रेल्वे प्रवाशांनी केला
काळ्या फिती लावून प्रवास
पॅसेंजर उशिरा सुटल्यामुळे केले अनोखे आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेच्या विविध कामांमुळे उशिराने जात आहेत. या पॅसेंजर गाड्या उशिराने धावत असल्यामुळे ग्रामीण भागातून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांना त्रास सोसावा लागतो. 'पॅसेंजर वेळेवर चालवा' या मागणीसाठी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास केला आणि रेल्वेप्रशासनाविरोधात अभिनव आंदोलन केले.
सोमवारी २८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर लासूर, रोटेगाव पोटूळ येथील प्रवासी औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या स्थानक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर जमा झाले. काळ्या फिती लावून आलेल्या प्रवाशांनी
र
गेल्पासून मनमाड काचीगुडा आणि काचीगुडा मनमाड या गाड्या वेळेवर चालविण्यात येत नाही. यामुळे या रेल्वेने औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होत असते. ही अडचण दुर करावी. अशी मागणी रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने करण्यात येत होती. याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याकारणाने नियमित प्रवाशांनी गेल्या २७ जानेवारी पासून काळ्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जालना - शिर्डी - नगरसोल या डेमू ची शिर्डी फेरी बंद करुन जालना - मनमाड, मनमाड - चिकलथाना, चिकलथाना- नगरसोल, नगरसोल -जालना अशी फेरी चालविण्यात यावी. अशी मागणी केली. या आंदोलनात करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या आंदोलनात रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर बिलवने पाटील, अंबादास माडवगड ,आसिफ सय्यद ,दादासाहेब घोडके, गोरख गिरी,मनीष मुथा, अरुण भाग्यवंत व महिला व विध्यार्थीनी उपस्थितींची उपस्थिती होती.
………
असं राहणार आंदोलन …
- क्रॉसिंग, इंजीनियरिंग ब्लॉक , मेगाब्लॉक, लेट तर अनअपेक्षित रद्द यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य व शेतकरी यांचे महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता येणारे विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,रोजगार , दवाखान्याचे काम , नोकरदार यांना प्रचंड त्रास होत आहे. या विरोधात २७ ते ३१ जानेवारी डोक्यास काळ्या रंगाची पट्टी ,रेबिन, टोपी ,मफलर ,उपरने बांधून रेल्वे प्रवास करुण रेल्वे प्रशासन चा निषेध करण्यात येत आहे.
- फेब्रूवारी महिन्यात - १ ते ५ मौन व्रत रेल्वे प्रवास करण्यात येईल.
- औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे ६ ते १० साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
- ११ फेब्रूवारी पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
……
जनरोषासाठी सोशल मिडीयाचा वापर
रेल्वे विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात जनतेला होत असलेल्या रोष आंदोलनातून समोर येत आहे. यामुळे या आंदोलनाचे फोटो तसेच मागणींची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्डाचे चेअरमन वी. के. यादव यांच्यासह स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिंधींना ट्विटरच्या माध्यमातुन पाठविण्यात येत आहे.
………