Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ सचखंड एक्स्प्रेस आजही रद्द

$
0
0


औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वे स्टेशनहून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस रविवारीही रद्द करण्यात आली आहे. सचखंडसह नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेसही रद्द केल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. दरम्यान, स्टेशनवर शनिवारी सचखंड एक्स्प्रेसच्या आगमनाच्या वेळी ३० ते ४० प्रवाशी पोहोचले. तेव्हा ती रद्द असल्याची माहिती मिळाली. येथे आलेल्या प्रवाशांना मथुरेला जाण्यासाठी औरंगाबाद ते मथुरेपर्यंत बस करून निघावे लागले. राम रहीम बाबाच्या अटकेनंतर डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी केलेल्या दंगलीनंतर हरियाणा, पंजाबमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे सचखंड शनिवारी रद्द करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पावसाने रेल्वेचा भराव गेला वाहून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात या आठवड्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे या अतिवृष्टीमुळे नियोजित अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी केलेले मातीकाम अडचणीत आले आहे. पावसाने पूलाला जोडणारे मातीकाम वाहून गेले आहे.
बीड जिल्ह्याचे स्वप्न म्हणून अहमदनगर-बीड-परळी रेल्वेकडे पहिले जाते. या रेल्वेमार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारने यासाठी भरीव निधी दिल्याने आता कुठे हे भिजत घोंगडे असलेल प्रकल्प मार्गी लागला आहे.
रेल्वेचे काम गतीने सुरू आहे. नगर ते नारायणडोह या सोळा किलोमीटर अंतरावर रेल्वे रूळ आंथरण्यात आले आहेत. तर या अंतरावर चाचणी रेल्वे धावली आहे. नारायणडोह ते बीड या मार्गावर रेल्वे मार्गासाठी मातीकाम आणि छोट; मोठ्या पुलाचे काम सध्या सुरू आहे. सध्या बीड जिल्ह्यात त्यात आष्टी तालुक्यात यंदा जास्त पाऊस झाला आहे. तीन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने आष्टी तालुक्यातल्या पिंपळा गावानजीक रेल्वे मार्गावरील ५० फूट उंचीवरील पुलास जोडणारा भराव होण्याआधीच ढासळला आहे. एवढ्याच पावसात मातीकाम केलेला भराव वाहून गेला असल्याने या माती कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाने भराव वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘पीओपी’ मूर्तीपासून खत निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यावरणास हानिकारक असणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीपासून खत निर्मिती होऊ शकते. वाचून आश्चर्य वाटले ना. हे खरे असून, ज्योतीनगरात हा प्रकल्प उभारला जात आहे.

शहरात गणेश विसर्जनाच्या अकरा विहिरी आहेत. प्रमुख गणेश मंडळे मिरवणुकीसह या विहिरींवर जातात, पण कॉलनींमधील गणेश मंडळांना मिरवणुकीने विहिरीवर जाणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे गतवर्षीपासून शेततळ्यांचा पर्याय महापालिकेने समोर आणला. हर्सूल तलावाच्या पायथ्याशी एक शेततळे गणेश विसर्जनासाठी तयार केले जाते, तर ज्योतीनगरात दोन शेततळे तयार केले जातात. ज्योतीनगरातील शेततळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याची माहिती या भागाचे माजी नगरसेवक गिरजाराम हळनोर यांनी दिली.

‘येथे जलकुंभाच्या परिसरात दोन शेततळे तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एक शेततळे ‘पीओपी’च्या मूर्तींसाठी, तर दुसरे शाडूमातीच्या मूर्तींसाठी. गेल्या वर्षीही दोन शेततळे तयार केले होते. ‘पीओपी’ मूर्तीसाठी शेततळ्याचा आकार ३० फूट बाय २० फूट असेल. खोली आठ फूट असणार आहे. शाडूमाती मूर्तीसाठी १५ फूट बाय १५ फूट आकाराचे शेततळे करण्यात येणार आहे. त्याची खोली देखील आठ फूट असेल. शाडूमातीचे गणपती पाण्यात विरघळतात आणि त्यांचा पर्यावरणाला धोका देखील निर्माण होत नाही. ‘पीओपी’ने तयार केलेल्या मूर्ती पाण्यात टाकल्यावर त्या विरघळण्यास अडचणी येतात. त्यावर उपाय शोधून काढला आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलाझर्स या केंद्र शासनाच्या कार्यालयातून विशिष्ट प्रकारचा सोडा उपलब्ध होतो. हा सोडा शेततळ्यातील पाण्यात टाकला आणि त्यात पीओपीची मूर्ती टाकली तर ती लगेचच विरघळते. मुर्ती विरघळल्यावर तळ्यात जे पाणी शिल्लक राहते, त्याचा उपयोग खतासाठी करता येतो. गतवर्षी अशा प्रकारचे खत ज्योतीनगरातील उद्यानात टाकले होते. त्याचा लाभ देखील झाला. ‘पीओपी’ मूर्ती विरघळल्यावर तळ्यात जो गाळ शिल्लक राहतो, त्या गाळापासून खडू तयार करता येतात. खडूंचे उत्पादन करणाऱ्यांसाठी तळ्यातील गाळ उपलब्ध करून देता येऊ शकेल. यंदा हा प्रयोग व्यापक प्रमाणात करण्याचे ठरविले आहे. त्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि छोटेछोटे व्यावसायिक देखील उभे राहतील,’ असे हळनोर म्हणाले.

एक टन सोडा मागवणार
‘नॅशनल केमिकल अँड फर्टिलायझर्स कार्यालयाकडून यंदा एक टन सोडा मागवण्याचे नियोजन केले आहे. हा सोडा सर्वसामान्यांच्या वापरासाठी सहजासहजी उपलब्ध करून दिला जात नाही. शिवाय त्याचा दर देखील जास्त असतो. एक टन सोडा मिळवण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांची मदत घेणार आहोत. सोड्यासाठीचे शुल्क आम्ही भरू,’ असे हळनोर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शारीरिक क्षमता ओळखून व्यायाम करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कोणताही व्यायाम करताना आपल्या शरीराची क्षमता ओळखून घ्यावी. आवश्यकतेनूसार तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चाही करावी. शारीरिक फिटनेसनुसार केलेला व्यायाम हा ह्रदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करतो. त्यामुळे व्यायाम हेच औषध हे सूत्र प्रत्येकाने अंगी बाणवून व्यायामाला प्रारंभ करावा,’ असे आवाहन प्रख्यात ह्रदयरुग्ण पुनर्वसन तज्ज्ञ डॉ. आशिष कॉन्ट्रॅक्टर यांनी येथे केले.

औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे ‘ह्रदयाचे आजार व चैतन्यमयी जीवन’ या विषयावर आयोजित कार्यक्रम देवगिरी अभियांत्रिकी कॉलेजच्या विश्वरूप सभागृहात शनिवारी झाला. यावेळी डॉ. कॉन्ट्रॅक्टर म्हणाले, ‘अनेक आजारांना प्रतिबंध करणारे आणि अनेकांचा धोका कमी करणारे व्यायाम हे सर्वात स्वस्त औषध आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने, समजावून घेऊन व्यायाम करावा. व्यायाम किती करावा, अतिरिक्त व्यायामाचे धोके समजावून घेतलेच पाहिजेत. यात सर्वात आधी आपले शरीर आपल्याला काही सिग्नल देते, त्यांची माहिती करून घ्या. त्याबाबत डॉक्टरांशी बोला, त्यांचा सल्ला घ्या. चालणे, धावणे, सायकलिंग असा कोणताही व्यायामाचा प्रकार आरोग्यासाठी चांगलाच आहे. 'किती, कसा, कितीवेळ आणि कोणता व्यायाम' या चतुःसूत्रीवर आपला व्यायाम आधारित हवा. व्यायामाने फिटनेस वाढतो तशीच प्रतिकारशक्तीही वाढते. ज्या गोष्टी करणे आधी अशक्य वाटतात, त्या सहज करता येतात,’ असे ते म्हणाले. ह्रदयविकास असलेल्यांना मॅरेथॉनपटू घडवण्यात मोलाची कामगिरी बजावणारे पी. व्यंटकरमण यांनी झिपर्स क्लबची संकल्पना सांगितली. यावेळी ह्रदयविकास झाल्यानंतर मॅरेथॉन धावणारे अजित इनामदार, रमेश पुरी, मनमोहनसिंग तलवार या ज्येष्ठांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आशिष कॉन्ट्रॅक्टर यांनी लिहिलेल्या ‘हार्ट ट्रुथ’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्योजक मुकुंद भोगले, डॉ. बालाजी आसेगावकर, पी. व्यंकटरमण यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मंगेश पानट यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास ब्लॅक बक्सचे सभासद, देवगिरी सायकलिंग क्लचे सदस्य उपस्थित होते.

क्लबचे ५३ सदस्य
प्रारंभी देवगिरी सायकलिंग क्लबतर्फे डॉ. मंगेश दसरे यांनी क्लबविषयी माहितीपट सादर केला. क्लबचे ५३ सदस्य असून विविध सायकलिंग उपक्रमात त्यांनी सातत्याने सहभाग घेतला आहे. येत्या काही महिन्यात दोन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यात औरंगाबाद ते दिल्ली आणि कश्मीर ते कन्याकुमारी या दोन मोहिमांचा समावेश असल्याचे डॉ. दसरे यांनी सांगितले. यावेळी डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी माहिती सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे नेते बागरेचाना अटक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

अनैतिक संबंधातून एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा राष्ट्रवादीचे नेते भागचंद बागरेचा व त्यांची प्रेयसी मंदाकिनी बनसोडे याना पोलिसांनी अटक केली. नाशिक पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांच्या मदतीने या खूनाचा सहा महिन्यात उलघडा करीत ही अटक केली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील बालाजी बनसोडे हे फेब्रुवारी २०१७ पासून गावातून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, बालाजी यांचा नाशिक येथे खून झाल्याचे उघड झाले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एक अज्ञात इसमाची हत्या झाल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, मयताच्या डोक्यात दगड घातल्याने चेहरा विद्रुप झाला होता. त्यामुळे ओळख पटणे अशक्य झाले होते. मात्र, पोलिसांनी खून झालेल्या भागातील मोबाइल क्रमांकाचा तपास करून या खुनाचे रहस्य उलगडले.

बालाजी हा मंगरूळ व परिसरात करणी, भानामती करणारा भोंदूबाबा म्हणून प्रसिद्ध होता. त्याची पत्नी मंदाकिनीसह गावात राहत होता. मात्र, पिंपळगाव डोळा येथील नरबळी प्रकरणानंतर तो बेपत्ता झाला होता. गावातील गावपुढारी भागचंद बागरेचा यांनी बालाजीला तुझे नरबळी प्रकरणात नाव येईल असे सांगत तू नाशिकला जा, मी येथे पाहून घेतो असा सल्ला दिला. त्यानंतर बालाजी नाशिकला गेला व तेथूनच तो बेपत्ता झाला. दरम्यानच्या काळात भागचंद व मंदाकिनी यांच्यात प्रेमलीला सुरू होती. याची कुणकुण लागल्याने बालाजीने भागचंद याना फोन करून नाशिकला बोलावले. तेव्हा भागचंद हे बालाजी याची पत्नी मंदाकिनी हिला सोबत गाडीत घेऊन गेले. त्यानंतर सिन्नर येथे मंदाकिनी व भागचंद हिच्या अनैतिक संबंधांवरून बालाजीसोबत वाद झाला. यातूनच भागचंद व मंदाकिनी यांनी बालाजी याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व हे दोघे मंगरूळ या गावी परतले. शिवाय काही घडले नाही असे ते वागत होते. विशेष म्हणजे बालाजी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी कुठेही पोलिसात नोंदविली नाही. त्यामुळे तपास करणे अवघड जात होते. मात्र, पोलिसांनी तब्बल ६ महिने कसून तपास केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली.

एका फोनने केला खुनाचा उलघडा

बालाजीच्या खून प्रकरणात भागचंद यांनी नाशिक येथून स्वतःच्या मोबाइलवरून एक फोन केला होता त्यावरून हा खून उघडकीस आला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी या नंबरवरून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण पोलिस स्टेशन गाठले व बेपत्ता लोकांची माहिती घेतली. मात्र, बालाजी ची नोंद नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र, उस्मानाबाद पोलिसांनी गावात चौकशी केल्यावर बालाजी बेपत्ता असल्याचे उघड झाले. मंदाकिनी व भागचंद याचे अनैतिक संबंधाची गावभर चर्चा होती, त्यामुळे पोलसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलघडा झाला.

राजकीय वर्तुळात खळबळ

भागचंद हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सक्रिय नेते असून ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू कारभारी होते. कळंब तालुक्यासह ते जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय होते. जिल्हा बँकेचे माजी संचालक म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज गळती कळणार कशी?

$
0
0

वीज गळती कळणार कशी?
२३०० डीपींना मीटरच नाही; फीडरवरून वीज वापरावरून ठरतोय तुटीचा अंदाज
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरामध्ये महावितरणचा कारभार अतिशय अजब पद्धतीने सुरू आहे. संपूर्ण शहरातील २ लाख ३० हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने विविध ठिकाणी २३०० डीटीसी (डीपी) बसविल्या आहेत, मात्र एकाही डीटीसीला वीज मीटरच बसविलेले नाही. त्यामुळे शहरात वीज गळती नेमकी कुठून होत आहे हे कळतच नाही. फीडरवरून झालेल्या वीज वापरावरून हा अंदाज बांधला जात आहे.
या शहराला दररोज २२० मेगा युनीटची विजेची आवश्यकता आहे. त्यानुसार वीजपुरवठा केला जातो. मात्र, यातून महावितरण कार्यालयाला मिळणारे उत्पन्न कमी आहे. महिन्याकाठी ५५ कोटींची वसुली अपेक्षित असताना तेवढी वसुली मात्र होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्यासाठी वीज वसुली मोहीम, वीज चोरी शोधण्याची मोहीम महावितरणला राबवावी लागते.
शहरातील विजेची तूट ४० टक्क्यांवर पोहोचली आहे. शहरातील काही फिडरवर असलेली तूट ६० टक्क्यांपेक्षाही अधिक असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. त्यामध्ये छावणी, शहागंज, पॉवर हाउस, चिकलठाणा, गारखेडा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
तुटीचा हा आकडा फीडरवर लावलेल्या वीज मीटरच्या आधारे काढण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र फीडर ते डीटीसी आणि डीटीसी ते ग्राहकांपर्यंत पोचणारी वीज यातील तफावत शोधण्यासाठी डीटीसीवर वीज मीटर बसविणे आवश्यक आहे. सध्यातरी शहरातील एकाही डीटीसीवर वीज मीटर बसविलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
जीटीएल कंपनीकडे शहराचा कारभार देण्यापूर्वी शहरातील अनेक डीटीसीवर वीज मीटर बसविले होते. जीटीएलच्या काळात मात्र हे काम झालेच नाही. पुढे महावितरणकडे कारभार आल्यावर तीन वर्षांत २३०० पैकी एकाही डीटीसीवर मीटर बसविले गेले नाही. त्यामुळे कोणत्या भागात नेमकी किती वीज गळती आहे, याची माहितीच मिळू शकत नाही. वीज चोरी शोधण्यात लाइनमन व इतर कर्मचाऱ्यांचा बराचसा वेळ वाया जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या २०११मधील सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेच्या अहवालानुसार जाहीर करून ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी ओबीसींनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसी, भटके विमुक्त, महात्मा फुले समता परिषद, सुतार लोहार संघटना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बलुतेदार संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (२७ ऑगस्ट) राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत आपल्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकजुटीने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अॅड. महादेव आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

ओबीसींच्या व भटक्या विमुक्त समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांसंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली. इतर मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. अहमदनगर येथील नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कडक शासन करावे. या मागणीसाठी निवेदन देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी औरंगाबादेतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी, भटके, विमुक्त समाज व समविचारी संघटनेतर्फे एक दिवस धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला सुतार समाज महासंघाचे सुरेश आगलावे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे, ओबीसी जनक्रांती परिषदेचे काशीनाथ जाधव, फुले ब्रिगेड राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रल्हाड राठोड, गणेश अनासरे, दत्तू वानखेडे, विलास ढंगारे, प्रा. बळीराम घाडगे, कैलास घोडके, संदीप घोडके, जनार्दन कापूरे, डॉ. विश्वनाथ कोलकर, प्रा. व्ही. एन. हारकळ, आर. बी. सोनवणे, अभिमन्यू उबाळे, बाबासाहेब जाधव, योगेश हेकाडे, जनार्धन राऊत, रमेश गायकवाड, र. ना. कोकणे, डॉ. संदीप घुगरे, चंद्रकला पाथरे, अनिता देवकर उपस्थित होते. नाभिक महामंडळाचे विष्णू वखरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक दायित्व जपणारा ‘कॅनॉटचा राजा’

$
0
0

औरंगाबाद : कॅनॉट प्लेस मार्केटमधील विविध जाती-धर्माचे व्यापारी एकत्र येऊन गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. सामाजिक दायित्व जपणारा ‘कनॉटचा राजा’ प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाची समाजपयोगी परंपरा कॅनॉट व्यापारी गणेश मित्र मंडळाच्या व्यापाऱ्यांनी जपली आहे.

सिडकोच्या कॅनॉट मार्केटमध्ये १९९७मध्ये गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली. पहिल्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर खर्डे अप्पा यांची नियुक्ती करण्यात आली होती. यंदा वर्षी या गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन अत्री, उपाध्यक्षपदी सय्यद अमीन यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सचिवपदी राजू वासवानी, कोषाध्यक्षपदी दिलीप दयालानी, कार्याध्यक्षपदी दिलीप अंभोरे यांच्यासह सहसचिवपदी सचिन चव्हाण यांची निवड केली आहे. या उपक्रमांतर्गत कॅनॉटचा राजाची आरती करण्यासाठी अधं, अपंग; तसेच इतर संस्थांतील विद्यार्थी किंवा संबंधित सदस्यांना निमंत्रित करण्यात येते. आरतीसाठी आलेल्या विविध संस्थांमधील सदस्यांना व्यापारी संघातर्फे विशेष भेट वस्तू देण्यात येतात. याशिवाय अशा संस्थांना मदत करून गणरायाचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.

भंडाराचे आयोजन
दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सोमवारी (चार ऑगस्ट) दुपारी १२ ते चार दरम्यान सत्यनारायण पूजा आणि महाभंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर खर्डे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलपीजी पंपावर रिक्षाचालकास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गॅस कमी टाकण्याच्या वादातून रिक्षाचालकास चिकलठाणा येथील एलपीजी गॅस पंपावर शुक्रवारी सकाळी सायंकाळी दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी पंपमालकासह दोघांवर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रईस शेख मुसा (वय २६ रा. नारेगाव) हे एलपीजी रिक्षाचालक असून ते शुक्रवारी गॅस भरण्यासाठी गेले होते. त्यांनी तीनशे रुपयाचा गॅस भरण्यास सांगितले, पण कर्मचाऱ्याने दोनशे रुपयांचा गॅस भरला, अशी तक्रार आहे. रईस यांनी रिडिंगनुसार शंभर रुपयाचा गॅस कमी भरल्याचे सांगून उर्वरित गॅस भरावा, असे सांगितले. या कारणावरून कर्मचारी संतोष व पंपमालकाने गॅस भरण्याचा नोझल व दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत रईस यांच्या हात व डोक्याला जखम होऊन दहा टाके पडले, त्यांच्या मोबाइलचा डिस्प्ले फोडून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पोलिस नाईक घुगरे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिडरमध्ये बिघाड; सणासुदीत पाणीसंकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐन सणासुदीत शहरात पाणीसंकट आले आहे. मागील संपूर्ण आठवडा पाणीपुरवठा विस्कळीत असताना आता पुन्हा रविवारी पाणीपुरवठा खंडित झाला. नक्षत्रवाडी फिडरवरील इन्सुलेटर फुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सणासुदीत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
एक महिन्यापासून जायकवाडी येथील १३२ केव्ही उपकेंद्रात वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडीत झाल्याने मुख्य पाइपलाइन फुटणे, अशा घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पाणपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. नक्षत्रवाडी फिडरवरील इन्सुलेटर रविवारी फुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. हा प्रकार दुपारी दीड वाजता झाला. त्यामुळे जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद पडली आहे. त्यामुळे २४ वॉर्डाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सांयकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. परिणामी, जुन्या शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता आहे. महावितरणाचे अधिकारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. शहराच्या पाणीपुर‍वठ्यात पाच तासांचा खंड पडल्याने जलकुंभ भरण्यास उशीर लागेल. सोमवारी सकाळी या भागांना होणारा पाणीपुरवठा सुमारे १२ तास उशिराने होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाचे दुर्लक्ष

सणासुदीच्या दिवसात पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महापालिका आणि महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. सणासुदीच्या काळात प्रशासनाने पाणीपुरवठ्याकडे लक्ष द्यायला हवे. पर्यायी उपाययोजना करण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

गॅप भरून निघेना

वीजपुरवठा खंडित आणि पाइपलाइनला लागलेल्या गळतीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाण्याने वेळापत्रक दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. रविवारी दोन दिवसाचा गॅप भरून काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, वीजपुरवठा खंडित झाल्याने पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगाव तालुक्यात सर्वाधिक दुषित पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद आरोग्य ‍विभागातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ६८ टक्के पाणी नमुने दुषित आढळून आले. सिल्लोड तालुक्यात केवळ दोन टक्के नमुने दुषित आढळले. जिल्हा परिषदेतर्फे दरमहा पाणी नमुने तपासणी केली जाते.
जुलै महिन्यातील तपासणी अहवालानुसार, सोयगाव तालुका सर्वाधिक दूषित असल्याची, तर सिल्लोड तालुका सर्वाधिक स्वच्छ असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ७३४ नमुने घेण्यात आले. त्यापैकी शहरी भागातील १४०, तर ग्रामीण भागातील ५९४ होते. सोयगाव तालक्यातील एकूण ८१ पैकी ५५ नमुने दूषित आढळले. सिल्लोड तालुक्यातील एकूण ५० नमुन्यांपैकी केवळ एक नमुना दुषित आढळला. अहवालानुसार जिल्ह्यातील ४० टक्के पाणी दूषित आहे. ग्रामीण भागातील पाणीसाठ्यांची स्वच्छता राखणे आवश्यक असते. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना आहेत. जलवाहिनी जवळून ड्रेनेजलाइन आहेत. त्याचा परिणाम दुषित पाणी होण्यावर होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमानी सेन्सॉरशिपचा विरोध करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सेन्सॉर बोर्डातील चार सदस्यांची समज वैयक्तिक असते. योग्यता नसलेल्या माणसांशी वाद घालत असताना सृजनकर्त्याची चिडचिड होते. या क्षेत्रात झुंडशाही, गटबाजी आणि भ्रष्टाचार असल्यामुळे काही चित्रपटांना सहज मंजुरी मिळते, तर काही अडकतात. घटनेची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेऊन, अशा सेन्सॉरशिपचा विरोध करावा’ असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. राज्यस्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते.
एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने ‘सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. एमजीएम कॅम्पसमधील आइन्स्टाइन सभागृहात रविवारी सकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चर्चासत्राचे उदघाटन केले. यावेळी मंचावर डॉ. वि. ल. धारूरकर, माध्यम अभ्यासक प्रा. जयदेव डोळे, ‘एमजीएम’चे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, प्राचार्य डॉ. रेखा शेळके आणि प्रा. विशाखा गारखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय समाजातील चित्रपटाचे स्थान आणि सेन्सॉरवर दिग्दर्शक कुलकर्णी यांनी परखड मत मांडले. ‘नाटक व सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची गोष्ट आहे. मोबाइलवर चित्रपट पाहणारा खरा प्रेक्षक नसतो. कारण चित्रपट अनुभवाची अखंड रेषा असते. प्रत्येक सिनेमात अंतःप्रेरणा असते. करमणूकप्रधान ते समांतर अशी चित्रपट समजून घेण्याची प्रक्रिया घडली. विशेषतः आताच्या सामाजिक स्थित्यंतरात चित्रपटाबाबत समज वाढली आहे. चित्रपट फक्त प्रेक्षकांचा असतो. जगण्याची समज वाढवतो तोच खरा चित्रपट. समांतर सेन्सॉरशिपचा त्रास पूर्वीसुद्धा होता. ही सेन्सॉरशिप बोर्डाची नव्हती, तर समाजातील एका गटाची होती. सत्तांतर झाल्यानंतर समित्या बदलतात आणि योग्यता नसलेली माणसे समितीवर येतात. अशा माणसांशी वाद घालताना सृजनकर्त्याची चिडचिड होते. आपल्याशी संबंधितांचे चित्रपट आश्चर्यकारकरित्या मंजूर होतात, तर इतरांचे अडकतात. घटनेची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेऊन अशा सेन्सॉरशिपचा निषेध करावा आणि चांगल्या नाटक-चित्रपटांना पाठिंबा द्यावा’ असे कुलकर्णी म्हणाले.
यावेळी वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप डॉ. वि. ल. धारूरकर यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा शेळके यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. आशा देशपांडे यांनी केले. दुपारच्या सत्रात विविध मान्यवरांनी विचार मांडले. यावेळी विद्यार्थी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निरर्थक वाद

‘मुरांबा’ चित्रपटातील ‘सेक्स’ शब्द काढण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली होती. सद्यस्थितीत हा शब्द वगळा आणि सब-टायटल ठेवा अशी विसंगती कशासाठी, असा सवाल कुलकर्णी यांनी केला. ‘आजचा दिवस माझा’ चित्रपटात ‘अंध’ शब्द वगळण्याची सूचना बोर्डाने केली होती. नेत्रहीन किंवा दृष्टीहीन शब्द वापरण्यास सूचवले होते. चित्रपटाचे कथानक अंध गायकाभोवती असून हा शब्द उपहासात्मक नसल्याचे सांगितल्यानंतर शब्द ‘पास’ झाला’ असा अनुभव कुलकर्णी यांनी सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑरिक’मधील २२ प्लॉट विक्रीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद इंडस्ट्र‌िअल सिटीमधील (ऑरिक) शेंद्रा एमआयडीसीत दुसऱ्या टप्प्यांतील २२ प्लॉट विक्रीला काढले असून त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. येत्या आठ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विक्रीस उपलब्ध असलेल्या प्लॉटपैकी दोन प्लॉट कमर्शिअल व २० प्लॉट इंडस्ट्र‌िअल आहेत, अशी माहिती ‘ऑरिक’चे महाव्यवस्थापक गजानन पाटील यांनी दिली.

यापूर्वी ‘ऑरिक’मधील ५६ प्लॉट विकले आहेत. यासंदर्भात पाटील म्हणाले, ‘प्लॉट विकत घेऊ इच्छिणारे उद्योजक आणि व्यावसायिकांनी ऑरिकच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. शेंद्र्यातील ‘सेक्टर-एक’मधील प्लॉट नंबर १९ आणि २० हे कमर्शिअल आहेत. ‘सेक्टर-पाच’मधील प्लॉट क्रमांक एक, तीन, चार, पाच, सात, दहा, १४, १९, २३-बी, २४, २६, २७, २८, २९, ३४, ३५-ए, ३७, ३८, ४०, ४३ या क्रमांकाचे प्लॉट उद्योगांसाठी आहेत. ही प्रक्र‌िया आठ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.’

या प्लॉट विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज करताना ऑरिकच्या वेबसाइटचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इंडस्ट्र‌िअल प्लॉट कमीतकमी ८३८ चौरस मीटर व जास्तीत जास्त चार हजार ८०० चौरस मीटरचे आहेत. कमर्शिअल प्लॉट एक हजार चौरस मीटरचे असल्याचेही गजानन पाटील यांनी सांगितले.

‘आयसीटी’चे कंत्राट ‘हनीवेल’कडे
ऑरिक सिटीतील शेंद्रा एमआयडीसीतील प्रकल्पात ‘माहिती संप्रेषण तंत्रज्ञान’चे (आयसीटी) कंत्राट हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड या कंपनीला दिले आहे. ऑरिक सिटी पहिली ग्रीनफिल्ड स्मार्ट शहरांपैकी एक आहे. ऑरिकमध्ये निवासी नागरिक व कर्मचाऱ्यांना परवडण्याजोग्या सेवा पुरविल्या जातील. आयसीटी प्रणालीसाठी व्यापक स्वरुपाचे डिझाइन बनवले गेले आहे. ‘एआयटीएल’ने हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड (हाईल) या कंपनीची नियुक्ती करून ऑरिकने एक मैलाचा दगड पूर्ण केला आहे. ही कंपनी फायबर ऑप्टिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सार्वजनिक वाय-फाय, एयूआरआयसी ई-गव्हर्नन्स आणि ईआरपी (एईई) करणे यावर भर देणार आहे.

कामाला मुदत दोन वर्षांची
हनीवेल कंपनीला हे कंत्राट १४२ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. त्यात ऑप्टिक फायबरचा वापर करण्यात येणार आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत कंपनीला दिली आहे. त्याचबरोबर कंपनीकडे ‘आयसीटी’च्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षांसाठी असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पाच पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी दिली.
नरहर कुरूंदकर वाङ्मय पुरस्कार (रुपये ३ हजार) हा पुरस्कार फक्त मराठवाड्यातील लेखक-कवींसाठी असोत. तो केशव वसेकर यांच्या ‘पाऊलवाट’या ग्रंथास जाहीर झाला आहे. मराठीतील समीक्षा आणि वैचारिक लेखनासाठी देण्यात येणारा प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार (रुपये ३ हजार) डॉ. विलास खोले (पुणे) यांच्या ‘विलोकन’ या ग्रंथास, मराठीतील उत्कृष्ट कविता लेखनासाठी दिला जाणारा कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार (रुपये ३ हजार) पुरस्कार ना. तु. पोघे (औरंगाबाद) ‘बिनचेहऱ्याचे अभंग’ या कवितासंग्रहास देण्यात येणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यंदापासून कादंबरी लेखनासाठी देण्यात येत असलेला बी. रघुनाथ वाङ्मय पुरस्कार (रुपये ३ हजार) प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीस जाहीर झाला आहे. ग्रंथ व्यवहारात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्याबद्दल ‘शब्दालय प्रकाशन’च्या सुमती लांडे यांना रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार (रुपये २ हजार) जाहीर झाला आहे. सुमती लांडे यांनी १९८९ पासून शब्दालय प्रकाशनातर्फे कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, वैचारिक लेखन आदी ५०० पेक्षा जास्ता ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
पुरस्कार निवड समितीमध्ये प्रा. शेषराव मोहिते, विजयकुमार करजकर, जयद्रथ जाधव, डॉ. सुरेश सावंत, संगीता मोरे, डॉ. दादा गोरे, के. एस. अतकरे, जीवन कुलकर्णी यांचा समावेश होता.

उस्मानाबादेत कार्यक्रम

मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्काराचे वितरण उस्मानाबाद येथे करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर २०१७ रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या अंतिम फेरीत केवळ १८८ प्रवेश

$
0
0

अकरावीच्या अंतिम फेरीत केवळ १८८ प्रवेश
पहिल्या टप्प्यात फक्त तीन प्रवेश
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावीची प्रवेशाची तीन महिन्यांपासून सुरू असलेली प्रवेश फेरी अंतिम टप्प्यात आहे. ‘प्रथम येणाऱ्या प्राधान्य’ या फेरीत तीन टप्पे करण्यात आले. यामध्ये केवळ १८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करण्यास मंगळवारपर्यंत अवधी आहे.
औरंगाबाद शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. जून ते ऑगस्ट असा प्रवेश प्रक्रियेचा कालावधी ठरला. एकूण वेगवेगळ्या नऊ फेरीनंतरही रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. सध्या ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य’ अशी प्रवेशाची फेरी आहे. त्यात गुणांनुसार वेगवेगळे टप्पे करण्यात आले. तिसरा अंतिम टप्पा शनिवारी संपला. त्यात १०८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया केली. या विद्यार्थ्यांना सोमवार व मंगळवार असे दोन दिवस प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. या तीन टप्प्यात केवळ १८८ जागांवर प्रवेश झाले. पहिल्या टप्प्यात तर फक्त तीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशाला विलंब झाल्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा फारसा बदलेला नाही. शहरातील २४ हजार ११० जागांपैकी ८ हजार जागा रिक्तच आहेत. ऑनलाइन प्रक्रिया नियोजना विरोधात पूर्वीच शहरातील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने शिक्षकांना अतिरिक्त ठरण्याची भीती सतावते आहे.
आणखी फेरी होण्याची शक्यता
शहरातील रिक्त जागांवर प्रवेशासाठी सप्टेंबरमध्ये आणखी एक प्रक्रिया फेरी राबविली जाण्याची शक्यता आहे. त्यात पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. विभागातून परीक्षा दिलेल्यापैकी औरंगाबादमध्ये किती विद्यार्थी प्रवेशास किती उत्सुक असणार हा प्रश्न आहे. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा साधारतः फार कमी होणार नाही असेही कॉलेज व्यवस्थापनास वाटते.
टप्प्यात झालेले प्रवेश
टप्पा-१.....३
टप्पा-२.....७७
टप्पा-३.....१०८
आजपर्यंत एवढ्या जागांवर प्रवेश....१५९०८
शहरातील अकरावी रिक्त जागा.....८२०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावीच्या निकालाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावीच्या निकालाची मात्र विद्यार्थ्यांना अद्याप प्रतूक्षाच आहे. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजनही शिक्षण विभागाकडे नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

दहावी पुरवणी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपली. या परीक्षेचा निकाल केव्हा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. निकाल वेळत लागला, तर पुढील प्रवेशाची प्रक्रिया करता येईल, असे विद्यार्थी, पालकांना वाटते. दहावीनंतरच्या अभ्यासक्रमात केवळ अकरावीची प्रवेश प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ३१ ऑगस्टला संपत आहे. पॉलिटेक्निकसारख्या अभ्यासक्रमांची ‘कट ऑफ डेट’ही महिन्या अखेर संपते. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर केव्हा होणार, गुणपत्रिका केव्हा मिळणार. निकाल वेळेत जाहीर झाला नाहीतर प्रवेश मिळणार नाही अशी भीती या विद्यार्थ्यांना सतावते आहे. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांतून १३ हजार ३०९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

‘एटीकेटी’ विद्यार्थ्यांचे नियोजन नाही
शिक्षण मंडळाने २०११मध्ये ‘एटीकेटी’चा निर्णय घेतला होता. दहावीत दोन विषयात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जातो, तर दोन वर्षांपासून पुरवणी परीक्षा जुलैमध्येच घेतल्या जाते. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी शिक्षण मंडळ फेब्रुवारी-मार्च परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ही महिनाभरात परीक्षा घेते. यामुळे ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नियोजनाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे.

नियोजन हुकणार
यावर्षी औरंगाबाद शहरात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ‘एटीकेटी’स पात्र विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही. त्यात पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियोजनही शिक्षण विभागाकडे तयार नाही. दहावी ऑनलाइन प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. अद्याप दहावीचा निकाल नाही. निकाल आणि गुणपत्रिकेच्या प्रक्रियेला संप्टेंबर उजाडेल तेव्हा या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक केले, तर त्यांचे शैक्षणिक सत्र केव्हा सुरू करणार, असा प्रश्न कॉलेजांसमोर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझा बाप्पा : पर्यावरणपूरक उत्सवाची २२ वर्षांची परंपरा

$
0
0

बाप्पा हा बुद्धीची देवता म्हणून आपण मानतो. त्या उत्सवाची एक परंपरा आहे, अनेक वर्षांपासून आमच्याकडेही गणेशाचे आगमन होते. घरी आम्ही गेल्या २२-२३ वर्षांपासून शाडूच्याच गणेशाची स्थापना करत आहोत. वाळूज येथील माझ्या फॅक्टरीत देखील ही परंपरा मी १२ वर्षांपासून सुरू केली असून, तेथेही आम्ही शाडूच्या मातीचा गणपती बसवतो. छोटा, सुटसुटीत, ठराविक आाकाराचा, नैसर्गिक रंगाने रंगकाम केलेली मूर्ती आम्ही आणतो. पर्यावरणपूरक गणपती बसवताना ‘नो पो‌ल्यूशन’ ही संकल्पना घरी आणि फॅक्टरीत दोन्हीकडे कटाक्षाने पाळतो. आवाज नाही, गोंगाट नाही, कृत्रिम रंग नाही, सजावट नाही, आणि कुठेही भपकेबाजपणा नाही. माझ्या फॅक्टरीत तर आम्ही गेल्या काही वर्षांपासून या गणेशोत्सवात काही स्पर्धाही करतो, रांगोळी व इतर बाबींचा त्यात समावेश असतो.

आमच्या घरी आणि फॅक्टरीत दोन्हीकडे १० दिवसांचा उत्सव असतो. दहा दिवसांत जमलेले निर्माल्य आम्ही आमच्या फॅक्टरीत वर्मी कंपोस्टमध्ये टाकतो आणि त्याचे खत तयार करत असतो. पूर्वी मी विनायक नगरमध्ये राहायचो तेथील कॉलनीतील सर्वजण दहा दिवसांत जमलेले निर्माल्य आमच्या फॅक्टरीत आणून देत असत. यंदा मी ऑगस्ट होम उल्कानगरी येथे राहायला आलोय येथेही निर्माल्याची संकल्पना सांगितली आहे, ते सर्व जण निर्माल्य देणार आहेत. दहा दिवसांत पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास न होऊ देता शांततेत, उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करत असतो. हा संदेश मी सर्वांना देऊ इच्छितो. उत्सव करा, एकत्र या सामाजिक भान ठेवा आणि पर्यावरण जपा.
- प्रसाद कोकीळ, अध्यक्ष सीएमआयए
(शब्दांकन ः धनंजय कुलकर्णी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन माहिती केंद्र ताब्यात घेण्यास एमटीडीसी एमडींची मंजुरी

$
0
0

पर्यटन माहिती केंद्र ताब्यात घेण्यास एमटीडीसी एमडींची मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
रेल्वेस्टेशन परिसरात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेले पर्यटन माहिती केंद्र ताब्यात घेण्यास एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी मंजुरी दिली आहे. नाममात्र शुल्कात हे केंद्र चालवण्यासाठी घ्या, अशी सूचना त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या निर्णयानंतर माहिती केंद्र एमटीडीसीच्या ताब्यात येऊ शकेल.
महापालिकेने गतवर्षी पर्यटन माहिती केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्‍घाटन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. माहिती केंद्रासाठी विद्यापीठाच्या पर्यटनशास्त्र विभागाच्या काही विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या विद्यार्थ्यांनी १३ महिने काम केल्यानंतरही त्यांना मानधन मिळालेले नाही. दरम्यान, हे माहिती केंद्र एमटीडीसीने चालवण्यासाठी ताब्यात घ्यावे, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली होती. त्याला विभागीय व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेचा प्रस्ताव त्यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवला. व्यवस्थापकीय संचालकांनी पर्यटन माहिती केंद्र ताब्यात घेण्यास तयारी दर्शवली आहे. नाममात्र दरात महापालिकेकडून हे केंद्र घ्या, असे त्यांनी कळविले आहे, असे शिंदे म्हणाले.
पर्यटन माहिती केंद्र ताब्यात घेण्यास आम्ही तयार आहोत, असे महापालिकेच्या आयुक्तांना कळविले आहे. स्थायी समितीच्या निर्णयानंतर ते केंद्र एमटीडीसीच्या ताब्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. स्थायी समिती या केंद्राबद्दल केव्हा निर्णय घेते याकडे आता संबंधितांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड, खुलताबादेत कापसावर रोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड तालुक्यात दुष्काळात तगलेल्या कपाशीवर मावा, तुडतुडे, थ्रिप्स व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. औषधी फवारून शेतकरी या कापसाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सिल्लोड तालुक्यात कपाशीची ४५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. पावसाचा मोठा खंड पडल्यानंतरही शेतकऱ्यांनी कापूस जगवला आहे. काही ठिकाणी हे पीक पावसाअभावी होरपळले आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे कपाशी तरारली. पाने, फुले, कैऱ्या लगडल्या असताना अचानक चारदिवसांपासून मावा, तुडतुडे, थ्रिप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे कपाशीची पाने राठ होत आहेत. किडी रस शोषण करीत असल्याने नरम असलेली पाने कडक झाली आहे.काही ठिकाणी कपाशीची पाने लाल होत आहे. रोगांच्या प्रादुर्भावामुळे पाने, फुले, कैऱ्या गळत आहेत. यावर्षी पावसाने हुलकावणी दिली असली, तरी शेतकऱ्यांनी पीक जोपासले, आतापर्यंत रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे किटकनाशकांची जास्त फवारणी करावी लागली नाही. आता पीक जोमदार असताना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कपाशीची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादन कमी होणार आहे. त्यातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पाणी भरलेल्या ठिबकच्या कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खुलताबाद तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत आहे. त्याचेवळी पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मध्यंतरीच्या पावसाने पिकांची वाढ होण्यास मदत झाली. मात्र किडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीची शक्यता वाढली आहे. कपाशीच्या पिकावर पांढरी माशी, मावा, तुडतुडे, पोखणारी अळी अशा कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कमी पावसामुळे मका पिकांची वाढ खुंटली आहे. मोठा पाऊस न पडल्यास असेच ढगाळ वातावरण कायम राहिल्यास पिके हातची जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ‘कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरण आणि धुके असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे,’ असे सालुखेडा येथील शेतकरी दिंगबर काळे यांनी सांगितले.
‘ढगाळ वातावरणामुळे मावा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगर दीड मिलीलिटर, प्रति लिटर पाणी, दोन ग्रॅम गंधक एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. शेतकऱ्यांनी शिफारस केलेले कीटकनाशक वापरावे. इतर कोणतेही मिश्रण करून फवारणी करू नये,’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध महिलेचा प्रतिकार; अर्धेच मंगळसूत्र चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जेष्ठ नागरिक महिलेने केलेल्या प्रतिकारामुळे दुचाकीस्वार चोरट्याच्या हातात अर्धेच मंगळसूत्र हाती लागले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता सिडको एन १, ई सेक्टर मध्ये घडला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा उत्तमराव कदम (वय ५७ रा. सिडको एन १, ई सेक्टर) या शुक्रवारी सायंकाळी गणपती स्थापनेसाठी मंदिरात गेल्या होत्या. त्या नातीसह सायंकाळी घरी येत असताना अंधारात अंदाजे २५ ते ३० वयोगटातील तरूण दुचाकीवरून मागून त्यांच्याजवळ आला. त्याने कदम यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र, कदम यांनी प्रसंगावधान राखत मंगळसूत्र हातात घट्ट पकडले. यामुळे तीन तोळ्यांपैकी एक तोळ्याचेच मंगळसूत्र चोरट्याच्या हाती लागले. कदम यांनी आरडाओरड केल्याने चोर पळून गेला. या प्रकरणी शनिवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सुभाष चव्हाण हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images