Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ सिल्लोडमध्ये वस्त्रोद्योग; आराखड्याची सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
सिल्लोड येथे वस्त्रोद्योग उभारणीसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे वस्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
आमदार अब्दुल सत्तार, सिद्धेश्वर सहकारी सूत गिरणीचे चेअरमन प्रभाकर पालोदकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रमेश सुरवाडे, वस्त्रोद्योग उपसचिव डी. ए. कुलकर्णी यांच्या उपस्थिती मंत्र्यांच्या दालनात ही बैठक नुकतीच झाली. या बैठकीत सिल्लोड येथे वस्त्रोद्योग उभारणीवर चर्चा झाली. सिद्धेशवर सहकारी सूत गिरणीची भराडी रोडवर जागा असून तेथे उद्योग उभारणीचा संस्थेचा मानस आहे. सिल्लोड तालुक्यात सुमारे ४५ हेक्टरवर कापूस लागवड होते. या भागात दर्जेदार व लांब धाग्याचा कापूस पिकतो, पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. येथे कापसापासून धागा व धाग्यापासून कापड निर्मिती केल्यास रोजगार निर्मिती होईल, असे या बैठकीत मांडण्यात आले. त्यावर वस्त्रोद्योग राज्यमंत्री खोतकर यांनी सकारात्मक पावले उचलत सचिवांना कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार सत्तार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजकल्याण विभागाची प्रक्रियाही लांबली

$
0
0

समाजकल्याण विभागाची प्रक्रियाही लांबली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समाजकल्याण विभागाच्या विविध वसतिगृहांमधील प्रवेशाची प्रक्रिया ऑक्टोबर सुरू झाला तरी पूर्ण झालेली नाही. त्यात प्रारंभी स्वजिल्हा त्यानंतर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असा प्राधान्यक्रम असतो. अद्याप प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांसमोर निवासाची अडचण निर्माण झाली आहे.
समाजकल्याण विभागातर्फे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी या हेतुने वसतिगृह उभारण्यात आली. अकरावी ते पदवी, पदव्युत्तरसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश कोटा ठरवून दिलेला असतो. शैक्षणिक वर्ष सुरू होताच ही प्रक्रिया सुरू होते. औरंगाबाद शहरातील वसतिगृहांची प्रवेशाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यंदा ऑफलाइन अर्ज प्रक्रिया होऊनही प्रक्रिया अपूर्ण आहे. त्याचवेळी कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थी जिल्ह्यातील विविध तालुक्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी औरंगाबादमध्ये दाखल झाले. समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला, परंतु प्रवेशाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने अशा विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अद्याप पहिली यादीच जाहीर झाली. त्यातील किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले याबाबत प्रशासनाकडेही आकडेवारी नाही. प्रक्रिया न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतो आहे.
निकाल लांबल्याचाही परिणाम
यंदा मुंबईसह राज्यातील विविध विद्यापीठांचे निकाल लांबले. त्यामुळे काही अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रियाही लांबली. अनेक अभ्याक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या सगळ्याचा फटकाही वसतिगृह प्रवेश प्रक्रियेवर झाल्याचे समाजकल्याण विभागाचे सतीश साळवे यांनी ‘मटा’ला सांगितले.
प्राधान्यक्रमामुळेही वाद
समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेत अकरावीपासून ते प्रत्येक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश कोटा निश्चित केलेला आहे. त्यासह प्रक्रियेत स्वजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधी प्राधान्य दिले जाते. त्यानंतर बाहेर जिल्हयातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. शिक्षणासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून औरंगाबादमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. समाजकल्याण विभागाची प्रक्रिया यंदा लांबली. त्यात स्वजिल्हा प्राधान्य या दोन्ही बाबींचा आर्थिक फटका बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सोसावा लागतो आहे. रिक्त जागा असताना, चांगले गुण असतानाही प्रवेश मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या; तिघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत करणाऱ्या पती, सासू व सासऱ्यास मंगळवारपर्यंत (३ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. वाडकर यांनी सुनावली.
या प्रकरणी सुभाष रामभाऊ भाडगे (रा. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांची मुलगी अर्चना (वय २२) यांचा विवाह छावणी गवळीपुरा येथील निखिल शिवाजी धात्रक (वय २५) याच्यासोबत ४ मे २०१७ रोजी झाला होता. लग्नात ठरल्याप्रमाणे दोन लाख रुपये हुंडा दिला होता व उर्वरित एक लाख रुपये लग्न झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. लग्नानंतर अर्चना हिला काही दिवस चांगले वागवण्यात आले; परंतु काही दिवसांनी, लग्नामध्ये तुझ्या वडिलांनी जुना टीव्ही दिला, हुंड्याची रक्कम दिली नाही, तुला स्वयंपाक येत नाही, अशा कारणांवरून सासू, सासरा व पतीने अर्चनाचा छळ सुरू केला. परिस्थिती सुधारली की हुंड्याची रक्कम देतो, असे फिर्यादीने सासरच्यांना सांगितले; परंतु छळ वाढतच गेला. या छळाला कंटाळून अर्चना यांनी राहत्या घरी २९ सप्टेंबर २०१७ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार फिर्यादीने केली. त्यावरून छावणी पोलिस ठाण्यात पती निखिल, सासरा शिवाजी व सासू कल्पना धात्रक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तिघांना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने तिन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळा अंतिम टप्प्यात; १३ तालुके संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सप्टेबर महिन्यात संपूर्ण मराठवाड्याला सुखावणारा पावसाने गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली असून, येत्या काही दिवसांत परतीचा पाऊसही संपण्याची चिन्हे आहेत. मराठवाड्यातील १३ तालुके पावसाअभावी संकटात आहेत.

यंदा मराठवाड्यात दमदार पाऊस झाला असला तरी औरंगाबाद, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने येणाऱ्या वर्षात या तेथे पाणीबाणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७९.४४ टक्के, परभणी जिल्ह्यात ६२.१२ आणि नांदेड जिल्ह्यात केवळ ६४.७४ टक्केच पाऊस झाला आहे. आतापर्यंत विभागात सर्वात कमी ३८.८२ टक्के पाऊस माहूर (जि. नांदेड) तालुक्यात झाला असून, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्येही केवळ ५५.६३ टक्के पाऊस झाला आहे. यंदा मराठवाड्यात मान्सूनपूर्वीच पावसाच्या सरी बरसल्या, मात्र त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यांत पावसात मोठा खंड पडला. याच कालावधीत लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा शिडकावा सुरू होता. पुरेशा पावसाअभावी चिंतेत पसरलेल्या मराठवाड्यामध्ये सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. आतापर्यंत मराठवाड्यातील ७६पैकी १६ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, हवामान विभागानुसार परतीचा पाऊस सुरू झाला आहे.

या तालुक्यांवर संकट
सोयगाव ५५.६३, खुलताबाद ५६.२२, पालम ५१.७९, गंगाखेड ५७.९७, पाथरी ४८.३०, कळमनुरी ४७.८१, किनवट ५२.५७, माहूर ३८.८२, हिमायतनगर ४७.२१, देगलूर ४५.५६, बिलोली ५९.२३, धर्माबाद ६२.८०, नायगाव ६२.१५ (पावसाची टक्केवारी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण लिंक रोड कोणाकडे?

$
0
0

औरंगाबाद ः ए.एस. क्लब ते पैठण रोडला जोडणारा साडेचार किलोमीटरचा रस्ता तयार होऊन तीन वर्षे उलटून गेले. या रस्त्यावरून वाहतूकही सुरू झाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा रस्ता तयार केला. रस्ता बनविल्यानंतर नियमाने तो संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे, मात्र अद्याप ही प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करायचा की सिडकोकडे, असा संभ्रम यंत्रणेसमोर आहे. या संभ्रमाचा फटका रस्ता दुरुस्तीला बसला आहे.

एमएसआरडीसीच्या औरंगाबाद रस्ते एकात्मिक विकास योजनेंतर्गत ए.एस. क्लब ते पैठण रोड हा लिंक रोड तयार केला. जमीन संपादन करण्यापासून अनेक अडचणी आल्या होत्या. साडेचार किलोमीटरपैकी बहुतांश जमीन सिडकोच्या मालकीची आहे. एप्रिल २०१४मध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. जालना, लातूर, नांदेडकडून येणारी व पुणे, मुंबई, वाळूजला जाणारी जड वाहतूक बीड बायपासमार्गे या रस्त्यावरून सुरू झाल्याने जालना रस्त्यावरील ताण कमी झाला. जडवाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने पहिल्याच वर्षी रस्ता खराब झाला होता, मात्र कंत्राटदाराच्या निविदेतील अटीप्रमाणे तीन वर्षांचा दोष निवारण कालावधी होता. त्यामुळे तीन वर्षे दुरुस्ती केली गेली. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासून पैठण लिंक रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याची दुरुस्ती कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; हा रस्ता अद्याप ‘एमएसआरडीसी’कडून हस्तांतरित झालेला नाही, मात्र ‘एमएसआरडीसी’कडून हा रस्ता ‘पीडब्ल्यूडी’कडे हस्तांतरित केल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक रस्ता सिडकोच्या कार्यक्षेत्रात असल्याने नियमानुसार पैठण लिंक रोड सिडकोकडे हस्तांतरित करणे आवश्यक असल्याचे मत एमएसआरडीसीतील सूत्रांनी व्यक्त केले. सिडकोकडे रस्ता दिल्यानंतर देखभाल व दुरुस्तीसाठी पुढे सिडको पीडब्ल्यूडीकडे रस्ता हस्तांतरित करू शकते, पण पहिल्या टप्प्यात मात्र रस्ता सिडकोकडेच दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हा रस्ता ‘पीडब्ल्यूडी’कडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या विषय त्यांच्या अखत्यारित आहे.
- सुनील देशमुख, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी

पैठण लिंक रोड हस्तांतराबाबत आम्हाला एमएसआरडीसीचे पत्र प्राप्त झाले आहे. दोन्ही संस्थांकडून पाहणी झाल्यानंतर पुढील निर्णय होईल. - अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मे महिन्यात आंबा महोत्सवाचे आयोजन

$
0
0

मे महिन्यात आंबा महोत्सवाचे आयोजन
म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात केशर आंब्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांना या फळझाड लागवडीचे शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन व विक्रीसाठी बाजारपेठेची माहिती व्हावी यासाठी २५ मे २०१८ रोजी आंबा महोत्सव करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.
कृषी विभाग, फळ संशोधन केंद्र व एमटीडीसी या विभागांनी एकत्र येऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महोत्सवाबाबत निर्णय घेण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत औरंगाबाद शहरात सीताफळ महोत्सवासोबतच विभागामध्ये आंबा महोत्सव तसेच रेशीम महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
फळझाडाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी व शेतकऱ्यांना फळझाड लागवडीचे शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन व विक्रीसाठी बाजारपेठेची माहिती व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. देशात फळझाडाखालील क्षेत्राच्या तुलनेत ४२ टक्के क्षेत्र आंब्याचे असून उत्पादन ९० लाख टन आहे. पूर्वी ‘आजोबा आंबे लावतो, नातू फळे खाते’ अशी म्हण होती. त्यामुळे दहा वर्षांनी मिळणाऱ्या फळांसाठी लागवड करायला शेतकरी उत्सुक नसे, पण काळ बदलला, बदलत्या काळाबरोबर कमी वेळात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दर्जेदार फळे देणाऱ्या जाती निर्माण झाल्या. त्यापैकी मराठवाड्यात केशर आंब्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येत असून विभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंब्यांची लागवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यौमे अशुरानिमित्त सिटीचौकात सवाऱ्यांचा ‘मजमा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यौमे अशुरानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोहर्रम महिन्याच्या दहा तारखेला रविवारी (एक ऑक्टोबर) सवाऱ्यांचा ‘मजमा’ सिटीचौक भागात भरविण्यात आला होता. इमाम हुसैन यांच्या हुतात्मा दिनानिमित्त शिया बांधवानी ‘मातमी जुलूस’ काढून श्रद्धांजली वाहिली.

चेलीपुरा येथील मोहम्मद नवाब यांच्या देवडीपासून रविवारी सकाळी शिया बांधवांच्या मातमी जुलूसची सुरुवात झाली. ही मिरवणूक चमन, गांधी पुतळा, सिटीचौकमार्गे निघाला. सिटीचौकात आला. तेथे अमलबरदार कमिटीतर्फे मातमी जुलूसच्या ‘अलम’ला विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अलमबरदार कमिटीचे अध्यक्ष, माजी महापौर रशीद मामू, नगरसेवक अफसर खान यांनीही पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिया धर्मगुरू, वक्फ बोर्डाचे सदस्य मौलाना जहिर अब्बास यांनी इमाम हुसेन याच्या हौतात्माविषयी मार्गदर्शन केले.

श्रद्धांजली कार्यक्रमानंतर मिरवणूक सिटीचौक, जुनाबाजार, बुढीलेन भागातून सालारजंग आशूरखाना येथे झाला. यावेळी अजुमन खादिमुल मासुमिनचे अध्यक्ष एजाज झैदी, डॉ. हसन नवाब, परवेज जाफरी, अली रजा आबेदी, हाजी हुसेन, मोहसीन आबेदी यांच्यासह मुशीर हुसेन, सैय्यद इहतेशाम अहेमद कादरी, सय्यद शाहेद हुसेन, हसन नवाब बडवाले, जमील काझमी, शमीम काझमी, आरेफ जाफरी, मीर अली यांची उपस्थिती होती.

दरम्यान, मिरवणूक सिटीचौकातून पुढे गेल्यानंतर सवाऱ्यांचा मजमा भरविण्यात आला. शहागंज, क्रांतीचौक, छावणी, सिडको, भडकल गेट आदी भागातून अनेक सवाऱ्या जमा झाल्या होत्या. या सवाऱ्यांमध्ये बडे चांद सहाब, छोटे चांद सहाब, नाले हैदर, पंजा आदी अनेक सवाऱ्यांचाही समावेश होता. सिटीचौकात आलेल्या सवाऱ्यांचा सत्कार अलमबरदार कमिटीच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात अलमबरदार कमिटीचे रशीद खान मामू, माजी विरोधीपक्षनेते अफसर खान, यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. हा सवाऱ्यांचा मजमा दुपारी एकपर्यंत सिटीचौकात होता. हा मजमा आणि मातमी जुलूस पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती. यावेळी या कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आल्या आल्या हो पाच गवळणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संबळ, दिमडी, डफ, ढोलकी, तुणतुणे या लोकवाद्यांच्या निनादाने रसिकांना महाराष्ट्रीय लोकसंगीताचा मनमुराद आनंद दिला. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद कॅन्टोन्मेंट यांनी विभागीय लोकांगण महोत्सव घेतला. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील लोककलावंतांनी बहारदार सादरीकरण करून महोत्सव गाजवला.

रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद कॅन्टोन्मेंट यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार पी. जी. शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पारंपरिक लोककलांचा ‘लोकांगण महोत्सव’ घेण्यात आला. संत एकनाथ रंगमंदिरात रविवारी या विभागीय महोत्सवात ४० संघ सहभागी झाले. जागरण, गोंधळ, भेदिक, सारजा, लावणी, बतावणी अशा कला प्रकारांनी धमाल उडवली. जय मल्हार वाघे मंडळ (जिंतूर) यांनी ‘आल्या आल्या हो पाच गवळणी, पाच रंगाचा शिनगार करूनी’ ही पारंपरिक रचना सादर केली. पाच रंगांच्या साड्या परिधान केलेली गवळण रसिकांची दाद घेऊन गेली. शिवशक्ती कला संघ (फुलंब्री) यांनी ‘सारजा’ ही दुर्मिळ लोककला सादर केली. सरस्वतीची आराधना करणारा या कला प्रकाराने रसिकांना खिळवून ठेवले. जय मल्हार वाघे मंडळ (भिवपूर) यांनी ‘मल्हारी हो मल्हारी जेजूर गडावरी’ रचना ‘भेदिक’ कला प्रकारात मांडली. ‘गोंधळाला ये अंबे’ अशी साद घालत जय शिव मल्हार इंदूरकर यांचे जागरण रंगले. गोंधळसम्राट राजारामबापू कदम कला मंच (परभणी) यांचा गोंधळ लक्षवेधी ठरला. हरिभाऊ कदम आणि सहकाऱ्यांनी गोंधळाचे पारंपरिक दर्शन घडवले. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील कला संघांनी वैविध्यपूर्ण कलांचे दर्शन घडवले. उत्तम सादरीकरणासाठी संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

दरम्यान, या महोत्सवाला महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, गायक प्रमोद सरकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाचे संयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, डॉ. डॉन अंबिलढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. मिलिंद साळवी, जे. सी. फ्रान्सिस, जेम्स अंबिलढगे, प्रमोद सावंत, संदीप सेठी, एम. एस. पाटील, सोमनाथ लहाने, प्रा. वसंत जाधव, दयाल मेवानी, कैसर खान आदींनी सहकार्य केले. यावेळी रसिक व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बतावणी रंगली
लोकांगण महोत्सवात ‘बतावणी’ कला प्रकाराचे शाहीर रमेश गिरी व मधुकर पाटील यांनी खुमासदार दर्शन घडवले. नवरा बायकोच्या भांडणाचा फार्स सादर करून रसिकांना खळखळून हसवले. उपहास, कोट्या, कोपरखळ्या आणि उत्तम अभिनयाला रसिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंक वॉकला महिलांची भरभरुन दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑल लेडीज लीग (एएलएल) या समुहाच्या औरंगाबाद विभाग व रेडिओ एफएम ९८.३ यांच्या वतीने स्तन कर्करोग झालेल्या महिलांना नैतिक बळ देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात ‘पिंक वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. या जागरूकता उपक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला.
संपूर्ण ऑक्टोबर महिना हा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तनाच्या कर्करोगासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने ‘पिंक मंथ’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त सकाळी साडे सहा वाजता विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमलेल्या महिलांच्या परिचयानंतर सहभागी महिलांना स्तनाच्या कर्करोग जागरुकता अभियानाचे आंतरराष्ट्रीय प्रतीक असलेली गुलाबी फित बांधण्यात आली. पांढरे व गुलाबी फुगे हवेत सोडून या वॉकची सुरुवात झाली.
स्वयंस्फूर्त महिलांनी कर्करोगासंबंधी जागरुकतेचा संदेश देणारे फलक हाती घेत सोनेरी महालपर्यंत ‘पिंक वॉक’ केला. सोनेरी महाल इथे अल्पोपहार झाल्यानंतर डॉ. अरुणा शहा कराड यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या निदान करणाऱ्या तपासण्यांबद्दल माहिती दिली आणि वेळेत निदान होण्याचे फायदे सांगितले. या प्रसंगी स्तनाच्या कर्करोगातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या सहभागी चारही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मुक्त संवादानंतर ‘एएलएल’च्या परंपरेनुसार महिलांमधील जागतिक मैत्रीभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने सर्व सहभागी महिलांना शक्तीबंधनाचा धागा बांधण्यात आला. या उपक्रमासाठी ‘एएलएल’च्या अध्यक्षा डॉ. निधी नावंदर, उपाध्यक्षा डॉ. अरुणा शहा कराड, डॉ. तृप्ती बोरुळकर यांच्यासह समन्वय समितीच्या प्रिया पुथान, श्वेता सेठी, शारदा मुद्कवी, डॉ. लीना सोनी, डॉ. निलीषा अग्रवाल यांनी पुढाकार घेतला.

रोगमुक्त महिलांचा सहभाग

‘सुरुवात रविवारची, नव्या दोस्तीची’ असे घोषवाक्य असलेल्या या उपक्रमात स्तनाच्या कर्करोगाशी यशस्वी लढा देऊन रोगमुक्त झालेल्या अलका कर्णिक, डॉ. गीता शेवगण, डॉ. दुर्गा डोईफोडे व गीता कोलाटकर यांचा लक्षणीय सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श विचारांना पुस्तकांचे कोंदण

$
0
0

आदर्श विचारांना पुस्तकांचे कोंदण
औरंगाबाद : जयंती आणि पुण्यतिथीला महापुरूषांचे स्मरण करतानाच विशेष उपक्रमांना साहित्यकृतीत रूपांतरित करण्याचे काम महात्मा गांधी अध्यासन केंद्र करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील या अध्यासन केंद्राने ‘निबंधाची वही’ पुस्तकाद्वारे वाचकांना विद्यार्थ्यांचे सरस निबंध दिले. आता ‘जायकवाडीची कहाणी’ हे नवीन पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
महापुरूषांच्या उदात्त कार्याचे स्मरण करणे आणि महापुरुषांचे विचार व कार्याचा प्रसार करण्यासाठी अध्यासन केंद्रांची स्थापना झाली. महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे संचालक मराठी विभागाचे प्रा. डॉ. दासू वैद्य आहेत. या केंद्राच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जातात. मागील आठवड्यात प्रा. जयदेव डोळे यांचे ‘मोहन की बात’ या विषयावर व्याख्यान झाले. मागील वर्षी चित्रपट समीक्षक प्रा. अभिजत देशपांडे यांचे ‘गांधीजी ते गांधीगिरी व्हाया भारतीय चित्रपट’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले होते. रूपेरी पड्यावरील गांधी विचारांची छाप विद्यार्थ्यांना प्रथमच अनुभवता आली. सामाजिक विकासात ग्रामीण भागाला अग्रस्थान देणाऱ्या गांधीजींचे स्मरण अध्यासन केंद्र वैविध्यपूर्ण उपक्रमातून करीत आहे. आता वैचारिक साहित्य निर्मितीला केंद्राने प्राधान्य दिले आहे. चार वर्षांपूर्वी गांधी विचारांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. दर्जेदार निबंध स्पर्धेनंतर अडगळीत पडले असते. या निबंधाचे पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार डॉ. दासू वैद्य यांना सुचला. ‘आजच्या जीवनात गांधी विचारांची गरज’ आणि ‘भारत विरूद्ध इंडिया’ या दोन विभागात बारा निबंधांचा समावेश करण्यात आला. यातून ‘निबंधाची वही’ पुस्तक आकारास आले. प्राध्यापकांचे शोधनिबंध प्रकाशित करणारी अनेक नियतकालिके आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे निबंध प्रकाशित करण्याचा नावीन्यपू्र्ण पायंडा गांधी अध्यासन केंद्राने पाडला. दर्जेदार व वाचनीय निबंध ‘निबंधाची वही’ पुस्तकामुळे वाचकांपर्यंत पोचले. अतिवृष्टी आणि दुष्काळ या काळात पैठणचे जायकवाडी धरण चर्चेत असते. पाणी पातळीपुरतेच सामान्यांचे आकलन असते. धरणाची निर्मिती आणि वैशिष्ट्यांवर प्रा. प्रदीप पुरंदरे यांचे व्याख्यान गांधी अध्यासन केंद्राने घेतले. या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. गांधी अध्यासन केंद्राचे ‘जायकवाडीची कहाणी’ ही दुसरी साहित्यकृती लवकरच वाचकांना मिळणार आहे. महापुरूषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यापुरते अध्यासन केंद्रांचे स्वरूप मर्यादित झाले आहे. मात्र, दर्जेदार उपक्रमांना पुस्तकात समाविष्ट करण्याचे नावीन्यपूर्ण काम केंद्राने सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६ ऑक्टोंबरपासून संप; महामंडळाला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने अखेर एसटी महामंडळाला २९ सप्टेंबर रोजी संपाची नोटीस बजावली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन करार करावा, या मागणीसाठी निर्णय होत नसल्याने १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ऐन दिवाळीत संप पुकारण्यात येणार आहे.
वेतन करारावेळी एसटी महामंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीची दखल महामंडळाने घेतलेली नाही. महामंडळाने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नेमलेल्या विशेष वेतन सुधार समितीसमोरही कामगारांनी वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली. वेतन सुधार समितीने महामंडळ प्रशासनासमोर शिफारशी सादर केल्या आहेत. एसटी कामगार संघटनेसह इतर संघटनांनीही सातव्या वेतन आयोगाची मागणी केली आहे. संघटनेने घेतलेल्या मतदानात कामगारांनी संपाला कौल दिला आहे. त्यानुसार संघटनेचे महासचिव हनुमंत ताठे यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला २९ सप्टेंबर रोजी १६ ऑक्टोबरपासून एसटी कामगार संपावर जाणार असल्याचे पत्र दिले आहे.
या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स फेडरेशनने पाठिंवा दिला आहे.

कामगारांच्या मागण्या
- ७ वा वेतन आयोग लागू करा
- ७ टक्के महागाई भत्‍ता थकबाकीसह द्यावा
- श्रमिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई थांबवावी
- कायदे, करार, आणि परिपत्रकांचा भंग करून घेतलेले निर्णय रद्द करावेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठार बहिरेपणावर १०० टक्के मात

$
0
0

ठार बहिरेपणावर १०० टक्के मात
‘कॉक्लिअर इम्प्लांट’ अन् प्रशिक्षणानंतर अनेक युवकांनी घेतली उंच भरारी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जन्मजात तीव्र-अतितीव्र बहिरेपणाला ठार बहिरेपणाही म्हटला जातो. अशा ठार बहिरेपणावर मात करतानाच बहिरेपणासोबत आपसुकच मुकेपणाही येतो. या दुहेरी अपंगत्वावर शंभर टक्के मात करून उंच भरारी घेणाऱ्या अनेक युवकांची यशकथा सामान्यांसाठी प्रेरक ठरू पाहात आहे. वयाच्या अवघ्या पहिल्या ते चौथ्या वर्षापर्यंत झालेली ‘कॉक्लिअर इम्प्लांट’सारखी क्लिष्ट शस्त्रक्रिया-प्रशिक्षणानंतर या मुलांनी कधी मागे वळून बघितलेच नाही, असे दिसून येत आहे. दोन्ही व्यंगाचा सर्वाधिक फटका वाचेला बसतो; परंतु यातील अनेकजण तीन-तीन, चार-चार भाषा सराईतपणे बोलतात आणि महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेऊ पाहात आहेत.
सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा ‘वर्ल्ड डेफनेस वीक’ म्हणून साजरा करण्यात आला. मागच्या वर्षी महाराष्ट्रात जन्मलेल्या आठ हजार शिशुंपैकी केवळ चारशे-पाचशे शिशुंवर बहिरेपणासाठी रामबाण ठरणारी ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया होऊ शकली आणि तब्बल साडेसात हजार शिशू हे शस्त्रक्रियेविनाच असल्याबाबत ‘मटा’ने नुकतेच लक्ष वेधले होते. ‘अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिरअरिंग डिसॅबिलिटीज’नुसार, देशामध्ये किमान ३० लाख व्यक्ती या तीव्र ते अतितीव्र बहिरेपणाने ग्रस्त आहेत, यावरून या प्रश्नाचे गांभीर्य नक्कीच स्पष्ट होते. त्याचवेळी ज्यांच्यावर योग्य वयामध्ये ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया झाली आणि ज्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळाले, त्यांनी दोन्ही व्यंगांवर मात करुन इतर सामान्यांप्रमाणे करिअर घडविण्यासाठी भरारी घेतल्याचेही दिसून आले आहे. ‘स्पिच थेरपी’चे प्रशिक्षण देणाऱ्या मराठवाड्यातील पहिल्याच ‘राजीव स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक’च्या माध्यमातून विभागातील १६७ मुलांवर ही शस्त्रक्रिया-प्रशिक्षण झाले व बहुतेकांनी उल्लेखनीय प्रगती केल्याचे समोर आले आहे. यातील अनेक युवकांची भरारी सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्यांसाठी आता ‘कला उत्सव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये कला उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात अशा उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. शाळांमध्ये संगीत, नृत्य, अभियन, हस्तकला अशा कलागुणांचे धडे ही विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांच्या विकासाठी शाळास्तरावर विविध प्रयत्न होतात. आता माध्यमिक शिक्षा अभियानातच अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून नववी ते बारावीच्या स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध लोककला सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळणार आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला लोककलेचा समृद्ध वारसा असून या उपक्रमांमुळे लोककलांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात १० ऑक्टोबर रोजी कला उत्सव होणार असून पूर्वतयारीसाठी ७ ऑक्टोबर रोजी सहभागी शाळेतील संघांना यशवंत कला महाविद्यालयात आमंत्रित करण्यात आले आहे.
लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य (अभिनय), लोकदृश्यकला (चित्रकला), रंगकला, शिल्पकला, हस्तकला या कला प्रकारांचा समावेश आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य व देशपातळीवर कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक कला प्रकाराच्या सादरीकरणासाठी ऑनलाइन प्रोजेक्ट सादर करावा लागणार आहे. निवडलेल्या कला प्रकाराचा इतिहास, सद्यस्थिती, याची माहिती द्यावी लागेल. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने कलागुणांसाठी २५ गुण राखीव ठेवले आहेत. त्यामुळे त्यांना या उपक्रमांचा लाभ होईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराणेशाहीच्या मुद्यावरून काँग्रेस लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
आतापर्यंत देशातील ज्या दहा कुटूंबांना सर्वात जास्त सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली, त्यापैकी एक कुटूंब नांदेडचे आहे. एवढा प्रदीर्घ काळ सत्तेत असूनही नांदेडच्या जनतेला उपाशी ठेवण्याचेच काम नांदेडच्या काँग्रेस नेतृत्वाने केले, अशा शब्दांत कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी प्रचाराच्या पहिल्याच जाहीर सभेत घराणेशाहीच्या मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. तर आगामी महापालिकेत परिवर्तन अटळ असून राजेशाही, नव्हे तर सर्व सामान्यांची सत्ता येईल, असे ठणकावत भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
येत्या ११ ऑक्टोबरला नांदेड पालिकेसाठीचे मतदान होत असून विजयादशमीचा मुहूर्त साधत भाजपने निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्याचा शुभारंभ केला. प्रचार सभेला सुरुवात करण्यापुर्वी मुंबईत परळ-एलफिस्टन रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर घडलेल्या दुर्देवी घटनेतील मृतांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.

यावेळी निलंगेकर यांनी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका करताना म्हणाले, ‘नांदेडच्या जनतेला यंदा दोन वेळा दिवाळी साजरा करण्याची संधी मिळणार आहे. ज्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाने नांदेडवर आजपर्यंत फक्त राज्य केले, त्यांना महाराष्ट्र सोडाच किमान नांदेडचाही विकास करता आला नाही. आगामी काळात भावनिक राजकारणावर नव्हे तर विकासाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. तुम्ही तब्बल वीस वर्षे काँग्रेसच्या हाती सत्ता दिली त्यांनी इतक्या वर्षांत नांदेडसाठी काय केले याचा विचार करून मतदान करा.’
नांदेडमध्ये जशी काँग्रेसची सत्ता आहे, त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून नागपुरची सत्ता भाजपकडे आहे. मात्र नागपूरकरांना स्वच्छ पाणी, सिटी बस, सीसीटीव्ही, मेट्रो यासारख्या सुविधा मिळाल्या. पण नांदेडकरांना काय मिळाले असा सवाल करत ते म्हणाले, फक्त निवडणूकीत भावनिक राजकारण करायचे, स्थानिक नेतृत्वाचे खच्चीकरण करायचे हेच उद्योग येथील काँग्रेस नेतृत्वाने केले. ‘गुरु ता गद्दी’साठी केंद्र सरकारने पैसे दिले पण तरीही विकास झाला नाही, असा आरोप करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वरांचे स्मारक होणार असल्याची ग्वाही नांदेडकरांना दिली.
यावेळी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी नांदेडमधील भ्रष्टाचाररुपी रावणाचे दहन करून नांदेड भ्रष्टाचार आणि काँग्रेसमुक्त करण्याचे आवाहन निलंगेकरांनी नांदेडवासियांना केले.
जातीपातीच्या राजकारणावर टीका करताना ठाकूर म्हणाले, ‘काँगेसने मुस्लीम आणि दलितांकडे केवळ वोटबँक म्हणून पाहिले. पण त्यांच्यासारखे आमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे नाहीत, असे सांगत डॉ. बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी संघर्ष केल्याची आठवण करून दिली. सत्तेत असताना काँग्रेसने कधीच डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र भाजपच्या सरकारने डॉ. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडन येथील निवासस्थान विकत घेऊन तिथे स्मारकाचे कामही मार्गी लावले आहे.’

सत्ता बदलाचे आवाहन
काही जण दिल्लीतून मुंबईत आले. मुंबईत येऊन आदर्श केले आणि तिथून निघून आता नांदेडला आलेत, असा खोचक टोला हाणत त्यांनी नांदेडवासियांना सत्ता बदलाचे आवाहन आमदार ठाकूर यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत ६८ टक्के उपयुक्त जलसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील २१९ पैकी केवळ ८० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. १९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्प अध्यापही जलसाठा वाढण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७६७ मिलिमीटर इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९१ टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील
उस्मानाबाद, वाशी व परंडा या तीन तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात पावसाने दिलासादायक हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यातील २१९ पैकी ८० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. १९ प्रकल्पांत ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. २१ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यादरम्यान पाणीसाठा आहे. तर २८ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के दरम्यान जलसाठा आहे. जिल्ह्यातील ४० प्रकल्पांमध्ये २५ टक्के इतकाही जलसाठा झालेला नाही. ३१ प्रकल्पांची पाणीपातळी आजही जोत्याखाली आहे.
जिल्ह्यातील एकमेव सर्वात मोठा असलेला परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्प तुडुंब भरला आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक पाणी साठवण क्षमता
असलेला लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती पाहता उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, रुईभर, वाघोली हे तीनही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह परिसरातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.
भूम तालुक्यातील संगमेश्वर, बाणगंगा, रामगंगा, परंडा तालुक्यातील खासापूर, साकत, हे प्रकल्प पुर्णतः भरले आहेत. कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्पात केवळ १३ टक्के तर चांदणी प्रकल्पात ७५ टक्के व खंडेश्वर प्रकल्पात ९५ टक्के जलसाठा आहे. तुळजापुर तालुक्यातील कुरनुर प्रकल्पात ९० टक्के, हरणी ४८ टक्के, खंडाळा प्रकल्पात ९८ टक्के तर उमरगा तालुक्यातील जकापूर प्रकल्पात ३७ टक्के, तुरोरी प्रकल्पात २८ टक्क, बेनितुरा प्रकल्पात ७४ टक्के इतका जलसाठा आहे. जलसाठ्यात वाढ होण्यासाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ वुमन ग्रँडमास्टर किताबाचे लक्ष्य

$
0
0

वुमन ग्रँडमास्टर किताबाचे लक्ष्य

सुधीर भालेराव
Sudhir.Bhalerao@timesgroup.com
@SudhirbMT
इन्ट्रो ः राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेपाठोपाठ जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षी चितलांगेने उपविजेतेपद पटाकाविले. आक्रमक डावपेच आखण्यावर भर देणाऱ्या साक्षीचे आगामी लक्ष्य आहे वुमन ग्रँडमास्टर बनण्याचे. व्यावसायिक प्रशिक्षक नसतानाही साक्षीने बुद्धिबळ क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या प्रवासाबद्दल साक्षीने ‘मटा’शी मनमोकळा संवाद साधला.
.....
जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंतचा प्रवास कसा होता?
- जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत मी प्रथमच खेळत होते. पहिले तीन डाव जिंकून मी चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे माझा आत्मविश्वासही दुणावला होता. परंतु, त्यानंतरचे दोन डाव मी गमावले. या पराभवाने मी जराही निराश झाले नाही. त्यानंतर सलग तीन डाव जिंकून मी स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. या स्पर्धेत मला सोळावे मानांकन होते. त्यामुळे प्रारंभी फेऱ्यांपासून मला सरस स्पर्धकांचा सामना करावा लागला. भारतीय संघाचे प्रशिक्षक जयंत गोखले यांनीही माझे मनोबल वाढवले. त्यानंतरच्या डावांमध्ये मी डावपेच सुधारले. त्यामुळे मला विजय मिळवता आले. गुणतक्त्यातील अव्वल बुद्धिबळपटूपेक्षा दीड गुणांची असलेली पिछाडी अखेरपर्यंत कायम राहिल्याने मला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. १८ वर्षांखालील गटात भारताला एकमेव पदक मी मिळवून दिले याचा मला खूप आनंद आहे.
महत्त्वाच्या डावांतील पराभवातून नेमके काय शिकायला मिळाले?
- कोणत्याही स्पर्धेत प्रारंभीचे डाव जिंकल्यानंतर चौथ्या व पाचव्या फेरीतील डाव अतिशय महत्त्वाचे असतात. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत चौथ्या व पाचव्या फेरीत मी पराभवाचा अनुभव घेतला होता. या स्पर्धेतही मला त्याच फेऱ्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. चौथ्या फेरीत डावाची सुरुवात करतानाच माझ्याकडून चूक झाली. त्यामुळे काळ्या स्वेअरमध्ये माझी स्थिती कमकुवत होती. त्याचा फटका मला बसला. पाचव्या डावात प्रतिस्पर्धांना दिेलेले प्याद्याचे बलिदान मी स्विकारले. ही चूक मला टाळता आली असती. परंतु, प्याद्याचा मोह टाळता आला नाही आणि नंतर डावपेचात्मक चुका झाल्याने मला सलग दुसरा पराभव स्विकारावा लागला. स्पर्धेत हार-जीत होत असली, तरी पराभवातून निश्चित काही शिकायला मिळते. नंतरच्या डावांमध्ये मी चुकांची पुनरावृत्ती टाळली. त्याचा मला फायदा झाला. आगामी स्पर्धांमध्ये मला या स्पर्धेतील अनुभव उपयोगी ठरणारा आहे. पराभवातून निराश न होता नैसर्गिक खेळ करणे महत्त्वाचे असते. या स्पर्धेमुळे मला ११६ रेटिंग गुणांचा फायदा झाला. त्यामुळे आता माझे आंतरराष्ट्रीय मानांकन २२८१ असे होईल.
हे तुझे सहावे आंतरराष्ट्रीय पदक आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल काय सांगशील?
- मी २०१४ मध्ये सिंगापूर येथे पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले होते. त्यात मी विजेतेपद पटाकाविले होते. २०१५ मध्ये आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत मी मुलींच्या गटात सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे मला वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळाला. २०१५ ते २०१७ अशा सलग तीन वर्षांमध्ये राष्ट्रकुल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्यपदके व एक ब्राँझपदक मिळविले. उरुग्वेमध्ये मी प्रथमच जागतिक बुद्धिबळ स्पर्धा खेळले. जगभरातील मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळताना खूप काही शिकायला मिळाले. जागतिक पातळीवर कामगिरीत सातत्य ठेवण्यासाठी भरपूर तयारी आवश्यक आहे. तसेच दबाव झेलण्याची क्षमताही हवी.
व्यावसायिक प्रशिक्षक नसल्याचा कामगिरीवर परिणाम होतो का?
- मी व्यावसायिक प्रशिक्षकांकडे शिकत नाही. माझे वडील दिनेश चितलांगे हेच माझे खरे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून मी बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षक नसल्याची उणीव मी कठोर सरावानेच भरून काढते. त्यासाठी मला संगणकाचा खूप उपयोग होतो. स्पर्धेची तयारी करण्यासाठी मी ऑनलाइन गेम्स अधिकाधिक खेळते. तसेच त्यावरील कोडीही सोडवते. ऑनलाइन गेम्समधील ग्रँडमास्टरच्या डावपेचातून खूप शिकायला मिळते. त्यामुळे डावाचे चांगले ओपनिंग करण्यात मी बऱ्यापैकी प्रगती केली आहे. मिडलगेममध्ये वेगवेगळे डावपेच आखण्यावर मी भर देते. पोझिशनल खेळत विजय साकारण्याचे कौशल्य मी आत्मसात केले आहे आणि तेच माझे बलस्थान आहे. प्रत्येक स्पर्धेत स्पर्धक हे प्रचंड तयारीनेच स्पर्धेत उतरलेले असतात. साहजिकच त्यांना हरवणे सोपे नसते. स्पर्धकांची तयारी व त्यांच्या चांगल्या डावपेचांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्पर्धेत खेळताना प्रत्येक डाव कसा जिंकता येईल याविषयी विचार करते. त्यानुसार खेळ करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे दबाव येत नाही.
आगामी काळात कोणते लक्ष्य ठेवले आहेस?
- सलग दोन उपविजेतेपदांमुळे माझ्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. माझे विजेतेपद अगदी थोडक्यात हुकत आहे. आगामी स्पर्धांत विजेतेपद मिळविणे हे माझे मुख्य लक्ष्य असेल. तसेच येत्या वर्ष-दोन वर्षांत वुमन ग्रँडमास्टर हा किताब मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी माझे रेटिंग २३००च्या पुढे नेणार आहे. वुमन ग्रँडमास्टर किताबासाठी तीन नॉर्म मिळवणे गरजेचे असते आणि त्यासाठी परदेशातील स्पर्धा खेळणे आवश्यक आहे. कामगिरीमध्ये सातत्य राखल्यास ही गोष्ट निश्चितच अवघड नाही. येत्या १४ ऑक्टोबरपासून मी कोईमतूर येथे राष्ट्रीय १७ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा खेळणार आहे. सध्या मी या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. मागील वर्षी मी या स्पर्धेत उपविजेती होते. आता ही स्पर्धा जिंकण्याचे ठरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा विशेषः गांधीगिरीमुळे मिळला न्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महात्मा गांधी यांनी शांततामय मार्गाने संघर्ष करण्याची शिकवण कृतीमधून दिली. उपोषण, पदयात्रा, मौन आदी स्वातंत्र चळवळीमधील मार्गाचा वापर अजूनही समस्या मांडण्यासाठी केला जातो. हिंसक आंदोलन करण्याऐवजी ‘गांधीगिरी’ करत यंत्रणेला खजील करण्याचे आंदोलनाचे तंत्र काही वर्षांत विकसित झाले आहे. त्याचा वापर शहरातील अनेक संघटना व व्यक्तिंनी केला आहे. या विधायक कृतीचा हा आढावा.

कंपनी अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील कॉँसेंट्रिक्स कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आंदोलन केले. ही कंपनी बंद होणार असून कर्मचाऱ्यांना त्याबद्दल अधिकृतरित्या काहीच सांगितले गेले नव्हते. काही कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील बदली स्वीकारण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे धास्तावलेल्या कार्मचाऱ्यांनी शांततामय मार्गांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी गांधीगिरी केली. पीएफ संदर्भातील दोष, चुका दुरुस्त करा, सक्तीने राजीनामे घेऊ नयेत, तीन महिन्यांचा पगार मिळावा, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कंपनी अधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल दिले. यामुळे आम्ही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालो, असे संजय त्रिभुवन या कर्मचाऱ्याने सांगितले. जिल्हा प्रशासन, कामगार उपायुक्त कार्यालयाचे अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न असून तो सुटावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून निश्चितच न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘गांधीगिरी’द्वारे मनविसेने मांडले प्रश्न

सत्य व अहिंसेची कास धरत महात्मा गांधीच्या मार्गाने हिंसा टाळून प्रश्न सोडवता येऊ शकतात हे मनविसेने दाखवून दिले. गेल्या काही वर्षापासून गांधीगिरीचा अवलंब करीत महाराष्ट्र न‌वनिर्माण विद्यार्थी सेनेने अनेक सामाजिक प्रश्न प्रशासनासमोर मांडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे आक्रमक आंदोलन ही ओळख आहे. परंंतु, या संघटनेने गांधीगिरी करत संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरास्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी आंधळ्या मनपाचा निषेध करीत डोळ्यावर काळी पट्टी बांधून पालिकेसमोर आंदोलन केले होते. दुसऱ्यावेळी देखील संत एकनाथ रंग मंदिराच्या दुरावस्थेचा प्रश्नावर गांधीगिरी पद्धतीने ‘पताका बांधा’ आंदोलन केले. दर्गा ते पीर बाजार रस्त्यावरील पुलाचे बांधकाम कोनशीलेचे अनावरण झाल्यानंतर चार वर्षे झाली तरी सुरूच होते. मनविसेने गांधीगिरी पद्धतीने या कोनशिलेचा केक कापून चौथा वाढदिवस केला होता. शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पालिकेच्या नाकर्तेपणाचा निषेध कर विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे स्वतः बुजवत गांधीगिरी केली होती.

मनविसेतर्फे विविध प्रसंगी गांधीगिरी करण्यात आली. निर्लज्ज प्रशासनाला लाज वाटावी या हेतूने उपहासात्मक पद्धतीने आंदोलन करण्याची ही पद्धत उपयुक्त आहे. यापुढे देखील जनसामान्यांच्या प्रश्नांवर गांधीगिरीचा अवलंब केला जाईल.
-संदीप कुलकर्णी, जिल्हा सचिव, मनविसे

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची लागली तड

विद्यापीठातील लंच होम सुरू करण्याची मागणी असो की, किरकोळ कामांसाठी रखडलेल्या वसतिगृहाच्या इमारतीत केलेले सत्ननारायण पूजन, गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गांधीगिरी करत लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर विद्यापीठात आंदोलने, निदर्शने करून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने वर्ष गाजवले. पण, त्यात लक्षवेधी ठरले ते विविध प्रश्नांसाठी केलेली गांधीगिरी आंदोलने. विद्यापीठाने चार कोटी रुपये खर्च करून कँटीनसाठी तयार केलेली इमारत बंद होती. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने याच इमारतीत उपहासात्मकरित्या कँटीन सुरू करून गांधीगिरी केली. त्यामुळे एका महिन्यात कँटीन सुरू करावी लागली. परीक्षा विभागाच्या कारभाराबद्दल अनेक वेळा आंदोलन होते. परीक्षा विभागात वर्षभरात तीन प्रभारी परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती केल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ‘आपलं विद्यापीठ लय भारी, एक वर्षात तीन परीक्षा नियंत्रक प्रभारी’ असे म्हणत प्रभारी पदाला वर्ष पूर्ण झाले तेव्हा केक कापून गांधीगिरी केली. उस्मानपुरा परिसरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह तीन वर्षांपासून किरकोळ कारणावरून बंद होते. विद्यार्थ्यांना निवासावर खर्च करावा लागत होता, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने या इमारतीची साफसफाई केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे फोटो ठेऊन सत्यनारायण पूजा केली होती. या अनोख्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी करावी लागते. या पद्धतीच्या आंदोलनांमधून कोणालाही इजा न पोहोचवता प्रशासनासमोर भूमिका मांडता येते. गांधीगिरी आंदोलनासारखे आंदोलने करून प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडले.
-अॅड. राहुल तायडे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांना २०० च्या नोटांची अजूनही प्रतीक्षा

$
0
0

औरंगाबादकरांना २०० च्या नोटांची अजूनही प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिझर्व्ह बँकेने ५० व २०० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या आहेत. याला आता महिना उलटेल मात्र, आणखी थोडे दिवस तरी औरंगाबादकरांसाठी शहरातील बँकांधून ही नोट मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. दिवाळी १५ दिवसांवर आहे, लक्ष्मीपूजनला नोटांची पूजा करण्याची प्रथा घरोघरी आहे, पण या पूजेसाठी आता नव्या २०० च्या नोटा घेऊ ‌इच्छिणाऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००च्या नव्या नोटा लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी व्यापारी आणि नागरिक करीत आहेत.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियातून या नवीन नोटांचे फोटो शेअर केले जात आहेत. या नोटा औरंगाबादला आल्या आहेत का असा प्रश्न या पोस्ट वाचून-पाहून केला जात आहे. नवीन नोटांबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली आहे, पण शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक आणि खासगी बँकांमध्ये त्या नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडिया या नोटांची मागणी रिझर्व्ह बँककडे करणार असून आगामी काळात या नोटा उपलब्ध होतील असे सूत्रांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेने २०० रुपयांच्या नवीन नोटांची घोषणा केली होती. २०० रुपयांची नोट पहिल्यांदाच चलनात येणार असल्याने त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. ही नोट उपलब्ध होईल, या अपेक्षेने अनेकांनी एटीएमवरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना नवीन नोटा मिळाल्या नाहीत. याबाबतची चौकशी केली असता अजूनही बँकांनी एटीएम मशीनमध्ये या नोटांच्या अनुषंगाने बदल केलेले नाहीत. या नोटा अद्याप बँकेतच उपलब्ध नाहीत तर एटीएमवर कुठून येणार असा प्रतिप्रश्न बँक अधिकारी करत आहेत. या आठवड्यात नवीन नोटा येण्याची शक्यता आहे. एटीएम प्रोग्राममध्ये आवश्यक बदल केल्यानंतर या नोटा एटीएमवरही उपलब्ध होतील अशी पुष्टीही अधिकारी देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खादीची विक्री दुपटीने वाढली

$
0
0

खादीची विक्री दुपटीने वाढली
कोट्यवधींची उलाढाल; नामांकित शोरूमसह पारंपरिक खादी दुकानांतही गर्दी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गांधी जयंतीच्या निमित्ताने गेल्या आठवड्यामध्ये खादीच्या विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. विशेषतः तरुणाई खादीच्या कपड्यांकडे वळल्याचे या खरेदीतून दिसून आले आहे. शहरातील सरकारी खादी ग्रामोद्योगमध्ये १ लाख रुपयांहून अधिक कापड विक्री झाली, तर खासगी दुकानांमध्येही खादीच्या कपड्यांची विक्री सुमारे ४० लाख रुपयांहून अधिक झाली आहे.
खादी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अतुट नाते. सोमवारी २ ऑक्टोबरला सर्वत्र गांधी जयंती साजरी झाली. शहरातही साजरी झाली. या जयंतीच्या आधीच्या आठवड्यात आणि २ ऑक्टोबरला खादीची विक्री अनपेक्षितपणे वाढल्याचे दिसून आले. खादीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि त्याचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालना दिली आहे. यामुळे हा फरक अधिक जाणवत असल्याचे शहरातील खादी ग्रामोद्योगमधील राजकुमार डांगर यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांगितले. जिथे काही हजारांची विक्री होत होती ती आज लाखोंनी होऊ लागली आहे, अशी पुष्टी त्यांनी दिली.
टिळकपथवरील कापड व्यापारी हरविंदरस‌िंग सुलजा यांनीही आजकाल मोदी जॅकेट, मोदी खादी यासारख्या कपड्यांना अधिक मागणी असल्याचे सांगितले. यात कोट्यवधींची उलाढाल होत, आहे असे ते म्हणाले. कॅनॉट, क्रांतीचौकातील दोन तीन कल्चरल हॉल, उस्मानपुरा येथील गोपाल कल्चरल हॉल, टिळकपथवरील नामांकित कपड्यांचे दालन आणि फक्त खादी विक्रीसाठी असलेल्या अधिकृत विक्रेत्यांनीही नवरात्र ते २ ऑक्टोबरपर्यंत कोट्यवधींची उलाढाल झाली असल्याचे सांगितले. खादी ग्रामोद्योगचे डांगर म्हणाले, सरकारी खादी विकण्यासाठी तर आम्ही २० टक्के सूट देत आहोत याचा ग्राहकांनी भरपूर फायदा घेतला आहे.
या कपड्यांना मागणी
खादीचा नेहरू शर्ट व जीन्सला मोठी मागणी आहे. महिन्याला पाच ते सात लाखांची खादीची विक्री शहरातील खादी भांडारात होत आहे. सध्या खादीमध्ये रंगीत बिहारी खादी, झरणा, लायनिंग, एन. एम. सी, मिनिस्टर इत्यादी प्रकार उपलब्ध आहेत. निळा, गुलाबी, आकाशी, फिकट हिरवा, चॉकलेटी अशा विविध आकर्षक रंगात खादी मिळत आहे. खादीच्या कापडासह सध्या रेडिमेड कपडेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामध्ये रेडिमेड कुर्ता, नेहरू शर्ट, जिन्स, नाइट ड्रेस, जॅकेट, बरमुडा, फूलशर्ट, हाफ शर्ट अशी विविधता आल्याने खादीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांना फुले वाहून अनोखे आंदोलन

$
0
0


खड्ड्यांना फुले वाहून अनोखे आंदोलन
औरंगाबाद : शहराच्या विविध भागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा, या मागणीसाठी गब्बर अॅक्शन कमिटीने विविध रस्त्यांवरील खड्ड्यांना हार-फुले वाहून अनोखे आंदोलन केले. शहराचे रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास आगामी काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही गब्बर अॅक्शन कमिटीच्या वतीने देण्यात आला.
गांधी जयंती निमित्त सोमवारी (२ ऑक्टोबर) गब्बर अॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. गब्बर अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी, उपाध्यक्ष हाफिज अली, कार्याध्यक्ष इम्रान पठाण, सचिव प्रवीण बुरांडे, सहसचिव जावेद खान महेबूब खान, कोषाध्यक्ष फेरोज पटेल, सल्लागार अब्दुल कय्युम, नदीम राणा, ईसा यासिन, सदस्य कृष्णा चव्हाण, अंकुश गायके, जावेद खान नवाज खान, हसन शाह, शकील अहेमद, मोहम्मद मोहसीन, अमोल भुरेवार, कायदेशीर सल्लागार अॅड. विकास खरात, अॅड. दीपक दाभाडे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. गब्बर अॅक्शन कमिटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महापालिका प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये फुले वाहून निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images