Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कन्नड तालुक्यातील १२३ गावांत टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कन्नड तालुक्यात जून २०१८अखेर १२३ गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. तहसीलदार महेश सुधळकर, गटविकास अघिकारी विजय परदेशी व उपअभियंता अपसिंगेकर यांनी तयार केलेला संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे.
सिंचन प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला नाही. यंदाही तालुक्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यात यंदा जून ते आक्टोबरदरम्यान ६८ टक्के (५१६ मिमी) पाऊस पडल्याने विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, बोअरवेल खोदणे व टँकरद्वारे पाणीपुरवठा हे पर्याय आहेत. त्यासंबंधीचा एक जानेवारी ते ३० जून या कालावधीसाठी संभाव्य कृती आराखडा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. एक जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ६० गावे, एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत ६३ गावांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचायत समितीला प्राप्त झालेल्या ८ डिसेंबरच्या पत्रामध्ये तालुक्यातील ३७ गांवामध्ये पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यातील सूचनेनुसार टंचाई घोषित गाव परिसरात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटर अंतरात इतर प्रयोजनासाठी जिल्हा प्राधीकरणाच्या परवाणगी शिवाय विहीर खोदकाम करता येणार नाही. कलम २६ नुसार एक किलोमीटर परिघात पाणी उपशावर निर्बंध घातले आहेत. कलम २२ नुसार पाणी उपशावर मनाई करण्यात आली आहे.

मोठ्या गावात टंचाई

जेहूर, देवगाव रंगारी, देवळाणा, देवळी, विटा, आमदाबाद, नाचनवेल, हतनूर, आठेगाव, खेडा, मोहरा, जवखेडा, आडगाव (पि.) या प्रमुख गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या आराखड्यास पंचायत समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतंत्र मराठवाड्यासाठी संघर्ष समिती स्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वतंत्र मराठवाडा प्रदेश स्थापन करण्यासाठी संघर्ष समितीची स्‍थापना करण्यात आली आहे. या समितीतर्फे कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रक जे. के. जाधव यांनी दिली.
जे. के. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत स्वतंत्र मराठवाडा संदर्भात केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुढील दिशा ठरविण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा पातळीवर व्यापक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जनजागृती निर्माण करण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले. येत्या मंगळवारी (२६ डिसेंबर) वैजापूर, २९ डिसेंबर रोजी पैठण येथे सभा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्‍थतता असून तरूण पिढी वेगळे मराठवाडा राज्य मिळाविल्याशिवाय स्वस्‍थ बसणार नाही, त्यामुळे त्यांच्याकरिता वेगळा कृती कार्यक्रम द्यावा, अशी सूचना युवा समन्वयक विकी राजे पाटील यांनी केली. या बैठकीत समितीचे संयोजक बाबा उगले, राम गायकवाड, डॉ. भास्कर रेघे, विशाल थोटे, ज्ञानेश्वर पाटील, सुधाकर दगडे, ज्ञानेश्वर धुमाळ, गुणवंत दोडे, एस. जे. मगरे, व्ही. के. मठपती आदींची उपस्थिती होती.

भूमिका जाणून घेणार

स्वतंत्र मराठवाडा प्रदेशाबाबत विद्ममान लोकप्रतिनिधींची भूमिका जाऊन घेतली जाणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत मुंबईत चर्चा करण्यात येणार आहे. त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असे जे. के. जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्रामनगरचा भुयारी मार्ग प्रस्तावात दबला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संग्रामनगर भुयारी मार्ग तयार करण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेल्वे विभागाला पाच कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. पण, हा निधी अद्याप रेल्वेला मिळाला नसल्याचे ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
उड्डाणपूल बांधल्यानंतर येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ५४ बंद करू नये, अशी देवानगरी भागातील नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले. आंदोलनानंतर एमएसआरडीसी आणि रेल्वे विभागाच्या संयुक्त बैठकीत भुयारी मार्गाचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत रेल्वेकडील एमएसआरडीसीच्या १२ कोटी रुपये अनामतमधून भुयारी मार्गासाठी लागणारा निधी वळवावा, असा निर्णय घेतला होता. त्याआधारे रेल्वेने भुयारी मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर रेल्वेने एमएसआरडीसीकडे निधी वळविण्याबद्दल समंती पत्राची मागणी केली. पण, एमएसआरडीसीने संमतीपत्राऐवजी पाच कोटी रुपयांचा निधी देऊन अनामत रक्कम रेल्वे विभागाकडून घेण्याचा नवीन प्रस्ताव दिला. यामुळे समंतीपत्र तर दिलेच नाही, उलट पाच कोटी रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही.
दरम्यान, निधी देण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार झाल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आल्याचे रेल्वे विभागाचे अभियंता अमित जैन यांनी सांगितले. पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे भुयारी मार्गचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

ऑडिटमध्ये ताशेरे

रेल्वे उड्डाणपूल बांधल्यानंतर तात्पुरते रेल्वे क्रॉसिंग गेट बंद केले जाते. पण, येथील रेल्वे क्रॉसिंग गेट सुरू असल्याने रेल्वेचा नियम डावलला गेला आहे. हे गेट सुरू ठेवण्यासाठी रेल्वेला कराव्या लागलेल्या खर्चामुळे रेल्वेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये वारंवार नोंद केली जात आहे. यामुळे येत्या काही काळात रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात ३१ टक्के पाणी नमुने दूषित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सरासरी ३१ टक्के पाणीनमुने दूषित आढळून आले असून सोयगाव तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्याठिकाणी घेतलेल्या नमुन्यापैकी ७६ टक्के नमुने दूषित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी तीन तालुक्यांमधील पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातून एकूण ९३८ पाणीनमुने तपासण्यात आले. त्यापैकी २९१ नमुने (३१ टक्के) दूषित आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.
यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती सोयगाव तालुक्यात आहे. तेथे घेण्यात आलेल्या ७८ पैकी ५९ नमुने दूषित आढळून आले. त्याखालोखाल वैजापूर तालुक्याची परिस्थिती आहे. ७३ पैकी ४४ नुमने दूषित आढळून आले आहे. औरंगाबाद २०९ पैकी ४६ नमुने (२२ टक्के), पैठण ७९ पैकी ३४ (४३ टक्के), गंगापूर १२१ पैकी ४० (३३ टक्के), खुलताबाद ५६ पैकी ७ (१३ टक्के), कन्नड १५४ पैकी ३४ (२२ टक्के), सिल्लोड ८३ पैकी २९ (३५ टक्के), फुलंब्री ११४ पैकी १० (९ टक्के), असे एकूण ३१ टक्के पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत.
दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने हा धोका ओळखून वेळीच पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किल्ले राजमाची, लोहगड मोहीम फत्ते

$
0
0

किल्ले राजमाची, लोहगड मोहीम फत्ते
स.भु.च्या विद्यार्थ्यांचे साहसी गिरीभ्रमण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंडियन कॅडेट फोर्स, औरंगाबाद जिल्हा अॅडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशन आणि कुंभारपिंपळगाव येथील सरस्वती भुवन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले राजमाची व लोहगड गिरीभ्रमण मोहीम गिरीप्रेमींनी फत्ते केली.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा डोंगर रांगेतील राजमाची व लोहगड या किल्ल्यांची गिरी मोहीम आखण्यात आली होती. गिरीभ्रमणाची सुरुवात तुंगार्ली मार्गे राजमाची गावातून झाली. राजमाची किल्ल्याची उंची ३६०० फूट आहे. राजमाची गावातून कालभैरव मंदिरापर्यंत जाण्यासाठी वाट असून मंदिरापर्यंत पोहचल्यावर राजमाची किल्ल्याचे दोन बालेकिल्ले दिसून येतात. हे दोन्ही स्वतंत्र किल्ले आहेत. डावीकडे मनरंजन व उजवीकडे श्रीवर्धन आहे. श्रीवर्धनगडावर तटबंदी, बुरुज, पाहरेकरी यांच्या देवड्या, गुहा, दारुगोळ्याचे कोठार, पाण्याचे टाके, बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ असून सभोवतालचा परिसर छान दिसतो. मनरंजन किल्ल्यावर किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष, पाण्याचे टाके, दगडी बांधकामाचे मंदिर, किल्ल्याची तटबंदी आहे.
लोहगड समुद्रसपाटीपासून ३४०० फूट उंचीवर आहे. गडावर चढताना सलग चार प्रवेशव्दारामुळे तयार झालेल्या सर्पाकार मार्गाने जावे लागते. प्रवेशद्वाराची नावे गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान व महादरवाजातून गडावर पोहचता येते. गडावर पोहचल्यानंतर लक्ष्मी कोठार, शिवमंदिर, दर्गा, त्रंबक तलाव, अष्टकोनी तलाव, हत्ती तलाव, गडावरील लांबलचक असलेला विंचूसारखा दिसणारा गडावरील हा कडा विंचूकडा या नावाने ओळखला जातो. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी कारला लेणी, भाजे लेणीही पाहिल्या.
या मोहिमेत विनोद नरवडे, बी. एल. वाहुळ, किशोर नावकर, राहुल आहिरे, मनीष पहाडिया, शोएब पठाण, अक्षय वैष्णव, आकाश कोटुरवार, मयुरेश खडके, शिवराज गबाळे, अभिषेक लोया, कल्याण कोरडे, नितीन खरात, विशाल राठोड, प्रतिक डहाळे, अश्विनी पवार, ज्योती पाटमासे, अंजली कंटुले, गायत्री गबाळे, पूजा ठाकर, साक्षी जगजीवन, सुजाता तौर आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत कारची धडक, शालेय मुलगा ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
एका स्कोडा कारच्या (एम एच २० सी एच ९०८४) धडकेमुळे एक अल्पवयीन मोटारसायकलस्वार (एम एच २० ई पी ३६४२) जागीच ठार झाला. कृष्णा आप्पाराव बारगळ (वय १४, रा. मोठी आळी खुलताबाद), असे त्याचे नाव आहे. या अपघातात पवन प्रकाश जाधव (वय १४) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजता नंद्राबाद येथील हॉटेल निसर्गसमोर झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा व पवन दररोज सकाळी बेकरीत खारी आणण्यासाठी जात होते. ते नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मोटारसायकलवरून खारी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते नंद्राबादपर्यंत फेरफटका मारण्यासाठी गेले हा अपघात झाला. मृत कृष्णा हा नववीचा विद्यार्थी होता.
घटनास्थळी असलेल्या एका काळीपिवळी चालकाने उपचारासाठी जखमी पवन प्रकाश जाधव याला खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कृष्णा आप्पाराव बारगळ याला तपासून मृत घोषित केले. पवन प्रकाश जाधव याला अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी नगरसेवक योगेश बारगळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्कोडा कारचालकाविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज

हा अपघात हॉटेल निसर्गसमोर झाला. हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये अपघाताचा हा प्रकार चित्रित झाला आहे. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायलर झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स; अध्यक्षपदी मालाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध्यक्षपदी औरंगाबाद ‌जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष प्रफुल मालाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी रविवारी हॉटेल बग्गा इंटरनॅशनलमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी वैजापूर येथील ज्येष्ठ व्यापारी काशिनाथ गायकवाड हे होते. या बैठकीत स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीत मानसिंग पवार, सत्यानारायण राठी, तनसुख झांबड यांचा समावेश होता. या समितीने कार्यकारिणी बिनविरोध करण्यात महत्त्वाची भूमिका बजवली. यावेळी निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणेः अध्यक्ष प्रफुल मालाणी, उपाध्यक्ष किशोर अग्रवाल (जालना), उपाध्यक्ष ओमप्रकाश पोखर्णा (नांदेड), काशिनाथ गायकवाड (वैजापूर), मन्मत हेरकर (बीड), सूर्यकांत हाके (परभणी), जनरल सेक्रेटरी राकेश सोनी (औरंगाबाद), सचिव वाय. जर्नाधन (बीड), चंपालाल सेठी (लासूर स्टेशन), श्यामसुंदर बाराड (उस्मानाबाद), सहसचिव सुभाष लदनिया (हिंगोली), हरिश सोमाणी (लातूर), कोषाध्यक्ष विकास साहुज‌ी (औरंगाबाद). या निवडीपूर्वी कार्यकारिमी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी संस्थेचा मागील कार्याचा अहवाल वाचण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ काळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा व्यापारी महासंघाच्या २०१७ ते २०२० या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड रविवारी मोठ्या उत्साहात एकमताने करण्यात आली. व्यापारी जगन्नाथ काळे यांची व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ७२ विविध संघटनांची शिखर संघटना म्हणून औरंगाबाद व्यापारी संघटना ओळखली जाते. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन नूतन अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी उपस्थितांना दिले. याप्रसंगी मावळते अध्यक्ष अजय शहा, सचिव राजन हौजवाला, जेष्ठ व्यापारी भाकचंद बिनायके, आदेशपालसिंग छाबडा, प्रफुल्ल मालानी, संजीव जैस्वाल आदींची उपस्थिती होती. यावेळी बिनविरोध निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे मानसिंग पवार यांनी जुन्या कार्यकारिणीने केलेल्या कामांची माहिती देत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यापारी महासंघाच्या वेबसाइटचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नूतन कार्यकारिणी

जगन्नाथ काळे (अध्यक्ष), हरिसिंग, संजय कांकरिया, दीपक पहाडे, विजय जैस्वाल (उपाध्यक्ष), लक्ष्मीनारायण राठी (महासिचव), जयंत देवळाणकर, गुलाब हक्कानी (सहसचिव), अनिल चुत्तर (कोषाध्यक्ष), कचरू वेलंकार (जिल्हा संघटक).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्राह्मण एक झाला, तर जग जिंकूः वेदमुर्ती केदारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘ब्राह्मणांनो एकत्र या, एकमेकांचे शाखाभेद, मतभेद विसरा, मुला-मुलींचे विवाह करताना ब्राह्मण म्हणून एक आहोत हे दाखवा, आता एकता दाखवण्याची वेळ आली आहे. ब्राह्माणांची एक झाला, तर जग जिंकता येऊ शकते,’ असे प्रतिपादन वेदमूर्ती सुरेश केदारे यांनी केले.
परशुराम सेवा संघाच्या ‘ब्रह्मगाठ’ आघाडीतर्फे रविवारी संत एकनाथ रंगमं‌दिरात ब्रह्मगाठ वधू-वर संमेलन पार पडले. यावेळी आयोजित व्याख्यानात केदारे बोलत होते. त्यांनी ‘विवाहविषयक धर्मशास्त्रीय समज-गैरसमज’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष अनिल मुळे, ब्रह्मोद्योगचे प्रदेशाध्यक्ष सतीश मंडपे, परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष उल्हास अकोलकर, संयोजक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केदारे म्हणाले, ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी आणि अथर्ववेदी, असे फरक केल्यास समाजाचे नुकसान आहे. विशषेत: मंगळ ग्रहाविषयीदेखील गैरसमज पसरवले जात आहेत, मुळात मंगळ ग्रह ऊर्जा स्थानी असतो आणि तो आडकाठी करत नसतो. गैरसमजातूनच काही विवाह तुटतात आणि समाजबाधा होते, असे ते म्हणाले. यावेळी अनिल मुळे म्हणाले, मेळावे, परिचय मेळावे नेहमीच होतात. परंतु, प्रबोधनात्मक संमेलनाचे आयोजन होत नाही. हे प्रबोधन होणे आवश्यक आहे, या हेतूने या संमेलनाचे आम्ही आयोजन केले.
‘विवाह संस्काराची वैशिष्ट्ये व ढासळणाऱ्या कुटुंब व्यवस्थेत पालक-वधू-वर यां‍ची जबाबदारी’ यावर डॉ. मंजुषा कुलकर्णी (मुंबई), ‘जीवनसाथी उद्योजक-व्यावसायिकच हवा’ यावर सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी मार्गदर्शन केले. जोडीदार कसा निवडावा यावर हर्षद बर्वे, ब्राह्मण वर श्रेष्ठ का? यावर पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी मार्गदर्शन केले. अश्विनी दाशरथे यांनी सूत्रसंचालन केले.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जगदीश एरंडे, कमलाकर जोशी, श्रीकांत जोशी, रामचंद्र अंधारकर, दत्तात्रय पिंपळे, केदार पाटील, सागर खेर्डेकर, वसंत किनगावकर, प्रयागदास देशमुख, श्रीप्रसाद कुलकर्णी, विनोद देवकाते, सुहास जोशी आदींसह महिला समितीने परिश्रम घेतले.

जुळल्या २२ लग्नगाठी

या संमेलनात २२ विवाह जुळले, ७० मुली आणि १०० मुलांनी सहभाग घेतला. संमेलनात जाहीर ओळख करून घेणे, माहिती देणे आणि हे सोपस्कार करणार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉम्बने दाणादाण, निघाले प्रदूषणमापक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेला उणे-पुरे २४ तास लोटले नसतानाच घाटीमध्ये आणि तेही वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या ‘एटीएम’मध्ये बॉम्ब ठेवण्याची वार्ता रविवारी दुपारी एकच्या सुमारास हवेपेक्षा जास्त वेगाने पसरली आणि वैद्यकीय अधीक्षकांपासून समस्त अधिकारी-कर्मचारी-डॉक्टर-रुग्ण-नातेवाईकांची एकच पळापळ सुरू झाली. तत्काळ बॉम्ब पथक, श्वानपथक हजर झाले, भीत भीत सगळ्या ‘चाचण्या’ही झाल्या आणि शेवटी ‘डोंगर पोखरून उंदीर निघाला’ या म्हणीप्रमाणे ते उपकरण प्रदूषणमापक असल्याचे स्पष्ट झाले.
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे उपकरण ‘एटीएम’लगत ठेवल्याची कोणतीही अधिकृत माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्यासह घाटीमध्ये कुणालाच नव्हती. त्यामुळेच ही अफवा वाऱ्यासारखी पसरत गेली आणि अख्खी घाटी तीन-चार तास गॅसवर होती, असेही यानिमित्ताने समोर आले.
घाटी हॉस्पिटलमधील पोलिस चौकीसमोर अधीक्षक कार्यालयाला लागूनच सेंट्रल बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरवर दुपारी एक दुचाकीस्वार आला. त्याने एक मोबाइलसारखे वरकरणी दिसणारे उपकरण एटीएम केबीनच्या मागील कप्प्यात ठेवले. या उपकरणाला बटन होते. हे उपकरण ठेवून तो निघून गेला. हा प्रकार एका रुग्णाच्या नातेवाईकाने पाहिला. त्याने याची माहिती सुरक्षा रक्षकांना दिली व सुरक्षा रक्षकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनवणे यांना ही माहिती दिली, तर सोनवणे यांनी त्याची माहिती तत्काळ कंट्रोल रुमला कळवली. तोपर्यंत या परिसरात बघ्यांची गर्दी उसळली होती व सुरक्षा रक्षकांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. काही वेळेतच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे जवान हजर झाले आणि त्यांनी त्या उपकरणाची तपासणी केली. त्यात काहीही धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाले. हे यंत्र ताब्यात घेऊन बॉम्ब शोधक पथक निघून गेले. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या तरुणाने हे कृत्य करण्याचे कारण काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू झाला आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले.

सॉरी, सांगयला विसरलो

या खबळजनक प्रकारची कुणकुण प्रदूषण मंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागली आणि मंडळाच्या एका कर्मचाऱ्याने अधीक्षक कार्यालय गाठले आणि ‘सॉरी, याविषयी आम्ही आपल्याला कल्पना द्यायला विसरलो…’ अशा शब्दांत अधीक्षकांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे सोनवणे यांनी ‘मटा’ला सांगितले. त्यानंतर काय तो प्रकार उघड झाला आणि सगळ्या घाटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

या प्रदूषणमापक उपकरणाविषयी प्रदूषण मंडळाने कुठलीही लिखित किंवा तोंडी माहिती अधीक्षक कार्यालयाला दिली नव्हती. याबाबत आम्ही सर्वजण पूर्णपणे अनभिज्ञ होतो. एकूणच या प्रकारामुळे खूप ताण आला. या उपक्रमाविषयी संबंधित विभागाने योग्य ती माहिती देणे आवश्यक होते.
-डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक

२४ व २६ डिसेंबर रोजी हवेचे प्रदूषण मोजण्यासाठीच घाटी परिसरात प्रदूषणमापक ठेवण्यात आले आहे. याचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते व या एजन्सीने या चाचणीची माहिती घाटीला दिली असावी. कदाचित अधीक्षकांना नसेल; पण दुसऱ्या कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली असावी. याबाबत नेमकी माहिती कुणाला दिली, हे पाहावे लागेल.
-जयवंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एआरटीओ’पद मोठे; पगार मात्र कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर काम करणाऱ्या राज्यातील ९८ अधिकाऱ्यांना मोटार वाहन निरिक्षकांपेक्षाही कमी पगार मिळत आहे. यामुळे दर्जा आणि पदाप्रमाणे पगार मिळविण्यासाठी त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील ११६ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यात ९८ पदांची भरती परिवहन विभागाने केली असून त्यांना नियुक्ती देताना ‘वर्ग-अ’ चा दर्जा देण्यात आला आहे. या दर्जानुसार ५६०० रुपयांची वेतनश्रेणी मिळणे आवश्यक आहे. परंतु, नियुक्तीनंतर त्यांना ‘वर्ग-ब’ची ४ ६०० रुपये वेतनश्रेणी देण्यात आली. दुसरीकडे या पदापेक्षा कनिष्ट पदावरील मोटार वाहन निरीक्षकांना मात्र ‘वर्ग-अ’ (कनिष्ठ) दर्जा देण्यात आला आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हे परिवहन (गृह) खात्यातील जिल्हास्तरीय पद आहे. या पदाचे कार्य प्रशासकीय आणि नियंत्रक आहे. आरटीओ विभाग हा स्वतंत्र असून त्यांचा पोलिस विभागाशी संबंध नसतो. परिवहन विभागाचे महत्त्वाचे कामकाज हाताळूनही ‘एआरटीओं’ना कनिष्ठांपेक्षा कमी दर्जा व वेतनश्रेणी मिळत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

७ जानेवारीला चर्चा

दर्जा आणि वेतनश्रेणीच्या मुद्द्यावर राज्यातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ७ जानेवारी रोजी एकत्र येत आहेत. त्यांच्यात रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेल विटस् येथे चर्चा होणार आहे. यावेळी ठाणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नखाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅचवर्कमुळे रस्ता बनला धोकादायक

$
0
0

पॅचवर्कमुळे रस्ता बनला धोकादायक
बजरंग चौक ते आझाद चौक रस्त्यावर वाहने चालविणे अवघड; ‘भूमिगत’ लावली सिडकोच्या रस्‍त्यांची वाट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
शहरातील महत्त्वाच्या रस्‍त्यांपैकी एक असलेला आझाद चौक ते बजरंग चौक हा रस्ता वाहन धारकांसाठी धोकादायक बनला आहे. रस्‍त्याच्या अर्ध्याच भागावर पॅचवर्क करण्यात आले आहे. त्यामुळे एका भागात उंचवटा तर दुसरा भाग खाली अशी रस्त्याची अवस्था झाली आहे.
सिडकोत भूमिगत गटार योजनेची कामे करताना रस्ते उखडले गेले. त्यानंतर पुन्हा ते तयार करताना मात्र अर्धवट तयार झाला आहेत. बजरंग चौक ते आझाद चौक रस्त्याची तीच गत झाली आहे. भूमिगत गटार योजनेंतर्गत बजरंग चौक ते आझाद चौक दरम्यानच्या उद्यानासमोराचा रस्ता पूर्णतः खोदण्यात आला होता. याशिवाय माता मंदिराकडून अविष्कार चौकाकडे जाणारा रस्ताही खोदण्यात आला होता.
भूमिगत गटारीचे काम पूर्ण करताना हा रस्ता पूर्ण खराब झाला. जागोजागी मोठे खड्डे झाले. भूमिगतचे काम झाल्यावर त्याच कंत्राटदाराने रस्ता बांधण्याची अट पालिकेने टाकलेली आहे. मात्र, कंत्राटदाराने खोदलेला रस्ता बांधताना एकाच बाजूचा बांधून दिला आहे. बजरंग चौक ते आझाद चौकादरम्यानच्या रस्त्याचे अर्धेच डांबरीकरण झालेले आहे. अर्धा रस्ता खराब आणि अर्धा रस्ता डांबरीकरण अशी अवस्था येथे झाली आहे. आझाद चौकाकडून जाणारी वाहने या चांगल्या रस्त्यावरून जात आहेत. मात्र, खड्डे चुकविण्यासाठी बजरंग चौकाकडून येणारी वाहनेही अनेकदा याच अर्ध्या डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून जात आहेत. एकाज बाजूने दोन्हीकडील वाहने जात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. एका बाजूला उंचवटा झाल्यानेही वाहने चालविणे अवघड झाले आहे.
अर्धवट तयार झालेला हा रस्ता लवकरात लवकर पूर्णतः चांगला करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भूमिगत गटार योजनेत हा रस्ता उखडलेला होता. त्या कंत्राटदाराने अर्ध्याच रस्‍त्याचे पॅचवर्क केले आहे. पूर्ण रस्त्याचे पॅचवर्क करण्याबाबत मी महापालिककडे पाठपुरावा करीत आहे. सिडकोमधील अन्य रस्‍त्यांचीही अवस्‍था भूमिगतमुळे वाईट झालेली आहे. आगामी आठ दिवसांत हा रस्ता चांगला करण्याचा इशारा दिला असून तसे न झाल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय मार्ग राहणार नाही.

शिवाजी दांडगे, नगरसेवक, गुलमोहर कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाहा’मध्ये धावणार ‘आर्यन’ची कार

$
0
0

‘बाहा’मध्ये धावणार ‘आर्यन’ची कार
शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे ‘आंतरराष्ट्रीय’वर प्रयत्न
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय अभियांत्रिकी मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेली ‘एक्स-कॅलीबर’ मार्चमध्ये होणाऱ्या ‘एसएई-बाहा-२०१८’साठी सज्ज झाली आहे. ३१० सीसीचे इंजिनी असलेली ही रेसिंग कार विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांच्या परिश्रमानंतर स्पर्धेत उतरणार आहे. ७ ते ११ मार्च दरम्यान पंजाबमधील आयआयटी-रोपर येथे ही स्पर्धा रंगणार आहे.
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सतर्फे ‘बाहा-२०१८’ होते आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदा पंजाबमध्ये ही स्पर्धा होत आहे. देशभरातील नामांकीत इंजिनीअरिंग कॉलेजचे संघांनी तयार केलेल्या रेसिंग कारचा थरार तेथे पहायला, अनुभवायला मिळणार आहे. यंदा स्पर्धेसाठी देशभरातील २१० कॉलेजचे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. टीम ‘आर्यन’ने या रेसिंग कारची निर्मिती केली आहे. पूर्णपणे बॅटरीवर चालणारी ही कारची निर्मिती केली आहे. १२७ किलो वजनाची ३१० सीसीची ही कार काही सेंकदात शंभर किलोमीटरचा वेग गाठते. ताशी वेग १२० किलोमिटर आहे. कारचे वैशिष्ट म्हणजे कमी वजन, एवढ्या सीसीची कार बनविताना वजन कमी करणे आव्हान होते. अॅल्युमिनियम, कम्पोझीट्स वापरून हे वजन कमी केले, डिफ्रेंशीयल कमी आहे, असे कॅप्टन अंजिक्य उरगुंडे याने ‘मटा’ला सांगितले. संघात योगेश माळी, स्तवन कुलकर्णी, सौरभ केलानी, विकास खोचरे, शुभम पवार, सौरभ चव्हाण, अर्थव गुप्ता, केतकी दातार, वैष्णवी पाटील, महेश बनकर, तेजस महालपुरे, मनोज चव्हाण, ऋषीकेश देशमुख अक्षय सिरसाठ आदींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. संजय चिकलठाणकर, प्रा. एम. जी. राठी, प्रा. के. एस. वासनकर यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी नोंदणी
शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘बाहा-२०१८’सह जागतिक पातळीवर होत असलेल्या स्पर्धेकडे लक्ष ठेवले आहे. जूनमध्ये अमेरिकेतील ओरेगॉन येथे ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठीची प्राथमिक नोंदणीची प्रक्रिया कॉलेजने पूर्ण केली आहे. स्पर्धेत सहभाग मिळाला तर, जागतिक पातळवर आपले टॅलेंट दाखविण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्वाभिमानी साहित्यिकांची देशाला गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अंबाजोगाई
गजानन मुक्तिबोध, विंदा करंदीकर अशा स्वाभिमानी साहित्यिकांची देशात परंपरा आहे. साहित्यिकांच्या कथनी आणि करणीत फरक नको. पण, स्वाभिमानाने लेखन करणारे साहित्यिक खूप कमी आहेत. नेत्यांच्या मागे-पुढे धावण्यात हयात घालवलेल्या साहित्यिकांची संख्या मोठी आहे, अशी चौफेरे टीका प्रा. रंगनाथ तिवारी यांनी केली.
३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ते बोलत होते. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्ष प्रा. तिवारी यांचे भाषण विशेष ठरले. आद्यकवी मुकुंदराज साहित्यनगरीत त्यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधत विविध विषयांवर रोकठोक मते मांडली. एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक लेखणी जगला बदलू शकते असा संदेश मलाला नावाच्या चिमुरडीने दिला. दुर्दैवाने आपल्या देशात शिक्षकाला सन्मान मिळत नाही याची खंत वाटते. गावात किती शौचालये बांधली हे मोजायला सांगताना सरकारला शरम कशी वाटत नाही. हे काम देशातील हजारो बेकार मुलांना दिल्यास त्यांना रोजगार तरी मिळेल. सध्याचे वास्तव विषण्ण करणारे आहे. नोकरीसाठी १० लाख आणि २० लाख रूपये मागतात. देणारे देतात आणि घेणारे निर्लज्जपणे घेतात. त्या तरुणाकडे पैसे असते तर तो नोकरी मागायला गेला नसता. सत्ता आणि संपत्ती वेश्येच्या पलिकडे गेली आहे. गजानन मुक्तिबोध आणि विंदा करंदीकर यांच्यासारखे स्वाभिमानी साहित्यिक आता नाहीत. नेत्यांनी व्यभिचार करायचा आणि समाजाने त्यांचे अंथरूण होऊन निपचित पडून रहायचे अशी भीषण स्थिती आहे असे तिवारी म्हणाले.
यावेळी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, खासदार रजनी पाटील, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार सुरेश धस यांची भाषणे झाली.
आठ खंड प्रकाशित करा
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची भाषा वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्याने भरलेली आहे. या भाषेची महत्त्व जाणून आठ खंड प्रकाशित करा. भाषेतील ठेवा सर्वांसाठी खुला होईल, अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषदेने खंड निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथ विक्रीला प्रतिसाद
मराठवाडा साहित्य संमेलनानिमित्त योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात पुस्तक विक्रीची ३० दालने आहेत. पहिल्याच दिवशी साहित्य रसिक आणि विद्यार्थ्यांनी पुस्तक दालनाला भेटी देऊन आवडत्या पुस्तकांची खरेदी केली. प्रत्येकाने किमान एक पुस्तक खरेदी करून विक्रेत्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन संयोजकांनी केले.
शेकडो विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग
शिवाजी चौकातून सकाळी नऊ वाजता जागर दिंडी काढण्यात आली. विविध शाळा आणि महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. वैविध्यपूर्ण वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. संमेलनस्थळी दिंडीचा समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य संमेलन नेत्यांकडून हायजॅक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठी भाषेचे प्रश्न, शेतीचे प्रश्न आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्तमानावरील भाष्य टाळत केवळ राजकीय कोपरखळ्या आणि सुमार भाषणांनी मराठवाडा साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा गाजला. मुख्य मंचावरील सर्व जागा नेत्यांनी ताब्यात घेतल्याने साहित्यिकांना दाटीवाटीने कोपऱ्यात बसावे लागले. राजकीय नेत्यांनी हे संमेलन हायजॅक केल्यामुळे साहित्यिक आणि रसिकांची पुरती निराशा झाली.
३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे रविवारी (२४ डिसेंबर) दिमाखदार उदघाटन झाले. हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली जागर दिंडी संमेलनाचे आकर्षण ठरली. एखाद्या निवडणुकीप्रमाणे शहरात ठिकठिकाणी लावलेले होर्डिंग्ज रसिकांचे लक्ष वेधून घेत होते. रांगोळ्या, आतिषबाजी आणि ढोल-ताशांनी संमेलनाची दिंडी गाजली. संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याला बीड जिल्ह्यातील जवळपास ५० राजकीय नेते उपस्थित होते. नेत्यांनी मुख्य मंचावर गर्दी केल्यामुळे संमेलन आहे की राजकीय सभा असा प्रश्न रसिकांना पडला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, माजी आमदार सुरेश धस, अंबा साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, माजी आमदार उषा दराडे, नगराध्यक्ष रचना मोदी, स्वागताध्यक्ष व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, महिला व बालकल्याण सभापती शोभा दरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सविता गोल्हार, उपाध्यक्ष जयश्री मस्के, संजय दौड, आनंद चव्हाण अशा नेत्यांची मांदियाळी होती. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय पक्षांचे जवळपास ५० पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. तर साहित्यिक केवळ सात होते. नेत्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि साहित्यिकांच्या जागा ताब्यात घेतल्या. त्यामुळे साहित्यिक आणि पदाधिकारी कोपऱ्यात दाटावाटीने बसले. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे ऐनवेळी आल्याने कशीबशी जागा उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे साहित्य, मराठी भाषा, महाराष्ट्राची सांस्कृतिक अवस्था अशा मुद्द्यांचा नेत्यांनी केवळ ओझरता उल्लेख केला. राजकीय कोट्या आणि आगामी निवडणुकीचे राजकीय गणित मांडत वक्त्यांनी भाषणे केल्यामुळे साहित्य रसिकांची निराशा झाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख शिक्षण विभागाचे सभापती असून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची संधी त्यांनी साधली. माझे छोटे बंधू सुरेश धस यांनी साहित्यिकांपेक्षा चांगले भाषण केले असे जाहीर कौतुक करीत खासदार रजनी पाटील यांनी साहित्यिकांना अप्रत्यक्षपणे कमी लेखले. पंकजा मुंडे यांचे भाषण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या अंबाजोगाई येथील वास्तव्याच्या आठवणीभोवती फिरले. भाषेचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मंचावर महिला प्रतिनिधी कमी असल्या तरी आमची शक्ती जास्त आहे. संख्येत मोजू नका तर शक्ती पहा असा टोला त्यांनी सुरेश धस यांना लगावला. पंकजा यांचे भाषण झाल्यानंतर मांडवातील गर्दी उठून निघून गेली. संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांचे भाषण ऐकण्यासाठी थांबा, कुणीही जाऊ नका असे आवाहन करण्यात आले. नेत्यांनी संमेलन हायजॅक केल्यामुळे तब्बल तीन तास उदघाटन सोहळा चालला. परिणामी, पुढील कार्यक्रम दोन तासांनी उशीरा सुरू झाले.
शेतीचे प्रश्न वगळले
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आपल्या भाषणात शेती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या अनुषंगाने महत्त्वाचे मुद्दे मांडले. शेतकरी संपावेळी आम्ही विदेशातून धान्य आणू असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले होते. यातून सरकारची असंवेदनशीलता दिसते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारी यंत्रणाच जबाबदार असल्याची टीका ठाले यांनी केली. मात्र, लोकप्रतिनिधींनी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आणि शेतीच्या प्रश्नावर भाष्य टाळत सुटका करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालकांच्या भावविश्वाचा पालकांनी विचार करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
आधुनिकीकरणाने समाज व व्यक्तीच्या विचारांच्या कक्षा बदलत चालल्या आहेत. तंत्रज्ञान व जागतिकीकरणात माणूस अन माणुसकी हरवत चालला असून साने गुरुजींच्या संस्काररुपी विचारांची समाजाला गरज आहे. बालकांच्या भावविश्वाचा पालकांनी हळूवार मनाने विचार करायला पाहिजे, असे प्रतिपादन बालकुमार महोत्सवात अध्यक्ष डॉ. छाया महाजन यांनी केले.
अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जालनातर्फे आयोजित स्व. दत्तात्रय हेलसकर कलानगरी श्री सरस्वतीभुवन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात बालकुमार महोत्सवाचे रविवारी बालसाहित्यिक नरेंद्र लांजेवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. बसवराज कोरे, सल्लागार उद्योजक सुनीलभाई रायठठ्ठा, डॉ. रमेश अग्रवाल, प्राचार्य केशरसिंह बगेरिया, डॉ. नारायण बोराडे, राधिका शेटे, कल्पना हेलसकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते, कार्यवाह आर. आर. जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, संतोष लिंगायत यांची उपस्थिती होती.
आजच्या सामाजिक वातावरणात सानेगुरुजींच्या संस्कारमय विचारांची गरज आहे. माणूस अन माणुसकी याला प्रेमाने व बंधुत्वाने जोडण्याचा धागा सानेगुरुजींच्या विचारात असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार मुलांच्या भावनिकतेचा विचार पालकांनी करायला पाहिजे असे सांगत मोबाइल व इतर तंत्रज्ञानाचा बाल मनावर परिणाम होत असताना यातून बाहेर कसे पडता येईल याबद्दल डॉ. महाजन यांनी प्रकाश टाकला.

बालसाहित्यिक नरेंद्र लांजेवार म्हणाले, ‘आज पालकांवरच संस्कार करण्याची गरज आहे. यासाठी बालकुमार मेळावे भरविण्याबरोबरच पालक मेळावेही घेतले पाहिजे. शहरीकरणाने बालकांचे विश्व रुंदावत असलेतरी संवेदना मात्र हरवत चालली आहे. धनाची भाषा बोलण्यापेक्षा मनाची भाषा बोलल्या गेली पाहिजे. माणसातील संवेदनशीलता हरवत चालली आहे. बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक चळवळीतून बालभवनाची संकल्पना रुजविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा.’

समारंभात अंनिस कार्यासाठीचा राज्यस्तरीय शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति साधना पुरस्कार वर्धा येथील गजेंद्र सुरकार यांना, स्व. दत्तात्रय हेलसकर स्मृति मराठवाडा विभागीय पुरस्कार नांदेड येथील संगीतकार आनंदी विकास यांना, सानेगुरुजी सेवा गौरव पुरस्कार जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते युनूसभाई हिंगोरा यांना, संस्थेसाठीचा प्रकाश पुरस्कार रेड स्वस्तिक सोसायटी जालना यांना तर यशोदा पुरस्कार कमल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात प्रा. बसवराज कोरे, डॉ. रमेश अग्रवाल, सुनीलभाई रायठठ्ठा यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमात स्व. बाबुराव जाफराबादकर शाळेतील विद्यार्थ्यांनी खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना सादर केली. भक्ती पवार हिने स्वागतगीत गायले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदाव्रते यांनी केले तर पुरस्कार निवड समितीची भूमिका कार्यवाह आर. आर. जोशी यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विद्या दिवटे यांनी केले.

कविसंमेलन, चित्रप्रदर्शनला गर्दी
बालकुमार महोत्सवात बालसाहित्यिक उद्धव भयवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमारांचे कविसंमेलन चांगलेच रंगले.बालकुमार महोत्सवाच्या ठिकाणी चित्रकार सुनील पवार यांनी रेखाटलेल्या सानेगुरुजींच्या कथांवर आधारीत चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. तर दिव्यांग चित्रकार राधिका भगवान शेटे हीने काढलेल्या निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनांनी लहान मुले भारावून गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास कोणाचा जनतेचा की भांडवलदारांचा ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
देश अंबानी, अदानीचा आहे की शेतकरी, शेतमजुर, कष्टकऱ्यांचा आहे, याचे उत्तर विकास पुरुषांनी देऊन विकास जनतेचा करायचा की भांडवलदाराचा हे स्पष्ट केले पाहिजे, असे मत सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी लातूरात केला.
बँक ऑफ महराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या बाराव्या द्विवार्षीक अधिवेशनाचे उद्घाटन उल्का महाजन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बॅँकेच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार चव्हाण, ललीता जोशी, राजीव ताम्हणे, आशा शेलार, महापौर सुरेश पवार उपस्थित होते.
यावेळी युनियनच्यावतीने देण्यात येणारा कॉ. श्रीपाद अमृत डांगे स्मृती पुरस्कार उल्का महाजन यांना नंदकुमार यांच्या हस्ते देण्यात आला. स्वागताध्यक्ष अशोक गोविंदपूरकर यांनी संघटीत बँक कर्मचारी संघटनेने सहकार क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा काम करावे. बँकाच्या सध्यस्थितीची सामान्य जनतेला माहिती करण्यासाठीही काम करण्याचे आवाहन केले.
उल्का महाजन यांनी त्यांच्या भाषणात आदिवासीच्या जमिनी वाचविण्यासाठी जिंदाल, रिलायन्स विरोधात दिलेल्या लढ्याची माहिती दिली. सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘समृद्धी मार्गासाठी, इंडस्ट्रीयल कॅरीडॉर हा सेझचा प्रकार असून यात शेतकरी देशोधडीला लागणार आहे. रोजगार किती मिळणार या पेक्षा बेरोजगारी किती वाढणार हे लक्षात घेतले पाहिजे.’
यावेळी नंदकुमार चव्हाण यांनी वाढत्या कर्ज थकबाकीचे आणि एनपीएचचे गौडबंगाल काय याची माहिती दिली. युनियनचे जनरल सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. सोमवारी या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनांचे अधःपतन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, अंबाजोगाई

बहुतांश आत्मचरित्रे ही दांभिक असतात. सांस्कृतिक संचित मांडण्याची कुवत असेल तर आत्मचरित्रे जरूर लिहावी. मात्र, अपयश झाकून केवळ यशाबद्दल लिहिली जाणारी आत्मचरित्रे सांस्कृतिक कचरा असतो, असे परखड मत ज्येष्ठ समीक्षक-कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते प्रकट मुलाखतीत बोलत होते. साहित्य संमेलनांचे वेगात अधःपतन झाले असल्यामुळे साहित्य संमेलनाध्यक्ष होण्याची इच्छा नाही, असे पाटील यांनी सांगितले.
३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ समीक्षक-कवी प्रा. चंद्रकांत पाटील यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. बाबासाहेब परांजपे मंचावर सोमवारी सकाळी आसाराम लोमटे (परभणी), डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर) आणि तुषार बोडखे (औरंगाबाद) यांनी वाङ्मयीन वाटचालीवर पाटील यांच्याशी संवाद साधला. मराठी साहित्यातील वाचनीयता कमी झाल्याच्या मुद्द्यावर पाटील यांनी परखड मते मांडली. ते म्हणाले, ‘आजकाल प्रत्येकाला कवी व्हायचे आहे, मात्र कविता कुणाला लिहायची नाही. कविता लेखनाचे स्वतंत्र शास्त्र असून ते जाणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कवीची कविता अस्सल असते. वाचनीयतेचे काही निकष आहेत. जे पुस्तक जगण्याबद्दलचे ज्ञान देते किंवा जगण्यासाठी उपयुक्त असते ते पुस्तक वाचनीय असते. ज्ञानात कोणतीही भर न घालणारी पुस्तके टाकाऊ असतात. हा निकष लावल्यास मराठीतील ऐंशी टक्के पुस्तके किलोने विकावी लागतील. कोणतेही गांभीर्य नसल्यामुळे एकूण वाड्मयीन व्यवहार अडचणीचा झाला.’ लघु अनियतकालिकांची चळवळ, अनुवाद, कविता लेखन, संपादन अशा मुद्द्यांवर पाटील यांनी मते मांडली.
साहित्य संमेलनाध्यक्ष होण्यास नकार देण्यामागे काही तात्त्विक कारणे आहेत का, या प्रश्नावर त्यांनी प्रांजळ मत मांडताना ते म्हणाले, ‘लोकांना देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी माझ्याकडे काही नाही. संमेलनाध्यक्ष पद दाखवेगिरीचे पद झाले आहे. परभणी आणि नागपूर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात सहभाग घेतला असला, तरी संमेलनाध्यक्ष कधी व्हावेसे वाटले नाही. परभणीच्या संमेलनात प्रसिद्ध हिंदी कवी अशोक वाजपेयी यांना आमंत्रित केले. तर नागपूरच्या संमेलनात प्रसिद्ध समीक्षक नामवरसिंह यांना आमंत्रित केले होते. मंचावर अध्यक्ष आणि नामवरसिंह बसले होते. सुशीलकुमार शिंदे येऊन दोघांच्या मध्ये बसले. दुसरे, तिसरे नेते येत गेले आणि नामवरसिंह सरकत-सरकत अगदी शेवटी प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले. ही अशी आपली संस्कृती आहे. याचा नेहमीच विषाद वाटतो. काही संमेलनाध्यक्षांची पुस्तके कुणालाच माहीत नसतात. संमेलनांचे अधःपतन झाल्यामुळे संमेलनाध्यक्ष होण्याची इच्छा नाही.’ स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी पाटील यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा बरूरे यांनी केले तर अलका वालचाळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाएंट्स प्राइड क्लबचा देशपातळीवर गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जाएंटस इंटरनॅशनलचे वार्षिक अधिवेशन मुंबईत नुकतेच झाले. अधिवेशनात जाएंटस ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राइडला देशातील सर्वोत्तम ग्रुप, तर सरिता मालानी यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्षांचा बहुमान मिळाला.
आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शायना एन. सी अध्यक्षस्थानी होत्या. केंद्रीयमंत्री रामदास आठवले, अभिनेते हृतिक रोशन यांची प्रमुख पाहुणे होते. अधिवेशनाचा समारोप राज्यपाल चे. विद्यासागर राव, मनोज तिवारी, सोनाली बेंद्रे यांच्या उपस्थितीत झाला. जाएंटसचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी, दिनेश मालानी, राजेश जोशी, नुरद्दीन शेवाला, पी. सी. जोशी, शिरीष कपाडिया यांची विशेष उपस्थिती होती.
वर्षभरात ६०० ग्रुप्सतर्फे घेण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यात औरंगाबाद प्राइड ग्रुपला सर्वोत्तम ग्रुपचे, सरिता मालानी यांना सर्वोत्तम अध्यक्ष, तर औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक सुशोभीकरणाबद्दल सर्वोत्तम प्रकल्पाचेही पारितोषिक देण्यात आले. याशिवाय सचिव भाग्यश्री काबरा, कोषाध्यक्ष स्वाती खटोड यांनाही गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलीम अली सरोवराची पक्षी व मानवात वाटणी ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अर्धे सलीम अली सरोवर पक्ष्यांसाठी, तर अर्धे माणसांसाठी आरक्षित ठेवावे, अशा अाशयाचे शपथपत्र महापालिका हायकोर्टात सादर करण्याच्या तयारीत आहे. सरोवरासंदर्भातील हायकोर्टात प्रलंबित याचिका लवकर बोर्डावर घ्यावी, असा विनंती अर्ज पालिकेतर्फे करण्यात येणार आहे.
डॉ. सलीम अली सरोवर हे शहाराच्या आकर्षणासोबतच पक्ष्यांनाही आकर्षित करते. या परिसरात अनेक दुर्मीळ पक्षी आढळतात. सरोवराचा परिसर पक्ष्यांचा निवास, विहार व प्रजोत्पादनासाठी पूरक मानला जातो. त्यामुळे हे सरोवर पक्ष्यांसाठीच राखीव ठेवावे, अशी पक्षीमित्रांची मागणी आहे. सरोवराच्या परिसरात नागरिकांना चार घटना घालवता याव्यात, यासाठी महापालिकेने पाच कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. पण, त्यानंतर सरोवर नागरिकांसाठी खुले केले जाणार असल्याने काही पक्षीमित्रांनी संघर्ष समिती स्थापन करून पालिकेच्या भूमिकेविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यापासून सरोवराच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले आहे. सरोवराच्या परिसरात सर्वसामान्य नागरिकांना सध्या मज्जाव आहे.
सरोवर नागरिकांसाठी खुले करावे व त्यासोबतच पक्ष्यांचाही संचार असावा, यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पक्षीमित्रांची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. दरम्यानच्या काळात पालिकेतर्फे हायकोर्टात शपथपत्र दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
पक्ष्यांची वस्ती असलेला सरोवराचा भाग पक्ष्यांसाठी राखीव व ज्या भागात फार पक्षी येत नाहीत, तो भाग नागरिकांसाठी खुला करण्याचा उल्लेख शपथपत्रात राहील, असे महापौर घोडेले यांनी सांगितले. पक्ष्यांचे सरोवर आणि नागरिकांचे सरोवर असे दोन भाग करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोर्टाने परवानगी दिली, तर पक्षी व माणसांसाठी सरोवर खुले करू, असे महापौर म्हणाले.

पक्षीमित्रांचा विरोध

माणूस आणि पक्षी एकत्र राहू शकत नाहीत. डॉ. सलीम अली सरोवर जैवविविधतेचा मोठा खजीना असून ते पक्ष्यांसाठीच राहिले पाहिजे. सरोवर परिसरात मानवाला प्रवेश नसावा, अशी आमची भूमिका आहे. पालिका सरोवरात बोटिंग सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. सरोवरातील ड्रेनेजचे पाणी आरोग्यास हानीकारक आहे, याचा विचार बोटिंग सुरू करताना झाला पाहिजे. पालिकेने हर्सूल तलावात बोटिंग सुरू करावी. सरोवराशेजारचे उद्यान विकसीत करून, सरोवराच्या चारही बाजूने टॉवर्र उभारल्यास नागरिकांना पक्षी निरीक्षण करता येईल, असे पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images