म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद केलेल्या कामाचा मबदला मिळत नसल्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा सोमवारी झोन क्रमांक तीन मध्ये सुमारे चार तास काम बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोन वेळा आंदोलन केले आहे. त्यामुळे रेड्डी कंपनीचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरोघरी जाऊन कचरा संकलन, रस्त्याशेजारी-दुभाजकांमध्ये साचलेल्या कचऱ्याचे संकलन, हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत पोचवण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. या कंपनीचे चार महिन्यापूर्वी काम सुरू केले. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार रखडत आहेत. पगाराच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोन-तीन वेळा आंदोलन केले. त्यावेळी पगार करण्याचे आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली. सोमवारी झोन क्रमांक तीनमध्ये कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले हे कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. पण कर्मचाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही, पगार मिळेपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर महापौरांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्फत रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना समज दिली. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावे, काम बंद पडू देऊ नका, असे भोंबे यांनी कंपनीला कळवले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले. \Bकर्मचाऱ्यांनी रोखली महापालिकेची वाहने \B रेड्डी कंपनीचे कर्मचारी कचरा संकलन व वाहतुकीचे काम करीत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर महापालिकेने स्वत:च्या यंत्रणेमार्फत कचरा उचलण्याचे ठरविले. त्यासाठी तीन ट्रक लावण्यात आल्या. काम बंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही वाहने रोखली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली. \Bमहापालिकेकडे ९० लाखांची थकबाकी \B पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीचे दीड कोटी रुपये पालिका प्रशासनाकडे थकले आहेत. यापैकी प्रशासनाने ६० लाख रुपयांचे पेमेंट केले आहे. उर्वरित पेमेंट वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार करता येत नाहीत, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट