Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औराळा फाटा येथे शिवसेनेचा रास्ता रोको

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड तालुका शिवसेनेतर्फे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी गुरुवारी दुपारी औराळा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे तालुका संघटक डॉ. आण्णासाहेब शिंदे यांनी केले.
शिऊर बंगला ते पाणपोई या राज्य मार्गावरील खामगाव ते पाणपोई, जिल्हा मार्ग औराळा ते मनूर प्रमुख रस्त्याची कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केले आहे. रास्ता रोको आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ए. एस. तांगडे यांनी एक महिन्यात ही कामे पूर्ण केली जातील, असे लेखी पत्र दिले. त्यानंतर १५ दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास अधीक्षक अभियंता सार्वजनिक विभाग यांच्या कार्यालयाला कुलूप लावण्यास येईल, असा इशारा देत आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी देवगाव रंगारी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर यांनी बंदोबस्त ठेवला. आंदोलनात रमेश वारे, काकासाहेब काळे, ज्ञानेश्वर बोरसे, रवींद्र निकम, बाबासाहेब शिंदे, योगेश पवार, सरपंच अरूण बोंगाणे, अशोक कुमावत, सुखदेव काळे, चांगदेव शिंदे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक सामील झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांची ‘आधार’साठी धावाधाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आधारकार्डासाठी शासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही अद्याप जिल्ह्यातील चार लाख पाच हजार २१२ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे. पावणेदहा लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ दोन लाख आठ हजार ४७ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड आहे. त्याचबरोबर साडेतीन लाख अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन टीसी टान्सफर, शिष्यवृत्ती योजना कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. दहावी, बारावीत अर्ज भरताना आधारकार्ड सक्तीचे केले, मात्र प्रत्यक्षात सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाहीत.

विद्यार्थ्यांना प्रवेशापासून परीक्षा अर्ज भरण्यापर्यंत आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले. पालकांचे स्थलांतर झाले अन् विद्यार्थ्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट ऑनलाइन पाठविण्याची प्रक्रिया जोडलेली आहे, परंतु अद्याप जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांचे आधारकार्डच तयार झालेले नाहीत. शाळांसह महसूल विभागाच्या अनास्थेमुळे सगळी प्रक्रियाच बंद आहे.

सरकारने २०१५-१६मध्ये आधारकार्ड बंधनकारक केले आहे. त्यानंतरही अद्याप सर्व विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाने वारंवार सूचना दिल्यानंतरही शाळांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिकस्तरापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या नऊ लाख ७३ हजार ५३ एवढी आहे. त्यापैकी केवळ दोन लाख आठ हजार ४७ विद्यार्थी आधार कार्डशी जोडलेले आहेत. तब्बल ८० टक्के विद्यार्थ्यांकडे अद्याप आधार कार्डच नसल्याने त्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही.

विद्यार्थी, पालकांची धावपळ
मागील वर्षीपासून माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचा अर्ज भरताना आधारकार्ड बंधनकारक केले आहे. यंदा हमीपत्र घेऊन अर्ज भरून घेतले जात आहेत, मात्र निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना हे आधारकार्ड जमा करायचे आहेत. आधारकार्ड नसल्यास गुणपत्रिका दिली जाणार नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. त्यामुळे दहावी, बारावीचे आधारकार्ड नसलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढलेली आहे.

अपात्र की बोगस विद्यार्थी
आधार कार्ड काढण्यासाठी प्रक्रिया सुरू अाहे. कार्डमध्ये त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख ५९ हजार ७९४ आहे. यामध्ये नावात, जन्मतारीख, जन्मस्थळ, शाळांच्या नावात बदल असल्याने ही अर्ज प्रलंबित असल्यसाचे सांगितल्या जात आहे. यात अनेक विद्यार्थीच नसल्यामुळे प्रक्रियेतून अनेक बोगस विद्यार्थी संख्याही समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असलेला औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात सर्वात पुढे आहे.

आधारकार्डसाठी काही सेंटर सुरू करून, तेथे मोफत कार्ड काढून देण्याची व्यवस्था प्रशासनाने करायला हवी. त्यातबरोबर अर्जातील त्रुटींचा प्रश्नही गंभीर आहे. नाव, जन्मतारखेत चुका आहेत. त्यात फोटो चुकीचे आहेत. शाळांचा आपापल्या परीने सगळ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी प्रयत्नशील अाहे. आम्ही ही जवळपास प्रक्रिया पूर्ण केली आहे.
- उषा नाईक - देशपांडे, मुख्याध्यापक, शिशू विकास हायस्कूल, औरंगाबाद

- जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी ः ९७३०५३
- आधारकार्ड असलेले ः २०८०४७
- त्रुटी असलेले कार्ड ः ३५९७९४
- आधार कार्ड नसलेले विद्यार्थी ः ४०५२१२
- औरंगाबाद शहरातील विद्यार्थी ः ३२४९९३
- आधारकार्ड असलेले विद्यार्थी ः ६१५४३
- आधारकार्ड नसलेले विद्यार्थी ः २६३४५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण सेवक भरतीला आठ वर्षानंतर मुहूर्त

0
0

शिक्षण सेवक भरतीला आठ वर्षानंतर मुहूर्त

रिक्त जागांचा तपशील मात्र गुलदस्त्यात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षण सेवक पदासाठी आठ वर्षापासून थांबलेल्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला आहे. शिक्षण सेवक पदाकरीता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डिसेंबरमध्ये घेण्याचे शासनाने जाहीर केले. त्यामुळे १० लाख डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी, राज्यात शिक्षकांच्या किती जागा रिक्त हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
राज्यातील डीटीएड, बीएडधारकांचे शिक्षक भरतीकडे लक्ष लागले होते. आठ वर्षांपासून प्रक्रिया न झाल्याने डीटीएड, बीएड पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. चार शिक्षक पात्रता परीक्षा झाल्या त्यानंतरही भरतीची प्रक्रियेला मुहूर्त लागत नव्हता. शासनाने २३ जून २०१७ रोजी निर्णय घेत सहा महिन्यांत शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी सहा महिन्यात घेण्याचे स्पष्ट केले. त्यानुसार या चाचणीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. प्रक्रियेला आठ वर्षानंतर मुहूर्त लागल्यानंतर डीटीएड, बीएड बेरोजगारांना काहिसा दिलासा मिळाला आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्ह्यांच्या मुख्यालयी परीक्षा होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने एका दिवसात तीन टप्प्यात ऑनलाइन चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. २ नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्याला वीस दिवस ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दिले आहेत. तर, १२ ते २१ डिसेंबर दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे.

जागा रिक्तची आकडेवारी नाही..
शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेतली जात आहे. मात्र, रिक्त जागा किती आहेत? याबाबत शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले नाही. आठवर्षापूर्वी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान शिक्षकांच्या रिक्त जागांचा तपशील दिला जायचा. आता रिक्त जागांचा तपशीलच नसल्याने या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन पुढे काय? असा प्रश्न आत्ताच बेरोजगारांना पडला आहे.

‘टीईटी’चा उपयोग काय
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१३ पासून राज्यात घेण्यात येत आहे. शिक्षक होण्यासाठीची पात्रता असेल असे सांगण्यात आले. त्यामुळे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला केवळ टीईटी पात्र विद्यार्थ्यांनास बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुढे आली होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा महसूल जमा करण्याचा प्रकार असल्याची बेरोजगारांमध्ये चर्चा आहे. टीईटीच्या सलग चार परीक्षा घेण्यात आल्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या ५८ हजार २४४ हजार एवढी आहेत. मात्र, शिक्षक भरतीची प्रक्रिया झालेली नाही. २०१०पासून एकदाही प्रक्रिया न झाल्याने राज्यातील डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांमध्ये प्रचंड नाराजी होती.

परीक्षा प्रक्रियेच्या तारखा
ऑनलाइन अर्ज या दरम्यान भरता येणार... २ ते २२ ऑक्टोबर
प्रवेशपत्र मिळणार……………………..१ ते ११ डिसेंबर
ऑनलाइन परीक्षा……………………..१२ ते २१ डिसेंबर

चार परीक्षेत एकूण पात्र.......५८२४४
डीटीएड, बीएडधारक बेरोजगार...१० लाख

वर्षनिहाय पात्र विद्यार्थी..
साल..........पात्र विद्यार्थी संख्या..
२०१४.........२९६१७
२०१५..........९५३९
२०१६.........९५९३
२०१७..........९४९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंटामुक्ती अध्यक्षाची प्रथमच निवडणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील आळंद येथे आठ वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची यंदा निवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत बुधवारी रामेश्वर विठ्ठलराव चोपडे हे सर्वाधिक ३१६ मते घेऊन विजयी झाले.
आळंद येथील तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्षपद गेल्या आठ वर्षांपासून बिनविरोध निवडले जात होते. पण, यावर्षी दोन महिन्यांपासून हे पद रिक्त राहिल्याने अध्यक्ष निवडीसाठी बुधवारी सरपंच मंगलबाई खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली. या निवडणुकीत २८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यापैकी २४ जणांनी माघार घेतल्याने चार उमेदवार रिंगणात राहिले. काही ग्रामस्थांनी रामेश्वर चोपडे यांची बिनविरोध करावी, असे सूचवले, मात्र काही जणांनी निवडणुकीचा आग्रह धरल्याने मतदान घेण्यात आले. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रथमच मतदान होत असल्याने ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मतदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मतदारांची नोंद घेण्यात येत होती. यावेळी वडोद बाजार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. ओ. पठाण, बीट जमादार एस. बी. सनवे यांनी बंदोबस्त ठेवला. शेवटच्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी झाल्याने काही मतदारांनी नोंद न करताच मतदान केले. परिणामी, नोंदणी न झालेले २६ मतदान वगळून ७३७ मतांची मोजणी करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी पुंडलिक मोटे आणि छाया सुरडकर यांनी ग्रामसभेत घेतला. त्यात रामेश्वर विठ्ठलराव चोपडे यांना सर्वाधिक ५१६, गुलाम गौस यांना १९८, योगेश भीमराव पायगव्हाण व रावसाहेब राजाराम बिडवे यांना अनुक्रमे १३ व आठ मते मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ १२०० लाभार्थींवर गुन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाच्या अनुदानाची रक्कम घेऊनही वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या १२०० लाभार्थ्यींवर गुन्हे दाखल करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. वॉर्ड अधिकाऱ्यांकडून यादी अंतिम होताच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याचा उपक्रम जाहीर करण्यात आला. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने वैयक्तिक शौचालयाची योजना आणली. त्यासाठी बारा हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी शहरात लाभार्थींकडून अर्ज मागवण्यात आले. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून नऊ हजार अर्ज पात्र ठरविण्यात आले. या लाभार्थींच्या बँक खात्यावर अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून सहा हजार रुपये देखील महापालिकेने जमा केले. अनुदानाच्या वाटपानंतर शौचालयाच्या बांधकामांचे सर्वेक्षण महापालिकेच्या यंत्रणेने केले, तेव्हा १२०० लाभार्थींनी अनुदानाची रक्कम शौचालयावर खर्चच केली नसल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान भावसिंगपुरा, राजनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, रेल्वेस्टेशनसह शहरात विविध दहा ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. ज्या भागात पाणी व ड्रेनेज लाइनमुळे नागरिक वैयक्तिक शौचालये बांधत नाहीत, त्या भागात प्रामुख्याने सार्वजनिक शौचालये बांधली जाणार आहेत.

तूर्तास पन्नास जणांविरुद्ध तक्रार
‘अनुदानाच्या रकमेतून शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेने त्या लाभार्थींकडे पाठपुरावा देखील केला, पण लाभार्थ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे वॉर्ड अधिकाऱ्यांना अशा लाभार्थींची यादी तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत पन्नास लाभार्थींच्या विरोधात पोलिसात तक्रार देवून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे,’ असे भालसिंग म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘एमआयएम’च्या गोंधळी नगरसेवकांचे पद वाचले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षा अधिकाऱ्याला मारहाण करून गोंधळ घालणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन व जफर बिल्डर यांचे पद केवळ नियमाचे संरक्षण मिळाल्यामुळे वाचले असून, त्यांना महापौर निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा १६ ऑक्टोबर रोजी झाली. यावेळी सय्यद मतीन व जफर बिल्डर यांनी पाणीप्रश्नावरून गोंधळ घालत महापौरांच्या समोरचा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. राजदंडाचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्याला मारहाण केली. खुर्च्यांही फेकून मारल्या. महापौर भगवान घडमोडे यांना खुर्च्या लागल्या. या प्रकारामुळे महापौरांनी या दोन्ही नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. पोलिसात गुन्हा दाखल करून सविस्तर अहवाल शासनाला सादर करा, असेही आदेशात म्हटले. त्यानुसार पालिकेच्या प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, त्या दोन नगरसेवकांच्या संदर्भात पत्रकारांनी महापौरांना विचारले असता ते म्हणाले, ‘नियमानुसार त्यांचे नगरसेवकपद कायमस्वरूपी रद्द करता येत नाही असे कळाले आहे. १५ दिवसांत दोनवेळा समज दिली असेल, तरच नगरसेवकपद कायमस्वरूपी रद्द करण्याची नियमात तरतूद आहे. त्या दोघांना १५ दिवसांत दोन वेळा समज दिली नव्हती. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद एक दिवसापुरतेच रद्द केले आहे. महापौर निवडणुकीतही त्यांना मतदान करता येईल. पालिका प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठवला असेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुख्यमंत्र्यांनी महापौरांना वेळ नाकारली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्कऑर्डर दिल्यानंतरच रस्ते कामाचा शुभारंभ करा, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर भगवान घडमोडे यांना रस्ते कामाचा नारळ फोडण्यासाठी वेळ देण्यास सपशेल नकार दिला.

राज्य शासनाने महापालिकेला शहर विकासाची कामे करण्यासाठी शंभर कोटींचे अनुदान दिले. या अनुदानातून रस्त्यांचीच कामे करायची असा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार रस्ते कामाचे टेंडर काढले. टेंडर भरण्याची शेवटची तारीख सात नोव्हेंबर आहे. त्यानंतर प्राप्त झालेले टेंडर उघडून आवश्यक ती प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यानच्या काळात विद्यमान महापौर भगवान घडमोडे यांची महापौरपदाची मुदत संपत आहे. २८ ऑक्टोबर हा त्यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीचा शेवटचा दिवस आहे. या दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शहरात येवून रस्त्यांच्या कामाचा नारळ फोडावा यासाठी घडमोडे यांनी प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन रस्ते विकासाच्या कामाचा शुभारंभ करण्याची वेळ देखील मागितली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही. रस्ते विकासाच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करा, कंत्राटदाराला वर्कऑर्डर द्या, त्यानंतर कामाचा शुभारंभ करू, असा निरोप त्यांनी महापालिकेच्या यंत्रणेला दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे वर्कऑर्डर नंतरच रस्ते कामाचा शुभारंभ होईल हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना महापौर म्हणाले, ‘२८ ऑक्टोबरपर्यंत रस्ते कामाचा शुभारंभ करण्यासाठी वेळ द्या अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती, पण त्यांनी वेळ दिला नाही. त्यामुळे आता नवीन महापौरांच्या
काळातच रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ होईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ ट्रॅक्टरची परस्पर विक्री

0
0


म. टा. प्रतिनिधी, कन्नड
भाड्याने घेतलेले १३ ट्रॅक्टर परस्पर विकल्याची घटना कन्नड तालुक्यात घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी बळीराम राठोड याची वीट भट्टीच्या व्यवसायातून संशयित आरोपी शेख शकील याच्यासोबत ओळख व पुढे मैत्री झाली. दोन महिन्यांपूर्वी वाळूचे कंत्राट घेतल्याचे सांगत शेख शकील याने राठोडकडील स्वराज्य ट्रॅक्टर वाळू वाहतुकीकरिता १५ हजार रुपये मासिक भाड्याने घेतले. यावेळी चालक व ट्रॉली आमचीच राहिल असे सांगितले. त्यानंतर बळीराम राठोड यांच्या ओळखीने आंबा तांडा येथील केशरचंद कपूरचंद राठोड, विनोद गोरख चव्हाण, कृष्णा फत्तू राठोड, गणपत हंसराज राठोड, देविदास हिरा राठोड यांचा प्रत्येकी एक असे पाच ट्रॅक्टर भाड्याने घेतले. हतगाव (ता. चाळीसगाव) येथील तुळशीराम देवराव पवार व अशोक लकीचंद राठोड, देवचंद राठोड (रा. वडनेर), शंकर हिरा चव्हाण (रा. तेलवाडी), उत्तम आनंदा आडे (रा. लंगडा तांडा), दिनेश महारू चव्हाण (सातकुंड तांडा), शेख शमीम (रा. मकरणपूर) या बारा जणांचे ट्रॅक्टर १० ते १२ हजार रुपये उचल देऊन घेऊन गेले. मध्यप्रदेशमधील शाली चौका, खांडसरी, धुळे, शिरपूर, चाळीसगाव, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या परिसरात या ट्रॅक्टरची विक्री करण्यात आली. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याप्रकरणी शेख शकील व त्याच्या साथीदारांच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे हे करीत आहेत.

यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल
कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात शेख शकील शेख शब्बीर (रा. श्रीराम कॉलनी, कन्नड), देविलाल सरदारसिंग राजपूत (रा. पांगरा नागद, ता. कन्नड) व शेख नासेर शेख रसूल (रा. मोमीनपुरा, कन्नड) या तिघाविरूध्द कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी देविलाल राजपूत याला गुरुवारी सायंकाळी सात वाजता अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीमा राठोड खूनप्रकरण; जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शारीरिक संबंधास विरोध केला म्हणून सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या आरोपीचा दुसऱ्यांदा कोर्टात सादर झालेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी गुरुवारी फेटाळला.

हनुमंतखेडा येथील सीमा राठोड ही १४ जुलै २०१७ रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाणी आणण्यासाठी गेली असता, आरोपी शेख मुस्ताक शेख महेमूद (२२), ज्ञानेश्वर जानसिंग राठोड (२२), भुऱ्या भालचंद पवार (२१) व शेख महेमूद शेख माजिद (४१, सर्व रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न असता, तिने त्याला कडाडून विरोध केला म्हणून तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी घाटनांद्रा घाट शिवारात तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी वरील आरोपींवर गुन्हा दाखल होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी शेख महेमूद शेख माजिद याने यापूर्वी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता तो कोर्टाने फेटाळला होता. पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी महेमूद याने पुन्हा दुसऱ्यांदा नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करताना पूर्वीच्या व सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही व आरोपीला जामीन मंजूर केल्यास जातीय तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो व पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला.
----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तत्कालीन लेखाधिकाऱ्यास सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बेहिशेबी संपत्ती जमविल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन लेखाधिकारी रुपराव उर्फ राजेश शहारे व त्याची पत्नी गीता हिला तीन वर्षांची सक्तमजुरी व तीन लाखांच्या दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी ठोठावली. दंड न भरल्यास दाम्पत्याला पुन्हा सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

आरोपी हा लेखाधिकारी वर्ग-दोन पदावर होता. आरोपीविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमाविल्याची तक्रार आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शेख मुजीब यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यात रूपराव उर्फ राजेश शहारे व त्यांची पत्नी गीताने नऊ लाख दोन हजार ३६४ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा उपायुक्त, कनिष्ठ लिपिक लाखाची लाच घेताना जाळ्यात

0
0

मनपा उपायुक्त, कनिष्ठ लिपिक लाखाची लाच घेताना जाळ्यात
नोकरीत कायम करण्यासाठी तीन लाखांची मागणी
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महानगर पालिकेचे उपायुक्त अयुबखान व वरिष्ठ लिपिक दादाराव लाहोटी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली. गुरुवारी दुपारी मनपा कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ लिपिकाला नोकरीत कायम करण्यासाठी अयुबखान यांनी तीन लाखांची मागणी केली होती. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणातील तक्रारदार हे १९९५ साली मनपामध्ये डेली वेजेसवर कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीला लागले होते. २००८ सालीया लिपिकाने नोकरीला कायमस्वरुपी करून घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने या लिपिकाला कायमस्वरुपी करण्याचे आदेश दिले होते. या लिपिकाला कायम करण्याची फाईल पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यासाठी उपायुक्त अयुबखान यांनी सुरुवातीला दहा लाखांची व तडजोडीअंती तीन लाखांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने लिपिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. गुरुवारी या तीन लाखांपैकी एक लाखाचा पहिला हप्ता आस्थापना विभागातील दादाराव लाहोटी यांच्याकडे देण्याबाबत अयुबखान यांनी सांगितले होते. दुपारी पोलिसांनी मनपाच्या आवारात सापळा रचला. एक लाखाची रक्कम तक्रारदाराकडून घेताना वरिष्ठ लिपिक लाहोटी याला अटक करण्यात आली. यानंतर उपायुक्त अयुबखान यांना देखील पथकाने अटक केली. या प्रकरणी आरोपी अयुबखान नूरखान पठाण (वय ५७) आणि दादाराव रखमाजी लाहोटी (वय ५४) यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग गंगापुरात मोकळा

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
गंगापूर नगर पालिकेच्या स्वीकृत सदस्याच्या नामनिर्देशनासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेला स्थगिती देण्याची विनंती मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी नामंजूर केली. सुट्टीतील न्या. एस. एम. गव्हाणे यांनी स्वीकृत सदस्य निवडीबाबतची पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तहकुब सभेचे सोमवारी (३० ऑक्टोबर) रोजी आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर नगरपालिकेत भाजप-शिवसेना आघाडीचा एक, तर काँग्रेसचा एक स्वीकृत सदस्य आहे. काँग्रेसचे स्वीकृत सदस्य संजय जाधव यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त पदावर नामनिर्देशन करण्यासाठी वैजापूर उपविभागीय अधिकाऱ्याची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या २७ आॅक्टोबर रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली. काँग्रेसचे नगरसेवक अशोक खाजेकर यांनी विशेष सभा आयोजनाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले. यापूर्वी २४ आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली असता खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे आदेश दिले होते.
ही याचिका अपरिपक्व असून स्वीकृत सदस्याच्या निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा होणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या कलम २४३ (झेड) (जी) नुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने त्यात हस्तक्षेप करता येत नाही. या पदावर आघाड्यांचेच गटनेते नाही, तर पात्र वैद्यकीय तज्ज्ञ, वकील, अभियंता, लेखा परीक्षक, प्राध्यापकही नियमानुसार नामनिर्देशित होऊ शकतात, असा युक्तिवाद प्रतिवादी नगराध्यक्षांच्यावतीने करण्यात आला. काँग्रेसच्या सदस्याच्या राजीनाम्यामुळे पद रिक्त झालेले आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे सभागृहातील नेतेच सक्षम असल्याने त्यांच्याकडूनच नामनिर्देशन मागविण्यात यावे अशी बाजू याचिकाकर्त्यातर्फे मांडण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना दिलेले आदेशही बेकायदेशीर असल्याचे म्हणणे मांडत, त्याला स्थगिती देण्याची विनंती केली. सोमवारी (३० आॅक्टोबर) नामनिर्देशनासाठी तहकूब करण्यात आलेल्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
सुनावणीअंती कोर्टाने स्थगिती देण्याची विनंती अमान्य केली व पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे युवराज काकडे यांनी, तर सरकारी वकील ए. डी. नामदे यांनी काम पाहिले. प्रतिवादी नगराध्यक्षांकडून महेश देशमुख व किशोर कऱ्हाळे यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय बांधकाम; ४९ जणांवर गुन्हा?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी दिलेले आलेल्या अनुदानाचा दुरुपयोग केल्यामुळे ४९ लाभार्थींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, असा विनंती अर्ज महापालिकेच्या प्रभाग ई च्या वॉर्ड अभियंत्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिला आहे. या तक्रार अर्जासोबत लाभार्थींची यादी व फोन क्रमांकही देण्यात आले आहेत.
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या नावे दिलेल्या तक्रार अर्जात प्रभाग अभियंत्याने म्हटले आहे की, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केंद्र व राज्य शासनामार्फत शौचालाय बांधण्यासाठी बारा हजार रुपये अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा पहिला हप्ता सहा हजार रुपये वितरित करण्यात आला आहे. अनुदानाचा पहिला हप्ता घेऊनही अद्याप वैयक्तिक शौचालय बांधले नाही, अर्धवट बांधकाम केले व शासकीय अनुदानाचा दुरुपयोग केला, अशा ४९ लाभधारकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांना दिलेल्या अर्जाची एक प्रत पालिका आयुक्तांना तर दुसरी प्रत घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुखांना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना चाळीस लाखांची औषधी विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औषधींची विनापरवाना विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून अन्न व औषधी प्रशासनाने सुमारे ४० लाख ३६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाळूज सिडको महानगर एक येथे गुरुवारी करण्यात आली.
वाळूज येथे सिद्धांत नहार यांचे न्यू मानसी डिस्ट्रिब्युटर्स नावाने औषधी, सौंदर्य प्रसाधने तसेच वैद्यकीय साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचा पत्ता शॉप नं २, सी.एस. नंबर १७०, प्लॉट क्रमांक ३११, वाळूज महानगर १, तीसगाव असा आहे. नहार यांनी काही महिन्यांपूर्वी संबंधित दुकानाची जागा बदलली. त्याची परवानगी अन्न व औषधी प्रशासनाकडून घेतली नव्हती, अशी माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय काळे व औषधी निरीक्षक मिलिंद काळेश्वरकर यांनी दिली. या माहितीची पडताळणी गुरुवारी करण्यात आली. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे पथक काळे, काळेश्वरकर, औषधी निरीक्षक प्रवीण हरक, माधव निमसे वाळूज येथे गेले. तेथे त्यांना न्यू मानसी डिस्ट्रिब्युटर्स हे दुकान बंद आढळले. तेथून पुढे गेल्यानंतर क्वालिटी गिफ्ट अँड जनरल असा फलक असलेले एक दुकान त्यांना आढळले. या दुकानाशेजारी असलेल्या अन्य एका दुकानात औषधीसाठा असल्याचे त्यांना दिसले. त्या दुकानावर कोणताही फलक नव्हता. संबंधित इमारतीच्या फाटकावर एक नामफलक आढळला. तेथील दुकानात औषधीचा साठा आढळला. त्यावेळी तेथे सिद्धांत नहार उपस्थित होते व आपण मालक असल्याचे त्यांनी सांगितले, असे काळे यांनी सांगितले.

नवीन पत्त्यावर विक्री

संबंधित पत्यावर दुकानाचा परवाना घेतलेला नव्हता. दुकानामध्ये औषधी, गोळ्या, कॅप्सूल, सिरप, सौंदर्य प्रसाधने, सर्जिकल आयटम्स, आयुर्वेदिक औषधींचा साठा आढळला. दुकान विनापरवाना सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अन्न व औषधी प्रशासनाच्या कायद्यानुसार विनापरवाना दुकान सुरू असल्यावरून अधिकाऱ्यांनी कारवाई करत ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे सहआआयुक्त संजय काळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरूच राहणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रियेचा कालावधी संपलेला असून उर्वरीत शिक्षकांसाठी पुन्हा ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
कळंब येथील एका कार्यक्रमप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी खासदार रजनी पाटील, विधान परिषद सदस्य विनायक मेटे, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब जाधवर, विक्रम मुंडे, हभप प्रकाश महाराज बोधले, विक्रम मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, मिलिंद पाटील, उमेश कुलकर्णी, विजय दंडनाईक, रमाकांत मुंडे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये चुकी होणार नसून शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षकांनी सुद्धा फॉर्म व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. या बदल्यामध्ये कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी वशिलेबाजीचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. पत्नी व पती शिक्षक हे एक ठिकाणी आणण्याचा सुद्धा पुढील काळात प्रयत्न राहणार आहे.’
शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेत असून शिक्षकांनी भितीचे काहीच कारण नाही आम्ही खंबीरपणे शिक्षकांच्या बाजूने उभा आहोत, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली.
दरम्यान, यावेळी शिक्षक संघटनेच्या महिला आघाडीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन ऑनलाइनऐवजी पूर्वीप्रमाणे समुपदेशानाद्वारे बदली प्रकिया राबवाव्यात. त्यासोबतच ऑक्टोबर महिन्याऐवजी ही प्रक्रिया एप्रिल व मे महिन्यात राबवावी अशी मागणी केली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी ठरल्याप्रमाणे ऑनलाइन प्रक्रिया राबवून एप्रिल व मे महिन्यात बदलीचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन महिला शिक्षकांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पशु चिकित्सालयाच्या आवारात सापडले प्रेत

0
0

सोयगावः येथील पशु चिकित्सालयाच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एकाचा मृतदेह शुक्रवारी पहाटे सापडला. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मृताचे नाव श्याम इंगळे (वय ३५, रा. नारळीबाग, सोयगाव) असे आहे. हा खून की मृत्यू, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
येथील एस. टी. बस स्थानकासमोर पशु चिकित्सालय आहे. या इमारतीच्या आवारात इंगळे यांचा मृतदेह सापडला. मृत इंगळे यांच्या डोक्यावर प्रहार केल्याची जखम असून अती रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. मृतदेह सापडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व्ही. बी. राजपूत व सहाय्यक सोमा चव्हाण यांनी पोस्टमार्टेम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा खून असल्याचा संशय त्याची आई यमुनाबाई इंगळे यांनी केला आहे. पोस्टमार्टेम अहवाल मिळाल्यानंतर चौकशीची दिशा ठरवण्यात येईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.
शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यलयांना संरक्षण भिंती, तार कंपाउंड नसल्याने आवाराचा ताबा अवैध धंदे करणारे व व्यसनी मंडळींनी घेतला आहे. त्यांचा येथे दिवस-रात्र धुमाकूळ सुरू असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार चिकटगावकरांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना बागायती जमिनीची नोंद जिरायती करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही, अशी तक्रार वैजापुरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले.
समृद्धी महामार्गासाठी वैजापूर तालुक्यातील गावांमध्ये भूसंपादन केले जात आहे. शासनाने जिरायती व बागायती जमिनीसाठी वेगवेगळे दर ठरवून दिले आहेत. सर्वेक्षण करताना तलाठी बागायती जमिनीची नोंद जिरायती करत आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून सिंचनासाठी विद्युत मोटार, पाइपलाइनचा खर्च केला आहे. त्यामुळे हा खर्च शेतकऱ्यांना मिळावा, त्यांच्या जमिनीची बागायती नोंद करावी, अशी मागणी आमदार चिकटगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय पाटील चिकटगावकर यांनी दिली. दरम्यान, आमदार चिकटगावकर यांनी याप्रश्नी नुकतेच औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत उपोषण केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अय्युब खानकडे सापडले घबाड

0
0

अय्युब खानकडे सापडले घबाड
दीड किलो सोने, दोन किलो चांदी, लाखांची रोकड; दोघांची रवानगी पोलिस कोठडीत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लाचेच्या गुन्ह्यात अटक केलेले मनपा उपायुक्त अय्युब खान व लिपिक दादाराव लाहोटी यांना सोमवारपर्यंत (३० ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी सुनावली. दरम्यान, आरोपी अय्युब खानच्या घरझडतीमध्ये दीड किलो सोने, दोन किलो चांदी व रोख सव्वाचार लाख रुपये आणि मालमत्ता खरेदीची कागदपत्रे सापडल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या प्रकरणी तक्रारदारास सेवेत कायम करण्यासाठीची संचिका सर्वसाधारण सभेत ठेवण्यासाठी तीन लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये लिपिकामार्फत घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) दोघांना अटक केली होती. त्या दोघांना शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, अतिरिक्त जिल्हा सरकरी वकील सतीश मुंडवाडकर यांनी अय्युब खानच्या घरातून दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीचे दागिने व रोख ४ लाख १९ हजार ६५० रुपये मिळाले असल्याचे कोर्टाच्या निदर्शास आणून दिले. त्याशिवाय बेनामी मालमत्ता खरेदीचे महत्वपूर्ण दस्तावेजदेखील घरझडतीमध्ये मिळाले आहेत. दोन्ही आरोपींच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवावयाचे आहेत. लाचेच्या गुन्ह्यात आणखी काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याबाबत सखोल तपास करावयाचा आहे. आरोपींविरुद्ध पहाटे साडेपाच वाजता गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांची सखोल चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करावी, अशी विनंतीही मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार दानवे यांचे आमदार सत्तारांना आव्हान

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
‘आमदार अब्दुल सत्तार यांनी विकासाच्या मुद्यावर राजकारण करावे. त्यांनी मंजूर करून आणलेली विकास कामे व मी आणलेली विकास कामे यावर एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी,’ असे खुले आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
येथे आयोजित दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सत्तार व खासदार दानवे यांच्यात नगर पालिकेच्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या उद्धाटनापासून आरोप-प्रतिआरोप होत आहेत. त्यामुळे खासदार दानवे काय बोलतील याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष होते. ‘लोकसभेच्या निवडणुकीत उंदरांची फौज घेऊन सत्तार मला काय हरविणार,’ असा सवाल करीत दानवे यांनी,‘राज्यमंत्री खोतकर दोनशे मतांनी निवडून येतात, ते मला काय अाव्हान देणार,’ असा प्रश्न केला. या सर्वांनी हिंमत असेल, तर मला हरवून दखावावे, असे अाव्हान त्यांनी दिले. ‘आमदार सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील रस्त्यांची चाळणी केली आहे. दरवर्षी शहरातील रस्त्यावरील दुभाजक बदलले जातात. यातून त्यांनी भ्रष्टाचार केला,’ असा सवाल त्यांनी केला. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी १६०० कोटींचा निधी आणाला. जळगाव-औरंगाबाद महामार्ग, अजिंठा-बुलडाणा मार्ग माझ्या प्रयत्नामुळे होत आहे. सत्तार यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विकास निधी न आणता आरोपाचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे विकास निधीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर यावे,’ असे आव्हान त्यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, सुरेश बनकर, मकरंद कोर्डे, ज्ञानेश्वर मोठे, इद्रीस मुलतानी, अशोक गरूड, डॉ. मच्छिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, राजेंद्र जैस्वाल, दिलीप दाणेकर, ज्ञानेश्वर तायडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पुढील आमदार भाजपचाच करा

देशात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने सिल्लोडचा आगामी आमदार भाजपचा राहील, याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा आमदार झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक गावात बारकाईने लक्ष देऊन नाराज असलेल्या वर्गाला भाजपत आणून निवडणूक जिंकावी. विधानसभेच्या दोन निवडणुकांत थोड्या मतांनी पराभव झाला. आता विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून शीला भवरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर पदासाठी शीला किशोर भवरे तर उपमहापौर पदासाठी विनय विश्वंभर पाटील-गिरडे या दोघांची काँग्रेस पक्षातर्फे निवड करण्यात आली. उभयतांनी शुक्रवार दोन्ही पदांसाठी स्वतंत्ररित्या अर्ज सादर केले. तर भाजपच्या वतीने महापौर पदासाठी बेबी जनार्दन गुपिले व उपमहापौर पदासाठी त्याच पक्षाच्या गुरूप्रितकौर दिलीपसिंघ सोडी यांनी उमेदवारी अर्ज आजच दाखल केले. महापौर व उपमहापौर पदाची निवड ही बिनविरोध होणार नाही. त्यासाठी येत्या १ नोव्हेंबरची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
नांदेडची निवडणूक सबंध राज्यात गाजली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. महापालिकेच्या अकराव्या महापौरपदी व उपमहापारैपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. त्याबाबतचे अंतिम चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती. त्यावेळेपर्यंत वरीलप्रमाणे अर्ज दाखल झाले.
यंदाचे महापौरपद मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षापर्यंत असेल. नांदेडची महापालिका ‘ड’ वर्गात मोडते. महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प २०० कोटींच्या घरात आहे. भवरे व गिरडे पाटील यांनी शुक्रवारी अर्ज सादर केला. त्यावेळी त्यांच्या समवेत आमदार डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, महापौर शैलजा स्वामी, नगरसेवक अब्दुल सत्तार, विरेंद्रसिंघ गाडीवाले, बापुराव गजभारे, विजय येवनकर, उमेश चव्हाण, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, श्रीनिवास जाधव, राजू यन्नम, नागनाथ गड्डम, अॅड. महेश कनकदंडे उपस्थित होते. तर भाजपच्या गुपिले व सोडी यांनी अर्ज दाखल केले. त्याच्या समवेत नगरसेवक दीपकसिंह रावत, चैतन्य देशमुख, प्रवीण साले, शीतल खांडील, संजय पाटील-घोगरे, बजरंग ठाकूर, राजू काकडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष स. दिलीपसिंघ सोडी हे उपस्थित होते. महापालिका कार्यालयात या राजकीय घटनांमुळे मोठी गर्दी होती. आता सर्वांचे लक्ष १ नोव्हेंबरकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images