भारत-पाकिस्तान युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी ‘विजय दिवस’ साजरा केला. गारखेडा परिसरातील नियोजित कारगिल उद्यानाच्या मैदानावर कार्यक्रम झाला.
‘विजय दिनी’ शहीदांचे स्मरण
↧
↧
रेल्वे उड्डाणपुलाजवळील वाहतूक कोंडी सुटणार
रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या एका बाजूच्या रस्त्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूच्या जमिनीबरोबरच क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यांवरील रेल्वेची जमीन पालिकेला देण्यास मान्यता दिली आहे.
↧
फुलांच्या मार्केटचे ‘एप्रिल फूल’
कृषी विभागाच्या हिमायतबाग संशोधन केंद्रात देशी-विदेशी जातीच्या फुलांवर यशस्वी संशोधन झाले आहे. शास्त्रज्ञांनी अधिक उत्पादनाच्या जाती शोधल्या आहेत; मात्र जिल्ह्यात फुलांच्या विक्रीसाठी यंत्रणा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे पाठ फिरवली आहे.
↧
टाइपकास्ट व्हायचे नाही : मंगेश बोरगावकर
‘एखादे लोकप्रिय चित्रपट गीत करिअरसाठी आवश्यक असले, तरी ती मर्यादासुद्धा ठरू शकते. टाइपकास्ट गायक होऊ नये, म्हणून अल्बम आणि शास्त्रीय गायनाकडेच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. नावीन्यपूर्ण अल्बम रसिकांना देण्यासाठी आग्रही आहे,’ असे युवा गायक मंगेश बोरगावकर याने सांगितले.
↧
आठवड्याची सुरुवात ‘झेडपी’मध्ये शुकशुकाटाने
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चासाठी आणि लाक्षणिक संपासाठी बहुतांश अधिकारी व कर्मचारी गेल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेत शुकशुकाट दिसून आला.
↧
↧
‘प्रोजेक्ट उन्नती’ लटकले
‘जीटीएल’च्या ‘प्रोजेक्ट उन्नती’ला महावितरण किंवा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मान्यता नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
↧
‘मसाप’ करणार ‘फमुं’चा सत्कार
सासवड येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. येत्या ३० डिसेंबर रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होणार आहे.
↧
मालमत्ता विभाग दाद लागू देईना
महापालिकेच्या ‘क्वार्टर्स’बद्दल मालमत्ता विभाग माहितीच देत नाही, या विभागाला माहिती देण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारे पत्र अखेर लेखापरीक्षण विभागाने पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना दिले.
↧
रस्त्यांसाठी आयात ठेकेदार
रस्त्यांच्या ‘व्हाइट टॉपिंग’साठी ठेकेदार आयात करण्याची व्यूहरचना पालिकेत आखली जात आहे. या संदर्भात काही अधिकारी विशिष्ट पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून १८ कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट एकाच ठेकेदाराला देण्याच्या विचारात आहे.
↧
↧
शेतीमालाच्या भावाची शासन दखल घेत नाही
शासन गठीत शेतमाल भाव समितीच्या अहवालानुसार शेतीमालास शासन भाव देत नसल्याची खंत भाजपाचे माजी आमदार तथा राज्य शेतमाल भाव समितीचे सदस्य पाशा पटेल यांनी उमरगा येथे बोलताना व्यक्त केली.
↧
मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादला घ्या
मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी, शिवाय मराठवाड्यातील प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पूर्ववत औरंगाबाद येथे घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज्याचे दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केली.
↧
पैठणमध्ये संपाला अल्प प्रतिसद
अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र केमिस्ट अंड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या तीन दिवसीय बंदला पहिल्या दिवशी शहरातील औषधी दुकानदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिला.
↧
फांदी कोसळल्याने वाहतूक खोळंबली
वेरूळ लेणीसमोर असलेल्या महावीर स्तंभाजवळच्या पुरातन वडाच्या झाडाला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक खोळंबली होती.
↧
↧
बीडमध्ये लाखभर महिला कुटुंबप्रमुख
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत महिलांना कुटुंब प्रमुख म्हणून निश्चित करावयाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीची अंमलबजावाणी बीड जिल्ह्यात सुरू झाली आहे. या तरतुदींनुसार बीड जिल्ह्यातील रेशनकार्डवर असलेल्या कुटुंबातील वरिष्ठ महिलेला कुटुंब प्रमुख निश्चित करण्यात आले आहे.
↧
महिलांच्या तक्रारींची त्वरित दखल घ्या
महिला विविध क्षेत्रात मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. विविध विभागांशी निगडित असलेल्या महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या तक्रारींची त्वरित दखल घ्यावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) दिले.
↧
अत्याचारग्रस्त मुलीला २ लाखांचे अर्थसाह्य
वाळूज येथील अत्याचारग्रस्त बालिकेला मनोधैर्य योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय सोमवारी (१६ डिसेंबर) घेण्यात आला. जिल्हा गुन्हेगारी क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
↧
‘TET’नंतर विद्यार्थ्यांचे ‘CET’कडे लक्ष
शिक्षक पात्रता परीक्षेनंतर (टीईटी) राज्यातील डीटीएड, बीएडधारक विद्यार्थ्यांचे लक्ष आता शिक्षक भरतीची ‘सीईटी’ केव्हा होते याकडे लक्ष लागलेले आहे. २०१०नंतर राज्यात सीईटी झालेली नाही. आरटीईनुसार तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या निकषामुळे विद्यार्थ्यांना आशेचा एक किरण दिसतो आहे.
↧
↧
रिक्षांची भाडेवाढ लवकरच
रिक्षांची मीटर दरवाढ डिसेंबरअखेरपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरू असून शेअरिंग रिक्षांच्या दरांबबातही सर्व्हेक्षणही सुरू आहे. त्यामुळे नव्या वर्षात मीटर दरवाढीची कुऱ्हाड नागरिकांवर कोसळू शकते.
↧
‘पीएचडी’ प्रक्रिया अद्याप कागदावर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी प्रक्रिया अद्याप कागदावरच आहे. ‘पेट-२’चा निकाल जाहीर होऊन सहा महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधनाला वाव मिळालेला नाही. २० सप्टेंबरपासून सुरू असलेली आरआरसी प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत अद्याप सुरूच आहे.
↧
हक्काच्या पाण्याबाबत आज विधानसभेत चर्चा
मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्याच्या विषयावर विधानसभेत मंगळवारी (१६ डिसेंबर) चर्चा होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्याच्या नियमांत समन्यायी पाण्याच्या कलमालाच बगल दिली आहे. त्याला मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आक्षेप घेतला आहे.
↧
More Pages to Explore .....