Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जातीय तेढ वाढवण्याचे उद्योग

0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून संधी दिली. मात्र, त्यांच्या तीन वर्षांच्या काळात जातीय तेढ वाढवण्याचे उद्योग झाले. देश घडवण्यापेक्षा देशाला तोडण्याचे काम मोदी सरकार आणि त्यांच्या अनुयायांकडून झाले आहे, असा आरोप विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी केला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत सोमवारी माजी खासदार गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कन्हैया कुमार यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. कन्हैया कुमार म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळवण्यापूर्वी जनतेला अनेक आश्वासने दिली. मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयावरही त्यांनी यावेळी टीकेची झोड उठवली. सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’चे स्वप्ने दाखवले. मात्र, तीन वर्षानंतर ही सामान्य माणसाच्या आयुष्यात ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत. आपल्या भाषणातून नवे-नवे जुमले सांगणारे मोदी जुमलेबाज पंतप्रधान म्हणून ओळखले जात आहेत. मात्र, तीन वर्षे उलटून गेल्यावर जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर सरकारला पडला आहे. नरेंद्र मोदी सरकारने एकही आश्वासन पूर्ण न केल्याने सामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे.’
गाजावाजा करीत सरकारने एक वर्षांपूर्वी नोटबंदी केली. मात्र, त्याचा उद्देश फसला आहे. जीएसटीने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत सत्तेत आलेल्या सरकारने सत्ता मिळाल्यावर भाजपचा विकास केला. आज देशात जाती व्यवस्था बिघडवली जात आहे. माणसाला माणूस म्हणून नाही तर जातीवादी, धर्मवादी म्हणून पाहिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या देशाचे संविधान बदलण्याचे षडयंत्र भाजप सरकारमधील लोक करीत आहेत. जात, धर्म, प्रदेश या पुढे करून माणसा-माणसांत फूट पाडण्याचे काम हे लोक करीत आहेत. ज्या लोकांनी मोठ्या आशेने देश घडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिले. त्यांना या जाती धर्माच्या नावाने तोडू नका अशी टीका त्यांनी यावेळी केली. महागाई, पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडरची दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवक, महिलांची सुरक्षा, समाजातील दारिद्र्य या समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठी सरकार जातीय तेढ निर्माण करीत आहे. सरकारच्या या जातीयवादी धोरणाविरोधात चळवळ उभा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ही कन्हैयाकुमार यांनी केले. या सभेचे प्रास्तविक अजय बुरांडे यांनी केले.

‘सरकार शेतकरी विरोधी’
राज्यातील देशातील शेतकरी आत्महत्या करतो आहे. त्याच्या मालाला सरकार भाव देऊ शकत नाही. एकीकडे विजय माल्या देशातील बँकाला अडचणीत आणून दिवसाढवळ्या देशाबाहेर निघून जातो आणि दुसरीकडे शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज माफ होत नाही, हे या सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आहे असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पडेगावच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात छळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पडेगाव येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्रात प्रभारी प्राचार्या थोरात यांच्याकडून मानसिक छळ व आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार करीत विद्यार्थिनींनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात सोमवारी (६ नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजेपासून ठिय्या मांडला होता. दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी पालकांच्या तक्रारी ऐकून घेत प्रभारी प्राचार्यांचा पदभार काढून घेत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.
प्रथम वर्षाच्या २० विद्यार्थिनींना चार महिन्यांपासून म्हणजेच प्रवेश घेतल्यापासून पडेगावच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात प्रभारी प्राचार्या थोरात यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्रास असह्य झालेल्या विद्यार्थिनींनी सकाळी सर्व्हेसाठी बाहेर पडल्यावर पालकांना बोलावून थेट उपसंचालकांचे कार्यालय गाठले. उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड हे परभणी दौऱ्यावर असल्याने डॉ. सुनीता गोलाईत यांनी निवेदन स्वीकारले. मात्र प्रभारी प्रचार्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका विद्यार्थिनींनी घेतल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांनी या विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पालकांशी संवाद साधून थोरात यांचा पदभार काढून जाधव यांच्याकडे सुपूर्द केला आणि विद्यार्थिनींना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या सुट्यानंतर शाळा ,कॉलेज सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीतील वीस दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून मराठी शाळांना सुरुवात झाली. दिवाळीच्या सुटीतील आनंद, लाडू, चिवडा अशा फराळाचा आस्वादानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये त्याचीच चर्चा होती. दिवाळीतील सुट्यांचा आनंद त्यांनी एकमेकांना ऐकवला.
यंदा दिवाळी सुट्याचे नियोजन पंधरा दिवसांचे करण्यात येऊन १६ ऑक्टोबरपासून शाळांना सुट्या लागल्या. त्यात यंदा दोन सुट्यांची भर पडली. वीस दिवसांच्या सुट्यानंतर शहरातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी ७० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची हजेरी लावली. सुट्यांमधील आनंद, मामाच्या गावाकडे केलेली सहल, फराळ अशा विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा रंगली. पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये पहिली तासिका सुट्यातील गप्पांवरच रंगल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

शिक्षक ऑनलाइनमध्ये व्यस्त

यंदा शाळांमध्ये सुट्यांमध्ये दहावीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासह शाळांची ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया, शाळा सिद्धी, शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियामध्ये मुख्याध्यापक, अनेक शिक्षक व्यस्त आहेत. त्यातच या आठवड्यामध्ये पायाभूत चाचणी, शिष्यवृत्ती परीक्षांचीही प्रक्रिया असल्याने शिक्षकांवर कामाचा बोजा आहे.

कॉलेजांचेही सत्र सुरू..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत असलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमधील दुसऱ्या सत्राला सोमवारपासून सुरुवात झाली. औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद अशा चार जिल्ह्यात ४२७ कॉलेजांमध्ये वर्ग सुरू झाले. दहा दिवसांवर सत्र परीक्षा आल्याने पहिल्या दिवशी शहरातील कॉलेजांमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती.

शहरातील शाळा……. ८६१
शहरातील एकूण विद्यार्थी … ३२४९९३
जिल्ह्यातील शाळा…..४०२७
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी… ९७३०५३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या निविदेला मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात दीडशे कोटी रुपये खर्चून केल्या जाणाऱ्या ५२ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख सात नोव्हेंबर होती, ती आता १६ नोव्हेंबर करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय घेतला असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. सर्व रस्त्यांची कामे इंडिया रोड काँग्रेसच्या निकषांनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे केले जातील, असा दावा त्यांनी केला.

शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. अनुदानाची रक्कम रस्ते विकासाच्या कामासाठीच खर्च करण्याचे पालिकेने ठरविले आहे. याशिवाय ५० कोटींचे रस्ते डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. दीडशे कोटींमधून ५२ रस्त्यांची कामे व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून येत्या काळात केली जाणार आहेत. रस्त्यांच्या कामासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागविल्या. निविदा भरण्याची अंतिम तारीख सात नोव्हेंबर ठेवण्यात आली होती, पण त्यात तांत्रिक कारणांमुळे १६ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आल्याचे महापौर म्हणाले. सर्व रस्त्यांची कामे इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसारच केली जातील, त्यात तडजोड केली जाणार नाही असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओव्हरलोड वाहनांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या वायुवेग पथकाने गेल्या दोन दिवसांत रस्‍त्यावरून वाहतूक करणाऱ्या २० ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली. रनिंग स्टॉप मोहिमेत केलेल्या या कारवाईत अवजड वाहने जप्त करून आरटीओ कार्यालयात जमा करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केल्याप्रकरणी यातील अनेक वाहनांना दंड आकारून सोमवारी सोडून देण्यात आले.

न्यायलयाने क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाप्रमाणे औरंगाबाद आरटीओ कार्यालयाच्या दोन्ही वायुवेग पथकांना स्टॉप रनिंग मोहिमेत कारवाई सुरू केली होती. शनिवार आणि रविवार वगळता ही कारवाई सुरू आहे. मोटार वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ, विनोद चौधरी, अंजली पातारे यांच्या वायुवेग पथकाने ही कारवाई केली. या पथकाने दोन दिवसांत २०पेक्षा अधिक अवजड वाहनांवर कारवाई केली. काही वाहने सुरक्षित ठिकाणी अडवणूक करून थांबविण्यात आली होती, तर काही दोषी वाहने औरंगाबाद आरटीओ कार्यालयात लावण्यात आली होती. त्यात जीजे १८ एयू ७२००, आरजे १४ जीए ७५७७, एमएच ४६ एबी ०५९१ , टीएस १० एयू ६२५९, एमएच ४६ एआर १७५८, एमएच ४६ एआर १७६६ या वाहनांचा समावेश आहे. यातील काही वाहनधारकांनी सोमवारी दुपारपर्यंत दंड भरला व वाहने ताब्यात घेतली.

वाहनधारकांना त्रास
विशेष कारवाईदरम्यान अवजय ट्रक आणि कंटेनर आरटीओ कार्यालयात लावण्यात आले. त्यामुळे कार्यालयात आलेल्या वाहनधारकांना नसता त्रास सहन करावा लागला.

असे आहेत आदेश
ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करताना संबंधित अधिकाऱ्यांनी जड वाहनांमधील अतिरिक्त माल काढून दुसऱ्या ट्रकमधून पुढे पाठ‌वावा, असा आदेश परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. या वाहनांमध्ये कंपनीचा सिल केलेले सामान असल्याने या वाहनांवर दंडाची कारवाई करून सोडण्यात आले, अशी माहिती आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटक एका घटनेत उलगडा दुसऱ्याच प्रकरणाचा

0
0

अटक एका घटनेत उलगडा दुसऱ्याच प्रकरणाचा
दोन संशयित ताब्यात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
मोंढा परिसरात एका व्यापाऱ्याची बॅग हिसकावून पळविल्याच्या घटनेत सशंयित म्हणून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी गजानन महाराज मंदिर रोडवर मोबाइल आणि पर्स हिसकाविल्याचीही कबुली दिली.
शेख मुब्बशीर शेख शब्बीर (२०) रा. शरीफ कॉलनी, सलमान खान इरफान खान (२२) रा. नवाबपूरा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या हातातून तीन जणांनी मोबाइल आणि पर्स चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल होती. दुसऱ्या एका या घटनेत मोंढ्यामध्ये व्यापाऱ्याच्या हातातून एक लाख रुपयांची बॅग पळविण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. रविवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेख मुब्बशीर याला ताब्यात घेतले. यानंतर सलमान खान यालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील तिसरा आरोपी शेख शहेबाज याला लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले. मोंढ्याच्या घटनेत या आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी दुसऱ्या घटनेतील चोरीचीही कबुली दिली.
आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक नसीम खान, सुरेश काळवणे, प्रदीप शिंदे, रितेश जाधव, संदीप बिडकर, नानासाहेब फुंदे, महिला पोलिस कर्मचारी शेख सुल्ताना यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियातील अनोळखींपासून राहा चार हात लांब

0
0

सोशल मीडियातील अनोळखींपासून राहा चार हात लांब
दहा महिन्यांत १४६ सायबर गुन्हे दाखल
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
‘आपल्याला लॉटरी लागलेली आहे’, असे मेसेज पाठवून गंडा घालणाऱ्या नायजेरियन गुन्हेगारांनी आता महिला तसेच एकांतवासात जगणाऱ्या पुरुषांना विवाह किंवा फ्रेंडशीपद्वारे गंडा घालण्याचे प्रकार सुरू केले आहेत. दहा महिन्यांत १४६ सायबर गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये अनोळखी व्यक्तींकडून अशाप्रकारे गंडविल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
औरंगाबाद शहर पोलिस विभागातील सायबर सेल विभागात आलेल्या तक्रारींमध्ये अनेक तक्रारी मोबाइलवरून एटीएम ब्लॉक झाल्याचे सांगून ओटीपींच्या आधारे ऑनलाइन गंडा घालणे अशा स्वरुपाच्या आहेत. याशिवाय नोकरी देण्याच्या नावाखाली संबंधीतांकडून पैसे उकळण्याच्या गुन्ह्यांचीही संख्या मोठी आहे. सायबर सेलमध्ये मागील दहा महिन्यात ९५ गुन्हे औरंगाबाद शहरात दाखल करण्यात आले आहेत. यात पन्नासहून अधिक गुन्हे टेलीफिशिंगचे असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय वेबसाइट हॅक करून आवश्यक माहिती घेण्याचे १५ गुन्हे उघडकीस आले.

यामध्ये काही प्रकरणे ही नायजेरियन फ्रॉडची आहेत. या नायजेरियन फ्रॉडमध्ये पूर्वी लॉटरी लागली किंवा बक्षिसाचे अामिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात होती. आता महिला ‌किंवा पुरुषांचे सोशल मीडिया वरून फोटो काढून त्याद्वारे मॅरेज किंवा फ्रेंडशीप साईटवरून मैत्री करण्यात येत आहे. यानंतर कालातरांने विविध कारणे दाखवून या महिला किंवा पुरुषांकडून पैसे वसूल केले जात आहेत. अशा प्रकरणात बदनामी होईल या भीतीने अनेकजण गुन्हा दाखल करीत नाहीत. यामुळे असे प्रकार अधिक वाढण्याचा धोका असल्याची माहिती सायबर सेलच्या सूत्रांनी दिली.


आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सतर्क राहणे आवश्यक आहे. दहा महिन्यांत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांचा शोध लावण्यात यश आले आहे. मात्र, नागरिकांनी ऑनलाइन साइटवर कोणतेही व्यवहार किंवा कोणतीही माहिती घेताना किंवा देताना समोरील व्यक्ती योग्य आहे अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. फसवणूक होत असल्याची थोडी जरी कल्पना आल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.
गजानन कल्याणकर
सहाय्यक पोलिस निरिक्षक, सायबर सेल, औरंगाबाद
आधार लिंकमुळे होईल फायदा
मोबाइल कार्डसाठी आता आधार लिंक केले जात आहे. याशिवाय बँकेच्या अकाऊंटलाही आधार लिंक होत असल्याने आगामी काळात ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या अकाऊंटला लिंक असलेल्या आधार कार्डनंबरवरून तपास अधिक सोपा होणार असल्याची माहिती सायबर सेलच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी अर्थशास्त्र परिषदेवर डॉ. तेगमपुरे यांची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या कार्यकारी मंडळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. मारोती तेगमपुरे यांची बहुमताने निवड करण्यात आली. फैजपूर (जि. जळगाव) येथे झालेल्या ४१व्या राष्ट्रीय अधिवेशनात ही निवडणूक झाली.
अर्थशास्त्र परिषदेचे फैजपूर येथे तीन ते पाच नोव्हेंबर यादरम्यान राष्ट्रीय अधिवेशन झाले. परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या प्रतिनिधीसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. तेगमपुरे यांना १९८पैकी ११९ मते, तर डॉ. दिलीप मिसाळ यांना ७४ मते मिळाली. पाच मते बाद ठरली. निवडणूक अधिकारी म्हणून पुणे विद्यापीठातील डॉ. मोहन चौधरी यांनी काम पाहिले. या विजयामुळे डॉ. तेगमपुरे यांचे अभिनंदन होत आहे. डॉ. आर. एस. सोळुंके, डॉ. बी. एस. म्हस्के, प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, डॉ. सुभाष पवार, बाबासाहेब पवार, डॉ. उल्हास उढाण, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. जीवन सोळुंके, डॉ. माधव शिंदे, डॉ. सुरेश घुमटकर यांचा डॉ. तेगमपुरे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
डॉ. तेगमपुरे अंबड येथील गोदावरी वरिष्ठ कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबर त्यांचे ४२ शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. त्यांनी ७६ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांतून निबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थी संशोधन करीत आहेत. एमफुक्टो, बामुक्टो या संघटनांचे ते पदाधिकारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दम भरताच वाढल्या २० हजार मालमत्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘तुम्हाला तीन महिन्यांचा वेळ देतो. काळ्याचे पांढरे काय करायचे ते करा, पण मालमत्तांचे सर्वेक्षण करून महापालिकेच्या रेकॉर्डवरच्या मालमत्ता वाढवा. तीन महिन्यांत हे काम झाले नाही, तर कारवाईसाठी तयार करा, असा दम अधिकाऱ्यांना भरला आणि तीन महिन्यात रेकॉर्डवरच्या मालमत्तांची संख्या २० हजारांनी वाढली,’ असा अनुभव अमरावती महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितला.

अमरावती महापालिकेचे महापौर संजय नरवणे, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय व आयुक्त हेमंत पवार औरंगाबाद महापालिकेला भेट देण्यासाठी आले होते. घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात या सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. घोडेले यांनी मालमत्ता कर वसुलीचा विषय काढला. अमरावती महापालिकेत काय स्थिती आहे, असे विचारले असता, सभापती भारतीय म्हणाले, ‘आमच्या महापालिकेतही मालमत्ता कराची वसुली जेमतेम होती. आम्ही पदभार घेतल्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना निर्वाणीचा इशाराच दिला. महापालिकेच्या रेकॉर्डवरच्या मालमत्तांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला तीन महिन्यांचा अवधी देतो. या काळात काळ्याचे पांढरे काय करायचे ते करा आणि मालमत्तांची संख्या वाढवून दाखवा. तीन महिन्यांत हे काम झाले नाही, तर कारवाईसाठी तयार रहा, असे स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सांगितले. या इशाऱ्यामुळे अधिकारी झपाटल्यासारखे कामाला लागले आणि तीन महिन्यांत पालिकेच्या रेकॉर्डवर २० हजार मालमत्ता वाढल्या.’

घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात औरंगाबाद महापालिका करीत असलेल्या कामाची नरवणे, भारतीय व पवार यांनी स्तुती केली. घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात औरंगाबाद महापालिकेचे काम योग्य प्रकारे सुरू आहे, असे नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांनी सांगितले होते. त्यामुळे मुद्दाम आम्ही हे काम पाहण्यासाठी आलो, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, माजी महापौर भगवान घडमोडे, विरोधी पक्षनेते फेरोज खान, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंह, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘कठोर निर्णय घ्या’
काही कठोर निर्णय घेतल्याशिवाय कामांना गती येत नाही, असा आमचा अनुभव आहे. तुम्हीपण कठोर निर्णय घ्या, अशी सूचना अमरावती महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय यांनी महापौर घोडेले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टुरिस्ट मेगासर्किटचे २१ कोटी अडकले

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर व परिसरातील पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने आखलेल्या टुरिस्ट मेगासर्किट योजनेतील सुमारे २१ कोटी रुपये दोन वर्षांपासून न मिळाल्यामुळे सौंदर्यीकरण कामाला ग्रहण लागले आहे. मध्यवर्ती बसस्थानक ते भडकलगेटपर्यंतच्या रस्ता दुभाजकाच्या कामाशिवाय या योजनेतून दुसरे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही कामे होणार की नाही, या बद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

राज्यसरकारने औरंगाबाद जिल्ह्याची घोषणा पर्यटनाची राजधानी अशी केल्यानंतर जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांच्या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने टुरिस्ट मेगासर्किटची योजना आखली. त्यासाठी स्वतंत्रपणे २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. या तरतुदीतून शहरातील बीबी - का - मकबरा, पानचक्की परिसराचे सौंदर्यीकरण, औरंगाबाद लेणी परिसरात विकास कामे, मध्यवर्ती बसस्थानक ते भडकलगेट, भडकलगेट ते पानचक्की आणि मकबरापर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुभाजकांचे सुशोभीकरण, दौलताबाद किल्ल्याच्या समोरील परिसराचे सौंदर्यीकरण अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.

‘दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या या योजनेसाठी शासनाने २४ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी आतापर्यंत फक्त तीन कोटी रुपयेच देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या योजनेचे २१ कोटी रुपये येणे बाकी आहेत. मिळालेल्या तीन कोटी रुपयांमधून मध्यवर्ती बसस्थानक ते भडकलगेटपर्यंतच्या रस्त्याच्या दुभाजकाचे काम करण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण दगड वापरून दुभाजकाचे बांधकाम करण्यात आले आहे. दुभाजकांच्या बांधकामामुळे या व्हीआयपी रस्त्याचा लुक पूर्णपणे बदलला आहे.

जिल्ह्यातील कामेही तुंबली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुभाजकाच्या कामाशिवाय टुरिस्ट मेगासर्किटमधील अन्य कोणत्याही कामाची सुरुवात झालेली नाही. मेगासर्किटसाठीचा शासनाने मंजूर केलेला निधी जिल्हा प्रशासनाकडून महापालिका व अन्य संबंधित कार्यालयांना मिळणे अपेक्षित आहे. शहरातील सौंदर्यीकरणाची कामे महापालिकेच्या माध्यमातून, तर शहराच्या बाहेरची कामे एमटीडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. निधी रखडल्यामुळे दोन वर्षांपासून ही कामे देखील रखडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कचरा व्यवस्थापन’ला फिलिपिन्समध्ये सुवर्णपदक

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला असताना नाथ व्हॅली हायस्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या विस्मय तोतला व आर्य मिटकरी या विद्यार्थ्यांनी याच विषयावर तयार केलेल्या मॉडेलला फिलिपिन्स देशात सुवर्णपदकाने गौरवण्यात आले.

‘मटा’ कार्यालयात विस्मय व आर्य यांनी हे मॉडेल आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीविषयी सविस्तर माहिती दिली. ‘आम्ही शाळेत जाताना सातारा परिसरात आम्हाला नेहमी खूप कचरा दिसायचा. त्याचा त्रास नागरिकांना, पाळीव प्राण्यांना किती होत असेल हा प्रश्न सतत भेडसावत असे. त्यामुळे आम्ही प्रयोगासाठी हा विषय निवडला. गेल्यावर्षी आम्ही हे मॉडेल विज्ञान प्रदर्शनात सादर केले. तेव्हा या प्रयोगाची वाहवा झाली. क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या (क्यूसीएफआय) परिषदेत सादरीकरणाची संधी मिळाली. त्यानंतर रायपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आमच्या मॉडेलने ‘पार एक्सलंस’ अॅवॉर्ड पटाकावले. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचे मॉडेल आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले. या प्रवासात संजय वैद्य यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. हे मॉडेल तयार करताना आम्ही लाकडाचा उपयोग करून तीन मजली छोटेसे अपार्टमेंट तयार केले. पाइप, सेन्सर व व्हॅक्युम क्लिनरचा वापर करून ओला व सुका कचरा वेगवेगळा केला. याचा वापर प्रामुख्याने नव्याने तयार होणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये प्रभावीपणे होऊ शकतो. अपार्टमेंटमधील प्रत्येक घरातून पाइपव्दारे कचरा तळमजल्यावरील दोन कंटेनरमध्ये गोळा होईल. या मॉडेलमधून ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती सहजपणे करता येते. सुक्या कचऱ्याचे रिसायकलिंग होतो. हे मॉडेल उभारण्याकरिता पाइप, सेन्सर व व्हॅक्युम क्लिनर हे तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यासाठी फारसा खर्च येत नाही. हा खर्च एकदाच करावा लागेल, परंतु त्याचा मोठा फायदा प्रत्येकाला होतो असे आम्ही प्रयोगातून सादर केले आणि त्यामुळेच या प्रयोगाला सुवर्णपदक मिळाले,’ असे त्यांनी सांगितले. फिलिपिन्स येथील मनीला येथे झालेल्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन क्वॉलिटी कंट्रोल सर्कल्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १३ देशांच्या एकूण ५०० संघांनी सहभाग घेतला होता. त्यात आर्य व विस्मय हे सर्वात कमी वयाचे स्पर्धक होते.

‘पार्किंग’वर प्रकल्प
विस्मय व आर्य यांनी आता पार्किंग हा विषय हाती घेतला आहे. त्यांनी तयार केलेल्या मॉडेलची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. म्हैसूर येथे ३० नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. औरंगाबाद शहरात विविध भागात नेहमीच पार्किंगचा विषय चर्चेत राहतो. त्यामुळेच आम्ही हा विषय निवडला, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेंटल’च्या ४० लाखांच्या निधीला कात्री

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला ‘डीपीसी’तून मंजूर झालेल्या निधीतून २० टक्के कपात झाली असून, त्यामुळे यंदा तब्बल ४० लाखांच्या निधीला कात्री लागणार आहे. परिणामी, अनेक महत्वपूर्ण व जीवनदायी उपकरणांपासून ‘शासकीय दंत’ वंचित राहणार आहे. २० टक्के निधीची कपात नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे शासनाने स्पष्ट केले नसले तरी दुसऱ्या शासकीय योजनेत हा निधी वर्ग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मराठवाड्यातील एकमेव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये पदवीसह विविध विषयातील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याचवेळी यंदा काही नवीन विषयात पीजी व फेलोशिप अभ्यासक्रम पहिल्यांदाच सुरू होणार आहेत, तर कृत्रिमदंतशास्त्र या विषयामध्ये ‘एमडीएस’च्या ३ जागा आता ६ होणार आहेत. त्यामुळेच नवनवीन अभ्यासक्रमांच्या पार्श्वभूमीवर व ‘डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (डीसीआय) मानकांनुसार महाविद्यालयामध्ये त्या तुलनेत पायाभूत सोयी-सुविधाही आवश्यक ठरतात. हे लक्षात घेऊन जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीसी) दोन कोटींच्या मंजूर निधीतून महत्वपूर्ण उपकरणांच्या खरेदीसाठी प्रयत्न सुरू असतानाच, एकूण दोन कोटींच्या निधीतील २० टक्के म्हणजेच ४० लाखांच्या निधीला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ‘शासकीय दंत’ला एक कोटी ६० लाख रुपये इतका निधी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी, ४० लाखांच्या उपकरणांच्या खरेदीला कात्री लागणार आहे.

जीवनदायी उपकरणांना फटका
यंदाच्या ‘डीपीसी’च्या दोन कोटींच्या मंजूर निधीतून शस्त्रक्रियेदरम्यान लागणाऱ्या महत्वपूर्ण व जीवनदायी उपकरणांची खरेदी अपेक्षित होती. या अपेक्षित उपकरणांमध्ये भूल देण्यासाठीचे १८ लाखांचे अनेस्थेशिया वर्क स्टेशन, हृदयक्रिया बंद झाल्यास तातडीने लागणारे १९ लाख ५० हजारांचे बायोडिफ्रिबिलिटर, २४ लाखांचे ओटी बेड, कृत्रिम श्वसनासाठीचे लागणारे १७ लाखांचे व्हेंटिलेटर आदींचा समावेश आहे. ४० लाखांच्या निधीला कात्री लागल्यामुळे यातील किती उपकरणांना कात्री लागणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या उपकरणांना कात्री लागली नाही तरी इतर उपकरणांना कात्री लावण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्या उपकरणांसाठी पुन्हा पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार, हे स्पष्टच आहे. मात्र ‘डीसीआय’च्या तपासणीत निकषांप्रमाणे पायाभूत सोयी-सुविधा, उपकरणे नसल्यास नवीन विषयांवर गंडांतर येणार नाही कशावरुन, असाही सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य नाट्य स्पर्धेची धूम आजपासून

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५७व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारी सुरू होणार आहे. तापडिया नाट्यमंदिरात दररोज सायंकाळी सात वाजता नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. तर दोन नाट्य प्रयोग सकाळी साडेअकरा वाजता होणार आहेत. यंदा स्पर्धेत तब्बल २१ नाटकांचे सादरीकरण होणार असल्यामुळे स्पर्धेत चुरस वाढली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला नाट्य संघांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या फेरीत औरंगाबाद केंद्रावर २१ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी सात वाजता प्रयोग सादर होईल. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय स्पर्धा घेत आहे. नावाजलेल्या नाटकांचे सादरीकरण करण्याची राज्य नाट्य स्पर्धेत परंपरा आहे. मात्र, प्रथमच नवीन पिढीतील लेखकांची सर्वाधिक नाटकं स्पर्धेत सादर होणार आहेत. शहरात ठिकठिकाणी नाटकांची तालीम सुरू असून नवोदित रंगकर्मी तालमीत मग्न आहेत. तापडिया नाट्यमंदिरात मंगळवारी सायंकाळी सात वाजता ‘चाणक्य विष्णूगुप्त’ या नाटकाने स्पर्धेचा प्रारंभ होईल. त्यापूर्वी स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पहिलाच प्रयोग रद्द
राज्य नाट्य स्पर्धा सहा नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र सात नोव्हेंबर रोजीचे नाटक ऐनवेळी रद्द झाले. सहा नोव्हेंबरला प्रयोग शक्य नसल्याचे पहिल्या नाट्य संघाने कळवले. त्यामुळे पहिल्या संघाला सात नोव्हेंबरला संधी देण्यात आली. मागील वर्षीसुद्धा पहिलाच प्रयोग रद्द झाल्यामुळे संयोजकांची नामुष्की झाली होती. यावर्षी काही दिवस अगोदरच समजल्यामुळे स्पर्धेचे फेरनियोजन करण्यात आले.

...या नाटकांचे प्रयोग
-
दिनांक - नाटक - लेखक
-
- ७ नोव्हेंबर - चाणक्य विष्णूगुप्त - गो. पु. देशपांडे
- ८ नोव्हेंबर - राजहंस एक - निर्मला पुराणिक रॉय
- ९ नोव्हेंबर - एका खटल्याची साक्ष - विजय कुमार
- १० नोव्हेंबर - बाजीराव नस्तानी - सुमित तौर
- ११ नोव्हेंबर - मॅरेथॉन - आकाश गवई
- १२ नोव्हेंबर - ओयासिस - प्रा. अनिल साळवे
- १३ नोव्हेंबर - विक्रमादित्य - संजय सोनवणे
- १४ नोव्हेंबर - अजूनही उजाडत नाही - सुरेश गोसावी
- १५ नोव्हेंबर - पॉज - सतीश बोहरा
- १६ नोव्हेंबर - सुसाट - अजित देशमुख
- १७ नोव्हेंबर - देव चोरला माझा - सुमित तौर
- १८ नोव्हेंबर - कस्तुरीमृग - रवींद्र पुरी
- १९ नोव्हेंबर - नथिंग टू से - प्रसाद दाणी
- २० नोव्हेंबर - नको गं बाई - सतीश लिंगडे
- २१ नोव्हेंबर - सारी रात्र - बादल सरकार
- २२ नोव्हेंबर - निर्णय - सर्जेराव खरात
- २३ नोव्हेंबर (सकाळी) - अखंड - प्रवीण पाटेकर
- २३ नोव्हेंबर (सायं.) दि परफेक्ट संन्यास - योगेश निकम
- २४ नोव्हेंबर (सकाळी) प्रियंका आणि दोन चोर - श्याम मनोहर
- २४ नोव्हेंबर (सायं.) एक नवे आंदोलन - डॉ. प्रणित फरांदे
- २५ नोव्हेंबर - वं माय - लक्ष्मीकांत दोडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जालन्यात आज संघ संघटानांची बैठक

0
0

सुरेश कुलकर्णी, जालना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विशेष उपस्थितीत संघ परिवारातील प्रमुख ३८ संघटनांची व महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी जालन्यात होत आहे. सोमवारी सायंकाळपासून या संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे जालन्यात आगमन झाले असून या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची विशेष व्यवस्था नवीन जालन्यातील महाराजा अग्रसेन फाऊंडेशनमध्ये करण्यात आली आहे.

संघ परिवारातील प्रमुख संघटनेत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सरसंघचालक डॉ. भागवत हे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक घेणार आहेत. यात विशेषत राष्ट्रसेविका समिती, विश्व हिंदू परिषद, नारी शक्ती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय जनता पक्ष, संस्कार भारती, अखिल भारतीय ग्राहक मंच, भारतीय किसान संघ, आरोग्य भारती, सेवा भारती, शिक्षा षरिषद या प्रमुख संघटनेच्या प्रदेश पातळीवरील महिला पदाधिकारी सरसंघचालकांच्या समवेत मंगळवारी दिवसभराच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतील महाराष्ट्र राज्यात विदर्भ, मराठवाडा व खानदेश, कोकण व पश्चिम महाराष्ट्र असे चार स्वतंत्र प्रदेश आहेत. गुजरात एक प्रदेश आहे आणि गोवा राज्य हे कोकण प्रदेशात समाविष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रदेशाला पश्चिम क्षेत्र असे संबोधले जाते याच भागात प्रदेश पातळीवरील साधारणपणे तिनशे महिला पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. संघ परिवारातील या संघटनेच्या माध्यमातून महिला आघाडीच्या कामाचा आढावा आणि भविष्यातील आव्हाने या संदर्भात विशेष मार्गदर्शन आणि काही विशेष धोरणात्मक निर्णय याबैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिंदू धर्मातील जातीभेदाच्या समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतील सामाजिक समरसता मंच या संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सगळ्या सामाजिक प्रयत्नांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय महत्त्वाचा प्रधान्यक्रम दिलेला आहे. संघाच्या गाव पातळीवर अस्तित्वात असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणीत सामाजिक समरसता या विषयाचा एक जवाबदार पदाधिकारी काम करत असतो दैनंदिन जीवनात जाती पंथ भाषा या भेदाभेदांचे हिंदु संघटनेच्या कामाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याकरीता विशेष प्रयत्न केले जातात. संघाच्या दैनंदिन शाखेच्या कामकाजात सामाजिक समरसता या विषयाचा महत्वपूर्ण सहभाग घेतला जातो. सामाजिक समरसता ह्या सगळ्या बदलेल्या वातावरणात मानवतेच्या सन्मानासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी संघाच्या परिवारातील सगळ्या संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे. याच अनुषंगाने बुधवारी दिवसभरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे समरसता या विषयाचा आढावा आणि भविष्यातील आव्हाने या संदर्भात विशेष मार्गदर्शन आणि काही विशेष धोरणात्मक निर्णय याबैठकीत घेतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील सर्व संघटनांमध्ये महिला व समरसता या विषयाचा हा एक विशेष आढावा घेण्यात येणार आहे. जालन्यात अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संघ स्वयंसेवक अतिशय उत्साहात आहेत.

आज सायंकाळी सभा
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या समरसता संगम या विशेष समारंभात जाहीर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व विविध पंथांच्या धर्माचार्य, संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

जालन्यात दोन दिवस मुक्कामी
सरसंघचालक बुधवारी संध्याकाळी जालन्यातील संघाचे पूर्णवेळ प्रचारक प्रसाद जाफराबादकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. ही भेट कौटुंबिक असेल. तेथून पुढे देवगड (जि. नगर) येथे मुक्कामी असणार आहेत. जनशताब्दी एक्सप्रेसने सोमवारी रात्री १०.३० वाजता जालना शहरात त्यांचे आगमन झाले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भागवत यांचा दोन दिवस मुक्काम जिल्हा संघचालक सुनील गोयल यांच्या निवासस्थानी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चाळीस हजार ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यातील चाळीस हजार ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यांच्यासाठी ६७४ हंगामी वसतिगृहांना शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सीईओ धनराज नीला यांनी मान्यता दिली. या वसतिगृहांच्या माध्यमातून येत्या काळात जिल्ह्यातील ४१ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात स्थलांतर करतात. या ऊसतोड मजूराबरोबर त्यांची कच्चीबच्ची थेट ऊसाच्या फडावर पोचतात. ते शिक्षणापासून वंचित होतात. स्थलांतर करत असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात वसतिगृह चालवली जातात. बीड जिल्ह्यात यावर्षीही ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ही वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांचे शिक्षण अखंडित व्हावे यासाठी चालवली जाणारी योजना म्हणून ह्या योजनेकडे पहिले जात होते. या योजनेचा फायदा घेऊन अनेक ऊसतोड कामगारांचे मुले हाती कोयता घेवून कुटुंबाबरोबर फडावर जाण्यापासून रोखले जात आहेत. आता यात अधिक पारदर्शकता या निर्णयाने आली असल्याने या योजनेचा लाभ लाभार्थी ऊसतोड मजुरांच्या कुटुंबाला होणार आहे.

बीड जिल्हा परिषदेने यंदा ६७४ हंगामी वसतिगृहांना मान्यता दिली असून या माध्यमातून ४१ हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वसतिगृहे लवकरच सुरू होतील, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी दिली. यंदा जिल्हाभरातील ११ तालुक्यांतून हंगामी वसतिगृहांसाठी ६७४ प्रस्ताव आले होते. या वसतिगृहांना शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सीईओ धनराज नीला यांनी मान्यता दिली आहे.
सोमवारी जिल्हा परिषदेच्या शाळा दिवाळी सुटीनंतर पुन्हा सुरू झाल्या. त्याच्या पूर्वसंध्येला हंगामी वसतिगृहांना मान्यता मिळाल्याने ऊसतोड मजुरांना दिलासा मिळाला. सध्या मजुरांचे स्थलांतर सुरू असून अनेकजण स्थलांतराच्या बेतात आहेत. मजुरांच्या पाल्यांची निवासव्यवस्था पालकांना आपापल्या सोयीने करायची आहे. वसतिगृहात दोन वेळचे जेवण व इतर मूलभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

शिक्षणात पडणार नाही खंड
जिल्ह्यातून दरवर्षी लाखो मजूर ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. त्यांच्या बरोबर त्यांचे कुटुंब ही सहा महिन्यांसाठी गाव सोडून जातात. या स्थलांतरामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शिक्षण खंडित होते. मात्र, त्यांचे शिक्षणात खंड होऊ नये म्हणून या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी जिल्ह्यात हंगामी वसतिगृह चालवले जात आहेत.


येत्या आठवडाभरात सर्व वसतिगृहे कार्यान्वित व्हावे याअनुषंगाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना पारदर्शकपणे सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी सतत भेटी देणार आहेत.
राजेसाहेब देशमुख, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बॅँकिंग’मागे नसते लचांड

0
0


औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी (८ नोव्हेंबर) घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बॅँकांचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाही.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी दोन महिन्यांत तब्बल सात हजार कोटींच्या नोटा बदलून घेतल्या. दोन हजार कोटींहून अधिक पैसा विविध खात्यात नव्या नोटांद्वारे जमा झाला. शहरातील ७०० पैकी ४५० एटीएम महिन्याभर बंद होते. दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेकडून अत्यंत कमी प्रमाणात चलन पुरवठा झाला. कोट्यवधींचे धनादेश वटणे बंद झाले. नोकरदारांचे पगार होण्यास अडचणी आल्या. असंघटित क्षेत्राचे तर कंबरडेच मोडले. ही परिस्थिती निवळण्यासाठी तब्बल साडेतीन हजार कोटींच्या चलनाची गरज होती, परंतु ती तीन महिन्यानंतर सुरळीत झाली. सर्व बँकिंग सुरळीत होण्यास शहराला तब्बल चार महिने लागले. नोटाबंदी काळात डिपॉजिटमध्ये वाढ झाली. परिणामी बँकांच्या व्यवसायाला त्याचा फटका बसला. एनपीएच्या प्रमाणात वाढ झाली. नवीन कर्जाची मागणी कमी झाल्याने संस्था व बँकांच्या सीडी रेशो कमी झाला. त्याचा परिणाम बँका व संस्थांच्या लाभांशावर झाला आहे.

कर्मचारी ताणाखाली
नोटाबंदी निर्णयाने बँक अधिकारी, कर्मचारी प्रचंड तणावाखाली आले. त्यांना या काळात रोज १८ तास काम करावे लागले. रोज नागरिक बँक कर्मचाऱ्यांत वाद झाले. तीन हजारांहून अधिक व्यापाऱ्यांची बँकांकडून चौकशी झाली. कॅशलेस व्यवहार वाढले. बॅँकिंग अॅप डाउन लोडिंग वाढल्याने इंटरनेट व्यवस्था कोलमडली. इंटनेट स्पीडसाठी पुन्हा शीतयुद्ध सुरू झाले.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमेवर व्याज द्यावे लागले. जनधन खात्यांत बरीच रक्कमही जमा झाली. शिवाय कर्जावरील व्याजाच्या रकमेतून मिळणाऱ्या रकमेवर मर्यादा आल्या. सर्व प्रकारची कर्जे देणे थांबले. अनेक बँकांचे एनपीए वाढले. यामुळे बँकिंग पूर्णपणे कोलमडले. कर्मचारीवर्गाला ओव्हर टाइम मिळाला नाही. त्यासाठी आम्ही अजून लढत आहोत. - देविदास तुळजापूरकर, सहसचिव, एआयबीईए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात आयकराच्या धाडी, ६० कोटी रूपये जप्त

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । जालना

जालन्यात आयकर विभागाच्या सुमारे २०० अधिकाऱ्यांनी दोन स्टील कंपन्यांवर धाडी मारल्या. या धाडीत आयकर विभागाच्या हाती ६० कोटी रूपयांचं घबाड लागलं असून कर बुडवून हा सर्व पैसा साठविण्यात आल्याचं या धाडीत उघड झालं आहे.

आयकर विभागाने १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान या धाडी मारल्या. विशेष म्हणजे नाशिक आणि औरंगाबाद आयकर विभागाच्या २०० अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. नोटाबंदीला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदीच्या काळात अनेकांनी लपवलेला पैसा बाहेर काढला, पण त्याचा हिशेब देण्यात ते अपयशी ठरले. शिवाय आयकर विभागाकडेही मराठवाड्यातून अशा पद्धतीचा पैसा लपवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातल्या त्यात जालन्यातील स्टील कंपन्यांचे व्यवहार संशयाच्या घेऱ्यात होते.

औरंगाबाद पोलिसांची मदत

ही छापेमारी करताना आयकर विभागाने जालना पोलिसांना या कारवाईची खबर लागू दिली नाही. आयकर विभागाने २०० अधिकाऱ्यांचे पथक तयार केले. त्यापैकी एका पथकाने स्टील कंपनीत आणि दुसऱ्या पथकाने या कंपनीच्या मालकाच्या घरी धाड मारली. एकाच वेळी धाडी मारण्यात आल्याने आयकर विभागाच्या हाती ६० कोटी रूपयांचं घबाड लागलं. दरम्यान, ज्या बड्या स्टील कंपन्यांवर धाड टाकण्यात आल्या आहेत, त्यांचे पुणे, कोलकाता, इंदूरमधील नातेवाईक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’वर टांगती तलवार

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुचर्चित भूमिगत गटार योजनेच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांकडे अनेक तक्रारी गेल्या असून, गुरुवारी नगरविकास खात्याच्या सचिवांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत शासकीय निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने विविध योजनांसाठी महापालिकांना निधी दिला आहे. या निधीतून केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला महापालिकांच्या आयुक्तांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीत प्रामुख्याने युआयडीएसएसएमटी (अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मीडियम टाऊन्स) या योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. औरंगाबादमध्ये या योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचेच काम केले जात आहे. या कामाबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. भूमिगत गटार योजनेच्या कामाचे लेखापरीक्षण केल्यावर त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत देखील वादळी चर्चा झाली. सभापती गजानन बारवाल यांनी भूमिगत गटार योजनेचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करा, या कामासाठी नियुक्त केलेल्या पीएमसीला काळ्या यादीत टाका, करा असे आदेश आयुक्तांना दिले. मात्र, आयुक्तांनी कारणेदाखवा नोटीस बजावून निलंबनाची कारवाई करणे टाळले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणारी बैठक महत्त्वाची मानली जात आहे. ‘भूमिगत’च्या कामाचा तपशील आयुक्तांना या बैठकीसाठी जाताना सोबत घेवून जावा लागणार आहे. सोबतच घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम या योजनांच्या कामांचा आढावा देखील सचिवांच्या स्तरावर घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री वक्री
भूमिगत गटार योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास वैद्य यांनी स्वतंत्रपणे भूमिगत गटार योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या देखील मुख्यमंत्री कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री या तक्रारींबद्दल काय निर्णय घेणार याकडे पालिकेतील वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘भूमिगत’ प्रकल्प
- १ जुलै २०१४ प्रकल्प सुरू
- ३० जून २०१७ काम संपण्याची मुदत
- ८ नोव्हेंबर २०१७ काम अजूनही सुरू
- ३५४ .६६ कोटी प्रकल्पाची मूळ किंमत
- ६० टक्के केंद्र सरकारचा हिस्सा
- २० टक्के प्रत्येकी राज्य व पालिका
- ४६४ कोटी टेंडर प्रक्रियेनंतर किंमत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ व्यापार, उद्योगात ५० टक्के घाटा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटाबंदीच्या तडाख्याने शहरातील लघु आणि मोठ्या उद्योगाला जबरदस्त हादरा बसला असून, त्यामुळे उलाढालीत ५० टक्के घट झाली. यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत ‘रेरा’ आणि ‘जीएसटी’ कायदे आल्यामुळे पुन्हा व्यापारी-उद्योजक होरपळून निघाले आहेत.

व्यवसायातील कच्च्या मालापासून ते पक्के उत्पादन बाहेर पडेपर्यंत असलेली साखळी नोटाबंदीमुळे कोलमडली. रोखीचे व्यवहार वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक घटले. क्रयशक्ती घटली. दिवाळी, दसरा, पाऊस यांनी थोडे तारून नेले, पण या दरम्यान पुन्हा नोटाबंदीची वर्षपूर्ती उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. पानटपरी ते इलेक्ट्रानिक्स् दुकान आणि किराणा ते मॉलपर्यंत सर्वच व्यापारी वर्गाचे १० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.

औरंगाबाद शहराशी निगडित उद्योगाचे विस्तारीकरण वर्षभरात खुंटले आहे. अनेक उद्योगांच्या प्रतिनिधींनी परिषदा व चर्चासत्रांत भाग घेतला, पण प्रत्यक्ष गुंतवणूक काही केली नाही. ऑरिक आणि डीएमआयसी‍च्या ठराविक आणि नियोजनातील टप्प्यांवर याचा काहीही विशेष परिणाम झालेला नाही, असे उद्योजक स्पष्ट सांगतात. तरीही वर्षभरानंतर प‌रिस्थ‌िती सुधारत असून दूरगामी प‌रिणाम व पारदर्शकतेसाठी नोटाबंदी व इतर ‌‌निर्णय चांगले असल्याचे व्यापारी-उद्योजकांनी सांगितले.

नोटाबंदीमुळे उद्योगाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. वर्षभरात चार टप्पे आपण सांगू शकतो. निर्णय होताच आधी शॉक लागला, मग सावरण्यात गेला, नंतर समजून घेण्यात तीन महिने गेले आणि आता कुठे त्यातून मार्ग काढणे सुरू आहे. - प्रसाद कोकीळ, अध्यक्ष सीएमआयए

व्यापाराच्या विविध प्रकारांनुसार विचार केला तर १० ते ५० टक्के व्यवसायाचे नुकसान झाले आहे. नोटाबंदीतून सावरत नाही तोवर आमच्यावर ‘जीएसटी’ आणि नंतर ‘रेरा’ लागू केला. या सर्वांचा विपरित परिणाम झालाच आहे. दूरगामी सुधारणा हव्या आहेत म्हणून आज त्याग सहन करतोय. - अजय शाह, अध्यक्ष व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगिरी उंचावणे हेच लक्ष्य

0
0



औरंगाबादः आशियाई यूथ बास्केटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघात औरंगाबादच्या खुशी डोंगरेचा समावेश होता. भारतीय संघात पदार्पण करणारी खुशी ही मराठवाड्यातील पहिलीच महिला खेळाडू ठरली. पदार्पणातील स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी बजावल्यानंतर आता सिनिअर भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य तिने बाळगले आहे. ‘मटा’शी तिने साधलेला संवाद.....

- भारतीय यूथ बास्केटबॉल संघातील पदार्पणाचा अनुभव कसा राहिला ?
- खरे तर या निवडीमुळेच मला अधिक प्रभावी कामगिरीची प्रेरणा मिळाली. गतवर्षी हसन (कर्नाटक) येथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा अनुभव उपयोगी ठरला. या स्पर्धेत संघात मी सर्वात ज्युनिअर होते. आठ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यात आम्ही सहा सामने जिंकले. संघातील प्लेइंग पाच खेळाडूंमध्ये मला स्थान होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आशियाई यूथ बास्केटबॉल स्पर्धेत मी भारतीय संघातून चार सामने खेळण्याची संधी मिळाली. डिफेंडर म्हणून माझे संघात स्थान होते. पासिंग खूप चांगले होते. बॉल रिजेक्ट करण्याचे काम मी प्रभावीपणे केले. संघातील सर्वोत्कृष्ट डिफेंडर म्हणून नाव झाले. पाँइंटर शुटिंग माझे उत्कृष्ट झाले. उपांत्य सामन्यात कझाकिस्तान संघाविरुद्ध माझे बारा पॉइंटर निर्णायक ठरले. अंतिम सामन्यात आम्ही मलेशियाला हरवत जेतेपद मिळविले. गटातील सामन्यात भारताने नेपाळ, श्रीलंका व इराण संघांना पराभूत केले. या स्पर्धेत १५ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मी नैसर्गिक खेळ केला. त्याचा फायदा झाला. भारतीय संघातून प्रथमच खेळताना मी कोणतेही दडपण घेतले नाही. झोरान व अनिता या प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला. या स्पर्धेतील कामगिरीने माझा आत्मविश्वासच वाढला नाही तर भविष्यात मोठी झेप घेण्याची ताकदही मिळाली. आता जबाबदारी वाढल्याची जाणीव आहे आणि माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न निश्चित असेल.

- जिम्नॅस्टपटू ते बास्केटबॉल खेळाडू हा प्रवास कसा राहिला ?
- शारीरिक तंदुरुस्तीसाठी मी जवळपास तीन वर्षे जिम्नॅस्टिक्स केले. आठवीत असताना मी बास्केटबॉल खेळण्यास सुरुवात केली. घरापासून जवळच असलेल्या चॅम्पियन क्रीडा मंडळाच्या बास्केटबॉल कोर्टवर मी नियमित व्यायामासाठी जात असे. तेव्हा तेथे खेळाडूंचा खेळ मी निरखून पाहात असे. माझी उंची चांगली असल्याने बास्केटबॉल खेळातही मी चांगली पारंगत होऊ शकते या विश्वास होता. वडील संजय डोंगरे यांच्यामुळे बास्केटबॉल खेळण्यास अधिक प्रेरित झाले. माझी बास्केटबॉल खेळाची पोस्ट या जागेवरून झाली. त्यानंतर फ्रंट व फॉरवर्ड खेळू लागले. सध्या मी फॉरवर्ड खेळाडू म्हणून खेळते. नववी असताना मी बास्केटबॉल खेळात झोकून दिले.

- प्रारंभीच्या काळात तुला फिटनेसचा प्रश्न होता. त्यावर कशी मात केली ?
- मी जेव्हा खेळण्यास सुरुवात केली तेव्हा फिटनेस तेवढा नव्हता. त्यामुळेच मी काही वर्षे जिम्नॅस्टिक्स केले. धावण्याचा व्यायामही नियमित करण्यास सुरुवात केली. साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात शिबिरांच्या कालावधीत तेथील प्रशिक्षकांचेही मार्गदर्शन घ्यायचे. पहाटे चार वाजता उठायचे. पाच वाजता मैदानावर हजर. आजही त्यात खंड नाही. दररोज किमान आठ ते नऊ तास सराव करते. त्यातून फिटनेस सुधारला. त्यामुळे माझा खेळही निखारला.

- चार राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा खेळणारी पहिलीच औरंगाबादची खेळाडू आहेस ?
- बास्केटबॉल खेळण्यास मी तीन वर्षांपूर्वी सुरुवात केली. तेव्हा बास्केटबॉल खेळात करिअर करण्याचेच ठरवून मी कौशल्य शिकत गेले. कठोर सरावाचा फायदा झाला. आतापर्यंत मी चार राष्ट्रीय स्पर्धा खेळले. हसन, राजनंदनगाव, नोयडा व हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. चार राष्ट्रीय स्पर्धा खेळणारी मी पहिलीच औरंगाबादची खेळाडू आहे ही गोष्ट मला सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करते.

- भारतीय यूथ संघातून पदार्पण केल्यानंतर पुढील लक्ष्य काय ?
- आशियाई यूथ बास्केटबॉल स्पर्धेतून मी भारतीय संघात पदार्पण केले. या स्पर्धेतील माझी कामगिरी लक्षवेधक ठरली. या गोष्टीचा मला निश्चितच फायदा होईल. आता १८ वर्षांखालील ज्युनिअर भारतीय संघातून खेळण्याचे लक्ष्य मी ठेवले आहे. तसेच सिनिअर भारतीय महिला बास्केटबॉल संघात स्थान मिळवणे हे उद्दिष्ट राहाणार आहे. पुढील वर्षी ज्युनिअर आंतरराष्ट्रीय व सिनिअर आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा होणार आहेत. कामगिरीचा आलेख उंचावणे हेच माझ्यासमोरील मोठे आव्हान आहे आणि त्यात मी कमी पडणार नाही.

- खेळामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते का ?
- बास्केटबॉलमध्ये मानसिक फिट राहाणे महत्त्वाचे असते. त्याचा अभ्यासातही फायदा होतो. देवगिरी कॉलेजमध्ये मी अकरावीत शिकत आहे. संदीप ढंगारे व संजय डोंगरे यांच्या नियमित मार्गदर्शनामुळे खेळाचा सराव करते. कठोर सरावामुळे पोस्ट व फॉरवर्ड पोझीशनवर खेळू शकते. स्पीड वाढला आहे. योग्य डायटमुळे खेळातील कामगिरीचा आलेख उंचावत आहे. साहजिकच या गोष्टींचा मला अभ्यासात फायदा होतो. खेळा इतकेच मी अभ्यासालाही महत्त्व देते. युपीएससी, एमपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याकडे माझा कल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images