अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळनिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून सणाची तयारी ख्रिस्ती बांधवांनीही जय्यत सुरू केली आहे. निराला बाजार, गुलमंडीसह शहरातील मॉलमध्ये विविध प्रकारांच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली.
ख्रिसमसनिमित्त बाजार फुलला
↧
↧
‘व्यवसाय प्रतिनिधी बँकेचे राजदूत’
बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधींचा जिल्हा स्तरावरील मेळावा मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे नुकताच आयोजित करण्यात आला होतो. जिल्ह्याच्या अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
↧
मान्यवरांना मिळणार ‘न्यू इअर’ची विशेष भेट
राज्यातील ४२०० मान्यवरांचा यंदाचा न्यू इअर दरवर्षीपेक्षा निराळा असेल. ‘एन्व्हायर्मेंटल रिसर्च फाउंडेशन’च्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली ही निसर्ग भेटकार्डे राज्यातील मान्यवरांना पाठवण्यात येणार आहे.
↧
शोकसंदेशांच्या पत्राबद्दल पालिकेची अनास्था
विविध नागरी प्रश्नांनिमित्त पालिकेच्या संवेदनशीलतेचा पंचनामा केला जातो. पालिकेच्या अशाच संवेदनशीलतेचा पंचनामा शोकसंदेशासंदर्भात गुरुवारी करण्यात आला.
↧
पालिका पदाधिकाऱ्यांची दिल्लीवारी हुकली
औरंगाबाद शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजना अंमलात आणावी व त्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी या मागणीसाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ कमलनाथ यांना भेटणार होते.
↧
↧
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता चाखणाऱ्या शिवसेनेला क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी निधी उपलब्ध नसेल, तर शासनाकडे पाठपुरावा करून आम्ही या कामासाठी विशेष निधी आणून पुतळ्याची उंची वाढवू, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत देशमुख यांनी घेतली आहे.
↧
दाढी-कटिंगसाठी आता ८० रुपये
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून वाळूजमध्ये ‘दाढी-कटिंग’साठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याचे दर ६० रुपये आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
↧
‘झालर’ची कामे उरकेना
सातारा येथील सुमारे दहा हजार बांधकामे नियमित करण्याचा विषय सुमारे दोन वर्षापासून प्रलंबित आहे. मात्र, सिडकोचा नियोजन विभाग सध्या झालर क्षेत्र प्रारूप आराखड्यात व्यस्त असल्याने या फायली हातावेगळ्या करण्यासाठी त्यांना फुरसत नाही.
↧
‘सात-बारा’वर आता बँक खाते क्रमांक
सात-बाराच्या उताऱ्यावर खातेदार शेतकऱ्याचा बँक खाते क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कारणांसाठी देण्यात येणारे अर्थसाह्य भविष्यात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात होईल.
↧
↧
शिक्षकांची नियुक्तीमध्ये ‘गडबड’
महापालिकेचे उपायुक्त व शिक्षणाधिकाऱ्यांनी तासिका तत्त्वावरील अकरा शिक्षकांची परस्पर व नियमबाह्यपणे नियुक्ती केली आहे, त्यामुळे या दोन्हीही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालिकेतील भाजपचे गटनेते संजय केनेकर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केली.
↧
शिवसेना म्हणते, ‘आधी लगीन लोकसभेचे’
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दावा सांगून ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ने (आठवले) विधानसभा निवडणुकीची घाई सुरू केली आहे. ‘रिपाइं’च्या या मागणीमुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून ‘आधी लगीन लोकसभेचे’ अशी भूमिका घेण्यात आली आहे.
↧
तोतया डीवायएसपीची पोलिसांनाच दमबाजी
मुकुंदवाडी भागात बुधवारी मध्यरात्री एक स्कॉर्पिओ सुसाट धावत होती. या गाडीच्या पुढे आणि मागे पोलिस लिहिले होते. मात्र, गस्तीवर असणाऱ्या बीट मार्शलना शंका आल्याने त्यांनी गाडी थांबविण्याची सूचना केली. गाडीतील एकाने ‘मी डीवायएसपी आहे,’ असे सांगत उलट पोलिसांनाच दमबाजी करण्यास सुरुवात केली.
↧
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना दारातच रोखले
जीबी सुरू होण्यासाठी दीड तास उशीर झाल्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मुख्य सभागृहाच्या दारातच रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी महापौरांविरोधात घोषणा दिल्या व यापुढे सभा उशिरा झाल्यास सभागृहाला कुलूप ठोकण्याचा इशाराही दिला.
↧
↧
स्टेशनवरचा दिवस...तिकीट तपासणीचा
विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा, या उद्देशाने गुरुवारी दिवसभर स्टेशन परिसरामध्ये तिकीट तपासणीची धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी साठ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे स्टेशन परिसरामध्ये ‘फुकट्यां’ची धावपळ उडाली.
↧
‘जीबी‘ला आयुक्तांची दांडी
पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अचानक दांडी मारली. त्यामुळे महापौर कला ओझा यांनी सर्वसाधारण सभाच तहकूब केली. सर्वसाधारण सभेच्या दिवशी आयुक्तांनी सर्व कामे सोडून सभेला उपस्थित राहिलेच पाहिजे, अशी ताकीद देत हा संदेश आयुक्तांना कळवा, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.
↧
नव्या तंत्रज्ञानावर टीका नको
साहित्यिकांनी नव्या तंत्रज्ञानावर टीका करण्यापेक्षा तंत्रज्ञान आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच कृषी क्षेत्रातील यांत्रिकता मराठी ग्रामीण साहित्यात योग्य पद्धतीने अवतरेल असा सूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात उमटला.
↧
साहित्यातून व्यक्त व्हा
‘शब्दजंजाळ व शब्दवैभव म्हणजे साहित्य नाही. वाचकाला अस्वस्थ करते ते खरे साहित्य. साहित्य संमेलन बनचुके होण्याचे माध्यम नसून संमेलन व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे. साहित्यिकांनी गांभीर्याने व्यक्त होण्यावर संमेलनाचे यश अवलंबून असते. त्यामुळे साहित्यिकांनी आत्मशोध घेण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.
↧
↧
‘मेंदूच्या व्यायामशाळेने‘ मुले झाली हुशार
१७ खेड्यातील प्राथमिक शाळेत शिकणारी मुले ६० पर्यंतचे पाढे स्वत:च तयार करून मुखोदगत म्हणतात. हे सांगितले तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखविली आहे कच्छवे गुरुजींच्या ‘मेंदूच्या व्यायामशाळेने’.
↧
ढोबळे, आव्हाड यांच्यात होणार दिलजमाई
गेल्या अनेक वर्षापासून एकमेकाविरोधात असलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि मानवी हक्क अभियानचे एकनाथ आव्हाड यांनी आपसातले वाद संपवण्याची तयारी दाखवली आहे. बीडमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून आपसातले वैर संपविण्याची ठरवल्याची माहिती दिली.
↧
बीडमध्ये ८५ हजार मतदार वाढले
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी येत्या सहा जानेवारीस प्रसिद्ध होणार आहे. बीड लोकसभा मतदार संघात १६ ऑगस्ट २०१३ पर्यंतच्या टप्प्यात १७ लाख सहा हजार ९४२ मतदारांची संख्या होती.
↧
More Pages to Explore .....