Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सरकारकडून भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सुभाष देसाई, प्रकाश मेहता यांच्याबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतला गेला आणि या दोन मंत्र्यांना वेगळा न्याय का ? सरकारची ही भूमिका भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालणारी आहे,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.
चव्हाण म्हणाले, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. पण मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळला. कारण देसाई यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडली असती आणि राज्य सरकार अस्थिर झाले असते. या भीतीने मुख्यमंत्र्यांनी देसाईंचा राजीनामा स्वीकारला नाही. प्रकाश मेहता यांच्याबाबत लोकायुक्तांमार्फत चौकशी जाहीर केली गेली. मुळात मुख्यमंत्री हे लोकायुक्तांच्या कक्षेत येत नाहीत, लोकायुक्तांना मुख्यमंत्र्यांची चौकशी करता येत नाही. मेहता यांनी फाइलवर मुख्यमंत्र्यांच्याबाबत टिपणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण फार लांबणार नाही. मुख्यमंत्री चौकशीच्या कक्षेत येत नाहीत म्हणून हा निर्णय घेतला गेला. हे चुकीचे आहे. चौकशी निःपक्षपातीपणे झाली पाहिजे. भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घालू नये, अशी मागणी त्यांनी केली.

टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करा

मराठवाड्यातील पीक परिस्थिती बाबत चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस झालेला नाही. शेतात उभे असलेले पीक वाळून गेले आहे. पाण्याची गंभीर समस्या आहे. सरकारने आता महसुली नोंदी, पंचनाम्यांची वाट न पाहता मराठवाड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोल चोरीतून मान सोडवण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पेट्रोल पंपावरील मशीनच्या यंत्रणेत बदल करून पेट्रोल चोरी प्रकरणातून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न ऑइल कंपन्या करत आहेत. मशीनची जबाबदारी ऑइल कंपन्यांकडे असल्याची भूमिका पंपचालकानांनी घेतली आहे. पण, ही जबाबदारी पंपचालकाची असल्याचे शपथपत्र द्यावे, असा आग्रह कंपन्या पंपचालकांकडे धरत आहेत.
ठाणे येथे पेट्रोल पंपावरील मशीनमध्ये तांत्रिक बदल करून पेट्रोल चोरी करण्यात येत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली होती. ठाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर औरंगाबाद शहरातील १० ते १२ पेट्रोल पंपाची वजन मापे विभाग, ठाणे पोलिस व शहर गुन्हे शाखा, ऑइल कंपनीचे अधिकारी यांनी तपासणी केली. या तपासणीत चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंप येथे कमी पेट्रोल दिले जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पंप चालकाने मशीनची जबाबदारी ऑईल कंपनीची असल्याची भूमिका घेतली होती. कोणातही बदल करायचा असेल, तर तो ऑइल कंपनीच्या माध्यमातूनच करावा असा दावा पंप चालकांनी केला होता.
हे पेट्रोल चोरीचे कंपनीच्या अंगलट येऊ नये यासाठी शक्कल लढवण्या आली आहे. ऑइल कंपनीने पंप चालकांना पत्र पाठवून पंप चालकांनी विशेष शपथपत्र लिहून देण्याचे कळवले आहे. या शपथपत्रानुसार, जबाबदारी पंप चालकांवर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यावर चिंतेचे ढग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जून ‌महिन्यात १७ दिवस पाऊस झाल्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये पावसाच्या दिवसांचे प्रमाण घसरले आहे. जुलैमध्ये नऊ दिवस, तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत एकाही दिवस पाऊस न झाल्यामुळे मराठवड्यात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. विभागात आतापर्यंत तब्बल ३९ तालुक्यांत ६० टक्केही पाऊस झाला नाही. पावसाच्या मोठ्या खंडाचा फटका खरीप पिकांना बसल्यामुळे यंदा उत्पादनाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, येत्या चार दिवसांत मराठवाड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामानतज्‍ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील खरिपाची पिके संकटात सापडली आहेत. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत तुनलेत पावसाच्या नोंदी चांगल्या असल्या तरी पावसातील खंडामुळे पेरण्या वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात प्रारंभी दमदार बरसलेल्या पावसाने जून महिन्यातच पावसाने अपेक्षित सरासरी ओलांडली होती, मात्र त्यानंतर पावसात मोठा खंड पडला. मराठवाड्यात आतापर्यंत २८९.७१ मिलिमीटर (५५.२ टक्के) पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ३२.५ टक्के आहे.

खरीप संकटात
मराठवाड्यात प्रारंभी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर १४ जूनपासून पाऊस गायब झाल्यामुळे दुबार पेरण्यांची स्थिती निर्माण झाली होती, दरम्यान जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा शिडकावा झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. पावसाच्या या लहरीपणामुळे उत्पन्नाला फटका बसण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ५९.२ टक्के, जालना ५८.८, परभणी ४६.३, हिंगोली ५५.२, नांदेड ५४.५, बीड ७०.५, लातूर ७१.१ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७५.४ टक्के पाऊस झाला आहे.

३८ तालुक्यांत स्थिती गंभीर
१२ ऑगस्ट पर्यंत विभागातील औरंगाबाद (५६.४), पैठण (३२.६ टक्के), सोयगाव (४४.२ टक्के), गंगापूर (५०.१ टक्के), खुलताबाद (४१.२ टक्के), जालना (५३.८ टक्के), परतूर (५६.८ टक्के), अंबड (४८.७ टक्के), घनसावंगी (५५.७ टक्के), परभणी (४९.५ टक्के), पालम (३८.५ टक्के), गंगाखेड (४३.७ टक्के), सोनपेठण (५३.६ टक्के), सेलू (५१.४ टक्के), पाथरी (३३.७ टक्के), जिंतूर (४०.३ टक्के), मानवत (४३.६ टक्के), कळमनुरी (३४.७ टक्के), वसमत (४७.१ टक्के), अर्धापूर (५९.३ टक्के), उमरी (४८.४ टक्के), लोहा (५६.८ टक्के), किनवट (५९.६ टक्के), माहूर(४३.२ टक्के), हदगाव (५८.०० टक्के), हिमायतनगर (३७.६ टक्के), देलगूर (३५.८ टक्के), बिलोली (४८.४ टक्के), धर्माबाद (५०.७ टक्के), नायगाव (४६.५ टक्के), मुखेड (५२.३ टक्के), गेवराई (४७.१ टक्के), वडवणी (५८.०० टक्के), माजलगाव (५६.५ टक्के), परळी (५२.५ टक्के), उदगीर (५७.६ टक्के) व जळकोट (५१.९ टक्के) या तालुक्यांमध्ये ६० टक्‍क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

पाऊस कमी असल्यामुळे चिंता असली तरी अद्याप दुष्काळ म्हणता येणार नाही. इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन उत्तरेकडे सरकल्यामुळे देशाच्या उत्तर भआगात, तसेत पूर्व भागातील राज्यात दमदार पाऊस झाला. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पावसाचा खंड पडला. येत्या १७ ते २० ऑगस्टदरम्यान मराठवाड्यातील बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही परतीचा मान्सून मोठ्या प्रमाणावर बरसण्याची चिन्हे असल्यामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही, मात्र पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
- श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजा अर्जावर स्वाक्षरीसाठी कैद्याच्या कुटुंबास ठकवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हर्सूल कारागृहात तीन वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या रजा अर्जावर ‘साहेबांची स्वाक्षरी घेऊन देतो’ असे सांगत जिल्हा कोर्टात आलेल्या महिलेचे २७ हजारांचे दागिने घेऊन पसार झाल्याप्रकरणी आरोपीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, बुधवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डब्ल्यू. उगले यांनी दिले.
या प्रकरणी लताबाई सुरेश पवार (वय ३५. रा. ढोकी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांचा पती सुरेश पवार याला दरोड्याच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली असून तो तीन वर्षांपासून हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, फिर्यादीची सासू आजारी असल्याने शिक्षा भोगत असलेल्या पतीला रजा मिळावी, यासाठी फिर्यादीने एका वकिलाशी बोलणी केली होती. त्यावर वकिलाने सासुच्या आजारपणाची कागदपत्रे घेऊन बोलाविले होते. त्यानुसार ही महिला, तिची आई, नणंद व मुलगी अशा चौघी लातूरहून औरंगाबाद येथील जिल्हा कोर्टात गुरुवारी आल्या होत्या. पण, त्यांची वकिलाशी भेट झाली नाही. या महिलेकडे वकिलाचा मोबाइल क्रमांक होता. त्यामुळे कोर्ट परिसरात फिरत असलेल्या अनोळखी संशयित आरोपी शेख अयुब शेख दगडू (वय ४५, रा. आडूळ, ता. पैठण, जि. औरंगाबाद) याला महिलने वकिलांना फोन करण्यास सांगितले. यावेळी संशयित आरोपीने वकील फोन उचलत नसल्याचे सांगत, कोर्टातील कामाविषयी शिताफीने जाणून घेतले. त्यावर त्याने ‘मी रजेची आर्डर मिळवून देतो, त्यासाठी २५ हजार रुपये लागतील’ अशी थाप मारली. पैसे नसल्याचे महिलने सांगितल्यानंतर स्वतःचे, आई व मुलीचे २७ हजार रुपये किंमतीचे दागिने काढून घेतले. ‘चार दिवसांनी पैसे घेऊन या आणि दागिने घेऊन जा’ असे सांगून त्याने तिला हर्सूल कारागृहात नेले. तेथे टपाल बॉक्समध्ये साहेबांची खोटी स्वाक्षरी घेतलेला कागद टाकला आणि ‘तुमचा माणूस चार वाजता सुटेल’ असे सांगून पळून गेला. त्यानंतर कारागृहातील कर्मचाऱ्याने टपाल बॉक्स उघडून त्या कागदावर फक्त सुरेश पवार असे लिहिले असल्याचे स्पष्ट केले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर महिले तक्रार दिली, त्यावरून शनिवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्याच दिवशी शेख अयुब याला अटक केली.

सराफासह साथीदारांचा शोध

संशयित आरोपीला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुन्ह्यातील दागिने चिकलठाणा येथील कोणत्या सराफ्याला विकले, याचा तपास करून दागिने जप्त करणे बाकी आहे. तसेच आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, आरोपीने यापूर्वी असे गुन्हे केलेले आहेत का आदींचा सखोल तपास करण्यासाठी सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने संशयित आरोपीला बुधवारपर्यंत (१६ ऑगस्ट) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेकरूंचा पहिला जत्‍था जेद्दाहला रवाना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हज यात्रेकरूंचा पहिला जथ्ता रविवारी दोन विमानाने जेद्दाहकडे रवाना झाला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांना हज कॅम्पमधून विमानतळाकडे रवाना केले.
औरंगाबाद विमानतळावरून हज यात्रेकरूंचे पहिले विमान सायंकाळी सहा व दुसऱ्या विमानाने रात्री साडे आठच्या सुमारास जेद्दाहकडे उड्डाण केले. रविवारपासून २१ ऑगस्टपर्यंत दररोज दोन विमाने हज यात्रेकरूंना घेऊन जाणार आहेत. यात्रेकरूंसाठी आमखास मैदान येथील जामा मशीदमध्ये तात्पुरता कँप तयार करण्यात आला आहे. तेथे विमान तिकिट, हज कमिटीकडून देण्यात येणारी रक्कम सौदी शासनाच्या चलनात देण्यात आली. येथे हाजींना एहराम बांधून यात्रेची तयारी केली जाते. येथून हाजींना विशेष बसमधून विमानतळाकडे रवाना करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी साश्रुनयांनी निरोप दिला.
या बसला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्य हज कमिटीचे अध्यक्ष इब्राहीम भाईजान, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, आमदार हुस्ना बानो खलिफा, रियाज काझी, इम्तियाज काझी, सिराज देशमुख, अॅड. सय्यद अक्रम, हमद चाऊस, इब्राहीम पठाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

विशेष प्रार्थनेचे आवाहन
यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हज येतील कर्तव्यांची माहिती दिली. या वर्षी सौदी अरेबियामध्ये तापमान चढे असल्याने सर्वांनी स्वतःला जपावे, असे आवाहन केले. देशाची एकता व अखंडता तोडणाऱ्यांच्या मनात प्रेम निर्माण करण्यासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिजीत कडाडली हलगी-ढोलकी

0
0

फिजीत कडाडली हलगी-ढोलकी

मराठी लोककलेचा आंतरराष्ट्रीय सन्मान

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोवाडा, गण, लावणी, जागरण, गोंधळ अशा पारंपरिक मराठमोळ्या लोककलांनी ‘फिजी’ देशातील रसिकांची भरभरून दाद मिळवली. देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी शाहीर रामानंद उगले व शाहीर कल्याण उगले यांनी बहारदार सादरीकरण केले. तसेच ‘नावरू’ देशाच्या अध्यक्षांनी या कलावंतांचा विशेष सन्मान केला. हलगी आणि ढोलकीच्या नादाने दोन्ही देश दुमदुमले.

भारत आणि फिजी सरकारच्या वतीने मराठी लोककलांचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत फिजी देशातील बा, लंबासा, सुवा, नांदी या शहरात ‘महाराष्ट्राची लोककला’चे सादरीकरण झाले. या संचात देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवाशाहीर कल्याण उगले व रामानंद उगले यांच्यासह ज्येष्ठ ढोलकीपटू पांडुरंग घोटकर, लावणी कलावंत रेश्मा परितेकर यांचा समावेश होता. गण, गवळण, लावणी, पोवाडा, जागरण, गोंधळ या लोककलांचे बहारदार सादरीरण करून कलाकारांनी बहार उडवली. फिजीतील रसिकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली. ढोलकीपटू पांडुरंग घोटकर व संबळवादक कल्याण उगले यांच्या मराठमोळ्या छेड्याने कार्यक्रम सुरू झाला. युवाशाहीर रामानंद उगले यांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांचा ‘या नाचत रंगणी’ हा गण सादर करून रंगत आणली. रेश्मा परितेकर यांनी ‘पंचकल्याणी घोडा अबलक’ या पारंपरिक लावणीवर धमाल नृत्य केले. लावणीचे गायन आशा मुसळे व किर्ती बने यांनी केले. रामानंद यांच्या शाहिरी गीतांनी रसिकांना खिळवून ठेवले. संबळ-दिमडीची जुगलबंदी व वाघ्या-मुरळीने समारोप झाला. यावेळी लक्ष्मण भालेराव, सत्यजित खांडगे, वर्षा मुसळे, अश्विनी, पूनम यांनी साथसंगत केली. फिजी येथील भारतीय उच्चायुक्त विश्वास सकपाळ आणि वीणा भटनागर यांनी कलाकारांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. फिजी येथील पाच कार्यक्रम गाजताच ‘नावरू’ देशाने मराठी कलावंतांना विशेष निमंत्रण दिले. या देशाचे शिक्षण व व्यवस्थापन मंत्री चर्माइन स्कॉटी यांनी कलाकारांचे स्वागत केले. मराठमोळ्या लोककलांचे सादरीकरण पाहून नावरूच्या अध्यक्षांनी कलाकारांचे कौतुक केले. तसेच राष्ट्रध्वज, मेडल, राष्ट्रचिन्ह असलेला टाय आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान केला. रामानंद आणि कल्याण हे जालना येथील शाहीर अप्पासाहेब उगले यांची मुले आहेत. विविध महोत्सव आणि कार्यक्रमात दोघांनी चमकदार कामगिरी केली आहे.विदेशी रसिकांची दाद
मराठी लोककलांना फिजी आणि नावरू देशातील रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रम संपल्यानंतर रसिकांनी कलाकारांची भेट घेऊन कौतुक केले. भाषा समजत नसली तरी कलेचा भाव आमच्यापर्यंत पोहचल्याचे अभिप्राय रसिकांनी दिले. पर्यटनदृष्ट्या अतिशय संपन्न असलेल्या फिजीतील अनुभव अविस्मरणीय असल्याचे कलावंतांनी सांगितले.
‘फिजी’ व ‘नावरु’ या देशातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुरूवर्य पांडुरंग घोटकर व लावणीसम्राज्ञी रेश्मा परितेकर यांनी ही संधी दिली. पुढील काळातही आश्वासक कला सादरीकरण करू.
- रामानंद उगले, शाहीर
पारंपरिक लोककलेचा वारसा मिळाला आहे. मराठी लोककला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाता आली. भारतभर महाराष्ट्राची लोककला सादर करीत असतानाच विदेशातही संधी मिळाली.
- कल्याण उगले, संबळवादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिड्रेसलचा निकाल रखडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पदवी अभ्यासक्रमाच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी ‌रिड्रेसलसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया करून दीड महिने उलटले, तरी विद्यापीठाकडून छायांकित प्रती विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थी पदव्युत्तरच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पदवी परीक्षेत मात्र ते अनुत्तीर्ण आहेत. उत्तरपत्रिका तपासणीबाबतही अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास ऑगस्ट उजाडला. त्याचवेळी पदवी परीक्षेचा निकालानंतर शेकडो विद्यार्थ्यांना रिड्रेसलसाठी दिलेल्या अर्जानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रिड्रेसलची प्रक्रिया पूर्ण केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न या विद्यार्थ्यांना सतावत आहे. बीएस्सी अंतिम वर्षासाठीच्या विद्यार्थ्यांनी जूनमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली. अद्याप त्यांना उत्तरपित्रकेच्या छायांकित प्रती मिळालेल्या नाहीत. सरस्वती भुवन, देवगिरी, वसंतराव नाईक कॉलेज, विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परीक्षा नियंत्रकांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. हे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत कॉलेज, विद्यापीठात खेटे मारत आहेत. प्रशासनाकडून योग्य ते उत्तरही दिले जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

‘काय ते लवकर सांगा’
बीएस्सीचा ‌पदवी परीक्षेचा निकाल २४ जून रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांनी २६ जून रोजी रिड्रेसलसाठी प्रक्रिया केली. कॉलेजांमार्फत हे अर्ज विद्यापीठात येतात. त्यानंतर छायांकित प्रती कॉलेजांमध्ये पाठवून त्या‌ संबंधित विषयाच्या शिक्षकाकडून तपासून विद्यार्थी परत कॉलेजमार्फत विद्यापीठाकडे पाठवतात. त्यावर विद्यापीठ निर्णय घेते. अद्याप विद्यार्थ्यांना छायांकित प्रतीच मिळाल्या नाहीत, तर पुढची प्रक्रिया केव्हा होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे उत्तीर्ण झालो, तर पदव्युत्तर प्रवेशाचीही संधी जाण्याची काही भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आम्हाला नापास असल्यास तसे सांगा, पण यावर तात्काळ निर्णय घ्या, अशी विनंती अर्ज विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांकडे केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाप साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. तिवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंबाजोगाई येथे आयोजित ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन २३ व २४ डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय मसापचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक मधुकर मुळे यांना जाहीर करण्यात आला आहे. हे निर्णय रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आले, अशी माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, मराठवाडा साहित्य परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षास प्रारंभ होत असून उस्मानाबाद येथे २९ सप्टेंबर रोजी मसापचा वर्धापनदिन साजरा होणार आहे. यावेळी पी. डी. पाटील यांच्या हस्ते संत गोरोबा काका सभागृहाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ‘मराठवाड्याचा वाङ्मयीन इतिहास’ हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी रामचंद्र काळुंखे, विद्यासागर पाटांगणकर, कमलाकर कांबळे हे संपादक मंडळ व सदस्यांवर आहे. या बैठकीला किरण सगर, दादा गोरे, भास्कर बडे व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. तिवारीची ग्रंथसंपदा

नियोजित अध्यक्ष रंगनाथ तिवारी यांनी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन केले आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी या दोन भाषांत लेखन केले. ‘संपल्या सुरावटी’, ‘उत्तम पुरूष: एक वचन’, ‘देवगिरी बिलावल’, ‘बेगम समरू’, ‘अनन्वय’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. ‘काया-परकाया’ हे नाटक, ‘सरधना की बेगम’, ‘उत्तरायण’ हिंदी कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. भाषांतर क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रभाषा रत्न, साहित्यरत्न उपाधी, भाषा भारती, राज्यशासनाचा हरी नारायण आपटे पुरस्कार व भैरू रतन दमानी साहित्य पुरस्कार देण्यात आले आहेत.

मुळे यांना जीवनगौरव

मसाप विश्वस्त समितीचे अध्यक्ष मुधकर मुळे यांनी ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे त्यांनी सहा साहित्य संमेलने घेतली आहेत. मशिप्र मंडळाच्या बेवारस शाळांच्या इमारती बांधून त्या नावारूपाला आणणे व मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह उभारणीत त्यांचे योगदान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरात दडवलेला गहू नारायणपुरात जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी वैजापूर
वीरगाव पोलिसांनी शनिवारी तालुक्यातील नारायणपूर येथे एका घरावर छापा मारून काळ्या बाजरात विक्री करण्यासाठी ठेवलेला रेशनच्या गव्हाचा साठा पकडला. या कारवाईत पोलिसांनी गव्हाच्या ५० गोण्या जप्त केल्या आहेत. घरमालकाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला. रेशन दुकानदाराविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नारायणपूर येथील सोमनाथ ढोक यांच्या घरात स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा साठा काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष घोडके, सहाय्यक फौजदार महादेव जरारे, बाबासाहेब धनुरज, टिपरसे, मोरे यांच्या पथकाने ढोक याच्या गट क्रमांक चारमधील घरावर छापा मारला. यावेळी घरात गव्हाच्या ५० गोण्या सापडल्या. हा गहू ढोकनांदूर येथील रेशन दुकानदार गायधने यांनी ठेवला असल्याचे ढोक याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, याप्रकरणी सहाय्यक फौजदार जरारे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्व वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घोडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाधार केंद्रातील दोन महिला गर्भवती

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद येथील स्वाधार महिला केंद्रातील दोन महिला गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाले आहे. उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत या महिला तीन महिन्याच्या गर्भवती असल्याचा अहवाल दिला आहे.
स्वाधार केंद्राच्या परिसरात कंडोम व दारुच्या बाटल्या आढळल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत महिलांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही तपासणी करण्यात आली. डीवायएसपी अंजुम शेख यांच्या पथकाने पाहणी करून स्वाधार महिला केंद्राला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. स्त्री रुग्णालयात तपासणीत दोन महिला गर्भवती असल्याची पुष्टी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंचला बोडके यांनी दिली.
स्वाधार केंद्रातील दुर्दशेचे व गैरप्रकारचा उलगडा झाल्यानंतर एकाच खळबळ उडाली होती. स्वाधार केंद्रातील निवास, स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली असून ही संस्था श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथील आहे.


महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत यांना चौकशी करून कारवाईचे व महिलेच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती कारवाई केली जाईल.
राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.


स्वाधार केंद्रात अत्याचारातील पीडित मुलींना व महिलांना न्यायालयाच्या आदेशाने सुरक्षित गृह म्हणून ठेवले जाते. मात्र या केंद्रांतून मुली बाहेर कशा जातात याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकाराबाबत महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बोलणे झाले असून कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
सुजितसिंह ठाकूर, आमदार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध कार्यक्रमाने जन्माष्टमी साजरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरेऽऽऽ...’ चा गजर.... मुरलीवादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह झालेली भजनसंध्या यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत शहरात कृष्णजन्मसोहळा उत्साहात सुरू होता. इस्कॉनतर्फे सिडको एन-१ येथील राधाकृष्ण मंदिरात जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
सिडकोतील मंदिरात तीन तास अभिषेक, सायंकाळी सहा ते बारा दरम्यान, महामंत्रोच्चारण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद देण्यात आला. या सोहळ्यासाठी तीस हजार भाविक बसू शकतील, असा मांडव घालण्यात आला होता. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. सुंदर देखाव्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अभिषेकाच्या दरम्यान इस्कॉनचे सर्व पदाधिकारी आणि शहरातील नामांकित व्यक्तींची उपस्थिती होती.

इस्कॉन सेंट्रल

इस्कॉन औरंगाबाद सेंट्रलतर्फे विविध कार्यक्रम पार पडले. अग्रसेन भवन येथे सायंकाळी सहापासून भजनसंध्या, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, पंचमहाभिषेक, गंधर्व नाटिका व महाप्रसाद वाटप झाला. इस्कॉन सेंट्रलतर्फे यंदा पहिल्यांदाच जन्माष्टमी सोहळा आयोजित केला होता. मुलांसाठी कृष्ण वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मुलांसाठी दहिहांडी असे उपक्रम पार पडले. यावेळी सीताराम अग्रवाल, डॉ. संदीप लोखंडे, डॉ. रमेश लड्डा, विनोद बगडिया, राम लड्डा, डॉ. संतोष मद्रेवार, मुंबई इस्कानॅचे रोहिणीदास प्रभ‌ू, बालाजी मद्रेवार यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाइट हँग; प्रवेश रखडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत गोंधळ उडाला आहे. वेबसाइट हँग झाल्यामुळे सोमवारी पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. अत्याधुनिक वेबसाइट सुरू करीत असल्यामुळे जुनी वेबसाइट बंद होती, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले, मात्र पदव्युत्तर प्रवेशासाठी हेल्पलाइनचा अभाव आणि प्रवेशाच्या सूचना नसल्यामुळे शेकडो विद्यार्थी वैतागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच पदव्युत्तर वर्गासाठी ‘सीईटी’ घेतली. प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणामुळे रखडल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. सध्या अलॉटमेंट लेटर घेऊन विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी संबंधित विभाग आणि महाविद्यालयात गेले. पण, प्रवेशाबाबत संबंधित विभागांना कोणतीही सूचना नसल्यामुळे विद्यार्थ्यांना माघारी फिरावे लागले. विद्यापीठ कॅम्पसमध्ये ही स्थिती असूनही प्रशासन उदासीन होते. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला. सलग सुट्या असल्यामुळे ‘पीजी’ विभागातील बहुतेक कर्मचारी रजेवर असून कंत्राटी कर्मचारी कामकाज करीत आहे. विद्यार्थ्यांची गर्दी उसळल्याने मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नव्हते. इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हेल्पलाइन किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत झाली नाही. प्रवेशासाठी दोन दिवस बाकी असतानाच वेबसाइट हँग झाल्यामुळे गोंधळात भर पडली. नवीन बेवसाइट लाँच करताना तांत्रिक कामासाठी जुनी वेबसाइट बंद असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, विशेष म्हणजे प्रवेश प्रक्रिया संपण्यास एक दिवस शिल्लक असताना प्रथम व द्वितीय यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश व स्पॉट अॅडमिशनसाठी विद्यापीठाने परिपत्रक काढले. पीजी प्रवेशाच्या प्रथम यादीतील विद्यार्थ्यांनी ११ ते १५ ऑगस्ट या कालावधीत लॉगिनमधील अलॉटमेंट लेटर फ्रिज करणे आवश्यक आहे. संबंधित विभागात किंवा महाविद्यालयात प्रवेश नको असल्यास ‘फ्लोट’ पर्याय वापरावा. या विद्यार्थ्यांचा द्वितीय यादीसाठी विचार करण्यात येईल. द्वितीय यादीतील विद्यार्थ्यांनी १६ ते २० ऑगस्ट या कालावधीत अलॉटमेंट लेटर घेण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे. ऑनलाइन ‘सीईटी’ दिलेल्या, परंतु पहिल्या व दुसऱ्या यादीत प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी स्पॉट अॅडमिशनसाठी २१ व २२ ऑगस्टदरम्यान विद्यापीठाच्या spotadmission@bamu.ac.in लिंकवर माहिती भरावी. २३ ऑगस्ट रोजी पदवी परीक्षेच्या गुणानुसार सीट अलॉटमेंट करण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांनी लिंकवर माहिती भरून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ३०० रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी २०० रूपये शुल्क ऑनलाइन भरावे असे विद्यापीठाने कळवले.

नवी वेबसाइट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. सिफार्ट सभागृहात दुपारी कार्यक्रम झाला. यावेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, अधिष्ठाता डॉ. दिलीप खैरनार, ‘युनिक’चे संचालक डॉ. सचिन देशमुख, ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. महेंद्र सिरसाठ, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्था विद्यापीठांची मानांकने जाहीर करतात. पुढील वर्षी विद्यापीठाला ‘नॅक’ला सामोरे जायचे आहे. सामूहिक प्रयत्न झाल्यास विद्यापीठचे मानांकन वाढेल, असे कुलगुरू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मुंडण मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे सोमवारी जिल्हा परिषदेवर मुंडण मोर्चा काढण्यात आला.
ऑगस्ट २०१३च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह किमान वेतन द्यावे, सरकारकडून येणारे किमान वेतनापोटीची संपूर्ण रक्कम त्वरित द्यावी, जानेवारी २०१७ पासूनचा थकित पगार द्यावा, शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खात्यावर जमा करावे, एप्रिल २०१४ पासून १०० टक्के वेतन लागू लागू करावे, ८० टक्के वसुलीची अट रद्द करावी, शासन निर्णयाप्रमाणे १ जानेवारी १९९६ पासून विशेष भत्ता लागू करावा, आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिले जाणारे वेतन थेट ऑनलाइन जमा करावे, १० टक्के आरक्षणाप्रमाणे राहिलेल्या सर्व जागा भरव्यात, भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या सूचना द्याव्यात, केवळ शासनाचेच अनुदान देऊन ग्रामपंचायतीच्या हिस्स्याचे वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी, सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापट अद्ययावत भरून द्यावेत आदी मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी हरिश्चंद्र सोनवणे, काकासाहेब कुंभाडे, बाबासाहेब सोळसे, मच्छिंद्र डघळे, नवनाथ गिरी, एकनाथ कांबळे, सीताराम राठोड, संजय राठोड, कैलास व्यवहारे, विठ्ठल वाघ, रामराव पवार, किशोर वैष्णव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको आगाराचा डिझेल पंप सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको आगारातील बससाठी अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या डिझेल पंपाचे सोमवारी उद्‍घाटन करण्यात आले. सिडको आगारातील बकमध्ये सोमवारपासून चिकलठाणा कार्यशाळेतून डिझेल भरण्यास सुरुवात करण्यात आली.
उपमहाव्यवस्‍थापक मधुकर पटारे आणि कार्यशाळा व्यवस्थापक उद्धव काळे यांच्या हस्ते चिकलठाणा कार्यशाळेत डिझेल पंपाचे उद्‍घाटन करण्यात आले. मध्यवर्ती बस स्‍थानकाचे विभाजन करून शहर बस व मराठवाड्यातील इतर शहरांत जाणाऱ्या बस सिडको आगारातून सोडण्यात येत आहेत. परंतु, डिझेल भरण्यासाठी बसगाड्यांना मोठा फेरा मारून मध्यवर्ती बस स्‍थानकात यावे लागत होते. त्यामुळे सिडको आगारात स्वतंत्र डिझेल पंप असावा यासाठी तत्कालीन विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांच्या काळात कारवाई सुरू करण्यात आली. पण, नियमांमुळे त्यांच्या कार्यकाळात पंप झाला नाही. विभाग नियंत्रकपदी आर. एन. पाटील हे आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला होता. ‘एक्सप्लोसिव्ह डिपार्टमेंट’च्या परवानगी मिळालेली नव्हती. त्याबद्दलचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सच्या ३१ जुलैच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित विभागाकडून मान्यता देण्यात आली.
उदघाटनप्रसंगी विभाग नियंत्रक पाटील, यंत्रचालन अधिकारी एल. व्ही. लोखंडे, उपयंत्र अभियंता खडसे, विभागीय भंडार अधिकारी फडणवीस आदींची उपस्थिती होती. या पंपावरून दररोज शंभर वाहनांत डिझेल भरता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या ‘विशेष फेरी’कडे विद्यार्थ्यांची पाठ

0
0

अकरावीच्या ‘विशेष फेरी’कडे विद्यार्थ्यांची पाठ
नामांकित कॉलेजांच्या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विशेष फेरीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. दीड हजार विद्यार्थ्यांनीच सहभाग घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे शहरातील १२ हजार अकरावीच्या जागा रिक्त राहणार आहेत. अडीच महिन्याच्या लांबलेल्या प्रक्रियेमुळे शहरातील नामांकित कॉलेजांमधील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद महापालिका हद्दीत अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली. ९ जूनला सुरू झालेली प्रक्रिया १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यात विशेष फेरीसाठी कॉलेज व शाखांचे पर्याय देण्याची प्रक्रिया रविवारी संपली. प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. नवीन नोंदणीसह, ज्यांचे नंबर लागले नाहीत यासह ब्लॉक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात आली होती. विशेष फेरीमध्ये दीड हजार विद्यार्थ्यांनी प्रक्रिया केल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. त्‍यामुळे प्रवेशाच्या पाच फेरी होऊनही ‌शहरातील ५० टक्के जागा रिक्त राहणार हे स्पष्ट झाले आहे. या फेरीतील विद्यार्थ्यांनी १६ ते १८ ऑगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची मुभा आहे.
अडीच महिने प्रक्रिया
शिक्षण विभागाने राबविलेली ऑनलाइन प्रक्रिया प्रक्रिया अडिच महिने राबविली जात आहे. त्यात अनेकदा वेळापत्रकात झालेले बदल, निकषातील बदल याचा विद्यार्थी, पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. १९ हजार ९५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. त्यातील १२ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. शिक्षण विभागाने प्रक्रियेला केलेल्या विलंबामुळे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात गेल्याचे आरोपही झाले. शहरातील उच्चमाध्यमिक हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
नामांकित कॉलेजांमधील जागा रिक्त
शहरातील ११६ उच्चमाध्यमिक, ज्युनिअर कॉलेजांमधील २४ हजार ११० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया घेतली जात आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या चार फेरीमध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अद्यापही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. नामांकित कॉलेजांमध्ये मागील वर्षीपर्यंत प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यंदा नामांकित कॉलेजांमधीलही अकरावीच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे चित्र आहे.
एकूण प्रवेश संख्या....२४११०

आजपर्यंतचे प्रवेश.....११८१०
अकरावीची ऑनलाइनची प्रवेश प्रक्रिया लांबली. दीड, दोन महिने विद्यार्थी, पालक कशी प्रतिक्षा करणार. त्यात गुणवत्ता यादीही कशी हे कळाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील कॉलेजांकडे वळले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या कॉलेजांवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार, त्याबाबत ते बोलायला तयार नाहीत. तर, दुसरीकडे शहरातील कॉलेजांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत.

रजनीकांत गरुड,

उपप्राचार्य,

देवगिरी कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन पिस्तुलासह एक अटकेत, दोन पसार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
बेकायदा शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुल, मोबाइल व मोटारसायकल, असा ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई रविवारी रात्री तालुक्यातील नांदगाव शिवारात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी वैजापूर शहरातील दर्गा बेस येथील रहिवासी सय्यद आसीम सय्यद आलिमोद्दिन याला अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार पसार झाले.
वैजापूर तालुक्यातील नांदगाव शिवारात गट क्रमांक ४६ मध्ये बेकायदा शस्त्राची खरेदी व विक्री करण्यासाठी तरूण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आरोपींकडे दोन गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत शेख अजहर व राजू भागवत हे दोघे पसार झाले. पोलिसांनी सय्यद आसिम याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे दोन पिस्तुल, २० हजार रुपयांची एक मोटारसायकल (एम एच १७ ए एच ७४६२) व १५०० रुपयांचा मोबाइल, असा ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत किरण गोरे हे किरकोळ जखमी झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विवेक जाधव, गणेश मुळे, किरण गोरे, नदीम शेख, प्रमोद साळवी, बाबा नवले यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी विवेक जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट

0
0

वाळूजः गंगापूर या दुष्काळी तालुक्याकडे यंदाही पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी तालुक्यात सरासरी फक्त ४० टक्के पाउस पडला आहे.
तालुक्यात गेल्या वर्षी जेमतेम पाऊस झाल्याने शेती उत्पादनात घट झाली होती. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने गेल्या वर्षीची उणीव भरून निघेल, अशी अपेक्षा होती. पेरण्यानंतर सुमारे अडीच महिने होत आले तरी पुरेसा पाऊस पडलेला नाही. तालुक्यातील काही भागात पेरण्या झाल्या नाहीत. पेरण्या झालेल्या भागात पिके वाळत आहेत. मोठा पाऊस झाला नसल्याने जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात होऊन सुद्धा पाणी साचलेले नाही, शेततळी-पाझर तलाव कोरडे आहेत. वाळूज जवळील टेंभापुरी प्रकल्पातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाइपलाइन करून शेतकऱ्यांनी शेती बागायती करण्याचे स्वप्न बघितले होते, ते पूर्ण होण्याची शक्यता नाही. हा प्रकल्प झाल्यापासून त्यात मुबलक पाणीसाठा झालेलाच नाही. शेतीला जोड धंदा असावा यासाठी खरेदी केलेल्या गायी, म्हशी व बैलांच्या चारा-पाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

शेतकऱ्यांना कर्जाची चिंता

गेल्या वर्षी भरघोस तूर उत्पादन झाले, पण १५-१५ दिवस नंबर न लागल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कमी भावात तूर विकली. गेल्या वर्षीचे कर्ज अद्यापही शेतकऱ्यांच्या माथी आहे. यंदाच्या कर्जाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावी पुरवणी परीक्षेच्या निकालाकडे परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण मंडळ जुलैमध्येच परीक्षा घेते, मात्र निकालाला विलंब झाला, तर पुढील प्रवेशाची शक्यता कमी होते याकडे मंडळाचे दुर्लक्ष आहे.

शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ जुलै ते एक ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १८ जुलै ते एक ऑगस्टदरम्यान घेण्यात आली. उत्तरपत्रिकांची तपासणी केंद्रीय पद्धतीने होते, तरीही निकालाच्या प्रक्रियेला विलंब लागतो. परीक्षा होऊन दहा दिवस उलटले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाची प्रातीक्षा आहे. पुढील आठवड्यात शासकीय सुट्या असल्याने निकालासाठी ऑगस्टचा चौथा आठवडा उजाडेल, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले. निकालाला उशीर झाल्यास पुढील प्रवेशाची संधी हुकेल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. विभागातून १३ हजार ३०९ विद्यार्थ्यांनी दहावीची, तर सात हजार २५१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.

केंद्रीय पद्धतीचाही उपयोग नाही..
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची महिनाभरात परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीचे काम केंद्रीय पद्धतीने होते. औरंगाबाद विभागातील उत्तरपत्रिका तपासणीचे काम पहिल्याच आठवड्यात पूर्ण झाले. असे असतानाही निकालाला विलंब लागतो. त्यामुळे परीक्षेचा हेतू साध्य होत नसल्याचे तज्‍ज्ञांना वाटते.

प्रवेशाची संधी हुकणार
दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अकरावीसह पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशाची संधी हुकण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. नेरळकर यांचा संगीतमय सन्मान

0
0

पं. नेरळकर यांचा संगीतमय सन्मान
शिष्यांकडून सन्मानपत्र अर्पण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांचे बहारदार गायन आणि रसिकांच्या उत्साहात पं. नाथराव नेरळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृहात सोमवारी सायंकाळी सन्मान सोहळा झाला. यावेळी शिष्यांनी गुरुजींना सन्मानपत्र अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. नाथराव नेरळकर यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त ‘नादब्रह्महोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंचावर विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, प्रसिद्ध कवी प्रा. फ. मुं. शिंदे, ज्येष्ठ गायिका आशालता करलगीकर आणि पं. विश्वनाथ ओक यांची प्रमुख उपस्थिती होती. संगीत क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या नेरळकर यांचा सत्कार केल्यानंतर मान्यवरांनी त्यांच्या गायकीचे पैलू सांगितले. तसेच शिष्यांनी गुरूजींना सन्मानपत्र अर्पण केले. दरम्यान, सत्कार सोहळ्यापूर्वी प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांचे शास्त्रीय गायन रंगले. सध्या पावसाने ओढ दिली आहे. पावसाची वाट बघण्याचे गहिरे भाव असलेला ‘राग मियाँ मल्हार’ कोमकली यांनी सादर केला. ‘कारे मेघा बरसत नाही’ ही रचना ‘बडा ख्याल’मधून सादर केली. दोन द्रुत बंदिशी सादर करून कोमकली यांनी संगीत मैफलीत रंग भरले. त्यांना तबल्यावर सागर पटोकार आणि हार्मोनिअमवर अभिषेक शिणकर यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमगार्डला द्या वर्षभर रोजगार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मानसेवी होमगार्डला उपजीविका भागविण्यासाठी वर्षभर रोजगार उपलब्ध करून देत किमान वेतन अधिनियमानुसार मानधन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (१४ ऑगस्ट) भारतीय कायदा व अधिकार परिषदेतर्फे विभागीय आयुक्तालयावर निदर्शने करण्यात आली.
विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, होमगार्ड स्वयंसेवकांना पुनर्नियुक्ती देण्याचे १३ जुलै २०१०चे परिपत्रक तत्काळ रद्द करावे, शासकीय-निमशासकीय आस्थापना, मंडळांवर बंदोबस्ता व्यतिरिक्त सुरक्षा पुरविण्यासाठी होमगार्डची नियुक्ती करून वर्षभर रोजगार द्यावा, जिल्हा समादेशकपदी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, कर्तव्य व कवायत भत्ता बंदोबस्त झाल्याच्या आठ दिवसांत खात्यावर जमा करावा, कामगार कल्याण मंडळात नोंदणी करून भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा, ५५ वर्षापर्यंत मानसेवी करण्याची परवानगी देऊन सेवानिवृत्त सदस्यास आर्थिक प्रोत्साहन एकहाती रक्कम देण्यात द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. या निवेदनावर मिर्झा जावेद बेग, असगर खान, संजय कुलकर्णी, शेख असलम शेख यासीन, उमेश सुरसुरवाले, सुरेश शर्मा यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images