Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कॅनाट प्लेसमध्ये हाणामारी; दोघे गंभीर जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सुपारी घेता का, असे म्हणत तरुणाच्या दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार कॅनाट प्लेस भागात घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
ऋषीकेश विश्वना‌थ जगदाळे (वय २१ रा. वडगाव गुंड ता. पारनेर) याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. जगदाळे याची फेसबुकवर निखिल बोरडे व त्याच्या मित्रासोबत कॅमेरा भाड्याने देण्याच्या जाहिरातीवरून ओळख झाली होती. सोमवारी जगदाळे व त्याच्या मित्रांना निखिल व त्याच्या मित्रांनी कॅनाट प्लेस येथे बोलावले. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सुपारी घेता का, असे म्हणत वाद घालून‌ शिवीगाळ सुरू केली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी जगदाळे व त्याचा मित्र रवींद्र पावडे यांना लोखंडी पाइपने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जगदाळेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निखिल बोरूडे, मयूर मुंढे, सोहेल पठाण, रोहित व इतर साथिदारांविरुद्ध पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली

$
0
0

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची अनेक वर्षांची मागणी लवकरच मार्गी लागणार आहे. औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी दोनशे ते अडीचशे एकर जागा लागणार आहे.

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्यादृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठी क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी शहरात येऊन गेले. क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी किमान दोनशे ते अडीचशे एकर जागा लागणार आहे. जागेची उपलब्धता पाहण्यासाठी हे अधिकारी आले होते. जागेची उपलब्धता झाल्यानंतर क्रीडा विद्यापीठाचा आरखडा तयार करण्यात येणार असल्याचे समजते. खेळापुरताच क्रीडा विषय मर्यादित राहिलेला नाही. खेळाला अन्य विविध विषय जोडले गेले आहेत. त्यादृष्टीने क्रीडा विद्यापीठाची गरज आहे. औरंगाबाद शहर हे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी येते. त्यामुळेच क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत व्हावे यावर राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सहमती दर्शवल्याचे समजते. क्रीडा विद्यापीठाला जागा मिळाल्यानंतरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जागा उपलब्ध होणे हाच मुख्य विषय आहे. त्यानंतरच विद्यापीठ स्थापनेविषयी हालचाली सुरू होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. क्रीडा विद्यापीठात कोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे याविषयी नेमका खुलासा होऊ शकला नाही.

विभागीय आयुक्तालयात क्रीडा विद्यापीठाबाबत बुधवारी चर्चा झाली. या बैठकीस विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे सीईओ मधुकरराजे आर्दड, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, ओएसडी कविता नावंदे, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

विभागीय क्रीडा संकुलात आधुनिक सुविधा

विभागीय क्रीडा संकुलात आधुनिक जलतरण तलाव, हॉकीचे अॅस्ट्रोटर्फ मैदान, अॅथलेटिक्स संकुलात सिथेंटिक ट्रॅक अशा प्रमुख सुविधा आगामी काळात निर्माण करण्याची क्रीडा खात्याची योजना आहे. नवा जिम्नॅशियम हॉलही उभारण्यात येणार आहे. औरंगाबाद, लातूर व अमरावती या ठिकाणी हॉकीचे अॅस्ट्रो टर्फ मैदान उभारण्यात येणार आहे. विभागीय क्रीडा संकुलाशेजारी असलेली पाच एकर जागा शासनाकडून मिळवून त्याठिकाणी जलतरण तलाव उभारण्याची योजना आहे. छावणीत जागा उपलब्ध झाल्यास तेथे हॉकीचे अॅस्ट्रोटर्फ मैदान उभारण्यात येईल. आधुनिक सुविधांचे प्रस्ताव तातडीने पाठवण्यात येणार आहेत. मंजुरीनंतर कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

सिडकोचे क्रिकेट मैदान क्रीडा खात्याकडे

सिडकोतर्फे गोलवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे. क्रिकेट स्टेडियम उभारणी झाल्यानंतर ते मैदान क्रीडा खात्याकडे सुपूर्द केले जाणार आहे. या प्रस्तावाला क्रीडा खात्याने मंजुरी दिली आहे. न्यूझीलंडच्या धर्तीवर हे स्टेडियम उभारण्यात येत आहे. या ठिकाणी अन्य सुविधाही निर्माण करण्यात येणार आहेत.


क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागेविषयी चर्चा झाली. संबंधितांनी औरंगाबाद शहर, परिसरात जागा उपलब्धेविषयी विचारणा केली. अद्याप हा विषय प्राथमिक स्तरावर आहे.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले.
विद्यानगर वॉर्डातील हिंदुराष्ट्र चौक परिसरात असलेल्या संत गाडगेबाबा उद्यानात रक्तदान शिबिर व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक नगरसेवक राजू वैद्य, नगरसेवक गजानन मनगटे, राजाराम मोरे, बापू कवळे, कैलास निकम, साईनाथ हजारे, अनिल गायकवाड, अप्पासाहेब ठोंबरे, नारायण भागवत, रामेश्वर वाघ, जनार्दन घोडके, भागवत काळे आदी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकराईट मुव्हमेंटतर्फे शहरातील महापुरूषांच्या पुतळ्याची व पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची व पुतळ्याच्या परिसराची, चौकांची स्वच्छता कार्यकर्त्यांनी केली. या अभियानात महापौरांनी सहभागी दिला. विशाल दाभाडे, केवल थोरात, मनीष नरवडे, प्रमोद आंबेवाडीकर, पंकज सुकाळे, सदाशिव डोईफोडे, आकाश मगरे, सागत थोरात, रोहित शिंदे, अभिजीत गंगावणे, संदीप मोकळे आदी सहभागी झाले. महापालिकेच्या चिकलठाणा येथील शाळेत संत गाडगेबाबा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक देवेंद्र सोळुंके यांनी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, अंधश्रध्दा याविषयावर कीर्तन केले. सर्जेराव वाघ, मंगल रंधे, बेबी मालोदे, शहर कापूरे, संगीता चव्हाण, सय्यद खिंजर, मनीषा शिंदे, जाहेद पठाण, रवींद्र खापे, अर्चना भारव्दाज उपस्थित होते. महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात देखील अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह देवेंद्र सोळंके, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार, स्वाती दिंडोरे, प्रतिभा गावंडे, मनीषा नगरकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वच्छता अभियान

राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त बुधवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. हडको एन -११ टीव्ही सेंटर चौक, सिडको एन -नऊ ट्रॅफिक गार्डन येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर सिडको एन -नऊ येथील संत गाडगे महाराज मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला. संत गाडगे महाराज पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष गोपीनाथराव वाघ, कचरू घोडके, उपाध्यक्ष अशोक दामले, मधुकर वाघमारे, कौतिकराव सोनवणे, सांडू अहिरे, राजू तांदळे, अनिल त्रिभुवन, मंगेश गायकवाड, कडूबा हजारे, मनोज सिरसाठ, बंडू मोरे, गजानन सिरसाठ, कैलास राऊत, नारायण गाडेकर, बी. डी. सूर्यवंशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित भाविकांना उज्ज्वल लक्ष्मणराव शिंदे आणि संजय काशीनाथ चौधरी यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात आला.

सम्यक विचार मंच

सम्यक विचार मंचच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्या आले. सिडको एन- दोन परिसरात हा कार्यक्रम झाला. अरुण जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी अनिल साळवे, गौतमराव शेजूळ, जे. एस. कदम, जगन्नाथराव गायकवाड, महादेव पाटील, अनिल गायकवाड, रमेश जैस्वाल, अभय जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवीतल्या मुलीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आठवीची विद्यार्थिनी असलेल्या १५ वर्षांच्या मुलीला म्हैसमाळ येथे घेऊन जाऊन बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार १३ डिसेंबर रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सातच्या दरम्यान घडला. याप्रकरणी एका तरुणीसह संशयित आरोपीवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लेखाना परिसरातील एक १५ वर्षांची मुलगी त्याच परिसरातील शाळेत आठवीमध्ये शिकते. ती १३ डिसेंबर रोजी शाळेत गेली होती. या मुलीचे वडील तिला शाळेतून आणण्यासाठी दुपारी गेले असता त्यांना मुलगी शाळेत ‌नसल्याचे आढळले. त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती सायंकाळी बाबा पेट्रोल पंप परिसरात आढळली. तिच्या आईने विचारपूस केली असता तिने धक्कादायक माहिती दिली. बलात्कार झाल्याचे घरी सांगू नको नाही, तर तुझ्या वडिलांना ठार मारेन, अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी तरुणी झिनत व अब्दुल विरुद्ध अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एपीआय विजय घेरडे हे तपास करीत आहेत.

असा घडला प्रकार

या मुलीच्या घरासमोर राहणाऱ्या मुलीची झिनत (रा. शहाबाजार) नावाची नातेवाईक तरुणी या मुलीला शाळेबाहेर भेटली होती. तिच्या सोबत अब्दुल रहीम नावाचा तरूण होता. झिनतने बळजबरीने या मुलीला खुलताबादला जाऊ, असे म्हणत बुलेटवर बसवले. खुलताबादला गेल्यानंतर झिनत खाली उतरली व मुलीला घेऊन अब्दुल म्हैसमाळ येथे गेला. या ‌ठिकाणी सागर लॉजवर मुलीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर अब्दुलने पीडित मुलीला बाबा पेट्रोल पंपाजवळ सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुळ्या शरीराला घाटीचे बळ

$
0
0

लुळ्या शरीराला घाटीचे बळ

‘जीबीएस’ आजारातून मुलगा ठणठणीत; औषधोपचारांसह ‘ओटी’ची मात्रा पडली लागू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोलियन बॅरी सिन्ड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजारामुळे ११ वर्षीय मुलाचे शरीर पार लुळे पडले आणि चालणे-फिरणे सोडाच उठून बसणेदेखील अशक्य झाले, मात्र घाटीच्या बालरोग विभागात अचूक निदान होऊन योग्य उपचार वेळीच मिळाले आणि आजार नाहीसा झाला; परंतु आजारामुळे शरीरातील शक्ती गेली. त्यावरही घाटीच्या ओटी-पीटी विभागाची मात्रा लागू पडली आणि मुलगा १५ दिवसांत चालू लागला.

एकूण लोकसंख्येच्या काही हजार व्यक्तींमध्ये एखाद्याला ‘जीबीएस’ आजार जडतो, ज्याची कारणे अजूनही फारशी उजेडात आलेली नाही. अशाच कुठल्याशा कारणामुळे उंडणगाव (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील ११ वर्षीय प्रणव गणेश जाधव याला हा आजार जडला आणि त्याचे शरीर पार लुळे पडले. चालणे-फिरणे सोडाच, त्याला साधे उठून बसणेही अशक्य झाले. खासगीत उपचार करुनही गुण येईना म्हणून त्याला २३ सप्टेंबर रोजी घाटीच्या बालरोग विभागात दाखल केले. विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वाती जोशी यांनी केलेल्या औषधोपचारांनी प्रणव याचा आजार पूर्णपणे बरा झाला. मात्र आजारामुळे शक्ती गेली म्हणून ४ ऑक्टोबर रोजी ‘ऑक्युपेशनल थेरपी’ सुरू केली. ऑक्युपेशनल थेरपिस्ट सतीश मसलेकर यांनी प्रणवला १५ दिवस ‘न्युरो डेव्हल्पमेंटल थेरपी’ (एनडीटी) दिली आणि प्रणव हळूहळू चालू-फिरू लागला. आता तर प्रणव पूर्णपणे ठणठणीत झाला आणि प्रणव याचे वडील गणेश जाधव यांनी घाटीला मनापासून धन्यवाद दिले आहेत.

घाटीमध्ये ‘जीबीएस’चे मोजके रुग्ण दर महिन्याला येत असले तरी पाच हजार लोकसंख्येमागे एखादा ‘जीबीएस’चा रुग्ण असतो. याचे अगदी नेमके कारण मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

– डॉ. प्रशांत पाटील, बालरोग विभागप्रमुख, घाटी

अशा रुग्णांकडून ‘एनडीटी’ या ऑक्युपेशनल थेरपी प्रकारातील विशिष्ट व्यायाम करवून घेतले जातात. त्याचा लाभ रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होतो. अर्थात, औषधोपचारानंतरच हे व्यायाम करवून घेतले जातात.

–सतीश मसलेकर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, घाटी

अशा अनेक वेगवेगळ्या व्याधींवर बालरोग विभागामध्ये यशस्वी उपचार होतात. यातील काहींना ‘ओटी’चे उपचार खूप महत्वाचे ठरतात.

– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विद्यापीठात ‘अविष्कार २०१७’ चे आयोजन

$
0
0

विद्यापीठात ‘अविष्कार २०१७’ चे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २४ व २५ डिसेंबर रोजी अविष्कार २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रो. भारती गवळी यांनी दिली.

संशोधनावर आधारित हे अविष्कार असणार आहे. यु.जी.,पी.जी., पोस्ट पी.जी. व पीएच.डी संधोक प्राध्यापक अशा चार विभागांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत मानवविद्या व सामाजिकशास्‍त्रे, वाणिज्य व्यवस्थापन व विधी, नैसर्गिकशास्‍त्रे, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधी व वैद्यकशास्‍त्रे अशा मुख्य सहा विद्याशाखेतील विद्यार्थी-प्राध्यापक या स्पर्धेत कोणत्याही विषयावर आपला प्रकल्प, उपक्रम सादर करू शकतात. स्पर्धेतून निवडलेले ४८ जण हे राज्यस्तरावर होणाऱ्या अविष्कारमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. अविष्कारमध्ये ६५ कॉलेजांमधून जवळपास आठशेहून अधिक विद्यार्थी तर ४५ संशोधक प्रध्यापक यात सहभागी होणार असून तज्ज्ञ मान्यवर देखील यात मार्गदर्शन करणार आहेत. या दोन दिवसीय अविष्कारचे उद्घाटन रविवार २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फाइन आर्ट् अॅण्ड प्रिंटींग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात होईल. पुणे येथील राष्ट्रीय रसायनशास्‍त्र प्रयोगशाळेचे माजी संचालक अनिल लचके यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी यावेळी कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे, प्रो. वाल्मिक सरवदे, प्रो. साधना पांडे हे उपस्थित राहणार आहेत. तर बक्षीस वितरण २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पद्मश्री शरद काळे यांच्या हस्ते होईल. पत्रकार परिषदेस डॉ.एस.एस.सोनवणे, डॉ.बी.एन. डोळे, डॉ.संयुक्ता मिश्रा, डॉ.सोनाली क्षिरसागर, डॉ.पुरुषोत्तम देशमुख,डॉ.आनंद देशमुख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परशुराम सेवा संघातर्फे २४ डिसेंबरला वधु-वर संमेलन

$
0
0

परशुराम सेवा संघातर्फे २४ डिसेंबरला वधु-वर संमेलन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परशुराम सेवा संघाच्या‘ब्रह्मगाठ’ आघाडीतर्फे २४ डिसेंबरला (रविवार) वधू-वर संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अनिल मुळे यांनी दिली. यावेळी ब्रह्मोद्योगचे प्रदेशाध्यक्ष सतीश मंडपे, परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष उल्हास अकोलकर आदींची उपस्थिती होती.

मुळे म्हणाले, हे संमेलन संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे सकाळी ८ ते रात्री ७ यादरम्यान होणार आहे. समाजात आयोजित वधू-वर मेळावे, परिचय मेळावे तर नेहमीच होत असतात परंतु प्रबोधनात्मक संमेलनाचे आयोजन होत नाही. हे प्रबोधन होणे आवश्यक आहे, या हेतूने या संमेलनात आम्ही ६० मुली आणि ७० मुलांची नावे नोंदवून घेतली आहेत. संमेलनात जाहीर ओळख करून घेणे, माहिती देणे आणि हे सोपस्कार करणार आहोत. नियोजितांची निवड आम्ही आधीच करून त्यांना, त्यांच्या पालकांसाठी काही विषयांवर मार्गदर्शनही केले जाणार आहे. ‘विवाहविषयी धर्मशास्त्रीय समज आणि गैरसमज’ यावर वेदमूर्ती सुरेश केदारे हे मार्गदर्शन करतील. ‘विवाह संस्काराची वैशिष्ट्ये व ढासळणाऱ्या कुटुंब व्यवस्थेत पालक-वधू-वर यां‍ची जबाबदारी’ यावर डॉ. मंजुषा कुलकर्णी (मुंबई), ‘जीवनसाथी उद्योजक-व्यावसायिकच हवा’ यावर सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ मार्गदर्शन करतील. जोडीदार कसा निवडावा यावर हर्षद बर्वे, ब्राह्मण वर श्रेष्ठ का? यावर पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी मार्गदर्शन करतील.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जगदीश एरंडे, कमलाकर जोशी, श्रीकांत जोशी, रामचंद्र अंधारकर, दत्तात्रय पिंपळे, केदार पाटील, सागर खेर्डेकर, वसंत किनगावकर, प्रयागदास देशमुख, श्रीप्रसाद कुलकर्णी, विनोद देवकाते, सुहास जोशी आदींसह महिला समिती परिश्रम घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्टः वैजापुरात मका खरेदी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
गोदाम नसल्याने शासकीय मका खरेदी बंद झाल्याची बातमी ‘मटा’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वैजापूर तालुका खरेदी विक्री संघाने ताबडतोब मोंढा मार्केट भागात पर्यायी गोदामाची साफसफाई करून ऑनलाइन मका खरेदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे.
तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष साहेबराव औताडे व व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी तातडीने संघाच्या मार्केट यार्ड भागात असलेल्या २५० मे टन क्षमतेच्या गोदामाभोवती वाढलेले गवत बुधवारी जेसीबीने साफ केले. या गोदामात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली मका साठवण्यात येणार आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी होत असून मका साठवण्यासाठी आणखी गोदाम लागल्यास त्याची व्यवस्था करण्यात येईल, असे संघाचे अध्यक्ष औताडे यांनी सांगितले. मात्र मका खरेदीसाठी किमान सहा तराजुंची गरज असून त्यासाठी तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा करू ,असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या मार्केट कमिटीच्या गोदामातच नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात येत आहे. हे गोदाम भरल्यानंतर खरेदी विक्री संघाच्या गोदामात साठवण केले जाईल, असे सांगण्यात आले. पूर्ववत ऑनलाइन मका खरेदी सुरू झाल्याने मका उत्पादकांनी ‘मटा’चे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
माजलगाव येथील तहसील कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने बुधवारी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा काढला. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. त्याला त्याच्या कष्टाचे मोल भेटले पाहिजे. या विविध मागण्यांसाठी अप्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
बीड जिल्ह्यातील शेतकरी वर्ग निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या चार वर्षापासून संकटात आहे. त्यास राज्य सरकार फसवी कर्जमाफीची लालच दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे. त्या विरोधात शिवसेनेच्या वतीने विराट बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, उपजिल्हा प्रमुख काशीद, कुलकर्णी तालुका प्रमुख सतीश सोळंके, डॉ. उद्धव नाईकनवरे, दत्ता रांजवन यांची उपस्थिती होती.
बोंड अळीमुळे कापसाचे पीक हातातून गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या बदल्यात शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, कार्यक्षेत्रात असणाऱ्या उसाच्या गाळपास प्राधान्य देऊन तीन हजार उसास भाव द्यावा, गेटकेन चालू असलेल्या उसाचे गाळप थांबवण्यात यावे व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ‘बळीराजा अडचणीत सापडला असताना पालकमंत्री व आमदार यांनी त्यांना मदत करणे कर्तव्य असताना त्यावर ते गप्प आहेत.’ राज्य सरकारवर यावेळी तीव्र शब्दात टीका करण्यात आली. शिवसेनेने यावेळी बैलगाडी मोर्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीआयसीयू’ला अडीच लाखांचे १० बेड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्या उद्योगातील मजुरांच्या सात मुलांना जीवनदान देणाऱ्या घाटीतील बालरोग विभागासाठी काहीतरी केले पाहिजे, या उदात्त हेतुने ‘हरियाली फाऊंडेशन’चे सतीश शुक्ला यांनी ‘पीआयसीयू’साठी अडीच लाखांचे दहा बेड व पाच नेब्युलायझर देणगीस्वरुपात दिले. त्यामुळेच लाखोंचा खर्च करूनही तीन वर्षांपासून सुरू न झालेले ‘पीआयसीयू’ आता तरी सुरू होईल, अशी आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे.
या निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वॉर्ड क्रमांक २६मध्ये म्हणजेच नियोजित ‘पीडियाट्रिक इन्टेसिव्ह केअर युनिट’मध्ये (पीआयसीयू) बुधवारी (२० डिसेंबर) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शुक्ला दाम्पत्याचा सत्कार अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके, विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. अनिल पुंगळे, दीप्ती शुक्ला, सतीश टाकळकर आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सतीश शुक्ला म्हणाले, सुलतानपूरच्या ‘हरियाली फाऊंडेशन’मध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सात मुलांनी एरंड्याच्या बिया खाल्यामुळे विष बाधा झाली होती व त्यांना घाटीच्या बालरोग विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. कठीण परिस्थितीत योग्य उपचारामुळे सर्व मुले ठणठणीत झाली आणि त्यामुळेच गोरगरीबांच्या मुलांना जीवनदान देणाऱ्या बालरोग विभागासाठी काही तरी केले पाहिजे, या भावनेतून गरज ओळखून ‘पीआयसीयू’ची दहा बेड देणगीस्वरुपात दिले. यापुढेही घाटीला काही ना काही देण्याचा संकल्प आहे, अशी भावना शुल्का यांनी व्यक्त केली आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
---
‘पीआयसीयू’ला मुहूर्त कधी?
---
यानिमित्ताने ‘पीआयसीयू’ होणार तरी कधी, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अपेक्षित मनुष्यबळ व आणखी उपकरणे उपलब्ध झाल्याशिवाय हा शासकीय रुग्णालयातील पहिलाच स्वतंत्र विभाग सुरू होण्याची शक्यता नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस्ट्रोप्रकरणी अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील गॅस्ट्रो उद्रेकाच्या चौकशीला एकदाचा मुहूर्त लागला असून, बुधवारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची छावणी परिषदेच्या वतीने चौकशी करण्यात आली, तर गुरुवारी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन शुक्रवारी विशेष बैठकीमध्ये चौकशी अहवाल सादर होण्याची शक्यता परिषदेने व्यक्त केली आहे.

मागच्या महिन्यात सुमारे १० ते १२ हजार छावणीवासियांना गॅस्ट्रो उद्रेकाचा फटका बसला होता व त्याची चौकशी करण्याचे आदेश तेव्हाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर अनुराग विज यांनी २४ नोव्हेंबरच्या बैठकीत दिले. याच बैठकीत चौकशी समिती नेमून चार डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही अध्यक्षांनी दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे देत चौकशीला टोलवाटोलवी करण्यात आली होती. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे हिवाळी अधिवेसनात जाहीर करून टाकले; पण त्यानंतरही चौकशीला मुहूर्त लागला नव्हता. अखेर बुधवारी चौकशी सुरू झाली. गुरुवारपर्यंत चौकशी पूर्ण होईल व अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावून अहवाल सादर होईल. त्यावर चर्चा होऊन दोषींवर कारवाईचा विचार होईल, असे परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. मात्र यानिमित्ताने या चौकशीतून खरे दोषी समोर येणार का व त्यांच्यावर खरोखर कारवाई होणार का, असे विविध सवाल उपस्थित होत आहे.

अजूनही नळाला काळे-निळे पाणी
छावणीतील अनेक भागांना मागच्या १०-१२ दिवसांपासून काळ्या-निळ्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पेन्शनपुरा भागात बुधवारीदेखील (२० डिसेंबर) काळ्या पाण्याचा पुरवठा झाला, असे काही नागरिकांनी ‘मटा’ला कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जमिनी पुढाऱ्यांच्या घशात!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर परिसरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या सिलिंग, गायरान, कनिष्ट वतनच्या जमिनी शहरातील उद्योजक आणि राजकीय पुढाऱ्यांच्या घशात घालण्यात आल्या असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन विक्री परवानगीचा घोळ शेकडो एकरांपेक्षा अधिक आहे.

शहर परिसरातील मौजे आडगाव येथील कनिष्ट वतन, वर्ग दोनची जमीन एका बड्या राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विक्री करण्याची परवानगी संबंधितांनी मागितली होती. यावर कोणत्याही कागदपत्रांची खातरजमा न करता उपजिल्हाधिकाऱ्यांनी जमीन विक्री करण्याच्या परवानगीस मान्यता देण्याची शिफारस केली, असा ठपका उपजिल्हाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. राजकीय पुढाऱ्यांना कवडीमोल भावात जमीन विक्री व्हावी म्हणून महसूल विभागातील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांकडून नियम डावलण्यात आले आहेत. वर्ग दोन श्रेणीत नोंद असलेल्या जमिनींची विक्री करण्यापूर्वी प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते, मात्र इथे सर्व नियम डावलून बड्या नेत्यांना तसेच उद्योजकांना या जमिनी देण्यात आल्या आहेत. गंगापूर तालुक्यातही मोक्याच्या जागेवर असलेल्या अनेक जमिनी बड्या उद्योजक, व्यापाऱ्यांनी घेतल्या आहेत. या संदर्भातील संपूर्ण तपशील निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबन आदेशामध्ये नमूद करण्यात आला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना किती जमिनींना परवानगी दिली याची गोळाबेरीज अद्याप चौकशी समितीने केली नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शंभर एकरांपेक्षा अधिक जमिनीच्या खरेदी विक्री परवागीमध्ये घोटाळा झाला आहे. शहर पसिरातील आडगाव तसेच लाडसावंगी, टाकळी सागज, येथेही अशाच प्रकारचे व्यवहार झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘डीएमआयसी’तली माहिती दडवली
वर्ग दोन जमीन विक्री परवानगी घोटाळ्यामध्ये ‘डीएमआयसी’मध्ये जमीन देण्यात आल्याची १७ प्रकरणे आहेत, मात्र ‘डीएमआयसी’त गेलेल्या या जमिनी कुणाच्या होत्या, या जमिनी कुणाला विक्री करण्यात आल्या, याचा कोणताही तपशील चौकशी समितीला उपलब्‍ध करून दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जमिनीही मोठे राजकीय पुढारी तसेच उद्योजकांना विक्री करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. डीएमआयसीमध्ये प्रती एकर २३ लाख रुपये जमिनीचा मोबदला देण्यात आला होता. त्यामुळे यामध्ये मोठा जमीन घोटाळा झाल्याची शक्यता आहे.

विक्री परवानग्यांचे काय ?
नियमांचे उल्लंघन करून वर्ग दोन जमीन विक्री करण्याच्या परवानग्या दिल्यामुळे दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, मात्र त्या अधिकाऱ्यांनी जमीन विक्रीसाठी दिलेल्या परवानग्यांचे काय, असा प्रश्न अद्याप कायम आहे. अशाच एका घोटाळयामध्ये २०११ साली तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांनी विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून औरंगाबाद जिल्ह्यातील वर्ग दोनच्या जमीन विक्री परवानग्या दिल्या होत्या. त्यावेळी डॉ. शेळके यांनी १०४ प्रकरणात दिलेल्या परवानग्या विभागीय आयुक्तांनी रद्द केल्या होत्या. आता या ११८ प्रकरणातील विक्री परवानग्या रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश झालेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलीम अली सरोवर खुले करूः महापौर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘नियमांच्या चौकटीत राहून डॉ. सलीम अली सरोवर जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न करू,’ अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. घोडेले यांनी पक्षीमित्रांसह सरोवराची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सरोवराच्या सुशोभीकरणावर जिल्हा नियोजन समिती व महापालिकेतर्फे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र त्यानंतर सरोवर सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले. यावर पक्षीमित्रांनी आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. यावेळी
महापौरांसह विरोधीपक्षनेता फेरोज खान, नगरसेवक रेणुकादास वैद्य, नासेर सिद्दिकी, पक्षीमित्र दिलीप यार्दी, डॉ. किशोर पाठक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आदी उपस्थित होते.
पाहणीबद्दल माहिती देताना महापौर म्हणाले, ‘सरोवराच्या वापरासंदर्भात कोर्टात प्रकरण सुरू आहे. नागरिकांकडून सरोवर खुले करण्याची मागणी आहे. कोर्टाचा अवमान होऊ नये, पक्षीमित्रांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या मुद्यांना देखील न्याय मिळावा याची दखल घेऊन नियमांच्या चौकटीत राहून डॉ. सलीम अली सरोवर जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न करू. सरोवरात एसटीपीचे घाण पाणी येते असा पक्षीमित्रांचा आक्षेप आहे. हे पाणी सरोवरात येऊ देऊ नका असे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिकेने बायोडाव्हरसिटी कमिटी स्थापन केली आहे.’

सरोवर पक्ष्यांसाठीच राहू देण्याची मागणी
दरम्यान डॉ. सलीम अली सरोवर संघर्ष समितीचे सदस्य ‘मटा’शी बोलताना म्हणाले, ‘सरोवर पक्ष्यांसाठीच राहू द्या. माणसांसाठी शहरात अन्यही उद्याने आहेत. त्यांचा योग्य प्रकारे विकास करून ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावी. सरोवराच्या चारही बाजूला टॉवर्स उभे करून पक्षी निरीक्षणासाठी सरोवर उपलब्ध करून द्या. सरोवराच्या परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी देऊ नका,’ अशी भूमिका मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेवर आर्थिक आरिष्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट ३९० कोटींचे असताना आठ महिन्यांत फक्त ४७ कोटी ६२ लाख रुपयांचीच वसुली झाली आहे. त्यामुळे महापालिकेवर आर्थिक आरिष्ट ओढावले असून, याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होणार आहे.

मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करून वसुलीचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात गेल्या आठ महिन्यांत पालिकेत अनेक बैठका झाल्या. वसुलीचे प्रमाण वाढावे म्हणून नवनवीन प्रयोग देखील करण्यात आले. मनुष्यबळ कमी असल्यामुळे वसुलीचे प्रमाण वाढत नाही, अशा तक्रारी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी नियुक्त करून मनुष्यबळात वाढ करण्यात आली. सुमारे १३५ कर्मचारी आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आले. मनुष्यबळ वाढल्यामुळे वसुलीचे प्रमाण वाढेल असे मानले जात होते, पण तसे काहीच घडले नाही. मालमत्ता कर वसुलीचा आढावा गेल्या आठवड्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला, तेव्हा धक्कादायक माहिती उघड झाली. मालमत्ता कराची मागणी ४३३ कोटी रुपयांची आहे. त्यापैकी ३९० कोटी रुपये वसुलीचे उद्दीष्ट पालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात ठेवले आहे. एक एप्रिल ते १४ डिसेंबर दरम्यान उद्दिष्टांपैकी फक्त ४७ कोटी ६२ लाख २४ हजार २८६ रुपये वसुली झाली आहे. वसुलीची टक्केवारी १२.२१ इतकी आहे.

वॉर्ड तीन पिछाडीवर
सर्वांत कमी वसुली वॉर्ड कार्यालय क्रमांक तीनची आहे. या कार्यालयातर्फे आतापर्यंत फक्त ४.७१ टक्के वसुली झाली आहे. या कार्यालयाच्या खालोखाल वॉर्ड कार्यालय क्रमांक दोनची (८.०५ टक्के) आहे. वॉर्ड क्रमांक एकची वसुली ९.१५ टक्के, वॉर्ड क्रमांक आठची वसुली ९.६९ टक्के, वॉर्ड क्रमांक चार ची वसुली ९.८९ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमुक्तीसाठी पुन्हा डेडलाइन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अखत्यारित असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी १५ डिसेंबरचा मुहुर्त जाहीर करण्यात आला होता, पण कंत्राटदारांचा असहकार आणि पीडब्ल्यूडीचे अयोग्य नियोजनामुळे आता डिसेंबर अखेरची तारीख दिली आहे. नव्याने दिलेली डेडलाइन पाळली जाणार की नाही, याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे.

राज्यातील रस्त्याची गेल्या काही महिन्यात पुरती दुर्दशा झाली आहे. संपूर्ण राज्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पीडब्ल्यूडीने एकत्रित कार्यक्रम जाहीर केला होता. त्याअंतर्गत विभागनिहाय नियोजन करून पुढील दोन वर्षांसाठी निधीची तरतूद केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते, मात्र रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याचे राज्यभर समान दर ठेवणे आणि अन्य काही मुद्यांवरून कंत्राटदारांनी असहकार आंदोलन जाहीर केले होते. राज्यातील पीडब्ल्यूडीची सर्व कामे बंद होती. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काही विभागांमध्ये जाऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यास काही प्रमाणात यशही मिळाले. दरम्यान, गेल्या महिन्यात पीडब्ल्यूडी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांत जाऊन खड्डे भरणीचा आढावा घेणे सुरू केले. त्यातून काही कामे झाली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी ७० निधी मंजूर केला गेला. त्यातून १७० कामे होणार असून २२०० किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त केले जातील, असा दावा पीडब्ल्यूडीने केला होता.

वादा पूर्ण होणार का?
ज्या कंत्राटदाराला ही कामे मिळतील त्यांना दोन वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती करावी लागणार आहे. रस्त्यांची कामे गेल्या महिन्यात सुरू झाली पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक रस्त्यांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. पीडब्ल्यूडीने रस्त्यांवरील खड्डे भरण्याची डेडलाइन १५ डिसेंबरची दिली होती. ती तारीख निघून गेली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण केली जातील, असा दावा पीडब्ल्यूडीने केला आहे. हा वादा तरी पूर्ण होणार काय ? असा प्रश्न आहे.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत सर्व रस्त्यांवरील खड्डे भरले जातील. - अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदाही वाळूचा तिढा; चोरी रोखण्याचे आव्हान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळूठेका लिलावाचा तिढा कायम असून, ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ कालावधीसाठी आतापर्यंत केवळ सहा वाळूपट्ट्यांना ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे वाळू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात वाळूपट्ट्यांना ठेकेदारकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. एकीकडे लिलावाच्या नियमांची किचकट प्रक्रिया आणि भरमसाठ दर यामुळे लिलावाला प्रतिसाद नाही, तरी शहरात सर्रास वाळूचोरी सुरू असून शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसूलाचा फटका बसत आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बीडमध्ये वाळूमाफियांना सळो की पळो करून सोडत चार वाळूमाफियांवर ‘एमपीडीए’ लावण्याची मोठी कारवाई केली होती. ते औरंगाबादला रुजू झाल्यानंतर येथील वाळूमाफीयांचेही धाबे दणाणले होते, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन केले नसल्यामुळे जिल्ह्यात सर्रास वाळूचोरी सुरू आहे. पर्यायाने वाळूठेक्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ३१ वाळूपट्यांचा लिलाव करून शासन तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कसब पणाला लावावे लागेल.

ई लिलाव सुरू
‌जिल्ह्यातील ३१ वाळूपट्ट्यांचा ई-लिलाव करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सिल्लोड तालुक्यातील १३, कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यांतील प्रत्येकी पाच आणि फुलंब्री तालुक्यातील तीन वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात येत आहेत. आतापर्यंत यातील केवळ सहा वाळूपट्ट्यांना ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. मुदतीत या ठेकेदारांकडून रक्कम भरून वाळूघाटांचा ताबा दिल्यानंतर वाळूउपसा सुरू करण्यात येईल.

ठेकेदारांनी प्रतिसाद दिलेले पट्टे

वाळूघाट………………. तालुका………. सरकारी रक्कम
‌देवळी.………………….कन्नड…………..११९२५००
मोढा खुर्द………………सिल्लोड…………२००८६५६
चिंचखेडा……………….सिल्लोड………….२२५९०७२
ढोरेगाव………………….गंगापूर………..५७२१६
डोंगरगाव………………..सिल्लोड………….१२३६०५
पाखोरा………………गंगापूर……………….३७९०५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तिथे नांदती पाखरे सारी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पाखरांचे गाव अशी ओळख असलेल्या जायकवाडीमध्ये चक्रवाक, तरंग, पट्टकदंब हंस अशा पक्ष्यांनी गर्दी केलीय, पण यंदा पक्ष्यांची संख्या घटल्याचा वन्यजीव अभ्यासक व्यक्त करत आहेत.

औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात सुमारे ३४ हजार १०५ हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्याचा परिसर सध्या देशी-विदेशी पाखरांनी किलबिलून गेला आहे. रविवारी वन विभाग व सृष्टीसंवर्धन संस्थेतर्फे जायकवाडी धरणाची भिंत, नदी परिसर, सोनेवाडी, एरंडगाव, दहेगाव, पिंपळगाव, रामडोह, ब्रह्मगव्हाण, कायगाव टोका, सिद्धेश्वर मंदिर परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी धनवर बदक (स्पॉट बिल डक), सारंग, चमचा बदक, मुग्धबालक, पाणबुडी, काणूक, पाणकोंबड्या, कमळपक्षी, नदीसुरय, चिखल्या, वारकरी बदक (कूट), वेडा राघू, माळभिंगरी, धोबी, चक्रवाक, तरंग, पट्टकदंब आदी पक्ष्यांचे दर्शन घडले. वन्यजीव अभ्यासक डॉ. किशोर पाठक म्हणाले, ‘यंदा धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाणथळ उशीराने तयार झाला. त्यात अतिक्रमण, अवैध मासेमारी, अवैध गाळपेरा या कारणांनी पक्षी जीवन बाधित होत आहे. जायकवाडीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित होत असून जलवनस्पतीवर त्याचा परिणाम होत आहे.’ या मोहिमेत पक्षीमित्र राजेंद्र डुमणे, ऋषिकेश जपे, दिलीप भगत, महादेव कल्याणे, मिलिंद कुलकर्णी, प्रतीक जोशी वन परिक्षेत्र अधिकारी संजय भिसे, सुरैय्या शेख आदींनी या सहभाग नोंदविला.

विदेशी पक्षी साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात येथे मोठ्या संख्येने पोचतात, पण अपेक्षित संख्येने सध्यातरी पक्षी आल्याचे दिसत नाहीत. प्रदूषणाचा मोठा धोका आहे. - डॉ. किशोर पाठक, वन्यजीव अभ्यासक

पहिल्या टप्प्यातील पक्षी निरीक्षण पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यात जानेवारीत पक्षी निरीक्षण करण्यात येणार असून, त्यानंतरच कोणते पक्षी, किती संख्येने आले हे सांगता येईल. - आर.आर. काळे उप वनसंरक्षक (वन्यजीव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डब्ल्यूएचओ’कडून घाटीवर ‘डॉक्युमेंटरी’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगभरात आणि त्यातही विकसनशील देशांमध्ये भेडसावणाऱ्या प्रसुती पश्चात रक्तस्त्रावासारख्या क्लिष्ट केसेसवर यशस्वी मात करून वर्षात राज्यामध्ये सर्वाधिक १७ हजार ४०० प्रसुती करणाऱ्या घाटीच्या स्त्रीरोग विभागाच्या कार्यकौशल्याचा वेध घेत जनजागृतीसाठी ‘डब्ल्यूएचओ’कडून डॉक्युमेंटरी तयार केली जात आहे. याच डॉक्टुमेंटरीसाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार जॉनी कबाना या मंगळवारी दाखल झाल्या आहेत.

जॉनी कबाना या ‘जागतिक आरोग्य संघटने’सह (डब्ल्यूएचओ) अमेरिकेतील ‘कन्सेप्ट फाउंडेशन’चे काम करतात आणि आतापर्यंत त्यांनी इथिओपिया, युगांडा, टाम्झानिया आदेशांमध्ये डॉक्युमेंटरी तयार केली आहे. यापूर्वी त्या भारतामध्येही आल्या होत्या व त्यांनी नवी दिल्ली, दार्जिलिंग आदी भागांत काम केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसुती होणाऱ्या मोजक्या रुग्णालयांमध्ये औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (घाटी) समावेश होतो. त्याचवेळी एक जानेवारी ते १९ डिसेंबर २०१७ या कालावधी घाटीत १७,४०० प्रसुती झाल्या आहेत. तसेच प्रसुतीपश्चात रक्तस्त्रावासारख्या क्लिष्ट केसेसवरही घाटीच्या ‘स्त्रीरोग’ने यशस्वी मात केली आहे. याची दखल घेत ‘डब्ल्यूएचओ’ने औरंगाबादच्या घाटीची निवड केली आणि या विषयावर डॉक्युमेंटरी करण्यासाठी कबाना या दाखल झाल्या. त्या घाटीमध्ये दाखल झाल्यापासून त्यांनी रोगशास्त्र विभागाची व विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती घेत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा व इतर डॉक्टर-परिचारिका-रुग्ण-विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अनेक फोटो तसेच व्हिडिओदेखील घेतले. विशेष म्हणजे प्रसुती पश्चात रक्तस्त्रावाच्या केसेसमधील रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधत रुग्णांची स्थिती, परिस्थिती, संस्कृती तसेच अडचणीही जाणून घेतल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील रुग्ण आणि प्राप्त परिस्थितीत त्यांच्यावर होणारे अत्याधुनिक उपचार पाहून त्या आवाक झाल्या.

कबाना म्हणाल्या…
‘एवढी मोठी स्त्री रुग्णसंख्या मी पहिल्यांदाच पाहत आहे. एवढ्या रुग्णांच्या प्रसुतीदेखील मी पहिल्यांदा पाहिल्या. या देशातील महिला रुग्णांची सहनशीलता, परिस्थितीवर मात करण्याची मानसिकता खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्याचवेळी या रुग्णालयामध्ये त्यांना मिळणारी रुग्णसेवादेखील नक्कीच ‘पेशंट फ्रेंडली’ आहे. या देशातील महिलांमध्ये दिसणारी मातृत्वाची ओढ आणि मातृत्वाची भावना अमेरिकेसह इतर देशांमध्ये दिसत नाही, हे नक्कीच मान्य करावे लागेल,’ असेही कबाना यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

पाणीपुरी ते श्रीखंड सर्व प्रिय
दोन दिवसांत घाटीतील स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांसोबत व विशेषतः निवासी डॉक्टरांसोबत जॉनी कबाना यांनी श्रीखंड-पुरीपासून पाणीपुरी, शेवपुरी, भजे, पापड, रसगुल्ले, पराठे आदींचा मनसोक्त आस्वाद घेतला. अस्सल भारतीय संस्कृती तसेच खाद्यपदार्थांनी जॉनी यांच्या मनावर गारूड केले, असेही त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

दोन तासांत उपचार मिळाले नाही तर प्रसुतीपश्चात रक्तस्त्रावामुळे महिलांचा मृत्यू होऊ शकतो व सुदैवाने हा मृत्यु रोखणे पूर्णपणे शक्य आहे. विकसनशील देशांमध्ये या केसेसचे प्रमाण उल्लेखनीय आहे. त्यामुळेच जनजागृतीसाठी जॉनी कबाना यांच्याकडून डॉक्युमेंटरी केली जात आहे. – डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग विभागप्रमुख, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महागामीत वयम् नृत्य महोत्सवाचे आयोजन

$
0
0

महागामीत वयम् नृत्य महोत्सवाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

महागामी गुरुकुलला २१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच श्रृंखलेअंतर्गत २३ व २४ डिसेंबर रोजी महागामीचे खुले रंगमंच ‘द्यावापृथिवी’ येथे दोन दिवसीय वयम् नृत्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पार्वती दत्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवामध्ये महागामीचे शिष्य आपली एकल नृत्य प्रस्तुत करतील. पार्वती दत्ता यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले व प्रशिक्षण घेत अससलेले अनेक विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. महोत्सवात निस्सीम रानाडे, अनीषा अनंतपुरकर हे अमेरिकातून येणार आहे. तसेच देशातील बंगरूळ, कोची, मुंबई ठाणे, नाशीक दिल्ली आदी ठिकाणहून १६ शिष्य या नृत्यमहोत्सवात सहभागी होणार आहे.

हा महोत्सव द्यावापृथिवी या महागामीतील खुल्या रंगमंचावर सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या दरम्यान महागामीतील अत्यापर्यंतच्या गुरू शिष्यपंरपराचे एकत्रित माहितीचे वयम् नावाचे पुस्तकाचे प्रकाशन एमजीएमचे विश्वस्त बाबुराव कदम यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महागामीच्या पार्वती दत्ता यांनी केले आहे.

महागामीच्या २१ वर्षाच्या प्रवासात जवळपास दोन हजार शिष्यांनी कथक तसेच ओडीसी नृत्याची तालीम घेतली आहे. तसेच आज काही नृत्यशिक्षक, नृत्याकार आणि कला आयोजकाच्या रुपात कलेच्या जगात सक्रीय आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना आमदारांचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात तुळजाभवानी देवस्थानाची सुमारे २६५ एकर जमीन बेकायदेशीररित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे. मंदिरातील दानपेटीतील लिलावात भ्रष्टाचार करून काही कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची लयलूट केलेली आहे. या प्रकरणी ६ वर्षे झाली, तरी सीआयडी चौकशी पूर्ण होत नाही. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत चौकशी अहवाल शासनाला सादर करण्याविषयी प्रतिज्ञापत्र पोलिस उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर करूनही तो घोटाळ्याचा अहवाल का सादर केला जात नाही. हा घोटाळ्याचा अहवालच न दडपता राज्य सरकारने याप्रकरणी सर्व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. अन्यथा राज्यात प्रखर आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी नागपूर विधान भवनाच्या पाययांवर आंदोलन करतांना दिला.
नागपूर येथील विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिवसेनेचे कोल्हापूर येथील आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, उल्हास पवार, सुजित मिणचेकर सहभागी झाले होते. या वेळी आमदारांनी तुळजापूर मंदिरात भ्रष्टाचार करण्यांवर कारवार्इ झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
तुळजापूर देवस्थानच्या मालकीच्या एकूण ३ हजार ५६८ एकर जमिनीपैकी अमृतवाडी येथील २६५ एकर जमीन दिनांक २० जुलै २००८ रोजी बेकायदेशीररित्या फेरफार करून ती ७७ लोकांच्या नावावर करण्यात आल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी उघडकीस आणले. याचा विधी व न्याय खात्याने तयार केलेला चौकशी अहवालानंतर महसूल खात्याने दडपून टाकला आहे. ते अहवाल सापडत नसल्याचे सांगत आहेत.
त्याचबरोबर तुळजापूर देवस्थानच्या दानपेटीच्या लिलावात मोठा घोटाळा संघटितरित्या करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या चौकशीत असे लक्षात आले की, देवस्थानचे एका वर्षाचे सरासरी उत्पन्न साधारण ४ कोटी ६३ लाख रुपये आहे; परंतु दानपेटीचा लिलाव केवळ २ कोटी ६७ लाख रुपयांना देण्यात आला होता. म्हणजे वर्षाला २ कोटी रुपयांचा तोटा देवस्थानला झाला आहे. अशा प्रकारे वर्ष १९९१ से वर्ष २०१० पर्यंत म्हणजे २० वर्षांत अंदाजे ४० कोटीहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार दानपेटीच्या माध्यमातून झाला आहे. यात काही जिल्हाधिकारी, तहसीलदार, लोकप्रतिनिधी व कंत्राटदार गुंतलेले आहेत. बडे अधिकारी असल्यामुळे जवळजवळ २३ अधिकाऱ्यांची चौकशी होऊनही कोणावरही कारवाई होत नाही. तरी शासनाने दोषींवर कठोर कारवार्इ करावी, अशी आमची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.


आंदोलन छेडण्याचा इशारा
पश्चीम महाराष्ट्र देवस्थान समिती, शिर्डी, मुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. या सर्व प्रकरणी आम्ही विधानसभेत लक्षवेधी मांडतो. त्या वेळी सरकार या घोटाळा प्रकरणांची चौकशी घोषित करते; मात्र त्या चौकशीचा अहवाल उघड करत नाही. त्यामुळे या प्रकरणांतील दोषी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही. यासाठी राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images