाला यांचे सिटी चौक परिसरात रंगाचे दुकान आहे. २०१२मध्ये बिल्डर कैलास बारवाल हा त्यांच्या दुकानावर रंग खरेदीसाठी आला. या ओळखीनंतर बारवालने बागवाला यांना पडेगाव गट. नंबर ४३मधील नवकार यश नावाच्या साइटची माहिती दिली. तसेच फ्लॅट खरेदीसाठी या म्हणून गळ घातली. त्यानंतर बागवाल यांनी मुलासह साइटवर जाऊन फ्लॅटची पाहणी केली. अखेर डी-१, आणि डी-२ असे दोन फ्लॅट खरेदी करण्यास तयारी दर्शवली. प्रत्येकी ३० लाख या प्रमाणे त्यांचा व्यवहार ठरला. २५ एप्रिल २०१३ रोजी शंभर रुपयांच्या बाँडपेपरवर नोटरी करून दोन्ही फ्लॅटचे मिळून २० लाख रुपये बारवाल याला दिले. हा व्यवहार धनादेशाने झाला. तसेच जसे काम होईल तसे पुढील पैसे देण्याचे ठरले. दरम्यान, २०१४मध्ये पुन्हा भेट घेऊन बारवाल याने बागवाला यांना तिसगाव येथे गट नं. १८५मध्ये आणखी साइट सुरू असून फ्लॅट खेरदीसाठी ग्राहक असेल तर पाठवा, असे आवाहन केले. त्यानंतर बागवाला हे पुन्हा मुलाला घेऊन फ्लॅट पाहून आले. तेथेळी दोन फ्लॅटची बुकिंग करण्यात आली. प्रत्येकी २६ लाख प्रमाणे व्यवहार ठरला. त्यानुसार, १२ नोव्हेंबर २०१४ रोजी एका फ्लॅटसाठी ७ लाख २५ हजार आणि दुसऱ्या फ्लॅटसाठी १२ लाख ७५ हजार रुपये, असे दोन धनादेश दिले. दोन्ही साइटवरील चार फ्लॅटसाठी मिळून ४० लाख रुपये बारवालला पोहोचले होते. दरम्यान, बागवाला यांनी नंतर अधिक चौकशी केली असता बारवालने एक फ्लॅट अनेकांना विकल्याची माहिती मिळाली.

असे फसवले
बागवाला यांनी दोन्ही सुना आणि मुले यांच्या नावाने खरेदी केलेले फ्लॅटही बारवाल याने दुसऱ्या ग्राहकांच्या नावे बुकिंग करून त्यांच्याकडूनही पैसे उकळल्याचे लक्षात आले. बागवाला यांचा डी-२ हा फ्लॅट जयश्री नागमोडे यांना विकल्याचे लक्षात आले. तसचे इतर फ्लॅटदेखील अन्य ग्राहकांना विकल्याचे झाले. त्यामुळे बागवाला यांनी पोलिसांत धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पत्नीला जाळले; पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देणाऱ्या आणि पत्नीच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश उत्तम तेलगावकर यांनी ठोठावली.

या प्रकरणी मृत माधुरी चंद्रकांत सोळस (रा. राहुलनगर, औरंगाबाद) हिने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा विवाह आरोपी चंद्रकांत विश्वनाथ सोळस (२६) यांच्याशी २०१०मध्ये झाला होता व त्यांना दोन मुली आहेत. मात्र, आरोपी चंद्रकांत याला दारूचे व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. आठ नोव्हेंबर २०१४ रोजी दुपारी दीडच्या सुमारास आरोपी चंद्रकांत घरी दारू पिऊन आला आणि ‘जेवायला वाढ’ असे पत्नीला म्हणाला. त्यावर ‘घरात किरणा नाही, आणून द्या, स्वायंपाक करते’ असे उत्तर पत्नीने देताच संतापलेल्या चंद्रकांतने पत्नी माधुरीला शिविगाळ करीत मारहाण केली. दररोजच्या त्रासाला कंटाळून शेवटी पत्नीनेच स्टोव्हमधील रॉकेल स्वतःच्या अंगावर टाकून घेतले असता, ‘तू काय मरते, मी तुला जाळतो’ असे म्हणत पती चंद्रकांतने पेटती काडी पत्नीच्या अंगावर फेकून घरातून पळून गेला. आगीने पेट घेताच शेजारच्यांनी माधुरीला वाचविण्यासाठी धाव घेऊन घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सातारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नारायण गुट्टे व विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा जबाब नोंदविला. दरम्यान, उपचार सुरू असताना १८ नोव्हेंबर २०१४ रोजी माधुरीचा मृत्यू झाला. माधुरीच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पती चंद्रकांत सोळस याच्याविरुद्ध कलम ३०२, ४९८ (अ), ३२३, ५०४ कलमान्वे गुन्हा दाखल होऊन आरोपी चंद्रकांत याला अटक करण्यात आली. तसेच कोर्टात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले.

तीन वर्षे सक्तमजुरीचीही शिक्षा
खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात मृत नंदाबाई, तपास अधिकारी, डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादावरुन व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने पतीला कलम ३०२ अन्वये जन्मठेप, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साधा कारावास, कलम ४९८ (अ) अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात एक साक्षीदार फितूर झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ हर्सूल तलाव खरवडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हर्सूल तलाव वाळू तस्करांनी खरवडला असून, रोज जेसीबीचा वापर करत जवळपास २० ट्रॅक्टरने रेती चोरी सुरू आहे. याकडे महापालिका अधिकारी आणि महसूल विभागाने सोयीस्कररित्या काणाडोळा केला आहे.

जुन्या शहरातील सुमारे २४ वॉर्डांना हर्सूल तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तलावाचा परिसर जवळपास ३५० एकरचा आहे. तलावात ज्या भागात पाणी साठते तो भाग वगळता अन्य भागात अतिक्रमण झाले आहे. काही भागात महापालिकेने स्मृतीवन व जांभुळबन विकसित केले आहे. सध्या तलावातील पाणीपातळी फारच कमी झाली आहे. २४ फूट पाणी साठवण्याच्या क्षमता असलेल्या या तलावात सध्या फक्त तीन फूट पाणी आहे. शिवाय पाठीमागच्या बाजूने तलाव अटत चालला आहे. त्याचा लाभ वाळू चोरांना होत आहे. वाळू माफीयांनी दीड ते दोन महिन्यापासून तलावाच्या परिसराचा ताबा घेतला असून दररोज वाळू उपसा करून राजेरोस विक्री केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाळूच्या उपशासाठी दोन ते तीन जेसीबी तैनात केलेले असतात. ‘मटा’ प्रतिनिधीने सोमवारी या भागाची पाहणी केली तेव्हा एकच जेसीबी वाळू उपसण्याचे काम करीत होती. जेव्हा दोन किंवा तीन जेसीबी सुरू असतात तेव्हा एकाच वेळी पाच ते सहा ट्रॅक्टर्स वाळू भरून घेण्यासाठी उभे असतात. दिवसभरात एका ट्रॅक्टरच्या पंधरा ते वीस फेऱ्या होतात. महापालिकेचे अधिकारी मात्र वाळू चोरीकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत.

जबाबदारी झटकली
हर्सूल तलावाचा परिसर मालमत्ता विभागाच्या अंतर्गत येतो. तलावाच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांची जबाबदारी या विभागाची असते. मात्र, वाळू चोरीच्या घटनेबद्दल या विभागाचे प्रमुख वामन कांबळे यांनी जबाबदारी झटकली आहे. पाणीपुरवठा विभागाने या प्रकारावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गंगूबाई’ नॉनमॅट्रिक नव्हे शिक्षित

$
0
0

औरंगाबाद : घरेलू काम करणारी मोलकरीण म्हटली की आपल्यासमोर आत्तापर्यंत ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ मालिकेतील चित्र उभे राहायचे. आता या गंगूबाईंच्या प्रशिक्षणासाठी बार्टीने पुढाकार घेतला असून हे असे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ८० महिलांना सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात पोलिस उपायुक्त दीपाली घाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना घाटे म्हणाल्या, ‘घरेलू काम करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय क्रांतिकारी आहे. पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या,’ असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला घाटी हॉस्पिटलच्या प्रा. डॉ. राजश्री सोनवणे, मुख्य प्रकल्प संचालक (बार्टी) प्रज्ञा वाघमारे, बाल कल्याण समितीच्या अॅड. रेणुका घुले आदी उपस्थित होते.

काय दिले प्रशिक्षण
घरगुती काम करणाऱ्या कामगार महिलांना त्यांची गुणवत्ता वाढावी, आर्थिक विकासासोबत समाजात ओळख निर्माण व्हावी यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. टाउन हॉल आणि भावसिंगपुरा भागातील प्रत्येकी ४० महिलांची यासाठी निवड करण्यात आली होती. कपडे कसे वापरावे, कसे बोलावे, इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा हाताळाव्या तसेच मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कुलर, एसी बरोबर अन्य वस्तूंची सफाई करण्याचे प्रशिक्षण तज्ज्ञांनी दिले.

प्रशिक्षणामुळे एक प्रकाराचा आत्मविश्वास निर्माण झाला. व्यासपीठावर बोलण्याची हिंमत मिळाली. महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होतील म्हणून भीतीपोटी सफाई करताना त्यास हात लावत नसे. या उपक्रमात कसे बोलावे, इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा हाताळाव्या यासह अन्य मार्गदर्शन मिळाले. त्याचा मोठा फायदा होईल. - लता बिरारे, प्रशिक्षित घरेलू कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्यांचे सत्र सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असून, गेल्या तीन महिन्यांमध्ये ३७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी आणि दुष्काळासारख्या कारणांबरोबरच, कृषी उत्पादनाला हमी भाव न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल पडल्याचे दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये २०१०पासून दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेमध्ये १२५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये एकूण ९ लाख २७ हजार ४३० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ८ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगावरून खरीप पिकांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध झाले. जिल्ह्यात १४०३ महसुली गावे आहेत. सर्वच गावांमध्ये तीन वर्षे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या वर्षी पहिल्यांदा अंतिम पैसेवारी सरासरी ५८.२४ पैसे नोंदविण्यात आली. उत्पादन वाढल्याचे दिसून येत असताना, पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुखांना दर न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील जानेवारीमध्ये वीस, फेब्रुवारीत सात तर मार्चमध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील २७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. तर, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली असून, एक प्रकरण चौकशी स्तरावर आहे.

बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग ,उडीद, मका, खरीप ज्वारी याच्या उत्पादनात मोठी तूट आली आहे. तसेच, ज्वारी, गहू, हरबरा यासारख खरीप आणि रब्बी उत्पादन शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे, चांगला पाऊस झाल्यानंतरही मिळणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

$
0
0

म. टा. विशेष प्र‌तिनिधी, शिरूर कासार (बीड)

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...

$
0
0

शिरूर कासार(बीड) : शिरूर तालुक्यात बडेवाडीची रूपाली. वडिलांचं छत्र हरवलेलं. गेल्या एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा झाली आणि तिचं लग्न झालं. नवरा हमाल. दारू पिऊन मारहाण करायचा. एक दिवस चाकू घेऊन मागे लागला. दीपाली जीव वाचवायला माहेरी परत आली ती परतलेली नाही

वडवली तालुक्यातल्या चिंचवणच्या वस्तीवरची शीतल. सातवी पास झाली आणि गेल्या जुलैमध्ये लग्न झालं. तीनच महिन्यांत सासरच्या लोकांसोबत कर्नाटकात ऊस तोडायला जावं लागलं. ‘पहाटे चार वाजता शेतात कोयता घेऊन धावायचं. ऊस तोडून मोळ्या बांधून गाडीत टाकायच्या. दुपारी कोपीवर येऊन सैपाक, धुणी-भांडी. लय अवघड होतं सारं’, कसनुसं हसत ती सांगते.

रूपाली आणि शीतलसारख्या लग्न ठरलेल्या, झालेल्या, मोडलेल्या आणि विधवा झालेल्या शाळकरी वयाच्या मुली बालाघाटात गावागावांत दिसतात. उघड्या बोडक्या बालाघाट डोंगरांच्या आडोशाला पहुडलेल्या या तालुक्यांत दुष्का मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...ळ कायमचा मुक्कामी. जमीन रेताड. खरीपाचं जमेल तेवढं पीक घेऊन दसरा झाला की बैलगाड्या जुंपून इथली ७५ टक्के जनता ऊस तोडणी कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातेत जाते. बीडमधून ४ लाख लोक ऊस तोडायला बाहेर जातात, त्यात बालाघाटातले सर्वाधिक. चार ते सहा महिने तिकडेच. तान्ही लेकरं सोबत, जाणती घरी. वयात आलेली मुलगी गावात ठेऊन जाणं लोकांना असुरक्षित वाटतं. कारखान्यांवर उघड्यावर संसार. तिथे मुलगी सोबत असणं धोक्याचं. लग्न करून जबाबदारी संपवणं हा एकच पर्याय उरतो. ‘इपरीत झालं तर गरीबाच्या अब्रूचं खोबरं व्हतंय, पोरीच्या जातीचा जीवाला लय घोर’, मातोरी गावातल्या सुमन जरांगे सांगतात. बीडमध्ये बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यांची मुलगी शिकतेय, पण नातेवाईकांनी लग्नाचा तगादा लावलाय. पती आजारपणात गेल्यामुळे जबाबदारी अंगावर पडलेल्या सुमनबाई तणावात होत्या.

या पट्ट्यात वंजारी समाजाची लोकसंख्या मोठी. त्यांच्यात हुंड्याची मोठी प्रथा. तेच अनुकरण इतर समाजातही दिसतं. ‘पोरगं नावाला शिकल्यालं, ऊस तोडणारं असलं तरी लाखभर रुपय मोजावं लागतेत. नोकरदार आसंल तर तीन चार लाख’, वारणीचे पोलिस पाटील श्रीनिवास बोटे सांगत होते. ऊसतोडणीला एक कोयता म्हणजे एक जोडपं. पूर्ण कोयत्याला जास्त पैसे मिळतात. मुलगा जाणता झाला की त्याचं लग्न उरकायची घाई. पुष्कळदा मुलगाही २१ हून कमी वयाचा असतो!

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

(अल्पवयीन मुलींची नावे बदलली आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृह खातं आवडतं, ते मिळाल्यास आनंदः पंकजा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गृह खातं हे माझं आवडतं खातं असून या खात्यावर माझं विशेष लक्ष असतं, ते खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, असं विधान करून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खात्यावर थेट दावा केला आहे. याआधी, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून बरंच रामायण घडलं होतं.

माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवासस्थानांचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी झालं. त्यावेळी त्यांनी राजकीय वर्तुळात नवी पुडी सोडली.

गृह खातं माझं आवडतं खातं आहे. माझ्या वडिलांनी - गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिलं होतं. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांचं मनोबल उंचावलं होतं. त्यांनी केलेलं काम मी अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे या खात्याबद्दल विशेष जिव्हाळा आहे. हे खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या गृह खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडील खात्यावरच दावा सांगून पंकजा यांना नेमकं काय सूचित करायचं आहे, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जातोय. पंकजा यांच्या इच्छेला पक्षश्रेष्ठींकडून काय प्रतिसाद मिळतो, याबद्दलही उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षांची आई अन् पस्तिशीची आजी!

$
0
0

धानोरा (जि. बीड) : बाजारचा दिवस असल्याने खालापुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्हरांड्यात गर्दी होती. त्यात चार-पाच फिकुटलेल्या, अशक्त तरुण बायका नंबर यायची वाट बघत बसलेल्या. डॉ. अंजली भांगे तिथल्या तरुण डॉक्टर. म्हणाल्या, ‘लग्नं लवकर त्यामुळे गर्भारपणही लवकर. मुली आधीच अॅनेमिक असतात. वजनही कमी. कोवळ्या वयात लादलेल्या शरीरसंबंधांमुळे रक्तस्राव, पोटदुखी, पाळीच्या तक्रारी असतातच. वेळेआधी प्रसूती, कमी वजनाची मुलं हे या भागात सर्रास दिसतं.’

या आरोग्य केंद्राची दोन वर्षांची आकडेवारी धक्कादायक होती. एप्रिल ते फेब्रुवारी, २०१६ दरम्यान ९१९ प्रसूती झाल्या. त्यापैकी ३० अर्भकमृत्यू होते. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी, २०१७ यादरम्यान ८८७ प्रसूती झाल्या त्यापैकी २२ अर्भकमृत्यू होते. यातल्या बालमाता किती होत्या हे कळायला मार्ग नाही. कारण नाव नोंदवताना वय १८ वर्षांच्या आत नोंदवण्याचा आरोग्य विभागाचा प्रघात नाही!

आर्वी गावात आशाताई भेटल्या. जेमतेम पस्तीशीच्या असून, पन्नाशीच्या दिसत होत्या. चार मुलं. सततच्या रक्तस्रावामुळे गर्भाशय काढून टाकावं लागलं. आता त्रास थांबलाय, पण घरात काम होत नाही म्हणाल्या. तिशी पस्तिशीत गर्भाशय काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार बायका या भागात मोठ्या संख्येनं.

केंद्र सरकार किशोरींसाठी विशेष योजना राबवते. यात आयर्न, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या शाळकरी मुलींना दिल्या जातात. दर सहा महिन्यांनी रक्त तपासणीही होते. शाळकरी वयाच्या संसारी मुलींपर्यंत मात्र या गोळ्या पोहचायला मार्ग नाही. मातोरीमध्ये आशा वर्कर सांगत होत्या, केंद्र सरकारने मुलींसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले. त्यांचा दर्जा इतका वाईट होता की मुलींनी ते घेतलेच नाहीत. मुदत संपून गेलेली अशी शेकडो खोकी अक्षरशः जाळून टाकावी लागली. बालाघाटातल्या मुली कुपोषण आणि अॅनेमिया सोबत घेऊन जगणाऱ्या. त्यामुळे पाठीची दुखणी, सांधेदुखी, अशक्तपणा यांची कायमची सोबत. जन्मलेली मुलंही अशक्त कुपोषित. डायरिया, न्यूमोनियाला बळी पडणारी. पस्तीशीत सासू हपन्नाशीच्या आत बाई म्हातारी होते. तोवर १५ वर्षांची सून हाताशी आलेली असते.

२१ वर्षांच्या मनीषाचं नुकतंच कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं. मनीषाला दोन मुली आणि एक मुलगा! ‘इथे गर्भनिरोधकं पहिल्या खेपेला कुणीही घेत नाही,’ धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. अभिजित सांगळे सांगत होते. इथे रायमोहापेक्षा बरी स्थिती. पण शस्त्रक्रिया बंदच होत्या. हल्लीच सर्जनची नेमणूक झाली आहे. इथे जून २०१६ मध्ये कुटुंबनियोजनाच्या १३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पैकी ११ जणींना तीन मुलं होती आणि वय सरासरी २३!

मातोरीच्या शाळेत एक मुलगा म्हणाला, शेजारच्या आठवीतल्या मुलीचं लग्न ठरलंय. तिच्या आई-वडिलांशी बोलू म्हटलं तर ते शेतात. मग तिची मोठी बहीण आली. १६ वर्षांची. नऊ महिन्यांची गरोदर! जालना जिल्ह्यात अंबडचं सासर. चेहऱ्यावर बाळासारखे निरागस भाव. थोडी थकलेली. पायावर सूज होती. तपासण्या केल्या का, नाव कुठे घातलंस… असं काहीबाही विचारलं तर तिला काही कळेना. लाजत राहिली नुसती. हे वाचकांपर्यंत पोहोचेल तोवर तिनं बाळाला जन्म दिलेला असेल. सुखरूप सुटका झाली असेल ना तिची?

आजारी पडलेलं ग्रामीण रुग्णालय

रायमोहच्या ग्रामीण रुग्णालयात आत शिरताना पायरीवर झोपलेले कुत्रे हाकलावे लागले. कुबट वास नाकात शिरला. कुणीही वैद्यकीय अधिकारी जागेवर नव्हता. अॅडमिट केलेले रुग्ण व्हरांड्यात गप्पा मारत होते. कुणीतरी धावपळ करून ‘एनआरएचएम’च्या डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञाची बदली झाल्याचं सांगितलं. बाकी वैद्यकीय सोयींचा उजेडच होता. गरीबांना साहजिकच खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, हजारो रुपयांच्या बिलांत घेतलेली उचल संपून जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात स्त्री जन्माविषयी झालेली जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी, गरोदर मातांना झालेले समुपदेशन आदी विविध कारणांमुळे जिल्हयात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी एक हजार मुलांमागे ९२७ एवढे प्रमाण मुलींचे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. स्त्री भ्रूणहत्येचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यासाठी ही निश्चितच भूषणावह बाब म्हणावी लागेल.

बीड जिल्हा हा गेल्या काही वर्षांपूर्वी शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील मुलींच्या प्रमाणात मागे पडला होता. जिल्ह्यातील शिरूर-कासार तालुका तर देशभरात रेडझोन घोषित झाला होता. त्यातच बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या उघड झाल्या. मात्र त्यानंतर जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढावा यासाठी विभागीय स्तरावर लेक वाचवा, राष्ट्र वाचवा अभियान राबवून मोठी जनजागृती केली होती. या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करून विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. ज्याचा परिणाम मुलींचा जन्मदर वाढण्यावर झाला. सन २०१०-११ मध्ये हजार मुलांमागे जिल्ह्यात ८१० मुली होत्या. हे प्रमाण २०११-१२ मध्ये ७९७, २०१२-१३ मध्ये ८९३, २०१३-१४ मध्ये ९१६, तर २०१४-१५ मध्ये ९१३ इतके होते. २०१५-१६ मध्ये हे प्रमाणात ८९८ इतके घटले, तर आता त्यात वाढ होऊन २०१६-१७ मध्ये ९२७ इतके झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या नोंदणीनुसार २३,३८७ मुलांचा, तर २१,६८१ मुलींचा जन्म झाला आहे.

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जिल्हयात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने प्रभावीपणे केली. रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांच्या नोंदणीमध्येही मागील वर्षभरात दहा टक्क्यांची वाढ झाली. मुलींना जन्म देण्याविषयी गरोदर मातांना समुपदेशन, गावा गावात लिंग-प्रमाण दर्शविणारे फलक, प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी आदी उपाययोजनांबरोबरच आरसीएच या शासकीय पोर्टलवर गरोदर मातांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून स्त्री जन्माविषयी जनजागृती, प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीच्या जन्माचे स्वागत, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व ग्रामसभेत सांगणे, सर्व शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये, सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना, माझी कन्या भाग्यश्री योजनेची यशस्वी अंमलबजावणी याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेला प्रभावी प्रचार आदी कारणांमुळे जिल्हयात मुलींची संख्या वाढण्यास मोठी मदत झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही महिला विषयक योजनांची अंमलबजावणी संदर्भात जिल्ह्यातील यंत्रणाना निर्देश दिले. या साऱ्याचा परिपाक
म्हणून जिल्ह्यात स्त्री जन्मदारात लक्षणीय वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू तस्कराचा भररस्त्यात होरपळून मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

दुचाकीवरून दारूचा साठा नेत असताना समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकींनी अचानक पेट घेतल्याने दारूची तस्करी करणाऱ्या इसमाचा भर रस्त्यात होरपळून मृत्यू झाला. माजलगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर हा विचित्र अपघात घडला.

माजलगाव शहरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील दुगड पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावरील दारूची दुकाने व बिअरबार बंद झाल्यापासून माजलगाव शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. माजलगावमध्ये आज अशीच एक विचित्र घटना घडली आहे. दारूच्या बाटल्या घेऊ येणाऱ्या एका दुचाकीस्वाराची आणि दुसऱ्या एका दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या अपघातात दोन्ही बाईक्सने पेटल्या. त्यापैकी दारूची तस्करी करणारा तरूण बाईकखाली अडकल्याने त्याचा या विचित्र अपघातात होरपळून मृत्यू झाला. तर दुसरा बाईकस्वार नितीन जयस्वाल हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात होरपळून ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.ए. कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डि.डि.मांडवे आणि पोलीस जमादार पी.के.खोडवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंकजा मुंडेंना परळी बाजार समितीतही धक्का

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीतच्या निवडणुकीतही राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे पॅनलवर दणदणीत विजय मिळवित बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात बीडवरील वर्चस्वाची लढाई रंगली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने दोघांचीही शक्ती पणाला लागली होती. आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आणि समितीवर धनंजय मुंडे यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे संकेत मिळू लागले. दुपारपर्यंत १८ जागांचे निकाल हाती आले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठबळावर धनंजय मुंडे यांच्या पॅनलने एकुण १४ जागांवर विजय मिळविला. तर भाजपच्या पाठबळावर पंकजा मुंडे यांच्या पॅनलला केवळ ४ जागांवर विजय मिळविता आला. त्यामुळे बीडमध्ये धनंजय मुंडे यांचीच ताकद असल्याचे या निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

परळी बाजार समिती गेल्या ३० वर्षापासून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार सांभाळायचे. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला. आता गोपीनाथ मुंडे आणि पंडितअण्णा हयात नाहीत. त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या पॅनलला गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले आहे, तर धनंजय यांनी आपल्या पॅनलला पंडितअण्णा यांचे नाव दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तराखंडमध्ये अडकलेले बीड जिल्ह्यातील सात भाविक सुखरूप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
उत्तराखंड येथे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामध्ये बीड जिल्ह्यातील सात भाविक अडकलेले आहेत. अडकलेले सातही भाविक सुखरूप आहेत. त्यांच्याशी प्रशासनाचा संपर्क झाला आहे.
उत्तराखंडमधील बद्रीनाथ मार्गावर असलेल्या विष्णू प्रयागजवळ मोठे भूस्खलन झाल्याने हा मार्ग ठप्प झाला होता. सुमारे १५ हजार यात्रेकरू व अनेक वाहने मार्गावर अडकली होती. संभाव्य धोका पाहून जिल्हा प्रशासनाने भाविकांना असलेल्या ठिकाणी थांबवले होते. जोशी मठ येथे अडकून पडलेल्या यात्रेकरूंमध्ये बीड जिल्ह्यतील सात भाविकांचा समावेश आहे. दामोदर तांदळे, उत्तम तांदळे ( रा. सारडगाव) , दिनकर चव्हाण ( रा. वडखेल), सिताराम येवले, रमेश तिवार ( रा. परळी), सतीश शेप, ( रा. शेपवाडी), उत्तरेश्वर बनाळे ( रा. पोखरी) यांचा समावेश होता.
हे भाविक संकटात सापडल्याचे वृत्त समजताच अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यासोबतच खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांनी तेथील प्रशासनाशी संपर्क साधून मदत मिळवून दिली.


नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधावा

हिंगोली - उत्तराखंडमध्ये शुक्रवारी १९ मे रोजी सायंकाळी जोशीमठ जवळ भूस्खलन होऊन हजारो पर्यटक अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून उत्तराखंड येथे गेलेल्या पर्यटकांना मदत तसेच इतर सुविधा प्राप्त करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उत्तराखंड येथे गेलेल्या नागरीकांचीमाहिती कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र परिवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. ०२४५६-२२२५६० व भ्रमणध्वनी ९५२७०४४१७१ या क्रमांकावर देण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बसला भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ खासगी बसला अपघात झाला . या अपघातात १२ जणांचा मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला हा अपघात झाला.

आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस एका अवघड वळणावर रस्ता सोडून उलटली आणि १०० फुटांवर जाऊन थांबली.

दरम्यान अपघात झालेल्या बसचा ड्रायव्हर वेगात गाडी चालवत होता असं प्रवाशांनी सांगितलं आहे. अपघातातील मृतांमध्ये दोन महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर अहमदनगर, आष्टी , कडा येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसयुव्ही महाग; लक्झरी स्वस्त

$
0
0

एसयुव्ही महाग; लक्झरी स्वस्त

जीएसटीचा वाहनबाजारावर परिणाम; दुचाकी दीड हजाराने स्वस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

मर्सडिज बेंझ, बीएमडब्‍ल्यु, इनोव्हा, ऑडी अशी लक्झरी कार तुम्हाला खरेदी करायची असेल तर हीच योग्य वेळ आहे. कारण जीएसटीने लक्झरी कारच्या किमती एकदम दोन ते पाच लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. एसयुव्ही वाहनांच्या किमती मात्र वाढलेल्या आहेत. दुचाकी वाहनांच्या किंमतीही आठशे ते दीड हजार रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत.

एक जुलै रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर गाड्यांच्या विविध प्रकारात वाहनांच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ज्या गाड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे, त्यामुळे डीलर्सला त्याचा फायदा होत आहे. तर स्वस्त झालेल्या काही कारमुळे नुकसानही सहन करावे लागत आहे. २५० सीसीपर्यंतच्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत ८०० ते १५०० रुपयांनी कमी झालेल्या आहेत. मात्र, ३५० सीसीपेक्षा जास्त असलेल्या दुचाकी वाहनांच्या किंमती २ ते ३ हजारांनी महागल्या आहेत. याशिवाय एक्सयुव्ही तसेच टीयुव्ही प्रकारात मोडणाऱ्या कारच्या किंमतीतही वाढ झाली आहे. मध्यमवर्गीयांसाठी असलेल्या गाड्यांच्या किंमती कमी झाल्या होत्या. मात्र, राज्य शासनाने टोल टॅक्स बंद करून दोन टक्के रोड टॅक्स वाढविल्याने या वाहनांच्या किंमती पूर्वीप्रमाणेच स्थिर आहेत.

आकडे वारीची चौकट

दुचाकी वाहन १०० सीसी ते २५० सीसी - आठ ते दीड हजारपर्यंत दर कमी

दुचाकी वाहन २५० सीसी ते ३५० सीसी - दर स्थिर

दुचाकी वाहन ३५० सिसी ते ५०० सिसी - दोन ते अडीच हजार महागले



जीएसटीनंतर असा आहे टॅक्सचा दर

वाहनांचा प्रकार जीएसटी सेस

छोटया आकाराच्या चार चाकी (पेट्रोल) २८टक्के १ टक्के

छोटया आकाराच्या चार चाकी (डिझेल) २८ टक्के ३ टक्के

मध्यम आकाराच्या चार चाकी २८ टक्के १५ टक्के

लक्झरी कार २८ टक्के १५ टक्के

एसयुव्ही २८ टक्के १५ टक्के

हायब्रिड २८ टक्के १५ टक्के

इलेक्ट्रीक कार १२ टक्के ० टक्के

महाराष्ट्रात रोड टॅक्स दोन टक्के वाढल्याने मध्यम आकाराच्या गाड्यांच्या किंमती जशास तशा आहे. मात्र, एसयुव्हीच्या किंमतीत वाढ झालेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात मृत्युप्रकरणी दुचाकीस्वाराला सक्तमजुरी

$
0
0

भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली व यात धडक बसलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणात धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी सुनावली.
गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे राहणारे परसराम सादशिव पठारे हे २९ जानेवारी २०१२ रोजी दुपारी दुचाकीवरून पैठण रस्त्यावरून शहरात येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या आपघातात पठारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश महाले यांच्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दुचाकीस्वार आरोपी सुदाम सोपान फड (वय २५ रा. वाघरा, ता. गंगाखेड, जि. औरंगाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन कोर्टात दोषरोपपत्र दाखल केले.

पाच हजारांची रक्कम कुटुंबियांना

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादावरुन व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १४ दिवस कारावास, कलम २७९ कलमान्वे सहा महिने सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये मृताच्या वारासांना देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images