Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रतिभाशाली कवयित्रीचे स्मरण

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हायकू काव्यप्रकार मराठी साहित्यात रूढ करणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचे वृद्धापकाळाने शनिवारी मुंबईत निधन झाले. आचार्य अत्रे यांची कन्या असलेल्या शिरीष पै यांनी मराठी कवितेत विशेष योगदान दिले. या समृद्ध प्रतिभेच्या कवयित्रीच्या आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला.

‘हायकू’ काव्यप्रकारासाठी शिरीष पै यांचे मराठी साहित्यात विशेष स्थान आहे. कथा, ललित लेखन, नाटक, बालसाहित्य या प्रकारातही मुद्रा उमटवली. आचार्य अत्रे यांची कन्या असलेल्या शिरीष पै यांनी पत्रकारिता आणि साहित्यात वेगळा ठसा उमटवला. ‘एक तारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘गायवाट’, ‘कस्तुरी’, ‘ऋतुचक्र’ हे कवितासंग्रह विशेष गाजले. कादंबरी व कथासंग्रह त्यांनी लिहिले. आचार्य अत्रे यांची कन्या एवढीच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. तर स्वतंत्र लेखनातून त्यांनी आपला ठसा उमटवला अशी प्रतिक्रिया मान्यवर साहित्यिकांनी दिली. अखेरपर्यंत त्यांनी लेखनाला वाहून घेतले होते.

शिरीष पै या मराठीतील संवेदनशील कवयित्री-लेखिका आहेत. जपानी काव्यप्रकार ‘हायकू’ त्यांनी मराठीत रूढ केला. ‘हायकू’ लेखनाची परंपरा सुरू झाल्याचे श्रेय त्यांना जाते. आचार्य अत्रे यांची मुलगी म्हणून असलेली प्रतिमा बदलून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. कवयित्रींच्या परंपेरत त्यांचे महत्त्वाचे नाव आहे.
- डॉ. दासू वैद्य, कवी

‘हायकू’ हा तीन ओळींचा जपानी काव्यप्रकार शिरीष पै यांनी मराठी साहित्यात आणला. पुढील काळात इतर कवींनी ‘हायकू’ लिहिण्याचा प्रकार केला. वडील आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाचे त्यांनी काळ संपादन केले. फारशी कविता लिहिली जात नव्हती त्या काळात अनुराधा पोतदार आणि शिरीष पै या दोघींची कविता लक्षात राहणारी ठरली. - कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष ‘मसाप’

शिरीष पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या. वडिलांची प्रतिभा त्यांच्यात होती. कवयित्री म्हणून मराठी साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या शिरीष पै यांचे शेवटपर्यंत लिखाण सुरू होते. संपूर्ण आयुष्य साहित्याला वाहिलेली कवयित्री गेल्याचे दुःख आहे. - डॉ. यु. म. पठाण, ज्येष्ठ साहित्यिक

शिरीष पै या अत्यंत प्रयोगशील कवयित्री म्हणून मराठी वाड्मय इतिहासात गणल्या गेल्या आहेत. प्र. के. अत्रे यांच्या ‘मराठा’ या अत्यंत परखड वृत्तपत्राची धुरा त्यांनी समर्थपणे वाहिलेली होती. पै यांचे ललित लेखनसुद्धा दखलपात्र आहे. - डॉ. ऋषिकेश कांबळे, समीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं!

0
0

... ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं!
---
ती अशीच. तिच्या जन्माच्या वेळी पंजाब पेटलेलं. तेव्हा अमरजीत नावाचा एक निधड्या छातीचा कार्यकर्ता होता. त्यांच्या नावावरून तिच्या आबानं तिचं नाव ठेवलं. कॉलेजात असताना एकदाही तिनं जातीचा रकाना भरला नाही. त्यासाठी तिच्या लहानपणी तिचे आबा जसे भांडायचे, अगदी तसंच ती ही भांडायची. ती अशीचचय. चळवळीची धार तिच्या गाण्यालाय. आजच्या ‘अग्निपथ’मध्ये अमरजीत राम बाहेतीचा हा रोमांचक प्रवास...
---
मनोज कुलकर्णी
manoj.kulkarni@timesgroup.com
---
ती अशीचय. म्हणजे कशी, की तिला दगड गोळा करायला आवडतात. बाबाला आबा म्हणते. त्या आबाशी बोलताना अरे, माझा असं एकेरी संबोधन वापरते. तिची सुरुवात त्या आबापासून झाली. म्हणते, ‘मी गायला बसले की माझा आबा उगाचच या रूममधून त्या रूममध्ये फेऱ्या मारतो. लेकीचं गाणं आपसूक मनात साठवून घेतो. दिवसभर मग तेच गुणगुणत राहतो. मला माहितंय त्याला शास्त्रीय, उपशास्त्रीय गाणं आवडतं. अशा वेळी मीही तेच गाते. त्यामुळं त्याचा दिस तर आनंदाला लगडतोच, सोबत माझाही.’
अमरजीत राम बाहेती. शाहिरी, शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत, लोकगीते. सगळे प्रकार ती उत्तम हाताळते. या संगीत प्रवासाच्या आठवणी सांगतानाही अलबतच तिची सुरुवात गाण्यापासूनच असते. ती दुसरीत असतानाचा किस्सा. म्हणाली, ‘पाहुण्यांच्या घरी गेलेलो. तिथं हार्मोनियम ठेवलेली. मी घेतली. त्यावर ‘ही चाल तुरुतुरु’ हे गाणं वाजवलं. बरं त्यापूर्वी मी कधी पेटी पाहिलीही नव्हती. माझ्या बोटातली ही जादू पाहून सर्वांना आनंद झाला. त्या काकांनी ती पेटी मला भेट दिली. मग कोणतंही गाणं मी त्यावर सहज वाजवायचे. सिंथेसायझर, माऊथ ऑर्गन, बुलबुल, तरंग ही वाद्य मी घरातच शिकले. माझ्या मुकुंद मामाला गायनाची आवड. तशी आई उषानंही नांदेडला अण्णासाहेब गुंजकरांकडं शास्त्रीय संगीत शिकलेलं. सातवीला होते. तेव्हा गॅदरिंग उद्यावर आलेली. अन् ऐनवेळी सातवी ‘अ’च्या वर्गानं आम्ही बसवलेलं गाणं चोरलं. मग खुन्नस म्हणून आमच्या सातवी ‘ब’च्या तुकडीनं रातोरात दुसरं गाणं शोधलं. एका दिवसात बसवलं. विशेष म्हणजे या नव्या गाण्याला पहिला नंबर मिळाला. त्यावेळी माझ्या मैत्रिणींनी मला उचलून घेतलं. हा ‘अ’ विरुद्ध ‘ब’चा प्रसंग. त्या निरागसतेचं आजही हसू येतं.
माझा आबा. त्याचा आणि आईचा प्रेमविवाह. दोघंही बीडचे. बहिण मानसी. आमचं असं माहेरचं चौकोनी कुटुंब. आता लग्नानंतर पती समाधान इंगळे, त्याची आई (चंद्रभागा). तो व मी त्यांना बाई म्हणतो. नणंद जीजा काकडे, आणि त्याची भावंडं, असं मोठं कुटुंब. लहानपणापासून माझ्या घरात सामाजिक कार्यकर्त्यांचा राबता. आबानं समाजकार्य करता यावं यासाठी दोन नोकऱ्या सोडून शेवटी प्राध्यापकी पत्करलेली. सोबतीला त्याचे लढे, मोर्चे, आंदोलनं सतत सुरू असायचं. कॉम्रेड गोविंद पानसरेंपासून अनेक दिग्गज आमच्या घरी येऊन गेलेले. पानसरेकाकांना माझं गाणं खूप आवडायचं. सोपे शब्द, सहज रचनेची गाणी म्हण. अवघड लिहणं, म्हणणं सोप असतं. सोपं लिहणं, सोप म्हणणं सगळंच अवघड असतं, असं ते म्हणायचे.
आबा कधी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अजून कुठलंतरी कार्यालय यावर सतत मोर्चे न्यायचा. वंचितांचे, शोषितांचे प्रश्न वारंवार मांडायचा. अशा वेळी अधिकाऱ्यांना भेटायला आबांसह सगळे प्रमुख कार्यालयात जायचे. मग या आंदोलकांना सांभाळायचं काम आमच्यावर यायचं. त्यांनी काहीही गडबड करू नये, शांत राहावं यासाठी आबा मला त्यांच्यापुढं गाणी म्हणायला लावायचा. इथूनच जमावाला गाण्यानं कसं हाताळायचं हे शिकले. दुखः फोडणारे, वेदना मांडणारे शब्द अशा वेळी जवळचे वाटायचे. हातात फक्त डफ असायचा. तोंडी कधी सुरेश भट, कधी द. ना. गवाणकर, नारायण सुर्वे, ज्योती म्हापसेकर. तर कधी प्रेम धवन, इकबाल, साहीर.

‘बुरी है आग पेट की,
बुरे हैं दिल के दाग़ ये,
न दब सकेंगे, एक दिन
बनेंगे इन्क़लाब ये,
गिरेंगे जुल्म के महल,
बनेंगे फिर नवीन घर!
अगर कहीं है तो स्वर्ग
उतार ला ज़मीन पर!’

असे घणाघाती शब्द कानावर पडले की आंदोलकही चिडीचूप असायचे. त्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं बळ मिळायचं. हे खूप जवळून शिकले. अनुभवले. या गाण्यांनी मला अक्षरशः वेडं केलं. माझी ही आवड पाहूनच आईनं मला शास्त्रीय संगीत शिकवलं. बीएलाही संगीत होतं. सोबत विशारद केलं. एम संगीत झालं. आता पीएचडी करतेय. या सगळ्या प्रवासात राम विधाते, विजय देशमुख, आनंद पाटील, वैशाली देशमुख या गुरुवर्यांकडून भरभरून गाणं मिळालं. समाधान कविता, गाणी लिहितो. उत्तम सूत्रसंचालन करतो. हाडाचा कार्यकर्ताय. त्यामुळंच आमचं नातं जुळलं. लग्नानंतरही त्यानं माझं गाणं जपलंय. माझं गाणं ‘बाईं’नाही आवडतं. समाधनचं गाव असई (ता. भोकरदन, जि. जालना). त्याच्यासह त्याची तिन्ही भावंडं शाळेत जायची. त्याच्या बहिणीला शाळेत घातलेलं नव्हतं. तेव्हा समाधाननं शाळा सोडली. जीजाला शाळेत घातल्याशिवाय शिकणार नाही म्हणाला. तेव्हा बाईनं जीजाला शाळेत घातलं, पण तिचं शिक्षण काही पूर्ण झालं नाही. मी गावी गेले की घरातली सगळी मुलं सांभाळते. त्यांना ओळीत बसवून गाणी म्हणते. माझ्याकडं हेचं महत्त्वाचं काम असतं. असेच गावी गेले होते. मी मुलांसमोर गाणं सुरू केलं....

‘लाडकी ही मैनी म्हण,
आई शाळत घाल गं मला
लई वाटतं गं मैने मला
पण जाते मी मजुरीला
तू गेलीस शाळेत तर
कोण बघेल धाकल्याला
मैनी रडली धाईधाई
काय करू मी बाई
शिक्षणाची गाडी
धाडधाड घरावरून जाई
माझी मैनी घरातच राहिली
शिक्षणाची गाडी चालली’

गाणं संपलेलं होतं. बाईंचे डोळे पाण्यानं भरलेले. तिला ही तिचीच वेदना वाटली. आजही जीजाच्या शाळेचा प्रसंग आठवून ती आतून झुरत असते. मी कधी गेलेच सासरी तर आवर्जून ते गाणं म्हणायला लावते. माझ्यातल्या गाण्यानं अशी एकन एक माणसं माझ्याशी जोडली गेली. आता कधी बाई औरंगाबादला आल्या आणि माझा कार्यक्रम असला, की त्या हमखास माझ्या सोबत येतात. त्यांना आता चळवळ, पुरोगामी विचार व्यवस्थित समजावून सांगितल्यानं पटतायत. यापेक्षा गाण्याकडून आणि कलेकडून तरी अजून काय मोठ्या अपेक्षा. माणसाला सुंदर करणं. हे गाणं करतंय. माझी सहा वर्षांची मुलगी नभा. तिलाही गाणं आवडतं. तिचा सूर चांगलाय. तिला मी घरातच शिकवते. गाणं आता पुढच्या पिढीतही रुजतंय. एक जुना प्रसंग आठवतो. आबाचं असंच एक आंदोलन. बहुतेक जिल्हा परिषदेच्या मैदानवर होतं. महिलांचा मोठा मोर्चा होता. हजारोच्या घरात गर्दी. आबा नेहमीप्रमाणं अधिकाऱ्यांना भेटायला गेला. मी नेहमीप्रमाणं डफ काढला. त्यावर हात पडला. आयाबाया कानात प्राण आणून ऐकत होत्या.’ हे सांगताना अमरजीतनं आवाज चढवला. आता डफ नव्हता की काही नाही. तिचे शब्द अंगार होऊन कोसळत होते...

‘या तुरुंगाच्या भिंती-भिंतीमधून
हाय लेकीसुनांना चिणल्यालं
अन् पिळणाऱ्या कायद्याचं धागं
घेऊन जाळं गुलामगिरीचं विणल्यालं
या जाळ्यात अडकून,
दबल्या मनानं आता
मरत राह्याचं न्हाय गं
या देशाच्या बायांना, आया-बहिणींना
सांगाया जायाचं हाय गं
एकी करून आणि लढा पुकारून
ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं...’

बसल्या क्षणी या शब्दांनी सुन्न केलेलं. तिनचं ही कोंडी फोडली. पुढं म्हणाली, ‘गाणं संपलं. तेव्हा आंदोलकांतली एक आजीबाई तरातरा माझ्याकडं आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवला. काही कळायच्या आत खाली वाकली आणि पाया पडू लागली. मलाच कसं तरी झालेलं. ‘तुझ्यात देव दिसला माय,’ तिच्या शब्दांनी आत हेलावलं. तिची कशीबशी समजूत काढली. तिच्या आठवणींच्या पावलांचे ठसे आजही मनात रेंगाळत राहतात. गाण्यानं असं भरपूर दिलंय.’ अमरजीतसोबतच्या गप्पा संपल्या. शब्दांचे चिखलठसे असे मागे सोडून.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘सिद्धार्थ’मधील हत्ती विशाखापट्टणमला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील लक्ष्मी आणि सरस्वती या हत्तीणी नोव्हेंबर महिन्यात विशाखापट्टणमच्या इंदिरा गांधी झुऑलॉजीकल पार्कमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.

प्राणिसंग्रहालयात हत्ती ठेवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असतानाही महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात दोन हत्ती अद्यापही आहेत. साखळदंडांनी बांधलेल्या हत्तींच्या संदर्भात हायकोर्टाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात स्युमोटो याचिका दाखल झाली आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी झुऑलॉजीकल पार्कशी संपर्क साधून हत्ती घेवून जाण्याबद्दल पुन्हा एकदा विनंती केली. प्राणिसंग्रहालयात हत्ती ठेवता येणार नाहीत, असे आदेश सेंट्रल झू ऑथॅरिटीने दिल्यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाने २००९पासून हत्ती पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला. तरीही प्रशासनाने इंदिरा गांधी झुऑलॉजीकल पार्कशी संपर्क साधून हत्तींच्या स्थलांतराबद्दल कार्यवाही सुरू केली, परंतु औरंगाबाद ते विशाखापट्टणम हे अंतर जास्त असल्यामुळे व एका हत्तीणीचे वय दूरचा प्रवास सहन करण्यासारखे नाही. त्यामुळे हत्ती घेवून जाण्याबद्दल झुऑलॉजीकल पार्कच्या व्यवस्थापनाने अस्ते कदम कार्यवाही सुरू केली.

हत्तींचे प्रकरण कोर्टात दाखल झाल्यावर प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने विशाखापट्टणमशी संपर्क साधला. हत्ती घेवून जाण्याबद्दल विनंती केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झुऑलॉजीकल पार्कच्या व्यवस्थापनाने ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हत्ती घेवून जाण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे हत्तींनी घेवून जाणे शक्य होणार नाही. हिवाळ्यात प्रवासात तेवढा त्रास होत नाही आणि रस्त्यात अडचणी येण्याची शक्यता देखील कमी असते, असे झुऑलॉजीकल पार्कच्या व्यवस्थापनाने कळवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हायकोर्टाच्या दट्ट्यानंतर नोव्हेंबर महिन्यात हत्ती रवाना होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

0
0



म. टा. प्रतिनिधी, पैठण

तालुक्यातील थेरगाव येथे शनिवारी शेततळ्यात बुडून असद नासिर पठाण (वय १८) याचा मृत्यू झाला. ईदच्या दिवशी दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. तो बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. ईदची नमाज अदा केल्यानंतर सकाळी बकऱ्यांना चारा आणण्यासाठी असद व त्याचा बारावर्षीय चुलत भाऊ मोटारसायकलवर शेतात गेले होते. चारा जमा केल्यानंतर, त्याने तळ्यात अंघोळीचा निर्णय घेतला. तेव्हा तोल जावून तो तळ्यात ही बाब लक्षात येताच चुलत भावाने मदतीसाठी इतरांना बोलावले. ग्रामस्थांनी असदला बाहेर काढून उपचारासाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मोदक स्पर्धेत डॉ. खंगार विजयी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित मोदक स्पर्धेला शनिवारी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उस्मानपुरा येथील हॉटेल अॅडमिरल सूट येथे झालेल्या स्पर्धेत डॉ. प्रीती खंगार यांनी पहिला, शीतल बाहेती आणि आरती शर्मा यांनी अुनक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.

मोदक हा गणरायाचा आवडता पदार्थ. गणेशोत्सवात घराघरात प्रसाद म्हणून मोदक तयार केला जातो. हेच लक्षात घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास स्पर्धा सुरू झाली. महिलांनी मोदक घरून तयार करुन आणले होते. सजावटीसाठी अर्धा तास देण्यात आला होता. त्यानंतर परीक्षक मनिषा यादव व मंजुषा शाहीर यांनी मोदकांचे परीक्षण केले. स्पर्धकांनी उकडीचे, शक्तीवर्धक, शाही, ड्रायफूट, चॉकलेट, तांबुली यासह विविध प्रकारचे मोदक या स्पर्धेत तयार केले होते.

चव, सजावट, सादरीकरण या निकषावर डॉ. प्रीती खंगार यांनी स्पर्धेत बाजी मारली. त्यांनी ‘शाही मोदक थीव चॉकलेट’ या प्रकारचे मोदक तयार केले होते. तर द्वितीय क्रमांक शीतल बाहेती, तर तृतीय क्रमांक आरती शर्मा यांनी पटकाविला. त्यांनी अुनक्रमे शक्तीवर्धक आणि काजम मोदक तयार केले होते. महाराष्ट्र टाइम्सचे सिनीअर असिस्टंट एडिटर प्रमोद माने यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कल्पना पारिख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्पर्धकांचा उत्साह
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचा उत्साह अवर्णनीय होता. त्यांनी मोदकाचे अनेक प्रकार तयार केले होते. उपवासाचे, कोझू कट्टाई, भिजलेल्या हरबरा दाळीचे, झटपट, शेवयाचे, तिखट, इडली, मिल्क, कोकोनट यासह अनेक नाना पदार्थ वापरून त्यांनी मोदकाची लज्जत वाढवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीतून उमरगा तालुक्यातून गेलेल्या सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता चौपदरीकरणाचे कर्नाटक सीमेपर्यंतचे काम कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने झालेल्या रस्त्याच्या कामावर पुढचे काम सुरू असतानाच मागील झालेल्या रस्त्याच्या कामावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम झाले असून, दोन ठिकाणी तर या पूलाचा वापर करण्याअगोदरच हे पुल खचून बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळई उखडल्याने वाहनधारकांना येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान पर्यायी मार्गासाठी जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून हे जुने पूल वाहतुकीसाठी खुले केले असले, तरी या ठिकाणचा बाजुचा भराव ढासळल्याने मोठे भगदाड पडले. त्यामुळे महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या नव्याने होत असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असून, या रस्त्याचीही वापर करण्यापूर्वीच दयनीय अवस्था झाली आहे. येथील चौपदरीकरणाचे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे, याचे बघताक्षणी दर्शन घडत असले, तरी याकडे संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार, तालुक्यातील दोन्ही आमदार, खासदार यांच्यासह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील तुळजापूर व उमरगा तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर खानापूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्याची सीमा असलेल्या तालुक्यातील धाकटीवाडी गावापर्यंतच्या ७० किलोमीटर अंतरावरील चौपदरीकरण व जुन्या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे, दोन्ही बाजूची साईडपट्टी एक ते दीड फूट खोल खचली आहे. त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीवरील अनेकजण रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होवून अनेकांचे बळी देखील गेला आहे. तर कित्येकजण जायबंदी झाले आहेत. दुसरीकडे या महामार्गावर काही ठिकाणी नवीन रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने कामे पूर्ण होण्याआधीच मोठमोठे खड्डे पडले आहेत.
तलमोड शिवारात घाईगडबडीत नवीन पुलाचे काम करण्यात आले आहे. बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या उखडल्या आहेत. त्यामुळे हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे. दाबका शिवारातील हत्तीनाला जुन्या पुलाच्या बाजूलाच खडकाचा भराव वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तर बलसूर येथील नवीन पुलावर देखील सळई उखडल्याने हा नवीन पूल धोकादायक बनला आहे. हा सर्व प्रकार उघड दिसत असताना संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डोळेझाक करीत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

या मार्गावर रात्रंदिवस धावत असलेल्या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने खड्डे चुकविताना वाहन पलटी होणे, समोरासमोर धडक बसणे, खड्ड्यात वाहन अडकून बंद पडणे आदी कारणाने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक करणार्या वाहनांसह अन्य प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


अधिकारी, लोकप्रतिनिधींची डोळेझाक
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे हा रस्ता म्हणजे अधिकारी, ठेकेदारांचे व अधिकाऱ्यांचे कुरण बनल्याचे बोलले जात आहे. शासनाकडून रस्त्यावर कोट्यवधी रुपयाचा चुराडा होत असताना वरिष्ठ अधिकारी कामाची पाहणी करण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करताना कामाचा दर्जा, गुणवत्ता, क्षमता यासाठी लागणारे साहित्य कोणते, किती प्रमाणात वापरायचे ? याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ साकारली गणेशाची ५१ रूपे !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गणेशोत्सवात श्रद्धा आणि विधायक उपक्रम यांचा सुरेख संगम बन्सीलालनगर येथील शिंदे कुटुंबात पहायला मिळत आहे. शाडू मातीच्या ५१ मूर्ती तयार करून शिंदे यांनी स्थापना केली आहे. वैविध्यपूर्ण आकार आणि रंग संगती असलेल्या मूर्ती भाविकांसाठी आकर्षण ठरल्या आहेत.

मागील चार वर्षांपासून कैलास शिंदे यांच्या कुटुंबाचा गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. गणेशाची वैविध्यपूर्ण रूपे या उत्सवाचे वैशिष्ट्य. शाडू मातीच्या तब्बल ५१ मूर्ती स्वतः तयार करून त्यांची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे गणेशमूर्ती घरी तयार केल्या आहेत. यावर्षी अभियंता आकाश शिंदे यांच्यासह आई सुनिता शिंदे व भाऊ आशीष शिंदे यांनी अतिशय सुंदर, रेखीव व वेगवेगळ्या आकारातील मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास १० किलो शाडू माती लागली. चार वर्षांपासून सराव झाल्यामुळे यंदा अवघ्या एका आठवड्यात ५१ मूर्ती तयार झाल्या. तीन ते दहा इंच आकाराच्या मूर्तींचा आकार आणि सौंदर्य नजरेत भरणारे आहे. आतापर्यंत शिंदे यांच्या घरी २५५ मूर्तींची निर्मिती व स्थापना झाली आहे. शाडू मूर्तीच्या गणेश स्थापनेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षी नोकरीनिमित्त आफ्रिकेत असलेल्या कैलास शिंदे यांनी तिथेसुद्धा शाडू मातीची मूर्ती तयार करून स्थापना केली.

प्रत्येक मूर्तीचा आकार आणि वैशिष्ट्य वेगळे आहे. सुबक मूर्ती घडवण्यावर भर दिल्यामुळे काम लवकर झाले. शाडू मातीची मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नसल्याचा संदेश या उपक्रमातून दिला आहे. - आकाश शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महाकाल प्रतिष्ठानच्या ढोल पथकाची मुहूर्तमेढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या विविध भागातील युवक - युवतींनी एकत्र येऊन महाकाल प्रतिष्ठान हे ढोलपथक यावर्षी सुरू केले. जगभरात आपल्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा ज्या गोष्टींमुळे ओळखला जातो. ती आपली संस्कृती जपण्याचा व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा युवक-युवतींना आवडेल असा मार्ग म्हणजे हे ढोल- ताशा पथक.

पारंपरिक वेशभूषा , हिंदू धर्मातील देव-देवतांच्या घोषणा , ऐतिहासिक महापुरुषांवरती लिहिले गेलेली स्तुती गीते व त्यावर बसवलेल्या ढोल वरील विविध ढोल-ताशांच्या चाली हे महाकाल प्रतिष्ठान ढोल पथकाचे वैशिष्ट्य आहे. वर्षभरात गुढीपाडवा, रामनवमी, शिवजयंती व गणेशोत्सव या चारही सणांना महाकाल ढोल पथक विविध ठिकाणी आपले सादरीकरण करत आहे. ६० चामडी ढोल, १५ ताशे, संबळ, कच्छी एवढी वाद्यसंख्या प्रतिष्ठानकडे आहे. वाद्यसंख्येसोबत वादनातील गुणवत्ता यावर प्रतिष्ठानकडून अधिक भर दिला जातो. पथकात ६० युवक व ४० युवतींचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरापासून केलेला सराव हा प्रत्येक सदस्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यासक्रम केल्यासारखे असल्याची भावना संयोजकांनी व्यक्त केली. यंदाच्या गणेशोत्सवात महाकाल प्रतिष्ठानचे ढोल पथक निश्चितच शहरवासियांसाठी पर्वणी ठरणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबवण्याचा सदस्यांचा मानस आहे.

ढोल पथकाची व महाकाल प्रतिष्ठान या ग्रुपची व्यवस्था चोखपणे पार पाडणाऱ्या प्रमुखांमध्ये सौरभ यादव, अभिषेक कादी, अमेय एकबोटे, श्रीनिवास देव, हर्षल दुबे, भूषण एकबोटे, नचिकेत इंगळे, तेजस महाराज, केदार एकबोटे, अनिकेत तिवारी, सौरभ अग्रवाल, आशिष सुरळे, शुभम शिरसळकर, नहूश कस्तुरे, प्रमोद भोरे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशोत्सवात सजीव देखाव्यातून प्रहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील गणेशोत्सवातून सजीव देखवे हळुहळु कमी होत आहेत. पण, चिकलठाणा येथील गणेश मंडळांनी सजीव देखाव्यांचे वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. यंदाही मंडळांनी सजीव देखाव्यातून सामाजिक समस्यांवर बोट ठेवले आहे.
चिकलठाणा भागात अनेक वर्षांपासून काही मंडळे सजीव देखावे सादर करण्यावर भर देतात. सावता गणेश मंडळाने ‘द्रौपदी स्वयंवर’, अचानक गणेश मंडळाने ‘अवयवदानाचे वाढते महत्त्व’, जयमराठा गणेश मंडळाने ‌‘विठ्ठल भक्ती’, सिद्धीविनायक गणेश मंडळाने ‘वृद्धाश्रमाचे वाढते प्रस्थ’ या विषयांवर सजीव देखावे सादर केले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी शनिवार आणि रविवारी प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी सोमवारी वाढले, असा अंदाज कार्यकर्त्यांनी केला. सावता गणेश मंडळ १९८४ पासून सजीव देखावे सादर करते. यापूर्वी सीता स्वयंवर, रामसेतू, द्रौपती वस्त्रहरण आदी देखावे आकर्षण ठरले होते. यंदा द्रौपदी स्वयंवर हा देखावा केला आहे. त्यात ५० पेक्षा अधिक कलाकार आहेत. हा देखावा शुक्रवारी रात्री सुरू करण्यात आला. दहा मिनिटांचे रेकॉर्डिंग आणि त्यावर नाटिकेचे सादरीकरण केले जाते. द्रौपदीची भूमिका प्रवण नवपुते यांनी केली असून मोरेश्वर धोतरे यांनी अर्जून साकारला आहे. जय मराठा गणेश मंडळाने गणेशभक्ती आणि वारकरी संप्रदायातील विविध संत या संकल्पनेवर आधारित सजीव देखावा केला आहे. हा २२ जणांचा गट आहे. शिवाय २० फुटांची विठ्ठल मूर्ती चित्त वेधून घेते. अचानक गणेश मंडळाने यंदा शहरात अवयवदानाची वाढती जनजागृती कशी झाली आहे हे दाखवले आहे. ब्रेन डेड होणे, यानंतर डॉक्टरांचे समुपदेशन, अवयवदान व ऑपरेशन हा घटनाक्रम सजीव देखाव्यातून अचूक मांडला आहे. अवयवदान ही काळाची गरज आहे हा संदेश देण्यात आला आहे.

शंभर कोटींच्या रस्त्यांवर भाष्य

संस्थान गणपती गणेश मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या सजीव देखाव्यात रंगकर्मी प्रा. राजू सोनवणे यांनी चालू घडामोडींवर मार्मिक भाष्य केले आहे. शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झालेला शंभर कोटींचा निधी; त्यातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांमुळे ‘मार्ग’ निघतो की शहराची ‘वाट’ लागते, असा प्रश्न ही नाटिका गणेश भक्तांसमोर उपस्थित करते. शहागंजमधील नवसार्वजनिक गणेश मंडळाने जम्मू-काश्मीर येथून पथक आणले आहे. हे पथक नृत्य नाटिका सादर करत आहे. या मंडळातील आनंद भारूका, कैलास माने, सुनील अग्रवाल, राजू जहागीरदार हे परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीर बलराम पथकाला दहा वर्षांपासून पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्रातील लोक‌प्रिय पावलीची परंपरा रंगारगल्ली येथील वीर बलराम गणेश मंडळाने राखली आहे. मंडळाच्या पावली पथकात ४०० जणांचा सहभाग आहे. हे पथक विसर्जन मिरवणुकीत सर्वांचे आकर्षण असते. पथकातील वाद्यांचा ठेका जागेवर खिळवून ठेवणारा आहे. हे मंडळ दहा वर्षांपासून उत्कृष्ट पावली पथकाचा पुरस्कार पटकावत आहे.
वीर बलराम गणेश व क्रीडा मंडळाची स्थापना २००६ मध्ये चेतन जांगडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. उत्साही तरुणांच्या या मंडळाने अल्पवधीतच गणेशोत्सवात स्थान निर्माण केले. मंडळाच्या पावली पथकात ४०० व ढोल पथकात ७२ जणांचा समावेश आहे. त्यापैकी ३५ जण ढोलवादक, सात ताशे व चार कच्छी हे राजस्थानी वाद्य वाजवतात. टोल आणि झांजचा सुमधूर नाद, पावली पथकात वेगळीच रंगत निर्माण करते. गणपती आगमनाच्या १५ दिवसपूर्वीपासून पथकाचा सराव सुरू होतो. ढोल पथकाचे मार्गदर्शक अमीत पुजारी दररोज साडेतीन ते चार तास सराव करून घेतात. यामध्ये सोळा ते वीस चाली बसवण्यात येतात.

पावली पथक असल्यामुळे मुख्यतः पावलीचाच सराव करून घेतला जातो. ढोल पथकामध्ये कच्छी, ताशा व ढोल, टोल व झांजचा समावेश असल्यामुळे पावली खेळताना वेगळीच रंगत चढते.
‌-अमित पुजारी, प्रशिक्षक

दहा वर्षापासून आमचे मंडळ उत्कृष्टपणे पावली पथक सादर करीत आहे. मंडळातील सर्व सदस्य एकत्रीतपणे व शिस्तीमध्ये सादरीकरण करतात. पावली हा पारंपारिक नृत्यप्रकार जपण्यावर आमचा भर आहे.
-चेतन जांगडे, मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिर्डी येथे दोन एकरात साकारले बाप्पा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथील शेतकरी व कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, अलका कोरडे यांनी ‘निसर्गराजा गणेश’ हा पर्यावरणपूरक गणरायाचा देखावा तयार केला आहे. गहू, ज्वारी व मका याचे ४५ किलो बियाणे यासाठी वापरण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी पेरलेल्या बियाणातून अडीच ते तीन फूट उंचीचे गणराय, मूषक आणि शिवलिंग साकारले आहे.
‘आमच्या आठ एकर पैकी दोन एकरात दोन महिन्यांपूर्वी आम्ही देखावा साकारण्यास सुरवात केली. पाणी बचत आणि पाण्याचा जपून वापर, पर्यावरण संदेश देतानाच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा संदेश या देखाव्यातून करण्यात आला आहे. दोन हजार फूट मल्चिंग पेपरचा वापर करून गणपती, मूषक, शिवलिंगाची आखणी केली. त्यात २५ किलो मका व प्रत्येकी १० किलो ज्वारी आणि गहू पेरले. तृणधान्याची दोन महिन्यात चांगली उगवण झाली. गणेशाची ही प्रतिमा २०० बाय ४०० फूट आकाराची दिसत आहे.
देखावा तयार करण्यासाठी खिर्डीचे किशोर हिवर्डे, रमेश हिवर्डे, राजू राठोड, वैभव कोरडे, कैलास खंदारे, चंद्रमणी जायभाये, संजय राठोड, अतुल सावजी, प्रल्हाद गायकवाड, भाउसाहेब घुगे, संजू जहागिरदार, अतिक पठाण, शेख मजहर, राजू दौड, संतोष गायकवाड, अनिल गावंडे यांनी पुढाकार घेतला.

चित्रीकरण दाखवणार

या देखाव्याचे चित्रीकरण ड्रोण कॅमेऱ्याद्वारे करण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात वेगवेगळ्या सहा ठिकाणी एलसीडीवर ते दाख‍वण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी तोबा गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आकर्षक विद्युत रोषणाई, पौराणिक व सामाजिक देखाव्यांपासून ते कठपुतळीच्या देखाव्यांनी गणेश भक्तांचे लक्ष वेधले. शनिवार, रविवारची सुटीचा आनंद घेत नागरिकांची देखावे पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली. मध्यवर्ती शहरात सजीव आणि निर्जीव देखाव्यांनी धम्माल उडवली.
शहरातील अनेक गणेश मंडळे सजीव, निर्जीव देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवात सात-आठ दिवसानंतर देखावे पाहण्यासाठी गर्दी होते. रविवारी मध्यवर्ती शहरातील विविध गणेश देखावे, मूर्ती पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. सकाळी अनेक गणेश मंडळांनी महाप्रसाद तसेच रांगोळी, रक्तदान शिबिर घेतले. सायंकाळी सातनंतर देखाव्यांना सुरुवात झाली. आकर्षक रोषणाई, मूर्ती, देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलेल्या गर्दीने मध्यवर्ती शहरातील रस्ते फुलून गेले होते. रोषणाईसह, गाण्यांमुळे उत्साहाचा माहोल तयार झाला. जाधवमंडीतील यादगार गणेश मंडळाचा ‘श्रीकृष्ण दर्शन’देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यासह पानदरिबामधील श्री जागृत हनुमान गणेश मंडळात महाआरती करण्यात आली. मंडळाची गणेश मूर्ती आकर्षक आहे. जबरे हनुमान गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, चौराहातील सिद्धीविनायक गणपती मंडळाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. रंगार गल्लीमधील मंगलमूर्ती मित्र गणेश मंडळाचा कठपुतळीचा देखावा लक्षेवधक होता. ‘झिंग झिंग झिंगाट’सारख्या गाण्यांवर ठेका धरत नाचणाऱ्या बाहुल्या पाहताना मुले हरखून गेली.गणेशोत्सवातील देखावे आणि आकर्षक रोषणाई मोबाइलमध्ये टिपण्यासाठी भाविक पुढे होते. देखाव्यांचे चित्रण करण्यातही अनेकजण दंग होते.

‘बाबा’ प्रकरणावर प्रकाश

रामरहीम बाबा याला कोर्टाने शिक्षा ठोठावल्याने बुवाबाजी पुन्हा चर्चेत आली आहे. यावर गणेश मंडळांनी प्रकाश टाकत नागरिकांचे लक्ष वेधले. जबरे हनुमान मंदिर परिसरातील शिवनेरी बाल गणेश मंडळातील सदस्यांनी बुवाबाजीवर प्रकाश टाकणारा सजीव देखावा सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवः नागरिकांना स्वच्छतेची शपथ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या हेतुने विविध भागात जिल्हा गणेश महासंघातर्फे ‘स्वस्थ रहा, मस्त रहा’ या पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. पथनाट्याद्वारे मसनतपूर येथील नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
मसनतपूर येथील महापालिकेच्या शाळेजवळ स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ‘स्वस्थ रहा, मस्त रहा’ पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. अभियानातील कलाकारांनी शौचालयांचे महत्त्व पथनाट्यातून सादर केले. उघड्यावर शौचास न बसता नागरिकांनी शौचालयांचा वापर करावा, आपल्या अवती-भवतीचा परिसर कचरा मुक्त ठेवावा, साबणाने स्वच्छ हात धुवावेत, असे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले. प्रारंभी पथनाट्याचे उदघाटन महापालिका घनकचरा कक्षप्रमुख भालचंद्र पैठणे, रवींद्र वासनिक, स्वच्छता निरीक्षक रवीकुमार कुलकर्णी, वॉर्ड अध्यक्ष सविता करपे, अमोल अपसिंगेकर यांच्या उपस्थितीत झाले.
पथनाट्याचे सादरीकरण सचिन कुंभार, प्रियंका पाटील, सिद्धांत करवाडे, प्रवीण पारधे, गंधाली जोशी, दत्ता काटकर या कलाकारांनी केले. यावेळी परिसरातील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेतले. पथनाट्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघांचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, समितीचे अध्यक्ष राजू शिंदे, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, नंदकुमार घोडेले, गोकुळ मलके, कल्याण गायकवाड, राजू पाटील, रुपाली वाहुळे, बी. के. जोशी, अजय शिंदे, शंकर म्हात्रे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखाव्यातून नवीन-जुन्या वाद्यांची ओळख

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देवानगरी येथील गृहिणी संध्या पाटील यांनी गणपतीच्या वाद्यांचा देखावा तयार केला आहे. गणेशाच्या मूर्तीभोवती ९ ते १० वाद्ये मांडली असून त्यात काळाच्या पडद्याआड गेलेल्या ग्रामोफोनसारख्या काही वाद्यांचा समावेश आहे. त्यांनी शाडूची मूर्ती स्थापन केली असून सजावटीसाठीही पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे.
देवानगरीतील पाटील कुटुंबात गणेशोत्सवानिमित्त देखावा सादर करण्याची परंपरा आहे. यापूर्वी संध्या सतीश पाटील यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव, श्रीकृष्ण लिला, चातुर्मासातील सण असे विषय घेऊन देखावे सादर केले आहेत. यावर्षी नादब्रह्मातील गणेशाचा देखावा तयार केला आहे. गणपतीला आवडणाऱ्या वाद्यांचे एक जुने कॅलेंडर त्यांच्याकडे होते. यावरून या देखाव्याची कल्पना सूचली. देखाव्यात वाद्यांची चित्रे न लावता वाद्ये मांडण्याचा मानस होता. त्यांनी नातेवाईक, मित्र, परिचितांकडून एक महिन्यापासून वाद्यांची जमवाजमव केली. तबला, ढोलकी, हार्माेनियम, डफ, तंबोरा, बासरी, पियानो, खंजिरी, टाळ, चिपळी, ग्रामोफोन आदी वाद्ये मांडली आहेत.
ग्रामोफोन हे खरे पर्यावरणपूरक वाद्य असून तो सुरू करण्यास वीज किंवा इतर कोणतीही उर्जा लागत नाही. याची नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी हे वाद्य मांडल्याचे संध्या पाटील यांनी सांगितले. वाद्यांसोबत त्याची माहिती आहे. सजावटीसाठी प्लास्टिकचे झिरमिरे, चायना मेड लायटिंगचा वापर टाळला आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी रांगोळी लक्ष वेधून घेते. त्यांना पती सतीश पाटील आणि मुले सुशांत आणि श्रेयस यांनी सहकार्य केले.

आम्ही दरवर्षी एक थीम घेऊन देखावा तयार करतो. यानिमित्ताने घरातील सर्व सदस्य एकत्र येतात. देखावा पाहण्यासाठी येणाऱ्यांना संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नादब्रह्मातील बाप्पा तयार करतांना खूप मजा आली.
-संध्या पाटील, देवानगरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यार्थी घडवणे हेच शिक्षकाचे दायित्व’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘चांगले विद्यार्थी-माणसे घडवणे शिक्षकाचे दायित्व असते. चारित्र्य व स्वाभिमान टिकवून डॉ. सतीश बडवे यांनी विद्यार्थी घडवण्याचे व्रत स्वीकारले. नोकरीत ज्या गोष्टी करणे अवघड गेले, त्या गोष्टी करण्यासाठी डॉ. बडवे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अधिक जबाबदारी आहे’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले. डॉ. सतीश बडवे यांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. भानुदास चव्हाण सभागृहात रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. अशोक कामत, प्रकाशक सुमती लांडे, डॉ. सतीश बडवे व जयंती बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांनी बडवे यांचा विशेष सत्कार केला. यावेळी बडवे यांच्या कार्यशैलीवर डॉ. कामत यांनी भाष्य केले. ‘जो मनुष्य नेहमी अभ्यास करतो तो चांगले शिकवू शकतो. बडवे नेहमीच अभ्यासात झोकून देत असल्यामुळे विद्यार्थिप्रिय ठरले. संत साहित्यात त्यांचे योगदान आहे. विद्यापीठात काम करताना वेळ वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर ते अधिक महत्त्वाचे काम करतील,’ असे कामत म्हणाले.

तर रंगनाथ पठारे म्हणाले, ‘सर्व जाती-धर्माला सामावून घेतलेल्या गंगा-जमुनी संस्कृतीचा बडवे यांनी नेहमीच उत्सव केला. कामाशी गुंतवून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. या प्रकारचे गुण आत्मसात करून जगता आले पाहिजे हा धडा त्यांनी विद्यार्थ्यांना घालून दिला.’ या सत्काराला उत्तर देताना बडवे यांनी विद्यार्थी व गुरू यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘शिक्षकी पेशात येण्यापूर्वी पोटासाठी पत्रकारितेचे काम केले. कृतज्ञता बाजूला ठेवण्याची गोष्ट असल्याच्या भावनेतून शिकवले. विद्यार्थ्यांनी मला नेहमी सजग ठेवले. यातून मला घडण्याची प्रेरणा दिली. आपण अभ्यासाच्या सोयीसाठी हवाबंद कप्पे तयार केले आहेत. संत साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य असे कप्पे अधिक घट्ट झाले. त्यामुळे समीक्षा करण्यासारखे वातावरण राहिले नाही. चांगले काम असल्यास काम देणारेसुद्धा वाट पाहतात’ असे डॉ. बडवे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात ‘संतसाहित्यमिमांसा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा. ताहेर पठाण, प्रा. सुधाकर शेलार, बाबूराव दूधगावकर, तुषार चांदवडकर, प्रा. एल. जी. सोनवणे, ज्ञानेश्वर गाडे, विजय शेवाळे, डॉ. अशोक देशमाने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. दैवत सावंत, प्रा. वाल्मिक वाघमारे, न. भ. कदम, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. सचिन मुंडे, प्रणव बडवे आदींनी परिश्रम घेतले.

आता संशोधनाचे काम
सेवानिवृत्त झाल्यानंतर संशोधनात्मक काम करणार असल्याचे डॉ. सतीश बडवे यांनी जाहीर केले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या मध्ययुगीन साहित्यावरील प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात पदरचनेबाबत संशोधन करून मांडणी करण्याचे काम डॉ. बडवे करणार आहेत. संत साहित्यावर सातत्याने दर्जेदार लेखन करून बडवे यांनी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. ‘माझ्यावर गौरवग्रंथ काढून आरती ओवाळण्यापेक्षा संदर्भमूल्याचा ग्रंथ प्रकाशित करा,’ असे बडवे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. त्यानुसार ‘संतसाहित्यमिमांसा’ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशोत्सवः वर्गणी न घेता समाजोपयोगी काम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हजारो रुपयांची वर्गणी जमा करून भरमसाठ व भपकेबाज देखावे आणि मनोरंजनावर खर्च करणारी मंडळे अमाप आहेत. परंतु, देखावे व मनोरंजनाला फाटा देत पूर्णपणे सामाजिक उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करून समाजभान जपणाऱ्या मोजक्या मंडळांमध्ये गांधीनगर (बन्सीलालनगर) गणेश मंडळाचा समावेश होतो. विशेष म्हणजे वर्गणी न करता दानपेटीमध्ये जमा होणाऱ्या रकमेतून एक दशकापासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
‘विना वर्गणीचा गणपती’ म्हणून गांधीनगरचा गणपती ओळखला जातो. कोणतीच कार्यकारिणी नसलेल्या या मंडळातर्फे मागच्या दहा वर्षांपासून कोणत्याही वर्गणीशिवाय गणपतीसोबतच दहीहंडी, होळीपूजनही केले जात आहे. मंडळाकडून मागच्या दहा वर्षांपासून न चुकता नामवंतांची व्याख्यानमालाही होत आहे. दरवर्षी कोणाच्या तरी घराच्या परिसरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. तिथेच दानपेटी ठेवली जाते आणि त्यात २५ ते ३० हजार रुपये सहज जमा होतात. त्यातूनच सर्व उपक्रम राबविले जातात. ११६ बंगले आणि सुमारे ४०० लोकसंख्या असलेल्या गांधीनगरमध्ये घरकाम, बागकाम यासह वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देणाऱ्या ३७६ बीपीएल व्यक्तींची व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ५८ व्यक्तींना चष्म्यांचे वाटप करून १० व्यक्तींवर जालन्यातील गणपती नेत्रालयात मंडळातर्फे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ४१ जणांची दंत तपासणीही करण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये सेवा देणाऱ्या वॉचमन, भांडेवाली, धुणेवाली आदी ८५ कर्मचाऱ्यांची प्रत्येकी ७५ हजारांची मोफत अक्सिडेंट विमा पॉलिसीदेखील मंडळामार्फत काढण्यात आली आहे. उत्तम काम करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. कॉलनी परिसरातील पालिकेच्या आरोग्य केंद्रात वृक्षारोपण-वृक्षसंगोपनही करण्यात आले आहे. मंडळाने पुढाकार घेऊन कॉलनीतील प्रत्येक घरावर क्रमांक व लोखंडी फलक लावण्यात आले आहेत. शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या मेघालयातील गोरगरीब मुलींना महिन्याभराचा तांदूळ, तर लहुजी साळवे केंद्रातील मुलांना कपडे-धान्य वाटपही करण्यात आले आहे. तसेच मंडळातर्फे दरवर्षी खास पारंपरिक खेळांच्या स्पर्धाही होतात; परंतु विजेत्यांना पारितोषिके न देता सर्व सहभागींना केवळ एक-एक पेन देऊन साधेपणाने स्पर्धा होतात. याशिवाय अनेक उपक्रमांसाठी मंडळाचे राजेंद्र झवर, रतनसीभाई पटेव, प्रा. विष्णू बजाज, आशिष भारुका, विनीत दर्डा आदी मंडळी सर्दैव कार्यरत असतात.

मंडळामुळेच ‘ती’ इंजिनीअर

गांधीनगरमधील एका मुलीला तिच्या कुटुंबाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे चांगले गुण मिळूनही इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येणे शक्य नसल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना लक्षात आले. त्यामुळे मंडळाने पुढाकार घेऊन ही बाब मधुकरराव मुळे यांच्या कानावर घातली आणि मुळे यांनी तिला प्रवेश मिळवून देत निम्मे शुल्क माफ केले. गणेश मंडळाने चारही वर्षांचे निम्मे शुल्क भरले आहे. केवळ मंडळामुळेच कॉलनीतील ही मुलगी इंजिनीअर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा १२० कोटींचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर राज्य मंत्रिमंडळाची ऑक्टोबर महिन्यात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी विद्यापीठाने १२० कोटी रुपये निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. वसतिगृहे, सायन्स पार्क, बारकोडींग सेंटर, गेस्ट हाऊस या प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता आहे.

मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्नांवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विभागांचे नवीन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन नियोजित कामांसाठी १२० कोटी रुपये निधीचा प्रस्ताव सादर करणार आहे. वसतिगृहे पुरेशी नसल्यामुळे विद्यापीठात दोन वसतिगृहे बांधण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे तातडीने वसतिगृहे उभारण्याची गरज आहे. या कामासाठी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे; तसेच बी. व्होकेशनल आणि एम. व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत व प्रयोगशाळेची गरज आहे. या कामासाठी २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सायन्स पार्क निर्मितीचा प्रकल्प निधीअभावी बारगळला आहे. या पार्कसाठी समिती स्थापन करण्यात आली असली, तरी सहा वर्षांपासून कामकाज झाले नाही. या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपयांची गरज आहे. डीएनए बारकोडिंग सेंटरसाठी दहा कोटी आणि व्हीआयपी विश्रामगृहासाठी दहा कोटी रुपये निधी गरजेचा आहे. विद्यापीठ प्रशासनाने विविध प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची सविस्तर माहिती देणारा प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात विभागीय आयुक्तांकडे ही माहिती सादर केली जाणार आहे. चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सामावून घेत असलेल्या विद्यापीठाचे प्रश्न निधी नसल्यामुळे ‘जैसे थे’ आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावावर चर्चा होऊन निधी मिळाल्यास प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे वसतिगृहे अपुरी पडत आहेत. जुनी वसतिगृहे पाडून नवीन तीन-चार मजली वसतिगृहे उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या निधीतून तातडीने वसतिगृहे उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

विद्यापीठात वसतिगृहे, गेस्ट हाउस, सायन्स पार्क यांच्यासाठी निधीची गरज आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- डॉ. वाल्मिक सरवदे, विशेष प्रभारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाचा गणपतीः राजुरीचा नवगण

0
0

बीड जिल्ह्यातील राजुरीचे नाव नवगण गणपतीसाठी ओळखले जाते. राजुरी नवगण हे गणेशाचे स्थान बीडशहरापासून अहमदनगर रस्त्यावर दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या पंचक्रोशीत नवगण म्हणजेच नऊ गणपतीची स्थाने आहेत. त्यामुळे या गणपतीस नवगण व गावास नवगण राजुरी या नावाने मराठवाड्यात ओळखले जाते. या गणपती मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे चार दिशेला चार गणेश मूर्ती एकाच ठिकाणी एका दगडावर पाहायला मिळतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार दिशेला चार गणपतीची रुपे एकाच शिळेवर एकत्र आहेत. पूर्वेकडे मुख असलेला ‘महामंगल’, पश्चिमाभिमुख ‘शेषाब्धिष्ठित’, दक्षिणाभिमुख ‘मयूरेश्वर’ आणि उत्तराभिमुख ‘उतीष्ट’ हे चार गणपती. या मूर्ती वेगवेगळ्या आसनात अंदाजे पावणेचार फूट उंचीच्या आहेत. हे मंदिर पेशवेकालीन असून मंदिरात पाच व गावाच्या चार वेशींवर चार गणपती
आहेत. त्यामुळे या स्थानाला नवगण राजुरी म्हणतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. या पद्धतीने एकाच ठिकाणी गणेशाची चार रुपे एकाच दगडात साकारलेले गणेशस्थान भारतात दुसरीकडे नाही. या चार दिशेच्या गणेशाचे दर्शन चारी दिशेने घेता येते. पाचवी मूर्ती गाभाऱ्यात आहे. नवगण राजुरीत चतुर्थी आणि गणेश उत्सवात भक्तांची मांदियाळी असते.
-अतुल कुलकर्णी, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेव वन उद्यानाच्या अंदाजपत्रकास मान्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
वेरूळ येथील लेण्यांच्या पायथ्याशी सुमारे १२ एकरात साकारण्यात येणाऱ्या महादेव वन उद्यानातील कामांना आता चालना मिळणार आहे. उद्यानातील विविध स्थापत्य कामांच्या एक कोटी ९९ लाख ४८ हजार ८३ रुपयांच्या अंदाजपत्रकास महसूल व वनविभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी २०१६ रोजी महादेव वन उद्यानाच्या कामाचे उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी मुनगंटीवार यांनी उद्यानाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. पण, वेरूळ येथे वनविभागाच्या मालकीची सुयोग्य जागा नसल्यामुळे उद्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर साकारण्यात येणार आहे. पहिल्यावर्षी चेन लिंक, तार कुंपण, निसर्ग पाऊल वाटा, वृक्ष वनस्पती लागवड आदी कामे करण्यात आली. माहितीफलक, प्रवेशद्वार, विद्युतपुरवठा, सोलर लाइट, पाणीपुरवठा, नालाबांध, स्वच्छतागृहे, सुरक्षारक्षक कक्ष, नाल्यावरील पूल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाके, वाहनतळ, भांडारगृह, उपहारगृह आदी सुविधांचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. या योजनेसाठी पाच कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रतिवर्षी ५८ लाख रुपये दिले जाणार होते. पहिल्या टप्प्यात ३९ लाख ५ हजार रुपयांचा निधी मिळाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवः मुलींनी गाजवला कुस्तीचा आखाडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकमेकांवर मात करत, धुळ चाटविणारे डावपेच अन् मल्लांच्या सहभागाने लक्षवेधी ठरलेला जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा आखाडा यावर्षी शहरातील मल्ल मुलींनी गाजवला. जिल्हा परिषदेच्या मैदानावर या स्पर्धा घेण्यात आल्या.
कुस्त्यांच्या दंगलीचे उदघाटन माजी खासदार प्रदीप जैस्वाल, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष राजू शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने कुस्तीला उत्साहात सुरुवात झाली. दहा रुपयांपासून कुस्तीला सुरुवात झाली. शहरासह जिल्हाभरातून आलेल्या मल्लांनी यात सहभाग घेतला. शेवटीची कुस्ती ५००१ रुपयांची झाली. या स्पर्धेत हंसराज डोंगरे, गोविंद भुसारे, मंगेश डोंगरे, रामेश्‍वर विधाते, डॉ. मुक्तार पटेल यांनी पंच म्हणून काम पाहिले.
महासंघातर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महासंघाचे कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, विनोद पाटील, नंदकुमार घोडेले, अनिल मानकापे, गोकुळ मलके, सचिन खैरे, रवि कवडे, राजु नरवडे, हंसराज डोंगरे, प्रभाकर विधाते, अजिज पहेलवान, रामचंद्र बागडे, देविदास तुपे, संदीप शेळके, अनिकेत पवार, विशाल दाभाडे, धीरज पाटील, सचिन करवा, भगवान चित्रक, राजु पारगावकर, शिवाजी लिंगायत आदींची उपस्थिती होती.

प्रेक्षकांकडून प्रोत्साहन

मुलींच्या कुस्तीत अमरीन सय्यद, तेजस्विनी फतेलष्कर, गौरी गोजे, राधा तुपे, ढवळीशंकर राठोड, विद्या फतेलष्कर, छाया पवार या कुस्तीपटुंनी आखाड्यात एकमेकींना चितपट करत कुस्तीचा आखाडा गाजवला. महिला कुस्तीपटुंना प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images