Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हिमायतबागेत लुबाडणारा कुख्यात गुन्हेगार जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हिमायतबाग परिसरात तरुणाला लुबाडणारा कुख्यात गुन्हेगार शेख वाजीद शेख असद उर्फ बाबा याला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. आंब्याची रोपे खरेदी करण्यासाठी ५ जुलै रोजी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याचा मोबाइल व दीड हजार रुपये लुबाडण्यात आले होते.
रवी हरी निकम (रा. साईनाथ कॉलनी, मयुरपार्क) हे ५ जुलै रोजी हिमायतबागेत आंब्याची रोपे विकत घेण्यासाठी आले होते. यावेळी दोन तरुणांनी त्याला मारहाण करून त्याचा मोबाइल व दीड हजार रुपये असलेले पाकीट हिसकावून पसार झाले होते. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख वाजीद उर्फ बाबा याचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मंगळवारी शोध घेऊन पहाटे शेख वाजीदला अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त परिमंडळ एकचे विनायक ढाकणे, एसीपी गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल रोडे, पोलिस नाईक देवा सूर्यवंशी, पवार, विकास खटके, सानप, पांडे, दळवी यांनी केली.

सराईत गुन्हेगार

संशयित आरोपी शेख वाजीद हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच छावणी, सिटी चौक व क्रांती चौक पोलिस ठाण्यातही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी खासदारांच्या नावे प्रवास; आठ हजारांचा दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
परभणीच्या माजी खासदारांच्या नावावर प्रवास करणे चार प्रवाशांना चांगलेच महागात पडले. या चौघांना परभणी ते मुंबईपर्यंतच्या प्रवासापोटी आठ हजार रुपये दंड भरावा लागला.
परभणी रेल्वे स्टेशनवरून मंगळवारी रात्री देवगिरी एक्स्प्रेस सुटल्यानंतर तिकीट तपासणीसाने तपासणी सुरू केली. या तपासणीत खासदारांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर चार प्रवाशी बसलेले आढळले. त्यांनी माजी खासदार यांच्या नावे तिकीट बुक केले होते. या जागेवर बसलेले प्रवासी माजी खासदारांसारखे दिसत नसल्याने तपासणी कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखपत्र दाखविण्याची विनंती केली. ओळखपत्र दिल्यानंतर काढलेल्या तिकिटावर माजी खासदारांच्या जागी दुसरेच प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर या प्रवाशांनी गोंधळ घालत माजी खासदारांशी संपर्क करून शहनिशा करावी, अशी मागणी केली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यास स्पष्ट नकार देत रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांना पाचारण केले.
माजी खासदारांच्या नावावर प्रवास करून रेल्वे विभागाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर त्यांनी दंड भरण्याबाबत तयारी दाखवली. त्यांच्याकडून आठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मोहीम राबविणार
आगामी काळात अशा आरक्षित जागेवर अन्य प्रवाशी प्रवास करत असल्याबाबत शोध घेण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या नावे इतर प्रवास करत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याबाबत विशेष मोहीम घेतली जाणार आहे, अशी मागणी रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११वी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी आज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना २१ ते २४ जुलै या चार दिवसांत थेट कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.

या प्रवेश प्रक्रियेत १५ ते १८ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना दुरुस्ती, पर्याय व नव्याने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता दुसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या गुणवत्ता यादीत १३ हजार ८८० विद्यार्थ्यांचा समावेश असेल. पहिल्या गुणवत्ता यादीत १० हजार ४८० विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी केवळ ६ हजार ६०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर पहिल्या फेरीत ४ हजार ८८८ जागा रिक्त राहिल्या. त्यानंतर दुरुस्ती, पर्याय व नव्याने नोंदणीच्या झालेल्या प्रक्रियेत दोन हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यात एक हजार विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी केली. या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या गुणवत्ता यादीत समावेश असणार आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना २१ जुलैपासून कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यासाठी २४ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश चार फेरींमध्ये पूर्ण होणार आहे.

तिसरी यादी २५ रोजी
दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेनंतर २५ रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या प्रक्रियेतून १२६ उच्चमाध्यमिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील २४ हजार ११० जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी २० हजार १०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी व निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन सुधार समितीची आज कामगारांशी चर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागपूर, अमरावती येथे एसटी कामगारांची भेट घेतल्यानंतर वेतन सुधार समिती गुरुवारी (२० जुलै) शहरातील कामगारांची भेट घेणार आहेत. सर्व प्रादेशिक कार्यालयांना भेटी व कामगारांसोबत चर्चा केल्यानंतर झाल्यानंतर एसटी महामंडळाकडून २० टक्क्यांपेक्षा जास्त वेतनवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. पण, एसटी कामगार संघटनेच्या सातव्या वेतन आयोगाच्या मागणीचा विचार होण्याची शक्यता दिसत नाही.
विविध राज्यातील सार्वजनिक परिवहन महामंडळांच्या वेतनाचा अभ्यास, मान्यताप्राप्त व इतर कामगार संघटनांकडून मागण्या घेऊन वेतन सुधार करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. समितीने पहिल्या टप्प्यात सर्व संघटनांकडून मागण्यांची निवेदन घेतली आहेत. समितीचे काम सुरू असताना एसटी कामगार संघटना, इंटक आणि इतर संघटनांनी एकत्र येऊन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ आंदोलनासाठी कामगारांचे मतदानही घेतले. पण, सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाकडून उत्तर मिळत नसल्याने अखेर आंदोलनाचा निर्णय जाहीर केला आहे.
या आंदोलनापूर्वी वेतनवाढ जाहीर करण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून केला जात आहे. महामंडळाने यंदा २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ देण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमिवर वेतन सुधार समितीची औरंगाबाद व इतर प्रादेशिक कार्यालयांतील बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत वेतनवाढ व कामाचे स्वरूप याबद्दल बस स्थानकात जाऊन कामगारांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आज आंदोलन

वेतन सुधार समिती गुरुवारी शहरात येत असून मध्यवर्ती बस स्थानकात बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी १२ वाजता एसटी कामगार संघटनेने वाढीव महगाई भत्ता, सातवा वेतन आयोग वेतन करारात लागू करावा या मागणीसाठी राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालय, मध्यवर्ती कार्यशाळा येथे आंदोलनाची घोषणा केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगसाठी नव्याने अर्जाची संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करण्याची संधी तंत्रशिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत (गुरुवार) ऑनलाइन नोंदणी व निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आहे. या विद्यार्थ्यांना थेट तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार अहे. कॉलेजांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया पाच जूनपासून सुरू झाली. ऑनलाइन अर्ज नोंदणी व निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना १७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश फेऱ्यांना सुरुवात झाली. आता दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर नव्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल, असे राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आले. यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली नसलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी गुरुवारपर्यंत संधी देण्यात अाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी नावनोंदणीची प्रक्रिया केली. गुरुवार हा नोंदणी व निश्चितीसाठीचा शेवटचा दिवस असेल. ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रात जाऊन निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर २० जुलै रोजी रात्री आठ वाजता या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. २४ जुलै रोजी जागा वाटपाची यादी जाहीर केली जाणार आहे.

तिसरी फेरी लांबली
नव्याने संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट तिसऱ्या फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. विद्यार्थ्याना नव्याने संधी दिल्याने प्रवेशाची तिसरी फेरी लांबणार आहे. विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री आठ वाजता गुणवत्तायादी पाहता येणार आहे. त्यानंतर २२पर्यंत तिसऱ्या फेरीसाठी अभ्यासक्रम, कॉलेजांचे पर्याय देण्यासाठीची संधी आहे. २४ रोजी जागा वाटपाची यादी जाहीर होईल. २५ ते २८ यादरम्यान सुविधा केंद्रांवर तपासणी; तसेच याच कालावधीत कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.

अंतिम गुणवत्ता क्रमांक
इंजिनीअरिंगची पहिली गुणवत्ता यादी २० जून रोजी जाहीर झाली. विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमांकानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता नव्याने संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना कोणता गुणवत्ता क्रमांक मिळणार, असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतील अंतिम गुणवत्ता क्रमांकानंतरचा क्रमांक दिला जाणार आहे. त्यानंतरच्या क्रमाने या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कॉलेजांना फायदा
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस कमी होतो आहे. यंदा मात्र चित्र बदलले आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थअयांची संख्या दहा हजारांनी वाढली आहे. राज्यातील ४० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नव्याने संधी देण्याचा निर्णय कॉलेजांनासाठी फायद्याचा ठरेल, अशी चर्चा इंजिनीअरिंग वर्तूळात आहे.

राज्यातील कॉलेज...१६५
प्रवेश क्षमता...........१५५०००
प्रवेश इच्छुक..........११५०००

विभागातील कॉलेड............३३
प्रवेश संख्या......................१२१८२
प्रवेशास इच्छुक विद्यार्थी....१३०४४

विभागात इंजिनीअरिंगासाठी नोंदणी
वर्ष...............ऑनलाइन नोंदणी
२०१५................१०१००
२०१६................११४००
२०१७................१३०४४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार कार्यालयात शेतकऱ्याने घेतले विष

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
सावकाराच्या जाचाला कंटाळून तालुक्यातील विहामांडवा येथील शेतकऱ्याने सहाय्यक निबंधक (सहकार) कार्यालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दिनकर डाके, असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणी सहाय्यक निबंधकांच्या तक्रारीवरून पैठण पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विहामांडवा येथील शेतकरी दिनकर बळीराम डाके यांचे याच गावतील सावकार प्रकाश श्रीपंत आठवे यांच्यासोबत सावकारी प्रकरण सुरू आहे. डाके यांनी आठवे यांच्याविरुद्ध बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी पैठण येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केलेली आहे. त्याची चौकशी सुरू असून दिनकर डाके यांच्या शेतीवर ताबा मिळावा यासाठी सावकार आठवे यांनी पैठण कोर्टात दावा दाखल केला आहे.
डाके यांनी मंगळवारी सहाय्यक निबंधक कार्यालयात येऊन सावकार आठवे यांच्या चौकशीची कागदपत्रे देण्याची मागणी केली. चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याने तो देण्यास सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी नकार दिला.
सावकार आठवे यांच्या बेकायदा सावकारीच्या प्रकरणाची कागदपत्रे कोर्टात दाखल न केल्यास आपण पैठण कोर्टातील खटला गमावू व शेती सावकार ताब्यात जाईल या चिंतेने ग्रासलेल्या डाके यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या डाके यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सहाय्यक निबंधक कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरी दिनकर डाके यांच्या विरोधात सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावकाराच्या घरी झडती
शेतकरी दिनकर डाके यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर विहामांडवा येथील सावकार प्रकाश आठवे यांच्या घरांची पोलिस बंदोबस्तात झडती घेण्यात आली. त्यांच्या घरात बेकायदा सावकारी प्रकारणासंबंधीचे अनेक पुरावे सापडल्याची माहिती सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ला जमीन देण्यास १७६ शेतकऱ्यांची संमती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सुरुवात केली असून, औरंगाबाद, गंगापूर व वैजापूर तालुक्यातील १७६ शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

बेंदेवाडी येथील २०, मुर्शीदकुली ४, कोनेवाडी ७, करंजगाव ७, शेवगा २६, शरणापूर ८, तर गावदरी तांडा येथील २७ शेतकऱ्यांनी आपल्या जमीन देण्यासाठी संमती दर्शवली आहे. संमतीपत्र भरून घेतल्यानंतर सर्च रिपोर्टची प्रक्रिया पूर्ण करून थेट खरेदी व्यवहार पूर्ण केला जाणार आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी समृद्धी महामार्गाविषयी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली त्यानंतर शेतकऱ्यांनी जमीन देण्याची संमती देण्यास सुरुवात झाली.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ६२ गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतून ११२ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी औरंगाबाद तालुक्यातील ३६ गावांतील; तसेच वैजापुरातील १५ आणि गंगापुरातील ११ अशा एकूण ६२ गावांमधील सुमारे चार हजार शेतकऱ्यांकडून १६०० हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरला कैलास बारवालच्या कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोख रक्कम देऊन बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन ४० लाखांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर व आरोपी कैलास रोहिदास बारवाल याच्या पोलिस कोठडीमध्ये शुक्रवारपर्यंत (२१ जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. पटेल यांनी दिले.
या प्रकरणी हसन लुकमान बागवाला यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीने बिल्डर व आरोपी कैलास बारवाल याच्या तिसगाव व वाळूज परिसरात सुरू केलेल्या गृहप्रकल्पात दोन फ्लॅट बुक केले होते व त्यासाठी फिर्यादीने ४० लाखांचे धनादेश आरोपीला दिले होते. दरम्यान, फिर्यादीने खरेदी केलेले फ्लॅट हे आरोपीने इतर ग्राहकांना परस्पर विक्री केल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन आरोपीला बुधवारपर्यंत (१९ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीने वेगवेगळ्या नातेवाईकांच्या २८ मालमत्ता स्वतःच्या नावावर करुन घेतल्या असून, त्या मालमत्ता कुठे-कुठे आहेत, याचा तपास करणे बाकी आहे, तसेच कागदपत्र जप्त करावयाची असल्यामुळे आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजाड सेनानगरला श्रमदानातून हिरवे कोंदण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपला परिसर सुंदर, स्वच्छ व पर्यावरणपूरक असावा, या उद्देशाने नागरिकांनी पुढाकार घेऊन एकत्रित प्रयत्ना केल्यामुळे उजाड परिसर असलेल्या सेनानगरात आजघडीला हिरवळ पसरली आहे. ६००पेक्षा जास्ता मोठ्या वृक्षांमुळे या परिसराच्या सौदर्यात अधिकच भर पडली आहे. यंदाही या भागात ८० रोपांची लागवड करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात सातारा, देवळाई परिसरात अनेक नागरी वस्त्या वाढल्या आहेत. सेनानगर हे त्या पैकी एक. बीड बायबास लगत असलेला हा भाग सुमारे आठ वर्षांपूर्वी उजाड माळरान होते. सुरुवातील एक-दोन रो हाउस येथे उभारण्यात आले. पण, आजघडीला सुमारे एक हजाराहून अधिक रहिवासी एकाप्याने राहतात. उजाड परिसरात हिरवाईने नटला जावा, आपला परिसर सुंदर, स्वच्छ असावा, अशी केवळ अपेक्षा करण्यापेक्षा ते साध्य करण्यासाठी येथील नागरिकांनी पुढाकार घेतला.
त्यासाठी लोकवर्गणी करून रोपांची लागवड करण्यात आली. लावलेले प्रत्येक झाड वाढले पाहिजे, फोटोपुरते लागवड नको, असे म्हणत प्रत्येकांने झाडे दत्तक घेत त्याची जोपासना व संवर्धनाची जबाबदारी घेतली. आंबा, वड, पिंपळ, गुलमोहर, लिंब, बदाम आदी विविध प्रकाराची रोपांची लागवड गेल्या आठ वर्षांत टप्प्या टप्प्याने करण्यात आली. नागरिकांनी संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आजघडीला सुमारे ६००हून अधिक वृक्षाची सावली या परिसरात पडत आहे.

लोकवर्गणीतून देखभाल

रोपांची लागवड, त्याचे जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे व्हावे, यासाठी रहिवासी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी झाड दत्तक योजनाही राबविण्यात आली असून लोकवर्गणी करून झाडांसाठी ट्री गार्डसह अन्य खर्च केला जातो. प्रत्येक घरासमोर किमान दोन तरी झाडे असावीत, असा दंडकच घालण्यात आला आहे. त्याचे सर्वजण आनंदाने पालन करतात. यासाठी किशोर शिताळे, दीपक डावकर, विष्णू शिंदे, सदानंद कुलकर्णी, दत्तात्रय सोनवणे, प्रदीप बुंराडे, उदय बोरसे यांच्यासह सर्व रहिवासी प्रयत्नशील आहेत.

केवळ नावापुरते वृक्षारोपण नको, तर लावलेले प्रत्येक रोप जगले पाहिजे; यासाठी रहिवासी कसोशीने प्रयत्न करतात. त्यामुळेच आजघडीला या रोपांची मोठी वाढ झाली आहे. यंदाही वृक्षारोपण करण्यात आले आहे.
- भाग्यश्री सोनवणे, रहिवासी

सर्वांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच परिसर हिरवागार दिसत आहे. लावलेल्या रोपांची चांगली वाढ झाल्याने, त्याच्या सावली खाली बसण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. ऑक्सिजन पार्क तयार झाले आहे.
- विजया देशमुख, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ लातूरच्या व्यापाऱ्यांना आयुक्तांचा दिलासा

0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
गेल्या काही वर्षांपासून लातूरातील व्यापाऱ्यांचा एलबीटीप्रश्न प्रलंबित राहिला होता. विशेषता यामध्ये १ नोव्हेंबर २०१२ ते ३० नोव्हेंबर २०१३ या १३ महिन्याच्या कालावधीतील एलबीटीचा दराबाबत वाद निर्माण झालेला होता. त्यामुळेच लातुरातील व्यापारी त्रस्त झाले होते. मात्र, या प्रकरणी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलासा दिला असून व्यापाऱ्यांची या १३ महिन्यांच्या दराबाबत असलेली भूमिका मान्य केली.
राज्य सरकारने सर्व महापालिकांना एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केलेला होता. त्यानुसार लातूर मनपाने सुद्धाशहरातील व्यापाऱ्यांसाठी लागू केलली होती. मात्र, मनपाने लागू केलेले दर व्यापाऱ्यांना मान्य नव्हते. त्यामुळे व्यापारी महासंघाने तत्कालीन मनपा आयुक्त रुचेश जैवंशी यांच्यासोबत चर्चा करून दर ठरविण्यात आले होते. सदर दराबाबत मनपा प्रशासनाने शासन दरबारी प्रस्ताव ही पाठविलेला होता. त्यामुळे या १३ महिन्यातील एलबीटी शहरातील व्यापाऱ्यांनी त्याच दराने भरणा केलेला होता. मात्र, यानंतर मनपाने जे दर लागू केले होते. ते शहरातील व्यापाऱ्यांना मान्य नव्हते. त्यामुळे या १३ महिन्याच्या एलबीटीबाबत व्यापारी व मनपा प्रशासनामध्ये तिढा निर्माण झालेला होता. सदर तिढा भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मनिष बंडेवार यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार व पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारापर्यंत पोहचविलेला होता.
याबाबत लातूरचे जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सोबत बुधवारी व्यापारी महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत व्यापारी महासंघाचे सचिव मनिष बंडेवार विशाल अग्रवाल, बसवराज वळसंगे, विनोद गिल्डा, निसार विधांनी, नंदकिशोर अग्रवाल, रामदास भोसले, विश्वनाथ किनीकर, दत्तात्रय पत्रावळे आदिंसह मनपा उपआयुक्ता वसुधा फड सहभागी झाले होते. या बैठकीत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यापाऱ्यांच्या भूमिकेस तात्काळ मान्यता देऊन हा तिढा सोडवत शहरातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर या निर्णयाची माहिती तात्काळ एलबीटी विभागास देण्यात आलेली आहे. तिढा सुटल्याने व्यापाऱ्यांनी तात्काळ एलबीटीचे असिसेमेंट करून घ्यावे, असे आवाहन व्यापार महासंघाच्यावतीने मनिष बंडेवार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शहरातील ४० टक्के व्यापाऱ्यांनी एलबीटी भरलेली नाही. आता पालिका प्रशासनाने मंजूर दराप्रमाणे त्यांच्याकडून वसूल करावी आणि ज्यांनी भरलेली आहे त्यांचे हिशेब करून त्यांना नो ड्यूज द्यावेत. याबाबत व्यापाऱ्यांना विनंती केली आहे.
मनीष बंडेवार, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप व्यापारी आघाडी, लातूर

निवडणुकीत दिलेला शब्द पळाला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि पालकमंत्री निलंगेकर यांनी लातूरच्या व्यापाऱ्यांचा एलबीटीचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली. त्यांचे आम्ही आभार मानतो.
शैलेश लाहोटी, भाजप नेते, लातूर

आता ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटी भरली नाही, त्यांनी मंजूर दराप्रमाणे भरावी. सध्या पालिकेसमोर आर्थिक अडचणी आहेत. कर्मचारी पगार देता येईल.
सुरेश पवार, महापौर, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेलूच्या तहसीलसमोर अंत्यसंस्कार

0
0

परभणी: सेलू तालुक्यातील देवला येथील स्मशानभूमीच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यास जागा मालकाने विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह घेऊन थेट सेलूचे तहसील कार्यालय गाठले. येथे तहसीलदारांना भेटीसाठी विनंती करूनही त्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकरी आणि नातेवाईकांनी ‘त्या’ मृतदेहाला पोलिसांदेखत तहसील कार्यालयासमोर अग्नी दिला.
लोअर-दुधना प्रकल्पात जमिनी गेल्याने देवला या गावाचे सेलूजवळ पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांनी स्मशानभूमीच्या जागेची मागणी लावून धरली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून एक जागा उपलब्ध करून दिली. मात्र, संबधीत जागामालकाने विविध पुरावे सादर करून विभागीय आयुक्तालयाकडून ही जागा स्मशानभुमीसाठी योग्य नसल्याबाबत निकाल आणला. यानंतर गावकऱ्यांनी स्मशानभुमीसाठी जागा मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. याकडे राज्य सरकारनेही दुर्लक्षच केले.
सेलू तालुक्यातील देवला (पुनर्वसन) येथील आश्रोबा दगडोबा पंढेरे (वय ५५ ) यांचा बुधवारी मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी गावकरी नियोजीत स्मशानभूमीकडे गेले होते. मात्र, संबंधीत जागा मालकाने विरोध केला. त्यामुळे बुधवारी (१९ जुलै) येथील गावकऱ्यांनी तहसीलसमोर अंत्यविधी करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. सेलूत नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना हे प्रकरण व्यवस्थित हाताळता आले नाही. मृताच्या नातेवाईकांना दोन शब्दही बोलण्यास ते तयार नसल्याने तहसील कार्यालयासमोरच मृत आश्रोबा पंढेरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार तास मृतदेह तहसील कार्यालय समोर ठेवण्यात आला होते. यामुळे मृतदेहाची अवहेलना झाली असून जबाबदार असल्याने कठोर कारवाईची मागणी नातेवाईक व गावकऱ्यांनी केली.
दरम्यान, संबधीत जमीन मालकाला नगर पालिकेने खोटा अहवाल दिल्याचा आरोप होतोय. या भागात १२०० मीटर अंतरावर स्मशानभूमी आहे. मात्र, ती नसल्याचा अहवाल देणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली. लोअर-दुधना प्रकल्पात जमीन, घर- दार सोडणाऱ्यांना अंत्यविधीसाठीही जागा उपलब्ध करून देवू शकत नाही, याबद्दल नागरिकातून संतप्त व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खरिपाचे संकट टळले

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात वीस जूननंतर पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे खरीप पिके अडचणीत आली होती. सोमवारपासून सलग तीन दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागात पडलेल्या पावसामुळे खरीप पिकावरील संकट दूर झाले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. पेरणी योग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यात शंभर टक्के म्हणजेच साडेसहा लाखाहून अधिक हेकटरवर पेरणी उरकली. मात्र, जून महिन्याच्या वीस तारखेनंतर पावसाने दडी मारली. तीन आठवडे पावसाचा खंड झाल्याने पेरलेले करपू लागले होते. राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रकर यांनी या पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीची पाहणी केली होती.
सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात रुसलेल्या पावसाने पुनरागमन झाले. मंगळवारी दिवसभर पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही. तर बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळ पर्यंतच्या मागील २४ तासांत जिल्ह्यात दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६ मिलीमीटर असताना यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दोनशे मिलीमीटरचा टप्पा ओलंडला आहे. बुधवारी सकाळ पर्यंत २०८ मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या तीस टक्के पाऊस झाला. या पावसाने कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद यासारख्या खरीप पिकांपुढील संकट दूर झाले आहे. साडेसहा लाख हेक्टरवरील पीक तगणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

नांदेडमध्ये पिकांना जीवदान
नांदेड - नांदेड जिल्ह्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली. रविवारपासून नांदेड जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दीर्घ काळ उघडीप दिल्याने शेतीच्या उत्पादन घट होणार असली तरी पावसाअभावी सुकू लागलेल्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. अनेक भागात दुबर पेरणीचे संकट टळले आहे. रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पाऊस गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे.

उस्मानाबादमध्ये हजेरी
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील काही भागात बुधवारी पावसाच्या सरी कोसळल्या या पावसामुळे बळीराजा सुखावला असून गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने पिके सुकू लागली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
लातूरमध्ये रिमझीम
लातूर - लातूर शहर व परिसरात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधून-मधून रिमझीम पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाअभावी सुकू लागलेल्या पिकांना जीवदान लाभले आहे. पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा नागरिकांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेन फॉरेस्ट चॅलेंज’साठी औरंगाबादचे वीर सज्ज

0
0

‘रेन फॉरेस्ट चॅलेंज’साठी औरंगाबादचे वीर सज्ज
सचिन, सुविध गोव्यात मोटर स्पोर्टचा थरार अनुभवणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगातील सर्वात मानल्या जाणाऱ्या रेन फॉरेस्ट चॅलेंज स्पर्धेसाठी औरंगाबादचे दोन तरुण सज्ज झाले आहेत. तीन वर्षांपासून सातत्याने या स्पर्धेत पात्र होण्यासाठीची त्यांची धडपड यंदा सार्थकी लागली आहे. रेन फॉरेस्ट चॅलेंज स्पर्धेत त्यांना स्वप्नवत संधी मिळाली असून हे आव्हान स्विकारण्यासाठी ते शारीरिक, मानसिकदृष्ट्या पूर्णतः फिट आहेत. गोव्यात २४ ते ३० जुलै या कालावधीत ‘रेन फॉरेस्ट चॅलेंज फोर्स मोटर्स गुरखा’ ही ऑफ रोड मोटार स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत औरंगाबादचे सचिन चोरडिया व सुविध अग्रवाल यांची टीम प्रथमच सहभागी होणार आहे.
या स्पर्धेत एमएच २० ऑफ रोडर्स ग्रुपचे सचिन व सुविध हे आपल्या मारुती जिप्सीसह उतरणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून ते जिप्सी या वाहनात बदल करून घेत तब्बल दहा लाख रुपये खर्चून त्यांनी स्पर्धेसाठी गाडी तयार करून घेतली आहे.
‘रेन फॉरेस्ट चॅलेंज’ स्पर्धेत सचिन, सुविधसह प्रत्येक स्पर्धकांना २६ विशेष अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. या स्पर्धेत त्यांच्या शारीरिक, मानसिक कणखरतेसह ड्रायव्हिंग कौशल्यांची कसोटी लागणार आहे. अत्यंत कठीण मार्गातून त्यांना जावे लागणार आहे. यात सर्वात अधिक गुण संपादन करणारी टीम चॅम्पियन ठरणार आहे. या स्पर्धेतील आघाडीवर राहाणाऱ्या ड्रायव्हरला आठ हजार डॉलर आणि मलेशियातील आरएफसी मोटर स्पोर्ट स्पर्धेसाठी प्रवेश मिळणार आहे.
गतवर्षी पुण्यात आलेल्या एका स्पर्धेत सचिन व सुविध यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील अनुभव त्यांना या स्पर्धेत उपयोगी पडणार आहे. ड्रायव्हिंगबरोबरच नेव्हिगेशनचे काम मोलाचे ठरणार आहे. सचिन चोरडिया ड्रायव्हिंग करणार असून नेव्हिगेशनचे जबाबदारी सुविध अग्रवाल पार पाडणार आहे. त्यांच्यासमवेत मधुर देसले, दीपक शेट्टी, अश्विन गुप्ता, मुख्तार खान व सुनील बासरकर यांची टीम असणार आहे.
एमएच २० ऑफ रोडर्स ग्रुपचे बबलू त्रिवेदी, गौरव भारूका, गिरीश पटेल, चैतन्य राजूरकर, अभिजीत कुरेकर, धनंजय फडके, चंदू तनवाणी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन व सुविध हे गोव्याकडे २० जुलैला रवाना झाले आहेत.

रेन फॉरेस्ट चॅलेंज स्पर्धा अतिशय आव्हानात्मक आहे. प्रत्येक दिवशी वेगळे आव्हान असते. गाडी चालवणे ही मोठी कसरत आहेच. यात नेव्हिगेशनचे काम महत्त्वाचे आहे. सलग तीन वर्षांच्या प्रयत्नानंतर या स्पर्धेत संधी मिळाली आहे. चॅम्पियन होण्यासाठीच आम्ही या स्पर्धेत उतरत आहोत.
- सचिन चोरडिया, ड्रायव्हर
या स्पर्धेची तयारी आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून करीत आहोत. भांगसीमाता डोंगर परिसर, दौलताबाद, सातारा परिसरातील कठीण रस्त्यावरून आम्ही सराव केला. ही स्पर्धा अतिशय कठीण मानली जाते. यात नेव्हिगेशनचे काम खडतर असते आणि त्यासाठी मी सज्ज झालो आहे. आता स्पर्धा कधी सुरू होते याचे वेध लागले आहेत.
- सुविध अग्रवाल, नेव्हिगेटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट ई-मेल पाठवून २२ लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुसऱ्याच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून तिसऱ्याच ठिकाणी १०० ‘कॉटन बंडल’चा माल उतरवून तब्बल २१ लाख ९१ हजार ६९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या तमीळनाडूमधील आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (२४ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी दिले.
या प्रकरणी विनित सुरेशकुमार तायल (वय ३५, रा. गुरुसहानीनगर, सिडको एन-चार, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, संशयित आरोपी कैलाश उर्फ कौशल चंद्रकांत शहा (वय ६०, रा. वडवल्ली, ता. कोईमतूर, तमीळनाडू) याने तायल यांना ई-मेलद्वारे राघवेंद्र टेक्सटाईल्ससाठी १०० कॉटन बंडलची मागणी केली. नंतर हा माल राघवेंद्र टेक्सटाईल्सची सहयोगी कंपनी असलेल्या तमीळनाडुतील व्हॅनिला टेक्सटाईल्समध्ये उतरवण्याचे कळविले. तायल यांनी ट्रान्सपोर्टद्वारे माल सांगितलेल्या ठिकाणी पाठवला; परंतु शहा याने तो माल तिसरीकडेच उतरवून २१ लाख ९१ हजार ६९ रुपयांची फसवणूक केली. तायल यांनी राघवेंद्र टेक्सटाईल्सकडे संपर्क केला असता, या मालाची मागणी केली नसल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी बुधवारी तमीळनाडूमध्ये अटक केली.

अनेकांची फसवणूक?

आरोपीला गुरुवारी कोर्टात हजर केले असता, माल कुठे विकला, आरोपीने अशा प्रकारे आणखी कितीजणांची फसवणूक केली आहे. आरोपीच्या बनावट ई-मेलचा तपास करणे बाकी असल्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमसीआय’वर देखरेख समितीची कडक नजर

0
0

औरंगाबाद ः ‘भारतीय आयुर्विज्ञान परिषदे’वर (एमसीआय) कडक नजर ठेवण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर स्थापन झालेली समिती आता आणखी बळकट झाली आहे. पूर्वी तीन सदस्यांची समिती आता आठ सदस्यांची झाली आहे आणि यामध्ये सर्व पाच नवीन सदस्य हे ‘एम्स’ व इतर नामांकित संस्थांतील तज्ज्ञ डॉक्टर आहेत. ‘एमसीआय’च्या प्रत्येक निर्णयाला किंवा केंद्र सरकारला शिफारस करण्यापूर्वी देखरेख समितीची परवानगी लागणार आहे व ‘एमसीआय’चे निर्णय फिरवण्याचे अधिकार समितीला असल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
‘एमसीआय’वर वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर दीड-दोन वर्षांपूर्वी तीन सदस्यांची देखरेख समिती केंद्र सरकारने स्थापन केली होती. मात्र पूर्वीच्या समितीमध्ये केवळ एकच डॉक्टर होता. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने पुन्हा १८ जुलै २०१७ रोजी आदेश दिल्यानंतर या समितीमध्ये पाच सदस्यांची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये एम्स (नवी दिल्ली) येथील बालरोगशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. व्ही. के. पॉल, ‘एम्स’चे (नवी दिल्ली) संचालक डॉ. राजदीप गुलेरिया, चंदीगढ येथील ‘पीजीआयएमईआर’चे संचालक डॉ. जगत राम, बंगळुरू येथील ‘निमहान्स’चे संचालक डॉ. बी. एन. गंगाधरन व ‘एम्स’ (नवी दिल्ली) येथील एन्डोक्रायनॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. निखिल टंडन यांचा नव्याने समावेश झाला आहे. या संदर्भातील शासन आदेश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील अवर सचिव अमित बिस्वास यांनी काढले आहे. त्यामुळे आता समिती आठ सदस्यांची झाली आहे. आता समितीमध्ये आठपैकी सहा सदस्य हे अतितज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अधिकाधिक पारदर्शकता येईल, असाही दावा करण्यात येत आहे.

‘एनएमसी’ कार्यान्वित होईपर्यंत?

‘एमसीआय’वर देखरेख समितीचा अंकुश असणार असून, ‘एमसीआय’ला प्रत्येक निर्णय हा देखरेख समितीच्या परवानगीनेच घ्यावा लागेल. तसेच केंद्र सरकारला ज्या काही शिफारसी सादर करायच्या आहेत, त्यालाही समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे शासन आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. जोपर्यंत केंद्राकडून नवीन यंत्रणा लागू होत नाही, तोपर्यंत समिती कार्यरत राहील, असेही आदेशात म्हटले आहे. अर्थात, संसेदत बिल पास झाल्यानंतर ‘एमसीआय’ची जागा ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) घेणार असल्यामुळे ‘एनएमसी’ कार्यान्वित झाल्यानंतर देखरेख समिती आपोआप बरखास्त होईल, असेही संकेत आहेत.

सर्वाधिकार लोकशाहीला मारक?

‘एमसीआय’च्या निकषांचे पालन न केलेल्या देशातील तब्बल ३२ मेडिकल कॉलेज बंद करण्याचा निर्णय ‘एमसीआय’ने मागच्या वर्षी घेतला होता. मात्र देखरेख समितीने ‘एमसीआय’चा हा निर्णय पूर्णपणे रद्द ठरवत सर्वच्या सर्व ३२ कॉलेज पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. यातील निदान काही कॉलेजांमध्ये पूर्णपणे अनागोंदी होती व निकषांची अंमलबजावणी कमीत कमी असल्यामुळे संबंधित कॉलेज बंद करणेच योग्य होते. तरीदेखील असे कॉलेज सुरू करण्याचा समितीचा निर्णय नक्कीच चुकीचा होता, असेही मत एका एमसीआय निरीक्षकाने व्यक्त केले. तर, लोकशाही हा देशाचा गाभा आहे व ‘एमसीआय’चे बहुतांश सदस्य निवडून येत असल्यामुळे, अशा सदस्यांवर नियुक्त सदस्यांचे पूर्णपणे नियंत्रण चुकीचे वाटते, असेही मत एका एमसीआय सदस्याने नोंदविले. सर्वाधिक सहा सदस्य हे डॉक्टर आहेत, हीच काय ती जमेची बाजू म्हणावी लागेल, असेही मत नोंदविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्टडी अॅब्रॉड’वर उद्या सेमिनार

0
0

औरंगाबाद : परदेशातील शिक्षणाच्या संधी विषयावरील ‘स्टडी अॅब्रॉड’ या सेमिनारचे ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. परदेशातील शिक्षणाच्या संधी, त्यासाठीच्या परीक्षा, शिष्यवृत्ती अशा विविध विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. एमजीएमच्या आइन्स्टाइन सभागृहात सकाळी साडेदहा वाजता सेमिनार सुरू होणार आहे.
‘मटा प्लॅनेट कॅम्पस’तर्फे आयोजित या ‘स्टडी अॅब्रॉड’ सेमिनारमध्ये विश्वश्री कन्सलटन्सीचे संचालक सीए अनिरुद्ध हातवळणे, इडुरुशियाचे संचालक मनोज पत्की, इंग्लीश ट्रेनर सय्यद नसरुद्दीन हैदर मार्गदर्शन करणार आहेत. परदेशातील शिक्षणासाठीच्या आवश्यक असलेल्या टोफेल, जीआरई, यूएन, सॅट, जी-मॅट आदी परीक्षा कोणत्या देशांसाठी घेतल्या जातात. त्याचे वेळापत्रक, अभ्यासक्रम कसा असतो, परदेशातील विद्यापीठे, संस्था, अभ्यासक्रम, परिक्षांचे स्वरूप, तयारी कशी करावी अशा विविध
विषयांवर या सेमिनारमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहिणीच्या ‌स्वप्नपूर्तीसाठी मदतीची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही केवळ जिद्दीच्या बळावर रोहिणी दशरथ जाधवने दहावीचा गड सर केला. तिने आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न बाळगले आहे. उच्च शिक्षणाचे रोहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाची साथ गरजेची आहे.
बिकट परिस्थितीतीशी ‌झुंजत श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी रोहिणीने दहावीच्या परीक्षेत रोहिणीने ९३.२ टक्के गुण प्राप्त केले. शेती हाच जाधव कुटुंबाचा मुख्य आर्थिक आधार. वरुणराजा बरसला तरच हाती मोजका पैसा, अन्यथा शिक्षणासाठी अडथळ्याची शर्यत कायम, अशी काहीशी रोहिणीच्या घरची परिस्थिती. अशा स्थितीत प्रसंगी कर्जबाजारी होऊ, पण मुलांनी शिक्षण घ्यावे, अशी वडिलांची इच्छा. त्यामुळे रोहिणीसह तिच्या बहिणीला वडील दशरथ जाधव यांनी औरंगाबादेत शिक्षणासाठी ठेवले. जाधव यांची औरंगाबाद शहरापासून ३०-‌३५ किलोमीटर अंतरावर धामनगाव (ता. फुलंब्री) येथे डोंगराच्या पायथ्याशी मुरमाड जमीन आहे. पाऊस पडला तरच शेत पिकते आणि हातात चार पैसे उरतात. अशा परिस्थितीत वाढलेली रोहिणी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. त्यामुळे तिला पुढे शिक्षण द्यावे, असे शिक्षकांनी सांगितले. केवळ मुलांच्या शिक्षणासाठी रोहिणीच्या वड‌िलांनी जयभवानी नगर येथे लहानसा प्लॉट घेतला होता. जसजसे पैसे येतील तसे तेथे दहा बाय दहाच्या दोन खोल्या कशाबशा बांधल्या. तेथे राहून रोहिणीने अभ्यास केला व दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. जयभवानगीनगर येथील घरामध्ये बहीण व आजीसोबत रोहिणी राहते. नातीच्या शिक्षणासाठी औरंगाबादेत राहणाऱ्या आजींचेही वय झाले आहे. ‌शैक्षणिक खर्चाला हातभार लागावा म्हणून त्या केटरिंगमध्ये, मेसमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जातात. दर आठ-दहा दिवसांना वडील दशरथ जाधव मुलींना, आईला भेटण्यासाठी औरंगाबाद शहरात येतात व किरकोळ खर्चासाठी मदत करतात. लहानपणीपासून हुशार असलेल्या रोहिणीला शिकवण्यासाठी वडिलही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही, मात्र मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या जमिनीचा तुकडा विकण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली आहे. रोहिणीने आर्किटेक्ट होण्याचे ठरविले आहे. तिच्या या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. समाजाने तिच्या शिक्षणासाठी हातभार लावला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अठराशे विद्यार्थ्यांचे लॉगइन ब्लॉक

0
0

अठराशे विद्यार्थ्यांचे लॉगइन ब्लॉक

विद्यार्थी, पालक संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मिळालेला कॉलेजचा पर्याय नाकारणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अशा पर्याय नाकारणाऱ्या १८०० विद्यार्थ्यांचे लॉगइनच शिक्षण विभागाने ब्लॉक केले आहेत. लॉगइनच ब्लॉक करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात पडले आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. त्यात पहिली फेरी पूर्ण झाली आहे. त्यात पहिल्या फेरीत अनेक तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी, पालकांची गैरसोय झाली. त्यात आता, पहिल्या फेरीत मिळालेल्या कॉलेजचा पर्याय नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॉगइनच शिक्षण विभागाने ब्लॉक केले. ऑप्शन फॉर्म भरताना ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या क्रमांकाच्या कॉलेजचा पर्याय दिला. जागा वाटपात त्यांना ते कॉलेज व शाखा मिळाली, परंतु त्यासाठी प्रवेश घेतला नाही, अशा विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. पहिल्या क्रमांकाचा पर्याय देऊनही प्रवेश का? घेतला नाही अशी विचारणा या विद्यार्थ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच त्यांचे लॉगइनच खुले होत नसल्याने त्यांना दुसऱ्या फेरीत सहभागी होता येत नाही. काही न कळविता लॉगइन ब्लॉक करण्यात आल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. तर, शिक्षण विभागाकडून याबाबत पुरेसी माहिती दिली जात नाही. दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने संतापलेल्या विद्यार्थी, पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठले आहे. तरी, त्यांना योग्य ते उत्तर दिले जात नाही.

१८०० विद्यार्थी

पहिल्या फेरीत जागा वाटपाच्या यादीत १० हजार ४८० विद्यार्थ्यांचा समावेश होता. कॉलेजचा पर्याय व शाखा निवडताना पहिल्या क्रमांकाचे दिलेला पर्याय मिळाल्यानंतरही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शहरात १ हजार ८०० आहे. अशा विद्यार्थ्यांचे लॉगइन ब्लॉक करून ठेवण्यात आले आहेत.

कारणे द्या..

कॉलेज व शाखेचा पर्याय मिळाल्यानंतर ही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता याचे कारण शिक्षण विभागाला द्यायचे आहे. वेबसाईटवर त्यासाठी स्वतंत्र कॉलम देत त्यात ही माहिती भरावयाची आहे. त्यासह विद्यार्थी, पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयातही अर्ज भरून देत आहेत.

चौथ्या फेरीनंतरच संधी

प्रवेश प्रक्रियेत पहिला पर्याय नाकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॉगइन ब्लॉक करण्यात आले. या विद्यार्थ्यांना आता थेट चौथ्या फेरीनंतर संधी दिली जाईल, असे शिक्षण विभागातील सुत्रांनी ‘मटा’ला सांगितले. ऑनलाइन अकरावीसाठीची प्रक्रिया चार फेऱ्यातून होणार आहे. दुसरी फेरी २१ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तीन फेरी पूर्ण होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेक्षकांची दाद माझ्यासाठी महत्त्वाची !

0
0

प्रेक्षकांची दाद माझ्यासाठी महत्त्वाची !
अभिनेता अनिल नगरकर यांच्याशी बातचीत
इंट्रो - ‘उत्तम अभिनयाला प्रेक्षक नेहमीच दाद देतात. त्यामुळे भूमिकेचे पैलू समजून घेऊन अभिनय करण्यावर लक्ष केंद्रित करतो’ असे अभिनेता अनिल नगरकर यांनी सांगितले. ‘ख्वाडा’ चित्रपटातील नगरकर यांची भूमिका विशेष गाजली आहे. शॉर्टफिल्म प्रीमिअरसाठी मंगळवारी शहरात आले असता नगरकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधला.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ चित्रपटातील भूमिकेमुळे अनिल नगरकर नाव सर्वपरिचित झाले. मात्र, त्यापूर्वीचा प्रवास कसा होता ?
माझा अभिनय प्रवास कॉलेज गॅदरींगपासून सुरू झाला. पुण्यातील पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग असायचा. योगेश सोमण यांच्यासोबत रंगभूमीवर भरपूर काम केले. एकांकिका व प्रायोगिक नाटकात काम करीत असताना चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘मनोमिलन’ नाटकाद्वारे पहिली व्यावसायिक संधी मिळाली. प्रवीण तरडे यांच्या भूमिकेची रिप्लेसमेंट होती. ‘बेबी’सारख्या नाटकातून प्रगल्भ अनुभव मिळाला. नाटकानंतर चित्रपट प्रवास सुरू झाला. ‘महिमा खंडोबाचा’, ‘होऊ दे जरासा उशीर’ अशा चित्रपटात भूमिका साकारल्या. मात्र, ‘ख्वाडा’ करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरला.
‘ख्वाडा’तील रांगडा खलनायक विशेष गाजला. या भूमिकेची खास तयारी केली होती का ?
मूळात ‘ख्वाडा’ खूप चांगला लिहिला होता. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची चित्रपटाबाबत संकल्पना स्पष्ट होत्या. त्यामुळे सक्षमपणे भूमिका बांधता आली. आपल्या अवतीभवती वेगवेगळ्या प्रकारचे लोक वावरत असतात. अशा लोकांच्या निरीक्षणातूनच भूमिका रंगवली. खूप अडचणीतून ‘ख्वाडा’ पूर्ण झाला. सशक्त कथा असलेला चित्रपट लवकर पूर्ण करण्याची सर्व कलाकारांना उत्सुकता होती. अस्सल ग्रामीण भाषा ‘ख्वाडा’ चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. लेखकाचा संभ्रम असल्यामुळे अनेक चित्रपटात ग्रामीण भाषा गुळगुळीत असते. राज्यातील विविध भागातील भाषांची सरमिसळ असते. ‘ख्वाडा’त भाषेबाबत हा प्रकार नव्हता. बहुतेक कलाकार नगर भागातील असल्यामुळे सर्वांनीच भाषेचा लहेजा अचूक पकडला. माझे आडनाव नगरकर असले तरी मी पुण्याचा आहे. पण, इतर कलाकारांसोबत काम करताना मलासुद्धा ग्रामीण भाषा खणखणीत बोलता आली. कोणतीही कृत्रिमता नसल्याने चित्रपट सर्वांना भावला.
तुमची भूमिका पाहिल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीला तगडा खलनायक मिळाल्याची चर्चा सुरू झाली...
‘ख्वाडा’तील ‘दादा’ ही राजकीय नेत्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. सुदैवाने, ग्रामीण भागातही चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट सर्वदूर पोहचल्यामुळे प्रेक्षकांचे चांगले अभिप्राय मिळाले. खलनायकाची वेगळी मांडणी करता आली. इंडस्ट्रीतील नामवंत कलाकारांनीही कौतुक केले. मात्र, यशाने हुरळून गेलो नाही. कारण चांगले काम करणे एवढेच ध्येय आहे. उत्तम अभिनयाला प्रेक्षक नेहमीच दाद देतात. त्यामुळे भूमिकेचे पैलू समजून अभिनय करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
मराठी चित्रपटांची सद्यस्थिती कशी वाटते ?
मराठी चित्रपटांची वाटचाल आश्वासक आहे. चित्रपटांचे पीक वाढल्यामुळे दर्जात थोडी घसरण झाली आहे. मात्र, नवीन दिग्दर्शक चांगल्या संहिता पडद्यावर आणत आहेत. विशेष म्हणजे नव्या दिग्दर्शकांनी चित्रपटाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे. मास कम्युनिकेशन शिकलेली पिढी मराठी चित्रपट आशय व तंत्रदृष्ट्या समृद्ध करीत आहे. डिजिटल यंत्रणेमुळे चित्रपटाचे प्रदर्शन सहजसोपे झाले आहे. ग्रामीण भागातसुद्धा एकाचवेळी चित्रपट पोहचत आहे. यश-अपयशाची गोळाबेरीज वेगळी असली तरी वैविध्यपूर्ण प्रयत्नातून मराठी सिनेमा समृद्ध होतोय असे म्हणता येईल. प्रेक्षकांच्या प्रतिसादातही वाढ झाली आहे.
तुमच्या आगामी योजना काय आहेत ?
काही दिवसांपूर्वीच एक शॉर्टफिल्म पूर्ण केली. अर्थात, ही चित्रपटाची पूर्वतयारी होती. लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनय केलेले चार-पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘रांजण’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. शिक्षण क्षेत्रातील बाजारावर आधारीत ‘कॉपी’ चित्रपट, प्रेमकथा असलेला ‘इर्सल’ या वेगळ्या चित्रपटांकडून अपेक्षा आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबित अधिकाऱ्यांची चौकशी; पुन्हा प्रस्ताव ठेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
निलंबित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थगित ठेवण्यात आला. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची १५ दिवसात उत्तरे द्या, त्यांचे समाधान करा, त्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणा, असे आदेश महापौर भगवान घडमोडे यांनी प्रशासनाला दिले.
निलंबित अधिकारी डॉ. डी. पी. कुलकर्णी, सखाराम पानझडे यांच्यासह विद्यमान शहर अभियंता सिकंदर अली यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पालिका प्रशासनातर्फे सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यावर नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर उपायुक्त अय्युब खान यांनी खुलासा केला. या अधिकाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस पूर्वीच बजावण्यात आली होती. त्याचे समाधानकारक उत्तर न आल्यामुळे विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, असे खान यांनी सांगितले. त्यावर भाजपचे राजू शिंदे म्हणाले, त्या अधिकाऱ्यांनी कारणेदाखवा नोटीसला दिलेले उत्तर सर्वसाधारण सभेसमोर ठेवा, ते योग्य की अयोग्य आम्ही ठरवू. शिवसेनेचे राजू वैद्य म्हणाले, हे अधिकारी दोषी असतील तर त्यांना नोकरीतून बडतर्फ करा. पण, तत्कालीन आयुक्तांनी हेतूपुरस्सरपणे कारवाई केली आहे, त्यामुळे सध्याच्या आयुक्तांनी या अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करून दोषी असतील तर कारवाई करावी, असे वैद्य म्हणाले.
यावर आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, नियमानुसार, मला या प्रकरणाची चौकशी करता येत नाही. त्रयस्थ संस्थेकडूनच चौकशी करून घ्यावी लागणार आहे. चौकशीसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता गरजेची असल्याने हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. एमआयएमचे विकास एडके यांनी ‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. गुन्हे दाखल करण्यास विलंब का केला जात आहे, अशी विचारणा त्यांनी केली. यानंतर प्रशासनाला आदेश देताना महापौर भगवान घडमोडे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी संदर्भात नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे १५ दिवसांत द्या, त्यानंतर पुढील सर्वसाधारण सभेत पुन्हा हा विषय आणा, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images