Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन रखडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. समायोजन नसल्याने शिक्षकांचे वेतन कागदावरच आहे. संस्थांकडून समायोजन करून घेतले जात नसल्याने त्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

शिक्षण विभागात दोन वर्षात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न तीव्र झाला आहे. विभागात प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक स्तरावरील ३००पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यात यंदाच्या भर पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर सात शिक्षकांबद्दल आदेश देऊनही संबंधित शाळांनी समयोजन करून घेतलेले नाही. आदेश दिल्यानंतरही अनेक संस्थांमध्ये समयोजनास प्रतिसाद दिला जात नाही, असे शिक्षकांनी सांगितले. अनेक संस्था, मुख्याध्यापक समायोजन करण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. कमी पटसंख्यांच्या शाळा बंद करण्याचा निर्णयाची अमंलबजावणी करणेही शिक्षण विभागाच्या अडचणीत भर पाडू शकते.

तीन महिन्यांपासून बिनपगारी
अतिरिक्त शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात शिक्षण विभागाला अपयश आले आहे. अतिरिक्त शिक्षकांचे पगार दोन-तीन महिने रखडतात. त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. समायोजनाला प्रतिसाद न दिल्यास पगार किंवा ते पदच रद्द करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्यानंतरही हा प्रश्न निकाली निघालेला नाही.

मला ९ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रथम समायोजनाचे आदेश देण्यात आले. मूळ आस्थापनेवरून कार्यमुक्त झाल्यानंतर समायोजनाचे आदेश दिले तेथे गेलो तर शाळेवर रुजू होण्यासाठी गेलो तर सामावून घेतले नाही. मी, परत विचारणा केली, शिक्षणाधिकारी यांना संपर्क साधला. परंतु, योग्य ते उत्तर दिले जात नाही. तीन महिन्यांपासून वेतन बंद आहे. - एस. आर. कायंदे, शिक्षक

एवढे रखडले समायोजन
औरंगाबाद…….७६
बीड………. .४१
परभणी… ९
जालना… २
हिंगोली… १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादचे पासपोर्ट केंद्र देशात पाचवे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक खूश खबर. गेल्या नऊ महिन्यांत पासपोर्टचे तब्बल २० हजारांहून अधिक अर्ज निकाली काढण्यात यश आले असून, आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांना पासपोर्ट वितरित झाले आहेत. त्यामुळे औरंगाबादचे केंद्र देशात जलद सेवा देण्यात पाचव्या स्थानी आहे.

शिक्षण, पर्यटन, नोकरीसाठी परदेशात जाण्याची आस बाळगणाऱ्या नागरिकांसाठी छावणी परिसरातील विभागीय पोस्ट कार्यालय आवारात मार्च २०१७मध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामुळे पासपोर्टसाठी नागरिकांची मुंबईला जाण्याची फेरी टळली. सुरुवातील दररोज केवळ ५० अर्जांचा कोटा येथील केंद्राला देण्यात आला, परंतू अर्जांचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस प्रतीक्षा यादी वाढत गेली. अर्जांचा निपटरा तातडीने व्हावा, लोकांना चांगली व तत्पर सेवा मिळावी यासाठी हा कोटा टप्प्याटप्प्याने वाढवून देण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून दररोज २०० ते २५० अर्जांवर कार्यवाही केली जात आहे. गेल्या नऊ महिन्यांत तब्बल २० हजारांहून अधिक अर्ज निकाली काढण्यात आले असून, पेडन्सीचे झिरो करण्यात केंद्राला यश मिळत आहे. - उमेश देवाधिया, पासपोर्ट केंद्र अधिकारी

कर्मचाऱ्यांची संख्या कमी
येथील केंद्रात अर्जाचा ओघ जास्त व कर्मचाऱ्यांशी संख्या कमी अशी अवस्था आहे. वरिष्ठांनी वेळोवेळी कोटा वाढवून दिल्याने अर्जाचा निपटार तातडीने होत असला तरी कर्मचाऱ्यांशी संख्या वाढल्यास, केंद्राचे कामकाज अधिक वेगाने होण्यास मदत होईल, असे मत पासपोर्टसाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केले.

पहिली तीन शहरे महाराष्ट्रातील
विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुलभ पासपोर्ट सेवा देण्यात पहिल्या पाच क्रमांकात तीन शहरे महाराष्ट्रातील आहेत. त्यात कोल्हापूर देशात पहिले असून, पिंपरी चिंडवड आणि औरंगाबादचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून २१ हजार ९५ पासपोर्टचे वितरण करण्यात आले. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड पासपोर्ट वितरण केंद्रातून २० हजार ८३ तर औरंगाबाद केंद्रातून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. कर्नाटकातील म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर असून या केंद्रातून १६ हजार ४४६ आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या भूज (गुजरात) केंद्रातून १५ हजार २८१ पासपोर्ट वितरित करण्यात आले आहेत.

अशीही झेप
- २०१७मध्ये केंद्र सुरू
- २० हजार पासपोर्ट निकाली
- १५ हजार पासपोर्ट वितरित
- ९ महिन्यांतील कामगिरी
- ५० सुरुवातीचा कोटा
- ३०० सध्याचा कोटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ निधी रस्त्यासाठीच खर्च करा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाने रस्त्यांसाठी दिलेला निधी रस्त्याच्या कामासाठीच वापरा. अन्यत्र हा निधी वळवू नका, असे पत्र भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे. कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे काम मार्गी लागावे, या उद्देशाने त्यांनी हे पत्र दिले आहे.
महापालिका निवडणुकीवेळी राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी सुमारे २४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून पाच रस्त्यांच्या व्हाइट टॉपिंगची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच रस्त्यांपैकी महावीर चौक ते क्रांतीचौक हा एक रस्ता त्यात होता. कालांतराने या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात करण्यात आल्यामुळे या रस्त्यासाठी राखून ठेवण्यात आलेला साडेसहा कोटींचा निधी शिल्लक राहिला. शिल्लक राहिलेला निधी कैलासनगरच्या रस्त्यासाठी खर्च करावा, अशी सूचना आमदार सावे यांनी केली होती. दरम्यान या साडेसहा कोटींपैकी अडीच कोटी रुपये माजी महापौर भगवान घडमोडे यांनी आपल्या वॉर्डात वळविल्याची चर्चा सुरू झाली, परंतु मिळालेल्या माहितीनुसार घडमोडे यांनी शिल्लक राहिलेले साडेसहा कोटी रुपये आपल्या वॉर्डात वळवले नाहीत, तर या रकमेवर जे व्याज महापालिकेला प्राप्त झाले होते, त्या व्याजाची रक्कम आपल्या वॉर्डात वळवली आहे.

पैसा वळवू नका
पालिका प्रशासनाला दिलेल्या पत्राबद्दल अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘शासनाने रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला आहे. त्यामुळे ज्या कामासाठी निधी देण्यात आला आहे, त्याच कामासाठी निधी वापरा असे पत्र मी पालिका प्रशासनाला दिले आहे. रस्त्यांच्या कामासाठीचा निधी अन्य कामांसाठी वळता करू नका, असा उल्लेख पत्रात केला आहे. २४ कोटींमधून शिल्लक राहिलेला निधी कैलासनगरच्या रस्त्यावर खर्च करण्याचे ठरले आहे, त्यानुसार शिल्लक राहिलेला साडेसहा कोटींचा निधी कैलासनगर ते एमजीएम या रस्त्याच्या कामासाठीच खर्च व्हावा अशी आपली भूमिका आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठेत शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र बंद’चा ‌परिणाम शहरातील व्यापारपेठ, बाजार समिती आणि मॉल्सवर झाला. ‘बंद’मुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी ‌दिली.

काळे म्हणाले, ‘शहरात दिवसभर सर्व व्यापाऱ्यांनी त्यांची दालने बंद ठेवली होती. मोंढा, जुना मोंढा, जाधववाडी, मोठ-मोठे दालने, काही मॉल बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. मुळात ‘बंद’ची मानसिकता मंगळवारीच व्यापारीवर्गाने करून ठेवली होती. यामुळे रोजचे व्यवहार थांबले. नाशवंत पदार्थांचे उत्पादन, विक्रीवरही परिणाम झाला.’

शहरात छोटी-मोठी ४५ हजार व्यापारी आहेत. त्यांनी सर्वांनी दालन बंद ठेवली होती. त्या व्यापारीवर्गावर अवलंबून असलेल्यांवरही ‘बंद’चा परिणाम झाला, असे काळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपामुळे वाहतुकदारांचाही चक्का जाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दलित संघटनांच्या ‘महाराष्ट्र बंद’चा परिणाम औरंगाबादच्या खासगी वाहतुकदारांनाही सोसावा लागला. या ‘बंद’मुळे मालवाहतूक सर्व गाड्यांची बंद होत्या. या आंदोलनामुळे सुमारे १५ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल थांबल्याची माहिती ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिली.

मंगळवारी औरंगाबाद शहराजवळ काही ट्रान्सपोर्टरच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. शिवाय ट्रक चालकालाही मारहाण केल्याची घटना घडलेल्या आहेत. अज्ञात लोकांकडून होत असलेल्या हल्‍ल्यांमुळे मंगळवारपासूनच शहरातील वाहतूकदारांनी गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

भारिप बहुजन महासंघ आणि लोकशाही आघाडीतर्फे बुधवारी (तीन जानेवारी) ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे वाहतूकदारांनी बुधवारीही गाड्या बंद ठेवल्या. औरंगाबाद शहरातून रोज सुमारे तीन हजार ट्रकच्या माध्यमातून मालाची ने-आण करण्यात येते. महाराष्ट्राच्या विविध शहरांसह, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून मालाची आवकही थांबलेली होती. वाहतूकदारांच्या गाड्या बंद राहिल्याने साधारणतः १५ कोटींची उलाढाल थांबली असल्याची माहिती औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असो‌सिऐशनचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी दिली.

पुणे, अहमदाबाद गोवा रद्द
औरंगाबाद बस ओनर्स असोसिएशनने बुधवारी औरंगाबादहून विविध शहरांकडे जाणाऱ्या बस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंगळवारी रात्री निघालेल्या खासगी बस सकाळी सुरक्षित औरंगाबादला पोचल्या. दिवसा पुणे, अहमदाबाद आणि गोव्याकडे जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्या होत्या. सायंकाळी महाराष्ट्र बंद मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर रात्री विविध ठिकाणी प्रवाशांच्या संख्येनुसार बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बंद’दरम्यान दगडफेक, लाठीहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. काबरानगर, आंबेडकरनगरात दगडफेक व लाठीमाराच्या घटना घडल्या. पोलिसांनी केलेल्या कोंम्बिग ऑपरेशनमध्ये अनेकांची ‌धरपकड करण्यात आली. ‘बंद’दरम्यान शहरातील बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यांवर शुकशुकाट होता.

कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद तिसऱ्या दिवशीदेखील शहरात उमटले. मंगळवारप्रमाणे बुधवारीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व शहरात किरकोळ पानटपऱ्या वगळता मोठी व्यापारी प्रतिष्ठाणे, दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती. तरुणांच्या जमावाने घोषणाबाजी करीत निराला बाजार, पैठणगेट, गुलमंडी भागात दुकाने बंद पाडली.

बंदला हिंसक वळण
या बंदला सकाळपासूनच हिंसक वळण लागले. दौलताबाद येथे सांगवी (ता. पंढरपूर) येथील श्री गगनगिरी विद्यालयाची विद्यार्थ्यांची सहल औरंगाबादेत आली होती. दोन दुचाकीवर आलेल्या चार तरुणांनी या सहलीच्या बसवर दगडफेक केली. यामध्ये समोरील व बाजूची काच फुटून एक ‌शिक्षक व विद्यार्थी जखमी झाला. उस्मानपुरा, फुलेनगर, मुकुंदवाडी, मिसारवाडी भागात जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

काबरानगरात धुमश्चक्री
काबरानगर, शंभूनगर भागात सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणाच्या गटाने सूतगिरणी चौकात येऊन एका अपार्टमेंटमध्ये घुसून दगडफेक करण्याचा प्रकार घडला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून जमाव आतमधल्या गल्ल्यांमध्ये पसार झाला. या ठिकाणी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात आदींनी मोठ्या फौजफाट्यासह कोंम्बिग ऑपरेशन राबवले. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये पोलिस निरीक्षक अविनाश आघाव नाकाला दगड लागल्याने जखमी झाले. पोलिसांनी या गल्ल्यामध्ये शोधमोहीम राबवत दगडफेक करणाऱ्या समाजकंटकाना सौम्य लाठीहल्ला करून पांगवले. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या ठिकाणी वातावरण शांत झाले.

आंबेडकरनगरात धरपकड
काबरानगरात दगडफेकीची घटना घडल्यानंतर मुकुंदवाडी, संजयनगर व आंबेडकरनगर येथील जमाव रस्त्यावर जमला. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांनी घटनास्थळ गाठले. संजयनगर येथे दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या, मात्र आंबेडकरनगर जमाव एकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये एसीपी नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती जखमी झाले. आतमधल्या गल्लीबोळातून पोलिसांवर दगडफेक करण्यात येत होती. पोलिसांनी अखेर कोंम्बिग ऑपरेशन राबवून दगडफेक करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांची व दगडफेक करणाऱ्या तरुणांची तीन तास धुमश्चक्री सुरूच होती. पकडलेल्या तरुणांना सिडको पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

शेकडो वाहनांचे नुकसान
जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये बुधवारी देखील पोलिसांच्या तीन वाहनांचे नुकसान झाले. पीरबाजार, एकनाथनगर, फुलेनगर, आंबेडकरनगर, काबरानगर आदी भागात घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड करीत नुकसान करण्यात आले. पोलिसांनी या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप आंबेडकरनगर येथील नागरिकांनी केला, मात्र पोलिस आयुक्त भारंबे यांनी हा आरोप फेटाळून लावला.

मंगळवारच्या दंगलीचे १७ गुन्हे दाखल
मंगळवारी शहरात सिद्धार्थनगर, पीरबाजार भागात; तसेच इतर ठिकाणी जमावाकडून दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये पोलिस, नागरिक व एसटी बसला देखील लक्ष्य करण्यात आले होते. याप्रकरणी जिन्सी मुकुंदवाडी, जवाहरनगर, क्रांतिचौक, सिडको, सिटीचौक, पुंडलिकनगर, दौलताबाद, उस्मानपुरा आदी पोलिस ठाण्यात समाजकंटकाविरुद्ध १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, दंगल करणे, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांचा समावेश आहे. या गुन्ह्यामध्ये राजू गौतम आव्हाड, शेखर भाऊसाहेब साळवे, राहुल नंदकिशोर दाभाडे, मुकेश भवरलाल पटेल, संतोष साळवे, पंकज बोर्डे, बुद्धभूषण निकाळजे, राजू हिवराळे, नारायण सुभाष साळवे, आनंद उत्तम दाभाडे, शुभम दिलीप मगरे,‌ विशाल राजेंद्र खरात, राजू दादाराव गायकवाड, अजय अशोक म्हस्के यांच्यासह इतर अनोळखी आरोपींचा समावेश आहे.

१३५ वाहनांचे नुकसान
मंगळवारी झालेल्या दगडफेकीमध्ये एकूण १३५ वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये ११ वाहने पोलिसांची, १०७ वाहने नागरिकांची आहेत. एसटीच्या १४ बस व तीन रुग्णवाहिका यांचाही त्यात समावेश आहे.

सिद्धार्थनगर, रमानगरात कोंम्बिग ऑपरेशन
मंगळवारी सिद्धार्थनगर, रमानगर भागात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. रमानगर भागात बुधवारी दुपारी, तर सायंकाळी सिद्धार्थनगर भागात पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राबवले. यामध्ये दगडफेक करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीए परीक्षाकेंद्रावरील सहकेंद्रप्रमुख कोणी बदलला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमबीए पेपरफुटी प्रकरणानंतर मोबाइल कॉपीचा प्रकार समोर आला. त्याबाबत नेमलेल्या चौकशी समितीला उपाय आणि नियमावली तयार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दुसरीकडे विद्यापीठ परीक्षा विभागाच्या परवानगीशिवाय सहकेंद्रप्रमुख बदलण्याचे अधिकार प्राचार्यांनी कोणी दिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीए प्रथमवर्ष पहिल्या सत्राच्या ‘अकाउंटिंग फॉर मॅनेजर्स’ विषयाचा पेपर सोमवारी वसंतराव नाईक कॉलेजच्या परीक्षा केंद्रातून व्हॉट्स अॅपवरून फोटण्यात आला. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शंका असून ही प्रश्नपत्रिका दुसऱ्या परीक्षा केंद्राहूनही बाहेर आल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर परीक्षा केंद्र, विद्यापीठाचा परीक्षा विभाग यांच्या कारभारातील त्रुटी समोर आल्या आहेत. परीक्षा सहकेंद्रप्रमुखाला परस्पर हटविण्यात आल्याचे उघड झाले आहे. परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सहकेंद्रप्रमुखांना कॉलेज कोणाच्या परवानगीशिवाय परत बोलावते, परीक्षा विभागाची परवानगी घेतली का, सहकेंद्रप्रमुख बदलल्यानंतर विद्यापीठाने त्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक का केली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यातून परीक्षा केंद्रावर कॉपीला आळा बसण्याऐवजी बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या चौकशी समितीने प्राथमिक आढावा घेतला असून गुरुवारपासून प्रत्यक्ष चौकशीला सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘मटा’ला दिली.

मोबाइलचे करायचे काय ?

परीक्षा कक्षात विद्यार्थ्याकडे मोबाइल आढळल्यास काय कारवाई करावी, यावर प्रशासन विचार करत आहे. ‘नीट’ परीक्षेच्या धर्तीवर मोबाइल जप्त झाल्यानंतर तो परत देऊ नये, असा एक प्रवाह आहे. त्याबद्दलची नियमावली, निकष तयार केले जाणार आहे. सध्या, जप्त केलेले मोबाइल संबंधित विद्यार्थ्यास परीक्षेनंतर परत दिले जातात.

कारवाई काय होणार?

विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सहकेंद्रप्रमुख काम करतात. त्यांना त्यांच्या कॉलेजने परत कसे बोलावले. याबाबत विद्यापीठाची ना हरकत घेणे गरजेचे असते. त्यासह परीक्षा केंद्रावरूनही त्यांना रिलिव्ह कसे करण्यात आले. याबाबत दोषी कोण? प्राचार्यांनी याबाबत कळविले होते का, याचा आढावा विद्यापीठ प्रशासन घेणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांचे मोबाइल दिवसभर इंटरनेटशिवाय

$
0
0

म. टा. प्रतिनधी, औरंगाबाद
सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग झालेल्या मोबाइलची इंटरनेट सेवा तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बंद ठेवण्यात आली. तब्बल १८ तासांहून अधिक काळासाठी इंटरनेट सेवा बंद असल्याने सोशल मीडियावर सक्रिय असलेल्यांची अडचण झाली.

‘महाराष्ट्र बंद’मु‍ळे काही शहरांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काही मोबाइल कंपन्यांनी मंगळवारी रात्रीपासूनच इंटरनेट सेवा बंद केली. शहरात व्होडाफोन, आयडिया, बीएसएनल, जीओ-रिलयान्स, एअरटेल यांची लाखो ग्राहक सेवा घेत आहेत. या सर्व कंपन्यांची ३७३ टॉवर्स आहेत. या सर्व टॉवर्सवरून देण्यात येणारी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. सर्वच कंपन्यांनी २४ तास इंटरनेट सेवा बंद केली होती, असे या कंपन्यांची ग्राहक सेवा विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात बीएसएनलच्या ग्राहकांची संख्या सव्वातीन लाखांवर असल्याचे बीएसएनल‍च्या सूत्रांनी सां‌गितले. कंपनीचे सद्यस्थितीत जिल्ह्यात टू-जीचे २६०, तर थ्री-जीचे १३० मोबाइल टॉवर्स आहेत. यांची सेवाही बुधवारी ‌दिवसभर बंद होती. जिओची सेवा सुरू होती. तीही बुधवारी दुपारनंतर बंद करण्यात आली. काही कंपन्यांनी बुधवारी रात्री १२नंतर इंटरनेट सेवा पूर्ववत केल्या. ही सेवा गुरुवारी पूर्ववत होईल, असे काही कंपन्यांतून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा उद्या, परवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाचा पेपर फुटल्यानंतर रद्द करण्यात आलेला हा पेपर आता शुक्रवारी (५ जानेवारी) व बंदच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या विषयाची परीक्षा शनिवारी (६ जानेवारी) होणार आहे.
पेपर फुटल्यामुळे रद्द केलेला सोमवारची एमबीएची परीक्षा बुधवारी (३ जानेवारी) होईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, कोरेगाव भीमा येथील घटनेनंतरच्या तणावामुळे विद्यापीठाने २ व ३ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या होत्या. या रद्द झालेल्या विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने वेबसाइटवर बुधवारी जाहीर केले. त्यानुसार, शुक्रवारी ‘अकाउंटिंग फॉर मॅनेजर्स’, शनिवारी ‘मॅनेजमेंट स्किल’ विषयाची परीक्षा संबंधित परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते १ या वेळेत घेतली जाणार आहे. एमबीएची परीक्षा सहा केंद्रावर घेतली जात असून २०२८ परीक्षार्थी आहेत.

एम. ए. च्या परीक्षा

तणावामुळे एम. ए. च्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. बदललेल्या वेळापत्रकानुसार, शुक्रवारी एमए इतिहास, अर्थशास्त्र, लोकप्रशासन विषयाचा पेपर-१ व शनिवारी याच विषयांच्या पेपर-२ ची परीक्षा घेतली जाणार आहे. एम. ए. ची परीक्षा चार परीक्षा केंद्रावर घेतली जात असून ४१ परीक्षार्थी आहेत.

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, परीक्षार्थींपर्यंत संदेश नीट जावा, यासाठी गुरुवारी परीक्षा न घेण्याचा निर्णय कुलगुरूंशी विचार विनियम करून घेतला आहे. नवीन वेळापत्रकाची माहिती परीक्षा केंद्रांना कळविली असून वेबसाइटवरही जाहीर केली आहे.
-डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन नियंत्रण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याची आवक थंडावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेला बंदमुळे जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली. धान्य बाजारातही बंद होता. यामुळे सुमारे कोट्यवधींची उलाढाल थांबल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जाधववाडी येथील बाजार समिती आवारात दररोज मोठ्या प्रमाणात शेतीनियमित माल, फळ - भाजीपाल्याची आवक स्थानिक; तसेच अन्य जिल्ह्यांतून होत असते. या बंदमुळे आवक घटली. भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी तुरळक व्यवहार झाले. त्यानंतर संपूर्ण बाजारा शुकशुकाट होता

वाटाण्याची तीन दिवसांपूर्वी १३५ क्विंटल आवक झाली होती. बुधवारी केवळ ८१ क्विंटल वाटाणा बाजारात विक्रीस आला. यासह अन्य भाजीपाल्याची आवकही रोजच्या तुलनेत केवळ २० टक्के झाली, अशी माहिती बाजार समितीने दिली. मार्केटमध्ये आणण्यात आलेला भाजीपाला स्थानिक होता. दररोज सरासरी ७०० ते ८०० क्विंटल तुरीची आवक होते. आज एक क्विंटलही तूर बाजारात आणण्यात आली नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनीही माल विक्रीस आणला नाही.

मार्केट आवारात असलेले धान्य बाजारातही कडकडीत बंद होता. बंदमुळे कोट्यवधी रुपायंचे व्यवहार थांबले असावेत, अशी माहिती आडत व्यापारी हरिष पवार यांनी दिली.

दूध विक्रीवर परिणाम नाही
दूध वितरण सायंकाळी आणि दूध संकलन सर्वसाधारण सकाळी होत असते. त्यामुळे त्यावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या मराठवाड्यात बोंडअळी पंचनाम्याची आकडेमोड

$
0
0

निम्म्या मराठवाड्यात बोंडअळी पंचनाम्याची आकडेमोड

नांदेड, बीड, लातूर,उस्मानाबादचा अहवाल सादर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला, नुकसान भरपाई देण्यासाठी राजकीय पक्षांचा दबाव वाढल्यानंतर सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले, मात्र प्रशासनाची पंचनाम्याची आकडेमोड केवळ चार जिल्ह्यातच पूर्ण झाली आहे.

मराठवाड्यातील मोठ्या क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात येते, यंदा पाऊसही चांगला झाल्यामुळे लागवडक्षेत्रही वाढले मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले, या नुकसानीचे पंचनामे करून दहा दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते, मात्र आतापर्यंत केवळ चार जिल्ह्यातच कापूस पिकाचे पंचनामे करण्यात प्रशासनाला यश आले असून निम्म्या मराठवाड्यात अद्यापही बोंडअळी पंचनाम्याची आकडेमोड सुरू आहे. पंचनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाल्याने शासनाने डिसेंबरच्या प्रारंभी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बोंडअळीचा प्रादुर्भाव व तांदूळ पिकांवरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचा निर्णय घेतला, दहा दिवसांच्या आत हे पंचनामे करावेत, पंचनामे करताना नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस यंत्रणाआधारित मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने फोटो घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. ७ डिसेंबरला शासनाने पंचनामे करण्याबाबतचे आदेश जारी केले होते.

खरीप हंगामात मराठवाड्यातील एकूण ४७ लाख ७० हजार २०० हेक्टरवर पेरणीपैकी १५ लाख ९२ हजार २०० हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात आले, पहिल्या वेचणीनंतर पिकांवर बोंडअळीने हल्ला केला. त्यात मराठवाड्यातील सुमारे ७० टक्के कापूस हातचा गेला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी सरकारकडे केली. सरकारवर दबाव वाढल्यानंतर सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले. यानंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले व जीपीएस आधारित प्रत्यक्ष नुकसानीची फोटो घेण्यासह नोंदी करण्यास सुरुवात झाली. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे या दोन जिल्ह्याचा अहवाल आधीच सादर झाला. तर दोन दिवसांपूर्वी नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात ४ लाख ७ हजार २०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली असून जालन्यात २ लाख ७९ हजार ५००, परभणीत १ लाख ९१ हजार ७००, हिंगोलीत ५४ हजार ६००, बीड ३ लाख ६१ हजार ७००, नांदेड जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७००, लातूर ४ हजार ९०० आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २२ हजार ६०० हेक्टरवर लागवड झालेली आहे.


पंचनामे पूर्ण झालेल्या जिल्ह्यांतील चित्र

जिल्हा……… बाधित क्षेत्र………. शेतकरी संख्या……. आवश्यक निधी

बीड…………..३७७७९२………..६९१९४५………..२५६ कोटी ५१ लाख

नांदेड…………..२६२९२०………..४२३५९९……….१७६ कोटी १३ लाख

लातूर……२१९५.८५…………३५३३…………१ कोटी ४९ लाख ३१ हजार

उस्मानाबाद….७९८४.२०……….९९२३………..५ कोटी ४१ लाख २२ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम, बँकांचे व्यवहार थांबले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरेगाव भीमा येथील घटनांच्या पडसाद उमटल्यानंतर शहरातील बँका बुधवारी दिवसभर बंद होत्या. याचप्रमाणे शहरातील सर्वच बँकांची एटीएमदेखील बंद होती. शहरात २१ राष्ट्रीयकृत बँकांची सुमारे शंभराहून अधिक शाखा आहेत. याशिवाय ३५० एटीएम सेंटर्सही आहेत. या सर्व शाखा व एटीएम बंद होते.

शहरात दिवसभर बंदमुळे आज बँकांचे तब्बल ९०० कोटींचे व्यवहार थांबले होते. याचा फटका ऑनलाइन व्यवहार व एटीएमवरही जाणवला. बंदमुळे बँकांचे सर्व्हरही ‘डाउन’ करण्यात आले. धनादेश वटणे, रोख व्यवहार आणि इतर ऑनलाइन व्यवहार होऊ शकले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा, कॉलेजांत शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोरेगाव भीमा घटनेनंतर विविध संघटनांनी केलेल्या बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी औरंगाबाद शहरातील शाळा, महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता अाणि पालकांशी विचार विनिमय करून शाळा व्यवस्थापनाने आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत अनेक शाळांनी मंगळवारीच मोबाइलच्या माध्यमातून संदेश पाठविले होते.

नाताळाच्या सुट्यानंतर मंगळवारपासून शाळा सुरू झाल्या. तणावानंतर मंगळवारी शाळा सोडून देण्यात आल्या. बुधवारी बंदचे आवाहन केल्याने शाळा, महाविद्यालयांनी सुटी दिली होती. शहरातील विविध माध्यमांच्या ८६१ शाळा आहेत. काही शाळांनी शाळा बंद राहतील, असे संदेश मंगळवारी पालकांच्या मोबाइलवर पाठविले. त्यामुळे अडचण निर्माण झाली नाही. स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत शाळांनी निर्णय घ्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापना दिला होत्या. त्यानुसार शाळांनी हा निर्णय घेतला. महापालिकेच्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. इंग्रजी शाळांमध्येही बंद होत्या.

परीक्षा रद्द
शहरातील कॉलेजही बंद ठेवण्यात आले. कॉलेजांच्या प्रवेशद्वारावर त्यासंदर्भातील नोटीसही लावण्यात आल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारचा पेपर रद्द केला होता. बंदमुळे बुधवारी होणारे पेपरही रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. कॉलेजांना त्याबाबत रात्री उशिरा सूचना देण्यात आल्या.

‘बंद’च्या पार्श्वभूमीवर शाळांनी परिस्थितीनुसार, पालकांच्या मागणीनुसार निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अनेक शाळा बंद होत्या. काही शाळांनी काहीवेळ शाळा भरविली. काही वेळानंतर शाळा सोडून दिली. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होत्या.
- गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज व्यवस्था सुधारसाठी एक वर्षाची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऊर्जा एका‌त्मि‌क विकास योजनेत मंजूर झालेली १०१ कोटींची कामे पूर्ण होण्यास एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. पायाभूत सुविधांचा विकास होऊन शहरातील वीज ग्राहकांना विनाखंड वीज मिळण्यासाठी या योजनांतून कामे केली जाणार आहेत.
औरंगाबादमधील वीज वितरण व्यवस्‍था सुधारण्यासाठी ड्रम प्रकल्प राबविण्यात आला. त्यानंतर शहरातील वीज वितरण जीटीएलला सोपवण्यात आले होते. जीटीएलने त्यानंतर कोणतीही सुधारणा केली नाही. वीज वितरण पुन्हा महावितरणकडे आल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार, २०१४-१५ मध्ये ११ केव्हीची कामे, लघुदाब वाहिनी आणि एबी केबलची ३० लाखांची कामे पूर्ण करण्यात आली. २०१५-१६ मध्ये ७२ लाख, आणि २०१६-१७ मध्ये दोन उपकेंद्रासह इतर कामांवर ७० लाख रुपये खर्च करण्यात आले.
या कामांमुळे शहरातील वीज वितरण व्यवस्था काही प्रमाणात सुधारली. मात्र, दहा ते बारा वर्षांपासून पायाभूत सुविधांची कामे होत नसल्याने वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने शहरातील वीज पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांचा निधी आयपीडीएसमधून (एकात्‍मिक ऊर्जा विकास योजना) देण्यात आला आहे.
ही कामे पूर्ण करणे व भूमिगत केबल टाकण्याकरिता खड्डे खोदावे लागणार आहेत. त्यावरील खर्च कमी करून सातारा येथून वीज वाहिन्या आणण्यापर्यंत अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. यामुळे विनाविघ्न वीज सेवा मिळण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

ही कामे होणार

टप्पा क्रमांक १
३३, ११केव्ही उपकेंद्र ६
उपकेंद्रातील रोहित्रांची क्षमता वाढविणे ३
अतिरिक्त रोहित्र २
उच्चदाब वाहिनी ८२.२५ किलोमिटर
भूमिगत केबल वाहिनी ४० किलोमिटर
..
टप्पा क्रमांक २
उच्चदाब वाहिनी ७८.२९ किलोमिटर
लघुदाब वाहिनी १४३.७ किलोमिटर
वितरण रोहित्र नवीन २५६
वितरण रोहित्र क्षमतावाढ ३३०
एचव्हीडीएस रोहित्र ६०
सोलार पॅनल १४५ केडब्‍ल्यू

आयपीडीएस योजनेतंर्गत सध्या कामे सुरू झाली आहेत. मार्चअखेरपर्यंत टप्पा एक मधील कामे पूर्ण होतील. डिसेंबर २०१८ पूर्वी उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत.
-दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत अँजिओप्लास्टी ठप्पच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अँजिओप्लास्टीचे उपचार मागच्या जवळजवळ दोन महिन्यांपासून ठप्पच आहेत. आधी ‘सीव्हीटीएस’ विभागातील कॅथलॅब बंद होती म्हणून, तर नंतर वैद्यकीय साहित्याअभावी हे जीवनदायी उपचार बंदच आहेत. परिणामी, गोरगरीब हृदयरोग्यांची फरफट होत असून, सामान्यांना अँजिओप्लास्टीसाठी खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

घाटीमध्ये हृदयरोगावरील सर्वांगीण उपचारांसाठी ‘सीव्हीटीएस’ हा स्वतंत्र विभाग आहे आणि या विभागाची स्वतंत्र इमारत घाटी परिसरामध्ये आहे. मात्र दुर्दैवाने या विभागाला तज्ज्ञांची कायम पदे आजपर्यंत मिळाली नाहीत आणि त्यामुळेच मानद तत्वावरील व बंधपत्रित पदव्युत्तर डॉक्टरांमार्फतच हा विभाग आजपर्यंत शब्दशः रेटण्यात आला. अशा एकंदर स्थितीमध्येही अलीकडे टू-डी इको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास व इतर उपचार-शस्त्रक्रिया या विभागामध्ये काही प्रमाणात नक्कीच होत आहेत. मात्र पुन्हा वेगवेगळ्या तांत्रिक व निधीच्या अडचणींमुळेही विभागातील सेवा ठप्प होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘कॅथलॅब’चा छोटासा सुटा भाग उपलब्ध होत नव्हता म्हणून तब्बल दोन महिने ‘सीव्हीटीएस’ची कॅथलॅब बंदच होती. अर्थात, कंपनीशी करार झाल्यानुसार वार्षिक देखभालीचे १८ लाख रुपये थकल्यामुळे कंपनीने हा सुटा भाग बसवून देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कंपनीने तो भाग बसवून दिला आणि एकदाची कॅथलॅब सुरू झाली खरी; परंतु प्रत्येक अँजिओप्लास्टीसाठी आवश्यक असणारी ‘पीटीसीए वायर’ उपलब्ध नसल्याने आता अँजिओप्लास्टी होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या साहित्याची मागणी मागच्या महिन्यातच करण्यात आली होती. मात्र कंपनीने संबंधित साहित्याचा अद्याप पुरवठाच केलेला नाही. हा पुरवठा ठप्प झाल्यामुळे अँजिओप्लास्टी ठप्प झाली आहे. परिणामी, मागच्या अडीच-तीन महिन्यापासून घाटीतील अँजिओप्लास्टीवर गंडांतर आलेले आहे. हा तिढा सुटणार तरी कधी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अँजिओग्राफी, टू-डी सुरू
‘सीव्हीटीएस’मध्ये अँजिओप्लास्टी बंद असली तरी अँजिओग्राफी, टू-डी इको व इतर तपासण्या-उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत स्टेंट, बलून व इतर आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घाटीतल्या शस्त्रक्रिया
- १५ अॅँजिओप्लास्टी
- १ महिन्याला
- ६० अॅँजिओग्राफी
- १ महिन्याला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात कडकडीत बंद

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशीही पहायला मिळाले. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त जमावाने परभणीतील स्टेशन रोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. तर निलंगा, नांदेडमध्ये जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. निलंगा शहरातील काही भागात काही वेळासाठी संचारबंदी लागू केली आहे. बंदमुळे मराठवाड्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

निलंग्यातील दगडफेकीत १३ पोलिस जखमी
लातूर - भीमा कोरेगाव प्रकरणी विविध दलित संघटनानी पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. या बंदला निलंगा शहरात गालबोट लागले असून आंदोलकांच्या दगडफेकीत १३ पोलिस कर्मचाऱ्यासोबत काही नागरिकही जखमी झाले. रात्री नऊ वाजेपर्यंत संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे.
निलंग्यात बंद शांततेत सुरू असताना आंदोलनकर्ते सकाळी दहाच्या सुमारास रस्त्यावरुन घोषणा देत जात असताना रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने अडवून त्याची तोडफोड केली. या तोडफोडीत ४० ते ५० दुचाकी, दहा ते बारा चाकीचा समावेश आहे. आंदोलनकर्ते दापका वेशीतून अशोक नगरकडे जात असताना पोलिस दाखल झाले. परंतु, या दगडफेकीत डीवायएसपी गोपाळ रांजणकर, पोलिस निरिक्षक कल्याण सुपेकर, उपनिरीक्षक एस. एन. माधाळकर, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आघाव यांच्यासह दहा पोलिस कर्मचारी जखमी झाले. राज्य राखीव पोलिस दलाचे हेमंत कोळनते, किरण आडे, गजानन घुगे, गजानन काळे हे जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या चार नळकांड्या फोडल्या. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली. जखमीवर निलंग्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. अनेक दिवसानंतर दुपारपर्यंत बंदचे आवाहन करीत मोटारसायकल, चारचाकी वाहन आणि पायी चालत मोठ्या संख्येने तरुणांचे जथ्थे शहरभर फिरत होते. सांयकाळपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. पेट्रोलपंप सुद्धा बंद होते. शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले.

परभणीत संघाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
परभणी : शहरासह भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशीही पहायला मिळाले. संतप्त जमावाने स्टेशन रोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. तर ज्येष्ठ वकील अशोक सोनी यांच्या घरावर बुधवारी (३ जानेवारी) देखील जमावाने तुफान दगडफेक केल्याची घटना घडली. त्यासोबतच इतर भागातही दगडफेकीचे प्रकार झाले. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून जमावाला हुसकावून लावले. दरम्यान, घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणाव कायम होता. परभणी शहरातील स्टेशनरोड, बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. तर सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद होत्या. तरी देखील दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही घरे व दुकांनावर जमावाने तुफान दगडफेक केली. यात ओव्हरसिस बँक आणि अँड. अशोक सोनींच्या घरावरीळ काचा मोठ्या प्रमाणात फुटल्या. ही घटना समजताच भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यालयास भेटी दिल्या. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कडकडीत बंद दिसून आला. गंगाखेड, जिंतूर, सेलू येथेही बंद होता. मानवत, सेलू येथे सकाळी रास्ता रोको करण्यात आला.

नांदेडमध्ये पोलिसांवर दगडफेक
नांदेड - शहरातील मंगळवारी सायंकाळी सर्व परिस्थिती नियंत्रणात आली असे वाटत असतानाच रात्री नांदेड शहराततील विजयनगर परिसरातल्या एका व्यापाऱ्याच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी भिंतीचे मोठे नुकसान झाले. एस. टी. महामंडळानेही सर्व फेऱ्या रद्द केल्या होत्या. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एक पथक पोलिस वाहनातून गस्त घालत असताना अचानक एक जमाव समोरून आला आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद मुंडे, जमादार गणेश कानगुले, चालक शिवाजी मुंडे हे जखमी झाले. जखमींपैकी गोविंद मुंडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. छत्रपती चौक, नल्लागुट्टा चाळ, आनंदनगर परिसरात समाजकंटकांनी दगडफेक केली. नल्लागुट्टा परिसरात तीन वाहने पेटून देण्यात आली. दुपारी स्वतः पोलिस अधीक्षक वेगवेगळ्या वसाहतीमध्ये घुसले आणि समाजकंटकांना चांगला चोप दिला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड आगाराला २५ लाख रुपयांचा फटका बसला.


जालन्यात १४ बसची तोडफोड
जालना - सलग दुसऱ्या दिवशी जालना शहर बंद होते. बुधवारी सकाळपासूनच शहरात बंदची सुरूवात झाली बहुतेक सर्व शाळा आणि खासगी कोचिंग क्लासेस, महाविद्यालये बंद होती. जालना मध्यवर्ती बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार गेट बंद करण्यात आले होते. एक देखील बस जालनातर्फे आगारातून बाहेर गेली नाही. दिवसभराच्या या एसटी बस सेवा ठप्प झाल्याने एसटी महामंडळाचे साधारणपणे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले, तर दोन दिवसीय दंगलीत १४ बसची तोडफोड झाली यामध्ये २० लाख रुपयांचे वेगळे नुकसान झाले.
जिल्ह्यातील मंठा शहरातील सगळे व्यवहार बुधवारी सुरळीतपणे सुरू होते मंठा शहरात मंगळवारी बंद पाळण्यात आला होता. परतूर व बदनापूरामध्ये बुधवारी बंद पाळण्यात आला. अंबड, जाफराबाद, भोकरदन व घनसावंगी येथे मंगळवारी व बुधवारी दोन दिवस बंद मुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात कडकडीत बंद
उस्मानाबाद - भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही उमटले. एस. टी. सेवा, बाजार पेठेतील व्यवहार जवळपास ठप्प होते. शाळा, महाविद्यालये बंदच होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र,
शासकीय कार्यालये व बँकांचा कारभार सुरळीतपणे चालू होता. उस्मानाबाद शहरात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी खंदारे यांना एक निवेदन देऊन भीमा-कोरेगाव प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तिविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

हिंगोलीत चार बस जाळल्या
हिंगोली - भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचे पडसाद बुधवारी हिंगोली जिल्ह्यात उमटले. वाशिम रोडवरील कनेरगाव येथे एका बसवर तर सकाळी तीन बसवर मोठी दगडफेक करण्यात आली. त्यासोबतच औंढा नागनाथ येथे अज्ञात व्यक्तींनी तीन बसवर दगडफेक करून नुकसान केले. या व्यतिरीक्त वसमत येथे दोन खासगी वाहने फोडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभुमीवर पोलिस विभागाने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावून कारवाई सुरू केली होती.
औंढा नागनाथ शहरात १ जानेवारीच्या रात्री दहाच्या दरम्यान औंढा बस स्थानकात उभ्या असलेल्या तीन बसवर दगडफेक करून संपूर्ण काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, दलित बांधवांच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.

बीड जिल्ह्यात बंदला प्रतिसाद
बीड- भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी दुसऱ्या दिवशी देखील बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला.
सलग दुसऱ्या दिवशी बीड शहरात व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. गेवराई, परळी, केज, अंबाजोगाई, वडवणी, माजलगाव, धारुर, शिरुर, आष्टी, पाटोदा येथेही बंदचा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. जिल्ह्यातील शाळा - महाविद्यालये सरसकट बंद ठेवण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाने बंदच्या अनुषंगाने प्रवासी वाहतूक बंद केली. राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अंबाजोगाई येथे एक पतसंस्थेच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. यात या पतसंस्था कार्यालयाचे नुकसान झाले. माजलगाव येथील बुधवारी येथे आठवडी बाजार असतो. परंतु बंदचा त्यावर परिणाम झाला. शहरातील हनुमान चौक, संभाजी चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, बीड रोड, मोंढामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘विभागीय क्रीडा संकुलाचे काम सुरू करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
नव्या वर्षात जिल्ह्यासाठी सिव्हील हॉस्पीटलची जागा निश्चिती, विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाची सुरुवात आणि नव्याने चार ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बोलून दाखवला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले, ‘राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यातील एक लाख २० हजार ६९ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी एक लाख पाच हजार ६६३ शेतकऱ्यांच्या खात्यावर २५३ कोटी ८२ लाख रुपये जमा झाले असून उर्वरीत ५७ कोटी ५५ लाख रुपये येत्या दोन दिवसांत जमा होणार आहेत. राज्य सरकारची शेतकरी सन्मान योजना शेवटच्या पात्र लाभार्थ्याचे पैसे बँकेत जमा करेपर्यंत सुरू राहणार आहे. भरलेले अर्ज आणि बँकेकडील माहिती जिथे जुळत नाही, त्याची पडताळणी करण्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर समित्या आहेत. त्या समितीसमोर ही अडचण मांडून ती सोडवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.’
ग्रामीण जिल्हा हगणदारी मुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू असून फक्त २० ते २२ ग्रामपंचायती क्षेत्रात काम शिल्लक आहे. पाच जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. ज्या ग्रामपंचायती उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या सरपंच ग्रामसेवकावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सात बाऱ्याचे संगणीकरण करण्यात लातूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असून जुन्या दस्तएैवजात स्कॅन‌िंग करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्हा रुग्णालयासाठी जागा निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी गंगापूर येथे जाऊन एका जागेची पाहणी केली आहे. विभागीय क्रीडा संकुल मंजूर आहे. परंतु, त्याचे काम सुरू होत नव्हते. ते आता सुरू केले जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत यंदा १४२ गावांचा समावेश असून ते उद्दिष्ट पूर्ण केले जाईल. नवा उपक्रम म्हणून लातूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ माळरानावर सेंद्रिय उसाची शेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील शिक्षण संस्थाचालक असलेले अभ्यासू शेतकरी अशोक पवार यांनी शहरालगत असलेल्या जाधववाडी रोडवरील माळरान जमिनीवर सेंद्रिय खताचा वापर करीत उसाची शेती फुलवून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या माळरान ५ एकर जमिनीत त्यांनी ऊस बेण्याची शेती केली असून त्यातून त्यांना अवघ्या दहा महिन्याच्या कालावधीत खर्च वजा जाता सुमारे १२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात या उस्मानाबाद निर्मित ऊस बेण्याला वाढती मागणी आहे.
उस्मानाबादला लागूनच अशोक पवार यांची शेती आहे. ती शेती अगदी हलक्या प्रतीची. मात्र, याच पाच एकर जमिनीला मागील वर्षी सुरुवातीला सपाट करून त्यात सुमारे ४०० टिप्पर काळी माती व सेंद्रिय खत टाकून तिला उपजावू केले. या जमिनीत त्यांनी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये टिशूकल्चर शास्त्रज्ञ आर. बी. भोईटे व डॉ ए. ए. निकम द्वारा संशोधित ८००५ या वाणाची लागवड करण्याचे नियोजन केले. बांबू आणि ऊस यांचे मिश्रण करून विकसित केलेल्या ऊस बेण्याची त्यांनी लागवड केली.
उपलब्ध पाण्याचे नियोजन करून उसाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. ऊस वाढीसाठी त्यांनी कुठलीही रासायनिक खते न वापरता त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केला. पाठीशी ऊस शेतीचा कुठलाही अनुभव नसताना केवळ पुणे येथील डॉ. निकम व भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिद्दीने व परिश्रम करून उसाची निगा राखली. अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत हा ऊस बांबूसारखा २८ ते ३० कांड्यावर दिमाखात उभा आहे. ८००५ या जातीच्या उसाचा गोडवाही अधिक असून त्यातील साखर उताऱ्याचे प्रमाणही दहापेक्षा अधिक आहे. शिवाय या उसाची उत्पादन क्षमताही अन्य जातीच्या उसापेक्षा अधिक आहे. एकरी १०० टनाहून अधिक असे या उसाचे उत्पादन आहे. त्यामुळेच त्यांच्याकडील या उसाला बियाण्यासाठी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यातील मोहोळ, बार्शी, माढा, सांगोला भागातून वाढती मागणी आहे.
अशोक पवार यांना पाच एकरमध्ये ५०० टनहून अधिक उत्पादन मिळण्याची खात्री आहे. शिवाय सध्या त्यांच्याकडील हा ऊस ३ हजार रुपये प्रति टन या
दराने ऊस उत्पादक शेतकरी स्वखर्चाने घेऊन चालले आहेत. त्यांना या पाच एकर शेतीतून खर्च वजा जाता १२ लाखाचा निव्वळ नफा होणार आहे. हाच ऊस त्यांनी साखर कारखान्याला दिला असता तर त्यांना केवळ ७ लाखाचा फायदा झाला असता. शिवाय ऊस घेऊन जाण्यासाठी त्यांना कारखानदारांची मनधरणी करावी लागली असती. या शेतीसाठी अशोक पवार यांना मुलगा अभिजित यांची साथ लाभत आहे. पवार यांच्याकडील उसाची पहाणी करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अनेक अभ्यासू मंडळींनी भेट दिली आहे.

पेरुच्या बागेची लागवड
उस्मानाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीला लागून पवार यांची डोंगराळ ७ एकर जमीन आहे. या जमिनीत त्यांनी आता यंत्राच्या सहाय्याने एक हजार खड्डे घेऊन त्यात पेरूची लागवड केली आहे. यामध्ये त्यांनी एल-४९, सरदार व तैवान या जातीच्या पेरूची लागवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन विभागाची ९२ टक्के रोपटी जगली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यात वनमहोत्सवात वन विभागाने लावलेल्या रोपट्यापैकी सुमारे ९२ टक्क्यांहून अधिक रोपटी जिंवत आहेत. वन विभागाने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली. रोपट्यांचे जतन व संवर्धनासाठी कसोशीने प्रयत्न केले जात असल्याने वृक्षारोपण यशस्वी झाल्याचे विभागाने नमूद केले आहे.

राज्यात एक जुलै ते सात जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. यात औरंगाबाद जिल्ह्यात १२ लाख तर जालना जिल्ह्यात सहा लाख ५० रोपांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी साडेपाच हजार रोपांची लागवड करण्याची जबाबदारी एकट्या वनविभागाकडे देण्यात आली होती. उर्वरित रोपे विविध शासकीय विभाग तसेच ग्रामपंचायतींच्या मदतीने लावले जातील, असे नियोजन करत संबंधित विभागानाही टार्गेट देण्यात आले होते. दरम्यान, वन विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात पोखरी, दुधड, गोलटगाव, जयपूर, करंजगाव, जांभई, अब्दीमंडी यासह अन्य अशा ४६४ हेक्टर क्षेत्रावर तीन लाख ९९ हजार ७५२ रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. यापैकी किती रोपटे जगली याची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात तीन लाख ६५ हजार ८९३ म्हणजेच ९२ टक्के रोपटे जिंवत असल्याचे आढळून आले.

अन्य विभागाची माहिती नाही
जतन, संवर्धनबाबत कर्मचाऱ्यांनी कसोशीने केलेल्या प्रयत्नामुळे रोप जगण्याचे प्रमाण वाढल्याचे उप वन संरक्षक सतीश वडस्कर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जालना जिल्ह्यात लावलेल्या ७१ हजार ३०० पैकी ६४ हजार ६४० रोपटे आता चांगली वाढली असून, अन्य विभागाने लावलेल्या रोपट्यांपैकी किती जिंवत आहे, याची माहिती अद्याप समजू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेव उद्यान लवकरच साकारणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेरूळ येथील महादेव उद्यानाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, येत्या सहा महिन्यांत उद्यान साकारण्यासाठी वन विभागाने कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र येत्या दहा दिवस प्राप्त होण्याची शक्यता असून, त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रियासह अन्य कार्यवाही केली जाईल, अशी माहिती उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर देवस्थान असल्याने तेथे महादेव वन उद्यान उभारण्याचा निर्णय वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराच्या धार्मिक महत्त्वाशी सुसंगत असे सुमारे पाच हेक्टर परिसरात हे वन उद्यान उभारण्यात येणार असून यानिमित्त पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उद्यानासाठी आवश्यक ती जागा एमटीडीसीकडून यापूर्वीच हस्तांतरित करण्यात आली आहे. बांधकामासाठी निधीचा पहिला हप्ताही वनविभागाला प्राप्त झाला. निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालीही जोमाने सुरू झाल्या, पण नियोजित उद्यान हे वेरूळ लेणी तसेच घृष्णेश्वर मंदिरानजिक येत असल्याने केंद्रीय पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी कार्यवाही झाली, पण गेल्या आठ महिन्यांपासून त्यास मंजुरी मिळाली नव्हती. परिणामी निधी प्राप्त असूनही उद्यानाचे काम वन विभागाला सुरू करता आले नाही.

दरम्यान, यासंदर्भात वन विभागाने केलेल्या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले असून, एनओसी लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती वडस्कर यांनी दिली. उद्यान्याच्या आराखड्यासह अन्य सर्व तयारी यापूर्वीच झाली असून, निविदा प्रक्रियेसह अन्य कार्यवाहीबाबत नियोजन झाले आहे. येत्या सहा महिन्यांत उद्यानाचे काम पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

असे असेल उद्यान
उद्यानाच्या नियोजित जागेतून एक मोठा नाला जातो. त्यावर बंधारा बांधणे, एक लाकडी पूल उभारण्याचे नियोजन आहे. भव्य प्रवेश द्वार, एक हजार ७०० मीटरची निसर्ग पाऊल वाट, ठिकठिकाणी बसण्यासाठी ठिकठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीचे आसन, उपहारगृह, स्वच्छतागृह, खेळणी, वन्यप्राण्याचे पुतळे, पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती, कृत्रिम धबधबे, दगडाच्या कलाकृती यासह अन्य आकर्षक बाबी या उद्यानात असणार आहेत. उद्यानात प्रामुख्याने भगवान शंकरांना आवडणारी फुले, झाडांची लागवड केली जाणार आहे. यात रुद्राक्ष, विविध पांढऱ्या रंगाची फुले असणारी झाडे, बोगनवेली, तुळस त्याचप्रमाणे वड, पिंपळ, उंबर लावली जाईल, अशी वन विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images