Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बैल चोरून नेणारा टेम्पो शेतकऱ्यांनी पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यातील खुल्लाेड येथून तीन बैलांची चाेरी करून घेऊन जाणारा टेम्पो शेतकऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री उंडणगाव शिवारात पकडला. अलिकडच्या काळआत अजिंठा पाेलिस ठाण्याअंतर्गत पशुधन चाेरीच्या घटना वाढल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनीवारी खुल्लाेड येथून तीन बैल चाेरून एम. एच. ०४ ए. यू. ६९०७ या क्रमांकाचा टेंपो उंडणगाव-गाेळेगाव रस्त्यावरून जात होता. या रस्त्यावरील रामकुंडवाडी वस्तीवरील अशाेक सपकाळ, काशीनाथ सपकाळ, देवीदास हिवाळे, याेगेश सपकाळ, अशाेक सपकाळ आदी शेतकऱ्यांनी टेंपो अडवला असता चालकाने तो थांबवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला पकडून पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचे नाव नाना पाटील (रा. वरखेडी ता. जामनेर), असे आहे. टेंपो पकडल्यानंतर पोलिसांनी चालक व बैल ताब्यात घेतले. है बैल शामराव वाघ, श्रीधर वाघ, गणपत वाघ यांना पोलिसांनी रविवारी दिले. गेल्या आठवड्यात उंडणगाव शिवारातून बंडू लांडगे, लक्ष्मण लांडगे व गुऱ्हाळकर यांचा प्रत्येकी एक बैल चाेरीस गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन अधिकाऱ्यांची झेडपीत प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ११ दिवसांपूर्वी झाली. अद्याप हे अधिकारी रुजू न झाल्याने झेडपी प्रशासनाला हे अधिकारी रुजू होण्याची प्रतीक्षा आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची जालना येथे बदली झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद दीड वर्षांपासून रिक्त होते. या दोन्ही जागांवर अनुक्रमे अशोक सिरसे आणि अब्दुल मुकीम देशमुख यांची नियुक्ती झाल्याचे २ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. दोन्ही अधिकारी चार, पाच दिवसांत रुजू होतील, अशी अपेक्षा होती. बेदमुथा दोन दिवसांत रिलिव्ह झाले. बदली आदेश मिळून ११ दिवस उलटून गेले तरी सिरसे व देशमुख रुजू झालेले नाहीत. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड हे १९ नोव्हेंबरपासून तीन आठवडे ट्रेनिंगसाठी मसुरीला जाणार आहेत. त्याआधी सिरसे रुजू झाले, तर झेडपीचा कारभार सांभाळण्यास मदत मिळणार आहे.

देशमुखांना एक महिना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरसे १४ नोव्हेंबर रोजी रुजू होण्याची शक्यता आहे. देशमुख सध्या हिंगोली येथे अतिरिक्त सीइओ म्हणून कार्यरत आहेत. तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी एक महिना ट्रेनिंगसाठी जाणार आहे. ते परतल्यानंतरच देशमुख हिंगोलीतून रिलिव्ह होऊ शकतात. तोवर प्रकल्प संचालकपद रिक्त राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रज्ञान प्रशिक्षणाला मुख्याध्यापक तयार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षणात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढला आहे. त्या अनुशंगाने शिक्षण विभाग प्रथमच ‘अविरत’ ऑनलाइन प्रशिक्षण देत आहे. सुरुवातीला तीस टक्केच शाळांची नोंद होती. शेवटच्या दिवशी ९० टक्क्यापेक्षा अधिक शाळांनी सहभाग घेतला. अत्याधुनिक प्रशिक्षणात शाळांची अनास्थेवर ‘मटा’ने प्रकाश टाकला होता.
शिक्षणपद्धतीत बदल करत शिक्षण विभागाने ज्ञानरचनावाद आणला. प्रत्यक्षात बदलते तंत्रज्ञान मराठी शाळांना देण्यासाठी शिक्षण विभागाने अविरत प्रशिक्षण समोर आणले. बदलते माहिती व तंत्रज्ञान, शिक्षण पद्धतीबाबत ऑनलाइन प्रशिक्षण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देणार आहे. अनुदानित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना हे प्रशिक्षण असणार आहे. शाळांनी बदलत्या तंत्रज्ञाला आत्मसात करण्यात प्रतिसाद देत नसल्याचे चित्र होते. यावर ‘महाराष्ट्र टाइम्स’नेही प्रकाश टाकला. शनिवारी रात्रीपर्यंत शेवटच्या दिवशी ३५ टक्क्यांवरून
नोंद ९० टक्क्यांवर गेली. प्रशिक्षणात सरल, शालार्थ, युडीआयएस, ऑनलाइन बदल्या, संचमान्यता, सेवेच्या नोंदी आदींबाबत तांत्रिक धडे देणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित नोंदणी.. १६२३
शनिवारपर्यंत नोंदणी………….१४०९


शिक्षकांना माहिती व तंत्रज्ञान सहजपणे हाताळण्यास मदत व्हावी. या हेतुने हे प्रशिक्षण करण्यात येत आहे. शिक्षकांना हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे ट्रेनिंग पहिल्यांदा होत आहे.
विजय पाटोदी, मुख्याध्यापक, पी. यू. जैन माध्यमिक विद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकाराचे पैसे आठ दिवसात देऊ

$
0
0

चित्रकाराचे पैसे आठ दिवसात देऊ
महापौरांची ग्वाही, आयुक्तांनीही दाखवली सहमीत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या खांबांवर समाज प्रबोधनविषयक घोषवाक्य लिहून पूरक चित्र काढणाऱ्या चित्रकाराचे पैसे महापालिकेने बुडविल्याचे वृत्त ‘मटा’ ने प्रसिद्ध केल्यावर महापालिकेच्या यंत्रणेला खडबडून जाग आली. त्या चित्रकाराचे पैसे देण्याची व्यवस्था आठ दिवसात करू, अशी ग्वाही महापौरांनी दिली, तर आयुक्तांनी ती रक्कम फार मोठी नाही. लगेचच देवून टाकू, असे म्हणत सहमती दर्शवली.
क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. उड्डाणपुलासाठीचे खांब विविध विषयांचे पोस्टर्स चिटकवल्यामुळे, तंबाखू व पान खावून मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे विद्रुप झाले होते. या खांबांना रंगरंगोटी करून, त्यावर समाज प्रबोधन करणाची घोषवाक्ये लिहून पुरक चित्र काढण्याची इच्छा अंबिका व सचिन भोरे या चित्रकार दांपत्यांनी व्यक्त केली होती. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर काम करण्याची त्यांची इच्छा होती. शहर सुशोभीकरणासाठीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी भोरे दांपत्यांची भेट आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याशी घालून दिली. ‘तुम्ही काम सुरू करा, पेमेंटची व्यवस्था आम्ही करतो’, असे आयुक्तांनी या दाम्पत्याला सांगितले. त्यानंतर सलग चार महिने काम करून त्यांनी रंगरंगोटीचे काम केले, चित्र काढली. काम पूर्ण झाल्यावर पालिका प्रशासनाकडे पेमेंटसाठी प्रस्ताव सादर केला तेव्हा अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाऊ लागली.
या संदर्भात ‘मटा’ ने शनिवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यावर त्याची दखल महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतली. ते म्हणाले, चांगल्या हेतुने त्या चित्रकारांनी शहर सुशोभीकरणाचे काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे क्रांतीचौक परिसराचा लुक बदलण्यास मदत झाली आहे. चित्रकारांच्या कलेचे चीज झालेच पाहिजे. त्यांचे पेमेंट करण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असतील तर ते योग्य नाही. कलेचा मान राखला गेला पाहिजे. सोमवारी कार्यालय सुरू झाल्यावर या प्रकाराची चौकशी करतो आणि आठ दिवसात भोरे यांना पेमेंट मिळेल याची व्यवस्था करतो.’ आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, भोरे यांनी सुरुवातीला विनामूल्य काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांनी पेमेंटची मागणी केली आहे. त्यांच्या पेमेंटची रक्कम फार मोठी नाही. सोमवार - मंगळवारी त्यांना पेमेंट देण्याची सोय करू.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा नव्वद कोटींचा वीजदंड रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीज नियामक आयोगाने महापालिका विरूद्ध महावितरण या प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे महाप‌ालिकेला आता ९० कोटी रुपयांचा दंड महावितरणाकडे भरावा लागणार नाही.
महापालिकेने शहराचा पाणीपुरवठा खासगी कंपनीकडे सोपवला होता. त्यावेळी कंपनी पाणी विकत असल्याने संबंधित कंपनी व महापालिकेला व्यावसायिक दराने वीजबिल आकारणी करावी, असा निर्णय महावितरणाच्या सुरक्षा पथकाने घेतला होता. त्यानुसार, औरंगाबाद युटिलिटी कंपनीला ९० कोटी रुपयांचे वीजबिल देण्यात आले होते. महावितरणने महानगर पालिकेस अनुक्रमे ७२ कोटी व १८ कोटी रुपयांचे बिल आकारले होते. याविरोधात महापालिकेने ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांच्या मार्फत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दाद मागितली होती. औरंगाबाद महापालिकेकडे पाणी पुरवठा स्वतःच्या मालकीचा आहे. देखभाल व दुरुस्ती खासगी कंपनीस देण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक दरानुसार वीजबिल आकारणी होऊ शकत नसल्याचा युक्तीवाद महापालिकेच्या वतीने हेमंत कपाडिया यांनी केला. आयोगापुढे शहराची सध्यस्थितीतील पाणीपुरवठा योजना, त्यावर पालिकेला करावा लागणार खर्च व वसुली आदींची माहिती दिली. नागपूर येथे ऑरेंज वॉटर सप्लाय कंपनी ही खासगी कंपनी पाणीपुरवठा करत असून त्या कंपनीला व्यावसायिक दराने बिल आकारणी हो नाही, हे लक्षात आणून दिले. तसेच महावितरण स्वतः देखील खासगी कंपनीकडून देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेते. त्याचप्रमाणे भिवंडी, नागपूर, औरंगाबाद शहरात वीज
देखभाल व दुरुस्तीची कामे फ्रँचायसीमार्फत करून घेण्यात येतात. त्यामुळे महापालिकेकडे केलेली मागणी चूक असल्याचे निवेदन आयोगासमोर केले.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने याप्रकरणी सुनावणी घेतली. पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती खासगी कंपनीस दिली असली तरी योजनेची मालकी महापालिकेकडे असल्याने पब्लिक वॉटर वर्क्ससाठी नियोजित दरानुसार बिलाची आकारणी करण्याचे आदेश दिले.

शहर विभागाकडून पालन

वीज नियामक आयोगाचे आदेश प्राप्त होताच महावितरणच्या औरंगाबाद शहर विभागाने महापालिकेला ऑक्टोबर २०१७मध्ये दिलेल्या वीजबिलातून व्यावसायिक दराने आकारलेले १८ कोटी रुपये कमी केले आहे. मात्र ग्रामीण विभागातर्फे ७२ कोटी रुपयांचे वीजबिल कमी करण्याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर’ यंत्रसामग्रीच्या २९ कोटीस प्रशासकीय मंजुरी

$
0
0

‘कॅन्सर’ यंत्रसामग्रीच्या २९ कोटीस प्रशासकीय मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयासाठी वर्ष २०१७ -१८ या आर्थिक वर्षात राज्यस्रीय कर्करोग संस्थेसाठी प्राप्त होणाऱ्या केंद्र - राज्य हिस्सा निधीतून २९ कोटी ९० लाख रुपये यंत्रसामग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभागाने १० नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शासनिर्णय काढला आहे. त्यानुसार कॅन्सर हॉस्पिटलसाठी कार्डिओव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड सिस्टिम, लॅप्रोस्कोपी सेट, हार्मोनिक स्कालपेल सेट, सीओटू लेझर, मायक्रोलारींगोस्कोप इन्स्ट्रुमेंट, अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेट, गॅस्ट्रोस्कोपी अँड कॉलोनोस्कोपी व्हिडिओस्कोप, थॉम्सन रिट्राक्टर सिस्टिम, ऑप्टिकल लुप फूल सेट, ओटेबल टी, ओटी लँप, इलेक्ट्रोसर्जिकल कॉटरी युनिट व्हेसल सिलिंग, एसॉरटेड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट विथ गोल्डन हँडल सेट, सेंट्रल स्टेशन फॉर आयसीयू, अॅनेस्थेशिया वर्क स्टेशन, डिफिब्रीलेटर, प्लेक्झिबल इंट्यूबेशन व्हिडिओ एंडोस्कोप अॅडल्ट अँड पेडियाट्रिक, मॅनिकिन फॉर डेमोनस्ट्रेशन, ब्लड प्लुईड वॉर्मर, ऑप्थॅल्मिक मायक्रोस्कोप, ए स्कॅन, ऑटोरिफरेक्टोमीटर विथ केरोमीटर, ऑप्थॅल्मिक चेअर युनिट विथ रिमोट ड्रम अँड सर्जन स्यूल, ओटेबल टी, रेडिओफ्रिक्वेन्सी कॉटरी, हँड हेल्ड टोनोमिटरू, लिनर एक्सेलेटर विथ एफ एफ एफ गेटिंग टेक्नॉलॉजी आदी यंत्रसामग्रीचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजाबकडे भक्कम आघाडी

$
0
0

पंजाबकडे भक्कम आघाडी
महाराष्ट्राचा संघ अडचणीत
लोगो - सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पंजाब संघाने २३ वर्षांखालील सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत रविवारी महाराष्ट्र संघाचा पहिला डाव अवघ्या ११४ धावांवर गुंडाळून १०२ धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर दिवसअखेरपर्यंत पंजाबने दुसऱ्या डावात ६ बाद १६६ धावा करून आपली आघाडी २६८ धावांपर्यंत नेत सामन्यावर पकड मिळवली आहे.
एडीसीए मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र संघास निर्णायक विजयाची नितांत गरज आहे. मात्र, पंजाबच्या पहिल्या डावातील २१६ धावांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा डाव अवघ्या ११४ धावांवर संपुष्टात आला.
पहिल्या दिवसाअखेर प्रशांत कोरे आणि कर्णधार विजय झोल बाद झाल्यामुळे महाराष्ट्राची अवस्था २ बाद ३६ अशी झाली होती. रविवारीही महाराष्ट्राच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरण्यात अपयश आले. यष्टीरक्षक निखिल नाईक (४) व शमशुझमा काझी (४) व ऋषिकेश काळे (१) हे फलंदाज झटपट बाद झाल्याने महाराष्ट्राचा संघ अडचणीत सापडला. महाराष्ट्रातर्फे जय पांडेने एकाकी झुंज देताना १८८ मिनिटे त्याने मैदानावर ठाण मांडून ११४ चेंडूंत ५३ धावांची खेळी केली. जय बाद झाल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्राचा डाव ४३.५ षटकांत ११४ धावांवर आटोपला. पंजाबकडून निखिल चौधरीने ३३ धावांत ३ विकेट्स घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली. कर्णधार करण कैलाने १९ धावांत २, तर सनवीर सिंगने १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर, फलंदाजीस उतरलेल्या पंजाब संघाने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाअखेर ६ बाद १६६ धावा काढून २६८ धावांची आघाडी मिळवली. प्रभज्योत सिंग (३४), सनवीर सिंग (२५), हिमांशू शर्मा (२७), तलविंदर सिंग (२४) व निखिल चौधरी (नाबाद ३१) यांनी पंजाबला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. महाराष्ट्राकडून जगदीश झोपे व शुभम कोठारी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यातील दोन दिवस अद्याप बाकी असल्याने महाराष्ट्र संघ कोणता चत्मकार घडवतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब ः पहिला डाव - सर्वबाद २१६ आणि दुसरा डाव - ४८.४ षटकांत ८ बाद १६६ (निखिल चौधरी नाबाद ३१, हिमांशू शर्मा २७, तलविंदर सिंग २४, प्रभज्योतसिंग ३४, सनवीर सिंग २५, जगदीश झोपे २-३६, शुभम कोठारी २-५९, शमशुझमा काझी १-२६). विरुद्ध महाराष्ट्र ः पहिला डाव - ४३.५ षटकांत सर्वबाद ११४ (जय पांडे ५३, विजय झोल १६, शुभम कोठारी १७, प्रशांत कोरे ६, निखिल नाईक ४, जगदीश झोपे ५, सनवीर सिंग ३-१७, निखिल चौधरी ३-३३, करण कैला २-१९, मनप्रीत सिंग २-३६).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभियांत्रिकी’चे होम सेंटर रद्द

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सहा महिन्यांपूर्वी साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या सामूहिक कॉपी प्रकरणात विद्यापीठाची नाचक्की झाली. या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी शाखेच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्र परीक्षेसाठी होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीत होम सेंटरचा निर्णय जाहीर करण्यात आला.
येत्या २८ नोव्हेंबरपासून अभियांत्रिकीची परीक्षा सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची सत्र परीक्षा वादग्रस्त ठरली होती. चौका येथील साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक कॉपी प्रकरण राज्यभर गाजले होते. नगरसेवकाच्या घरात उत्तरपत्रिका लिहीत असलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. अभियांत्रिकीच्या परीक्षेला होम सेंटर देण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने दोन वेळेस घूमजाव केले होते. ‘साई प्रकरण’ घडल्यानंतर प्रशासनाची भूमिका चर्चेत होती. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्र परीक्षेसाठी होम सेंटर देण्यात येणार नाही अशी भूमिका परीक्षा विभागाने घेतली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विद्यापीठात सोमवारी बैठक झाली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके उपस्थित होते. या बैठकीत होम सेंटर रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परीक्षेचे नियोजन कोलमडू नये म्हणून प्राचार्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. संतोष भोसले, डॉ. नीलेश पाटील, डॉ. एच. एच. शिंदे यांचा समावेश आहे. विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन समिती परीक्षेबाबत सूचना करणार आहेत. ‘एम-४’ पेपरला सर्वाधिक विद्यार्थी असल्यामुळे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे समिती मार्गदर्शन करणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक चाचणी असून २८ नोव्हेंबरपासून लेखी परीक्षा आहे. जालना, तुळजापूर, अंबाजोगाई, परळी, माजलगाव या परीक्षा केंद्राबाबत काय निर्णय घ्यावा हा परीक्षा विभागासमोर मोठा प्रश्न आहे. परीक्षा केंद्रातील पायाभूत सुविधा पाहून समिती सूचना करणार आहेत. चार दिवसानंतर समितीची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत परीक्षेचे अंतिम नियोजन निश्चित करण्यात येणार आहे.

नेटके मुंबई विद्यापीठात
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके प्रतिनियुक्तीवर मुंबई विद्यापीठात रुजू होणार आहेत. याबाबत राजभवनातून सोमवारी नियुक्तीपत्र कुलगुरू कक्षात आले. पत्र आपल्याला मिळाले नसून कुलगुरूंच्या सूचनेनुसार निर्णय घेऊ, असे नेटके यांनी स्पष्ट केले. मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडल्यामुळे राज्यभर चर्चा झाली. पुढील परीक्षा आणि निकाल सुरळीत करण्यासाठी नेटके यांना प्रतिनियुक्तीवर बोलावले आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलसचिव पदासाठी २१ नोव्हेंबर रोजी नेटके यांची मुलाखत आहे. डॉ. नेटके काही दिवसच परीक्षा संचालकपदी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुलगुरुंना प्रभारी परीक्षा संचालकाचा शोध घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडगावात तीन घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
आडगाव भोसले (ता. कन्नड) येथे रविवारी रात्री तीन घरे फोडली. एका घरातून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. उर्वरित दोन ठिकाणी घरमालक नसल्याने चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत अंदाज कळू शकला नाही. चोरट्यांनी कुलूपबंद घरे लक्ष्य केली.
पिशोर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून आडगाव भोसले येथे रविवारी मध्यरात्री दीपक भिकन बोलकर, मुख्यध्यापिका सुनिता काळे व अंजित दादाराव भोसले यांच्या घरांचे कुलूपे तोडून चोरी केली. बोलकर यांच्या कपाटातून ४० हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख चार हजार रुपये व आठशे रुपयांचा पांघरायचा वूलनचा रग चोरट्यांनी लंपास केला. भोसले यांच्याकडील चोरी गेलेला एेवजाची माहिती मिळू शकली नाही. ही दोन्ही कुटुंबे शेतवस्तीवर वास्तव्यास आहे. तिसऱ्या ठिकाणी घरफोडी झालेल्या मुख्यध्यापिका काळे या बाहेरगावी असल्याने चोरी झालेल्या एेवजाची माहिती मिळू शकली नाही. चोरटे एकापेक्षा जास्त असल्याने त्यांनी तीन घरे फोडल्यानंतर कुलूपबंद असलेली अन्य नऊ घरे फोडण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो टळला.
उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, स्थानिक पोलिसांनी, श्वानपथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या आधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. या घरफोडीत मुद्देमाल चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दीपक बोलकर यांच्या फिर्यादीवरून पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयराज भटकर करीत आहे.

सीसीटीव्ही बसविणे गरजेचे
सांसद आर्दश ग्राम योजनेत खासदार चंद्रकांत खैरे यांनी आडगाव (भोसले) दत्तक घेतले आहे. गावात १४व्या वित्त आयोगाच्या आणि इतर निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असते, तर हा प्रकार घडला नसता, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या : सत्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करणाऱ्या राज्यातील फडणवीस सरकारने आधी ८९ लाख लाभार्थी शेतकऱ्यांची यादी द्यावी. मगच कर्जमाफीविषयी बोलावे. कारण आतापर्यंत प्रत्येक तालुक्यातील मोजक्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा मिळाला आहे. अन्य शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार, असा सवाल कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी वैजापूर येथे सोमवरी आयोजित जनआक्रोश मोर्चाप्रसंगी केला.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, वीज बिलमाफी, संजय गांधी योजनेचे अनुदान एक हजार रुपये, रस्त्यांची दुरुस्ती या मागण्या मान्य न झाल्यास कोणताही मंत्री व अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यातील फडणविस सरकारविरुद्ध असलेला जनतेचा रोष व्यक्त करण्यासाठी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पुढाकाराने वैजापूर शहरात जनआक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार नामदेव पवार, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ. परदेशी, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश नाईकवाडी, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, महिला आघाडीच्या जयमाला वाघ, बाजार समितीचे सभापती काकासाहेब पाटील, मनसुख झांबड, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, मर्चंट बँकेचे विशाल संचेती यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भाजप सरकारविरुद्ध घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात पोचला. यावेळी झालेल्या सभेत काँग्रेसच्या नेत्यांची भाषणे झाली. जाहिरातबाजी करून नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत आले, पण गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात या सरकारने समाजातील कोणत्याही घटकाचे कल्याण केले नाही. या सरकारच्या विचित्र धोरणांमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व गरीब जनता आज मेटाकुटीला आली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी ४४ हजार कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही. राज्यात ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा दावा हे सरकार करते, पण गेल्या चार महिन्यांपासून आम्ही या शेतकऱ्यांची यादी मागत आहोत. ही यादी द्यायला भाजप तयार नाही. मग कर्जमाफीची भाषा कशाला करता, असा सवाल आमदार सत्तार यांनी केला. या सरकारला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत डॉ. परदेशी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे हात मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. परदेशी, डॉ. काळे, आमदार झांबड यांनी राज्य सरकारवर टिका केली. या सरकारला परत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

वाणींचे नेतृत्व चांगले
शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना पक्षात कोणी गडबड केलेली चालत नाही. तसे केल्यास माझ्या दाराची पायरी चढायची नाही, असा त्यांचा खाक्या असतो. त्यामुळे पक्षात शिस्त राहते. तसे नेतृत्व काँग्रेसच्या नेत्यांनी करावे, असा सल्ला माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी दिला.

रेशीमबागेत दोन लाख कोटींचा गैरव्यवहार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रेशीमबागेत दोन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा पैसा भाजपने निवडणुकीसाठी ठेवला आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी यावेळी केला.

बाबांची फटकेबाजी
माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस नेत्यांचे कान टोचले. भाजपाला आता जनता मतदान करणार नाही हे स्पष्ट आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे. मी मुळ काँग्रेसचाच आहे. सोनिया गांधींचा कार्यकर्ता, माजी खासदार आहे. तेव्हा मला काँग्रेसमधून काढण्याचा अधिकार सत्तारांनादेखील नाही, असे बाबांनी बजावताच स्टेजवर हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता बांधणीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरा

$
0
0

परभणी : प्रत्येक पावसाळ्यानंतर रस्त्यांची दुरवस्था होत आहे. वारंवार रस्त्यांची दुरूस्ती करून देखील खड्ड्यांची निर्मिती होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी अन्य राज्यांमध्ये रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात येणारे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्ते दीर्घकाळ मजबूत राहतील, यासाठीच्या नवनवीन उपाययोजना देखील केल्या पाहिजेत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाची खड्डेमुक्त रस्ते अभियानांतर्गत सोमवारी आढावा बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्य अभियंता मुकुंद सुरवडकर, उपसचिव के. डी. पाटील, अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता एस. व्ही. पार्डीकर उपस्थित होते.
जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था संपविण्यासाठी रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे त्वरित पूर्ण करून, परभणी जिल्हा १५ डिसेंबरअखेर पूर्णपणे खड्डेमुक्त रस्ते करण्याचे निर्देश देखील पाटील यांनी दिले. तसेच यावेळी पाटील यांनी संबंधीत सर्व अधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर उपाययोजना करण्यासंबंधीच्या सूचना देखील दिल्या.
बंद सभागृहात, खड्डेमुक्तीचा आढावा
राज्यात १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्तीचा निर्धार केल्यानंतर, जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांनी बंद खोलीमध्येच खड्ड्यांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे त्यांनी हिंगोलीचा दौरा रद्द करत, परभणीमध्येच त्या जिल्ह्याविषयीही चर्चा केली. राज्य सरकारने खड्डेमुक्त रस्ते ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी चंद्रकांत पाटील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून, या कामांचा आढावा घेत आहेत. प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी केल्यानंतरच खड्ड्यांची परिस्थिती लक्षात येऊ शकते. या निमित्ताने चंद्रकांत पाटील सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सकाळी नऊ वाजता जिल्हा कचेरीच्या नियोजन सभागृहात बैठक घेतली. या सभागृहामध्ये मोहिमेचा आणि दुरूस्तीच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धक्काबुक्कीप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बंदोबस्तावरील सुरक्षा अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळाच्या परिसरात रविवारी दुपारी चार वाजता हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी विशेष सुरक्षा विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक ‌बद्रीनारायण बाबासाहेब तांबे (वय ३५) यांनी तक्रार दाखल केली आहे. तांबे हे गेल्या तीन वर्षांपासून महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षा व्यवस्थेचे काम पाहतात. उद्धव ठाकरे येणार असल्यामुळे रविवारी तांबे, पीएसआय दीक्षित, जमादार उपरे, लघाने, पुर्हे व चालक राठोडे हे सुरक्षा व्यवस्थेसाठी विमानतळावर गेले होते. ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवत व्हीआयपी गेटपासून कारपर्यंत पोचवले. नागरिकांना बाजूला करीत असताना त्यांचा काही जणांसोबत वाद झाला. ठाकरे हे त्यांच्या वाहनात बसल्यानंतर तांबे हे त्यांच्या शासकीय वाहनात बसत असताना १५ ते २० कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून ठेवत वाहनात बसण्यापासून मज्जाव केला. तांबे यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यकर्त्यांची समजूत घातल्यानंतर वाहन जाऊ देण्यात आले. ठाकरे यांचा कन्नड दौरा संपल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. त्यानंतर तांबे यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अनोळखी आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, रस्ता अडवणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अज्ञात
उद्धव ठाकरे कन्नड येथील दौऱ्यासाठी रविवारी औरंगाबादमध्ये आले होते. विमानतळातून बाहेर पडण्याचा त्यांना मार्ग ऐनवेळी बदलण्यात आला होता. त्यावेळी स्वागतासाठी थांबलेल्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती. या प्रकारानंतर बाचाबाची झाली होती. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला, मात्र गुन्ह्यात एकाही आरोपीचे नाव नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्गो डिसेंबरअखेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याच्या कामाला वेग आला आहे. कार्गो सुविधा देण्यासाठी सुरक्षाविषयक कामे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. ही कामे पूर्ण करून डिसेंबरअखेर कार्गो सेवा सुरू करण्याचे विमानतळ प्राधिकरणाचे नियोजन आहे.

औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. देशांतर्गत कार्गो सुविधा खासगी कंत्राटदाराकडे सोपविल्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा विमानतळ प्राधिकरणाकडून पुरविण्यात येणार आहे. विमानतळाच्या जुन्या इमारतीत आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्यात येणार आहे. तत्कालीन विमानतळ संचालक अलोक वार्ष्णेय यांनी आंतरराष्ट्रीय कार्गो सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीहून आलेल्या सुरक्षा समितीकडून सुरक्षेबाबत योग्य नियोजन करण्याचा अहवाल दिला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू झाली नव्हती. सध्याचे विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सुरक्षा समितीच्या तपासणी अहवालानुसार कार्गोच्या इमारतीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. याशिवाय कार्गो सुविधा उपलब्ध करून देताना ग्राहकांना कमीत कमी अडचणी येतील, असे नियोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय कार्गोसंदर्भातील बांधकाम विषयक कामांची पूर्तता करण्यात आली आहे.

येत्या आठवड्यापासून कार्गोच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या कांमाची सुरवात केली जाणार आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर मशीन पॉइंट आणि अन्य आवश्यक कामांची पूर्तता डिसेंबर पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे. ही कामे पूर्ण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधेसाठी निश्चित केलेल्या सुरक्षेच्या नियमांनुसार काम सुरू आहे. यामुळे समितीच्या फेरतपासणीत कोणतीही अडचण येणार नाही. हे सुविधा डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्यात विमानतळ प्राधिकरणाला यश मिळेल.
- डी. जी. साळवे, विमानतळ संचालक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा लाखांची बॅग चोरणारे दोघे जेरबंद

$
0
0

वाळूज महानगर ः गाडीत ठेवलेली सहा लाख रुपये असलेली बॅग चोरल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गाडीतून बॅग चोरल्याची तक्रार संदीप भवर यांनी आठ नोव्हेंबर रोजी पोलिस ठाण्यात दिली होती. या चोरीचा तपास सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे केला. सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले असता आरोपी जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसानी जळगाव यथे जाऊन आरोपी विकास राजू गुमाने (वय २४, रा. तांबापूर कुंजरवाडी, जि. जळगाव) व संजय बिरजू गारुंगे (वय ३१) यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपींवर इतर जिल्ह्यांतही गुन्हे नोंद आहेत. त्यांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरीप्रकरणात आणखी तिघे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. हा तपास पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, विजय पवार, विजय जाधव, नसीम खान, धुडकू खरे, दत्ता ढंगारे, सुदर्शन एखंडे, रितेश जाधव, संदीप बीडकर, गोकुळ कुत्तरवाडे, सुनील पवार यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीत गॅस्ट्राचा उद्रेक; तीन हजार रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या तब्बल तीन हजारांवर पोहोचली असून, सोमवारी चौथ्या दिवशी सामान्य रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या हजारावर असल्याचे स्पष्ट झाले. या चार दिवसांत किमान अडीचशे बालरुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्या सोमवारी किंचित घटली आहे.
छावणी परिषदेच्या सामान्य रुग्णालयामध्ये शुक्रवारी गॅस्ट्रोचे रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली. पहिला रुग्ण शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आला. त्यानंतर दिवसभरात गॅस्ट्रोच्या शंभर रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील ५२ रुग्णांना ‘आयव्ही’तून सलाइन, प्रतिजैविके व इतर औषधी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी २५२ रुग्णांवर उपचार झाले. त्यापैकी १७५ रुग्णांना दाखल करण्यात आले. तिसऱ्या दिवशी रविवारी सर्वाधिक १६४० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी ७५० रुग्णांना दाखल करण्यात आले. चौथ्या दिवशी सोमवारी दुपारी चारपर्यंत ६२० रुग्णांवर उपचार झाले. त्यापैकी ११२ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरापर्यंत किमान ३०० ते ४०० रुग्णांवर उपचार झाल्याचे सांगण्यात आले. या रुग्णांमध्ये १८ ते ४० या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असले तरी वृद्ध व लहान मुलांवरही उपचार झाले आहेत. रुग्णालयात पाच वर्षांपर्यंतच्या १३, तर ६ ते १४ या वयोगटातील २३४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. सर्व रुग्णांमध्ये उलट्या-जुलाब या तक्रारी समान असून, काहींना ताप-चकरा येत असल्याचे दिसून येत आहे.
रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारी दुपारी चारपर्यंत गॅस्ट्रोचे ओपीडीला २६१२, तर आयपीडीला १०८९ रुग्ण दाखल झाल्याचे सांगण्यात आले. छावणीच्या सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत घाटी तसेच लष्कर, महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाकडून सेवा दिली जात आहे. त्याशिवाय विविध सामाजिक कार्यकर्ते गरजेनुसार मदत करीत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन, सुहास दाशरथे, विजय वाघचौरे, छावणीचे उपाध्यक्ष संजय गारोल, सदस्य हनीफ शेख आदींनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. छावणी परिसरात गॅस्ट्रोचा फैलाव नेमका कशामुळे झाला, याची कारणे शोधण्यासाठी १२ कर्मचाऱ्यांच्या पथकाने ‘डोअर टू डोअर’ सर्व्हेक्षण सुरू केले आहे.

१४०० ओआरएस एकाच दिवशी
रुग्णालयात सोमवारी दिवसभरात १४०० ओआरएसची पाकिटे वापरण्यात आल्याचेही दिसून आले. निधीची कोणतीही अडचण नसल्याचे रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

माझ्या १७ वर्षीय मुलीला शनिवारी रुग्णालयात दाखल केले. अजूनही काही प्रमाणात त्रास होत आहे.
-सायरा बेगम, रुग्णाची आई

मला आज सोमवारी दुपारी दाखल केले असून, आतापर्यंत १५-१६ जुलाब झाले. मी छावणीचाच रहिवासी आहे.
-किशोर दळवी, रुग्ण

माझी स्वतःची रिक्षा असून रुग्ण-नातेवाईकांना आणण्या-नेण्यापासून व इतरही मदत करीत आहेत.
-शेख कादर शेख करीम, कार्यकर्ते

छावणीतील नऊ पिण्याच्या पाण्याचे व दहा स्टूल कल्चरचे नमुने तपासणीसाठी विभागीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दोन दिवसांत रिपोर्ट येईल.
-डॉ. गीता मालू, वैद्यकीय अधीक्षक, छावणी सामान्य रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्या राज्य शालेय बँड स्पर्धेचा मान औरंगाबादला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रीडा खात्यातर्फे आयोजित पहिली आंतरशालेय राज्यस्तरीय बँड स्पर्धा औरंगाबादेत १८ व १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. क्रीडा उपसंचालक कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने राज्यस्तरीय आंतरशालेय बँड स्पर्धा घेण्याची सूचना केल्यानंतर राज्याच्या क्रीडा खात्याने या स्पर्धेचे यजमानपद औरंगाबाद क्रीडा उपसंचालक कार्यालयाला दिले आहे. ही स्पर्धा प्रथम राज्यस्तरीय, त्यानंतर विभागीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. विभागीय स्पर्धेत गुजरात, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, दीव व दमन, दादरा, नगर हवेली या सहा राज्यांचा समावेश आहे.
विभागीय क्रीडा संकुलात १८ व १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत विभागीय क्रीडा संकुलात सहभागी संघांनी उपस्थित राहाणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातून २० मुलांचे, तर २० मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सहभागी संघांची भोजन व्यवस्था संबंधित शाळेने करावयाची आहे. प्रत्येक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आपापल्या जिल्ह्यातील संघांची माहिती विहित नमुन्यात ओळखपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातून एक मुलाचा व एक मुलींचा उत्कृष्ट बँड संघ सहभागी होईल. अधिक माहितीसाठी क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, चंद्रशेखर घुगे, मखरे, स्नेहा पाराशरे, राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा खात्यातर्फे करण्यात आले आहे.

बँड स्पर्धेच्या अटी

प्रत्येक बँड संघास सादरीकरणासाठी ३ ते ५ मिनिटांचा कालवधी
चित्रपट गीत व राष्ट्रगीताच्या धुनवर सादरीकरण नसावे.
बँडपथकाच्या सादरीकरणासाठी पाईप व ड्रम बँडचा समावेश असावा.
बँड पथकाचे सादरीकरण हे देशभक्तीपर असावे.
सहभागी संघांनी नोंदणी अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठीचा खर्च संबंधित संस्था, शाळांनी करावयाचा आहे.
स्पर्धकांनी पुरेसे अंथरूण व पांघरण्यासाठीचे साहित्य सोबत आणावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार कवितांमधून ‘बालप्रतिभे’चे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लहान मुलांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा म्गणून जय साहित्य प्रतिष्ठानतर्फे पहिल्यांदाच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली. त्यात तब्बल दोन हजार १०८ विद्यार्थ्यांनी त्यांच्या कविता पाठवल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना ‘नवोन्मेष विद्यार्थी काव्यप्रतिभा’ पुरस्कार देऊन हे प्रतिष्ठान गौरवणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा निःशुल्क होती. बालदिनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणाही प्रतिष्ठानने केली आहे.

विद्यार्थ्यांमधील साहित्यिकाला जागृत करणे, त्याला प्रोत्साहन देणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. चिमुकल्याच्या काव्यप्रतिभेसमोर परीक्षकांचा सुद्धा कस लागला. जय साहित्य प्रतिष्ठानतर्फे जानेवारी २०१८मध्ये घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनात काव्यप्रतिभा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. संमेलनात स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचेही स्वतंत्र काव्यसंमेलन घेणार आहोत, असे संयोजकांनी सांगितले.

राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे परीक्षण म्हणून संदीप ढाकणे, उद्धव भयवाल, अमरसिंह चंदेल, संजय घोगरे, लक्ष्मण सावंत, अश्विनी जगताप, उत्तरा अकोलकर, प्रतिभा हंप्रस आदींनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीकांत कुलकर्णी, रमेश ठाकूर,राजीव मासरूळकर, कृष्णा शिंदे, प्रियाराणी पाटील,अंजली चिंचोलकर,दिगंबर अवसरमल,जगदीश मुर्तिकर, वैभव धर्माधिकारी,अविनाश वाघमारे यांचे सहकार्य लाभले.

पुरस्काराचे मानकरी
प्राथमिक गट (पहिली ते सातवी) ः प्रथम - प्रणिता संतोष शिरसाठ (जि.प. प्रशाला आपतगाव क्रमांक एक, ता. जि. औरंगाबाद), द्वितिय - अतुल संतोष कांडेलकर (जि.प. प्रशाला टिटवी, ता. सोयगाव), तृतीय - ऋतुजा राधाकिसन धोत्रे (जि.प. प्रशाला भिंदोन, ता. जि. औरंगाबाद) चतुर्थ - संस्कृती गुप्ता (अग्रसेन विद्यामंदिर, औरंगाबाद), पाचवा क्रमांक - अनिकेत भाऊसाहेब साळवे (जि.प. प्रशाला, मोरहिरा ता. जि. औरंगाबाद).
माध्यमिक गट (आठवी ते दहावी) प्रथम - पुष्कर प्रमोद लोणारकर (कवठेकर प्रशाला, पंढरपूर, जि. सोलापूर), द्वितिय - पौरवी प्रशांत चंद्रात्रे (विद्या प्रबोधिनी प्रशाला, नाशिक) तृतीय - साक्षी जंजाळ (धारेश्वर विद्यालय, पळशी ता. जि. औरंगाबाद) चतुर्थ - वैष्णवी श्रीपाद जोशी (बाल विद्यामंदिर, परभणी), पाचवा क्रमांक - अनिकेत दिलीप बोरसे (संस्कार माध्यमिक विद्यालय, औरंगाबाद).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाणा ठाण्यावर दगडफेक, एक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या काचेवर दगडफेक करून काच फोडण्यात आली. हा प्रका रविवारी सकाळी अकरा वाजता घडला. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्या आरोपीला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
जालना रोडवरील चिकलठाणा गावाच्या मुख्य रस्त्याला लागून चिकलठाणा पोलिस ठाणे आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता संशयित आरोपी रामेश्वर जर्नाधन नगराळे (वय २५ रा. गांधेली) हा पोलिस ठाण्यासमोर आला. काहीही कारण नसताना रामेश्वरने हातात दगड घेऊन ठाण्याच्या इमारतीच्या समोरील काचेवर फेकून मारला. यामध्ये काच फुटून अंदाजे पाच हजारांचे नुकसान झाले. पोलिसांनी आरोपी नगराळेला पकडले. सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत चिकलठाणा पोलिस ठाणे येत असल्याने सिडको एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी आरोपी नगराळेला अटक केली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्याचे जमादार सुरेंद्र दिगंबर खिस्ती यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगराळेविरुद्ध सार्व‌जनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय दाखले एका क्लिकवर

$
0
0

विजय चौधरी, खुलताबाद
शासकीय दाखले मिळविण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट थांबावी म्हणून सरकारने ‘आपले सरकार’ पोर्टलचा आधार घेतला आहे. त्यामुळे विविध शासकीय दाखले नागरिकांना आता घरबसल्या मिळणार आहेत. आपले सरकार पोर्टलवर खात्याची नोंदणी केल्यानंतर कुठल्याही नागरिकाला घरबसल्या कुठल्याही दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. त्यामुळे आता विविध शासकीय दाखल्यांसाठी सेतू किंवा महा ई - सेवा केंद्रात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

शैक्षणिक व इतर कामांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना थेट तहसीलदार कार्यालयातच जावे लागत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास होत होता. शिवाय दाखले लगेच मिळतील याचीही खात्री नव्हती. अधिकारी कार्यालयात हजर नसल्यास रिकाम्या हातानेच परतावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत होता. त्यावर सरकारने सेतूची संकल्पना राबविली, परंतु यासाठी तहसीलदार कार्यालय आणि शहरातील विविध भागांत जावेच लागत होते. यानंतर सरकारने महा ई - सेवा केंद्रे सुरू केली, परंतु आता थेट ‘आपले सरकार’ हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

असे मिळतील दाखले
केवळ खाते नोंदविल्यास यूजर आयडी आणि पासवर्ड कायम सोबत ठेवावा लागणार आहे. आधार, मोबाइल नंबर आणि इतर अत्यावश्यक वैयक्तिक माहिती सादर करावी लागेल. आवश्यक असलेल्या दाखल्यांचा ऑनलाइन अर्ज माहितीसह सादर करावा लागेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर संपूर्ण प्रकरण दाखल्यासाठी सादर करता येईल. अर्ज संबंधित तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन पद्धतीने पाठविले जातील. त्यावर संबंधित यंत्रणेकडून लागलीच कार्यवाही केली जाईल. कागदपत्रांची पूर्तता झाली असल्यास वेळेत दाखला मिळू शकेल. ही सर्व प्रक्रिया मोबाईलवरून किंवा घरातील कम्प्युटरवरून करता येणार अाहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांची झुकझुक गाडी सिडकोत धुळखात पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको परिसरातील मुलांसाठी असलेली टॉय ट्रेन (रेल्वे गाडी) अनेक वर्षांपासून बंद आहे. ही रेल्वे ट्रायल म्हणून काही दिवस झुक झुक कर धावली, पण त्यानंतर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली. ही रेल्वे बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन धुळ खात पडून आहे.
सिडकोवासींसाठी मध्यवर्ती ठिकाणी गार्डन उपलब्ध असावे, या उद्देशाने १९९०मध्ये सिडको एन-आठमध्ये बॉटनिकल गार्डन विकसित करण्याची योजना सिडकोच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आखली होती. हे काम अनेक वर्ष काम रखडले, कालांतराने सिडको भागाचे मनपाकडे हस्तांतर झाल्यानंतर गार्डनच्या कामास गती मिळाली. हे गार्डन एलोरा कन्स्ट्रक्शने विकसित केले, असून ते गेल्या वर्षी महापालिकेने पुन्हा ताब्यात घेतले.
या गार्डनचे काम प्रगतीपथावर असताना तत्कालीन आमदार राजेंद्र दर्डा यांची पुढाकार घेऊन टॉय ट्रेन सुरू करण्यासाठी निधी दिली होता. त्यातून रेल्वे इंजिन, डबे आणले गेले. रेल्वे रूळ अंथरून आकर्षक स्टेशन बांधण्यात आले. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याची व्यवस्थेची चाचणी घेऊन तपासणी करण्यात आली. परंतु, ही रेल्वे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. परिणामी, तिचा आनंद घेण्यापासून मुले वंचित राहत आहेत.

महापालिका उदासीन

महापालिकेलाच इच्छा नसल्याने रेल्वे सुरू होत नसल्याचा आरोप होत आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे या गार्डनची काही वर्षात मोठी दुरवस्था झाली आहे. येथील कांरजे बंद आहेत. सुमारे १२ एकरावरील हे गार्डन सिडको भागातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरू शकते. त्यामुळे या प्रश्नांकडे पालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सिडको परिसरातील हे एक मोठे गार्डन असून देखभाल दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. परिणामी, गार्डन बकाल होत आहे. मुलांसाठीची रेल्वे तातडीने सुरू व्हावी, गार्डनला वैभव प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे.
- मकरंद कुलकर्णी, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images