Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रयोगशीलतेशिवाय नवनिर्मिती अशक्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कुठल्याही क्षेत्रात यश मिळविताना मेहनत, नाविन्यपूर्ण गोष्टींचा अधिकाधिक वापर आवश्यक आहे. प्रयोगशीलता हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. प्रयोगशीलतेशिवाय नवनिर्मिती अशक्य आहे,’ असे प्रतिपादन पद्मश्री एम. एम. शर्मा यांनी शनिवारी येथे केले.

आस्था फाऊंडेशन, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) च्या पुढाकाराने यशवंत प्रेरणा व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प शर्मा यांनी आज गुंफले. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)चे कुलगुरू पद्मविभूषण जी. डी. यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, सीएमआयए अध्यक्ष प्रसाद कोकिळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

‘इनोव्हेशन्स फॉर रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ’ या विषयावर मार्गदर्शन करताना शर्मा म्हणाले, ‘आपल्याकडे इनोव्हेशन हा शब्द अगदी सहजपणे वापरला जातो, पण त्यामागे अथक परिश्रम असतात. हे लक्षात घेतले पाहिजे. मोबाइल, झेरॉक्स मशीन ही त्याची उदाहरणेआहेत. पॉलिस्टरने कपड्याच्या क्षेत्रात क्रांती घडविली. भारतीयांकडे प्रचंड पात्रता असूनही आपण इनोव्हेशनकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दुर्दैवाने सगळे टॅलेंट सिलिकॉन व्हॅलीमध्ये वापरले जाते. ‘इन्व्हेन्शन’ आणि ‘इनोव्हेशन’ या दोघांमध्ये अनेकवेळा गल्लत होते. वास्तविक दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. इनोव्हेशन हे उद्योगांसाठी ऑक्सिजन बनले आहे. आज तुम्ही स्वतःला अपडेट केले नाही, तर तुम्ही संपाल. ‘इनोव्हेशन’ ही उद्योगातील प्रक्रिया आहे. विक्री, विपणन, उत्पादन हे त्याचे काही भाग आहेत. जागतिक पातळीवरील स्पर्धेमुळे घरेलू मार्केटमधील उद्योगांनाही आता स्वतःला बदलून घेणे आवश्यक बनले आहे.

इनोव्हेशन करताना त्यात चुका होणे क्रमप्राप्त आहे. कारण प्रयोगशीलतेतून तुम्ही केलेल्या प्रयोगात काही लगेचच यश मिळणार नाही. अपयश पचविण्याची आपली मानसिकता नाही. सोपे असलेले स्वीकारून त्यातच पुढे संशोधनाचा ट्रेंड आहे. आपण ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. किमती कमी झाल्या पण त्यात नाविन्यपूर्णता पुढे सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे. ऑडिओ कॅसेट आज काळाचा ओघात लुप्त झाल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाने जुने तंत्रज्ञान मोडित निघाले, भविष्यात याचा विचार करून इनोव्हेशनवर आपण भर दिला पाहिजे,’ असा सल्ला त्यांनी दिला. यादव, चोपडे यांनी मार्गदर्शन केले. रितेश मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले. उत्सव माछर यांनी आभार मानले.

भारतात प्रयोगातील अपयश पचविण्याचे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. कारण प्रयोगशीलतेशिवाय इनोव्हेशन शक्य नाही. आणि अपयशाशिवाय प्रयोगशीलता अशक्य आहे. त्यासाठी कायम प्रयोगशील राहण्याची आवश्यकता आहे. - एम. एम. शर्मा, आयसीटीचे प्राध्यापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ सिंचन प्रस्ताव; अभियंता पांढरे दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत ५२ कामांची मंजुरी दिली गेली होती. ही कामे नियमबाह्य व कुठलीही परवानगी न घेता वाटल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे कार्यकारी अभियंता व्ही. पी. पांढरे हे दोषी असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी राज्याच्या सिंचन सचिवांकडे अहवाल पाठविला आहे. त्यावरून पांढरे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत गेल्या वर्षी कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांची ५२ कामे मंजूर केली गेली होती. निवडणूक काळात ही कामे मंजूर केल्याबद्दल प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत सीईओ अर्दड यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने सर्व फायली व कागदपत्रे तपासून ४७ फायली कुठेच नोंदविल्या नसल्याचे निदर्शनास आले होते. अर्थ खात्याकडूनही कुठलीच परवानगी घेतलेली नव्हती. काम वाटप झालेल्या कंत्राटदाराकडून आवश्यक त्या नोंदी बुकांमध्ये नव्हत्या, आदी नोंदी अहवालात मांडल्या होत्या. त्यावरून सीईओ अर्दड यांनी अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा आणि कार्यकारी अभियंता व्ही. पी. पांढरे यांना कारणे दाखवा नोटिस बजावली होती.

पुढील आठवड्यात कारवाई
दरम्यान, या अहवालाची दखल घेऊन सीईओ अर्दड यांनी सिंचन विभागाच्या सचिवांना नुकतेच पत्र पाठविले आहे. त्यात या प्रकरणात पांढरे दोषी असल्याचे पत्रात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. सचिवांकडून याबाबत पुढच्या आठवड्यात कारवाई अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाभळगावची पुनरावृत्ती होणार नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती आणि बांधणीच्या कामात न झालेल्या कामाचे बिल उचलण्याची बाभळगावसारखी पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, सभापती प्रकाश देशमुख, संजय दोरवे, संगीता घुले उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसोबत नुकतीच जिल्ह्याच्या विकासासाठी झालेल्या बैठकीतील निर्णय सांगण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एकूण चार हजार ९६२ किलो मिटर रस्ते आहेत. या रस्त्याच्या तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी सातशे कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे तिरुके यांनी सांगितले. लातूर जिल्ह्याचा विकास नागपुरसारखाच करण्यासाठी मदत करावी अशी विनंती आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निधीची कमतरता पडणार नाही, असा शब्द दिला असल्यचेही तिरुके म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील रस्ते दुरुस्ती आणि बांधणी दर्जेदार व्हावा यासाठी तालुकानिहाय निविदा मागविण्यात येणार असून ज्यांच्याकडे स्वतःचा हॉटमिक्स प्लँट आहे, अशानाच आम्ही ऑनलाईन पद्धतीने कामे देणार असल्याचे बांधकाम समितीचे सभापती प्रकाश देशमुख यांनी स्पष्ट केले.
पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षकाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्टेप (सोल्युशन ऑफ टिचर एज्युकेशनल प्रॉब्लेम) नावाने एक अॅप विकसित केले आहे. या अॅपवर एकूण ७६ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ६६६ तक्रारीचे निराकरण करण्यात आल्याची माहिती रामचंद्र तिरुके यांनी दिली. शिक्षकाच्या समस्या सोडविण्यासाठी अॅप तयार करणारी लातूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद असल्याचे ते म्हणाले. गेली काही वर्ष १४० शाळांना पूर्णवेळ मुख्याध्यापक नव्हते. त्याशाळेसाठी सहशिक्षकाना बढती देऊन त्यांच्या संमतीनेच पारदर्शकपणे नियुक्त्या दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शाळा डिजीटल करण्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्याची तयारी सुरू झाल्याचे ही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील असा दावा ही तिरुके यांनी केला.

भंगाराची चोरी झाल्याची कबुली
जिल्ह्यात अद्यापही ८२ हजार शौचालयाचे बांधकाम होणे शिल्लक आहे. ते डिसेंबर अखेरपर्यंत होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या उभारणीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नसल्याचा निर्वाळा देऊन तिरुके यांनी त्या जागेवरच्या भंगाराची चोरी झाल्याचे मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयसीटी’ला जागा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय पातळीवरील ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’चे (आयसीटी) उपकेंद्र जालना येथे दोनशे एकरवर उभारले जाणार आहे. यासाठी लागणारी जागा ‘आयसीटी’कडे वर्ग करण्यात आली. तेथे शैक्षणिक वर्ष २०१८-१९मध्ये चार अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
उपकेंद्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा दिली आहे. जालना जिल्हाधिकारी निवासस्थानापासून अर्धा-एक किलोमीटरवर ही जागा असून त्याची कागदपत्रे ‘आयसीटी’कडे वर्ग करण्यात आली. कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय सचिव डॉ. महेश शिवणकर यांनी ही कागदपत्रे सुपू्र्द केली. ऑटोक्लस्टरमध्ये आयोजित सोहळ्यात ही प्रक्रिया झाली. निवृत्त संचालक पद्मविभूषण एम. एम. शर्मा, प्रा. ए. बी. पंडित याप्रसंगी उपस्थित होती. जागा मिळाल्याने संस्थेच्या उभारणी प्रक्रियेला गती येणार आहे. ‘आयआयएम’साठी युती सरकारने नागपूरला प्राधान्य दिल्यानंतर मराठवाड्यात रोष निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने जालन्यात ‘आयसीटी’ उपकेंद्र मंजूर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘अमृत’ला टाकले कंत्राटदारांनी वाळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अमृत योजनेअंतर्गत हरित पट्टा विकसित करण्यासाठी महापालिकेला कंत्राटदार मिळत नाही. त्यामुळे तीन वर्षांची कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे पालिकेवर फेरनिविदा काढण्याची नामुष्की ओढावली आहे.

विविध शहरांमध्ये विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत योजना जाहीर केली. त्यामध्ये औरंगाबादचा देखील समावेश आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपये शहरात काम करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या निधीतून शहराच्या विविध भागात हरित पट्टे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने हर्सूल तलावाच्या क्षेत्रात हरित पट्टा विकस‌ित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. येथे लहान मुलांसाठी मनोरंजन उद्यान व सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. याशिवाय सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंट पर्यंत मुख्य रस्त्याच्या बाजूने हरित पट्ट्याचा विकास केला जाणार आहे. सिल्कमिल कॉलनी, जालाननगर, स्वामी विवेकानंद उद्यान, विमानतळाच्या भिंतीलगतचा मुकुंदवाडीच्या पाठीमागचा परिसर, आसेफिया कॉलनी, टाइम्स कॉलनी या परिसरात देखील हरित क्षेत्राचा विकास अमृत योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

दरम्यान २०१५ - १६ व २०१६ - १७ वर्षासाठीच्या कामांना शासनाने मंजुरी दिली असून निविदा देखील काढण्यात आली. हर्सूल तलाव क्षेत्रात काम करण्यासाठी दोनच निविदा प्राप्त झाल्या. शासनाच्या नियमानुसार तीन निविदा प्राप्त होईपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देता येत नाही. त्यामुळे पालिकेला हर्सूलसाठी फेरनिविदा काढावी लागणार आहे. सिडको बसस्टँड ते हर्सूल टी पॉइंटपर्यंतच्या कामासाठी निविदाच प्राप्त झाली नाही. त्यामुळे या कामाचीही फेरनिविदा काढावी लागणार आहे. २०१७ - १८ यावर्षासाठी दोन कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. या निधीतून करावयाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे पाठवल्यावर निधी पालिकेच्या पदरात पडणार आहे. शासनाकडून खात्रीने पैसे मिळण्याची शक्यता असताना देखील पालिकेने काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमृत योजनेतून हर्सूल तलावाच्या परिसरात काम करण्यासाठी निविदा काढली होती, पण दोनच निव‌िदा प्राप्त झाल्या. त्यामुळे फेरनिविदा काढावी लागणार आहे. अन्य ठिकाणीही प्रतिसाद मिळाला नाही. २०१७-१८ वर्षासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून, तो मंजुरीसाठी लवकरच शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. - डॉ. विजय पाटील, उद्यान अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणोरी शाळेची झाडाझडती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
गणोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या मुलांना साधे मराठी वाचता येईना ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शिक्षणाबाबतची गंभीर बाब फुलंब्रीचे गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांच्या निदर्शनास शनिवार (१५ जुलै ) आली. त्यामुळे त्यांनी शिक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र महाजन होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषदेची शाळा फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील आहे. शनिवारी शाळेत काही शिक्षक तब्बल एक तास उशिरा आले. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चंद्रे यांनी हा प्रकार उपसरपंच बाळासाहेब तांदळे यांच्या कानी टाकून वरिष्ठांकडे शाळेची फोनवर तक्रार केली. त्यामुळे गटविकास अधिकारी एम. सी. राठोड यांनी त्वरित शाळेला भेट दिली. दरम्यान, शाळेत शिक्षक उशिरा येण्याचे कारण विचारले असता गाडी पोलिसांनी पकडली असल्याचे कारण शिक्षकांनी त्यांना सांगितले.
राठोड यांनी मुलांच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल चौकशी केली दरम्यान त्यांना सहावी, सातवी, आठवी, नववी, आणि दहावीत विद्यार्थ्यांना साधे मराठीचे शुद्ध लेखन काढता आले नाही. त्याशिवाय नीट वाचनही करता आले नाही शिवाय इंग्रजी विषय दूरच ठेवावा लागला.
स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून मुलांना आहार पुरवण्याचे सांगितले. येथील शालेय आहार औरंगाबाद येथील बचत गट शहरात हा आहार शिजवून गणोरी शाळेला पुरवत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. याबाबत त्यांना शंका आली त्यामुळे त्यांनी स्वतः आहार खाऊन आहार चौकशी केली. दरम्यान, शाळेचा आहार शाळेतच शिजवून देण्याचे संबंधितांना सांगण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब तांदळे, शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब चंद्रे, अंबादास जाधव, मच्छिंद्र चव्हाण, रावसाहेब जाधव व ग्रामस्थ, पालकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा जिल्ह्यात वीज गळती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातंर्गत मराठवाड्यातील ८ जिल्हे व खानदेशातील ३ अशा ११ जिल्ह्यांत वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे. डिसेंबर २०१६ ते मे २०१७ मध्ये लघुदाब ग्राहकांनी ४४,१०० लाख युनिटचा वापर केलेला आहे. मात्र, त्यापोटी फक्त २२,६९० लाख युनिटचेच वीज बिलिंग झाले आहे. म्हणजेच २१,४१० लाख युनिटची वीज गळती झाल्याने १ हजार ५६९ कोटी रुपयांचा आर्थिक तोटा हा तांत्रिक व वाणिज्यिक हानीमुळे महावितरण कंपनीला झालेला आहे.
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातंर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, जळगाव,धुळे, नंदूरबार, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या शहरी भागामध्ये वीज गळतीचे प्रमाण साधारणपणे ३० ते ४० टक्के इतके आहे. या भागात आकडे टाकून विजेचा वापर करणे, मिटरमध्ये फेरफार करणे, रिमोट कंट्रोलचा वापर करणे इत्यादी प्रकारच्या वीज चोरीमुळे महावितरणला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तरीसुद्धा वीज गळतीचे प्रमाण कमी होत नाही. याची मुख्यत्वे कारणे रिमोट कंट्रोलचा वापर, मिटरमध्ये फेरफार करणे, मिटरचे वायर बायपास करणे हे करून देणाऱ्या अनधिकृत व्यक्तिंच्या टोळया कार्यरत असल्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांनी प्रयत्न करून देखील वीज गळती कमी करणे अवघड झालेले आहे. औरंगाबाद शहरामध्ये पोलिस आयुक्त यांच्या मदतीने सदर कार्य करणारी एक टोळी नुकतीच पकडली असून दोन दिवसात १८ वीज चोऱ्या पकडण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरणी सखोल लक्ष घालून वरील सर्व शहरांमध्ये कार्यरत असलेल्या टोळया पकडण्याची कार्यवाही महावितरण व पोलिस संयुक्तपणे करत आहेत.
महावितरणतर्फे सातत्याने वीज गळती कमी करण्याचे प्रयत्न चालू असून त्याचाच एक भाग म्हणून वीज चोरी पकडून त्याद्वारे वीज चोरांवर कडक कारवाई केली जात आहे. एप्रिल ते जून २०१७ या दरम्यान औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया अंतर्गत ८ हजार ४०९ वीज चोऱ्या पकडण्यात आलेल्या असून एकूण ३५४ वीज चोरांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घरगुती, व्यापारी व औघोगिक वीज ग्राहकांकडे मोठया प्रमाणात थकबाकी आहे. औरंगाबाद परिमंडळामध्ये मार्च २०१७ मधील १८२ कोटी रुपयांच्या थकबाकीत वाढ होवून ती मे २०१७ अखेर २१५ कोटी झालेली आहे. तसेच जळगाव परिमंडळात मार्च २०१७ मध्ये असलेली ६१ कोटींची थकबाकी मे २०१७ अखेर ८८ कोटी रुपये, लातूर परिमंडळात मार्च २०१७ अखेर असलेली १६२ कोटींची थकबाकी मे २०१७ मध्ये १९७ कोटी व नांदेड परिमंडळात २०७ कोटींची थकबाकी मे २०१७ अखेर २४१ कोटींची झालेली आहे. प्रादेशिक कार्यालयातंर्गत एप्रिल २०१७ व मे २०१७ फक्त या दोन महिन्यांमध्ये १२९ कोटी रुपयांच्या थकबाकीची वाढ झालेली आहे.

वीज बील भरा कारवाई टाळा
चालू वीज बिल व थकबाकी भरून वीज पुरवठा खंडित करण्याची कटु कारवाई टाळावी व वीज ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करून नये असे आवाहन बकोरिया यांनी केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यजमान औरंगाबादची यशस्वी कामगिरी

$
0
0

यजमान औरंगाबादचे वर्चस्व
१७ वर्षे वयोगटात जेतेपद, तीन गटांत उपविजेते
राज्य स्क्वॉश स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य स्क्वॉश संघटना व औरंगाबाद जिल्हा स्क्वॉश संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्क्वॉश अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात औरंगाबादच्या गौतम पाढी, ईशान महाजन या जोडीने विजेतेपद पटाकाविले. मुलींच्या गटात औरंगाबादचा संघ उपविजेता ठरला.
विभागीय क्रीडा संकुलात शनिवारी प्रारंभ झालेल्या या स्पर्धेत २७ जिल्ह्यांतील ६३२ खेळाडूंनी विविध वयोगटांत सहभाग घेतला आहे. सबज्युनिअर, ज्युनिअर व वरिष्ठ गट मुले अशा विविध गटांत ही स्पर्धा सुरू आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात औरंगाबाद संघाने गोंदिया संघाचा २-० असा पराभव करून विजेतेपद पटाकाविले. औरंगाबादच्या गौतम पाढीने अंशचा, तर ईशान महाजनने मयूरचा २-० असा पराभव करून संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाणे संघाने यजमान औरंगाबाद संघावर २-१ असा विजय नोंदवत विजेतेपद मिळविले. औरंगाबादला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ठाण्याच्या अंजली सैनिवालने औरंगाबादच्या अलोकी बोबडेला २-१ असे हरवले. उपांत्य फेरीत औरंगाबादने कोल्हापूरला २-० असे पराभूत केले. अलोकी बोबडेने शर्वणीला २-० असे सहज पराभूत केले.
मुलांच्या १४ वर्षांखालील गटात औरंगाबादचा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात औरंगाबादला नागपूर संघाकडून १-२ असा पराभव स्विकारावा लागला. औरंगाबादच्या ओम करवा, जीत जैन यांनी चांगली कामगिरी बजावली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूर संघाने औरंगाबादला २-० असे पराभूत करून अजिंक्यपद मिळविले. नागपूरच्या विजयात करिना बाठिया चमकली. औरंगाबाद संघाकडून आर्या पाटील, खुशी जैस्वाल यांनी लक्षवेधक खेळ केला.

उद्घाटन सोहळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा भारतीचे प्रसन्न हरदास, राज्य स्क्वॉश संघटनेचे सरचिटणीस डॉ. दयानंद कुमार, अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, डॉ. पी. आर. रोकडे, महेशराजे निंबाळकर, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, उदय कहाळेकर, जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव रणजित भारद्वाज यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी गतवर्षी आंतरशालेय स्क्वॉश स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा प्रमुख अतिथींच्या हस्ते टी-शर्ट्स देऊन सत्कार करण्यात आला. रोहित गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रदीप खांड्रे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर हिवराळे, स्वप्निल नरोडे, आकिब सिद्दिकी, दीपक बिरारे, सोहेल खान, आनंद लाहोटी, शैलेश खांड्रे, राजकुमार गारोळ आदींनी पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेशन दुकानदार दिल्लीत धडकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, निश्चित मानधन द्या यासह प्रलंबित मागण्यासाठी दिल्ली येथे १८ जुलै रोजी राज्यातील रेशन दुकानदार मोर्चा काढणार आहेत,’ अशी माहिती अशी माहिती अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी शनिवारी दिली.

पाटील म्हणाले, ‘दुकानदारांना मिळणारे कमिशन अत्यअल्प आहे. त्यामुळे ते आर्थिक अडचणी सापडले आहेत. शासनासोबत राज्यस्तरावर याबाबत बैठका झाल्या, पण अद्याप तोडगा निघाला नाही. एका क्विंटलमागे ७० रुपये कमिशन मिळते, पण दुकान चालविण्यासाठी येणारा खर्च व त्यातून बचत होणाऱ्या पैशांतून घर चालविणे अवघड आहे. त्यामुळे आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा किंवा निश्चित मानधन मिळावे. रोजगाराची निश्चित हमी देऊन भविष्यात महागाई निर्देषांकानुसार कमिशन वाढवून मिळावे.

शालेय पोषण आहार, रोजगार हमी आदी योजनेच्या माध्यमातून पुरविलेल्या धान्यापोटीची थकबाकी त्वरित द्यावी. हमालीच्या नावाखाली कंत्राटदाराकडून होणारी लूट थांबवा, एलपीजी गॅस सिलेंडर वितरणाची परवानगी द्या,’ अशा मागण्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी बी. एन. देशमुख, रफिक शेरखान, तात्याराव मगरे, मधुकर चव्हाण, नरेंद्र देशमुख, पुंडलिक अंभोरे, सचिन कोरडे, प्रकाश निकाळजे आदी उपस्थित होते.

सात कोटी रुपये थकले
पाटील म्हणाले, ‘एकट्या औरंगाबादेतील दुकानदारांना सुमारे सात कोटी रुपये येणे बाकी आहेत. ऑनलाईन डाटा एन्ट्रीमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित असून तातडीने दुरुस्ती करावी. दुकानदारांना त्यांच्या जागेचे शासकीय दराने भाडे मिळावे यासाठी ऑल इंडिया प्राइज शॉप डिलर्स फेडरेशनने देशव्यापी निर्णायक लढा पुकारला आहे. त्यात महासंघाचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नगरसेवकांना अडीच हजारांची खिरापत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाढत्या महागाईचा हवाला देत राज्य शासनाने विविध महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या नगरसेवकांच्या मानधनात अडीच हजार रुपये वाढणार आहेत.

नगरसेवकांच्या मानधनवाढीसंदर्भात राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने शनिवारी अध्यादेश काढला. अध्यादेशात म्हटले आहे की, बृह्न्मुंबई महापालिकेतील सदस्यांचे मानधन २००८ व इतर महापालिकेतील सदस्यांचे मानधन २०१० मध्ये निश्चित करण्यात आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सदस्यांचे मानधन वाढवण्याचे विचाराधीन होते. त्यानुसार त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत आहे.

मानधन वाढवताना महापालिकांचे वर्गीकरण देखील करण्यात आले आहे. अ (प्लस) वर्ग असलेल्या महापालिकेतील सदस्यांना आता २५ हजार रुपये दर महिन्याला मानधन मिळतील. अ वर्ग महापालिकेच्या सदस्यांना २० हजार रुपये, ब वर्ग महापालिकेच्या सदस्यांना १५ हजार रुपये, तर क आणि ड वर्ग महापालिकेच्या सदस्यांना दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. औरंगाबाद महापालिकेचा समावेश क वर्गामध्ये होते. त्यामुळे या महापालिकेतील नगरसेवकांना आता दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन मिळेल.

बारा लाखांचा बोजा
महापालिकेतील नगरसेवकांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मानधनापोटी दिले जात होते. स्वीकृत सदस्यांसह पालिकेत १२० नगरसेवक आहेत. साडेसात हजार रुपये या प्रमाणे पालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला नऊ लाख रुपयांचा बोजा पडत होता. आता वाढीव मानधनानुसार बारा लाख रुपयांचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

राज्य सरकारने नगरसेवकांचे मानधन नाही वाढवले तरीही चालले असते. मात्र, औरंगाबादमधील अनेक कामे रखडली आहेत. ती विकास कामे करण्यासाठी आम्हाला पैसा द्यावा. - रेणुकादास वैद्य, नगरसेवक, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विभागीय स्क्वॉश स्पर्धा आयोजित करू’

$
0
0

‘विभागीय स्क्वॉश स्पर्धा आयोजित करू’
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्क्वॉश खेळाला राज्यभरात चालना देण्यासाठी आगामी काळात विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘मेट्रो सिटी’पलीकडे अन्य जिल्ह्यांमध्ये हा खेळ अधिक प्रमाणात रुजावा, यासाठी राज्य संघटना गांभीर्याने प्रयत्न करीत असल्याची माहिती राज्य स्क्वॉश संघटनेचे सरचिटणीस डॉ. दयानंद कुमार यांनी दिली.
राज्य स्क्वॉश स्पर्धेनिमित्त औरंगाबादेत आलेल्या डॉ. दयानंद कुमार यांनी ‘मटा’शी संवाद साधताना स्क्वॉश खेळाच्या सद्यस्थितीबद्दल मनमोकळी चर्चा केली. कुमार म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांमध्ये राज्य संघटनेने स्क्वॉश खेळाला चालना देण्याचे काम केले आहे. सद्यस्थितीत राज्य संघटनेने २२ जिल्हा संघटनांना मान्यता दिली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये स्क्वॉश खेळाच्या नियमित स्पर्धा घेतल्या जातील, त्यांनाही मान्यता दिली जाईल. सध्या राज्यात स्क्वॉश खेळाचे चांगल्या दर्जाचे ६० प्रशिक्षक कार्यरत आहेत. हे प्रशिक्षक प्रामुख्याने ‘मेट्रो सिटी’मध्येच आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही चांगले प्रशिक्षण घडवण्याची योजना राज्य संघटनेने हाती घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुणे या शहरानंतर आता नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमधूनही दर्जेदार स्क्वॉशपटू घडताना दिसत आहेत. हे चित्र आश्वासक आहे. पुढील चार-पाच वर्षांमध्ये राज्यभरात स्क्वॉश खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल याची खात्री वाटते.’
‘दोन वर्षांपूर्वी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये स्क्वॉश खेळाचा समावेश झाल्याने या खेळाच्या वाढीस चालना मिळाली आहे. खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी या हेतूने विभागीय स्पर्धांचेही आयोजन राज्य संघटना करणार आहे. राज्यात सध्या आठ विभाग आहेत. त्यामुळे विभागातील खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय अशा स्पर्धांतून खेळाडूंचा कस लागेल आणि प्रगतीही होईल. चेन्नईत राष्ट्रीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्राला १४ वर्षे, १७ वर्षे आणि १९ वर्षे या वयोगटात सर्वसाधारण अजिंक्यपद मिळाले. तब्बल २३ वर्षांनी महाराष्ट्राने या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. हे यश उल्लेखनीय असून आगामी काळात हा खेळ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट व्हावा, यासाठी राज्य संघटना पुढाकार घेणार आहे.’
‘व्यावसायिक खेळ असल्याने याचे प्रशिक्षण देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षक सहजपणे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात लेवल वन प्रशिक्षण तयार व्हावेत यासाठी राज्य संघटना प्रयत्नशील आहे. प्रत्येक क्रीडा संकुलात स्क्वॉश कोर्ट उभारण्यात येत आहे. या सुविधांचा अधिकाधिक फायदा खेळाडूंना व्हावा यासाठीही उत्तम प्रशिक्षक असणे आवश्यक आहे. लोढा समितीने क्रिकेटमध्ये विविध बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशपातळीवर विविध क्रीडा महासंघामध्ये आता बदल होऊ लागले आहेत. वयाचे बंधन प्रामुख्याने अंमलात आणत आहे. आता माझे वय ७२ आहे. नवीन पिढी पुढे आणण्याकरिता मी प्रयत्न करीत आहे. त्यानुसारच औरंगाबादचे प्रदीप खांड्रे, रणजित भारद्वाज यांच्यासह अन्य जिल्ह्यातूनही चांगले संघटक निश्चित पुढे येतील असा मला विश्वास वाटतो, असे कुमार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पत्नीने काढला पतीचा काटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद
प्रेमात आड येणाऱ्या पतीचा काटा काढणाऱ्या पत्नी नजमाबी आणि तिचा प्रियकर विनोद पवार यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. महाजन यांनी दोषी ठरवून जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

नायगाव (ता. औरंगाबाद) येथील सय्यद रहेमान सय्यद रुस्तुम हा २६ सप्टेंबर २०१४ रोजी सांयकाळी मित्र सय्यद कलीम सोबत बैल घेऊन औरंगाबादला पायी जाणार होता. त्याने पत्नी नजमाबीला तसे सांगितले. मात्र, नजमाबीने आपण अगोदर विहिरीवरुन पाणी आणू. त्यानंतर तुम्ही जा अशी गळ घातली. पती-पत्नी दोघेही पाणी आणण्यासाठी गावातील विहिरीजवळ गेले. तेव्हा रहेमान आला नाही म्हणून त्याचा मित्र कलीम त्याच्या घरी गेला. तेव्हा मुलगी आस्माने पप्पा आणि मम्मी विहिरीवर पाणी आणायला गेल्याचे सांगितले. कलीम विहिरीकडे निघाला.

विहिरीजवळ पाणी भरताना पती-पत्नीमध्ये संवाद सुरू असताना विनोद रंगनाथ पवार (रा. सांवगी) हा पाठीमागून आला आणि त्याने डोक्यात जोरात फावड्याचा दांडा मारला. ही घटना कलीमने प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यामुळे तो ओरडला. त्यावेळी विनोद पवार आणि नजमाबीने कलीमला जीवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून पळून गेले. सय्यद रहेमान हा अर्धनग्न रक्ताच्या थारोळ्यात पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृत अवस्थेत पडलेला दिसला. या घटनेची माहिती शेख गफार शेख गुलाब यांनी फुलंब्री पोलिस ठाण्याला कळवली. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. एम. गायकवाड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गायकवाड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता नजमाबी आणि विनोद पवार यांचे अनैतिक संबध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. गायकवाड यांच्या पथकाने नजमाबी आणि विनोद पवारची कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्या दोघांना अटक करून तपास अधिकाऱ्यांनी तपास करून न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले होते.

मुलीसह मित्राची साक्ष महत्त्वाची
खून खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. एच. महाजन यांच्यासमोर झाली असता सहाय्यक लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यात मुलगी आस्मा आणि सय्यद रहेमानचा मित्र सय्यद कलीम या प्रत्यक्षदर्शीचा साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने रहेमानची पत्नी नजमाबी आणि प्रियकर विनोद पवार यास खूनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून भादंवी ३०२ कलमान्वे जन्मठेप, प्रत्येकी १० हजार रुपये, दंड न भरल्यास ६ महिने साधी शिक्षा. पुरावा नष्ट करणे भादंवि २०१ कलमान्वये दोघांना ही तीन वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंजूर झालेल्या डीपी निधीअभावी कागदावर

$
0
0

मंजूर झालेल्या डीपी निधीअभावी कागदावर
दोन वर्षांपासून ट्रान्सफार्मरची प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
शहरातील महावितरणच्या दोन्ही विभागात २०० हून अधिक डीपींना (ट्रान्सफॉर्मर) मंजुरी मिळाली आहे. तथापि, निधीअभावी व जागेअभावी त्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाढत्या शहराची विजेची मागणी पूर्ण करण्यात महावितरणला अपयश येत आहे.
उस्मानपुरा भागातील चौकात असलेल्या डीपीद्वारे उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिर परिसरासह आसपासच्या परिसरात वीज पुरवठा केला जात आहे. या भागात घरगुती वीज कनेक्शन्ससह व्यावसायिक इमारतींची संख्या वाढत चालली आहे. यामुळे वीज वापरही वाढला आहे. त्याचा ताण जुन्या झालेल्या डीपीवर येऊ लागला आहे. या भागातील नागरिकांनी नवीन डीपीची केलेली मागणी २०१५ मध्ये मान्य करण्यात आली. मात्र, अद्यापही या भागात नवी डीपी बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे जुन्याच डीपीवर सगळा भार येत असून वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाळ्यात तर हे प्रमाण अधिकच वाढत आहे.
उस्मानपुऱ्यासह पुंडलिकनगर, जयभवानीनगर, राहुलनगर, सातारा परिसर, हर्सूल, सिडको भागातही हीच समस्या आहे. डीपी मंजूर तर झालेली आहे, पण ती त्या त्या भागात बसविण्याबाबत महावितरणचा आनंदीआनंद आहे. एकीकडे निधीअभावी महावितरण अनेक भागांमध्ये डीपी बसवू शकत नाही, तर दुसरीकडे अतिरिक्त दाब आलेल्या डीपींची संख्या अडीचशेच्यावर गेली आहे. त्यामुळे छोटासा पाऊस आला तरी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.
आयपीडीएस अंतर्गत कामांना सुरुवात
केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेर्गत १११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या अंतर्गत समाधान कॉलनी येथे उपकेंद्र तयार करण्याच्या योजनेचा शुभारंभ चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यानंतर रोशनगेट येथे डीपीची क्षमता वाढविण्याचे काम करण्यात आले आहे. ३३/११ उपकेंद्र दूध डेअरी, क्रांती चौक, बेंडसे पेपर मिल, एमआयडीसी चिकलठाणा, सिडको वाळूज महानगर - ४, एन-१० टीव्ही सेंटर, चिकलठाणा शिवार या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत.

अशा वाढविणार वाहिन्यांची क्षमता

उच्चदाब वाहिनी - ७८.२९ किमी

लघुदाब वाहिनी - १४३.७ किमी

वितरण रोहित्रे (नवीन) - २५६

वितरण रोहित्रे (क्षमतावाढ) - ३३०

एचव्हीडीएस रोहित्रे - ६०

सोलार पॅनल - १४५ केडब्‍ल्यु

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूमुक्तीविरुद्ध महिलांचे वैजापुरात बळ अपुरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील फुलेवाडी रोड भागातील दारूचे दुकान हटवण्यासाठी केवळ ९५ महिलांनी विरोध दर्शवल्याने दारू दुकानाविरुद्ध मतदान घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आवश्यक संख्याबळ दाखविण्यात या भागातील महिला अपयशी ठरल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी व रविवारी लोकमान्य टिळक विद्यालयात ४७२ महिलांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यासाठी सह्यांची पडताळणी केली. पहिल्या दिवशी ८६ व दुसऱ्या दिवशी केवळ ९ अशा एकूण ९५ महिलांच्या सह्यांची पडताळणी झाली. त्यामुळे नियमानुसार दारू दुकान हटवण्यासाठी मतदानाचा प्रस्ताव प्रशासनाला पाठवण्यात येणार नाही, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी दिली.
वैजापूर शहरातील स्टेशन रस्त्यावरील चव्हाण यांच्या मालकीचे अजंठा वाईन शॉप हे फुलेवाडी रोडवरील नागरी वस्तीत स्थलांतरित करण्यात आले आहे. पण, तळीरामांचा त्रास वाढल्याने मोर्चा काढून दुकानाला विरोध केला होता. शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख आनंदी अन्नदाते यांच्या नेतृत्वाखाली तक्रार कर्ज देण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे, आनंदी अन्नदाते यांच्यात बैठक होऊन तक्रारदार महिलांना दारुबंदीच्या नियमांची माहिती देण्यात आली. त्यानुसार तक्रार अर्जावरील ४७२ महिलांच्या सह्यांपैकी ४२४ सह्यांची पडताळणी झाल्यास दारुबंदीच्या मतदानासाठी तहसीलदारांकढशडे प्रस्ताव पाठवण्यात येणार होत. पहिल्या दिवशी केवळ ८२ महिलंच्या सह्यांची पडताळणी केली व दुसऱ्या दिवशी फक्त ९ महिलाच सही पडताळीसाठी आल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे एस. एम. बोदमवाड, दुत्य्यम निरीक्षक राहुल रोकडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

दुकान मालकांचा आक्षेप

मूळ तक्रार अर्जात सह्या असलेल्या व्यतिरिक्त व मतदार यादीत नावे नसलेल्या महिला पडताळणी प्रक्रियेत सह्या करत आहेत. वैशाली छबुराव निकम या महिलेचे नाव मतदार यादीत आहे. परंतु, ती सध्या वैजापूर येथे नसून तिच्या सासरी आहे. तरीसुद्धा अज्ञात महिलेने तिच्या नावासमोर पडताळणी अर्जावर सही केल्याचा आक्षेप दारू दुकानदार पंढरीनाथ दशरथ चव्हाण यांनी सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका तासात घरफोडी; दोन लाखांचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकाच आठवड्यात शहरात दोन मोठ्या घरफोड्या झाल्यानंतर गुरुवारी गारखेडा परिसरात तासाभरात दागिने व रोख, असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित भालचंद्र पोफळे (रा. खिवंसरा विहार, हॉटेल चौरंगीशेजारी, गारखेडा) हे खासगी नोकरी करतात. ते गुरुवारी (१३ जुलै) दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत बाहेर गेले होते. या काळात घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरांनी दाराचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे गंठन, ६२ हजार ५०० रुपयांची सोनसाखळी, ३७ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, ४ हजारांचा चांदीचा छल्ला, दीड हजार रुपयांचे चांदीचे पैंजण, रोख ७ हजार रुपये,असा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा राऊंड टेबल ः कायद्यासह यंत्रणा बळकट करा

$
0
0

‘कट प्रॅक्टिस’ हे वैद्यकीय क्षेत्रातील एक कटू वास्तव असून, त्या विरोधात प्रत्येक डॉक्टरने उभे राहिले पाहिजे आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. ‘कट प्रॅक्टिस’ विरोधातील कायद्याची निर्मिती हे उत्तम पाऊल आहे आणि या कायद्याचा अंकुश वैद्यकीय क्षेत्रावर निश्चितपणे राहील आणि त्यामुळे असे निषेधार्ह प्रकार कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. त्याशिवाय संपूर्ण शासकीय आरोग्य यंत्रणेचेही बळकटीकरण करण्याची वेळ आली असून, सरकारी रुग्णालये, सरकारी विमा व ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’सारखी योजना आणखी गुणवत्तापूर्ण करण्याची गरज आहे. शासकीय, खासगी आरोग्य सेवांचे प्रमाणीकरण व सर्व प्रकारच्या रुग्णसेवांचे शुल्क निर्धारित करणेही अत्यावश्यक असून, त्याशिवाय ‘कट प्रॅक्टिस’ खऱ्या अर्थाने हद्दपार होणे शक्य नाही, असा सूर रविवारी (१६ जुलै) ‘मटा’ कार्यालयात आयोजित ‘राऊंड टेबल’मध्ये शहरातील आघाडीच्या डॉक्टरांमधून उमटला.

डॉक्टर उपलब्ध हवेत समप्रमाणात
मुंबईतील ख्यातनाम डॉ. रमाकांत पांडा यांनी ‘कट प्रॅक्टिस’चा विषय छेडल्यानंतर ‘कट प्रॅक्टिस’विरोधातील कायद्याच्या निर्मितीला वेग आला असला तरी ‘कट प्रॅक्टिस’ ही वर्षानुवर्षांची कुप्रथा वैद्यकीय क्षेत्राच्या खोलपर्यंत रुजली आहे. त्यामुळे ‘कट प्रॅक्टिस’ विरोधातील कायद्याचे स्वागतच केले पाहिजे. या कायद्यामुळे वैद्यकीय क्षेत्रावर निश्चितच अंकुश निर्माण होईल आणि शिक्षेच्या व बदनामीच्या भीतीतून या चुकीच्या प्रथा-परंपरा उल्लेखनीयरित्या कमी होतील. त्याचबरोबर सरकारी आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरणही ‘कट प्रॅक्टिस’ हद्दपार करण्यासाठी तितकेच आवश्यक आहे. सरकारी रुग्णालये, सरकारी विमा तसेच ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’सारख्या आरोग्य योजना अधिकाधिक व्यापक, प्रभावी व गुणवत्तापूर्ण करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबच आज जेथे १० डॉक्टरांची गरज आहे, तिथे १०० डॉक्टर आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली असून, हेदेखील ‘कट प्रॅक्टिस’मागील महत्त्वाचे कारण आहे. त्यासाठीच डॉक्टरांची समप्रमाणातील उपलब्धी आज गरजेची झाली आहे. गाव-तालुका-शहरांनुसार आणि रुग्णालयांच्या खाटांच्या संख्येनुसार रुग्णसेवांचे शुल्क निर्धारित करणे; म्हणजेच प्रत्येक रुग्णालयासाठी ‘रेट लिस्ट’ गरजेची आहे. ज्यामुळे कुठल्याही रुग्णालयात कुठलेही उपचार घेतले तरी विशिष्ट शुल्कांच्या मर्यादेत हे उपचार होऊ शकतील व रुग्णसेवा पारदर्शी होतील. अर्थात, ‘रेट लिस्ट’ ठरवताना तज्ज्ञ डॉक्टर, कायदे क्षेत्रातील तज्ज्ञ व इतर महत्त्वाची मंडळी त्यामध्ये असणे गरजेचे आहे. रुग्णसेवांच्या दर्जाचे प्रमाणिकरण हादेखील महत्वाचा आहे; म्हणजेच ‘एमडी-मेडिसिन’ झालेल्या डॉक्टरकडे उपचार घेतल्यास विशिष्ट पातळीपर्यंतचे उपचार हमखास मिळतील, याची खात्री प्रत्येक नागरिकाला बाळगता येईल व निर्धोकपणे उपचार घेता येतील. याबाबींची अंमलबजावणी ‘कट प्रॅक्टिस’ला हद्दपार करण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील.
- डॉ. अजित भागवत, हृदयरोगतज्ज्ञ

पारदर्शी व्यवहार वाढेल
‘पीसी-पीएनडीटी’ कायदा आल्यानंतर लिंगनिदानाचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे. शिक्षेच्या व बदनामीच्या भीतीमुळे ‘पीसी-पीएनडीटी’चा चांगलाच अंकुश निर्माण झाला आहे. त्यामुळेच ‘कट प्रॅक्टिस’विरोधातील कायदा नक्कीच स्वागतार्ह म्हटला पाहिजे. या कायद्यामुळे अगदी १०० टक्के ‘कट प्रॅक्टिस’ थांबेल, असे नसले, तरी मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येईल व त्याचा फायदा रुग्णांना होईल. या कायद्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पारदर्शी व्यवहार वाढेल. त्याचबरोबर रुग्णसेवा डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक डॉक्टरने ‘कट प्रॅक्टिस’ला दूर ठेवले, तर वैद्यकीय क्षेत्रातून ‘कट प्रॅक्टिस’ हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.
- डॉ. सविता पानट, शहराध्यक्ष, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना

क्षेत्र डागाळलेले नाही
‘कट प्रॅक्टिस’ ही वैद्यकीय क्षेत्रातील वस्तुस्थिती आहे आणि ती मान्य करावी लागते, मात्र ‘कट प्रॅक्टिस’ करणाऱ्यांची संख्या खूप नाही व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र डागाळलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. उलट चांगल्या डॉक्टरांची संख्या ही नेहमीच जास्त होती, आहे व पुढेही राहणार, मात्र त्याचबरोबर सरकारने आरोग्य सेवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. सरकारी आरोग्य सेवांचे बजेट वाढवले पाहिजे आणि ‘राजीव गांधी’सारख्या योजना आणखी प्रभावी केल्या पाहिजे. याकामी सरकारला करण्यासाठी खूप काही आहे आणि यातूनच ‘कट प्रॅक्टिस’सारख्या चुकीचे प्रकार बंद होतील व प्रत्येक डॉक्टरने त्याविरोधात उभे ठाकले पाहिजे.
- डॉ. प्रशांत जाधव, बालरोगतज्ज्ञ

लाजिरवाणे प्रकार बोकाळले
‘कट प्रॅक्टिस’ हा वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय घाणेरडा व लाजिरवाणा धंदा आहे. ज्या रुग्णाचे सकाळी सिटी स्कॅन केले जाते, त्याच रुग्णाचा त्याच रात्री एमआरआय काढला जातो, हा काय प्रकार आहे? ‘एमसीआय’चा माजी अध्यक्ष डॉ. केतन देसाई याच्या घरात दीड क्विंटल सोने व कोट्यवधी रुपये सापडले होते आणि त्याला ‘एमसीआय’वरून दूर केले असले तरी तो आज जागतिक पातळीवरील डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्षपद भूषवतो आहे. यावरून वैद्यकीय क्षेत्रात घाण किती खोलपर्यंत रुजली आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही. आता त्याविरोधात कायदा होऊ घातला असला, तरी जोपर्यंत डॉक्टर स्वतःहून ठरवत नाही तोपर्यंत पळवाटा निघतच राहतील.
- डॉ. रामदास आंबुलगेकर, निवृत्त वैद्यकीय अधिकारी

‘कॅश अंडर टेबल’ घातकच
कट म्हणजेच ‘कॅश अंडर टेबल’ हा प्रकार सर्रास होत असून, तो वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि रुग्णहिताच्या दृष्टीने घातकच म्हटला पाहिजे. त्याविरोधात प्रत्येक डॉक्टरने उभे राहिले पाहिजे आणि कठोर भूमिका घेतली पाहिजे. त्याशिवाय ‘कट प्रॅक्टिस’ देशातून नामशेष होणे नाही.
- डॉ. अमित वांगीकर, नेत्रतज्ज्ञ

‘क्रॉस पॅथी’ला प्रतिबंध हवाच
‘कट प्रॅक्टिस’च्या होऊ घातलेल्या कायद्यामध्ये केवळ अॅलोपॅथीच्या डॉक्टरांचा समावेश पुरेसा नसून, आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर सर्व पॅथींचा समावेश असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय या कायद्याला कुठलाही अर्थ राहणार नाही. या कायद्याबरोबर ‘क्रॉसपॅथी’ला परवानगी नाकारणे व त्या त्या पॅथीनुसारच प्रत्येकाला प्रॅक्टिस करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आज नागरिकांना कुठल्या डॉक्टरकडे कुठल्या उपचारांसाठी जायचे आणि ‘सेकंड ओपिनियन’ कुणाकडे घ्यायचे, याचे आरोग्य शिक्षण देणाऱ्या संस्था किंवा व्यासपीठ उपलब्ध होणे खूप गरजेचे झाले आहे. पुण्यात अशा काही संस्था नक्कीच उदयास आल्या आहेत. त्याप्रमाणे औरंगाबाद व सगळ्या शहरांमध्ये अशा संस्था उदयास आल्या पाहिजेत. याकामी डॉक्टरांनाही पुढाकार घेता येईल. यातून ‘कट प्रॅक्टिस’चे प्रमाण नक्कीच घटेल. अर्थात, ‘कट प्रॅक्टिस’विरोधात प्रत्येक डॉक्टरने प्रतिज्ञा घेतली पाहिजे तरच ‘कट प्रॅक्टिस’ खऱ्याअर्थाने हद्दपार होईल.
- डॉ. आनंद निकाळजे, इन्टेसिव्हिस्ट, फिजिशियन

‘मॅनेजमेंट कोटा’ बंद करा
एका नामांकित संस्थेतून मला चक्क ७ हजार रुपयांचा ‘कट’ आला होता, तो मी साभार परत केला. त्यामुळे ‘कट प्रॅक्टिस’ ही खूप खोलपर्यंत रुजली असल्याचे म्हणावेच लागते. मुळात खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या उदयानंतर ‘कट प्रॅक्टिस’ खूप जास्त प्रमाणात बोकाळली, असे हमखास दिसून येते. कोट्यवधी रुपये मोजून जेव्हा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून विद्यार्थी डॉक्टर होतो, तेव्हा तो त्याकडे गुंतवणूक म्हणूनच पाहतो व त्याच्या वसुलीसाठी ‘कट प्रॅक्टिस’ सुरू होते. त्यामुळे गुणवत्तेनुसारचखासगी महाविद्यालयात प्रवेश, ‘नो मॅनेजमेंट कोटा’ याबाबी खूप महत्वाच्या आहेतच; शिवाय शासकीय महाविद्यालयांची संख्या वाढवणेही तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर ‘आयएमए’ने ‘कट प्रॅक्टिस’विरोधात भूमिका घेणे खूप गरजेचे आहे.
- डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता, घाटी

चुकीच्या प्रथांना आयएमएचा विरोधच
‘कट प्रॅक्टिस’विरोधात कायदा होऊ घातला आहे; पण मग वकिलांविरोधात असा कायदा का नाही केला जात? इतर व्यवसायांमध्येही ‘कट प्रॅक्टिस’ होते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे काही वैद्यकीय शाखांमधील डॉक्टरांनी ‘कट प्रॅक्टिस’ बंद करण्याची शपथ घेतली असली, तरी रुग्णसेवांचे शुल्क किंवा दर्जादेखील काही कमी झालेला नाहीत, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. अर्थात, ‘आयएमए’ने चुकीच्या प्रथांचा नेहमीच विरोध केला आहे व पुढेही करणार आहे, हेही सत्यच आहे. खरे म्हणजे कट प्रॅक्टिस विरोधातील कायदा निर्मिती प्रक्रियेमध्ये आयएमए महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
- डॉ. रमेश रोहिवाल, शहराध्यक्ष, आयएमए

प्रत्यक व्यवसायात ‘कट प्रॅक्टिस’
‘कट प्रॅक्टिस’विरोधात कायदा होऊ घातला असला तरी आणि तो नक्कीच स्वागतार्ह असला तरी केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठीच हा कायदा कशामुळे? इतरही बहुतांश छोट्या-मोठ्या व्यवसायांमध्ये ‘कट प्रॅक्टिस’ चालते, त्याविरुद्ध का नाही होत कायदा? मुळात डॉक्टरांना प्रत्येक वेळी अडचणीत आणले जाते, हेच वास्तव आहे. तरीदेखील ‘कट प्रॅक्टिस’ रोखण्यासाठी डॉक्टरांनी पुढे आले पाहिजे, यात दुमत नाही.
- डॉ. मंजुषा शेरकर, शहराध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना

दर्जात्मक सेवांवर अंकुश हवा
‘कट प्रॅक्टिस’विरोधातील कायदा करण्याची गरज का निर्माण झाली, याचा विचार डॉक्टरांनी केला पाहिजे. या कायद्याविषयी बोलले जात असले तरी वैद्यकीय रुग्णसेवांच्या दर्जाविषयी काही बोलले जात नाही, त्याचे काय? अर्थात, ‘एनएबीएच’सारख्या अॅक्रिडिएशनद्वारे दर्जात्मक रुग्णसेवांसाठी पाऊल टाकले असले, तरी त्याची अंमलबजावणी खूप कमी आहे, मात्र शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील दर्जात्मक सेवांवरही सरकारचा अंकुश हवा. याबाबत सरकारने पाऊल टाकले पाहिजे.
- डॉ. राजीव मोहगावकर, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ

आधी आरोग्याचे बजेट वाढवा
‘कट प्रॅक्टिस’ हा विषय डॉक्टरांपुरताच मर्यादेत नसून, तो सगळ्याच व्यवसाय-उद्योगांमध्ये आहे. डॉक्टरांनाच प्रत्येक वेळी टार्गेट केले जाते. सगळे नियम डॉक्टरांनाच, हे असे कशामुळे? सुप्रिम कोर्टात दोन-दोन, चार-चार लाख रुपये घेणाऱ्या वकिलांवर कोणताच अंकुश नाही. नियम-कायदे फक्त डॉक्टरांनाच. त्या उलट सरकारने आरोग्याच्या बाबतीतील ध्येयधोरणे बदलली पाहिजे. आरोग्य सेवांचे बजेट वाढवले पाहिजे. अजूनही आरोग्याचे बजेट २-३ टक्क्यांच्या पुढे नाही, हे दुर्दैवी म्हटले पाहिजे.
- डॉ. इक्बाल मिन्ने, रेडिओलॉजिस्ट

‘हेल्थ इन्शुरन्स’ आवाक्याबाहेर
आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि लष्करी सेवांप्रमाणे देशामध्ये आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे, मात्र पैसा नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होताना प्रकर्षाने दिसत आहे. ‘हेल्थ इन्शुरन्स’देखील खूप महागडे आहे आणि त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला ‘हेल्थ इन्शुरन्स’ घेणे शक्य होत नाही. त्यातच आज डॉक्टरांची शहरामध्ये फार मोठी गर्दी झाली आहे आणि त्यामुळे स्पर्धा वाढून ‘कट प्रॅक्टिस’ वाढत आहे. विमा आवाक्यात आल्यास आणि दर्जा वाढल्यास ‘कट प्रॅक्टिस’ला आळा बसेल.
- डॉ. विकास रत्नपारखे, फिजिशियन, हृदयरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी ऑनलाइनमध्ये विद्यार्थी, पालकांचे हालचं

$
0
0

अकरावी ऑनलाइनमध्ये विद्यार्थी, पालकांचे हालचं

बेवसाइट गती धीमी, अनेक त्रुटी, दुरुस्ती मुलांचा वेळ चालला वाया

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीनंतर शनिवारपासून दुसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात नव्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधेसह, ज्यांच्या अर्जातील त्रुटी आहेत, त्यांना त्यात दुरुस्ती करता येणार आहे. त्यासाठी सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे तर, शिक्षण विभागाने सुरू केलेले मदत केंद्र कागदावरच असल्याचे चित्र आहे. पहिल्या फेरीत १० हजार ४८० पैकी सहा हजार प्रवेश झाले.
पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीतील गोंधळानंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ देण्यात आली. शुक्रवारपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शनिवारी दुसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. या फेरीत एखाद्या विद्यार्थ्यांने ऑनलाइनमध्ये नोंदणी केली नसेल तर, त्याला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासह अर्ज-२ मधील त्रुटीतील दुरुस्ती, कॉलेज, शाखेचे पर्याय भरण्याची प्रक्रिया १८ जुलैपर्यंत चालणार आहे. कालावधी मोठा असला तरी, वेबसाइट स्लो असल्याने विद्यार्थी, पालकांना त्रुटी दुरुस्त करणे, पर्याय देणे वेळखाऊ ठरत आहे. अर्जातील त्रुटी, प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरी कशी असेल अशा विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी अनेकजण कॉलेजांवरच अवलंबून राहत आहेत. तर, पाच झोन सेंटरवरही विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसत आहेत.
मदत केंद्रही नावापुरते
शिक्षण विभागाने प्रवेशासाठी झोन सेंटर बनविले. त्यासह मदत केंद्रही सुरू करण्यात आले. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी पाच तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी दोन झोन सेंटर सुरू करण्यात आले. पहिल्या फेरीच्याच गोंधळात झोन सेंटरसह मदत केंद्रावरही शिक्षण विभागाचे अधिकारी फारसे फिरकत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी देवगिरी कॉलेजमध्ये शिक्षण विभागाने सुरू केलेले मदत केंद्र ओस पडले होते. शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली
२० ला दुसरी गुणवत्ता यादी
पहिल्या फेरीत १० हजार ४८० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यापैकी ४० टक्के प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील प्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २० जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. ही गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २१, २२, २३ जुलैपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
उच्चमाध्यमिक हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज....१२६
प्रवेश क्षमता............................२४११०
पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी......१०४८०
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या.......५६९२
पहिल्या फेरीत रिक्त...........................४८८८
दुसऱ्या फेरीतील प्रवेश संख्या................१८४१८
काहीवेळ फॉर्म-२ची अडचणी होती, ती दूर झाली. विद्यार्थ्यांना १८ जुलैपर्यंत दुरूस्ती, पर्यायासह नोंदणीची प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आम्हीही विद्यार्थी, पालकांना अडचण आली तर, मार्गदर्शन करत आहोत.
वैजनाथ खांडके,
शिक्षण उपसंचालक,
औरंगाबाद.
पहिल्या फेरीत दिलेला पहिला पर्याय जर मिळाला तर, प्रवेश बंधनकारक हे अनेकांना माहित नव्हते. त्यामुळे काहिसा गोंधळ उडाला. शनिवारी फॉर्म-२ काहीवेळ दिसत नव्हता, तो पूर्ण रिसेट केल्यानंतरच पुन्हा भरावा लागतो. त्यामुळे पालक, विद्यार्थी गाेंधळात होते.
रजनीकांत गरुड,
उपप्राचार्य,
देवगिरी कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घालत पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयातील उपनिरीक्षक अरूण अंकुशराव डोंगरे यांच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कार्यालयीन कामकाज करत होते. त्यावेळी रमेश गजानन काळे (रा. खामगाव, ता. फुलंब्री) तिथे आला. ‘तुम्ही बदमाश आहात,’ असे म्हणत मोठ्याने ओरडत अश्लिल शिविगाळ करू लागला. डोंगरे यांनी साहेब येईपर्यंत शांत बसा, त्यांना सांगा, असे सांगितल्यानंतर काळे याने डोंगरे यांनाच धरण्याचा प्रयत्न केला. मी ड्रायव्हर लाइनचा माणुस आहे, तुला गाडी खाली चिरडून टाकीन, तू बाहेर भेट, तुला भोसकून टाकीन, अशा भाषेत बोलून गोंधळ घातला. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबत झटापट करून कार्यालयाच्या पायऱ्या वरून शिव्या दिल्या, अशी तक्रार आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. अधाने हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हनुमंतखेड्यातील मुलीचा दगडाने ठेचून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद/सिल्लोड
सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील १६ वर्षांच्या शालेय विद्यार्थिनीचा मृतदेह घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावरील २०० फूट खोल दरीत सापडला. पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. तिचा खून कोणी व कशासाठी केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
हनुमंतखेडा येथील स्वातंत्र्यसैनिक सरिचंद राठोड विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी सीमा रामा राठोड (वय १५) हिची आई मजुरीला व वडील शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. त्यामुळे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर सीमाने आईला मदत म्हणून स्वयंपाक करणार होती. तिने भाकरी करण्यासाठी पिठाचा डबा घेतला, पण माठात पाणी नव्हते. गावात तीन-चार दिवसांपासून पाइपलाइनेच काम सुरू असल्याने नळाला पाणी आले नव्हते. त्यामुळे पीठ झाकून ठेऊन ती पाणी आणण्यासाठी गेली. पण, ती परत आली नाही. त्यामुळे तिचे आई-वडील व गावातील मंडळींनी सीमाचा शोध घेतला. पण, रात्री उशिरापर्यंत ती सापडली नसल्याने शनिवारी सकाळी शोध घेतला. बनोटी येथील पोलिस चौकीत सीमाचे चुलते, तंटामुक्त गाव समितीचे सदस्य रसाल राठोड हे फिर्याद देण्यास गेले होते. त्याचवेळी पोलिस शिपाई योगेश झाल्टे यांना घाटनांद्रा घाटात एका मुलीचा मृतदेह पडला असल्याची माहिती देणारा फोन आला. तेथे जाऊन पाहिले असता गावातील नागरिक व नातेवाईकांनी तो सीमाचा मृतदेह असल्याची ओळख पटवली. मीनाला दगडाने ठेचून मारण्यात आले आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचार नाही

दरम्यान पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह शनिवारी रात्रीपासून बनोटी येथे ठाण मांडून बसल्या आहेत. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना देऊन सात पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, या मुलीवर अत्याचार झालेला नाही, अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिले.

घाटी हॉस्पिटलमध्ये तणाव

मारेकऱ्याला पकडेपर्यंत शवविच्छेदनानंतर मृतदेह घेण्यास हनुमंतखेड येथील नागरिकांनी नकार दिल्याने घाटी हॉस्पिटलमध्ये तणाव निर्माण झाला होता. गावकऱ्यांनी शवविच्छेदन विभागासमोर ठिय्या आंदोलन केले. अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी मारेकऱ्यांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. घाटी हॉस्पिटलमधील शवविच्छेदन विभागासमोर रविवारी हनुमंतखेडा येथील गावकरी व नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले. मारेकऱ्यांना पकडण्याच्या मागणीसाठी त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणाव वाढला होता. हा प्रकार सुमारे दोन तास सुरू होता. अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन मृत मुलीच्या वडिलांसोबत चर्चा केली. लवकरात लवकर तपास करून सीमाला न्याय देण्यात येईल, असा शब्द दिल्याने ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावाकडे नेला. यावेळी रविकांत राठोड, दत्ताभाई राठोड, योगीराज राठोड, संदीप राठोड, राहुल राठोड, विजय चव्हाण, सुनील पवार, जे. पी. चव्हाण, संतोष राठोड, योगेश राठोड, किरण राठोड, योगेश राठोड, दिलीप राठोड, भगवान राठोड, शेख फिरोज, विकास जाधव, कृष्णा राठोड, राजपालसिंग राठोड यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकीमध्ये ‘इनक्युबेशन सेंटर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर उद्योजकतेचेही धडे गिरविता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी एखादी कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविणे शक्य असेल, तर त्यांना आवश्यक ती मदत या सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. त्याबाबतचा सामंजस्य सीएमआयए, औरंगाबाद ऑटोक्लस्टर व शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यांच्यात झाला.

शहरातील उद्योजकांनी पुढाकार घेत, या सेंटरची संकल्पना मांडली होती. दोन-तीन वर्षांपासून याबाबतची चर्चा सुरू होती. अखेर याला मूर्त रूप मिळाले आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर या विद्यार्थ्यांना सेंटरच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यात मदत केली जाणार आहे. मराठवाड्यातील उद्योजकांनी त्यात पुढाकार घेतला आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआय), औरंगाबाद ऑटो क्लस्टर आणि शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकिळ, प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सेंटरमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान, उद्योग उभारणीसाठी आवश्यक त्याबाबींची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मराठवाड्यातील सर्व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता येणार आहे. ‘इनक्युबेशन सेंटर’बाबतचा करार शनिवारी झाला. या सेंटरमध्ये मराठवाड्यातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना आपल्या नवनवीन संकल्पना येथे मांडता येणार आहे. त्यांची संकल्पना चांगली असेल, तर उद्योग उभारणीसाठीही मदत केली जाणार आहे, असे शासकीय अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ यांनी सांगितले.

स्वतंत्र इमारत देणार
हे इनक्युबेशन सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असेल. त्यासाठी कॉलेज स्वतंत्र जागाही उपलब्ध करून देणार आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्फॉरर्मेशन टेक्नॉलॉजी, कॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग अशा विविध अभियांत्रिकी शाखांमधील अद्ययावत टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. त्यासह त्यांना आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना येथे मांडता येणार आहे. त्यानंतर उद्योग उभारणीसाठी सेंटरच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images