…म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरात ऑगस्ट २०१६ मध्ये झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शहरात 'ट्रान्सपोर्ट नगरी' तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेला तीन वर्ष आगामी काही दिवसात पुर्ण होणार आहे. तीन वर्ष उलटल्यानंतर ट्रान्सपोर्ट नगरीचे काम अजुनही सुरू झालेले नाही. ४ ऑक्टोंबर २०१६ रोजी औरंगाबाद शहरात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. याबैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करोडी येथे ट्रान्सपोर्ट नगरी करण्यासाठी जगा देण्याची घोषणा केली होती. या घोषनेनुसार करोडी येथील गट नं २४ मध्ये 'ट्रान्सपोर्ट हब' साठी जागा देण्यात आली आहे. करोडी येथे औरंगाबाद आरटीओ कार्यालयाच्या इमारतीसाठी तसेच फिटनेस टेस्टसाठी जागा देण्यात आली आहे. .या गटात महापालिका, महावितरण, याशिवाय क्रिडा विद्यापीठासाठीही जागा देण्यात आलेल्या आहे. यासह ठिकाणी दोन संस्थांना जागा देण्यात आली आहे. या गटात मराठा व महार या समाजासाठी स्मशान भुमीसाठीही जागा देण्यात आली आहे. करोडी येथे गट नंबर २४ येथे ८० ते ९० एक्कर जागा रिक्त आहे. या गटातील पाच ते दहा एक्कर जागेवर अतिक्रमण आहेत. या गटातून ट्रान्सपोर्ट हबला जागा देण्याचे निश्चित करण्यात आले होते. करोडी येथे प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हब किंवा नगरीची जागा ही औरंगाबाद नाशिक रोडपासून हे हब साडे तिन किलोमिटर अंतरावर आहे. तसेच एएस क्लबपासून हे हब ३०० मिटर अंतरावर आहे. यामुळे करोडीची जागा ट्रान्सपोर्ट नगरीसाठी उपयुक्त मानून या जागेवर ट्रान्सपोर्ट नगरी तयार करण्यासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. करोडी येथे ट्रान्सपोर्ट नगरीचे बांधकाम सार्वजनिक विभागाकडून केले जाणार आहे. या कामासाठी एक एजन्सीही नेमण्यात आले आहे. या एजन्सीकडून डिझाईनींगचे काम गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून सुरू आहे. अजुनही डिझाईन निश्चित झालेले नाही. यामुळे हे काम अजुनही सुरू झालेले नाही. …… लवकरच होणार काम सुरू सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या डिझाईनींगचे काम सुरू आहे. या कामामध्ये ट्रान्सपोर्टरच्या गरजेनूसार बदल करण्यात येत आहे. आवश्यक बदल करून ट्रान्सपोर्ट नगरीचे काम वेगात सुरू होईल. फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिऐशन …… ट्रान्सपोर्ट भवन बांधण्याचाही प्रस्ताव ट्रान्सपोर्ट नगरी येथे नागपूर प्रमाणे ट्रान्सपोर्ट भवन बांधावे अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे उदयोग राज्यमंत्री अतुल सावे यांच्याशी ट्रान्सपोर्ट असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. या ट्रान्सपोर्ट भवन बांधण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावी. यासाठी अतुल सावे यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी माहिती ट्रान्सपोर्ट असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ……… अशी होणार सुविधा करोडीपासून काही अंतरावर दौलताबादच्या माळीवाडा येथे कंटेनर डेपो उभारण्यात आला आहे. या कंटेनर डेपोचाही विस्तार होणार आहे. रेल्वे लाईन जवळ असल्याकारणाने याचा फायदा स्थानिक टान्सपोर्टर्सला मिळेल. याशिवाय एनएच २११, तसेच नागपूर मुंबई एक्सप्रेस वे झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढणार आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी ट्रान्सपोर्ट नगर येथे थांबू शकतील. ट्रान्सपोर्ट नगरीतून वाढणार रोजगार ट्रान्सपोर्ट हब एमएसआरडीसी (महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ) च्या माध्यमातुन उभारले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या हब मध्ये औरंगाबाद शहरातील ट्रान्सपोर्टर्सचे गोडावून, या मार्गावरून जाणाऱ्या ट्रक थांबण्यासाठी पार्किंग, तसेच छोटया वाहनांसाठी जागा, बॉडी बिल्डींगचे गॅरेज, गॅरेज, अटो पार्टस विक्रीची दुकाने, वजन काटा, याशिवाय वाहन चालकांसाठी विश्रांतीगृहे, छोट्या मोठ्या हॉटेल, स्वच्छता गृहे यासोबतच या ठिकाणी जर हजारापेक्षा जास्त कामगार किंवा लोकांची वर्दळ असेल तर अशा ठिकाणी मनोरंजनासाठी थीऐटर उभारण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे या भागात रोजगार वाढण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट