Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बिल थकल्याने पाणीबाणी; एसटी कर्मचाऱ्यांचे हाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभाग नियंत्रक कार्यालयाने महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे बिल थकवल्याची शिक्षा एसटी कर्मचाऱ्यांना भोगावी लागत आहे. एक दिवसआड पाणी मिळत असल्याने एसटी महामंडळाच्या क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या ९० कुटुंबांचे हाल होत आहेत.
एस. टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयामाग एसटी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. येथे ९० कुटुंब राहतात. महापालिकेकडून दररोज सहा टँकर पाणी मागवून येथील दोन हजार लिटरच्या टाकीत टाकले जाते. त्यापोटी पालिकेला प्रतिटँकर १३०० रुपये द्यावे लागतात. मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षापासून एसटी महामंडळाने सुमारे तीस लाख रुपये थकवले आहेत. त्यामुळे पालिकेने टँकरची संख्या कमी केली आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना एक दिवसआड पाणी मिळत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे मोठे हाल होत आहेत. पालिकेकडून सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्यावा, अशी विनंती कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रक कार्यालयाकडे केली आहे.

पर्यायी व्यवस्‍थेचा विचार

एसटी महामंडळ टँकरवर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘टँकर होणारा खर्च मोठा असल्याने कर्मचाऱ्यांच्या निवासस्‍थानासाठी वेगळे नळ कनेक्‍शन घेण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे देणार आहोत. शिवाय बोअर पाडूनही पाणीपुरवठा करण्याचा विचार आहे. पालिकेला पैसे देईपर्यंत ही अडचण राहणार आहे. त्यानंतर पूर्वीसारखी व्यवस्‍था कायम होईल,’ अशी माहिती विभाग नियंत्रक रा. ना. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
गेवराई तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल बुधवारी दुपारी लागले. यापैकी सर्वाधिक १५ ग्रामपंचायतीवर आमदार अमरसिंह पंडित व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्व सिद्ध केले. विजयी उमेदवारांनी कृष्णाई निवासस्थानी जोरदार जल्लोष करून आनंद व्यक्त केला.
बुधवारी लागलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १५ ग्रामपंचायतीत निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी ग्रामीण भागात जोरदार मुसंडी देत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. त्यांना मोठा प्रतिसाद ग्रामीण भागातील जनतेने दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे. आज झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीकडे बेलगांव, तांदळा, तळवट बोरगांव, उक्कडपिंपरी, भेंडटाकळी, सिंदफणा चिंचोली, आगरनांदूर, गोळेगांव, काठोड, कांबी-नंदपूर, कटचिंचोली, गैबीनगर तांडा, रसुलाबाद, ढालेगांव, शेकटा या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचपदाचे उमेदवार बहुमताने विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण भागात पुन्हा वर्चस्व सिद्ध झाले आहे.
तालुक्यातील उमापूर आणि चकलांबा या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवारानी बाजी मारली. माजलगाव तालुक्यातील व गेवराई मतदार संघातील टाकरवण या मोठ्या ग्रामपंचायतीसह इर्ला-डुब्बा या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. मतमोजणीनंतर सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे विजयसिंह पंडित यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी ढोल आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

इंजिनीअर मुलगी झाली सरपंच
माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंचपदी तालुक्यात सर्वात कमी वय २५ वर्षे असलेली एरोनॉटीकल इंजिनीअर युवती निवडून आली आहे. ऋतुजा राजेंद्र आनंदगांवकर ही दोन तगड्या उमेदवारांचा पराभव करत सरपंच झाली.
मंजरथ हे गाव धाकटी काशी म्हणून राज्यात ओळखले जाते. गेल्या ३० वर्षांपासून राजेंद्र आनंदगांवकर हे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन असून, मंजरथ गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. गोदावरी नदीच्या घाटाची स्वछता आणि गाळ काढण्याचे काम त्यांनी केले होते. राजेंद्र आंनदगावकर व राजश्री आनंदगांवकर यांची मुलगी ऋतुजा आनंदगांवकर ही उच्चशिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण करून ती इंजिनीअर झाली आहे. तिने एमटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत दोन मातब्बर उमेदवारांचा पराभव करत ऋतुजा आनंदगांवकर मंजरथच्या सरपंच बनल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांसाठी बोटिंग ठरतेय मेजवानी

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचे रुपडे सध्या पालटले असून, या किल्ल्याचे संगोपन व संवर्धन
करत असताना या किल्ल्याला पंचतारांकित रूप देण्यात आले असल्याने शिवाय येथे आता बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांची
गर्दी चांगलीच वाढली आहे.
येथे येणाऱ्या पर्यटकांना आनंद घेता यावा, शिवाय मौज मस्ती करता यावी यासाठी युनिटी मल्टिकॉन्स या कंपनीने कोकण समुद्र किनाऱ्यावर वापरण्यात येणाऱ्या ‘स्पीड बोट नौका’ उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. त्याशिवाय येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध आकर्षक सोयी-सुविधांमुळे पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजनेतंर्गत सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्स या डेव्हलपर्स कंपनीच्या माध्यमातून सामंजस्य करारानुसार सध्या
या किल्ल्याचे संवर्धनाचे काम सुरू आहे. २६ ऑगस्ट २०१४ रोजी या कंपनीने येथील संवर्धनाचे काम हाती घेतले आणि अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत नष्ट
होण्याच्या मार्गावर असलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व टिकवित रुपडेच पालटून टाकले आहे. आता नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबादसह लातूर, बीड, सोलापूर तसेच हैदराबाद, पुणे, गुलबर्गा येथील पर्यटकांसाठीचे आकर्षण केंद्र बनले आहे. आता या किल्ल्यात परदेशातील पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनामुळे आता नळदुर्गची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू झाली आहे. इतकेच नव्हे तर पर्यटकांवर आधारित उद्योगाची देखील भरभराट होऊ लागली आहे.
युनिटी मल्टिकॉन्सने येथे पर्यटकांना मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध करुन दिली आहेत. साहसी क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठीचे विविध उपक्रम येथे सुरू करण्यात आले आहेत. येथील नर-मादी धबधबा, बगीचा, कारंजे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहेत. आता यामध्ये स्पीड बोटस उपलब्ध करून दिल्याने ही बाब पर्यटकांसाठी मेजवानी ठरत आहे. किल्ल्यातील बारादरी येथील बोरीनदी पात्रात पर्यटकांना या स्पीड बोटीद्वारे नोका प्रवासाचा तसेच जलक्रीडाचा आनंद लुटता येणार आहे. त्याशिवाय या परिसरातील विविध प्राणी, पक्षी यांचे दर्शन घेता येणार आहे.

म्युझिक सिस्टीमवर आधारित कारंजे
या किल्ल्याचा परिसर सुमारे १२५ एकर इतका आहे. त्यामुळे किल्ल्यांतर्गत फेरफटका मारण्यासाठी युनिटीच्या वतीने गोल्फकार्ट कारचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय आता येथे लाईट म्युझिक सिस्टीमवर
आधारित कारंजे, आकर्षक लायटिंग आदी बाबी उपलब्ध करून देत, पर्यटकांना रात्री आनंद लुटता यावा यासाठीचे युनिटी मल्टिकॉन्सचे कफिल मोलवी,
जयधवल करमरकर, भरत जैन, रजनीकांत शहा यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’चा डेटा गायब

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गलथान कारभारामुळे २०१५मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांचा डेटा संकेतस्थळावरून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना अजून प्रमाणपत्र मिळाले नसून, त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वैजापूर येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २०१३मध्ये फिटर ट्रेडसाठी १५, वायरमनसाठी १३ व सिव्हिल टेक्नॉलॉजी या ट्रेडसाठी सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१५मध्ये ते परीक्षा पास झाले. या विद्यार्थ्यांना गुणपत्रक देण्यात आले, मात्र प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. वरिष्ठांकडून प्रमाणपत्र मिळण्यास उशीर असल्याने हे विद्यार्थी नोकरीच्या शोधात बाहेर पडले. दरम्यान २०१५मध्ये शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. याचवर्षी इंइंटरनेटद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. संस्थेने शासनाच्या संकेतस्थळावर माहिती घेतली असता रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा संदेश मिळाला. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच या विद्यार्थ्यांचा डेटा गायब झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कंपनीत निवड; मात्र अडचण
औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्था प्रशासनाच्या गलथानपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याच आरोप विद्यार्थी वर्गातून होत आहे. अबरार शेख व अशरफ कादरी या विद्यार्थ्यांची कंपनीने इंटरशिपसाठी निवड केली, पण आयटीआयचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना या कंपनीत नोकरी मिळवण्यास अडचण येत आहे.

आयटीआय कोर्स केल्यानंतर रोजगाराची संधी असल्यामुळे २०१३मध्ये मी प्रवेश घेतला. दोन वर्ष प्रशिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. आता माझी एका कंपनीने निवड केली आहे, मात्र प्रमाणपत्र नसल्याने अडचण येत आहे.
- अबरार शेख

संकेतस्थळावरून गायब झालेली माहितीचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवू. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवरसुद्धा याबाबत कळवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यात येतील.
- एस. पी. घोडके, मुख्याध्यापक

...अशी सुरू परवड
- २०१३मध्ये प्रवेश
- १५ फिटर ट्रेड
- १३ वायरमन
- ७ सिव्हिल टेक्नॉलॉजी
- ३५ विद्यार्थी एकूण
- २०१५मध्ये प्रशिक्षण पूर्ण
- २०१७मध्येही प्रमाणपत्र नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा लाखांची चोरी

0
0


म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
बाबारा येथे तीन सराफा दुकानांसह दोन घरे फोडून चोरट्यांनी जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी झालेल्या या धाडसी चोरीने खळबळ उडाली आहे.
बाबरा हे तालुक्यातील बाजारपेठेचे असून आहे. यातील तीन सराफा दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी आतील दागिने लंपास केले. हा सर्व प्रकार सकाळी उघडकीस आला. यानंतर वडोद बाजार पोलिसांनी औरंगाबादहून श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले. या पथकातील श्वान मागोवा घेत वाहेगाव शिवारातील गट क्रमांक ११२मधील शेतापर्यंत गेले. याठिकाणी काही मद्देमाल हस्तगत झाला. चोरीत शिवनारायण सोनवणे यांच्या हरिओम ज्वेलर्समधील चार लाखांचे दागिने व रोख लंपास केली. शांताराम इंगळे यांच्या बालाजी ज्वेलर्समधून ५५ हजारांचे दागिने, तर शिवम ज्वेलर्समधून जवळपास ५० हजारांचे दागिने लंपास केले. दुकानांच्या बाजूलाच कमलबाई मधुकर मुळे यांच्या घराचा कडिकोंडा तोडून या घरातील एक लाख ५५ हजार हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. बालाजी मंदिराच्या पाठीमागील राजू त्र्यंबके यांच्या घराचा कडी-कोंडा तोडला, मात्र चोरट्यांच्या हाती येथे काहीही लागले नाही. या तपासात उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आमले, सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, राहुल साळवे आदींनी पंचनामा केला.

सीटीव्ही डीव्हीआरऐवजी टीव्हीचे रिसिवर चोरले
चोरट्यांनी आपली छबी सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन नये म्हणून सीसीटीव्हीच्या डीव्हीआरऐवजी टीव्हीचे रिसिवर चोरून नेले. मंगळवारी मध्यरात्री घडलेली घटना सकाळी उघडीस आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. दोन वर्षांपूर्वी येथील मंदिरातून लाखो रुपयांच्या बालाजीच्या मूर्ती चोरीस गेल्या होत्या. त्या मूर्तींचा अजूनही शोध लागलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट विक्रीत साडेसतरा लाखांची केली फसवणूक

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट कागदपत्रांआधारे साडेतेरा लाखांचा प्लॉट विक्री करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला शनिवारपर्यंत (३० डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच मोहम्मद यांनी दिले.

या प्रकरणी सय्यद लाल सय्यद हबीब (रा. हर्सूल सावंगी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची ओळख आरोपी शेख मुस्ताक शेख मुनाफ (रा. हिनानगर, रशीदपुरा) याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने फिर्यादीला जटवाडा रोवरील प्लॉट दाखवला होता. हा प्लॉट पसंत पडल्याने फिर्यादीने खरेदी केला. त्यासोबतच आणखी तीन प्लॅट खरेदी केले व आरोपीने साडेतेरा लाख रुपयांमध्ये व्यवहार केला. दरम्यान, काही दिवसांनी जटवाडा रोडवरील प्लॉट दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आल्यानंतर फिर्यादीने पैशांची मागणी केली असता आरोपीने पैसे देण्यास नकार दिला होता.

दुसऱ्या गुन्ह्यातून ताब्यात
फिर्यादीच्या तक्रारीवरुन शेख मुजीब शेख सुभान (रा. सादातनगर), शेख मुश्ताक शेख मुनाफ (रा. रहेमानिया कॉलनी) व शेख साहेबलाल शेख हसन (रा. बाबर कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी शेख मुश्ताक शेख यास दुसऱ्या गुन्ह्यातून ताब्यात घेतले. त्याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखान्यावर छापा; आंटीला केले गजाआड

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोजाबाग परिसरातील एका घरातील कुंटणखाना सिटीचौक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता उद्धवस्त केला. कुंटणखानाचालक आंटीसह एका पीडित तरुणीला ताब्यात घेतले आहे.

अलअलीम हौसिंग सोसायटीतील एका घरात चाळीस वर्षांची महिला कुंटणखाना चालवत असल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांना मिळाली होती. या माहितीवरून या घरावर पंचाना सोबत घेऊन छापा टाकण्यात आला. यावेळी कुंटणखाना चालक महिलेसह एका पीडित तरुणीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख सोळा हजार आठशे रुपये व दोन मोबाइल पोलिसांनी जप्त केले. पोलिस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. एपीआय जानकर यांच्या तक्रारीवरून कुंटणखाना चालक महिलेविरुद्ध पिटा अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला.

दोन वर्षांपासून सुरू
कुंटणखाना चालक महिलेला तीन महिन्यांपूर्वी गणेश कॉलनीतील एक महिला भेटली. ती मोलकरणीचे काम करते. या महिलेला घरकाम देण्याच्या आमिषाने आंटीने घरी बोलावले. या महिलेचा पती मजूर असून तिला एक मुलगी आहे. उदरनिर्वाह चांगला होत नसल्याने तिची आर्थीक अडचण होती. त्यामुळे पैशाचे आमिष दाखवून आंटीने तिला या कामी प्रवृत्त केले. गेल्या दोन वर्षांपासून हा कुंटणखाना सुरू होता. आंटी ग्राहकाकडून पाचशे रुपये घेत होती. पीडित तरुणीला तीनशे रुपये, तर दलाली म्हणून स्वतः दोनशे रुपये घेत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनी मानसिक रुग्णाविरोधात आता सुनावणी नाही

0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा सत्र न्यायालयाने खुनी हा मानसिक रुग्ण असल्याने त्याच्याविरोधातील सुनावणीला स्थगिती देण्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात मयताच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली असता ही याचिका फेटाळत न्या. पी. डी. नाईक यांनी सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

२०१३मध्ये आरोपी फजल सिंकदर पटेल याच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१४साली त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करत मानसिक रुग्ण असल्याचा दावा केला. तसेच मानसिक उपचारांसाठी वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करावे अथवा जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती केली होती. पण त्याचवर्षी सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्याविरोधात पटेल याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्या. टी. व्ही. नलावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ३२९अन्वये सुनावणी घेण्याचे सत्र न्यायालयाला आदेश दिले. कलम ३२९नुसार आरोपीने मनोरुग्ण असल्याचा दावा केल्यास व तसा अहवाल प्राप्त झाल्यास त्याच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्यात येते. दरम्यान येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी अहवालात एका ठिकाणी मनोरुग्ण, तर काही ठिकाणी मानसिकरित्या योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्याआधारे सत्र न्यायालयाने आरोपीविरोधात खटला चालविण्यास परवानगी दिली. त्यानाराजीने आरोपीच्या पत्नीने पुन्हा औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. आरोपीतर्फे अभयसिंह भोसले यांनी बाजू मांडली.

१६८ पानांचा अहवाल
नोव्हेंबरमध्ये खंडपीठाने सत्र न्यायालयाला पुन्हा सुनावणी घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर आरोपीच्या मानसिक स्थितीबाबत १६८ पानांचा अहवाल दाखल करण्यात आला. त्याआधारे सत्र न्यायालयाने आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याचा निर्वाळा दिला. या आदेशाविरोधात मृताचे वडील युसूफ खान यांनी पुन्हा आव्हान दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुजरातच्या ‘एमआर’चा लॉजमध्ये संशयास्पद मृत्यू

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुजरात येथील सर्जिकल कंपनीमध्ये ‘एमआर’ म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा मंगळवारी सायंकाळी लॉजमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शिवशक्ती लॉजमध्ये हा प्रकार घडला. राकेशभाई हसमूखभाई पटेल (रा. नारोडा, अहमदाबाद) असे या मृताचे नाव आहे.

पटेल कंपनीच्या कामानिमित्त २२ डिसेंबर रोजी शहरात आले होते. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शिवशक्ती लॉजमधील रुम क्रमांक सतरामध्ये ते थांबले होते. २४ डिसेंबरपासून त्यांचे गुजरात येथील नातेवाईक मोबाइलवर कॉल करीत होते, मात्र त्यांचा मोबाइल लागत नव्हता. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या रूममधून कुजकट वास येत होता. लॉजमालकाला संशय आल्याने त्यांनी दरवाजा वाजवत पटेल यांना आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर रूमचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आतमध्ये पटेल यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. क्रांतीचौक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पटेल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलवला. बुधवारी शवविच्छेदन झाल्यानंतर पटेल यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पीएसआय अनिल काचमांडे या प्रकरणी तपास करीत आहेत.

मृत्यूचे कारण अस्पष्ट
राकेश पटेल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. हा अकस्मात मृत्यू आहे की आत्महत्या अथवा घातपात आहे याचा काही निष्कर्ष सध्या निघालेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगाड्यांवर कारवाई करण्यामागे षड्यंत्र

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महापालिकेने पथविक्रेता अधिनियम २०१४ची अंमलबजावणी करावी, हॉर्कर्स झोन जाहीर करावे. त्यानुसार पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करावे, मात्र हे सर्व बासनात गुंडाळून पथविक्रेत्यांना हटविण्याचे षडयंत्र रचले आहे,’ असा आरोप शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे निमंत्रक अॅड. अभय टाकसाळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

टाकसाळ म्हणाले, ‘शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने मागील चार महिन्यांपासून हॉकर्स झोन तयार करा. पथविक्रेता अधिनियम लागू करा. हा अधिनियम लागू करण्यासाठी समिती तयार करा. समितीच्या देखरेखीखाली हॉकर्स झोन तयार कराव्यात. शहरात वीस हजारांच्या वर हॉकर्स आहेत. यातील अनेक जण वर्षानुवर्षे एका रस्त्यावर वाहतुकीला कोणतीही बाधा न पोहोचविता उभे राहून नागरिकांना स्वस्त वस्तू विक्री करतात. पथविक्रेत्यांचा परिवार चालत आहे. त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही कारवाई आवश्यक आहे. हा नियम लागू करण्याबाबत शहरातील शंभर ते दीडशे विक्रेत्यांकडून फार्म भरून घेण्यात आले होता. हे फार्म महापालिकेत देण्यात आले, मात्र ते महापालिकेने स्वीकारले नाहीत. आम्ही युनियनकडून वारंवार मागणी केल्यामुळे अखेर त्रयस्थ संस्थेकडून पथविक्रेत्यांचा सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या सर्वेक्षणात शहरातील विविध रस्त्यांवर उभे असलेले हॉकर्सचे गाडे दिसू नये यासाठी हॉकर्स हटविण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात आली,’ असा आरोप यावेळी टाकसाळ यांनी केला. पत्रकार परिषदेला अश्फाक सलामी, किरण पंडित यांच्यासह गुलमंडी आणि सिटीचौक येथील पथविक्रेत्यांची उपस्थिती होती.

आठ जानेवारीला धरणे आंदोलन
‘महापालिकेच्या कारवाईविरोधात तसेच पथविक्रेता अधिनियम लागू करा या मागणीसाठी आठ जानेवारी रोजी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती टाकसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्टः अखेर अजिंठ्यातील व्हिजिटर सेंटर सुरू

0
0


म. टा. प्रतिनिधी फर्दापूर
अखेर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील व्हिजिटर सेंटर पर्यटकांच्या वाहन पार्किंगसाठी सुरू करण्यात आले आहे. ‘मटा’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.

अजिंठा लेणी परिसरात जपान सरकारच्या मदतीने कोट्यवधी रुपये उधळून बांधलेले ‘अजिंठा व्हिजिटर सेंटर’ पाढंरा हत्ती ठरत असल्याने बंद करण्यात आले आहे. सलगच्या सुट्यांमुळे पर्यटंकाची गर्दी उसळल्याने नियोजनाअभावी पर्यटंकाची ताराबंळ उडत आहे. त्यांना वाहनेसुद्धा औरंगाबाद-जळगाव महामार्गावर दोन्ही बाजूने पार्किंग करावी लागत आहेत. त्यामुळे रोज या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या अजिंठा व्हिजिटर सेंटरचा उपयोग निदान पार्किंगसाठी तरी करावा. त्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल, असे वृत्त ‘मटा’ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पर्यटन महामंडळाने मंगळवारीच तातडीने हे व्हिजिटर सेंटर पार्किंगसाठी खुले करण्यात आले. याबद्दल पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही पार्किंगसाठी अजिंठा येथील व्हिजिटर सेंटर खुले करून दिले आहे. मंगळवारपासून येथे वाहनांचे पार्किंग सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे. - रोहिदास धनशेट्टी, व्यवस्थापक, एमटीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ विस्तार २०१८मध्ये?

0
0

<< Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद ः राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या तीन महिन्यांपासून नुसतीच चर्चा आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यास मुहूर्त लागणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची विस्ताराची शक्यता असून भाजपकडून आणखी तीन जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. त्यात मुंबईच्या अॅड. आशिष शेलारांसह दोन नव्या दमाच्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार, उद्या होणार याविषयी नुसतीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी याला होकार दिला, मात्र विस्तार कधी होणार याबाबत साशंकता होती. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच याबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच दिल्लीतून झाल्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात विस्ताराची चर्चा थंडावली होती.

दोन्ही राज्यातील सरकार स्थापनेनंतर आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने वेग घेतला आहे. मुंबईतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात समावेश करावयाच्या नावाची यादी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या तीन-चार दिवसांत त्यावर चर्चा होऊन नावे निश्चित होतील.

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांचा समावेश निश्चित मानले जात आहे. त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाईल. राणेंशिवाय आणखी तिघांचा समावेश होईल. त्यात मुंबईचे अॅड. आशिष शेलार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देताना त्यांच्या कामाचा आवाका, भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेसह, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देण्याचा निकष प्राधान्यक्रम म्हणून ठरविण्यात आला आहे.

दुय्यम खाते
विद्यमान मंत्रिमंडळातून काहींना डच्चू दिला जाईल, अशी चर्चा होती. पण निवडणुका आणि भविष्यातील वाटचाल पाहून या मंत्र्यांना काढून टाकण्यापेक्षा त्यांच्याकडे दुय्यम खाते सोपविण्याचा विचार श्रेष्ठींकडून केला गेला आहे. मंत्रिमंडळ विस्तार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा जोरदार कडाका; मराठवाडा गारठला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून गुरुवारी परभणीत निच्चांकी म्हणजे ५.६ सेल्सिअस अंशतापमानाची नोंद झाली. येत्या चार दिवसात तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील बहुतेक शहरांचे किमान तापमान दहा सेल्सिअस अंशाखाली आले आहे. शहरात गुरुवारी कमाल २८.७ आणि किमान १०.४ सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला असून चार दिवसांत पारा आणखी उतरणार आहे. परभणी शहरात सर्वाधिक कमी ५.६ सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली. परभणीचे स्वयंचलित हवामान केंद्र शहराबाहेर असून मोकळ्या जागेत आहे. त्यामुळे कमी तापमानाची नोंद होणे स्वाभाविक आहे, असे हवामान अभ्यासक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. मराठवाड्यात दोन जानेवारीपर्यंत तापमान आणखी घसरेल. नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीनेच होईल, असे औंधकर यांनी स्पष्ट केले. सध्या बहुतेक शहरातील तापमान १० अंशाच्या खाली आहे. ही परिस्थिती आठ दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भात थंडीची लाट आली आहे. मागील २४ तासांपासून नागपूरकरांना हुडहुडी भरविली आहे. बुधवारी सकाळी नागपुरात ७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले असून सामान्य तापमानापेक्षा तब्बल पाच अंशाने पाऱ्यात घसरण झाली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जुनी कामठी परिसरात एक ३५ ते ४० वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. खान्देशात गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा चांगलाच तडाखा बसत आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात दोन जणांचा थंडीने गारठून मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाची ११ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.

मराठवाड्यात दोन जानेवारीपर्यंत तापमान आणखी घसरेल. नवीन वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीनेच होईल. ही परिस्थिती आठ दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
- डॉ. श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडचा एसडीएम, स्टेनो लाच घेताना अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड व स्टेनो रत्नाकर साखरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजारांची लाच घेताना गुरुवारी दुपारी त्यांच्याच कार्यालयात अटक केली. जमिनीच्या दाव्याबाबत तहसीलदाराच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.
या प्रकरणातील तक्रारदाराची मौजे चांदापूर येथे वडिलोपार्जित २९ एकर २१ गुंठे कुळ जमीन आहे. या जमिनीबाबत तक्रादाराचे वडिल व चुलत्याने सबंधित व्यक्तीविरुद्ध दिवाणी व फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल तक्रारदाराच्या वडिलांच्या बाजुने लागला होता. दरम्यान, तत्कालीन तहसीलदारांनी जमिनीच्या खोट्या फेरफार मंजुरीला स्थगिती दिली होती. कुळ जमिनी संदर्भात नवीन आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती मिळाल्याने या तक्रारदाराने सिल्लोडच्या तहसीलदाराकडे अर्ज, तर उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपिल केले होते. तहसीलदाराच्या आदेशाला स्थगिती आदेश देण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांनी स्टेनो रत्नाकर साखरे यांच्या मार्फत ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे ही तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्याची पडतळणी केली असता माचेवाड यांनी तडजोड करत साखरे यांच्या मार्फत दहा हजारांची मागणी केली. स्टेनो साखरे याला गुरुवारी दुपारी दहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. या प्रकरणी पथकाने उपविभागीय अधिकारी अनिल गोविंदराव माचेवाड (वय ४२ रा. राजगृह, शासकीय निवासस्थान सिल्लोड) आणि रत्नाकर महादू साखरे (वय ५२ रा. अलका सोसायटी एन ९, हडको) या दोघांना अटक केली.
याप्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीपाद परोपकारी, अप्पर अधीक्षक जिरगे, उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक भरत राठोड, सचिन गवळी,‌ विजय बाह्मंदे, रवींद्र देशमुख, रवींद्र अंबेकर, सुनील पाटील व संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रयोगांनी लक्ष वेधले

0
0

प्रयोगांनी लक्ष वेधले
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘पिरॅमिड’च्या माध्यमातून संतुलित आहाराचे महत्त्व सांगणे असो की, ओव्हरटेकिंग करत असताना होणाऱ्या रस्ते अपघातावर एलईडीच्या सहाय्याने उपाय सांगणारा प्रयोग. वाहतुकीवर पर्याय म्हणून ‘एअरबस’चा पर्याय, तर आपल्या कल्पनेतील ‘स्मार्टसिटी’ही विद्यार्थ्यांनी उभारली आहे ती ‘जिल्हास्तरीय ग्रंथमहोत्सव’तील विज्ञान प्रदर्शनात.
शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे आजपासून ‘जिल्हास्तरीय ग्रंथमहोत्सव’ व ‘जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन’ सुरू झाले. सीएसएमएसएस शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात हा महोत्सव सुरू आहे. जिल्हाभरातील ९० विद्यार्थ्यांचे यासह शिक्षकांनी तयार केलेल्या निवडक शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापन, जलशयांचे संरक्षण कसे करावे इथपासून ते वाहतूक व दळणवळणाशी निगडित एअरबसचे प्रयोगही विद्यार्थ्यांनी सादर केले. स्मार्टसिटीचा संकल्पनेवर आधारीत प्रयोगही विद्यार्थ्यांनी सादर केले. छोट्या जागेत शहराचा रचना करताना, सोलार सिस्टीम, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षलागवड, रस्ते, आरोग्य व्यवस्था कशी असावी हे प्रयोगातून मांडत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले. शहरासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनावरील प्रयोगही पाहण्यासाठी गर्दी होती. महोत्सात शुक्रवारी ‘कथाकथन’ स्पर्धा रंगणार आहे. सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याच दिवशी सकाळी ११ वाजता कविसंमेलन होणार आहे. ३० रोजी वक्तृत्व स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे.
अध्यक्ष, सीईओ आलेच नाहीत
महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. देवायानी डोणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या उपस्थितीत होणार, असे शिक्षण विभागाने जाहीर केले, परंतु ते आले नाहीत. उद्‍घाटनाला शिक्षण व आरोग्य समिती सभापती मीना शेळके, महिला व बालकण्याण समिती सभापती कुसुम लोहकरे, जि. प. सदस्य अविनाश गलांडे, सीएसएमएसएसचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, अश्विनी लाटकर, प्राचार्य उल्हास शिंदे, प्राचार्य प्रा. गणेश डोंगरे, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, राकेश साकुंके, प्रदिप मोंढे यांची उपस्थिती होती.
शैक्षणिक साहित्यातही लक्षवेधक
शैक्षणिक साहित्य निर्मितीत लोकशिक्षण विषयात सादर करण्यात आलेले साहित्य उत्तम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळते. मी, शैक्षणिक साहित्यात सादर केलेली जी सापशीडी आहे. त्यातून हसत खेळत शिक्षण तर, मिळतेच पण आरोग्य शिक्षणही देता येते.

शैक्षणिक साहित्य निर्मितीत लोकशिक्षण विषयात सादर करण्यात आलेले साहित्य उत्तम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळते. मी, शैक्षणिक साहित्यात सादर केलेली जी सापशीडी आहे. त्यातून हसत खेळत शिक्षण तर, मिळतेच पण आरोग्य शिक्षणही देता येते.

एस. एम. पाठक
शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवांनी जपला सांस्कृतिक ठेवा

0
0

युवांनी जपला सांस्कृतिक ठेवा
राज्यस्तरीय युवा महोत्सवास सुरुवात

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

युवा कलाकारांच्या प्रतिभांची चाचणी घेणारा राज्यस्तरीय युवा महोत्सव २०१७-१८ मध्ये पहिल्याच दिवशी दर्जेदार सादरीकरण पहायला मिळाले. शास्त्रीय गायन, वादन, कथ्थक, भरतनाट्यम या शास्त्रीय कलाप्रकारांसह एकांकिकांद्वारे युवांनी स्पर्धेची शान उंचावली. त्यातच तब्बल ११ वर्षांनंतर औरंगाबादला महोत्सवाचे यजमानपद मिळाल्याने विभागानेही कौशल्य पणाला लावले होते.
क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवास गुरुवारी सुरुवात झाली. विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, महापौर नंदकुमार घोडेले, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक राजकुमार माहादावाड उपस्थित होते. या महोत्सवात औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, नांदेड, कोल्हापूर व पुणे या आठ विभागातून ४५० स्पर्धक सहभागी झाले आहेत. औरंगाबादला इतक्या वर्षांनंतर युवा महोत्सवाची संधी मिळाल्याचा खूप अभिमान वाटला. रंगभूमीवरच्या कसलेल्या कलाकारांमध्ये मराठवाड्याचे नावही अग्रेसर आहे अशा शब्दांमध्ये हरिभाऊ बागडे यांनी युवकांना प्रोत्साहित केले. तर भापकर यांनीही युवांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या कलेला वेळ द्या, असे आवाहन केले.
शास्त्रीय गायन, तबला व बासरीवादन या तीन स्पर्धांचा श्रवणीय सूरदरबार कानसेनांसाठी उत्तम संधी होता. तर कथ्थकमध्ये स्पर्धकांचा देखणा अंदाज नजर हटू देत नव्हता. " मोहे छेडत मोहन गिरीधारी...."," होली खिलनको चले कन्हैय्या.." "सकल मची धूम.." सारख्या रचनांवर नागपूर, मुंबई, अमरावती, लातूर, औरंगाबाद व नाशिकच्या ६ स्पर्धकांनी अतिशय दर्जेदार सादरीकरण केले. तर या विभागांशिवाय कोल्हापूर व पुणे संघातील ८ स्पर्धक भरतनाट्यममध्ये होते.
राज्यस्तरीय युवा महोत्सव १५ वर्ष वयोगटासाठी दहावीचे महत्त्वाचे वर्ष असूनही आपल्या आवडीला वेळ देणारे विद्यार्थी पहायला मिळाले. दहावीतही योग्य नियोजन केले तर अभ्यास व रियाज शक्य आहेत, अशी प्रतिक्रिया सुनील खिस्ती या पालकांनी ‘मटा’स दिली. त्यांची मुलगी जान्हवी तबला वादन स्पर्धेतील एकमेव मुलगी होती. भरतनाट्यममध्ये अमरावतीचा प्रेमकुमार निनगुरकर व नाशिकचा विकिराज कडाळे आणि कथ्थकमध्ये नाशिकच्या रोहीत जंजाळे यांनी अतिशय सुरेख नृत्य सादर केली. एकांकिका स्पर्धेने पहिल्या दिवशीचा समारोप झाला. लातूर संघाने 'दी मँसेज' एकांकिका सादर करून जोरदार सुरुवात केली. दी मँसेजने समाजातील वास्तव पुढे आणले.
याशिवाय अमरावती संघाने ' एकांक है', नागपूर संघाने 'क्या यम है हम' व कोल्हापूर संघाने 'अंधेर नगरी' एकांकिका सादर केल्या.
महोत्सवासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, भाऊराव वीर, लता लोंढे, सुभाष मुरकुंडे,किशोर पाठक, रमाकांत भालेराव, सुरेश मोरे,गणेश पवार, सुनील वानखेडे, एन. एन. धंदर, गुरूदीपसिंग संधू, पूनम नवगिरे, गोकुळ तांदळे, शैलेंद्र गौतम आदी परीश्रम घेत आहेत.

-----
चौकट:
आमदारांनी फिरवली पाठः
राज्यस्तरीय युवा महोत्सवाच्या पत्रिकेवर आमदार व खासदारांची नावे होती.मात्र हरिभाऊ बागडे वगळता कुणीच स्पर्धेस आले नाही. दुसरे म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा असूनही कलारसिकांची अनुपस्थितीही स्पर्धेत जाणवली. परीक्षकांनीही ही खंत बोलून दाखवली.
----
दोन दिवसाची संधी
राज्यस्तरीय युवा महोत्सव पाहण्याची संधी अजून दोन दिवस आहे. शुक्रवारी सकाळी १० ते २ कुचीपुडी, मणीपुरी व ओडीसी हे शास्त्रीय नृत्यप्रकार, दुपारी ३ ते ५ लोकगीत व सायंकाळी ५ पासून औरंगाबाद, पुणे, नाशिक व मुंबई विभागाच्या एकांकिका क्रीडा संकुलाच्या स्व. प्रा. कुमार देशमुख रंगमंचावर सादर होतील. तर स्व. प्रा. रुस्तुम अचलखांब रंगमंचावर सकाळी १० ते १ मृदूंग वादन स्पर्धा, दुपारी १ ते २ वक्तृत्व, २ ते ५ हार्मोनियम व सायंकाळी ५ पासून सितार, गिटार व वीणा वादन स्पर्धा होतील. शनिवारी स्पर्धेचा समारोप असून सकाळी १० ते १ लोकनृत्य स्पर्धा व दुपारी २ पासून बक्षीस वितरण कार्यक्रम होईल.
---

प्रतिक्रिया

'गुरुबीन ज्ञान अधुरा' अशी आपली परंपरा आहे. गुरू-शिष्य परंपरा आत्मसात करण्यासाठी अशा स्पर्धा खूप आवश्यक आहेत. आजच्या पिढीचा कल मनोरंजनात्मक प्रकारांकडे अधिक असला तरी या स्पर्धेत शास्त्रीय कलाप्रकार पाहून एक कलावंत म्हणूनही मला समाधान वाटले.
डॉ. भारत जेठवाणी, आंतरराष्ट्रीय कलावंत व परीक्षक
-------
मी बालपणापासूनच गाणे शिकते.राज्यस्तरीय स्पर्धेत गाणे सादर करताना खूप अभिमान वाटला.
किशोरी मुरके, शास्त्रीय गायिका, लातूर
----
आजोबा व बाबांनंतर तबलावादनाचा वारसा माझ्याकडे आला. स्पर्धा जिंकले तर छानच. नाही जिंकले तरी रियाजसाठी माझ्याकडे अजून खूप वेळ आहे.
जान्हवी खिस्ती, तबला वादक, अहमदनगर
----
माझे पण यंदा दहावीचे वर्ष आहे, पण डान्स सोडणे शक्य नव्हते. शिवाय राज्यस्तरीय स्पर्धेची संधी पुन्हा मिळाली नसती. स्पर्धा खूप कठीण असली तरी मी माझे बेस्ट दिले.
याशिका ढोले, भरतनाट्यम, नागपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरियाचे लाखभर बळी, लसीकरणाचा अभाव

0
0

डायरियाचे लाखभर बळी, लसीकरणाचा अभाव
दोन राज्यांतील सरकारी रुग्णालयांमध्ये लस झाली उपलब्ध, महाराष्ट्रात मात्र अजूनही प्रतिक्षेतच
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डायरियामुळे जगभरात दररोज दोन हजारपेक्षा जास्त मुलांचा मृत्यू होतो, तर भारतात दरवर्षी तब्बल एक लाखापेक्षा जास्त मृत्यू हे केवळ डायरियामुळेच होतात. तसेच आपल्या देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमधील सर्वाधिक मृत्युला डायरिया व निमोनिया हे दोन मोठे आजार सर्वाधिक कारणीभूत ठरतात. सुर्दैवाने दोन राज्यांतील सरकारी रुग्णालयांमध्ये डायरियावर लस उपलब्ध झाली आहे; परंतु महाराष्ट्रात ही लस अद्यापपर्यंत तरी उपलब्ध झालेली नाही. ही लस महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होऊन बालकांना दिली गेल्यास निम्मे मृत्यू टाळता येतील, असे तज्ज्ञ म्हणतात.

भारतासह बहुतांश विकसनशील देशांध्ये डायरियामुळे होणारे मृत्यू खूप जास्त आहेत. एकट्या भारतात डायरिया व निमोनियामुळे पाच वर्षांखालील किमान दोन ते तीन लाख बालकांचा दरवर्षी मृत्यू होतो. या गंभीर स्थितीमुळेच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात डायरियावरील ‘रोटाव्हायरस’ या लसीचा समावेश करावा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेने (आयएपी) केंद्र सरकारला दिला होता. त्यासाठी संघटनेने वारंवार पाठपुरावाही केला. त्यानंतर अलीकडेच केंद्र सरकारने ‘रोटाव्हायरस’ या लसीचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आणि दोन राज्यांमध्ये ही लस आता उपलब्ध होऊन त्या दोन राज्यांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध झाल्याचे समजते. मात्र आपल्या राज्यामध्ये ही लस काही उपलब्ध झालेली नाही. या लसीची आपल्या राज्यामध्ये प्रतीक्षा कधी संपणार व त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होणार, हा खरा प्रश्न आहे.

खासगीत दोन ते तीन हजारांवर खर्च

खासगीमध्ये या लसीचे दोन ते तीन डोस द्यावे लागतात, ज्याचा खर्च सुमारे दोन हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. निमोनियाच्या लसीचा खर्च तर तीन ते साडेतीन हजारांवर जातो. हा खर्च सामान्य तसेच गोरगरीब पालकांना झेपणारा नाही. त्यामुळे सर्व सरकारी रुग्णालयांच्या लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

८० टक्क्यांपर्यंत परिणामकारकता शक्य

हीच रोटाव्हायरस लस जर अमेरिका किंवा युरोपात दिल्यास तिची परिणामकारकता (इफिकसी) ९५ टक्क्यांपर्यंत असू शकते; परंतु आपल्या देशातील अनेक प्रकारचे विषाणू व जंतुंमुळे रोटाव्हायस लसीची परिणामकारकता ही ५० ते ६० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहू शकते. अर्थात, या लसीकरणाचे कव्हरेज १०० टक्के असेल तर हा विषाणू पसरण्याची शक्यता व क्षमता नक्कीच घटेल व लसीची परिणामकारकता ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये या लसीची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, असे मत ‘आयएपी’चे माजी राष्ट्रीय सचिव डॉ. प्रवीण मेहता यांनी ‘मटा’कडे व्यक्त केले.

डायरिया व निमोनियामुळे भारतात तीन लाख बालकांचा मृत्यू होतो. त्यामुळे दोन्ही आजारांच्या लसींचा समावेश राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात होणे गरजेचे आहे. ‘गावी’ तसेच ‘बिल गेटस फाऊंडेशन’सारख्या संस्थांकडून या लसी कमीत कमी शुल्कात सरकारला मिळू शकतात. याचा लाभ घेऊन सरकारने राज्यातील गोरगरीब बालकांना ही लस उपलब्ध करुन द्यावी.

– डॉ. राजेंद्र वैद्य, राज्य अध्यक्ष, आयएपी

९० टक्के डायरिया हा रोटाव्हायरस या विषाणुमुळे होतो. त्यामुळेच जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या आत रोटाव्हायरस लसीचे दोन डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी व जास्त लोकांमध्ये राहणाऱ्या बालकांना या लसीची जास्त गरज आहे.

– डॉ. मंजुषा शेरकर, शहराध्यक्ष, आयएपी

असा आहे डायरियाचा मोठा फटका

जगात डायरियाने दररोज होणारे मृत्यू……..२१९५

जगभरात ९ बालकांपैकी एकाचा मृत्यू डायरियामुळेच

भारतात दरवर्षी डायरियाने होणारे मृत्यू….एक लाख

भारतात ५ वर्षांपर्यंत डायरियाने होणारे मृत्यू….१३ टक्के

९० टक्के डायरियाला कारणीभूत असलेला विषाणू….रोटाव्हायस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वर्षात ‘वायफाय’ सुविधा

0
0

नवीन वर्षात ‘वायफाय’ सुविधा
विद्यापीठ कॅम्पसमध्ये कामाला गती
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कॅम्पस ‘वायफाय’ करण्याची घोषणा प्रशासनाने दोन वर्षांत अनेकदा केली. प्रत्यक्षात वायफाय सुविधा उपलब्ध झाली नाही. प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी ‘वायफाय कॅम्पस’साठी पुढाकार घेतला आहे. तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच कॅम्पस वायफाय होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
विद्यापीठ अधिक अद्ययावत करण्यासाठी वायफाय सुविधा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रकुशल करण्यासाठी इंटरनेट सुविधा मोफत देण्याची गरज आहे. या उद्देशाने विद्यापीठ कॅम्पस वायफाय करण्यात येईल असे प्रशासनाने जाहीर केले होते. २०१५ मध्ये कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी ‘वायफाय कॅम्पस’ सुविधा प्रत्यक्षात आणण्याचे जाहीर केले. मात्र, प्रशासकीय दिरंगाईने अजूनही सुविधा उपलब्ध झाली नाही. प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महिनाभरापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर ‘वायफाय कॅम्पस’ची योजना पुन्हा मांडली. तसेच पाठपुरावा करून कामाला गती दिली आहे. कॅम्पसमध्ये केबल्स टाकण्यात आले असून स्पॉट निश्चित केले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले. जगभरातील नवीन संशोधन आणि संधी इंटरनेटमुळे समजणे सहजशक्य होते. कॅम्पसमध्ये वायफाय सुविधा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक माहिती समजणार आहे. थेट दोन हजार विद्यार्थी व कर्मचारी योजनेचा फायदा घेणार आहेत. शहरात काही खासगी महाविद्यालयांनी वायफाय सुविधा दिली आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी काही विद्यार्थी संघटनांनी वायफाय सुविधेबाबत आक्षेप घेतला होता. या सुविधेमुळे विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत. इंटरनेटचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी होईल असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे सुविधा देण्याबाबत प्रशासन चालढकल करीत होते. मात्र, सुविधा देण्यासाठी इतर संघटनांसह विद्यार्थी आग्रही आहेत. त्यामुळे प्रशासनाने वायफाय सुविधा देण्यावर शिक्कामोर्तब केले. सध्या वायफाय यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वेगात काम सुरू आहे.
‘नॅक’साठी आवश्यक
‘नॅक’ मूल्यांकनासाठी पुढील वर्षी समिती विद्यापीठात येणार आहे. विद्यापीठातील अद्ययावत सुविधेत वायफाय सुविधेचा समावेश आहे. अभ्यासिका, प्रयोगशाळा, वर्ग अशा अनेक सुविधांसह वायफाय सुविधेची पाहणी समिती करणार आहे. पायाभूत सुविधांची त्रुटी असलेल्या विद्यापीठात किमान वायफाय सुरू करण्याची गरज आहे. ‘नॅक’ समितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या प्रारंभीच ‘वायफाय’ची भेट मिळेल असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विकासा’ची शनिवारपासून राष्ट्रीय परिषद

0
0

‘विकासा’ शनिवारपासून राष्ट्रीय परिषद

सीए इन्स्टिट्यूट-विद्यार्थी संघटनेचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चार्टर्ड अकाउटंट इन्स्टिट्यूटमधील विकासा या विद्यार्थी संघटनेतर्फे सीए विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सीए इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अल्केश रावका आणि ‘विकासा’चे अध्यक्ष रोहन आचलिया यांनी गुरुवारी (‌२८) पत्रकार परिषदेत दिली.

रावका म्हणाले, ‘शनिवारी व रविवार (३० व ३१ डिसेंबर) रोजी ही परिषद असेल. यासाठी आयसीएआयच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सहकार्य मिळाले आहे. तापडिया नाट्यगृह निराला बाजार येथे सकाळी ९ वाजता परिषदेचे उद्‍घाटन होईल. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या कार्यक़्रमाचे मुख्य अतिथी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून राजुरी स्टील ग्रुपचे संचालक डी. बी. सोनी यांची उपस्थिती राहणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता ‘जीएसटी-आणि पुढील वाटचाल’, साडेअकरा वाजता ‘आगामी दोन दशकात उपयोगी पडणारे कौशल्य चार्टर्ड अकाउंटन्सीत उपयगी ठरतील?’ या विषयावर सत्र होईल. दुपारी दीड वाजता ‘कॅपिटल मार्केटद्वारे संपत्तीत कशी वाढ होऊ शकते? किंवा ‘आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे भारताचे विकासविरुद्ध प्रत्यक्ष परिस्थिती’ यावर मार्गदर्शन केले जाईल. दुपारी साडेतीन वाजता ‘रेरा : ए गेम चेंजर’; ‘बँक करप्टसी लॉ.’ यावर मार्गदर्शन केले जाईल.

रविवारी दुसऱ्या दिवशीही भरगच्च कार्यक्रम होतील. यात सकाळी १० वाजता ‘सीए - नवा आणि जुना अभ्यासक्रम’ यावर मार्गदर्शन होईल. सकाळी ११ वाजता बीटकॉईन - दशा आणि दुर्दशा’, यावर व्याख्यान होईल. यानंतर दीड वाजता ‘अन्न विषबाधेपेक्षा धोकादायक विषारी विचार’ यावर विशेष सत्र होईल. दुपारी २ नंतर ‘सीए करिअर आणि प्रशासकीय सेवा’ यावर संतोष अजमेरा यांचे व्याख्यान होईल. या संपूर्ण दोन दिवसीय परिषदेत बोर्ड ऑफ स्टडजीचे अध्यक्ष अतुल गुप्ता, उपाध्यक्ष मंगेश किनारे, एफसीए संचालक अनिल भंडारी यांची उपस्थिती असेल. या दोन दिवसीय परिषदेसाठी ऐश्वर्या ब्रह्मेचा, रोहन खंडेलवाल, मंगिरी महातोळे, श्रेया लढ्ढा, रोहन मुगदिया, रश्मी तोतला, अभिनव शर्मा, कमलेश काकडे-पाटील आदी परिश्रम घेत आहेत. सीए विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अल्केश रावका यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला 'नाताळ' पावला

0
0

एसटीला 'नाताळ' पावला
सिबीएसला मिळाले ७२ लाखांचे उत्पन्न
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
नाताळ सणानिमित्त शाळेला तसेच शासकीय कार्यालयांना सुट्या होत्या. या सुट्ट्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या दीडपट वाढली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून निघणाऱ्या एसटी बसला चांगला प्रतिसाद मिळाला. नाताळाच्या सुट्ट्यांमुळे एसटी मध्यवर्ती बस स्‍थानकाला चार दिवसांत तब्बल ७२ लाखांचे उत्पन्न मिळाले.
नाताळ सणाच्या पूर्वी चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळाची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्या आल्या होत्या. तीन दिवस सुट्ट्यांमुळे एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली. अनेकांनी शुक्रवार तर अनेकांनी मंगळवारची सुट्टी टाकून परिवारासोबत परगावी जाण्याचे नियोजन केले होते. २३ डिसेंबरपासून एसटीच्या गाड्यांमध्ये गर्दी वाढत होती. सलग आलेल्या तीन शासकीय सुट्यांमुळे ही गर्दी चारही दिवस कायमच राहिली.
एसटी बसला मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीडपट अधिक प्रवासी मिळाले. आगार तिकिट बुकिंग आणि शिवनेरीसह शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढली होती. या नाताळच्या सुट्ट्यांमधून एसटी विभागाला ७२ लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती ‌वरिष्ठ आगार प्रमुख स्वप्निल धनाड यांनी दिली.
८० ते ९० टक्के भारमान
नाताळाच्या सुट्यांमुळे एसटी गाड्यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शुक्रवार ते सोमवार या चार दिवसात मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गावरील एसटी बसला ८० ते ९० टक्के भारमान मिळाला आहे, अशीही माहिती धनाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images