Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लिन मॅन्युफॅक्चरिंग संकल्पनेचा समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (मसिआ) १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या लिन मॅन्युफॅक्चरिंग संकल्पना अंमलबजावणीची नुकतीच सांगता करण्यात आली. या प्रकल्पाला एमएसएमई-एनपीसीच्या व टीयुव्ही एसयुडी साऊथ एशिया कंपनीचे मार्गदर्शन मिळाले.
वाळूज येथील मासिआच्या सभागृहात सांगता समारंभ पार पडला यावेळी मासिआचे अध्यक्ष सुनील कीर्दक, एनपीसीचे प्रादेशिक संचालक टी. शंकरनारायणन व उपसंचालिका डॉ. अरुंधती चट्टोपाध्याय, सहाय्यक संचालक गौरव कदम, उद्योग सहसंचालक बी. एस. जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी उल्हास गुळवणे, यशवंत महाकाळ आणि सुनील खेडकर यांचा मासिआ व दोन्ही क्लस्टरच्या सदस्यांकडून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग क्लस्टर औरंगाबादमध्ये आहेत. येथील बारापैकी १० क्लस्टर मासिआच्या अंतर्गत आहेत. त्यात सुमारे १२० १२० कंपन्यांचा सहभाग आहे. इंजिनीअरिंग क्लस्टरमध्ये दहा व परिवर्तन क्लस्टरमध्ये आठ, अशा १८ कंपन्यांत उद्दिष्ट्ये साध्य करण्यात आली. ही संकल्पना सुरू करण्यासाठी मसिआचे सर्व माजी अध्यक्ष पृथ्वीराज शहा, अशोक काळे, रमण आजगावकर, भारत मोतिंगे, बालाजी शिंदे, विजय लेकुरवाळे यांनी आपापल्या कार्यकाळात प्रयत्न केले. या प्रसंगी अशोक काळे, हर्षवर्धन छल्लानी, रमण आजगावकर यांनी अनुभव सांगितले. क्लस्टरचे समन्वयक म्हणून अनिल पाटील यांनी काम पाहिले.

या लिन क्लस्टर्सचा उपयोग सहभागी कंपन्यांना झाला आहे. वार्षिक उलाढालील वाढ, उत्पादकतेत वाढ, मोकळ्या जागेत नव्या उद्योगाची स्थापना, उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधार, ग्राहकांच्या तक्रारीत घट, उत्पादन रिजेक्ट होण्याचे प्रमाण कमी, कामात सुसूत्रता आणि शिस्त, नवीन विचारांना गती आदी उपयोग कंपन्यांना या संकल्पनेमुळे मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घसरत्या दरांमुळे शेतकरी चिंतित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये दोन वर्षांतील पावसामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, कापूस आणि सोयाबीनला मिळालेला कमी भाव आणि अजूनही जाहीर न झालेले उसाचे दर, यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमामध्ये सापडला आहे.
बीड जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच गेल्या दोन वर्षात सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र ही वाढले आहे. मात्र यंदा एकीकडे कापसाच्या भावात गेल्या वर्षीपेक्षा तेराशे रुपये घट आहे. दुसरीकडे सोयाबीन उत्पादक प्रतिक्विंटल दोन हजार ते अडीच हजार रुपये मिळत असल्याने हवालदिल आहे. तर उसाला भाव जाहीर झाला नसल्याने ऊस उत्पादक संभ्रमित आहे. एकूणच यंदा शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट या पडत्या भावाने निर्माण केले आहे.
जिल्ह्यात काही वर्षात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. यावर्षी तब्बल दोन लाख तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिली आणि सोयाबीन काढणीच्या काळात पावसाने उघडीप दिली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन भिजल्याचे चित्र पहायला मिळाले. सोयाबीनच्या उत्पादनात पावसाच्या ओढ बसल्याने घट आली व बाजारात भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरले. गेल्या वर्षी सोयाबीनला २९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. यंदा मात्र दोन हजार ते अडीच हजार रुपये भाव सोयाबीनला मिळतो आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचे या उतरलेल्या भावाने अडचणीत आला आहे.
दोन वर्षांत पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे नगदी पीक असलेल्या ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे संकट वेगळे आहे. जिल्ह्यातील वैद्यनाथ, अंबाजोगाई, येडेश्वरी, सुंदरराव सोळंके, जय महेश, छत्रपती, जय भवानी हे सात साखर कारखान्यांमध्ये गाळप होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्या उतरल्या. ऊस तोडणी आणि वाजत गाजत गाळप हंगाम सुरू झाला. मात्र, सातपैकी एकाही साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे भाव कारखान्यांनी जाहीर केले असले, तरी बीड जिल्ह्यात मात्र राजकीय भूमिका वेगवेगळी असलेले कारखानदार उसाच्या भाव न जाहीर करण्याच्या भूमिकेवर एक आहेत, हे विशेष. सर्वच कारखान्यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्याएवढा भाव देऊ, अशी सावध भूमिका या कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी दराबाबत अंधारात आहेत.
वेचणीचा खर्च दुप्पट
बीड जिल्हा हा गेल्या काही वर्षात कापूस पिकासाठी ओळखला जात आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांपाठोपाठ बीडमध्ये कापूस लागवड होते आहे. जिल्ह्यात यंदा कापसाचा पेरा तीन लाख एकतीस हजार हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या या पिकाची नगदी पैसे मिळवून देणारे पीक अशीही ओळख आहे. त्यामुळे कापसाचे क्षेत्र बीडमध्ये वाढते आहे. गेल्या वर्षी कापसाला विक्रमी पाच हजार आठशे रुपयांपर्यंत भाव मिळाला.
यंदा मात्र कापसाच्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होता. पावसाने ही कापसाच्या उत्पन्नात घट आली. यात आणखी कहर म्हणजे कापूस वेचणीसाठीचा दर यंदा वाढला. गेल्या वर्षी पाच रुपये असलेला वेचणीचा खर्च वाढला व आठ ते दहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस वेचणी शेतकऱ्यांना करावी लागली. तर बाजारात मिळणारा दर खूपच कमी आहे. यावर्षी कापसाला दिवाळीत चार हजार तर सध्या ४३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वेचणीचा खर्च दुपटीने वाढला आणि भाव मात्र एक हजार पाचशे रुपये कमी मिळाला. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक
अडचणीत आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतुकीसाठी तिसरी साइडिंग दौलताबादला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दौलताबाद रेल्वे स्टेशनवरून मालवाहतूक करण्यासाठी उद्योजकांच्या मागणीनुसार तिसरी साइडिंग टाकण्यात येत आहे. या साइडिंगवरून मालाची थेट वाहतूक करता येणार आहे.
रेल्वेद्वारे मालवाहतूक वाढावी यासाठी रेल्वे विभाग विविध प्रयत्न करत आहे. मालवाहतुकीसाठी विशेष कॉरिडोर तयार करण्याचे काम सुरू आहे. औरंगाबाद शहरातील विविध उद्योगांत तयार होणारा माल रेल्वेव्दारे पुरवठा करण्यासाठी दौलताबाद येथे कंटेनर डेपोची उभारणी करण्यात आली आहे. येथून एका आठवड्यात दोन दिवस मालवाहतूक केली जाते. याशिवाय लष्कराच्या माल वाहतुकीसाठी विशेष साइडिंग करण्यात आली आहे.
दौलताबाद स्टेशनवरील या दोन साइडिंगनंतर तिसरी साइडिंग तयार करण्याचे काम सुरू आहे. शहरातील लक्ष्मी इंटरप्राईजेस या निर्यातदार एजन्सीने तिसरी साइडिंग तयार करण्याची मागणी केली होती. ही साइडिंग तयार झाल्यानंतर येथे उद्योजकांना जागा उपलब्‍ध होणार आहे.

व्हिडिओकॉन साइडिंग बंद

औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीशेजारी व्हिडिओकॉन कंपनीसाठी साइडिंग तयार करण्यात आली होती. त्या वरून एकदाच मालवाहतूक करण्यात आली. ही साइडिंग अनेक वर्षांपासून उपयोगात नाही. ती बंद करून इतर मालवाहतुकीसाठी तिचा वापर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

साइडिंग म्हणजे काय

रेल्वेच्या डब्यात उत्पादने भरण्यासाठी रूळ टाकून प्लॅटफॉर्म बांधला जातो. येथे माल भरण्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था केली जाते. याला साइडिंग म्हणतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरल्याने छावणीत गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कर्णपुरा ते छावणी परिषद कार्यालय यादरम्यान असलेली जलवाहिनी वर घेण्याचा निर्णय छावणी परिषदेने घेतला आहे. दरम्यान, छावणीतील गॅस्ट्रोच्या साथीची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गंभीर दखल घेतली असून, छावणी परिषदेच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

छावणी परिसरात शुक्रवारी रात्रीपासून गॅस्ट्रोची साथ सुरू झाली होती. मंगळवारी नव्याने ३०० रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या साडेतीन हजारांपेक्षा अधिक झाल्याची छावणीत चर्चा होती. छावणी परिषदेच्या रुग्णालयाचे डॉ. विनोद धामंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्व डॉक्टर, कर्मचारी, छावणी परिषदेचे नगरसेवक उपचार करत आहेत. परिस्थिती गंभीर झाल्याने लष्कराच्या डॉक्टरांसह महापालिकेच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले होते.

छावणी परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन पाइप लाइन आहेत. छावणीच्या लष्करी भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइप लाइन आहे. चार दिवसांपूर्वी छावणी परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइप लाइनचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने तातडीने लष्कराच्या पाइप लाइमधून पाणी घेण्यात आले. व्हॉल्व्ह खराब झाल्यानंतर ती पाइप लाइन पुर्णपणे रिकामी झाली. ती महापालिकेच्या ड्रेनेजच्या नाल्याच्या खाली असल्याने त्यात ड्रेनेजचे पाणी घुसले. त्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी कर्णपुरा नाका ते छावणी परिषद कार्यालयादरम्यान जमिनीखाली असलेली पाइप लाइन तातडीने उंच करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या कामाला दोन ते तीन दिवसांत सुरवात होईल. त्याचप्रमाणे घराघरात मेडिक्लोअरचे वाटप करण्याचा निर्णयही झाला छावणी परिषदेने घेतला आहे.

दरम्यान, ‘छावणी परिषदेतील गॅस्ट्रोची पसरलेल्या साथीबाबत माहिती का दिली नाही. पाच दिवस परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत का वाट पाहिली,’ असा गंभीर सवाल छावणी परिषदेची सीईओ विजयकुमार नायर आणि संबंधित अधिकाऱ्यांना करत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी फैलावर घेतले. त्यानंतर त्यांनी तातडीची बैठक घेऊन विविध यंत्रणांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासंबंधी सूचना केल्या.

जिल्ह्यातील प्रत्येक घटनेची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची असते. गॅस्ट्रोबाबत छावणी परिषदेला कळवण्याचीही गरज वाटली नाही आणि स्वत:ला परिस्थितीही हाताळता येत नाही. छावणीमध्ये दूष‌ित पाण्याने गॅस्ट्रो झाला. पहिल्या दिवसानंतर परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी गंभीर झाली. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पुरवणे ही छावणी परिषदेची जबाबदारी आहे. काहीही करा, पाणी स्वच्छ पाणी पुरवा, अशा सूचनाही नायर यांना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

सर्व वॉर्डांच दूष‌ित पाणी
गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकांमार्फत विविध घरांमधून शंभरावर पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ५० नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले. छावणीच्या सातही वॉर्डांमधील पाणी दूष‌ित आहे, हे यावरून स्पष्ट झाले. पाच दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ सुरू असतानाही छावणी परिषदेने अजूनही पाण्याच्या शुद्धिकरणासाठी काहीही ठोस पावले उचलली नसल्याचे उघड झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर घराघरात मेडिक्लेअरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला.

छावणीतील टाक्या, पाइप लाइन यांचा प्रश्न निर्माण झाला, हे उघड झाले आहे. यामुळे गॅस्ट्रोचे पेशंट वाढले. मी छावणीत जाऊन पाहणी केली आहे, परिस्थिती गंभीर होईपर्यंत वाट का पाहिली, असा प्रश्न छावणी परिषदेला केला. यानंतर संध्याकाळी मी तातडीची बैठक बोलावून या भागातील टाक्यांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. जीवन प्राधीकरणाची टीम देखील नियुक्त केली आहे. त्यांनाही सर्वेक्षण करून अहवाल देण्यास सांगितले आहे.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालकाकडून ४६ लाखांचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : फुलंब्री येथील भोईदेव शिक्षण संस्थेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत ४६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१४ ते मार्च २०१६ या काळात हा प्रकार घडला.

दत्ता पोताजी चोपवाड (रा. नवीन नांदेड) या माजी सैनिकाने तक्रार दाखल केली आहे. चोपवाड यांचा मुलगा महेश याचे डी. एड. झाले. त्याचे चुलत सासरे श्रीराम डुबूकवाड यांनी त्यांच्या पाहुण्याची फुलंब्री येथे शिक्षण संस्था असून तेथे शिक्षकाची नोकरी असल्याचे सांगितले. मार्च २०१४मध्ये ते संस्थेचे राजेंद्र वानखेडे यांना त्यांच्या एन अकरा येथील घरी भेटले. वानखेडे यांनी शिक्षकाची एक जागा शिल्लक असून, त्यासाठी चौदा लाख रुपये मागितले. चोपवाड यांनी वानखेडे यांना सात लाख रुपये रोख व उर्वरित रक्कम रितिका ‌इंडस्ट्रिजच्या बँक खात्यावर पाठवली. नंतर महेशने ‌डिसेंबर २०१५पर्यंत शाळेवर शिक्षक म्हणून काम केले, त्याने वानखेडे यांना नियुक्तीपत्र मागितले असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. चोपवाड यांनी जि.प.मध्ये चौकशी केली असता, भोईदेव शिक्षण संस्थेत शिक्षकाची जागा शासन भरणार असल्याचे समजले. चोपवाड यांनी वानखेडे यांना रक्कम परत मागितली असता त्यांनी टाळाटाळ केली.

बेरोजगारांना गंडवले
चोपवाड यांच्याप्रमाणेच वानखेडे कुटुंबीयाने मनोज जोशी, प्रभाकर पंडिवाड, नीलकंठ लाडेकर, स्वप्नील कोठवरे यांचीही शिक्षक, शिपाई पदासाठी नोकरी लावण्याच‌े आमिष दाखवत ३४ लाखांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. चोपवाड यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राजेंद्र वानखेडे, चंद्रकलाबाई वानखेडे, विजय वानखेडे व पल्लवी वानखेडे (काथोटे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक हेमंत कदम तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वशांतीसाठी बारा ज्योर्तिंलिंग धाम पायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तरुणांना लाजवणारा दांडगा उत्साह. दररोज किमान ४०-४५ किलोमीटरचा पायी प्रवास, हातात काठी, सोबत सात-आठ किलोचे ओझे व एक वेळचे जेवण करून त्यांनी ६२०० किलोमीटर अंतर कापून बारा ज्योर्तिंलिंग पूर्ण करण्याचे ठरवले आहे. विश्वशांतीचा संदेश देत ६५ वर्षांचे पुण्याचे दिवाकर नारायण घड्याळजी मंगळवारी व्यंकटेशनगरच्या रामकृष्ण निसळ यांच्याकडे मुक्कामी होते. या वयातही कसलीच भीती न बाळगता त्यांनी चार ज्योर्तिंलिंगचा पायी प्रवास केला. त्यांच्या या कष्टदायी प्रवासावर साधलेला संवाद.

आपल्याविषयी माहिती सांगाल ?
- मी मूळचा पुण्याचा. शासकीय यांत्रिकी मंडळामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून सेवा दिल्यानंतर २०१० मध्ये सेवानिवृत्त झालो. पत्नी, मुल, नातू असे आमचे सुखवस्तू कुटुंब.

पायी प्रवास का सुरू केला ?
- चालणे माझा नित्यक्रम आहे. मला सहकारी सुद्धा तसेच भेटले. दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी ३५ वारी पूर्ण केल्या आहेत. नंतर तर पायी प्रवास करण्याचा छंद जडला.

यापूर्वी आपण कोणता प्रवास पायी केला?
-४० दिवसांचा जवळपास १६०० किलोमीटरचा चार धाम पायी प्रवास माझे सहकारी जगदीश पटेल यांच्यासोबत पूर्ण केला. हिमालयाचा प्रवास तर अत्यंत आवडीचा. त्यामुळे हिमालयात सर्वाधिक प्रवास केला. पण सर्वात स्मरणीय प्रवास नर्मदा परिक्रमा होती. १०० दिवसांमध्ये ३६०० किलोमीटरची नर्मदा परिक्रमण स्वप्नच होते. नर्मदेचे उल्लंघन करायचे नाही किंवा मागे फिरायचे नाही. यातील बहुतांश भाग आदिवासी भागातून जातो. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतानाही ती माणसं आपले आदरातिथ्य करतात तेव्हा मन हेलावून जाते.

बारा ज्योर्तिंलिंग प्रवासाला कधी सुरुवात केली?
- या वर्षी २ अॉक्टोबरपासून रामेश्वरमपासून मी ज्योर्तिंलिंग प्रवास सुरू केला. विश्वशांतीचे आवाहन करून या ६२०० किलोमीटरच्या पायी प्रवासाचे नियोजन मी केले आहे. आत्तापर्यंत श्रीशैलम, परळी-वैजनाथ व औंढा नागनाथ पूर्ण केले. या महिन्यात घृष्णेश्वर, भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंग पूर्ण होतील. नंतर द्वारका-सोमनाथ, उज्जैनचे ओंकारेश्वर, काशी विश्वनाथ व शेवटी मार्चमध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ धामला मी असेल.

या वयात इतका पायी प्रवास करताना आरोग्याची काळजी कशी घेता?
- मी दिवसा फक्त बिस्कीट, दूध-पोहे असाच आहार घेतो. रात्री जेवण करतो. मुळातच पायी चालण्याची सवय व पायी प्रवास करण्याची इच्छाशक्ती मला खूप फायद्याची ठरते.

प्रवासादरम्यान आलेले अनुभव कसे होते?
- अर्थातच खूप छान. दक्षिण भारतापासून सुरूवात केली. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांनी मला मदत केली. कुणी निवारा दिला. कुणी नाश्ता दिला. पण वाईट वागणूक कुठेच मिळाली नाही. मी कधी मंदिरात झोपतो तर कधी कोणी आसरा देते. आपल्या भाषा वेगळ्या असूनही सर्वच भली माणसं भेटली. या प्रत्येक अनुभवाचे संचित मी नोंद करून ठेवतो.

युवा पिढीला काय आवाहन कराल?
- माझा पायी प्रवास आहे म्हणून मी स्वतःला मोठा म्हणणार नाही.पण प्रत्येकाने जीवनात असा एक तरी प्रवास नक्की करावा. पायी चालण्याचा व्यायाम तर सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे मन प्रसन्न होते.तणाव दूर होतात. आत्मिक समाधान मिळते. आता तर मोबाइल जवळ असतो. त्यामुळे भारताला स्वअनुभवातून अभ्यासा. देशाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नावर गाजणार पालिकेची सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातत्याने विस्कळीत होणाऱ्या पाणीप्रश्नावरून बुधवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा गाजण्याची शक्यता आहे. छावणी परिसरातील गॅस्ट्रोची लागण हा देखील सर्वसाधारण सभेत चर्चेचा विषय राहील.
नवनिर्वाचित महापौर नंदकुमार घोडेले यांच्या कार्यकाळातील बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा पहिलीच सभा आहे. या सभेला सामोरे जाण्यापूर्वी घोडेले यांनी प्रत्येक विभागाची आढावा बैठक घेतली व आवश्यक ती माहिती जाणून घेतली. असे असले तरी पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून सर्वसाधारण सभेत नगरसेवक प्रशासनाला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा आला आहे. अनेक भागात तीन-चार दिवसांच्या नंतर पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याच्या वेळेत देखील कपात झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. भारतनगर, बाळकृष्णनगर, गुरूदत्तनगर या भागात जलवाहिनी टाकण्यात आलेली नसल्यामुळे संतापलेल्या महिलांनी दोन दिवसांपूर्वी आमदार अतुल सावे यांच्या समोर माठ फोडण्याचे आंदोलन केले. छावणीमध्ये गॅस्ट्रोची लागण झाली. यावर मात करण्यासाठी व्हॉल्व्ह बदलण्याचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शटडाउन घेतला, याच दरम्यान बसस्टँड जवळ पाइपलाइन फुटली. त्यामुळे जुन्या शहरात पाणीबाणी निर्माण झाली. या सगळ्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटतील, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे दुर्लक्ष, समई उद्यान बकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन तीन व चार परिसरातील समई उद्यान नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची ओरड होत आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळे उद्यान परिसर बकाल झाला असून सर्वत्र गाजर गवत माजले आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने परिसरात टवाळखोरांचा त्रास वाढला असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सिडको एन तीन व चार हा परिसर उच्चभ्रुंची वसाहत म्हणून ओळखला जातो. याच परिसरातील मोकळ्या जागेत महापालिकेने पुढाकार घेत समई उद्यान विकास केले आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी तेथे आकर्षक अशी मोठ्या आकाराची समई बसविण्यात आली. त्यामुळे या उद्यानाची ओळख ही समई उद्यान अशी झाली आहे.
लहान मुलांसाठी खेळणी, नागरिकांसाठी खास आसन व्यवस्था, हिरवळ, वॉकिंगसाठी विशेष सोय या सोयींमुळे समई उद्यान मुलांसह नागरिकांचे आवडते ठिकाण झाले आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने उद्यान परिसराची देखभाल होत नाही. साफसफाई होत नसल्याने सर्वत्र गाजर गवत माजले आहे, असा आरोप आहे.
नागरिकांचा आवडता जॉगिंग ट्रॅकही खराब झाला असून त्यावरून चालणे अवघड झाले आहे. त्यात भर पडत आहे ती टवाळखोरांची. उद्यानाला द्वार नाही, सुरक्षारक्षक, उद्यानाची देखभाल करणारे कर्मचारी नाहीत. याचाच गैरफायदा टवाळखोर घेतात. या टवाळखोरांमुळे सर्वासामान्य नागरिक उद्यानात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
उद्यान उभारणीमागील उद्देश सफल करण्यासाठी आतातरी महापालिकेने पुढाकार घ्यावा, देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

चांगले जॉगिंग ट्रॅक, मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा, अशा अनेक सोयी सुविधा या उद्यानात आहेत. परंतु, केवळ मनपाच्या दुर्लक्षामुळे बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. टवाळखोरांचा त्रास होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- राहुल इंगळे, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौका घाटातील मंदिर हटविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
अाैरंगाबाद - जळगाव रस्त्यावरील चाैका घाटातील हनुमान मंदिर व मूर्ती वन विभागाने हटविली. या कार्यवाहीसाठी चाैका ग्रामस्थांनी सहकार्य केले.

हनुमान मंदिर वन खात्याच्या गट क्रमांक ३५०मध्ये उभारण्यात अाले हाेते. त्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. अाैरंगाबाद - जळगाव हा रस्ता चाैपदरीकरण हाेत अाहे. यासाठी या मंदिराची अडचण निर्माण हाेणार अाहे. हे मंदिर हटविण्यासाठी अाैरंगाबाद खंडपीठाचा अादेश हाेता. वन खात्याने चाैका ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना दहा नाेव्हेंबर राेजी नाेटीस दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी हे मंदिर हटविण्यास सहकार्य केले. हनुमानाची ११ फूट उंचीची मूर्ती अलगद काढून समाेर असलेल्या शिव मंदिराच्या मागच्या बाजुस सुरक्षित ठेवण्यात अाली अाहे.

यावेळी फुलंब्री येथील पाेलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन पाेलिसांचा बंदाेबस्त केला हाेता. गेल्या १५ ते १६ वर्षांपूर्वी हे मंदिर उभारले हाेते. जागा शाेधून नवीन मंदिर उभारले जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन खात्याचा रथ पडला बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वृक्ष लागवड अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत म्हणून वन खात्याने काढलेला प्रचार व प्रसार रथ मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाला. जिल्ह्यातील विविध भागात हा रथ जाणार असून, माहितीपट, पोस्टर आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. दरम्यान, उद्घाटनप्रसंगी रथ बंद पडल्याने पाहुण्यांसमोर वन अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

येत्या तीन वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वन खात्याने हाती घेतले आहे. यात एक ते सात जुलै २०१८ या कालवधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. वन विभाग, इतर विभाग व ग्रामपंचायतीच्या सहभागाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी वन विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत.

या उपक्रमाची माहिती जनसामान्यांना व्हावी, त्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा म्हणून प्रचार व जनजागृती रथ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भ्रमण करीत आहे. हा रथ मंगळवारी बीड जिल्ह्यातून औरंगाबादेत दाखल झाला आहे.

उस्मानपुरा येथील कार्यालय आवारात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झाले. उपमहापौर विजय औताडे, मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन, उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

खुलताबाद, कन्नड, अजिंठा, सिल्लोड आदी भागातून हा रथ जाणार असून, तेथील शैक्षणिक संस्था, गर्दीचे ठिकाण आदी भागात जनजागृती करण्यात येणार अाहे. त्यानंतर हा रथ जालना जिल्ह्यात जाईल.

आणि वाहन पडले बंद
चित्रफित दाखविण्याची सुविधेसह अन्य जनजागृती पोस्टर, माहिती आकर्षक चित्र अशा सजविलेल्या बस या जनजागृतीसाठी वापरण्यात येत आहे. त्या-त्या जिल्ह्यातील वन विभागाच्या वाहनचालकांची नेमणूक या रथचा स्थारथी म्हणून करण्यात आली आहे. सकाळी अकराच्या सुमारास महापौर घोडेले यांनी हिरवा झेंडा दाखवत मोहिमेचे उद्घाटन केले, पण तांत्रिक अडचणीमुळे चालकास रथ सुरूच करता आली नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. शेवटी बंद पडलेल्या बसला हिरवा झेंडा दाखवत कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. दरम्यान, दुरुस्ती झाल्यावर हा प्रचार व प्रचाररथ जिल्ह्यात रवाना करण्यात आला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसदरासाठी आंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
साखर कारखाने, साखर आयुक्त व सबंधित विभागांची बैठक बोलावून योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने आम्ही ऊस वाहतूक करणारी वाहने वगळता अन्य गाड्या न रोखण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

उसाला तीन हजार १०० रुपये प्रती क्विंटल किंवा ७० - ३० या तत्त्वानुसार भाव मिळावा यासाठी, पैठण व शेवगाव तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी कृती समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना एक नोव्हेंबरपासून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे. साखर कारखान्यांनी आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने सोमवारपासून कृती समितीने पैठण शेवगाव रस्त्यावर सलग सात तास ‘रास्ता रोको’ केले.

ऊस उत्पादकांनी आंदोलन तीव्र केल्यानंतर, सोमवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. साखर कारखाने, साखर आयुक्त व संबधित सरकारी विभागांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती कृती समिती सदस्य माऊली मुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे आम्ही ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहने न रोखण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुळे यांनी दिली.

आंदोलकांनी मंगळवारी केवळ उस वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतल्याने. त्यामुळे मंगळवारी दिवसभर पैठण शेवगाव रस्त्यावरील ऊस वाहतूक बंद होती. ढोरकीन परिसरात बैलगाड्यांच्या माध्यमातून ऊस वाहतूक सुरू होती. ही माहिती आंदोलकांनी मिळाली. त्यांनी तेथे जाऊन बैलगाडीच्या टायरमधील हवा सोडून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधारबनची शाळा शिक्षकांमुळे प्रकाशमान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
शाळेची इमारती नाही. अनेक दिवसांपासून शाळा बंद. शाळेत खुर्च्या, फळा, खडू आदी प्राथमिक साहित्यही नाही. शाळेचे बँकेत खातेही नाही... जिल्हा परिषदेच्या अंधारबन येथील शाळेतील हे चित्र. दोन शिक्षकांची या दुर्गम भागातील शाळेत बदली केली जाते. ते रुजू होतात. शाळेची अवस्था बदलण्याचा निश्चय करतात आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येते. एकेकाळी अडगळीत पडलेली शाळा बालकांच्या किलबिलाटाने भरून जाते...

भराडी केंद्रांतर्गत अंधारबन (मोढा बुद्रुक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सुनील महाजन आणि दयानंद लाठे या शिक्षकांनी कायापालट केला आहे. त्यांची २०११मध्ये या शाळेत बदली झाली. त्यावेळी शाळेला इमारत नव्हती. अनेक दिवसांपासून शाळा बंद होती. शाळेचे कोणत्याही बँकेत खाते नसल्याने शासनाचे अनुदान मिळत नव्हते. शाळेत बसण्यासाठी खुर्ची, हजेरीपट, खडू आदी साहित्यही नव्हते. मोल मजुरी करणाऱ्या पालकांची मुले या शाळेत आहेत. पुरेशी विद्यार्थी उपलब्ध असताना देखील शाळेला जमीन देण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. शिक्षणाविषयी तळमळ असलेले शेतकरी सीताराम सोनवणे यांनी शाळेसाठी एक रुपयाही न घेता पाच गुंठे जमीन दान दिली. शाळेच्या जागेचा प्रश्न मिटला.

प्रथम स्वतः पदरमोड करून शिक्षकांनी शाळेसाठी प्राथमिक साहित्य आणले. हार न मानता जिद्दीने दोन्ही शिक्षकांनी हळुहळु शाळेत सकारात्मक बदल करायला सुरुवात केली. बँकेत शाळेचे खाते उघडून निधीसाठी पाठपुरावा केला. इमारतीचा पाठपुरावा करून बांधकाम पूर्ण करून घेतले. शाळेला बोअर घेऊन २४ तास पिण्याच्या पाण्याची सोय केली. प्रत्येक विद्यार्थ्याला हात धुण्याची सोय केली. खडकाळ जमिनीवर उजाड माळरानावर स्वतः खड्डे खोदून काळी माती आणली. शाळेभोवती झाडी व सुंदर गार्डन उभे केले. सध्या या शाळेत २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांना स्टील ताटांमध्ये पोषण आहार दिला जातो. सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढून पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा केली आहे. गरीब शेतकरी, शेतमजुरांच्या ज्या मुलांनी कधी टीव्ही पाहिलेला नाही. प्रजासत्तादिनानिमित्त त्या मुलांकडून अथक परिश्रमाद्वारे मोबाइलच्या माध्यमातून तीन तासांचा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम बसविला. त्यानंतर गावकऱ्यांनी शाळेला सढळ हाताने मदत केली. लोकसहभागातून साउंड सिस्टीम, स्मार्ट एलईडी टीव्ही, सौर ऊर्जा संयंत्र बसवून शाळा १०० टक्के डिजिटल करण्यात आली आहे. साउंड सिस्टीमचा वापर विद्यार्थ्यांचा रोजचा परिपाठ, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी केला जातो.

ज्ञानरचनावादाचा उपयोग
स्मार्ट एलईडी टीव्हीवर विविध शैक्षणिक अॅपद्वारे विद्यार्थ्यांना गणिती, इंग्रजी शिकविले जाते. अभ्यासक्रमातील अवघड भाग टीव्हीच्या माध्यमातून समजण्यास सोपा जातो, असा अनुभव आहे. वीज बिलाची सोय नसल्याने शाळेला सौर ऊर्या सयंत्र बसविले आहे. शाळेत निसर्ग सहल, क्रीडास्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व शासनाचे सर्व उपक्रम घेतले जातात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शाळेच्या भिंती व फरशांवर चित्रे काढली आहेत. ज्ञानरचनावादाचा वापर केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याचा खून करून २९ लाखांचा दरोडा

$
0
0



वाळूज महानगरः गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे सोमवारी रात्री प्रसिद्ध व्यापारी केशरचंद उत्तमचंद जाजू (वय ८१) यांचा खून करून चोरट्यांनी २८ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

लासूर स्टेशन येथील जुना मोंढा भागात शिवाजी मैदानाजवळ जाजू यांचे घर आहे. घरामागील लोखंडी दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश केला असावा. घरातील तिजोरीतून ९० तोळे सोने, पाच किलो चांदी, तसेच अडीच लाख रुपये रोख असा ऐवज चोरीस गेल्याची माहिती आहे. ही तिजोरी चावीने उघडल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसत आहे. चोराने जाजू यांना शस्त्राचा धाक दाखवून तिजोरी उघडली असल्याची शक्यता आहे. यावेळी जाजू यांचा मुलगा कैलास जाजू व त्यांची पत्नी वरच्या मजल्यावर झोपले होते. ते सकाळी खाली आल्यानंतर वडील रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिस अधीक्षक आरती सिंह, उपअधीक्षक उज्ज्वला वनकर, अविनाश सोनवणे, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सपोनि मिलिंद खोपडे, उपनिरीक्षक संदीप काळे, प्रशांत मुंढे, अशोक गंगावणे, अप्पासाहेब काळे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.

बाजारपेठ बंद
घटनास्थळी ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण केले असता गणपती मंदिर परिसरातील समतानगर रस्त्यापर्यंत जाऊन श्वान पथक थांबल्याची माहिती मिळली आहे. दरम्यान, लासूर स्टेशन येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. या घटनेची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका अभियंत्यावर हक्कभंगाची कारवाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पाणीपुरवठा व्यवस्थेबद्दलची माहिती वेळेत दिली नाही म्हणून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करा,’ असे आदेश स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला दिले.

स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांनी भारतनगर, बाळकृष्णनगर, गुरुदत्तनगर वसाहतींचा पाणीप्रश्न मांडला. या वसाहती अस्तित्वात आल्यापासून पालिकेने जलवाहिनी टाकलेली नाही. जलवाहिनी टाकण्याच्या नागरिकांच्या मागणीची दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी या भागातील महिलांनी आमदार अतुल सावे यांच्यासमोर माठ फोडला. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच हे घडले. त्यासर्व वसाहतींमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम तात्काळ करा, अशी मागणी त्यांनी केली. सभापतींनी या संदर्भात चहेल यांना खुलासा करण्यास सांगितले. चहेल म्हणाले, ‘आठ - दहा दिवसांत अंदाजपत्रक तयार केले जाईल.’ त्यानंतर सभापती म्हणाले, ‘अंदाजपत्रक तयार करून त्या भागात पाइपलाइन टाकण्याचे काम लवकर सुरू करा. पाणीपुरवठा योजनेसंदर्भात तुम्हाला लेखी माहिती मागितली होती. अद्याप तुम्ही ती दिली नाही. सभापतींचा आदेश न मानल्यामुळे तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची करण्यात येईल.’ सभापतींच्या आदेशानुसार चहेल यांच्यावर खरोखरच कारवाई झाली, तर हक्कभंगाला सामोरे जाणारे ते महापालिकेतील पहिलेच अधिकारी ठरतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...दिल है छोटासा!

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खेळ खेळा. त्यामुळेच शारीरिक, बौद्धिक विकास होतो, असे मार्गदर्शन करत चक्क महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाधिकारी डॉ. भरत कदम यांनी मंगळवारी बालदिनाचे औचित्य साधून मुलांसोबत विटी दांडूचा डाव खेळला.

गरवारे कम्युनिटी सेंटरच्या ‘बालोत्सव २०१७’ कार्यक्रमाला उपमहापौर विजय औताडे, गरवारे उद्योग समुहाचे अध्यक्ष विनोद नांदापूरकर, नगरसेवक मकरंद कुलकर्णी, सेंटरचे संचालक सुनील सुतवणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. परिसरातील विविध शाळांतील दोनशे मुलांसाठी पारंपरिक खेळ घेण्यात आले. मान्यवरांनाही हे खेळ खेळण्याचा मोह आवरला नाही. विटी दांडू खेळून कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. नंतर मात्र बच्चेकंपनीने दुपारपर्यंत खेळाचा मनसोक्त आनंद घेतला. मोबाइल,सोशल मीडियाच्या युगात मुलांमध्ये खेळ खेळण्याची भावना जणू लुप्त झाली. मुलांना मातीची ओळख व्हावी, संघभावना वाढावी व त्यांच्यातील सृजनात्मक गुणांचा विकास व्हावा म्हणून सेंटरतर्फे मुलांसाठी पारंपरिक खेळ घेण्यात आले.

यावेळी चिरकी पाणी, तीन पायाची शर्यत, विटी दांडू, लिंगोरचा, गोट्या, सागरगोट्या, भोवरा, भिंगरी,आंधळी कोशिंबीर, चक्का रेस, चंपूल, चक्री पानी पोत्याची रेस, तीन पायांची शर्यत, रस्सीखेच या मैदानी खेळांचा आनंद मुलांनी घेतला. तर फेस पेंटिंग, मेंदी आणि चित्रही काढली. कार्यक्रमासाठी सुलभा जोशी, सुधीर बहिरगावकर, विक्रांत वायकोस,शिल्पा कुलकर्णी,रमाकांत रौतल्ले आदींसह सेंटरच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

या शाळा सहभागी
मुकुल मंदिर, वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, बळीराम पाटील विद्यालय, महापालिका शाळा एन सात, शिशुविकास केंद्र, संस्कार बालक मंदिर, सोनामाता बालक मंदिर, पार्वती कन्या मंदिर, गोदावरी पब्लिक स्कूल शाळेतील मुले या उपक्रमात सहभागी झाले. २५ स्वयंसेवक, सेंटरचा महिला विभाग व छंदवर्गाचे पालक यांनी सर्व खेळ घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ वेळेत निकालाचे आव्हान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शैक्षणिक वेळापत्रकाच्या नियोजनासाठी पदवी-पदव्युत्तर परीक्षेचे निकाल लवकर जाहीर करण्याचे परीक्षा विभागासमोर आव्हान आहे. पदव्युत्तर वर्गांचे प्रथम सत्र दोन महिने उशिरा सुरू झाल्यामुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत आहे. प्रथम सत्र परीक्षा झाल्यानंतर कमी कालावधीत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या सुटीनंतर लवकर रुजू होण्याबाबत प्राध्यापकांना विनंती केली असून कुलगुरू अंतिम निर्णय घेणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया दीर्घकाळ चालल्यामुळे वार्षिक वेळापत्रक विस्कळीत झाले. जुलै महिन्यात पदव्युत्तर वर्गाच्या तासिका सुरू होणे अपेक्षित होते, मात्र स्पॉट अॅडमिशनच्या प्रक्रियेत जास्त वेळ गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रथम सत्राचे वर्ग सुरू झाले. अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा कालावधी मिळाला नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व प्राध्यापकांनी केल्या आहेत. किमान दुसऱ्या सत्राचा वेळेत अभ्यासक्रम पूर्ण होऊन परीक्षा वेळेत घेण्यासाठी परीक्षा विभागाने नियोजन केले आहे. पदवी-पदव्युत्तर वर्गाच्या परीक्षा चार डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर सुटीत अधिक वेळ न घालवता पेपर तपासणीचे काम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. परीक्षेनंतर फक्त आठ ते दहा दिवसांचे अंतर ठेवून उत्तरपत्रिका तपासणीची तयारी करण्यात आली आहे, मात्र प्राध्यापकांना विनंती केल्यानंतरही त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर निकालाचे भवितव्य अवलंबून आहे. दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्यास परीक्षा विभाग अडचणीत सापडू शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या पदवीचे तीन लाख पाच हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पदव्युत्तर वर्गांचे विस्कळीत शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी केली आहे.

उत्तरपत्रिका दररोज जमा
परीक्षा झाल्यानंतर संबंधित केंद्रावर उत्तरपत्रिका ठेवू नये अशा स्पष्ट सूचना परीक्षा विभागाने दिल्या आहेत. औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद येथे उत्तरपत्रिका जमा करण्याचे प्रमुख केंद्र आहे. शिवाय प्रत्येक तालुक्याला सब कलेक्शन सेंटर दिले आहे. तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या उत्तरपत्रिका तालुक्याच्या केंद्रात जमा करण्यात येतात आणि दुसऱ्या दिवशी जिल्हा केंद्रात जमा करण्यात येत असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. परीक्षा प्रक्रियेसाठी १७ मूल्यांकन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

पदवी-पदव्युत्तर परीक्षेनंतर आठ ते दहा दिवसांचा सुटीचा कालावधी ठेवण्याचा प्रयत्न आहे. प्राध्यापकांना विनंती केली असून लवकर निकाल लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत कुलगुरुंशी चर्चा करण्यात येईल. - डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत भाजपविरुद्ध सर्व विरोधक एकत्र?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची चर्चा आहे. नगर पंचायतीची निवडणूक येत्या १३ डिसेंबर रोजी होणार असून, नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे.

या निवडणुकीची गेल्या पावणेतीन वर्षांपासून प्रतीक्षा होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप सर्व १७ वॉर्डात लढणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आघाडी बनवून भाजपविरुद्ध रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी पक्षचिन्ह बाजुला ठेवले जाईल, अशी चर्चा आहे. फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक पक्षचिन्हावर होत असली, तरी ही निवडणूक व्यक्तीभाेवती फिरणारी अाहे. यामुळे पक्षापेक्षा कोण कोणत्या बाजुने उमेदवारी घेतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ व शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे हे या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील. शिरसाठ हे २० वर्षे फुलंब्रीचे सरपंच होते. राजेंद्र ठोंबरेे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष अाहेत. या भागाचे खासदार रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अाहे. यामुळे हे दाेन्ही नेते या निवडणुकीत पूर्णवेळ लक्ष देणार अाहे. त्यांच्याच नावावर ही निवडणूक हाेत असल्याचे चर्चेतून समाेर येते. शिवसेनेचे नेतृत्त्व तालुका प्रमुख राजेंद्र ठाेंबरे यांच्याकडे असेल. कांग्रेसचे माजी अामदार डाॅ. कल्याण काळे हेही या निवडणुकीत पक्षाची ताकद आजमविणार अाहेत. त्यांच्यावतीने तालुकाध्यक्ष संदीप बोरसे हे उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन देशमुख यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेे.

उमेदवारांची चाचपणी
उमेदवारी अर्ज १८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वांनी बैठका सुरू केल्या. वॉर्डावॉर्डांतील संभाव्य उमेदवार हे अापली भूमिका सांगून स्थिती जाणून घेत अाहेत. गावातील प्रभावी व्यक्तींच्या भेटीवर भर देण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सहा वॉर्डातून १७ सदस्य निवडले जात होते, मात्र १७ वॉर्डातून १७ नगरसेवक निवडले जातील. त्यामुळे वॉर्डरचना समजून घेण्यात संभाव्य उमेदवारांचा वेळ गेला. वॉर्डांचा अभ्यास करून राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षप्रवेशासाठी भाजपकडून ५ कोटींची ऑफर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपनं आपल्याला पाच कोटी रुपये आणि विधान परिषदेवर घेण्याची ऑफर दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हा गौप्यस्फोट केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला. 'गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील आणि आपली भेट झाली होती. यावेळी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं. त्याबदल्यात पाच कोटी रुपये देण्याचं आणि विधान परिषदेवर घेण्याची ऑफरही पाटील यांनी दिली,' असं जाधव यांनी सांगितलं.

२५ आमदारांना ऑफर

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ आपल्या एकट्यालाच नव्हे तर २५ आमदारांनाही पाटील यांनी ही ऑफर दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. जाधव यांनी थेट पाटील यांचं नाव घेऊन हा दावा केल्याने त्यावर पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भाजपकडून पाच कोटींची ऑफर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटींची ऑफर दिली आहे,’ असा गौप्यस्फोट कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केल्यामुळे वेगळ्याच राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

‘मटा’शी बोलताना जाधव म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांची कामे करा, असा नागरिकांचा आग्रह आहे. रस्त्यांची कामे केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी मी दरवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधतो. पाठपुरावा करतो, पण त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. दीड वर्षात माझ्या मतदारसंघातील एकाही रस्त्याचे टेंडर निघालेले नाही. ही व्यथा घेऊन मी चंद्रकांत पाटील यांना भेटलो. माझ्या मतदारसंघातील रस्त्यांची कामे होत नाहीत. काही तरी सोक्षमोक्ष लावा अशी विनंती केली. यावर पाटील भाजपमध्ये या सर्व कामे होतील, असे म्हणाले. मी तर शिवसेनेचा आमदार आहे. भाजपमध्ये कसा येणार, असा प्रश्न केला. यावर पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्या आणि भाजपमध्ये या. पुन्हा निवडून येण्यासाठी पाच कोटी रुपये देतो अशी ऑफर दिली,’ असा दावा जाधव यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी मला दिलेल्या पाच कोटीच्या ऑफरची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून दिली आहे. मतदारसंघातील कामे व्हावीत हाच माझा उद्देश आहे. बाकी कशाशीही मला देणे घेणे नाही. मी छोटा माणूस आहे. मला मंत्री, मुख्यमंत्री काहीही व्हायचे नाही. - हर्षवर्धन जाधव, आमदार, शिवसेना

आपले अपयश लपवण्यासाठी हर्षवर्धन जाधवांकडून नौटंकी सुरू आहे. चंद्रकांत पाटील हे मंत्री आहेत. त्यांना कोणताही आमदार भेटू शकतो. त्यापद्धतीने ते भेटले असतील. भाजपची बदनामी केल्याबद्दल आम्ही निश्चितच योग्य ते पाऊल उचलू आणि निर्णय घेऊ. - माधव भंडारी, प्रवक्ते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ९०० लोकांना कोट्यवधींना गंडविणाऱ्या बिल्डरला बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील तब्बल ९०० लोकांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून २५ कोटींचा गंडा घालणारा मुंबईचा पसार बिल्डर प्रमोद विजयशंकर पालला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी महावीर चौकातील हॉटेलमध्ये बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सिडको, मुकुंदवाडी, छावणी, पुणे व डोंबवली पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

स्वस्त घर योजनेत एक लाख २० हजार रुपये गुंतवणारे सेवानिवृत्त जमादार राम पुंडलिक उदावंत यांनी दोन वर्षांपूर्वी सिडको पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आज पाल महावीर चौकातील हॉटेल रवीराज येथे आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना मिळाली. या माहितीवरून हॉटेलमध्ये छापा टाकून पालला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पीएसआय अनिल वाघ, नितीन मोरे, मनोज चौहान, भगवान शिलोटे, शेख हकीम, दत्तात्रय गाडेकर, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

कामगारांना लुबाडले
२०११मध्ये पालने दोन साथीदाराच्या मदतीने भीम फाउंंडेशन संस्था स्थापन करून वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. तीन लाखांमध्ये पडेगाव भागात स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवले. या जाहिरातीला भुलून शहरातील सुमारे ९०० जणांनी या संस्थेशी संपर्क साधला. यामध्ये कामगार व गरिबांचा जास्त समावेश होता. या नागरिकांनी घराची मागणी केल्यानंतर पालने आपल्या साथीदारांसह पोबारा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images