Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ भाजपचे आता खेड्याकडे चला!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण मतदारसंघ अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खास व्यूहरचना आखली आहे. त्यासाठी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खेड्याकडे चला, असे म्हणत त्यांना प्रत्येकी पाच ते सहा गावांचे पालकत्व देण्यात आले आहे.

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतही बाजी मारली. ही विजयी घोडदौड कशी कायम राहील, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांना एक एक कार्यक्रम वरिष्ठ पातळीवरून दिला जात आहे. आता खेड्याकडे चला, असा आदेश शहरातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, संजय केणेकर, अनिल मकरिये यांच्यासह शहरातील प्रमुख ४० पदाधिकाऱ्यांकडे पैठण तालुक्यातील गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह सिल्लोड, कन्नडसह अन्य नगपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दुसऱ्या तालुक्यातील गावांचे पालकत्व देण्यात आले आहे.

सोशल इंजिनीअरिंग
त्या-त्या गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय, आरोग्यसह अन्य एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. सर्व लोकांची माहिती गोळा करून शिक्षित, निरक्षर अशी वर्गवारी करून सोशल इंजिनीअरिंगवर भर देत प्रत्येक समाजातील व्यक्तीशी पक्ष कसा जोडला जाईल, यावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक बुथनिहाय डाटा संकलित केला जात असून गावातील प्रमुख्य विकास प्रश्नांची यादीही तयार केली जात आहे.

प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांना पाच ते सहा गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. - किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भाजप

खेड्याकडे चला, हा उपक्रम जिल्हाभरात सुरू आहे. कन्नड शहरातील कार्यकर्त्यांना कन्नड ग्रामीणसह वैजापूर तालुक्यातील गावाचे पालकत्व दिले असून यामाध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. - संजय खंबायते, जिल्हा उपाध्यक्ष भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेतन कपात केल्याने शिक्षकांचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेतनात बेकायदा कपात करण्यात आली आहे. ही रक्कम त्वरित देण्यात यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी सेंट झेविअर्स शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारीपासून उपोषण सुरू केले आहे.
भारतीय कामगार सेनेचे नेते प्रभाकर मते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा दिली जात नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. महिला कर्मचाऱ्यांना नाकारण्यात आलेल्या रजांचा लाभ त्वरित देण्यात यावा, बेकायदा केलेली वेतन कपात त्वरित परत मिळावी, शासकीय नियमानुसार वेतन व भत्ते मागील फरकासह मिळावेत, मुख्याध्यापकपदी ज्येष्ठता यादीनुसार पात्र व्यक्तीची नेमणूक करावी, सेवेची १२, २४ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना चट्टोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावा, तासिकेच्या वेळा पाळल्या जाव्यात, यांसह अन्य मागण्यासाठी शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यावर अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागास निर्देश देत चौकशी समिती स्थापन केली. आठ दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले होते, परंतु चार महिन्यानंतरही अहवाल आलाच नाही, असा आरोपही आंदोलकांनी केला. यावेळी एम. ए. वहाब, मोहित कुलकर्णी, मानसी भागवत, शहेनाज पठाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलताबाद घाटात वृक्षारोपण कार्यक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवछत्रपती महाविद्यालयाने वन विभागाच्या सहकार्याने दौलताबाद घाटात वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. घाटातील माळरानावर आतापर्यंत सुमारे अडीच हजार रोपटी लावून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. या वृक्षसंवर्धन प्रकल्पाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच भेट दिली.

वन विभागाच्या १० एकराच्या खडकाळ क्षेत्रावर महाविद्यालयाने सुमारे अडीच हजारांहून अधिक झाडांचे संगोपन केले आहे. या उपक्रमात ३०हून अधिक प्रकारची भारतीय वंशातील झाडांची रोपटी लावून त्यांचे संवर्धन केले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका महाविद्यालयाने डोंगरमाथ्यावर माळरान फुलवल्याने कौतुक होत आहे. या वर्षीही महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. भर पावसात भिजत विद्यार्थी, प्राध्यापकांसह दीडशे जणांनी दिवसभर परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. आष्टेकर, डॉ. समाधान इंगळे, प्रा. राकेश खैरनार, प्रा. सुनील वायसळ, प्रा. व्ही. एम.काळे, प्रा. कीर्ती वर्मा, डॉ. गहिनीनाथ वळेकर, प्रा. संजय जाधव, प्रा. हनुमान गाडे यांच्यासह रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादातून छावणीत हाणामारी; गुन्हे दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी येथे जुन्या वादातून दोन गटात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये हॉकी, बेसबॉल व गोल्फ स्टिकचा वापर करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शेख तस्लीम अहेमद शेख खलील अहेमद (वय २५ रा. गड्डीगुड्डम) याने दिलेल्या तक्रारीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या घरात १२ ते १३ जणांनी बळजबरीने प्रवेश केला. घरातील सामानांची तोडफोड करून तस्लीम, त्याचा मामा व मामेभावाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी संशयित आरोपी शेख आमेर शेख सादीक, शेख रफत शेख सादीक, शेख आमेर सोहेल शेख सलीम, मिर्झा समीर बेग मीर्झा रफत बेग, शेख मझर, शेख तौहफीक, शेख नबील, शेख सादिक, शेख जुबेर, मिर्झा इरफान, शेख अझर व शेख शिराज शेख खिजर यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न व दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून शेख नईम शेख अब्दुल अजीज (वय ६२ रा. पानचक्की, प्रबुद्धनगर) यांनी तक्रार दिली आहे. यामध्ये शेख नईम यांचा मुलगा नदीम हा सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता छावणी येथे मशिदीबाहेर नमाज पडून आला होता. यावेळी बाहेर काही मंडळी जुन्या कारणावरून लोकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत होती. यावेळी नदीम याला देखील गोल्फच्या स्टिकने गुप्तांगावर वार करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी शेख नईम यांच्या तक्रारीवरून वाहेद अब्दुल करीम, मुझाहेद अब्दुल करीम, कादर अब्दुल करीम उर्फ बाबा, तनवीर अब्दुल वाहेद, शहानवाज अब्दुल वाहेद, अब्दुल कय्युम अब्दुल करीम, अब्दुल बारी अब्दुल करीम, अब्दुल आमेर अब्दुल बारी, शेख तस्लीम अहेमद, नदीम अब्दुल मुझाहेदचा भाचा (सर्व रा. गड्डीगुड्डम, छावणी) यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न व दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रवेशात विद्यार्थ्यांची हेळसांड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच गुणवत्ता यादीनंतर विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. चांगले गुण असूनही आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, तर दुसऱ्या फेरीत शाखा निवडीचे स्वातंत्र राहील की, नाही याची चिंताही विद्यार्थ्यांना सतावत आहे. विविध संघटना, पालक, विद्यार्थ्यांनी गुरुवारी शिक्षण उपसंचालकांची भेट घेत नाराजी व्यक्त केली.

औरंगाबादमध्ये प्रथमच होत असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत मंगळवारच्या गुणवत्ता यादीनंतर बुधवारी पालकांनी प्रवेशासाठी कॉलेजांमध्ये गर्दी केली, परंतु कॉलेज कसे मिळाले याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमता आहे. १२६ उच्चमाध्यमिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलजमधील २४ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्यासाठी १९ हजार ७८ विद्यार्थी रांगेत आहेत. अनेकांना प्रवेशासाठी मेसेजही आलेले नाहीत, तर कॉलेज कसे मिळाले याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी आणि संभ्रम कायम आहे.

अभावितर्फे निवेदन
अकरावी ऑनलाइन प्रक्रियेतील गोंधळ थांबविण्यात यावा आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे. प्रथम फेरीमध्ये निवडलेली शाखा दुसऱ्या फेरीमध्येही अन्य कॉलेजमध्ये निवडता यावी, पैसे घेऊन प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई करावी, वाणिज्य शाखा प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाचा प्रर्याय उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर इश्वर आष्टेकर, शिवा देखणे, योगेश पवार, वीरभूषण पाटील, अनिकेत पाटील यांची उपस्थिती होती.

आज मुदत संपणार
प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे यादी उशिराने जाहीर झाली. त्यात गुणवत्तायादीवरूनही संभ्रम आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा होती.

‘एआयएमआयएम’तर्फे मागणी
प्रवेश प्रक्रियेतील त्रुटी तात्काळ दुरूस्त कराव्यात अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहाद-उल-मुस्लिमीनतर्फे उपसंचालकांना निवेदन देण्यात आले. वेबसाइटवरील तांत्रिक बिघाड दूर करत, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी केली. यावेळी महापालिकेचे गटनेते नासेर सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दहावीतील गुणांनुसार विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे. गुणवत्ता यादीबाबत संभ्रमता असण्याचे कारण नाही. काही बदल असतील, तर ते कळविले जातील.
- भास्करराव बाबर, सहाय्यक उपसंचालक, शिक्षण विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊंड टेबल : ‘समृद्धी’साठी इंचभर जमीन देणार नाही

0
0

समृद्धी महामार्गाच्या नावावर सरकार केवळ शेतकऱ्यांना भूलथापा देत आहे. सध्या महामार्ग उपलब्ध असताना ही ‘समृद्धी’ कोणाची? विकास कोणाचा? हा प्रकल्प शेतकरी - शेतमजूर व गावकऱ्यांना देशोधडीला लावण्यारा असून, यासाठी शेतकऱ्याची संमती नाही. समृद्धी महामार्ग म्हणजे शासनाच्या कंत्राटदारांना पोसण्याची शक्कल आहे. वेगवेगळ्या गावांचे दरनिश्चितीचे मायाजाल निर्माण करून जिल्हा प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी जमीनच द्यायची नाही. त्यामुळे दरांचा प्रश्नच निर्माण होत नाही. शेतकऱ्यांनी आता समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरून लढाई सुरू केली असून, प्रसंगी आपली जमीन वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढू, मात्र समृद्धी महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही, अशा तीव्र शब्दांत बाधित शेतकऱ्यांनी ‘मटा राऊंड टेबल’मध्ये भावना व्यक्त केल्या.

सत्याग्रह करणार
नागपूर-मुंबई ७१० किलोमीटरच्या महामार्गासाठी सुमारे २२ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. शासनाला जमीन घेण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करण्याचा अधिकार बहाल केल्यानंतर राज्य शासनाने कायद्यात दुरुस्ती करून समृद्धी महामार्गाचे सूतोवाच केले, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना महामार्गासाठी जमीनच द्यायची नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीन गेल्यानंतर त्यांच्या हातात पैसा मिळेल, मात्र त्यांच्या भविष्याचा सरकार विचार करत नाही. सध्याच्या व्यवस्थेत नुकसान भरपाई ही पैशांमध्ये मोजली जात आहे, जमिनीचा मालक भूमिहीन होईल, त्यांच्या हाताला काम मिळणार नाही, याचाही शासनाने विचार करण्याची गरज आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांनी जमीन संपादनासाठी संमती दिली असल्याचे सांगितले जाते, मात्र किती लोकांनी संमती दिली हे त्यांनी दाखवावे. समृद्धीबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये शेतकरीच पुढे येऊन महामार्गासाठी विरोध करत आहेत. शेतकऱ्यांचा असलेला हा लढा प्रसंगी कायद्याने लढण्याचा; तसेच सत्यागृह करण्याचीही आमची तयारी आहे.
- डॉ. कॉ. भालचंद्र कानगो, राज्य सचिव भाकप

मागणी नसताना रस्त्याचे काम
शहरात राहणारा नागरिक म्हणून कुणीही नागपूर-मुंबई या रस्त्याची मागणी केलेली नाही. सरकार निवडून आले असले, तरी ते केवळ स्वतःची स्वप्न पूर्ण करत आहेत. सरकार रस्त्यासाठी कर्ज काढणार, त्याचा बोजा सर्वसामान्य लोकांवर लादणार. प्रत्यक्षात या रस्त्याची गरज आहे काय, याचा विचार होण्याची गरज आहे. मुळात मागणीच केलीली नसताना हा रस्ता तयार करण्यात येत आहे. ही पुढच्या निवडणुकीची तयारी आहे.
- अॅड. अभय टाकसाळ

शेती गेली तर काय?
आमची दोन एकर जमीन महामार्गासाठी जाणार आहे. शेतीशिवाय दुसरा उद्योग नाही. केवळ भूसंपादन करून व पैसे वाटप करून उपयोग नाही. शेती गेली तर शेतीपूरक असलेल्या उद्योगांवरही मोठा परिणाम होईल, त्यामुळे आमचा समृद्धी महामार्गाला विरोध आहे.
- सागर हेकडे, फतियाबाद

न्यायलयीन लढाईची तयारी
समृद्धी महामार्गासाठी राजकारण नको, असे मांगण्यात येते, मात्र नागपूरपासून मुंबईपर्यंत बहुतांश ठिकाणी शिवसेनेचे खासदार; तसेच मंत्री आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचीही अशीच स्थिती आहे. शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. समृद्धी महामार्गाऐवजी सध्या अ‌स्तित्वात असलेल्या नागपूर ते मुंबई मार्गाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. औरंगाबादसह जालना, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील जमिनी बागायती आहे. तेथे शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात, बागायती जमीन असलेलेली शेती रस्त्यासाठी दिली, तर शेतकरी काय करणार? प्रत्येक तालुक्यामध्ये समृद्धीविरोधात शेतकरी एकवटले अाहेत. शेतकऱ्यांचा भावना तीव्र असून, आम्हाला जमीनच द्यायच्या नाही. त्यामुळे दरांबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही. येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांसोबत समृद्धी महामार्गाविरोधात न्यायालयीन लढण्यासाठी तयार असून, वेळप्रसंगी सत्याग्रह, जेलभरो आंदोलनातही सहभागी होऊ.
- प्रा. राम बाहेती, जिल्हा सचिव भाकप

आम्हाला रस्ता नको
माझी नऊ एकर बागायती जमीन महामार्गासाठी जाणार आहे. यापूर्वी १९९०मध्ये बोरदहेगाव प्रकल्पासाठी ४२ एकर जमिनीचे संपादन झाले आहे. वाढीव मोबदल्यासाठी मी आजही लढा देत आहे. आता याप्रकल्पासाठी जमीन घेत आहेत. हा प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल व यासाठी ज्या सुपिक जमिनींचे संपादन होणार त्याचा उपयोग काय, असा प्रश्न आहे. या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहे. आम्हाला हा रस्ता नकोच.
- भाऊसाहेब शिंदे, गोळवाडी

भूमिहीन झाल्यास काय करावेय़
आम्हा तीन भावांची १२ एकर जमीन या महामार्गासाठी जाते. माझी ४ एकर जमीन जाणार असून, मी भूमिहीन होईल. सध्या आमच्या गावातील संपादित होणारा मोठ्या भागामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येते. या जमिनी कसण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आम्ही टोमॅटोची लागवड करून आलो आहोत. जमीन गेली व आम्ही भूमिहीन झालो, तर काय करावे, हा प्रश्न आहे.
- गुलाबराव कांडेकर, पेकलवाडी

उपजीविका जाणार
आमची साडेसात एकर जमीन महामार्गासाठी जाणार आहे. सध्या चिकू, पेरूच्या बागा आहेत. समृद्धीसाठी जमीन गेली, तर मोठे नुकसान होणार आहे. शेतात राबून सध्या पुढील चार पिढ्यांचे उपजीविका होईल, अशी स्थिती आहे, मात्र जमीन गेल्यानंतर सर्वच आर्थिक गणिते बदलतील. त्यामुळे आमचा रस्त्याला विरोध आहे. एकीकडे वनवमंत्री झाडे लावा, असे सर्वांना सांगत असताना दुसरीकडे या झाडांची होणाऱ्या कत्तलीचे काय? शेतकऱ्यांकडे दुसरे उपजीविकेचे साधन नाही.
- सूर्यभान पल्हाळ, माळीवाडा

सध्याचा रस्ता दुरुस्त करा
या प्रकल्पासाठी काकांची आणि माझी साडेचार एकर जमीन जाणार आह. यापुर्वीही आमची जमीन कंटेनर डेपोसाठी गेली आहे. शासनाने समृद्धीसाठी नव्याने भूसंपादन करण्याऐवजी सध्या असलेला मार्ग दुरुस्त करावा, भूसंपादनाच्या धास्तीमुळे शेतकरी त्रस्त असून, काही शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. महामार्गासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या दराबाबत संभ्रम निर्माण होत आहे. काही गावांमध्ये अधिक भाव मिळाला असून, थोड्या अंतरावरील शेतकऱ्यांना कमी दर दिला आहे. ही प्रशासनाची खेळी आहे. महामार्गासाठी शेतकऱ्यांनी संमती दिली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सांगतात, मात्र यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही, आम्ही यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा करणार आहोत.
- बाळासाहेब हेकडे, फतियाबाद

आमची अडचण समजून घ्या
आमची १२पैकी ११ एकर जमीन समृद्धीसाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले. ही बातमी कळाल्यानंतर त्रस्त झाल्यामुळे अनेक महिने झोप लागली नाही. नुकतेच शेतीमध्येच आरसीसीचे मोठे घर तयार केले आहे. शिवाय पत्र्याचे अन्य एक घर, शेतामध्ये असलेल्या दोन विहिरी भूसंपादनामध्ये जाणार असल्याचे सांगण्यात आले. आता काय करावे, असा प्रश्न आहे. सरकारने आमची अडचण समजून घ्यावी व हा महामार्ग रद्द करावा.
- बाळू भंवर

जमीन देण्यास आमचा विरोध
आम्ही कसत असलेली गायरान जमीन समृद्धी महामार्गासाठी ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक वर्षांपासून वडील व घरातील सर्व ही जमीन कसतात. अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या खेट्या मारल्यानंतर आता ही जमिनीचा आम्हाला ताबा मिळणार असून, प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. आता हातातोंडाशी आलेला घास प्रशासन हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आमचा जमीन देण्यासाठी विरोध आहे.
- गणेश कसबे, टाकळी कदीम

शेतकरी देशोधडी लागतील
१४ एकरापैकी सात एकर समृद्धी महामार्गासाठी जमीन जाणार असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण जमीन बागायती आहे. शेतामध्ये पाइप लाइन केली असून, यासाठीही मोठा खर्च केला आहे. सध्या असलेले रस्ता रूंद करण्याऐजवी शासनाने समृद्धी महामार्ग तयार करण्याचे ठरवले आहे. असे झाल्यासर शेतकरी देशोधडीला लागतील. त्यामुळे आमचा या रस्त्यासाठी विरोध आहे.
- पारसनाथ कोल्हे, पालखेड

जमीन द्यायचीच नाही
आम्हाला समृद्धी महामार्गासाठी जमीन द्यायची नाही. सरकार करत असलेल्या विकासाला आमचा विरोध नाही, मात्र यापूर्वी जिल्ह्यातून झालेल्या महामार्गालाच रूंद करून, समृद्धी महामार्ग रद्द करावा. सध्या असलेला रस्त्याचे स्ट्रक्चर चुकले असल्याचे बोलले जाते, मात्र समृद्धी महामार्ग तयार झाला आणि त्यानंतर हा रस्ताही चुकीचा असल्याचे म्हटले तर? त्यामुळे आम्हला आमची जमीन वाया घालवायची नाही.
- सुभाष बर्डे, माळीवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआय वायाळ यांच्यावरील गुन्हा रद्द

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
मुंबईत कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक सतीश वायाळ यांच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात झालेला गुन्हा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. एम. ढवळे यांनी रद्द केला.
फिर्यादीने पती शामसुंदर वायाळ, सासू शोभा वायाळ व दीर सतीश वायाळ यांच्याविरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्यासंबंधी सर्व आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात ४८२ नुसार गुन्हा रद्द करण्यासाठी फौजदारी अर्ज दाखल केला होता. २००७ पासून सतीश वायाळ हे घराबाहेर राहत आहेत. ते आधी सहशिक्षक व नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यामुळे मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे फिर्यादीने केलेले आरोप हे खोटे असून, गुन्हा रद्द करण्याची त्यांचे वकील श्रीकांत कवडे यांनी विनंती केली. सतीश वायाळ यांच्यावरील गुन्हा रद्द केला. अन्य आरोपींचा फौजदारी अर्ज फेटाळून लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीएचआर’ घोटाळा; सीआयडीचे आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत आहे. जवाहरनगर भागातील उत्तमनगर येथील शाखेत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनी स्नेहनगर येथील सीआयडीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगावच्या रायसोनी क्रेडिट सोसायटीच्या उत्तमनगर येथील शाखेमध्ये मुरारी दादाराव हेबारे (रा. गजानन कॉलनी, गारखेडा) यांनी व इतर ठेवीदारांनी गुंतवणूक केली होती. यामध्ये ठेवीदाराची परतफेड न करता एक लाख ७८ हजार रुपयांचा सोसायटीच्या संचालकांनी अपहार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी हेबारे यांच्या तक्रारीवरून २७ ऑक्टोंबर २०१५ रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला असून पोलिस निरीक्षक व्ही. डी. चव्हाण या तपास करीत आहेत. उत्तमनगर येथील शाखेत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनी ठेवीच्या पावत्या व पासबुकसह सीआयडी कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारांना चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक

0
0

औरंगाबाद ः औरंगाबाद जिल्ह्यातील हॉटेल, लॉज, कंपनीमधील कामगारांना कामावर ठेवण्यापूर्वी सबंधित पोलिस ठाण्याकडून त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. कामगाराकडे चारित्र्य प्रमाणपत्र नसल्यास संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिला आहे.

डॉ. सिंह यांनी बुधवारी महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी ज्योती नायर या हॉटेल व्यवसायिक महिलेचा खून झाला आहे. या गुन्ह्यातील दोन्ही संशयित वेटर पसार आहे. या वेटरच्या नावाशिवाय कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. यामुळे तपासात अडथळा आला आहे. ही बाब पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गांर्भियाने घेतली आहे. जिल्ह्यातील हॉटेल, लॉज, धर्मशाळा, कंपनी आदी ठिकाणी अनेक परप्रांतीय किंवा बाहेरच्या गावावरून आलेले कामगार कार्यरत आहेत. या कामगारांची पूर्ण माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. कामगारांनी संबंधित पोलिस ठाण्याकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतले पाहिजे. असे प्रमाणपत्र नसल्याचे आढळल्यास सबंधित कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सात एमआयडीसीत लाखो कामगार
‌औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ लेणी, अजिंठा लेणी यांच्यासह इतर महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. तेथे विदेश पर्यटक आवर्जून भेट देतात. या ठिकाणी असलेल्या हॉटेल, लॉजमध्ये कामासाठी पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्र असलेले कामगाराच ठेवणे आता बंधनकारक राहणार असल्याची माहिती अधीक्षक

डॉ. आरती सिंह यांनी दिली.
औरंगाबाद शहरात सात ठिकाणी एमआयडीसी आहेत. यामध्ये शेंद्रा, चिकलठाणा, वाळूज, चितेगाव, बिडकीन, रेल्वे स्टेशन व पैठण एमआयडीसीचा समावेश आहेत. या सात एमआयडीसीत लघु, मध्यम व मोठ्या अशा सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत. यामध्ये अडीच ते तीन लाख कायम कामगार असून हंगामी कामगारांची संख्या देखील दोन ते तीन लाख असल्याची माहिती एमआयडीसीतील सूत्रांनी दिली.

हॉटेल, लॉज किंवा कंपनीमध्ये कामावर ठेवण्यात आलेले कामगार हंगामी स्वरुपाचे असतात. यामध्ये अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील असण्याची शक्यता असते. काही दिवस काम केल्यानंतर हे निघून जातात. त्यांची माहिती पोलिसांना असणे आवश्यक आहे. यासाठी यापुढे हॉटेल, लॉज किंवा कंपनीमधील कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र मालकांना ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
- डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामिण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात भाजप नगरसेवकांचे उपोषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
शहरातील विविध नागरी समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी भाजपच्यावतीने बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी भाजपच्यावतीने माजी आमदार कैलास गोरंट्याल हेच जालन्यातील नागरी समस्यांना जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला तर यानंतर गोरंट्याल यांनी भाजपच्या या उपोषणाची जोरदार खिल्ली उडविली.
जालना शहरातील अनेक दिवसांपासून असलेल्या राजकीय शांततेत बुधवारी अचानक जबरदस्त स्फोट झाला. गेल्या पंधरा दिवसापूर्वीच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात जालना शहराच्या विविध रखडलेल्या विकासांच्या प्रकल्पाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक मोठी बैठक घेतली पालिका अध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या सोबत प्रदीर्घ चर्चा झाली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि नगर विकास खात्याचे अधिकारी याबैठकीत उपस्थित होते विशेष म्हणजे भाजपच्या एकाही नगरसेवक, गटनेता, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वगळून ही बैठक झाली.
दरम्यान, भाजपच्यावतीने शहरातील साचलेल्या कचरा, अनियमित पाणी पुरवठा, पथदिव्याचा अंधार याप्रश्नांवर गोरंट्याल यांना घेरण्याचा उपोषणाच्या माध्यमातून प्रयत्न झाला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपचे सगळी नेते, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील-भांदरगे, माजी आमदार अरविंद चव्हाण, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, पालिकेचे गटनेता अशोक पांगारकर, उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह सर्व पदाधिकारी नगरसेवक झाडून हजर होते. जिल्हाधिकाऱ्यांना या प्रसंग एक सविस्तर निवेदन देण्यात आले.

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज पथदिव्याचा अंधार याप्रश्नांवर गोरंट्याल यांना पूर्ण अपयश आले आहे. भाजपच्यावतीने यापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आता आंदोलनात पहिल्या टप्प्यात हे लाक्षणिक उपोषण करतोय यानंतर स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून सगळा कचरा गोळा करून नगर पालिकेच्या कार्यालयात नेऊन टाकणार आहोत.
भास्कर दानवे, नगरसेवक, जालना.


पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहायचे नाही, आणि सभेच्या कामकाजाची तक्रार करून राजकीय दबाव आणून जिल्हाधिकारीकडून स्थगिती आणायची हे सगळे ड्युप्लिकेट राजकारण भाजपकडून सुरू आहे. ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार सुरू आहे. खासदार दानवे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतरचे शक्तीशाली नेते स्वतःला समजतात. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर जालना पालिकेच्या वीज थकबाकी, फुले मार्केट, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, २२ इंजिनिअर, १२ स्वच्छता निरीक्षक यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास जालन्यातील नागरीकांना सहकार्य करावे. पालकमंत्री लोणीकर मदत करीत असतात. शहरातील नागरिकांना सगळे राजकारण समजते.
कैलास गोरंट्याल, माजी आमदार, जालना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजप कार्यकर्त्यांत व्हॉट्सअॅप ग्रुपवर युद्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
‘फक्त खुलताबाद तालुका या व्हॉट्सअॅप ग्रुपवर बुधवारी वरिष्ठ नेत्यांवर कमेंट केल्याने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये युद्ध पेटले होते. अखेर ग्रुपमधील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक्झिट करून ‘बीजेपी खुलताबाद तालुका’ ग्रुप तयार केला आहे. तालुक्यात याच प्रकारावर बुधवारी दिवसभर चर्चा होती.
तालुक्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी ‘फक्त खुलताबाद तालुका’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यात सर्व राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या ग्रुपवरील एका सदस्याने बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांविषयी, तर दुसऱ्याने भाजप नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्याचा भडका उडाला व त्या वादग्रस्त सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याने नाराज झाले. भाजपच्या सर्वांनी ग्रुपमधून बाहेर पडावे, असे आवाहन भाजप नगरसेवक योगेश बारगळ यांनी केले. त्यांना प्रतिसाद देत जवळपास सर्वच भाजप कार्यकर्ते ग्रुपमधून बाहेर पडले आहेत.
‘फक्त खुलताबाद तालुका’ हा ग्रुप व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांशी जोडला गेला होता. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा समावेश असल्याने माहिती व सूचना तातडीने पोहोचविण्यासाठी याचा वापर होत होता. शासकीय विकास योजना, निर्णय व धोरणांच्या अंमलबजावणीला गती देणे व नवीन उपक्रम सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी या ग्रुपचा वापर होत आहे. पण, त्याचा सकारात्मक वापर होण्याऐवजी अलिकडे टीका करण्यासाठी व्यासपीठ असे स्वरूप झाले. त्याचेच पडसाद तालुक्यातील या सर्वसमावेशक सोशल प्लॅटफॉर्मवर उमटले.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत नवनियुक्त तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, नेतेमंडळींवर कोणीही टीका करायला नको. पक्षीय मतभेदामुळे ग्रुपमधील सदस्य नाराजी होऊ नयेत ही काळजी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असून यापुढे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, अशी ताकीद दिली आहे.

फक्त भाजप कार्यकर्त्यांचा ग्रुप

भाजपने सुरू केला ‘बीजेपी खुलताबाद तालुका’ग्रुप फक्त खुलताबाद ग्रुपमधून बाहेर पडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बीजेपी खुलताबाद तालुका हा नवा ग्रुप तयार केला आहे. यामध्ये फक्त भाजप कार्यकर्ते व पत्रकार यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाखाली पार्किंग धोकादायक

0
0

पुलाखाली पार्किंग धोकादायक
हायकोर्टाचे आदेश धाब्यावर; हॉटेल, गॅरेजनी मांडले ठाण
टाउन हॉल
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उड्डाणपुलाखाली वाहनांची पार्किंग करू नये, असे हायकोर्टाचे आदेश आहेत, मात्र औरंगाबाद शहरात हा आदेश सर्रास धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे. या उड्डाणपुलाखाली दुचाकी चारचाकी वाहनांच्या पार्किंगसोबतच अनाधिकृतरित्या हॉटेल व गॅरेजचालकांनी देखील ठाण मांडले आहे.
शहरात टाउन हॉल, रेल्वे स्टेशन, सेव्हन हिल्स, सिडको बसस्टँड, क्रांतिचौक, मोंढा नाका, संग्रामनगर व महावीर चौकात उड्डाणपूल आहेत. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. या पुलांच्या आजुबाजुला नागरी वसाहतीसोबत व्यापारी प्रतिष्ठाणे देखील आहेत. उड्डाणपुलांखाली मोकळ्या जागा आहेत. सुरुवातीला तारेचे कंपाउंड करून बंदिस्त केलेल्या या जागा आता मोकळ्या झाल्या आहेत. नागरिकांसाठी या जागा मोफत पार्किंगचे हे ठिकाण ठरत आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलांखाली पार्किंग नको, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे वाहतूक शाखेला निर्देशही आहेत. शहरातील रेल्वेस्टेशन, सेव्हनहिल्स, क्रांतीचौक, मोंढा नाका आदी भागांतील पुलांखाली वाहने बेकायदा उभी केलेली असतात.
हॉटेल, फेरीवाल्यांचे साम्राज्य
टाउन हॉल येथे असलेल्या उड्डाणपुलाखाली वाहनांच्या पार्किंगसोबतच चहाच्या टपऱ्या, पानटपरी तसेच वाहनांच्या दुरुस्तीचेही काम करण्यात येते. यामुळे या उड्डाणपुलाखाली असलेल्या चौकातून जाण्यासाठी वाहनधारकाला कसरत करावी लागते
संग्रामनगर पार्किंग प्लेस
संग्रामनगर भागातील उड्डाणपुलाच्या बाजूला मोठी नागरी वसाहत आहे. चारचाकी वाहनधारकांची संख्या देखील या भागात लक्षणीय आहे. या वाहनधारकांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न या पुलामुळे सुटल्यात जमा आहे. संग्रामनगर पुलाखाली नेहमीच चारचाकी वाहने उभी असल्याचे नेहमी दिसून येतात. त्याचप्रमाणे येथे देखील वाहनांची दुरुस्ती तसेच पानटपरी, चहा टपरीचे अ‌नाधिकृत अतिक्रमण दिसून येते.
पुलाला धोका
उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. एका जनहीत याचिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला. समाज विघातक संघटनांकडून वेगवेगळ्या प्रकारे देशविघातक कारवाया केल्या जातात. उड्डाणपुलाखाली उभ्या करण्यात आलेल्या वाहनांचा वापर करून एखादी दुघर्टना घडल्यास पुलाला क्षती होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे उड्डाणपुलाखाली पार्किंगला मनाई करण्यात आली आहे.
उड्डाणपुलाखाली पार्किंग करणे बेकायदा आहे. हायकोर्टाने आदेश दिलेला आहे. संबंधीत अतिक्रमणावर महापालिका व वाहतूक शाखेने कारवाई करणे अपेक्षित आहे.
- उदय भरडे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य सुविधांसाठी दौलताबादचा फेरा

0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात समावेश असलेल्या वाळूज महानगरातील कामगार वसाहतींकरिता शासकीय हॉस्पिटल नाही. त्यामुळे या परिसरातील रुग्णांना उपचारासाठी थेट दौलताबाद आरोगय केंद्रात जावे लागत आहे. त्यामुळे या भागात स्वतंत्र शासकीय हॉस्पिटल स्थापन करण्याची गरज आहे.
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, तिसगाव, सिडको वाळूज महानगर, साजापूर, करोडी आदी गावांचा समावेश आहे. या गावांत सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यानुसार या परिसरात स्वतंत्र ग्रामीण रुग्णालयाची अावश्यकता आहे. पण, येथे शासकीय हॉस्पिटल नसल्याने स्थानिक नागरिकांना दौलताबाद येथील आरोग्य उपकेंद्रात जावे लागत आहे. विशेषतः या परिसरातील गरोदर माता, नवजात शिशू यांना डोस, इलाज व नोंदणीकरिता दौलताबाद येथील आरोग्य उपकेंद्रात जावे लागते. दूरचे अंतर असल्याने या कामांना विलंब होत आहे. अनेक जण दूरवर जाण्याऐवजी खासगी हॉस्पिटलमध्ये जातात. परिणामी, कामगार व ग्रामस्थांना आर्थिक फटका बसतो.
दौलताबाद येथील आरोग्य केंद्रात दरमहा उपलब्ध करून देण्यात येणारे डोस पुरेशा संख्येत नसतात. त्यामुळे अनेकवेळा महिला व बाळांना परत यावे लागते. याचा सर्वाधिक परिणाम बालकांवर होत आहे. या परिसरातील गरज ओळखून जिल्हा परिषदेने शासकीय हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या दैवशाला कुठारे यांनी केली आहे.

दूरचे अंतर

शासकीय हॉस्पिटल नसल्याने स्थानिक नागरिकांना दौलताबाद येथील आरोग्य उपकेंद्रात जावे लागत आहे. विशेषतः या परिसरातील गरोदर माता, नवजात शिशू यांना डोस, इलाज व नोंदणीकरिता दौलताबाद येथील आरोग्य उपकेंद्रात जावे लागते. दूरचे अंतर असल्याने या कामांना विलंब होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यास मारल्याचा आरोप; तरुणावर खुनी हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुत्र्याला का मारले, अशी विचारणा करत एका तरुणावर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. हा प्रकार सोमवारी दुपारी अडीच वाजता माळीवाडा ते आसेगाव रस्त्यावर घडला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दौलताबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सागर हमीद सरदार (वय १९ रा. आसेगाव, ता. गंगापूर) हे सोमवारी दुपारी हॉटेल दयासागर बाहेर उभे होते. तेव्हा आमच्या कुत्र्याला का मारले, थांब तुला कुत्र्यासारखे ठेचतो, असे म्हणत हल्ला चढवला. त्याला लोखंडी पाइप व चाकुने वार करून गंभीर जखमी केले. त्यांच्या तक्रावरून संताराम बल्लाळ, अमोल बल्लाळ, समाधान बल्लाळ, सोनाजी बल्लाळ व गिरजानाथ बल्लाळ (सर्व रा. आसेगाव) यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोडशेडिंगचे सावट

0
0

औरंगाबाद ः महसूल मुख्यालय असलेल्या शहरांत विजेचे लोडशेडिंग करू नये, असा नियम असला, तरी औरंगाबादकरांना येत्या काळात भारनियमनाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये विजेची सुमारे ४० टक्के हानी होते. विजेची हानी जास्त असलेल्या भागांमध्ये सहा ते नऊ तास लोडशेडिंग सुरू करण्याची शक्यता महावितरणच्या सूत्रांनी व्यक्त केली.

औरंगाबाद शहरातील २ लाख ४० हजार ग्राहकांना दररोज २२० मेगा युनिट वीजपुरवठा केला जातो. पुरवठ्याच्या तुनेत वसूल होणाऱ्या बिलांचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. शहरातील अनेक भागात सुमारे २० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त विजेची चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहेत. वीज चोरीविरोधात महावितरणाकडून विविध मोहिमा राबविण्यात आल्या. मार्चअखेरपर्यंत राबविण्यात आलेल्या सुमारे १२ हजार ग्राहकांच्या वीज जोडण्या कापण्यात आल्या. त्यानंतर या ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे भरले. औरंगाबाद विभागाने ही कारवाई केल्यानंतर २५० कोटी रुपयांचा महसूल मार्चअखेरीस वसूल केला होता.

मार्च महिन्यानंतरही वीज चोरी रोखण्यासाठी कारवाई सुरू आहे. ही कारवाई केल्यानंतरही सध्या औरंगाबाद शहरात शंभर रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकित असलेल्या ग्राहकांची संख्या ही १ लाख १५ हजार आहे. या ग्राहकांकडे सुमारे १६० कोटी रुपये बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात ‘अ’ ते ‘ड’ या वर्गांत ३१ फीडर आहेत. या भागातील वीज तूट १८ ते ४२ टक्के यादरम्यान आहे. ‘ई’ आणि ‘फ’ या गटांत २२ फीडर आहेत. ‘ग १’ ते ‘ग ३’ या गटांत शहरातील ३३ फिडर आहेत. ‘ग १’ प्रवर्गापेक्षाही जास्त वीज तूट सात फीडरवर असल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात करण्यात येणारा वीजपुरवठा आणि होणारी वसुली यांत मोठे अंतर झाल्याने भविष्यात औरंगाबाद शहरांत विजेची तूट असलेल्या भागांत लोडशेडिंग होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या बैठकीत संकेत
मराठवाड्यासह राज्यातील विविध भागातील उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महावितरणाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वीज तूट वाढल्याने लोडशेडिंग करण्यात येणार असल्याचे सूचित केल्याची माहिती महावितरणाच्या सूत्रांनी दिली.

३० फीडर संकटात
वीजपुरवठा आणि वसुलीची माहिती फीडरद्वारे मोजण्यात येते. औरंगाबादेत शहर एक आणि शहर दोन या विभागातील आठ उपकेंद्रातील ८३ फ‌ीडरची माहिती घेण्यात आली. विजेच्या हानीनुसार त्यांची वर्गवारी केली आहे. ‘अ’ ते ‘ड’ वर्गात ३१ फीडर आहेत. ‘ग १’, ‘ग २’ आणि ‘ग ३’ या गटात २३ फीडर आहेत. खूप कमी वसुली असलेले सात फीडर अशा एकूण ३० फीडरवरील वसुली नि‌यमित वसुलीपेक्षा कमी आहे. ‘ग ३’ गटापेक्षाही कमी वीज वसुली असलेल्या फीडरच्या नोंदी घेतल्या आहेत. औरंगाबाद शहरात राहुलनगर, रेल्वे स्टेशन, एकनाथनगर परिसर, क्रांतीचौक, शासकीय डेअरीचा परिसर, सातारा भागातील सिद्धी फिडर, पडेगाव भागातील देवगिरी व्हॅली, पेठेनगर, दर्गा परिसर आणि शहागंज भागातील नऊ फीडरवर वसुली कमी आहेत. औरंगाबाद दोन विभागात सहा फीडरवर वसुली खूपच कमी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कमी असलेल्या फीडरच्या कार्यक्षेत्रात सहा ते नऊ तासांचे लोडशेंडिग होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुबार पेरणीसाठी मदत कराः काँग्रेसची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
राज्यातील हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्याच पावसात खरीप पिकांची लागवड केली. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
मराठवाड्यात पाऊस गायब झाल्याने पिकांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची स्थितीही गंभीर झाली आहे. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात मका व कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या दोन्ही पिकांना सुरुवातीला किमान पावसाची गरज असते, मात्र पाऊस झालाच नसल्याने पीक वाळणे, वाढ खुंटणे, उगवलेले पीक माना टाकणे, आदी प्रकार होत आहेत. या मतदारसंघातील भौगोलिक रचनेमुळे पाणी वाहून जाते व कमीप्रमाणात जमिनीत मुरते, असे निवेदनात म्हटले आहे. बँक, सोसायटी व वैयक्तिक कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली, आता दुबार पेरणीचे संकट आल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यांना बी- बियाणे, खत किंवा आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॉकेलचा साठा वैजापुरात जप्त; संशयित पसार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शासकीय दुकानातून विक्री होणाऱ्या १७५ लिटर निळ्या रॉकेलचा साठा स्थानिक पोलिसांनी मुस्तफा पार्क परिसरातून छापा मारून पकडला. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मजीद कुरेशी यांचा मुलगा जावेद कुरेशी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो पसार आहे.
शहरातील मुस्तफा पार्क परिसरातील एका घरात शासकीय दुकानातून विक्री होणाऱ्या निळ्या रॉकेलचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, हवालदार सचिन सोनार, रवींद काळे, सुरडकर यांनी छापा मारला. येथे प्लास्टिकच्या ११ कॅन सापडल्या. त्यापैकी पाच कॅनमध्ये ७ हजार ५०० रुपयांचे एकूण १७५ लिटर रॉकेल होते. याचा पंचनामा तलाठी जितेंद्र चापानेरकर यांनी केला. पोलिसांनी हा साठा जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केला आहे. ही घटना शनिवारी घडली. हा साठा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मजीद कुरेशी यांचा मुलगा जावेद कुरेशी याने करून ठेवला होता. पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या फिर्यादीवरून जावेद मजीद कुरेशी याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद कुरेशी हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेची रक्कम लुटण्याचा डाव उधळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/वैजापूर
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची रक्कम लुटण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला ओरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गंगापूर चौफुलीवर एका हॉटेलमागे पकडले. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य, दोन मोटारसायकल, फोन आदी एक लाख २८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विवेक जाधव, सचिन कापूरे, भगतसिंग दुलत, जी. डी. मुळे, आर. एस. वारे, एन. बी. कोल्हे, राजू जोशी, बाबा नवले, शेख अबु बकर यांचे पथक लासूर स्टेशन येथील चोरीच्या तपासकामासाठी या परिसरात आले होते. त्यावेळी गंगापूर चौफुलीवर बाबा हॉटेलमागे काही संशयित दबा धरून बसल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकून पाच जणांना पकडले, पण एकाने घटनास्थळावरून पळ काढला. भारत लालचंद काळे (वय २५), प्रदीप लालचंद काळे (वय २७), बाळू नंदू पवार (वय ३२), बादशहा शब्बीर शेख (वय २५) व लक्ष्मण मंगल चव्हाण (वय २३), अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. या टोळीकडून एक एअरगन, चाकू, मिरची पावडर, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी फायटर, रॉड, दोरी, तीन मोबाइल व दोन मोटारसायकल, असा एक लाख २८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी होती योजना

वैजापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून शिऊर येथील बँकेच्या शाखेत रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांना लुटण्याची या टोळीची योजना होती. या टोळीतील आरोपींवर औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यामधे चोरी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यांना यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘अतिक्रमण हटाव’ रामभरोसे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागासाठी देण्यात आलेला पोलिस बंदोबस्त तब्बल साडेसहा कोटींचा पगार थकल्याने काढण्यात आला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटावचे काम तूर्तास ठप्प आहे.

पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सक्षमपणे कारवाया करण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाते. त्यासाठी २०१३मध्ये पोलिस विभागाने २२ कर्मचारी नियुक्त केले. यामध्ये एक पोलिस निरीक्षक, एक फौजदार व अन्य २० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या बंदोबस्तानंतर महापालिकेने शहरातील अनेक विभागातील अतिक्रमण काढली. बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार संबंधित विभागाला द्यावे लागतात. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचे पगार पालिकेकडून येणे अपेक्षित होते, परंतु पालिका प्रशासनाने हा निधी पोलिस विभागाला विभागाला दिला नाही. त्यात ही थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात गेल्याने पोलिस विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे. पोलिस प्रशासनाने आधी थकबाकी द्यावी, याचा आग्रह पालिकेकडे धरला आहे. याबाबत अतिक्रमण विभागाचे एम. बी. काझी यांच्याशी संपर्क साधाला असता तो झाला नाही.

थकबाकी मिळाली तरच कर्मचारी
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागात नियुक्त केलेले पोलिस कर्मचारी पोलिस विभागाने परत बोलावल्याने विभागाचे कामकाजच ठप्प झाले आहे. त्यात थकबाकी दिल्याशिवाय विभागाला पोलिस कर्मचारी मिळण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव कारवाईसाठी पोलिसांचा बंदोबस्त मिळणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मराठा क्रांती मोर्चाची जनजागृती रथयात्रा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी बुधवारपासून (१२ जुलै) औरंगाबाद येथून मराठा जनजागृती रथयात्रेची सुरुवात करण्यात आली.

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून मधुकरअण्णा मुळे यांच्या हस्ते रथयात्रेची सुरुवात झाली. अप्पासाहेब कुढेकर, रवींद्र काळे, रमेश केरे, माणिक शिंदे, मनोज गायके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या वेळी अभिजित देशमुख, बाळासाहेब थोरात, संतोष काळे, विशाल पवार, शिवानंद भानुसे, प्रशांत शेळके, गणेश काळे, आदींसह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा रथ औरंगाबाद, नेवासा या मार्गे नगर येथे दाखल होईल. तिथे आयोजित कँडल मार्चमध्ये सहभागी होईल. त्यानंतर कोपर्डी या गावी मार्गस्थ होईल. १३ जुलै रोजी कोपर्डी येथील क्रांतीज्योतीला श्रद्धांजली अर्पण करून त्या ठिकाणी नऊ ऑगस्ट महामोर्चाची आढावा बैठक होईल. तिथून हा जनजागृती रथ हा बीडकडे रवाना होईल. १४ जुलैपासून मराठवाड्यात मराठा समाज जनजागृती मोहीम हाती घेतली जाईल. १५ जुलै - उस्मानाबाद , १६ लातूर, १७ - नांदेड, १८ - हिंगोली, १९ - परभणी आणि २० जुलै जालना अशी रथयात्रेचा प्रवास असेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे ही रथयात्रा उत्तर रवाना होईल.

सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीचे आंदोलन
‘कोपर्डीच्या निर्भयावरील अत्याचाराला वर्ष उलटूनही तिला न्याय मिळाला नाही. या निषेधार्थ गुरुवारी (१३ जुलै) सकाळी दहा वाजता मूकमोर्चे काढण्यात येतील,’ अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तटकरे म्हणाले, ‘कोपर्डी घटनेमुळे संतापलेल्या मराठा समाजाने राज्यात शांततेत मोठे मोर्चे काढले. त्यावेळी हा खटला जलदगती न्यायालयात चालवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, वर्षभरात सरकारने काही केले नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. अशा स्थितीत सरकार काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. अशा स्थितीत दुटप्पी वागण्यापेक्षा शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ढोल वाजवावा.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images