Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिकेच्या निषेधार्थ पाण्यासाठी हाती कुदळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हडको एन-१२ सिद्धार्थनगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी सुरळीत येत नसल्याने रविवारी महिलासह नागरिकांनी रस्त्यावर उतरून मनपाचा निषेध केला. मनपा कर्मचाऱ्यास जाब विचारत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. वॉल स्लिप होत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगताच नागरिकांनी स्वतः हातात फावडे, कुदळ घेत कामात मदत केली.
शहरातील पाणी पुरठवठ्यात सुरळीतपणा नसल्याने अनके वॉर्डातील नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः त्याचा महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. हडकोतील एन-१२ मधील सिद्धार्थनगरातही अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता. रविवारी नागरिक, महिलांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. पाणी सोडणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांचा रोष पाहता कर्मचारीही भांबावले. वॉल स्लिप होत असल्याचे कर्मचाऱ्यानी सांगितले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलावले व हाती कुदळ, फावडे घेत स्वतः वॉलची जागा खोदून कर्मचाऱ्यास तेथील अडचण दूर करण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. मात्र, दुपारपर्यंत तेथील प्रश्न सुटला नव्हता. नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मोहन मेघावाले यांना सांगितले. मात्र, तरी पाणी सोडले जात नव्हते. म्हणून स्थानिक नागरिकांचा रोष अनावर झाल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालन्यातील समरसता संगम कार्यक्रमाची तयारी पूर्ण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे सोमवारी जालन्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत ७ व ८ नोव्हेंबर रोजी दोन दिवस महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यातील संघ परिवारातील सर्व प्रमुख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आहे. डॉ. भागवत हे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता समरसता संगम या विशेष समारंभात जाहीर मार्गदर्शन करणार आहेत.
जालना जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच सरसंघचालकांचा हा विशेष दौरा होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आली आहे. नवीन जालन्यातील महाराजा अग्रसेन फाऊंडेशनच्या सभागृहात संघ परिवारातील महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यातील प्रमुख संघटनेचे पदाधिकारी एकत्र येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी महिला समन्वय समितीची बैठक होणार आहे, संघ संबंधित संस्थांच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत विद्यमान परिस्थितीमध्ये महिलांच्या संघटनांच्या रचनात्मक कार्याचा आढावा आणि भविष्यातील आव्हाने या संदर्भात विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच्या भागातील देऊळगावराजा ते भोकरदन वळण रस्त्याच्या राजूर चौफुली जवळच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या समरसता संगम या विशेष कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी श्री क्षेत्र सरला बेट (ता. श्रीरामपूर) जिल्हा नगर येथील मठाधिपती महंत रामगिरी महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने जालना जिल्ह्यातील दोनशे गावातील दहा हजार संघ स्वयंसेवक संघाच्या गणवेषात उपस्थित राहणार असून २५ हजार नागरीक या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सभेची जय्यत तयारी
जालना शहरातील नवीन मोंढ्यासमोर असलेल्या दहा एक्कर परिसराच्या विस्तीर्ण प्रांगणावर ही सभा होत असून या सभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्रोत्यांच्या आसन व्यवस्थेसह वाहन तळासाठी स्वतंत्र दहा एक्करचा परिसर राखीव ठेवण्यात आला आहे. सभेच्या संचालनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून पदाधिकारी आणि स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने काम करत आहेत. सभास्थळी कोणतीही गैरसोय होऊ नये, प्रत्येक श्रोत्याला सभास्थळी सुलभतेने पोहचता यावे आणि आसन उपलब्ध व्हावे याची देखील दक्षता घेतली जाणार आहे. सभेला जमणारी गर्दी लक्षात घेऊन पार्किंग आणि पादचारी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वीस एकर परिसरात सर्वत्र प्रकाश असेल याची काळजी घेण्यात आली आहे. सभा स्थानी राष्ट्रीय विचारांची व देशभक्तीपर विचाराची पुस्तके उपलब्ध असणार आहेत. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी समरसता संगम कार्यक्रमस्थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ परभणीत युवक महोत्सवाचे उद्घाटन

$
0
0

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय पाच दिवसीय युवक महोत्सवाचे रविवारी उद्घाटन झाले. या महोत्सवात संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय व ललित कला, शास्त्रीय गायन, तालवाद्य, सूरवाद्य, आदिवासी नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्त्व, वादविवाद, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, नकला, चित्रकला, पोस्टर मेकींग, मातीकला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी अशा विविध २४ कला प्रकारांत विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करतील. राज्यातील १९ कृषी व अकृषि विद्यापीठातील सुमारे ७१४ स्पर्धक विद्यार्थी, विद्यार्थीनींसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा निरिक्षक सहभागी झाले आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १५ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०१७ स्पर्धा ५ ते ९ नोव्हेबर दरम्यान होत आहे. स्पर्धेचे उदघाटन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले. व्यासपीठावर प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.बी. व्यंकटेश्वरलु हे होते. तसेच डॉ. पी.आर. शिवपुजे, डॉ. विलास पाटील, डॉ. आनंद पाटील, डॉ. अजय देशमुख, डॉ. प्रदिप इंगोले, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. अशोक कडाळे, विनोद गायकवाड, डॉ. महेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यामध्ये सांस्कृतिक कला गुणांना वाव देण्याची गरज असून इंद्रधनुष्य सारख्या युवक महोत्सव त्यांच्यासाठी मोठे व्यासपीठ आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यी घडत असतो, त्यांच्या सांस्कृतिक कला गुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.
यावेळी प्रा. इंद्रजीत भालेराव म्हणाले, ‘समाजात कलावंत हा सर्वात मोठा असतो, श्रीमंत, अधिकारी किंवा राजा यापेक्षा लोक कलावंताना लक्षात ठेवतात. कलावंतांनी आपल्या कलागुणांचा वापर लोक,समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी करावा. नवा युगाचा नवा शिवाजी तुमच्या मधुन घडवावा.’
आजच्या स्पर्धा
सोमवारी (६ नोंव्हेबर) सकाळी नऊ ते एक या वेळेत चिकटकला, मुकनाटक, शास्त्रीय गायन, वादविवाद तर दुपारी दोननंतर एकांकीका, पोस्टर मेकिंग, सुगम संगीत, वकृत्व, स्वरवाद्य आणि माती कला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाच्या भावासाठी उद्यापासून आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
उसाला ३१०० रुपये भाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी पैठण व शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागण्या सोमवारपर्यंत पूर्ण न झाल्यास पैठण व शेवगाव तालुक्यातून ऊस वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पैठण व शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीची स्थापन केली असून शनिवारी व रविवारी समितीची पाटेगाव येथे बैठक घेण्यात आली. यावर्षीच्या गळीत हंगामात ३१०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळावा, ऊस मोजणी काटा पारदर्शी असावा, मागच्या वर्षी ठरल्याप्रमाणे भाव न देणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावी, कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यास ऊस तोडणी व हमी भावाचे तीन वर्षांचे करार पत्रक करून द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रविवारी, समितीने शेवगाव तालुक्यातील घोटन येथे ऊस वाहतूक रोखली. या आंदोलनात माऊली मुळे, चंद्रकांत झारगड, अनिल घोडके, राजुभाई विटभट्टीवाले, बद्री बोबले, संजय मोरे, ज्ञानेश घोडके, सलीम शेख यांच्यासह शेतकऱ्यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ‌७ डिसेंबरपासून शेतकऱ्यांचा जेलभरो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी कर्जमुक्तीसह हमीभाव व इतर मागण्यांबाबत सरकारकडे आंदोलने, विरोधी पक्षाकडून विधीमंडळातील आग्रह, न्यायालयातील लढा अशा वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. यामुले ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने घेतला, अशी माहिती निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.
किसान मंचतर्फे वेगवेगळ्या संघटनांच्या राज्यकार्यकारिणी सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार निष्ठूर असल्याची भावना अनेकांनी बैठकीत व्यक्त केली. दुष्काळ, रोगराई, अतिवृष्टी व शेती उत्पादन भाव याबाबत यापूर्वी उपाययोजना होत होत्या, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी मदत दिलीच नाही, उलट जबाबदार मंत्र्यांनीही शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील बाबींवर उपहास केला, अशा भावना व्यक्त झाल्या.
सरकारने कर्जमाफीच्या नावे शेतकऱ्यांची दिशाभूल केली, प्रशासनातही कुणीही जबाबदारीने वागताना दिसत नाही, नोटबंदी, जीएसटीच्या निर्णयाने ग्रामीण अर्थकारण उध्दवस्त झाले आहे. आता घरी राहून फाशी घेण्यापक्षा सविनय कायदेभंग व शांततेच्या मार्गाने लाखो शेतकऱ्यांनी तुरुंगात जाऊन शेतकऱ्यांची शक्ती दाखवणे आवश्यक असल्याचे मत अनेक नेत्यांनी मांडले.
या बैठकीला अडीचशे तालुक्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी मंडळींनी सर्वानुमते ७ डिसेंबरपासून जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती धोंडगे यांनी दिली.

जिल्ह‌ाधिकाऱ्यांना इच्छापत्र

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातील शेतकरी ७ नोव्हेंबरपासून तुरुंगात जाण्यासाठी इच्छापत्र देणार आहेत. अस्मानी संकट, सरकारच्या धोरणांमुळे शेतमालास निचांकी भाव मिळाल्याने आर्थिक कोंडी होत असून कुटूंबाची आर्थिक कोंडी होत आहे. शासनाच्या या धोरणाविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर व शांततेच्या मार्गाने माझी तुरुंगात जाण्याची इच्छा आहे, असे इछापत्रामध्ये नमूद केले आहे. शेतकरी तसेच शेतीपूरक व्यावसायिकांना सरसकट कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव, शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक व सामाजिक संरक्षण दिले जावे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे आदी मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेतील तीन रस्त्यांसाठी निधी द्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील तीन प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकारकडे विशेष मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हर्सूल टी पॉइंट ते महानुभाव चौक, महावीर चौक ते चिकलठाणा (जालना रोड), गोलवाडी टी पॉइंट ते पैठण या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय लासूर, वैजापूर परिसरातील दोन रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे प्रस्ताव सादर केले असून, त्यास केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने औरंगाबाद लगतचे काही रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले. हे रस्ते सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. सद्यस्थितीला राज्याच्या ‘पीडब्ल्यूडी’कडून रस्ते मजबुतीकरणासाठी म्हणावा तेवढा निधी मंजूर केला जात नाही. त्यामुळे औरंगाबादलगतच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत आले होते. त्यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रस्ते मजबुतीकरणाची मागणी करणारे प्रस्ताव सादर केले. त्यात औरंगाबाद शहरासह वैजापूर, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यातील प्रमुख रस्ते; तसेच भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील रस्त्यांच्या समावेश आहे. केंद्र सरकारने हे सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे या रस्त्यांसाठी केंद्राकडून निधी मिळू शकतो. ‘पिरिऑडिकल रिन्युअल’मधून (नूतनीकरण) या रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा, असे प्रस्तावात म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; केंद्राने या प्रस्तावास मंजुरी दिली, तर मे महिन्यापूर्वी हे सर्व रस्ते मजबूत होणार आहेत.

औरंगाबादेतील रस्ते
- चिकलठाणा ते महावीर चौक या नऊ किलोमीटर रस्त्यासाठी १५ कोटी १५ लाखांचा प्रस्ताव (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ए)
- ए.एस. क्लब टी पॉइंट ते गोलवाडी टी पॉइंट पैठण रोड रस्त्याचाही प्रस्ताव सादर
- हर्सूल टी पॉइंट ते महावीर चौक या सात किलोमीटर रस्त्यासाठी ११ कोटी ७६ लाखांचा खर्च अपेक्षित (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ)

अन्य रस्ते
लासूर चौक ते ए.एस. क्लब टी पॉइंट, वैजापूर चौक ते लासूर चौक, कोपरगव ते वैजापूर चौक, धाड ते माहोरा, माहोरा ते भोकरदन, गणेशपूर फाटा ते अजितपूर, येवला जंक्शन ते शिवूर बंगला, खुलताबाद ते फुलंब्री.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोड येथे भरड धान्य खरेदी केंद्र सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
शेतमाल विकताना विविध ठिकाणी होणारी शेतकऱ्याची अडवणूक, पिळवणूक रोखण्यासाठी शासनाचे भरड धान्य खरेदी केंद्र हा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी शासकीय भरड धान्य केंद्रावरच आणावे, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शनिवारी शासकीय भरड धान्य खरेदी केंद्रे आमदार सत्तार यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार संजय सोनवणे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, सहाय्यक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, व्हाइस चेअरमन हनिफ मुलतानी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, खरेदी विक्री संघ यांचा परस्पर समन्वय असणे गरजेचे आहे. खरेतर भरड धान्य खरेदी केंद्र हे हंगामी न राहता वर्षभर सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना कधीही शेतमाल विकता येईल. मागील वर्षाचे धान्य खरेदी करता येणार नाही, हा निकष बदलण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे आमदार सत्तार यांनी सांगितले. एक वर्ष उलटूनही नोटबंदीचा परिणाम कायम असल्याने शेतकरी आणि व्यापारी अडचणीत असल्याची टीका त्यांनी केली. या कार्यक्रमाला बाजार समिती संचालक नरसिंग चव्हाण, दामू गव्हाणे, ईश्वर जाधव, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय मुरकुटे, बाजार समिती सचिव विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

‘म. टा.’च्या वृत्ताची दखल

या प्रश्नी ‘म.टा’ने गुरुवारच्या अंकात ‘हमी भावाच्या पोटावर पाय, शासकीय भरड धान्य केंद्राअभावी शेतकऱ्यांची लूट’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेऊन शेतमाल हमीभावाने विकला जावा यासाठी तातडीने पावले उचलून भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले.

विक्रीपूर्वी नोंदणी करा

शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे मका, ज्वारी, बाजारी हा शेतमाल १४ टक्क्याच्या आतील आर्द्रता असलेला शेतमाल विक्रीस आणावा. तसेच भरड धान्य विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सातबारा उतारा, पीक पेरा, आधार कार्ड, बँक खाते पासबूक घेऊन येऊन बाजार समितीमध्ये नोंदणी करावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेआठ लाख कोटींची ८९ खातेदाराकडे थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
देशातल्या बँकाचा एनपीए दहा लाख कोटी आहे. त्यापैकी ८९ खातेदारांकडे साठेआठ लाख कोटी रुपये थकीत आहेत. यामधल्या १२ कंपन्याकडे दोन लाख ५० हजार कोटीची थकबाकी आहे. मात्र सरकार कारवाई, कर्जवसुली करण्याऐवजी माफ करण्याकडेच भर देत असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लाइजचे जनरल सेक्रेटरी संजीव कुमार बंदलीश यांनी केला.
अधिवेशनानंतर रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अधिवेशनात बँकाच्या माध्यातून करण्यात येणारे ऑउटसोर्सिंग थांबवण्याची मागणी करणारा ठराव, तसेच कर्मचाऱ्याचा ११वा वेतन करार लागू करावााव, हे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी बंदलीश यांनी सरकारने यापुढे विलीनीकरण केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला. एसबीआय आणि सहयोगी बँकाचे विलीनीकरण एकाच बँकाच्या सहयोगी बँका होत्या. मात्र इतर बँकाचे विलीनकरण अवघड आहे. प्रत्येकाचे सॉफ्टवेअर कामाची शैली संस्कृती भिन्न आहेत. त्यामुळे भविष्यात सरकराने असा विलीनकरणाचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू. त्यासाठी सर्वात मोठे आंदोलन देखील सर्व संघटनाच्या माध्यमातून केले जाई, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

नोटाबंदीतून मर्यादित यश

नोटाबंदीतून काय साध्य झाले याच्या चर्चा राजकीय आहेत. मात्र आम्ही रात्रदिवस काम केले. ज्या काळ्यापैशासाठी नोटाबंदी केले तो सफल झाल्याचे दिसत नाही. ९९ टक्के पैसा आरबीआयकडे आला असल्यामुळे नोटाबंदीला यश आले असे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

बँकांना वाचवले पाहिजे

देशाच्या अर्थकारणात सार्वजनिक बँकांचा मोठा वाटा आहे. गावपातळीपर्यंत बँकांचे कार्य मोठे आहे. पण, नवे नियम आणि धोरण लागू करत बँकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने त्या वाचविण्याची गरज आहे, असा सूर नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइजच्या अधिवेशनात निघाला.
स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन मुंबई सर्कलतर्फे रविवारी सिडकोमधील अग्रेसन भवनात नॅशनल कॉन्फेडरेशन बँक एम्प्लॉइजचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइजचे निमंत्रक संजीव कुमार बंदलीश, एनसीबीईचे अध्यक्ष विनील सक्‍सेना, मिलिंद नाडकर्णी, एआयएसबीआयएसएफचे अध्यक्ष व्ही. व्ही. एस. आर. सर्मा, जगदीश सिंगारपुरे, प्रदीप येळणे, अमोल सुतार, अरूण जोशी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
देशातील कोणतेही सरकार हे आजपर्यंत बँकेच्या कल्याणासाठी नव्हते. आताचे सरकार हे कॉर्पोरेट घराण्यास लाभ देत आहे, असे नमूद करून व्ही. व्ही. एस. आर. सर्मा म्हणाले, सार्वजनिक बँकाशिवाय देशाला पर्याय नाही. तरीही खासगीकरण केले जात आहे. देशात दहा लाख बँक कर्मचारी आहेत. हे कर्मचारी याच बँकाच्या माध्यमातून सेवा देतात. नोटबंदीनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिने अहोरात्र मेहनत घेऊन बँकांची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सार्वजनिक बँकांनी पुढाकार घेतला. ३० कोटी जनधन खात्यांपैकी २६ कोटी खाते या सार्वजनिक बँकानी उघडले, एवढेच नाही तर ८० टक्‍के मुद्रा लोन याच बँकानी दिले आहेत. बँकांच्या आधुनिकीकरणातही याच बँका पुढे आहेत. तरीही सरकारची ओढ खासगी बँकाकडे असल्याची खंत आहे. यानंतर त्यांनी सार्वजनिक बँकांचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमात अमोल सुतार, जगदीश सिंगारपुरे, प्रदीप येळणे, मिलिंद नाडकर्णी, विनील सक्‍सेना यांनीही मार्गदर्शन केले. वैशाली जहागीरदार, प्रियंका वनगे यांनी सूत्रसंचालन केले, तर अरूण जोशी यांनी आभार मानले.

वसुलीसाठी नवे नियम करा

देशात ‘नॉन परफॉमिंग असेट'ची (एनपीआय) संख्या मोठी आहे. आम्ही सरकारला सांगितले की कर्ज बुडविणाऱ्यांची नावे घोषित करा. त्यांना गुन्हेगार जाहीर करा. सहा हजार कोटी घेऊन विजय माल्ल्या फरार झाला आहे. असे अनेक कर्जबुडवे देशात अजून आहेत. मात्र त्यांची यादी जाहीर करण्यास सरकार असमर्थता दर्शवत आहेत. सध्या केवळ ९ टक्‍क्यांपर्यंत वसुली सुरू आहे. आम्ही सरकारकडे वसुलीसाठी नवे नियम बनवा, असे सूचवले आहे. सार्वजनिक बँकांच्या ध्येय धोरणाला धोका निर्माण होईल, असे कोणतेही निर्णय शासनाने घेऊ नयेत. सरकारने बँकाचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा बँक कर्मचारी याच्या विरोधात आंदोलन छेडेल, असेही संजीव कुमार बंदलीश यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेने लाज सोडली, जगताप यांची टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यभर नावाजलेल्या रंगकर्मींच्या औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेचे किती वाईट शब्दात वर्णन करणार हा प्रश्न पडतो. सुमीत राघवनसारख्या कलाकारांनी वाभाडे काढूनही आपल्याला लाज वाटत नाही हे दुर्दैव आहे. औरंगाबाद महापालिका भगवान भरोसे सुरू आहे’ अशा परखड शब्दात प्रसिद्ध नाटककार-गीतकार अरविंद जगताप यांनी महापालिकेवर टीका केली. ‘नाट्य परिवर्तन पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
परिवर्तन संस्था आणि बर्लिफिल्ड यांच्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘नाट्य परिवर्तन पुरस्कार’ प्रदान सोहळा घेण्यात आला. तापडिया नाट्यमंदिरात रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी रंगमंचावर ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. विजय दिवाण, उद्योजक ज्योती दाशरथी, सुनील देशपांडे व ‘परिवर्तन’चे मोहन फुले यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवाण यांनी अरविंद जगताप यांना पुरस्कार प्रदान केला. जगताप यांनी भाषणात औरंगाबाद शहरातील नाट्य चळवळीवर भाष्य केले. ‘काही दिवसांपूर्वी संत एकनाथ रंगमंदिरात ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या प्रयोगात कलाकाराला खिळा घुसला. तिकीटावर खुर्ची क्रमांक असतो, पण नाट्यगृहात ती खुर्चीच नसते. इतर सोयीसुविधांचा ठावठिकाणा नाही. कलाकारांनी जाहीर वाभाडे काढूनही आपल्याला लाज वाटत नाही. या अवस्थेचे किती वाईट शब्दात वर्णन करावे. खुर्च्या महापौरांनी तोडल्या नाहीत. पण, कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. ही महापालिका भगवान भरोसे सुरू आहे. सरकार आवाज दाबत असल्याची ओरड सुरू आहे. फेसबुकवर तुम्ही काय लिहिता यावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगतात. मला ही सकारात्मक बाब वाटते. एरव्ही लेखकाला कुणी विचारत नव्हते. सरकारच लक्ष देत असल्यामुळे आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवणे सोपे झाले’ असे जगताप म्हणाले.
अरविंद जगताप साधकाच्या नव्हे, तर उपासकाच्या नजरेतून लिहितात असे प्रतिपादन प्रा. विजय दिवाण यांनी केले. ‘हाल-अपेष्टा भोगत असलेल्या मराठवाड्यातील लोकांशी जगताप यांची नाळ जुळलेली आहे. ऐन दुष्काळात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या कुटुंबांना शोधत जगताप फिरले आणि वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळवून दिली. ‘नाम’ फाउंडेशनच्या कामाशी ते जोडले गेले आहेत. ही भूषणावह बाब आहे’ असे दिवाण म्हणाले. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर ‘वेदरंग’ हा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन फुले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीकांत उमरीकर यांनी करून दिला आणि सूत्रसंचालन मैथिली हळदेकर यांनी केले.

नेत्यांबाबत भावना बधीर

‘मराठवाड्यात चांगले कलाकार असताना मुंबईत मोजकेच दिसतात असे काहीजण विचारतात. प्रचंड खड्डे असल्यामुळे वैजापूर गाठायलाच दिवस लागतो. त्यामुळे मुंबईत कुणी येत नाही, असे उत्तर मी देतो. वाळूज रस्त्यावर इतके खड्डे आहेत की उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. एवढ्या घाणेरड्या रस्त्यांबाबत सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. नेत्यांबाबत माझ्या भावना बधीर झाल्या असून मला त्यांची लाज वाटते’ असे परखड मत अरविंद जगताप यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिषेकींच्या गायनाने संध्याकाळ अविस्मरणीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाट्यगीत, अभंग, बंदिशी यांच्या श्रवणीय सादरीकरणाने पंडित शौनक अभिषेकी यांनी रसिकांना अवीट संगीताची पर्वणी दिली. निमित्त होते ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे ‘जय जय रामकृष्‍ण हरी’पासून ते ‘काटा रुते कुणाला’ अशी बहारदार गीते त्यांनी सादर केली.
शहरातील विविध ३० ब्राह्मण संघटनांचा सहभाग असलेल्या ब्राह्मण समाज समन्वय समितीच्या वतीने सरस्वती भुवन कॉलेजच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी यांचा 'स्वराभिषेक' हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक श्रीकांत बडवे यांना ‘उद्योगरत्न’, ज्येष्ठ समाजसेविका मालती करंदीकर यांना ‘समाजरत्न’, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट विवेक देशपांडे आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे याना ‘खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. सुरुवातीला पं. शौनक अभिषेकी यांचा ‘स्वराभिषेक’ कार्यक्रम रंगतदार ठरला. प्रश्न-उत्तरातून त्यांनी आपली वाटचाल मांडत नाट्यगीत, अभंग, बंदिशी अशा विविध गीतांतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रांरभी ‘जय जय रामकृष्‍ण हरी’ हा अभंग गात त्यांनी वातावरण भक्तीमय केले. त्यानंतर त्यांनी ‘विष्‍णूमय जग’ हा अभंग सादर केला. त्यानंतर ‘सुहास्ये तुझे मनाशी मोहे’ भावगीत सादर केले. त्यांच्या बहारदार आवाजातील गीतांचा आस्वाद ररिकांनी घेतला. अभंगानंतर त्यांनी नाट्यगीतांची मैफल रंगवली. यामध्ये त्यांनी ‘लागी कलेजवा कट्यार’ हे नाट्यगीत सादर केले अन् उत्तरोत्तर कार्यक्रमाला रंगत येत गेली. त्यानंतर त्यांनी ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी’, हे गीत सादर केले. त्यानंतर सादर केलेल्या ‘काटा रुते कुणाला’, या गीताला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. बहारदार नाट्यगीत, बंदीशींनी रविवारची संध्याकाळ औरंगाबादकरांसाठी अविस्मरनीय ठरली.
प्रारंभी कार्यक्रमाच्या उदघाटनावेळी प्रा. दिनकर बोरीकर, राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला आमदार अतुल सावे, संजय सिरसाठ यांच्यासह पंडित नाथराव नेरळकर, श्रीरंग देशपांडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, प्रकल्प प्रमुख मंगेश पळसकर, कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, सचिव मिलिंद दामोदरे यांच्यासह प्रमुख सदस्य आनंद तांदुळवाडीकर, धनंजय पांडे, अनिल खंडाळकर, संजय मांडे, आशिष सुरडकर, परिमल मराठे, सचिन अवस्थी यांची उपस्थिती होती.

यांच्या हस्ते गौरव

कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक श्रीकांत बडवे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट विवेक देशपांडे यांचा सत्कार भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्या हस्ते ‘खेलरत्न’ पुरस्काराने करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेविका मालती करंदीकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने विजया कुलकर्णी, वनिता पत्की, गीता आचार्य, अंजली गोरे, अनुराधा देशपांडे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यांच्याच हस्ते आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे यांना ‘खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मौलिक ते सार्वकालिक, तीन लेखकांचा संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुक्त शब्द मासिकातर्फे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत झालेल्या कार्यक्रमात रविवारी कवी-कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, कथाकार आसाराम लोमटे आणि सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय विश्लेषक राहुल कोसंबी यांनी संवाद साधला. सुरुवातीस मिलिंद जगताप यांनी सर्वांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
यावेळी रमेश इंगळे उत्रादकर यांनी, समाजाची, काळाची मूल्यात्मक मागणी पूर्ण करणारा लेखक समकालीन म्हणावा असे सांगत कार्यक्रमास सुरुवात केली. त्यावर संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा दाखला देत आसाराम लोमटे यांनी, जे मौलिक असते ते सार्वकालिक असते, असे सांगितले. एका बाजूला भूतकाळात रमण्याचे एखाद्या वर्गाला जितके स्वातंत्र्य मिळते दुसऱ्या बाजूला क्लेशदायक आणि दाहक वातावरण असताना आपल्यापुरत्या आनंदाची बेटंही निर्माण केली जातात. या वर्गाचे हितसंबंध ओळखून लेखकाने भूमिका घेतली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राहुल कोसंबी यांनी केले. मात्र, लेखकाने आपापल्या माध्यमातून भूमिका घेतली पाहिजे. तरी लेखकाने भूमिका घेण्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरले पाहिजे असे नाही. व्यवस्था गेंड्याच्या कातडीची आहे. पण आपल्या सर्जनाच्या माध्यमातून यावर व्यक्त झाले पाहिजे, असे मत रमेश इंगळे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिष्ठा भोसले यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, मुक्त शब्दचे येशू पाटील, प्रल्हाद लुलेकर, ऋषिकेश कांबळे, कवी श्रीधर नांदेडकर, रवी कोरडे, वीरा राठोड आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाचे वाद सकारात्मकपणे घ्यावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद हे ठरलेले असले. हे वाद सकारात्मकपणे घेतले पाहिजेत. या वादातून दुर्लक्षित विषय बाहेर येत असतात, असे मत अध्यक्षपदाचे उमेदवार राजन खान यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

बडोदा येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजन खान उमेदवार आहेत. भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘मी बडबड्या आहे. मनातील, डोक्यातील बोलता यावे आणि ते लोकांपर्यंत पोचावे यासाठी मी उभा आहे. साहित्य, वाचनसंस्कृती बदलत चालली आहे. संमेलन आणि वाद हे ठरलेले गणित मोडायचे आहे. निवडणूक बिनविरोध करायची, यात काही वाद नाही, पण समकालीन आणि समवयस्क उमेदवार उभे राहिल्याने बिनविरोध निवडणूक होणे कठीण आहे, पण भविष्यात त्यासाठी प्रयत्न करू. सध्या असलेल्या प्रवाहांत आपआपली भूमिका समजावून देण्यासाठी मतदारांशी संवाद साधतोय. मुळात संवादातून सर्वच प्रश्न सुटू शकतात, यावर आपला विश्वास आहे. हा संवाद संपत चालला आहे. घराघरांत, माणसामाणसांत, धर्मधर्मात जाती जातींत सर्वच पातळीवर संवाद संपत चालला आहे. हा संवाद साधण्यासाठी मनामनातील द्वेष राग काढण्यासाठी मी अध्यक्षपदासाठी उभा आहे.’

यावेळीही बुलडाणा येथील हिवराबाजार येथे संमेलन होताहोता राहिले. महाराजांवरून विविध वाद झाले, पण बडोदा हे नावही यानंतरच पुढे आले. यामुळे वाद झालेच पाहिजे, असे ते म्हणाले.

५४ पुरस्कार, २७ संमेलनांचा अध्यक्ष
आयुष्यात काही काळीशेती केली. रंगारी मजूर म्हणून काम केले. थोडा काळ शिक्षकी पेशाही केला. नंतर पत्रकार, संपादक, पुस्तक प्रकाशक अशाही भूमिका साकारल्या. भाषा आणि साहित्याचे काम करत आहे. माझ्या नावावर १९ कादंबऱ्या, १८ कथासंग्रह, सात लेखसंग्रह, दोन नाटके, सहा चित्रपटांच्या कथा प्रसिद्ध आहेत. मुलांसाठी थोडे लिहिले आहे. साहित्य, नाटक, चित्रपट या क्षेत्रांतील ५४ पुरस्कार मिळाले आहेत. विविध २७ संमेलनांचा अध्यक्षही राहिलो आहे. भविष्यातही सरहद संस्थेसह विविध उपक्रम घेण्याचा मनोदय राजन खान यांनी बोलून दाखवला.

महिलांनी पुढे यावे
अध्यक्षपदाची निवडणूक कायम पुरूषसत्ताक किंवा पुरूषकेंद्रीच राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदाची एकूण प्रक्रियाच किचकट आहे, पण महामंडळाने ठरवून दिल्याने ही प्रक्रिया स्वीकारली पाहिजे, अशी भूमिकाही खान यांनी मांडली. महिलांनी या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला पाहिजेत. निवडणूक लढवली पाहिजे. अनेक महिला आहेत त्या अध्यक्षपदासाठी आजही योग्य वाटतात, असे सांगून अरुणा ढेरे, रेखा बैजल याच्यासह काहींची नाव खान यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला‘विद्यार्थी दिवस’;शाळांत जय्यत तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शाळा, कनिष्ठ कॉलेजांमध्ये मंगळवारी (७ नोव्हेंबर) विद्यार्थी दिवस साजरा केला जाणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील राजवाडा चौक येथे शाळा प्रवेश घेतला होता. हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या या दिनाची अनेक शाळांनी तयारी केली आहे.
डॉ. आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन शैक्षणिक क्रांतीची चाहूल असल्याने हा दिन यंदापासून विद्यार्थी दिन म्हणून पाळण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शाळांमधून आदर्श विद्यार्थी घडणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण विद्यार्थ्यांमध्ये यावी या हेतुने हा दिवस साजरा केला जाणार आहे. या निर्णयानंतर मंगळवारी पहिल्यांदाच हा दिन साजरा होत आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळांना सूचना दिल्या असून शाळांनीही त्यानुसार तयार केली आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून हा दिन साजरा केला जाणार आहे. विद्यार्थी दिवस उपक्रमातंर्गत डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी उपक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील शाळांनी तयारी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’साठी पुन्हा ‘फिल्डिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी पत्रकारांसोबत बोलताना दिली. शहरातील १५ लाख नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी समांतर जलवाहिनीची योजना पूर्ण होणे गरजेचे असून तिचे काम २०१९पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार खैरे हे सोमवारी महापालिकेत आले असता महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर महापौरांच्या दालनातच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार खैरे म्हणाले, शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना मंजूर करून आणली असून ती राबवण्याची जबाबदारी महापालिकेची होती. पण, तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून योजनेचा करार रद्द केला. नगर विकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी समांतर जलवाहिनीच्या संदर्भात ६३ बैठका घेतल्या होत्या. योजनेचा करार रद्द झाल्याचे कळताच त्यांनी ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले होते. सेवानिवृत्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनीही करार रद्द व्हायला नको होता अशी भावना व्यक्त केली होती, असा दावा खासदारांनी केला. या पार्श्वभूमीवर योजना कार्यान्वीत करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, पक्षप्रमुख ठाकरे, पालकमंत्री कदम यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
खासदार खैरे यांनी शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात घेत असलेल्या परिश्रमाबद्दल महापौर घोडेले यांचे कौतुक केले. सफाई कर्मचाऱ्यांना शिस्त लागली, शहर स्वच्छ दिसत असल्याचे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महापालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजनांचा दैनंदिन अहवाल घेण्याच सूचना त्यांनी केली.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, विधानसभा संघटक व नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य आदी उपस्थित होते.

पक्षप्रमुखांना विचारून शपथपत्र

शहर विकास आराखड्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. या प्रकरणी विद्यमान महापौरांना शपथपत्र दाखल करावे लागणार आहे. त्याबद्दल विचारले असता, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून शपथपत्राबद्दल निर्णय घेतला जाईल, असे खासदार खैरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी प्रकरणी दुसऱ्या आरोपीला बेड्या

$
0
0

खंडणी प्रकरणी दुसऱ्या आरोपीला बेड्या
उद्योजक पगारिया यांना मागितली होती सात लाखांची खंडणी; दहा नोव्हेंबरपर्यंत कोठडी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
शहरातील उद्योजक राहुल पगारिया यांना पत्राद्वारे सात लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. दोन्ही आरोपींना कोर्टाने दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव सुरेश नरवडे असे आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शिवाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी रिक्षा चालकाने पगारिया शोरूमवर एका लिफाफ्यात पत्र दिले. या पत्राद्वारे सात लाखांची खंडणी मागण्यात आली होती. पैसे दिले नाही तर कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकारानंतर उद्योजक राहुल पगारिया यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना भेटून याबाबत माहिती दिली होती. यादव यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज तपासून रिक्षा चालकाला शोधून काढले. शेख चांद या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली होती. रिक्षा चालकासोबत एक व्यक्ती असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने दिली होती. शेख चांद याच्या चौकशीनंतर दुसरा आरोपी सुरेश नरवडे यालाही रविवारी (५ नोव्हेंबर) रात्री अटक करण्यात आली. या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने दोन्ही आरोपींना दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजकाला १६ लाखांचा ऑनलाइन गंडा

$
0
0

उद्योजकाला १६ लाखांचा ऑनलाइन गंडा
औरंगाबाद ः
ईमेल, ऑनलाइन व्यवहाराद्वारे उद्योजकाला १६ लाख रुपयांना गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भामट्याविरूद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
साईनाथ रंगनाथ आहेर यांची त्रिमूर्ती एटरप्रायजेस नावाची एमआयडीसी चिकलठाणा येथे कंपनी आहे. युनिटमध्ये इंण्डस्ट्रियल अ‍ॅण्ड अ‍ॉटोमोबाइल गॅसकेटचे उत्पादन केले जाते. यासाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेतून इंटरफेस परर्फामन्स मटेरियल्स २०१६, व्होलसन वेलॉनकास्टर पी ए १७६०३ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या कंपीकडून गरजेनुसार ते मागवितात. ५० टक्के रक्कम जमा केल्यानंतर कच्चा माल अमेरिकेहून भारतात जहाजामार्फत पाठविण्यात येतो. गेल्या दहा वर्षांपासून हा व्यवहार सुरू होता. २५ आणि २७ सप्टेंबरला कच्चा मालाची ऑर्डर त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना ५० टक्के रक्कम भरण्याचे सांगण्यात आले. आहेर यांनी पैसे भरून कंपनीच्या ईमेलवर सॉफ्ट कॉपी (पावती) पाठविली. मात्र, कंपनीकडून पैसे न मिळाल्याबाबत त्यांना सांगण्यात आले. ज्या बँकेतून पैसे पाठविले तिथे विचारपूस केल्यानंतर पैसे संबंधितांकडे जमा झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. १६ लाख २० हजार २५० रुपये त्यांनी ऑनलाइन व्यवहाराने पाठविले होते. यासंदर्भात सखोल चौकशी केल्यानंतर अमेरिकेतील कंपनीच्या नावाचा भामट्याने बनावट मेल आयडी तयार केल्याचे लक्षात आले. दहा ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आहेर यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयात शॉटसर्किटमुळे आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
जिल्हाधि‌कारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या नियोजन सभागृहाबाहेरील कमी दाबाच्या डिस्ट्रिब्युशन बॉक्सला सोमवारी दुपारी सव्वाच्या सुमारास आग लागली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत तत्काळ अग्निसुरक्षा नळकांड्या वापरून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाची लगबग सुरू असताना लागलेल्या या आगीमुळे कार्यालयाचा पहिला मजला धुराने भरून गेला. उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, कर्मचारी मीर जफर अली, राजेंद्र भगत यांनी नियोजन विभगाकडे धाव घेऊन फायर इस्टिंगविशरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. लोकशाही दिन नियोजन विभागाच्या सभागृहात घेण्यात येतो, मात्र आजचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या दालनात घेण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दुपारी सव्वाच्या सुमारास सभागृहाशेजारी दोन वेळेस मोठा आवाज झाला. लोकशाही दिनात उपस्थित असलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी, नेमके काय झाले आहे, हे पाहण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. कर्मचारी राजेंद्र भगत यांनी तत्काळ सभागृहाकडे धाव घेतली. सभागृहाला विद्युत पुरवठा करणाऱ्या ‌डिस्ट्रिब्युशन बॉक्सला आग लागल्याचे त्यांच लक्षात येताच ही माहिती संबंधितांना दिली. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाचा संपूर्ण वीजपुरवठा बंद करण्यात आला. आगीमुळे सभागृहासमोरचा भाग; तसेच प्रतीक्षालय धुराने भरून गेले. दरम्यानच्या काळात उपजिल्हाधिकारी कटके व सामान्य प्रशासन विभागातील मीर जफर अली यांनी (फायर इस्टिंगविशरच्या मदतीने सभागृहाकडे धाव घेतली. धुरातून वाट काढत त्यांनी काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळवले. लोकशाही दिनासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी परि‌स्थितीचे गांभीर्य ओळखून प्रतीक्षालय परिसरात असलेल्या नागरिकांना पहिल्या मजल्यावरून हलवले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविल्यावर १५ मिनिटांमध्ये पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र तो पर्यंत कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवले होते.

मोठा अनर्थ टळला
आगीची माहिती मिळताच तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. डिस्ट्रिब्युशन बॉक्समधून सभागृहाला वीजपुरवठा करण्यात येत असल्याने बॉक्समधून संपूर्ण वायरिंग सभागृहामध्ये गेलेली आहे. संपूर्ण सभागृह साउंड प्रुफ असल्यामुळे येथील भिंतीवर मोठ्याप्रमाणवर फ्लायवूड लावण्यात आलेले आहे. कर्मचारी तेथे उशिरा पोचले असते, तर केवळ अग्निसुरक्षा नळकांड्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले असते.

सभागृहाकडे जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग
नियोजन विभागाच्या सभागृहात जाण्या-येण्यासाठी एकच मार्ग आहे. मंत्री, सचिव व अन्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या बैठका याच सभागृहात घेण्यात येतात. त्यावेळी सभागृहात मोठी गर्दी असते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सभागृहातून बाहेर जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. या सभागृहाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केलेला आहे, मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.

फायर इस्टिंगविशर कालबाह्य
जिल्हाधिकारी कार्यालयात एक जुलै २०१२मध्ये ५९ फायर इस्टिं‌गविशर लावण्यात आले होते. सिलिंडर रिफिलिंगची मुदत जुलै २०१७मध्येच होऊन गेली आहे. शिवाय इमारतीचे फायर ऑडिटही झाले नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने महापालिकेला पत्रव्यवहारही केला आहे, मात्र यावर पुढील कोणतीही कारवाई झाली नाही.

दुपारी लोकशाही दिन सुरू असताना नियोजन विभागाच्या इलेक्ट्रिक डिस्ट्रिब्युशन बॉक्सला आग लागली. प्रसंगावधान राखून कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. शॉर्टसर्किट होण्यापूर्वी वीज ट्रीप होणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे, मात्र ही यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही हे तपासावे लागेल. यासंदर्भात मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.
- देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ निवडणुकीत बिनविरोध तडजोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध जिंकले. प्रतिस्पर्धी विद्यापीठ विकास मंचला एका जागेवर बिनविरोध विजय मिळाला. विद्या परिषदेत विजयी झालेले डॉ. रमेश मंझा आपलेच उमेदवार असल्याचा दावा दोन्ही पॅनलने केला. शेवटच्या दिवशी तडजोड करून दोन्ही पॅनलने एक-एक उमेदवार बिनविरोध विजयी केल्याची चर्चा रंगली. तीन पॅनलमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी (६ नोव्हेंबर) होता. या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी आणि पदवीधर गणाची उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी झाली. विद्यापीठ उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच व बामुक्टो या तीन पॅनलमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. संस्थाचालक गणातून ‘उत्कर्ष’च्या मनीषा टोपे आणि प्राचार्य गणात विद्यापीठ विकास मंचाचे डॉ. रामचंद्र इप्पर बिनविरोध विजयी झाले. महिला प्राचार्य गणात ‘उत्कर्ष’ पॅनलच्या डॉ. प्राप्ती देशमुख बिनविरोध विजयी ठरल्या. टोपे आणि देशमुख यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यापीठ विकास मंचाच्या डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी ऐनवेळी माघार घेतली. तर प्राचार्य गणातील डॉ. इप्पर यांचे प्रतिस्पर्धी ‘उत्कर्ष’चे डॉ. वसंत सानप यांनी माघार घेतली. अर्ज मागे घेण्यासाठी दहा मिनिट उरलेले असताना ‘तडजोड’ झाल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे. मनीषा टोपे या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या पत्नी आहेत. चुरशीने लढणारे पॅनल मतदानापूर्वीच तडजोडी करीत असल्याने काही प्राध्यापकांनी जोरदार टीका केली. ‘उत्कर्ष’चे संस्थाचालक अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवार राहुल म्हस्के आणि प्राचार्य अनूसुचित प्रवर्गाचे डॉ. शिवदत्त शिरसाठ यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. आतापर्यंत ‘उत्कर्ष’ने चार जागा जिंकल्या आहेत.
प्राध्यापकांच्या हितासाठी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर करीत ‘बामुक्टो’ने पॅनल जाहीर केले. अधिसभा व अकॅडमिक कौन्सिल निवडणुकीसाठी एआयफुक्टो, एमफुक्टो संलग्नित बामुक्टोचे अधिकृत सिनेट पॅनल जाहीर केले. डॉ. बप्पासाहेब मस्के, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, डॉ. शरफोद्दीन शेख, डॉ. संजय कांबळे, डॉ. दिलीप बिरूटे, डॉ. कारभारी भानुसे आणि डॉ. जयश्री पाटील यांचा सिनेट पॅनलमध्ये समावेश आहे. अॅकॅडमिक कौन्सिल पॅनलचे डॉ. विक्रम खिलारे व डॉ. दिलीप बिरुटे उमेदवार आहेत. विद्यापीठ विकास मंच ताकदीनिशी निवडणूक लढवत आहे. या पॅनलच्या अध्यापक गणात डॉ. अशोक कोर्डे, डॉ. भगवान डोभाळ, डॉ. मोहम्मद सिद्दीकी, डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. कालिदास भांगे, डॉ. सूर्यकांत (बापूराव) धोंडे, डॉ. महानंदा दळवी, डॉ. गोविंद काळे उमेदवार आहेत. विद्या परिषद गणात डॉ. दया पाटील, डॉ. जितेंद्र अहिरराव, डॉ. किशोर साळवे, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. विक्रम दहीफळे, डॉ. किसन लोहार उमेदवार आहेत.
विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यासाठी एक दिवसांचा अवधी घेतला आहे. पॅनलचे डॉ. राजेश करपे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. अंकुश कदम, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. सर्फराज पठाण, डॉ. सदाशिव सरकटे संभाव्य उमेदवार आहेत.

मंझा कुणाचे ?

विद्या परिषदेत बिनविरोध विजयी झालेले डॉ. रमेश मंझा आपलेच उमेदवार असल्याचा दावा उत्कर्ष व विकास मंच या दोन्ही पॅनलने केला. मात्र, मंझा कोणत्या गटाचे ते स्पष्ट झाले नाही. निवडणूक निकाल लागल्यानंतर बऱ्याच राजकीय तडजोडी होण्याची शक्यता आहे. विद्यापीठावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तीन पॅनल चुरशीने लढत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमएसएम कॉलेजच्या प्राध्यापकांचे वेतन थकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा सांस्कृतिक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकलेले आहे. दिवाळी सणही त्यांना वेतनाविना साजरा करावा लागला.
महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन देण्याबाबत लेखी निवेदन मंडळाच्या अध्यक्षांना दिले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीन महिन्यांचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची खूप आर्थिक अडचण झाली आहे. या संदर्भात आपल्याला लेखी अर्ज करूनही वेतन दिले नाही. तसेच अॅडव्हान्सही दिले गेले नाही. या धोरणामुळे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन थकीत वेतन तातडीने देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर डॉ. आर. के. बडवणे, एम. एस. राठोड, एम. एस. जोशी, के. पी. तादलापूरकर, आर. व्ही. सिद्दिकी, एम. एम. पवार, एम. एम. राठोड, एस. एम. कोटे, अब्दुल वहीद, ए. एस. गिरी, एस. एस. कुलकर्णी, पी. डी. मुंडे, पी. टी. चौधरी, पी. बी. बनसोड, एम. एम. खरात, शेख मोहसीन, पी. एम. बहादुरे, सी. आर. पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकुने भोसकले; ७ वर्षे सक्तमजुरी

$
0
0

चाकुने भोसकले; ७ वर्षे सक्तमजुरी
दोन तरुण विद्यार्थी झाले होते गंभीर जखमी; ‘मौलाना आझाद’मधील अडीच वर्षांपूर्वीचा प्रकार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
धक्का लागला म्हणून चाकुने दोन विद्यार्थ्यांना भोसकणाऱ्या आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी (५ नोव्हेंबर) ठोठावली. हा प्रकार २७ मार्च २०१५ रोजी मौलाना आझाद कॉलेजमध्ये घडला होता.
या प्रकरणी मोहम्मह जोहेब मोहम्मद हनीफ (२२, रा. मोतीकारंजा, नवाबपुरा, औरंगाबाद) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २७ मार्च २०१५ रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी हा मौलाना आझाद कॉलेजमधील वर्गात जाण्यासाठी जिन्यातून वरच्या मजल्यावर जाताना आरोपी अरबाज उर्फ गुड्डू गनी देशमुख (२५, रा. लेबर कॉलनी, औरंगाबाद) यास वरून खाली येताना फिर्यादीचा धक्का लागला. त्यामुळे संतप्त आरोपीने शिवीगाळ करीत कमरेला लावलेल्या चाकुने फिर्यादीच्या पाठीवर वार केला. त्यावेळी फिर्यादीचा मित्र आदिल आवत चाऊस (२२) भांडण सोडवण्यासाठी आला असता आरोपीने आदिलच्या पोटात चाकू खुपसला व तो पळून गेला. आरोपीने चाकुवरील रक्ताचे डाग नष्ट केले होते. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. ए. उदार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
फिर्यादी फितूर, तरी साक्ष-पुरावे भक्कम
खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी एकूण १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये गंभीर जखमी झालेला फिर्यादीचा मित्र आदिल, कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकदुम फारुखी व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दरम्यान, फिर्यादी फितूर झाला. तरीदेखील दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला कलम ३०७ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष कारावास, तर कलम ५०४ अन्वये सहा महिने सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली.

आरोपीवर १४ गुन्हे दाखल
या प्रकरणातील आरोपी अरबाज याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी हा कुख्यात असल्याचे सुनावणीवेळी कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. दरम्यान, फिर्यादीचा मित्र आदिल याने अलीकडेच आत्महत्या केली. याबाबत कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर कोर्टाने आदिलच्या वडिलांकडे नुकसान भरपाई सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images