Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुरुस्तीच्या नावे अनेक तास वीज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एप्रिल महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीसाठी महावितरणे तीन ते चार तासांचे शटडाउन घेतले होते. चार दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून मोठे नुकसान झाले. त्यानंतर दुरुस्तीसाठी शुक्रवारी पुन्हा एकदा अर्ध्याहून शहराचा वीजपुरवठा पाच तासांहून अधिक काळ खंडित करणअयात आला. त्यामुळे शहरवासियांचे हाल झाले.

पावसाळ्यात वादळ, वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणकडून मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती केली जाते. एप्रिल महिन्यातील चारही शुक्रवारी वीजपुरवठा खंडित करून दुरुस्ती करण्यात आली. ४२ अंश सेल्सियसहून अधिक तापमानात असह्य उकाडा सहन करताना नागरिकांचे हाल झाले. गेल्या आठवड्यात तीन दिवस पाऊस झाला. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. हर्सूल येथील ३३ केव्ही उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाळूज, साजापूरसह अर्ध्या शहरातील वीजपुरवठा आठ तास खंडित झाला होता. याच काळात जळगाव रस्त्यालगतच्या उच्चदाब वाहिनीच्या अर्थिंग तारांचे मोठे नुकसान झाले. चिकलठाणा एमआयडीसीतील उद्योजकांचीही वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रात चिकलठाणा १३३ केव्ही अंतर्गत दुपारी तीनपर्यंत शटडाउन घेण्यात आले. त्यामुळे ४० टक्के शहराची वीज सकाळी नऊपासून बंद राहिली. हे काम लांबल्याने पुन्हा काही वेळ वाढवून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान दुपारी तीननंतर तीस तासांसाठी उस्मानपुरा, क्रांतीचौक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, उकाड्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळीवाऱ्यामुळे वीजतारा तुटून नुकसान झाले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला होता.

-निर्मळ, अधीक्षक अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमआयएम’ची महापालिकेत नाकाबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील 'एमआयएम'च्या नगरसेवकांची नाकाबंदी करण्याची व्युहरचना शिवसेना-भाजप युतीने आखली आहे. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत 'एमआयएम'च्या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव युतीच्या नगरसेवकांनी बहुमताने मंजूर केला. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर प्रक्रिया शुक्रवारी सुरू करण्यात आली. नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव मंगळवारपर्यंत शासनाला पाठविला जाण्याची शक्यता आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. 'एमआयएम'च्या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला. मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, महापौर कार्यालयाने कायदेशीर प्रक्रिया शुक्रवारी सुरू केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

मालमत्ता कराची जास्त वसुली व जास्त प्रमाणात बेटरमेंट चार्जेस भरण्यात आलेल्या वॉर्डात यापुढे विकास कामे करण्याचे गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले आहे. या ठरावानुसार, 'एमआयएम' नगरसेवकांचे वॉर्ड फारच कमी संख्येने बसतात. त्यामुळे आता कर वसुली न होणाऱ्या वॉर्डात विकास कामे होणार नाहीत, असे मानले जात आहे.

महापौरांनी शुक्रवारी पालिकेच्या लेखा विभागाला भेट दिली, यावेळी त्यांनी 'एमआयएम' नगरसेवकांच्या वॉर्डात किती कामे झाली, किती कामे प्रलंबित आहेत, किती कामांचे नियोजन केलेले आहे, याची माहिती घेतली. जी कामे सुरू झालेली नाहीत ती सुरू करू नका, असे आदेश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. अर्थसंकल्पात देखील 'एमआयएम' नगरसेवकांच्या वॉर्डातील कामांचा उल्लेख करू नका, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. यामुळे येत्या काळात 'एमआयएम' विरुद्ध शिवसेना, असा संघर्ष निर्माण होईल, असे मानले जात आहे.

\Bकायदेशीर प्रक्रियेला गती \B

सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयानुसार त्या २० नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी महापौर कार्यालयाकडून पालिका प्रशासनाला शनिवारी कारणापुरता उतारा दिला जाणार आहे. कारणापुरता उतारा मिळाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाईल. २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून मंगळवारपर्यंत शासनाला पाठवला जाण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव पाठवल्यावर 'एमआयएम'च्या नगरसेवकांच्या वॉर्डातील कामांवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेच्या मालगाड्या रद्द

$
0
0

औरंगाबाद : मध्य रेल्वेमध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीयरिंग ब्लॉकमुळे सोलापूर विभागात अधिक मालगाड्या धावणार आहेत. त्यामुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणाऱ्या काही मालगाड्या रद्द तर, काही अंशता: रद्द करण्यात आल्या आहेत यामध्ये निजामाबाद ते पुणे, पंढरपूर ते निझामाबाद, पुणे ते निझामाबाद, निझामाबाद ते पंढरपूर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अंशता: रद्द गाड्यामध्ये निजामाबाद ते पुणे, नांदेड ते दौंड आणि दौंड ते नांदेड या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळांनी बहरणार डॉ. सलीम अली सरोवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मजनु हिल येथील डॉ. सलीम अली सरोवरात महापालिकेने कमळाच्या एक हजार रोपांची लागवड केली आहे. येत्या एक महिन्यात संपूर्ण सरोवर कमळाच्या फुलांनी बहरून जाणार आहे. १९८५ च्या काळात या सरोवरात कमळ होते, त्यानंतर सुमारे ३५ वर्षांनंतर सरोवरात कमळ फुलणार आहे.

डॉ. सलीम अली सरोवर पानवनस्पतीने व्यापले होते. या वनस्पतीमुळे सरोवरातील पाणी देखील दिसत नव्हते. सरोवरातील ही वनस्पती काढून ते विकसित करण्याची भूमिका महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी पक्षी मित्रांना विश्वासात घेतले. पक्षी मित्रांच्या सहमतीनंतर रायगड येथील एका संस्थेच्या मदतीने सरोवरातील पानवनस्पती काढून टाकण्यात आली. आता सरोवराचा ९० टक्के भाग पान वनस्पतीमुक्त झाला आहे. या संपूर्ण भागात कमळाची रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १५ दिवसांपूर्वी चारशे ते साडेचारशे रोपांची लागवड सरोवरात करण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात पाचशे रोपे सरोवरात लावण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सगुणा नर्सरीमधून कमळाची रोपे आणण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी दिली. रोपांची लागवड केल्यानंतर एक महिन्याने सरोवरात कमळाची फुले फुललेली दिसू शकणार आहेत. कमळाच्या फुलांमुळे सरोवराचे रूप पालटलेले दिसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेयसीसाठी दुसऱ्या महिलेचा खून; दोघे हर्सूल कारागृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रेयसीसाठी दुसऱ्याच महिलेचा खून केल्याच्या प्रकरणात जिचा खून झाल्याचे भासवण्यात आले ती आरोपी प्रेयसी सोनाली सदाशिव शिंदे व तिचा आरोपी प्रियकर छबादास भावलाल वैष्णव यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी शुक्रवारी (१४ जून) दिले.

या प्रकरणात जिचा खून झाल्याचे भासवण्यात आले त्या आरोपी सोनाली सदाशिव शिंदे हिचा भाऊ अमोल कौतिकराव वाढेकर (२१, रा. तलवाडा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) याने फिर्याद दिली होती. प्रकरणात २४ मे रोजी पिसादेवी पोखरी शिवारात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता व प्राथमिक तपासात मृत महिला ही सोनाली सदाशिव शिंदे (रा. जाधववाडी) असल्याची ओळख तिच्या भावाने पटविली होती. या मृत महिलेच्या पायात चेन, जोड, अंगठ्या, बांगड्या आढळल्या होत्या व घटनास्थळी सुसाईड नोटही आढळली होती. त्यावरुन ती मृत महिला सोनाली असल्याचे तिच्या भावाने म्हटले होते व तिचा भाऊ अमोल याच्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलिसांनी तिचा पती सदाशिव सिंदे याला अटक केली होती. मात्र, सोनाली शिंदे हिचे आरोपी छबादास भावलाल वैष्णव (२५, रा. बोघेगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे छबादास व सोनाली यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, सोनाली हिच्यासाठीच छबादास याने २४ मे रोजी एका दुसऱ्याच महिला भुलवून नेऊन तिचा पिसादेवी पोखरी शिवारात खून केला आणि जिचा खून केला ती सोनाली असल्याचे भासवले. प्रकरणात रुक्मणबाई सर्जेराव माळी (५०, रा. सैदा कॉलनी, हर्सूल तलानाजवळ) हिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. दोघांना अटक करुन शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी डॉक्टरांचे ‘मास बंक’ शांततेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्‍टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (१४ जून) घाटी हॉस्पिटलमधील ३५०पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर व आंतरवासितांनी शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन केले. निवासी तसेच आंतरवासितांनी सकाळी आठ ते पाच या वेळेत केलेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला असला तरी दिवसभरात १७ ते १८ छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया व १४ प्रसुती झाल्या. आंदोलनात अनुचित प्रकार झाला नाही, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी 'मटा'ला सांगितले.

या आंदोलनात २६४ निवासी डॉक्‍टर व शंभरपेक्षा जास्त आंतरवासिता सहभागी झाले होते, तर ७९ निवासी डॉक्टर हे कामावर होते. संपामुळे संपूर्ण घाटी प्रशासन व घाटीचे वरिष्ठ डॉक्टर दिवसभर सज्ज होते. विशेष म्हणजे रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, याचे प्रशासनाने नियोजन केले होते. दरम्यान, डॉक्‍टरांवर वारंवार होणाऱ्या हल्याच्या पार्श्वभूमीवर कठोर कायदे केले पाहिजेत व रुग्णालयात सुरक्षित वातावरण असले पाहिजे, अशी मागणी 'मार्ड'चे शहरातील अध्यक्ष डॉ. आमेर खान यांनी निवासी डॉक्टरांच्या वतीने केली. तसेच रुग्णालयातील सुरक्षित वातावरणासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत, असे 'अस्मी' या आंतरवासितांच्या संघटनेचे राज्य सहसचिव डॉ. सुशील शिंदे म्हणाले.

\Bअडीच हजार डॉक्टरांचा निषेध

\Bकोलकाता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शहातील दोन ते अडीच हजार खासगी डॉक्टरांनी शुक्रवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम केले. तसेच 'आयएमए' संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सोमवारी (१७ जून) देशभर संप पुकारण्यात आला आहे, असे 'आयएमए'चे शहर सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वसाधारणसभेत गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्ण गोंधळ झाला. जलील यांच्या नावाने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याचा हट्ट 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी धरला. ठराव मंजूर होईपर्यंत सर्वसाधारण सभा चालू न देण्याचा इशारा त्यांनी दिला. महापौरांनी ही मागणी अमान्य केली. त्यामुळे 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढतच गेल्यामुळे महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी या नगरसेवकांना सभागृहाच्या बाहेर काढले. एमआयएमच्या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, काळात महापौरांनी तीनवेळा सर्वसाधारण सभा तहकूब केली.

लोकसभा निवडणुकीनंतर गुरुवारी प्रथमच महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या सभेत उमटतील असे गृहित धरण्यात आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सभा सुरू झाल्यावर भाजपचे नगरसेवक राजू शिंदे, माजी महापौर भगवान घडमोडे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला शिवसेना, भाजपच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिले. प्रस्ताव मंजूर करताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे.' हा प्रस्ताव मंजूर केला जात असताना 'एमआयएम'चे नगरसेवक सभागृहात नव्हते. सभागृहात आल्यावर 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी यांनी,'औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करा,' असा विषय मांडला. विरोधीपक्षनेच्या सरिता बोर्डे यांनी देखील जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला, परंतु महापौरांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. महापौर 'एमआयएम'च्या नगरसेवकांना म्हणाले, 'नवनिर्वाचीत खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर लगेचच मंजूर करण्यात आला आहे. नवनिर्वाचीत खासदारांमध्ये जलीलसुद्धा येतात. त्यामुळे त्यांचे स्वतंत्रपणे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची गरज नाही.'

महापौरांच्या या भूमिकेमुळे एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. नगरसेवक अफसर खान यांनी देखील जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाला विरोध केला आणि त्यांनी जलील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. त्यामुळे 'एमआयएम'चे नगरसेवक अधिकच संतापले. त्यांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. महापौरांनी नगरसेवकांना जागेवर बसण्याची सूचना केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे महापौरांनी सुरुवातीला सहा नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले. त्यांनी या नगरसेवकांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना केली. त्या सहा नगरसेवकांच्या समर्थनार्थ 'एमआयएम'चे अन्य नगरसेवक एकत्र आले. त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. नगरसेवक जमीर कादरी, नासेर सिद्दिकी यांनी महापौरांच्या समोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गोंधळ अधिकच वाढला. दरम्यानच्या काळात महापौरांनी दोन वेळा आणि नंतर एक वेळा अशी तीन वेळा सर्वसाधारण सभा तहकुब केली. नगरसेवक ऐकत नाहीत, असे लक्षात आल्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या 'एमआयएम'च्या सर्व २० नगरसेवकांना निलंबित करण्यात येत आहे, असे महापौरांनी जाहीर केले. त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना त्यांनी केली, पण ते बाहेर जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना बोलावण्यात आले. सुरक्षा रक्षक देखील नगरसेवकांना बाहेर नेऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी एकेका नगरसेवकाला उचलून सभागृहाच्या बाहेर नेले.

त्यानंतर शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या भूमिकेचे स्वागत केले. महापौर झिंदाबादच्या घोषणा दिल्या. या २० नगरसेवकांचे नगरसेवकपद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या गटनेत्यांनी मांडला. महापौरांनी तो मान्य केला व तशी शिफारस प्रशासनाने शासनाकडे करावी, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

या नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा झाला प्रस्ताव

खान फेरोज, विकास एडके, नासेर सिद्दिकी, अब्दुल नाईकवाडी, जमीर कादरी, आबु हाश्मी, सरिता बोर्डे, अजिम अहेमद, लता निकाळजे, खान इर्शाद, खान सायराबानो, सरवत बेगम, शेख नर्गिस, खान नसरीन बेगम, नसीम बी सांडू खान, सलीमा कुरेशी, तसनीम बेगम अब्दुल रऊफ, गंगाधर ढगे, पठाण अस्मा फिरदोस, शेख जफर अख्तर.

खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला त्यावेळी 'एमआयएम'चे नगरसेवक सभागृहात नव्हते. ते मुद्दाम उशिरा आले. त्यांना वाद घालायचा होता. 'एमआयएम'च्या नगरसेवकांकडून सतत गैरवर्तन केले जात आहे. त्यामुळे २० नगरसेवकांचे पद कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यांनी महापौरांबद्दल असंसदीय शब्द वापरले. सभागृहाचे कामकाज बंद पाडले म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिले आहेत.

- नंदकुमार घोडेले, महापौर

महापौर नंदकुमार घोडेले कोणताही निर्णय स्वत:च्या मताने घेत नाहीत. खैरे यांनी उठ म्हणताच उठणारे आणि बस म्हणताच बसणारे हे महापौर आहेत. शिष्टाचार डावलून वेगवेगळ्या कार्यक्रमात मला डावलणे कोणत्या स्तराचे राजकारण आहे? घडलेला प्रकार दुर्दैवी आहे.

- इम्तियाज जलील, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजपुरवठा खंडित; पाणी पुन्हा विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील पंपहाउसचा आणि शहरातील जलकुंभांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक ते दोन दिवसांनी पुढे ढकलले जाण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

जायकवाडी पंपहाउसचा वीजपुरवठा शुक्रवारी (१४ जून) सकाळी साडेआठ ते दहा या कालावधीत खंडित झाला होता. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा उपसा पूर्णपणे बंद होता. विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर पंप आणि मशिनरी सुरू करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागला. त्याचा परिणाम फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर झाला. फारोळ्यापासूनचे पुढचे पंपिंग दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झाले. फारोळाहून शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी येण्यासाठी सहा ते आठ तास लागतात. औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक, सिडको एन-पाच, एन-सात येथील पंपगृहाचा वीजपुरवठा महावितरणने सकाळी सव्वादहा ते दुपारी सव्वातीन या कालावधीत बंद केला होता. त्यामुळे या पंपगृहांवरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. विस्कळीत पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी किमान एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक देखील पुढे ढकलले जाऊ शकते, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संगणक कंपनीला लाखोंचा गंडा, दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संगणकाच्या कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घतल्याप्रकरणात पवनकुमार सोनी उर्फ विकास सिंग रामलुलक सोनी व कृष्ण गोपाल गुलाबचंद शर्मा या दोन परप्रांतीय आरोपींना शुक्रवारी (१४ जून) अटक केली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींना सोमवारपर्यंत (१७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. दहातोंडे यांनी दिले.

या प्रकरणात यापूर्वी आरोपी आकाश डाके याला नऊ जून रोजी अटक करण्यात आली होती, तर न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. आरोपींकडून डेल कंपनीचे दोन लॅपटॉप, १६५ जुने मदरबोर्डे, प्रिंटर मशीन व एक कार असा सुमारे आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. माधव निवृत्ती काळे (५२, रा. शिवाजीनगर, पुणे) हे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत. डेल कंपनीच्या संगणकाचे स्पेअर पार्ट विकण्यासाठी काळे यांच्या कंपनीची एक शाखा सिडको कॅनॉट प्लेसमध्ये आहे. या शाखेतून मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यांचे कामकाज चालते. २१ जानेवारी २०१९ पासून आकाश डाके हा कंपनीत कामाला लागला. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील कामांचा डाके याच्याशी कंपनीने करारनामा केला. त्यानुसार आकाशने संगणक दुरुस्तीचे काम स्वीकारले होते. हे काम तो कंपनीच्या शाखेतून करायचा. मात्र, डाके याने वापरलेल्या संगणकाचे पार्ट वेळेत परत पाठवले नाही. त्यामुळे कंपनीचे नागपूर येथील मॅनेजर राजू उगले यांनी डाकेला संगणकाचे पार्टस परत करण्यास सांगितले. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लेखा परीक्षणासाठी विभागीय समन्वयक नितीन पवार यांना औरंगाबादला पाठविण्यात आले. लेखा परीक्षणादरम्यान पवार यांनी कॉल लॉग केलेल्या तक्रारदारांची भेट घेण्याचा प्रयत्न असता, तक्रारी बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे डाके याची चौकशी केली असता त्याने पवनकुमार सोनी उर्फ विकास सिंग रामलुलक सोनी (२७, रा. ता. ग्यानपूर, उत्तर प्रदेश) व कृष्ण गोपाल गुलाबचंद शर्मा (२८, रा. राजस्थान) या आरोपींशी संगनमत करून निकामी पार्टवर बनावट क्रमांक टाकून ३४३ पार्टस परस्पर विकून कंपनीला गंडा घातल्याचे कबूल केले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणातील आरोपी सॅम करण हा अजूनही फरार आहे.

\B४८ लाखांचे मदर बोर्ड जप्त करणे बाकी

\Bप्रकरणात दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या पसार साथीदाराला अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपींकडून ४८ लाखांचे नवीन मदर बोर्ड हस्तगत करावयाचे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची ३९ हजारांची सोनसाखळी पळवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीस्वार चोरांनी आता मंगळसूत्र चोरीनंतर सोनसाखळी पळवण्याकडे कल वळवला असून, औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानाजवळ तरुणाची एकोणचाळीस हजारांची सोनसाखळी पळवण्यात आली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनसाखळी चोरीप्रकरणी उमेश अंबादास लोखंडे (वय २९, रा. साईराम निवास, बारुदगरनाला, रंगारगल्ली रोड) यांनी तक्रार दाखल केली. लोखंडे हे सात जून रोजी रात्री मोबाइलवर बोलत पायी जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून एक अनोळखी तरुण आला. या तरुणाने लोखंडे यांच्या गळ्यात असलेली दहा ग्रॅमची एकोणचाळीस हजारांची सोनसाखळी हिसकावली. यानंतर तो तेथे उभ्या असलेल्या साथीदाराच्या पल्सर दुचाकीवर बसून पसार झाले. याप्रकरणी लोखंडे याने गुरुवारी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एपीआय राहुल सूर्यतळ तपास करीत आहेत.

\Bमैदानावर मद्यपींचा सुळसुळाट\B

सोनसाखळी चोरीची घटना घडली त्या ठिकाणापासून जवळच जिल्हा परिषदेचे मैदान आहे. या मैदानावर गेल्या काही दिवसांपासून मद्यपींचा सुळसुळाट वाढला आहे. रात्री उशीरापर्यंत येथे मद्यपी मद्यप्राशन करताना दिसून येतात. या प्रकरणातील संशयित आरोपींची ओळख पोलिसांनी पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पर महासंचालकांनी घेतला पोलिस आयुक्तालयाचा आढावा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक राजेंद्रसिंह दौऱ्यासाठी शहरात आलेले आहेत. शुक्रवारी त्यांनी पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला तक्रार निवारण केंद्र, विशेष शाखा तसेच इतर विभागातील कामकाजाचा पूर्ण आढावा जाणून घेतला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यास भेट दिली. या ठिकाणी देखील तब्बल तीन तास राजेंद्रसिंह थांबले होते. ठाण्यातील प्रत्येक गोष्टीची त्यांनी तपासणी केली. यानंतर सायंकाळी सहायक पोलिस आयुक्त शहर विभागाच्या कार्यालयाला भेट देत तपासणी केली. शनिवारी क्राइम मिटींग घेतल्यानंतर महासंचालक राजेंद्रसिंह मुंबईला रवाना होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अन्न शिजवून मध्यान्ह भोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अन्न शिजवून मध्यान्ह भोजन देण्यात यावे, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

सहसंचालक दिनकर टेमकर यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीसाठी संस्थांची निवड करण्यासाठी २०१२मध्ये स्वारस्याची अभिव्यक्ती प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर राबविण्यात आली होती. या प्रक्रियेअंतर्गत पात्र झालेल्या संस्थांना अंतिम मंजुरी देण्याबाबत प्रस्ताव शासन स्तरावर मात्र तेव्हापासून प्रलंबित आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना आहार पुरवठा करण्यासाठी मागील वर्षी अन्न शिजवून देणाऱ्या संस्थांना मुदतवाढ देऊन तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था करण्यासाठीही मान्यता देण्यात आली होती. मात्र, नागरी भागामध्ये सद्यस्थितीमध्ये काम करीत असलेल्या बचतगटांना वेळोवेळी देण्यात आलेल्या मुदवाढीबाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. प्रस्ताव प्रलंबित असल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होतो आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे १७जून पासून सुरू होत असून, शाळेच्या पहिल्या दिवसापासून शालेय पोषण आहार देणे आवश्यक आहे. त्यामुळे आता केंद्रीय स्वयंपाक गृहाकरिता पात्र असलेल्या शाळांमध्ये स्वारस्याची अभिव्यक्ती प्रक्रियाद्वारे केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी पात्र असलेल्या शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृहासाठी संस्थांची निवड होऊन या संस्थांमार्फत शाळा स्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा सुरू होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेची नियुक्ती करण्याचा अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस राहिल. शाळा व्यवस्थापन समिती २०१८-१९ मधील यंत्रणेची नियुक्ती करू शकेल. अथवा आवश्यकतेनुसार नवीन यंत्रणेची नियुक्ती करु शकेल, असेही टेमकर यांनी दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमजीएम’मध्ये अद्ययावत मॉड्युलर ‘आयसीयू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्व प्रकारच्या अद्ययावत वैद्यकीय सोयी-सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच सर्वप्रकारचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी केलेल्या अत्याधुनिक उपाययोजनांचा समावेश असलेले 'मॉड्युलर आयसीयू' शहरातील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सज्ज झाले आहे. 'पॉझिटिव्ह प्रेशर' तसेच 'निगेटिव्ह प्रेशर'ची सुविधाही या ठिकाणी करण्यात आली असून, एमजीएम रुग्णालयातील हे दहावे 'आयसीयू' आहे. त्यामुळे आता रुग्णालयात एकूण ९० पेक्षा जास्त आयसीयू बेड झाले आहेत.

या नवीन व्यवस्थेची माहिती एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, संचालक डॉ. अजित श्रॉफ व क्रिटिकल विभागाचे प्रमुख इन्टेसिव्हिस्ट डॉ. आनंद निकाळजे यांनी शुक्रवारी (१४ जून) पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार,

दैनंदिन वैशिष्ट्यांपेक्षा जास्त व्यापक मॉनिटर, व्हेंटिलेटरसह अनेक उपकरणांच्या सुविधा या प्रत्येक 'आयसीयू बेड'ला आहेत. ईसीजी, डायलिसिस, सोनोग्राफीदेखील बेडवर करता येऊ शकेल. हात धुतल्याशिवाय डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी रुग्णाजवळ जाऊ शकणार नाही. तसा प्रयत्न केल्यास लाल दिवा लागून त्याची तातडीने नोंद होईल. पडद्यांमुळे जंतुसंसर्गाची शक्यता असल्यामुळे या 'आयसीयू'त पडदा नाही. सर्व भिंती व छत हे स्वच्छ धुता येईल व जंतुनाशकांचा वापर करता येईल, अशा आधुनिक साहित्याचा वापर केला आहे. प्रत्येक चेंबरला मोठी पारदर्शी खिडकी असून, त्याचा उपयोग रुग्णाचे मन प्रसन्न राहण्यासाठी होणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या समुपदेशनासाठी खास खोलीची सोय करण्यात आली आहे.

\Bस्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी निराळी व्यवस्था

\Bयाच 'आयसीयू'त डेंगी, स्वाईन फ्लू तसेच कर्करुग्णांच्या गरजेनुसार वेगळ्या खोल्या केल्या आहेत. यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या खोलीच्या हवेची बाधा 'आयसीयू'तील इतर रुग्णांना होणार नाही. या प्रकारची व्यवस्था मराठवाड्यात पहिल्यांदाच झाली आहे, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाचे अपहरण; तिघांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभक्त दाम्पत्यापैकी वकील पित्याच्या घरात घुसून पित्यासह पित्याच्या आई-वडिलांना मारहाण करीत सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून दीड कोटीची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मुलाचा मामा कृष्णा बापूराव लाटकर, मुंबईचा पोलिस उपनिरीक्षक अमोल रसिकलाल चव्हाण व शांभवी अनिल मालवणकर या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी शुक्रवारी (१४ जून) दिले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.

या प्रकरणी अॅड. श्रीकांत तात्यासाहेब वीर (४०, रा. गारखेडा परिसर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १२ जून २०१९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी घरी असताना सातजण हातात काठ्या-चाकूसह फिर्यादीच्या घरात घुसले. काही क‌ळायच्या आत त्यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या आई-वडिलांना मारहाण करुन मुलाचे अपहरण केले. तसेच दीड कोटी रुपये दिले तरच मुलगा परत मिळेल, अशी धमकीही दिली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी व पोलिस उपनिरीक्षक अमोल रसिकलाल चव्हाण (२९, रा. सायन, मुंबई), कृष्णा बापूराव लाटकर (३४, रा. घाटकोपर, मुंबई) व शांभवी अनिल मालवणकर (२५, रा. घाटकोपर, मुंबई) यांना गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर तिघांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ लाखांचा २४३ पोते गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोडी - साजापूर शिवारात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास तब्बल ३८ लाखांचा गुटखा असलेला कंटेनर गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने जप्त करून तिघांना बेड्या ठोकल्या. आजपर्यंत गुटख्याबाबत केलेही ही पहिली मोठी कारवाई आहे.

शहरालगतच्या करोडी शिवारात गुटख्याचा साठा घेऊन कंटेनर आल्याची माहिती माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली. त्यांनी अन्न आणि औषधी प्रशासन विभागचे अधिकारी मिलिंद शहा आणि योगेश कणसे यांना ही माहिती देत सोबत घेतले. या पथकांनी करोडी शिवारातील तुळजामाता पेट्रोलपंपाजवळ सापळा रचला. यावेळी एका कंटेनरमधून टाटा लोडिंगमध्ये काही व्यक्ती माल भरत असल्याचे दिसून आले. पथकाने छापा टाकला असता हा साठा हीरा गुटख्याचा असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी कंटेनरमध्ये १९८ पोती आणि लोडिंगमध्ये ४५ पोती असा एकूण २४३ पोते गुटख्याचा साठा होता. याची किंमत ३८ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी गुटख्यासहीत दोन्ही वाहने मिळून ५६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपी रुबाब अली हजरत अली शेख (वय २७ रा. आमाशुक्ल, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), इंद्रेश श्रीमदनलाल निषाद (वय २८ रा. भगतपूर, जि. आझमगड, उत्तरप्रदेश) आणि तौसीफ समद शेख (वय २० रा. साजापुर ता. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय शेख अफरोज, जमादार सुभाष शेवाळे, गजेंद्र शिंगणे, सुधाकर राठोड, राजेंद्र साळूंके, अशरफ सय्यद, ज्ञानेश्वर ठाकूर नितीन धुळे आणि बहुरे यांनी केली.

\Bरविवारपर्यंत पोलिस कोठडी

\Bगुटखा तस्करी प्रकरणात कंटेनर चालकासह तिघांना गुरुवारी (१३ जून) मध्यरात्री अटक करण्यात आली. तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना रविवारपर्यंत (१६ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोसळलेल्या वडाचे पुन्हा रोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वटपौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरवासियांना सुखद धक्का दिला आहे. या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उन्मळून पडलेल्या जुन्या वडाच्या झाडाचे यशस्वीरित्या रोपण केले. आता हे झाड पुन्हा बहरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

औरंगपुरा येथील नाथसुपर मार्केटमागे सरस्वती भुवन कॉलनीला लागून एक वडाचे झाड आहे. पाच दशकांपेक्षा जास्त वयोमान असलेले हे झाड दोन दिवसांपूर्वी वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात कोसळले. झाड वाचवण्यासाठी या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले आणि त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्या झाडाची पाहणी केली. झाडाचे पुन्हा रोपण करणे शक्य आहे, असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर झाडाचे पुन्हा रोपण करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या. त्यानंतर तेथेच जवळ जेसीबीच्या साह्याने मोठा खड्डा खोदण्यात आला. त्या खड्यात वडाचे झाड मुळासह लावण्यात आले. झाड लावल्यावर त्यात माती टाकून टँकरभर पाणी टाकण्यात आले.

\Bनागरिकांच्या इच्छेमुळे बळ \B

वडाच्या झाडाचे पुन्हा रोपण करणे सोपे असते, हे काम सहज करता येते, असे विजय पाटील यांनी सांगितले. एका मोठ्या आणि महत्त्वाच्या झाडाचे पुनर्रोपण केल्याचे आम्हाला समाधान आहे. नागरिकांची देखील झाड वाचवण्याची इच्छा होती, त्यांच्या इच्छेमुळे आम्हाला बळ मिळाले. त्यांच्यामुळेच या झाडाला जीवदान मिळाले, असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरेदीसाठी जात असलेल्या मजुराला अडवत गावठी कट्ट्याचा धाक दाखवून नऊ हजार रुपये लुबाडण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी पुंडलिकनगर रोडवर घडला. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तीन आरोपींना गावठी कट्ट्यासह बेड्या ठोकल्या.

संतोष रामदास कांबळे (वय ३२, रा. गल्ली क्रमांक ९, हुसैन कॉलनी) हा मजुरी काम करणारा तरुण कपडे खरेदी करण्यासाठी पुंडलिकनगरला पायी जात होता. यावेळी त्याला तीन संशयित आरोपींनी अडवले. या तिघांनी संतोषला लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच एकाने कंबरेला लावलेला गावठी कट्टा संतोषच्या कपाळावर मारत जखमी केले. यानंतर त्याच्या गळ्याला गावठी कट्टा लावत संतोषच्या खिशातील नऊ हजार रुपये बळजबरीने काढून घेत पसार झाले. या प्रकरणी संतोषने शुक्रवारी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने शोध घेत या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. आरोपीमध्ये भरत दादाराव वाघ उर्फ भुऱ्या, कुणाल प्रदीप सोनकांबळे उर्फ हँडसम आणि शेख शफीक शेख मुसा उर्फ शप्या (सर्व रा. हुसैन कॉलनी) यांचा समावेश आहे. आरोपी भरत वाघच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई एपीआय घनश्याम सोनवणे, पीएसआय विकास खटके, जमादार मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, रवी जाधव, विलास डोईफोडे, जालिंदर मांटे, कोमल तारे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोदीजी ये देश को बुलेट ट्रेन की जरूरत नहीं’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मोदीजी ये देश को बुलेट ट्रेन की जरूरत नहीं, पहले जमीनपर आओ' अशा बोचऱ्या पण परखड कवितांनी हास्यस्फोट करत पद्मश्री सुरेंद्र शर्मा यांनी रसिकांना दोन तास खिळवून ठेवले.

'एमजीएम'चे सचिव अंकुशराव कदम यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त वर्षामंगलमपूर्वसंध्या कार्यक्रमात शर्मा यांनी भारतीय संस्कृतीमध्ये बदलत जाणारी परिस्थिती, तंत्रज्ञानाचे परिणाम, नातेसंबंधात आलेला परकेपणा यावर कोरडे ओढत उपस्थितांना अंतर्मुख केले. प्रारंभी दीपप्रज्वलनाने या कवीसंमेलनास सुरुवात झाली. याप्रसंगी अंकुशराव कदम, कमलकिशोर कदम, प्रतापराव बोराडे, डॉ. सुधीर गव्हाणे, हास्यकवी घनश्याम अग्रवाल, रोहित शर्मा, स्नेहलता दत्ता, पार्वती दत्ता, प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती.

आपल्या दोन तासांच्या काव्य सादरीकरणात शर्मा यांनी राजकीय नेत्यांना शालजोड्यांचा आहेर देत, वास्तविकतेचे भान करून दिले. राहुल गांधी हे दलितांच्या घरी जेवायला गेले की बातमी होते, 'राजा का ये काम नही, दलितोंका घर राजा जैसा क्यू नही?,' असा मार्मिक प्रश्न कवितेतून केला. पालकांचा मुलांवर हल्ली एवढा दबाव आहे, की पाचवी-सहावील मुले आत्महत्या करत आहेत, 'बचपन मार दिया...' ही कविता अंतर्मुख करणारी ठरली. बोअरवेलमध्ये ६० तास मुले पडल्यावर 'इलेक्ट्रॉनिक मेडिया गड्डेमे' या कवितेतून त्यांनी वाहवत जाणाऱ्या माध्यमांचा परखडपणे पंचनामा केला.

आधुनिक संत मायेच्या मोहात अडकले आहेत. त्यांनीच देशाचा सत्यानाश केला, 'सब कुछ छोडनेवाला आज साधू नहीं,' ही कविता अंधश्रद्धेत वाहवत जाणाऱ्या समाजाला उताराच ठरली. ओशो रजनीश यांचे दाखले देत 'किसी को हंसाओ, यही ईश्वरकी प्रार्थना' ही कविताही प्रभावी राहिली. 'इन्सान चाँद पर गया', 'इन्सानियत खाई में', 'मन छोटा', 'भ्रम बडा', 'दिवार मे दरारे', 'अपना भ्रष्टाचार', 'तमाचा मारा है', अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले.

या काव्यसंध्येला कवी प्रा. यशोधरा शर्मा (दाभाडे), अनुराधा कदम, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. गिरीश गाडेकर, अरूण गोसावी, डोलन रॉय, प्रतीक्षा शर्मा, डॉ. सुधाकर शेंडगे, प्रतीक शेंडगे, शशांक दळवी, प्रा. सुनीता पाटील, रवीकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

\Bमंदिरापेक्षा नोकऱ्यांची गरज \B

अयोध्येतील श्रीराम मंदिर व राजकारणाचा समाचार घेत शर्मा यांनी 'राजा का काम मंदिर बनाना नही, उसका मन मंदिर बने,' अशा चपलख ओळीतून हा प्रश्न मांडला. १०० मंदिरे बांधण्यापेक्षा शंभर नोकऱ्या द्या, हा संदेश देत त्यांनी भारतीय संस्कृतीमधील अधोगतीवर चिमटे काढत 'मल्ल्या का बेटा अब्दुल कलाम बनेगा,' हे काव्य सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने ८२ मेंढ्यांचा मृत्यू; साडेनऊ लाखांचे नुकसान

$
0
0

कन्नड:

शेतातून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहक तार मेंढ्यांच्या कळपावर पडून जवळपास ७७ मेंढ्या व ५ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. यात मेंढपाळाचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना शनीवारी पहाटे ३ च्या सुमारास शिवना-टाकळी प्रकल्पाच्या पायथ्याशी जैतापूर शिवारात घडली आहे.

वैजापूर तालुक्यातील वाकला येथील कडूबा सुखदेव आयनर, संजय मांगू शिंगाडे, सदा देमा शिंदे, अंबादास देमा शिंगाडे, बाळू देमा शिंगाडे, महादू देमा शिंदे या सहा मेंढपाळ कुटूंब जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर पंडीत झाल्टे यांच्या २९६ गट क्रमांकामध्ये रात्री वास्तव्यास होते, या सर्व मेंढपाळांच्या ८५ मेंढ्या एकत्रित वाघूळ (संरक्षक) करून कळपाने बंदिस्त होत्या व शेजारी ५० फुटांवर मेंढपाळ कुटुंबातील ३० जण झोपलेले असताना पहाटे अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्याने शेतातून गेलेली उच्चदाबाची ११ के.व्ही.ची विद्युत तार मेंढरांच्या कळपावर पडली, यात ८५ मेंढ्यांचा व काही शेळ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दरम्यान विद्युत तार पडल्यानंतर मेंढरांच्या कल्लोळाने मेंढपाळ जागे झाले, पण कळपातून आगीचे लोळ दिसू लागल्याने मेंढपाळानी स्वतःचा जीव वाचवत शेतमालकास कळविले. शेतमालकाने हतनूर सब स्टेशनला कळवून तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत केला, परंतु तोपर्यंत सर्व मेंढ्यांचा मृत्यू झाला होता.

जैतापूरचे पोलिस पाटील शिवाजी केवट यांनी महसूल व महावितरण यांना या घटनेबाबत कळविले. दरम्यान तहसिलदार संजय वारकड, उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने, सहाय्यक अभियंता सचिन केदारे, तालुका पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. रमण इंगळे, सहाय्यक पशुधन आयुक्त (कन्नड) डॉ. डी. एन. महाजन, पशुधन पर्यवेक्षक डॉ. विजय मोखडे, डॉ. चव्हाण, यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल मंडळ अधिकारी दिनकर पाटील, तलाठी वंदना भिंगारे, देवगाव ( रंगारी ) पोलिस ठाण्याचे विजय धुमाळ यांनी या घटनेचा पंचनामा केला. मेंढपाळावर ओढवलेले संकंट अत्यंत दुर्दैवी असून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे उप-कार्यकारी अभियंता विजय दुसाने यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या वादातून तरुणास जिवंत जाळले

$
0
0

परभणी:

गावातील नालीच्या किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणास जिवंत जाळले. ही घटना सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील वालूर रस्त्यावर शनिवारी (१५ जून) सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सतीश दत्तराव बरसाले (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. सतीश हा स्वत:चे ट्रॅक्टर सेलू वालूर रस्त्याने घेऊन जात असतांना काही लोकांना त्याला आडवून बेदम मारहाण केली. ट्रॅक्टर मधील डिझेल काढून सतीशच्या अंगावर टाकून भर रस्त्यावर जिवंत जाळले. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सेलू पोलीस ठाण्यात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images