Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उस्मानाबादच्या गावांमध्ये भाजपचा शिरकाव

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिरकाव केला असून, जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतींपैकी ३७ ठिकाणी भाजपचा सरपंच निवडून आला आहे. ग्रामीण राजकारणामध्ये भाजपचे अस्तित्व निर्माण होत असून, लोकसभा निवडणुकीची मशागत या निमित्ताने जोमाने सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे निकाल हे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चिंतन करण्यास भाग पाडणारे आहे.
जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतींपैकी ३७ ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपाला जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात एवढे यश मिळाले आहे. बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीने आपला गड राखला आहे. तर त्यापाठोपाठ, तुळजापूर, उमरगा आणि लोहाऱ्यात काँग्रेसने बाजी मारली आहे. तुळजापूर तालुक्यात ४८ पैकी ३२ ठिकाणी काँग्रेसचे सरपंच निवडून आले असल्याचा दावा आमदार मधुकर चव्हाण यांनी केला आहे.
जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यापैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित १६१ ग्रामपंचायतींसाठी सोमवार, १६ रोजी ६७० केंद्रांवर मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायत क्षेत्रातील तीन लाख ३७ हजार ६४० पैकी २ लाख ६० हजार ७७१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७७.२३ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याचे तर मतमोजणीनंतर प्रस्थापितांना हादरा बसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले. यात उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या तेर व ढोकी येथे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर हादरा बसला. दोन्ही ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सदस्यसंख्या सर्वाधिक असली, तरी सरपंच मात्र काँग्रेस आघाडीचे झाले आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात मात्र राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश आले. उमरगा तालुक्यातील २२ पैकी दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या. उर्वरित २० पैकी सर्वाधिक ठिकाणी काँग्रेस आघाडीच्या पॅनलने यश मिळविले. त्यापाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी तर भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले. तुळजापूर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निकालानंतर काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांनी ३३ सरपंच काँग्रेसचे असल्याचा दावा केला आहे, भाजपने १२, शिवसेनेकडून ७ ग्रामपंचायतींवर दावा करण्यात
आला आहे.
कळंब तालुक्यातील २८ पैकी १३ ठिकाण शिवसेना, ९ राष्ट्रवादी, ३ काँग्रेस, २ भाजप तर प्रत्येकी एका जागेवर सर्वपक्षीय व अपक्ष सरपंच निवडून आल्याचा दावा केला जात आहे. वाशी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी ३ काँग्रेस, तर एका ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील १२ पैकी ७ ठिकाणी काँग्रेस यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑफलाइन अर्जांचा पीक विमा संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रचंड गर्दी व डिजिटल सुविधा पुरेशा नसल्याने राज्य शासनाने वाढवलेल्या मुदतीत ऑफलाइन पीक विमा अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही संख्या मराठवाड्यात तब्बल ४१ हजार १७१ एवढी आहे.
पीक विमा ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही नियमित तारीख होती. पण, ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या पुरेशा सुविधान नसल्याने अर्ज दाखल केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या. काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्य सरकारने पीक विमा अर्ज दाखल करण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली. त्याचवेळी शेतकऱ्यांना ऑफलाइन अर्ज दाखल करण्याचीही मुभा दिली होती. मराठवाड्यातील सीएससी केंद्रांवर तब्बल ४१ हजार ऑफलाइन अर्ज भरून घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. पण, या ऑफलाइन अर्जाबद्दल केंद्र सरकारने कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विम्याचा पर्याय शोधला आहे. गेल्यावर्षी एक एक जिल्ह्यात विम्यापोटी कोट्यवधी रुपये मिळाल्याने त्याबद्दल जागरूकता निर्माण झाली. यंदा खरिपाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाला, मात्र त्यानंतर मोठ्या खंड पडल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती. ३१ जुलै या मुदतीपर्यंत विभागातील शेतकऱ्यांनी ५३ लाख ७९ हजार २७२ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज दाखल केले. अनेक शेतकऱ्यांना अर्ज दाखल करणे शक्य न झाल्यामुळे शासनाने विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. यानंतर ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, या दरम्यान मराठवाड्यातून तब्बल ४१ हजार १७१ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांचे पुढे काय असा प्रश्न कायम आहे. त्यामुळे विभागातील ४१ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याचा धोका वाढला आहे.
पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी, महसूल तसेच जिल्हा परिषद यंत्रणेने एकत्रित काम करणे गरजेचे होते. पण, ऑफलाइन अर्जांची जबाबदारी घेणार कोण अशी स्थिती आहे. महसूल यंत्रणा तसेच ग्रामसेवक ग्रामपंचायत निवडणुकीत गुंग, तर कृषी विभागानेही या अर्जांबद्दल कोणतीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ४१ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा संकटात सापडला आहे.

जिल्हानिहाय स्थिती
औरंगाबाद ८५८४
जालना ४९२७
बीड १२९११
लातूर २४९३
उस्मानाबाद १७०३
नांदेड ३६५३
हिंगोली २०६५
परभणी ४८३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉक्टरां’च्या तेरमध्ये राष्ट्रवादीचा पराभव

$
0
0



उस्मानाबाद ः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या तेर गावातच पक्षाला जबर हादरा बसला. सर्वाधिक जागा जिंकूनही सरपंचपद मात्र सर्वपक्षीय आघाडीने पटकावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी या गावात ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील, स्नुषा जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील, नातू मल्हार पाटील या सर्वांच्या प्रचारयंत्रणेला भेदून सर्वपक्षीय पॅनलचा महादेव खटावकर हा तरुण विजयी झाला आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून तेर, ढोकी या गावांकडे पाहिले जाते. मतदारसंघाच्या फेररचनेत ही दोन्ही गावे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला आणि या मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकर चव्हाण यांच्याकडे आले. या दोन्ही गावात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. ढोकी येथे काँग्रेसचा सरपंच निवडून आला. तर तेर येथील महादेव खटावकर हे सर्वपक्षीय पॅनलचे प्रतिनिधी म्हणून विजयी झाले असले, तरी ते मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांची तेर ग्रामपंचायतवर कायम सत्ता राहिली आहे. १९७४ नंतर पहिल्यांदा पाटील गटाला ग्रामपंचायतमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकुण १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक १५ सदस्य विजयी झाले. तर विरोधी पॅनलमधील केवळ दोन सदस्यांना विजयश्री प्राप्त झाली आहे. सर्वाधिक सदस्य निवडून आले. मात्र गाव कारभार हाकणारे सरपंचपद राष्ट्रवादीला राखता आले नाही. गावाशी फारसा संपर्क नसलेल्या पद्माकर फंड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे हा पराभव झाला असल्याचे आता बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी वसतिगृहात दारू पिऊन तोडफोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वसतिगृहात राहणारे विद्यार्थी व त्यांच्या मित्रांनी दारू पिऊन शासकीय वसतिगृहात तोडफोड केली. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता सिडको एन आठ येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गृहपाल नितीन यशवंत मोरे (वय ३५, रा. एन आठ) ‌यांनी पोलिस तक्रार दिली आहे. त्यानुसार, वसतिगृहात परमेश्वर रामचंद्र बावधने व अनुप गुलाबराव वाकोडे हे तरूण राहतात. या दोघांकडे सोमवारी रात्री बारा वाजता त्यांचा मित्र संतोष गंगाराम साबळे आला. या तिघांनी वसतिगृहात दारू पिली, त्यानंतर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली. शिवाय खिडकीचे ग्रील वाकवले. यामध्ये अंदाजे २० हजार रुपयांचे नुकासान झाले आहे. तसेच संशयित आरोपी साबळे याने मोरे यांना तुला पाहून घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी तिघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या संपामुळे अजिंठाच्या पर्यटकांचे हाल

$
0
0

सोयगाव/ फर्दापूरः
राज्य परिवहन महामंडळाचा राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने तयारी केली नसल्याने पर्यटकांचे मोठे हाल झाले. बस बंद असल्याने पर्यटकांना बैलगाडीतून व पायी प्रवास करून लेणीला जावे लागले. अनेक पर्यटक लेणी न पाहताच परत गेले.
अजिंठा लेणीत परिसरात खाजगी वाहनांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे फर्दापूर टी पॉइंट येथून महमंडळाच्या प्रदूषणमुक्त बसमधून प्रवास करावा लागतो. बसचा संप असल्याने मंगळवारी फर्दापूर येथे पोहोचलेल्या प्रवाशांची अडचण झाली. काही पर्यटकांनी पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांचे कार्यालय गाठून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यवस्थापक सुट्टीवर गेले होते. त्यांनी मोबाइलही बंद ठेवला असल्याने पर्यटकांनी संताप व्यक्त केला.
फर्दापूर येथील काही स्थानिक नागरिकांनी बैलगाडीमधून शंभर ते दोनशे रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे पर्यटकांची वाहतूक केली. स्वतंत्र बैलगाडी हवी असेल तर हजार रुपये आकारण्यात आले. त्यामुळे काही पर्यटकांनी बैलगाडीतून, तर काही पर्यटकांनी पायीच अजिंठा लेणी गाठली. दिवाळीच्या सुट्ट्या व मंगळवारी वेरूळ लेणी बंद असल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक आले होते.

दुपारनंतर बस सेवा

पर्यटकांचा रोष लक्षात घेऊन सोयगावचे नायब तहसीलदार पी. टी. जाधव, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड, उपनिरीक्षक निलेश घोरपडे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर खासगी चालकांना नियुक्त करून त्यांच्यामार्फत सोयगाव आगाराने दुपारी पावणे दोन वाजता बस सेवा सुरू करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी ऑडिटमध्ये बीड, लातूर जिल्हे मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा पहिला टप्पा देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली असताना अद्यापही मराठवाड्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांची ऑडीटची यादीच तयार झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता धुसर आहे. ऑडिट प्रमाणीकरणामध्ये बीड आणि लातूर जिल्ह्यांची पिछाडी आहे, तर परभणी आणि हिंगोली जिल्हे अव्वल आहेत.
पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, त्यांनी सन्मानाने जगावे, यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली. मात्र या योजनेत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कर्जमाफीचे निकष ठरवतानाही सरकारचा गोंधळ उडाला. कर्जमाफीच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यापासून समितीची छानणी आणि आता सहकार खात्यामार्फत कर्जमाफी देण्यासाठी ऑडिट करणे आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांची संख्या निश्चित करणे, त्यांचे ऑडिट करणे आदी काम सुरू आहे. मात्र या कामामध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यात काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दिवाळीपूर्वी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कशी, असा प्रश्न आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यात २५.०३ टक्के, तर बीड जिल्ह्यात हे प्रमाण केवळ ४७.८६ टक्के आहे. संपूर्ण लातूर विभागाचे हे प्रमाण केवळ ५४.८३ टक्के आहे.
औरंगाबाद विभागात मात्र ऑडिट केल्याचे प्रमाण ९८.३७ टक्के झाले आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शंभर टक्के ऑडिट झाल्याची नोंद सरकार दप्तरी आहे.
ऑडिटरकडून शंभर टक्के प्रमाणीकरण झाल्यानंतरच कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. विभागात परभणी आणि हिंगोली जिल्हा वगळता अन्य कुठल्याही जिल्ह्यांत कर्जप्रकरणाचे शंभर टक्के प्रमाणीकरण झाले नाही. त्यामुळे कर्जमाफीचा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कसा लाभ होणार असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएसएनएलचे जिल्ह्यात २०३ नवीन टॉवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खासगी मोबाइल कंपन्यांसोबत स्पर्धा करणे व ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बीएसएनलने मोबाइल नेटवर्क अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जिल्ह्यात थ्री जीचे १५८ व टु जीचे ४५ असे एकूण २०३ नवीन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामुळे नेटवर्क विस्तारासोबतच डेटा स्पीड वाढेल, अशी माहिती बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद वडनेकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
बीएसएनएलच्या स्थापनेला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलने २०१६-१७ या आर्थिक वर्षात ११८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला, तर औरंगाबाद कार्यालयाअंतर्गत एक कोटी आठ लाख रुपयांचा नफा झाल्याचे वडनेकर यांनी सांगितले. सद्यस्थितीत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. या परिस्थितीतही ग्राहकांच्या विश्वासामुळे बीएसएनएलच्या व्यापार हिश्शात वाढ झाली आहे, असा दावा वडनेरकर यांनी केला. या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील ३२ हजार ५०० नवीन ग्राहक जोडले गेले व एकूण ग्राहकांची संख्या सव्वा तीन लाखांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या जिल्ह्यात टु जीचे २६० व थ्री जीचे १३० मोबाइल टॉवर्स आहेत. जानेवारी २०१८पर्यंत जिल्ह्यात आणखी २०३ व राज्यात दीड हजार टॉवर उभारण्यात येणार आहेत. सर्व टॉवर्स आयपी मिडियावर १०० एमबीपीएसपेक्षा जास्त बॅडविड्थने जोडले जाणार आहेत. भविष्यात याच टॉवरच्या माध्यमातून फोर जी आणि फाइव्ह जी सुविधा पुरविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे अधिकारी एस. बी. शेवगावकर, आय. झेड. गायकवाड, आर. के. तुपे, बी. जी. ठाकुर, ए. एम. सय्यद, एन. बी. कुलकर्णी उपस्थित होते.

आकर्षक योजना

४२९ रुपयांच्या रिचार्जवर तीन महिने अमर्यादित कॉल्स व दररोज एक जीबी डेटा अशी योजना बीएसएनएलने आणली आहे. केबल टीव्ही ऑपरेटरशी सेवा पुरविण्याचा करार करून केबल टीव्हीसह ग्राहकांच्या घरांपर्यंत ऑप्टिक फायबर केबल्सवर हायस्पीड ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात येत आहे. सद्यस्थितीत खुलताबादेत ए. जी. केबल व वाळूज परिसरात यशोदीप केबलच्या सहकार्याने ही सुविधा ग्राहकांना देण्यात येत आहे. मेसर्स टिकोना आणि मेसर्स बी ४ एस यांच्याशी करार करून जिल्ह्यात वायरलेस ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायंतीत ऑप्टिक फायबर जाळे

भारत सरकारच्या नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्कच्या पहिल्या टप्प्यात बीएसएनएलने जिल्ह्यात ३६३ ग्रामपंचायंतीमध्ये जोडणी करण्यात येत आहे. फुलंब्रीतील ७३, सोयगाव ४६, गंगापूर १०८, सिल्लोड ९७, खुल्ताबादेतील ३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ३६३ पैकी १८१ ग्रामपंचायतींना अतिशय उच्चगतीची ब्रॉडबँड सेवा पुरविण्यात आली आहे. उर्वरित जोडणीचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागामध्ये संचार क्रांती घडवून आणण्यासाठी गावांमध्ये ८०० किमीपेक्षा जास्त ऑप्टिक फायबर केबल्स टाकण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाने पळवले वृद्ध महिलेचे ५० हजार

$
0
0

बँकेतून पैसे काढून रिक्षाने घरी परतणाऱ्या महिलेचे ५० हजार रुपये रिक्षाचालकाने लंपास केले. हा प्रकार सोमवारी दुपारी एक वाजता ईटखेडा भागातील मोकळ्या मैदानात घडला. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यमुनाबाई हिराजी नरवडे (वय ६५ रा. प्रतिज्ञानगर, ईटखेडा) या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी सोमवारी रेल्वे स्टेशनजवळील बँक ऑफ हैदराबादमधून ५० हजार रुपये काढले. ही रक्कम व पासबुक त्यांनी एका पिशवीत ठेवले. त्यानंतर बँकेबाहेर उभ्या असलेल्या एका रिक्षात बसून त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. महानुभाव आश्रम चौकात रिक्षा आल्यानंतर पेट्रोल भरतो, असे सांगत रिक्षाचालकाने जवळच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले. यानंतर त्यांना ईटखेडा येथील मोकळ्या मैदानात रिक्षा आणली. नरवडे यांचे घर आल्यानंतर त्या खाली उतरल्या. रिक्षाचे भाडे देऊन त्या घराकडे जात असताना रिक्षाचालकाने हातचलाखीने त्यांची रक्कम व पासबुक असलेली पिशवी लंपास करीत रिक्षात बसून निघून घेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नरवडे यांनी पोलिस ठाणे गाठून रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जमादार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीच्या आनंदावर संपामुळे विरजण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी महामंडळातील कामगारांच्या संपामुळे एसटी बसची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. या संपाचा ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका बसला आहे. बस स्थानकातून एकही बस सुटली नसल्याने हजारो प्रवाशांना प्रवास रद्द करावा लागला, तर शेकडो प्रवाशांनी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजून खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला.
एसटी कामगारांच्या संपाचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसला. एसटी महामंडळाकडून सवलत मिळत असल्याने वृद्ध एसटी बसप्रवासाला प्राधान्य देतात. अनेक वृद्ध मंडळी बस स्थानकावर आले होते. पण, बस बंद असल्याने त्यांना येथेच अडकून पडावे लागले. बस बंद असल्याने दिवाळीकरिता घरी कसे जावे, असा प्रश्न अनेक प्रवाशांना बसला. खासगी बस, काळी पिवळी व इतर वाहनांतून प्रवासाकरिता अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात आले.
औरंगाबाद ते शिरूरचे भाडे ३०० रुपये, औरंगाबाद-पुणे कारप्रवासासाठी ६०० रुपये मोजावे लागले. एका दिवसांच्या आंदोलनामुळे औरंगाबाद विभागात एक लाख ९० हजार किलोमिटर रद्द करण्यात आले. यामुळे एसटीला ७० ते ८० लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.
एसटी कामगारांनी मंगळवारी सकाळपासून मध्यवर्ती बस स्‍थानकातील आउट प्रवेशद्वारावर आंदोलन करून वाट अडवून ठेवली. एसटी महामंडळ प्रशासनाविरुद्ध कामगारांनी जोरदार घोषणा दिल्या. ‘शिवशाही वालों होश में आओ... होश मे आओ,’ ‘देत कसं नाही, द्यालाच पाहिजे,’ या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलनातील सहभागी महिला कर्मचाऱ्यांनी रस्‍त्यावर ठाण मांडून भाज्या चिरत एसटी प्रशासनाचा धिक्कार केला. मागण्या मान्य करत नसल्याने त्यांनी महिला कर्मचाऱ्यांनी सिडको बस स्‍थानकात प्रतिकात्मकरित्या परिवहन मंत्र्यांना बांगड्यांचा आहेर दिला. संपात सामील झालेल्या परगावच्या कर्मचाऱ्यांसाठी बसस्‍थानकावरच स्वयंपाक करण्यात आला. एसटी महामंडळाचे येथील १९०० कर्मचारी गैरहजर होते. त्यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा गैरहजर कामगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही शेवटची संधी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कामगारांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी केले आहे.

खासगी बसला पिटाळले

मध्यवर्ती बस स्‍थानकावर आरटीओ विभागाच्या मदतीने सहा खासगी स्कूल बसमधून प्रवासी वाहतूक करण्यात येणार होती. पण, बस स्थानकावर खासगी बस येण्यास कामगारांनी आक्षेप घेतला. कामगारांना आरटीओंनी समजविण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याने क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना सुनावले. खासगी बसवर बस स्थानकात दगडफेक झाली, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर खासगी बस स्‍थानकाबाहेर काढण्यात आल्या. पण, आरटीओ अधिकाऱ्यांनी शहरात चार ठिकाणी थांबून प्रवाशांना खासगी वाहनांत बसवून दिले. रिक्षाचालकांना जादा दर आकारून जालना, खुलताबाद, फुलंब्री, पैठण, गंगापूर आदी ठिकाणी प्रवासी वाहतूक केली. शिवनेरीच्या प्रवाशांनी बस बंद असल्याने महामंडळाच्या वरिष्ठांशी भेटून संताप व्यक्त केला. त्यांनी नाईलाजाने खासगी वाहनांतून प्रवास केला.

संगमनेरहून आलो असून पुसदला जायचे आहे. खासगी बसने औरंगाबादला येण्यासाठी ३०० रुपये खर्च केले. दिवाळीसाठी ठेवलेले पैसे प्रवासावरच खर्च करावे लागत आहेत.
-ओमकार राठोड

कंपनीला सुट्या लागल्याने दिवाळीसाठी लातूरला जायचे आहे. पण, एसटी बस बंद असल्याने अडचण झाली आहे. आता लातूरला जाण्यासाठी खासगी वाहनातून अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे गावी जाणे रद्द करत आहे.
-शिवाजी लकडे

माझ्या गावला खासगी वाहने जात नाहीत. आम्हाला बीडची बस सोयीची होती. आता जादा खर्च करून अंबड व त्यानंतर पुढे १५ किलोमिटर प्रवास करावा लागेल. यात खर्च जास्त होणार आहे.
-अन्सार खान रहीम खान

संपाचा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे. पण, आम्हाला एसटीचा प्रवास सुरक्षित वाटतो. त्यांच्या मागण्या मान्य करून बस सेवा सुरळीत करावी.
-रघुनाथ कर्डिले

मी मुलांसोबत पाचोडला जाण्यासाठी आलो आहे. पण, संपामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडत आहे. मुलांना गावी सोडयचे होतं. एसटी बंद असल्याने खासगी वाहनातून प्रवास करावा लागणार आहे.
-विठ्ठल आहेर

माळस पिंपळगावला जाण्यासाठी आलो होतो. पण येथे आल्यानंतर संप असल्याची माहिती ‌मिळाली. माझ्या सोबत दोन महिला असून पुढचा प्रवास कसा करावा, हा प्रश्न आहे. दिवाळीत पाहुण्यांच्या घरी राहता येत नाही.
-सचिन वाघमारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामांकित कंपनीच्या बनावट जीन्सची विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लेव्हिस स्ट्रेस या नामांकित जीन्स कंपनीचा बनावट माल विकणाऱ्या दुकानदाराविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कारवाई सोमवारी सायंकाळी रोशन गेट भागात करण्यात आली. संशयित आरोपीच्या ताब्यातून सव्वाचार लाख रुपयांचा बनावट पँटचा साठा जप्त करण्यात आला आहे.
‌या प्रकरणी, दिपेश जितेंद्र गुप्ता (वय २४, रा. बोरवली पश्चिम, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गुप्ता हे नेत्रिका कन्सल्टिंग इन इन्व्हिस्टिगेशन कंपनीचे फिल्ड ऑफिसर असून त्यांना रोशन गेट भागातील एका दुकानात लेव्हिस स्ट्रेट या कंपनीच्या बनावट जीन्स विकल्या जात आहेत, अशी माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी जिन्सी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुप्ता यांच्यासह दुकानावर छापा टाकला असता शेख खालेद शेख अजीज (वय ३३, रा. भडकलगेट) हा दुकानदार बनावट जीन्स विकत असताना आढळला. पोलिसांनी ४५० बनावट जीन्स जप्त केल्या आहेत. गुप्ता यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख खालेद याच्याविरुद्ध कॉपीराइट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार अयुब पठाण हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या उत्साहावर विरजण

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद
ऐन दिवाळीच्या ‘मुहूर्त’ साधत एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचे परिणाम मराठवाड्याच्या सर्वच भागांमध्ये दिसून आले. एसटी कर्मचाऱ्यांचा या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, सर्वच बस स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत होता. मात्र, या संपामुळे सामान्य प्रवाशांचे बेसुमार हाल झाले. दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आणि अनेक जणांना अव्वाच्या सव्वा भाडे देत खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागला.
सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली आहे. राज्य सरकारबरोबरील चर्चा फिसकटल्यानंतर सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी संपाला सुरुवात झाली. बसस्थानकांमधून एकही एसटी बाहेर पडू न शकल्यामुळे रात्रीपासून अनेक प्रवासी बस स्थानकांच्या परिसरामध्ये अडकून
पडले होते.

जालन्यात १०० टक्के प्रतिसाद
जालना : जालना जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे, दररोज जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये सेवा देणारी एसटीची चाके थांबली होती.
या संपामुळे जालना, परतूर, अंबड, भोकरदन, जाफ्रराबाद, घनसावंगी, मंठा या प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी बस स्थानकावर शुकशुकाट पसरलेला आहे. जिल्ह्यामध्ये २७७ बसच्या माध्यमातून एसटीची सेवा असते.
यात एकूण ४५३ चालक, ४७८ वाहक, १९४ यांत्रिकी आणि १८८ प्रशासकीय असे एकूण १३१३ एसटी कर्मचारी आहेत. या सर्वच कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतला. या एसटीतून दररोज ७५ हजार किलोमीटरचा प्रवास होतो, तर प्रतिदिन १७ लाख रुपयांचा महसूल मिळत असतो, असे एसटी महामंडळाच्या
सुत्रांनी सांगितले.

खासगी वाहनांची ‘वसुली’
बीड : दिवाळीचा मुहूर्त साधून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा खाजगी वाहन चालक घेत असून, अडचणीतील प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल केले जात आहे.
या संपाला मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातील एकाही बसस्थानकातून एकही बस बाहेर पडली नाही. अनेक जणांना या संपाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकावर शेकडोंच्या संख्येने प्रवाशी अडकून पडले आहेत. या संपामुळे बसस्थानाकावर एकही बस उभी नसल्याने बसस्थानके सुनसान झाली आहेत, तर आगार मात्र हाउसफुल झाली आहेत. दरम्यान, संपामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा लाभ खासगी व्यावसायिक वाहतूकधारक घेत आहेत . एरवीच्या तिकिटाच्या दुप्पट तर काही वेळेस तिप्पट, चौपट तिकीट आकारले जात आहे. मात्र पैसे मोजून खासगी बसमध्ये उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर
आली आहे.

खासगी वाहनांत लटकून प्रवास
परभणी : एसटीच्या संपामुळे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. परभणीच्या बसस्थानकासह तालुका आणि ग्रामीण भागातील स्टँडवर आलेल्या प्रवाशांना खासगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागला. परिणामी, खासगी वाहतुकदार गाड्यांमध्ये अक्षरश: कोंबाकोंबी करून प्रवाशी भरल्याने हा प्रवास त्यांच्या जीवावर बेतला होता.
विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या अंतर्गत परभणी आगारासह पाथरी, जिंतूर, गंगाखेड आगारांतर्गत येणाऱ्या नऊ तालुक्यांतील स्थानकांमध्ये सर्व बस थांबून होत्या. यामध्ये सेलू बसस्थानकात एकूण १३७ फेऱ्या रद्द झाल्या. तर इतर तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात तेवढ्याच बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. यात सुमारे १२०० ते १३०० बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, सणासाठी गावाकडे येणारे विद्यार्थी, महिलावर्गाला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे, सर्व बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून आली. दुपारनंतर संप मिटेल आणि बस येईल, अशी अपेक्षा ठेवून अनेक प्रवाशी सायंकाळपर्यंत बसस्थानकात ठाण मांडून होते. गडबडीच्या प्रवाशांनी खासगी वाहतुकदारांचा सहारा घेतला. परभणी शहरातून जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत महामार्गावर धावणाऱ्या जीप, टमटम आणि छोट्या ट्रॅव्हल्समधून प्रवाशांची अक्षरश: कोंबाकोंबी झाली. अनेक प्रवाशांनी लटकून प्रवास केल्याचे चित्र दिसून आले. एकूणच एसटीच्या संपामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला.

ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल
लातूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना अतिशय हाल सहन करावे लागले. या संपाची माहिती नसल्यामुळे जवळच्या गावी नोकरी करणाऱ्या नोकरदारांचे अतिशय
हाल झाले. मध्यरात्री संपाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागात पहिल्या एसटीने गावा-गावात जाणाऱ्या वर्तमानपत्राच्या पार्सलचे गठ्ठेही पडून राहिले. त्यामुळे आज अनेक गावात शहरातून जाणारे वर्तमानपत्राचे अंक पोहोचू शकले नाहीत. पुुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी जाणाऱ्या खासगी बसेसचे दर अगोदरच दिवाळी म्हणून वाढले होते. त्यांच्याकडून संपाचा फायदा घेत, प्रवासीभाडे वाढविले होते. जिल्ह्यामध्ये पूर्वी १८ सीटर लहान गाड्या चालत असत. त्या गाड्याही आता बंद झाल्यामुळे तालुका ते जिल्हा ठिकाण अशी वाहतूक ठप्प झाली आहे. काळ्या-पिवळ्या जीपचालकांनी मात्र नेहमीप्रमाणे भाडे घेण्याचा प्रकार दुपारपर्यंत सुरू होता. खासगी वाहनधारकांकडून लातूर-पुणे भाडे १२०० ते १५००, लातूर-मुंबई भाडे १५००-१८०० आणि औरंगाबादसाठी चारशे ते पाचशे रुपये भाडे आकारले जात आहे. नियोजनपूर्वक प्रवास करणाऱ्यांपेक्षा ऐनवेळी सुट्टी मिळाली, प्रवासाला जाण्याचे निश्चित झाले, अशा प्रवाशांचे अधिक हाल होत आहेत, याकडे बसमालक लक्ष वेधत आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये प्रवासी त्रस्त
नांदेड : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांनाही बसला. या संपामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील एसटी वाहतूक थंडावली असून, सकाळपासून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
दिवाळीमुळे अनेक जणांनी गावाकडे जाण्याचे नियोजन केले होते. त्यातील अनेकांना संपाची माहितीच नव्हती. त्यामुळे, मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांमधील गोंधळ दिसून येत होता. बहुतेक स्थानकांवरून एकही गाडी बाहेर जात नव्हती. खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली असली, तरीही त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करण्यात येत होते. त्यामुळे, अनेक प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागला.

उस्मानाबादमध्ये भाविकांनाही फटका
उस्मानाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला. त्याचबरोबर तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचेही या संपामुळे हाल झाले.
या संपात उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यातील एकाही डेपोतून एकही बस रस्त्यावर धावली नाही. या संपाचा फटका तुळजापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील बसला. या संपाचा नेमका फायदा खासगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांना झाला. शिवाय प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी चढे दर करून प्रवाशांना लुटले. एस टी कर्मचाऱ्यांनी हा संप अवेळी केला असून, यामुळे त्यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.
प्रवाशाना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही हालचाल केल्याचे दिसून आले नाही. पोलिस विभागांनी मात्र बस स्टँडवर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. जिल्ह्यातील उस्मानाबादसह तुळजापूर, कळंब, उमरगा, भूम, परांडा या प्रमुख बस स्टँडमधून मंगळवारी एकही बस धावली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिव्हइन रिलेशनशिपमधून पीएसआयचा गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लिव्हइन रिलेशिनशिपमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर मॅनेजर महिलेवर प्रियकराने गोळीबार केल्याची घटना हडको एन अकरा यादवनगर भागात घडली. आरोपी किरण पवार हर्सूल जेलमध्ये पीएसआय पदावर कार्यरत असून त्याला अटक करण्यात आली आहे.

वाळूज भागातील एका शोरूमध्ये कामाला असलेली महिला सिडको बजरंग चौकात पती, मुलगी व मुलासह वास्तव्यास होती. ती २००८मध्ये हर्सूल कारागृहात एका आरोपीला भेटण्यासाठी गेली असता तिची किरण संतोष पवार या पीएसआयसोबत ओळख झाली. यानंतर दोघांची मैत्री वाढली. जानेवारी २०१२मध्ये ही महिला पतीला न सांगता किरणकडे रहायला गेली. यादवनगर भागात एक घर किरायाने घेऊन दोघे सोबत राहत होते. दरम्यान या महिलेने पवारला अनेक वेळा कुटुंबाकडे जाऊ देण्याची मागणी केली, मात्र त्याने तिला वारंवार धमकावत नकार दिला. या महिलेने तिच्या बावीस वर्षांच्या मुलीसोबत याबाबत चर्चा करत म‌ाहिती दिली. तिची मुलगी देखील म्हैसूर येथील एका कंपनीत इंजिनिअर आहे. सध्या ही मुलगी औरंगाबादला आली आहे. रविवारी सकाळी यादवनगर येथील घराच्या बेडरूममध्ये या महिलेची, मुलीची व पवार याची याबाबत चर्चा सुरू होती. महिलेने पुन्हा घरी जाऊ देण्याची मागणी केली. यावेळी पवारने खासगी रिव्हॉल्वर महिलेवर रोखून गोळी झाडत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही महिला खाली वाकल्यामुळे बचावली व गोळी बाथरूमच्या भिंतीला लागली. यावेळी पवारने माझ्याविरुध्द पोलिस केस केली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. सोमवारी रात्रीही पवारने या महिलेच्या बजरंग चौक येथील पतीच्या घरी गोंधळ घातला. पती व दोन्ही मुलांना ठार मारण्याची धमकी देत खिडकीच्या काचा फोडल्या. मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या महिलेने सिडको पोलिस ठाणे गाठून पवारविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यादवनगर गाठून पवारला बेड्या ठोकल्या. मंगळवारी त्याला कोर्टात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश देत नियमित जामीन फेटाळला.

गँगस्टर अबू सालेमची धरली होती गचांडी
२००४मध्ये पीएसआय पवार मुंबईतील कारागृहात कार्यरत होता. या ठिकाणी कुख्यात गँगस्टर अबू सालेम हा शिक्षा भोगत होता. कपडे इस्त्री करण्याच्या वादातून अबू सालेमसोबत पवारचा वाद झाला. या वादातून त्याने थेट सालेमचा गळा पकडत शिवीगाळ केली होती. सालेमने वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याकडे याची तक्रार केली. या तक्रारीनंतर पवारला काही काळासाठी निलंबित केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८० जणांना गंडा; ठकसेनाला बेड्या

$
0
0


म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महा ई सेंटर ही बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे आधारकार्ड, विविध सुविधा देण्याचे आमिष दाखवत देशभरातील ८० जणांना गंडा घालणाऱ्या ठकसेनाला ग्रामीण पोलिसांनी नागपूरमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. शेखर पोद्दार असे या ठकसेनाचे नाव आहे.

रमेश गणेश कुलकर्णी (रा. बाभुळगाव खुर्द, ता. फुलंब्री) यांनी याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १० जुलै रोजी कुलकर्णी यांना एक एसएमएस आला होता. यामध्ये आधार कार्ड पोर्टल, बस, रेल्वे, विमान, ई तिकीट आदी सुविधा देण्याचे नमूद करीत संपर्क क्रमांक व महा ई सेंटर या वेबसाइटचा पत्ता देण्यात आला होता. कुलकर्णी यांनी या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने पंधरा हजार शंभर रुपये ऑनलाइन भरण्याबाबत कळवले. कुलकर्णी यांनी ही रक्कम भरली, मात्र त्यांना कोणतीही पावती दिली नाही. यानंतर त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी स‌ुविधा देण्याबाबत टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने कुलकर्णी यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सायबर सेलने या प्रकरणी एक महिना परिश्रम घेत नागपूर येथून शेखर ओमप्रकाश पोद्दार (रा. जरीपटका, नागपूर) याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अशोक आम्ले, पीएसआय सय्यद मोसीन, प्रमोद भिवसने, दत्ता तरटे, रवींद्र लोखंडे, प्रेम म्हस्के आदींनी केली.

आरोपी आठवी पास
आरोपीने महाराष्ट्रातल्या २६ जणांसह उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, पंजाब, ओडिसा, आंध्रप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आदी राज्यातील नागरिकांची फसवणूक केली आहे. आरोपी शेखर केवळ आठवी पास असून त्याची देखील अशा पद्धतीने फसवणूक झाल्याने त्याने हे कृत्य सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत पाण्याअभावी शवविच्छेदन ताटकळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील गोरगरिबांचा आधारस्तंभ असलेल्या घाटीमध्ये पाण्याअभावी सोमवारी (१६ ऑक्टोबर) झालेल्या अपघातातील मृताच्या शवविच्छेदनास तासन् तास उशीर झाल्याचे मंगळवारी उघड झाले. शेवटी ताटकळलेल्या नातेवाईकांनी खासगी टँकर मागवल्यानंतर एकदाचे शवविच्छेदन सुरू झाले. तोपर्यंत ही बाब प्रशासनाच्याही लक्षात आली नाही.

डॉक्टर-अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वय अभावाचा गंभीर फटका नातेवाईकांना बसल्याचे स्पष्ट आले. दुसरीकडे, घाटीला गरजेच्या केवळ ६० टक्के इतकेच पाणी पालिकेकडून मिळत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळेच घाटीला दररोज खासगी टँकरवर खर्च करण्याची वेळ येत आहे. शहरामध्ये सोमवारी झालेल्या दुर्दैवी अपघातातील मृतावर घाटीमध्ये सकाळी सहाला शवविच्छेदन सुरू होणार होते. मात्र शवविच्छेदनगृहाच्या टाक्यांमध्ये पाणी नसल्यामुळे ही अवनिवार्य वैद्यकीय प्रक्रिया सुरूच होऊ शकली नाही. पाण्याची प्रतीक्षा करीत दहा-साडेदहा वाजले; परंतु त्यानंतरही ना पाण्याची सोय झाली ना ‘मॉर्च्युरी’च्या टाक्यांमध्ये पाणी आले. त्यामुळे ताटकळलेल्या नातेवाईकांचा संयम संपला आणि लवकर पोस्ट मार्टेम व्हावे म्हणून नातेवाईकांनीच खासगी टँकर मागवले. मात्र त्यासाठीही बारा वाजले आणि त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली. धक्कादायक बाब म्हणजे ‘मॉर्च्युरी’मध्ये एवढे सगळे घडत असताना संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला काहीच कळविले नाही, असेही समोर येत आहे. जेव्हा ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली त्यानंतर हालचाल सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.

रोज टँकरवर पाच हजारांचा खर्च?
मागच्या काही महिन्यांपासून घाटीला गरजेच्या ६० टक्के इतकाच पाणीपुरवठा होत असल्यामुळे दररोज तीन हजार ते पाच हजार रुपये खासगी टँकरवर खर्च करावे लागत आहेत. सद्यस्थितीत रोज पाच ते सहा टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळेच परिसरातील दोन विहिरी व एका बोअरचे पाणी वापरण्याचा विचार सुरू असून, त्या संदर्भात लवकरच प्रस्ताव तयार केला जात आहे, असेही डॉ. सोनवणे म्हणाले. त्याचवेळी घाटीच्या टाक्यांमधून पूर्वीपासून लगतच्या वस्त्यांमध्येही पाणी पुरवठा होतो. मात्र आता पाणी पुरवठा कमी झाल्यामुळे त्याचा फटका रुग्णालयाला बसत असल्याचेही त्यांनी ‘मटा’ला सांगितले.

‘मॉर्च्युरी’च्या टाक्यांमध्ये पाणी नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने फार उशिरा कळविले. ते जर सकाळीच सांगितले असते तर तातडीने खासगी ठँकर मागवता आले असते आणि वेळेत शवविच्छेदन सुरू झाले असते. – डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

‘मॉर्च्युरी’मध्ये सोमवारी रात्री दहापर्यंत शवविच्छेदन चालले. त्यावेळी मी स्वतः घाटीत होतो व त्यावेळी पाण्याचा कोणताही प्रश्न नव्हता. सकाळी पाणी नव्हते, तर तसे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कळविले नाही. नातेवाईकांनी टँकर मागवला हे खरे असेल तर त्यांना टँकर मागवण्यास कुणी सांगितले, हाही प्रश्न आहे. मलादेखील ही बाब संध्याकाळी कळाली. या प्रकरणी चौकशी केली जाईल. – डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चीनच्या कंपनीची डेपोवर नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेला चिंता शहरात रोज गोळा होणाऱ्या कचऱ्याची असताना चीनच्या कंपनीची ‘नजर’ मात्र मांडकी (नारेगाव) येथील कचरा डेपोवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील कचरा नष्ट करण्यासाठी यंत्रसामुग्री उभारण्याची तयारी या कंपनीने दाखवली, परंतु रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्याबद्दल असमर्थता व्यक्त केली.

कचरा डेपोवर कचरा आणू नका, अशी मागणी करीत मांडकीसह सुमारे वीस गावांच्या गावकऱ्यांची तीन दिवस आंदोलन केले. गावकऱ्यांचे आंदोलन संपले आणि पालिकेच्या प्रशासनाने चीनच्या बॉस्को इनव्हारमेंटल प्रोटेक्शन टेक्नॉलॉजिकल कंपनीला पाचारण केले. कंपनीच्या प्रतिनिधींनी सोमवारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह कचरा डेपोची पाहणी केली. तेथे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबद्दल चर्चा केली आणि त्या बद्दलचे सादरीकरण मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात केले. यावेळी महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता गजानन मनगटे, नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात, गोकळसिंह मलके, आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी, सिकंदर अली, हेमंत कोल्हे, भालचंद्र पैठणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण करताना कचरा डेपोवरच लक्ष केंद्रीत केले. कचरा डेपोवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार वर्ष लागतील. तीस टनाचा प्लांट तेथे उभारावा लागेल. त्यासाठी पाचशे रुपये प्रतिटन, प्रती दिवस खर्च येईल. महापालिकेने तयारी दाखवल्यास १५० दिवसांत प्रकल्प उभा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठीची जागा, त्यावरचे बांधकाम, वीज पुरवठा, रस्ते, पाणी आदी व्यवस्था महापालिकेला करून द्यावी लागेल. सहाशे लिटर प्रतितास या प्रमाणे प्रकल्पाला पाणी लागेल असेही सादरीकरणातून स्पष्ट करण्यात आले.

नगरसेवक राजू शिंदे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेल्या सादरीकरणानंतर शहरात रोज गोळा होणाऱ्या कचऱ्या बद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांचा कचरा डेपोवर नव्याने कचरा आणून टाकण्यास विरोध आहे. त्यामुळे रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यावर लगेचच प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी या कंपनीची तयारी आहे का ? महापौर भगवान घडमोडे यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला. यावर आयुक्तांनी कंपनीच्या प्रतिनिधींना वॉर्डा वॉर्डात छोटे छोटे प्रक्रिया प्रकल्प उभारता येतील का असे विचारले, तेव्हा त्यांनी या बद्दल असमर्थता दर्शवली. आयसोलेटेड बिल्डिंग बांधून त्यात प्लांट सुरू करावा लागेल. त्यासाठी खर्च खूप येईल असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. याच्या तुलनेत कचराडेपोवर प्रकल्प उभारून काम करणे सोपे जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

चीनला स्वखर्चाने जाणार
कंपनीने चीनमधील शांघाय शहरात कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प पाहण्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांना घेवून ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण चीनला जाणार आहोत, असे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी यावेळी सांगितले. चीन दौऱ्याचा खर्च महापालिकेच्या तिजोरीवर पडणार नाही, स्वखर्चाने आम्ही शांघायला जावून येऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ विद्यापीठ प्रशासन नमले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सात हजार महिला मतदार आणि तदर्थ प्राध्यापकांना ‘पात्र’ करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सुधारित आदेश काढले आहेत. महिला मतदारांना हमीपत्र भरून मतदानाच्या दिवशी हमीपत्र सादर करावे लागणार आहे.

मतदारयादीत अपात्र ठरवल्याबाबत प्राध्यापक संघटना आणि आमदार सतीश चव्हाण यांनी विचारणा केल्यानंतरही नावे अपात्र ठरवण्याचे ठोस कारण विद्यापीठ प्रशासन देऊ शकले नव्हते. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. याबाबत गदारोळ झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने माघार घेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या आदेशानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अध्यापक, प्राचार्य, विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांचे विभागप्रमुख आणि विद्यापीठ पदवीधर या निर्वाचक गणांच्या दुरुस्त मतदारयाद्या विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. या गणांसंबंधी कुलगुरूंना अपील सादर करण्यासाठी आणि विद्यापीठ पदवीधर गणासंबंधी चुकीच्या किंवा वगळलेल्या नोंदी कुलसचिवांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शनिवार, २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महिला अर्जदारांचे पदवीवरील नाव व रहिवासी पुराव्यावरील नाव जुळत नसल्यास त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले हमीपत्र डाउनलोड करून ते छायाचित्रासह पूर्ण भरून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राध्यक्षांना सादर करावे असे आदेशात म्हटले आहे. हमीपत्र दाखवल्यानंतरच मतदान करता येईल आणि हमीपत्राशिवाय छायाचित्र असलेले ओळखपत्र आवश्यक आहे असे जाहीर सूचनेत नमूद केले आहे.

विविध संघटना आणि प्राध्यापकांनी केलेल्या अपील अर्जाच्या अनुषंगाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सुधारित निर्देश दिले. सर्व प्राधिकरणाच्या जाहीर केलेल्या दुरुस्त मतदारयाद्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तदर्थ (अॅडहॉक) मान्यताप्राप्त जोडलेल्या अर्जदारांचे सेवासातत्य आदेश जोडायचे राहिले असल्यास त्यांनी अपील करताना परिविक्षाधीन कालावधीचे आदेश किंवा सेवासातत्य आदेश वा ‘कॅस’ ऑर्डर्स अपील अर्जासोबत जोडल्यास त्यांचे अर्ज वैध करण्यात येणार आहेत. विद्यापीठ अध्यापक गटाच्या अर्जदारांनी अपील करताना परिविक्षाधीन नमूद आदेश आणि सेवासातत्य नमूद आदेश अपिलासोबत जोडल्यास अर्ज वैध ठरवण्यात येणार आहेत. अर्जदाराची स्वाक्षरी, सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि शिक्का नसलेले अर्ज अवैध ठरवण्यात येतील. व्यवस्थापनाचे प्रतिनिधी गणासाठी ज्या अर्जदारांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल किंवा धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असेल किंवा धर्मादाय आयुक्तांचे रितसर अर्ज नसलेले अर्ज अवैध ठरवण्यात येतील. तसेच तात्पुरत्या नियुक्तीचे आदेश, तासिका तत्त्वावरील आदेश ग्राह्य धरले जाणार नाहीत असे सुधारित आदेशात म्हटले आहे.

आमदारांचे दबावतंत्र
दरम्यान, आमदार सतीश चव्हाण आपल्या समर्थकांना बेकायदेशीर मार्गाने विद्यापीठाच्या अधिकार मंडळात घुसवण्यासाठी दबावतंत्र वापरत आहेत. कुलगुरूंनी दबावाला ब‌ळी पडू नये. अन्यथा कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात येईल असे विद्यापीठ विकास मंचने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी डॉ. गजानन सानप, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. कालिदास भांगे आदी उपस्थित होते.

मतदानाचा अधिकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयाशी संबंधितांचे निर्वाचक गणासाठी प्राप्त अर्जांपैकी ज्या अर्जावर ‘बाटू-इनव्हॅलिड’ असे यादीत दाखवले आहे असे अर्ज वैध मानण्यात येणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदानापासून वंचित ठेवल्यास विद्यापीठाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडच्या कुलगुरूंना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
याचिकाकर्त्याचा निकाल जात प्रमाणपत्राअभावी जाहीर न केल्याने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली.

राज्यपालांनी ९ जुलै २०१४ रोजी मुस्लिम समाजाच्या आरक्षणासंबंधी वटहुकूम काढला. त्यानुसार ५० जाती-जमातींना विशेष मागासप्रवर्ग-अ म्हणून अधिसूचित करण्यात आले. शैक्षणिक व नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात आले. या वटहुकुमाच्या काळात १५ सप्टेंबर २०१४ रोजी याचिकाकर्ते हामेद हाश्मी यांनी नांदेड येथील महात्मा गांधी मिशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेतला. अंतिम सत्राची परीक्षा ही त्यांनी दिली, पण जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने याचिकाकर्त्याचा निकाल राखून ठेवण्यात आला. त्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

सुनावणीदरम्यान हा वटहुकूम विधिमंडळासमोर न ठेवल्याने व्यपगत झाला असून, सद्य परिस्थितीमध्ये याचिकाकर्ता जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ आहे, असा युक्तीवाद करत निकाल जाहीर करण्याची विनंती याचिकाकर्त्यातर्फे करण्यात आली. सुनावणीअंती न्या. संजय गंगापूरवाला व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंना नोटीस बजावली. याचिकाकर्त्याची बाजू अजिंक्य रेड्डी यांनी मांडली. या याचिकेची सुनावणी एक नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पंचवीस हजारांची लाच घेताना पोलिस अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल सुनील नाडर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी अडीच वाजता पोलिस ठाण्याच्या मागील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये करण्यात आली. नाडार याने जीप चोरीप्रकरणी इन्शुरन्स रिपोर्ट देण्यासाठी लाच मागितली होती.

या गुन्ह्यातील तक्रारदार लघुउद्योजक असून त्यांची बोलेरो जीप मे २०१७ मध्ये चोरीला गेली आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जीपचा शोध लागत नसल्याने तक्रारदाराने विमा मंजुरीसाठी फायनल रिपोर्ट मागितला होता. त्याकरिता कॉन्स्टेबल नाडर याने २५ हजारांची लाच मागितली. त्याने तक्रारदाराला मंगळवारी रक्कम घेऊन पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या मागील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बोलावले होते. लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथका येथे सापळा रचून सुनील राजुअप्पा नाडर (वय ४३) याला अटक केली.

याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक जिरगे, डीवायएसपी किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरत राठोड, सचिन गवळी, रवी देशमुख, संदीप आव्हाळे, गोपाल बरंडवाल, रवी आंबेकर, संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चुन्नीलाल पेट्रोल पंप सुरू करण्याचे निर्देश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
ठाण्याच्या गुन्हे शाखेने सील केलेला चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंप सुरू करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. मंगेश पाटील यांनी दिले आहेत.

पलसर युनिट आणि कंट्रोल कार्डमधील चिपमध्ये फेरबदल करून ग्राहकांना पेट्रोल व डिझेलमध्ये कमी माप दिले जात असल्याच्या कारणावरून ठाणे येथील गुन्हेशाखेने चुन्नीलाल आसाराम या पेट्रोलपंपावर कारवाई केली होती. या कारवाईविरोधात पेट्रोलपंप चालकाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने पोलिसांनी व इतर प्रतिवादींनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार दहा दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून पेट्रोल पंप सुरू करावा आणि पेट्रोल पंप चालकाने आवक शुल्कापासून तीन दिवसांत पैसे जमा करावे, असे आदेश देत याचिका निकाली काढली.

पलसर युनिट आणि केंट्रोल कार्डच्या चीपमध्ये फेरबदल करून पेट्रोल व डिझेल कमी मापात दिले जात असल्याच्या कारणावरून २३ जून २०१७ रोजी ठाणे येथील गुन्हेशाखेने औरंगाबादेतील चुन्नीलाल आसाराम या पेट्रोल पंपाची तपासणी करून तेथील पलसर युनिट आणि कंट्रोल कार्ड काढून नेत कारवाई केली होती.

याचिकेच्या यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पेट्रोल पंपाच्या जप्त केलेल्या पल्सर युनिट आणि कंट्रोल कार्ड तपासणी अहवालाबाबत विचारणा केली. त्यानुसार ठाणे गुन्हेशाखेचे निरीक्षक रणबीर बायेस यांनी पल्सर युनिट आणि कंट्रोल कार्डमध्ये छेडछाड आढळून आले नसल्याचे अहवाल सादर केला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि वैद्यमापन कार्यालयाने देखील प्रकरणात शपथपत्र दाखल केले व पेट्रोल पंप पुन्हा सुरू करण्यास सहमती असल्याचे न्यायालयास सांगितले.

दरम्यान याचिकेवर नुकत्याच झालेल्या सुनावणीत पोलिसांनी दाखल केलेला अहवाल आणि इतर प्रतिवाद्यांनी दाखल केलेले शपथपत्र, प्रतिवाद्यांनी पेट्रोल पंपाला ना हरकत असल्याचे केलेले प्रतिपादन ऐकून याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्याच्या वतीने सोमनाथ लड्डा यांनी काम पाहिले. त्यांना सत्यजीत एलारे यांनी सहाकार्य केले. राज्य शासन, ठाणे गुन्हेशाखा, वैद्यमापन शास्त्र विभाग यांच्या तर्फे महेंद्र नेरळीकर आणि ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने आनंद भंडारी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
संस्थाचालकांची याचिका फेटाळल्यामुळे ‘ए.एन.एम.’आणि ‘जी.एन.एम.’अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तीन महिन्यांत अदा करण्याचा मोकळा झाला आहे.
‘योग्यता प्रमाणपत्राचा’ आग्रह न धरता ‘ए.एन.एम.’आणि ‘जी.एन.एम.’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २०११-१२ आणि २०१२-१३ या दोन वर्षांची शिष्यवृत्ती तीन महिन्यात अदा करा, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने १३ आॅगस्ट २०१५ रोजी दिला होता. या आदेशाविरुद्ध राज्य शासनाने दाखल केलेले पुनर्विलोकन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. व्ही. के. जोशी यांनी १३ आॅक्टोबर रोजी फेटाळले. परिणामी राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २०११-१२ आणि २०१३-१४ या दोन वर्षांची थकित शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात ‘ए.एन.एम.’आणि ‘जी.एन.एम.’ अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी २१ मार्च २००५च्या शासन निर्णयातील ‘क्लॉज’ ९ नुसार भारतीय परिचर्या परिषदेचे ‘योग्यता प्रमाणपत्र’ घेतले नव्हते. त्यामुळे समाज कल्याण विभागाने या संस्थांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची २०११-१२ आणि २०१३-१४ या दोन वर्षांची शिष्यवृत्ती रोखली होती. त्याविरुद्ध शिवा ट्रस्टचे चेअरमन डॉ. बाळासाहेब पवार यांच्यासह औरंगाबाद, अहमदनगर-जामखेड, शेवगाव, नेवासा फाटा, श्रीरामपूर, नाशिक, वसमत, लातूर आणि बीड येथील १३ संस्थाचालकांनी २०१२ मध्ये औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकर्त्या संस्थांकडे योग्यता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता त्या संस्थांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीन महिन्यात २०११-१२ आणि २०१३-१४ या दोन वर्षांची शिष्यवृत्ती अदा करण्याचा आदेश दिला होता. पुनर्विलोकन अर्जाच्या सुनावणीवेळी शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील एम. ए. देशमुख यांनी, तर संस्थाचालकांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन यांनी काम पाहिले. त्यांना अश्विन होन आणि चंद्रकांत जाधव यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images