Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खाद्य तेलावरचे आयात शुल्क वाढविल्याने दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
शुक्रवारी रात्री केंद्र सरकारने सोयाबीन, सूर्यफूल, मोहरीच्या तेलावरील आयात शुल्कात मोठी वाढ केली. त्यामुळे शेतकरी आणि देशी तेल उद्योगाला मोठा दिलासा लाभला असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी लातूरात पत्रकार परिषदेत दिली.
देशात सध्या सोयाबीनसारखे पीक हमी भावापेक्षा कमी भावने विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. पामतेलावर ३० टक्के, रिफाइंड सूर्यफुलावर ३५ टक्के, क्रुड सोयाबीनवर ३० टक्के, तर रिफाइंड सोयाबीनवर ३५ टक्के, मोहरी तेलावर २५ आणि ३५ टक्के आयात शुल्क केले.
देशात सध्या सहाशे तेल कारखाने आहेत. त्यापैकी तिनशे बंद असून ३५० कारखाने हे अर्ध्याच क्षमतेने चालवले जात आहेत. सोमवारपासून बाजारात सोयाबीनचे भाव हमी भावाच्या किमान आसपास तरी पोहचतील अशी माझी खात्री आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे तेल उद्योगातील व्यापाऱ्यानीही आनंद व्यक्त केला असल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली.

गेल्या आठवड्यात सरकारने डाळीच्या निर्यातीवरील बंदी उठवली त्यामुळे डाळ उत्पादक आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला असून आता सरकारे सोयाबीन उत्पादकाना मदत करण्यासाठी हा नवा अध्यादेश काढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सोमवारी बाजार उघडल्यानंतर नव्या अध्यादेशाचे परिणाम दिसू लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांसाठी कितीही अध्यादेश काढावे लागले तरी ते काढेल. परंतु, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आता पर्यंतचे सरकारे ही ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय करीत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी आणि शेतमाल उत्पादकाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे असा निर्णय झाला असल्याचे सांगून राज्य कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीपेक्षा ही जास्त फायदा सरकारने केल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.


अनेक वर्षानंतर तेलबिया आयातीवर केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवून उद्योजकांचा आणि शेतकऱ्यांचा फायदा केला आहे. माजी आमदार पाशा पटेल यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने लातूरकर म्हणून आनंद होत आहे. आम्ही सोयाबीनच्या खरेदी दरात शंभर रुपयांनी वाढ केली असून सोमवारनंतर बाजार सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात १५० रुपयांनी तर सूर्यफुलाच्या दरात दोनशे रुपयांची वाढ अपेक्षीत आहे. तेलबीयासाठी सरकारचे असेच धोरण राहिले तर शेतकरी पुन्हा सोयाबीनचा पेरा वाढवतील आणि देशातील तेल उद्योगाला पुन्हा चालना मिळणार आहे.
अशोक भुतडा, तेल उत्पादक, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांच्या प्रश्नांपुढे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत निरुत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कापसाला भाव नाही, काहींच्या घरी लग्न आले, कसे करायचे सांगा? पीक विमा ऑनलाइन, कापसावर अळी ते ऑनलाइन, सगळं ऑनलाइन करातरी, पैसे मिळंना सांगा, आम्ही आत्महत्या करायची नाही तर काय करायचं? शेतकऱ्यांच्या या प्रश्नांपुढे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत निरुत्तर झाले. बोंडअळीने कपाशीवर हल्ला चढविल्याने, बाळापूर येथे शेतावर जाऊन खोत यांनी कपाशीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी याप्रसंगी प्रश्न विचारून मंत्र्यांना भंडावून सोडले.
जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीवर हल्ला चढविल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा बाधित गावांतील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी थेट बाळापूरच्या बांधावर खोत सायंकाळी पोहचले. गावातील ताराबाई खाडे यांच्या शेतावर कृषी अधिकारी मंत्र्यांना घेऊन गेले. मंत्री येणार असल्याने अधिकाऱ्यांचा फौजफाटा हजर होता तर, शेतकरीही पोहोचले होते. बोंडअळीची माहिती घेत, अनुदानासाठी अर्ज भरला का, असा प्रश्न करताच शेतकऱ्यांना प्रारंभी कशाचे अनुदान हे कळाले नाही. खोत यांनी त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत, असे सांगत अधिकाऱ्यांना सूचना करत होते, तोच शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सगळे ऑनलाइन करता, पीकविमाही ऑनलाइन आता हेही. आम्ही काय काय ऑनलाइन भरायचे सांगा? तरी, पैसे मिळेनात. अनुदान कधी मिळणार ते सांगा? गावात वीज नाही..कालच वीजवाले आले होते वीज तोडू म्हणाले, तुम्ही आले म्हणून हे तुमचे अधिकारी शेतीवर आले आहेत, असे प्रश्न, समस्या मांडत शेतकऱ्यांनी सदाभाऊंवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कपाशीला सात हजार रुपये भाव द्या, एक बॅग वेचायला हजार रुपये लागतात. शेतकऱ्याने मरायचे की काय? असा प्रश्नही आला अन् दाहकता लक्षात घेत खोत हेही निरुत्तर झाले. यावेळी सुभाष पवार, भानुदास खाडे, वैजनाथ वाघ, ताराबाई खाडे हे शेतकरी उपस्थित होते.
तुम्ही आले म्हणून तुमचे अधिकारी शेतीवर आले, असे सांगताच संतापलेल्या खोत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. ‘तुम्ही कृषी अधिकारी आहात, तुम्ही खुर्ची सोडा शेतावर जा. तुम्हाला सिमेंट काँक्रिटची सवय लागली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सुनावले. कर्ज माफीच्या प्रश्नावर मंत्री म्हणाले की, जुन्या सरकारमध्ये दीड वर्ष लागले होते, आम्हाला घोषणा करून वर्षही झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कर्ज माफीचे पैसे १५ दिवसांत जमा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कर्जमाफी अंतर्गतचे पैसे टप्प्या टप्प्याने १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील,’ असे आश्वासन कृषी, फलोत्पादन, पणन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

जिल्ह्यातील कृषी, पाणी पुरवठा, स्वच्छताबाबत खोत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी खोत म्हणाले, ‘कर्जमाफी योजनेतंर्गत थकबाकीदारांना दीड लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू असून, १५ दिवसांत टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. जिल्ह्यात कापसावरील बोंडअळीने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी अधिकारी तक्रार अर्ज भरून घेतील. ज्या कंपन्या नुकसान भरवाई देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मान्यताप्राप्त नसलेल्या फवारणीची औषध विक्री होते. त्यांच्यावरही कारवाई करू. मुख्यमंत्री पेयजल योजनांची रखडलेली कामे गतीने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांवर कारवाई करावी,’ अशा खोत यांनी अधिकाऱ्यांना केली.

राजू शेट्टी दुर्योधन
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाभारतातील दुर्योधन आहेत. त्यांनी धर्मराज्याच्या भूमिकेतून पाहिले असते, तर त्यांना चांगले दिसते असते. त्यांनी मला नेहमी दुर्योधनाच्या नजरेतूनच पाहिले. त्यामुळे त्यांना वाईट दिसले,’ असे खडेबोल खोत सुनावत शेट्टींनी यापूर्वी केलेल्या पौराणिक संदर्भाच्या टीकेला खोत यांनी उत्तर दिले. ‘अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू होते. बाहेरगावच्या लोकांनी आंदोलन भडकावले. शेतकऱ्यांचे प्रश्न समोपचाराने सुटले पाहिजेत. गोळीबारीचे मी समर्थन करत नाही,’ असे खोत म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वेतनासाठी शिक्षकांचे ‘पिंडदान’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दशक्रिया चित्रपटाबाबतचा वाद राज्यभर गाजतो आहे. हाच धागा पकडत विनावेतन किती दिवस काम करायचे असा सवाल करत विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी शनिवारी कायम विनाअनुदानित धोरणाविरोधात ‘पिंडदान’ करत निषेध व्यक्त केला.

सोळा वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे हजारो शिक्षक असून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी राज्यभर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षकांनी क्रांती चौकातील आंदोलनात आपल्या व्यथा मांडल्या. महागाईच्या काळात विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना आपला उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले आहे. अनुदानपात्र १६२६ शाळांसोबत एक जुलै व दोन जुलै २०१६च्या निर्णयानुसार अनुदानपात्र घोषित आणि मूल्यांकनपात्र शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुप्टा महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचे शिवराम म्हस्के, मिलिंद खरात, मलखांब राठोड, हाज्जू शेख, राजेश हिवराळे, ए. ए. बल्लाळ, बी. यू. लिंगायत, नितीन खरात, आर. के. खिल्लारे, संजय साळुंके, संतोष जाधव, व्ही. एम. खेडकर, बी. डब्ल्यू गायकवाड आदींची
उपस्थिती होती.

आमच्यावर गोळ्या चालवा
सोळा वर्षांपासून पगारविना काम करत आहोत. वारंवार आंदोलनानंतरही आश्वासने देण्यात आली मात्र, प्रश्न निकाली निघाला नाही. मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी मोर्चावर लाठीहल्ला करण्यात आला. आता आमच्यावर गोळ्या चालवा, असेही मेलेलो असे सांगत यावेळी शिक्षकांनी व्यथा मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘एटीकेटी’चा निर्णय अंगलट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना सरसकट ५० टक्के एटीकेटी देण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंगलट आला. कुलपतींच्या अधिनियमाचे उल्लंघन करून अतिरिक्त ‘एटीकेटी’ दिल्यामुळे परीक्षा विभागाने संबंधित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली नाही. परिणामी, दोन हजार विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन नवीन परिपत्रक काढण्याची शक्यता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेचा निकाल घसरल्यामुळे एटीकेटी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. सतत आठ दिवस निवेदने, आंदोलन आणि उपोषणाने विद्यापीठ प्रशासन जेरीस आले होते. कुलपतींच्या निकषानुसार २५ टक्क्यांपेक्षा जास्त एटीकेटी देता येत नाही, मात्र राजकीय हस्तक्षेप वाढताच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सरसकट ५० टक्के एटीकेटी देण्याचा निर्णय जाहीर केला. गुणपत्रिका मिळाली नसल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी तात्पुरते प्रवेश दिले. मागील तीन महिन्यांपासून गुणपत्रिकेच्या मुद्द्यावर विद्यापीठ प्रशासन टोलवाटोलवी करीत आहे. येत्या २८ नोव्हेंबरपासून अभियांत्रिकीची परीक्षा असल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कुलपतीच्या अधिनियमाप्रमाणे अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना २५ टक्क्यांपर्यंत एटीकेटी देण्याची तरतूद आहे. अधिनियम पायदळी तुडवून विद्यापीठाने ५० टक्के एटीकेटी जाहीर केली. तांत्रिक निकष न पडताळता कुलगुरूंनी एटीकेटीचा निर्णय घेतला. राज्यपालाच्या अधिनियमाचे उल्लंघन असल्यामुळे परीक्षा विभागाने गुणपत्रिका देण्यास नकार कळवला आहे. गुणपत्रिका दिली नसल्यामुळे महाविद्यालयांनी प्रवेश मिळालेल्या वर्गाची परीक्षा देण्यास मज्जाव केला आहे. वार्षिक शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. भरमसाठ शुल्क भरूनही परीक्षा देता येणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे. आंदोलने करून एटीकेटी मागणे योग्य नसल्याचे सांगत कुलगुरू सारवासारव करीत आहेत. दुसरीकडे दोन हजार विद्यार्थी संतप्त झाले आहेत. दरम्यान, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन दिवसांत विद्यापीठ प्रशासन ‘एटीकेटी’ मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन परिपत्रक काढण्याची शक्यता आहे.

मनविसेचे निवेदन
विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना रिन काढून सण साजरा करायला लावत आहे. कुलगुरूंकडून विद्यार्थी हिताचे निर्णय अपेक्षित असताना एटीकेटीचा निर्णय घेऊन एटीकेटीचा निर्णय घेऊन विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब केल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव राजीव जावळीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. एटीकेटीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. विद्यार्थ्यांना व्याजासह शैक्षणिक शुल्काचा परतावा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मनविसे पोलिस आयुक्तांकडे करणार आहे. या निवेदनावर राजीव जावळीकर, अक्षय खोबरे, मंगेश साळवे, अविनाश साळवे, महेश तुरे, मंगेश सोनवणे, अजिंक्य खरात, गौतम त्रिभुवन यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजी म्हणतात, बदली हवी !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करत बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी बदली हवी आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला.

२७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने तत्काळ कार्यमुक्त करण्याची एकमेव मागणी घेऊन जिल्ह्यातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरून बदली हवी आंदोलन समितीच्या वतीने आयोजित मोर्चात सहभागी झाले. शनिवारी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद मैदानावरून हा मोर्चा गुलमंडी-सिटीचौक-काळा दरवाजा-दिल्ली गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नियोजनपूर्वक शिस्तबद्ध व स्वच्छ मार्गाने मोर्चा पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. दुर्गम भागातील शिक्षकांनी बदली किती आवश्यक आहे, हे पटवून देण्यासाठी भावना व्यक्त केल्या. त्यानंतर ५ महिलांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी डॉ. नवल किशोर राम यांना निवेदन देऊन मागणी मांडली. शिष्टमंडळात मंगला मदने,कौसर शेख,अर्चना गोर्डे, सारिका निवारे व जयश्री लाड या शिक्षिकांचा समावेश होता. मोर्चाला कुठलेही नेतृत्व तसेच संघटनेचे अधिष्ठान न देता शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

...अन्यथा साखळी उपोषण
दिव्यांग शिक्षक, विधवा, परित्यक्ता, कुमारिका शिक्षिका, मतिमंद पाल्यांचे पालक, ५३ वर्षांपेक्षा जास्त सेवाज्येष्ठ शिक्षक,गंभीर आजारी शिक्षक, ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर कार्यरत पती-पत्नी, दुर्गम भागात कार्यरत शिक्षक व वर्षानुवर्षे अंतर्गत भागात काम करणारे, विनंती बदली इच्छुक आदी प्रवर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक सहभागी झाले होते. मोर्चात ‘ उमेद नवी, बदली हवी,’ ‘हे आपले सरकार, पारदर्शक बदल्या करणार,’ ‘अब की बारी २७ फेब्रुवारी,’ ‘सोप्याचं लोणी, अवघडलाही चाखू द्या,’ ‘एकच चर्चा, कार्यमुक्ती पर्चा,’ आदी घोषणा देण्यात आल्या. निवेदनाप्रमाणे १९ नोव्हेंबरपर्यंत कार्यमुक्त केले नाही तर सोमवारी २० नोव्हेंबर नंतर आंदोलन तीव्र करून साखळी पद्धतीने उपोषणाचा इशारा बदली हवी आंदोलन समितीच्या समन्वयकांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नात्याचे द्वंद्व ‘नथिंग टू से’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वडील आणि मुलीच्या नातेसंबंधाचे हळवे पैलू उलगडणाऱ्या ‘नथिंग टू से’ नाटकाचा प्रयोग लक्षवेधी ठरला. उत्तम अभिनय, नेटके नेपथ्य आणि प्रवाही संहितेमुळे नाटक उठावदार झाले. अनेक प्रसंगांना भरभरून प्रतिदाद देऊन रसिकांनी नाटकाचा आनंद घेतला.
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नाट्यरंग संस्थेच्या प्रसाद दाणी लिखित व रोहित देशमुख दिग्दर्शित ‘नथिंग टू से’ नाटकाचा प्रयोग झाला. तापडिया नाट्यमंदिरात रविवारी सायंकाळी झालेल्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडील आणि मुलीच्या नातेसंबंधाचा वेध घेणारे नाटक उत्तम रंगले. बदलत्या काळानुसार कुटुंबव्यवस्था बदलली आणि ओघात नातेसंबंधही बदलले. बदलाच्या वादळात अनेक प्रश्न उभे राहिले. बाप आणि मुलीच्या नात्याचा शोध घेणाऱ्या मुलीची कथा नाटकात उत्कटतेने समोर आली. वडील नसल्याचा त्रास सहन करीत असलेल्या मालविकाची घुसमट वाढते. अखेर वडीलांना शोधत ती त्यांच्यासमोर घुसमट व्यक्त करते. मात्र, आई-वडीलांच्या दुराव्याचे कारण कळल्यानंतर तिचा दृष्टिकोन बदलतो. माधव सहस्त्रबुद्धे आणि मालविका यांच्या नात्याची संवेदनशील कथा नाटकाचे वेगळेपण ठरली. जग्या या पात्राचा विनोदी प्रसंगासाठी खुबीने वापर करीत नाटकातील भावनांचा समतोल साधला गेला. गंभीर प्रसंगातील संवाद रसिकांची दाद घेऊन गेले. या नाटकात रोहित देशमुख, निकिता मांजरमकर, सुनील कांबळे व विक्रांत भालेराव यांच्या भूमिका होत्या. संगीत योगेश इरतकर, प्रकाशयोजना शिवकुमार जाधव, नेपथ्य उमेश राजहंस, गौतम सोनवणे, रंगभूषा कविता दिवेकर आणि वेशभूषा प्राजक्ता सुपेकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या.

‘नको गं बाई’ आज

जालना येथील नाट्यरंगपूर संस्थेच्या ‘नको गं बाई’ नाटकाचा सोमवारी सायंकाळी प्रयोग होणार आहे. सतीश लिंगडे लिखित या नाटकात सामाजिक विषय मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयाद्यांचे नियोजन विस्कळित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या केंद्रनिहाय मतदारयाद्या जाहीर झाल्या नसल्यामुळे प्रचार थंडावला आहे. विद्या परिषदेची निवडणूक २४ नोव्हेंबर आणि पदवीधर गणाची निवडणूक चार डिसेंबरला आहे. पदवीधर गणातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी (२० नोव्हेंबर) संपणार आहे.

मतदार नोंदणी, उमेवदारी अर्ज दाखल करणे, उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात विलंब लावल्यामुळे विद्यापीठाचा निवडणूक विभाग चर्चेत आहे. विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचे पुरेसे नियोजन नसल्यामुळे उमेदवार व मतदारांची गैरसोय झाली आहे. निवडणूक विभागाने चार जिल्ह्यांतील मतदारांची यादी जाहीर केली आहे. मतदान केंद्रनिहाय यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे निवडणूक विभागाने कळवले होते, मात्र निवडणूक चार दिवसांवर असूनही याद्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. शिक्षक आणि विद्यापरिषद गणासाठी मतदार मोजके आहेत. पदवीधर गणासाठी ३० हजार मतदार असल्यामुळे याद्या लवकर प्रकाशित करण्याची मागणी आहे. जिल्हा, तालुका आणि केंद्रनिहाय याद्या जाहीर झाल्यास प्रचार करणे सहजसोपे होणार आहे. तसेच मतदारांनाही मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे. पदवीधर गणाचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपणार आहे. तब्बल ९५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. जवळपास सात पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, मात्र काही उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत किती उमेदवार राहणार याची उत्सुकता वाढली आहे. विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने रविवारी देवगिरी महाविद्यालयात पदवीधर मेळावा घेतला. या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शहरातील शिक्षक आणि पदवीधर मेळाव्याला उपस्थित होते. आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्यावर मेळाव्यात चर्चा झाली.

दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणची मतदान केंद्रे वगळून फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान केंद्र राहण्याची शक्यता आहे. या नियोजनामुळे मतदार आणि उमेदवारांची गैरसोय होणार आहे. उमेदवारांनी मागणी केल्यास केंद्रनिहाय योग्य नियोजन होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उत्कर्ष पॅनलची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा शिक्षक व विद्यापरिषदेची निवडणूक २४ नोव्हेंबरला आणि अधिसभा पदवीधर गटाची निवडणूक चार डिसेंबरला आहे. विद्यापीठाने मतदारयाद्या मतदान केंद्रनिहाय प्रसिध्द केल्या नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी केंद्रनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे अधिसभा शिक्षक गटाचे उमेदवार डॉ. राजेश करपे आणि पदवीधर गटाचे उमेदवार डॉ. भारत खैरनार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली.

विकास मंचचे निवेदन
अधिसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विकास मंचाने निवडणूक विभागाला निवेदन दिले. निवडणुकीसाठी २४ नोव्हेंबरला शैक्षणिक सुटी जाहीर करा, मतदान केंद्राची संख्या वाढवा आणि मतदारांना मतदानाबाबत माहिती होण्यासाठी बॅलेट पेपर जाहीर करा अशी मागणी विकास मंचचे प्रमुख प्रा. गजानन सानप यांनी केली. मतदारयादी केंद्रनिहाय जाहीर करण्याची गरज आहे. मतदानाला के‍वळ तीन दिवस शिल्लक असूनही मतदारांना मतदान केंद्र माहिती नाही. त्यामुळे तातडीने यादी जाहीर करा, असे सानप म्हणाले, मात्र याबाबत ठोस उत्तर निवडणूक विभागाने दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैजापूरमध्ये बेकायदा आडत वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नगर पालिका हद्दीत भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून बेकायदा आडत वसूल करून भाज्यांचे लिलाव करणाऱ्या सात व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. हे लिलाव त्वरित थांबवण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणनच्या अधिनियमात २०१६ मध्ये शासनाने बदल केला असून त्यानुसार भाजीमाल खरेदी विक्रीच्या व्यवहारात शेतकऱ्यांकडून आडत वसूल करण्याऐवजी खरेदीदाराकडून आडत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पेंढेफळ (ता. वैजापूर) येथील रहिवासी गोकुळ आहेर यांनी वैजापूरच्या भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून बेकायदा आडत वसुली करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची तक्रार मुख्याधिकारी विठ्ठल डाके यांच्याकडे केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीनेसुद्धा या निर्णयची अंमलबजावणी सुरू केली आहे मात्र गेल्या तीन वर्षांपासून वैजापूर येथील भाजी मार्केटमध्ये हे व्यापारी कोणताही परवाना नसताना शतकऱ्यांच्या मालाच लिलाव करून त्यांच्याकडुन दहा टक्के आडत वसूल करत आहेत, तसेच नगरपालिकेच्या जागेचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे हा लिलाव त्वरित बंद करून शेतकऱ्यांकडून होत असलेली बेकायदा आडत वसुली थांबवावी अन्यथा सर्व व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुख्याधिकारी यांनी बजावले आहे. भाजी मार्केटमधील व्यापारी जीवन अशोक पहाडी, शेख गणी, शेख राजू शेख, नवनाथ मतसागर, सुनील देवकर, शकिल पठाण व पुंडलिक गायकवाड यांना कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद स्टेशन होणार ‘ए-वन’

$
0
0

औरंगाबाद ः सिकंदराबाद, मुंबई या ‘ए - वन स्टेशन’प्रमाणे औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथेही प्रवाशांच्या सुविधा येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद स्टेशनचे उत्पन्न ‘ए-वन’ दर्जाच्या रेल्वे स्टेशनच्या जवळपास पोचले आहे. वार्षिक उत्पन्नात आणखी पाच कोटी रुपयांची वाढ झाल्यास औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा दर्जा ‘ए - वन’ होईल, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली.

औरंगाबाद स्टेशनवर विशेष तिकीट तपासणीसाठी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक डॉ. सिन्हा आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, देशभरातील विविध रेल्वे स्टेशनची वर्गवारी करण्यात आलेली आहे. ए - वन या वर्गवारीत सिकंदराबाद, मुंबई स्टेशनचा समावेश होतो. तेथून रेल्वेला दरवर्षी सुमारे साठ कोटींवर उत्पन्न मिळते. तेथे सुविधाही जास्त आहेत.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात नांदेड आणि औरंगाबाद या दोन्ही रेल्वे स्टेशनमध्ये ‘ए वन’ दर्जा मिळविण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनहून दर रोज १५ हजारांहून अधिक प्रवासी जातात. या रेल्वे स्टेशन प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे उत्पन्न ५५ कोटींपर्यंत पोचले आहे. ‘ए - वन’ दर्जा मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपये असावे लागते. येत्या वर्षभरात उत्पन्न साठ कोटी रुपये झाल्यास स्टेशनला ‘ए - वन’ दर्जा मिळेल.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनची सद्य परिस्थिती
- दररोज २२ एक्स्प्रेस; १२ पॅसेंजरची वाहतूक
- आतापर्यंत कंटेनर डेपोतून ८० रॅक पाठविल्या
- रोज १६ हजार प्रवाशांची वाहतूक

‘ए- वन’ दर्जामुळे मिळतील या सुविधा
- स्टेशन मास्टरचा दर्जा स्टेशन डायरेक्टर होईल
- प्रत्येक फलाटावर सरकते जिने
- अपंग, वृद्धांसाठी फलाटावर बॅटरी ऑपरेटेड वाहने
- प्रत्येक फलाटावर फूड प्लाझा
- डिलक्स टायलेट, एसी वेटिंग रूम

पाच कोटींचा टप्पा गाठण्यासाठी...
- औरंगाबाद स्टेशनवरून मुंबई, दिल्ली; तसेच अन्य मार्गावरील रेल्वेची संख्या वाढवावी
- विना तिकीट प्रवास रोखण्यासाठी टीटी, आरपीएफ कर्मचारी संख्येत वाढ करावी
- रेल्वेद्वारे माल वाहतुकीसाठी स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन द्यावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकील कक्ष दालनाच्या बांधकामाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील वकिली व्यवसाय करणाऱ्या अनेक वकिलांचे खंडपीठ परिसरामध्ये कार्यालय थाटण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वकील कक्षाच्या बांधकामाचा शुभारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.
भारतात प्रथमच उच्च न्यायालयाच्या परिसरात वकिलांचे चेंबर होत आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर वकिलांना चेंबर मिळणार आहेत. या चेंबरचा लाभ सध्या ५१० वकिलच घेऊ शकणार आहेत. या चेंबरमुळे केवळ वकिलांचीच नव्हे, तर पक्षकारांचीही सोय होणार आहे. हा कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नरेश पाटील, न्या. भूषण गवई, न्या. रवींद्र बोर्डे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सानप, संघमित्रा वडमारे, सचिव आनंदसिंह बायस आदी उपस्थित होते. ‘औरंगाबाद खंडपीठाच्या इतिहासात नोंद होण्यासारखी ही बाब आहे. कासवगतीने का होईना, पण शर्यत जिंकल्याचा हा आनंद आहे,’ असे मत डॉ. मंजुला चेल्लूर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या बेल्लारी शहरातील महिलांच्या कक्षासाठी केलेल्या लढ्याची माहिती दिली.
ज्येष्ठ वकिलांचा सन्मान करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या असे आवाहन न्या. नरेश पाटील यांनी तरूण वकिलांना केले. औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी आपल्या भाषणात न्यायमूर्ती नेमताना संघाच्या सदस्यांचा विचार करावा, अशी मागणी केली. हाच धागा पुढे नेत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वच ठिकाणी चांगले व वाईट वकील आहेत. औरंगाबाद खंडपीठ वकिल संघाच्या सदस्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, याची अनेक उदाहरणे आहेत, असे त्यांनी सांगितले. कक्षाच्या बांधकामाला प्रारंभ झाला असला तरी याचे वाटप करण्याचे आव्हान असणार आहे, असे न्या. रवींद्र बोर्डे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्दी-पडशाने शहर हैराण

$
0
0

सर्दी-पडशाने शहर हैराण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकीकडे थंडीचा जोर वाढत असतानाच दुसरीकडे अचानक काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे औरंगाबादकरांना सर्दी-पडशाचा फटका बसला असून, सद्यस्थितीत घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. त्याचवेळी डेंगी व डेंगीसदृश रुग्णही उल्लेखनीयरित्या आढळून येत आहेत. यानिमित्ताने थंडीपासून जपण्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.
नोव्हेंबरच्या महिन्याच्या अगदी पहिल्या आठवड्यापासून थंडी जाणवत आहे. त्यातच मागच्या आठवड्यापासून थंडीची तीव्रता वाढली आहे. मात्र त्याचवेळी गेल्या चार-पाच दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण असल्याने सर्दी-पडशाचे तसेच एकूणच विषाणुजन्य आजारांचेही रुग्ण वाढल्यामुळे सद्यस्थितीत घरोघरी एक-एक, दोन-दोन, तीन-तीन सदस्यांना विषाणुजन्य आजारांचा फटका सहन करावा लागत आहे. या संदर्भात चिकित्सक डॉ. अनंत कडेठाणकर म्हणाले, साधारणतः महिन्यापासून विषाणुजन्य आजारांचे रुग्ण वाढलेले दिसून येत आहेत. यामध्ये सर्दी-खोकला-तापेचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यामुळे थंडीपासून आणि विशेषतः सकाळच्या थंडीपासून जपणे गरजेचे असून, थंड व तेलकट पदार्थ टाळावेत, असा सल्लाही डॉ. कडेठाणकर यांनी दिला.
इन्टेसिव्हिस्ट डॉ. अनंत कुलकर्णी यांच्यानुसार, सध्या सर्दी-ताप-खोकल्याचे रुग्ण ‘ओपीडी’मध्ये सर्वाधिक असून, सर्दी-खोकला वाढून निमोनिया झालेले रुग्णही उल्लेखनीय आहेत आणि यातील बऱ्याचशा रुग्णांना दाखल करण्याची वेळ येत आहे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. अंगदुखी-डोकेदुखीचे रुग्णही मोठ्या प्रमणावर आहेत. त्याचबरोबर डेंगी व डेंगीसदृश रुग्णही काही प्रमाणात नक्कीच आहेत, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. या मोसमात एकूणच विषाणुजन्य आजारांचे रुग्ण वाढतात; परंतु त्याचवेळी डेंगी व डेंगीसदृश रुग्णही वाढलेले दिसून येत आहेत. ‘स्वाइन फ्लू’चे प्रमाण सध्या तरी कमी आहे, असे मत इन्टेसिव्हिस्ट डॉ. आनंद निकाळजे यांनी नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाइट ठप्प; विद्यार्थ्यांची फरफट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. वेबसाइटमधील तांत्रिक अडचणींनी विद्यार्थ्यांची फरफट सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरला, शुल्क भरल्यानंतर अर्ज सेव्ह होत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज वारंवार भरावा लागतो आहे. अर्ज भरण्याची मुदत २२ तारखेपर्यंतच आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची परीक्षा असून आठ वर्षानंतर विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. दोन नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात शनिवारी दिवसभर वेबसाइट पूर्ण हँग होती तर, रविवारी दुपारपर्यंत हाच गोंधळ असल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. दिवसभर वेबसाइटवर ‘व्यूई पेज नॉट अव्हेलेबल’ असे लिहून येत होते. अर्ज भरल्यानंतर डेटा सेव्ह होत नव्हता. त्यामुळे अर्जातील माहिती पुन्हा पुन्हा भरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. सुरुवातीला अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित होती पण, अडचणीही होत्या. शनिवार आणि रविवारी विद्यार्थ्यांची संख्या वाढली अन् सर्व्हर डाउन झाले. विद्यार्थ्यांनी परिक्षा परिषदेच्या आयुक्तांनाही समस्या कळवल्या. त्यांना तांत्रिक दुरुस्ती केली जात असल्याचे सांगण्यात आले. अर्ज भरण्याची मुदत संपण्यास दोन दिवस शिल्लक असून वेबसाइटची स्थिती अशीच राहिली, तर संधी हुकेल अशी भीती राज्यातील डीटीएड, बीएडधारकांना आहे.

भरतीसाठीची पात्रता

शासकीय, स्थानिक स्वराज्य व खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीच आवश्यक करण्यात आली आहे. यातील पात्र विद्यार्थ्यांमधूनच संस्थांनाही निवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

२०० गुणांची परीक्षा

ही परीक्षा मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमातून होणार आहे. परीक्षा बहुपर्यायी २०० गुणांची असेल. अभियोग्यता चाचणीसाठी १२० व बुध्दिमत्ता चाचणीसाठी ८० गुण असतील. चाचणी परीक्षा दोन तासांची असून सर्व जिल्ह्यातील केंद्रावर तीन सत्रात होणार आहे. अभियोग्यतामध्ये गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचुकता, भाषिक क्षमता, बुध्दिमत्ता घटकामध्ये आकलन, वर्गीकरण, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान पातळी तपासली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची वेबसाइट आयटी विभागाकडून चालवली जाते. आम्ही त्यांना तांत्रिक अडचणी असल्याचे कळवले आहे. त्यांनीही सुरळीत करण्याची प्रक्रिया केली आहे. अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही दोन दिवसात वाढली असली तरी विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत.
-सुखदेव डेरे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार जोडप्यांचे लग्न लाऊन वाढदिवस साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जन्मदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस धुमधडाक्यात करणारे आपण आनेकजण पाहतो. मात्र, हा बडेजाव टाळत लग्नाचा वाढदिवस गरजवंत कुटुंबातील चार जोडप्यांचे शुभमंगल करून देत विलास, अलका कोरडे दांम्पत्याने समाजासमोर आदर्श ठेवला.
समाजातील गरीब, गरजवंत कुटुंबांना लग्नाचा खर्च करणे अनेकदा आवाक्याबाहेर जाते. कोरडे दांपत्याला याची जाणिव होती. आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचे त्यांनी ठरवले अन् त्यातून महिनाभरापूर्वी ‘सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा’ हा संकल्प केला. विविधसमाजातील जोडप्याची जुळवाजुळव सुरू झाली. लग्नासाठीची प्रक्रिया सुरू झाली. अखेर रविवारी कुलस्वामिनी मंगलकार्यालयात चार जोडपे रितीरिवाजानुसार, विवाह बंधनात अडकले. नवदांपत्यास आशीर्वाद देण्यासाठी नातलग, समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी हजेरी लावली. याप्रसंगी सतीश वामनराव सळे यांचा भारती राजेंद्र जगदाळे यांच्याशी, सखाराम मुंजाजी चौरे व किरणप्रभा गंगाधर पाटील यांच्याशी, मुबारक मोहम्मद याकुब आणि रुकसार बेगम शेख रियाज यांचा व महादेव सोपान जावळे व स्वाती संदीप खळगे हे विवाह बंधनात अडकले.

घरगुती साहित्य

विलास, अलका कोरडे दांपत्याने लग्नाचा २५ वा वाढदिवस असा आगळावेगळा साजरा केला. लग्नसोहळ्यात मंगळसूत्र, जोडवे अशा वस्तुंसह कुटुंबांना गरजेचे घरगुती साहित्यही देण्यात आले. त्यासह पुढचे पाच वर्ष त्यांच्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालावा यासाठी मार्गदर्शन, मदत करू, असे आश्वासन कोरडे दांपत्याने दिले आहे.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा

यावेळी काढण्यात आलेली नवरदेवांची मिरवणूक लक्षवेधक ठरली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासह, अनाथ आश्रमातील दीडशे मुली फेटे बांधून सहभागी झाल्या. प्रत्येकाच्या हातात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली प्रगती झाली’, ‘मुलगा-मुलगी नको भेद’ अशा आशयाचे सामाजिक संदेश देणार फलक हाती होते.

लग्नाचा वाढदिवस काही सामाजिक उपक्रम करून साजरा करावा असे ठरवले होते. अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा अनेक पालकांना आपल्या पाल्याचे लग्न करून देणेही अडचणीचे ठरते. आपण त्यांना मदत करू, असा विचार समोर आला आणि त्यातून कुलस्वामिनी प्रतिष्ठानने हा प्रयत्न केला.
-विलास कोरडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस्ट्रो रुग्णांचा ओघ सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील सामान्य रुग्णालयातील गॅस्ट्रोची रुग्णसंख्या सहा हजारांवर पोहोचली असून, गॅस्ट्रो उद्रेकाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी (१९ नोव्हेंबर) बाह्य रुग्ण विभागात ५०पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी आले. आंतररुग्ण विभागात १६ पेक्षा जास्त रुग्णांना दाखल करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, महापालिकेच्या टँकरद्वारे पिण्याचे पाणी व छावणी प्रशासनातर्फे वापरण्याचे पाणी पुरवले जात आहे. हा पाणी पुरवठा अपुरा असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे पाणी भरताना वादावादी होत आहे.
छावणीतील गॅस्ट्रोच्या उद्रेकाला दहा दिवस लोटले आहेत. छावणी परिषदेच्या सामान्य रुग्णालयामध्ये १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता गॅस्ट्रोचा पहिला रुग्ण उपचारासाठी आला. त्यानंतर आतापर्यंत ओपीडीतील रुग्णांची संख्या सहा हजारांवर, तर आयपीडीतील रुग्णांची संख्या पावणे दोन हजारांपर्यंत पोचली आहेत. गॅस्ट्रो उद्रेकाच्या दहाव्या दिवशी रविवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी चारपर्यंत गॅस्ट्रोचे ५० रुग्ण आले, यापैकी १६ रुग्णांना दाखल करण्याची वेळ आली. सामान्य रुग्णालयातील रुग्णसंख्या सहा हजारांपर्यंत पोहोचली असली तरी, छावणीतील एकूण गॅस्ट्रोची रुग्णसंख्या तब्बल १४ ते १५ हजारांपर्यंत असू शकते, अशीही भीती व्यक्त होत आहे.
छावणी परिसरातील तीन ते चार खासगी क्लिनिकमध्येही रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर उपचार घेतले आणि अजूनही काही प्रमाणात उपचार घेत आहेत. त्यामुळे गॅस्ट्रोच्या उद्रेकाची दखल थेट राज्यस्तरावरून घेतली जात आहे. मात्र त्यानंतरही प्रशासनाने उशिरा कार्यवाही केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. हा संताप शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) उत्स्फूर्त बंदमधून व्यक्त झाला. दरम्यान, छावणी परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये लिकेज शोधण्यासाठी गुरुवार उजाडला आणि शुक्रवारपासून महापालिकेच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा, तर वापरण्यासाठीच्या पाण्याचा पुरवठा छावणी प्रशासनाच्या टँकरद्वारे सुरू झाला. मात्र अपुरा पाणी पुरवठ्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यातच कुठल्या वॉर्डात कमी, तर कुठल्या वॉर्डात जास्त पाणी पुरवठा होत असल्याचीही तक्रार नागरिकांकडून होत आहे.

सामाजिक संस्थांचा पुढाकार

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्थांकडून पिण्याच्या पाण्याचे जार वाटप सुरू आहे. यामध्ये तरूण क्रांती मंचअंतर्गत ‘गुरू परिवार’तर्फे विलास साहुजी, प्रीतम पाटणी, अमोल पाटणी, वृषभ कासलीवाल, प्रिया कासलीवाल, अंकुर साहुजी, सोनू संचेती, अनिल बडजाते, दर्शन बोंबले, संतोष बडजाते आदींनी जारचे वाटप केले. त्याशिवाय मोहम्मद समी, प्रशांत तारगे आदींनीही विविध वॉर्डात पाण्याचे वाटप केले.

आज होणार दुरुस्ती पूर्ण?

छावणीला पाणी पुरवठा करणाऱ्या लिकेज पाइपची दुरुस्ती सुरू असून, लिकेज पाइपलाइन बदलीचे काम रविवारी रात्रीतून पूर्ण होऊन सोमवारी सकाळी टेस्टिंग करण्याचा प्रयत्न असणार आहे. टेस्टिंगमध्ये पाणी पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर छावणीच्या पंपहाउसमध्ये पाणी पुरवठा सुरू करून नंतर टाक्यांमध्ये भरण्यात येईल. मंगळवारपासून (२१ नोव्हेंबर) पाणी पुरवठा पूर्ववत होईल, असे छावणीचे सीईओ विजयकुमार नायर यांनी ‘मटा’ला सांगितले.

टँकरद्वारे छावणीला होणारा पाणी पुरवठा अपुरा आहे. तसेच समान वाटप होत नसल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. जवळच्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.
- मयंक पांडे, अध्यक्ष, छावणी विकास युवा मंच

टँकर वॉर्डात आला की जास्तीत जास्त रहिवासी आपापले सर्व ड्रम एकदम भरून घेत आहेत. त्यामुळे वादावादी-भांडणे होत आहेत. नागरिकांनी सहकार्य करून संयम पाळल्यास सर्वांना पुरेसे पाणी मिळेल.
- विजयकुमार नायर, सीईओ, छावणी

छावणीच्या रुग्णालयात रविवारी ५० रुग्ण ओपीडीत आले व १६ रुग्णांना दाखल करण्यात आले. गॅस्ट्रो नियंत्रणात आला आहे व येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या शून्यावर येईल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. गीता मालू, वैद्यकीय अधीक्षक, छावणी रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामीण रुग्णालयाची राज्य स्पर्धेसाठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या ‘कायाकल्प’ पुरस्कार राज्य स्पर्धेसाठी येथील ग्रामीण रुग्णालय पात्र ठरले आहे. या स्पर्धेसाठी पुढील आठवड्यात राज्यस्तरीय तपासणी पथक मूल्यांकनानुसार पाहणी करणार आहे.
येथील ग्रामीण रुग्णालय १२ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय परिक्षणात जिल्ह्यात तिसऱ्या स्थानी व राज्यपातळीवर दहाव्या स्थानी आले होते. या स्पर्धेसाठी ग्रामीण रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलण्याकरिता प्रयत्न करण्यात आले. त्याला शहरातील काही ठराविक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आर्थिक सहकार्य केले. ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सुविधा, स्वच्छता व इतर बाबींकडे कटाक्षाने लक्ष दिले. लोकसहभागातून धन्वंतरी आर्युवेदिक उद्यान, प्रसुती पश्चात कक्षात मच्छरदाणी, रुग्णालयाच्या कक्षातील खिडक्यांना डास विरोधी जाळ्या, आरोग्य विषयक भित्तीपत्रके, ड्रेनेज दुरुस्ती, रुग्णालयातील वातावरण स्वच्छ व आल्हाददायक ठेवण्यासाठी रंगरंगोटी, प्रवेशद्वार, पार्किग, नियमित परीसर स्वच्छता व कुंड्यांमध्ये शोभिवंत झाडे आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा ५०० गुणांची आहे. ते विविध निकषांमध्ये विभागण्यात आले आहेत.

कायाकल्प पुरस्कार योजनेत राज्यस्तरीय पात्रता फेरीत कन्नड ग्रामीण रुग्णालयाचा प्रवेश झालेला आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्यस्तरीय तपासणीत यश मिळ‍वू, अशी अपेक्षा आहे.
-डॉ. दत्ता देगावकर, वैद्यकीय अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याचा टँकरफेरा सुटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाऊस असो की नसो औरंगाबाद जिल्ह्याला गेल्या वर्षापासून समाधापनकारक पाऊस नसल्यामुळे पावसाळ्यानंतरही टँकरने पाणी द्यावे लागत आहे. जिल्ह्यातील ७० हजार ९०५ लोकसंख्येची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सद्य:स्थितीत २५ टँकर सुरू आहेत. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक १७ गावांत १७ टँकर सुरू असून फुलंब्री तालुक्यातील सात गावांत नऊ, तर वैजापूर तालुक्यातील एका गावात टँकर सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर वगळता एकाही तालुक्याने पावसाची सरासरी गाठली नाही. त्यामुळे पावसाळा संपताच तीन तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
विशेषत: गंगापूर तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक आहे. तालुक्यातील १७ गावांमधील ५१ हजार २०० नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. तालुक्यातील वाळूज, सि. वडगाव, हर्सूल, तुर्काबाद व डोणगावमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद शहराशेजारी असलेल्या फुलंब्री तालुक्यालाही यंदा दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. पावसाळा संपताच तालुक्यातील फुलंब्री, आळंद, वडोद बाजार, पीरबावडा या गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वैजापूर तालुक्यातील लाडगाव, लासूरगाव व गारज गावांमध्ये एक टँकर सुरू आहे. जिल्ह्यात टँकरबरोबरच विहीर अधिग्रहणालाही सुरुवात झाली असून प्रशासनाने फुलंब्री तालुक्यात १६, गंगापूर ५ तर वैजापूर तालुक्यात एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तालुकानिहाय लोकसंख्या
फुलंब्री तालुक्यातील १८५०५, वैजापूर तालुक्यातील १२००, तर गंगापूर तालुक्यातील तब्बल ५१ हजार २०० नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून आहे. येत्या काही दिवसांमध्ये या परिसरातील गावांमध्येही टँकर सुरू करावे लागण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाप्रमुख त्रिवेदीकडून सापत्न वागणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढवलेले सुनील मिरकर हे २५ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्याकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने पक्ष सोडत असल्याचा आरोप त्यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली तेव्हा मी भाजपतच होतो. युती तुटल्याने शिवसेनेची उमेदवारी घेऊन विधानसभा मतदारसंघता पक्षाचे काम नसताना १५ हजार ९०० मते घेतली. निवडणूक लढताना पक्षाची मदत, पार्टी फंड मिळाला नाही. वरिष्ठांच्या सभा झाल्या नाहीत, युवासेना प्रमुख अादित्य ठाकरे यांची सभा झाली होती. शिवसेनेची पक्ष बांधणी करून १७ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकाविला. मात्र, जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सापत्न वागणूक दिली. गटबाजीच्या राजकारणाने पक्ष वाढीस फटका बसला. शिवसेना जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना त्रिवेदी यांनी निष्क्रिय लोकांना पदे दिल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. माझ्यासोबत किसान सेनेचे तालुकाप्रमुख कैलास वराडे, सोयगावचे उपतालुका प्रमुख गणेश लोखंडे, नगरसेवक हिराबाई लोखंडे यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

काँग्रेस धार्जिनी सेना

सिल्लोड मतदारसंघात काँग्रेस निवडून आली पाहिजे हे शिवसेनेचे धोरण आहे. त्यामुळे येथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नाही. मात्र त्यामुळे कांग्रेसला फायदा होते म्हणून शिवसेनेतून पुन्हा भाजपत जात असल्याचा दावा सुनील मिरकर यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसपासून दुरावलेला ओबीसी जवळ करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव असल्याने ओबीसी काँग्रेसपासून दुरावला आहे. भविष्यकाळात संवाद साधून ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेस ओबीसी विभाग मराठवाडा उपसमितीचे प्रमुख कल्याण दळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले. विद्यमान केंद्र व राज्य सरकारचा ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव आहे, तो आम्ही हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. या निमित्ताने उपसमितीचे प्रमुख कल्याण दळे, समन्वयक सत्संग मुंढे, सदस्य राजकिशोर मोदी रविवारी औरंगाबादेत आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दळे म्हणाले, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व विभागांसाठी ओबीसी पदाधिकारी उपसमिती नेमली आहे. मराठवाड्यासाठी उपसमितीतर्फे कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. भाजप सरकारने ओबीसी समाजच्या विरोधात घेतलेले निर्णय, आरक्षण तसेच क्रिमीलेअरच्या अटीसंदर्भात असंतोष व्यक्‍त करण्यात येत आहे. समितीतर्फे ओबीसी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मोदी सरकारच्या कार्यकाळात ओबीसींविषयी घेण्यात आलेल्या निर्णयांची व्यापक चर्चा करण्यात आली. तसेच नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या, बारा बलुतेदार आरक्षण, धनगर आरक्षण, नोकऱ्यांमधील बढतीचे आरक्षण या विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
भाजपने दिलेले आश्‍वासन न पाळता केवळ ओबीसी समाजाचा उपयोग मतांसाठीच केला आहे. सर्व बैठकांचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे देण्यात येईल. गेल्या काही वर्षांत ओबीसी काँग्रेसपासून दुरावला आहे. त्यांना जवळ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाविषयी काढलेल्या अनुदगाराबद्दल विचारले असता ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांजवळ माफी मागितली. कार्यकर्ता म्हणजे समाज नव्हे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, इब्राहिम पटेल, जगन्नाथ काळे, संतोष भिंगारे, बाबासाहेब पवार उपस्थित होते.

२६ पासून कापूस दिंडी

काँग्रेसच्या वतीने २६ नोव्हेंबरपासून मराठवाडा, खान्देश व विदर्भातून कापूस दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीदरम्यान गावोगावी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातील. ती माहिती संकलित करून हिवाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नांवर आवाज उठविला जाईल. दिंडीची सुरवात २६ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेतून होईल. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात गौण खनिज माफियांवर घाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लिलावांकडे पाठ फिरवत सर्रास वाळूचोरी करण्याचा फंडा वाळूमाफियांनी अवलंबला असून, मराठवाड्यात गेल्या सात महिन्यांमध्ये वाळू, इतर गौण खनिज उपसा आणि त्यांच्या वाहतुकीच्या दोन हजार ४८० प्रकरणात प्रशासनाने सात कोटी ३९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दरम्यान, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या ९९ प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५३ आरोपींना अटक करण्यात आल्याची नोंद सरकार दप्तरी आहे. एकूण कारवाई करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये मुरूम, खडी उत्खनन व वाहतुकीचीही प्ररकणे असून, यातील बहुतांश प्रकरणे वाळूचोरी आणि वाळू वाहतुकीची आहेत. यावर्षी तुलनेत पाऊस चांगला असल्यामुळे नदीपात्रात वाळूही मोठ्या प्रमाणात आहे. येत्या काही दिवसांत मराठवाड्यातील वाळूपट्टा लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असली, तरी त्यापूर्वीच वाळूमाफियांनी एप्रिल महिन्यांपासून नदीपात्रातून वाळूउपसा करण्यास सुरुवात केली आहे. वाळू कंत्राटाचे दर सातत्याने वाढत अाहेत. वाढत्या दरांमुळे सरळ चोरीचा पर्याय निवडला असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसते.

यंदाही २८६ वाळूपट्ट्यांचा लिलाव
मराठवाड्यात २०१७ - १८ या वर्षासाठी विभागातून २८६ वाळूपट्ट्यांचे लिलाव करण्याचे प्रशासनाचे नियोन असून, १२४ कोटी रुपये सरकारी किंमत असलेल्या या वाळूपट्ट्यांमधून किती रुपयांचा महसूल मिळतो हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात ३१, जालना ३२, पराभणी ४३, हिंगोली २३, नांदेड १०४, बीड १५, लातूर २६ व उस्मानाबाद जिल्ह्यात १२ वाळूपट्ट्यांचे लिलाव करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images