Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हात पाय बांधून युवकाला जाळले

0
0


म. टा. प्रतिनिधी, जालना
तारेने हात पाय बांधून युवकाला जिवंत जाळल्याच्या घटनेने सोमवारी जालना जिल्ह्यात खळबळ उडाली. पाथरवाला - शहागड रस्त्यावर कुरण फाट्याजवळ ही घटना घडली. अनंत श्रीकांत इंगोले (वय २७) असे मृताचे नाव असून, तो बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील रहिवासी आहे.

श्रीकांत हा तेथील ग्रामपंचायतमध्ये ऑपरेटर म्हणून काम पाहात होता. यासोबतच तो आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करण्याचे काम करायचा. काही महिन्यांपूर्वी त्याने हायवा ट्रक भागिदारीत खरेदी केला व मुंबईला तो किरायाने दिला. दरम्यान सध्या तो बँकींगच्या परिक्षेसाठी औरंगाबादला रूम किरायाने घेऊन राहत होता. रविवारी तो औरंगाबादहून बीडकडे जाताना पाचोड येथे जेवणासाठी थांबला. त्यावेळी आपला मित्र नवनाथ चव्हाण याला त्याने फोन करून आपल्या जीविताला धोका असल्याचे सांगितले होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. तसेच त्याने आपला भाऊ गोविंद इंगोले यांनाही एसएमएस करून आपल्या सोबत धुमाळ आहे आणि मला २१ लाख रुपये येणे आहे, असे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान ही घटना घडली.

सुरक्षा रक्षकांनी कळवले
सदर घटनेची माहिती समर्थ साखर कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर गोंदी पोलिसांनी तात्काळ घटना स्थळ गाठले. त्यावेळी श्रीकांतचे शरीर जळालेल्या अवस्थेत आढळून आले. तर हात पाय तारेने बांधलेले होते. दरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणाधिकारी कधी येणार ?

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पद जवळपास वर्षभरापासून रिक्त आहे. नाही म्हणायला नियुक्त झालेले शिक्षणाधिकारी काही दिवसांतच बडतर्फ झाले आणि अडचण पुन्हा कायम झाली. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महत्वाचे असलेल्या शिक्षण विभागाकडे सरकारचेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शिक्षणाधिकारी कधी येणार ? याची प्रतीक्षा कायम आहे.

आर. एस. मोगल ३१ मार्च २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर कोण येणार ? अशी नुसती चर्चा सुरू होती. स्थायी शिक्षणाधिकारी म्हणून येण्यासाठी अनेकजण उत्सुक होते, पण त्यांची डाळ मुंबईत शिजली नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना तरी शिक्षणाधिकारी लाभतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. दरम्यान शिक्षण विभागांतर्गत काही पदोन्नती झाल्या. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्या गेल्या. त्यात उपशिक्षणाधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे सहा महिन्यांनंतर भरली गेली. एकवेळ जिल्हा परिषदेत अशी परिस्थिती होती शिक्षणाधिकारी, दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त होती. तेव्हा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार सांभाळला. दरम्यान शिक्षणाधिकारी म्हणून अशोक कडूस नगरहून रुजू झाले. मंत्रालयात एका प्रकरणात त्यांची चौकशी सुरू होती. रुजू झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या बडतर्फीचे आदेश आले. त्यामुळे शिक्षणाधिकारीपद पुन्हा रिक्त झाले. ते जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरी भरले गेलेले नाही.

ग्रामीण भागावर परिणाम
जिल्ह्यातील दहा हजार शिक्षक, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ज्या कार्यालयाच्या हातात आहे त्याचे प्रमुखपदच रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक कामकाजावर विपरित परिणाम झालेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कडूस यांच्या बडतर्फीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे, पण ते कुठे रुजू होणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. दहा महिने संपत आले तरी स्थायी शिक्षणाधिकारी लाभत नसल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे मात्र हाल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची कामे मार्गी लावणार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे कित्येक महिन्यांपासून दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने देताच प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. बी. चव्हाण यांच्या दालनात शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. वारंवार निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विविध प्रश्नांवर उकल होईपर्यंत एकेका विषयावर चर्चा होऊन प्रश्न मार्गी लागण्याचा आराखडा तयार करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी एन. के. देशमुख उपस्थित होते. सर्व तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला राष्ट्रीयीकृत बँकेतच करणे शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. जिल्हा परिषद स्तरावरून थेट शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करण्याची सुरू झालेली कार्यवाही अचानक बंद का झाली ? याबाबतही प्रशासनाने काहीच उत्तर दिले नाही. या प्रश्नी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

जिजाऊ जयंती निमित्त १२ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्याची व जिजाऊ सप्ताह साजरा करण्याची मागणी शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, सुटी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पदवीधर शिक्षकांची दिलेली वेतनश्रेणी, आरक्षण व न्यायप्रविष्ट प्रकरणांवरही चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष दीपक पवार स्वतः एका याचिकेचे याचिकाकर्ते आहेत. कोर्टात अजुन केस प्रलंबित असताना अंतिम निकाल येईपर्यंत जैसे थे हे प्रकार थांबवण्याची मागणी शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली. प्रशासनाने बहुतांश मुद्यांची दखल घेतल्याने शिक्षक सेनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. बैठकीत शिक्षक सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, सरचिटणीस सदानंद माडेवार, कोषाध्यक्ष लक्ष्मण ठुबे, उपाध्यक्ष विनोद पवार, प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, तालुका अध्यक्ष अमोल एरंडे आदी उपस्थित होते.

चटोपाध्याय वेतनश्रेणी;आठ दिवसांत कार्यवाही
तीन वर्षांपासून प्रलंबित चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्तावाबद्दल चर्चा करण्यात आली. आठ दिवसांत शिक्षण विभागाच्या वतीने कार्यवाही पुर्ण होणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. वस्तीशाळा शिक्षकांच्या वेतनश्रेणी बाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित स्थायी, भाषा सूट प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. कन्नड तालुक्यातील ४२९ शिक्षकांच्या यादीवर श्रीमती लाठकर यांनी स्वाक्षरी करून जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्याकडे यादी सुपुर्द केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘भूमिगत’साठी कर्ज काढण्यास विरोध

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी हडकोकडून ९८ कोटींचे कर्ज घेण्यास नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. याच मुद्द्यावर पुढील सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारची सर्वसाधारण सभा तहकूब केली.

महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भूमिगत गटार योजनेसाठी कर्ज काढण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला माजी महापौर त्र्यंबक तुपे, भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी विरोध केला. यावर बोलताना महापौर म्हणाले, ‘प्रस्ताव ९८ कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा असला, तरी भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी ५८ कोटी रुपयेच लागणार आहेत. सभागृहाच्या भावना लक्षात घेवून योग्य तो निर्णय केला जाईल.’ राजू शिंदे म्हणाले, ‘भूमिगत गटार योजनेसाठी शासनाकडून किती निधी आला, त्यापैकी किती खर्च झाला याचा तपशील सभागृहाच्या समोर मांडवा.’ त्र्यंबक तुपे म्हणाले, ‘९८ कोटींच्या कर्जासाठी १२५ कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता गहाण ठेवाव्या लागणार आहेत. महापालिकेने आतापर्यंत किती मालमत्ता गहाण ठेवल्या, किती मालमत्ता शिल्लक आहेत याचाही खुलासा झाला पाहिजे.

पालिकेच्या एकूण मालमत्ता किती?
प्रशासनाला आदेश देताना महापौर म्हणाले, ‘महापालिकेच्या मालमत्तांची माहिती सभागृहाच्या समोर ठेवा. पालिकेच्या एकूण मालमत्ता किती आहेत, त्यांची किंमत किती आहे, मालमत्तांबद्दलचे सॉलंसी सर्टिफिकेट, महापालिकेवर असलेले कर्ज, कर्जाचा हप्ता, महापालिकेचे उत्पन्न, बांधिल खर्च याचा तपशील पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या स्वरुपात सादर करा. २६ जानेवारीपूर्वी सर्वसाधारण सभा घेवून कर्जाबद्दल निर्णय घेतला जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलसचिवांच्या मुलाखतीची साशंकता

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने कुलसचिवपदासाठी मुलाखती घेण्याची तयारी केली आहे. कुलपती कार्यालयाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असल्यामुळे मुलाखती स्थगित होण्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसांत प्र-कुलगुरू रूजू होतील आणि प्रभारी अधिष्ठातांना मुदतवाढ दिल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले.

विद्यापीठातील कुलसचिवांची निवड प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडली आहे. प्रभारी कुलसचिव प्रशासकीय कारभार सांभाळत आहेत. काही प्रभारी कुलसचिवांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त ठरला. सध्या डॉ. साधना पांडे प्रभारी कुलसचिव आहेत. या पदासाठी जाहिरात दिल्यानंतर २७ अर्ज आले होते. छाननी प्रक्रियेत १६ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्यामुळे ११ उमेदवारांची मुलाखत होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने २० जानेवारीला मुलाखती घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, राज्यपाल कार्यालयाकडून हिरवा कंदिल नसल्यामुळे मुलाखतींबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अंतिम सूचनेची प्रतीक्षा करीत आहोत. परवानगी मिळाल्यानंतर मुलाखती होतील. अन्यथा, मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. मुलाखतीसाठी निवड समितीतील सदस्यांना पत्रे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठात कुलसचिवासह प्रमुख पदांवर प्रभारी अधिकारी आहेत. कुलसचिवांची निवड झाल्यानंतर इतरही पदे कायमची भरली जाण्याची शक्यता आहे. प्र-कुलगुरू पदाच्या मुलाखती होऊन तीन महिने झाले आहेत. या पदासाठी तीन उमेदवारांनी मुलाखत दिली. मात्र, आतापर्यंत नाव जाहीर करण्यात आले नाही. येत्या आठवड्यात प्र-कुलगुरू रूजू होण्याची शक्यता आहे असे चोपडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्र-कुलगुरू कोण असतील याची चर्चा रंगली आहे.

अधिष्ठातांना मुदतवाढ
सध्या विद्यपीठात चार प्रभारी अधिष्ठाता आहेत. कायमस्वरुपी अधिष्ठाता नेमण्यासाठी जाहिरात देण्याची विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, राज्य शासनाने या पदासाठी आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे जाहिरातीला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे प्रभारी अधिष्ठातांना मुदतवाढ दिली आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईपर्यंत प्रभारी अधिष्ठाता पदावर राहतील असे चोपडे यांनी सांगितले.

नामविस्तार दिनाची तयारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनाची विद्यापीठात तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मंगल खिंवसरा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा प्रकरणामुळे राज्यातील इतर वक्त्यांशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे प्रा. खिंवसरा यांना विनंती केली, असे चोपडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदर्शनातील ज्ञानातून प्रत्यक्ष कृती करा

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा, परिसंवादांमधून मिळालेल्या ज्ञानातून प्रेरणा घेऊन आपण यश मिळविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी,’ असे आवाहन राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी सोमवारी केले.

अयोध्यानगरीत गेल्या चार दिवसांपासून आयोजित असलेल्या महा अॅग्रो कृषी प्रदर्शनाच्या समारोप डॉ. गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी डॉ. गोयल म्हणाले, ‘कमी जमीन, कमी पाऊस अशा कोणत्याही सबबी आता चालणार नाहीत. जमिनीचा प्रत्यके इंच आणि पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याची जिद्द आपण बाळगली पाहिजे. तसे करून यश मिळविलेल्यांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली पाहिजे. शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही. आपण अन्नदाता आहेत हे मनात ठसवा. तुम्ही डोळसपणे प्रयत्न आणि कष्ट करा. भरभराट होईलच,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समारोप सत्रात नाशिकच्या सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे आणि अभिनव फार्मर्स क्लब पुणेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर बोडखे, डॉ. कृष्णा लव्हेकर, शंकरराव नागरे आदींनी मार्गदर्शन केले. दरम्यान, या चारदिवसीय प्रदर्शनास हजारो शेतकऱ्यांसह अभ्यासक, विद्यार्थी, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तसेच बचत गट निर्मिती वस्तूंनाही मोठी मागणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किती वेळ पाणीपुरवठा?

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील नागरिकांना किती वेळ पाणीपुरवठा केला जातो, किती ठिकाणी अनधिकृत नळ जोडणी करण्यात आली, याची माहिती सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिले.

मालमत्ता कर, पाणीपट्टी नियमित भरूनही रोहिला गल्लीत नियमित पाणीपुरवठा करण्यात येत नाही. जो पाणी पुरवठा करण्यात येतो, तोही अपुरा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावला. नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, पाणी पुरठयाचा कालावधी वाढवावा, अशी विनंती याचिकेत केली आहे.

याप्रकरणी पालिकेने शपथपत्र दाखल केले. त्यात पाणीपुरवठ्याची साधन-सामुग्री अपुरी आहे. शहरातील पाणी पुरवठ्याची पाइपलाइन जुनी आहे. अनेक ठिकाणी नळाची जोडणी गंजलेली आहे. समांतर योजना कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याची नियमित तजवीज करण्याचा प्रयत्न पालिका करत असली तरी उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान कायम असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

पाणीपुरवठ्याची स्थिती
- १९७५ मध्ये औरंगाबाद शहराची जुनी पाणीपुरवठा योजना (जायकवाडी ते नक्षत्रवाडी) कार्यान्वित करण्यात आली.
- २८ एमएलडी या योजनेची क्षमता होती.
- १९८४ - ८५ मध्ये या योजनेची क्षमता वाढवून ५६ एमएलडी करण्यात आली.
- १९९१मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून १०० एमएलडीची नवीन योजना करण्यात आली.
- १२१९ मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते फारोळा दरम्यान या योजनेअंतर्गत टाकण्यात आली.
- १४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी नक्षत्रवाडी ते शहरापर्यंत टाकण्यात आली. स्वजल निर्मल अभियानातून हे काम करण्यात आले.
- २००३मध्ये सिडको - हडकोसाठी नक्षत्रवाडी येथील एमबीआर पासून (संतुलित जलकुंभ) एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली.
- १५० ते १६० एमएलडी पाणी दररोज जायकवाडी येथून उचलले जाते.
- १२० ते १३० एमएलडी पाणी शहरापर्यंत पोचते.
- ३० एमएलडी पाण्याची गळती होते.
- १३५ लिटर एका व्यक्तीला पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.
- ७० ते ९० लिटर सध्या प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा.
- ३ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने गैरसोय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणोरी, आळंद आरोग्य केंद्र राज्यात अव्वल

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम) नॅशनल सर्टिफिकेशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पाहणीत औरंगाबाद जिल्ह्यातील गणोरी (ता. फुलंब्री) आणि आळंद (ता. सिल्लोड) या प्राथमिक केंद्रांनी अव्वल स्थान पटकाविले.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापण्यात आली. या केंद्रांमधून सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. केंद्र सरकारच्या एनएचएम अंतर्गत नॅशनल सर्टिफिकेशन कार्यक्रमांतर्गत डिसेंबर महिन्यात आरोग्य केंद्रांची पाहणी करण्यात आली. १२ प्रकारचे निकष या केंद्रांमधून पाळण्यात येतात की नाही, याची तपासणी दिल्लीतील पथकाने केली होती. केंद्रीय आरोग्य विभागाने या पाहणीचा निष्कर्ष नुकताच जाहीर केला आहे. गणोरी केंद्राला ९१.३२ टक्के गुण मिळाले असून पुढील तीन वर्षांसाठी उत्कृष्ट दर्जाबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. गणोरी केंद्र आयएसओ मानांकनप्राप्त असून या ठिकाणी रुग्णसेवेच्या बाबतीत चांगल्या सुविधा पुरविल्या जातात. सिल्लोड तालुक्यातील आळंद केंद्राला ८९.६८ टक्के गुण मिळाले असून नॅशनल क्वालिटी सर्टिफिकेशनसाठी आवश्यक असलेले सर्व निकष असल्याचा शेरा पत्रातून दिला आहे.

काय पाहिले निकष
स्वच्छता, रेकॉर्ड, प्रसुती प्रमाण, आंतररुग्ण, बाह्य रुग्णांचे प्रमाण, परिसर स्वच्छता, डॉक्टरांनी अटेंड केलेल्या प्रसुती, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तक्रारपेटी, वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, रुग्णांचे, नागरिकांचे रुग्णालयाबद्दलचे मत आदी मुद्दे तपासून गुणांकन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सद्‍भावना मूक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात शांतता व जातीय सलोखा कायम राहावा तसेच आरएसएसच्या विरोधात शहरातून शिवराय ते भीमराय सदभावना मूक रॅली सोमवारी दुपारी काढण्यात आली. क्रांतीचौकापासून निघालेली ही रॅली भडकलगेट येथे विसर्जित करण्यात आली. यामध्ये मराठा, आंबेडकरवादी व डावे पक्ष संघटना तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

क्रांतीचौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये विविध मागण्याचे फलक तसेच विविध रंगाचे ध्वज घेऊन महिला, पुरुष व नागरिक सहभागी झाले होते. क्रांतीचौक, नूतन कॉलनी, पैठणगेट, औरंगपुरा, मिलकॉर्नर मार्गे भडकलगेट येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी विविध मागण्याचे वाचन करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी कोरेगाव भीमा दंगलीचे सूत्रधार संभाजी उर्फ मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. फटागंडे कुटुंबाला ३० लाखांचे तसेच आष्टी, नांदेड येथे पोलिसांच्या लाठीहल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या आईवडिलांना ३० लाखांचे अर्थ सहाय देण्यात यावे, भीमा कोरेगाव येथील दंगेखोरांना अटक करावी तसेच आंबेडकरी जनतेच्या तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांची नुकसानभरपाई द्यावी. राज्यात अनेक तरुणांवर दंगल, खुनाचे प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घ्यावेत तसेच अटकसत्र थांबवावे, लाठीमार करणाऱ्या पोलिसांना निलंबीत करावे, पोलिसांनी नुकसान केलेल्या वाहनांची नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्या मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात यावेळी करण्यात आल्या. यावेळी एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त साधना सावरकर यांना या मागण्याचे निवेदन दिले.

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या संघटना
संभाजी ब्रिगेड, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय मराठा महासंघ, भारीप बहुजन महासंघ, स्वाभिमानी अखिल भारतीय छावा, अखिल भारतीय शिवक्रांती संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय छावा, ‌शिवप्रहार, माकप, संभाजी सेना, छावा, बुलंद छावा, मराठा सेवा संघ, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, रिपाई गवई गट, फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन, एआयएसएफ, एसएफआय, डिवायएफआय, लाल निशान पक्ष, वेलफेअर पार्टी ऑफ इंडीया, जमात ए इस्लामी, जिवा सेना, तंजीम ए इन्साफ, जनता दल सेक्युलर, समता विध्यार्थी आघाडी, महात्मा फुले युवा दल, ‌मुळ निवासी संघ, बामसेफ, बीआरपी, स्वराज इंडीया, भिम आर्मी, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, भिमशक्ती कर्मचारी युनियन, सत्यशोधक समाज, मुप्टा, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र महाक्रांति सेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घृष्णेश्वर’च्या गाळपाला आक्षेप

0
0

कन्नड : घृष्णेश्वर शुगर्स प्रा. लि. बेकायदा ऊस गाळप करत असून, गाळपासाठी कन्नड तालुक्यातून ऊस उचलत आहे. या व इतर बेकायदा बाबींवर साखर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी बारामती अॅग्रोने केली आहे.

बारामती अॅग्रोकडून मिळालेल्या माहितीवरून; गदाना येथील घृष्णेश्वर शुगर्सला २०१६- १७ व १७-१८ या हंगामात गाळप परवाना मिळालेला नव्हता. या साखर कारखान्यास हवाई अंतर प्रमाणपत्र मंजूर नसताना २०१६-१७मध्ये उसाचे गाळप केले आहे. याबाबत बारामती अॅग्रोने २२ सप्टेबर २०१७ रोजी साखर आयुक्त पुणे कार्यालयात तक्रार दिलेली आहे. घृष्णेश्वर शुगर्सकडून कन्नड तालुक्यातील ऊस खरेदी केला जात आहे. ‘घृष्णेश्वर’ बेकायदा उसाचे गाळप करीत असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र साखर कारखान्याचे क्षेत्राचे आरक्षण व गाळप ऊस पुरवठा करण्याचे नियमन आदेश १९८४चे व उस नियंत्रण दुरुस्ती आदेश २००६, विशेष म्हणजे अत्यावश्यक वस्तुंचा कायदा १९५५ या सर्व कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. अशा कार्यपद्धतीचा फक्त त्यांच्या कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याच्या विश्वास आणि आर्थिक स्थितिवर विपरित परिणाम होत नसून, यामध्ये राज्य सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कारवाईची मागणी
याबाबत बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले की, घृष्णेश्वर शुगर्स यांना आवश्यक तो गाळप परवाना व एरियल डिस्टन्स प्रमाणपत्र मंजूर नसतानाही २०१७-१८चा गाळप हंगाम सुरू ठेवण्याची शक्यता अाहे. त्यांच्याविरुद्ध १९५५ कलम सातअंतर्गत दखलपात्र गुन्हा दाखल करत आहोत. हा कारखाना दंडास पात्र असून, यासाठी त्यांच्या प्राधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६९ दिवस व्हेंटिलेटरवरील झुंज यशस्वी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जीबीएस’ म्हणजेच गुलियन बॅरी सिन्ड्रोम या दुर्मिळ आजारामुळे शरीर लुळे पडले आणि श्वास घेणेही अशक्य झाले. त्यामुळेच तब्बल १०३ दिवस घाटीच्या ‘एमआयसीयू’मध्ये दाखल करावे लागले. त्यातील तब्बल ६९ दिवस मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आणि इतर अनेक उपचारही करावे लागले. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे के. के. ग्रुप धावून आला आणि घाटीच्या डॉक्टरांनीही शर्थ लढविली आणि मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. मुलाची जिद्दही कामाला आली आणि त्याने आपला वाढदिवस सोमवारी रुग्णालयात साजरा केला.

आसई (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील एका सामान्य कुटुंबातील ऋषिकेश कैलास सुसर हाच तो जिद्दी मुलगा. एक दिवस अचानक त्याचे शरीर लुळे पडले आणि अगदी श्वास घेणेही कठीण होऊन बसले. त्यामुळे त्याला घाटीत दाखल करण्यात आले आणि गुलियन बॅरी सिन्ड्रोम हा दुर्मिळ आजार जडल्याचे स्पष्ट झाले. गुंतागुत वाढत गेली आणि श्वास घेणेही अशक्य झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. वेगवेगळे उपचार व इंजेक्शन्सही द्यावे लागले. घरची स्थिती नाजूक असल्यामुळे ‘के. के. ग्रुप’ मदतीला धावून आला व ग्रुपने अनेक आवश्यक औषधे-इंजेक्शन्स उलब्ध करून दिली. दीर्घ उपचाराअंती ऋषीकेशची प्रकृती सुधारली आणि नंतर त्याला वॉर्डात हलविण्यात आले. १०३ दिवस एमआयसीयूमध्ये व त्यातील ६९ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर सद्यस्थितीत ऋषिकेशची प्रकृती पूर्वीच्या तुलनेत खूप सुधारली आहे. तो पूर्णपणे चालता-फिरता झाला नसला तरी तो आजारमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. फिजिओथेरपी-ऑक्युपेशनल थेरपीनंतर तो चालू-फिरू शकेल, असेही रुग्णालयातून सांगण्यात आले. यानिमित्त अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनीही उपचार करणाऱ्या टीमचे कौतुक केले.

तीन वेळा झाला न्युमोनिया
उपचारादरम्यान, ऋषिकेशला दोन ते तीन वेळा न्युमोनिया झाला व त्याचे रक्त शुद्ध करण्यासाठी पाच ते सहा वेळा ‘प्लाझ्मा फेरेसिस’ची उपचार प्रक्रिया करावी लागली. या काळात त्याला वेळोवेळी व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. गुलियन बॅरी सिन्ड्रोम या आजारामध्ये शरीराच्या पेशी स्वतःच्याच शरीराविरुद्ध कार्य करू लागतात व त्यामुळे ‘नर्व्ह डॅमेज’ची तीव्र समस्या उद्भवते व शरीराचे नियंत्रण जाते. वेगवेगळ्या लसींचा दुष्परिणाम म्हणून कालांतराने हा आजार क्वचितप्रसंगी जडू शकतो किंवा विषाणुजन्य आजारांमुळेदेखील हा आजार होऊ शकतो, असे ऋषिकेशवर उपचार करणारे सहयोगी प्रा. डॉ. प्रभाकर जिरवणकर यांनी सांगितले. तर, डायरियाचे विषाणू हेदेखील ‘जीबीएस’च्या मुळाशी असू शकतात, असे विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या.

रुग्णालयात कापला केक
ऋषिकेशचा सोमवारी वाढदिवस होता व योगायोगाने त्याला सोमवारीच सुटी देण्यात आली. यानिमित्तने त्याचा केक कापण्यात आला. या प्रसंगी के. के. ग्रुपचे अखिल अहमद, किशोर वाघमारे, आशू सिद्धीकी, जुनेद शेख, जमीर पटेल, इद्रीस नवाब, पोलिस निरीक्षक राजश्री आडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंगोलीत अतिक्रमणांवर हातोडा

0
0



हिंगोली ः स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी झालेल्या हिंगोली नगर परिषदेने अतिक्रमणांविरोधातही कारवाई हाती घेतली आहे. शहरात स्वच्छता मोहीम राबविताना, सकाळी सहा वाजता नांदेड नाका परिसरामध्ये अतिक्रमणांवर हातोडाही चालविला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील स्पर्धेत हिंगोली नगर परिषदेचा समावेश झाला आहे. हिंगोली नगर परिषदेने शहरातील स्वच्छतेच्या जनजागृतीसह इतर उपक्रम हाती घेतले आहेत. या कामांबरोबरच शहरातील अतिक्रमण हटविण्याचे कामही नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी अग्रसेन चौक, औंढा रोड, बस स्थानक ते इंदिरा गांधी चौक व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर असणारे अतिक्रमण हटविण्यात आले. हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील व शहर पोलिस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक तानाजी चेरले यांच्या पथकाने सकाळीच मोहीम सुरू केल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार-दुचाकी अपघातात सिल्लोडचे शिक्षक मृत्युमुखी

0
0

सिल्लोड : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर लिहाखेडी फाट्यावर कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता घडला.

मृताचे नाव सय्यद अर्शद हुसैन अल्ताफ हुसैन (वय ४८, रा. सिल्लोड) असे आहे, तर त्यांचा मुलगा सय्यद अब्दुल रहेमान सय्यद अर्शद हुसैन (वय २०) व त्यांच्या सोबत असलेला शेख मुजाहेद शेख लतीफ (वय ३२, रा. सिल्लोड) हे दोघे गंभीर जखमी झाले.

अधिक माहिती अशी की, सिल्लोड येथून सय्यद अर्शद हुसैन हे त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान व शेख मुजाहिद या दोघांसोबत मोटरसायकलवरून (क्रमांक एमएच २० सीपी ३२२४) अजिंठाकडे जात होते. लिहाखेडी फाट्याजवळ समोरून येणारी इंडिका कारने (क्रमांक एमएच २० बीएन ३००८) समोर जोरदार धडक दिल्याने सय्यद अर्शद हुसैन हे जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा सय्यद अब्दुल रहेमान सय्यद अर्शद हुसैन व शेख मुजाहेद शेख लतीफ़ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

सिल्लोड येथे शिक्षक
मृत सय्यद अर्शद हुसैन हे सिल्लोड येथील नॅशनल शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाइक व नागरिकांनी मोठीत गर्दी केली. नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी राईस खान, मुख्याध्यापक शेख मुख्तार आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनासाठी २५० कोटींचे अनुदान द्या

0
0

भूसंपादनासाठी २५० कोटींचे अनुदान द्या
पालिका शासनाला प्रस्ताव पाठवणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
शहर विकास योजनेतील रस्ते रुंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी किमान २५० कोटी रुपयांचे अनुदान द्या, अशी मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेतर्फे शासनाला पाठवण्यात येणार आहे. शासनाने अनुदान दिल्यास रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर करता येणार आहे.
शहर विकास योजनेतील १४ रस्त्यांचे रुंदीकरण पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले. त्यानंतर ओम प्रकाश बकोरिया यांनी विकास योजनेतील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा विषय हाती घेतला. सुमारे १६ रस्त्यांचे मार्किंग करण्याचे आदेश त्यांनी नगर रचना विभागाला दिले होते. त्यानुसार काही रस्त्यांचे मार्किंग करण्यात आले. भूसंपादन करून विकास योजनेतील १६ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी पालिकेला कोट्यावधी रुपयांचा खर्च येणार आहे. महापालिकेकडे तेवढा निधी नसल्यामुळे शासनाने भूसंपादनासाठी पालिकेला २५० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, असे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सांगितले. प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच तो शासनाला पाठवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत पाणीबाणी

0
0

म. टा.प्रतिनिधी, खुलताबाद
यावर्षी खुलताबाद तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे येसगाव येथील गिरीजा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे खुलताबाद शहरवासीयांना ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागल्याने नगर पालिकेने तातडीने नवीन विहिरीचे खोदकाम हाती घेतले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर व मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी ‘मटा’ला दिली.

गिरीजा प्रकल्पात असलेल्या नगर पालिकेच्या मालकीच्या तीन विहिरीतील पाणी एकत्र करून चारीतून पंपिंग हाउसपर्यंत आणले जात आहे. खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरिजा मध्यम प्रकल्प येसगाव येथे नवीन विहिरीच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष कमर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, पाणीपुरवठा सभापती सईदा बेगम, पाणीपुरवठा अभियंता सचिन तोंडेवाड, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, अविनाश कुलकर्णी, मच्छिंद्र लिंगायत, गजानन पाटील फुलारे, अशोक भालेराव, सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

येसगाव ते खुलताबाद १७ किलोमीटर पाइप लाइनद्वारे खुलताबाद येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पोचायला आठ तास सतत पंपिंग करावे लागते. त्यानंतरच शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होतो. विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने सध्या चार तास पंपिंग होत आहे. पाण्याची टाकी भरत नसल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा कर्मचारी कासिम बेग यांना नागरिकांनी, ‘पाणी का येत नाही,’ अशी विचारणा करून धक्काबुक्कीही केली. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एक दीड वर्षांपासून चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, आता प्रकल्पातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. १५ हजार लोकसंख्येच्या खुलताबाद शहराला टँकरने पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. पावसाळ्याला सहा-सात महिने असताना हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

पर्यायी उपाययोजनांची गरज
पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती पाहता येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून खुलताबाद व फुलंब्री तालुक्यातील १८ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यावर्षी प्रकल्प कोरडाठाक पडल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पर्यायी उपाययोजनांचे नियोजन करण्याची गरज आहे.अन्यथा प्रशासनाला जनक्षोभाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिल्लोडमध्येही पाण्याचे टेन्शन
सिल्लोड ः सिल्लोड शहर आणि तालुक्यातील २५ टक्के गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या खेळणा मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, नगर पालिका प्रशासनाने खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी आणण्याची तयारी सुरू केली आहे. तेथील एक अब्ज घनफूट पाणी सिल्लोड आणि भोकरदनसाठी राखीव आहे. तेथून पाइप लाइन अंथरण्यात येणार आहे.

वैजापूरमध्ये चिंता नाही
वैजापूर ः यावर्षी नाशिक जिल्ह्यातील धरणांतून दर दोन महिन्यांनी वैजापूर शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येत आहे. ते पाणी भोयगाव प्रकल्पात आणून तेथून वैजापूर शहरास पुरविले जाते. त्यामुळे यावर्षी वैजापूरकरांना पाण्याची चिंता सतावणार नाही. सध्या वैजापूरमध्ये दर दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर नारंगी प्रकल्पातही यावर्षी पाणी आहे. तेही वैजापूर शहरासाठी वापरण्यात येते.

फुलंब्रीतही जलचिंता
फुलंब्री ः गेल्यावर्षी तुलनेत कमी पाऊस पडल्यामुळे येत्या उन्हाळ्यात फुलंब्री शहरात पाणी टंचाई भासण्याची चिन्हे आहेत. फुलंब्री मध्यम प्रकल्पातील विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पातील साठा जोत्याच्या खाली आहे. सध्या विहिरीला पाणी अाहे. या योजनेतून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे तूर्त चिंता नाही, मात्र उन्हाळ्यात फुलंब्रीकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

कन्नडमध्ये जुलैपर्यंत चिंता नाही
कन्नड ः अंबाडी प्रकल्पातून कन्नड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या या प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याच्या खाली आहे. हे पाणी कन्नड शहराला जुलैअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे कन्नडकरांना यावर्षी पाण्याची चिंता सतावणार नाही, असे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लातूर कॅन्सरमुक्त करण्याचे लक्ष्य ः निलंगेकर

0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विभागांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. यातून जिल्ह्यातील विकास कामांना अधिक गती प्राप्त होणार आहे. त्याकरीता अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी चर्चा करुन तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. जिल्हा अंधत्व व कॅन्सरमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत, अशा सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी दिल्या.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर लातूर जिल्ह्यातील विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पपूर्व आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्हा अंधत्व व कॅन्सरमुक्त व्हावा, असा संकल्प या बैठकीत पालकमंत्री निलंगेकर यांनी केला आहे. संपूर्ण राज्यासाठी हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ राहणार आहे. याकरीता आरोग्य विभागाने प्रत्येक दिवसासाठी कार्यक्रम आखावा आणि त्याची अंमलबजावणीची माहिती दररोज जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना द्यावी. या संबंधित असलेल्या विविध योजनांचा मंत्रालयस्तरावरील पाठवुरावा करण्यात येईल. जिल्हा अंधत्व व कॅन्सरमुक्त करणे ही आपल्या सर्वाची जबाबदारी असून, यासाठी सर्वानीच निर्धार करावा.’ मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळावा, यासाठी आलेले प्रस्ताव विनाविलंब दाखल करावेत, याबाबत विशेष सूचना दिल्या.
जिल्ह्यात सीएसआर अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असुन या कामांचे प्रस्ताव तातडीने द्यावेत, अशी सुचना करुन पालकमंत्री निलंगेकर यांनी या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मंजूर करुन देण्याची ग्वाही दिली. जिल्हा नियोजन समिती आणि विकास मंडळामार्फत प्राप्त होणारा निधी शिल्लक राहता कामा नये, याची विशेष दक्षता घ्यावी असे सांगुन या माध्यमातून जास्तीत लाभार्थ्याना लाभ मिळावा याकरीता तातडीने कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा त्यांना मिळावा, यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाने कोणतेही हलगर्जी करू नये अशा सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सोळा हजार वीज मीटर बदलणार

0
0

शहरातील सोळा हजार वीज मीटर बदलणार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :
शहरात रिमोटद्वारे होणारे वीज चोरीचे प्रकार रोखण्यासाठी आता महावितरणकडूनच उपाययोजना केली जात आहे. वीज मीटर छेडछाडीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता स्मार्ट वीज मीटर वापरले जाणार आहे. या मीटरमध्ये छेडछाड केल्यास ते अधिक वेगाने धावणार असून यात बस‌विण्यात आलेल्या चीपमधून सहा महिन्यांचा डाटा सहज उपलब्‍ध होऊ शकतो.
औरंगाबाद शहरात वर्षभरापूर्वी रिमोटद्वारे वीज मीटरमध्ये छेडछाड करण्याचे प्रकार उघड झाले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर शहरात वीज चोरी रोखण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत अनेक वीज ग्राहकांनी वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतरही विजेच्या होत असलेल्या वापरापेक्षा वीज बिलाची रक्कम कमी येत असल्याने आधुनिक पद्धतीचे वीज मीटर आणण्याचा प्रस्ताव वीज महामंडळाकडे देण्यात आला होता.
या प्रस्तावाप्रमाणे महामंडळाने एचपीएल कंपनीचे वीज मीटर पाठविले आहेत. एकूण बारा हजार वीज मीटर पहिल्या टप्प्यात पाठविण्यात आले आहेत. शहरातील कमी वीज बिल असलेल्या वीज ग्राहकांना तसेच फॉल्टी असलेल्या वीज ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसवून दिले जाणार आहेत. या कारवाई अंतर्गत शहरात १६ हजार वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलण्यात येणार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली.
काय आहे स्मार्ट वीज मीटरमध्ये
नवीन वीज मिटरच्या आत एखादी चीप किंवा अन्य काही यंत्र बसविल्यानंतर ही चीप वीज मीटरच्या बाहेरून सहजपणे दिसू शकेल. याशिवाय या वीज मीटरमध्ये आधुनिक यंत्र बसविण्यात आले आहेत. याशिवाय या वीज मीटरमध्ये सहा महिन्यांपर्यंत विजेची माहिती संकलित करण्याची सोय करण्यात आली आहे. वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज मिटर बंद केल्यास हे यंत्र आपोआप वीज मीटरमधून जाणाऱ्या विजेचा प्रवाह ओळखून ७.२ केडब्‍ल्यू इतक्या वेगाने चालण्यास सुरुवात होईल. यामुळे अशा वीज मीटरमुळे वीज चोरीला आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वीज पुरवठा बंद झाल्यानंतरही घेता येणार रिडिंग
शहरात अनेकदा वीज मीटर रिडिंग घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला वीज पुरवठा खंडित असलयामुळे परत यावे लागते. मात्र, नवीन वीज मीटरमध्ये विशेष बटन देण्यात आले आहे. हे बटन दाबल्यानंतर वीज मीटरची रिडिंग सहजपणे दिसणार आहे.

हे मीटर बदलण्यात येतील
आरएनए - रिडिंग मिळाली नाही - ५६४१
आरएनटी - रिडिंग घेतली नाही - ४८३७
फॉल्टी - खराब वीज मीटर - ५३००

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने आधुनिक पद्धतीचे वीज मीटर बसवून चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हे वीज मीटर लावल्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी आल्यास आधुनिक वीज मीटरमधील तंत्रज्ञानामुळे ग्राहकाने वीज मीटरमध्ये छेडछाड केली आहे किंवा नाही, याचीही माहिती सहज उपलब्‍ध होणार आहे.
सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्य फारुकी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ. मकदुम मोईनोद्दीन फारुकी रियाझुद्दीन फारुकी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला नाही. न्या. मंगेश पाटील यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

या प्रकरणी डॉ. शेख सलीम शेख चाँद यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, आरोपी डॉ. मकदुम फारुकी यांनी एससी-डीएनटी जातीच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे १९९३मध्ये अधिव्याख्यातापदावर नोकरी मिळवली. तेव्हापासून आतापर्यंत मौलाना आझाद शिक्षण संस्थेची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचीही फसवणूक केली. आरोपीने बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली व प्राचार्यपदापर्यंतचे सर्व लाभ उपभोगले. बनावट प्रमाणपत्रावर जावक क्रमांक, सह्या-शिक्केदेखील बनावट असल्याचे आढळून आले आहे.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यामध्ये कलम ४२०, ४३७, ४६८, ४७१, ४७२ अन्वये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपी डॉ. मकदुम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता.

यादरम्यान कुलगुरुंना गोपनीय अहवालही पाठविण्यात आला. एसटी जमातीचा उमेदवार उपलब्ध असताना एनटी जातीच्या उमेदवारासाठी संस्था आग्रही असल्याचे अहवाल नमूद करण्यात आले होते. याप्रकरणात डॉ. फारुकी याने बनावट जात प्रमाणपत्र तयार करून लाभ मिळविल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीअंती न्यायालयाने डॉ. फारुकी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् संजयनगर निशब्द झाले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संजयनगरमधील गल्ली क्रमांक पाच येथील कुरेशी कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा अपघातात होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार कळताच नातेवाईकांनी त्यांच्या घरी व घाटीत धाव घेतली. अचानक घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे सगळेच हादरून गेले होते. चिमुकल्यांच्या या मृत्यूमुळे पूर्ण संजयनगर निशब्द झाले होते. दोन चिमुकल्यांचा दुपारी, तर एका मुलाचा सायंकाळी अंत्यविधी पार पडला.

जुनेद शफीक कुरेशी, नमीर शफीक कुरेशी व महाविश अतिक कुरेशी ही चिमकुली बालके सोमवारी खेळत, बागडत आई-वडिलांसह साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेली होती. कार्यक्रम साजरा झाल्यानंतर ही मंडळी आनंदात औरंगाबादकडे परतत होती. यावेळी काळाने त्यांच्या रिक्षावर प्रवरासंगम जवळ घाला घातला. रिक्षा उलटून पेट घेतल्याने रिक्षातील जखमी अक्षरशः होरपळून निघाले. या चिमुकल्यांच्या आजोबाला डोळ्यादेखील नातवांचा मृत्यू पाहावा लागला. जखमींना घाटीत दाखल करण्यात आले.

घाटीच्या पोस्टमार्टेम विभागात मंगळवारी सकाळीच नातेवाईकांनी गर्दी केली. तिघांचे पोस्टमार्टेम केल्यानंतर मृतदेह संजयनगर येथील घरी नेण्यात आला. यावेळी सकाळपासूनच नातेवाईकांनी घरी गर्दी केली होती. महिलांच्या आक्रोशाने वातावरण शोकमग्न झाले होते. घडलेल्या घटनेचे दुःख सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शोकमग्न असलेली मंडळी एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत देखील नव्हती. घटनास्थळी मृत्युमुखी पडलेल्या नमीरा कुरेशी व महाविश कुरेशी यांचा अंत्यविधी मंगळवारी दुपारी काली मशीद रेंगटीपुरा येथे एकत्रित करण्यात आला. उपचारादरम्यान मरण पावलेल्या जुनेदचा अंत्यविधी मंगळवारी सायंकाळी काली मशीद येथेच पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्यांनी बाजार झाला हिरवागार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सध्या फळभाज्यांपेक्षा हरभरापेंडी,पालक, मेथी, कोथिंबिर आणि शेंगा आदींची आवक दुपटीने वाढली आहे. सध्या किरकोळ बाजारात पाच ते दहा रुपयांना चार जुड्या पालक, दहा रुपयांना जोन कोथिंबीर जुड्या आणि दहा रुपयांना तीन जुड्या मेथी अशा दराने विकले जात आहेत.

कृषी उत्पन्नबाजार स‌मितीत किमान २५ ते ३० हजार जुड्या पालक, मेथी, कोथिंबिरची आवक होत आहे. इतर फळभाज्यांही मुबलक असल्या, तरी वांगी, गवार, दोडका यांची आवक घटली आहे. या तीन भाज्यांची किमान चार ते सहा क्विंटल एवढीच आवक होत आहे. फळभाज्या किमान ३० ते ४० रुपये किलो यादराने विकल्या जात आहेत. किरकोळ ‌भाजीविक्रीत औरंगपुरा, जाधववाडी बाजार यांतील भावफरक किमान पाच ते दहा रुपयांचा आहे. सिडको व इतर हाउसिंग सोसायटी परिसरात फळभाज्यांचे किरकोळ बाजार दर ५० ते ६० रुपये किलो आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images