Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

६७ किमी ड्रेनेज लाइन गायब!

$
0
0

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या कामातील घोटाळ्यावरून महापालिकेचे प्रशासन तोफेच्या तोंडी सापडलेले असताना आता या योजनेतील ६७ किलोमीटरच्या ड्रेनेज लाइन गायब असल्याचे प्रगती अहवालात समोर आले आहे. त्यामुळे ही ड्रेनेज लाइन गेली कुठे आणि त्यासाठी अपेक्षित आसलेल्या खर्चाचे काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मिडियम टाउन्स (यूआयडीएसएसएमटी) प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यासाठी केंद्र सरकारने एकूण खर्चाच्या ६० टक्के रक्कम देण्याचे मान्य केले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून २१९ कोटी ४१ लाख रुपये महापालिकेला मिळणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १४६ कोटी २७ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यांत ७३ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.

राज्य सरकार व महापालिकेने या योजनेसाठी एकूण खर्चाच्या प्रत्येकी २० टक्के रक्कम स्वतःचा हिस्सा म्हणून टाकणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्य शासनाने आतापर्यंत ५४ कोटी ८५ लाख रुपये महापालिकेला दिले आहेत. केंद्र सरकारने या योजनेसाठी ३६५ कोटी ६९ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली असली, तरी महापालिकेने केलेल्या टेंडर प्रक्रियेनंतर या योजनेची किंमत ४६४ कोटी रुपये झाली. ९८ कोटी ३१ लाख रुपयांचा फरक निर्माण झाला. या फरकासह भूमिगत गटार योजनेचे काम करण्यास महापालिकेने कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरुवात केली.

भूमिगत गटार योजनेचा प्रगतीचा अहवाल महापालिकेने १३ जुलै २०१७ रोजी शासनाला सादर केला. या अहवालाच्या पान क्रमांक तीनवर प्रकल्पात समाविष्ट असलेल्या प्रमुख बाबींचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील एकूण ५४४ किलोमीटर लांबीच्या विविध व्यासांच्या मलनिःसारण वाहिन्यांपैकी आवश्यकतेनुसार २७२ किलोमीटर पर्यंतच्या विविध व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्या बदलण्यात येणार आहेत, असे त्यात म्हटले आहे. याच प्रगती अहवालाच्या १६ क्रमांकाच्या पानावर, ‘२०५ किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्यांपैकी आतापर्यंत १०३.३५ किलोमीटर मलनिःसारण वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत,’ असे नमूद केले आहे. एकूण कामाच्या ५५.९७ टक्के काम पूर्ण झाल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

प्रगती अहवालाच्या पान क्रमांक तीनवर २७२ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइन बदलण्याचा उल्लेख असताना याच अहवालाच्या पान क्रमांक १६वर २०५ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइनपैकी १०३.३५ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळे ६७ किलोमीटर ड्रेनेज लाइनचा फरक निर्माण झाल्याचे लक्षात येते. ही ६७ किलोमीटरची ड्रेनेज लाइन कुठे गेली, त्यावर करण्यात आलेला खर्च नेमका कुठे करण्यात आला, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

भूमिगत गटार योजनेवर जुलैअखेर झालेला खर्च
काम.................................मंजूर खर्च.......झालेला खर्च
कलेक्शन सिस्टीम................२७७.२१...........११९.९७
एसटीपी बांधकाम................१५५.६९...........९९.२९
५ सेवरेज पंपिंग स्टेशन्स........२४.८५.............८.२३
गोलवाडी ते नक्षत्रवाडी काम..६.२५...............५.५६
एकूण................................४६४.००...........२३२.८०
(खर्च कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांस्कृतिक कार्यक्रमाने आणली रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन समूह गीत, नृत्य, नाटिका आदी सादर केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, विभागीय समाजकल्याण अधिकारी पी. बी. बच्छाव आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात जिजामाता कन्या विद्यालय, पार्थ विद्या मंदीर, सरस्वती भुवन प्रशाला, महाराष्ट पब्लिक स्कूल, शारदा मंदिर कन्या प्रशाला, संस्कार बालक मंदिर, तनवाणी विद्यालय, मोईल उल उलूम, शासकीय विद्यानिकेतन, गुजराथी कन्या विद्यालय, ज्ञानदीप विद्यालय या शाळांनी देशभक्तीपर समूह गीते, नृत्य, नाटिका आदी सादर केले. यावेळी डॉ. भापकर यांनी शब्दबद्ध केलेल्या लोकगीतांतून श्री खंडेराय कला मंगलम औरंगाबादेचे दिलीप खंडेराय यांनी नृत्य सादर केले.

स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या सर्व महात्म्यांचा आदर्श नवीन पीढीने घेऊन भारताचे भवितव्य उज्ज्वल करावे, असे आवाहन डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी ‌केले. समशेर पठाण यांनी सूत्रसंचलन केले. अनिल सकदेव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहभागी स्पर्धकांसाठी आजपासून ग्रुमिंग सेशन

$
0
0

सहभागी स्पर्धकांसाठी आजपासून ग्रुमिंग सेशन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र टाइम्स’ महिलांसाठी घेत असलेल्या ‘मटा मिसेस औरंगाबाद’ स्पर्धेला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असून या स्पर्धेमध्ये ७५हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या या सर्व महिलांसाठी आजपासून (१७ ऑगस्ट) दोन दिवसांचे ग्रुमिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे रेडिओ पार्टनर आहेत रेडिओ मिर्ची ९८.३, तर व्हेन्यू पार्टनर आहेत
हॉटेल मॅनोर.
औरंगाबाद शहरामध्ये प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत आहे. एकदा लग्न झाले की, बहुतेक महिलांच्या आवडीनिवडी या बदलतात. सासर आणि मुलांमध्ये त्यांच्यातील कलाही काही प्रमाणात त्या स्वतःहून बाजुला ठेवतात. मात्र, मनात कायम कुठेतरी असतेच, ‘माझ्यातील टॅलेंट दाखविण्याची संधी कुठेतरी मिळायला हवी’. महिलांच्या मनातील हीच भावना ओळखून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने विहाहित महिलांसाठी ही अनोखी सौंदर्य, बुद्धिमत्ता व कला यांची कसोटी पाहणारी ‘मटा मिसेस औरंगाबाद’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याला महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा हॉटेल मॅनोरमध्ये २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
स्पर्धेसाठीची महिलांची उत्सुकता वाढली असून अनेक महिलांनी या स्पर्धेत काय करावं लागेल, यासंदर्भात एखादे मार्गदर्शन सत्र व्हावे, अशी विचारणा केली होती. महिलांची मागणी लक्षात घेत ‘मटा’ने १७ व १८ ऑगस्ट असे दोन दिवस ग्रुमिंग सेशन आयोजित केले आहे. निराला बाजार येथील ‘ब्युटी वर्ल्ड’ येथे हे ग्रुमिंग सेशन दुपारी १२ ते ५ या वेळेत घेतले जाणार आहे. स्पर्धकांचे वेगवेगळे ग्रुप केले असून त्यांना वेळा दिल्या आहेत. दिलेल्या सूचनेनुसारच स्पर्धक महिलांनी ग्रुमिंगसाठी उपस्थ‌ित राहावे. कोरिओग्राफर चेतन पाटील आणि ब्युटी वर्ल्डच्या अंजली सामनगावकर या स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत.
रॅम्पवॉक कसा करायचा, रॅम्पवॉक करताना आपले हावभाव कसे असावेत, नृत्य करताना आवश्यक बाबी, अभिनय करताना कोणती काळजी घ्यावी, मेकअप कसा असावा, पेहराव, हेअर स्टाइल संदर्भात या ग्रुमिंग सेशनमध्ये स्पर्धकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘मटा’ने ‘मटा श्रावणक्वीन’ पाठोपाठ आता ‘मिसेस औरंगाबाद’ ही स्पर्धा आयोजित केल्याने महिलांमध्ये या उपक्रमांचीच सध्या चर्चा सुरू आहे. स्पर्धकाला चार राऊंडची परीक्षा द्यावी लागणार आहे. यात इंट्रोडक्शन राऊंड, रॅम्पवॉक, कोणताही एक कलाप्रकार तीन मिनिटांत सादर करणे व त्यानंतर प्रशोनत्तराचा राऊंड होईल.

सौंदर्य स्पर्धांमध्ये रॅम्पवॉक ही महत्त्वाची बाब आहे. रॅम्पवॉक कसा करायचा, त्यावेळी आपला अॅटीट्यूड कसा असायला हवा, पोश्चर कसे असावेत, डान्स करताना चेहऱ्यावरील हावभाव त्या त्या गाण्यानुसार कसे असावेत याकडे स्पर्धकांनी लक्ष द्यायला हवे. त्यावरच स्पर्धकांना मार्गदर्शन केले जाईल.
- चेतन पाटील, मार्गदर्शक
​ लग्न झाले की आपणच आपल्यातील कलागुण, आवडी बाजूला ठेवतो. कुणाला काय वाटेल, सासरी काय म्हणतील किंवा कुणी साथ देईल का, असे बरेच प्रश्न असतात, पण आपणहूनच आपल्या आवडी का सोडायच्या. मटा मिसेस औरंगाबाद अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये आपली आवड व टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. मला ही संधी सोडायची नाही.- स्वाती अंबेकर, सहभागी स्पर्धक
मेकअप कसा असायला हवा, हेअर स्टाइल कशी असावी याबाबत आम्ही महिलांना मार्गदर्शन करू. रंगमंचावर येताच आपली छाप कशी पडेल याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवे. आत्मविश्वासाने रॅम्पवर कसे उभे रहावे हे सांगितले जाईल.
- अंजली सामनगावकर, संचालिका ब्युटी वर्ल्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्याभरात ३४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खरीप पिकांची धूळधाण व कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, सहा ते १३ ऑगस्ट या आठवड्याभरात तब्बल ३४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही विभागात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची सख्या १२१पर्यंत पोचली आहे.

आठवडाभरात झालेल्या आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये सर्वाधिक आठ आत्महत्या बीड जिल्ह्यातील असून, औरंगाबाद जिल्ह्यात दोन, जालना सहा, परभणी चार, हिंगोली एक, नांदेड पाच, लातूर चार, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एका आठवड्यात चार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जून महिन्यांपासून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलने केली. सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर रान पेटवले. काही दिवसांत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत कर्जमाफीची घोषणा केली, तरीही मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी २५ जून रोजी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही आतापर्यंत जुलै महिन्यात ७७, तर ऑगस्ट महिन्यात ४४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

मराठवाड्यात यंदाही दुष्काळी स्थिती असून, आतापर्यंत पावसाच्या ७७पैकी केवळ २९ दिवस पाऊस झाला असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. कर्जमाफीची घोषणा झाली असली, तरी शेतकऱ्यांचे सातबारे मात्र अद्यापही कोरे झाले नाही. आता परभणी, बीड, लातूर, जालना, हिंगोली; तसेच उस्मानाबाद, नांदेड व औरंगाबादच्या काही भागांमध्ये खरिपाची पिके जळाली आहेत.

पैठण तालुक्यात साडेतीन हेक्टरची धुळधाण
औरंगाबाद जिल्ह्याती पैठण तालुक्यात सर्वाधिक साडेतीन हजार हेक्टवरील पिकांची धूळधाण झाली असून, या क्षेत्रावरील पिके मोडण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

अहवाल शासनाकडे पाठवला
मराठवाड्याच्या परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, विभागातील काही तालुक्यात परिस्थिती गंभीर आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, प्रत्येक जिल्ह्यांकडून टंचाई सदृष्य परिस्थितीचा दररोज आढावा घेणे सुरू आहे. पावसाच्या या सर्व परिस्थितीचा अहवाल शासनाकडेही पाठवला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसाने बराच फरक पडला अाहे. चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून आहेत, मात्र मुरमाड, हलक्या जमिनीवरील पिके वाया गेली आहेत. मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात येत्या १९ ऑगस्टपासुन दमदार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे येत्या काही दिवसात परिस्थिती निश्चित बदलेल, परतीचा पाऊस चांगला झाला तर पिण्याचा पाण्याला तसेच रबी पीकांसाठी त्याचा उपयोग होईल, असेही डॉ. भापकर यांनी सांगितले.

- आठ दिवसातील आत्महत्या ः ३४
- कर्जमाफीच्या घोषणेनंतर आत्महत्या ः १२१
- एक जानेवारीपासून ः ५८०
- ५० टक्‍क्यांपेक्षा कमी पाऊस ः १३२ मंडळे
- ५० ते ७५ टक्के पाऊस ः १८२ मंडळे
- ७५ टक्‍क्यांपेक्षा अधिक ः १०७ मंडळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे चिंतेचे ढग आहेत. शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या या अडचणीच्या परिस्थितीत सरकार त्यांच्या पाठीशी उभे असून, सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आपणास स्वतंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. मोठा संघर्ष करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर आक्रमण झाले, तर आपण आपण सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन ‘हम सब एक है’ हे जगाला दाखवून देऊ, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मराठवाड्याच्या पावसाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत संकटप्रसंगी सर्वांना एकत्र लढण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना त्यांनी आई भवानीकडे केली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस विभागात विशेष कामगिरी करणारे, राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस अधिकारी, ग्रामपंचायती, गुणवंत विद्यार्थी यांना गौरवण्यात आले. यामध्ये पोलिस आयुक्त कार्यालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांना उत्कृष्ट गुन्हे तपासाबद्दल, तर उपायुक्त राज्य गुप्तचर वार्ता विभागाचे गुप्त वार्ता अधिकारी रघुनाथ फुके यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरवण्यात आले. तसेच सिटीचौक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुत्तुल यांना विशेष सेवा पदक देण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक तसेच मान्यवरांना भेटून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, महापौर भगवान घडमोडे, एम. एम. शेख यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरीक शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामपंचायतींना पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१६-१७अंतर्गत विभागीय स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रसंत ‌तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता पुरस्कार धामणगाव (जि. लातूर) या ग्रामपंचायतीला दहा लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. शेळगाव गौरी (जि. नांदेड) व पिंपराळा (जि. हिंगोली) या ग्रामपंचायतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आला. वसंतराव नाईक पुरस्कारामध्ये (पिण्याचे पाणी व सांडपाणी) खासगाव (जि. जालना) या ग्रामपंचायतीला, स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (कुटुंब नियोजन) पोखरी (जि. औरंगाबाद) या ग्रामपंचायतीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) आलियाबाद (जि. उस्मानाबाद) या ग्रामपंचायतींना गौरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालकमंत्री गो बॅक’च्या घोषणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाला आंदोलनाचे गालबोट लागले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

‘पालकमंत्री गो बॅक’, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’, ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन लागू करा’, ‘स्वामीनाथन आयोग लागू करा,’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करू नका, शेतकरी किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन करा या मागणीसाठी डाव्या; तसेच समविचारी पक्षांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. शहागंज येथील महात्मा गांधी पुतळा येथून आयुक्त कार्यालयापर्यंत आंदोलक घोषणा देत आले होते. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वराज अभियान, लाल निशाण लेनिनवादी आदी संघटनांचा सहभाग होता. या आंदोलनात आंदोलनात मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, बुद्धीनाथ बराळ, मेजर सुखदेव बन, अजमल खान, पंडित मुंडे, भीमराव बनसोड, सांडू जाधव, भगवान भोजने, अभय टाकसाळ, याच्यासह रऊफ पटेल, सुधाकर शिंदे, डॉ. कल्याण जाधव, संजय चव्हाण, रामचंद्र पिल्दे, शिवाजी गाडे, मोहिद देशमुख, विलास इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग सुट्ट्यांमुळे बँकांची कामे तुंबली

$
0
0

सलग सुट्ट्यांमुळे बँकांची कामे तुंबली
कोट्यवधीच्या धनादेशांसह रोख व्यवहार ठप्प
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बँकांना आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे बँकांची कामे तुंबली असून कोट्यवधींच्या धनादेशांसह रोख व्यवहार ठप्प झाले आहेत.
गेल्या आठवड्यापासून सातत्याने सुट्या आल्या आहेत. गुरुवारीही पतेतीची बँकांना सुटी आहे. १२ ऑगस्टला दुसरा शनिवार, १३ ऑगस्टला रविवार, (काही बँकांना सुटी), १५ ऑगस्टला स्वातंत्र दिन अशा सुट्या आलेल्या होत्या. या दरम्यान बँकांमध्ये धनादेश वटणे, आर्थिक व्यवहार थांबणे, रोख व्यवहार न होणे अशी कामे झाली नाहीत. या कामांचा ताण बुधवारी १६ ऑगस्टला विविध बँकांच्या कर्मचारी वर्गावर पडला. काही राष्ट्रीयकृत बँकांच्या सूत्रांनुसार या चारपाच दिवसांत किमान १०० कोटींची चेक्स वटले नाहीत, काहींचे इएमआय जे नेटबँकिंगद्वारे जाणार होते तेही एक दिवस उशिरा गेले. या‌शिवाय रोख व्यवहारही झाले नाहीत. बुधवारी १६ ऑगस्टला किमान काही एटीएम सुरू झाल्याने दिलासा मिळाला होता.
काही ठिकाणी लिंक डाऊन
बँकांना सलग सुट्ट्या आल्या की, खाजगी एटीएम काही तासातच बंद करावे लागतात. अशावेळी राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएमकडे लोक धाव घेतात. मात्र, १३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएमची लिंक डाऊन असल्याने पैसे काढण्यास अडचण निर्माण झाली होती.
आऊट ऑफ सर्विस
तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये पैसे टाकण्यात आले नाही. शनिवारी (१२ ऑगस्ट) टाकलेले पैसे संपताच एटीएमसमोर ‘आऊट ऑफ सर्विस, अशी सूचना लावण्यात आल्याचे रांगेतील एकाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात थर लावून फोडली दहीहंडी

$
0
0


औरंगाबादः भारतीय जनता युवा मोर्चाच्या संस्कृती दहीहंडी उत्सवात मंगळवारी सिडको वैद्यनाथ बँक चौकातील दहीहंडी सात थर लावून बेगमपुऱ्याच्या राजे संभाजी पथकाने फोडली. या पथकाला ७७ हजारांचे पहिले बक्षीस मिळाले.
सिडकोतील दहीहंडी उत्सवात दहाच्यावर गोविंदा पथकांनी सहभाग नोंदविला. यात साई दयावान प्रतिष्ठान, मांगिरबाबा भक्त पथक, किलेअर्क पथक, बालकन्हैय्या पथकासह अन्य पथकांचा समावेश होता.
रात्री दहाच्या सुमारास राजे संभाजी गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यास सुरुवात केली. अत्यंत शिस्त बद्ध पद्धतीने बेगमपुऱ्याच्या गोविंदा पथकाने सात थर लावले. सात थरात ही दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उदघाटन सोहळ्याच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार किशनचंद तनवाणी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाजप युवा मोर्चा शहरजिल्हा अध्यक्ष सचिन झवेरी, सिडको पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थित राहणार आहेत. दहीहंडीचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस मयूर वंजारी यांनी केले होते. दहीहंडीच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती अध्यक्ष अविनाश पवार, संयोजक मयूर विधाते, सचिन अमोलिक, अनिस शेख, सौरव तोतरे यांनी परिश्रम घेतले.

संस्कृती दहीहंडी उत्सव समितीच्या माध्यमातून पहिला उत्सव या वर्षी साजरा करण्यात आला. गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली. आगामी वर्षात या दहीहंडीचे स्वरूप आणि बक्षीस वाढविण्यात येईल. - मयूर वंजारी, संयोजक, संस्कृती दहीहंडी उत्सव समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ...ढगाच्या आडून चंद्र हसला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोविंदा आला रे आला म्हणत मंगळवारी सायंकाळी औरंगाबादकरांनी दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला. गुलमंडी, औरंगपुरा, टी.व्ही. सेंटर, कॅनाट प्लेस आदी ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकांनी काळजाचा ठोका चुकवणारे थर रचत दहीहंडी फोडल्या.

यंदाहायकोर्टाने थरांची बंधने शिथिल केली होती. त्यामुळे गोविंदा पथकात मोठ्या प्रमाणावर जल्लोष दिसून आला. राजाबाजार मित्र मंडळ, दयावान गोविंदा पथक, भवानीनगर गोविंदा पथक, शिवछत्रपती गोविंदा पथक, वीर बलराम गोविंदा पथक, पावन गोविंदा पथक, शिवशक्ती गोविंदा पथक, जय भद्रा गोविंदा पथक, जय भोले क्रीडा मंडळ, रणयोध्दा क्रीडा मंडळ आदी प‌थकांचा दहीहंडी फोडणाऱ्यामध्ये समावेश होता.

शहरातील सर्वच दहीहंडी आयोजकांनी डीजेची सोय केली होती. सायंकाळपासून सर्वच दहीहंडीच्या ठिकाणी तरुणांची गर्दी वाढली. गोविंदा पथकांच्या थर लावण्याच्या मधल्या वेळेत डीजेवर सुरू असलेल्या गीतावर तरुणांनी ठेका धरीत नृत्य केले. गोविंदा पथकांनी सलामी देत विविध ठिकाणी सहा ते सात थर लावले. यावेळी गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, गार्ड, बेल्ट, मॅटची सोय करण्यात आली होती.

थरांचा थरथराट
गुलमंडी येथील देवकीनंदन दहीहंडी राजाबाजार मित्र मंडळ व जय भद्रा मंडळ यांनी संयुक्तपणे फोडली. तसेच बाराभाई ताजीया चौकातील गोपाळा दहीहंडी धावनी मोहल्ला येथील शिवशक्ती क्रीडा मंडळाने सहा थर लावून फोडली. औरंगपुरा महात्मा फुले चौकातील अश्वमेध क्रीडा मंडळाची दहीहंडी जय राणा पथकाने फोडली. कॅनाट प्लेस येथील स्वाभिमान दहीहंडी भवानीनगर येथील गोविंदा पथकाने फोडली. टी.व्ही. सेंटर येथील वंदे मातरम दहीहंडी दयावान गोविंदा प‌थकाने सहा थर लावत फोडली. टी.व्ही. सेंटर येथीलच धर्मरक्षक दहीहंडीमध्ये दोन मंडळामध्ये वाद झाल्याने या दहीहंडीला गालबोट लागले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटवला. शेवटी पोलिसांनी दहीहंडी खाली उतरवून काठीने फोडली.

सिनेकलावंत आकर्षण
औरंगपुरा येथील अश्वमेध क्रीडा मंडळाच्या वतीने महात्मा फुले चौकात माजी नगरसेवक अनिल मकरिये व विशाल पांडे यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीमध्ये ‘का रे दुरावा फेम’ कलावंत सुरूची आढारकर हिने उपस्थिती लावली. बजरंग चौकात पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी नमो दहीहंडीचे आयोजन केले होते. या ठिकाणी देखील सुरूचीने हजेरी लावली. यावेळी सुरूचीला पाहण्यासाठी पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नगराध्यक्षपद निकाल दोन महिन्यांनी लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूरच्या नगराध्यक्षपदावरुन सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे पद सर्वसाधारण महिलेसाठी ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाने (औरंगाबाद खंडपीठ) दिल्यानंतर त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी देण्यात आला.

ऑक्टोबरमध्ये मुंबई येथे झालेल्या राज्यातील नगराध्यपदाच्या सोडतीत वैजापूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्याचे जाहीर झाले. त्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने यात बदल करून नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी करण्याचा निर्णय घेतला व तशी नोंद निवडणूक विभागाच्या राजपत्रात करण्यात आली. वैजापूरचे नगराध्यक्षपद हे गेल्या पाच वर्षांपासून महिलेच्या ताब्यात असल्याने शासनाने यात बदल करून सर्वसाधारण गटाला नगराध्यक्षपदाची संधी दिली होती, परंतु शासनाच्या या निर्णयाला तत्कालीन नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी औरंडाबाद खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी होऊन कोर्टाने सोडतीत जाहीर झालेला सर्वसाधारण महिलेचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. या निर्णयाला रवी पगारे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून आतापर्यंत या याचिकेवर अनेक सुनावण्या झाल्या आहेत.

नगरपालिका निवडणूक लांबली
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी की फक्त सर्वसाधारण गटासाठी याबाबतच्या निर्णयायासाठी अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल. परिणामी नगरपालिकेची निवडणूकही आणखी लांबणीवर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...तर मंत्र्यांना फिरू देणार नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
‘मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना सरकार मूग गिळून गप्प आहे. यावर बोलायला आमदार, खासदार तयार नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. सरकारने या भागातील पंचनामे सुरू करून तात्काळ मदत केली नाही, तर एकाही मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी संपूर्ण कर्जमुक्ती शेतकरी मेळाव्यात दिला.

शेट्टी म्हणाले, ‘सध्या शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी सरकारच्या चुकीच्या धोरणाने तो आर्थिक विवंचनेत अडकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेले पीक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कवडीमोल भावाने विकाव लागत असेल, तर त्याच्यावर कर्ज होणे ही शेतकऱ्यांची चूक नसून तर ती सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने सातबारा कोरा करावा. त्यासाठी कोणतेही निकष लावू नये. अन्यथा शेतकरी ह्या सरकारला कोणतेही निकष न लावता घरी पाठवल्या शिवाय राहणार नाही,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोफळे, माणिक कदम, गजानन बंगाळे, घनश्याम चोधरी, मुक्तराम गव्हाणे, मारोती वराडे, सुनील सनान्से आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

सात दिवसांचा अल्टिमेटम
सध्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीवर सरकार गंभीर नाही. हे त्यांच्या वागण्यावरून दिसून येत आहे. येत्या सात दिवसांत दुष्काळी भागात पंचनामे करून त्यांना मदत दिली नाही, तर कोणत्याच मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृह अनुदान; झेडपी अधिकाऱ्यांची चौकशी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अनुदान देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी टाळाटाळ करत असल्याची तक्रार संस्थाचालकांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याची दखल घेऊन अतिरिक्त सीईओ आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे आदेश सहसचिवांनी समाजकल्याण आयुक्त तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह चालविणाऱ्या संस्थांना नियमानुसार अनुदान देणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा परिषदेत अनुदान देण्यास टाळाटाळ केली जाते, संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना झेडपी अधिकाऱ्यांकडून उद्धटपणाची वागणूक दिली जाते, अशी तक्रार संस्थाचालकांनी केली होती. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ५५ वसतिगृहे कार्यरत आहेत. ही वसतिगृहे चांगल्या पद्धतीने चालविण्यात येत असल्याचा दावा संस्थाचालक करतात. पण वसतिगृहे चालवित असताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी, लेखाधिकारी काकडे, कार्यालयातील लिपिक, कर्मचारी हे संस्थाचालक व वसतिगृह कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देतात. अनुदानाच्या बाबतीत सतत टाळाटाळ करत असल्याची तक्रार दोन ऑगस्ट रोजी अनुदानित वसतिगृह संस्था चालक संघाचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे, सचिव भीमराव हत्तीअंबीरे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. विद्यार्थ्यांना मिळत असलेली परिपोषण आहाराची रक्कम शासन आदेशाप्रमाणे जून महिन्यात ६० व जानेवारीमध्ये ४० टक्के हे अनुदान वेळेवर न देणे, पैसे घेतल्याशिवाय मंजूर न करणे, वसतिगृहात कार्यरत कर्मचाऱ्यांना चार चार महिने मानधन न देणे, वसतिगृहांची प्रत्यक्ष तपासणी न करणे, खाजगी संस्थेच्या वसतिगृहांना इमारत भाडे वेळेवर न देणे, वसतिगृहातील वीज, पाणी पुरवठा, स्वस्त धान्य पुरवठा आणि इंधन यासाठी नियमित लागणारी देयके वेळेवर देण्यास टाळाटाळ करणे आदी आरोप करण्यात आले होते. २०१६-१७ ची देयके जाणीवपूर्वक दिली गेली नाहीत, असे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेऊन सहसचिव ज्ञा. ल. सूळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मडावी यांचा कार्यभार शेळकेंकडे
दरम्यान ११ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव सि. अ. झाल्टे यांनी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रभारी समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांचा कार्यभार सहायक आयुक्त एस. एस. शेळके यांच्याकडे देण्यासंदर्भात आदेशित केले आहे.

वसतिगृह कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून थकलेले मानधन नुकतेच बँकेत जमा करण्यात आले. निवडक संस्थाचालकांचे प्रस्ताव मुदतीच्या आत येतात, त्यामुळे पुढील प्रक्रियेला विलंब होतो. अनुदानाचा प्रश्न प्रलंबित आहे. वसतिगृहांची नियमित तपासणी केली जाईल. - डॉ. सचिन मडावी, प्रभारी समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...आम्हीही ‘सोच’ बदलणार!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘टॉयलेट - एक प्रेम कथा’ हा चित्रपट बघून हजारावर नागरिकांनी आपली ‘सोच’ बदलण्याचा निर्धार केला. आपल्या गावात, घरात शौचालय बांधण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारला करावा लागलेला संघर्ष, प्रसंगी पत्नीला घटस्फोट देण्याची त्याने केलेली मानसिक तयारी व त्यातून घरातील सदस्यांसह गावकऱ्यांची बदललेली मानसिकता शहरातील उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांच्या मनाचे परिवर्तन करू शकेल आणि याच शक्यतेतून नागरिकांची शौचालयासाठीची ‘सोच’ बदलण्याचा निर्धार बुधवारी केला.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात शौचालय बांधण्याची घोषणा केली. त्यासाठी शासनातर्फे बारा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. घराघरात शौचालय बांधून घेण्याची जबाबदारी शहरीभागात महापालिकेवर टाकण्यात आली. औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या विश्रांतीनगर वॉर्डात उघड्यावर बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या वॉर्डातील नागरिकांनी स्वतःच्या घरात शौचालय बांधून घ्यावे यासाठी महापालिकेने सतत पाठपुरावा केला, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या वॉर्डातील नागरिकांना वैयक्तिक शौचालयाचे महत्व लक्षात यावे यासाठी वॉर्डाचे नगरसेवक व महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी वॉर्डातील तब्बल एक हजार स्त्री - पुरुषांना बुधवारी पीव्हीआर टॉकीजमध्ये ‘टॉयलेट - एक प्रेम कथा’ हा चित्रपट दाखवला. यासाठी राठोड यांनी तीन शो बुक केले होते. वॉर्डातील नागरिकांसह बीड बायपास रस्त्यावरील भगवानबाबा बालिकाश्रमच्या शंभरावर मुलींना देखील राठोड यांनी हा चित्रपट दाखवला.

घरात शौचालय बांधण्यास विरोध करणारा घरातील कर्ता पुरूष, गावाची ग्रामपंचायत आणि सरपंच यांचा विरोध मोडून काढून घरातच नव्हे तर संपूर्ण गावात शौचालयाची योजना आणणारा चित्रपटाच्या नायकाने चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या स्त्री - परूषांच्या मनात घर केले. शौचालयासाठी पत्नीला घटस्फोट देण्याची त्या नायकाची असलेली तयारी व नायकाच्या पत्नीने देखील त्यासाठी नायकाला दिलेला प्रतिसाद, त्यातून हाललेली शासकीय यंत्रणा, गावकरी - सरपंचांसह घरातील व्यक्तींचे शौचालयाच्या बांधकामासाठी झालेले मन परिवर्तन विश्रांतीनगर वॉर्डातील नागरिकांचे देखील मन परिवर्तन करण्यास सहाय्यभूत ठरण्याची शक्यता आहे.

‘टॉयलेट’ चित्रपटात नायकाला शौचालयासाठी किती संघर्ष करावा लागला हे पाहिल्यावर आपल्याही घरात शौचालय असलेच पाहिजे याची मनोमन खात्री पटली. विश्रांतीनगरात पाणीपुरवठ्याची समस्या आहे. घरात संडास-बाथरूम असले तरी पाण्याची व्यवस्था नाही. ती झाली तर आम्ही संडास - बाथरूमचा वापर करू. - शोभा मोरे, नागरिक, विश्रांतीनगर

चित्रपट खूप छान आहे. प्रत्येकाच्या घरात संडास-बाथरूम असलेच पाहिजे. घरात संडास नसल्यामुळे प्रामुख्याने महिलांना त्रास होतो, त्याचा अनुभव वॉर्डातील अनेक महिलांना आहे. विश्रांतीनगरला टँकरने पाणीपुरवठा होतो, हा पाणीपुरवठा फारच मर्यादित असतो. पाणीपुरवठ्यात वाढ केली तर शौचालयाचा वापर वाढेल. - मीना काथार, नागरिक, विश्रांतीनगर

चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकाच्या घरात शौचालय असले पाहिजे याचे महत्त्व पटले. आमच्या घरात टॉयलेट आहे, पण पाणी नाही. बोअरला देखील पाणी नाही. पाणी नसल्यामुळे पुरुष बाहेर जातात. महिला मात्र घरातील टॉयलेट वापरतात, पण घरातील टॉयलेटचे प्रमाण वाढले पाहिजे. यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. - कृष्णा शिनगारे, मुकंदवाडी, रेल्वेस्टेशन परिसर

चित्रपट पाहण्यासाठी मी सहकुटुंब आलो आहे. आमच्या घरी टॉयलेट आहे. ज्यांच्या घरी ते नाही त्यांनी ते बांधून घ्यावे असे सांगण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे, कारण देशाच्या स्वच्छतेसह वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व देखील खूप आहे. चित्रपट पाहून हे महत्त्व अधोरेखीत झाले. - बाळासाहेब गवळी, जयभवानीनगर

विश्रांतीनगर वॉर्ड रेल्वेरुळाला लागून आहे. या वॉर्डातील बहुतांश घरांमध्ये शौचालय नाही. नागरिकांनी शौचालय बांधून घ्यावे यासाठी पालिका प्रशासनासह आम्ही प्रयत्न केले. २५० पेक्षा जास्त घरांमध्ये शौचालय बांधले. उर्वरित घरात शौचालय बांधून घेण्याची प्रेरणा हा चित्रपट पाहिल्यावर नागरिकांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने हा चित्रपट दाखवला. या भागात टँकरच्या खेपा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. - प्रमोद राठोड, नगरसेवक, विश्रांतीनगर वॉर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नांदेडच्या १३ नगरसेवकांचा भाजप प्रवेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड वाघाळा महापालिकेतील काँग्रेसचे ५ शिवसेनेचे ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ अशा एकूण १३ नगरसेवकांनी बुधवारी (दि.१६) दादर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात जाऊन प्रवेश केला. पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या भाजप प्रवेशाला महत्व देण्यात येत आहे.
काँग्रेसचे नवल ओमप्रकाश पोकर्णा, सरजितसिंघ गील, किशोर यादव, अन्नपुर्णा ठाकूर, स्नेहा पांढरे, शिवसेनेचे दीपकसिंह रावत, विनय गुर्रम, वैशाली मिलींद देशमुख, ज्योती महेंद्र खेडकर, सुदर्शना खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. संदीप पाटील-चिखलीकर, श्रद्धा चव्हाण, इंदूताई घोगरे यांचा समावेश आहे. शिवसेनेचे जिल्हा प्र्रमुख मिलींद देशमुख, महापालिकेचे शिवसेनेचे माजी विरोधी पक्ष नेते बाळू खोमणे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पक्षाचे केंद्रीय सहसंघटक व्ही. सतिश, राज्यमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे महानगराध्य संतुक हंबर्डे, शामसुंद शिंदे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संजय कौडगे, प्रवीण साले, डॉ. अजित गोपछडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य देशमुख, व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आदींची यावेळी उपस्थिती होती.

खतगावकरांची भेट
विविध राजकीय पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यापैकी काही जणांनी बॉम्बे हॉस्पीटलमध्ये जावून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील- खतगावकर यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. नांदेड दक्षिणचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, त्यांचे पूत्र नवल पोकर्णा, किशोर यादव आदींचा त्यात समावेश होता.
..........................
भूमच्या नगराध्यक्षासह १४ नगरसेवक भाजपमध्ये
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
भूम तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गाढवे, भूमच्या नगराध्यक्षा संयोजीता गाढवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवक आणि ८ सरपंच यांनी दादर (मुंबई) येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम नगरपालिकेवर आता भाजपचा झेंडा फडकला आहे.
दादर (मुंबई) येथील भाजपच्या कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यसह उस्मानाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्ट अधिकारी सेवेत नको

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘निलंबित भ्रष्ट अधिकाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत पुन्हा घेऊ नका,’ असे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी आयुक्तांना दिले. ‘समांतर’मध्ये मोठा घोळ झालेला आहे, घोळ करणारे पुन्हा सेवेत कशासाठी,’ असा सवाल त्यांनी केला.

विशेष रस्ते अनुदानातून मोंढा नाका, तानाजी चौक ते गुरुद्वारा कमान या रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगच्या कामासह वॉर्ड क्रमांक ७५मधील विविध विकास कामांचे लोकार्पण कदम यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या कार्यक्रमानंतर मयूरबन कॉलनी वॉर्डात पोदार स्कूल ते पृथ्वीराज नगर रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगच्या कामाचा शुभारंभ देखील कदम यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर भगवान घडमोडे होते. खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर स्मिता घोगरे, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर व अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

कदम यांनी पालिकेतील निलंबित अधिकाऱ्यांचा विशेष उल्लेख आपल्या भाषणात केला. या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेऊ नका असे आदेश आयुक्तांना देतानाच पाण्यावरून राजकारण करण्याची काहीच गरज नाही, असे म्हणत त्यांनी ‘समांतर’ च्या आश्रयदात्यांना देखील फटकारले. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर झाल्यावर काही जणांनी पोस्टरबाजी केली, असा उल्लेख खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात केला होता. हाच संदर्भ पकडून कदम म्हणाले, होर्डिंग लावले तर लाऊ द्या, शेवटी निधी सरकारचाच आहे आणि तो मी आणला आहे. कुणीही आपल्या खिशातून पैसा दिलेला नाही. जेव्हापासून मी पालकमंत्री झालो तेव्हापासून महापालिकेचे प्रत्येक काम मी करीत आहे, असे सांगताना पालकमंत्री म्हणाले, शहरातील रस्त्यांसाठी यापूर्वी निधी आणून दिला. शहरात स्वच्छता मोहीम राबवून नऊ टन कचरा गोळा केला आहे. महापालिका शासनाच्या पैशावर जगत आहे, वसुलीचे प्रमाण फक्त तीस टक्के आहे. वसुली वाढवा आणि विकास कामे करा, असे त्यांनी आयुक्त व पदाधिकाऱ्यांना सांगितले.

आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला
खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘महापौर भगवान घडमोडे एकेकाळी शिवसेनेचे शाखा प्रमुख होते. सभापती गजानन बारवाल देखील शिवसेनेत होते. ही मंडळी आपल्यापासून दूर गेली असली, तरी ती आपल्यात परत येणार आहे, असा उल्लेख त्यांनी केला. खैरे यांच्या भाषणाचा संदर्भ देत पालकमंत्री रामदास कदम खैरे यांना उद्देशून म्हणाले, ‘हे सर्वजण आपल्यापासून का दूर गेले, याचे आत्मपरिक्षण करा. काम करताना काही चुका झाल्या का याचाही विचार झाला पाहिजे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात

$
0
0

मटा, औरंगाबाद

सर्वत्र भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सत्तरावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सर्वत्र जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

७४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी
उस्मानाबाद - शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकाने यावर्षी सर्वात मोठी कर्जमाफी योजना अंमलात आणली आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७४ हजार ४२० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. तसेच प्रोत्साहनपर योजनेंतर्गत ८६ हजार ४३३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या ध्वजारोहण सोहळयास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदचे मख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

‘विकासात प्रत्येकाचे योगदान’
परभणी - परभणी जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. लोकप्रतिनिधी प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याच्या विकास अधिक वेगाने शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करून झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील संदेशपर भाषणात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, पोलिस अधिक्षक दिलीप झळके, तसेच खासदार संजय जाधव, आमदार मोहन फड, आमदार राहुल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला राठोड, उपाध्यक्षा भावना नखाते आदि मान्यवर उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर महसूल, क्रीडा, शिक्षण, पोलिस आणि कारागृह विभागांतर्गत विविध पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या डिजीटल चित्ररथालाही पालकमंत्री पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
......................
‘हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करा’
जालना - संपुर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छता विभागामार्फत यशस्वीरित्या प्रयत्न करण्यात येत असून राज्यात आजपर्यंत ११ जिल्हे, १५७ तालुके आणि १७ हजार ७०० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. जालना जिल्ह्यातील चार तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. येणाऱ्या काळात संपूर्ण जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, रामेश्वर भांदरगे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजु नंदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती होती.
....................
‘उदय योजना वंचितांसाठी वरदान’
नांदेड : भटक्या जमातीतील वंचितांचे स्थलांतर रोखणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची वंचितांसाठी ‘उदय’ योजना वरदान ठरेल, असा विश्वास राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम पार पडला.
या समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातुरमध्ये गुणवं‌तांचा सत्कार
म. टा. प्रतिनिधी, लातूर
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सत्तराव्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थी तसेच पोलिस विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड, माजी खासदार रुपा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपमहापौर देविदास काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य), सुनील यादव, यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘टीसी’च्या नोकरीचे आमीष; अनेकांना लाखोंचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वेतील ‘टीसी’ची नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (१६ ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, शनिवारपर्यंत (१९ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. के. कुरंदळे यांनी दिले. या प्रकरणी वेगवेगळ्या भागातील १२ पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणी बेरोजगार तरुण सज्जन हिराचंद घुसिंगे (२४, रा. गोकुळवाडी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, रेल्वे विभागामध्ये ‘टीसी’ची नोकरी लावण्याचे आमीष दाखवून फिर्यादीकडून आरोपी अमोल मधुकर गांगुर्डे (३५, रा. दिग्वत, ता. चांदवड, ता. नाशिक), आरोपी आनंद कचरू वानखेडे (२६, रा. पाथरशेंबे, ता. चांदवड) आणि आरोपी व मुख्य सूत्रधार मनोजदादा जगताप (३२, रा. बांभर्डी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दहा लाख रुपये घेऊन रेल्वे विभागाचे बनावट शिक्के असलेले बनावट नियुक्तपत्र फिर्यादीला दिले होते. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दौलताबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी आनंद वानखेडे याला १८ ऑक्टोबर २०१६ रोजी अटक करण्यात आली होती, तर आरोपी अमोल गांगुर्डे याला १० ऑगस्ट २०१७ रोजी अटक करण्यात येऊन १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी आरोपी मनोजदादा जगताप याला बुधवारी बारामतीमधून अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून रक्कम जप्त करणे बाकी आहे, तसेच आरोपींनी रेल्वेचे बनावट शिक्के, बनावट नियुक्तीपत्र कुठून व कोणाकडून आणले, या गुन्ह्यामध्ये रेल्वेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का आदींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले.

साखळी पद्धतीने गुन्हे
या प्रकरणात आरोपींनी चांदवड, नांदेडसह राज्यातील सहा शहरांमध्ये वेगवेगळ्या किमान १२ बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत साखळी पद्धतीने हे गुन्हे झाल्याचे पोलिसांनी सांगिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरे लग्न करून युवकाची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
पती, भोंदू बाबाच्या मदतीने विवाहित महिलेने दुसरे युवकासोबत दुसरे लग्न करून त्याची फसवणूक केली. त्यासाठी भोंदू बाबाने युवकाच्या वडीलांकडून एक लाख ६० हजार रुपये उकळले. विवाहित महिलेने लग्नानंतर रात्रीच दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी विवाहित महिला व तिचा पती आणि भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या.

कंडारी (ता. बदनापूर) येथील काकाजी यमाजी खाडे उर्फ खाडे महाराज या भोंदू बाबांनी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. राळाहिवरा (ता. बदनापूर) येथील गणेश कुलकर्णी औरंगाबादच्या सातारा परिसरात चालक आहे. गणेशचे लग्न जुळवून देतो असे सांगून खाडे बाबाने जवळीक साधली. नाशिकमध्ये एक अनाथ मुलगी आहे. तिला आई नाही. वडील व्यसनी असून भावाने सांभाळ केला आहे. लग्न खर्च तुम्हाला करावा लागेल असे सांगून खाडेनी त्यांना क्षितीजा नावाची मुलगी दाखवली. दोन्ही बाजूंनी पसंती येताच आणि मुलीच्या भावाला काही खर्चाला द्या अन मला खर्च आला आहे असे सांगून एक लाख आठ हजार रोख रक्कम मुलाकडून उकळली.
५ ऑगस्ट रोजी कंडारी (ता. बदनापूर) येथील श्री कृष्ण मंदिरात त्या विवाहित महिलेने दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे त्या युवतीचा नवरा संजय हा या लग्नावेळी तिचा भाऊ झाला. त्याने या लग्नाचा साक्षीदार असल्याचे शंभर रुपयांच्या बॉन्डपेपरवर त्या विवाहित महिला, भोंदूबाबासह खोटे शपथपत्र लिहून दिले.
दरम्यान, लग्न करून युवती औरंगाबादला सातारा परिसरात आली. त्या रात्रीच दीड वाजता घराच्या पहिल्या मजल्यावरून सिनेस्टाइलमध्ये गॅलरीत साड्याचा दोर बांधून खाली उतरून पोबारा केला.
दरम्यान, नववधू अशा पद्धतीने पळून गेल्याचे लक्षात येताच गणेशने सातारा पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. बदनापूर येथे या लग्नाचा मध्यस्थ दलाल खाडेबाबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भोंदू बाबाने लबाडी झाकण्यासाठी पुन्हा बनवाबनवी सुरू केली. या सगळ्या प्रकरणात सातारा परिसरात राहणाऱ्या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सविता कुलकर्णी यांनी लक्ष घातले. बदनापूर ठाण्यात त्यांनी धाव घेतली. भोंदू बाबासह ती विवाहित महिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी बुधवारी ( १६ ऑगस्ट) रोजी बेड्या ठोकल्या.


खाडे हा पक्का भोंदू बाबा असून त्याने अशाच प्रकारे अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने फसवलेले प्रकार उघडकीस येत आहे. संबंधित विवाहिता आणि तिच्या पतीने अनेकांसोबत लग्न करून गंडविल्याचे प्रकार समोर येत आहेत. या सगळ्या घटनांबद्दल चौकशी केली जात आहे.
रामेश्वर खनाळ, पोलिस निरीक्षक, बदनापूर.

अन सगळे बिंग फुटले
त्या युवतीने व तिच्या भाऊ झालेल्या पती या दोघांनी नाव व पत्ता खोटा दिला होता. विशेष म्हणजे विवाह संमती शंभर रुपयांच्या बाँडपेपरवर लिहून दिली. भोंदू बाबाने घेतलेल्या रक्कमेतील वाटा सत्तर हजार रुपये आणि लग्नात घातलेले दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला. इज्जत जाईल जास्त गडबड करू नका असा दम भोंदू बाबाने आणि त्या युवतीने गणेशने दिला. मात्र, त्यांना यावेळी यश आले नाही, अन सगळे बिंग फुटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कोयत्याने वार करून व्यापाऱ्याला लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना येथील व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करून कारसह रोख दोन हजार रुपये व मोबाइल लुबाडल्याची घटना रविवारी रात्री सव्वादहा वाजता चिकलठाण्यापुढील केंब्रिज स्कूलजवळ घडली. याप्रकरणी तीन अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय सर्जेराव कातकडे (रा. चंदनझिरा, जालना) हे व्यापारी रविवारी शहरात आले होते. रात्री सव्वादहाच्या सुमारास कातकडे केंब्रिज स्कूलजवळ मित्राची वाट पाहत उभे होते. यावेळी पॅशन प्रोवर (क्रमांक एमएच २६ एक्स २४८६) तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या कारजवळ आले. त्यांनी आपसात ‘यांना उचलून कारमध्ये टाका,’ असे म्हणत कोयत्याने त्यांच्या डाव्या पायावर वार केला. तसेच एका आरोपीने त्यांच्या खिशात बळजबरीने हात टाकत रोख दोन हजार व मोबाइल हिसकावून घेतला. कातकडे यांना मारहाण करीत त्यांची महिंद्रा वेरिंटो कार घेवून आरोपी पसार झाले. याप्रकरणी कातकडे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय केदारे या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याणनिधीचा पास एक्कावन हजारांचा

$
0
0

कल्याणनिधीचा पास एक्कावन हजारांचा
उद्योजक व कारखानदारांनी दिला स्वेच्छा निधी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस कल्याण निधीच्या पासची किंमत किती असू शकते, असा प्रश्न केला तर तुम्ही एक हजार, दोन हजार फार तर दहा हजार असे उत्तर द्याल. मात्र शहर पोलिस शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिस कल्याण निधीच्या कार्यक्रमासाठी घेतलेल्या कार्यक्रमाची किंमत होती तब्बल ५१ हजार रुपये. बुधवारी सायंकाळी एमजीएमच्या रुख्मिणी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
महात्मा गांधी मिशन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला आणि शहर पोलिस त्यांना सहकार्य करीत असल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. या चॅरीटी शोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीससह संगीत दिग्दर्शक मिथून शर्मा, हास्य कलाकार राजू श्रीवास्तव, मराठी सिनेतारका सोनाली कुलकर्णी, बाल कलाकार हर्षाली मल्होत्रा, शरद कपूर, आमिषा पटेल यांच्यासह इतर कलाकारांचा सहभाग होता. या कार्यक्रमातून जमा झालेला निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत, कर्करोग पीडित रुग्णांच्या उपचारासाठी मदत तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या उच्च‌ ‌शिक्षणासाठी मदत म्हणून वापरण्यात येणार आहे.
एकावन हजार दर
शहरातील मोजक्या व्हिआयपी लोकांसाठी हा चॅरीटी शो आयोजित करण्यात आला होता. गेल्या एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. शहरातील १५ पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आदी विभाग प्रमुखांना या कार्यक्रमाच्या पास विक्रीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
पोलिसच वंचित
पोलिस कल्याण‌ निधीचे यापूर्वीचे कार्यक्रम जाह‌ीर व भव्य स्वरुपात घेण्यात आले होते. गेल्यावर्षी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गायक मिल्खासिंग यांचा कार्यक्रम घेतला होता. यावेळी सुमारे २० हजार प्रेषकांची उपस्थिती होती. पोलिस कल्याण निधीच्या कार्यक्रमाला पोलिसांचे कुटुंबाची उपस्थिती असते. मात्र, या वर्षीच्या‌ व्हिआयपी कार्यक्रमाला पोलिसांचे कुटुंब व कर्मचारी वंचित राहिल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images