Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अल्पसंख्यांक आयोग व गृह विभागााच्या प्रधान सचिवांना नोटीस

$
0
0

वक्फ बोर्डात साहित्य खरेदीत गैरव्यवहार

अल्पसंख्यांक आयोग व गृह विभागााच्या प्रधान सचिवांना नोटीस

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

वक्फ बोर्डात साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून यासाठी अ वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने राज्याच्या अल्पसंख्याक आयोग व गृह विभागाच्या प्रधान सचिवांसह, विभागीय आयुक्त आैरंगाबाद, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व वक्फ बोर्डाच्या तत्कालिन सीईआे नसिमबानो पटेल यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा, आैरंगाबाद येथील मुस्तफा दिलावरखान पठाण व अंबाजोगाई (जि. बीड) शेख अनिसोद्दीन मझबोद्दीन यांनी वक्फ बोर्डाच्या कामकाजासंबंधी विशेष पथकाची नेमणूक करून चौकशी करावी अशी विनंती केली आहे. वक्फ बोर्डाने २०१२ पासून केलेल्या साहित्य खरेदीची सविस्तर चौकशी करण्याची त्यांनी केली आहे.

प्रत्यक्षात खरेदी न करताच बोगस बिले व व्हाऊचर्स दाखविण्यात आल्याचा आरोप संबंधितांनी केला. सदर प्रकरणी बोर्डाच्या तत्कालिन सीईआे नसिमबानो पटेल यांनी चौकशी समिती नेमली. त्यात दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीईआे पटेल यांच्यावर आरोप असताना त्यांनी आपल्या खालचे अधिकारी अजीज अहमद सहाय्यक सिईआे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. दोषींची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अ वर्ग अधिकाऱ्याकडून करण्यात यावी यासाठी शासनास २३ फेब्रुवारी २०१६ मध्ये पत्र देण्यात आले होते, परंतु चौकशी न झाल्याने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.याचिकाकर्त्यांनी बाजू सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली.

या वस्तू केल्या खरेदी

संगणक - ४८ लाख ९० हजार ७१७ रुपये,

झेरॉक्स मशिन- ७५ लाख ७३ हजार ८३९ रुपये

झेरॉक्स मशिन- ६ लाख ६६९० रुपये

ऑनलाईन युपीएस- ४४ लाख ८४ हजार २२० रुपये

फ्रॅकिंग मशिन- ४४ लाख ८४ हजार २२० रुपये

प्रिंटर खरेदी- ७ लाख २९ हजार ४९५ रुपये

कार्यालयातील फर्निचर-२९ लाख २५ हजार रुपये

कार्यालयीन स्टेशनरी- १९ लाख ५० हजार रुपये

वीज देयके, व टेलिफोन बिल- २६ लाख ८२४९ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा जानेवारीपासून राज्य अग्रवाल संमेलन शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
२३ वे राज्यस्तरीय अग्रवाल संमेलन ६ व ७ जानेवारी रोजी शहरातील सिडको टाउन सेंटर परिसरातील श्री अग्रसेन भवनात आयोजित करण्यात आले आहे. तब्बल चार ते साडेचार हजार प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
संमेलनामध्ये ६ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अग्रवाल युवक-युवती परिचय मेळावा होणार आहे. दुपारच्या सत्रात महिला सशक्तीकरण या विषयावर महिलांचे चर्चासत्र होणार असून, यात अग्रवाल महिला संमेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा गुप्ता, माहेश्वरी महिला संमेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कल्पना गगराणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याच दिवशी कार्य समितीची बैठक होऊन अभिनेत्री ग्रेसी सिंग यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रांतीय अधिवेशनाचे उद्‍घाटन ७ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता झी टीव्हीचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्रा गोयल, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपालशरण गर्ग, राष्ट्रसंत आचार्य विजय कौशल महाराज, डॉ. संजय कृष्ण सलील महाराज, जगतगुरू महामंडलेश्वर इंद्रदेवश्वरानंद सरस्वती, महाराष्ट्र अग्रवाल संमेलनाचे अध्यक्ष विजय चौधरी आदींच्या उपस्थितीत होईल. या संमेलनासाठी डॉ. सुशील भारुका यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष केशव लिला, ऋषीकुमार बागला, उपाध्यक्ष आनंद बारुका, विशाल लदनिया आदी मंडळी पुढाकार घेत असल्याची माहिती दिलीप अग्रवाल, विजय गोयल, विवेक अग्रवाल, सुनिल अग्रवाल आदींनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाचे विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
वारकरी पंथाचे शिक्षण घेणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलासोबत त्याच वारकरी संस्थेतील शिक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील वाघाडी येथील माजी खासदाराच्या फार्म हाउसवर घडली. पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने शिक्षक पळून गेल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलाने केला आहे.
तालुक्यातील वाघाडी येथे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या शेतवस्तीवर सुरू असलेल्या रामेश्वर वारकरी शिक्षण संस्थेत जवळपास १७ सतरा विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत. या शिक्षण संस्थेतील शिक्षक गणेश तौर (वय ४०) हा ११ वर्षीय विद्यार्थ्यावर अनेक दिवसापासून अनैसर्गिक कृत्य करून लैंगिक अत्याचार करत होता. ही बाब याच संस्थेत शिकणाऱ्या व पीडित मुलाच्या गावातील १३ वर्षाच्या मुलाला माहीत झाली. त्याने त्याच्या मामाला फोनवर ही माहिती दिल्यावर, अत्याचारांची घटना उघड झाली. दरम्यान, पीडित मुलाचे वडील व नातेवाईक वाघाडी येथे येण्यापूर्वीच या भागातील नागरिकाना या गंभीर घटनेची माहिती मिळाली. संतप्त नागरिकांनी व संस्थेतील विद्यार्थ्यानी शिक्षक गणेश तौर याला चोप देत त्याला पैठण पोलिस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलाच्या फिर्यादीवरून शिक्षक गणेश तौर याच्याविरोधात पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची टाळाटाळ

संशयित आरोपी शिक्षक गणेश तौर याला परिसरातील नागरिकांनी सोमवारी दुपारी बारा वाजता पैठण पोलिस ठाण्यात आणले. शिक्षकाला मारहाण झाल्याने तुमच्या विरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून प्रकरण आपसात मिटवून घ्या, असा दबाव टाकत पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीड़ित मुलाच्या वडिलाने केला आहे. या दरम्यान आरोपी शिक्षक गणेश तौर पळून गेल्याचा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पा सेंटर’च्या मॅनेजरसह दोघींचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रोझोन मॉलमधील ‘दी स्ट्रेस हब’ व ‘अंतरा’ या स्पा सेंटरमध्ये अनधिकृतपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पुरेसे पुरावे आढळले असतानाच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘स्पा सेंटर’ची व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापकाचा नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सोमवारी फेटाळला.
या ‘स्पा सेंटर’वर ७ डिसेंबर रोजी कारवाई होऊन थायलंडच्या ९ पीडित तरुणींसह एकूण १८ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाच्या आदेशाने थायलंडच्या तरुणींना सुधारगृहात पाठवून ‘स्पा सेंटर’ची व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक व इतरांना आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. दरम्यान, व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक या दोघी आरोपींनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. सुनावणीवेळी, प्रकरण अतिशय गंभीर व संवेदनशील असून, यात मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे व या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी दोघी आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोघी आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. अविनाश देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहाय्य केले.

सुरक्षेचा दृष्टिकोन अधोरेखित

दोन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळताना, कोर्टाने वेगवेगळ्या मुद्द्यांना अधोरेखित केले. या ‘स्पा सेंटर’मध्ये अनधिकृतरित्या वेश्याव्यवसाय सुरू होता, याचे पुरावे सापडले आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक खोलीमध्ये कंडोम सापडले आहेत. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या व प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून आरोपींना जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही, असेही मत कोर्टात या प्रकरणात व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस्ट्रो पुन्हा उंबऱ्यावर!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागच्याच महिन्यात गॅस्ट्रोच्या उद्रेकाने छावणीवासीय पुरते त्रस्त झाले असताना, आता पुन्हा अनेक भागांत दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. विशेषतः पेन्शनपुरा, गवळीपुरा, गुड्डीगुडम आदी भागांमध्ये अनेक दिवसांपासून काळ्या-पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच गॅस्ट्रोच्या अनेक नवीन रुग्णांवर दररोज उपचार करण्याची वेळ येत आहे. छावणी परिषदेच्या रुग्णालयात सोमवारी गॅस्ट्रोचे ११ नवे रुग्ण आढळले.

छावणीमध्ये १० नोव्हेंबर ते २४-२५ नोव्हेंबरपर्यंत गॅस्ट्रोच्या तब्बल सहा हजार रुग्णांवर एकट्या छावणी परिषदेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याशिवाय तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान, खाम नदीतून पुढे आलेल्या जलवाहिनीतील लिकेज शोधून तेवढी जलवाहिनी बदलण्यात आली खरी; परंतु दूषित पाणी पुरवठा काही केल्या अजूनही बंद झालेला नाही, असेच एकंदरीत चित्र आहे. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेन्शनपुरा, गवळीपुरा आदी भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा अजूनही होत असल्याचे स्पष्ट झाले. ‘मटा’च्या प्रतिनिधीने या भागातील नागरिकांशी संवाद साधला असता, अनेक भागांमध्ये चक्क काळे पाणी येते, काही भागांमध्ये पिवळे पाणी येते, तर काही भागांमध्ये पाणी वरकरणी स्वच्छ दिसते, पण ते पाणी पिण्यामुळे अजूनही अनेक त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गवळीपुरा भागामध्ये तर कित्येक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे व त्याची तक्रार शेकडोवेळा करण्यात आली; परंतु छावणी परिषदेला त्याचे काहीही सोयरसुतक नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. पेन्शनपुरा भागामध्ये तर सोमवारी नळाला चक्क काळे पाणी आल्याची तक्रार नागरिकांनी केली.

परिषदेने घेतले पाण्याचे नमुने
दूषित पाण्याची तक्रार करून नागरिक थकले असताना, सोमवारी अनेक भागांमध्ये काळे पाणी आल्याचे समजल्यानंतर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काही पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, दूषित पाण्याच्या समस्येला छावणीवासीय पुरते वैतागल्याचे दिसून येत असून, बहुतेक घरांमध्ये कोणाला ना कोणाला दूषित पाण्याचा त्रास होत असल्याची भावना नागरिकांनी ‘मटा’कडे बोलून दाखविली.

पेन्शनपुरा, गुड्डीगुडम भागात दूषित पाण्याची समस्या आहे. या भागांतील बहुतेक पाइप जुने झाले आहेत व वॉर्डातील पाइपलाइनमधील लिकेजमुळे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. – संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद

मागच्या किमान चार-पाच दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे. आज तर नळाला चक्क काळे पाणी आले. या पाण्याला दुर्गंधीही होती. वारंवार तक्रार केल्यानंतर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले. – नागेश मोरेल्लू, पेन्शनपुरा

मागच्या किमान आठ ते दहा दिवसांपासून काळे-पिवळे पाणी येत आहे. याबाबत परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणीही ऐकत नाही. त्यामुळे आमच्या समस्या कुठे मांडाव्यात हेच कळेनासे झाले आहे. – शेख तालीब शेख नूर, पेन्शनपुरा

दोन-तीन दिवसांपासून फारच घाण पाणी येत आहे. या पाण्यामुळे पुन्हा एकदा गॅस्ट्रोचा उद्रेक होतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मागच्या महिन्यात तर आमच्या घरातील बहुतेकजण आजारी होते. – सुंदरलाल मोरेल्लू, पेन्शनपुरा

गवळीपुऱ्यात तर बहुतेक घरांमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडलेले लोक आहेत. आमच्या भागात तर कित्येक दिवसांपासून दूषित पाण्याची समस्या आहे. मात्र परिषदेला आमच्यासाठी काहीही करायचे नाही, हेच खरे. – एस. के. उस्मान, गवळीपुरा

आमच्याकडे पिवळे पाणी येत असून, त्यामुळेच माझा मुलगा कित्येक दिवसांपासून आजारी आहे. किती दिवस पाणी उकळून प्यायचे, हा प्रश्नच आहे आणि पुन्हा पाणी उकळूनही मुले-आम्ही आजारी पडत आहोत. – बबिता लिंगायत, गवळीपुरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’कर्ज प्रस्तावावर पुढच्या सभेत चर्चा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी हडकोकडून ९८ कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या प्रस्तावावर २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,’ असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी जाहीर केले. ‘हर्सूल तलावातील गाळ प्रकरणात तीन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव देखील त्याच सभेत चर्चेसाठी घेतला जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शासनाने ३५५ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती, पण महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवल्यावर या योजनेचे काम ४६५ कोटी रुपयांवर गेले. खर्चातील तफावत भरून काढण्यासाठी हडकोकडून कर्ज काढण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला काँग्रेस, एमआयएम या प्रमुख पक्षांनी विरोध केला. या पार्श्वभूमीवर महापौर घोडेले यांनी कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या सभेत मात्र या प्रस्तावावर निर्णय घ्यावाच लागेल, असे ते म्हणाले. हर्सूल तलावातील गाळ प्रकरणात कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, शाखा अभियंता के. एम. फालक, के. पी. धांडे यांच्या विभागीय चौकशीला मान्यता देण्याचा प्रस्ताव देखील प्रशासनातर्फे ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव देखील पुढील सर्वसाधारण सभेत घेण्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

अधिकारी नागपूरला
नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवशनासाठी काही प्रमुख अधिकारी नागपूरला गेले आहेत. अस्थापना विभागाचे अधिकारी देखील तेथे आहेत. त्यामुळे ते परतल्यावरच या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेऊ असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणीजन साहित्य संमेलन जानेवारीत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दशकपुर्तीच्या मुद्रांकित वाटचालीनंतर अकरावे गुणीजन साहित्य संमेलन २८ जानेवारी २०१८ रोजी भानुदास चव्हाण सभागृह, रेल्वे स्टेशन येथे होणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बाबू बिरादार (प्रसिद्ध कादंबरीकार) असतील. याचे उद्घाटन नर्मदा बचाव चळवळीचे खंबीर नेतृत्व करणाऱ्या मेधा पाटकर यांच्या हस्ते होईल. यावेळी अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. संजय नवले, हिंदी साहित्य‌िक शशीबाला विमलकुमार, साहित्यिक अशोक भांडवलकर आदींची उपस्थिती असेल. यावेळी पंडित नाथ नेरळकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यात स्व. धोंडिराम माने साहित्य पुरस्कार महेश लोंढे (निद्रानाशाची रोजनिशी), लक्ष्मीदेवी चव्हाण (सुनयना), एकनाथ पांडवे (वादळातल झाड), इंद्रजित घुले (या वेशपासून त्या वेशीपर्यंत) यांना देण्यात येणार आहे. स्व. गंगाबाई माने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सुभेदार बाबूराव पेठकर (कृषितज्ज्ञ) वंदना मुळे (संघर्षशील दिव्यांगिनी), संजय झट्टू (सामाजिक कार्यकर्ता) यांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) करतील.

जोगवा कार्यक्रम
प्रा. जयराम खेडेकर यांच्या कवितांवर आधारित शब्दसुरांची सुरेल मैफल ‘जोगवा’ कार्यक्रम होईल. यादिवशीच कविसंमेलनही होणार आहे. याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी गीतकार फ. मुं. शिंदे असतील. यात गौरी भोगले, वीरा राठोड, मृणालिनी कानिटकर, संदीप वाघोले, मीनल येवले, इंद्रकुमार झांजे यांचा सहभाग असेल. या संमेलनाचे संयोजक सुनीता सुभाष माने असून, स्वागताध्यक्ष स्मिता सुभाष माने असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कृषी मूल्य आयोगाच्या सचिवपदी देवळाणकर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांच्या सचिवपदी कृषी विभागातील अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देवळाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात प्रथमच कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. भाजपचे नेते पाशा पटेल यांची आयोगाच्या अध्यक्षपदी यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. देवळाणकर गेल्या ३० वर्षांपासून कृषी विभागात कार्यरत आहेत. सध्या ते बीड येथे अतिरिक्त प्रकल्प संचालकपदी कार्यरत आहेत.

विविध पीकांच्या उत्पादन खर्चाचा अभ्यास करून किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याचे मुख्य काम या आयोगाकडे सोपविले आहे. त्याचबरोबर विविध कृषी उत्पादनांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पीतळीवरील दरांचे विश्लेषण करून सल्ला देण्याचे कामही हा आयोग करणार आहे. केंद्र सरकारला आयात, निर्यात धोरण ठरविण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाने केलेला अभ्यास आणि विश्लेषण महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात सुपारी, नारळ यांसह अनेक पिके हमीभाव व्यवस्थेच्या बाहेर आहेत. या पीकांनाही हमीभाव देण्यासाठी सध्या कृषी मूल्य आयोग अभ्यास करीत आहे.

यादव समितीचा अहवाल महिन्यात
आयोगाची संरचना निश्चित करण्यासाठी डॉ. यादव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल महिनाभरात अपेक्षित असून, फेब्रुवारी २०१८पासून कृषी मूल्य आयोगाचे काम नव्या स्वरुपात सुरू होईल. विविध पिकांचा उत्पादन खर्च, संभाव्य दर यांचे अंदाज शेतक-यांना पेरणीपूर्वी सांगण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा कृषी मूल्य आयोग प्रयत्न आहे. त्याचबरोबर हवामान बदलांचा विविध पिकांवर होऊ घातलेल्या परिणामांचा अभ्यासही करण्याची जबाबदारीही कृषी मूल्य आयोगाकडे सोपविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांवरील कारवाई बंद करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने सुरू केलेली कारवाई बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देत शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने सोमवारी महापालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली.

निदर्शनानंतर पालिका आयुक्तांच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदनात या संघटनेने म्हटले आहे की, क्रांतीचौक, पैठण गेट, सिटी चौक, शहागंज, कुंभारवाडा, गुलमंडी, गजानन महाराज मंदिर परिसर या भागात भोंगे लावलेल्या रिक्षा फिरवून फेरीवाल्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे केला जात आहे. कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस न देता अशा प्रकारे बेकायदेशीर कारवाई करणे महापालिकेला शोभत नाही. फेरीवाले शहरातील मध्यमवर्गीय नागरिकांची गरज भागवतात, नागरिकांना सोयीचे होईल तेथेच फेरीवाल्यांना उभे रहावे लागते. फेरीवाल्यांनी कष्ट करायचे नाही, तर चोऱ्या करायच्या का ? कारवाईपूर्वी प्रत्येक फेरीवाल्यांना लेखी नोटीस दिली का ? असे विविध प्रश्नही संघटनेने निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत कारवाई बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदनावर अभय टाकसाळ, अश्फाक सलामी, किरण पंडित, विकास गायकवाड, रतन गायकवाड, सतीश निकम, संग्राम कोरडे, राजेश हिवराळे, अशोक राठोड, हरी शेकटे, बबलू राठोड आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नागरिकांचे खड्डयात बसून आंदोलन

$
0
0


परभणी : सोनपेठ तालुक्यातील रस्त्याविना त्रस्त असलेल्या नागरीकांनी खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोमवारी शेळगाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून धरणे आंदोलन केले.
राज्यातील सर्व रस्ते १५ डिसेंबरपुर्वी खड्डे मुक्त करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. पण सोनपेठ तालुक्यातील प्रमुख रस्त्यावर अजुनही काम सुरू नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील रस्त्याविना त्रस्त नागरीकांनी शेळगाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. सोनपेठ-शेळगाव या राज्य महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले असून दहा किलोमीटरच्या अंतरासाठी नागरीकांना अर्धा तास लागतो. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊन लोक गंभीर जखमी झाले आहेत. उघड्ड्या गिट्टीमुळे बैलांच्या पायांना जखमा होऊन जनावरे कायमची जायबंदी होत आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. तालुक्यातील रस्ते दुरुस्त्यासाठी नागरीकांनी ५९ दिवस आंदोलन करुन ही बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. सोमवारी तासभराच्या आंदोलनानंतर सोनपेठ पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांची समजूत काढली व आंदोलकांना उठवण्यात आले. बांधकाम विभागाने आठवडाभरात या रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदु, माधव जाधव, सोमनाथ नागुरे, अमरदीप नागुरे, अंगद काळे, विश्वंभर गोरवे, विष्णू मुसळे, रवींद्र देशमुख, खदीर विटेकर, सिद्धेश्वर गिरी, शिवमल्हार वाघे, गणेश पाटील, कृष्णा पिंगळे, मारोती रंजवे, अशोक तिरमले, रामप्रसाद यादव, गुलाबराव ढाकणे, राधेश्याम वर्मा, बाळकृष्ण बहादुर, संपतराव सोळंके, सुभाषआप्पा नित्रुडकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरात, हिमाचल प्रदेशातील विजयाने मराठवाड्यात जल्लोष

$
0
0


टीम मटा, औरंगाबाद - गुजरात व हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविला. या विजयामुळे मराठवाड्यातील भाजपच्या पदाधिकायांनी जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

लातूरात विजयी मिरवणूक
म. टा. प्रतिनिधी, लातूर
गुजरात, हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर शहर जिल्हा भाजपने जल्लोष करण्यास सुरुवात केली. शहर जिल्हाअध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रदिप मोरे, नगरसेवक नितीन वाघमारे, सुनील मलवाड, नगरसेविका गीता गौड, भानुदास डोके, प्रविण येळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व शहर जिल्हा भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

उस्मानाबादमध्ये आनंदोत्सव
उस्मानाबाद - भाजपच्या गुजरात व हिमाचल प्रदेशातील विजयानिमित्ताने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, मिलींद पाटील, अॅड. अनिल काळे, प्रभाकर मुळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

जालन्यात फोडले फटाके
जालना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यात विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला या विजयाचा जल्लोष परतूर येथे राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरातील महादेव मंदिर चौक, रेल्वे गेट, गाव भागातील दसमाळे चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते भगवान मोरे, रमेश भापकर, सभापती रामेश्वर तनपुरे, शहाजी राक्षे, सुधाकर बेरगुडे, शिवाजी पाइकराव, प्रकाश चव्हाण, राजेश मुंदडा, कृष्णा अरगडे, श्रीकांत उन्मुखे, डॉ. सुखराज कोटेचा, ओम मोर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक घेतलेल्या डोंजा गावाला सचिन देणार भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
खासदार दत्तक ग्राम योजनेमध्ये दत्तक घेतलेल्या गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा (ता. परंडा) येथे येणार आहे. सचिनच्या आगमनाकडे डोंजा ग्रामस्थांबरोबरच जिल्ह्यामध्येही उत्सुकता आहे. संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाबरोबर पोलिसांनीही तयारी करत, कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
राज्यसभा सदस्य असणाऱ्या सचिन तेंडुलकरने जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतले आहे. त्याच्या खासदार निधीतून गावामध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. सचिननेही या गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याच्या निधीतून कामांसाठी पैसा खर्च करण्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून आले होते. सचिननेच त्याची दखल घेत, काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे विचारणा केली होती. त्यानंतर हालचाली झाल्या आणि कामांना सुरुवात झाली आहे. खासदार निधीतून गावामध्ये चार कोटी रुपयांची कामे होत आहेत. यामध्ये शाळा, पाणीपुरवठा योजनेबरोबर रस्त्यांचीही कामे होत आहेत. यातील काही कामांची सुरुवात सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार आहे. तसेच, कामांची सुरुवात झालेल्या प्रकल्पांनाही तो भेट देणार आहे. या वेळी सचिन तेंडुलकर ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहे.
या दौऱ्यासाठी सचिन मंगळवारी सकाळी पुण्यातून हेलिकॉप्टरने डोंजा येथे येणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता डोंजा येथे पोहोचल्यानंतर तो जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधेल. तसेच, शाळेची व गावातील पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करेल. त्यानंतर तो गावातील धार्मिक स्थळात जाऊन दर्शन घेऊन ग्रामस्थांना त्याच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात गॅसचे वितरण केले जाणार आहे. सचिन त्यानंतर दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी तो पुण्याला परतेल.खासदार सचिन तेंडुलकर मंगळवारी (१९ डिसेंबर) उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा या खासदार दत्तक ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या गावाला भेट देणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डोंजा येथे पोलिस दलाच्यावतीने बंदोबस्तासाठी २५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती उस्मानाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. सचिन सरासरी डोंजा या गावात २ तास वेळ देणार असून त्यामुळे डोंजा गावात पाहण्यासाठी गर्दी उसळणार असल्याने प्रशासनाने त्याची पूर्ण तयारी केली आहे. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. संजय कोलते त्याचे स्वागत करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे २२ डिसेंबरला उद्घाटन

$
0
0

खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे २२ डिसेंबरला उद्घाटन

शहराच्या वैभवात भर पडणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे शुक्रवारी (२२ डिसेंबर) उद्‍घाटन करण्यात येणार आहे. ‌भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान प्रसार विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांच्या हस्ते हा उद्‍घाटन समारंभा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.‌

शहरातील शैक्षणिक संस्थांमधून कुलशल तंत्रज्ञ, अभियंते तयार होत असताना उपयोजित विज्ञानासोबत मूलभूत विज्ञानाची जोड असणे गरजेचे झाले आहे. ही गरज पूर्ण कण्यासाठी एमजीएमने या खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबची उभारणी केली आहे. मराठवाड्यात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र असून या केंद्रामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे, असे ते म्हणाले.

या केंद्रामध्ये आदित्य सौर वेधशाळा, सायन्स पार्क, मराठवाड्यातील पहिलेच डिजिटल तारांगण, खगोलशास्‍त्र व भारतीय अंतराळ तंत्रज्ञान दालन, होलोग्राफी थिएटर, थ्रीडी थिएटर, अंकगणित तसेच भूमिती दालन व मूलभूत भौतिकशास्‍त्र विभागाची दोन भव्य दालने तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनामध्ये संबंधित विषयाची माहिती देण्यासाठी तज्‍ज्ञांची उपस्थिती राहणार आहे. खगोल अंतराळ विज्ञान केंद्रामध्ये तयार करण्यात आलेल्या बागेमध्ये भौतिकशास्‍त्र नियमावर आधारित विज्ञान खेळणी बसवण्यात आली असून शाळकरी विद्यार्थ्यांना या खेळण्यांवर खेळ खेळत मनोरंजक पद्धतीने भौतिकशास्‍त्र समजावून घेता येणार असल्याचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढची पिढी घडविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा

$
0
0

पुढची पिढी घडविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा
जिल्हा परिषद अध्यक्षांचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी शिक्षकांना आवाहन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण भागातील टॅलेंटला ओळखून त्यांना प्रशिक्षित करण्याचे काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर असते. डिजिटल युगात ग्रामीण विद्यार्थी कुठेही कमी पडता कामा नये, आपली पुढची घडविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी मंगळवारी येथे केले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे वर्ष २०१७ -१८ च्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण मंगळवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, अतिरिक्त सीइओ अशोक शिरसे, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे, मीनाताई शेळके, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी गजानन सुसर आदींसह झेडपी सदस्य, जिल्हाभरातील शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते.
डोणगावकर म्हणाल्या, शिक्षणाव्यतिरिक्त स्त्री पुरुष समानता, सामाजिक भान तसेच बांधिलकीचे शिक्षणही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे. शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरू नये, वेळेवर उपस्थित राहिले पाहिजे. सीइओ अर्दड म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे काम चांगले सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राथमिक शाळेत ज्या गुरुंनी आपल्या शिकवले त्याची आठ‍वण आयुष्यभर राहते. उपाध्यक्ष केशवराव तायडे, अतिरिक्त सीइओ शिरसे, मधुकर वालुतरे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. आश्विनी लाठकर यांनी प्रास्ताविक केले. प्रविण लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले. गजानन सुसर यांनी आभार मानले. पाहुण्यांच्या हस्ते प्राथमिक व माध्यमिक विभागातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील ९० टक्के पोस्टमार्टेम अप्रशिक्षितांकडून

$
0
0

देशातील ९० टक्के पोस्टमार्टेम अप्रशिक्षितांकडून
११८ वर्षे जुन्या कायद्यात सुधारणाच नसल्याने ठोस पुराव्यांचा बट्ट्याबोळ; डॉ. खांडेकरांची टीका
Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet-@nnirkheeMT
औरंगाबादः भारतातील तब्बल ९० टक्के मृतदेहांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) हे अप्रशिक्षित डॉक्टरांकडूनच होते. कोणत्याही डॉक्टरने यावे आणि शवविच्छेदन करावे, अशी दुर्दैवी स्थिती सध्या देशात आहे. त्याचवेळी ११८ वर्षे जुन्या पोस्टमार्टेम कायद्यामध्ये आतापर्यंत कोणत्याच सुधारणा झालेल्या नाहीत. परिणामी, असंख्य गुन्ह्यांमध्ये ठोस पुराव्यांचा अभाव असतो आणि दिल्लीतील आरुषी तलवार खून प्रकरणासारखी असंख्य प्रकरणे आपल्या देशामध्ये दररोज वर्षानुवर्षे घडतच आहेत, अशी टीका सेवाग्राम येथील ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख व नामांकित विषयतज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केली.
न्यायवैद्यक प्रकरणांवर मंगळवारी (१९ डिसेंबर) घाटीमध्ये आयोजित वैद्यकीय परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आले असता, त्यांनी ‘मटा’शी त्यांनी संवाद साधला. डॉ. खांडेकर म्हणाले, शवविच्छेदन हे तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच होणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी अनेक आधुनिक मार्गदर्शक तत्वे आहे व त्यांचे तंतोतंत पालन सगळ्याच प्रगत देशांमध्ये होते. मात्र आपल्या देशात कुठल्याच आधुनिक मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नाही. ११८ वर्षे जुन्या पोस्टमार्टेम कायद्यामध्ये कोणत्याच सुधारणा झालेल्या नाहीत आणि कोणताही ‘प्लेन एमबीबीएस’ डॉक्टर कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय कुठेही पोस्टमार्टेम करतो. त्यामुळेच असंख्य गुन्ह्यांमधील ठोस व अतिशय महत्वाचे पुरावे हातातून निसटून जातात आणि त्याचा तपासावर गंभीर परिणाम होतो. अर्थातच, ठोस पुराव्यांशिवाय गुन्हेगारी व गुन्हेगारांवर नियंत्रण न राहता असंख्य गुन्हेगार निसटतात व गुन्ह्यांचे दुष्टचक्र आणखीनच गडद होत जाते. कोणतेच पुरावे न सापडलेले आरुषी तलावर खून प्रकरण हे त्याचे बोलके उदाहरण म्हणता येईल.
‘पीएमओ’कडून अहवालाची दखल
पोस्टमोर्टेम कायद्यामध्ये सर्वांगीण सुधारणा व्हावी, पोस्टमार्टेमचा एकूणच दर्जा सुधारावा व एकही ठोस पुरावे हातून निसटून जाऊ नये म्हणूनच केंद्र सरकारला मी ८२ पानी अहवाल मागेच सादर केला आहे. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून, माझ्या अहवालाचा अभ्यास करुन पोस्टमार्टेम कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा गरजेच्या आहेत, याविषयीच्या सूचना सादर करण्याचे आदेश ‘पीएमओ’ने कायदा आयोगाला दिले आहेत. बलात्कारप्रकरणामध्ये पीडितेच्या ‘फिंगर टेस्ट’सह अनेक चुकीच्या पद्धती बदलाव्यात म्हणूनच २०१० मध्ये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात पीआयएल सादर केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये राज्य सरकारने ‘फिंगर टेस्ट’सह अनेक पद्धती बदलल्याचे डॉ. खांडेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फर्दापूरजवळ तिहेरी अपघात, सहा जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर
फर्दापूर-तोंडापूर रोडवर वरखेडी गावाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या स्विप्ट कार, अॅपे रिक्षा व दुचाकीच्या तिहेरी अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी पाच जणांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात व एकाला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
फर्दापूरकडून येणाऱ्या स्विप्ट कारने (एम एच ०२ बी जी ८०२३) तोंडापूरकडून येणाऱ्या अॅपेरिक्षा (एम एच २० ए जी ६३८०) व दुचाकीला (एम एच १९ सी बी ०४२४) धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आसाराम लहानू जोशी (वय २२) व हौसाबाई आबाजी जोशी (वय ६०, रा. कुंभारी, ता. जामनेर) अॅपेरिक्षातील सैय्यद सलीम शफी (वय ३० रा. ठाणा ता. सोयगाव) व वजीर सांडू तडवी (वय ३५), दिलावर सांडू तडवी (वय ८०), इन्सान सांडू तडवी (वय ३९ रा. घानेगाव, ता.सोयगाव) हे गंभीर जखमी झाले. शासकीय रुग्णवाहिकेतील डॉ. संजय पाठक, सिद्धार्थ इंगळे, बापू चव्हाण यांनी पाच जणांवर प्राथमिक उपचार करून जळगाव येथे दाखल केले. अॅपेरिक्षाचालक सैय्यद सलीम हे गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फिजिशियन्स’च्या दातृत्वातून ‘न्युरोस्टेशन’

$
0
0

‘फिजिशियन्स’च्या दातृत्वातून ‘न्युरोस्टेशन’

खासगी डॉक्टरांच्या संघटनेने घाटीला दिले चार लाखांचे उपकरण; रुग्णांची मोठी सोय

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेंदू, मज्जातंतू व स्नायुंच्या वेगवेगळ्या आजार-विकारांच्या सर्वांगीण व सखोल तपासण्यांसाठी अतिशय उपयुक्त असणारे ‘न्युरोस्टेशन’ हे परस्परसंबंध असलेले तीन उपकरणांचे युनिट घाटीला उपलब्ध झाले आहे ते खासगी डॉक्टरांच्या दातृत्वातून. तब्बल चार लाखांचे ‘न्युरोस्टेशन’ हे ‘फिजिशियन्स असोसिएशन’ने देणगीस्वरुपात घाटीच्या मेडिसिन विभागाला दिले असून, त्याचा वेधक उद्घाटन सोहळा मंगळवारी (१९ डिसेंबर) विभागात झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ज्येष्ठ मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार उकडगावकर, ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास कोंडपल्ले, घाटीतील मानद मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर, अतीवदक्षतातज्ज्ञ डॉ. अनंत कुलकर्णी, चिकित्सक डॉ. विकास रत्नपारखे, डॉ. सुरेंद्रसिंग जैस्वाल, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील आदींच्या उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम रंगला. औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागाच्या पहिल्या मजल्यावर ‘न्युरोस्टेशन’ उपलब्ध झाले आहे. याच न्युरोस्टेशनच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांत ६० पेक्षा जास्त तपासण्या झाल्या, असे सांगत शासकीय योजनेतून न्युरोस्टेशन हे घाटीला लवकर उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नव्हती आणि म्हणूनच मागच्या वर्षी ‘फिजिशियन्स असोसिएशन’च्या वैद्यकीय परिषदेत (मॅपकॉन) हे युनिट देण्याची फिजिशियन्सला गळ घातली आणि संघटनेने हे युनिट देण्यास तात्काळ मान्यता दिली. याकामी डॉ. कोंडपल्ले, डॉ. रत्ननपारखे, डॉ. कुलकर्णी यांनी मोठी भूमिका निभावली, असेही डॉ. भट्टाचार्य यांनी नमूद केले. याच न्युरोस्टेशवर ‘मायस्थेनिया ग्रेव्हिस’ या बऱ्यापैकी दुर्मिळ आजाराच्या दोन रुग्णांचे निदानदेखील झाले, असेही त्यांनी सांगितले. सर्व एमबीबीएस, एमडी तसेच बीपीएमटी विद्यार्थ्यांसाठी हे युनिट अतिशय महत्वपूर्ण असल्याचे मत डॉ. कांजाळकर यांनी व्यक्त केले, तर सामाजिक बांधिलकीतून युनिट देणगीस्वरुपात देण्याची संधी दिल्याबद्दल डॉ. कोंडपल्ले यांनी आभार मानले. घाटी ही आपली ‘मदर इन्स्टिट्यूट’ असल्याचे लक्षात घेऊन घाटीला उपकरणे देण्यासाठी तसेच ‘सीएसआर’साठी खासगी डॉक्टरांनी-संघटनांनी पुढे यावे. बी. जे. मेडिकल कॉलेजचा ‘सीएसआर फंड’ हा ६० कोटींचा आहे, हेही लक्षात घ्यावे. अर्थात, उपकरणांचा भक्कम आधार अतिशय महत्वाचा असला तरी डॉक्टरांच्या ‘क्लिनिकल नॉलेज-स्कील’ला पर्याय असू शकत नाही, हेही ध्यानात ठेवणे तितकेच गरजेचे असल्याचे डॉ. येळीकर म्हणाल्या.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार
आपल्या कामातून उत्तम योगदान देणाऱ्या चतुर्थ तसेच तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा यानिमित्ताने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रुग्णालयाचा आधार असलेल्या परिचारिकांसाठी व त्यांच्या योगदानासाठी सभागृहात मनसोक्त टाळ्या वाजल्या.
उपस्थित डॉक्टरांची दखल
या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले डॉ. वर्षा आफळे, डॉ. रंजना देशमुख, डॉ. तुपकरी, डॉ. मयुरा काळे, डॉ. झंवर आदींचे स्वागत करण्यात आले, तर वाढदिवसानिमित्त डॉ. आनंद निकाळजे यांना डॉ. येळीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कारच्या धडकेत पाच शिक्षक जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात पाच शिक्षक जखमी झाले. हा अपघात औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दाभरूळजवळ मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास झाला.
तालुक्यातील आंतरवाली खांडी येथील सम्राट अशोक विद्यालय येथील शिक्षक कारमधून (एम एच २० डी वी ६७८४) औरंगाबाद येथून शाळेला जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या कारसोबत (एम एच २५ आर ५३६५) धडक झाली. या अपघातात शिक्षक शरद ठकाराम गुंजाळ (वय ४२) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. महेंद्र निवृती वीर (वय ३५), दिलीप युवराज देशमुख (वय ४०), नेमदास निळकंठ तांबे (वय ५५), मंगेश भिका महाजन (वय ४४), ज्ञानेश्वर धोडींराम राठोड (वय ४२, सर्व रा. सातारा परिसर औरंगाबाद) हे जखमी झाले.
सर्व जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पैठणमध्ये बैलगाडी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी मंगळवारी अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत भाजपच्या मंत्र्याना औरंगाबाद जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत यांनी याप्रसंगी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात १० ते १५ बैलगाड्यांसह तालुक्यातील शेतकरी व छावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, नाथ हायस्कूल चौकमार्गे मोर्चा तहसील कार्यालयात धडकला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ऊस, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करा, महावितरणची सक्तीची बिल वसुली थांबवा, कृषी पंपाचे कनेक्शन तोडू नका आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी संतोष जेधे, पंजाबराव काळे, देवकर्ण वाघ, जालिंदर एरंडे, भगवान निवारे, संजय मोरे, तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते, कदीर पटेल, अभिजीत औटे, अर्जून खराद, किरण सातपुते, भागवत भुमरे, एकनाथ मानमोडे, उद्धव कळसकर, कृष्णा साळुंके, परमेश्वर क्षीरसागर, महेश शिंदे, आप्पा गिरगे, व्यंकटेश लांडगे, राहुल काशीद, शिवकुमार माळवदकर, निलेश गटकळ, लक्ष्मण शिंदे, रोहित भोपळे, आशिष झराड, विजय शिरवत, सुनील दाणे, आकाश घुले, ज्ञानेश्वर गावंडे, विश्वनाथ पऱ्हाड, दत्ता चिंचखेडे, मुकुंद शिरवत, रामेश्वर डोईफोडे, सुरज तवार, सुनील मोरे आदी शेतकरी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ परळीत ‘जलयुक्त’मध्ये चार कोटींची बोगस कामे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेमध्ये तब्बल चार कोटी रुपयांची बनावट कामे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या तब्बल चोवीस कर्मचारी अधिकाऱ्यावर निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच या रकमेच्या फसवणूक प्रकरणी कंत्राटदारांच्याकडून पन्नास टक्के वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली होती. यात २०१५-१६मध्ये परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत अनेक कामात अनियमितता झाली असल्याचे समोर आले होते. त्या संदर्भात सुरुवातीला मोठ्या प्रमाणात तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या होत्या. मात्र या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन चार जणांना निलंबित करण्यात आले. कृषी आयुक्तपदी सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्याकडे आणखी तक्रारी आल्या. त्याची दखल घेत, आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दक्षता पथक नेमले. या दक्षता पथकाने बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील तक्रारी आलेल्या कामांची पाहणी केली. मोजमापे घेतली एक महिना बीड जिल्ह्यातील या कामांची तपासणी या दक्षता पथकाने केली व आपला अहवाल आयुक्तांना दिला. या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर त्यानुसार, कारवाई करण्यात आली. या ६४ पानांच्या अहवालात परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने झाली असल्याचे यात म्हटले आहे. ही रक्कम अधिकारी कर्मचारी व कंत्राटदाराकडून निम्मी निम्मी वसूल करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणात २४ कृषी विभागाचे कर्मचारी निलंबित करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी काढले आहेत. यातील १५ कर्मचारी वर्ग तीनचे कर्मचारी आहेत. यातील चार कर्मचारी यापूर्वीच निलंबित आहेत, तर चार कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. यात दोन उपविभागीय कृषी अधिकारी, दोन तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images