Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘द शेअर स्ट्रीट’उपक्रमात गरजवंताना वस्तू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरातील वापरात नसलेल्या चांगल्या वस्तू, कपडे, खेळणी गरजू बांधवांपर्यंत पोहचविणारा ‘द शेअर स्ट्रीट’ उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला. दिवाळीमध्ये घराची साफसफाई करताना अशा अडगळीतील वस्तू एकत्र करत, त्याचे गरजवंतांना वाटप करण्यात आले.
वेदांतनगरमधील बॅडमिंटन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. जैनमूनी गौरव मूनी यांच्यासह पोलिस उपायुक्त दीपाली घाटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पूजा पगारिया, डिंपल पगारिया, अल्पा जैन, मनीषा भन्‍साळी, सीमा झांबड, आरती बागरिचा, श्वेता सेठी यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. गरजू नागरिकांना भांडी, खेळणी, पुरुषाचे कपडे, लहान मुला, मुलींचे कपडे, साड्या, लहान मुलांची खेळणी, बॅग, सायकल, घड्याळ आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. दिवाळीमध्ये साफसाफाई करताना घरामध्ये आढळणारे कपडे बाहेर टाकून देण्यापेक्षा, भंगारमध्ये फेकण्यापेक्षा या ग्रुपतर्फे हे साहित्य एकत्र करण्यात आले. अनेकांकडून जमा केलेले हे साहित्य गरजूंना वाटप केले जाते. गरजवंतांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटविण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न म्हणून हा उपक्रम घेतला जातो, असे डिंपल पगारिया यांनी ‘मटा’ला सांगितले. दिवसभरात दोन ते अडीच हजार नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक विकास जैन यांची उपस्थिती होती. कपडे, भांडी अशा घरगुती साहित्यासह यावेळी उपस्थित नागरिकांना ‘द शेअर स्ट्रीट’तर्फे अन्नदानही करण्यात आले. वस्तू घेऊन जाण्यासाठी आलेल्यांना दीड हजार पाकिचे अन्न वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. गर्गे यांना पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संस्कृत पंडित डॉ. दा. वि गर्गे यांना सांगली येथील कै. सौ. जयंती वसुदेव विश्वस्थ निधीतर्फे दिला जाणारा पुरुषोत्तम पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार १९९३पासून दिला जातो.

संस्कृत पंडित आणि मीमांसातज्ज्ञ डॉ. दा. वि. गर्गे यांनी नुकतेच १०१व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्कृत विषयातील विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. सांगलीचे गणेश गाडगीळ यांनी रविवारी घरी येऊन हा पुरस्कार डॉ. गर्गे यांना प्रदान केला. ११ हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. गर्गे यांनी आपले शिक्षण पुण्यातील स. प. महाविद्यालय आणि डेक्कन महाविद्यालय येथे पूर्ण केले आहे.

त्यांनी १९४७मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली. ‘शबर भाष्यातील अवतरणे : एक चिकित्सक अभ्यास’ हा मीमांसा शास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटनेशी एकनिष्ठ रहा; प्रश्न सुटतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आपली संघटना नेहमीच अधिकाऱ्यांच्या विविध अडीअडचणी, समस्या सोडवत आलेली आहे. अधिकारी संघटना म्हणून आपले काम उत्तम आहे. संघटनेशी सर्वांनी एकनिष्ठ रहावे, आपले प्रश्न मार्गी लागतील,’असे प्रतिपादन महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष गणेश चौधरी यांनी रविवारी येथे केले.
महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला मंत्रालय सचिव प्रमोद शिंदे, दीपक म्हसेकर, अजय सावरीकर, दीपक देशमुख, उपायुक्त पारस बोथरा, संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष गणेश चौधरी आदींची उपस्थिती होती. संघटनेचे माजी अध्यक्ष सुनील चव्हाण म्हणाले की, काम करताना आपला लोकप्रतिनिधींशी संबंध येतो, त्यामुळे त्यांच्याशी चांगले संबंध असावेत. आपण अनेक विषयांना हात घालतो, यासाठी आपल्याकडे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. डॉ. दिलीप देशमुख, कार्याध्यक्ष राजेश कुलकर्णी, सचिव अशोक पाटील, नरसिंह मित्रगोत्री, अजय सावरीकर, उपायुक्त मनोज चौधर आदींसह राज्यभरातील अधिकारी उपस्थित होते.

सरचिटणीसपदी सोळंके

महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. गेल्या वर्षीचीच कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येत प्रवृत्त करणारा कोठडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्नाचे आमीष दाखवून विवाहितेला फूस लावून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याला रविवारी (आठ ऑक्टोबर) कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत नऊ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले.

या प्रकरणी २१ वर्षांच्या विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २०१४ मध्ये विवाहितेचे लग्न सिल्लोड येथील तरुणाशी झाले होते व त्यांना एक वर्षाची मुलगी आहे, मात्र दोघांमध्ये घरगुती कारणावरून सतत भांडणे होत होती. त्यातच आरोपी सुरेश मुंढे व पीडितेची ओळख झाली होती. पीडितेच्या घरगुती भांडणाचा फायदा घेत तिच्याशी लग्न करण्याचा तगादा आरोपीने लावला होता. जून २०१७मध्ये आरोपी सुरेशने पीडितेला ‘मी माझ्या पत्नीला सोडले,’ असे सांगत तिला फूस लावून घेऊन गेला. त्यानंतर आरोपी व पीडिता शिवजीनगर येथे भाड्याच्या खोलीत राहात होते. पीडितेने आरोपीकडे लग्नाची विचारणा केली असता, आरोपीने महिन्याभरानंतर विवाह करू, अशी थाप मारली. त्यानंतर पीडितेने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे आरोपी पीडितेला मारहाण करत होता; तसेच आरोपी विवाहितेला ‘तू आत्महत्या कर,’ असे सारखा म्हणत होता.

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी सुरेश मुंढे याला शनिवारी अटक करून रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एम. ए. गंडले यांनी कोर्टात केली.

घरी आणून ठेवले विष
आरोपीने विषाची बाटलीदेखील आणून ठेवली होती. तीन ऑक्टोबर रोजी लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये कडक्याचे भांडण झाले व आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर पीडितेने दुपारी विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने आरोपीने तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा टी पॉइंटची तेरा दुकाने फोडली

$
0
0

म. टा प्रतिनिधी, फर्दापूर:
फर्दापूर येथील अजिंठा लेणी टी पॉइंट येथे अज्ञात चोरांनी १३ दुकाने फोडून एक लाख दोन हजार ५८० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही चोरी शनिवारी रात्री झाली. यामुळे खळबळ उडाली असून फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे ७८ दुकाने बांधण्यात आली आहेत. येथील १३ दुकानांचे कुलूप एकाच रात्री शनिवारी तोडून चोरी करण्यात आली. या दुकानांतून एसडी कार्ड, डीव्हीडी, व्हिडिओ कॅमेरा, चष्मे, सिगारेट, बिस्किट, आईसक्रीम, रोख रक्कम आदी साहित्य चोरीस गेले. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी दुकाने उघडण्यासाठी दुकानदार आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. व्यापाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिस विभागाचे ठसे तज्ज्ञ सहायक पोलिस निरीक्षक गणेश मदने यांना पाचारण करण्यात आले. श्वानाने एमटीडीसीच्या व्यवस्थापकाच्या निवासस्थानापासून जंगलाच्या दिशेने मार्ग पकडला. याप्रकरणी सैय्यद मुमताज हुसेन यांच्या फिर्यादीवरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे.
टी पॉइंट येथील दुकानांच्या परिसरात सीसीटीव्ही नाही, फक्त तीन सुरक्षारक्षक असून ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबतात. येथे रात्रीच्यावेळी लाइट बंद राहतात. येथील पार्किंगमधून नुकत्याच दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणमध्ये तोडफोड, जमावावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन १२ येथील महावितरण कार्यालयात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी जमावावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार शनिवारी दुपारी बारा वाजता भारनियमनाच्या कारणावरून झाला.
महावितरणचे सहाय्यक अभियंता अविनाश चव्हाण यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मनोहर बनकर, व्यंकटेश बावीस्कर (दोघेही रा. एन ११,‌ हडको) हे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या जमावासह महावितरणच्या कार्यालयात विनापरवानगी घुसले. भारनियमन क करता अशी विचारणा करत जमावाने कार्यालयातील टेबल, खुर्च्या, बायोमेट्रिक मशीन, बोर्ड, जुने मीटर आदी साहित्याची तोडफोड केली. तसेच कार्यालयातील कर्मचारी व चव्हाण यांना धक्काबुक्की करीत अश्लील शिवीगाळ केली. या घटनेत कार्यालयाचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्या तक्रारीवरून मनोहर बनकर, व्यंकटेश बावीस्कर व जमावाविरुद्ध् शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगल करणे, सरकारी मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक झुंजारे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीची तयारी; आज मतमोजणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींमधील कारभारी सोमवारी ठरणार आहेत. या ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान झाले. यावेळी सरपंचाची निवडणूक थेट होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी जिल्ह्यात सर्वत्र पूर्ण तयारी झाली असून दुपारी एकपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य निवडीसाठी ६९२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सरपंचपदासाठी ६१२ व सदस्यपदासाठी ३४२१ उमेदवार रिंगणात आहेत. औरंगाबाद तालुक्यात गोलटगाव, लाडसावंगी, गांधेली आणि रहाळपट्टीतांडा या चार ग्रामपंचायती संवेदनशील म्हणून घोषित केल्या होत्या. तालुक्याची मतमोजणी हडकोतील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. मतमोजणीला सर्वत्र सकाळी आठ वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीः सोयगाव ०५, सिल्लोड १८, कन्नड ५१, फुलंब्री १७, खुलताबाद १०, वैजापूर २१, गंगापूर ३५, औरंगाबाद ३४, पैठण २२. (यापैकी काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध उमेदवारांची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात येईल.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ शिक्षकांना पुन्हा मुदतवाढ

$
0
0

‘त्या’ शिक्षकांना पुन्हा मुदतवाढ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग चारमध्ये असलेल्या व संवर्ग एक ते तीनमुळे बदली होऊन विस्थापित होणाऱ्या ७४९ शिक्षकांना बदली अर्ज करण्यासाठी नऊ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत प्रशासनाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
ग्रामविकास खात्याने यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन आणि राज्यस्तरावरून राबविण्याचे जाहीर केले. त्यानुसार अवघड व सोपे क्षेत्र तसेच संवर्ग एक ते चार असे गट करण्यात आले. संवर्ग एक ते तीन मध्ये निकषपात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. अवघड क्षेत्र, पती पत्नी एकत्रिकरण, एकाच ठिकाणी दीर्घ काळ राहिलेले असे त्यात वर्गीकरण आहे. या शिक्षकांना मिळणाऱ्या पदस्थापना या उर्वरित शिक्षकांमधून असतील. या प्रक्रियेतून विस्थापित होणाऱ्या शिक्षकांचा समावेश संवर्ग चारमध्ये करण्यात आला आहे. संवर्ग चारमध्ये समाविष्ट झालेल्या शिक्षकांची संख्या जिल्ह्यात ७४९ आहे. या शिक्षकांना पोर्टलवर अर्ज दाखल करताना कोणत्या शाळांमधून पदे रिक्त राहणार आहेत ? कोणत्या विषयाच्या जागा कोठे रिक्त आहेत ? याची माहिती दिसणे अपेक्षित आहे. अर्ज भरण्याची मुदत चार ऑक्टोबरपर्यंत होती. त्यानंतर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सहा तारखेपर्यंत दिलेली मुदतवाढ पुन्हा नऊ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आले. दरवर्षी बदली प्रक्रिया मार्च एप्रिल महिन्यात राबविली जाते. यंदा राज्यस्तरावरून बदली प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयामुळे अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी, शिक्षकवर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्तिबोध हे हिंदी साहित्याचे आइन्स्टाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कवी गजानन माधव मुक्तिबोध यांची हयातभर उपेक्षा करण्यात आली. मात्र, काळाला पुरून उरण्याची क्षमता या कवीत होती. आजच्यासारख्या सुविधा त्यांना मिळाल्या असत्या, तर कवी मुक्तिबोध यांनी जग कवेत घेतले असते. मुक्तिबोध हिंदी साहित्याचे आइन्स्टाइन होते,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक विष्णू खरे यांनी केले. ते चर्चासत्रात ते बोलत होते.
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे कवी गजानन माधव मुक्तिबोध यांच्या साहित्यावर रविवारी मसापच्या सभागृहात चर्चासत्र घेण्यात आले. या एकदिवसीय चर्चासत्राचे उद्‍घाटन साहित्यिक विष्णू खरे यांनी केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील, डॉ. चंद्रदेव कवडे, डॉ. निशिकांत ठकार, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुक्तिबोध यांच्या कवितेचे खरे यांनी विश्लेषण केले. ‘आपल्या आधीच्या लेखकांचा त्यांच्यावर प्रभाव नव्हता. मुक्तिबोध यांची लेखनशैली वाचकांसाठी भिन्न ठरली. तत्कालीन परिस्थितीत कुणाचीही पर्वा न करता त्यांनी परखड लिखाण केले. कवितेला त्यांनी ब्रह्मांडाशी जोडले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते जगले. हयातीत कुणीच त्यांच्या कवितेची दखल घेतली नाही. कालांतराने कवितेचे महत्त्व लक्षात घेत भरपूर लेखन झाले,’ असे खरे म्हणाले.
पहिल्या सत्रात डॉ. चंद्रदेव कवडे यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तिबोध यांच्या साहित्यावर आधारित निबंधांचे वाचन झाले. डॉ. गोविंद बुरसे यांनी ‘मुक्तिबोध यांच्या कवितेतील निसर्गवाद व श्रृंगार’ यावर विवेचन केले. ‘मुक्तिबोध यांच्या कवितेत नेहमी निसर्गतत्त्वांच्या प्रतिमा होत्या. काळानुरूप श्रृंगार कमी झाला आणि नवी धाटणी समोर आली. स्त्रियांचे सर्वांगीण चित्रण त्यांनी केले’ असे बुरसे म्हणाले. डॉ. भारती गोरे यांनी ‘मुक्तिबोध का गद्य साहित्य’, प्रा. सादिक यांनी ‘मुक्तिबोध यांचा उर्दू साहित्यावर प्रभाव’ या विषयावर भाष्य केले. दुसऱ्या सत्रात डॉ. राजेंद्र नाईकवाडे, प्रफुल्ल शिलेदार आणि डॉ. श्रीनिवास हेमाडे यांनी निबंधवाचन केले. प्राचार्य ठाले पाटील यांनी चर्चासत्र घेण्याची भूमिका स्पष्ट केली. दोन सत्रांच्या शेवटी प्रा. निशिकांत ठकार यांनी चर्चासत्राचा गोषवारा घेतला. यावेळी साहित्य रसिक, लेखक उपस्थित होते.

मुक्तिबोधांचे चिंतन

‘तत्कालिन मार्क्सवादी विचारवंत व नेत्यांनी मुक्तिबोध यांची नेहमीच उपेक्षा केली. मुक्तिबोध यांना अनेकजण कवी मानत नव्हते. हिंदी कवितेला स्वातंत्र्य बहाल करणारे कवी मुक्तिबोधांचे चिंतन काळाच्या पुढचे होते. त्यांच्या कवितेतील आशय लक्षात घेतल्यास त्यांची उंची लक्षात येते’ असे प्रसिद्ध साहित्यिक विष्णू खरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमन करिअरच्या मुळावर

$
0
0

​ भारनियमन करिअरच्या मुळावर
अंधारात अभ्यास करायचा कसा; स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना धास्ती
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारनियमनामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरवर पाणी फिरण्याची चिन्हे आहेत. गावात अन् शहरातही भारनियम यामुळे औरंगाबादमध्ये जवळपासच्या खेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षेची तयारी कशी करायची, असे मोठे संकट उभे राहिले आहे. चार-चार वर्षे परीक्षेची तयारी, त्यात एक-एक संधी महत्त्वाची, परंतु, आठ, दहा तासांच्या भारनियमनामुळे अभ्यास कोठे करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मागील काही वर्षांत औरंगाबादसह, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या यशातील टक्का वाढला आहे. राज्य, केंद्रीय लोकसेवा आयोगासह, बँकिंग अशा विविध परीक्षेची तयारीसाठी चार-चार वर्षे विद्यार्थी घालवतात. डोळ्यात तेल घालून अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना सध्या भारनियमनाचे सर्वाधिक चटके बसत आहेत. ग्रामीण भागात आठ ते दहा तासाचे भारनियम. अभ्यासात निवांतपणा मिळावा म्हणून शेकडो विद्यार्थी शहरातील अभ्यासिकांमध्ये, कॉलेजमधील ग्रंथालयांचा आधारा घेतात, परंतु येथेही अनेकदा भारनियमनामुळे अंधार अशी स्थिती आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी निवांत अन् शांत वातावरण आवश्यकता असते. त्यासाठी दिवसा अभ्यासिकेत तर, रात्री निवांत घरी विद्यार्थी अभ्यास करतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा स्पर्धा परीक्षांचा काळ, आठ ते दहा परीक्षा तोंडावर आहेत. परीक्षा तोंडावर असल्याने प्रत्येक मिनिट महत्त्वाचा. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत, परंतु भारनियमनचा फटका त्यांना सहन करावा लागतो आहे. ही संधी हुकली तर करिअरवर पाणी सोडावे लागेल अशी भीती विद्यार्थ्यांना सतावत आहे. सर्व परीक्षा असताना आठ ते दहा तास भारनियमन करणे म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरसोबत खेळण्यासारखे आहे, भारनियमन टाळले तर, विद्यार्थ्यांवरील संकट टळेल असे विद्यार्थ्यांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकाशदिवे, पणत्यांनी सजली बाजारपेठ

$
0
0


आकाशदिवे, पणत्यांनी सजली बाजारपेठ
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने बाजाराला चैतन्य येऊ लागले आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीला उधाण येईल. ही खरेदीच सुकर व्हावी यासाठी पणती, आकाशदिव्यांपासून ते अगदी रिअल इस्टेट, आणि कन्झ्युमर ड्युरेबल्सपासून ते अगदी खवय्येगिरीपर्यंत विविध प्रकारच्या बाजारपेठा आणि त्यातील विविध नवीन ट्रेंडविषयी माहिती देणारी मालिका ‘आली दिवाळी’ आजपासून...
वर्षभरातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपोत्सव. आठ दिवसांवर आलेल्या दीपोत्सवाची बाजारपेठा सजू लागल्या आहेत. आकाशदिवे, फुलमाळ, पणत्या, दिव्यांनी बाजारपेठ सजली असून खरेदीस नागरिकांनी विशेषत: महिलांनी सुरुवात केली आहे. सात ऑक्टोबरपर्यंत विविध कंपन्यांचे पगार झाल्याने पैसा हाती आल्याने दिवाळीच्या खरेदीस वेग आला आहे.
गुलमंडी, गोमटेशमार्केट, दिवाण देवडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा, उस्मानपुरा, उल्कानगरी, गजानन महाराज मंदिर परिसर, कॅनॉट, टीव्ही सेंटर आदी भागात दालने सजली आहेत. पणत्यांमध्ये यंदा कुंभारवाड्यातील पारंपरिक पणत्यांसह राजस्थानी, गुजराती पणत्यांना मागणी आहे. मातीच्या पणत्या पाच रुपये नग ते १५ रुपये नग व त्यानुसार डझनभर पणत्यांची रेंज बाजारात आहे. राजस्थानी, गुजराती पणत्या किमान २० रुपयांपासून ते अगदी ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. महिरपी व मयूर पणत्यांचा नव्या आकारातील पणत्यांना मागणी आहे. याशिवाय मेणबत्या, तरंगणाऱ्या दिव्यांनाही मागणी आहे.
नेत्रदीपक आकाशकंदिल, आकर्षक पणत्या, फटाक्यांनी सजलेली दुकाने, पूजा साहित्याचे विशेष ‘कीट’ खतावणी व रोजमेळच्या वह्या यांची दालने सजायला सुरुवात झाली आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांंनी विविध योजना दिल्या आहेत. काहींनी ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी एकाच छताखाली फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्यांचे विशेष दीपावली कीट उपलब्ध करून दिले आहे. बाजारपेठेत फेरफटका मारल्यास चिनी मालाची निर्माण होऊ पाहणारी मक्तेदारी भारतीय साहित्याने मोडून काढल्याचे दिसत आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण असणारे आकाशकंदीलाचे अनेक प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यंदा चिनी मालाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून पर्यावरणस्नेही विशेषत: ‘हॅण्डमेड पेपर’ तसेच कापडी आकाश कंदीलला विशेष मागणी आहे. कापडी आकाशकंदील साधारणत: ७० पासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा असे प्रकार आहेत. तर प्लास्टिकद्वारे तयार केलेला ‘फायर बॉल’ही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. जुन्या चांदणी आकारातील आकाशकंदील ५० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत आहेत. या शिवाय सजावटीसाठी वापरण्यात येणारे लहान आकारातील आकाशदिव्यांच्या माळांची ४० रुपये डझन या दराने विक्री होत आहे. पणत्यांमध्ये नेहमीच्या मातीच्या साध्या पणत्या १० ते १५ रुपये डझन आहेत. कुंदन वर्क, ंगीत, टिकली वर्क, सिरॅमिक वर्क असणाऱ्या पणत्या प्रती नग २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आहे. या शिवाय मेणाच्या जेल, फ्लोटिंग, सुगंधी असे विविध प्रकार ५५ रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा बाजारात कोकण परिसरातून आलेले खास ‘मॅजिक लॅम्प’ उपलब्ध आहे. या दिव्याचे वैशिष्ट्य म्हणजे, मातीच्या बोळक्याचा आकार असलेला दिव्यावर गणरायाची मूर्ती विराजमान आहे अशा दिव्यांना मागणी आहे. आकाशदिवे, माळ, दीपमाळ, तोरणमाळ, लायट‌िंग यांचे विविधप्रकार २० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत आवड आणि हौसेनुसार उपलब्ध झाल्याने ग्राहकही खूष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचे परिपत्रक वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रभारी प्राचार्यपदासाठी अर्हताप्राप्त अध्यापकांना डावलून सेवाज्येष्ठतेचा नियम लादणारे परिपत्रक काढल्याने विद्यापीठ प्रशासन वादात अडकले आहे. विशेष म्हणजे रद्द झालेल्या शासन निर्णयातील तरतुदींचा समावेश करून परिपत्रक काढण्यात आले. एका संस्थेचे हितसंबंध जपण्यासाठी परिपत्रक काढणाऱ्या तत्कालीन बीसीयूडींविरोधात (महाविद्यालय व विद्यापीठ विकास संचालक) कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. उल्हास उढाण यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात संबंधित शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाच्या वादामुळे नियमित प्राचार्यांच्या नियुक्तीत अडचणी आहेत. अशा महाविद्यालयात प्राचार्यांची नियमित नियुक्ती होईपर्यंत शासन निर्णयातील बाबीनुसार मान्यताप्राप्त अध्यापकांच्या ज्येष्ठतेनुसारच प्रभारी प्राचार्यांची नियुक्ती करावी व अशाच नियुक्तीची प्रकरणे मान्यतेसाठी कार्यालयास सादर करावीत असे परिपत्रक प्रभारी विशेष अधिकारी डॉ. सतीश पाटील यांनी काढले होते. सेवाज्येष्ठता डावलून प्रभारी प्राचार्य म्हणून इतर अध्यापकांची नियुक्ती करतील, अशा नियुक्तीस विद्यापीठ मान्यता देणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे, मात्र हेच परिपत्रक वादात सापडले आहे. तत्कालीन बीसीयूडी संचालकांनी हितसंबंध जपण्यासाठी विद्यापीठ प्रशासन, कुलगुरू, संस्थाचालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांची परिपत्रकाद्वारे दिशाभूल केली, असा आरोप व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. उल्हास उढाण यांनी केला आहे. अतिरिक्त प्राचार्य पदांचा कार्यभार देण्याबाबत १७ जानेवारी २०१७ रोजी तत्कालीन बीसीयूडी संचालकांनी कुलगुरूंच्या परवानगीशिवाय तोंडी आदेश देऊन विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाला परिपत्रक काढण्याचे आदेश दिले होते. रद्द शासन निर्णयातील तरतुदी टाकून परिपत्रक काढले. परिपत्रकातील आदेश उच्च न्यायालय आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. विशेष म्हणजे परिपत्रक काढताना संदर्भातील तारखा जाणीवपूर्वक चुकीच्या दिल्या आहेत, असे डॉ. उढाण यांनी सांगितले. परिपत्रकाचा आधारे शैक्षणिक विभागाने अनेक महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य पदाची अर्हताप्राप्त अध्यापकांना मान्यता दिली नाही.

कारवाई करा
संबंधित महाविद्यालयांना त्रुटी लेखी न कळवता तोंडी, फोन आणि मेसेंजरद्वारे कळवल्या. विशेष म्हणजे संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थाचालक परिपत्रकाची चौकशी न करता संचालकांच्या आदेशाला बळी पडले. परिपत्रकाद्वारे कुलगुरू, प्राचार्य आणि संस्थाचालकांची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या संचालकाविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. उढाण यांनी केली. या मागणीसाठी उढाण यांच्यासह शिष्टमंडळ कुलगुरूंची भेट घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेव्हण्यावर चाकुहल्ला; रवानगी हर्सूल कारागृहात

$
0
0

औरंगाबाद ः माहेरी गेलेल्या विवाहितेला सासरी न पाठविल्याने मेव्हण्यावर चाकुने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी रविवारी (आठ ऑक्टोबर) दिले. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी जहीर खान अब्बास खान (३२, रा. नॅशनल कॉलनी, औरंगाबाद) याला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

आरोपी जहीर खान याची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहत होती. आरोपी जहीर याने पत्नीला सासरी सोडा म्हणून बराच आग्रह केला होता. मात्र तिला पाठवले जात नव्हते. दोन ऑक्टोबर रोजी आरोपी जहीर खानचा मेव्हणा शहाबाज खान शेर खान (२५, रा. रोहिलागल्ली, सिटीचौक) हे चुलत भाऊ अमजत खान यांच्यासह दुचाकीने हर्सूल टी पार्इंटहून रोहिलागल्लीकडे जात होते. त्यावेळी रोजाबाग ईदगाह येथे आरोपी जहीर खान हा आला. दोघांना पाहून त्याने शिविगाळ करून त्यांना थांबण्यास सांगितले. शहाबाज खान यांनी दुचाकी थांबविली असता आरोपी जहीर खान याने त्यांच्या छातीवर चाकुने प्राणघातक हल्ला चढविला व दोघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी जहीर खान याला सात ऑक्टोबरला अटक करण्यात आली व कोर्टाने आरोपीला रविवारपर्यंतक पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. सहाय्यक सरकारी वकील एम. ए. गंडले यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगा शटडाउननंतर शहरात गढूळ पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी येथील उपकेंद्रात दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या तब्बल ३६ तासांच्या शटडाउननंतर रविवारी शहरात पाणीपुरवठ्यास सुरवात झाली, पण हे पाणी दुर्गंधीयुक्त आणि गढूळ असल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले. सकाळपासून याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी आल्या असून, ते प्यायल्यानंतर शेकडो शहरवासीयांचे आरोग्य धोक्याची भीती निर्माण झाली आहे.

उपकेंद्रातील दुरुस्तीसाठी महावितरणने तीन तासांचा वेळ मागितला होता, पण एकूण योजनेवरील दुरुत्या करण्यासाठी पालिकेने ३६ तासांचे शटडाउन घेण्याचे ठरविले. शटडाउनच्या काळात फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढणे, रिसायकल युनिटची स्वच्छता, फिडरवरील १७ व्हॉल्व्हची दुरुस्ती, आठशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलणे ही कामे केली गेली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी अकरापासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. शनिवारी रात्री अकरा वाजता काम संपून पाणीपुरवठा सुरू झाला.

सकाळच्या टप्प्यापासून वितरित झालेले पाणी गढूळ होते. पाण्याला एक विशिष्ट प्रकारचा दर्प होता. सहा दिवसांनंतर मिळणारे पाणीही गढूळ आणि खराब असल्याबद्दल संताप व्यक्त केला. या पाण्याला शेवाळाचा वास असल्याचे नागरिकांनी सांगितले. दिवसभरात पाणीपुरवठा केलेल्या वसाहतींतून दुर्गंधीयुक्त व गढूळ पाण्याची तक्रारी करण्यात आल्या. हे पाणी आरोग्यास धोकादायक असल्याने नागरिक आजारी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

पाण्याबाबत काही तक्रारी आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी काही भागातील नमुने पाहिले. त्यात गढूळपणा आढळला नाही, पण पाण्याला वास येत असल्याचे मला सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून पाणीनमुने तपासणीसाठी पाठवून त्याची चौकशी केली जाईल.
- डी. एम. मुगळीकर, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममधून रक्कम लंपास, दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
एटीएम कार्डची अदलाबदल करून दुसऱ्याच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास करणाऱ्या दोघांना वैजापूर पोलिसांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे. शफी करीब साहब (वय ४०, रा. विहार रेल्वे स्टेशन) व रफिक अहमद सय्यद (वय ३३, रा. अंबरनाथ ठाणे), अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या दोघांनी तालुक्यातील सवंदगाव येथील दुर्योधन धुळे या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या खात्यातून एटीएममधून पैसे पळवल्याची कबुली दिली आहे. त्यांनी वैजापूर येथून ७६ हजार ५०० रुपये, अंबेजोगाई येथून साडे चार लाख रुपये व उल्हासनगर येथे एक लाख ३० हजार रुपये एटीएममधून लांबवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अनेक गुन्हे केल्यानंतर चोरी सोडण्याची सुबुद्धी झाल्याने त्यांनी उल्हासनगर पोलिसांत जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. हे दोन्ही आरोपी आंध्रप्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. दरम्यान, या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरूद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिडचिडे नव्हे, तर.. अतिशांत मुले चिंताजनक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मुलांना व्यक्त होऊ द्या. त्यांना मनापासून ऐका-समजून घ्या. त्यांना व्यक्त होण्यासाठी मदत करा, प्रोत्साहन द्या. मुले राग-राग-चिडचिड करत असतील, तर ते पालकांविषयी असलेल्या प्रेमामुळे व पालकांजवळ सुरक्षित वाटत असल्यामुळेच, हे लक्षात घ्या. उलट मुले अतिशांत असतील, अजिबात बोलत नसतील, तर ते जास्त चिंताजनक आहे,’ असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी व्यक्त केले.
मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त पंख फाउंडेशन व बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे ‘वाद घालणारी मुले व हुशार पालक’ या विषयावर रविवारी तापडिया नाट्य मंदिरात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्टेपिंग स्टोन शाळेच्या संस्थापक इन्सिया हुसेन रहीम, बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. राजेंद्र वैद्य, पंख फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. मोनिका देशपांडे, सचिव डॉ. विक्रांत पाटणकर, सदस्य मधुरा अन्वीकर, बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या शहराध्यक्षा डॉ. मंजुषा शेरकर, सचिव डॉ. रोशनी सोधी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. शेट्टी म्हणाले, मुले वाद का घालतात किंवा वितंडवादी का होतात, याचा विचार केला पाहिजे. जेव्हा घरातील वातावरण विस्कळीत असेल. मुलांची झोप-आहार कमी होत असेल, घरामध्ये टीव्ही किंवा तत्सम साधनांचा अतिवापर होत असेल, मुले पुरेशा प्रमाणात बाहेर-मैदानात खेळ नसतील, तर मुले चिडचिडे किंवा वितंडवादी होऊ शकतात. त्यामुळे अशा सर्व बाबींची काळजी घेत मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू दिल्या पाहिजेत. तसेच मुले भांडत असतील, तर ती त्यांची व्यक्त होण्याची पद्धत आहे, हे समजून घेतले पाहिजे. मुलांना ‘चॉइस’ दिला तरी त्याला महत्व दिलेच पाहिजे, असे नाही. तसेच मुलांना प्रश्न विचारू दिले पाहिजेत. त्याउलट मुले अतिशांत असतील, अजिबात बोलत नसतील तर त्यातून मनोविकार जन्माला येऊ शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मुलांना बोलू द्या, व्यक्त होऊ द्या आणि त्यांच्या विश्वात डोकाऊन त्यांच्याशी मनापासून संवाद साधा. वयात येणाऱ्या मुलांचे बोलणे नैसर्गिकरित्या कमी होते; परंतु त्यांच्याशी अगदी विनाकारण बोलते व्हा आणि हळूच त्यांच्या भावविश्वात डोकाऊन पाहा. स्वतःच्या प्रेमाविषयी व अगदी स्वतःच्या ब्रेकअप विषयीदेखील पालकांनी मुलांशी बोलावे. अगदी दोनदा-तीनदा-चारदाही ब्रेकअप होऊ शकते आणि त्यामध्ये स्वतःला अपराधी समजण्यात काहीही अर्थ नाही, हे मुलांना समजणेही तितकेच गरजेचे आहे. एखाद्या वेळेस मूल नापास झाले तरी चालेल. पण सुसंस्कारामुळेच ते आयुष्यात यशस्वी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

‘शेअर लाइफ स्टोरीज’

डॉ. शेट्टी यांनी ‘शेअर युवर लाइफ स्टोरीज, नॉट ग्लोरिज…’ असेही पालकांना आवाहन केले. आपण आपल्या आयुष्यात कोणत्या चुका केल्या किंवा आपल्या आयुष्यात कोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून मार्ग कसा काढला, हे मुलांना आवर्जून सांगा. मुलांसमोर फुशारक्या मारण्याचा काहीही उपयोग होत नाही. मुलांचे चुकत असेल, तर त्यांना प्रवचन देण्यापेक्षा किंवा घालून-पाडून बोलण्यापेक्षा प्रभावी शब्दांत समजावून सांगा. पालक हेच मुलांचे ‘बेस्ट काउन्सिलर’ असतात, असेही ते म्हणाले.

‘गॅझेट हायजिन’ महत्त्वाचे

मोबाइल व इंटरनेटच्या अतिवापरावर नियंत्रण आवश्यक आहे. दिवसाला दीड-दोन तासांपेक्षा जास्त वापर त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळेच घरात ‘नो मोबाइल झोन’ गरजेचा आहे आणि त्याचे पालन पालकांसह सर्वांनीच करणे गरजेचे आहे, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले. कार्यशाळेनिमित्त उपस्थितांच्या विविध शंकांचेही त्यांनी निरसन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत जोरदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शहरात रविवारी दुपारी एक ते दीड तास सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत ३२ मिलिमीटर पाऊस झाला. वाळूज परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर सखल भागात पाणी साचून रहिवाशांची तारांबळ उडाली.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सलग एक तास जोरदार पाऊस झाल्यानंतर शहराच्या सखल भागात पाणी साचले. सिडको, गारखेडा, औरंगपुरा, चिकलठाणा, वाळूज या परिसरातील काही वसाहतीत पाणी साचल्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली, मात्र पाऊस थांबल्यामुळे पाणी इतरत्र वळवण्यात आले. शहरात सायंकाळपर्यंत ३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली. औरंगाबाद तालुक्यात १२.६० मिलिमीटर, फुलंब्री ३.५०, पैठण १३, वैजापूर ०९, गंगापूर १.३३ आणि खुलताबाद तालुक्यात १६.६७ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ६.२३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. या आठवड्यात सहा दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस समाधानकारक झाल्यास जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा वाढणे अपेक्षित आहे.

दरम्यान, मराठवाड्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जालना जिल्ह्यात ७.३५ मिलिमीटर, परभणी ७.४५, हिंगोली १०.३०, बीड ३.८३, लातूर ४.६६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १७.३७ मिलिमीटर पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लक्ष्य सातत्य ठेवण्याचे’

$
0
0

‘लक्ष्य सातत्य ठेवण्याचे’
Sudhir.Bhalerao@timesgroup.com
@SudhirbMT
कूचबिहार स्पर्धेतील ४५१ धावांच्या मॅरेथॉन खेळीने जालन्यातील शैलीदार डावखुरा फलंदाज विजय झोलचे नाव देशभर झाले. भारताला ज्युनिअर वर्ल्ड कप विजेत्या संघातील विजय आता २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने जिंकण्याबरोबरच कामगिरीत सातत्य ठेवण्याचे लक्ष्य त्याने बाळगले आहे.
.......
- २३ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करताना काय आव्हाने आहेत?
एकोणीस वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर काही मोठ्या स्पर्धांमध्ये नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. त्यामुळेच २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवताना माझ्यावर अजिबात दडपण नाही. या स्पर्धेतील चारही सामने जिंकणे हेच मी लक्ष्य ठेवले आहे.
- या स्पर्धेत तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत?
संघाचे नेतृत्व करीत असल्याने माझ्याकडून अपेक्षा असणे साहजिकच आहे. आमचा सलामीचा सामना दिल्ली संघाविरुद्ध आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश, पंजाब व विदर्भ या संघांविरुद्ध महाराष्ट्राचे सामने आहेत. या सामन्यांमध्ये कामगिरीत सातत्य ठेवणे हेच माझे मुख्य लक्ष्य आहे. क्रिकेटमधील स्पर्धा खूप वाढली आहे. संघातील स्थान राखण्याबरोबरच पुढील मार्ग प्रशस्त करण्यासाठी सातत्यपूर्ण धावा करणे आवश्यक आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मला फलंदाजीतील लय सापडली आहे. मागील चार लढतीत मी एक द्विशतक व तीन अर्धशतके झळकावली आहेत. याच कामगिरीत मला सातत्य ठेवायचे आहे.
- महाराष्ट्र रणजी संघात स्थान मिळवण्याविषयी काय सांगशील?
सध्या माझ्यासमोर २३ वर्षांखालील स्पर्धा जिंकण्याचे ध्येय मी बाळगले आहे. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. या स्पर्धेत मला चांगली कामगिरी करता आली तर महाराष्ट्र रणजी संघात निश्चितच स्थान मिळेल. महाराष्ट्र रणजी संघातून खेळणे हे माझे ध्येय आहे. मात्र, मी तूर्तास त्याचा विचार केलेला नाही.
- स्पर्धा सुरू नसताना कशी तयारी करतोस ?
मागील वर्षी मी टी-२० आणि वन-डे सामने खेळलो होतो. रणजी करंडक स्पर्धेत मी खेळलो नव्हतो. टी-२० आणि वन-डे सामन्यात माझी कामगिरी चांगली होती. पावसाळ्यात मी जालन्यात नियमित सराव करीत होतो. माझ्या घरासमोरच सिमेंटची विकेट बनवली आहे. त्यावर मी सराव करतो. तसेच शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याने जीममध्येही व्यायाम सुरू असतो. जालन्यातील मॅटिंग विकेटवर मी काही सामनेही खेळलो आहे. या सरावाचा मला निश्चितच फायदा होईल. २०११ मध्ये कूचबिहार क्रिकेट स्पर्धेतील ४५१ धावांच्या मॅरेथॉन खेळीने मला देशभर पोहचवले. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा माझा प्रयत्न असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अलाप’मध्ये विद्यार्थ्यांच्या आवाजाची जादू

$
0
0


‘अलाप’मध्ये विद्यार्थ्यांच्या आवाजाची जादू
भोंदू बाबा, जीएसटीवर तरुणाईने टाकला प्रकाश
सायली बाभूळगावकर, कॉलेज क्लब रिपोर्टर, शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज.
‘तेरी दिवानी’.. ‘तूम हो’.. ‘चुनरया’पासून ते ‘रुपेरी वाळूत’ अशी अप्रतिम हिंदी, मराठी, इंग्रजी गीते आपल्या आवाजात सादर करत तरुणाईने उपस्थितांना भुरळ घातली. ‘विंग्स’ सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रविवार धम्माल अन् मस्तीचा ठरला. ‘धिंडोरा’ पथनाट्यात भोंदू बाबागिरीसह जीएसटीसारख्या प्रश्नालाही विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या मांडत अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका, कर प्रणाली एक हवी असा संदेश दिला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ उपक्रमचा मीडिया पार्टनर आहे.
शासकीय अभियांत्रिकी कॉलेज परिसर तीन दिवसांपासून ‘विंग्स’ महोत्सवात रंगला आहे. आज शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी व्यासपीठ गाजवला. तरुणाईचा उत्साह, टाळ्या, शिट्यांचा आवाजाने परिसराला जत्रेचे स्वरूप आले. आजचा दिवस गाजला तो ‘अलाप’ इव्हेंटने. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी अन् इंग्रजी गाणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या बहारदार आवाजाच्या जादूने महोत्सवाला चारचांद लावले. संगीत अन् गीत सोबतीला प्रोत्साहनासाठी शिट्या, टाळ्या अन् वन्स मोअरचा नारा असा धम्माल अनुभवायला मिळाला. अनेक गीतांवर विद्यार्थी आपसूक थिरकले. ‘तेरी दिवानी’, ‘तू थोडी देर’, ‘तुम हो’, ‘रंगरेज मेरे’ यासह ‘प्रीतीत ये ना’ अशा मराठी गीतांनी माहौल संगीतमय झाला. बहारदार गीते सादर करत अभियांत्रिकीचे विद्यार्थी कला क्षेत्रातही कमी नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गायक राजेश सरकटे, प्रमोद सरकटे यांची उपस्थित होते. स्पर्धेनंतर त्यांनीही दोन गीते सादर करत केले.
‘विंग्स’ला डिजीटल लूक देण्यापासून ते इव्हेंट्स पार पडेपर्यंत प्रत्येकाचा सहभाग हा इव्हेंट हिट करून गेला. ज्ञानाची आदान-प्रदानसह धम्माल अन् मस्तीचा उत्सव ठरला.
- स्वराली नांदगावकर
तीन दिवसांमध्ये शहरासह विविध ठिकाणच्या इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले. तांत्रिक ज्ञानासह मनोरंजन करणारे इव्हेंट्सही महत्त्वपूर्ण ठरले.
- अबोली पाटील
​ ‘विंग्स’ महोत्सव यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामाजिक प्रश्नांवर ही प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी तरुणाई जागरुक असल्याचे दाखवून दिले. तरुणाईची समाजाबद्दलची सजगता त्यातून दिसून आली.- तेजस बागुल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांशी चर्चा करूनच तीन दिवसांआड पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा करण्यासंदर्भात सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे संकेत महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. सर्वांना समान पाणीपुरवठा व्हावा, असा प्रशासनाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. त्यानुसार, नागरिकांना दर चौथ्या दिवशी म्हणजे आठवड्यातून एकदाच पाणी मिळणार आहे. यासंदर्भात पत्रकारांनी आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, शहरातील सर्व नागरिकांना समान पाणीपुरवठा व्हावा, असे निवेदन आले आहे. त्यानुसार नियोजन केले जात आहे. शहराची लोकसंख्या, शहरात येणारे पाणी, जलकुंभांची संख्या आदी बाबी लक्षात घेवून तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्याबद्दल पाणीपुरवठा विभाग काम करीत आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर सर्वांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या पाणीपुरवठा विभागासोबत मी चर्चा करत आहे, असे त्यांनी सांगितले.
दुरुस्तीसाठी ३६ तासांच्या मेगा शटडाउन घेतल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. अनेक भागात पाच-सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, शटडाऊन बरोबरच वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळेही पाणीप्रश्न निर्माण होत आहे. भारनियमनाचा फटका पाणीपुरवठा यंत्रणेला बसू नये यासाठी नक्षत्रवाडी, फारोळा व जायकवाडी येथील पंपहाउसवर विशिष्ट यंत्रणा बसवण्यासाठी महापालिकेने महावितरणकडे ५० लाख रुपये भरले आहेत. पण महावितरणने अद्याप काम सुरू केले नाही, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images