Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालखेडचा ओव्हर फ्लो नारंगीत सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी तलावात पालखेड धरणाच्या ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. शिवना टाकळी कालव्याच्या दहा किलोमीटर अस्तरीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी दिली.
एकनाथ जाधव, मोहन आहेर व पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रविवारी गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे महाजन यांची भेट घेतली. वैजापूर तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी तलावात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाच्या ओव्हर फ्लोचे पाणी सोडल्यास शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असे त्यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावर मंत्री महाजन यांनी मुख्य अभियंता मोरे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून कालव्यात पाणी सोडण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत कंगले, भास्कर आहेर, नबी पटेल, बाबा डमाळे, प्रभाकर गुंजाळ, सोपान तुरकणे, ज्ञानेश्वर आदमाने, प्रवीण सोमवंशी, जगन गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेवर इंगळे, सचिन दाढे, प्रमोद कुहिले, जगन मलिक, शंकर मलिक, रमेश मलिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बिझनेस करण्यासाठी व्हिजन महत्त्वाचे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठा समाजाला बिझनेस जमत नाही, असे म्हणतात मात्र ते खरे नाही. कोणताही बिझनेस करताना व्हिजन असणे आवश्यक आहे. उद्योग, व्यवसायाला सुरुवात करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावेळी कुटुंबाची साथ असने गरजेचे असते. त्याला घरातून साथ द्या,’ असा यशस्वी बिझनेस करण्याचा मंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी उद्योजक संजय वायाळ पाटील यांनी दिला.
मराठा बिझनेस नेटवर्कतर्फे रविवारी आयोजित मराठा उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्‍घाटन एमजीएमचे विश्वस्‍त अंकुशराव कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप सोळंके होते. यावेळी कल्याणराव साळुंके, डॉ. सारंग देवरे, एकनाथराव पावडे, सदाशिवराव जाधव, अमोल कोचाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत. मराठा उद्योजकांची एकमेकांशी ओळख, एकमेकांच्या सहकार्याने व्यवसाय वाढ, नवीन व्यवसायाची उभारणी, ग्राहक-पुरवठादार जोडले जावेत हे उद्देश पूर्ण करण्यासाठी शहरातील अनुभवी उद्योजक व व्यावसायिकांच्या ‘मराठा बिझनेस नेटवर्क’ने मेळाला आयोजित केला होता.
अमेरिकेतील उच्चपदस्थ नोकरी सोडून विदर्भातील तरूण, महिलांना रोजगार उपलब्‍ध करून देणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी सिंदखेडराजा येथे २५ कोटी रुपयांची गुंत‌वणूक करून संजय वायाळ यांनी इश्वेद बायोटेक प्रा. लि. कंपनीची स्थापना केली आहे. लहानपनापासून अमेरिकेला जाण्याची जिद्द बाळगून, सर्व परि‌स्थितींवर मात करून स्वप्न साकार करणारे वायाळ अनुभव व परिस्थिती सांगताना भावुक झाले होते. ‘कोणतीही गोष्ट अशक्य नाही, आयुष्यात अनेक खाचखळगे येतात. त्याला न घाबरता, व्हिजन ठरवले तर सर्व काही शक्य आहे. ‌समाजात बिझनेस कणाऱ्या तरुणाला वेडे म्हणतात, मात्र बिझनेसचे हे वेड अंगी असलेच पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले. उद्‍घाटनानंतर अंकुशराव कदम यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदीप साळुंके यांनी आपल्या भाषणातून सर्वांना अंतर्मुख करायला भाग पाडले. मराठ्यांचा मुख्य व्यवसाय शेती. शेकडो एकर शेती असलेल्यांकडे वाढत्या कुटुंबामुळे वाटणीत गुंठ्यात जमीन येत आहे. ही स्थिती असताना उद्योग, व्यवसायासाठी पुढे येण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येकाने काळानुरूप बदललेच पाहिजे. शेतीला धंदा म्हणून करा, शेतीला पर्याय निर्माण केला पाहिजे. व्यवसायाला प्रतिष्‍ठा देण्याची गरज आहे, असे साळुंके यांनी सांगितले.
यावेळी दुबई येथून कार्यक्रमासाठी आलेले अमोल कोचळे यांनी दुबई येथील व्यावसायिकांचे अनुभव सांगितले. कल्याणराव औताडे म्हणाले की, व्यावसायिकांनी सर्व सामाजास एकत्र घेऊन ग्वाल्हेर-नागपूर-कोल्हापूर असा गोल्डन ट्रायंगल निर्माण करावा. कोणत्याही समाजातील व्यक्तीला काय गरज आहे हे ओळखून तेथे मदतीसाठी पुढे या, व्यवसायात दर्जा राखल्यास जग डोक्यावर घेईल,असा विश्वास औताडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जीएसटीची ओळख या विषयावर सीए बद्रीनाथ खरात यांनी मार्गदर्शन केले. तसेच एमबीएनची ओळख ज्ञानेश्वर सुरासे, रयत ट्रेडिंग विषयीची माहिती राम पवार यांनी दिली.

अॅपचे उद्‍घाटन

यावेळी एमबीएनच्या (मराठा बिझनेस नेटवर्क) अॅपचे अंकुशराव कदम यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. राज्यभरातील उद्योजक, व्यावसायिक, त्यांचे उद्योग, सेवा, उत्पादनांची माहिती या अॅपवर उपलब्‍ध आहे. त्या माध्यमातून बिझनेस शेअरिंग करता येणार आहे. या अॅपची ओळख संदीप खरात यांनी करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
पावसाअभावी तालुक्यात अनेक भागात कपाशीवर मावा व कडधान्यांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणा गवार, चवळीवरही मावा रोग पडला आहे. अन्य पिकांवरही रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यातच पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे पिके माना टाकत आहे. बऱ्याच ठिकाणी कपाशीची पाने लाल पडत आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कपाशी व कडधान्यांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे .पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावले आहेत. कोवळ्या पिकांना उन्हाचा फटका बसत आहे. अनेकदा आकाश काळ्या ढगांनी भरून येते, दिवसभर प्रचंड गरम होते पण पाऊस पडत नाही.

पिकांवर अतोनात खर्च

कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कडधान्य ही पिके सध्या कोवळी व लहान आहेत. अत्यंत महाग बियाणे, खते आणि मजुरीवर खर्च केलेले शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. अनेकांनी ठिबक संच लावले, तर बी बियाणे खरेदीसाठी कर्ज काढले. गेल्या काही काळात तालुक्यातील काही भागात रिमझिम पाऊस झाल्याने पिके तग धरून आहेत. पण, या दोन-चार दिवसांत पाऊस पडला नाही, तर मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. पिकांवरील रोग निवारणासाठी कृषी विभागाने शेतावर सर्वेक्षण करून सल्ला द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या ६४ घरांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी कर्मचाऱ्यांसाठी ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाची अवस्था जीर्ण झाल्याचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून एसटी प्रशासनाने ९६ पैकी ६४ घरांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नोटीस देत १५ दिवसांत घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील नोटीस संबंधितांना नुकत्याच बजावल्या आहेत.
मुंबई येथे ३० वर्षांपूर्वीची इमारत कोसळल्यानंतर एसटी प्रशासनाने जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्यशास्त्र विभागाकडून या इमारतींचे ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील बाजुला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अवस्था वाईट झालेली आहे. येथील स्लॅबच्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. ठिकठिकाणी स्लॅबचे पोपडे पडले आहे. इमारतीचा बराचसा भाग हा जीर्ण झालेला आहे. यामुळे इमारत कधीही कोसळण्याची भीती आहे, असा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटनंतर देण्यात आला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अहवाल मिळाल्यानंतर एसटीच्या बांधकाम विभागाने एसटीच्या ६४ कुटुंबांना १५ दिवसांच्या आत घरे रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी काही दिवसांत उर्वरित ३२ घरांनाही नोटीस देऊन लवकरात लवकर ही घरे रिकामी करण्याबाबत कारवाई केली जाणार असल्याची माहिती एसटी बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता एम. डी. मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांचे गुणवत्तेकडे दुर्लक्ष

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ज्यांनी सत्ता गाजवली, त्यांनी गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले, असा आरोप स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात विविध वक्त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात आगामी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचाच प्रभाव अधिक राहिला.

मेळाव्याचे उद्घाटन आमदार संजय सिरसाठ यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे, विलास पांडे, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. किशोर साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणले गेले त्यामुळे विद्यापीठाची प्रगती झाली नसल्याचे सिरसाठ म्हणाले. शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा वाढवायचा असेल तर राजकारणापासून हे क्षेत्र दूर रहावे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्नांकडे लक्ष द्यावे. संचालक डॉ. माने यांच्यावर सरकारकडून कारवाई होत नसल्यावर ही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दुपारच्या सत्रात डॉ. गजानन सानप, डॉ. अंभोरे, डॉ. भगवानसिंह ढोबाळ यांनीही आपली मते मांडली. डॉ. ढोबळ यांनी शिक्षकांचे प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. डॉ. सानप यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्या कारभारावर टिका केली. सत्ता आपल्याकडे रहावे यासाठी आपल्या जवळच्यांना पदे दिली गेली. त्यातूनच विद्यापीठाची गुणवत्ता ढासळल्याचे ते म्हणाले. तर, संघटनेच्या कामाचा डॉ. आंभोरे यांनी आढावा मांडला.

मेळाव्यावर निवडणुकीचा प्रभाव
शिक्षक, प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत विविध विषयांवर चर्चा होत असताना मेळाव्यावर विद्यापीठाच्या होऊ घातलेल्या अधिसभा निवडणुकीचा प्रभाव असल्याचे स्पष्ट जाणवत होते. वक्त्यांनी आगामी काळात आपले पॅनल विविध अधिकार मंडळासाठी कसे प्रयत्नशिल आहे, याची माडणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथ्या फेरीचे प्रवेश दोन दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेत चौथी फेरी आठ तारखेपर्यंत चालणार आहे. चौथ्‍या फेरीतील जागा वाटपाची यादी जाहीर झाली असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशासाठी सोमवार व मंगळवार हे दोन दिवस मुदत देण्यात आली आहे. या फेरीनंतर रिक्त जागांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. रिक्त जागांसाठी ‘पाचवी फेरी’ घ्यायची की ’‘पॉट अॅडमिशन’ द्यायचे याचा अद्याप निर्णय झालेला नाही.
औरंगाबाद महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, अंतिम व चौथी फेरी मंगळवारपर्यंत चालणार आहे. चौथ्या फेरीसाठीची जागा वाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या फेरीसाठी गुणवत्ता यादीत आठ हजार ४४९ विद्यार्थी आहेत. त्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार कॉलेज मिळाले असेल, तर या विद्यार्थ्यांना सात व आठ ऑगस्ट या दोन दिवसांत प्रत्यक्ष प्रवेश पूर्ण करायचा आहे. अकरावी ऑनलाइन प्रक्रियेला विलंब होत असल्याने अद्याप ५० टक्के जागांवरही प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे उच्चमाध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेजांमध्ये नाराजीचा सूर आहे. अद्याप शहरातील १३ हजार ९९५ जागांवर प्रवेश रिक्त आहेत.

तरीही जागा रिक्त
ऑनलाइन प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व निश्चितीसाठी नऊ जून ते सात जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली. शहरातील १९ हजार ९४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्रवेश क्षमता अधिक असल्याने प्रवेशासाठी अडचणी विद्यार्थ्यांना जाणवल्या नाहीत. प्रक्रियेच्या विलंबामुळे प्रवेशाची टक्केवारी कमी असल्याचे मानले जात आहे. एकूण २४ हजार ११० प्रवेश क्षमतेसाठी १९ हजारच अर्ज आहेत. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांपैकी सर्वांनी प्रवेश घेतले तरी पाच हजार जागा रिक्त राहणार हे स्पष्ट आहे.

‘स्पॉट अॅडमिशन’ की ‘पाचवी फेरी’
चौथी फेरी मंगळवारी संपत आहे. त्यानंतर रिक्त जागांचा आढावा शासनस्तरावरून घेतला जाणार आहे. त्याबाबतच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाला आलेल्या आहेत. या फेरीनंतर कॉलेज, शाखानिहाय आढावा घेत रिक्त जागांची निश्चित माहिती जाहीर केली जाणार आहे. शासनाकडे पाठविल्यानंतर या जागांवर कसे प्रवेश घ्यायचे याचा निर्णय शासन घेणार आहे.

आतापर्यंत झालेले प्रवेश
कला शाखा....१९३९
वाणिज्य........१७४०
एमसीव्हीसी....६९०
विज्ञान..........५७८३

एकूण प्रवेश संख्या....२४११०
आजपर्यंतचे प्रवेश......१०१५१

चौथ्या फेरीतील अॅलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. चौथी फेरीनंतर रिक्त जागांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. या रिक्त जागांवर प्रवेश कसे द्यायचे, कशा पद्धतीने ती प्रक्रिया असेल याच्या सूचना बुधवार, गुरुवारपर्यंत येतील.
- वैजनाथ खांडके, उपसंचालक, शिक्षण विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसविणाऱ्या भाचीला कोल्हापुरात अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मावशीलाच गंडा घातल्याप्रकरणी डॉक्टर तरुणी व कामावरील चालक यांना रविवारी कोल्हापूर येथे अटक करण्यात आली. दोघांना कोर्टासमोर हजर केले असता, त्यांची नऊ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, सुकेशिनी बापूराव येरमे (२४, रा. वनभुजवाडी, नांदेड) व राजेंद्र बाबुराव माटे (४२, रा. नागराळा, उस्मानाबाद. ह. मु. पुंडलिकनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. वत्सला व डॉ. शिवाजी गुणाले हे सुकेशिनीची मावशी, काका आहेत. राजेंद्र माटे हा त्यांच्याकडे चालक म्हणून कामावर आहे. मावशी वत्सला व काका शिवाजी गुणाले सात वर्षांपासून अमेरिकेत राहतात. त्यांचा सिडको एन-४ येथील बंगला सुकेशिनीकडे रखवालीसाठी दिला होता.

सिडकोकडून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (कम्प्लिशन सर्टीफिकेट) न घेतल्यास कारवाई होऊ शकते, अशी थाप सुकेशिनीने ऑगस्ट २०१६मध्ये वत्सला गुणाले यांना मारली. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वत्सला गुणाले अमेरिकेतून शहरात आल्या. आधीच प्लॅन केल्यानुसार, सुकेशिनी व कारचालक राजेंद्र माटे यांनी वत्सला यांना सिडको कार्यालयात नेले. तेथे त्यांच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन कॅमेऱ्यांसमोर फोटो काढून अंगठ्यांचे ठसे घेतले. इप्सित साध्य झाल्यानंतर सुकेशिनीने मावशी कधी अमेरिकेत परतेल याचीच वाट पाहत होती. वत्सला गुणाले २४ फेब्रुवारी २०१७ रोजी अमिरेकेत गेल्या. त्यानंतर हा गुन्हा घडला.

पालनपोषण करणाऱ्यांनाच फसविले
सुकेशिनीने मूळ गावी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर सुकेशिनी व तिची बहीण गुणालेंकडेच राहत होते. बहिणीचे लग्न झाल्यानंतर वत्सला गुणाले यांच्याकडे सुकेशिनी एकटीच राहात होती. तिच्या सर्व शिक्षणाची व खर्चाची जबाबदारी गुणालेंनी उचलली, पण त्यांना सुकेशिनीनेच मोठा गंडा घातल्याचे उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिसेस औरंगाबाद’ची नोंदणी सुरू

$
0
0


‘मिसेस औरंगाबाद’ची नोंदणी सुरू
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे औरंगाबादमधील महिलांसाठी ‘मटा मिसेस औरंगाबाद’ ही अनोखी स्पर्धा होणार आहे. शहरातील २६ ते ४५ वयोगटातील गृहिणी या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सौंदर्य आणि अदाकारी अर्थात कला अन् बुद्धिमत्तेची कसोटी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यातील कलाकाराला जागं करा आणि सज्ज व्हा ‘मिसेस औरंगाबाद’ बनण्यासाठी. त्यासाठी प्रथम तुमची नोंदणी करा, या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे.
स्पर्धेसाठी ‘मिसेस औरंगाबाद’ किताबासह आठ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. उपविजेती, तृतीय, तौथा व पाचवा क्रमांक अशी पाच पारितोषिके आहेत. याशिवाय बेस्ट ड्रेस, बेस्ट मेकअप, बेस्ट परफॉर्मन्स अशी तीन विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
गेल्या बुधवारी थाटामाटात ‘मटा श्रावणक्वीन’ स्पर्धा पार पडली. मोठ्या संख्येने युवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आपल्या मुलींची स्पर्धा बघण्यासाठी तेवढ्याच मोठ्या संख्येने महिलाही त्यावेळी उपस्थित होत्या. अनेकींकडून मटा युवतींसाठी घेत असलेल्या अनोख्या सौंदर्य स्पर्धेप्रमाणेच महिलांसाठीही अशी स्पर्धा असावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. अनेक जणींचे गृहिणींसाठी सौंदर्यस्पर्धा घ्यावी म्हणून मटा कार्यालयात फोन खणखणले. महिलांचा मोठा उत्साह पाहून ‘मटा’ने ‘मटा श्रावणक्वीन’ पाठोपाठ आता ‘मिसेस औरंगाबाद’ ही स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे.
स्पर्धा २० ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘मिसेस औरंगाबाद’ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय २६ ते ४५ दरम्यान असायला हवे. स्पर्धकाला चार राऊंडची परीक्षा द्यावी लागणार आहे. यात इंट्रोडक्शन राऊंड, रॅम्पवॉक, कोणताही एक कलाप्रकार तीन मिनीटांत सादर करणे व त्यानंतर प्रशोनत्तराचा राऊंड होईल. त्यातून परीक्षक विविध पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड करतील.
स्पर्धेची तारीख - २० ऑगस्ट २०१७
स्पर्धेचा वयोगट - २६ ते ४५
असे आहेत पुरस्कार
प्रथम - ‘मिसेस औरंगाबाद’
द्वितीय - ‘मिसेस औरंगाबाद’ उपविजेती
तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक - तीन पुरस्कार
विशेष पुरस्कार
बेस्ट ड्रेस
बेस्ट मेकअप
बेस्ट परफॉर्मन्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निसर्ग पर्यटनासाठी गौताळ्यात गर्दी

$
0
0

निसर्ग पर्यटनासाठी गौताळ्यात गर्दी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समाधानकारक झालेल्या पावसामुळे गौताळा अभयारण्य हिरवेगार झाले आहे. येथील निसर्गाचा सुखद अनुभव घेण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या या अभयारण्यात बिबट्या, काळवीट, नीलगाय, सायाळ असे प्राणी प्रामुख्याने आढळतात तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदा येथे आहे. पाटणदेवी, केदारकुंड धबधबा सह वन्यजीव हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी येथे अधिक गर्दी होत असल्याचे सहायक वन संरक्षक पी. व्ही. जगत यांनी सांगितले. वाद्य वाजूनये, पर्यटन झोन वगळता अन्य क्षेत्रात फिरण्यास मनाई असून नियमांचेपालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.दरम्यान, पर्यटकांना स्थानिक ग्राम विकास समितीमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्पोरेटमधील कंपन्यांचा ‘डीएनए’ वेगळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कार्पोरेट वर्ल्डमधील विविध कंपन्यांचा ‘डीएनए’ वेगवेगळा असतो. तेथील कामाचे स्वरूप, त्याचे स्वप्न, आराखडा, तेथील वातावरण हे वेगवेगळे असते. याचा आनंद कसा घ्यायचा आणि आपलेच काम आपण कसे चोख बजावायचे, हे शिकता आले की कार्पोरेट क्षेत्रात टिकता येते, असे प्रतिपादन रिलायन्स ‌इंडस्ट्रीज लिमिटेडचे मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष सुभाष जैन यांनी केले.

सीए इन्स्टिट्यूटच्या विकासा या विद्यार्थ्यांच्या विंगतर्फे आयोजित व्याख्यानात रविवारी जैन यांना ‘कार्पोरेट क्षेत्रातील करिअर’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर सीए विद्यार्थी संघटनेचे चेअरमन रोहन आचलिया, ऐश्वर्या ब्रह्मेचा, रोहन खंडेलवाल यांची उपस्थिती होती.

जैन म्हणाले, ‘कॉलेजमधील जीवन हे वेगळे असते, कार्पोरेट मध्ये आल्यावर त्यातील काम हळुहळु कळते. इंजिनीअर, एचआर, सीए, अकाउंटंट कोणत्याही क्षेत्राचा उमेदवार असो त्याला मॅनेजमेंट ट्रेनिंग करावेच लागते. या ट्रेनिंगमध्ये खूप काही शिकायला मिळते. आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूमधून माणसे निवडत असतो. रिलायन्स कंपनीत सुमारे ९०० ते १००० विद्यार्थी ‌वेगवेगळ्या कॉलेजमधून निवडले जातात. यात जीवघेणी स्पर्धा असते. करिअर घडणे हे फार साधे सरळ नाहीच. त्यासाठी मेहनत, श्रम, सचोटी आणि कामातील सातत्य ठेवावेच लागते. संस्था काय करते हे फार महत्त्वाचे नसते, आपण संस्थेसाठी काम करत असताना त्याचेच मूल्यमापन केले जाते. कामावरील श्रद्धा आणि सातत्य हीच काम करत असलेल्यांसाठी महत्त्वाचे असते. तीच कंपनीची अॅसेट म्हणून संबोधली जाते. आज मनुष्यबळ विकास होताना प्राइड मॅनेजमेंट ट्र‌ेनिंग महत्त्वाचे मानले जात आहे. संस्थेला आजकाल रिजल्ट हवा असतो, तो रिझल्ट आला नाही, तर कार्पोरेट क्षेत्रात बाहेरचा दरवाजा दाखवला जातो. संस्था तुम्हाला बोलावत नाही, संस्थेला तुम्ही निवडले असते. तेव्हा संस्थेला रिझल्ट द्यावाचा लागतो.’

कार्पोरेट क्षेत्रातील ताण-तणाव, कामाचे स्वरूप हे तुमच्या वर्तवणुकीवर अवलंबून असल्याचेही जैन यांनी सांगितले. यानंतर जैन यांनी कार्पोरेट क्षेत्रातील वागणूक, सकारात्मकता, नकारात्मता, रिझल्ट ओरिएंटेड वर्ल्ड यावषियी माहिती दिली. कार्पोरेट वर्ल्डमध्ये या अनुभव घ्या, आनंदाने जगा हा सल्ला ‌त्यांनी दिला. सुरुवातीला आ‌चलिया यांनी जैन यांचे स्वागत केले. ऐश्वर्या ब्रह्मेचा यांनी परिचय करून दिला. रोहन खंडेलवाल यांनी सूत्रसंचालन केले.

जैन यांनी दिलेल्या टिप्स
- कॉलेजचे शिक्षण आणि कार्पोरेटमधील नोकरी नंतरचे शिक्षण वेगळेच
- कामावर लक्ष देत आपले काम करत राहा
- कॉर्पोरेटमध्ये काम करताना आनंद घ्या
- काम, काळ, वेळ, यांचा योग्य मेळ महत्वाचा
- कोणतीही मोठी कंपनी वाईट किंवा चांगली नाही, त्याचे स्वरूप ओळखता आले पाहिजे
- कार्पोरेट क्षेत्रात तुम्ही तुमचे शिक्षक निवडा, त्यांचे मार्गदर्शन फलदायी ठरते
- डेडलाइन्स पाळणे, गॉसिपिंग टाळणे, फक्त प्रोजेक्टवर लक्ष्य ठेवणे आदींवर लक्ष केंद्रित करा
- कार्पोरेट कल्चर सांभाळून कसे राहता येईल हे शिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तची साइट आता शासनाच ठरवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलयुक्त शिवार अभियानात २०१७-१८ या वर्षी गावे निवडल्यानंतर प्रत्येक गावात आवश्यक ठिकाणीच पाणलोटाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी भूजल सर्व्हेक्षण (जीएसडीए) व जलसंधारण विभाग पाणलोट नकाशा तयार करणार आहे. त्यानुसार ठरवलेल्या ‌ठिकाणीच पाणलोटाची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी उपग्रहामार्फतच्या नकाशांची मदत घेण्यात येणार आहे.
शिवारातील पाणी शिवारात जिरवणे व दुष्काळी प्रदेश सुजलाम सुफलाम करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान आखले आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून त्याचा मराठवाड्यातील अनेक गावांना लाभही झाला आहे. योजनेच्या पुढील टप्प्यात निवडलेल्या गावांत तांत्रिक पारदर्शकता आणण्याचे शासनाने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०१७-१८ या वर्षांसाठी निवड झालेल्या गावांमध्ये पाणलोटाच्या कामाताली संबंधित यंत्रणांची मनमानी थांबणार आहे. यासाठी जलसंधारण तसेच भूजल सर्व्हेक्षण विभाग गावाच्या उपग्रहामार्फतच्या नकाशांवरुन कामांची जागा ठरवणार आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यासाठी गावस्तरीय पाणलोटाचे ट्रिटमेंट मॅप तयार करून ग्रामस्तरावर उपलब्‍ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरीय पथकाचे तीन दिवसांचे प्रशिक्षण, विभागस्तरीय तांत्रिक कार्यशाळेत पथकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नकाशा तसेच शिवार फेरीच्या आधारे गाव आराखडा निश्चित करून त्याला ग्रामसभेत मान्यता द्यावी लागणार आहे. या आराखड्याला तालुका व जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेऊन त्यानंतर अंदाजपत्रक व जिल्हास्तरीय मान्यता, त्यानंतर निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश अशी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

यंदाही मुदत हुकली

जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या सर्व गावांमध्ये ३१ जुलैपूर्वी कामे पूर्ण करून देण्याची मुदत प्रशासनाकडून हुकली आहे. यंदाही मुदत वाढवून घेण्याची नामुष्की यंत्रणांवर येणार आहे. वर्ष २०१६-१७ साठी निवडण्यात आलेल्या १५१८ गावांपैकी जुलैअखेर केवळ ५०५ गावांमध्येच शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १६२, जालना ४०, बीड ८९, परभणी २४, हिंगोली ४८, नांदेड १००, लातूर १६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २६ गावांमध्ये शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींना नव्हे, त्यांच्या विचारधारेला विरोध

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना देशातील सव्वाशे कोटी जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे निवडून दिलेल्या प्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. नरेंद्र मोदी या व्यक्तीला माझा विरोध नसून त्यांच्या विचारधारेला आमचा विरोध आहे, असे प्रतिपादन विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने केले.

बीडमध्ये आयोजित संविधान बचाव व रोहित अॅक्ट परिषदमध्ये केले कन्हैयाकुमारच्या सभेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बीड ही क्रांतिवीरांची भूमी असल्याचे सांगत कन्हैयाकुमार म्हणाला, ‘क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पहिल्यांदा बीडमध्ये कर्जमुक्तीची मागणी केली. आज देशातील महिला, अल्पसंख्याक, विद्यार्थी, शेतकरी, दलित, अल्पसंख्याक अडचणीत आहेत. एका वर्षांत देशात बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुसरीकडे पंतप्रधान पीकविमा योजनेच्या कंपनीला दहा हजार करोड रुपये फायदा होतो. ही विचार करायला लावणारी बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देशातील जनतेला अनेक आश्वासन देऊन सत्तेवर आले. मात्र, सत्तेवर आल्यावर त्यांना समाजातील सर्वसामान्य माणसांचा विचार सोडून दिला. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून फक्त अदानी आणि अंबानी ना या सरकारने अच्छे दिन आणले.’
महाराष्ट्र ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, संत तुकाराम यांची भूमी आहे. परंतु, काही लोक वीर सावरकर यांची भूमी असल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रातील संत तुकाराम, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा भगवा ध्वज आणि रंग सर्वधर्माचा रंग आठवतो. मात्र, मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांचा भगवा रंग रक्त सांडण्याची भाषा करतो. आपली संस्कृती, इतिहास बदलण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. प्रभू राम हे सिंहासन सोडणारे होते रामाचे भक्त म्हणणारे आल्हा के बंदे सुरक्षा का करीत नाहीत असा सवाल करीत आहेत. पण नरेंद्र मोदी हे सत्तेसाठी पत्नीला सोडणारे आहेत. आप मनकी बात करता मात्र दिलकी बात ऐका असा सल्लाही कन्हय्याकुमार यांनी या वेळी दिला.

देशाला वाटण्याचे काम हे धर्मांध लोक करीत आहेत. त्या विरोधात कन्याकुमारीहून निघालेला हा लाँगमार्च सरकार आणि धर्मांध सत्तेविरुद्ध जंग आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी साडेसात हजार कोटी सरकारजवळ आहेत. तरी तीन वर्षात गंगा नदी अधिक अस्वछ झाली असून एवढा पैसे शेतकरी दिन दलितांच्या कल्याणासाठी लावले असते तर शेतकरी आत्महत्या थांबल्या असत्या, असे त्यांनी सांगितले.

संविधानाला हात लावल्यास हात भाजतील
मोदी आणि त्यांचे लोक मनुवादी संस्कृती आणू पाहत आहेत. संविधान तोडण्याची भाषा करीत आहेत. मात्र, बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली. मात्र, संविधानाला हात लावला तर हात भाजतील. आज अनेक जण शिकून बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार द्या अन्यथा रोजगार भत्ता द्या. मोदीजी आपण ‘वन नेशन वन टॅक्स’ आणला आता ‘वन नेशन वन शिक्षा’ व ‘वन नेशन वन हेल्थ’ राबवा, अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसेना, जरा इकडे पण लक्ष द्या’

$
0
0

‘शिवसेना, जरा इकडे पण लक्ष द्या’
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शिवसेना, जरा इकडे पण लक्ष द्या’ असे म्हणत अभिनेता सुमीत राघवनने ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेवर ताशेरे ओढले. ‘एक शून्य तीन’ नाटकाचा प्रयोग शनिवारी रात्री रंगमंदिरात झाला. या प्रयोगावेळी मोडका रंगमंच, घाणेरडे टॉयलेट, नाट्यगृहातील केर-कचरा, मुंग्या-किडे अशा समस्यांचा कलाकारांना सामना करावा लागला. सुमीतने फेसबुकवर हा प्रश्न मांडल्यानंतर प्रेक्षक-कलाकारांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली.
व्यावसायिक प्रयोगानिमित्त औरंगाबाद शहरात आलेल्या राज्यभरातील कलाकारांनी संत एकनाथ रंगमंदिराच्या दूरवस्थेवर जाहीर टीका केल्यानंतरही महापालिका प्रशासनाची बेपर्वाई कायम आहे. संत एकनाथ रंगमंदिराची रौप्य महोत्सवी वर्षात प्रचंड दुरवस्था झाली. तुटलेल्या खुर्च्या, फळ्या मोडलेले रंगमंच, फाटलेले पडदे, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृह, आरसा-खिडक्या तुटलेले मेकअप रूम, सभागृहात पसरलेला कचरा अशा समस्यांनी प्रेक्षक वैतागले आहेत. सुमीत राघवनची मुख्य भूमिका असलेल्या ‘एक शून्य तीन’ या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांची प्रचंड गैरसोय झाली. पैसे मोजून मोडक्या खुर्चीवर का बसायचे असा सवाल प्रेक्षकांनी केला. मात्र, संयोजक उपस्थित नसल्यामुळे प्रेक्षक शांत झाले. सभागृहात प्रचंड कचरा साचलेला असताना प्रयोग सुरू झाला. या दूरवस्थेचे ‘दर्शन’ अभिनेता सुमीत राघवनने ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे घडवले. प्रयोगाच्या एक तास अगोदर सुमीतने लाइव्ह संवाद साधला. ‘फक्त मुंबईत गचाळ नाट्यगृहे आहेत असे वाटत होते. मात्र, तोडीस तोड नाट्यगृह औरंगाबादेतसुद्धा आहेत. शिवसेना जिंदाबाद’ असे सुमीतने म्हटले. ‘अशा थिएटरमध्ये काम करायला धाडस लागते. पालिकेचे अधिकारी हे पाहत असतील तर काही होईल असे वाटते. हे दुर्लक्षित थिएटर आहे’ असे सुमीत म्हणाला. ‘शिवसेना जिंदाबाद’ असे दोन वेळेस म्हणत त्याने अप्रत्यक्षपणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले. गचाळ मेकअप रूममध्ये जाण्याची इच्छा नसल्याचे अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सांगितले. रात्री माणसं मिळत नसल्यामुळे स्वच्छता करणे शक्य नसल्याचे उत्तर अनपेक्षित असल्याचे कलाकारांनी सांगितले. यानंतर औरंगाबाद शहरात मित्र आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी येईल, पण नाट्य प्रयोगासाठी येणार नाही, असे सुमीतने जाहीर केले.
दरम्यान, सुमीतच्या ‘लाइव्ह’वर प्रेक्षक आणि कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
‘मागील अनेक वर्षांपासून नाट्यगृहाची हीच अवस्था आहे. वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला पाहिल्यानंतर जगभरातील पर्यटकांना संत एकनाथ रंगमंदिर हे ‘प्रेक्षणीय’ स्थळसुद्धा दाखवा’ असा सल्ला प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिला. चिन्मयी सुमीत, मंगेश देसाई यांच्यासह अनेक कलाकार आणि रसिकांनी महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस सिलिंडरच्या वाहनाला आग; वाकोद हादरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जळगावहून औरंगाबादकडे गॅस सिलिंडर घेऊन जाणारा भारत पेट्रोलियमटा ट्रक (एम एच ०४ डी डी ५६१७) सोयगाव तालुक्याच्या सिमेवरील वाकोदजवळ शनिवारी मध्यरात्री पेटला. यावेळी ट्रकमधील नऊ सिलिंडरचा स्फोट झाल्याने वाकोदसह तीन किलोमिटरचा परिसर हादरला.
गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर वाकोद येथील ग्रामस्थांनी घरातील वीजसंच बंद करून मोकळे मैदान गाठले. त्यांच्यापैकी अनेकांनी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा परिसरातील वाकोद वाडी, वडगाव, पिंपळगाव, वडाळी, जांभोळ, पहूर, शेंदुर्णी, तोंडापूर, फत्तेपूर या गावांत स्थलांतर केले. ही स्फोटाची मालिका रात्री ११ वाजून १० मिनिटांपासून पहाटे दोन वाजून १० मिनिटांपर्यंत सुरू होती. ट्रकमध्ये भरलेले ३०० सिलिंडर होते व जवळच पेट्रोलपंप असल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी जामनेर, पाचोरा व सिल्लोड येथील नगर पालिकांना माहिती दिली. सुप्रिम कंपनीचे फोन गन पावडर स्प्रेअरचे पथक व जळगाव मनपाच्या अग्निशमन बंबांना पाचारण केले. ही माहिती मिळाल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी हजर झाले. अग्निशमन बंबांनी पेटलेल्या सिलिंडरवर रात्री ११. ५० पासून पहाटे दोन वाजून २० मिनिटांपर्यंत प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नजीर शेख, पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, पोलिस पाटील संतोष देठे, जैन फार्माचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

सतत पाण्याचा मारा

आग विझल्यानंतर तरूण, पोलिस व अग्निशमन जवानांनी सिलिंडर उतरवून त्यावर पाणी मारून थंड केले. पाण्याचे बंब भराण्यासाठी जैन फार्मकडून मदत मिळाली. हे सिलिंडर रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून हलवले. या घटनेचा पंचनामा रविवारी दुपारपर्यंत करण्यात आला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरा जन्मशताब्दी औरंगाबादेतून सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माजी पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कार्यक्रमांची सुरवात औरंगाबादेत १३ ऑगस्टपासून होणार आहे. राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते यानिमित्त उपस्थित राहणार आहेत.
शहानूरमियाँ दर्गा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे रविवारी दुपारी दीड वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह मराठवाड्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पुढील वर्षभर इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोणकोणते कार्यक्रम राबविण्यात येतील, याबाबत माहिती देण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्यासह पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या राज्यातील महत्त्वाच्या उपक्रमाची सुरवात औरंगाबादेतून होणार असल्याने विरोधी पक्षांचेही या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबादमधून राज्यव्यापी कार्यक्रमाची सुरवात होत आहे. त्याची आम्ही जय्यत तयारी केली आहे. जिल्हा व शहरातून कार्यकर्त्यांचे नियोजन केले असून बैठका घेऊन जागृती केली जात आहे. हा कार्यक्रम केवळ काँग्रेसचा नव्हे तर देशासाठी गौरवपूर्ण ठरणार आहे.
- अब्दुल सत्तार, आमदार व जिल्हाध्यक्ष काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिघांची फसवणूक; बिल्डरविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्लॉट देण्याच्या नावाखाली बिल्डरने फसविल्याची तक्रार एका डॉक्टरने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार बिल्डरविरुद्ध तीन जणांना एक कोटी ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; गुरू सहानीनगर भागात राहणारे डॉ. संतोष प्रदीप पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दिली. त्यांनी २३ नोव्हेंबर २०१२ ते ५ ऑगस्ट २०१७ या कालावधीत बिल्डर सुयोग सुरेश रुणवाल, सुरेश रुणवाल आणि मुकुंद व्यंकटेश यांच्याकडे २५ लाख ७१ हजार ८०० रुपये जमा केले. पैसे दिल्यानंतर प्लॉट ताब्यात द्यावा, अशी मागणी संतोष पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांना प्लॉट देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्याचबरोबर बिल्डरने वैभव गंगाधर भगत (रा. मुकुंदवाडी), एकनाथ राजाराम पठारे (रा. एन २ सिडको), शलका सचिन कहांडळ यांच्याकडूनही बिल्डरने ७५ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. या तिघांनाही अद्यापही प्लॉट मिळालेला नाही.
याप्रकरणात संतोष पाटील यांनी, बिल्डरने एक कोटी ७१ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ‘महाराष्ट्र मालकीहक्क सदनिक अधिनियम १९६३’; तसेच फसवणुकीच्या अन्य कलमान्वये सुयोग रुणवाल यांच्यासह अन्य दोघांवर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम फसवणूक, अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करून तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी शेख तसनीम उर्फ नेहा हिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी फेटाळला. यापूर्वी सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने या महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
मुकुंदवाडी येथील अरुणा राजेंद्र रेंगे यांच्याशी ओळख झाल्यानंतर शेख तसनीम आणि तिच्या पतीने रेंगे यांच्याकडे येण-जाणे वाढविले. दरम्यान त्यांनी रेंगे यांचे एटीएम कार्ड चोरून घेतले व त्याचा वापर करून नांदेड आणि नायगाव येथील एटीएम सेंटरमधून रेंगे यांच्या खात्यातून तब्बल ५ लाख ५५ हजार रुपये काढले, अशी फिर्याद रेंगे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. घटनेपासून तसनीम फरार आहे. तिने यापूर्वी सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर तिने पुन्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्याला सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी विरोध केला. तसनीम कडून फसवणुकीची रक्कम जप्त करावयाची आहे. गुन्हा घडल्यापासून ती फरार आहे. आरोपीच्या अटकेशिवाय तपास पूर्ण होवू शकणार नाही. सबब, तिला जामीन मंजूर करु नये, अशी विनंती त्यांनी केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञान, कौशल्याच्या बळावर नाव कमवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय क्षेत्र हे एक ‘नोबेल प्रोफेशन’ असून, ज्ञान, कौशल्याच्या बळावर या पवित्र क्षेत्रात नाव कमवा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘डीनस् अॅड्रेस’मध्ये एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना केले.

घाटीच्या महात्मा गांधी सभागृहामध्ये नुकताच हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी पोलिस उपायुक्त दीपाली घाटगे, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, जनऔषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन डोईबळे, जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रेषाकिरण शेंडे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सईदा अफरोझ, शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव, शरीरविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजन बिंदू आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. येळीकर म्हणाले, ‘येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून असंख्य नामांकित डॉक्टर घडले. आज या महाविद्यालयाचे विद्यार्थी अगदी राजकारणासह अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहे. त्यामुळे प्रगती करण्यासाठी फार मोठी संधी असून, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे.’

डॉ. डोईबळे म्हणाले, ‘आयएएस-आयपीएस यासारख्या आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांमध्येही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे प्रगती करण्यासाठी व उत्तुंग झेप घेण्यासाठी फार मोठी संधी विद्यार्थ्यांना आहे आणि ती विद्यार्थ्यांनी घ्यावी.’

या प्रसंगी रॅगिंग विषयीची माहिती डॉ. सईदा अफरोझ यांनी दिली. डॉ. शिल्पा आसेगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर डॉ. शेंडे यांनी प्रास्ताविक केले.

कॉलेज आहे म्हणून हॉस्पिटल
घाटीची ख्याती फार मोठी असली तरी घाटी म्हटले की रुग्णालय, असेच समीकरण सामान्यांमध्ये रूढ झाले आहे. मुळात घाटी हे सर्वांत आधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि महाविद्यालय आहे म्हणूनच रुग्णालय आहे आणि महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्ण व रुग्णालय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच महाविद्यालयामध्येही अत्याधुनिक सोयी-सुविधा वाढायला पाहिजेत, जेणे करून वैद्यकीय विद्यार्थी आणखी कौशल्य प्राप्त करू शकतील, याकडे डॉ. सुक्रे यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांना शॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ५० कारखान्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. विजेच्या प्रश्नाकडे महावितरण आणि एमआयडीसी कार्यालयाने सपशेल दुर्लक्ष केल्याने उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

या विषयी माहिती देताना ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर’चे (सीएमआयए) माजी अध्यक्ष आशिष गर्दे यांनी सांगितले की, ‘शनिवारी दुपारी दोनपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. रविवारी विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, याविषयी महावितरणच्या सूत्रांनी सांगितले की, दुपारी एक वाजता रेल्वे एमआयडीसी परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही विद्युत खांब वाकले. विद्युततारा तुटल्या. यामुळे तब्बल सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात आला आहे.

औरंगाबाद रेल्वेस्टेशन एमआयडीसी भाग-एक या परिसरात वारंवार अशा घटना होऊ नयेत, यासाठी महावितरण आणि एमआयडीसी विभागाने काळजी घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

कंपन्यांनी घेतली रविवारी सुटी
रेल्वे स्टेशन एमआयडीसीत सुमारे ५० उद्योग आहेत. त्यात ऑटोमोबाइल, इंजिनीअरिंग, पेपर, रसायन यांसह अन्य उद्योग आहेत. एमआयडीसीत सुमारे सात हजार कामगार आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहेत. वीजपुरवठा खंडित असल्याने काही कंपन्यांनी रविवारी सुटी दिली. ही सुटी पुढील आठवड्यात भरून काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यावर दुष्काळी ढग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दमदार सुरवातीनंतर पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीने मराठवाड्यातील शेतकरी धास्तावला असून, विभागावर पुन्हा एकदा दुष्काळाचे ढग दाटू लागले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सहाही दिवशी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नोंद घेण्याएवढाही पाऊस झाला नाही. संपूर्ण पावसाळ्यात विभागात केवळ २६ दिवसच पाऊस झाला असल्याने चिंता वाढत आहे.

एकीकडे कोकण व नाशिक विभागात प्रत्यक्ष पाऊस ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाला असताना दुसरीकडे मराठवाडा व विदर्भामध्ये ही टक्केवारी केवळ ६३ आसपास आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली असून, ‌जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशीची स्थिती येत्या काही दिवस राहिली, तर पुन्हा एकदा विभागाला दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण होत आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार २७ जुलै ते २ ऑगस्ट या आठवड्यामध्ये राज्यातील सर्वच विभागांना पावसाने हुलकावणी दिली. यादरम्यान कोकणात २४७.२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित अाहे, पण प्रत्यक्षात केवळ १२०.८ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात या आठवड्यामध्ये ५५.७ अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४३ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्याची या आठवड्यात अत्यंत बिकट स्थिती होती. विभागात ४९.३ मिमीटर अपेक्षित पाऊस असताना केवळ ३.९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. या कालावधीत मराठवाड्यात तब्बल ९२ टक्के कमी पाऊस झाला. विदर्भाचीही काहीशी अशीची स्थिती आहे. या कालावधीत विदर्भात ७१.६ मिलिमीटर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ १९.७ मिलिमीटर पाऊस झाला.

मराठवाड्यात प्रारंभी मराठवाड्यात दमदार बरसलेल्या वरुणराजाने जून महिन्यात १३ दिवस, जुलै महिन्यात तब्बल २१ दिवस, तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सहाही दिवस पाठ फिरवली. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या ६३.४ टक्के, जालना ६३.८, परभणी ५१.५, हिंगोली ५७.६, नांदेड ५७.६, बीड ७२.२, लातूर ७४.६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ८५.१ टक्के पाऊस झाला आहे.

विभागनिहाय पावसाचे दिवस
विभाग......पावसाचे दिवस
कोकण.........६५
नाशिक.........४३
पुणे..............४३
औरंगाबाद....२६
अमरावती.....३४
नागपूर.........३५
(पावसाचे दिवस एक जून ते सहा ऑगस्टदरम्यान)

मराठवाड्यात खरीप पेरणीची स्थिती
जिल्हा..........टक्केवारी
औरंगाबाद......९५.८०
जालना...........१००.५०
बीड...............१०६.२०
लातूर.............९५.३०
उस्मानाबाद....१०५
नांदेड............९४.२०
परभणी..........७१.६०
हिंगोली..........८७.१०
एकूण............९४.५९ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images