Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरणकडे पालिकेची बाकी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने महावितरणच्या विविध सुविधांवर लावलेल्या करातून थकीत बिलाचे पैसे चुकते होतील. शिवाय महावितरणलाच पालिकेकडे अतिरिक्त रक्कम भरावी लागेल, असा दावा मंगळवारी झालेल्या जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एन. सोरमारे उपस्थित होते. बैठकीत खासदार खैरे यांनी पालिकेकडे थकलेल्या वीज बिलाचा मुद्दा मांडला. यावेळी महापौर म्हणाले, 'महापालिकेने महावितरणाच्या विविध सुविधांवर कर लावला आहे. अनेक सुविधांवर कर लावायचा आहे.त्यामुळे थकबाकी, खड्डयांपोटी परत करायचे पैसे पालिकेला परत करण्याची गरज पडणार नाही. उलट पालिकेकडेच महावितरणला पैसे भरावे लागतील. या कराबाबत कायदेशीर कारवाईही केली जाईल,' असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी वीज सेवा खासगीकरणाचा मुद्दा निघाला. याबाबत खैरे म्हणाले, 'ऊर्जामंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहणार आहे. यापूर्वीचा वीज सेवा खासगीकरणाचा प्रयत्न फसला आहे. यामुळे ६०० कोटी रुपयांचा फटका कंपनीला बसला आहे. पुन्हा असे नुकसान करून घेऊ नका,' असा सल्ला देणार असल्याचे सांगितले. वीजेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आगामी जिल्हा नियोजन समितीकडे पाच कोटींची मागणी करा, अशी सूचना खैरे यांनी केली. तर मुख्य अभियंता गणेशकर यांनी जालना जिल्हा नियोजन समितीत दहा कोटींची मागणी केल्याचे सांगितले. त्यानुसार दहा कोटींची मागणी करू, असे खैरे म्हणाले.

\Bवीज रिडिंग न घेता बिल

\Bवीजेमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. वीज रिडिंग न घेता वीज बिल दिल्यामुळे अनेक भुर्दंड सोसावा लागत असल्याची माहितीही समोर आली. अशा एजन्सी चालकांवर कारवाई केल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. सौर कृषिपंप महापालिकेच्या उद्यान विभागाला मिळेल का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर गणेशकर यांनी ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, असे सांगितले.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार कोण? आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन महिना उलटल्यानंतर आता निकालाचा दिवस उजाडला आहे. गुरुवारी (२३ मे) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून संध्याकाळपर्यंत औरंगाबादचा खासदार कोण? याचा फैसला होणार आहे.

औरंगाबाद मतदारसंघासाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार, गणित, जातीनिहाय झालेले मतदान यासह अनेक मुद्द्यांवर सर्वसामान्य नागरिकांनाही उत्सुकता आहे. एक महिन्यापासून सुरू असलेल्या या चर्चेला गुरुवारी संध्याकाळपर्यंत पूर्णविराम मिळणार आहे.

आतापर्यंत चार वेळा खासदार राहिलेले शिवेसना-भाजप महाआघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पाचव्यांदा विजयाचा विश्वास आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आमदार सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव व एआयएमआयएम वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनीही विजयाचा दावा केला आहे. मात्र मतदारराजाने कोणाच्या पारड्यात वजन टाकले आहे, हे गुरुवारी सायंकाळपर्यंत कळेल. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६ लाख ५८ हजार १५७ पुरुष, तर ५ लाख ३७ हजार महिला अशा एकूण ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी (६३.४१ टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. चिकलठाणा एमआयडीसीमधील मेल्ट्रॉन कंपनीतील मतमोजणी केंद्रावर गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल. सर्वप्रथम टपाली मतदान व ईटीपीबीएस मतमोजणी झाल्यानंतरच ईव्हीएमची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया ८४ टेबलवर २६ फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार असून प्रत्येक फेरी अंदाजे ३० ते ४५ मिनिटांची राहील.

मोबाइल पाहा घरबसल्या फेरिनिहाय निकाल

निवडणूक आयोगाने 'वोटर हेल्पलाइन अ‍ॅप' आणि आयोगाच्या https://results.eci.gov.in या वेबपोर्टलवर मतमोजणीची माहिती घेण्याची सुविधा दिली आहे. मोबाइल आणि इंटरनेटच्या साह्याने डेस्कटॉपवर दरअर्ध्या तासाला निकालाचे अपडेट्स पाहता येणार आहेत. एका फेरीसाठी ३० मिनिटांचा कालावधी लागणार असून फेरी पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्र आणि विधानसभानिहाय अहवालावर आयोगाकडून नियुक्‍त निवडणूक निरीक्षकांची स्वाक्षरी होईल. त्यानंतर हे निकाल आयोगाचे संकेतस्थळ आणि वोटर हेल्पलाइन अ‍ॅपवर अपलोड केले जाणार आहेत. हे अॅप डाउनलोड करून कोणत्याही मतदार संघातील मतमोजणीचे अपडेट्स मिळवता येतील.

मतमोजणी केंद्रावरही मिळणार माहिती

मेल्ट्रॉन येथील मतमोजणी केंद्रावर सर्वसामान्य नागरिक तसेच कार्यकर्त्यांना फेरीनिहाय मतमोजणीची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी मेल्ट्रॉन कंपनीच्या आवारात नागरिकांना मांडव, तसेच साउंड सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील मतदान

मतदारसंघ………........एकूण मतदान......……झालेले मतदान……….......टक्के

औरंगाबाद……….........१८८४८६६.......…..११९६११२..........…………….६३.४६

जालना…………….......…......१८६५०४६……….......…..१२०३८२२.......…..……………..६४.५५

परभणी…………….........…....१९८४१३०……….......…..१२५१८२५.......…..……………..६३.०९

हिंगोली……………........….....१७३२५४०.......…..…………११५२२१४.......…..…….६६.५

नांदेड……………….......…........१७१७८३०………….......…..१११९२१०.......…..……….६५.१५

बीड………………….......…..........२०४११९०……….......…..१३४८३९९.......…..……….६६.०६

लातूर…………….......…........….१८८३५३५.......….…………११७०३९८……….......…...६२.१४

उस्मानाबाद…….......…….१८८६२३८……….......….११९४७२६.......…...६३.३४


प्रमुख उमेदवार


औरंगाबाद

चंद्रकांत खैरे शिवसेना

सुभाष झांबड काँग्रेस

इम्तियाज जलील एमआयएम-वंचित

हर्षवर्धन जाधव शिवस्वराज्य बहुजन पक्ष


जालना

रावसाहेब दानवे भाजप

विलास औताडे काँग्रेस

डॉ. शरदचंद्र वानखेडे वंचित बहुजन आघाडी


बीड

डॉ. प्रीतम मुंडे भाजप

बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस

विष्णू जाधव वंचित बहुजन आघाडी


नांदेड

अशोक चव्हाण काँग्रेस

प्रताप पाटील चिखलीकर भाजप

डॉ. यशपाल भिंगे वंचित बहुजन आघाडी


हिंगोली


हेमंत पाटील शिवसेना

सुभाष वानखेडे काँग्रेस

मोहन राठोड वंचित बहुजन आघाडी


उस्मानाबाद

राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस

ओमप्रकाश राजेनिंबाळकर शिवसेना

अर्जुन सलगर वंचित बहुजन आघाडी


परभणी


संजय जाधव शिवसेना

राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस

आलमगीर मोहम्मद खान वंचित बहुजन आघाडी


लातूर

सुधाकर शृंगारे भाजप

मच्छिंद्र कामत काँग्रेस

राम गारकर वंचित बहुजन आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा छावण्यांत पाच लाख जनावरांना आसरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पालकमंत्र्यांच्या मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी दौऱ्यात चारा चारा छावण्यांच्या मंजुरीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर छावण्या मंजुरीचा धडाका सुरू झाला असून महिन्याभरात मराठवाड्यात तब्बल १९९ नवीन छावण्यांना मंजुरी देण्यात आली. यापैकी सव्वाशे छावण्या नव्याने सुरू करण्यात झाल्या आहेत. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील ७३१ चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या आता तब्बल ५ लाख ७ हजार २८४ एवढी झाली आहे. महिन्याभरापूर्वी या चार जिल्ह्यांतील ६०५ चारा छावण्यांमध्ये ३ लाख ७५ हजार ६५७ जनावरे होती.

मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळाचे आहे. परिणामी, जानेवारी महिन्यांपासून चारा टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. मात्र पशुपालक व शेतकऱ्यांनी दोन महिने कशीतरी चाऱ्याची सोय केली. एप्रिलनंतर मात्र जनावरांकरिता शेतकऱ्यांसमोर चारा छावणी हाच पर्याय उरला आहे. मराठवाड्यात मार्च महिन्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून चाऱ्याची सर्वाधिक टंचाई बीड जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक ५९९ चारा छावण्यांत ३ लाख ६९ हजार ७९३ मोठी, तर ३० हजार ३७० लहान जनावरे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या २३ छावण्यांमध्ये सध्या २२ हजार ३०० जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ छावण्यांत ७० हजार ६३७, तर जालना जिल्ह्यातील २२ चारा छावण्यांमध्ये १४ हजार १८४ जनावरांना आसरा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरापासून चारा छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. येत्या काळात चारा व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, पशुपालकांना पशुधनाचा सांभाळणे कठीण होणार असल्याने चारही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून अधिकच्या चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. जनावरांसाठी दररोज तीन ते सहा किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. मराठवाड्यात लहान मोठी एकूण ६७ लाख जनावरे आहेत. त्यात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी, ११ लाख ३६ हजार लहान जनावरे, शेळ्या-मेढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दररोज २६ हजार ३३० टन चाऱ्याची आवश्यकता आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी आवश्यक चारा व पाणी उपलब्धतेसंबंधी येत्या काही दिवसांमध्ये गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शासनाने चारा छावण्या उघडण्याचा निर्णय घेतला होता.

\Bप्रशासनकडून झाडाझडती\B

दरम्यान, प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींनंतर बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सूचना केल्या. त्यानुसार, बड्या अधिकाऱ्यांची चारा छावण्यांची झाडाझडती घेतली होती, यामध्ये सोयीनुसार जनावरे व सुविधांच्या आठ-आठ दिवसांच्या नोंदणी घेणे, काही छावण्यांमध्ये नोंदी नसणे, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकानेही छावण्यांना भेटी न देण्याचा प्रकार उघडकीस आला होता.

\Bचारा छावण्यांची स्थिती\B

जिल्हा.......मंजूर छावण्या....... सुरू छावण्या......... मोठी जनावरे......... लहान जनावरे........... एकूण

औरंगाबाद.....५६....................२३.......................१६८७४.....................५४२६................२२३००

जालना.........४२...................२२.......................११९१७....................२२६७.................१४१८४

बीड.............९३३..................५९९...............३६९७९३......................३०३७०............४००१६३

उस्मानाबाद......१०४..................८७.................६२४९२..................८१४५.................७०६३७

-------------------------------------------------------------------------------------

एकूण............११३५...................७३१................४६१०७६...................४६२०८.............५०७२८४

\Bमहिन्याभरात वाढलेल्या छावण्या\B

जिल्हा............मंजूर ..... सुरू

औरंगाबाद......५३...............२२

जालना..........००...............००

बीड............६१...............३७

उस्मानाबाद....४३.............४५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’चा भार महापालिकेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेचे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने सोडलेली ७२ किलो मीटरची ड्रेनेज लाइन आता महापालिका टाकणार आहे. आयुक्त आणि महापौर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली.

भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी महापालिकेने खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली. या कंपनीने आता महापालिकेकडे विनंती अर्ज करून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. कंपनीने केलेल्या कामाचे पैसे देऊन कंपनीला कार्यमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासन देखील विचार करीत आहे. यासंदर्भात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना देखील आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डॉ. विनायक यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी भूमिगत गटार योजनेचा विषय चर्चेच होता. कंत्राटदाराने ७२ किलोमीटरची ड्रेनेज लाइन टाकलेली नाही. हे काम कंत्राटदाराकडून करून घेण्याऐवजी या कामातून सूट देऊन कंत्राटदाराला कार्यमुक्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिकेच्या खर्चातून ७२ किलोमीटरची ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहे. कंत्राटदार कंपनीने भूमिगत गटार योजनेचे काम करण्यासाठी एक जागा विकत घेतली आहे. कंत्राटदाराला जागेच्या बदल्यात जागा द्यायची की, जागेची किंमत द्यायची याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाकडून महापालिकेला सव्वाशे कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानातून किती रस्त्यांची कामे करायची याची यादी येत्या चार दिवसांत अंतिम केली जाईल, असा शब्द आयुक्तांनी दिल्याची माहिती महापौरांनी दिला. यादी अंतिम केल्यावर आयुक्त पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर यादी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे.

शहरातील महत्त्वाचे चौक आणि दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी २९ विकसकांनी तयारी दर्शवली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर ही कामे सुरू करण्याचा निर्णय देखील महापौर, आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला.

\Bकार्यमुक्तीला आक्षेप\B

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदाराला कार्यमुक्त करणे योग्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही औरंगाबाद शहर व महापालिकेच्या हिताचा निर्णय घ्या, असे आवाहन करणारे पत्र स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले आहे.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात वैद्य यांनी म्हटले आहे की, भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराला कार्यमुक्त करण्याबद्दलच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. कंत्राटदाराला कार्यमुक्त करण्यासंदर्भात सर्वसाधारण सभा, स्थायी समितीत माझ्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी कंत्राटदाराच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. यामध्ये कामाचा दर्जा, कामासाठी ठरवून दिलेला कालावधी, चुकीच्या पद्धतीने झालेली कामे, मुळ प्रकल्प अहवालात असलेली कामे, अहवालानुसार पूर्ण न झालेली कामे वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहेत. यासंदर्भात आपण स्वत: प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे, असा उल्लेख वैद्य यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

असे असताना कंत्राटदाराला त्याचे देयक देऊन कार्यमुक्त करण्याचा प्रशासनाचा निर्णय चुकीचा ठरेल. तो महापालिकेच्या हिताचा नसेल. उलटपक्षी संबंधित कंत्राटदाराने केलेल्या कामासंदर्भात चौकशी करून तटस्थ व्यक्तीकडून कामाचे फेरनिरीक्षण करावे. त्याचा अहवाल घेण्यात यावा. ठरवून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न केल्यामुळे संबंधितांवर दंडात्मक व कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात महापालिका व शहराच्या हिताचा निर्णय आपण घ्यावा, असे वैद्य यांनी आयुक्तांना पत्राद्वारे कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे पदाधिकारी ‘राकाज्’साठी पुन्हा सरसावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्योतीनगरातील वादग्रस्त ठरलेला राकाज् क्लब पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेतील पदाधिकारी पुन्हा सरसावले आहेत. या क्लबची पाहणी करून तो सुरू करण्याबद्दल आयुक्तांनी भूमिका मांडावी, अशी सूचना महापौरांनी बुधवारी केली. हा क्बल बंद पडल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

ज्योतीनगरात महापालिकेने 'बीओटी' तत्वावर राकाज् क्लब उभारला होता. या ठिकाणी प्रामुख्याने पोहण्याच्या तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. पोहण्याच्या तलावाबरोबरच क्लबमध्ये अन्य उपक्रम देखील सुरू करण्यात आले. त्यात हुक्का पार्लरसह काही उपक्रम वादग्रस्त ठरले. त्याशिवाय स्थानिक नागरिकांच्या देखील क्लबबद्दल तक्रारी होत्या. याची दखल घेऊन तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे आणि उपमहापौर प्रमोद राठोड यांनी पुढाकार घेतल राकाज् क्लब सील करण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडले. ही कारवाई होऊन सुमारे तीन वर्षे झाली आहेत. आता हा क्लब पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने पालिका पदाधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी याचसंदर्भात महापौरांच्या दालनात बैठक झाली होती. या बैठकीसाठी सभागृहनेता विकास जैन यांनी पुढाकार घेतला होता. यासंदर्भात वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यावर राकाज् क्लब बद्दलच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. आता पुन्हा या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राकाज् क्लबसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी स्वत: क्लबची पाहणी करावी, अशी सूचना केली असल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले. क्लब बंद असल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे, असे त्यांनी सांगितले. पद्‌मपुरा येथील जागेवर महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधायची आहे. ही जागा ताब्यात घेण्याबद्दल विधीज्ञांचा सल्ला घ्या, असेही आयुक्तांना सांगितल्याचे महापौर म्हणाले. 'बीओटी'च्या विविध प्रकल्पांमधील महापालिकेच्या मालकीचा हिस्सा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने देखील अधिकाऱ्यांना सूचना करा, असे आयुक्तांना महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरद गणेश मंदिरात केसर आंब्याची आरास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर येथील श्री वरद गणेश मंदिरात बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने 'श्रीं'ला १७५ किलो केसर आंब्यांची आरास करण्यात आली. सायंकाळी आरतीनंतर प्रसाद म्हणून या आंब्याचे भक्तांना वाटप करण्यात आले. संकष्टी चतुर्थीनिमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुरेख आरास करण्यासाठी संस्थेचे सचिव मनोज पाडळकर, सदस्य मयुरेश कोटणीस, पंकज खोडेगावकर, गजानन जोशी, पियुष देशपांडे आदी सकाळी नऊपासूनच कामाला लागले होते. आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील केसर आंब्याची त्यांनी आराससाठी निवड केली. दुपारी साडेबारापर्यंत ही सुंदर आरास तयार झाली. दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताचे लक्ष या आरासने वेधून घेतले होते. दरम्यान, सांयकाळी 'श्रीं'ची आरती झाल्यानंतर उपस्थित भक्तांना प्रसाद म्हणून या आंब्याचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांची संपर्क कार्यालये, घरांवर लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेची मतमोजणी गुरुवारी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही अनुचित घटना घडू नये म्हणून उमेदवारांच्या घरांवर; तसेच संपर्क कार्यालयावर देखील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला शहरात पोलिस दलाचे पथसंचलन करण्यात आले.

औरंगाबाद लोकसभेची निवडणूक यावेळी रंगतदार ठरत आहे. चिकलठाणा विमानतळासमोरील मेल्ट्रॉन कंपनीमध्ये गुरुवारी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर समर्थक जमा होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने शहरात आणि मतमोजणीच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये मतमोजणीच्या ठिकाणी एक पोलिस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, दहा पोलिस निरीक्षक, ३० सहायक निरीक्षक, २०० कर्मचारी, ६० महिला कर्मचारी यांच्यासह केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दलाचे प्रत्येकी एक प्लाटून तैनात करण्यात आले आहे; तसेच या ठिकाणी १२ कॅमेरामन देखील राहणार आहेत. शहरात दोन पोलिस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, ८३ सयाक निरीक्षक, १५० महिला कर्मचारी असा बंदोबस्त राहणार आहे.

\Bउमेदवारांच्या घरांवर बंदोबस्त\B

मतमोजणीनंतर अनेक वेळा विजयी उमेदवारांच्या घरासमोर किंवा संपर्क कार्यालयासमोर पराभूत उमेदवारांच्या समर्थकांकडून धुडगूस घालण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात ठेवून शहर पोलिस उमेदवारांच्या घरावर, संपर्क कार्यालयावर बंदोबस्त तैनात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bसंवेदनशील भागात पथसंचलन\B

शहरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन दक्ष आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला शहरात शहर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दल यांच्या तुकड्यांसह पथसंचलन करण्यात आले. जुन्या शहरात संवेदनशील भाग असलेल्या राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज, सराफा, सिटीचौक, गुलमंडी, मछलीखडक आदी भागात हे पथसंचलन करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार आहे. उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी खेळीमेळीने या निर्णयाचा स्वीकार करावा. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता बाळगावी. कोणत्याही परिस्थीला सामोरे जाण्यास पोलिस प्रशासन दक्ष आहे.

- डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहने दुरुस्तीसाठी बाहेर काढली

$
0
0

\Bवाहनांची दुरुस्ती\B

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागली. तेव्हापासून लोकप्रतिनिधींची शासकीय वाहने काढून घेण्यात आली होती. महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांची शासकीय वाहने जमा करण्यात आली होती. दोन - अडीच महिने ही वाहने उभीच होती. आता ही वाहने देखभाल दुरुस्तीसाठी बाहेर काढण्यात आली आहेत. मतमोजणीनंतर आचारसंहिता संपणार आहे. शनिवारपासून शासकीय वाहने लोकप्रतिनिधींच्या ताब्यात मिळतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी महाराज पुतळ्यासाठीच्या कंत्राटदाराला बजावणार नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अगोदर पैसे द्या, त्यानंतर काम सुरू करतो,' अशी अट घालणाऱ्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी मान्य केले. तीन दिवसांची नोटीस या कंत्राटदाराला बजावली जाणार आहे.

क्रातीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचे कंत्राट महापालिकेने गायत्री आर्किटेक्ट या संस्थेला दिले आहे. एक कोटी ६४ लाख ५७२ रुपये किंमतीचे हे काम आहे. कंत्राट देऊन दोन महिने उलटून गेले तरी कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. त्यामुळे महापौरांनी त्याचा आढावा घेतला असता, कंत्राटदाराने अगोदर पैसे मागितले आहेत. अगोदर पैसे द्या, त्यानंतरच काम सुरू करतो, अशी अट त्याने घातली आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौरांना सांगितले. पुतळ्याच्या कामासाठी महापालिका पैसा कमी पडू देणार नाही. शिवाय शासन देखील या कामासाठी विशेष निधी देणार आहे त्यामुळे कंत्राटदाराने पैशाची काळजी करू नये, असे मत महापौरांनी व्यक्त केले होते.

बुधवारी महापौर आणि आयुक्त यांची बैठक झाली तेव्हा पुतळ्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा विषय महापौरांनी आयुक्तांच्या समोर मांडला तेव्हा आयुक्तांनी कंत्राटदाराला नोटीस बजावण्याचे मान्य केले. तीन दिवसांच्या मुदतीची नोटीस आता कंत्राटदाराला बजावली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे भावगीतांचा कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सदाचार संवर्धन ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे संस्थेचे माजी उपाध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रकाश गायकवाड व संध्या गायकवाड यांच्या भजनसंध्या व भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्वभारती कॉलनीतील महादेव मंदिरात झालेला हा कार्यक्रम रंगला. श्री गणपती श्लोक व प्रार्थना गातीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकाहून एक सरस भावगीते गायकवाड यांनी सादर केली. यावेळी तबल्यावर स्वप्ना गायकवाड व अक्षय कुलकर्णी यांना साथ दिली. निवेदन स्वप्ना गायकवाड यांनी केले. अविनाश देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. भालचंद्र कुलकर्णी यांच्याबद्दल देशपांडे, चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात संस्थेच्या सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. शशिकला देशपांडे यांचा अमृत महोत्सवी सत्कार, श्री व सौ. सुरेश देशपांडे, श्री व सौ. धोंडोपंत कुलकर्णी, श्री व सौ. वसंत पुराणिक, श्री व सौ. बबन मोताळे यांच्या विवाहात ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी कमी किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी वॉटर व्हेडींग मशीन लावण्यात आले आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यातच ही मशीन बंद झाली आहे. सदर कंत्राटदाराने पाणी बील रेल्वे विभागाकडे न भरल्याने त्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरा कक्षाच्या बाजुला जुन्या इमारतीत प्रवाशांसाठी थंड पाण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून पाण्याचे वेंडर मशीन सुरू करण्यात आले आहे. यात पाच रुपयांना एक लिटर पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाण्याच्या सेंटरवर उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मशीन बंद असल्याची सूचना या ठिकाणी लावण्यात आली आहे.

प्रवासी पाण्यासाठी येथे रिकामी बाटली घेऊन येतात, मात्र मशीन बंद असल्याने त्यांना तसेच परत जावे लागत आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून वॉटर वेंडर मशीन ऑपरेटरने रेल्वेचे पाण्याचे बील भरलेले नाही. यामुळे त्याचे पाणी रोखण्यात आले आहे. ही कारवाई करण्यापूर्वीही काही तांत्रिक कारणामुळे वॉटर वेडींग मशीन बंद ठेवण्यात आले होते.

टाकीत गरम पाणी …

सध्या शहरात तापमान वाढू लागले आहे. जुन्या रेल्वे स्टेशनच्या इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी वाढत्या तापमानामुळे गरम होत आहे. या गरम पाण्यावर प्रक्रिया करून थंड पाणी करण्यासाठी जी व्यवस्था उभारण्यात आली आहे तीही कार्य करीत नसल्याची माहिती वॉटर वेंडर मशीनच्या ऑपरेटरच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीची रंगीत तालीम पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. बुधवारी (२२ मे) मेल्ट्रॉन येथील मतमोजणी केंद्रावर प्रशासनाकडून मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक टेबलवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी निवडणूक निरीक्षक ब्रजमोहन कुमार, देवेंद्र सिंह यांनी मतमोजणी प्रक्रिया राबवताना घ्यावयाची काळजी, करवावयाची कार्यवाहीबाबत मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. रंगीत तालीममध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी कोणकोणते कागदपत्र भरून किती वेळेत तयार करावयाचे याबाबत माहिती घेतली. मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबल लाावण्यात आले असून मतमोजणीच्या २६ फेऱ्यांमध्ये मोजणी होणार आहे. प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैसर कॉलनीत तीन दिवसांआड पाणी

$
0
0

औरंगाबाद : वॉर्ड क्रमांक ४५मधील कैसर कॉलनी भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. कैसर कॉलनीसह नागसेन कॉलनी, सिद्धेश्वर कॉलनी, समी कॉलनी, जुना बायजीपुरा, गंजेशाही मशीदच्या पाठीमागचा परिसर या भागाला संजयनगर येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा होतो. आठ, दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो. रमजानचा पवित्र महिना लक्षात घेता या संपूर्ण भागाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शहर दक्षता समितीचे नुसरत खान अब्दुल रहेमान खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन देखील दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरद गणेश मंदिरात केशर आंब्याची आरास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर येथील श्री वरद गणेश मंदिरात बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने 'श्रीं'ला १७५ किलो केशर आंब्यांची आरास करण्यात आली. सायंकाळी आरतीनंतर प्रसाद म्हणून या आंब्याचे भक्तांना वाटप करण्यात आले. संकष्टी चतुर्थीनिमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुरेख आरास करण्यासाठी संस्थेचे सचिव मनोज पाडळकर, सदस्य मयुरेश कोटणीस, पंकज खोडेगावकर, गजानन जोशी, पियूष देशपांडे आदी सकाळी नऊपासूनच कामाला लागले होते. आपल्या अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील केशर आंब्याची त्यांनी आराससाठी निवड केली. दुपारी साडेबारापर्यंत ही सुंदर आरास तयार झाली. दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताचे लक्ष या आरासने वेधून घेतले होते. दरम्यान, सांयकाळी 'श्रीं'ची आरती झाल्यानंतर उपस्थित भक्तांना प्रसाद म्हणून या आंब्याचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यकल्लोळ : दहा दिवसांपासून लाहीलाही, चाळीशी कायम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भयाण दुष्काळ आणि रणरणत्या उन्हामुळे शहरवासीयांचे हाल होत आहेत. आग ओकत असलेल्या सूर्यामुळे शहराचे कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून चाळीस अंश सेल्सियसच्या घरात आहे. येत्या आठवड्यामध्येही उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे.

शहरावर सूर्य कोपल्याने कमाल तापमानाने मोठी वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरामध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच शहराच्या तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, संध्याकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात ढगाळ वातावरण असले तरी, उन्हाचा पारा ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शहरात १२ ते १६ मे दरम्यान शहराचे तापमान ४०.२ ते ४०.४ अंश सेल्सियस दरम्यान होते. त्यानंतर १६ मे पासून तापमानात वाढ झाली. २० मे रोजी शहराचे कमाल तापमान ४१.६ अंश तर, २१ मे रोजी तापमान ४२.६ अंश सेल्सियस होते.

\Bआज, उद्या पावसाचा अंदाज

\Bहवामान विभागानुसार गुरुवारी (२३ मे) आणि शुक्रवारी (२४ मे) औरंगाबाद शहरात सकाळी रिमझीम पावसाचा अंदाज आहे. दरम्यान दोन दिवस शहरात काहीसे ढगाळ वातावरण राहणार असले तरी, तापमानात कोणतीही कमी होणार नाही. या दिवशी शहराचे कमाल तापमान सरासरी ४३ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. तर आठवड्यामध्ये कमाल तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

- २० मे - ४१.६ अंश

- २१ मे - ४२.६ अंश

- २३ मे - ४१ अंश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेसतरा हजार मालमत्तांचे घबाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिक संकटामुळे खोलात पाय गेलेल्या महापालिकेला कर आकारणी न झालेल्या तब्बल १७ हजार ४१६ मालमत्ता सापडल्या आहेत. त्यामुळे मालमत्ताकराच्या वसुलीचे प्रमाण वाढून पालिकेच्या गंगाजळीत भर पडेल असे मानले जात आहे.

मोठे घर किंवा मोठे व्यापारी प्रतिष्ठान असलेल्या व्यक्ती मालमत्ता सर्वेक्षणाला विरोध करतात, असा महापालिकेचा अनुभव आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होऊ लागला आहे. त्यामुळे महापौर व आयुक्तांनी मिळून गेल्यावर्षी (नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात) विशेष परिश्रम घेवून कर वसुलीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष वसुली मोहीम राबवली. त्यातून सुमारे चाळीस कोटींचा महसूल जमा झाला. आयुक्तांनी प्रशासनाच्यास्तरावर अधिकारी - कर्मचाऱ्यांना कर वसुलीच्या प्रक्रियेत जुंपले. ज्या मालमत्तांना कर आकारणी झालेली नाही, अशा मालमत्ता शोधून त्या मालमत्तांना कर लावण्याचे टार्गेट देखील देण्यात आले. त्यानुसार ३० हजार ८१ मालमत्ता शोधण्यात आल्या. यापैकी १७ हजार ४१६ मालमत्तांना नव्याने कर आकारणी करण्यात आली. ४,२९३ मालमत्तांना कराची फेरआकारणी करण्यात आली. फेरआकारणी करण्यात आलेल्या मालमत्तांना वर्षानुवर्षे जुन्याच दराने कर आकारणी केली जात होती. त्यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. महापालिकेच्या रेकॉर्डवर दोन लाख १९ हजार मालमत्तांची नोंद होती. त्यात वाढ होऊन आता महापालिकेच्या नावावर दोन लाख ४६ हजार मालमत्ता झाल्या आहेत. रेकॉर्डवरच्या मालमत्तांची संख्या तीन लाखांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी जून महिन्यापासून पुन्हा सर्वेक्षणाचे काम पालिकेतर्फे हाती घेतले जाणार आहे. किमान सहा महिने हे काम चालेल असे मानले जात आहे.

मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम जून महिन्यापासून पुन्हा नव्या जोमाने सुरू करायचे आहे. प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला रोज नवीन वीस मालमत्तांना कर आकारणी करण्याचे टार्गेट दिले आहे. गतवर्षी सर्वेक्षणाची मोहीम राबवल्यामुळे १७,४१६ नवीन मालमत्तांना कर आकारणी करता आली. यंदाही हे काम नेटाने करायचे आहे. मोठे मालमत्ताधारक सर्वेक्षणासाठी सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगळा विचार करावा लागेल असे वाटते.

- डॉ. निपुण विनायक, आयुक्त

---

\Bमालमत्तांचे गणित

\B---

पालिकेच्या रेकॉर्डवरच्या मालमत्ता - २ लाख १९ हजार

रेकॉर्डवर मालमत्ता आणण्याचे उद्दीष्ट - ३ लाख

सर्वेक्षणातून सापडलेल्या नवीन मालमत्ता - ३० हजार ८१

नव्याने कर आकारणी करण्यात आलेल्या मालमत्ता - १७४१६

कराची फेर आकारणी करण्यात आलेल्या मालमत्ता - ४२९३

---

मटा भूमिका

---

\Bकठोरपणे कर वसुली करा

\B---

औरंगाबाद महापालिकेची अनेक कामे फक्त निधी नसल्यामुळे तुंबली आहेत. कंत्राटदार थकलेल्या बिलासाठी महापौर आणि आयुक्तांना भंडावून सोडत आहेत. विशेष म्हणजे क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे कामही केवळ कंत्राटदाराला पैसे दिले नसल्यामुळे खोळंबले आहे. पालिकेची आर्थिक पत इतकी खालावली आहे की, कुठलेही काम करण्यासाठी कंत्राटदार अगोदर पैसे. त्यानंतरच काम सुरू करू, असे म्हणत आहेत. एखाद्या प्रशासकीय संस्थेवरचा विश्वास इतका उडावा, हे काही ठिक नाही. आयुक्त आणि महापौरांनी मिळून मालमत्ता सर्वेक्षणाची मोहीम राबवली. त्याला गोड फळे लागताना दिसत आहेत. मालमत्ता नुसत्या कागदावर येऊन उपयोग नाही. तितक्याच कठोरपणे मालमत्ता कराची वसुली केली पाहिजे. तर आणि तरच पालिकेच्या हाती पैसा खुळखुळेल. विकासकामे मार्गी लागतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ टक्के स्किझोफ्रेनिक व्यक्ती पुन्हा जिंकू शकतात आयुष्य

$
0
0

\Bनिखिल निरखी, औरंगाबाद

\B'ऐन तारुणात आजाराच्या गंभीर आघाताने व्यक्तीचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करण्याची क्षमता असणारा स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार तब्बल एक कोटी ३५ लाख देशवासियांना भेडसावत आहे. खरे म्हणजे अत्याधुनिक उपचारांमुळे ७५ टक्के स्किझोफ्रेनिक व्यक्ती या पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उभे राहू शकतात. त्यामुळे स्टिग्मा सोडा, उपचार घ्या,' असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. विनय बाऱ्हाळे व डॉ. विनायक पाटील यांनी जागतिक स्किझोफ्रेनिया (२४ मे) दिनानिमित्त केले. त्यांच्याशी 'मटा'ने साधलेला हा संवाद.

\B- 'स्किझोफ्रेनिया' काय आहे? त्याचा व्यक्ती, कुटुंबावर कसा परिणाम होतो?

\B- हा आजार संपूर्ण जगात सपप्रमाणात दिसून येतो. आज मनोरुग्णालयातील ५० ते ६० टक्के खाटा याच आजाराच्या रुग्णांनी व्यापल्या आहेत आणि तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण बाहेर आहेत. या आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन जनजागृतीच्या हेतुने २४ मे रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिन पाळला जातो. हा आजार सर्व वयात दिसत असला तरी पुरुषांमध्ये १५ ते २५ आणि महिलांमध्ये २५ ते ३५ या वयोगटात सर्वाधिक प्रमाणात दिसतो. मुळात या आजारामध्ये मेंदुतील मनाचे कार्य बिघडते आणि त्यामुळेच विचार, भावना, आकलन व वर्तणुकीत कुठलाच ताळमेळ राहात नाही. पूर्णपणे चित्र-विचित्र, अकल्पित व अनाकलनीय विचार, भावना, आकलनातून संबंधित व्यक्तीची कृती -वर्तणूकदेखील तशीच चित्र-विचित्र होते आणि त्याची लक्षणे अचानक बदल झालेल्या संबंधित व्यक्तीच्या वागणुकीतून अतिशय स्पष्टपणे दिसतात. अशा व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात अचानक बदल दिसून येतात. अशांच्या बोलण्यावरही कुठलेच नियंत्रण राहात नाही आणि अशा व्यक्ती एकाच जागी बसून राहू शकतात किंवा एकट्यात स्वत:शी बोलतात किंवा अचानक हसतात किंवा अगदी बेशुद्ध पडल्याप्रमाणे झोपून राहतात. अशा व्यक्तींमध्ये तीव्र भावनातिरेक दिसून येतो आणि अशांना अतिशय चित्र-विचित्र भास तसेच भ्रम होत असतात. त्याचवेळी अशांना वास्तवतेचे किंवा स्वत:च्या आजाराचे कोणतेच भान नसते. अर्थातच, अशांची निर्णय क्षमता पूर्णपणे नष्ट होते व अशा व्यक्ती कोणतेही जबाबदारीचे काम, नोकरी, व्यवसाय करू शकत नाहीत. धक्कादायक म्हणजे ५० टक्के स्किझोफ्रेनिक व्यक्ती हे आत्महत्येचा प्रयत्न करतात आणि त्यातील १५ टक्के व्यक्ती हे आत्महत्या करण्यात यशस्वी होतात. अशा व्यक्ती आसपासच्या व्यक्तींवर जीवघेणा हल्ला (होमिसाइड) करण्याची शक्यताही नाकारता येत नसते; परंतु दुसऱ्यांवर हल्ला करणाऱ्या स्किझोफ्रेनिक व्यक्तींचे प्रमाण खूप कमी आहे. या आजारामुळे संबंधित व्यक्तीचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते व त्याचा फटका त्याच्या कुटुंबाला बसतो. अशा व्यक्तींवर योग्य ते उपचार न झाल्यास त्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा कोणतेही जबाबदारीचे काम करू शकत नाहीत. मात्र योग्य वेळी योग्य उपचारांमुळे हे दुष्टचक्र नक्कीच थांबवता येते.

\B- या आजाराची कारणे कोणती? सभोवतालची परिस्थिती आजाराला पोषक ठरते का?

\B- हा आजार होण्यामागे अनुवंशिकता हे एक कारण आहे. आई किंवा वडिलांना हा आजार असेल तर मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता १२ टक्के असते आणि दोघांना हा आजार असेल तर ही शक्यता ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्याचबरोबर मेंदुमध्ये होणारे जीव-रासायनिक बदल हेदेखील आजारामागचे महत्वाचे कारण आहे. ताणतणाव, मद्यपान किंवा चरस, अफू, गांजा यासारखी व्यसनेदेखील आजार उद्भवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी खतपाणी घालतात. अर्थात, कुटुबियांनी आजाराची कारणे न शोधता अशा व्यक्तींना लवकरात लवकर मनोविकारतज्ज्ञाकडे घेऊन जाणे जास्त महत्वाचे आहे. दुर्दैवाने अजूनही हा आजार दडवण्याचा प्रयत्न केला जातो.

\B- आजघडीला उपचार किती प्रभावी आहेत? किती जणांना उपचारांचा लाभ होतो?

\B- आजघडीला कमी शुल्कात प्रभावी औषधोपचार उपलब्ध झाले आहेत. दुष्परिणामविरहित औषधांमुळे तसेच सुरक्षित इलेक्ट्रिक शॉक उपचार पद्धतीमुळे आजार नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे. एकूण स्किझोफ्रेनिया रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांना हा आजार एकदाच होतो आणि उपचारानंतर त्यांना हा आजार कधीच होत नाही व औषधी घेण्याचीही गरज उरत नाही. दुसऱ्या २५ टक्के रुग्णांचा आजार उपचारांनी बरा होतो; पण आजार परत उद्भवू शकतो व त्या त्या वेळी पुन्हा उपचार घ्यावे लागतात. तिसऱ्या २५ टक्के रुग्णांना आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर काही औषधे घ्यावी लागतात, तर उर्वरित २५ टक्के रुग्णांमध्ये उपचारानंतरही आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण असू शकते. याचाच अर्थ ७५ टक्के स्किझोफ्रेनिक व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात उभ्या राहू शकतात, सामान्य आयुष्य जगू शकतात. आपापली नोकरी, व्यवसायही करू शकतात आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलू शकतात.

\B- स्किझोफ्रेनियावर मात केलेल्या यशस्वी व्यक्ती आहेत का?

\B- या आजारावर मात केलेली अनेक उदाहरणे देता येतील. ख्यातनाम गणितज्ज्ञ आणि स्किझोफ्रेनिया झाल्यानंतर इकॉनॉमिक्स विषयामध्ये नोबेल हा सर्वोच्च किताब पटकाविलेला जॉन नॅश हे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. घाटीमध्ये 'एमडी' करताना एका विद्यार्थ्याला स्किझोफ्रेनिया असल्याचे त्याच्या मित्रांना लक्षात आले. मित्रांनी त्याला उपचारासाठी आणले आणि उपचार घेत असताना त्याने 'एमडी'ची परीक्षा दिली आणि त्याने परीक्षेत सुवर्णपदक पटकाविले. एका व्यापाऱ्याला ऐन तारुण्यामध्ये आजाराने कवेत घेतले आणि गेल्या ३५ वर्षांपासून हा व्यापारी उपचार घेत असतानाच स्वत:चा व्यवसायही समर्थपणे करीत आहे. स्वत:चेच नव्हे तर, त्याच्या मुलांचे आयुष्यही फुलत आहे. त्याच्याच एका मुलीने अहमदाबादच्या 'आयआयएम'मधून शिक्षण घेतले आहे. अशी कितीतरी यशस्वी उदाहरणे आहेत. मात्र, यशस्वी ठरलेल्यांना उपचारासाठी कधीतरी रुग्णालयात आणावे लागले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन; उद्यानाच्या कामाला तडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मयूर पार्क येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या कामाला तडे गेले आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, याबाबत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

मयूरपार्क वॉर्ड क्रमांक सात येथे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात नागरिकांना योगासने करण्यासाठी ओटा तयार करण्यात आला आहे. एक मार्च २०१९ रोजी या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. दोन महिन्यांत येथील कामाचा दर्जा समोर आला. येथील योगासनाच्या ओट्याला कोबा करण्यात आला आहे. या कामाला तडे पडण्यास सुरुवात झाली आहे. ओट्याच्या चारही बाजूंना तडे पडत असून खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या उद्यानात दररोज परिसरातील अनेक नागरिक फिरण्यासाठी तसेच व्यायाम, योगा करण्यासाठी येतात. या संदर्भात परिसरातील नागरिक ललित सरदेशपांडे यांनी या निकृष्ट कामाची तक्रार महापालिका आयुक्तांना एका निवेदनाद्वारे केली आहे. सदरील कामाचा दर्जा निकृष्ट असून, या संदर्भात कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या कामाची दुरवस्था झाली आहे. ओट्याच्या कामाला तडे गेले आहेत. खड्डे पडण्याची शक्यता आहे. हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

- ललित सरदेशपांडे, जागरुक नागरिक, मयूर पार्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा एकरावर उभारणार वाहतूकनगर

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

Tweet : @rtaksalMT

औरंगाबाद : 'जाधववाडी परिसरातील दहा एकर जागेवर वाहतूकनगर उभारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम महिनाभरात सुरू होणार असून, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसह टॅव्हल्स बस पार्किंग, गॅरेज लाइनची सोय या नगरात असेल,' अशी माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

पर्यटननगरी असलेल्या औरंगाबादचा औद्योगिक विकासामुळे गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली. रोजगार, व्यवसाय तसेच शिक्षणानिमित्त शहारात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यात प्रवासी वाहनाबरोबरच माल वाहतूक करणाऱ्यांचाही समावेश असून, पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. बाजार समिती आवारातही दररोज मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करणारी वाहने येतात. या सर्व बाबींचा विचार करत जाधववाडी परिसरात सुसज्ज वाहतूकनगरी उभारण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. वाहतूकनगर दहा एकर जागेवर असून, त्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम महिन्याभरात सुरू होईल. वर्कऑर्डर दिली आहे. या कामासाठी सुमारे ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यास पणन मंडळाने मंजुरी दिली आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसह टॅव्हल्स पार्किगसाठी स्वतंत्र सोय करून दिली जाणार आहे. काही गाळे उभारून खास गॅरेज लाइन सुरू करण्याचा मानस आहे. या नगरात जा ये करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असून, २४ मीटरचा रस्ता असेल. मुलभूत पायाभूत सोयी सुविधांसह येत्या ऑगस्ट महिन्यांपासून वाहतूकनगर सुरू व्हावे असे नियोजन असून, उर्वरित कामे टप्प्या टप्प्याने व मागणी प्रमाणे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पठाडे यांनी दिली.

\Bमहापालिकेचा पत्ता कट?

\Bवाहतूकनगर उभारणीसाठी जागा मिळावी, असे पत्र पाच ऑगस्ट १९९७मध्ये महापालिकेने बाजार समितीला दिले होते. पणन संचालकाच्या परवानगीनंतर समितीने दहा एकर जागा वाहतूक नगरासाठी भाड्याने देण्यास मान्यता दिली होती. त्यावेळी लिजभाडे किमान एक रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे दरसाल आकारण्याचा निर्णय नोव्हेंबर १९९७मध्ये घेण्यात आला. तसेच त्यावेळी महापालिकेने २० लाख रुपयांचा भरणाही बाजार समितीकडे केला. मात्र, त्यानंतर वाहतूकनगर उभारणीसाठी महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही. आता बाजार समितीनेच त्यासाठी पुढाकार घेतल्याने पालिकेचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.

महापालिकेस वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांनी वाहतूकनगर उभारणीसाठी काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे शहराची गरज लक्षात घेता बाजार समितीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. नगराचे कामही आता सुरू झाले आहे. शेजारीच पेट्रोल पंप, गॅरेज लाइनही उभारली जाणार आहे.

- राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला शाखेचे विद्यार्थी ‘मुक्त’मध्ये वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी, बारावी आणि पदवीला कला शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात मात्र सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेला आहेत. औरंगाबाद विभागात जवळपास ४५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी हे कला शाखेचे आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या बीए, बीएस्सी, बीकॉमसह एम. ए., एम. कॉम., एमएस्ससी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. औरंगाबाद विभागातून ६८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून, ७२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विभागातील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांमधून सर्वाधिक परीक्षार्थींची संख्या बीड जिल्ह्यातील आहे. मुक्त विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेतील विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात, हे परीक्षार्थींच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ७२ हजार परीक्षार्थींपैकी ४५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी हे कला शाखेशी निगडीत आहेत. यंदा उत्तरपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या स्तरावरूनच होत आहे. मागील वर्षीपर्यंत हे काम खासगी कुरिअरमार्फत केले जायचे. यंदापासून विभागीय पातळीवर जिल्हास्तरावर एक समन्वयक नेमण्यात आला असून उत्तरपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया केली जाते. या उत्तरपत्रिका चार टप्प्यात जमा करून विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर एकत्रित त्याची तपासणीची प्रक्रिया होणार आहे.

\Bकॉपी थांबेना

\Bमुक्त विद्यापीठाच्या परीक्षेतही कॉपीला आळा घालणे शक्य झाले नसल्याचे बोलले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागातील केंद्रात कॉपी करू देण्यास आग्रह केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉपी प्रकरणांना आळा बसावा यासाठी विद्यापीठाने बैठे पथकांसह भरारी पथकांचीही नेमणूक केली आहे. बैठे पथक केंद्रावर परीक्षा होईपर्यंत असते तर, भरारी पथकांना विविध केंद्रांना भेटी देत नियमितपणे अहवाल द्यायचा आहे.

विविध अभ्यासक्रमांमध्ये कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. परीक्षा सुरळीत सुरू असून गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे अन् भरारी असे दोन्ही पथक कार्यरत आहेत.

- डॉ. राम माने, विभागीय संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, औरंगाबाद

\Bपरीक्षा सुरू

\B- ६० परीक्षा केंद्र

- ७२००० विद्यार्थी

- ६ केंद्र औरंगाबादमध्ये

- २२ जिल्ह्यात

- १९००० विद्यार्थी संख्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images