Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

यशाचा पाठलाग

$
0
0

सदर - अग्निपथ
---------
यशाचा पाठलाग
------------------
इंट्रो - दिग्दर्शक होण्याचे स्वप्न उराशी बाळगत १८ वर्षांपूर्वी गोरख जोगदंडे यांनी मुंबई गाठली. सहा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही त्याला यशाने हुलकावणी दिली. मात्र, यश कधीतरी गवसणारच या आशावादावर त्यांचा संघर्ष सुरू आहे.
-------------
तुषार बोडखे
Tushar.bodkhe@timesgroup.com
मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन दिवसभर धडधडत असते. हजारो प्रवाशांना ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी जणू तिचासुद्धा संघर्ष सुरू असतो. जीवनात प्रगती करण्यासाठी स्थलांतर अपरिहार्य असल्याचा नियम स्वीकारून लाखो लोक मुंबईचा एक भाग होतात. अशाच कोणत्यातरी लोकल ट्रेनमध्ये चित्रपट दिग्दर्शक गोरख जोगदंडे असतात. अठरा वर्षांपूर्वी मुंबईत पोहचलेल्या गोरख यांचा मायानगरीतील संघर्ष अद्यापही संपलेला नाही. दररोज मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त जाण्यासाठीचा हा अथक प्रवास कायम आहे. नाटक, चित्रपट, जाहिरातीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करीत ते वाटचाल करीत आहेत.
मिलिंद गवळी यांची मुख्य भूमिका असलेला आणि गोरख जोगदंडे यांचे दिग्दर्शन असलेला ‘हक्क’ हा नक्षलवादावर भाष्य करणारा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. पण, रूढार्थाने ‘हिट’ या शब्दाची गोरख यांच्यावर मोहर उमटलेली नाहीत. या तरुण दिग्दर्शकाचे प्रयत्न तिकीट खिडकीवरील यशाचा पाठलाग करीत आहेत. चुकलेले गणित जुळवून नव्या प्रयत्नात तरी यश गवसेल आशेवर काम थांबलेले नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच दिग्दर्शकांना यश मिळते. इतरांचा ‘स्ट्रगल’ लवकर संपत नाही. प्रारंभी अपयश पचवलेले दिग्दर्शक कालांतराने यशस्वी दिग्दर्शकांच्या रांगेत जाऊन बसतात, अशी उदाहरणेसुद्धा कमी नाहीत. निल्लोड (जि. औरंगाबाद) या लहानशा गावातून गोरख १८ वर्षांपूर्वी मुंबईत पोहचले. ‘डायरेक्टर व्हायचं’ हा निर्धार पक्का होता. लहानशा शेतकरी कुटुंबातील या तरुणाने बारावीनंतर थेट मुंबई गाठली आणि कामाचा शोध सुरू झाला.
‘एक फिल्म संपली की नवीन सुरू करायची असते. स्ट्रगल करीत असताना मनात ठाण मांडलेल्या कल्पना कागदावर उतरल्या आहेत. या संहितेवर फिल्म करायची असते. पण, पुन्हा नव्याने निर्मात्याचा शोध घेऊन कथा ऐकवतो. पुन्हा-पुन्हा प्रयत्न करतो. हिट फॉर्म्युला सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक दिग्दर्शकांची हीच अवस्था असते. माझा संघर्ष इतरांपेक्षा वेगळा नाही. पाच-सहा चित्रपट होऊनही संघर्ष संपला नाही’ असे गोरख प्रांजळपणे सांगतात. मुंबईत बहीण, मावशी आणि चुलतभाऊ राहात असल्यामुळे प्रारंभीच्या काळात गोरख यांना फारसा त्रास झाला नाही. कलावंतांचा पहिला स्ट्रगल राहण्याच्या जागेपासून सुरू होतो. सुदैवाने, गोरख यांना हा संघर्ष करावा लागला नाही. दिग्दर्शनासाठी तंत्रज्ञान शिकावे लागले. अभिनय, कथा-पटकथा-संवाद, सिनेमॅटोग्राफी, डबिंग, संकलन अशा प्रत्येक तांत्रिक बाजूंचे ज्ञान त्यांनी मेहनतीने मिळवले. काही प्रायोगिक व व्यावसायिक नाटकात भूमिका, दिग्दर्शन अशी जबाबदारी सांभाळली. ‘पेइंग गेस्ट’, ‘सारथी’ या व्यावसायिक नाटकांनी रंगभूमीचा अनुभव दिला. रसिकांना काय भावते याची पुरेपूर जाणीव झाली.
नाटकाचे विश्व जाणून घेताना चित्रपटांचे आकर्षण स्वस्थ बसू देईना. अभिनेते विजय गोखले, गीतकार प्रवीण दवणे, संकलक शैलेंद्र डोके यांनी गोरख यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. रूपेरी दुनियेचे खरे पदर उलगडून दाखवले. उमेदीच्या काळातच २००६ मध्ये ‘दवबिंदू’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. चित्रपटात अशोक शिंदे, आसावरी जोशी, सुधीर जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या तरुण दिग्दर्शकाकडे पाहून एक अनुभवी कलाकार खंतावले. ‘हा नीट काम करील का’ अशी विचारणा केली. या अपमानास्पद प्रश्नाने गोरख काहीसे निराश झाले. पण, प्रश्नातील आव्हान स्वीकारत त्यांनी चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन करून आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. ‘दवबिंदू’ राज्यभर प्रदर्शित झाला. सिल्लोड येथील ‘स्विटी’ टॉकिजमध्ये चित्रपट प्रदर्शित करून आपल्या गावातही चित्रपट दाखवण्याचा पुरेपूर आनंद गोरख यांनी घेतला. चित्रपट निर्मितीत बरे-वाईट अनुभव घेत गोरख यांची कारकीर्द घडते आहे. ‘जीवन-एक संघर्ष’, ‘भेंडीबाजार’, ‘नजर’, ‘हक्क’ या मराठी चित्रपटांनी त्यांना आत्मविश्वास दिला. सध्या काम मिळत असले तरी कुटुंबाची काळजी असतेच. आर्थिक स्थैर्यासाठी एका जाहिरात कंपनीत निश्चित वेतनाची नोकरी करीत ते प्रपंच सांभाळत आहेत. औरंगाबादेत बीबी का मकबरा परिसरात प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन यांच्या एका जाहिरातीचे दिग्दर्शन गोरख यांनी केले. नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या हक्क चित्रपटाला विविध महोत्सवांमध्ये वेगवेगळ्या विभागांत नामांकन मिळाले. पण, तिकीट खिडकीवर तो साधारण यशस्वी ठरला.
‘सध्या इंडस्ट्रीत चांगला रूळलो आहे. कधीतरी मानत करिअरचा विचार येऊन भीती वाटायची. आयुष्याची दहा वर्षे खर्ची घालूनही यश मिळत नसेल, तर भवितव्य काय असेल असा प्रश्न मनात येई. आता हिंदी आणि मराठी चित्रपट अशी दुहेरी संधी आहे. इंडस्ट्रीत भक्कम उभा राहीन’, गोरख पुन्हा आत्मविश्वासाने सांगतात. पुढील महिन्यात त्यांच्या ‘अतरंगी’ या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. चित्रिकरणाचे वेळापत्रक बनवण्यात ते मग्न आहेत. ‘मोल नात्याचे’ या आगामी चित्रपटाची तयारीही पूर्ण झाली आहे. पुन्हा नव्या जोमाने दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासाठी ते सज्ज आहेत...यश फार दिवस हुलकावणी देणार नाही या आशेवर!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ बेरोजगारीमुळे चोऱ्या वाढल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढण्यास बेरोजगारी कारणीभूत आहे. अशा तरुणांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करून सोशल इंजिनीअरिंग करण्याचे काम पोलिस करत आहेत,’ अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी दिली.

विशेष पोलिस महानिरिक्षक भांबरे यांच्या कार्यालयात केसरकर यांनी बैठक घेतली. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, ‘मराठवाड्यासह पुणे तसेच अन्य ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढण्यास बेरोजगारी कारणीभूत आहे. अशा युवकांना रोजगार मिळेल का ? यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. नक्षलवादी भागात किंवा दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात तरुण अडकू नये, यासाठी पोलिसांकडून सोशल इंजिनिअरिंग केली जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पोलिस हाउसिंग बोर्डातर्फे घरे तयार करण्याचे काम सुरू आहे. गुन्हे प्रकटीकरणासाठी न्याय वैधक प्रयोग शाळेला आधुनिक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या गुन्ह्यासाठी शिक्षा मिळावी. असा प्रयत्न सुरू आहे. पूर्वी जिल्हा सनियोजन समितीकडून साडे तीन टक्के निधी सीसीटीव्हीसाठी देण्याची तरतूद होती. शासनाने नवीन अध्यादेशाद्वारे ही तरतूद दहा टक्केपर्यंत केली आहे. सीसीटीव्हीसाठी नवीन हेड तयार करण्याचाही प्रयत्न राज्य शासनाकडून केला जात आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलिस अधीक्षक आरती सिंह, बीडचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जालन्याचे पोलिस अधीक्षक पोकळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

महिला सुरक्षेला प्राधान्य
‘सध्या राज्यात महिला सुरक्षा व वयोवृद्ध व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. यासाठी काही योजनांवर काम केले जात आहे. पुण्यात बढी नावाचा प्रयोग सुरू आहे. यात एक पोलिस कर्मचारी दहा आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलींचे पालकतत्व घेत आहे. अशा योजना वृद्ध लोकांच्या तसेच महिलेंच्या सुरक्षेसाठी राज्यात अन्य ठिकाणी लागू करता येईल का ? याबाबत प्रयत्न सुरू आहे. अशा योजनांचा अभ्यास करण्यासाठी दोन महिला अधिकारी आणि आमदारांची एक कमिटी तयार करण्यात आली आहे,’ अशी माहिती केसरकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहाची भिंत कोसळली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या वसतिगृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने शुक्रवारची रात्र भेदरलेल्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः जागून काढली. खोल्यांच्या भिंती पाणी झिरपून ओल्या झाल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

शासकीय अध्यापक महाविद्यालयातील वसतिगृहाचा प्रश्न समोर असतानाच शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयामधील हा प्रकार समोर आला आहे. मराठवाड्यातील सर्वात जुने कॉलेज अशी ओळख असलेल्या या महाविद्यालयाच्या वसतिगृहालगतची भिंत पावसाने कोसळली. त्यामुळे वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुलांच्या सुरक्षित निवासाचा प्रश्न समोर आला आहे. गुरुवारच्या पावसामुळे शुक्रवारी ही भिंत पडली. खोल्यांच्या भिंतीमधून अजूनही पाणी टपकते आहे. छतांमधूनही पाणी येत आहे. त्यामुळे विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत आहेत.

कॉलेजच्या वसतिगृहात सध्या ४०पेक्षा अधिक विद्यार्थी राहत आहेत. भिंत पडली तेव्हा काही विद्यार्थी वसतिगृहात होते. रूममधील भिंतीही पाण्याने खराब झाल्या आहेत. बाजूला असलेल्या ऐतिहासिक वास्तूच्या भिंतीतून पाणी झिरपत आहे. मागील वर्षी ही असा प्रकार घडल्याने तीन खोल्या आधीच बंद करण्यात आल्या आहेत. कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे. जीव धोक्यात घालून ते वसतिगृहात राहत होते. घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना ही बाब सांगितली. कॉलेजच्या सभागृहात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रभर आहे त्या परिस्थितीत राहण्याची वेळ विद्यार्थ्यावर आली. सभागृहात रात्र काढल्यानंतर सकाळच्या प्रातःविधीसाठी विद्यार्थी वसतिगृहात आले, परंतु रूमच्या भिंतीही अतिशय जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात भीती कायम आहे.

दिवसभर बैठकीत
विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतर शनिवार कॉलेज प्रशासनाचा दिवस बैठकीत गेला. या विद्यार्थ्यांची तातडीने निवासाची इतरत्र व्यवस्था करण्यावर चर्चा झाली. प्राचार्यासह प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते असे सूत्रांनी सांगितले. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहात या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
शासकीय ज्ञान विज्ञान कॉलेजचे वसतिगृह १९७२मध्ये बांधण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक रूम अतिशय खराब झालेल्या आहेत. छत गळते, भिंतीमध्ये पाणी गेल्याने भिंती ओलसर झालेल्या आहेत. या धोकादायक इमारतीचे ऑडिट करण्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. दोन वर्षांपूर्वी विभागाला ऑडिट करावे, याबाबत पत्र देण्यात आले. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

पावासाचे पाण्याने सरंक्षण भिंत कोसळली. खोल्यांमध्ये ओे असल्याने अन् सरंक्षण भिंत कोसळल्यानंतर आम्ही सुरक्षा लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या निवासाची इतरत्र व्यवस्था करत आहोत. वसतिगृहाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला ऑडिट करून देण्याची विनंती यापूर्वीच केलेली आहे. सोमवारी याबाबत पुन्हा स्मरणपत्र देणार आहोत. - डॉ. कुमुद गोरे-खेर्डेकर, प्राचार्य, शासकीय ज्ञान विज्ञान कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याच्या राजकारणात गुन्हेगारी नेते चालतील ?

$
0
0


राणेंवरून गृहराज्यमंत्र्यांचा भाजपला टोला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नारायण राणे २९ आमदार विकत घेण्याची भाषा करतात, अशी व्यक्ती महाराष्ट्राला चालेल काय, मोदींचा करिष्मा आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यामुळे सत्तेत आलेल्या आमच्या मित्रपक्षाने याबाबत विचार करावा, असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाला मारला.
दोन व्यापाऱ्यांच्या हत्येनंतर केसरकर यांनी शनिवारी जालन्यास भेट दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात मराठवाड्यातील पोलिस अधीक्षकांची त्यांनी बैठक घेतली. बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रात, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पुन्हा सक्रीय करण्याची संधी देणाऱ्यांबाबत जनतेनेच विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी राणेंविषयी विचारलेल्या प्रश्नावर, व्यक्त केले.

केसरकर म्हणाले की, कोकणातून माझ्यासारख्या सामान्य चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याने अशा अपप्रवृत्तीला काढून टाकले आहे. कोकणातून बाहेर काढलेल्या या अपप्रवृत्तींना महाराष्ट्राच्या राज्यात किती स्थान दयावे याबाबत संबंधितांनी विचार करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक घटल्याने, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या धरणात चार हजार क्यूसेकप्रमाणे पाण्याची आवक सुरु असून धरणाच्या दोन्ही कालव्यातून १९०० क्यूसेक पाणी सोडले जात आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक शुक्रवारी सतत घटत होती. सुरुवातीला एक लाख क्यूसेकप्रमाणे येणारी आवक सायंकाळी दहा हजार क्यूसेकपर्यंत पोहचली होती. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी विसर्ग पंधरा हजारावरून दहा हजार क्यूसेक एवढा कमी करण्यात आला होता. धरणात शनिवारी, आवक पाच हजारावर पोहचल्यावर, विसर्ग चार हजार चारशे करण्यात आला.
दरम्यान, ९८.०७ टक्के एवढा साठा कायम ठेवल्यावर व दोन्ही कालव्यांतून होणाऱ्या एक हजार ९०० क्यूसेक विसर्गचा विचार केल्यावर, शनिवारी दुपारी साडेतीनला धरणाच्या मुख्य गेटमधून होणारा विसर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ राणेंना पक्षात घेऊ नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
राज्य सरकारचा कारभार चांगला चालला आहे. भाजप मोठा भाऊ आहे, त्यांचे आमदार देखील जास्त आहेत. केंद्रात त्यांचे सरकार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भ्रष्ट नारायण राणे यांना भाजपने पक्षात घेऊ नये असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिला.
नारायण राणे यांना जनतेने नाकारलेले आहे. तीन निवडणुकीत त्यांना जनतेनी आपटी दिली आहे. आता पैशाचा खूप मोठा माज आला आहे. त्याच जोरावर सेनेचे आमदार ते फोडणार आहेत काय ? असेही केसरकर म्हणाले. शिवसेना ही जनतेच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी महागाई विरोधी आंदोलन करत आहे. सत्तेत आम्ही आहोतच त्यामुळे आंदोलन करू नये असे कसे ? सत्तेत असल्याने काय फरक पडतो ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जालन्यातील व्यापारी नितीन कटारीया आणि अंबड येथील व्यापारी गोविंद गगराणी यांच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केसरकर हे जालन्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या समवेत त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण आणा अशा सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.

दौरा ठरला निष्फळ
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा दौरा तसा अगदी निष्फळ ठरल्याची चर्चा आहे. गगराणी यांच्या हत्येसंदर्भातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यात आली तर कटारीया यांच्या हत्या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे कटारीया यांना संरक्षण न दिल्याबद्दल आणि त्यांची फिर्याद नोंदविली नाही. या कारणावरून संबंधित पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले. पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, सदर बाजार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांची कंट्रोल रूममध्ये बदली आणि विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. हे सगळे तडकाफडकी निर्णय पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी घेऊन गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्याची एका अर्थाने हवा गायब केल्याचे सांगितले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजापुरातील नवरात्रोत्सवावर पावसाचा परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ, राज्याची कुलस्वामिनी व देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात दररोज भाविकांची प्रचंड गर्दी असते. परंतु, यंदा पावसामुळे शिवाय देवस्थान समितीच्या जाचास वैतागून भाविकांनी नवरात्रात येणे टाळल्याचे प्रकर्षाने जाणवत आहयंदा भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडवल्याचे चित्र आहे. सध्या भाविकांची जी गर्दी दिसते यामध्येही आंध्र, कर्नाटक व तेलंगणा येथून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
पाऊस, शेतातील पीक कापणी तसेच मशागतीची कामे ही करणे यंदा भाविकांची संख्या रोडावण्यास कारणीभूत असली तरी नवरात्रोत्सवात देवस्थान प्रशासनाबरोबरच मंदिर आवारातील सुरक्षा यंत्रणेकडून होणारी भाविकांची हेळसांड याला वैतागून आता भाविक या देवस्थानापासून दुरावत
चालला आहे. मात्र, याची जाण अद्यापही देवस्थान समितीबरोबरच या समितीवर अधिष्ठान मांडलेल्या महसूलच्या मान्यवरांना नाही.
दहशतवादी अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर देवस्थानला व परिसराला देण्यात आलेले छावणीचे स्वरूप, दर्शनासाठीची पायपीट, वाहनतळावरील
अपुऱ्या सोयी-सुविधा, महसूल अधिकाऱ्यांची दंडेलशाही, महाद्वाराचे लोप पावत चाललेले महत्व, पुजाऱ्यांना मिळणारे दुय्यम स्थान, यासर्व बाबीला वैतागून आता मंदिरात जाणे नकोच अशीच काहीशी भावना आता सर्वसामान्य भविकातून बळावत चालली आहे. याचाच मोठा फटका आता येथील भाविकांची
संख्या रोडवण्याबाबत बसला आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात सुरक्षा रक्षकाकडून होणारी भाविकांची व पासधारकांची हेळसांड शिवाय भविकांबरोबर करण्यात येणारी ढकलाढकली याला वैतागूनही सर्वसामान्य देवभक्त नवरात्रोत्सवात दर्शन नको या भूमिकेवर ठाम होत चालला आहे.
नवरात्रोत्सवात घटस्थापणेदिवशी दीड-दोन लाखांची भाविकांची गर्दी असते. मात्र, यंदा केवळ ७० हजार भाविकांनी हजेरी लावल्याची माहिती देवस्थानने अवलंबिलेल्या बायोमेट्रिक पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेतून समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केटरिंग चालकावर हल्ला; दोघांना एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केटरिंग चालकावर हल्ला करणाऱ्या दोघांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी ठोठावली.

याप्रकरणी उत्तम कर्नाळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा केटरिंगचा व्यवसाय आहे. फिर्यादीने केटरिंगचे काम करण्यासाठी मजूर बदलल्याचा मनात राग धरून १४ मार्च २०१५ रोजी सायंकाळी विश्वकर्मा मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फिर्यादीला अडवून किरण खरात, सिद्धार्थ काजळे व रमेश काजळे यांनी शिविगाळ करत मारहाण केली. तिघांपैकी एकाने फिर्यादीवर ब्लेडने वार केल्याने फिर्यादी जखमी झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरुन तिघांविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादावरुन व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने किरण जयाजी खरात व सिद्धार्थ शेषराव काजळे यांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली, तर सबळ पुराव्याअभावी रमेश काजळे यास कोर्टाने निर्दोष मुक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदोन्नती आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. सध्याचे सरकार आरक्षणविरोधी असल्यामुळे संघर्षाची दिशा ठरवावी लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातील सर्व घटकांनी एकत्रित हा लढा द्यावा, असे सूर आरक्षण बचाव मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समिती, मुंबई यांच्या वतीने पदोन्नती आरक्षण बचाव मेळावा व पुणे कराराची ८५ वर्षे (अधिकार दिन) कार्यक्रम घेण्यात आला. मौलाना आझाद संशोधन केंद्रात रविवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर समितीचे अध्यक्ष रमेश सरकटे, कार्याध्यक्ष सुनील निरभवणे, भारत वानखेडे, एस. के. भंडारे, प्रशांत येण्डे, प्रा. डॉ. वाय. के. ठोंबरे, सी. आर. निखारे, भरत खंडारे आणि प्रा. भारत शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रात पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात मान्यवरांनी विचार मांडले. पदोन्नतीचे आरक्षण रद्द झाल्याचा फटका पुढील पिढीला सहन करावा लागेल, असे प्रशांत येण्डे म्हणाले. ‘हायकोर्टाने राज्य सरकारला संख्यात्मक अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सरकारने माहिती दिली नसल्यामुळे आरक्षण रद्द झाले. या सरकारची ही मनोवृत्ती नसून मनुवृत्ती आहे. आंबेडकरी चळवळ वगळता इतर लोक झोपलेले आहेत. प्रत्येक राज्यातील उच्चवर्णियांचे मोर्चे आरक्षण मिळवण्यासाठी नसून आरक्षण बंद करण्यासाठी आहेत’ असे येण्डे म्हणाले. भरत खंडारे यांनी एकजुटीचा मुद्दा उपस्थित केला. ‘इंजिनीअरिंग आणि मेडिकलला निवड होऊनही पैशाअभावी काही विद्यार्थी दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. दोन-दोन वर्षे तुमची शिष्यवृत्ती येत नसल्याचे सांगून कॉलेज प्रवेश देत नाहीत. या स्थितीत पदोन्नतीचे आरक्षण गेल्यास गंभीर स्थिती निर्माण होईल. या प्रश्नावर चिंतन करून दिशा ठरवावी लागेल’ असे खंडारे म्हणाले. ‘आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. शिकलेल्या वर्गात उन्माद असल्यामुळे कष्टकरी वर्गालाच आपल्या हिताचे काम करावे लागेल’ असे गणेश कांबळे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारत शिरसाठ यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षणावर संकट

‘सध्या केंद्रातील व राज्यातील सरकार धर्मांध आहे असून आरक्षणावर संकट आले आहे. एससी, एसटी, ओेबीसी, भटके विमुक्त प्रवर्गाला फटका बसणार आहे. २४ सप्टेंबरचा ‘पुणे करार’ बहुजन समाजाचा अधिकार दिन आहे. म्हणून आज मेळावा घेऊन जनजागृती करीत आहोत’ असे प्रा. भारत शिरसाठ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्रिनिमित्त शहरात रास दांडियाची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पारंपरिक गुजराती पेहरावातील तरुणाई आणि बहारदार गाणी अशा उल्हासपूर्ण वातावरणात शहरात ठिकठिकाणी रास दांडिया रंगला आहे. चित्रपट कलावंतांची उपस्थिती, वाद्यवृंदाचा ठेका आणि नेटक्या संयोजनामुळे शहरवासीय नवरात्रोत्सवात दंग आहेत. सलग दोन दिवस सुटीचे औचित्य साधत गरबाप्रेमींची रविवारी (२४ सप्टेंबर) लक्षणीय गर्दी उसळली.
शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शहरात रास दांडियाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असून तरूण-तरुणींची गर्दी वाढत आहे. पारंपरिक पेहरावातील तरुणाईने दांडियाचा उत्साह वाढवला आहे. औरंगपुरा येथील नवरंग रास दांडिया, अदालत रोड परिसरातील संस्कृती दांडिया, एसएफएस मैदानावरील क्रिस्टल स्वरविहार रास दांडिया, सिडकोत स्वाभिमान दांडिया आणि संग्रामनगर येथील युगंधर रास दांडिया आबालवृद्धांचे आकर्षण ठरले आहे. वैविध्यपूर्ण नेपथ्य, आकर्षक रोषणाई आणि उत्तम वाद्यवृंदाने सर्वांना आकर्षित केले आहे. नव्या वळणाचा दांडिया ठेका सादर करून तरूणांनी धमाल उडवली आहे. एन-३ येथे स्वाभीमान क्रीडा मंडळ आयोजित रास दांडियात जल्लोष वाढला आहे. मराठमोळी संस्कृती जोपासत तरुणांनी पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या उपक्रमाचे संयोजन नगरसेवक प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, शहराध्यक्ष विशाल दाभाडे यांनी केले आहे. उत्कृष्ट नृत्य आणि वेशभूषेसाठी दररोज बक्षीस देण्यात येत आहे. संग्रामनगर येथे आमदार संजय शिरसाठ व नितीन घोगरे यांनी ‘युगंधर रास दांडिया’चे आयोजन केले आहे. यानिमित्त ‘कुटुंबासाठी दांडिया’ संकल्पना प्रथमच राबवली आहे. या दांडियाला भरभरून प्रतिसाद मिळत असून दररोज सायंकाळी गर्दी होत आहे. या उपक्रमाला अभिनेता सयाजी शिंदे, आदित्य पांचोली, अनंत जोग, मंगेश देसाई, गायक अभिजीत कोसंबी, जान्हवी प्रभू-अरोरा आणि ‘बॉइज’ चित्रपटातील कलाकार उपस्थित राहणार आहेत. एसएफएस मैदानावर ‘क्रिस्टल स्वरविहार डिजिटल रास दांडिया’ सुरू आहे. मागील १७ वर्षांची परंपरा असलेल्या हा दांडिया तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ‘संकल्प महिला सुरक्षा’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विनोद पाटील, अभिजीत देशमुख, पवन जैस्वाल व संजय सरकटे यांनी दांडियाचे आयोजन केले आहे. वैविध्यपूर्ण गाणी आणि नेटके संयोजन दांडियाचे वैशिष्ट्य ठरले आहे. जिल्हा परिषद मैदानावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ‘नवरंग रास दांडिया’ आयोजित केला आहे. विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि पारंपरिक दांडियाचे आयोजन ‘नवरंग’चे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी तरूणाईची गर्दी झाली आहे. पाटीदार भवनात गुजराती समाजाचा पारंपरिक दांडिया सुरू आहे.

कॉलनीत जल्लोष

शहरातील मोठ्या दांडिया आयोजनाची धूम असली तरी कॉलनी आणि सोसायट्यात स्थानिक रास दांडिया रंगला आहे. रहिवासी नेटके संयोजन करून दांडियाचा आनंद घेत आहेत. सातारा, गारखेडा, चिकलठाणा, हडको, पडेगाव या भागात दांडियाची धूम आहे. देवीची स्थापना करून नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि दांडिया यांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी

दांडिया आयोजकांनी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करूनही दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दांडियाला येताना आणि परतताना गर्दी होऊन वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडत आहेत. शहानूरमियाँ दर्गा चौक, जालना रोड, अदालत रोड चौकात अशी कोंडी सायंकाळी होत असल्याच्या तक्रारी इतर वाहनधारकांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुुकीसाठी धडपड

$
0
0

गुंतवणुुकीसाठी धडपड
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑरिक आणि डीएमआयसीमध्ये (औरंगाबाद स्मार्ट सिटी आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडोर) गुंतवणूक वाढावी आणि त्यातून येथील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सध्या शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री दे‌वेंद्र फडणवणीस, उद्योग खात्याचे ‌वरिष्ठ अधिकारी, ऑरिकचे महाव्यस्थापक गजानन पाटील हे स‌िंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. उद्योग खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर तेथे २६ सप्टेंबरपासून विविध कंपन्या, सरकार आणि राज्यशासन यांच्यात चर्चा होणार आहे.
मराठावाडा आणि विदर्भात गुंतवणूक आणण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नातून शहरात एक अँकर प्रोजेक्ट येऊ शकतो. काही चिनी कंपन्या, दक्षिण कोरियातील कंपन्या आणि सिंगापूरच्या कंपन्यांशी या दौऱ्यात चर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्ग योजनेसाठीही अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गुंतणुकीसंबंधी या २४ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या काळात काही सामंजस्य करारही होणार आहेत. करारामुळे राज्याला आर्थिक फायदा होऊ शकतो.
कंपन्यांची गुंतवणूक वाढू शकते आणि त्यातून राज्यातील बेरोजगारांचा प्रश्नही सुटू शकतो. समृद्धी योजनेसाठीही दक्षिण कोरियाच्या काही कंपन्यांनी तयारी दर्शविली असून यातून त्या प्रोजेक्टसाठी असलेला आर्थिक प्रश्नही सुटू शकणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांशी आणि वरिष्ठ अधिकारीवर्गाशी चर्चा करून यात गुंतवणूक करा, असे सुचवले होते, परंतु बँकांनी यात फारसा रस दाखवला नाही. या सिंगापूर-दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, त्या विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे देखील आहेत. हे
सर्व जण २९ सप्टेंबर रोजी मायदेशी परतणार आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉटनिकल गार्डनची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

बॉटनिकल गार्डनची सुरक्षा वाऱ्यावर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लाखो रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या सिडको परिसरात बॉटनिकल गार्डनची मोठी दुरवस्था झाली आहे. कारंजे बंद अवस्थेत असून दुर्मिळ वनस्पतीची माहिती देणाऱ्या केंद्राची बकाल अवस्था झाली आहे. परिसरात सुरक्षा रक्षक अभावी टवाळखोरांचा वावर वाढला असून प्रामुख्याने सायंकाळी सर्वसामान्यांना गार्डनमध्ये जाणे अवघड झाले आहे. बच्चेकंपनीसाठी असलेली रेल्वे कधी सुरू होणार हा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेस सोडविता आला नाही.
सिडकोतील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी एक चांगले गार्डन असावे, या संकल्पनेतून १९९० च्या सुमारास एन - ८ भागात बॉटनिकल गार्डन विकसीत करण्याची योजना सिडकोच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आखली होती. अनेक वर्ष काम रखडले. त्यानंतर सिडकोचे महापालिकेकडे हस्तांतर झाले. त्यानंतर २००७मध्ये मुहूर्त लागला. एलोरा कन्स्ट्रक्शनला हे उद्यान विकस‌ित करण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी एका वर्षात काम पूर्ण करावे व पुढील तीन वर्षे त्याची देखभाल करून नंतर हस्तांतरित करावे, असे ठरले होते. सिमेंटच्या छत्र्या उभारणे, अर्धवतरुळाकार खुला रंगमंच, जॉगिंग ट्रॅक, गार्डन परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचे चॅनलिंग व तो आच्छादित करणे, दुर्मिळ वनस्पतीची लागवड यासह विविध सुविधा, पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक पायाभूत सुविधा उभारण्याचे ठरले होते. संबंधित ठेकेदारांनी कामे केल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी गार्डन पुन्हा महापालिकेने ताब्यात घेतले, परंतु महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या गार्डनची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली आहे. माळी काम करणारे तीन कर्मचारी वगळता येथील सुरक्षा व्यवस्था पूर्णतः वाऱ्यावर आहे. सुरक्षारक्षकांसाठी केबीन तयार आहे, पण त्यांची नेमणुका करण्यात आलेल्या नाही. परिणामी, टवाळखोरांचा वावर अधिक वाढला असून गार्डनचा वापर मद्यप्राशनासह अन्य गैरकामांसाठी अधिक होत असल्याची ओरड होत आहे. प्रामुख्याने सांयकाळी असे प्रकार अधिक होतात. दुर्मिळ वनस्पतीची माहिती देण्यासाठी बांधण्यात आलेल्या सभागृहाचीही मोठी दुरवस्था झाली आहे. सुमारे १२ एकरांवर साकारलेले हे उद्यान सिडकोवासीयांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ ठरू शकते, पण त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत देखभाल करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांच्या एकांकिकेने उडवली धमाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय व्यवसायाला भेडसावणाऱ्या ज्यलंत प्रश्नांवर विनोदी शैलीत; पण अतिशय मार्मिक भाष्य करणाऱ्या एकांकिकेने मोठी धमाल उडवून दिली. लेखनापासून अभिनयापर्यंत सर्व भूमिका डॉक्टरांनी समर्थपणे पार पाडलेली एकांकिका ही ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) शहर शाखेच्या वतीने रविवारी सादर करण्यात आली होती. विशेष म्हणजे नाटकाला रसिकांनी ‘भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद दिला.

आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रसिद्ध नाटककार अजित दळवी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ‘आयएमए’चे शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर, सहसचिव डॉ. उज्ज्वला दहिफळे, माजी शहराध्यक्ष डॉ. दत्ता कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत तीव्र स्पर्धेतून वैद्यकीय अभ्यासक्रमाला मिळवावा लागणारा प्रवेश, वैद्यकीय शिक्षणासाठी द्यावे लागणारे तब्बल आठ ते दहा वर्षे, त्यानंतर कर्जाचा डोंगर उरावर घेऊन सुरू करणावा लागणारा वैद्यकीय व्यवसाय, दिवस-रात्र प्रामाणिकपणे-निष्ठेने रुग्णसेवा करताना उलटून जाणारे वय आणि त्यानंतरही रुग्णालयांवर-डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांवर होणारे मारहाणीसारखे अत्यंत निषेधार्ह प्रकार, मिळणारी अपमानास्पद वागणूक, डॉक्टरांबाबत समाजात पसरवले जाणारे गैरसमज अशा दुष्टचक्रात सापडलेल्या वैद्यकीय व्यवसायावर अतिशय विनोदी शैलीत; परंतु मार्मिक भाष्य करणाऱ्या ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’ या एकांकिकेने रसिक-श्रोत्यांना अंतर्मुख करायला लावले. ठायी-ठायी पोट धरून हसायला लावणाऱ्या आणि गमतीदार किश्यांनी रसिकांना शब्दशः जिंकले आणि रसिकांनीही मोठी उत्स्फूर्त दाद दिली. अनेक रसिकांनी चक्क उभे राहून एकांकिकेचा आनंद घेतला. डॉ. अनंत कडेठाणकर लिखित-दिग्दर्शित एकांकिकेमध्ये डॉ. अमोल देशमुख, डॉ. मंजिरी देशमुख, डॉ. वैशाली लोखंडे-उने, डॉ. रमेश रोहिवाल, डॉ. संदीप मुळे, डॉ. आनंद देशमुख, डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. विक्रम लोखंडे, डॉ. अनंत कडेठाणकर आदींनी पात्र रंगवली. रवी कुलकर्णी यांचे नेपथ्य व वेशभूषा होती, तर निवेदन डॉ. शिल्पा सातारकर यांचे होते.

समाजसेवी संस्थांना मदत
याच कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना ‘आयएमए’च्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये कर्णबधीर व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या ‘उत्कर्ष’, ऑटिस्टिक मुलांसाठी कार्य करणारी ‘आरंभ’, विविध कार्य करणाऱ्या रामकृष्ण मिशन आदी संस्थांना डॉ. रोहिवाल व डॉ. रंजलकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अम्युझमेंट पार्कमुळे बस पोर्टचे काम रखडणार?

$
0
0


अम्युझमेंट पार्कमुळे बस पोर्टचे काम रखडणार?
औरंगाबाद ः आधुनिक बस पोर्ट तयार करताना, प्रवाशांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यासोबतच या ठिकाणी प्रवाशांसाठी एक अम्युझमेंट पार्कही तयार करावे, असा निर्णय परिवहन विभागाने घेतला. परिवहन विभागाच्या नवीन निर्णयामुळे बस पोर्ट उशीर लागण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्व सुविधा असलेले बस पोर्ट बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला. औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकावर बस पोर्ट बांधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, नंतर पहिल्या टप्प्यात मुंबई येथील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक अशा तीन ठिकाणी बस पोर्ट बांधण्याचा निर्णय झाल्याने हे काम थंडावले होते. १९६४ मध्ये तयार झालेल्या औरंगाबाद बसस्थानकाच्या इमारतीला जवळपास साठ वर्ष झालेली आहेत. या इमारतीच्या जागी नवीन इमारत बिओटी तत्वावर तयार करण्याचा निर्णय तत्कालीन एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांच्या काळात झाला होता. मात्र, नंतर राज्यात सरकार बदलले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बीओटी प्रकल्प रद्द केला. बीओटीच्या जागी बस पोर्ट बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राज्यात १६ शहरातील बस स्थानकात बस पोर्ट उभारण्यात राबविण्यात येईल, असे जाहीर
करण्यात आले. त्यानंतर औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाच्या बस पोर्ट निर्मितीसाठी डिझाइन तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. येथील बस पोर्ट तीन मजली असणार आहे. त्यासाठी ६५ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी मागील पाच महिन्यांत तीन वेळेस निविदा काढण्यात आली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
तिसऱ्यांदा निविदा काढल्यानंतर एसटी महामंडळाने बस पोर्टमध्ये लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क तयार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बस पोर्टच्या इमारतीत आणखी काही मजले वाढविण्यात येणार आहे. अम्युझमेंट पार्कसाठी बस पोर्टचे डिझाइन नव्याने करावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन; दोन राजदूत येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शनिवारी (३० सप्टेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील बुद्ध लेणी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी श्रीलंका आणि थायलंडच्या राजदुतांसह विविध देशांचे भिक्खू प्रवचनास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या शनिवारी सकाळी ७ धम्मध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर भिक्खू संघांच्या उपस्थितीत संपूर्ण परित्राण पाठ होणार आहे, सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत भिक्षुसंघाचे प्रवचन, दुपारी तीन ते सहापर्यंत बुद्धगया व विदेशातील भिक्खुंचे जाहीर धम्मप्रवचन होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता मान्यवर अधिकाऱ्यांचा सत्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे वाचन होणार आहे. रात्री आठ वाजता शहरातील नामवंत कलाकारांचा धार्मिक गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमास अधिकाधिक समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना थारा नसेल, असे विशुद्धानंद बोधी यांनी स्पष्ट केले. शहरातील धम्मचक्र प्रवर्तनदिनाला श्रीलंका आणि थायलंडचे राजदूत उपस्थित राहणार आहेत. त्यासह जपान, लाओस, म्यानमार, मलेशिया अशा विविध देशातील भिक्खू उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धावणी मोहल्ल्यात हेरिटेज वॉक उत्साहात

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे धावणी मोहल्ला येथे रविवारी ‘हेरिटेज वॉक’ उत्साहात पार पडला. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात उदासी मठ, मारुती मंदिर, भाई दयासिंहजी गुरुद्वारा आणि विठ्ठल मंदिर परिसर दाखवून इतिहासप्रेमींना माहिती सांगण्यात आली.
महात्मा गांधी पुतळ्यापासून सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या ‘हेरिटेज वॉक’ला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची विशेष उपस्थिती होती. इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी, डॉ. दुलारी कुरेशी, हिस्ट्री सोसायटीच्या सचिव डॉ. बिना सेंगर यांनी या भागाविषयी माहिती सांगितली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा इतिहास जाणून घेत इतिहासप्रेमींचा जत्था धावणी मोहल्ल्यातील संगत स्वामी भास्करानंद महाराज मठात आला. येथे सरदार हरीसिंग, छोटेलाल अरोरा, सरबजितसिंग यांनी चहापानाने पाहुणचार करत मठाच्या चालीरिती सांगितल्या. महंत हरिहर स्वामी यांनी १८४० मध्ये स्थापन केलेल्या या मठात आजही गुरू ग्रंथसाहिबचे निरंतर पठण केले जाते. १९८४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी येथे दर्शन घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. या मठातील सोन्याचा वर्ख असलेली दुर्मिळ चित्रे पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती. यानंतर पुरातन विठ्ठल मंदिरात सुधीर सेवेकर आणि राजहंस परिवाराने लोकमान्य टिळक याठिकाणी मुक्कामी राहिल्याचे सांगितले.
शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी बादशहा औरंगजेबाला पाठवलेला ‘जफरनामा’ घेऊन आलेल्या भाई दयासिंगजी यांच्या नावे या मोहल्ल्यात तीनशे वर्षे जुना गुरुद्वारा आहे. या ठिकाणी सर्व इतिहासप्रेमींना जफरनाम्याची मूळ प्रत पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती. या ठिकाणी लंगरचा लाभ घेऊन पुढे दक्षिणमुखी हनुमान मंदिर पाहून सर्वजण बाखरिया यांच्या कुस्तीच्या आखाड्यात गेले. अॅड. सेवकचंद बाखरिया आणि मोहिंदर बाखरिया यांनी आखाड्याचा इतिहास, येथील विविध साधनांची माहिती दिली. पुढे अप्पा हलवाई यांच्या पेढ्यांच्या इतिहासाविषयी जाणून घेऊन, खव्याच्या पेढ्यांचा आस्वाद घेऊन उपक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवाखाली चिरडून तीन वर्षांची मुलगी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर
गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनी रस्त्यावर अंदाजे तीन वर्षाच्या मुलीला गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने चिरडले. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. मनश्री सचिंद्र मनोहरे (रा. न्यु गणेशनगर रांजणगाव), असे या मुलीचे नाव आहे.
नर्सरी कॉलनीतील रस्त्यावरून दुचाकीवरून (एम एच २० सी एक्स ७०३२) मनोहरे दांपत्य घराकडे जात होते. त्यावेळी गतिरोधकावर दुचाकी आदळून तीन वर्षांची मनश्री मागे बसलेल्या महिलेच्या हातातून निसटली. ही रस्त्यावर पडलेली मुलगी मागून येणाऱ्या हायवा ट्रकच्या (एम एच ४६ एफ ४६४०) मागील चाकाखाली येऊन जखमी झाली, अशी माहिती मिळाली आहे. या मुलीला तातडीने उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तेथे डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. हायवाखाली चिरडून ठार होण्याची ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. अंबेलाहळ रस्त्यावर हायवा खाली दबून एकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना रविवारी पुन्हा त्याच पद्धतीची घटना घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून हायवाचालक पळून गेला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तृत्व गौरवाचा आज सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बिकट परिस्थितीशी झुंज देऊन दहावीच्या परीक्षेत यशाचे उत्तुंग शिखर गाठणाऱ्या पाच गुणवंतांना ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी भरभरून लाखमोलाची मदत केली असून, ही मदत गुणवंत विद्यार्थ्यांना सोमवारी (२४ सप्टेंबर) समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या सर्वांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विश्वकर्मा सभागृहात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांन मदत प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापक विठ्ठल गर्जे उपस्थित राहणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत शुभम दांडगे, कोमल पळसकर, ऋतुजा जाधव, सूरज सवणे, रोहिणी जाधव यांनी मोठे यश मिळविले. ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना ‘मटा’च्या वाचकांनी भरभरून मदत केली आहे. औरंगाबादसह परभणी, लातूर, नांदेड, उदगीर, सेलू, बीड अशा अनेक ठिकाणांहून वाचकांनी आवर्जून मदतीचे चेक ‘मटा’कडे पाठवले. वाचकांनी दिलेली मदत सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

- कार्यक्रमाचे स्थळ ः देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेजचे विश्वकर्मा सभागृह.
- वेळ ः सायंकाळी साडेपाच.
- प्रमुख पाहुणे ः डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, विठ्ठल गर्जे, व्यवस्थापक, कॉसमॉस बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडाईच्या प्रदर्शनात २५० घरांची नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रेडाई ड्रीम होम २०१७ या प्रदर्शनाचा रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला. या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली व २५० पेक्षा जास्त घरांची नोंदणी करण्यात आली. भव्य आयोजन, सहभागी व्यावसायिकांचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळे यंदाचे प्रदर्शन अविस्मरणीय ठरले.
क्रांती चौकातील हॉटेल मॅनोर लॉन्स येथे भरलेल्या या भव्य गृह प्रदर्शनाला गमराठवाड्यातील ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात औरंगाबाद शहर आणि परिसरातील जवळपास २५० प्रकल्पामधील हजारो घरे, फ्लॅट,रो हाउस, बंगल्यांची माहिती मांडण्यात आली. त्यासोबतच गृहबांधणी, खरेदी या क्षेत्रास शासनाने दिलेल्या विशेष महत्त्वामुळे कर्जपुरवठादार संस्थामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्याचे प्रतिबिंब प्रदर्शनात दिसले. एचडीएफसी, एलआयसी, एसबीआय, एडेलवाईज, आयसीआयसीआय आदी १२ कर्जपुरवठादार संस्थांनी प्रदर्शनात स्टॉल लावले होते. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार, सचिव आशुतोष नावंदर, प्रदर्शनाचे चेअरमन नरेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, माजी अध्यक्ष सुनील पाटील, विकास चौधरी, निलेश अग्रवाल, विजय शक्करवार, अर्चित भारुका, रमेश नागपाल, नितीन बगडिया, देवानंद कोटगिरे, पंजाब तौर, रामेश्वर भारुका, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, बालाजी येरावार, रोहित सूर्यवंशी आदीसह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रविवारी शस्त्रपूजन आणि विजयदशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम देवळाई रोड, वसंत विहार सोसायटी येथील राजे छत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला गंगापूर तालुक्यातील उद्योजक अजय मुणोत, संघाचे क्षेत्र सहकार्यवाह बाळासाहेब चौधरी, शहरसंघचालक डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, प्रांत सहसंघचालक मधुकर जाधव, शहर सहसंघचालक देवानंद कोटगिरे आदींची उपस्थिती होती. यावेळी संचलन आणि शस्त्रपूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना अजय मुणोत म्हणाले, माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च व्यर्थ घालण्याऐवजी मी गरजुंना घरे बांधून दिली. मी खूप मोठे कार्य केले नाही, तर आपल्यावरील समाजाचे ऋण फेडले, असे ते म्हणाले. कार्यक्रमाची प्रस्तावना करून हेमंत जोशी यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय शहर सहसंघचालक देवानंद कोटगिरे यांनी केला. चारुदत्त देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहरातील नागरिक, संघ स्वयंसेवकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images