Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ १२४ गावात टँकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद झाली असून, पिण्याच्या पाण्याची टँकरसंख्या १२४वर गेली आहे.

२७ गावातील नागरिकांचा घसा ऐन पावसाळ्यात कोरडा आहे. सध्या पैठण तालुक्यातील २७ गावांना ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून येत्या काही दिवसांमध्ये २० पेक्षा अधिक टँकरला मंजुरी मिळणार आहे. सध्या औरंगाबाद तालुक्यातील २८ गावात २४, फुलंब्रीच्या चार गावात ६, गंगापूर तालुक्यातील ४६ गावात सर्वाधिक ४६, सिल्लोड ९ गावात ११, वैजापूर १० गावात ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३१ हजार ६२३, गंगापूर तालुक्यातील १ लाख ३९ हजार, वैजापूर १० हजार ८४४, कन्नड, तर सिल्लोड तालुक्यातील २५ हजार ११९ असे एकूण दोन लाख ५३ हजार नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पावसाने सरासरीही ओलांडली नाही. फुलंब्री व वैजापूर तालुक्यात तुलनेत चांगला पाऊस असल्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा या तालुक्यांमध्ये टँकरसंख्या कमी आहे.

पाण्यावर ४८ कोटी
यंदा ऐन पावसाळ्यात आजवर केवळ २६ दिवस पाऊस झाल्यामुळे प्रशासनाला पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांनी टंचाई कालावधी तसेच जून महिना अखेरपर्यंतचा खर्च विभागीय प्रशासनाकडे सादर केला असून, या काळात तब्बल ४८ कोटी ९२ लाख खर्च करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात पाण्यासाठी इतर उपाययोजनाही केल्यामुळे मराठवाड्याच्या एकूण खर्चाच्या तुलनेत यातील निम्मा २३ कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च केवळ औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आला. हा खर्च टंचाईच्या कालावधीसह केवळ जून अखेरचा खर्च आहे. पावसाने दडी मारल्यास सप्टेंबर अखेर खर्चाचा आकडा मोठा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात जूनअखेर सर्वाधिक २५ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च टँकरवर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘योगीं’चा भगवा डागाळलेला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘आम्हाला भगव्याबाबत सांगून भीती घातली जाते. संत तुकारामांचा भगवा हा अध्यात्म, शांती, एकात्मता, अहिंसेसाठी होता, तर योगी आदित्यनाथांनी घातलेला भगवा त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी होता. योगी यांच्या भगव्यावर अल्पसंख्याकांवर केलेल्या हल्ल्याचे डाग आहेत,’ अशी घणाघाती टीका विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी सोमवारी केली.

विविध डाव्या, आंबेडकरवादी, लोकशाहीवादी विद्यार्थी संघटनांतर्फे संविधान बचाव युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगदगुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर संयोजन समितीतील अॅड. अभय टाकसाळ, संघपाल भारसाखळे, प्रा. भारत सिरसाट, नीलेश राऊत, प्रा. सतीश पटेकर, सुनील राठोड, नीलेश अंबेवाडीकर यांची उपस्थिती होती.

यावेळी कन्हैया कुमार म्हणाले, ‘लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आकर्षक जाहिराती करत मोदी सत्तेवर आले. तीन वर्षांतच ही आश्वासने फसवी असल्याचे स्पष्ट झाले. देशात शिक्षण, आरोग्य, महागाई, काळा पैसा, बेरोजगारीचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट मुस्लिमांवर हल्ले, दलितांवर अत्याचार करत धर्माधिष्ठीत राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. आपल्या खाण्यावर, कपडे घालण्यावर बंधने आणली जात आहेत. त्यांना हवी ती संस्कृती लादली जात आहे. या अडून संविधानावर, इतिहासावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. हा देश संविधानावर चालतो. मोंदीच्या ताऊंचा नाही. जगभरात फिरणे आणि केवळ भाषणे करणे हा मोदींचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. उलट सामाजिक प्रश्नांवर कोणी बोलले की तो देशद्रोही ठरतो. जुनैद, अखलाक, रोहितची हत्या होते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र लढ्यात कधी सहभाग घेतला नाही ते देशभक्तीबाबत आम्हाला सांगत आहेत. मोदींची अच्छे दिन सोशल मीडिया, माध्यमांमध्येच आहेत. परदेशवारी, सूट बदलणे आणि ‘मन की बात’ यातच मोदी व्यस्त असून ते परिधान मंत्री आहेत. मोदी व्यक्तीवादी आहेत. त्यांचे भक्त ही त्यांना अजय असे संबोधतात. अमित शहा यांचे उत्पन्न तीन वर्षांत तीन वर्षात तीनशे पटींनी वाढली. ‘वन नेशन वन टॅक्स’ बोलले जाते त्यावेळी वन नेशन वन एज्युकेशन, हेल्थ याचा विचार का केला जात नाही,’ असा प्रश्नही कन्हैया यांनी केला.

‘आरएसएस’मध्ये अजून जात कायम
कन्हैया म्हणाले, ‘राष्ट्रीय सेवा संघ २०२२ मध्ये शंभराव्या वर्षात पदापर्ण करत आहे. तोपर्यंत देशाला हिंदू राष्ट्र करण्याची भाषा आहे. त्यामुळे छोट्या जातींवर हल्ले केले जात आहेत. जाती-पातीचे राजकारण करू नका, असे सांगितले जाते. त्याच ‘आरएसएस’मधून जात जावू शकली नाही. ‘आरएसएस’ हा ‌अविवाहितांचा परिवार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात महिलेची नग्न धिंड

$
0
0

बीडः भावाला अनैतिक संबंधांसाठी मदत केल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील वंरगलवाडी येथे गेल्या शुक्रवारी एका २८ वर्षीय महिलेची नग्न धिंड काढण्यात आली. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलीला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

या बाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपींच्या कुटुंबातील एका महिलेशी पाडित महिलेच्या भावाचे अनैतिक संबंध होते. त्यासाठी पीडिता मदत करीत असल्याच्या संशयावरून दोन ऑगस्ट रोजी तिला मारहाण करण्यात आली. संबंधित महिला आणि तिच्या पतीला गावासमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. माफी मागितल्यानंतरच महिलेची सुटका करण्यात आली. त्यानंतर पीडितेचा पती ४ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेला असताना पाच महिला आणि चार पुरुष पुन्हा तिच्या घरी गेले आणि तिला चपलांनी मारहाण करून तिची गावातून विवस्त्रावस्थेत धिंड काढली.

या प्रकरणी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारुती सातळे, बबन सातळे, संजय इंगोले, कुंता इंगोले, लंका सातळे, रेखा इंगोले आणि झुंबर दाताळ अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदीजी, ‘जेएनयू’ जिंकून दाखवा!

$
0
0

औरंगाबाद : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हुकुमशहा आहेत. हिंमत असेल तर त्यांनी फक्त ‘जेएनयू’मध्ये प्रवेश घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून दाखवावी,’ असे खुले आव्हान ‘जेएनयू’चा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी सोमवारी (७ ऑगस्ट) दिले.

तापडिया नाट्यमंदिरात प्रगतिशील लेखक संघ आणि लोकवाङ्मय गृहद्वारे ‘बिहार ते तिहार’ या मराठीमध्ये अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन कन्हैया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर लोकवाङ्मय गृहचे संचालक आणि युगांतरचे संपादक डॉ. भालचंद्र कानगो, अनुवादक सुधाकर शेंडगे आणि साहित्यिक गणेश विसपुते यांची उपस्थिती होती. कन्हैया म्हणाले, ‘जेएनयूबाबत सातत्याने नकारात्मक विचार पसरवण्याचे काम सरकारद्वारे केले जात आहे. मोदी हे हुकुमशाह आहेत, पण हुकुमशाहीचा शेवट आत्महत्येत होतो हे सांगणारा वास्तविक इतिहास विसरून चालणार नाही. मोदीजी स्वत:ला ओबीसी मानतात, तरीही त्यांनी जेएनयूत ओबीसींची फेलोशिप बंद करून मोठी फसवणूक केली. जेएनयूत देशभक्त आणि देशविरोधी वाद नाही, तर हैदराबादमध्ये घडवण्यात आला. याकूब मेमनच्या फाशीनंतर हा वाद देशभर पसरवला. आम्ही याला तात्विक विरोध केला. याकूब मेमनची फाशी असो किंवा मोदींचा विरोध हा तात्विक आणि नैतिक मुद्दयांवर आहे. यासाठी मोदींनी चर्चेला किंवा वादविवादाला समोर यावे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला जबाबदार कोण? ते एक समाजकार्य करणारे लेखक होते, मात्र हे पसरवण्यावच्या ऐवजी ते शिवाजी महाराजांचे विरोधक होते अशी नकारात्मकता पसरवण्यात येते. रोहित वेमुलाप्रकरणी कुलगुरू बदलण्यापर्यंत सरकारने मजल मारली. वेमुलाची आत्महत्या नाही, तो एक खून आहे. या हत्येला जबाबदार कोण, याची चौकशी झाली पाहिजे. निळा सलाम असो, लाल सलाम असो किंवा कुठल्याही झेंड्याशिवाय लढला जाणारा लोकांचा लढा असो. हे सगळे लढे एकत्र येत असल्याचे पाहून मोदींची हुकुमशाही अधिक बळावते. आंदोलन चिरडून टाकले जाते. सध्या जात, धर्म, समाज असे मुद्दे आणले जातात. राष्ट्रप्रेमाचा भावनिक मुद्दा आणला जातो आणि संविधानाला खुंटीवर टांगत मनुस्मृतीला गळ्याशी लावले जाते. एकीकडे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करायची आणि ‘वुई द पीपल्स’ हे संविधानाने म्हटलेले सपशेल टाळायचे. राष्ट्रभक्तीचा कुटील व भावनिक मुद्दा आणायचा हाच या सरकारचा डाव आहे. दलित अत्याचार, शेतकरी आत्महत्यांबाबत आवाज उठवणाऱ्यांना मारून टाकले जाण्याचे प्रकार होत असताना आज सर्वसामान्य नागरिक सुरक्षित कसा काय? म्हणूनच आज पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, वेमुलाच्या हत्येचा तपास लागत नाही,’ असा आरोप कन्हैया यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलाश अंभोरे यांनी केले. स्वागत वीरा राठोड, प्रिया धारूरकर व प्रगतिशील लेखक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले.

मोदींचा ‌हिंदुत्वाचा अजेंडा
‘हिंदुत्व, सिंफ्रोनायझेशनचा अजेंडा असो की खासगीकरणाचा डाव. यावर जेव्हा प्रश्न उठवले गेले, तेव्हा-तेव्हा आम्हाला विरोध झाला. सरसंघचालक मोहन भागवत व इतर लोक एखाद्या दलिताच्या घरी जाऊन जेवणाचे नाटक करतात. कधी दलिताच्या घरून लग्नाची वरात स्वत:च्या घरी आणता का ? असे प्रश्न उठवल्यामुळेच मोदी आमची मुस्कटदाबी करत आहेत,’ असा आरोप कन्हैया यांनी केला.

हिंदूंसाठी काय केले?
‘मोदी हिंदूवादी आहेत, पण त्यांनी हिंदूंसाठी तरी काय काम केले. गोरक्षक गोपालनाविषयीही केवळ राजकारण केले जात आहे. नागपूरच्या संघ कार्यालयावरील भगवा पाहिजे की हिंदूधर्मानुसार आस्था असलेला भगवा पाहिजे हे लोकांनी ठरवावे. हे पुस्तक मी लिहिण्याचे कारण फार वेगळे आहे आणि तेच मी याद्वारे समजावून सांगण्यासाठी आलो आहे,’ असे कन्हैया म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत एकनाथ रंगमंदिरासाठी २० लाख

$
0
0

संत एकनाथ रंगमंदिरासाठी २० लाख
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभिनेता सुमित राघवनने संत एकनाथ रंगमंदिराची दुर्दशा फेसबुक लाइव्हमधून चव्हाट्यावर आणून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची अक्षरशः पिसे काढल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आमदार संजय शिरसाट यांनी रंगमंदिराची सोमवारी पाहणी करून डागडुजीसाठी २० लाख दिल्याची घोषणा केली.

एकनाथ रंग मंदिर औरंगाबाद पश्चिम मतदार संघ या शिरसाटांच्याच मतदार संघात येते. शिरसाट यांनी आज अभिनेता मंगेश देसाईसोबत नाट्यगृहाच्या पाहणी करून अवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांनाही बोलावून घेतले. आयुक्तांनाही तुटलेला खुर्च्या, मोडलेला रंगमंच, मेकअप रूमची अवस्था दाखविली. स्वच्छता गृह, मेकअप रूम, स्टेज, लाइटिंग, साउंड, स्वच्छतागृहाच्या सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्याबाबतही शिरसाटांनी आयुक्तांना ‌सूचना केली. त्यासाठी आमदार निधीतून २० लाख रुपये देण्याची तातडीने घोषणा त्यांनी यावेळी केली. या कामांसाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, उपशहरप्रमुख रमेश बाहुले, नितीन पवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, ‘संत एकनाथ रंगमंदिराचे काम १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल. ते काम होईपर्यंत बंद ठेवण्यात येईल,’ अशी माहिती आयुक्तांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती खंडपीठाच्या ई-स्क्रिनवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्तींच्या नवीन सिटिंगचा पहिलाच दिवस होता. नव्याने न्यायलयीन व्यवस्था सोमवारी कार्यान्वित करण्यात आली.

न्यायमूर्ती, याचिका आणि हॉलनिहाय न्यायलयीन कामकाजाची सद्यस्थिती दर्शविणारा ई-स्क्रिन सकाळी सुरळित सुरू झाला. दुपारी बारानंतर काहीकाळ सर्वोच्च न्यायालयात बढतीवर गेलेल्या न्या. ए. एम. खानविलकर यांचे नाव बोर्डवर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. संगणकीय घोळामुळे काहीकाळ चुकीने उपरोक्त नाव आले होते. काही मिनिटांत यात दुरुस्ती करून एक क्रमांकाच्या कोर्टासमोर शांतनू केमकर व न्या. एन. डब्ल्यू सांबरे यांचे नाव दाखविण्यास सुरुवात झाली.

खंडपीठात नवीन रचना सोमवारपासून कार्यान्वित झाली. खंडपीठात एकूण तेरा हॉल असून, उपरोक्त हॉलमधील न्यायमूर्ती, याचिका क्रमांक संबंधित वकिलांची माहिती स्क्रिनवर येते. हॉल क्रमांक एकवर न्यायालयीन कामकाज सुरू झाले तेव्हा न्या. शांतनू केमकर व न्यायमूर्ती एन. डब्ल्यू सांबरे यांचे नाव होते. साडेबारानंतर अचानक उपरोक्त कोर्टासमोर न्या. ए. एम. खानविलकर व न्या. एस. एस. शिंदे यांचे नाव यायला सुरुवात झाली. क्रमांक एकवर न्या. एस. एस. शिंदे यांचे नाव होते आणि तीन क्रमांकाच्या हॉलवर न्या. एस. एस. शिंदे व न्या. अरुण ढवळे यांचे नाव होते.

एकाचवेळी एकच न्यायमूर्ती दोन कोर्टात कसा यामुळे एकाचवेळी १३ कोर्ट हॉल आणि अनेक ठिकाणी स्क्रिन न्याहाळणाऱ्या वकील आणि पक्षकारांमध्ये एकच खसखस पिकली. परंतु संबंधित घोळ संगणकीय यंत्रणेचा आहे की शिरस्तेदाराचा आहे हे समजण्याच्या आत पाच मिनिटांमध्ये संबंधित दुरुस्ती झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ संचालकांच्या भेटीस गेलेले पाच कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरियांची भेट पाच पदाधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली असून, बकोरियांनी या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले.

महावितरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कनिष्ठ अभियंत्यांच्या बदलीत झालेल्या अन्यायाबाबत भेटण्यासाठी बुधवारी (२ ऑगस्ट) बकोरिया यांच्याकडे गेले. या शिष्टमंडळात सिद्धार्थ पाटील, विश्वनाथ भारती, गौतम पगारे, आशुतोष शिरोळे आणि रूपाली पहुरकर यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने बकोरिया यांची भेट घेऊन त्यांना या बदलीत कशा पद्धतीने काही मोजक्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मनासारखी जागा दिली, याबाबत माहिती दिली. बकोरिया यांनी ही तक्रार ऐकून घेतली. त्यांनी काही प्रश्न या पदाधिकाऱ्यांना विचारले. यात तुम्ही कोणत्या कार्यालयात काम करता, व्यवस्थापकीय संचालकांना भेटण्यापूर्वी तुम्ही कार्यालयीन परवानगी घेतली का, याचा खुलासा करण्याचे आदेश दिले. या पदाधिकाऱ्यांना संध्याकाळपर्यंत खुलासा करण्यास सांगितले, पण पाच तारखेपर्यंत खुलासा आला नाही. त्यामुळे कार्यालयीन प्रमुखांना न विचारता विनापरवानगी कार्यालय सोडल्यामुळे या पाच पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे पत्र संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावाने कार्यालयाला दिले. दरम्यान, ‘कार्यालय प्रमुखांच्या आदेशाशिवाय कार्यालये सोडू नका,’ असे आदेश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी काढले आहेत. संघटनेच्या नावाखाली होणारे प्रकार रोखण्यासाठी हे आदेश काढल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

‘प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालकांनी कामगार चळवळ मोडीत काढण्यासाठी दबाब तंत्राचा वापर सुरू केला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्य मागास विद्युत कर्मचारी संघटनेचे पाच पदाधिकारी निलंबित केले. ही भ्याड, निंदनीय कारवाई प्रथम जातीय भावनेतून प्रेरित होऊन कामगार चळवळ संपवण्यासाठी केली आहे,’ असा आरोप संघटनेचे श्रावण कोळूनकर यांनी केला आहे.

दरम्यान, या कारवाईबाबत ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, ‘नियमाप्रमाणे कार्यालय सोडण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी ‌किंवा कार्यालय प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक आहे. संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या नियमाचे पालन केले नाही. त्यांना खुलासा करण्यासाठी वेळ दिला होता. त्यांनी खुलासा केला नाही. यामुळे ही कारवाई केली’. बकोरियांनी केलेल्या या तडकाफडकी कारवाईमुळे कर्मचारी संघटना आक्रमक झाला आहेत. त्यांनी बकोरियांनी केलेल्या कारवाईचा निषेध करत कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुंबईतील एल्गारासाठी मराठा बांधव झाले रवाना

$
0
0

औरंगाबाद : मुंबईत नऊ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी धडकणाऱ्या भव्य मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्ह्यातील मराठा बांधव सोमवारपासून रवाना होणे सुरू झाले. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातून एक लाख बांधव मुंबईमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे.

शहरात मोटारसायकल फेरीपासून मोर्चाचे वातावरण तयार होण्यास सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात गावोगावी तसेच शहरातील वार्डांमध्ये मोर्चाच्या तयारीसाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वाहनांचेही नियोजन करण्यात आले होते. बहुतांश लोकांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी रेल्वे, एसटीसारख्या वाहनांना अधिकाधिक वापर केला आहे. जिल्ह्यातून सोमवारी मुंबईमध्ये मोर्चाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्थेत मदत करण्यासाठी शहरातून स्वयंसेवकांचे पथक मुंबईला रवाना झाले. तसेच ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकही नियोजनाप्रमाणे सोमवारी मुंबईकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ शेतकऱ्यांमध्ये घालमेल वाढली

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद
सुरुवातीच्या दमदार हजेरीनंतर, मराठवाड्यामध्ये पावसाने दडी मारली आहे. जुलैमध्ये काही दिवसच पाऊस झाला असून, ऑगस्टमध्येही पावसाची हजेरी नगण्यच आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील परिस्थिती बिकट होत आहे. खरिपाची पिके हातातून जाण्याच्या मार्गावर असून, पिण्याच्या पाण्यासाठीही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सरकारने उपाययोजनांना सुरुवात करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

उस्मानाबादमध्ये चिंतेचे वातावरण
गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही उस्मानाबादसह मराठवाड्यात दमदार पाऊस होईल, असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज तूर्ततरी फोल झाला आहे. पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर जुलै महिन्याबरोबरच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी स्वतःची समजूत काढली. जुलै महिन्यात केवळ सात दिवस जिल्ह्यात हलका पाऊस झाला. मे व जूनमध्ये उस्मानाबादेत दमदार बरसलेल्या वरुणराजाने जुलै महिन्यात तब्बल २३ दिवस पाठ फिरवली. ऑगस्टचा पहिला आठवडाही कोरडाच गेला.

ग्रामसभेतही दुष्काळाचा ठराव
जालना : पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपून गेली असून, दुबार पेरणीचाही उपयोग झालेला नाही. त्यामुळे, सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारा ठराव जालना तालुक्यातील कारला येथील ग्रामसभेने केला आहे.
कारल्यातील ग्रामस्थांनी दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले होते. ग्रामपंचायतने या आंदोलनाची दखल घेत दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव पास केला.

महादेवाला दुग्धाभिषेक
मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. जालना तालुक्यातील कारला या गावात गावकर्यांनी व महिलांनी कामेश्वर महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक करून देवाकडे पाऊस पडण्यासाठी साकडे घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनेला जाळले; सासू, सासऱ्यास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मूल-बाळ होत नसल्याच्या रागातून सुनेला छळणाऱ्या आणि किरकोळ वादातून सुनेला पेटवून देत सुनेच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या सासू-सासऱ्याला जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी ठोठावली.
या प्रकरणी प्रमिला संदीप डोंगरे (वय २४, रा. कडेठाण, ता. पैठण, औरंगाबाद) यांनी मृत्युपूर्व जबाब दिला होता. मृत प्रमिला हिच्या जबाबानुसार, प्रमिला यांचे लग्न १३ जून २०१० रोजी संदीप अशोक डोंगरे याच्याशी झाले होते. मात्र प्रमिला हिला मूलबाळ होत नसल्याच्या रागातून सासू जिजाबाई अशोक डोंगरे (वय ४५) आणि सासरा अशोक शंकर डोंगरे (वय ५०) हे छळत होते. दरम्यान, घटनेच्या दोन महिन्यापूर्वी प्रमिला यांचा पती संदीप हा विहिरीच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. २५ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमिला या भाजी निवडत असताना तिथे सासरा अशोक आला आणि तिला म्हणाला, ‘तू येथे राहू नको, निघून जा’. त्यावर प्रमिला म्हणाली, ‘शिविगाळ करू नका’. असे म्हणताच संतप्त सासू जिजाबाईने प्रमिलाच्या अंगावर रॉकेल टाकले आणि ‘काडी लाव’ असे सासरा म्हणताच, सासूने त्यांना पेटवून दिले. यात प्रमिला ९३ टक्के जळाली. आरडाओरड ऐकून शेजारच्यांनी तिला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस उपनिरीक्षक संपत पवार यांनी प्रमिलाचा मृत्युपूर्व जबाब नोंदविला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम ३०७, ४९८ (अ), ५०६, ३४ अन्वये पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपचार सुरू असताना त्यांचा २७ जानेवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्युनंतर आरोपींविरुद्ध कलम ३०२ दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. आरा. लोया यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यातील दोन साक्षीदार फितूर झाले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने सासू व सासऱ्याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

भाऊ-बहिणीची साक्ष महत्त्वाची

या प्रकरणी मृत प्रमिला यांचा भाऊ तसेच बहिणीने कोर्टात दिलेली साक्ष तितकीच महत्त्वाची ठरली. तसेच दोघांची साक्ष व प्रमिला यांच्या मृत्युपूर्व जबाबातील साम्य, याचीदेखील कोर्टाने दखल घेतली. घटनास्थळाचा पंचनामा व घटनास्थळी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, याचीही नोंद कोर्टाने घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणीला वेग; महिलांमध्ये स्पर्धेचीच चर्चा

$
0
0

नोंदणीला वेग; महिलांमध्ये स्पर्धेचीच चर्चा
औरंगाबाद : ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे औरंगाबादमधील महिलांसाठी घेण्यात येत असलेल्या ‘मटा मिसेस औरंगाबाद’ या अनोख्या स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. महिलांकडून होत असलेल्या नोंदणीला वेग आला आहे. शहरातील अनेक महिला मंडळांमध्ये या स्पर्धेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येकजण स्पर्धेत सहभागी होण्याबाबत आणि स्पर्धेसाठीच्या तयारीबाबत चर्चा करीत आहे. नोंदणी करण्यासाठी १५ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे त्यापूर्वीच आपली नोंदणी करून निश्चिंत व्हा.
शहरातील २६ ते ४५ वयोगटातील गृहिणी या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सौंदर्य आणि अदाकारी अर्थात कला अन् बुद्धिमत्तेची कसोटी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यातील कलाकाराला जागं करा आणि सज्ज व्हा ‘मिसेस औरंगाबाद’ बनण्यासाठी. त्यासाठी प्रथम तुमची नोंदणी करा, या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी ‘मिसेस औरंगाबाद’ किताबासह आठ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. उपविजेती, तृतीय, तौथा व पाचवा क्रमांक अशी पाच पारितोषिके आहेत. याशिवाय बेस्ट ड्रेस, बेस्ट मेकअप, बेस्ट परफॉर्मन्स अशी तीन विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
‘मटा’ने ‘मटा श्रावणक्वीन’ पाठोपाठ आता ‘मिसेस औरंगाबाद’ ही स्पर्धा आयोजित केल्याने महिलांमध्ये या उपक्रमांचीच सध्या चर्चा सुरू आहे. स्पर्धा २० ऑगस्ट रोजी होणार आहे. ‘मिसेस औरंगाबाद’ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय २६ ते ४५ दरम्यान असायला हवे. स्पर्धकाला चार राऊंडची परीक्षा द्यावी लागणार आहे. यात इंट्रोडक्शन राऊंड,
रॅम्पवॉक, कोणताही एक कलाप्रकार तीन मिनीटांत सादर करणे व त्यानंतर प्रशोनत्तराचा राऊंड होईल. त्यातून परीक्षक विविध पारितोषिकांसाठी विजेत्यांची निवड करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातल्या मैत्रिणींत सायली रमली

$
0
0

पुण्यातल्या मैत्रिणींत सायली रमली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादची श्रावणक्वीन झाल्यानंतर सायली बाभुळगावकरनं फायनलसाठी पुण्यात ठेवलं तेव्हा मनात धाकधूक होती. तिथे कसं होईल, आलेल्या सर्व फायनलिस्टमध्ये आपण कसं अॅडजेस्ट होऊ... असे बरेच प्रश्न होते. मात्र, पहिल्याच दिवशी एक-दोन नव्हे तब्बल १८ नव्या मैत्रिणी झाल्या. सोबत औरंगाबादहून उपविजेती झालेली अक्षरा चौधरी होतीच. या सर्व २० जणी मिळून आम्ही धमाल करतोय, असं सायलीनं ‘मटाशी बोलताना सांगितलं.
पुण्यातील अंतिम फेरीत औरंगाबादची श्रावणक्वीन म्हणून प्रतिनिधित्व करताना मनात काय भावना आहेत, अशी विचारणा केल्यावर सायली म्हणाली, ‘विजेती म्हणून अंतिम फेरीत दाखल झाल्याचा आनंद आणि अभिमान आहेच. त्यासोबतच माझी जबाबदारीही वाढल्याची जाणीव आहे. आता माझ्या औरंगाबादसाठी काहीतरी करायचं आहे. स्पर्धा मोठी आहे. इथे आलेल्या सगळ्याच सौंदर्यवती आहेत, विजेत्या, उपविजेत्या आहेत, टॅलेंटेड आहेत.’ पुण्यातील स्पर्धकांमध्ये स्वतःला कसं अॅडजेस्ट केलंस, असं विचारातच ती म्हणाली, ‘मी नाही, तर त्यांनीच मला अॅडजेस्ट करून घेतलं. अगदी पहिल्याच दिवशी आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी झालो आहोत. स्पर्धा आहे असं वाटतच नाही. धमाल करतोय आम्ही. ग्रुमींगे सेशनचा खूपच फायदा होतोय. सेलिब्रिटींचे मार्गदर्शन दररोज होत आहे. सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, आदिनाथ कोठारे, भार्गवी चिरमुले, सचिन खेडेकर यांच्यासारखे मोठमोठे अभिनेते, अभिनेत्री दररोज आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत.’
निवडा तुमची ‘वेबक्वीन’
‘श्रावणक्वीन’ स्पर्धेमध्ये दिल्या जाणाऱ्या टायटल्सपैकी एक आहे ‘वेबक्वीन’. हे टायटल तुम्ही निवडायचं आहे. mtshravanqueen.com या वेबसाइटवर जाऊन तुमच्या मनातील स्वर्धकाला व्होट करा. साइटवर गेल्यानंतर स्पर्धकांचे प्रोफाइल दिसतील. प्रोफाइलवर क्लिक केल्यानंतर स्पर्धकाच्या फोटोखाली व्होट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आपलं मत नोंदवायचं आहे. तेव्हा साइटवर जा आणि आपल्या स्पर्धकाला ‘वेबक्वीन’ होण्यासाठी व्होट करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनिष्ठ लिपिकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. धूत हॉस्पिटलजवळील उत्तरानगरी येथे मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. किशोर नारायण पारशर (वय ४५) असे या लिपिकाचे नाव आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पाराशर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पाराशर यांनी सकाळी पत्नीला बहिणीच्या घरी मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी सोडून ऑफिसला जातो असे सांगितले होते, मात्र ऑफिसला न जाता पाराशर घरी परत आले. त्यांचा मुलगा कॉलेजला व मुलगी शाळेत गेली होती. त्यांनी घरी पंख्याला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पाराशर यांच्या पत्नीने दुपारी त्यांना फोन केला, मात्र फोन कॉल उचलला नाही. त्यामुळे त्यांनी पाराशर यांच्या कार्यालयात फोन केला. यावेळी पाराशर आले नसल्याचे सांगण्यात आले. पाराशर यांचा भाचा सागर हा मामाचा शोध घेण्यासाठी घरी गेला. दरवाजा वाजवल्यानंतरही पाराशर यांनी प्रतिसाद दिला नाही. दरवाजा तोडल्यानंतर आत पाराशर यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. सिडको एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पीएसआय कुरेवाड व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
पाराशर गेल्या २४ वर्षांपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत होते. त्यांची शिपाई पदावरून लिपिक पदावर बढती झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून ते कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. वरिष्ठांनी त्यांचे चार महिन्यांचे वेतन रोखून धरले होते. सुटीच्या दिवशी देखील त्यांना पेडिंग कामे असल्याचे सांगून बोलावण्यात येत होते. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. त्यांच्या वरिष्ठांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी न‌कार दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनाच्या झाडाची चोरी; आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खडकेश्वर परिसरातील अंजली कॉम्प्लेक्समधून चंदनाचे झाड तोडून नेणाऱ्या आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुरुवारपर्यंत (१० ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.
या प्रकरणी मदन धोंडीराम कुचे (वय ४६, रा. नारळीबाग) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार आमदार अतुल सावे यांच्या कुटुबाच्या मालकीच्या अंजली कॉम्प्लेक्समध्ये ते वॉचमन आहेत. १७ जुलै २०१७ रोजी पहाटे चारच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती कॉम्प्लेक्समध्ये शिरल्या व त्यांनी कुचे यांच्या गळ्याला सुरा लावला आणि जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच कॉम्प्लेक्समधील चंदनाचे झाड करवतीने तोडून चोरुन नेण्याच्या तयारीत असतानाच आवाजामुळे परिसरातील नागरिक धावून आले. मात्र आरोपींनी तोडलेल्या चंदनाच्या झाडासह धूम ठोकली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी हुसेन खान चाँद खान (वय ४०, रा. आडगाव माऊली, अजमेर मशिदीजवळ, ता. जि. औरंगाबाद) याला सोमवारी अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून चंदन व गुन्ह्यात वापरलेली करवत जप्त करणे बाकी आहे, तसेच आरोपीचे कोणी साथीदार आहेत का आदींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज मीटर रीडिंग एजन्सी रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीज गळती व चोरी कमी करण्यासाठी महावितरण विविध उपाययोजना करत आहे. आता महावितरणने वीज मीटर रीडिंग घेणाऱ्या ४५ एजन्सीच्या कामकाजावर लक्ष केंद्रीत केले आहे. तक्रार निवारण दिनी रीडिंगबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने रीडिंगनंतर पाच टक्‍के ग्राहकांच्या वीज मिटरची तपासणी करण्यात आली. त्यात दोषी एजन्सीविरुद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यात २१ जून ते ७ ऑगस्ट दरम्यान ग्राहक मेळावा घेण्यात आला. एकूण २९ मेळाव्यात नवीन कनेक्‍शन व वीज बिलाच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारीनंतर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील वीज मिटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सींच्या कामावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. रिडिंग घेतल्यानंतर पाच टक्के ग्राहकाच्या वीज मिटरची तपासणी करण्यात येत आहे. या फेरतपासणीत औरंगाबाद ‌आणि जालना विभागातील ७६६२ वीज ग्राहकांचे वीज मिटर तपासण्यात आले. त्यामध्ये ४० लाख २९ हजार ४६१ युनिट विजेची तफावत आढळली आहे.
या तपासणीनंतर छावणी पोलिस ठाण्यात व्हिजन इन्फोटेकच्या मनीष मुळे या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज महावितरण कार्यालयातर्फे देण्यात आला आहे. याशिवाय सदोष वीज मिटर रीडिंग घेतल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज मागासवर्गीय बेरोजगार एजन्सी चालकाविरोधातही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. या पुढील काळात वीज मिटर रीडिंग प्रकरणात दोषी एजन्सींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, एप्रिल ते जून या चार महिन्यात ५१ कोटी ५९ लाख रुपयांनी थकबाकी वाढली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ग्राहक तक्रार मेळाव्यात वीज बिल दुरुस्तीच्या एकूण ३७१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २२० तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यात २९ तक्रार मेळाव्यात ६२९ तक्रारी मिळाल्या होत्या. यात वीज देयकाबाबत ३७० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

थकबाकीत वाढ
मार्च २०१७-१८२.४५ कोटी
जून २०१७ - २३४.३४ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगमंदिरासाठी पालकमंत्र्यांचे दोन कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपये देण्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी मान्य केले. लवकरच हा निधी दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले, तर खासदार चंद्रकांत खैरे यांनी संत एकनाथ रंगमंदिराचे पालकत्व स्वीकारणार असल्याची घोषणा केली.

रौप्यमहोत्सव साजरा कारणाऱ्या महापालिकेच्या संत एकनाथ रंगमंदिराची दुर्दशा झाली आहे. या दुर्दशेची कथा अभिनेता सुमित राघवन यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. राघवन यांनी रंगमंदिराच्या दुर्दशेबद्दल शिवसेनेला जबाबदार धरले. त्यामुळे रंगमंदिराची ‘स्थिती’ सर्वदूर पोचली. मुंबईतही त्याची दखल घेण्यात आली. या प्रकारामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते सतर्क झाले. आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी सायंकाळी रंगमंदिराची पाहणी केली व दुरुस्तीच्या कामासाठी २० लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नगरसेवक नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर यांच्यासह रंगमंदिराला भेट दिली. यावेळी ‘नावासाठी नाही तर गावासाठी’ या ग्रुपचे सदस्य प्रेषित रुद्रावार, शीतल रुद्रावार, किशोर निकम, नीना निकाळजे, योगेश इतरकर, सारंग टाकळकर आदी उपस्थित होते.

खासदार खैरे यांनी संत एकनाथ रंगमंदिराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी खासदार विकास निधीतून २० लाख रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी देण्याची तयारी दर्शवली, परंतु वैद्य यांनी ठोस तरतूद करून रंगमंदिराच्या दुरुस्तीचे काम एकत्रितपणे करण्याची मागणी केली. त्यामुळे खैरे यांनी थेट पालकमंत्री रामदास कदम यांना फोन लावला. संत एकनाथ रंगमंदिराची अवस्था त्यांच्या कानावर घातली. रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणे गरजेचे आहे, असे त्यांच्या लक्षात आणून दिले. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची मान्य केले. ही माहिती खैरे यांनी नंतर उपस्थितांना सांगितली. आपण स्वतः या रंगमंदिराचे पालकत्व घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. खैरे यांच्या भेटीनंतर महापौर भगवान घडमोडे यांनीही रंगमंदिराला भेट दिली. त्यांच्या बरोबर महापालिकेचे शहर अभियंता सिकंदर अली होते. रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्याची सूचना त्यांनी शहर अभियंत्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्टेंबर, ऑक्टोबरात ग्रामपंचायत निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात चार व ऑक्टोबर महिन्यात २१ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंचांची निवडणूक होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण निश्चिती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकी होत आहेत. राजकीय पक्षांनी विशिष्ट ग्रामपंचायती व जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्याकरिता आतापासूनच गावांमध्ये आपापल्या परीने नियोजन केले जात आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सरपंचपदासाठी अनेक गावात प्रत्येक पक्षांकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. तरीही ते कार्यकर्त्यांची नाराजी ओढावून घेण्यास तयार नाहीत. ‘तुम्ही यावेळी थांबा, तुमच्यासाठी दुसरीकडे संधी देऊ,’ असे सांगून कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येत आहे. उमेदवारीची आर्थिक परिस्थिती, जनसंपर्क व जनमानसातील प्रतिमा या निकषांवरून उमेदवारी ठरवण्यात येणार असल्याने अनेकजण उमेदवारीसाठी नेत्याची मनधरणी करत असल्याचे तालुक्यात दिसत आहे.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती

खरज तित्तरखेडा, कविटखेडा बिरोळा, भग्गाव, हनुमंतगाव, पानवी बुद्रुक वक्ती, महालगाव, माळी घोगरगाव, हिलालपूर कोरडगाव, बेलगाव, कोल्ही, तिडू मकरमतपूरवाडी, अव्वलगाव हमरापूर, वांजरगाव, टुणकी दसकुली, कनकसागज, पारळा, रोटेगाव, डागपिंपळगाव, बाबतरा, हिंगणे कन्नड, गोळवाडी, नांदूरढोक बाभुळगावगंगा, खिर्डी हरगोविंदपूर, पुरणगाव, नादी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर खरेदीसाठी २५ लाखांची मागणी; खुनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घर खरेदीसाठी माहेरातून २५ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करीत विवाहितेचा छळ करून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार जून २०११ ते सप्टेंबर २०१६ या काळात जिन्सी भागातील नाहेदनगर येथे घडला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २८ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पुण्याला फ्लॅट किंवा औरंगाबादेत घर खरेदीसाठी २५ लाख रुपये आणण्याची मागणी करून सतत छळ करण्यात आला. तिच्या वडिलांची परिस्थिती २५ लाख रुपये देण्यासारखी नव्हती. त्यामुळे तिच्या वडिलांना त्रास देण्यासाठी सासरच्या मंडळीनी त्यांच्या विरोधात खोटे अर्ज-फाटे करीत मानसिक छळ केला. तसेच या विवाहितेच्या चारित्र्याविषयी व्हॉटस अॅपवर वाईट चर्चा पसरवली. त्याच प्रमाणे विवाहितेचा गळा दाबून खुनाचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी संशयित आरोपी पती मुनिरोद्दीन मैनोद्दीन शेख, सासरा मैनुद्दीन शेख व एका महिला आरोपी (सर्व रा. वाजेगाव जि. नांदेड) यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त‘पीआय’च्या बंगल्यात चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन-३ परिसरात निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या बंगल्याचे ग्रील काढून चोरांनी घरातील सहा लाख ३० हजारांचा तीस हजाराचा ऐवज लंपास केला. बजरंग चौकातील जयलक्ष्मी चौकात देखील सोमवारी याच पद्धतीने घरफोडी करून ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. सिडको एन-३ येथील घरफोडी प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको एन-३ मधील प्लॉट क्रमांक २४० वरील शांती बंगल्यात निवृत्त पोलिस निरीक्षक अशोक गोविंदराव कटके (वय ६७) यांचे वास्तव्य आहे. त्यांनी वरच्या मजल्यावरील खोल्या भाड्याने दिल्या आहेत. रक्षाबंधनानिमित्त त्यांचा मुलगा सोमवारी पुणे येथे बहिणीकडे गेला होता. कटके हे मध्यरात्री एकपर्यंत घरातील हॉलमध्ये जागेच होते. ते झोपल्यानंतर चोरांनी वॉल कंपाउंडवरून उडी मारून बंगल्याच्या आवारत प्रवेश केला. त्यांनी आधी कटके झोपी गेलेल्या हॉलची कडी बाहेरून लावून घेतली. त्यानंतर बेडरुमची उघडी खिडकी असल्याचे पाहून तिचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर कटके झोपलेल्या हॉल व बेडरूमला जोडणारे दार बंद करून त्यांना हॉलमध्ये कोंडले. बेडरुममधील आवाज हॉलमध्ये जाऊ नये याकरिता दारांच्या फटीत चादर कोंबली. त्यानंतर बनावट चावीने लोखंडाचे कपाट उघडून ऐवज लंपास केला.

हे गेले चोरीला

लोखंडी कपाट उघडल्यानंतर त्यातील इतर ड्रॉवरच्या चाव्या चोरांच्या हाती लागल्या. त्यांनी कपाटातील रोख ३० हजार, सहा तोळ्यांच्या चार बांगड्या, पाच तोळ्याचा गोफ, सतरा ग्रॅमचा नेकलेस, तीन ग्रॅमची अमेरिकन हिऱ्याची अंगठी, एक तोळ्याच्या रत्नाच्या चार अंगठ्या, साडेआठ ग्रॅमच्या दोन रिंग, असा सहा लाख तीन हजाराचा ऐवज लंपास केला.

कटकेंची सुटका सकाळी

कटके यांनी पहाटे साडेपाच वाजता जाग आल्यानंतर बेडरुम, स्वंयपाकघराकडे जाणारे दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दार बंद होते, त्यामुळे मुख्य दार उघडण्याचे प्रयत्न केला, ते दारही बंद असल्याने मोबाइलवरून वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूला संपर्क केला. भाडेकरूने त्यांची सुटका केली. कटके यांनी पाहणी केल्यानंतर बेडरुमच्या खिडकीची ग्रील काढलेली दिसली व चोरी झाल्याचे उघड झाले.

‌दिशाभूल करण्याचा प्रयत्न

चोरी करून बेडरुम बाहेर पडल्यानंतर चोराने बंगल्याच्या आवारात काही काळ घालवला. एका झाडाजवळ त्याने प्रातःविधी केला, प्लास्टिकच्या फुटक्या बांगड्या व काळ्या मण्याची माळ बंगल्याच्या मागील भागात फेकत कंपाउंडवर चढून शेजारी असलेल्या विजेच्या खांबावरून खाली उतरत पसार झाला. ही माहित झाल्यानंतर पुंडलिकनगर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट दिली. श्वान पथकाला चोराचा माग काढण्यात अपयश आले.

बजरंग चौकातील पुनरावृत्ती
सिडको एन ७ मधील बजरंग चौकातील जयलक्ष्मी कॉलनी येथील वाल्मिक दिलीप चव्हाण (वय ३०) यांच्या घरी सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. चव्हाण घरात झोपलेले असताना खिडकीचे ग्रील काढून चोरट्याने घरातील बेडरुममध्ये प्रवेश केला. कपाटातील ५५ हजारांचा ऐवज लांबवत चोरटा पसार झाला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलार पंप योजनेत औरंगाबादचा समावेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोलार कृषी पंप योजनेत अखेर औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०८ सोलार कृषी पंप देण्यात येणार आहेत. या योजनेत लाभ मिळविण्यासाठी नियम व अटी लागू आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.
सोलार कृषी पंप योजनेच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. दुष्काळ असूनही औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नसल्याने स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. जालना जिल्ह्यात पहिल्या वर्षी १९० सोलार पंप देण्याचे जाहीर करण्यात आले होते. आतापर्यंत या योजनेतून १७९ सोलार पंप वाटप करण्यात आले आहेत. यंदा जाहीर केलेल्या नवीन यादीत औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २०८ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे पाच एकर शेतजमीन असावी, अशी प्रमुख अट आहे. सोलार कृषी पंप योजनेत सामील होण्याकरिता त्याच्याकडे वीज सेवेची पायाभूत सुविधा नसावी. या शेतकऱ्यांचा सोलार कृषी पंपचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवण्यात येईल. समितीच्या मंजुरीनंतर साधारणतः पाच ते साडे पाच लाख रुपयांचे सोलार पॅनल जैन इरिगेशनच्या माध्यमातून बसवण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images