Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विकास योजेनतील सोळा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी लागणार हजार कोटी

$
0
0

विकास योजेनतील सोळा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी लागणार हजार कोटी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
विकास योजनेतील १६ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी किमान एक हजार कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. महापालिकेचे बजेट १४०० कोटी रुपयांचे असले तरी प्रत्यक्षात चारशे ते पाचशे कोटी रुपयांपर्यंतच बजेट प्रत्यक्षात येते. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी पालिका हजार कोटी रुपये कुठून आणि कसे उभे करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
रस्त्यांवरील अतिक्रमणे, शहर विकास योजनेतील रस्त्यांचे रुंदीकरण या विषयावर बुधवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सहा वर्षापूर्वी विकास योजनेतील बारा रस्त्यांचे रुंदीकरण केले. त्यानंतर ओम प्रकाश बकोरिया यांनी रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्याचा प्रयत्न केला. विकास योजनेतील सुमारे सोळा रस्त्यांच्या मार्किंगचे काम करण्याची घोषणा त्यांच्या काळात करण्यात आली. त्यातील राजाबाजार ते जिन्सी या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. दमडीमहल - चंपाचौक ते जालनारोड या रस्त्याच्या रुंदीकरणाची कारवाई देखील सुरू करण्यात आली. विकास योजनेतील रस्त्यांचे मार्किंग झाल्यावर एकानंतर एका रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पालिकेतर्फे हाती घेतले जाईल, असे मानले जात होते.
१६ रस्त्यांचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतल्यास महापालिकेला भूसंपादन करून रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागणार आहे. शासनाने भूसंपादनासंदर्भात ठरवलेल्या धोरणानुसार गावठाण क्षेत्रात रेडिरेकनर दराच्या तिप्पट मोबदला देणे बंधनकारक आहे. गावठाण व्यतिरीक्तच्या क्षेत्रात रेडिरेकनर दराच्या दुप्पट दर द्यावा लागणार आहे. या दरांचा विचार करता सोळा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पालिकेला किमान एक हजार कोटी रुपये खर्च येईल, असे मानले जात आहे. भूसंपादनाच्या कामासाठी शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे महापालिकेलाच भूसंपादनासाठीचा निधी उभारावा लागणार आहे. पालिकेच्या उत्पन्न आणि खर्चाचा विचार करता भूसंपादनासाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार फोडली, डीन बचावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे हे महाविद्यालयात जात असताना, त्यांची गाडी तरुणांच्या घोळक्याने अचानक अडवून फोडली. यात गाडीचा चालक गंभीर जखमी झाला, तर अधिष्ठाता डॉ. डांगे हे बालंबाल बचावले. याप्रकरणी अधिष्ठातांनी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.

डॉ. डांगे हे मंगळवारी (दोन जानेवारी) सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. बैठक आटोपून ते आपल्या कार्यालयात आले व काम आटोपून दुपारी घरी गेले. त्यानंतर ते आपल्या खासगी कारने (एमएच २०, ईई ४४४१) महाविद्यालयात येत असताना सांस्कृतिक मंडळाच्या परिसरात येताच तरुणांच्या घोळक्याने त्यांची गाडी अडवली आणि जोरदार हल्ला चढवला. दगडांच्या वर्षावात कारची काच फुटून कारचालक बाळू मुठाळ हे जखमी झाले. कारचे मोठे नुकसान झाले व मागे बसलेले डॉ. डांगे हे सुदैवाने बचावले.

जिवे मारण्याचा प्रयत्न
याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार डॉ. डांगे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. यात माझ्या गाडीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली असून, दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

वस्ताऱ्याने हल्ला
दरम्यान, शासकीय दंत महाविद्यालयाचा शासकीय चालक अय्युब खान हे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास टाउन हॉल परिसरातून दुचाकीवर येत असताना जमावाने त्यांना अडवून त्यांच्यावर वस्ताऱ्याने हल्ला केला. याच चालक अय्युब खान हे जखमी झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’चे निम्मे भूसंपादन १५ दिवसांत करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टानुसार येत्या १५ दिवसांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (२ जानेवारी) समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेची आढावा बैठक मोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत देण्यात आलेल्या पॅकेजप्रमाणे ५० टक्के भूसंपादन पूर्ण करावे, भूसंपादनाची कार्यवाही नियमानुसार पूर्ण करावी, जमीन खरेदीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करून खरेदीखत व प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी औरंगाबादला समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून खरेदी प्रक्रिया केली जात असल्याचे सांगितले. येत्या १५ दिवसा‌ंत ५० टक्के भूसंपादन करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ९२९ खरेदीखत केले आहेत. त्याद्वारे ५२९ हेक्टर जमीन संपादन झाले आहे.
गेल्यावर्षी एका वादग्रस्त प्रकरणात अडकलेल्या मोपलवार यांना व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात या पदाचा पदभार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भुषण गगराणी यांच्याकडे होता. या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता.

फतियाबादच्या शेतकऱ्यांनी घेतली भेट
जमिनीच्या दरासंदर्भात फतियाबादच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली व दर वाढवून देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी भूसंपादनाचे दर सुधारित करण्याची मागणी केली असून ही मागणी शासनाकडे कळवण्यात येईल, शासन निर्देशानंतर दरामध्ये बदल होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या परीक्षा केंद्रातूनही फुटला पेपर ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीए पेपरफुटीची व्याप्ती वाढली आहे. प्रश्नपत्रिकेचे तीन वेगवेगळे फोटो व्हॉट्स अॅपच्या ‘फ्युचर मॅनेजर’ या ग्रुपवर पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन फोटो नाईक कॉलेज, तर तिसरा फोटो हा दुसऱ्या परीक्षा केंद्रावरून आल्याचे तपासणीत आढळले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

परीक्षा सुरू होताच सहाव्या मिनिटाल एमबीएच्या ‘अकाउंटिंग फॉर मॅनेजर्स’ विषयाचा पेपर व्हॉट्स अॅपवरून बाहेर आला. याप्रकरणी सोमवारी तीन जणांना काल ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मोबाइल, पुस्तके जप्त करण्यात आली. ज्या ग्रुपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल झाली, त्याच्या तपासणीत या प्रकरणाची व्यापकता मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे, शिवाय यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त आहे. ग्रुपवरून पाठवलेल्या प्रश्नपित्रकेच्या तीन फोटोपैकी दोन फोटोवरील परीक्षा केंद्राचा कोड वसंतराव नाईक कॉलेजचा आहे. तिसऱ्या फोटोवरचा कोड वेगळा आहे. त्यामुळे इतर केंद्रावरूनही प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे चर्चा आहे.

ग्रुपवर पेपर पाठवलेल्या विद्यार्थ्याचे नावही ग्रुपवर आहे. त्याबाबत पोलिस खातरजमा करत आहेत. विभागात सहा परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू आहे. त्यापैकी शहरात वसंतराव नाईक व देवगिरी टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट महाविद्यालय हे दोन केंद्र आहेत. सोमवारी पकडलेला विद्यार्थी देवगिरी कॉलेजचा आहे. वर्णमालेनुसार शहरात ‘ए’ टू ‘एन’ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नंबर देवगिरीला परीक्षा केंद्रावर, ‘एन टू ‘झेड’ पर्यंतचे नंबर वसंतराव नाईक कॉलेज केंद्रावर आला आहे. ग्रुपवर ज्या विद्यार्थ्यांने पेपर पाठविला त्याचा नंबर देवगिरीत आल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबित कटकेंच्या दालावरील नेमप्लेट काढली

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील कुळ तसेच कनिष्ठ वतन प्रकारातील वर्ग दोन जमिनींच्या नियमबाह्य विक्री परवानगी प्रकरणात निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या दालनाबाहेर त्यांच्या नावाचा उल्लेख असलेली नेमप्लेट नेमप्लेट मंगळवारी (२ जानेवारी) काढण्यात आली.
कटके यांचा पदभार उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्याकडे यापूर्वीच देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुळ तसेच कनिष्ठ वतन प्रकरातील जमिनीच्या नियमबाह्य विक्री परवानग्या दिल्याप्रकरणी कटके यांच्यावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी चौकशीअंती निलंबनाची कारवाई केली होती. कटके यांच्या निलंबनानंतरही सामान्य प्रशासन विभागाच्या दारावर त्यांच्या नावाची नेमप्लेट कायम होती. त्यामुळे कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांना कटके हे उपजिल्हाधिकारी म्हणून नोकरीत कार्यरत असल्याबाबत चुकीचा संदेश जात होता. त्यामुळे ही नेमप्लेट काढून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला ७० लाखांचा फटका

$
0
0

एसटीला ७० लाखांचा फटका
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर मंगळवारी एसटीच्या बसची वाहतूक थांबविण्यात आली. आंदोलकांनी दोन दिवसांत २२ साध्या बस फोडल्या. आंदोलकांनी एसटीच्या शिवशाही बसलाही लक्ष्य करून आगारात उभ्या असलेल्या तीन बसवर दगडफेक करून बस फोडल्या. या आंदोलनामुळे प्रवाशांना दिवसभर ताण सहन करावा लागला, तर एसटी बस बंद ठेवल्यामुळे एसटीचे ७० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.
कोरेगाव भीमा येथे सोमवारी (एक जानेवारी) दुपारी हल्ला झाल्याची बातमी पसरली. त्यानंतर भडकल गेट येथे दोन एसटीच्या बसवर दगडफेक करण्यात आली. याशिवाय पैठण रोडवर तीन बसवर दगडफेक केली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत १८ एसटी बस फोडण्यात आल्या होत्या. मंगळवारी (२ जानेवारी) सकाळीही औरंगाबाद विभागातील बसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. सकाळी सत्रात चार बस फोडण्यात आल्या. यानंतर साडेनऊच्या सुमारास एसटीने बस सोडणे बंद केले. दुपारी तीनच्या सुमारास औरंगाबाद-पुणे मार्गावर २५ बस पोलिस बंदोबस्तात सोडण्यात आल्या होत्या.
या आंदोलनात ‌एसटीच्या २५ बस फोडल्यामुळे चार लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय एसटीचे सुमारे ९५ लाखांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
प्रवासी ताटकळले
मंगळवारी एसटी बसची वाहतूक थांबविण्यात आली होती. या बसमधील प्रवासी बस स्‍थानकावरच अडकले. काहिंनी स्थानकावर जेवण केले. ग्रामीण भागातील अनेकांनी आपल्यासोबत आलेले डबे खाऊन बसची वाट पाहत होते. रात्री उशिराही दुसऱ्या शहराच्या बसला बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर पाणी योजनेला थारा देऊ नकाः पालकमंत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागरिकांवर जाचक अटी लादणाऱ्या समांतर जलवाहिनीच्या पीपीपीतत्वावरील (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) योजनेला थारा देऊ नका, अशा शब्दात पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बजावले. त्यामुळे ‘समांतर’च्या आडून कदम यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे.
महापालिकेत महापौरपदी नंदकुमार घोडेले व सभागृहनेतेपदी विकास जैन यांची नियुक्ती करून खैरे यांनी कदम यांचा महापालिकेतील हस्तक्षेप मोडित काढला. त्यामुळे कदम यांच्या समर्थक नगरसेवकांचे पालिकेतील स्थान कमी झाले आहे. संघटनात्मक कामातही खैरे यांनी गेल्या काही महिन्यात औरंगाबाद शहर व जिल्ह्यात कदम यांना कोंडित पकडल्याचे मानले जात आहे. संघटनात्मक कामात असलेले कदम यांचे समर्थक देखील काही महिन्यांपासून बाजुला पडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांनी समांतर जलवाहिनीच्या संदर्भात अधिकाऱ्यांची केलेली कानउघाडणी खैरे यांच्यावर कुरघोडी करणारी असल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सकाळी आठ वाजता सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत त्यांनी समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाबरोबरच हैदराबाद मुक्तीसंग्राम संग्रहालय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन, विमानतळा समोरील पर्यटननगरी, डॉ. आंबेडकरनगरात उभारण्यात येणारे ५० खाटांचे हॉस्पिटल, जांभुळबन, संत एकनाथ रंगमंदिराचे नुतनीकरण या कामांचा आढावा घेतला. ही सर्व कामे वेगाने पूर्ण करा, असे आदेश त्यांनी दिले.

जाचक अटीवर रोष

समांतर जलवाहिनीचे काम पीपीपीतत्वावर सुरू व्हावे यासाठी खासदार खैरे यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. नागरिकांवर बोजा टाकून पीपीपीतत्वावरची समांतर जलवाहिनीची योजना होणार असेल, तर अशा योजनेला थारा देऊ नका, अशा स्पष्ट शब्दात कदम यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बजावले. दरवर्षी पाणीपट्टीत केली जाणारी दहा टक्के वाढ रद्द झाली पाहिजे, त्याच प्रमाणे अन्य जाचक अटी रद्द झाल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहमार्गावर टायर जाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
एकनाथ नगर रेल्वे क्रॉसिंग गेट जवळील लोहमार्गावर दुपारी अडीचच्या सुमारासन काही अज्ञात व्यक्तींनी टायर जाळून फेकले होते. ते हटविण्यासाठी गेलेल्या ‘जीआरपी’ आणि ‘आरपीएफ’ पथकावर दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे दीड तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस आणि हैदराबाद पॅसेंजर या रेल्वेंचे प्रवासी खोळंबले.

लोहमार्गावर जळते टायर फेकल्याचा संदेश रेल्वे प्रशासनाला आला. त्यामुळे लोहमार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी रेल्वे अधिकारी, लोहमार्ग पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे पोलिस दलाचे (आरपीएफ) अधिकारी घटनास्थळी पोचले. तेथे त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. या घटनेत जीआरपीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश बनसोडे आणि आरपीएफचे अधिकारी अरविंद शर्मा हे जखमी झाले. या रेल्वे अधिकाऱ्यांनी जमावाला रोकण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावांने जोरदार दगडफेक सुरू केल्याने त्यांना अखेर माघार घ्यावी लागली. यानंतर शहर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर शहर पोलिसांचा ताफा एकनाथ नगर रेल्वे क्रॉसिंगवर दाखल झाला. जमावाला पांगण्यासाठी अश्रुधूराच्या कांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.तत्पूर्वी मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस चिकलठाणा रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आली, तर औरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजरला औरंगाबाद स्टेशनवरच थांबवून ठेवण्यात आली होती.

असा मिळाला संदेश
मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसवर काही अज्ञात व्यक्ती दगडफेक करण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेलवे सुरक्षा दल आणि ‘जीआरपी’ला गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. त्याआधारावर रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी एकनाथनगर रेल्वे क्रॉसिंगवर पोचले होते. तेथे पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लखपती थकबाकीदारांनी भरले अडीच कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांविरुद्ध कारवाई सुरू करताच महावितरणच्या तिजोरीत दोन कोटी ४६ लाख रुपये आले आहेत. या मोहिमेत २८६ लखपती थकबाकीदारांनी बिल भरले असून १६५ थकबाकीदारांची वीज कापण्यात आली आहे.

एका स्‍थानिक स्वराज्य संस्‍थेच्या पदाधिकाऱ्याच्या पैठण रोडवरील हॉटेलचे दोन लाख रुपयांचे वीजबिल थकले होते. वारंवार सूचना देऊनही बिल भरले जात नव्हते. संबंधित पदाधिकाऱ्यांनी बिलात त्रुटी असल्याचे सांगत होते. पण, लखपती थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम हाती घेताच या पदाधिकाऱ्यांने बिल भरले. एका माजी पदाधिकाऱ्याने वीजबिल भरणा मोहिमेतील पथकावर एक वर्षापूर्वी तलवार उगारली होती. त्यानेही बिल भरल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
औरंगाबाद परिमंडळात एक लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल असले २२५५ ग्राहक असून त्यांच्याकडे ४३ कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ९८७ वीज ग्राहकांचे वीज मोहिमेपूर्वीच खंडित करण्यात आली आहे. त्यांच्याकडे १७ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे. सध्याच्या कार्यवाहीत १६५ ग्राहकांची वीज तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तीन कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा विद्यापीठात कडकडीत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोरेगाव भीमा दंगलीचे शहरात तीव्र पडसाद उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध सभा घेतली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रशासकीय कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिवसभर विद्यापीठात शुकशुकाट होता.

भीमा कोरेगाव येथील दंगलीचे शैक्षणिक वर्तुळातही तीव्र पडसाद उमटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी सकाळी प्रशासकीय कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली. त्यामुळे कार्यालयात आलेले कर्मचारी सकाळी अकरा वाजता घरी गेले. याबाबत कुलगुरू व कुलसचिवांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवसभरात कोणतेही प्रशासकीय काम झाले नाही. कामानिमित्त आलेले बाहेरगावचे विद्यार्थी व नागरिक बंद पाहून परतले. स्टुटंड्स फेडरेशन ऑफ इंडिया, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनांनी विद्यापीठात निषेध सभा घेतली. भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर दगडफेक करण्याची घटना निषेधार्ह आहे. याप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली. यावेळी सुनील राठोड, अमोल खरात, नितीन वाव्हळे, प्रकाश इंगळे, सत्यजीत म्हस्के, लोकेश कांबळे, प्राजक्ता यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थी रस्त्यावर
शहरात ठिकठिकाणी दगडफेक आणि रास्ता रोको करण्याचे प्रकार घडले. विद्यापीठ ते मिलिंद कॉलेज रस्त्यावर विद्यार्थ्यांनी लोखंडी खांब रस्त्यावर आडवा पाडला. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून घटनेचा निषेध केला. काही वेळेनंतर खांब रस्त्याच्या कडेला उचलून ठेवण्यात आला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

शाळा, कॉलेज बंद
औरंगाबाद : नाताळाच्या सुट्यानंतर सोमवारी शाळा सुरू झाल्या, परंतु शहरात तणावाचे वातावरण असल्याने अनेक शाळांनी सकाळीच शाळा सोडून दिल्या. कॉलेजांमध्येही शुकशुकाट होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलली.

नाताळाच्या सुट्या २४ डिसेंबरपासून लागल्या होत्या. सुट्यानंतर मंगळवारपासून शाळा सुरू होणार होत्या. दंगलीचे शहरात पडसात उमटले अाणि आज शाळांनीही कडकडीत बंद पाळला. शाळांमध्ये सकाळी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच होती. काही शाळांनी विद्यार्थ्यांना सोडून देत सुटी जाहीर केली. बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्याने उद्याही अनेक शाळा बंद असतील, असे शाळांनी पालकांना कळविले आहे. कॉलेजही मंगळवारी बंद होते.

विद्यापीठाची परीक्षा रद्द
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी होणारे पेपर रद्द करण्यात आले आहेत. मंगळवारी ‘एमए’ आणि ‘एमबीए’ अभ्यासक्रमांचा पेपर होते. परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सकाळी साडेआच वाजता विद्यापीठ प्रशासनाने कॉलेजांना कळविले. प्रश्नपत्रिका डाउनलोड करू नयेत, असाही निरोप पाठविला. त्यानंतर कॉलेजांनी परीक्षार्थींना पेपर रद्द करण्यात आल्याचे सांगितले. बुधवारी (दोन जानेवारी) होणारी परीक्षाही रद्द केले जाण्याची शक्यता आहे. संबंधित पेपर कधी होणार याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन नियंत्रणचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीची ‘डीपीसी’कडे वीस कोटींची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वतीने विविध उपकरणांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे २०१८-१९ या वर्षासाठी २० कोटी ४२ लाख ५१ हजार ७२२ रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (२ जानेवारी) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घाटीचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ही निधीची मागणी सादर केली.
यापूर्वी २०१६-१७ या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीकडून घाटीसाठी तीन कोटी ५४ लाख ५६ हजार ८५६ रुपये मंजूर झाले होते. यापैकी मार्च २०१७ पर्यंत यातील संपूर्ण रक्‍कम घाटी प्रशासनाने खर्च केली होती. यानंतर २०१७-१८ या वर्षासाठी घाटीसाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले व सर्व रक्‍कम खर्चही झाली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त घाटी प्रशासनाने मॉड्युलर ओटी, व्हेंटिलेटर आदी विविध यंत्रसामग्रीसाठी तब्बल २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. उपअधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे या मागणीचे पत्र सोपविले. यापैकी किती रक्‍कम मंजूर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘दंत’ची सव्वा पाचकोटींची मागणी

घाटीसह शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीकडे सव्वापाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी सादर केली. या निधीतून अनास्थेशिया वर्क स्टेशन, व्हेंटिलेटर आदी उपकरणांची खरेदी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित संचारबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ शहरात दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. शहरातील विविध भागात जमावाने दगडफेक करीत वाहनांचे, दुकानांचे नुकसान केले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला; तसेच रमानगर भागात हवेत गोळीबार, तर आठ ते दहा ‌ठिकाणी अश्रुधूराचा मारा करण्यात आला. संपूर्ण शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता होती. दगडफेकीमध्ये सात पोलिस जखमी झाले आहेत. यामध्ये एका एसीपीसह दोन निरीक्षकांचा समावेश आहे. दगडफेक करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोरेगाव भीमा येथे सोमवारी घडलेल्या दंगलीच्या घटनेचे पडसाद सोमवारी दुपारपासून शहरात उमटायला सुरुवात झाली होती. संतप्त जमाव मंगळवारी सकाळपासून ‌पुन्हा रस्त्यावर उतरला. शहरातील सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर, जटवाडा रोड, रांजणगाव, उस्मानपुरा, एकनाथनगर, रमानगर, टाउन हॉल आदी ठिकाणी हा जमाव जमला होता. जमावाने हिंसक होत खाजगी वाहने, एसटी बस यांना लक्ष्य केले. घोषणाबाजी करीत हा जमाव दगडफेक करीत होता. सिद्धार्थनगर येथे मोठा जमाव जमल्याने पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी फौजफाट्यासह सिद्धार्थनगर गाठले. वारंवार आवाहन करूनही जमाव एकण्याच्या स्थितीत नव्हता. पोलिसांच्या दिशेने देखील जमावाने दगडफेक केली. अखेर पोलिसांनी अश्रुधूराचा मारा; तसेच सौम्य लाठीमार करीत जमाव पांगवला. दुपारपर्यंत या भागात तणाव कायम होता.

रमानगर, रांजणगाव, जोगेश्वरीत गोळीबार
जालना रोडवरील रमानगर भागात देखील मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. येथील चारचाकी वाहनांचे शोरूम जमावाच्या दगडफेकीचे लक्ष्य ठरले. दुकाने बंद करण्यास या जमावाने भाग पाडले. पोलिसांना या जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले, मात्र जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. त्यानंतरही जमाव नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या. वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव व जोगेश्वरी येथे देखील संतप्त जमावाला पांगवण्यासाठी रबरी गोळ्याचा वापर करीत हवेत गोळीबार करण्यात आला.

एकनाथनगर, पीरबाजारमध्ये तणाव
पीरबाजार, एकनाथनगर, आनंद गाडे चौकात देखील पोलिस व जमाव समोरासमोर आले. येथील जमावाने जोरदार दगडफेक करीत दुकाने बंद केली. पोलिसांना अडथळा निर्माण करण्यासाठी रस्त्यावर टायर, लाकडी टेबल जाळण्यात आले. येथील एका शाळेत जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. जमावाची दगडफेक सुरूच असल्याने या ठिकाणी देखील अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या ठिकाणी जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांनी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पीरबाजार गाठले. मोठ्या फौजफाट्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

अन्य भागातही दगडफेक
शहरातील आंबेडकरनगर, जाफरगेट, जुना मोंढा, जटवाडा रोड, हर्सूल, घाटी परिसर आदी ठिकाणी जमावाकडून दगडफेकीचे प्रकार घडले. दुकानाच्या दिशेने दगडफेक करण्यात येत होती. गटागटांने फिरून या जमावाकडून घोषणाबाजी व दगडफेक करण्यात येत होती. टिळकपथ, गुलमंडी टीव्ही सेंटर यां भागात देखील जमाव होता.

पेट्रोल बाँब आढळला
आंबेडकरनगर भागात देखील जमावाकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या ठिकाणी एका टपरीखालून पोलिसांनी पेट्रोल बाँब जप्त केला. बाटलीमध्ये पेट्रोल भरून त्याच्या झाकणाला वात लावून हा बाँब तयार करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी हा बाँब नष्ट केला.

रस्त्यांवर शुकशुकाट
शहरात सकाळपासून तणावपूर्ण वातावरण असल्याने व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली. औरंगपुरा, गुलमंडी, मछलीखडक, सिटीचौक, टिळकपथ, टीव्ही सेंटर, गजानन महाराज चौक, शहागंज आदी बाजारपेठेची ठिकाणे बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.

वाहनांचे नुकसान
संतप्त जमावाकडून पोलिसांची शासकीय वाहने व अनेक खासगी वाहनांना लक्ष्य करण्यात आले. टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर भागात, तर प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. सिद्धार्थनगर, पीरबाजार, शिवशंकर कॉलनी, भोईवाडा, ‌जळगाव रोड, रामनगर, चिकलठाणा, हर्षनगर, जटवाडा रोड आदी ठिकाणी सुमारे शंभर खासगी वाहनांची जमावाकडून तोडफोड करण्यात आली. जाफरगेट भागात एका हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची कार अज्ञात तरुणांनी पेटवून पलायन केले.

सुभेदारीत नेत्यांसोबत बैठक
सुभेदारी विश्रामगृहात पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काही नेत्यांसोबत शांतता समितीची बैठक घेतली. शांतता राखण्याचे आवाहन भारंबे यांनी केली.

मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त
हिंसक जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, विनायक ढाकणे सातत्याने विविध भागात गस्त घालीत होते. संवेदनशील ठिकाणी; तसेच महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट नेमण्यात आले होते. राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आल्या होत्या.

महापालिका शाळांना आज सुट्टी
‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन आणि शहरातील सध्याची स्थिती लक्षात घेता महापालिकेच्या सर्वच्या सर्व ७२ शाळा बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पालिकेच्या सर्व शाळा बुधवारी बंद राहतील, असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. पालिकेच्या शाळेतून १७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

संचारबंदी नव्हे; जमावबंदीचे आदेश ः जिल्हाधिकारी
कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर काही भागात पडसाद उमटले असले, तरी परि‌स्थिती नियंत्रणात असून, यंत्रणांकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे. शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, संचारबंदीचे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगाड्या - फेरीवाल्यांनी व्यापले रंद रस्ते

$
0
0

हातगाड्या - फेरीवाल्यांनी व्यापले रंद रस्ते
पालिकेची कारवाई तोंडदेखली
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
रुंद करण्यात आलेले रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची महापालिकेची घोषणा हवेतच विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहा दिवसांत दोनवेळा पालिकेने रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे पालिकेने केलेली कारवाई तोंडेदखली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी २०११ यावर्षी शहर रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवली व बारा रस्त्यांचे रुंदीकरण केले. शहराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेमुळे मुख्य रस्ते रुंद झाले, अरुंद रस्त्यांमुळे वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक रुंद झालेल्या रस्त्यांमुळे सुरळीत होईल, रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा होईल, असे मानले जात होते, परंतु सहा वर्षांच्या काळात महापालिकेला रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करता आला नाही. रुंद करण्यात आलेले रस्ते हातगाड्या आणि फेरीवाल्यांमुळे रस्ते अधिकच अरुंद झाले. रुंद करण्यात आलेल्या रस्त्यांवरची अतिक्रमणे हटविण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी पालिका आयुक्तांकडे वारंवार केली, पण त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही.
काही दिवसांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची घोषणा केली व तसे आदेश अतिक्रमण हटाव विभागाला दिले. दहा दिवसांत या विभागाने पोलिसांच्या मदतीने दोनवेळा सायंकाळच्या वेळी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. या कारवाईच्या नंतरही रस्त्यांवरची अतिक्रमणे आहे तशीच आहेत. त्यामुळे पैठणगेट ते सिटीचौक, बाराभाई ताजीया ते औरंगपुरा, शहागंज ते सिटीचौक या प्रमुख बाजारपेठेतील रस्त्यांवरून दुचाकी वाहने चालवणे कठीण झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. महापौरांनी आदेश देऊनही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सलग केली जात नसल्यामुळे पालिका प्रशासन महापौरांचे ऐकत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभियोग्यता चाचणी’ची उत्तरसूची जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियोग्यता व बुध्‍दिमत्ता चाचणी परीक्षेची उत्तरसूची परिषदेने जाहीर केली. त्यातही चुका असल्याचे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. उत्तरसूचीवरील आक्षेप दहा दिवसांत नोंदवावा, असे परिषदेने केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठीच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी १२ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेची उत्तरसूची परिषदेने आपल्या वेबसाइटवर जाहीर केली. परीक्षेतील गलथान कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर उत्तरसूचीवरूनही संभ्रमाची अन् वादाची शक्यता आहे. यात अनेक पर्याय सारखेच असल्याचे दर्शविण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षा विषय ज्ञानावर नाही असे सांगिण्यात आले, परंतु त्यावरच अधिक प्रश्न आले. इतिहासाच्या विद्यार्थ्याला विज्ञानाचे प्रश्न, काठिण्य पातळीही अधिक अशा तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत. त्यामुळे परीक्षेनंतरही विद्यार्थी अन् परीक्षा परिषदेत वाद होण्याची शक्यता आहे. आयुक्तांनाची भेट घेऊन, निवेदन देण्याची प्रक्रिया करणार असल्याचे डीटीएड, बीएडधारक विद्यार्थी असोसिएशनने केले आहे.

आक्षेपासाठी दहा दिवस

उत्तरसूचीवर आक्षेप असतील तर विद्यार्थ्यांना दहा दिवसांत कळवायचे आहेत. परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाइटवर हे आक्षेप नोंदविण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना केल्या आहेत. उत्तरसूचीत त्रुटी असल्याचे विद्यार्थी सांगत असल्याने आक्षेप वाढतील. आक्षेपाच्या छाननीनंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग, बाजारपेठा बँका, एटीएम बंद

$
0
0

औरंगाबाद : कोरेगाव ​ भीमा येथील घटनांचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले. याचा परिणाम उद्योग, मोठ्या बाजारपेठा, छोटे व्यावसायिक, बँक, एटीएम आणि कामगार आदींवर झाला. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी मंगळवारी दालने बंद ठेवली होती. औद्योगिक वसाहतीवर परिणाम झाला. शहरातील बँका, एटीएम बंद होते. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.

चिकलठाणा, वाळुूज, शेंद्रा, रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील उद्यागांवरही विपरीत परिणाम झाला. काही ठिकाणी‌ शिफ्ट बंद करण्यात आल्या होत्या. औरंगाबादमधील तब्बल दोन हजारांहून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्यांचे व्यवहार मंगळवारी बंद होते. औद्योगिक वसाहती गेल्या तीन दिवसांपासून बद आहेत. उद्योगांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. माझ्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली, असे चेंबर ऑफ मराठवाडा अँड इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.

शहरातील एसबीआयसह विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा व खासगी बँकांच्या शाखा दिवसभर बंद होत्या. त्याचबरोबर ३५० एटीएम बंद करण्यात आली होती. बँकांना दोन दिवस सुट्या होत्या. त्यानंतर मंगळवारी बँका सुरू झाल्या होत्या, पण लगेचच बंद कराव्या लागल्या. यामुळे धनादेश वटणे, ऑनलाइन व्यवहार, आर्थिक रोखीचे व्यवहार बंद झाले होते, असे बँकांच्या सूत्रांनी सांगितले. आजची परिस्थिती पाहून एटीएममध्ये रकमेचा भरणा करण्यात आला नाही, असे एसबीआयच्या एटीएम चॅनल विभागातून सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनीही, छोटे-मोठे व्यावसायिकांनी आज दुकाने बंद ठेवल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासकामे मुदतीत पूर्ण कराः पालकमंत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
जिल्ह्यातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे विविध विभागांना देण्यात आलेला निधी खर्च करून विकासकामे मुदतीत पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (२ जानेवारी) पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड, महापालिका आयुक्त डॉ. डी. एम. मुगळीकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल आदींची उपस्थिती होती. सर्व विभागांनी कामे वेळेत पूर्ण करावी, ज्या विभागांना अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे अशा विभागांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असे सांगत संत एकनाथ रंगमंदिर आणि संत तुकाराम महाराज नाट्यगृहाच्या विकासकामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्‍ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ज्या विभागांची कामे प्रलंबित आहेत, अशा विभागांनी मुदतीत कामे पूर्ण करावी, अशा प्रलंबित कामांची जबाबदारी ठरवून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीए पेपरफुटी प्रकरण; त्रिसदस्यीय चौकशी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एमबीए’ च्या पेपरफुटीप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तीन जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही चौकशी आठ दिवसात पूर्ण करण्यात येणार असून रद्द झालेल्या विषयाची परीक्षा कधी होणार, हा प्रश्न कायम आहे.
वसंतराव नाईक कॉलेजच्या परीक्षा केद्रांवर सोमवारी एमबीए अभ्यासक्रमाचा ‘अकाउंटिंग फॉर मॅनेजर्स’ या विषयाचा पेपर सहा मिनिटात व्हॉट्स अॅपवर फुटला. याप्रकरणी पोलिसांनी परीक्षार्थीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परीक्षेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने विशेष कार्यअधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय साळुंके या तिघांची समिती नेमली आहे. ही समिती आठ दिवसात समिती चौकशी करून अहवाल देणार असल्याचे कळते. बंदी असताना विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात मोबाइल कसा नेला, परीक्षा केंद्रावरील रचना, विद्यार्थ्यांनी तांत्रिक मदत कशी घेतली, याची चौकशी समिती करणार असल्याचे कळते.

चौकशी समितीवर आक्षेप?

परीक्षेत कॉपी करू द्या, असे फोन विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्यांकडून येतात, असा आरोप संबंधित कॉलेजांमधील प्राध्यापकांनी केला आहे. त्यामुळे हे अधिकारी कोण? याची चर्चा दिवसभर होती. त्यासह सलग तीन वर्षांपासून कॉलेजला ‘एमबीए’चे केंद्र देण्यात येत असल्याने हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. विद्यापीठाने नेमलेल्या समितीमधील सदस्यांवरही आक्षेप येण्याची शक्यता असल्याने पेपरफुटीचा छडा विद्यापीठ कसा लावते याकडे लक्ष राहील.

सहकेंद्रप्रमुखच नाही

परीक्षा केंद्रावरील परीक्षा सुरळीत होण्यासाठी बाहेरील कॉलेजमधील प्राध्यापकाची सहकेंद्रप्रमुख (जेसीएस) म्हणून नेमणूक करण्यात येते. वसंतराव नाईक कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर कॉलेजचे डॉ. आर. बी. वनारसे यांची नियुक्ती करण्यात आली. २६ डिसेंबर २०१७ पासून परीक्षा सुरू झाल्या व डॉ. वनारसे यांनी पहिल्याच दिवशी कॉपी केल्याबद्दल ३० विद्यार्थ्यांवर कारवाई केली. त्यानंतर तातडीने त्यांच्या कॉलेजकडून परत बोलावून घेण्यात आले. त्यानंतर ते सहकेंद्रप्रमुखाचे काम सोडत कॉलेजला रुजू झाले. यानंतर परीक्षा केंद्राला ‘जेसीएस’ नसल्याचेही कळते. या सगळ्या प्रकारात विद्यापीठ प्रशासनाचाही गलथान कारभार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीत वेरुळ-अजिंठा महोत्सवाची पर्वणी

$
0
0

फेब्रुवारीत वेरुळ-अजिंठा महोत्सवाची पर्वणी
कार्यक्रम स्थळांसंदर्भात शनिवारी बैठक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
भारतीय तसेच परदेशी पर्यटकांसाठी पर्वणी ठरणारा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव यंदा फेब्रुवारी महिन्यांत होणार असून ९ ते ११ फेब्रुवारी या संभाव्य तारखा राहणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
६ जानेवारीपर्यंत महोत्सव आयोजन समितीकडून बीबी का मकबरा, सोनेरी महल, वेरुळ तसेच कलाग्राम या कार्यक्रमस्थळांना भेटी देण्यात येऊन आवश्यक त्या मंजुरी घेण्यात येतील. या संदर्भात ६ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येऊन महोत्सवाची निश्चित तारीख ठरवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले.
शासनाने औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. अजिंठा-वेरूळ यासारखी जगप्रसिद्ध स्थळे जिल्ह्यात आहेत, तसेच बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, म्हैसमाळ, पानचक्की अशी अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी वेरूळ-अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात येत होता. मात्र काही कारणास्तव या महोत्सवाच्या आयोजनाकडे दुर्लक्ष केले गेले होते मात्र गेल्यावर्षी तत्कालिन विभागीय आयुक्‍त डॉ. उमाकांत दांगट यांनी पाठपुरावा करून वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या आयोजनाची खंडित परंपरा पुन्हा सुरू केली होती.
कमी खर्चात यंदाचा महोत्सव
गेल्यावर्षी शहरात आयोजित करण्यात आलेल्या वेरुळ महोत्सवासाठी ३ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता मात्र यंदा महोत्सवाच्या खर्चाला कात्री लावण्याचा प्रशासन विचार करत आहे. मानधनाशिवाय कलाकार सादरीकरण करु शकतील काय याचीची चाचपणी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसेवा कोलमडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय शिक्षणापासून ते वैद्यकीय व्यवसायापर्यंत सर्व बाबींचे नियमन-नियंत्रण करणारे ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एमसीआय) बरखास्त करून देशात येऊ घातलेल्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या (एनएमसी) विरोधात शहरातील खासगी डॉक्टरांनी दुपारी दोनपर्यंत कडकडीत संप पाळला. त्यामुळे शहरातील ९० टक्के क्लिनिक-हॉस्पिटलच्या दैनंदिन ओपीडी सेवा ठप्प होत्या. ‘आयएमए’च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर संपात सहभागी झाले होते.

‘एनएमसी’च्या विरोधात देशातील दहा लाखांपेक्षा जास्त अॅलोपॅथीचे डॉक्टर संपात सहभागी झाले होते. ‘एनएमसी’ विधेयकाच्या अनेक मुद्द्यांना ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) राष्ट्रीयस्तरावरुन आक्षेप घेतला आहे. ‘एनएमसी’ विधेयक हे खासगी मेडिकल कॉलेजांना चुकीच्या पद्धतीने प्रोत्साहन देणारे आहे. या विधेयकामुळेच देशातील खासगी मेडिकल कॉलेजांमधील केवळ ४० टक्के जागांवर सरकारचे नियंत्रण राहील, तर तब्बल ६० टक्के जागांवर सरकारचे कोणतेच नियंत्रण राहणार नाही. त्याचवेळी खासगी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी किंवा पदवी किंवा पदव्युत्तर जागा वाढवण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज उरणार नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा एकूणच दर्जा खालावेल व भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळेल. दुर्दैवी बाब म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. गंभीर बाब म्हणजे भारतात एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही प्रत्येक डॉक्टरला ‘एक्झिट’ ही केंद्रीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, मात्र कमी गुण असूनही लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून रशिया-चीन यासारख्या देशांमध्ये वैद्यकीय पदवी घेऊन परतलेल्यांना ‘एक्झिट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज राहणार नाही. ना एक्झिट ना बाँड, अशी त्यांना खास सवलत असणार आहे. पूर्वी विदेशात वैद्यकीय पदवी घेऊन परतलेल्यांना ‘स्क्रिनिंग टेस्ट’ होती, जी आता रद्द होणार आहे. त्याचवेळी ‘आयुष’ची पदवी प्राप्त केलेल्यांनाही ‘एक्झिट’मधून सूट देण्यात आल्याची टीका ‘आयएमए’चे शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर, कोषाध्यक्ष डॉ. यशवंत गाडे, नियोजित शहराध्यक्ष डॉ. कुलदीपसिंह राऊळ, माजी शहराध्यक्ष डॉ. दत्ता कदम व डॉ. संजीव सावजी, डॉ. अपर्णा राऊळ आदींनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

हुकुमशाही पद्धतीचे विधेयक
‘एनएमसी’मध्ये केवळ पाच प्रतिनिधी हे निवडून येतील, तर २० प्रतिनिधींची सरकारकडून नियुक्ती होईल. नियुक्त केले जाणारे प्रतिनिधी हे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असतीलच असे नाही. राज्यातील वैद्यकीय परिषदा या ‘एनएमसी’च्या अधिपत्याखाली राहतील व त्यांना कोणतेही अधिकार राहणार नाही. तसेच या आयोगात प्रत्येक राज्यातील वैद्यकीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व राहणार नाही. केवळ वैद्यकीय सल्लागार समितीत प्रत्येक राज्याचा केवळ एक प्रतिनिधी राहणार आहे. वैद्यकीय व्यवसायी व वैद्यकीय संस्थांचे कुठलेही अभिप्राय विचारात न घेता विधेयक तयार करण्यात आल्यामुळे हे विधेयक लोकशाही विरोधी व हुकुमशाही पद्धतीचे असल्याचा आरोपही ‘आयएमए’ने केला.

दखल घेतल्यानंतर संप मागे
‘एनएमसी’ विधेयक हे संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि पुढील अधिवेशनापर्यंत संसदीय समितीला या विधेयकाबाबत आपले मत कळवायचे आहे. हे विधेयक मंगळवारी संसदेत सादर होणार होते; परंतु डॉक्टरांच्या विरोधाचा विचार करून ते संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यानंतर ‘आयएमए’ने आपला संप मागे घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० एटीएमचे शटर डाउन

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटाबंदीनंतर शहरातील जवळपास ४० एटीएम बॅंकांनी बंद केली आहेत. विशेषत: स्टेट बँक ऑफ इंडियाने जवळपास पाच एटीएम सेंटर बंद केली आहेत. या व्यतिरिक्त काही खासगी बँकांची सात ते आठ एटीएम बंद झाले आहेत. यात देशी-विदेशी खासगी बँकांच्या एटीएमचा समावेश आहे.

शहरातील एटीएमची संख्या यापूर्वी जवळपास ४०० ते ४३५च्या घरात होती. यात खासगी आणि राष्ट्रीयकृत (सरकारी) बँकांनी त्यांचे एटीएम बंद केल्याने ती संख्या आता सुमारे ४० ते ४५ ने घटली आहे. स्टेट बँकेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असोस‌िएट बँका विलीन झाल्यानंतर टप्प्या-टप्य्याने काही बँकांचेही विलिनीकरण झाले. शाखा संख्या अधिक झाल्याने त्यांचे विलिनीकरण करण्यात आले होते, त्या बंद झालेल्या शाखांचे एटीएम कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. यासंबंधी बँकेचे अधिकारी एटीएम बंद नाहीत तर ‘रिलोकेट’ होणार आहेत असे म्हणत आहेत. एकूण एटीएम संख्या घटत नाही, असे स्पष्टीकरणही बँकेच्या एटीएम चॅनेलचे अधिकारी देत आहेत. खासगी बँकांचे अधिकारी एटीएमबाबत कुठली माहिती देण्याचा अधिकार मुंबईत व झोनल ऑफिसला असल्याचे सांगून यासंबंधी कोणीतीही अधिकृत माहिती देत नाहीत.

खासगी बॅंकांही आघाडीवर
एसबीआयशिवाय शहरातील खासगी बँकांच्या शाखांचेही जाळे आहे. या बँकांनीही त्यांचे एटीएम बंद केले आहेत. यात एचडीएफसी आणि इतर बँकांचा समोवश आहे. एसबीआयच्या सुत्रांनुसार एसबीआय नव्याने काही एटीएम रिलोकेट करून एटीएम संख्या वाढवण्यावर भर देणार आहे. आता शहरात बँक विलिनीकरणानंतर एसबीआयची २१६ एटीएम आहेत व ती सर्व चालू स्थितीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images