Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘टाइपरायटर’ दुरुस्तीसाठी कारागिरांना मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टंकलेखन यंत्राच्या वापराला सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी चौकशी सुरू केली आहे. पुन्हा ‘टकटक’ सुरू होणार असल्याने अडगळीत गेलेल्या टंकलेखन यंत्रांच्या दुरुस्तीसाठी कारागिरांना मागणी वाढली आहे.

कार्यालयांमध्ये कम्प्युटरचा वापर वाढत अाहे. त्यामुळे सरकारने टंकलेखन यंत्राऐवजी कम्प्युटरच्या मदतीने टंकलेखन अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी घेतला. त्याचवेळी ३० नोव्हेंबर २०१५पर्यंत टप्प्याटप्प्यांने जुना अभ्यासक्रम बंद केला. त्यामुळे टंकलेखन यंत्रांचा वापर बंद होईल, असे सांगण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल कायम होता. वर्षभर मुदतवाढ देऊन अभ्यासक्रम सुरू झाला. या आठवड्यात शासनाने आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची; तसेच गरज असल्यास पुढेही विचार केला जाईल, असे संकेत दिल्याने टंकलेखन संस्थाचालकांना बळ मिळाले आहे. ऑगस्ट २०१६मध्ये टंकलेखन यंत्रांचा वापर बंद करण्यात आला, पण या यंत्रांच्या वापराला सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे डिंसेबरमध्ये बॅचेस सुरू होत अाहेत. औरंगाबादमध्ये विद्यार्थी टंकलेखन संस्थांकडे विचारपूस करत असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. यंत्र दुरुस्तीकरणाऱ्या कारागिरांना मागणी वाढली आहे. यंत्र कारागिरांची संख्या मोजकीच आहे. यंत्र अडगळीत पडल्याने या कारागिरांना कोणी विचारत नव्हते. आता पुन्हा त्यांची मागणी वाढली आहे. मराठवाड्यात चार ते पाच जण टंकलेखन यंत्र दुरुस्तीची कामे करतात. त्यामुळे विविध जिल्ह्यांतून याबाबत विचारणा होत असल्याचे कारागिरांनी ‘मटा’ला सांगितले.

जुना अभ्याक्रम चालवणारे अनेकजण आहेत. जुना अभ्यासक्रम बंद करू नये, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कम्प्युटरपेक्षा जुन्या यंत्रावर परीक्षा देणाऱ्यांची संख्या अधीक आहे. तसे असतानाही तो निर्णय घेण्यात आला. मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा चौकशी सुरू केली आहे.
- महावीर चांदीवाल, संस्थाचालक

बंद होणार असल्याने कारागिरांवर उपासमारीची वेळ आली. वर्षभरापासून इतर कामे शोधत होतो. अनेक वर्षांपासून यंत्र दुरुस्तीचे काम करतो. हातचा रोजगार गेला तर अडचणी येतात. आता जुने यंत्र पुन्हा दुरुस्ती येत आहेत. त्यामुळे आम्हाला मागणी वाढली आहे.
- संजय डहाळे, यंत्र कारागीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाभुळगाव झाले अॅथलिटचा बालेकिल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका हा अॅथलिटचा बालेकिल्ला झाला आहे. अॅथलेटिक्स म्हटले की वैजापूर असे समीकरणच झाले आहे. याच तालुक्यातील बाभुळगाव येथील जयहिंद विद्यालयाने शेकडो खेळाडू घडवून ‘अॅथलिट खाण’ अशी ओळख निर्माण केली आहे. ‘जयहिंद’ने गेल्या अडीच दशकात हजारांवर अॅथलिट घडवले आहेत.

मराठवाड्याठ्यातील कोणत्याही धावण्याच्या स्पर्धेत वैजापूर तालुक्यातील धावपटूंचा सहभाग लक्षणीय असतो. त्याचमुळे कोणत्याही स्पर्धांचे नियोजन करताना सर्वप्रथम वैजापूर तालुक्यातील अॅथलिटचा अग्रक्रमाने विचार केला जातो.

बाभुळगावमधील जिल्हा परिषद शाळा १९७२मध्ये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९८०पासून ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेने जिल्हा परिषदेची शाळा चालवण्यास घेतली. जयहिंद विद्यालय असे नामकरण करण्यात आले. कल्याण तुपे यांच्या अध्यक्षतेखाली या शाळेने शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. १९९०मध्ये सतीश पाटील हे क्रीडा शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाले. मुख्याध्यापक डी. टी. सरोवर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्यांना संधी देण्यास सुरुवात केली. काही वर्षांतच जयहिंद विद्यालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात आघाडीवर झळकू लागले. त्यात अॅथलिटचा मोलाचा वाटा राहिला. गेल्या २७ वर्षांच्या कालावधीत जयहिंद विद्यालयातून शेकडो अॅथलिट घडले.

औरंगाबाद शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बाभुळगावची लोकसंख्या १०-१२ हजारांची. आठवी ते दहावी असे तीन वर्ग जयहिंद विद्यालयात चालतात. शाळा परिसरात प्राथमिक शाळाही चालते. तेथे पहिली ते सातवीचे वर्ग चालतात. जयहिंद विद्यालयात दोनशे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे हे विशेष. साहजिकच खेळाचे मैदान गाजवण्यातही मुलीच आघाडीवर आहेत. ‘बाभुळगावच्या मुली धावण्यात पुढे’ असे समीकरणच बनले आहे. गावातील मुख्य रस्त्यावरच ही शाळा आहे. शाळेनेच पुढाकार घेऊन एक छोटेसे मैदान तयार केले आहे. कोणत्याही आधुनिक साधने नसतानाही खेळाडू कठोर मेहनत घेऊन विविध स्पर्धा गाजवतात हे विशेष.

सतीश पाटील १९९०मध्ये यांनी अॅथलिट घडवण्यास प्रारंभ केला. तेव्हा अगदी चार-पाच मुले-मुले ट्रेनिंगला येत होत्या. त्यांची प्रगती पाहून नंतर मुला-मुलींची संख्या वाढत गेली. प्रारंभी क्रीडा साहित्य नसणे ही सर्वात मोठी अडचण होती. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, हर्डल्स अशी साहित्य काही विकत तर काही स्वतः तयार करून घेतली. लोखंडी पाइपचा वापर करून हर्डल्सचे साहित्य तयार केले. आजही त्याचाच वापर खेळाडू सरावासाठी करतात. खेळाडूंचे पालक प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर असल्याने आर्थिक अडचण हेच मोठे आव्हान आहे.

अनेक खेळाडूंकडे शूजही नाही!
अनेक खेळाडूंकडे शूज, ट्रॅकसूट असे प्राथमिक कीट देखिल नाही. स्पर्धेसाठीचा खर्च भागवणे देखिल कठीण आहे; तसेच स्पर्धेचे शुल्क भरणे देखिल खेळाडूंच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे अनेक खेळाडू हे शेती कामात पालकांना मदत करतात. कापूस वेचणीही करतात. त्यातून मिळालेल्या पैशातून ते खेळातील गरज भागवतात. शाळेच्या मर्यादा असल्याने उपलब्ध क्रीडा साहित्यांचाच वापर करून खेळाडू सराव करून प्रगती करीत आहेत. धावण्याचा सराव करण्याकरिता रस्त्याचाच वापर केला जातो. धावण्याचा ट्रॅक अथवा मोठे मैदानही पंचक्रोशीत नाही. पालकांचा सकारात्मक पाठिंबा असल्याने खेळाडू मैदान गाजवताना दिसतात. खेळाबरोबरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीही चांगली आहे. अॅथलीटमुळे जवळपास ५०-६० खेळाडूंना नोकरीचीही संधी मिळाली आहे. काही खेळाडू लष्करात तर काही पोलिस दलात, वन खात्यात नोकरीस लागले आहेत. बँकिंग क्षेत्रातही काही खेळाडूंची निवड झाली आहे.

खेळाडूंची खाण
भालाफेक प्रकारात प्राची पाटीलने सर्वप्रथम राष्ट्रीय पातळीवर पदक जिंकले. त्यानंतर एकापाठोपाठ एक सरस अॅथलिट घडत गेले. त्यात प्रामुख्याने वैशाली तुपे, आशा जाधव, जयश्री तुपे, योगिता तुपे, वसुंधरा कऱ्हाळे, प्रीतम शिंपी, वंदना तुपे, रेखा जमधडे, सुरेखा जमधडे, तबस्सुम शेख, छाया तुपे, गौरव पाटील, नारायण तुपे, शिवाजी तुपे, पांडुरंग तुपे, सुनील तुपे, गणेश चोपडे अशा शेकडो खेळाडूंचा समावेश आहे. विविध मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये जयहिंद विद्यालयाच्या खेळाडूंनी लक्षणीय यश संपादन करून आपला ठसा उमटविला आहे.

आधुनिक क्रीडा साहित्यांबरोबरच खेळाडूंची आर्थिक अडचण हीच मुख्य समस्या आमच्यासमोर आहे. क्रीडा क्षेत्रातील जाणकार तसेच दानशूर मंडळींनी मदतीचा हात दिला तर आमच्या शाळेचे खेळाडू जिल्ह्याचे नव्हे तर देशाचेही प्रतिनिधीत्व करू शकतील अशी त्यांची क्षमता आहे. आमच्या परीने आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोतच.
- डी. टी. सरोवर, मुख्याध्यापक, जयहिंद विद्यालय

धावण्यासाठी मोठे मैदान नसल्याने रस्त्यावरच आमचे खेळाडू धावण्याचा सराव करतात. तीन, पाच, दहा, एकवीस किलोमीटर अशा प्रकारे धावण्याचा सराव खेळाडू नियमित करतात. शाळा संपल्यावर दोन तास आणि आठवड्यातून एकदा सकाळी धावण्याचा सराव केला जातो. खेळाडूंचा प्रगतीचा आलेख अधिक उंचावण्यासाठी आधुनिक साधनांची नितांत गरज आहे.
- सतीश पाटील, क्रीडा शिक्षक, जयहिंद विद्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिजोत्पादन योजनेचा शेतकऱ्यांना फटका

$
0
0

सोयगावः रब्बी हंगामासाठी शासनाच्या ग्रामीण बिजोत्पादन योजनेतून वितरित करण्यात येणाऱ्या बियाण्यांची निम्म्यापेक्षा अधिक किंमत रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे. आधीच कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा न झाल्याने हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी पैसे मोजावे लागत आहेत.
सोयगाव तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून बनोटी, सावळदबारा मंडळात खरिपाच्या उत्पन्नाची दमडीही शेतकऱ्यांच्या खिशात पडलेली नाही. त्यामुळे रब्बीच्या हंगामावर शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती. त्यासाठी रब्बीची जुळवाजुळव करण्यात अपयशी ठरलेला शेतकरी शासनाच्या योजनेत अडकला आहे. ग्रामीण बिजोत्पादन योजनेतून शेतकऱ्यांना गहू, हरभरा आदी बियाण्यांचे वाटप अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून बियाण्यांवर देण्यात येणारे अनुदान तुटपुंजे असल्याने अनुदानाच्या नावावरही शासनाच्या कृषी विभागाकडून मोठी रक्कम उकळण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. कृषी विभागाकडून बियाण्यांचा केवळ परवाना देण्यात येत आहे. परवाना घेवून नेमून दिलेल्या कृषी केंद्रावरून संबंधित बियाणे घेवून जावे लागत आहे. यासाठी तालुका कृषी विभागाने पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ सोयगाव येथे एकाच कृषी विक्रेत्याकडे बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. परिणामी, बनोटी, सावळदबारा मंडळातील शेतकऱ्यांना यावर पुन्हा वाहतूक खर्चाचा बोजा पडत आहे. शासनाची ग्रामीण बिजोत्पादन योजना कुचकामी ठरली आहे. त्यातही या योजनेसाठी केवळ चाळीस आर शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाबी बोंड अळीचे कापसावर संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तालुक्यातील गदाना, सुलतानपूर, टाकळी राजाराय, खांडी पिंपळगाव, भांडेगाव परिसरात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बोंड अळीमुळे देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. कपाशीच्या पिकांचे पंचनामे अद्यापही करण्यात आलेले नाहीत.
तालुक्यातील शेकडो एकर शेतीमधील कपाशीचे पीक गुलाबी बोंड अळीने नष्ट केले आहे. बोंड अळी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी बीटी कपाशीचा स्वीकार केला. सुरुवातीला त्याचा चांगला परिणाम दिसला. कापसाचे उत्पन्न देखील वाढले. मात्र बीटी बीजी टू बियाण्यांवरही बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने यंदा परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून दुष्काळी, नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना यंदा कापसापासून उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बीटी टू या नवीन कपाशी वाणावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे हताश शेतकरी कपाशीच्या पिकात जनावरे सोडत आहेत.
कापूस किडीमुळे वेचणी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढत असतांना उत्पादनात होणारी घट शेतकऱ्यापुढे मोठे संकट आहे. उच्चप्रतीच्या औषधांची फवारणी करूनही ही कीड नियंत्रणात येऊ शकली नाही. बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असतांना अळीने आक्रमण केले आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी येत आहेत. कृषी विभागातर्फे पाहणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर पंचनामे केले जातील.
- मिलिंद कोलंबीकर, कृषी पर्यवेक्षक

बोंड अळीमुळे कपाशीचे प्रचंड नुकसान झाले असून एकही वेचणी झालेली नाही. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
-आसाराम घुले, शेतकरी भांडेगाव


गंगापूर तालुक्यात दैना

वाळूज महानगरः गंगापूर तालुक्यातही कापसावर बोंड अळीने आक्रमण केले आहे. यावर्षी बीटी बियाणे वापरूनही बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने फवारणीचा खर्च वाढला आहे. बोंडे परिपक्व झाल्यानंतर अळी बोंडे पोखरत असल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यात बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत शासनाने जाहीर करावी. बोगस बियाणे विक्री केल्याप्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत. योग्य ती कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांसह उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी गंगापूरचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी निवेदनाद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उज्ज्वला योजनेला किचन ओट्याचा अडसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
किचन ओटा नसल्याने तालुक्यातील अनेकांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन घेता येत नाही. इंधन कंपन्यांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्यामुळे तालुक्यातील अनेक जण योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. तालुक्यात आतापर्यंत अंदाजे फक्त साडेतीन हजार कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.
पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी २०११ च्या सर्वेक्षणातील दारिद्र्यरेषेची यादी निकष म्हणून ठरवण्यात आली आहे. यानुसार यादीतील लाभार्थींनी सिल्लोड शहरासह तालुक्यातील गॅस एजन्सीकडे अर्ज दाखल केले. संबंधित एजन्सींनी तत्परता दाखवत अर्ज भरून घेतले. पण, कनेक्शन मिळवण्यासाठी अर्जदारांना खेट्या घालाव्या लागत आहेत. ‘या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. मात्र संबंधित यंत्रणा प्रतिसाद दे नाही,’ अशी तक्रार माजी नगरसेवक रघुनाथ घडमोडे यांनी केली आहे.
सिल्लोड, शिवना, अजिंठ्यासह अनेक गावांतील कुटुंबे योजनेतून गॅस कनेक्शन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, या योजनेबद्दल भारत गॅसच्या सेल्स ऑफिसर प्रिती कोटकर यांच्याशी संपर्क करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंपाक घरात किचन ओटा असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबाची सुरक्षा लक्षात घेऊन हे निकष पाळणे बंधनकारक आहे. यामुळे अनेकांना गॅस कनेक्शन देता आले नाहीत, असे कोटकर यांनी स्पष्ट केले.

योजनेचे उद्दिष्ट

पांरपारिक पद्धतीने चूल पेटवून स्वयंपाक केला जातो. परिणामी, महिलांचे आरोग्य धोक्यात येते. शिवाय लाकूड फाटा मिळत नसल्याने इंधनाची समस्या गंभीर आहे. जंगल तोड रोखणे आदींसाठी ही योजना आखण्यात आली आहे. पण, स्थानिक पातळीवर या महत्त्वाकांक्षी योजनेत अडथळे येत आहेत.

शंभर रुपयांत कनेक्शन

या याजनेच्या लाभासाठी शंभर रुपये शुल्क भरावे लागते. उर्वरित अठराशे रुपये नसल्यास गॅस कंपनी कर्ज देते. त्याची परतफेड गॅस सबसिडीमधून वळती करून करण्यात येते. यामुळे या योजनेकडे गरीब कुटुंबांचा ओढा वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या वादात गुंडांचा शाळेत फिल्मी स्टाईल धुडगूस

$
0
0

विद्यार्थ्यांच्या वादात गुंडांचा शाळेत
फिल्मी स्टाईल धुडगूस

सात जण ताब्यात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नववीतील विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादानंतर एका विद्यार्थ्याने भावाला व त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. या गुंडांनी लाठ्याकाठ्या, चैनसह फिल्मी स्टाईलने शाळेतील वर्गात प्रवेश केला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. मात्र, शाळेच्या प्रशासनाने गेट लावून घेतल्याने गुंड आतमध्येच अडकले. उस्मानपुरा परिसरात बुधवारी सकाळी बारा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
उस्मानपुरा परिसरात गुरू तेग बहादूर स्कूल आहे. या स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. यापैकी एका विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांने मारहाण केली. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने घरी जात आपल्या भावाला हा प्रकार सांगितला. त्याच्या भावाने त्यांच्याकडे कामाला असलेल्या सात ते आठ तरुणांना सोबत घेऊन शाळा गाठली. या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांच्या हातात लाठ्या, चैन आदी शस्त्र होते. पहिल्या मजल्यावरील वर्गात त्यांनी प्रवेश केला. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. जोरजोरात आरडाओरड व ‌शिवीगाळ करण्यात आली. यामुळे विद्यार्थी भेदरून रडू लागले, शिक्षकही घाबरला. मात्र, प्रसंगावधान राखून काही शिक्षकांनी पहिल्या मजल्यावर प्रवेश करणारा मुख्य दरवाजा लावून घेतला. यामुळे हे गुंड पहिल्या मजल्यावरच अडकले. उस्मानपुरा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पीएसआय राहुल चव्हाण, विशेष पोलिस अधिकारी गोर्डे पाटील, किरण जोशी आदींनी शाळेत धाव घेतली. या गुंडाना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी या गुंडावर दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुर्च्यांची मोहिनी अन् उन्हामुळे टाळली नामुष्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गरवारे क्रीडा संकुलाच्या देखभालीचा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा केंद्रबिंदू असताना नव्यानेच तयार करण्यात आलेल्या मैदानावरच महापौरांसह अधिकाऱ्यांना बसण्यासाठी खुर्च्या मांडण्यात आल्या. महागड्या गवतावर पदाधिकारी, अधिकारी ठाण मांडून बसणार होते, मात्र ऊन वाढले आणि गवतावर येणारा बाका प्रसंग टळला. या प्रसंगामुळे भविष्यात मैदानाच्या देखभालीची स्थिती कशी असेल याचे चित्र समोर आले.

महापौरांसह काही नगरसेवक व महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी गरवारे संकुलाची पाहणी करण्यासाठी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मैदानावर दाखल झाले. बैठकीची व्यवस्था बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आली होती, परंतु महापौर घोडेले हे अधिकाऱ्यांसह थेट मैदानात पोचले. त्यामुळे थेट मैदानावरच त्यांना बसण्यासाठी गोलाकार खुर्च्या मांडण्यात आल्या. तेव्हा संकुलाच्या व्यवस्थापनाचा भविष्यकाळ कसा असेल याची झलक दिसून आली.

खुर्च्या मांडल्यानंतरही महापौरांनी उभ्याने बराच वेळ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कडक उन्हाचा त्रास जाणवू लागल्याने महापौरांनी, ‘बॅडमिंटन हॉलमध्येच बैठक घेऊ,’ असे म्हणत मैदानावरून काढता पाय घेतला. त्यामुळे खुर्च्यांवर बसण्यासाठी संधी हुकली. या प्रकारामुळे मैदानावरच खुर्च्यांवर ठाण मांडून चर्चा करण्याची नामुष्की टळली. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना खुर्च्यांच्या आकर्षणाची चर्चा मात्र रंगली. कडक उन्हाचा त्रास जाणवला नसता तर बैठक थेट मैदानावरच झाली असती. कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आलेल्या मैदानावर बरम्युडा ग्रास लावण्यात आलेली आहे. या मैदानावर साधे बूट घालून चालणे देखील चुकीचे मानले जाते. त्यामुळे गवताचे नुकसान होते. खुर्च्यांमुळे तर गवताचे अधिक नुकसान होऊ शकले असते. कडक उन्हामुळे हा प्रसंग टळला.

बॅडमिंटन हॉलमध्ये तास-दीड तास चाललेल्या चर्चेत गरवारे क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन दर्जेदार व्हावे यावर सविस्तर चर्चा झाली, परंतु खुर्च्याच्या प्रसंगातून गरवारे संकुलाचे व्यवस्थापन नीटपणे होईल याविषयी साशंकता निर्माण झाली, हे मात्र नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये तीन अपघात; तीन ठार, तीन जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठणकरांसाठी मंगळवारची रात्र, अपघात रात्र ठरली. शहर व तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार, तर तीन जखमी झाले.
संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या मुख्य गेटसमोर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोटारसायकलला (एम एच २० ई एफ ५८०९) पाठीमागून येणाऱ्या लोडिंग बोलेरो जीपने (एम एच २० डी ई २११०) जोराची धडक दिली. मोटारसायकलवर सारंग बाबुराव अडसूळ (वय २५), छायाबाई पुंजाराम मंचरे (वय ४५) व हिराबाई नारायण जाधव (वय २५) हे तिघे होते. या अपघातात जखमी झालेल्या छायाबाई पुंजाराम मंचरे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सारंग आडसूळ व हिराबाई जाधव गंभीर जखमी झाले आहेत. जैनपुरा येथील रहिवासी संतोष एकनाथ शिंगटे (वय ३०) व त्यांचा मित्र नंदू घेगडे मोटरसायकलने औरंगाबादहून पैठणकडे येत होते. त्यांची मोटारसायकल व ट्रॅक्टरची संत एकनाथ साखर कारखान्यासमोर रात्री अकराच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात संतोष शिंगटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदू घेगडे हा जखमी झाला. घेगडे यांच्यावर औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
पैठण शेवगाव रस्त्यावरील सोनवाडी रस्त्यावर रात्री साडेअकराच्या सुमारास तिसरा अपघात झाला. या अपघातात सोनवाडी येथील १८ वर्षीय सोन्या कान्हा पवार याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला. औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना तो मरण पावला. या अपघातांची पैठण व एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिरुपती विशेष रेल्वेच्या फेऱ्यांत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नांदेड विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. यातील नांदेड - तिरुपती आणि नगरसोल - तिरुपती विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुढील तीन महिन्यासाठी या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

तिरुपती नगरसोल ते तिरुपती ही विशेष रेल्वे औरंगाबाद, जालना, परभणी परळीमार्गे धावणार आहे. तिरुपती ते नगरसोल ही रेल्वे तिरुपती येथून शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता निघणार असून, नगरसोल ते तिरुपती ही गाडी शनिवारी रात्री दहा वाजता नगरसोलवरून निघणार आहे. त्याचबरोबर नांदेड - तिरुपती ही रेल्वे तिरुपतीकडे मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता निघणार असून, तिरुपतीवरून बुधवारी दुपारी पावणेचार वाजता निघणार आहे. नांदेड ते तिरुपती ही रेल्वे निजामाबाद, सिकंदराबाद विजयवाडामार्गे धावणार आहे. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पुढील तारखांना या दोन्ही विशेष रेल्वे धावणार आहेत.

तिरुपती ते नगरसोल ( शुक्रवार)
डिसेंबर २०१७ ः १, ६, १५, २२, २९
जानेवारी २०१८ ः ५, १२, १९, २६
फेब्रुवारी २०१८ ः २, ९, १६, २३

नगरसोल ते तिरुपती (शनिवार)
डिसेंबर २०१७ ः २, ९, १६, २३, ३०
जानेवारी २०१८ ः ६, १३, २०, २७
फेब्रुवारी २०१८ ः ३, १०, १७, २४

नांदेड ते तिरुपती (मंगळवार)
डिसेंबर २०१७ ः ५, १२, १९, २६
जानेवारी २०१८ ः२,९, १६, २३, ३०
फेब्रुवारी २०१८ ः ६, १३, २०, २७

तिरुपती ते नांदेड (बुधवार)
डिसेंबर २०१७ ः ६, १३, २०, २७
जानेवारी २०१८ ः ३, १०, १७, २४, ३१
फेब्रुवारी २०१८ ः ७, १४, २१, २८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तेदुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अॅन्यूटी (डिफर्ड पेमेंट) तत्वाने दहा हजार किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी जाहीर केलेल्या या योजनेस कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने यातील अटींमध्ये बदल केले आहेत. नवीन धोरणानुसार जानेवारी अखेर ही कामे मार्गी लागून कामांना सुरवात होण्याची शक्यता आहे.

राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम अडचणीचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध निधीतून रस्तेदुरुस्ती करणे अडचणीचे ठरत होते. त्यावर उपाययोजना करत अॅन्यूटीतून रस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील दहा हजार किलोमीटरचे रस्ते या योजनेसाठी निवडले गेले त्याचे ७३ पॅकेजेस केले. रस्त्याच्या कामासाठी जो निधी लागेल त्याचा ४० टक्के वाटा सरकार तत्काळ देणार आणि उर्वरित ६० टक्के रक्कम टप्प्याटप्प्यांने देण्याचे नियोजन होते. तोपर्यंत कंत्राटदाराला पैसा गुंतवावा लागणार होता. एका कामासाठी किमान १०० किलोमीटरची लांबी निश्चित केली गेली होती.

एका रस्त्यासाठी ४०० कोटी रुपये गुंतवणे अनेक कंत्राटदारांना अडचणीचे ठरल्याने ‘पीडब्ल्यूडी’च्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. या कामांच्या निविदा भरण्यासाठी कंत्राटदार पुढे आले नाहीत. हे पाहून प्रशासनाने या कामांच्या बाबत निकष बदलले. १०० ऐवजी ५० किलोमीटरची कामे केली गेली. त्यामुळे कामांसाठीच्या निधीतही कपात झाली. साधारणपणे १५० कोटींपर्यंतची कामे आता कंत्राटदारांसाठी मिळणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून, जानेवारीअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

पेमेंटची पद्धतही बदलली
अॅन्यूटीतून होणाऱ्या कामांचे पैसे देताना सुरवातीला सरकार ४० टक्के रक्कम देणार होते, पण नव्याने बदललेल्या निकषानुसार पहिल्या दोन वर्षांत ६० टक्के रक्कम दिली जाईल. त्यानंतर उर्वरित ४० टक्के रक्कम दहा वर्षांत टप्प्याटप्प्यांने दिली जाईल. परिणामी या कामांसाठी कंत्राटदार पुढे येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांमध्ये हयात प्रमाणपत्राची सोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन सुरू राहण्यासाठी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. आता हेच हयात प्रमाणपत्र देण्याची सोय विविध बँकांनी केली आहे, पूर्वी ही सोय फक्त भविष्यनिर्वाहनिधी कार्यालय आणि कोषागार कार्यालयात होती. शहरातील २००हून अधिक बँक-शाखांमधून ही सेवा आहे, पण अजूनही काही जण त्या सेवेचा नीट फायदा घेत नाही. शहरातील स्टेट बँक आणि २७ राष्ट्रीयकृत बँकांपैकी काही बँकांच्या शाखांमध्ये ही सोय आहे. एकूण शहराचा विचार केल्यास ५५ हजारांहून अधिक जणांचे पेन्शन बँकांमध्ये जमा होते, तर उर्वरितांचे ग्रामीण भागातील शाखांमध्येही होत असते. खेडे गावातील शाखांमध्ये ही सोय असली तरी त्या गावांत किती जणांचे पेन्शन जमा होते याची संख्या उपलब्ध होऊ शकला नाही.

सध्या बँकांमध्ये हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी गर्दी होत आहे. सर्वच बँकानी ही सोयही केली आहे. ज्या बँकांमध्ये ही सोय किंवा तांत्रिक अडचणी येत आहेत त्यांना पीएफ कार्यालय सिडको, जिल्हाकोषागार भवन, महा ई सेवा केंद्र येथे ही सोय करण्यात आली आहे.

‘केंद्र सरकारने www.jeevanpraman.gov.in या नावाचे बेव पोर्टल तयार केले आहे. राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी बायोमेट्रिक म्हणजे बोटाचे ठसे घेण्याची सुविधा जिल्हा कोषागार आणि सर्व तालुका कोषागार कार्यालयांमध्ये करण्यात आली असते. निवृत्तवेतन जमा होत असलेल्या बँकांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय दिलासाजनक बातमी म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांकडे बायोमेट्रिक यंत्र असेल, तर त्यांना नोंदणीची प्रक्रिया अॅन्ड्रॉइड टॅब, स्मार्टफोन किंवा कम्प्युटरवरदेखील करता येणार आहे,’ असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले, पण ही बाब जरा खर्चिक असल्याने व इंटरनेट सेवाही अखंडित असणे आवश्यक असल्याने याचा वापर फार होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभात मृत पक्ष्यांचे अवशेष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको, हडको भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या सिडको एन-पाच येथील जलकुंभाचे छत कोसळले असून, त्यात पक्षांचे अवशेष सापडत आहेत. यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रांतीचौकातील जलकुंभाचे छत देखील चार वर्षांपूर्वी कोसळले. तेथेही अशाच प्रकारची समस्या आहे.

सिडको, हडकोसह मुकुंदवाडी, जयभवानीनगर, नारेगाव - मिसारवाडी आदी भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडको एन-पाच येथील जलकुंभांचा वापर केला जातो. या ठिकाणी एक भूमिगत जलकुंभ असून, तीन मोठे जलकुंभ आहेत. प्रत्येक जलकुंभाची क्षमता १५ ते २५ लाख लिटर आहे. या जलकुंभांवरून अर्ध्या शहरासाठी टँकरद्वारेही पाणी पुरविले जाते. तिन्ही जलकुंभ कार्यान्वित आहेत. रात्री पाच तास जलकुंभांवरचे काम बंद असते. उर्वरित वेळेत जलकुंभातून अखंड पाणीपुरवठा केला जातो.

तीन जलकुंभांपैकी एकाचे छत काही महिन्यांपूर्वी कोसळले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे त्याकडे लक्ष नसल्यामुळे दररोज या जलकुंभात पक्षी पडतात. पाण्यात पडलेल्या पक्षांना पुन्हा जलकुंभाच्या बाहेर येता येत नसल्यामुळे ते त्यातच मरून जातात. दररोज १५ ते २० पक्षांना जलकुंभात जलसमाधी मिळते आणि तेच पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोचवले जाते. गेल्या काही महिन्यांपासून हेच पाणी सिडको, हडकोसह विविध वसाहतींना पुरविले जात आहे. यासंदर्भात चिश्तिया कॉलनीचे एमआयएमचे नगरसेवक अब्दुल नाईकवाडी हा प्रश्न उपस्थित केला, मात्र त्याचा अद्याप काहीच परिणाम झालेला नाही.

जलकुंभ झाले ३८ वर्षांचे
सिडको एन-पाच येथे एक भूमिगत आणि तीन मोठे जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभाचे बांधकाम १९७८-७९मध्ये झाले आहे. दुसऱ्याचे १९८७-८८ मध्ये, तिसऱ्या जलकुंभाचे बांधकाम १९९३-९४ मध्ये झाले आहे. भूमिगत जलकुंभाचे (संप) बांधकाम १९९३-९४मध्ये करण्यात आले आहे. या सर्वच जलकुंभांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पालिकेतर्फे नियमितपणे केले जात नसल्यामुळे अनेक वेळा दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होतात.

छतावर मॅटही टाकता येत नाही ः चहल
सिडको एन-पाच येथील एका जलकुंभाचे छत कोसळले आहे ही बाब खरी आहे. छत कोसळल्यामुळे जलकुंभात पक्षी पडतात. पालापाचोळा देखील पडतो यात तथ्य आहे. ज्या कोसळलेला जलकुंभ खूप जुना आहे. हिरवी मॅट टाकून जलकुंभाचा कोसळलेला भाग झाकण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, पण तेही शक्य होत नाही. आता दुसरा पर्याय शोधावा लागेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले. मिसारवाडी येथे मंगळवारी पाण्याच्या टँकरमध्ये पाल निघाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात चहेल यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पाण्याच्या टँकरमध्ये पाल असणे शक्यच नाही. त्या भागात नागरिक उघड्यावर ड्रम ठेवतात. त्या ड्रममध्ये अगोदरच पाल पडलेली होती, असे अधिक चौकशी केली असता लक्षात आले. नागरिकांच्या रोषापुढे टँकरचालकाला काहीच बोलता आले नाही, त्यामुळे त्याने टँकरमधून पाल निघाल्याचे मान्य केले, पण त्यात तथ्य नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नसुरक्षा बंद करणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली अन्न सुरक्षा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १४ जिल्ह्यांमध्ये योजनेचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, टप्प्याटप्प्यांने योजना बंद करण्याचे संकेत अन्न व पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) दिले.

दुष्काळामुळे उपासमार होऊ नये म्हणून राज्य शासनाने ऑक्टोबर २०१५पासून मराठवाडा; तसेच विदर्भातील १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली होती, मात्र गेल्या दोन वर्षांत मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुष्काळी स्थिती नाही यामुळे या योजनेचा शासनाकडून आढावा घेणे सुरू झाले असून, टप्प्याटप्प्यांने त्या योजनेतील धान्यवितरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात ३६ लाख ६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ऑक्टोबर २०१५पासून प्रत्येक महिन्यात शासनाकडून पुरवण्यात आलेले सुमोर ८५ ते ९० टक्के धान्याची उचल शेतकरी करतात, मात्र आता सरकारला दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यासारखे वाटू लागले असल्याने योजनेच्या पारदर्शकतेचा आढावा घेण्याचा निर्णय करण्यात आला आहे.

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता कमी झाली असली तरी शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाण कायम आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि जालना जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली असून, उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळ सपंल्यानंतर ही योजना बंद करण्याबाबत मागील काही महिन्यांपासून शासनाकडे विचार सुरू होता.

काय आहे योजना...?
दुष्काळामुळे राज्य सरकारने ऑक्टोबर २०१५मध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना सुरू केली. त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येतो. या योजनेत दरमहा मराठवाड्यात दहा हजार ८१८ टन गहू आणि सात हजार २१२ टन तांदूळ वितरित करण्यात येतो.

आता दुष्काळाची तीव्रता कमी झाली आहे. या योजनेंतर्गत धान्य वितरण चालू ठेवावे की नाही, याचा आढावा घेतला जाईल. लगेच धान्यपुरवठा बंद केला जाणार नाही, मात्र पुरवठ्याची गरज आहे की नाही, हे आढावा घेतल्यानंतर समोर येईल.
- गिरीष बापट, अन्न व नागरी पुरवठामंत्री

जिल्हानिहाय लाभार्थी
औरंगाबाद ः ५६७००७
जालना ः २४९३८१
परभणी ः ३६५६९८
हिंगोली ः २१३६९१
बीड ः ६६६३९९
नांदेड ः ६८७९९१
लातूर ः ३८२४४०
उस्मानाबाद ः ४७३६५८
एकूण ः ३६०६२६५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावती चित्रपटावर बंदीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजपूत राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप असलेल्या ‘राणी पद्मावती’ या चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला, या मागणीसाठी शिवसेनेने बुधवारी सिडको कॅनॉट परिसरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या समोर निदर्शने केली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी, अभिनेत्री दीपिका पडुकोन यांचे चित्र असलेल्या पोस्टर्सचे दहन करण्यात आले. राणी पद्मावती चित्रपटाविरोधातील आंदोलनात शिवसेना प्रथमच उतरली आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मावतीवर वाईट नजर टाकली, तेव्हा राणी पद्ममावतीने हजारो राजपुत स्त्रियांसह जोहार केला. चित्रपटात मात्र राणी पद्ममावतीचा अवमान करणारी दृष्ये चित्रित करण्यात आली आहेत, असा आरोप शिवसेनेतर्फे यावेळी करण्यात आला. या चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात महापौर नंदकुमार घोडेले,विधानसभा संघटक रेणकुदास वैद्य, संतोष जेजूरकर, मोहन मेघावाले, अनिल पोलकर, फुलसिंह राजपूत, कवंरसिंह बैनाडे, बंडू ओक, अनिल जैस्वाल, राजेंद्र दानवे, जयसिंह होलिये, गोपाळ कुलकर्णी, गणपत खरात, राजू इंगळे, कमलाकर जगताप, रंजना कुलकर्णी, प्राजक्ता राजपुत, कमला राजपुत, सीमा खरात, शुभांगी लातूरकर, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे देविचंद बारवाल आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होनाजीनगरात भर दिवसा दुसरी घडफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
होनाजीनगर जटवाडा रोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून एक लाख ४० हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांत या परिसरातील दिवसाढवळ्या घरफोडीची ही दुसरी घटना आहे.
नितीन रामचंद्र दंदे (वय ३८ रा. सॅफ्रोन रेसिडेन्सी, होनाजीनगर) हे मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजता पत्नीसह फ्लॅटच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून नोकरीसाठी गेले होते. ते दुपारी पाऊण वाजता परतले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाट फोडून त्यातील अंदाजे एक लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे द‌ागिने लंपास केले. याप्रकरणी दंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय रोडे हे तपास करीत आहेत.

चार दिवसातील दुसरी घटना

गेल्या चार दिवसांतील दिवसा घरफोडीची ही दुसरी घटना आहे. सुरेश किसनराव बनकर (वय ५३, रा. के. के. हाइटस अपार्टमेंट, होनाजीनगर) हे शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता पत्नीसह बाहेर गेले होते. ते साडेबारा वाजता घरी परतले. या दरम्यान चोरांनी त्यांचे घर फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी देखील बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिस निष्क्रीय

शहरात चार्ली, पीसीआर मोबाइल, गुन्हे शाखेची पथके, सबंधित पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध प्रकटीकरण पथक आदींची गस्त लावण्यात आली आहे. मात्र दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोडीमुळे ही गस्त नावालाच असल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कापूस, मका, सोयाबीनचे पावसामुळे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
तालुक्यात गोळेगाव, भराडी, अंभई, अजिंठा, आमठाणा या मंडळातील गावांमध्ये मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस ओला झाला आहे, तर मळणीसाठी ठेवलेला मका, सोयाबीन आदी पिकांच्या गंजीत पाणी शिरले आहे.
भराडी मंडळात १८ मिमी, अंभई १७, अजिंठा ११, गोळेगाव २२, आमठाणा मंडळात ३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची पिके झाकण्यासाठी तारांबळ उडाली होती. खरिपातील पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली. तुरीचे पीक ऐन बहरात असतांना ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकावर कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. काही प्रमाणात पेरलेल्या रब्बी हंगामातील हरबरा, गहू या पिकांना या पावसाने फायदा झाला असला तरी कापूस, सोयबीन, मका हे पिक ओले झाले आहे.

बुधवारीही हजेरी

दरम्यान, बुधवारी दुपारी सिल्लोड शहर परिसरात पाऊस पडला. या पावसामुळे मोंढ्यात विकण्यासाठी आणलेला मका व जीनिंगमधील कापूस ओला झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बॅरीजेस कम रोड’ची कन्नड तालुक्यात मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड व वैजापूर तालुक्याच्या हद्दीवर शिवना नदीपात्रावर ताड पिंपळगाव, औराळा व मनूर या राज्य मार्गासाठी ‘बॅरीजेस कम रोड’च्या (कोल्हापूरी किंवा साखळी बंधाऱ्यावरील रस्ता) काम करावे, अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात देवगाव जिल्हा परिषद सदस्य रेणुका जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास जाधव, अजबसिंग राजपूत, सुरेश बोडखे, ताडपिंपळगावचे सरपंच प्रभू जाधव यांची उपस्थिती होती. शिवना टाकळी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात तालुक्याच्या हद्दीवरील मालेगाव (ता. वैजापूर) जवळील शिवना नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्यासह १० मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी तालुक्यातील दहा ते पंधरा गावांच्या सरपंच, ग्रामस्थांनी संबधित विभागाकडे केली आहे. मालेगाव जवळील शिवना नदीवर हा ‘बॅरीजेस कम रोड’ तयार झाला तर, जिल्ह्यातील खुलताबाद, वैजापूर, कन्नड तालुक्यातील नागरिकांना कमी वेळात नांदगांव तालुक्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे चार तालुक्यातील जवळपास दीडशे गावांना जोडणारा हा जिल्हा मार्ग तयार आहे. फक्त शिवना नदीवर पूल नसल्याने अडसर निर्माण झाला आहे. या नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्यावरील पुलाचा रस्ता तयार झाला, तर पाणीसुद्धा अडवले जाऊ शकते. याचा लाभ तालुक्यातील टंचाईग्रस्त टाकळी, लामणगाव, ताडपिंपळगाव, बोरसर खुर्द, बोरसर बुद्रुक, लव्हाळी, देवगाव रंगारी, शेवता, देवळणा, देभेगाव, शिवाय वैजापूर तालुक्यातील काही गावांना होऊ शकतो, असे शिष्टमंडळाने बागडे यांना सांगितले.
दरम्यान, या मागणीसाठी मराठवाडा गोदावरी विकास पाटबंधारे मंडळ, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना स्थळपाहणी करण्याचे बागडे यांनी सूचवले आहे, अशी माहिती खंबायते यांनी दिली.

१५ गावांचा ठराव

देवगाव जिल्हा परिषद गटातील १५ ग्रामपंचयतीच्या ग्रामसभा घेऊन मागणीचा ठराव संबधित विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या कामामुळे, पाणी आणि रस्ता या दोन मुलभूत गरजा साध्य होऊन मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार आरोपींची मालमत्ता करणार जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींची मालमत्ता पोलिस जप्त करणार आहेत. कोर्टाकडून ३५ गुन्हेगारांची मालमत्ता जप्तीचे आदेश मिळवण्यात आले आहेत. ही माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.
शहरात विविध गुन्ह्यातील अनेक गुन्हेगार काही वर्षांपासून फरार आहेत. वारंवार शोधूनही ते सापडत नाहीत. कोर्टाने जाहीर केलेल्या या फरार गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. कोर्टाला या गुन्हेगाराची माहिती दिल्यानंतर एक नोटीस काढण्यात येणार आहे. यामध्ये फरार गुन्हेगाराला शरण येण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. या काळातही गुन्हेगार शरण आला नाही, तर कोर्टाकडून त्याची चलअचल मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात येणार आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरात व्यापाऱ्यावर हल्ला करून रक्कम लुबाडल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. नागरिकांनी सावधगिरी म्हणून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगायची असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी केले आहे. लाखो रुपयांच्या रक्कमेची वाहतूक करावयाची असल्यास योग्य तो बंदोबस्त घ्यावा. अन्यथा ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास ती जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा आयुक्त यादव यांनी दिला आहे. ही रक्कम कोर्टाच्या आदेशाने पुन्हा सबंधिताला परत देण्यात येईल. तसेच हा नियम फक्त वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीपुरताच असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शंभर गुन्हेगार हद्दपार

पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पदभार घेतल्यापासून आठ महिन्यात परिमंडळ एक व परिमंडळ दोनमध्ये एकूण १०२ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये परिमंडळ एकमधील ४८ व परिमंडळ दोनमधील ५४ गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यांना सहा महिने ते दोन वर्षापर्यंत हद्दपार करण्यात आले आहे. आगामी काळात देखील सुमारे शंभर गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येणार आहेत. त्यांच्यात आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलनाका कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोलवाडी येथील छावणी परिषदेच्या टोलनाक्यावर कंटेनर चालकाला दमदाटी करून तिप्पट वसुली करण्यात आली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात टोलनाका कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनर चालकाने या बेकायदा वसुलीची माहिती दिल्यानंतर वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छावणी पोलिसांत धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती.
सय्यद सोहब अली सय्यद गफार अली (वय ३० रा. इंदूर) हे चालक शहरातील बीड बायपास भागातील रोड लाइन्स ट्रान्सपोर्ट येथे कार्यरत आहेत. ते मंगळवारी दुपारी तीन वाजता मालकाच्या सांगण्यावरून लासूर स्टेशन येथील एका कंपनीच्या गोदामातून माल भरण्यासाठी कंटेनर घेऊन जात होते. मात्र, त्यांच्या मालकाने फोन करून ऑर्डर रद्द झाल्याची माहिती दिली. यामुळे सोहबअली हे कंटेनर वळवून शहराकडे परत येत होते. यावेळी गोलवाडी टोलनाक्यावर त्याला कर्मचाऱ्यांनी अडवले. सोहबअली याने कंटेनर रिकामा असल्याचे सांगितल्यानंतरही टोल भरण्याचे सांगण्यात आले. नियमाप्रमाणे साठ रुपयांची पावती असताना सोहबअली यांना १८० रुपयांच्या तीन पावत्या देण्यात आल्या. सोहबअली यांनी विरोध केल्यानंतर दमदाटी करण्यात आली. सोहबअली यांना पैसे देण्यास भाग पडले. सोहबअली यांनी हा प्रकार शिवसेनाप्रणित वाहतूक सेनेचे अध्यक्ष युसूफखान व कार्याध्यक्ष बाळासाहेब दानवे यांना सांगितला. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी इतर ट्रान्सपोर्ट चालकांसह छावणी पोलिस ठाणे गाठून टोलनाका चालकावर कडक कारवाईची मागणी केली. याप्रकरणी सोहबअलीच्या तक्रारीवरून टोलनाक्याच्या कर्मचाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोलनाका चालकाने तिप्पट शुल्क वसूल केल्याप्रकरणी कंटेनर चालकाने आमच्याशी संपर्क केला होता. त्यावरून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. टोलनाकाचालकांने नियमाप्रमाणे वसुली करावी, पुन्हा असा प्रकार घडल्यास आमच्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल.
-बाळासाहेब दानवे, कार्याध्यक्ष, वाहतूक सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी गायब; पदाधिकारी हतबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आयुक्त नसल्यामुळे महापालिकेतील काही प्रमुख अधिकारी गायब आहेत. फोन केला तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. या प्रकारामुळे खुद्द महापौर आणि सभापती हतबल झाले आहेत. सभापतींनी तर अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून कोणकोणते अधिकारी कामावर आहेत याची माहितीच मागवली आहे.

महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले आहेत. त्यांचे प्रशिक्षण १२डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे त्यांचा कार्यभार शासनाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आणि ते सोमवारपासून आठ दिवसांच्या सुट्टीवर गेले. अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तच नसल्यामुळे काही अधिकारी कमालीचे निर्धास्त झाले आहेत. त्यांची त्यांच्या कार्यालयात येण्याच्या आणि जाण्याच्या वेळा स्वतःहून बदलून घेतल्या आहेत. त्यामुळे अधिकारी कामावर आहेत की नाहीत, हे कळतच नाही. फोन केला तर त्याला त्यांच्याकडून प्रतिसाद देखील मिळत नाही. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेतच, पण आता खुद्द महापौर नंदकुमार घोडेले व स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल हतबल झाले आहेत.

गजानन बारवालांनी घेतला आढावा
बारवाल यांनी बुधवारी कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा घेतला तेव्हा त्यांच्या पदरी निराशाच आली. प्रमुख अधिकारी त्यांना आढळले नाहीत. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंह यांना पत्र दिले. कोणते अधिकारी कामावर आहेत, कोणत्या अधिकाऱ्यांनी रजा घेतली आहे याची माहिती त्यांनी भालसिंह यांच्याकडून मागवली आहे. नगरचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख परवानगी घेवून बाहेर गेले आहेत. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी देखील परवानगी घेतली. मसुरीला जाताना आयुक्त देखील सांगून गेले पण अन्य अधिकारी काहीही न सांगता गैरहजर राहतात, हे योग्य नाही असे बारवाल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images