Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोफत प्रवेशाच्या प्रक्रियेत मुदतवाढ

$
0
0

औरंगाबाद

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पालकांना सात मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. बुधवारपर्यंत नऊ हजार अर्ज सादर झाले आहेत.

या प्रक्रियेला जानेवारीपासून सुरुवात झाली, तर अर्ज करण्याची प्रक्रिया दहा फेब्रुवारीपासून सुरू होती व २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. मुदतसंपण्यापूर्वी मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. ऑनलाइन अर्ज भरण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेत आठवडा भराची मुदत वाढवून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉपी करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांवर कारवाई

$
0
0

औरंगाबाद

दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी विषयात कॉपी केल्याबद्दल अकरा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेत कॉपी प्रकरणांमध्ये बीड जिल्हा आघाडीवर आहे.

मंडळाच्या भरारी पथकांनी पहिल्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या अकरा विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये औरंगाबाद दोन, बीड सहा, जालना दोन, परभणी एक अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

$
0
0

औरंगाबाद

नैसर्गिक आपत्ती घोषित करून जिल्ह्यातील सर्व बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने न्याय दिला पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली. दरम्यान, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांकडे पळविले असून त्याविरुद्ध राजकीय मतभेद बाजुला ठेवत न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सदस्य रमेश गायकवाड यांनी केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४ लाख ७ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड केली, पण बोंडअळीच्या फटक्याने कापसाचे पिक उद्ध्वस्त केले, पण सरकारने कापूस पिक कापणी प्रयोगानुसार ज्या ज्या मंडळात कापूस पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्याच मंडळातील बोंडअळीबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, असे घोषित केले आहेत. याचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसणार असून हा अन्याय दूर करण्यात यावा, सर्व कापूस उत्पादकांना न्याय मिळावा, अशी भूमिका रमेश गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी मांडली. तर मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नगर,नाशिक, ठाणे जिल्ह्यांनी पळवत असून त्याविरुद्ध राजकीय मतभेद बाजुला ठेवत न्यायहक्कासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सदस्य रमेश गायकवाड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादातून शेरखानचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमिनीच्या वादातून छावणीतील हुसेन खान अलीयार खान उर्फ शेरखान (वय ४६, रा. पेन्शनपुरा) यांचा खून झाला असून, या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. यात एक जण हा अट्टल घरफोड्या असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

अक्रम खान गयाज खान (रा. आहेर, जटवाडा) याला आधीच अटक करण्यात आली आहे, तर शेख अश्फाक शेख इसाक उर्फ अश्फाक पटेल (रा. शहाबाजार), शेख सरजात शेख नासेर उर्फ अज्जी दादा (रा. युनूस कॉलनी) यांना शनिवारी बेड्या ठोकण्यात आल्या. आकाश उर्फ शेऱ्या उत्तमराव पडूळ (रा. अनिसा शाळेजवळ, जिन्सी) याला त्याच्या आजीने जिन्सी ठाण्यात हजर केले. तर शेख बशीर उर्फ मुन्ना बोचरा शेख करीम (रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

अन् काटा काढला

शेरखान यांचा अश्फाक पटेलसोबत वाद होता. त्याने अक्रम खानला शेर खानच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यावरून अक्रम खानने मुलाचा मित्र अज्जी दादा, अट्टल घरफोड्या मुन्ना बोचरा, आकाश पडूळ यांच्यासह २७ डिसेंबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास अंगुरीबाग येथे शेरखानचा काटा काढला. शेरखान दुचाकीने घरी परतत असताना त्याला लक्ष्मी कॉलनीत गाठून लोखंडी पाइपने डोक्यात सपासप वार केले होते. यावेळी गुन्हे शाखेने पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यात अक्रम खानचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासूचा खून करणाऱ्या सुनेस जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

पेईंग गेस्ट का ठेवला अशी विचारणा करणाऱ्या सासूच्या डोक्यात वरंवटा आणि डंबेल्स घालून निर्घृण खून करणाऱ्या सुनेस अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांनी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

वाळूज परिसरातील मनीषा नगरात समाधन महाजन (वय ३७) हा आपल्या पत्नी, आई, तीन मुलांसोबत राहत होता. त्यांच्यासोबत पेईंग गेस्ट म्हणून अविनाश पाटील सुद्धा राहत होता. पेईंग गेस्ट ठेवू नका म्हणून सासू आणि सुनेमध्ये कायम भांडण होत होते. त्यामुळे घरमालकाने खोली खाली करण्यास सांगितल्यामुळे त्याने २९ नोव्हेंबर २०१५ रोजी रिकामी करून वाळूजमध्ये अन्य ठिकाणी खोली भाड्याने घेतली. त्या खोलीतील घरसामान नेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही घर सामान जुन्या घरी राहिल्यामुळे समाधान महाजनची आई सखूबाई झोपण्यासाठी जात होत्या. एक डिसेंबर रोजी रात्री सुनबाई मंगलाबाई आणि दोन मुले जेवणाचा डबा घेऊन गेल्या. जेवण करून सखूबाई झोपल्यानंतर सुनबाई मंगला या रात्री परत आल्या आणि जिन्यात झोपलेल्या सखुबाईच्या डोक्यात वरंवटा टाकून डंबेल्स मारून निर्घृण खून करून घरी परत गेली. दोन डिसेंबर रोजी पाहटे सात वाजता जुन्या घराकडे राहणारा शेजारी गजहंस हा महाजनच्या घरी आला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला. तातडीने महाजन यांनी जुन्या घराकडे धाव घेतली. जिन्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सखुबार्इंना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. समाधन महाजनच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या पथकाने या खुनाचा तपास करून महाजनची पत्नी मंगला हिस ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी करण्यात आली असता तिने वरवंटा डोक्यात टाकून डंबेल्स मारुन खून केल्याची कबूली दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खुन खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्या समोर अंतिम सुनावणी झाली.

फिर्यादी फितूर

सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी नऊ साक्षीदार तपासले. अविनाश पाटील यांची साक्ष यात महत्वाची ठरली. मंगलास रात्री गाऊन मध्ये झाकून वस्तू नेत असताना पाहिले असल्याचे न्यायालयात सांगितले. दरम्यान फिर्यादी समाधान महाजन फितूर झाला होता. मात्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावा, न्यायवैद्यक प्रयोग शाळेचा अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने मंगला हिस दोषी ठरवून भांदवि ३०२ कलमान्वे जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी शिक्षा ठोठवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयीन शुल्क वाढ; कायदाच अस्तित्वात नाही

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

न्यायालयीन शुल्कवाढीविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित ठेवली. न्यायालयीन शुल्क वाढीसंदर्भातील कायदाच अस्तित्वात आलेला नाही, असे निवेदन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठात केले.

राज्य सरकारने यावर्षी १६ जानेवारीपासून न्यायालयीन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दावे, अपील, दुरुस्ती अर्ज, वकील पत्र, जामीनबंद, इतर साधे अर्ज, मुदतीचे अर्ज, कौटुंबिक न्यायालयातील अर्ज, वैयक्तिक बंद, कामगार न्यायालये, औद्योगिक न्यायालयातील अर्जाच्या शुल्कात कमालीची वाढ केली. त्याविरोधात महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे माजी अध्यक्ष अॅड. नितीन चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या शुल्क वाढीची अद्याप अंमलबजावणी सुरू झाली नसली तरी ही शुल्क वाढ अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वीच्या सुनावणीत विधी व न्याय विभागासह सामान्य प्रशासन विभागाचे सचिव तसेच राज्याच्या महाधिवक्त्याला हायकोर्टाने नोटीस बजावली होती. महाराष्ट्र कोर्ट फी अधिनियम, सुधारणा २०१७ मधील वाढ अवास्तव आहे. त्यामुळे गरीब पक्षकारावर अन्याय होईल. कल्याणकारी राज्य हा शासनाचा अविभाज्य घटक आहे. शुल्क वाढीपूर्वी हायकोर्टात याचिकेसाठी २५० रुपये शुल्क होते. त्यात आता पाचपट वाढ झाली असून याचिकेसाठी १,२५० रुपये लागेल. अशिलाला त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. ही अन्यायकारक वाढ रद्द करण्याची विनंती याचिकेत केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने प्रल्हाद बचाटे व विष्णू बी. मदन-पाटील व प्रल्हाद बचाटे यांनी काम पाहिले. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी व सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी सरकारची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्करोग जनजागृती, तपासणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाच्या वतीने महिलांसाठी कर्करोग जनजागृती व तपासणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

यावेळी कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती. डॉ. येळीकर म्हणाल्या, 'महिलांमध्ये विशेषत: ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती नाही. परिणामी त्या उपचारासाठी आल्यानंतर बऱ्याचवेळा उशीर झालेला असतो. कर्करोगाच्या जनजागृतीची आवश्यकता कायम सांगण्यात आली आहे. यंदा राज्य सरकारच्या वतीने कर्करोग जनजागृतीवर विशेष कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. महापालिकेच्या महिला आरोग्य कर्मचारी, महिला बचत गट, असंघटीत महिला कामगार, जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षिका, आशा वर्कर्स, तसेच विद्यार्थिनींसाठी कर्करोगावर मार्गदर्शनपर कार्यक्रम, व्याख्याने होतील. आरोग्य कीर्तन, रांगोळी कलेद्वारे कर्करोग प्रतिबंधात्मक संदेश देण्यात येणार आहे. पाच ते आठ मार्चदरम्यान भित्तीपत्रक प्रदर्शन, सात मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व आठ मार्च रोजी शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करोग निदान शिबिर होईल. गर्भाशयाच्या मुखकर्करोगाची तपासणी, स्तनांच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफीद्वारे तपासणी करण्यात येईल. ३० वर्षांवरील महिलांनी याचा लाभ घ्यावा,' असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. सुरेश हरबडे, डॉ. विजय मुळे, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. कमलाकर माने, डॉ. मुक्ता खापरखुंटीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२९ लाखांचा गंडा; जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद: ऋषिकेश कम्युनिकेशन आणि जयभद्रा टोबॅकोच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या अकाउंटंटने २९ लाख ५० हजार रुपयाचा अपहार केला. त्याचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश पौर्णिमा कर्णिक यांनी फेटाळला.

हडको येथील सुधाकर धाडबळे यांचे ऋषिकेश कम्युनिकेशन आणि जयभद्रा टोबॅको ही दुकाने आहेत. त्या दुकानात अकांउंटटसाठी सुदाम नानासाहेब भांडवलकर (रा. अंबड टाकळी ता. पैठण) हा गेल्या काही वर्षापासून कामाला होता. त्याला कार्यालयातील सर्व पासवर्ड माहित होते. तो व्होडाफोन कंपनीला पैसे भरून लॅपटॉप , रिचार्ज कार्ड खरेदी करून आणून तो शहरातील अन्य किरकोळ दुकानांमध्ये रिचार्ज कार्ड आणि मोबाइल द्वारे रिचार्ज पाठवत असे. त्याच्याकडून आलेल्या २९ लाख ५० हजार रुपये बँकेच्या खात्यात न भरता परस्पर अपहार केल्याचे धाडबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन सुदाम भांडवलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी भांडवलकर याच्या ताब्यातून लॉपटॉप जप्त करावयाचा आहे, रोख रक्कम हस्तगत करावयाची असल्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्याधिकाऱ्यावरचा अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

फुलंब्री नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मोठा दिलासा मिळाला. त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटीची गुन्हा न्या. प्रसन्न वराळे व न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द केला.

शेवंताबाई संकपाळे यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात याचिकाकर्ते व मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याविरोधात अनुसूचीत जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्या मालकीच्या जागेची गावातील काही लोकांनी त्यांच्या नावावर खरेदीखत केले. त्याविरोधात त्यांनी मंत्रालयापर्यंत धाव घेतली व निवेदन दिले. त्यात मुख्याधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही त्यांनी दाद दिली नसल्याचा आरोप केला. दरम्यान पोलिसांनी मुख्याधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. त्याविरोधात त्यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. तसेच सदर गुन्हा रद्द करण्याची विनंती केली. मूळ तक्रारदाराच्या अर्जावर प्रशासनाने त्वरीत कारवाई केली व मालमत्ता रजिस्टर क्रमांक आठमध्ये तिच्या नावाची नोंद घेतली. तरीही त्रास देण्याच्या हेतूने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीअंती फुलंब्री नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांविरोधातील अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांतर्फे विजय लटंगे यांनी बाजू मांडली. त्यांना रामदास शिनगारे-पाटील यांनी सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्म महामोर्चा आठ मार्चला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी व इतर मागण्यांसाठी लिंगायत धर्म महामोर्चा येत्या आठ मार्च रोजी विभागीय आयुक्तालयावर काढण्यात येणार आहे, अशी माहिती जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामी यांनी दिली.

बसवेश्वर चौक परिसरातील मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे उघडण्यात आलेल्या महामोर्चा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चन्नबसवानंद महास्वामी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अशोक मुस्तापुरे, अविनाश भोसीकर, बाबासाहेब कोरे, प्रा. राजेश विभूते, बसवराज मंगरुळे, प्रदीप बुरांडे, आत्माराम पाटील, राजेश कोठाळे, गणेश वैद्य, बसवराज खानापुरे आदी उपस्थित होते.

महास्वामी म्हणाले, 'लिंगायत धर्माला स्वतंत्र, स्वाभिमान, मानवतावादी इतिहास आहे. पण, देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्ष होऊन देखील लिंगायत समाज संविधानिक हक्क अधिकारापासून वंचित आहे. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक यासह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. १९५१ला लिंगायत धर्मांची शासकीय मान्यता रद्द केली गेली आहे. परिणामी, धार्मिक अल्पसंख्यांकांच्या कोणत्याही सवलती, हक्क मिळत नाही. तेच लिंगायत धर्मियांच्या सर्व समस्यांचे कारण आहे. त्यामुळे न्यायहक्कासाठी, पुढील पिढीच्या भवितव्यासाठी निर्णायक लढा उभारण्यात आला असून यात लिंगायत धर्मातील वाणी, जंगम, तेली, बुरुड यासह ३५० जाती, पोटजातील बांधव एकवटले आहेत. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या. राष्ट्रीयस्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मराठवाडास्तरीय मोर्चा काढण्यात येणार आहे.' जिल्हा समन्वयक बुरांडे म्हणाले, 'क्रांती चौक येथून सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्तालयावर मोर्चा निघेल. यात सुमारे दहा लाख नागरिक उपस्थित राहतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडीच्या काचा फोडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इटखेडा परिसरातील पंधरा एकर खुल्या जागेवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या गाड्यांच्या काचा शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास महानुभव आश्रमासमोर आक्रमक नागरिकांनी फोडल्या. त्यानंतर कचरा भरलेला ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला.

कांचनवाडीत कचरा टाकण्यास निघालेल्या गाड्या आंदोलकांनी महानुभवआश्रमाजवळ रोखून धरल्या. पालिकेच्या एका गाडीची काच फोडली. एका ट्रकमधील कचरा पेटवून दिला, मात्र प्रसंगावधान राखून चालक जगदीश गायकवाड, संजय जाधव, आनंद म्हस्के, विशाल ढाले, जाकेर पठाण, शोएब खान, रमेश भुईगळ यांनी आग विझवली. गोलवाडीतही कचरा टाकण्यासाठी काही ट्रक गेल्या होत्या. आठ ते दहा गाड्या रिकामच्या झाल्यानंतर आंदोलकांनी कचरा गाड्यांचा रस्ता रोखला. पोलिस सरंक्षणात जात असलेल्या काही गाड्यांमधून छावणी परिषदेच्या रिक्षाची काच आंदोलकांनी फोडली. या विरोधानंतर गाड्या पुन्हा शहराकडे परतल्या.

---

माजी नगरसेवकासह

नागरिकांवर गुन्हे दाखल

---

कांचनवाडी येथे गुरुवारी कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या आणि एसटीवर दगडफेक करणाऱ्या वीस ते पंचवीस जणांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात बस चालक नामदेव जगन्नाथ खाडे याच्या फिर्यादीवरून आंदोलकांवर जमावबंदी उल्लंघनासह अन्य कलमे लावण्यात आली आहेत. तर सातारा पोलिस ठाण्यात मनोहर सुरे (रा. हर्सूल, जटवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी नगरसेवक विजय वाघचौरे, रावसाहेब गायकवाड, अशोक हाळनोर, भागचंद मोटे, जनार्धन कांबळे, यशवंत पगारे, अशोक गायके व अन्य चाळीस ते पन्नास महिला पुरुषांवर कचऱ्याच्या गाड्या अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके फोडून घातली कचऱ्यात भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सगळीकडे कचऱ्यांचे ढीग साचलेले असताना महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्रिपुरा निवडणुकीतील विजयाचा आनंद म्हणून फटाक्याची आतिषबाजी करून साजरा करत शहरातील कचऱ्यात अधिक भर घातली. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

शहरातील कचरा प्रश्न हायकोर्टात गेला आहे. नारेगाव, मांडकीनंतर सर्व ठिकाणी कचरा टाकण्यास तीव्र विरोध होत आहे. निष्क्रिय प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे मनपात शिवसेनेसोबत सत्तेत भागीदार असलेल्या भाजपने फटाक्याची आतिषबाजी करत एकप्रकारे कचऱ्यात भरच घातली. त्रिपुरा विजयाचे फटाके फोडल्याने परिसरात कचरा झाला. अर्थात नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांनी तातडीने सफाई मोहीम हाती घेतली. कचरा प्रश्नी पत्रकारांनी विचारले असता, 'भाजप पदाधिकारी प्रश्न सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. अतिषबाजीमुळे झालेला कचरा गोळा केला असून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल,' अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यामुळे वाड्या धुमसल्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात जागोजागी साचलेले कचऱ्यांचे ढीग. निष्क्रिय प्रशासन आणि वेळ मारून नेणारे पुढारी यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी कांचनवाडी, गोलवाडीत रस्त्यावर येऊन विरोध केला. दगडफेक करत अधिकाऱ्यांना कचऱ्यांच्या गाड्यासह पिटाळून लावले. कचरा कोठेच टाकता न आल्याने पाच वॉर्डात दीड हजार टन कचरा रस्त्यावर पडून आहे.

कचरा डेपोचा प्रश्न पालिकेला सोडविता आलेला नाही. १६ फेब्रुवारीपासून नारेगाव कचरा डेपो हटाव यासाठी गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सोळाव्या दिवशी शहरातील कचराकोंडीने गंभीर रूप धारण केले आहे. कचरा भरलेल्या काही गाड्या कांचनवाडीत टाकण्यात आल्या, परंतु नागिरकांनी त्याला विरोध केला. गुरुवारी मिटमिटा-जांभाळा भागात कचरा टाकण्यास हिंसक वळण लागले. धुळवडच्या सुटीनंतर शनिवारी साचलेला कचरा कोठे टाकायचा असा प्रश्न पडलेल्या पालिकेने गोलवाडीसह कांचनवाडीत प्रयत्न केला परंतु, नागिरकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. गोलवाडीत गाड्या येत आसल्याचे कळताच परिसरातील नागिरक रस्त्यावर उतरले. पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न झाले. पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत संतापलेल्या नागिरकांनी अक्षरश: त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर गोलवाडीकडून पालिकेने कांचनवाडीत प्रयत्न केला. परंतु, याची खबर असल्याने तेथील नागरिक, महिलांनी विठ्ठल-रुखमाई मंदिराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. सुरुवातीला जेथे कचरा टाकला तेथेच गाड्या रिकाम्या करण्याचा विचार पालिकेकडून करण्यात येत होता. नागिरकांनी रस्ता अडवून टाकत आंदोलन सुरू केले. पोलिस तैनात असून पालिकेकडून कोणीच या ठिकाणी आले नाही. काहीवेळ बीड बायपासच्या चौकात गाड्या उभ्या होत्या. दुपारच्या वेळेत गाड्या पुढे येत असल्याची खबर नागरिकांना लागली अन् पुन्हा रोष वाढला. परिसरातील काही जणांनी रस्त्यावर विरोध सुरू केला. महापालिकेच्या कचरा ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या. दिवसभर हा तणाव कायम होता. पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा संताप पोलिसांनाही सहन करावा लागला. पोलिस अन् नागरिक यांच्यातील वादामुळे तणाव वाढला अन् आंदोलक रस्त्यावर आले. त्यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली.

---

वर्गीकरण झालेला कचरा स्वीकारू

---

कचराकोंडीवरून चौफेर टिका होत असलेली पालिका आता वर्गीकरण झालेलाच कचरा स्वीकारणार आहे. वर्गीकरण केलेले नसल्यास नागरिकांच्या घरातून कचरा उचलला जाणार नाही, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. तसेच आठवड्यातून मंगळवारी व शुक्रवारी असे केवळ दोनच दिवस सुका कचरा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी वॉर्ड अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. काही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर, काही ठिकाणी अद्याप परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. ११५ पैकी ७६ वॉर्डामध्ये ओला-सुका असे वर्गीकरण केले जाते. ३९ वॉर्डामध्ये अद्याप एकत्रच कचरा घेतला जातो असे पालिकेकडून सांगण्यात आले. सेंट्रलनाका येथील कॅनपॅकच्या मशिनवर कचरा प्रक्रियेसाठी पाठविल्यास कचऱ्याची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

---

हॉटेल, मंगल कार्यालयांचा कचरा घेणार नाही

---

शहरातील हॉटेल, मंगल कार्यालये व मटन मार्केटमधील कचरा महापालिका स्वीकारणार नाही, असेही महापौरांनी सांगितले. त्यांनी स्वतः कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असे त्यांना महापालिकेकडून कळविण्यात आले आहे. कचरा प्रश्नाचे सगळे खापर आंदोलकांवर फोडण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही परिस्थिती आंदोलकामुळे ओढावली. इतर सोयी-सुविधा चांगल्याप्रकारे देण्याचे काम पालिका करते. हा प्रश्नाला पालिकेला दोष कसा देता असा सवाल केला.

---

२५ वर्षांचा हिशेब देणार नाही

---

कचराप्रश्नावरून एमआएमने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. पालिका बरखास्त करावी अशी मागणी केली आहे. त्यावरून महापौरांनी विरोधकांवर राजकारण करत असल्याची टीका केली. कचराप्रश्नी टीका, राजकारण करण्यापेक्षा एकत्र येत मार्ग काढावा. २५ वर्षांत आम्ही काय केले याचा हिशेब त्यांना देण्याची गरज नाही, जनतेला उत्तर देऊ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावीचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या विद्यार्थिनीने घरातील फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी प्रकाशनगर (सिडको एन २) भागात घडली. ऋतुजा किसन निखलपुरे (वय १८) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

अभ्यासात हुशार असलेली ऋतुजा वसंतराव नाईक कॉलेजची विद्यार्थिनी होती. परीक्षेपूर्वी ती कावीळ आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिचा अभ्यासही पूर्ण झालेला नव्हता. दोन दिवसांपूर्वी तिचा केमेस्ट्रीचा पेपर अवघड गेल्यामुळे ती तणावात होती. शुक्रवारी (२ फेब्रुवारी) ती नेहमीप्रमाणे आपल्या खोलीमध्ये अभ्यास करीत होती. दुपारी साडेतीन वाजता तिने आपल्या खोलीचे दार बंद केले. समोरच्या खोलीमध्ये आई -वडील बसलेले होते, परंतु त्याच वेळी खोलीमध्ये आवाज आल्याने आई-वडिलांनी खोलीचे दार वाजवले. मात्र ऋतुजाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी खिडकीतून आत पहिले असता ती पंख्याला लटकल्याचे दिसले. आई-वडिलांनी आरडाओरडा करत नातेवाईक, शेजाऱ्यांना बोलावले. घराचे दार तोडून तिला खाली उतरविले. त्यानंतर धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी घाटीत जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दहावीत ९४ टक्के गुण

ऋतुजाला दहावीत ९४ टक्के गुण होते, परंतु आजारामुळे तिचा बारावीचा अभ्यास पूर्ण न झाल्याने तिचा पेपर अवघड गेला. त्याच तणावात तिने हे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. धुलिवंदनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने निखलपुरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीचा हातकडीसह पलायनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट नोटा प्रकरणातील आरोपी अफसर पठाण याने हातकडीसह पोलिस व्हॅनमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला़ ही घटना शनिवारी टी़ व्ही़ सेंटर भागात घडली.

बनावट नोटाप्रकरणी अफसर पठाण (रा. नारेगाव), भिका उत्तमराव वाघमारे (रा. चिकलठाणा, मूळ रा. लक्ष्मीनारायणपुरा, जुना जालना) सुनील बोराडे (रा. श्रीरामपूर, जि. नगर) या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शनिवारी पोलिस कोठडीचा शेवटचा दिवस असल्याने मेडिकल करून त्यांना न्यायालयात हजर करावे लागणार होते़ दुपारी अफसर पठाण यास एक हातकडी अणि भिका वाघमारे व सुनील बोराडे या दोघांमध्ये एक हातकडी लावण्यात आली होती़ मेडिकलला घेऊन जात असताना टी़ व्ही़ सेंटर येथे गाडीची स्पीड कमी होताच अफसर पठाणने चालत्या गाडीतून हातकडीसह उडी मारली़ पोलिसांनी लगेच गाडी थांबवून तत्परतेने त्याला पकडले़ यात अफसर पठाण याच्या हाताला व गुडघ्याला जखम झाली आहे़ न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे़. दरम्यान,

अफसर पठाण याच्यावर हाफमर्डर, जीवे मारण्याचा प्रयत्न, भूखंड फसवेगिरी यासह विविध गुन्हे दाखल आहेत़ पोलिसांनी त्याला पकडले की, तो नाटक करतो़ पळून जाण्याचा प्रयत्न, स्वत:ला हाताने मारून घेणे, असे प्रकार तो करत असल्याचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे़

---

तपास नगर जिल्ह्यातच

---

बनावट नोटाप्रकरणी पोलिसांना मुंबईसह इतर परराज्यातील धागेदोरे हाती लागतील, असा संशय होता़ मात्र, श्रीरामपूर येथील सुनील बोराडे याने श्रीरामपूर येथूनच घेतलेल्या नोटांचा पुढील तपास पोलिसांच्या हाती लागला नाही़ श्रीरामपूरच्या बाहेर पोलिसांच्या पथकाला जाता आले नाही़ पथक पुन्हा वापस आले आहे़ पोलिसांना या बनावट नोटा कुठे छापल्या याचा शोध लागलेला नाही़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात पाच हजार गावांत पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निम्म्या मराठवाड्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांच्या काही भागामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे या जिल्ह्यांवर टंचाईचे सावट आहे. येणाऱ्या काळात संभाव्य टंचाईची परिस्थिती पाहता प्रशासनाने एप्रिल ते जून अखेरपर्यंत मराठवाड्यातील पाच हजार ११८ गावे आणि १२४६ वाड्यांसाठी ६७ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा शासनदरबारी सादर केला आहे.

यंदा मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये तुलनेत कमी पाणी आहे. उन्हाळ्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यात टँकर सुरू करावे लाले आहेत. प्रशासनाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी टंचाई कृती आरखडा शासनाकडे पाठवला आहे. यामध्ये १५९ कोटी रुपयांचा एप्रिलपर्यंत, तर ६७ कोटी रुपयांचा एप्रिल ते जून या कालावधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण जानेवारी पासून फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात टंचाईची मोठी स्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे प्रशासनाला काही भागात टँकर वगळता जास्त खर्च करण्याची गरज पडली नाही. आता एप्रिल ते जून या कालावधीसाठी टंचाई निर्माण झाल्यास आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागणार आहे.

यावर्षी मराठवाड्यात सरासरी ७७९ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ६७३.८ मिलिमीटर (८६.४० टक्के) पाऊस झाला. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे या जिल्ह्यांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या अनेक मंडळांमध्ये तुलनेत कमी पाऊस झाल्याने या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये जूनपर्यंत पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाला जूनपर्यंत सादर करण्यात आलेल्या टंचाई आराखड्यात जालना जिल्हा वगळता इतर सातही जिल्ह्यांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. हा आराखडा पुढे शासनाकडे पाठवला आहे. मराठवाड्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाने एप्रिल ते जून या महिन्यांपर्यंत पाणीटंचाई निवारणासाठी तयार करण्यात येणाऱ्या विविध योजनांवरील संभाव्य खर्चाची माहिती शासनाकडे पाठवली. कृती आराखड्यानुसार नवीन विंधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, टँकर तसेच बैलगाडीने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढण्याच्या कामांसाठी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय गावे

जिल्हा............................. गावे............... अपेक्षित खर्च

औरंगाबाद.......................८४३....................१५७०.८०

जालना............................अप्राप्त.....................अप्राप्त

बीड.................................७७४.....................११४८.३८

परभणी.............................९७५.......................११५८.६८

हिंगोली..............................६६०.......................५०९.५६

नांदेड...............................१०३८......................१५३३.८२

उस्मानाबाद........................४४६........................३६७.४९

लातूर.................................५६६.......................४५९.००

-------------------------------------------------------.

एकूण...............................५११८..........................६७४७.७३

(रक्कम लाखात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पश्चिम’मध्ये कचरा नकोच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरालगतचा भाग असलेल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात कचरा टाकू देणार नाही, अन्यथा जनआंदोलनासाठी तयार रहा, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी प्रशासनाला दिला आहे.

आमदार शिरसाट यांनी कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मिटमिटा, गांधेली या भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन नागरिकांची मते ऐकली. कचरा टाकणयास विरोध कायम असून पश्चिम विधानसभा मतदारसंघात कचरा येऊ देणार नाही, अशी भूमिका मांडत प्रत्येकाने आपले घर, आपले गाव हे ब्रीद आत्मसात करून सर्वांनी कुटुंबाच्या आरोग्यासाठी एकत्र उभे राहण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले. महापालिका प्रशासन लपून छपून पश्चिम मतदारसंघात कचरा टाकत आहे. मात्र पश्चिम मतदासंघातील नागरिक म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, आता सर्व गावकऱ्यांनी मदभेद विसरून या संकटाविरोधात मिळून संषर्घ करायचा आहे. प्रशासनाला शांततेचा मार्ग समजत नसेल, तर हा कचरा औरंगाबाद पश्चिम भागात येऊ नये यासाठी एक जनआंदोलन उभारावे लागेल, जेथे गाव, नागरी वसाहत नाही, ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी कचरा टाकावा. ही सूचना आपण यापूर्वीही महापालिकेला केल्याचे आमदार शिरसाट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुलत भावाकडून लैंगिक शोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन वर्षांच्या चिमुकलीचे सख्ख्या चुलत भावाने लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार रेंगटीपुरा भागात घडला. शुक्रवारी सायंकाळी पाळीव प्राणी दाखवतो, असे म्हणत गच्चीवर नेत हा प्रकार केला. या नराधमाला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे.

रेंगटीपुरा भागात हा २६ वर्षाचा आरोपी एकाच वाड्यात संयुक्त कुटुंबासह राहतो. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता त्याने चुलत बहिणीला गच्चीवर नेत हा प्रकार केला. या चिमुकलीने हा प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने तिला घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी तपासणीनंतर तिचे लैंगिक शोषण झाल्याचा अहवाल दिला. या प्रकरणी मुलीच्या आईने रविवारी जिन्सी पोलिस ठाणे गाठत पुतण्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी भावाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तो एका वेल्डिंगच्या दुकानात कामाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सरकारमध्ये भांडवलदारांची मक्तेदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशात भारतीय जनता पक्षा सरकारने सर्वसामान्यांना 'अच्छे दिन'चे केवळ स्वप्न दाखवले. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सरकारने जे मिळवले होते तेही भाजपच्या या सरकारने गमावले. गरीबांनी बँकेत जमा केलेले पैशांची मल्या, नीरव मोदींसारख्यांकडून लूट होत असून, भाजप सरकारमध्ये केवळ भांडवलदारांची मक्तेदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांनी केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रविवारी (चार मार्च) दोन दिवसांच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन अॅड. लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे सदस्य राजू देसले, प्रा. राम बाहेती, अश्फाक सलामी, मनोहर टाकसाळ यांची मंचावर उपस्थिती होती. भारकीय कम्युनिस्ट पक्षाचे एप्रिलमध्ये केरळ येथे २३ वे राष्ट्रीय महाअधिवेशन व शहादार येथे मार्च महिन्यामध्ये राज्य अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी लांडे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात सर्वाधिक संघर्ष आमच्या पक्षाने केला. गोरगरीबांच्या हिताचे कायदे तयार करण्याला सरकारला आम्ही भाग पाडले. देशात आमच्या ६२ जागा होत्या, त्यावेळी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले, मात्र देशातील नागरिकांनी काँग्रेसला नाकारले व भाजपला निवडून दिले. 'अच्छे दिन' म्हणत भाजपने जे काँग्रेसने कमावले होते तेही गमावले आहे. सरकारने नोटबंदीच्या काळात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या. बँकेच्या दारात शंभरावर सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला. काळ्या पैशांच्या शोधात सरकारला श्रीमंतांचा; तसेच दहशतवाद्यांचा पैसा सापडला नाही. भाजप सरकारने कामगारांची सुरक्षा धोक्यात आणली आहे. देशातील असंघटित कामगारांवर मोठे संकट ओढावल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांचे खून करण्यात आले. निवडणुकीच्या वेळी केलेल्या कोणत्याही घोषणा सरकारने पूर्ण केल्या नाही.'

नुकत्याच झालेल्या त्रिपुरा निवडणुक निकालाबाबत लांडे म्हणलो की, निवडणुकीत काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजप सरकारनेही गेल्या साडेतीन वर्षांत तेच केले, त्रिपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इतर राज्यांतील मंत्र्यांनी तळ ठोकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमीत शहाही त्रिपुरात होते. डाव्यांना नामोहरम करण्यासाठी राजकारण खेळले गेले. राज्यात कोट्यवधी रुपये वाटण्यात आले. देशात निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला भांडवलदारांनी मदत केली आता हे सरकार जनतेला केवळ भूलथापा देऊन भांडवलदारांची कामे करत आहे.'

मिरवणुकीने लक्ष वेधले

सकाळी ११ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खोकडपुरा कार्यालयापासून पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडीमार्गे श्री शिवाजी हायस्कूल या अधिवेशन स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जनतेची साथ न सोडण्याचा निर्धार पक्षाने केला. मिरवणुकीत शेकडो तरुणांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी उत्तरपत्रिका तपासणीचा पेच कायम आहे. मान्य केलेल्या मागण्यांचे अद्यादेश निघत नाही, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी करणार नसल्याचे सांगत गणिताच्या नियामकांची बैठक रविवारीही झाली नाही. उत्तरपत्रिका तपासणीविना कस्टडीतच पडून आहेत.

राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांसह विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांनी बारावी उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीला सुरू झाल्या आहेत. पेपर संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू होते. परीक्षा सुरू होऊन १२ दिवस झाले, तरी उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झालेली नाही. शासनाने मान्य केलेल्या मागण्यांबाबत अद्यादेश काढण्यात येत नाही, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणी केली नाही, या भूमिकेवर शिक्षक ठाम आहेत. मंडळ अधिकारी शिक्षकांची संपर्क साधून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे स्वीकारण्याच्या सूचना करत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्त जागा भरा, अनुदान द्यावे, आयटी विषयाला अनुदान अशा विविध ३२ मागण्या शिक्षकांच्या आहेत. विभागीय गणित विषयाचे नियामक रविवारी जमा झाले, परंतु बैठक झाली नाही. सचिवांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षणमंत्र्यांची बैठक आज

उत्तरपत्रिका तपासणी राज्यभरात कोठे सुरू झालेली नाही. ९० लाखांपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. औरंगाबाद विभागात एक लाख ६५ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. शिक्षकांच्या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांची बैठक सोमवारी बोलावल्याचे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीत तोडगा निघाल्यास उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images